तत्कालिन : डाॅल्बीविरुद्ध सेनापती विद्यानंद बापट
रस्त्यावर येऊन आणि प्रचंड ध्वनिप्रदूषण करून सण साजरे करण्याच्या 'नव हिंदू' प्रवृत्तीविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सोमी आणि बातम्यांमध्ये चांगलेच भाव खाऊन जात आहेत. ते left of center आणि नास्तिक असल्याचे अत्यंत नम्रपणे नमूद करतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर:
"घटनादत्त धर्मस्वातंत्र्य आहे. पण ते स्खलनस्वातंत्र्य म्हणून आम्ही मान्य करतो. पण स्खलनस्वातंत्र्य म्हणजे 'Right to be wrong' म्हणजेच 'चुकीचं वागण्याचं स्वातंत्र्य' आम्ही ते बलप्रयोगाने थांबवू शकत नाही. ते आम्ही काऊन्सिलिंग म्हणजेच प्रबोधनाने थांबवू."
"प्रथा परंपरेच्या नावाखाली सतीप्रथा, बालविवाह, जरठकुमारी विवाह, केशवपन या सगळ्याचं तुम्ही समर्थन करायला जाल. हे जसं तार्किकदृष्ट्या टिकणार नाही. तसच ढोलताशांचंही समर्थन टिकणारं नाहीये. ढोलताशे तुम्ही बंदिस्त प्रेक्षागृहात वाजवा. ज्यांना ऐकायचं त्यांनी ते तिथे जाऊन ऐका. आमचं काहीही म्हणणं नाही."
आवाजी सणांना, वहातूक कोंडीला आणि गणेशमंडळांच्या (अर्थात राजकीय पक्ष प्रायोजित) मुजोरपणाला विटलेल्या सर्वसामान्य पुणेकरांचा (यात आता भाजपाचे समर्थकपण नाईलाजाने सामिल झाले) बापटांना प्रचंड पाठिंबा मिळाला असल्याने अखंड हिंदूराष्ट्र, राष्ट्रप्रथम वाल्या लोकांची पंचाईत झाली आहे. बापटांचे मुद्दे कोणाला खोडून काढता येईनात. मौज आहे एकूण 🙂
आडनाव बंधू
आडनाव बंधू आहेत, त्यामुळे तुम्हाला विशेष कौतुक वाटलेलं दिसतंय ! अर्थात त्यांनी केलेला प्रयत्न स्पृहणीय आहेच. सात- आठ वर्षांपूर्वी रत्नागिरीतून पुण्याला आले आहेत असं मुलाखतीत ऐकलं. चेहरा कोरा ठेऊन समोरच्याला तर्कशुद्ध प्रतिवादाने निरुत्तर करण्यात त्यांचा हातखंडा दिसतो. त्यांच्या विषयी अपमानकारक विधानं केलेल्या लोकांना अत्यंत निर्विकारपणे don't shoot the messenger - you can't do anything about the message असं म्हणतात त्यामुळे जाम मजा येते. त्यांच्यावर व्यक्तिगत टीकात्मक हल्ला झाला तरी अजिबात विचलित न होता निवांतपणे आपला मुद्दा लाऊन धरतात. त्यामुळे त्यांच्यावर मीम्स पण अत्यंत मनोरंजक येताहेत. एकेठिकाणी big bang theory मधल्या शेल्डनशी साधर्म्य दाखवणारा मीम आवडला. मात्र कॉमर्स ग्रॅज्युएट आणि BPO मध्ये नोकरी अशी अगदी non glamorous पार्श्वभूमी असल्याने सुद्धा बापट जनसामान्यांना एकदम आपले वाटत असावेत. आजच्या जमान्यात त्यांचं शुद्ध मराठी ऐकून सुद्धा छान वाटतं!
तुमचा तळटीप रोख बरोबर आहे, पटला 🙂
>>>अखंड हिंदूराष्ट्र,…
>>>अखंड हिंदूराष्ट्र, राष्ट्रप्रथम वाल्या लोकांची पंचाईत झाली आहे.
हा शोध खूपच गंमतीचा आहे. कोणते ए आय वापरले?
