Skip to main content

काही बरणाल्या

मेलेल्यांनाही मिळत होता, मतदानाचा हक्क,
नावे कापून ज्ञानदेवाने दिला, मृतात्म्यांना धक्क.

डुप्लीकेट मते टाकून, रक्षण करत होतो लोकशाहीचे
नावे कापून ज्ञानदेवाने, गाडून टाकली लोकशाही.

बांगलादेशी मतदार होता, आमुचा हो आधार,
नावे कापून ज्ञानदेवाने, दूर केला हक्काचा मतदार .

सेंट्रल फोर्सेस आल्या, बूथ लुटू नाही दिले,
पराजय आमुचा झाला, संविधानाची हत्या झाली.

गाळलेली नावे पुन्हा टाकून, बूथ आम्ही लुटणार
गुनाहगार ज्ञानदेवाला दंड आम्ही देणार.

काळा मठ्ठ बैल … Wed, 20/05/2026 - 00:12

निवडणुकीच्या अखाड्यातील “धर्मवीर”

मतदारच न दिसता, मतपेटी मात्र गर्भवती,
“लोकशाहीचा चमत्कार”—अशी काहींचीच वाकबगती.

केंद्राच्या फौजा उतरल्या, म्हणे रक्षणासाठी,
पण तपासणीच्या नावाखाली, भीतीचं साम्राज्य उभं पायापासून माथ्यापर्यंत.

सभांमध्ये गर्जना—जमिनीवर मात्र शून्य,
विकासाच्या गप्पा म्हणजे, मतांचा फक्त धंदा खूनखराबा.

धर्माच्या तलवारीने मतदारांना कापलं रेषेत,
विभाजनाच्या धुरात हरवली, लोकशाहीचीच शेवटची श्वासरेषा.

“बाहेरचे” म्हणत आरडाओरडा, भिंती उभ्या केल्या लोखंडाच्या,
आरोपांच्या वादळात सत्याचा दिवा—कधीच न पेटणारा.

यंत्रांवरचा विश्वास म्हणे, देवासारखा पवित्र,
पण निकाल लागला की दोष—नेहमीच इतरांवर चित्र.

जिंकण्यासाठी नियमांना, चामड्यासारखं सोललं,
आणि पराभव झाला की, तक्रारींचं डोंगरच ढकललं.

लोकशाहीच्या नावाखाली, खेळले राजकीय खेळ,
आणि शेवटी म्हणाले—“आम्हीच खरे रक्षक”—हा तर सर्वात मोठा मेळ.

Rajesh188 Thu, 21/05/2026 - 14:27

Social मीडिया, fb, you tube, insta, ट्विटर वर ह्या अशा लोकांच्या पोस्ट वर 80 टक्के लोक विरोधी मत व्यक्त करतात.

यंत्रने चा वापर आणि घोटाळे ह्या मुळेच हे जिंकतात एकदम साफ आहे.

समाज माध्यमावर इतकी लोक अपशब्ध वापरतात तरी शर्म बिलकुल ह्या लोकात नाही.
आर्थिक फायदा असाव की अंध भक्ती.
ह्या अशा लोकांच्या पोस्ट च लॉजिक पासुन हजारो प्रकाश वर्ष दूर असतात त्यांच्या पोस्ट वर logicaly उत्तर देणे पृथ्वी वरील माणसा साठी तरी अशक्य आहे.

विवेक पटाईत Sat, 23/05/2026 - 12:49

ज्या लोकांना देशातील अकरा वर्षाची भूतून भविष्यती अशी झालेली प्रगती दिसते ते लोक फक्त असतात. आणि ह्या लोकांना तर प्रगती दिसणारच नाही. बरनाल लावून दिलेले प्रतिसाद वाचले. बंगालमध्ये तुम्ही केला असता तर तुम्हाला कळले असते वीस पंचवीस लाख लोकांनी यावेळी पहिल्यांदा मतदान केले आधी त्यांचे मते बूथलुटेरे टाकून जायचे. बाकी बांगलादेशी लोक ज्यांना आपले वाटतात त्यांनी बांगलादेशी लोकांना स्वतःच्या घरात जागा द्यावी. केरलच्या एका काँग्रेस आमदाराने काँग्रेसच्या विजयात सर चे योगदान मान्य केले आहे. कारण लाखो डुप्लिकेट मध्ये कापल्या गेले.

