निर्भया डॉक्युमेंटरी
बीबीसी ४ चॅनेलने भारत सरकारच्या इच्छेविरुद्ध ही डॉक्युमेन्टरी प्रदर्शित केली आहे. ही डॉक्युमेंटरी ह्या २०१२ सालच्या बलात्कार प्रकरणाशी संबंधित आहे.
भारत सरकारची इच्छा अशी आहे की ही डॉक्युमेंटरी जगात कोठेच दाखविली जाऊ नये. सध्यातरी भारतापुरती तिच्यावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. राजनाथ सिंहापासून सगळे तोंडाला फेस येईपर्यंत हिच्या विरोधामध्ये बोलत आहेत.
प्रश्न असा आहे की भारत सरकारची ही इच्छा कितपत समर्थनीय आहे? जगभरची बंदी बहुधा शक्य होणारच नाही पण भारतातहि तिच्यावर बंदी घालणे योग्य वाटते काय? कोणत्या कायद्यानुसार भारतात ही बंदी आणण्यात आली आहे हे मला समजत नाही कारण त्यात बेकायदेशीर असे काहीच दाखविलेले नाही. भारतातील पुरुषी विचार त्यांच्या खर्याखुर्या नग्नावस्थेत जगापुढे येतात इतकेच काय ते भारताच्या दृष्टीने म्हटले तर लज्जास्पद आहे असे 'राष्ट्रवादी' लोक म्हणू शकतील. पण जी वस्तुस्थिति आहे ती आहे. ती लपवून काय लाभ आणि सध्याच्या जगात ती लपविता येईल काय?
ही डॉक्युमेन्टरी पहा आणि आपले खालील मुद्द्यांवर आपले मत नोंदवा असे म्हणतो:
१) असे निर्बंध घालणे कितपत योग्य?
२) असे निर्बंध कायद्याने घालावेत काय?
३) असे निर्बंध घालणे शकय आहे काय?
मुलीचे नांव जाहीर
>> डॉक्युमेंटरीत आक्षेपार्ह असेल तर एकच गोष्ट आहे, ती म्हणजे त्या मुलीचे नांव जाहीर केले आहे.
नयना पुजारी खून किंवा नुकत्याच लोणावळ्यात झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणासारख्या इतर प्रकरणांतही बलात्कारानंतर मृत झालेल्या स्त्रीचं नाव जाहीर झालं आहे. मग ह्या प्रकरणात गोपनीयता कशासाठी पाळली जावी?
अधिक चर्चा होणं गरजेचं
माहितीपट अजूनही पाहिलेला नाही. फेसबुक आणि इतरत्र वाचलेल्या मतामतांवरून बनवलेलं हे मत -
१. निर्बंध अयोग्य वाटतात.
२. कायद्याने निर्बंध घालू नयेत. (यामागचं बारकं कारण असं की इंटरनेट युगात डिजीटल माहितीवर निर्बंध घालणं, पूर्ण ब्लँक करायचं असेल तर चीनसारखी फायरवॉल लागेल. आपल्याकडे तितपत निर्बंध नाहीत. त्यामुळे या बंदीचा खरोखर फायदा कितपत होईल याबद्दल संशय आहे. 'एआयबी रोस्ट'चा बहुचर्चित व्हिडीओ यूट्यूबवरून काढल्यानंतरही मला टोरंट आणि यूट्यूबवर मिळाला.)
३. माहीत नाही.
भारतातील पुरुषी विचार त्यांच्या खर्याखुर्या नग्नावस्थेत जगापुढे येतात इतकेच काय ते भारताच्या दृष्टीने म्हटले तर लज्जास्पद आहे असे 'राष्ट्रवादी' लोक म्हणू शकतील. पण जी वस्तुस्थिति आहे ती आहे. ती लपवून काय लाभ आणि सध्याच्या जगात ती लपविता येईल काय?
+१
या निमित्ताने भारतीय पुरुषप्रधानतेबद्दल चर्चा होणं महत्त्वाचं वाटतं. बलात्कार होणं वाईट, पण बलात्कारी मनुष्य कितपत वाईट याबद्दलही त्यानिमित्ताने चर्चा व्हावी. बलात्काराच्या बातम्या बहुचर्चित झाल्यावर "भर चौकात टांगा साल्याला" प्रकारातली प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया वगळता पुढचे कंगोरे बहुतेकांपर्यंत पोहोचावेत.
दुर्दैव आहे की निर्भयाच्या
दुर्दैव आहे की निर्भयाच्या औचीत्याने ही चर्चा घडत आहे... असो.
भारतिय सोडा जगातल्या यच्चावत पुरुषांची मानसिकता फार वेगळी आहे असे वाटत नाही. पण घटनेची उद्युक्तता जरी मानसिकतेवर अवलंबुन असली तरी ती तडीस जाणे इतर घटकांवरही अतिशय अवलंबुन असते, आणी बलात्कार तडीस न्हेणार्या घटकात स्त्रिचे वागणे/कपडे वगैरे घटकांचा सामावेष मी करत नाही हे आधिच स्पष्ट करतो. किंबहुन मी बलात्कारी मानसिकतेचाही विचार करत नाहीये. मी विचार करतो आहे गुन्हेगारी मानसिकतेचा. या मानसिकतेचा उहापोह आवश्यक आहे कारण ती मानसिकता नसेल तर सुवर्णसंधी असुनही बलात्कार सोडा इतर कोणतेही गुन्हे घडत नाहीत. आज अनेक ठीकाणी स्त्रिया एकट्या अथवा पुरुषबहुल परिस्थीतीमधे बिंधास्त वावरताना दिसतात याचे एकमेव कारण त्या पुरुषांचे स्त्रियांबद्दलचे द्रुष्टीकोन इतकेच हे नसुन त्या व्यक्तिंचा गुन्ह्या-बद्दलचा द्रुश्टीकोन हे असते. हा द्रुष्टीकोन कधी नैतीक अधिश्ठानामुळे तर कधी इतर दबाव घटकांमुळे निकोप वा समतोल असतो. And thats the real truth/mechanism that does not spark the crime against anything... at most of the situation. We need to study that first to get the core of criminality. पुरुषांच्या मानसिकतेची चिरफाड एका मर्यादेनंतर नेमके सत्य जाणून घ्यायला कुचकामी आहे.