कारण महाराष्ट्रात बरेच ठिकाणी कामानिमित्त गणपती उत्सवात फिरत असतांना डीजे लावणारे कार्यकर्ते सर्वपक्षीय असतात... आणि बहुतेक डीजेवाले मराठा आणि ओबीसी समाजातून येतात. त्यांच्याकडे काम करणारे (जे स्वतःला मुजिशीयन) असे म्हणवून घेतात ते बरेचदा शेड्युल्ड कॅटेगरीतले असतात. या डीजेवर नाचणारे सुद्धा हेच लोक असतात. तथाकथित अभिजन यात नसतातच. त्यामुळेच सरकार पटकन डीजेवर बंदी आणू शकत नसावे असे वाटते.
म्हणून विचारले की कोणते ए आय वापरले..? उत्तर अडचणीचे असेल तर दिले नाही तरी चालेल.
ए आय कशाला पाहिजे? उत्तर…
ए आय कशाला पाहिजे? उत्तर तुम्हीच दिलंय की. ही अशी जातीवरून कोण काय काम करतात ही वर्गवारी तुम्हाला चांगलीच माहीत आहे. मग या मंडळांना 'मॅनेज करणारे' आणि पैसा पुरवणारे कोण असतात तेही तुम्हाला माहितेय. गणेशमंडळ अध्यक्षांकडून बरीच मनोरंजक माहिती मिळते. बारा वर्षं एकहाती सत्ता असणार्या लोकांकडे जितका पैसा या मंडळांना द्यायला आहे तितका इतर कुणाकडेही नाही हे उघड आहे. 'सांस्कृतिक गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे जगाला पुणेकरांनी दाखवून द्यावे' असे गुळमुळीत फालतू विधान करणाऱ्याच्या हाती अख्ख्या महाराष्ट्रात डाॅल्बीवर बंदी घालायचे अधिकार आहेत. पण ते तसं करणार नाहीत. बापटांची जात अखंड हिंदूराष्ट्र, राष्ट्रप्रथम वाल्या लोकांची पंचाईत करते. धड ना त्यांच्या विरोधात बोलता येतं आणि धड ना पाठिंबा देता येतो! पाठिंबा द्यावा तर high command नाराज आणि विरोधात बोलावं तर सामान्य माणूस अक्कल काढतोय. घैसास, कुलकर्णी वगैरे लोकं बापटांवर अपमानकारक टीका करतात तेव्हा त्यांची कशी शाब्दिक धुलाई होतेय ते वाचून इतर आपोआपच गप्प बसत असतील. म्हणूनच मजा चालू आहे.
>>>मग या मंडळांना 'मॅनेज…
>>>मग या मंडळांना 'मॅनेज करणारे' आणि पैसा पुरवणारे कोण असतात तेही तुम्हाला माहितेय.
अगदी नेमके माहित आहे.
>>>गणेशमंडळ अध्यक्षांकडून बरीच मनोरंजक माहिती मिळते.
धर्मादाय आयुक्तांकडून अधिक उपयुक्त माहिती मिळते. प्रश्न कसे विचारायचे ते माहित असावे.
>>>बारा वर्षं एकहाती सत्ता असणार्या लोकांकडे जितका पैसा या मंडळांना द्यायला आहे तितका इतर कुणाकडेही नाही हे उघड आहे.
इथे तुमचे आमचे एकमत नाही. सर्वच पक्षांकडे या मंडळांना द्यायला पैसा आहे हे निर्विवाद सत्य.
>>> 'सांस्कृतिक गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे जगाला पुणेकरांनी दाखवून द्यावे' असे गुळमुळीत फालतू विधान करणाऱ्याच्या हाती अख्ख्या महाराष्ट्रात डाॅल्बीवर बंदी घालायचे अधिकार आहेत.
हे विधान प्रत्येक मुख्यमंत्रीपदी बसणा-याला (खुर्ची टिकवण्यासाठी) करावेच लागते. तुम्ही जरी मामु (माननीय मुख्यमंत्री) झालात तरी हेच होईल याची आम्हास खात्री आहे.
>>पण ते तसं करणार नाहीत.