'न'वी बाजू Sun, 31/05/2026 - 17:43

In reply to by विवेक पटाईत

बाकी बांगलादेशी लोक ज्यांना आपले वाटतात त्यांनी बांगलादेशी लोकांना स्वतःच्या घरात जागा द्यावी.

१९४७ साली (पाकिस्तानातून!) आलेले (न्हेरूने येऊ दिलेले!) लोक तुम्हाला ‘आपले’ वाटतात, किंवा कसे?

त्यांना तुम्ही स्वतःच्या घरात जागा दिली होतीत काय?

अमित.कुलकर्णी Sun, 24/05/2026 - 08:53

समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता
नावे कापून ज्ञानदेवाने, माझा नंबर पहिला

'न'वी बाजू Sun, 24/05/2026 - 16:32

In reply to by अमित.कुलकर्णी

…‘नावे कापून ज्ञानदेवाने’ हे पालुपद मूळ कवितेतून जसेच्या तसे उचलले आहे, याची कल्पना आहे. (आणि, ते ठीकच आहे.)

मात्र, (मूळ कवितेतील) ‘ज्ञानदेवा’ऐवजी (हल्ली लोकप्रिय असलेला) ‘ज्ञान*द्या’ हा शब्द (कदाचित, मूळ कवीस उद्देशून?) अधिक समर्पक ठरला असता, किंवा कसे, याबद्दल विचार करतोय.

असो चालायचेच.


(बाकी, मूळ कवीची स्थिती बोले तो, ‘आधीच नागपुरी, तशातहि दिल्लीत वाढला’ अशी असल्याकारणाने, ‘समोरच्या कोनाड्यातील हिंदमाते’चा संदर्भ बहुधा (मूळ कवीच्या) डोक्यावरून जाईल, असा अंदाज आहे.)

अमित.कुलकर्णी Mon, 25/05/2026 - 14:09

In reply to by 'न'वी बाजू

मूळ कवीचे नागपूर कनेक्शन माहीत नव्हते!
ज्या विषयावर हे काव्य रचले आहे त्या विषयातील एक्स्पर्टस अमेरिका / रशिया / इराण / युक्रेन / आयुर्वेद / अर्थशास्त्र / राज्यशास्त्र वगैरेंबद्दल इतके ज्ञान वाटत (खरे तर तुम्ही लिहिलेला शब्द इथे अधिक योग्य आहे) फिरत असतात की त्यांना सगळेच कळते असे आम्ही समजतो; पण तरीही भाईकाकांचा रीच पुण्या-मुंबईपलीकडे फारसा नाही हे ही खरेच!

'न'वी बाजू Mon, 25/05/2026 - 16:17

In reply to by अमित.कुलकर्णी

ज्या विषयावर हे काव्य रचले आहे त्या विषयातील एक्स्पर्ट्स

…बोले तो, ‘पटाईत’???

मूळ कवीचे नागपूर कनेक्शन माहीत नव्हते!

ओह, कम ऑन! ‘नागपूर कनेक्शन’ आतापावेतो उघड नाही काय?

अमित.कुलकर्णी Mon, 25/05/2026 - 18:01

In reply to by 'न'वी बाजू

अहो, "एक्स्पर्ट्स" लिहिताना रवळनाथाशपथ माझ्या डोक्यात "ते" नव्हते :D
नागपूरचा खरा अर्थ तेव्हा समजला नाही खरा :(

मनीषा Mon, 25/05/2026 - 19:50

उशीरा का होइना .. अच्छे दिन आलेच म्हणायचे.

पण तुम्ही उल्लेखलेले नावे कापणारे ज्ञानदेव कोण?
मला तर फक्त "अरे अरे ज्ञाना झालसि पावन" असे लिहिणारेच माहिती होते.