भारतातही निर्भयामुळे लोक पेटुन उठले ते, Not because of crime against women... but because of brutal crime against humanity but since a girl was involved as a victim (a large number of happening)crime against woman also became major concern. I see nothing else changed...
ता.क :- निर्भयाबाबतीत एक गोष्ट गुन्हा घडायला कारणीभुत ठरली असावी ती म्हणजे सहभागी आरोपींची गुन्ह्याबद्दलची मानसिकता. जसे इंटर्व्युमधे गुन्हेगाराने म्हटले आहे की आम्ही तर काहीच केले नाही पण केव्हडी शिक्षा दिलीय आम्हाला, फलाना फलाना प्रकरणात बलात्कारानंतर मुलिचे डोळे काढले होते... अमुक तमुक ठीकाणी नंतर मुलीला जाळुन मारले होते. एखादा गुन्हा करणे अथवा करुन सहज सुटु शकणे अथवा तो घडल्यास त्याची जबाबदारी/झळ गुन्हा करणार्यावर विषेश न येणे अशी उदाहरणे वा मानसीकता एखाद्या व्यक्तीकडे असेल ती व्यक्ती गुन्हा करायाला सहज प्रवृत्त होइल आणी इथे तेच घडलेले दिसत आहे. गुन्हेगाराला गुन्ह्याचे गंभीर्यच नाही तर तो कसला पश्चाताप दाखवणार... लटकवा अन विषय संपवा.
ह्म्म्म ओके.
अरे काय... थोडं पेनशन का काय ते पकडा की
हाहाहा
______
ह्म्म्म ओके.
http://www.newindianexpress.com/nation/Convicted-Rapist-in-Nirbhaya-Cas…
या निमित्ताने भारतीय
या निमित्ताने भारतीय पुरुषप्रधानतेबद्दल चर्चा होणं महत्त्वाचं वाटतं.
-१०^१००.
भारतीय पुरुषप्रधानतेबद्दल अनंत चर्चा करा. ती सुधरवा वा नष्ट करून टाका. पण "या निमित्ताने" नको. "बलात्कार नीट करू दिला तर जीवाची हमी" असं प्रावधान भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत नाही.
आताच बॅट्याने टाकली बातमी
आताच बॅट्याने फेसबुकवर टाकलेली बातमी वाचली की त्या बलात्कार्यांना खेचून मारलं लोकांनी. खरय का हे?
खरी दिसतेय - http://www.cnn.com/2015/03/06/asia/india-rape-suspect-hanging/index.html
पण हा वेगळा नराधम आहे की तोच आहे?
ह्म्म्म ..... हा वेगळा हलकट आहे.
भारतातील पुरुषी विचार
भारतातील पुरुषी विचार त्यांच्या खर्याखुर्या नग्नावस्थेत जगापुढे येतात इतकेच काय ते भारताच्या दृष्टीने म्हटले तर लज्जास्पद आहे असे 'राष्ट्रवादी' लोक म्हणू शकतील.
यातल्या भारतातील शब्दावर स्ट्रेस असेल तर हे विधान एक मोठे जावईशोधदर्शक आहे. जगातले यच्चयावत (खासकरून गोर्यांच्या देशातले) बलात्कारी स्त्रीचा एक मनुष्य म्हणून प्रचंड सन्मान करतात आणि केवळ वासना भागवायची म्हणून 'भारतीय पुरुषी विचार नसलेला' बलात्कार करून बाजूला होतात असं काहीसं निर्दिष्ट होतं. "भारतीय पुरुषी विचार" एक अनक्वालिफाइड फ्रेज म्हणून प्रचंड न्यूनगंडाची निदर्शक आहे. भारतात अमेरिकेपेक्षा दरडोई १५ पट कमी बलात्कार होतात आणि भारत याबाबतीत स्त्रीयांसाठी अमेरिकेपेक्षा १५ पट चांगला देश आहे.
http://www.nationmaster.com/c
http://www.nationmaster.com/country-info/compare/India/United-States/Cr…
वेल, अमेरिकेची भारताच्या शेजारी नाव लिहायची लायकी नाही इतकं क्राईम रेकॉड बेक्कार आहे. पण भारतीय न्यूनगंड मात्र अतुलनीय आहे.
दिल्लीत नवर्याचा एक मित्र
दिल्लीत नवर्याचा एक मित्र त्याच्या मुलीला बसमधून न्यायचा ते चोहोबाजूने झाकत, रक्षण करत का तर अनेक जण टपलेले असतात घसरुन चुकून हात पडला असे दाखवत लहान मुलींची छाती स्पर्शायला.
____
अनेक असे अनुभव भारतातील प्रत्येकी मुलीच्या प्राक्तनी जळत्या चरचरीत चिरेसारखे आलेले असतात. हे अमेरीकेत होत नाही. हां इथेही पेडोफाइल्स आहेत, गुन्हेगार आहेत पण रोजचे जीवन तरी सुरक्षित आहे. अमेरीकेत किती मुली/बायका पबमध्ये/कॉलेज कँपस्मध्ये दारु पीऊन नंतर त्यांच्यावर रेप होतो ते स्टॅटिस्टिक्स नाही दिलेले. अर्थात दारु प्यायली म्हणजे रेप झाला तरी चालेल असे मी म्हणत नाही.