हंगाश्शी... तेच तर आम्ही म्हणत होतो...
>>> बापटांची जात अखंड हिंदूराष्ट्र, राष्ट्रप्रथम वाल्या लोकांची पंचाईत करते.
अजिबात नाही. ती जात कुणाची पंचाईत करत नाही... बिनधास्त त्यांचे नाव घेऊन झोडपता येते... तुम्ही पण करुन पहा..
>>>धड ना त्यांच्या विरोधात बोलता येतं आणि धड ना पाठिंबा देता येतो! पाठिंबा द्यावा तर high command नाराज आणि विरोधात बोलावं तर सामान्य माणूस अक्कल काढतोय.
सामन्य माणूस सदर जातीच्या नावाने नेहमीच शंख करत असतो... त्याला काही फरक पडत नाही.
>>>घैसास, कुलकर्णी वगैरे लोकं बापटांवर अपमानकारक टीका करतात तेव्हा त्यांची कशी शाब्दिक धुलाई होतेय ते वाचून इतर आपोआपच गप्प बसत असतील.
अजिबात नाही. बरेच इनपुटस आहेत वरच्या स्तरावर डीजेबंदी होऊ नये यासाठी... कान डोळे उघडे ठेवा. राप(अप) गट सगळ्यात जास्त सक्रिय आहे...
>>>म्हणूनच मजा चालू आहे.
याबाबत एक मत.
>धर्मादाय आयुक्तांकडून अधिक…
>धर्मादाय आयुक्तांकडून अधिक उपयुक्त माहिती मिळते.
- हाहाहा. तुमचा शोध भारी आहे. आणि हा ए आय नाही याबद्दल खात्री आहे. सरकारी आकड्यांवर तुमचा गाढ विश्वास दिसतो. गणेशमंडळ अध्यक्ष बरीच वेगळी माहिती सांगू शकतात. त्यांनाही कोणते प्रश्न विचारायचे ते महत्त्वाचं.
आता बापटांना मारहाण करून आणि त्यांचा दाभोळकर करण्याची धमकी देऊन कशी जिरवली की नाही?? बोलबच्चन मामु काय करतात पाहू! मौज आहे.
>>>सरकारी आकड्यांवर तुमचा…
>>>सरकारी आकड्यांवर तुमचा गाढ विश्वास दिसतो.
:) मी सरकारी आकड्यांबद्दल बोलत नव्हतो. धर्मादायच्या संकेत स्थळावरचे लेखापरीक्षण केलेले आकडे संस्था/ विश्वस्त मंडळांनीच सादर केलेले असतात. तिथे सरकारी आकडे वगैरे संदर्भ नसतो.
मी बोलत होतो ते धर्मादाय आयुक्तांसमवेत चर्चा करण्याबद्दल. तुम्हाला ते समजले नसावे, किंवा समजुन घेतले नसावे. असो.
का?
>>>सरकार पटकन डीजेवर बंदी आणू शकत नसावे असे वाटते.>>
का बरं?
किती मोठा आवाज किती वेळ सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही याचे नियम असतीलच. तो नियम लावा आणि करा बंद.
चैत्र महिन्यापासूनच ( गणपती भाद्रपदात येतात)बंदी आणली असती तर ढोल ताशा सराव पथकांचा सराव वाचला असता.
तर बापटांनी तुतारी हाती घेतली आहे .कुणी मला आणून द्या बोलले नाहीत.
>>>>किती मोठा आवाज किती वेळ…
>>>>किती मोठा आवाज किती वेळ सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही याचे नियम असतीलच. तो नियम लावा आणि करा बंद.
अरेच्या हो का ? खरेच की विसरलोच की... ते रात्री १० चा नियम आहेच की... तीन दिवस गणपती आणि तीन दिवस गरबा रात्री १२ पर्यत सुट सरकार न मागताच देते...
बाकी मागच्या २६ तारखेला मोठी जयंती साजरी झाली... सकाळी ४ वाजताच मोहल्ल्यात डीजेवर प्रार्थना... मग हे मग ते करत रात्री २ वाजेपर्यंत दणादण चालू होते... भंडारा पण झाला. जुलूस पण झाला.. दणक्यात. परवानगी नाही की अनुमती नाही.. मज्जाच मज्जा !!!