पण भारतासारखे तर नाही - शाळेला निघालेल्या लहान मुलींची बसमध्ये झालेली परवड तर नाही.
__________
तुमचे भारतीय न्यूनगंडाबद्दलचे अनेक मुद्दे बिनशर्त मान्य पण लैंगिकता सप्रेस केल्याने, शुचितेच्या मूर्ख कल्पनांमुळे, जे आलेले लैंगिक फ्रस्ट्रेशन फक्त भारतातच पाहीले ब्वॉ. अन ही ओकारी होते कुठे - लहान मुलींवर, गर्दीत. फक!!!
दिल्लीत नवर्याचा एक मित्र
दिल्लीत नवर्याचा एक मित्र त्याच्या मुलीला बसमधून न्यायचा ते चोहोबाजूने झाकत, रक्षण करत का तर अनेक जण टपलेले असतात घसरुन चुकून हात पडला असे दाखवत लहान मुलींची छाती स्पर्शायला.
मित्राला मानसोपचार तज्याची गरज आहे. मी दिल्लीत १५ वर्षे राहतोय. बाकी कळून घ्या.
लैंगिकता सप्रेस केल्याने,
लैंगिकता सप्रेस केल्याने, शुचितेच्या मूर्ख कल्पनांमुळे, जे आलेले लैंगिक फ्रस्ट्रेशन फक्त भारतातच पाहीले ब्वॉ. अन ही ओकारी होते कुठे - लहान मुलींवर, गर्दीत. फक!!!
ताई, कृपया मी दिलेली लिंक पहा. अमेरिकेत भारतापेक्षा १५ पट दर्डोई जास्त बलात्कार होतात. उलटी त्या भूमीवर करा. फक पण त्यांनाच म्हणा. किंवा थोडी तरी न्यूनगंडाच्या बाहेर यायची मानसिकता असेल तर १५ दा अमेरिकेला फक म्हणा नि मग एकदा भारताला.
वाचकांना काही नविन
वाचकांना काही नविन देण्यापेक्षा आमचा देश कोणीही काहीही म्हणावं यासाठी उघड्यावर पडला नाही यात मला जास्त स्वारस्य आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीयांचा, एन आर आय लोकांचा न्यूनगंड आणि अमेरिकेने लोकांना मूल्ये शिकवत राहणे हे जे उघडपणे होतेय यातून अमेरिकन लोक आपली काळी बाजू झाकण्यात किती सक्षम आहेत, सॉफ्ट पावर वाले आहेत याची झलक दिसते. न्यू यॉर्क रेप कॅपिटल असताना दिल्ली रेप कॅपिटल ठरणे चूक आहे.
बाय द वे अस्वलजी, (हे सत्य
बाय द वे अस्वलजी, (हे सत्य नसतानाही) भारतीय पुरुषांची स्त्रीविषयक मानसिकता सिक आहे, खूप सिक आहे,खूप खूप सिक आहे हे इथल्या ६०-७०% सदस्यांचं मत आहे याची आम्हाला कल्पना आली आहे. पण दरवेळी तोच मुद्दा पुढे आणला तर त्यातून वाचकांना/बाकी प्रतिसादकांना काय नवीन मिळणार?
काहीच नाही. मुद्दा भरकटवला
काहीच नाही.
मुद्दा भरकटवला आहे. तेव्हा पुढे बोलण्यात प्वाईंट नाही.
अस्वलशेठ, एरवी तुमच्या मुद्द्यांपुढे कोणाचं काही चालत नाही म्हणून वाचायला मजा येते, पण या ठिकाणी स्वारी बरं का..
याला मुद्दा भरकटवणं म्हणायचं की अन्य काही ते मला समजत नाहीये याक्षणी पण ..
पण जे काही आहे ते इथेच वरती तुम्हीही अगदी याच प्रकारे केलं आहेत..
हे अमेरीकेत होत नाही. ज्या
हे अमेरीकेत होत नाही.
ज्या देशाचा राष्ट्रपती, राष्ट्रपती सदनात, विद्यमान राष्ट्रपती असताना, आपल्या क्लर्क लेवलच्या स्त्रीकडून, फसवणूक करून, मुखसंभोग करून घेतो, वर खोटे बोलतो, पदाचा गैरवापर करायचा प्रयत्न करतो त्या देशाबद्दल अधिक बोलणे नको. प्रणव मुखर्जी असं करतील असं वाटतं का? तुमच्या त्या बसमधे मुलीला सांभाळून नेणार्या दिल्लीकराला म्हणावं अमेरिकेत तर व्हाइट हाउस पण सेफ नाही.
----------------------
भारतातले उच्चवर्णीय, सभ्य, सुसंस्कृत, सभ्य, सुशिक्षित लोक अमेरिकेत जातात तेव्हा त्यांचं आयुष्य परिपूर्ण असतं. असं आयुष्य जगात कोणत्याच जमातीला मिळालेलं नसावं. नात्यांमधील भारतीय आर्द्रता, स्थिर लग्ने, लहान मुलांचे लाड, सणसमारंभ, चांगली सामाजिक मूल्ये, कमी गुन्हेगारी, जी आर इ, जीमॅट मधून आलेले लोक असल्याने प्रचंड ज्ञान, बुद्धिमत्ता, शिक्षण, पर्सनल स्पेसचा अतिरेक नसणे, व्यक्तिवादाचा अतिरेक नसणे, शिस्त असणे, अशी खूप चांगली चांगली मूल्यं त्यांच्यात पाहायला मिळतात. हे लोक भारताची घाण टाळून उत्तम जीवन जगायला स्थलांतरित झालेलं "भारताचं क्रीम" आहे. हेच लोक भारतात असते तर परिस्थितीने फ्रस्टेटेड असते. पण त्यांचे अमेरिकेतले जीवन म्हणजे अमेरिकन जीवन नव्हे. पण असं समजण्यात भारताबद्दल न्यूनगंड निर्माण होतो.
एन आर आय लोकांच्या स्वतःच्या तुलनेत रहिवाशी भारतीय लोकांबद्दल न्यूनगंड असणं अगदी योग्य आहे. आहेच परिस्थिती तशी. खूप फरक आहे. पण आर्थिक समृद्धी बाजूला ठेवली तर कितीतरी सामाजिक पॅरामीटर्स मधे "एकूण भारतीय समाज" "एकूण अमेरिकन समाजापेक्षा" श्रेष्ठ आहे.
http://abcnews.go.com/blogs/politics/2011/11/one-in-four-u-s-women-repo…
४ पैकी एक स्त्रीला तिथे कामाच्या जागी हरासमेंट फेस करावी लागते. (नाईलला आकड्यांबद्दल साशंकता नसेल अशी आशा करू. या आकड्यात भारत सरकारचा, भारतीय लोकांचा काही एक संबंध नाही.). अशी हरासमेंट पाश्चात्य जगतात एक "आर्थिक समस्या" देखिल मानली जाते.
त्यामानाने भारतीय ऑफिसेस खूप सुरक्षित आहेत.
http://timesofindia.indiatimes.com/india/Rise-in-sexual-harassment-case…
ही तुलना अॅपल टू अॅपल नाही, पण तरीही कल्पना देण्यास पुरेशी आहे.
तुमच्या त्या बसमधे मुलीला
तुमच्या त्या बसमधे मुलीला सांभाळून नेणार्या दिल्लीकराला म्हणावं अमेरिकेत तर व्हाइट हाउस पण सेफ नाही.
हाहाहा अगदी अगदी मोनिका लेविन्स्की अगदी दूध पीणारं कुक्कुलं बाळच होती.
पण त्यांचे अमेरिकेतले जीवन म्हणजे अमेरिकन जीवन नव्हे.
ह्म्म. हे बाकी खरं आहे. अमेरीकेतही भारताप्रमाणेच विविध स्तराचे अन विविध प्रकारची अनुभवविश्वे असणारे लोक आहेत.
फाटेफोडीची सवय
जगातील पुरुषी विचार त्यांच्या खर्याखुर्या नग्नावस्थेत जगापुढे येतात इतकेच काय ते भारताच्या दृष्टीने म्हटले तर लज्जास्पद आहे असे 'राष्ट्रवादी' लोक म्हणू शकतील.
हे वाक्य ठीक होईल काय? सगळ्या जगात ते असतीलहि पण भारतातहि असे विचार आहेत हे जगापुढे येऊ न देणे हीच सरकारी 'राष्ट्रवादी' प्रेरणा बंदीमागे आहे आणि म्हणून भारताचा उल्लेखच योग्य आहे. कसल्याहि न्यूनगंडाचा 'जावईशोध' ह्या सरळ वाक्यात करण्याची आवश्यकता काय? (मुख्य मुद्द्यापासून दूर जायची आणि फाटेफोडीची सवय सोडली तर!)
भारत सरकार इतके खवळले आहे ह्याचे अन्य कोणते कारण तुम्ही सुचवू शकाल?
हे वाक्य ठीक होईल
हे वाक्य ठीक होईल काय?
वाक्याचं ग्रामर बिघडलं आहे. आहे तसं मला निरर्थक वाटत आहे. जगाच्या पुरुषांचा भारत वाली कसा म्हणून.
सगळ्या जगात ते असतीलहि पण भारतातहि असे विचार आहेत हे जगापुढे येऊ न देणे हीच सरकारी 'राष्ट्रवादी' प्रेरणा बंदीमागे आहे
ही वाक्यरचना योग्य आहे. असा आरोप कराल तर मला त्यात काही गैर वाटत नाही. वाजवी आहे. मी वर दिलेला प्रतिसाद "भारतातील शब्दावर स्ट्रेस असेल तर" असे लिहून दिलेला आहे. जगाच्या विकृती इथेही आहेत हे सरकारला लपवायचे असू शकते हा आरोप म्हणून कंसिडरेबल आहे.
भारत सरकार इतके खवळले आहे ह्याचे अन्य कोणते कारण तुम्ही सुचवू शकाल?
फक्त सरकार खवळले नाही. ९०% मिडिया खवळला आहे. ९०% विचारवंत खवळले आहेत. ९०% सामान्य लोक खवळले आहेत. विरोधी पक्ष खवळला आहे. प्रत्येकाचे कारण वेगळे आहे. 'गुपचूप बलात्कार करू दिला असता तर जीव गेला नसता' या विधानावर सगळे खवळले आहेत. ते खवळणं आणि 'ही डोक्यूमेंटरी पब्लिक मधे आहे' म्हणून खवळणं यांत फरक आहे.
आता का?