बापट crystal clear छान माणूस आहे.
बापट कॉमर्स graduate आहे. BPO मध्ये नोकरी करता. ही पार्श्वभूमी उलट त्यांना अधिक आकर्षक बनविते. ते पारंपरिक कार्यकर्ते किंवा पारंपरिक बुद्धिजीवी वर्गातून आलेले नाहीत असे असूनही एक सामान्य माणूस असूनही ते ज्या passion ने आपला मुद्दा मांडत आहेत भांडत आहेत ते खूप कौतुकास्पद आहेच आहे.
संस्कृत इंग्रजी मराठी सर्व भाषा वापरून तार्किक बोलून बहार आणले त्यांनी. त्याहून महत्वाचं ज्या मुद्द्यावर कोणीच तोंड उघडत नाही आणि ताप ओढवून घेत नाही तिथे हा माणूस आपली Time energy लावतोय हेच खूप आशावादी आहे.
मात्र अखेरीस फार काही होणार ही अपेक्षा भाबडी आहेच. एक साध उदाहरण राज ठाकरे सारख्या मोठ राजकीय पाठबळ असलेल्या नेत्याने जे आक्रमक सुद्धा आहेत कार्यकर्त्यांची फौज ही आहे तरी त्यांना मशिदींवरील भोंगे बंद करता आले नाहीत.
त्यामुळे बापट काही क्रांतिकारी बदल घडवून आणतील असे तूर्तास तरी वाटत नाही.
अंदाज चुकला आणि क्रांती झाली तर आनंदच वाटेल.
बघूया
बापटांना स्वतःला सुद्धा लगेच…
बापटांना स्वतःला सुद्धा लगेच क्रांतिकारी बदलांची अपेक्षा नसेल. नास्तिक आणि डाव्या विचारसरणीच्या या व्यक्तीने आपले विचार मांडण्याचं धैर्य झुंडशाहीत दाखवलं (त्यांच्या जोडीला आता केळकर आलेत असं वाचलं). त्यामुळे निदान लोकांची नाराजी तर उघडपणे व्यक्त होऊ लागली! ज्याला त्याला राष्ट्रद्रोही, हिंदूविरोधी अशी लेबलं लावणाऱ्यांचे कान आणि डोळेही असह्य आवाज आणि लेझरमुळे फुटू शकतातच ना! त्याच लोकांना शेवटी या मुद्यावर बापटांना नाईलाजाने पाठिंबा द्यायला लागला. काही चांगलं घडेल न घडेल पण सामान्य हिंदू मतदारांची सरकारला जरा सुद्धा पर्वा नाही हे उघड झालं.
"डाव्या विचारसरणीच्या या…
"डाव्या विचारसरणीच्या या व्यक्तीने आपले विचार मांडण्याचं धैर्य झुंडशाहीत दाखवलं"
बीबीसी आणि लोकसत्ताच्या यूट्युब हँडलवर मुलाखतीही पाहिल्या. विचार इथल्या बहुतांश सदस्यांना आपलेसे वाटतील. विचार मांडांयचे धैर्य, शांतपणे करायचा प्रतिवाद ही कौशल्य वादातीत आहेत. म्हणूनच मला पण आवडले हे सदगृहस्थ. त्यांना हाकलवून लावतानाचा तो व्हिडिओ पाहिला. त्या अगोदर घडलेल्या घटनेची फक्त कल्पना करता येते. (तसा पूर्ण व्हिडिओ असेल तर तो वादविवाद बघायला आवडेल). पुढे काय होईल हे मला तितकेसे महत्त्वाचे वाटत नाही. पण कुणीतरी वाचा फोडली हे महत्वाचे.
>>> सामान्य हिंदू मतदारांची…
>>> सामान्य हिंदू मतदारांची सरकारला जरा सुद्धा पर्वा नाही हे उघड झालं.