आय एस आय एस वाले जेव्हा लोकांना कापतात, जाळतात तेव्हा पण भारतात ते चित्र तश्यास तसं दाखवत नाहीत. अगदी अपघात सुद्धा भयानक असेल तर नाही दाखवत. अमेरिकेत दाखवतात का माहित नाही. कोणता बीभत्सपणा दाखवायचा, नाही याचे इथले संकेत आहेत. श्वापदाचं मन दाखवलं कसं असा कोणाचा संताप असू शकतो. शिवाय यात "राष्ट्रवाद", "पुरुषवाद लपवणे " पाहणे मला तद्दन मूर्खपणा वाटतो. शुद्ध पुरोगामी न्यूनगंड. ही राजकीय दृष्ट्या भयंकर महत्त्वाची केस आहे. "आपण निर्भयाचा अपमान होऊ देत नाहीयेत" हे राजकारणी जीव तोडून दाखवू पाहत आहेत. त्यासाठी , तश्या प्रतिमेसाठी आटापिटा आहे. त्यात डोक्यूमेंटरीचा बळी दिला जात असेल. त्या बाबाला अलरडी फाशी आहे, मग संताप काढा कुठे? काढा डोक्यूमेंटरीवर आणि दाखवा संवेदनशीलता.
ह्म्म्म लोकसंख्येच्या
ह्म्म्म लोकसंख्येच्या विस्फोटामुळे, भारताच्या स्वतःच्या अशा युनिक समस्या आहे. लोकांनी कायदा हातात घेऊ नये, लॉ & ऑर्डर ची जटील समस्या निर्माण होऊ नये या दृष्टीने ती बंदी आणत असावेत.
____
अन अजो मात्र मला एक घटना मात्र आठवते- न्यु ऑरलिन्स च्या वादळात हजारो लोक बेघर होऊन उघड्यावर पडले होते तेव्हा अमेरीकेत त्या शहरात, विस्थापितांवर (उघड्या पडलेल्या लोकांवर) कमालीचे रेप झाले होते खरे.
माझा अवांतर प्रतिसाद.ह्म्म्म
माझा अवांतर प्रतिसाद.
ह्म्म्म लोकसंख्येच्या विस्फोटामुळे भारताच्या स्वतःच्या अशा युनिक समस्या आहे.
एह्र्लिच ने उभे केलेले भूत अजूनही लोकांच्या मानेवरून उतरायला तयार नाही. विस्फोट झाल्यावर नेमके असे काय होईल जे विस्फोटाच्या आधी होत नाही ? विस्फोट होतो म्हंजे नेमके काय होते ?
अरे विस्फोट म्हणजे, लोकसंख्या
अरे विस्फोट म्हणजे, लोकसंख्या प्रति चौरस मीटर अतिच असणे. त्यातून कायदा अन सुव्यवस्थेच्या काही समस्या येऊ शकतात की नाही?
साभार - http://en.wikipedia.org/wiki/Population_density
त्यातून कायदा अन
त्यातून कायदा अन सुव्यवस्थेच्या काही समस्या येऊ शकतात की नाही?
कशा ते विस्ताराने लिहा. एक क्लू देतो - खूप माणसे असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागेल व त्यासाठी पोलिसदल लागेल. हे पटते. पण खूप माणसे असतील तर पोलिस (हवालदार, सब इन्स्पेक्टर, आर्डर्ली वगैरे) बनण्यासाठी मनुष्यबल मुबलक उपलब्ध का नसेल ?? (हा एकच मुद्दा आहे असे नाही. इतरही मुद्दे आहेत. पण .... तुम्ही मांडाल याची वाट पाहतोय.)
पुन्हा तेच?
भारतात अमेरिकेपेक्षा दरडोई १५ पट कमी बलात्कार होतात आणि भारत याबाबतीत स्त्रीयांसाठी अमेरिकेपेक्षा १५ पट चांगला देश आहे.
या विषयी मागे मी सविस्तर प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे वरील आकड्यांबद्दल साशंकता आहे. तुम्ही दिलेल्या लिंकचा सोर्स तपासलात तर हे स्पष्ट आहे. एक उदाहरणः कॅनडाची "रेप" ची व्याख्या: "'Rape' includes sexual assault with a weapon and aggravated sexual assault that may or may not involve sexual intercourse."
तस्मात, आधी ठोस पुरावे द्या. किमान आधीची चर्चा तरी अशी सोयीस्कररित्या विसरू नका.
उचलली जीभ लावली टाळाला. हे
उचलली जीभ लावली टाळाला. हे आकडे भारताच्या आणि यूएसच्या अधिकृत एजन्सीजचे आहेत. नेशनमास्टरने केवळ कोलेट केले आहेत.
-----------------
यात एक सुधारणा आहे. ९% केसेस पुरुषांवरील बलात्काराच्या आहेत. म्हणून १५*.९१% पट हा आकडा ठिक आहे.
--------------
बाकी नाईलचा शुद्ध न्यूनगंड आहे. हे सगळे आकडे, स्रोत, इ इ मागे देऊन झालं आहे. भारतात अंडररिपोर्टींग १५००% आहे असा जावईशोधही काढून झालाय. त्यालाच तो साशंकता म्हणतोय.
मत
तिन्ही प्रश्न पाहिले. डॉक्युमेंटरी पाहण्याच्या आधीच ह्याची उत्तरं देतो आहे, आणि पाहिल्यावर ती बदलतील असं वाटत नाही.
१) असे निर्बंध घालणे कितपत योग्य?
संपूर्ण अयोग्य. उद्या जर एखाद्याने "नथुराम गोडसे हे खरे देशभक्त होते" अशी डॉक्युमेंटरी काढली तर तीसुद्धा प्रदर्शित करावी. लोक काय उचलतात आणि काय नाकारतात ते लोकांना ठरवू दया की.
अर्थात, हे सगळं सेन्सॉरच्या नियमांत बसेल इथवरच- सेन्सॉरच गळचेपी करत असेल तर तो अजून वेगळा मुद्दा होईल.
पण सेन्सॉरने मंजूर केल्यावरही कलाकृतीवर बंधन घालणं अयोग्य आहे.
२) असे निर्बंध कायद्याने घालावेत काय?
नाही- सेन्सॉर बोर्डाची मान्यता असावी. त्याउपर कायदा कशाला?
३) असे निर्बंध घालणे शकय आहे काय?
:ड Digital युगात अशक्य. "यूट्यूबला ही डॉक्युमेंटरी काढायला सांगणे" ह्याप्रकारात काहीच अर्थ नाही. ती अजून १०० पद्धतींनी पसरू शकते- Torrents, downloads, mirroring sites, private videos, email --यादी अनंत आहे!
Digital युगात अशक्य.
Digital युगात अशक्य. "यूट्यूबला ही डॉक्युमेंटरी काढायला सांगणे" ह्याप्रकारात काहीच अर्थ नाही. ती अजून १०० पद्धतींनी पसरू शकते- Torrents, downloads, mirroring sites, private videos, email --यादी अनंत आहे!
साधारण असाच युक्तीवाद त्या R. V. Bhasin यांच्या पुस्तकाबाबत बचाव पक्षाच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयात केला गेलेला होता. कोर्टाने फेटाळला.
----
सध्या अस्तित्वात असलेले सेन्सॉर बोर्ड बरखास्त करावे. सरकारच्या अभिव्यक्तीवर बंधने घालण्यासाठी एक स्वतंत्र व एक्सक्लुझिव्ह सेन्सॉर बोर्ड स्थापित करावे.
हे वाचा
आजच्या सकाळमध्ये पुढील बातमी आली आहे. (रंग मी घातले आहेत):
नवी दिल्ली - निर्भया प्रकरणावर आधारित बीबीसी वाहिनीने तयार केलेल्या माहितीपटावर केंद्र सरकारने घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने केली आहे. सरकारची ही कृती "संपूर्णपणे धक्कादायक‘ असल्याचे एडिटर्स गिल्डने म्हटले आहे.
दिल्लीमध्ये 2012 मध्ये खासगी बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतरच्या घटनांचे चित्रण असलेला "इंडियाज् डॉटर‘ हा माहितीपट ब्रिटिश चित्रपट निर्मात्या लेस्ली उडवीन आणि बीबीसी यांनी तयार केला. या माहितीपटात त्या खासगी बसचा चालक आणि प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याचीही मुलाखत आहे. "निर्भया‘ने प्रतिकार केला नसता, तर तिच्यावर फक्त बलात्कार करून सोडून दिले असते, असे धक्कादायक विधान त्याने मुलाखतीत केले आहे.
या माहितीपटात निर्भयाच्या कुटुंबीयाच्या धैर्याचे आणि संवेदनशीलतेचे चित्रण तर आहेत, शिवाय महिलांबाबत असलेला आरोपींचा आणि वकिलांसह इतर तथाकथित शिक्षित समाजाचा लाजिरवाणा दृष्टिकोन दाखविण्यात आला असल्याचे एडिटर्स गिल्डने म्हटले आहे. त्यामुळे या माहितीपटाच्या प्रसारणावरील बंदी सरकारने उठवावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. मात्र, न्याय आणि सामाजिक शांततेच्या दृष्टिकोनातून आणि या प्रकरणातील दोषी माध्यमांचा गैरवापर करण्याची शक्यता लक्षात घेऊन माहितीपटाच्या प्रसारणास केंद्र सरकारने बंदी घातली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, आरोपींचे वकील एम. एल. शर्मा आणि ए. के. सिंह यांनीही या माहितीपटात महिलांबद्दल अवमानकारक विधान केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतला आहे.
"यू ट्यूब‘वर प्रसारण झाले होते
हा माहितीपट "यू ट्यूब‘वर प्रसिद्ध झाल्याचे वृत्त कळताच भारत सरकारने संतप्त होत बीबीसीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच, भारतातील त्याच्या प्रसारणावरही बंदी घातली आहे. मात्र, हा माहितीपट यू ट्यूबवरून काढून टाकण्यात आल्याचे बीबीसीने सांगितले आहे. प्रसारण झाल्याने या माहितीपटाचा वापर व्यावसायिकतेसाठी करणार नसल्याच्या कराराचा भंग झाल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.
माहितीपटावर भारत सरकारने घातलेल्या बंदीला कोणताही कायदेशीर आधार नाही. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे.
- लेस्ली उडवीन, माहितीपटाच्या निर्मात्या >
हे वाचून येथील प्रतिसादकारांना वारे कोणीकडे वाहात आहे ह्याची उत्तम कल्पना येईल. कोणीतरी वर फक्त सरकार खवळले नाही. ९०% मिडिया खवळला आहे. ९०% विचारवंत खवळले आहेत. ९०% सामान्य लोक खवळले आहेत.> असे 'ठोकून देतो ऐसा जे' पद्धतीचे काही विधान केले आहे. एडिटर्स गिल्ड बहुधा ह्या 'विचारवंतां'मध्ये मोजले जात नसावे! ह्या बातमीला मी ती वाचली तोपर्यंत ४५० लाइक्स आणि ३१ डिसलाइक्स आले होते. ह्याचा आणि त्या ९० टक्क्यांचा मेळ आता त्यांनी घालून दाखवावा.
सरकार हे कोणत्या कायद्याखाली करत आहे त्याचा मला अद्यापि अंदाज आलेला नाही. देशात कायद्याचे राज्य असल्यामुळे आज ना उद्या असा आधार दाखवावा लागेल अन्यथा यूट्यूबवर भारतात घातलेली बंदी उठविण्याची नामुष्की पत्करावी लागेल.