किंचित सुधारणा.. सामान्य मतदारांची सरकारला जरा सुद्धा पर्वा नाही हे उघड झालं (की सरकार फक्त मुस्लिम धार्जिणे आहे... असेल बुवा ;) )
काय आहे... आम्ही पडलो मध्यममार्गी त्यामुळे डाव्यांसारखे हिंदूत्व वादी हिंदूत्ववादी आणि उजव्यांसारखे मुस्लिम धार्जिणे मुस्लिम धार्जिणे असला घोषा लावत नाही... चालायचेच...
>>>मशिदींवरील भोंगे बंद करता…
>>>मशिदींवरील भोंगे बंद करता आले नाहीत.
येणार पण नाहीत कारण मग मंदीरावरील भोंगे (सकाळी सकाळी ३.३० वाजता काकड आरती, रात्री ११ वाजता शेजारती), चातुर्मास सप्ताह, जैन स्थानक चातुर्मास प्रवचन, बौध्द विहारातील भंते प्रवचन... काय काय बंद करणार...? चालू द्या भोंगे..
.
सर्वप्रथम, I must confess that I am terribly impressed. (अर्थात, ते महत्त्वाचे नाही. कारण, 'न'वी बाजू नावाचा अटलांटातील कोणी सोम्यागोम्या impress व्हावा, हा बापटांचा फोकस असेलसे वाटत नाही. (तसा तो असूही नये.) त्यांना जे पटते, ते ते निर्भीडपणे, रोखठोकपणे मांडतात, असे दिसते. कोणी त्यातून impress व्हावे, हे त्यामागील उद्दिष्ट नसावे.)
(त्यांच्या अनेक मुलाखती पाहिल्यावर त्यांत अनेक मुद्द्यांचा तोचतोचपणा जाणवतो खरा, परंतु, तो त्यांचा दोष नव्हे. त्यांना दर खेपेस जर तेचतेच प्रश्न विचारले गेले, तर त्यांची प्रत्येक खेपेस निरनिराळी उत्तरे त्यांच्यासारख्या logically consistent माणसाने द्यावीत, अशी अपेक्षा कशी करता येईल बरे? मात्र, या निमित्ताने त्यांची विचारपद्धती अनेक जणांपर्यंत पोहोचते आहे, हे चांगले आहे.)
माणसात वैचारिक स्पष्टता तथा तर्कसुसंगती, दोन्हीं दणकट आहेत, हे निश्चित. आजकाल हे दोन्हीं गुण दुर्मिळ आहेत.
ते स्वतःला नास्तिक म्हणवतात. तो अर्थात त्यांचा दृष्टिकोन आहे, नि तो आपल्या जागी ठीकच आहे. आणि, नारायण पेठेत राहून जर ते left of center राहू शकत असतील, तर, good for him, and may his tribe grow!
Having said that,
"प्रथा परंपरेच्या नावाखाली सतीप्रथा, बालविवाह, जरठकुमारी विवाह, केशवपन या सगळ्याचं तुम्ही समर्थन करायला जाल."
यात एकच गोष्ट खटकते. म्हणजे, बापट स्वतः प्रतिपक्षाच्या आर्ग्युमेंटांमधील logical fallaciesचे दाखले देत असतात. (आणि, ते चपखलही असतात; त्याबद्दल वाद नाही.) परंतु, प्रतिपक्षाने जो मुद्दा केलेलाच नाही, त्यावरून त्याला ठोकणे, हे नक्की कोठल्या fallacyचे उदाहरण म्हणता येईल बरे? (तर्कशास्त्राचा माझा अभ्यास तितकासा चांगला नसल्याने हा प्रश्न विचारतोय. कदाचित हे गुगलून काढता येईलही. परंतु, ही जी कोठली fallacy असेल, ती असो, परंतु, हे चटकन डोळ्यांत भरले नि खटकले खरे. कारण, आजमितीस सतीप्रथा, बालविवाह, जरठकुमारी विवाह, केशवपन, यांपैकी कोठल्याही कुप्रथेचे समर्थन प्रतिपक्षापैकी कोणीही केल्याचे निदान माझ्या माहितीत तरी नाही. (Although, not necessarily on account of any enlightenment, I am pretty sure. It is merely that justification of such practices is so last century, you know, and certainly not the in thing these days. Unless, of course, some socio-political entity decides to make it the in thing again. But, until then...) उगाच 'उद्या तुम्ही समर्थन कराल' या जर-तरला काय अर्थ आहे?)