सरकार हे कोणत्या कायद्याखाली
सरकार हे कोणत्या कायद्याखाली करत आहे त्याचा मला अद्यापि अंदाज आलेला नाही. देशात कायद्याचे राज्य असल्यामुळे आज ना उद्या असा आधार दाखवावा लागेल अन्यथा यूट्यूबवर भारतात घातलेली बंदी उठविण्याची नामुष्की पत्करावी लागेल.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने बंदी घातली आहे. युट्युब ला पण सरकारने हाच आदेश पाठवल्याचे कुठेतरी वाचल्याचे आठवते. मी वाचल्याप्रमाणे, तो आदेश आधीच सरकारने बीबीसीलाही पाठवला होता. त्यामुळे त्यांनी भारतात दाखवणार नाही हे स्पष्ट केले. बीबीसी ने स्वतः युट्यूब वर डॉक्युमेंटरी टाकली आहे का याची कल्पना मला नाही. आजच एका वृत्तपत्रात वाचलेल्या बातमीनुसार बीबीसी ने गुगल ला विनंती केली आहे कि या डॉक्युमेंटरी चे सगळे व्हिडीओ काढून टाकावेत. कारण: Copyright Infringement
सरकार कोणत्या कायद्यानुसार कारवाई करते आहे याची कल्पना नाही. परंतु सरकारच्या मते, ब्रीच ऑफ कॉन्ट्राक्ट आहे. तसेच, सरकारच्या मते, ही मुलाखत 'सामाजिक उद्देशा' साठी घेण्यात आली होती, व्यावसायिक उद्देशा साठी नाही. डॉक्युमेंटरी दाखवण्याच्याआधी तिहार जेल मधील अधिकार्यांना दाखवणे अपेक्षीत होते परंतु तसे झाले नाही. सध्या तरी जी लीगल नोटीस आहे ही याच धर्तिवर पाठवण्यात आली असावी. ही लीगल नोटीस तिहार जेल कडुन पाठवण्यात आली आहे, सरकार कडुन नाही. सरकार पुढचा तपास करत आहे. कालच लोकसतामध्ये वाचलेल्या बातमीनुसार, मुलाखतीबद्दल ४०००० रुपये देण्यात आले होते. खरे खोटे तपासाअंती कळेलच. तसेच, इतर बर्याच गुन्हेगारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. परंतु, फक्त एकच मुलाखत डॉक्युमेंटरी मध्ये आली.
दिल्लीच्या लोकांना बदनाम करू
दिल्लीच्या लोकांना बदनाम करू नये. दिल्लीचे लोक ही मुंबईपेक्षा वेगळे नाही.
अंधारातल्या राक्षसांची मनोवृत्ती कळल्याशिवाय दिवसाच्या उजेडाचे महत्व कळत नाही. अपराधी अश्या मनोवृत्तीचे का झाले? या विषयाची कारणे शोधून ते दूर करणे अधिक गरजेचे. त्या शिवाय आपण पुढील घटना थांबवू शकत नाही. प्रतिबंध लावण्याने दहापट जास्त लोक पाहतात आणि चर्चा करतात, या शिवाय अधिक काही होत नाही.
समाजात अशी विकृत मनोवृत्तीची
समाजात अशी विकृत मनोवृत्तीची मानस असतात कि मुलीना बाहेर पडाव कि नको याचा विचार करावा लागतो. आज इथे सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या आणि मला काही दिवसांपूर्वी रेप च्या संधर्भात एका परदेशी नटीन केलेलं वक्तव्य आठवलं. ती बया म्हणाली कि रेप म्हणजे फारशी मोठी गोष्ट नाही रेप म्हणजे एक सरप्रायाजिंग सेक्स होय.पण त्या बयेला हे कुणी सांगाव कि सरप्रायाजिंग सेक्स हवा हवासा वाटण्याएवढी भारतीय स्त्रियांची मानसिकता खालच्या पातळीची नाही. अजून भारतीय स्त्रिया आपल शील प्राणापेक्षा जपतात.अशा वक्तव्यामुळेच आधीच विकृत असणार्या माणसाना अधिक विकृत होण्यासाठी खतपाणी मिळत.
समजुतीचे दौर्बल्य असले की
समजुतीचे दौर्बल्य असले की असेच होणार.
माझा मुद्दा असा आहे की रेप ही अतिशय घृणास्पद इ. गोष्ट आहे. पण एकदा रेप झाला म्हणजे जीवन बर्बाद झाले, आता जगण्यासारखे काही नाही अशी मेंटॅलिटी नसेल तर ते उत्तमच नाही का? रेप झाला, शारीरिक-मानसिक त्रास खूप झाला- बरोबर. परंतु रेप झाला म्हणजे यापुढे जीवन जगण्यात अर्थ नाही वगैरे पटत नाही.
माझा मुद्दा असा आहे की रेप ही
माझा मुद्दा असा आहे की रेप ही अतिशय घृणास्पद इ. गोष्ट आहे. पण एकदा रेप झाला म्हणजे जीवन बर्बाद झाले, आता जगण्यासारखे काही नाही अशी मेंटॅलिटी नसेल तर ते उत्तमच नाही का? रेप झाला, शारीरिक-मानसिक त्रास खूप झाला- बरोबर. परंतु रेप झाला म्हणजे यापुढे जीवन जगण्यात अर्थ नाही वगैरे पटत नाही.
माझा मुद्दा असा आहे की रेप ही
माझा मुद्दा असा आहे की रेप ही अतिशय घृणास्पद इ. गोष्ट आहे. पण एकदा रेप झाला म्हणजे जीवन बर्बाद झाले, आता जगण्यासारखे काही नाही अशी मेंटॅलिटी नसेल तर ते उत्तमच नाही का? रेप झाला, शारीरिक-मानसिक त्रास खूप झाला- बरोबर. परंतु रेप झाला म्हणजे यापुढे जीवन जगण्यात अर्थ नाही वगैरे पटत नाही.