(आता, मी हे जे काही मांडले, तो वरकरणी (बापटांच्या लाडक्या) tu quoque fallacyचा प्रकार वाटू शकेल कदाचित. तर तो तसा नाही. बापटांनी जी भूमिका मांडलेली आहे, ती एकंदरीत मला पटते. तिला माझा अजिबात विरोध नाही. (त्यात त्यांच्या नास्तिक्याचा किंवा नास्तिक्यवादी भूमिकेचा जो भाग आहे, तो त्यांच्या वैयक्तिक विचारसरणीचा भाग झाला; त्यांच्या भूमिकेचा तो भाग मला शंभर टक्के पटेलच, असे नाही, परंतु, त्याला माझा विरोधही नाही, आणि, at least, I think I understand where he is coming from.) आणि, ती भूमिका मांडताना त्यांची तार्किक सुस्पष्टता वाखाणण्याजोगी आहे. फक्त, त्या तर्कशुद्धतेला तर्कदोषाचे हे किंचितसे गालबोट लागू नये, म्हणून हा खटाटोप. (अर्थात, त्यांची मुलाखत घेणार्यांपैकी किती जणांना हा किंचित तर्कदोष लक्षात येईल, हे शंकास्पदच आहे म्हणा! चालायचेच.))
(बाकी, बापटांचे हे किंचित 'चुक्याच' हे मी त्यांचा right to be wrong म्हणून सोडून देतो. असो.)
विद्यानंद बापट कमालीचे…
विद्यानंद बापट कमालीचे चॅनेलप्रिय व्यक्तिमत्व झाले आहेत. गेल्या चारपाच दिवसात त्यांच्या अनेक मुलाखती गाजत आहेत.
कुठेही बोलताना एकही वावगा शब्द त्यांच्याकडून येत नाही. तर्ककर्कश्य म्हणावे इतक्या कठोरपणे ( पण आवाज खाली ठेवून)आणि कोऱ्या चेहऱ्याने बोलत असतात.
गणपती उत्सवानिमित्ताने होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरुद्ध बोलत असतात. समाजातील बराच मोठा वर्ग सोशल मीडियावर त्यांच्या बाजूने लिहीत आहे आणि काही त्यांच्या बोलण्यात खोट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या वर तुटून पडत आहेत.
त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचेच हसे होत आहे. (उदा. भाजप शहरप्रमुख घाटे) राजकीय पार्श्वभूमी कुठलीच नसल्यामुळे सर्वपक्षीय ( अगदी भाजप सुद्धा) मध्यमवर्ग त्यांच्या बाजूने उभा राहिला आहे. शुद्ध आणि स्पष्ट मराठी , हातासरशी सॉक्रेटिस ते तुकाराम ते भारताची राज्यघटना याचे दाखले देत असल्यामुळे कि काय माहित नाही , लोकांना ते परके वाटत नाहीत.
नारायण पेठेतले आहेत . नारायण पेठेतील तळटिपांसकट तर्कशुद्ध लिहिणारे आमचे मित्र इथे आपल्याला परिचित आहेतच.
गेले चारपाच दिवस पुण्यात धमाल उडाली आहे या विषयावर.
for a change , उत्सवाच्या निमित्ताने धुमाकूळ घालणारे राजकीय पाठबळ असणारे पुंड प्रवृत्तीचे लोक बॅकफूट वर आहेत .
मजा आ रहा हय .
परदेशी राहणाऱ्या इथल्या लोकांना काय चाललंय हे बघायचं असेल तर त्याच्या मुलाखती बघाव्यात ( starting from महानगरपालिका सभागृहात जाऊन त्याने आपला मुद्दा मांडला आणि तिथे काय गदारोळ उठला. करमणूक आहे )
मेरी भी तळटीप : इथे डॉल्बी , DJ, प्लास्मा इत्यादी शब्दांचा अर्थ अत्यन्त मोठ्या असह्य आवाजात लावले जाणारे स्पिकर्स असा घ्यावा.