तुमच हे म्हणन बरोबर असल तरी समाज त्या स्त्रीकडे वासनेच्या नजरेनच बघतो.एकदा एकाच्या वासनेला बळी पडलेल्या स्त्री काय फक्त वासना भागवण्याचे साधन आहे का?समाज जर तिच्याकडून तीच अपेक्षा ठेवत असेल तर यापुढे जीवन जगण्यात अर्थ नाही अस त्या स्त्री ला वाटण साहजिकच आहे.
समाज त्या स्त्रीकडे वासनेच्या
समाज त्या स्त्रीकडे वासनेच्या नजरेनच बघतो.
असं कशावरून? बलात्कारीत स्त्रीवर रिपिट बलात्कार होतात का? निर्भयाकडे दिल्लीकर वासनेच्या नजरेनेच बघत? उगाच काहीही.
-----------------
घरातला सदस्य म्हणून किंवा संभाव्य जीवनसाथी म्हणून समाज बलात्कारित स्त्रीवर अन्याय करत असावा, पण त्याचा अर्थ असला होत नाही.
बलात्कार जखमा शरीरावर जशा
बलात्कार जखमा शरीरावर जशा करतो तसाच मनावरही करतो... व्यक्तीच्या आत्मसन्मानाला एकदा ठेच लागली तर मनाची जुळणी कमालीची अवघड होउन बसते... लोक आज ना उद्या घटनेवरुन व्यक्तीवरुन लक्ष दुसरीकडे न्हेतीलही पण जी व्यक्ती त्या अनुभवातुन जाते तिच्यासाठी गोश्टी अशावेळी अतिशय अवघड बनु शकतात व यापुढे जीवन जगण्यात अर्थ नाही असे त्या स्त्री ला वाटण साहजिकच आहे. आत्मसन्मानाला ठेच लागलेल्या कोणत्याही व्यक्तीला असे वाटणे चुकीचे नाही.
आत्मसन्मानास ठेच लागतेच पण
आत्मसन्मानास ठेच लागतेच पण भीती वाटते.
एकदा वॉलमार्ट मध्ये मी एक ट्रॉली घेतली. मला काय माहीत ती एका बाईने तिथे राखून ठेवलेली होती. अन ही बाई एकदम ओरडत हातवारे करत आली अन मला हातावर सौम्य पण अनपेक्षित चापटी मारुन रागावली.
मी हादरले होते.
मला वॉलमार्ट मध्ये भीती वाटत राहीली. नंतर गेली पण ते पडसाद राहीलेल थोडा काळ.
सरप्राइज सेक्स हवा-हवासा
सरप्राइज सेक्स हवा-हवासा वाटला पाहिजे असे ती नटी म्हणाली नसावी असे वाटते. रेप झाला म्हणजे सर्वस्व गेलं अशी भावना असू नये असा हेतू असण्याची शक्यता आहे. सरप्राइज सेक्सपेक्षा रेपकडे एक अपघात म्हणून बघणे त्यामानाने स्वीकारार्ह असावे.
बाकी शील हा शब्द खूप लहानपणापासून ऐकतोय. त्याचा नक्की अर्थ काय? शील म्हणजे आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीशी शरीरसंबंध ठेवणे असा आहे का? की आपल्या मर्जीने आपल्याला हव्या त्या पुरुषाशी संबंध ठेवणे म्हणजे शील?
भारतीय स्त्रिया शीलवान आहेत म्हणजे नक्की काय? शील प्राणपणाने जपण्याची ही उदात्त जबाबदारी त्यांच्यावर कोणी टाकली आहे? ज्या महान संस्कृतीतून डॉक्युमेंटरीत दिसून आलेली पुरुषी मानसिकता निर्माण झाली आहे त्याच संस्कृतीने तर ही जबाबदारी टाकलेली नाही ना?
डोक्यात प्रश्न आले म्हणून विचारले.
बाकी डॉक्युमेंटरी बॅन होऊ नये. बॅन करणे वेडेपणा आहे आणि बॅन करता येणे शक्य नाही असेच मत आहे. उलट आपल्या महान संस्कृतीतल्या सगळ्याच 'मानसिकता' बाहेर पडतील अशा अनेकानेक डॉक्युमेंटर्या बनणे आवश्यक आहे.
शील म्हणजे आयुष्यात फक्त एकाच
शील म्हणजे आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीशी शरीरसंबंध ठेवणे अस म्हण्यापेक्षा फक्त तिने तिच्या पतीशी शरीरसंबंध ठेवणे वयक्तिक माझ्या दृष्टीने मी यालाच शील म्हणेन.कारण एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या किंवा पती व्यतिरिक्त दुसरया व्यक्तीशी असे संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला समाज काय मानतो किंवा कोणत्या दृष्टीने पाहतो हे तर सर्वाना माहीतच आहे. जर माझ म्हणन कोणाला चुकीच वाटत असेल तर मी त्यांची माफी मागते.
शरीरसंबंध जर नसतील तर आयुष्य
शरीरसंबंध जर नसतील तर आयुष्य संपते का नाही ना?
आयुष्य न संपणं हेच इतिध्येय नसतं. त्या आयुष्याचा दर्जा (क्वालिटी) देखील महत्त्वाची असते. शरीर्संबंधाशिवाय "नॉर्मल" व्यक्तीला घुसमटीला, विकृतीला बळी पडावं लागतं. हां थोर्थोर सन्यासींची गोष्ट वेगळी असेल कदाचित. का ते ढोंग करतात काय माहीत.
विचारात पाडलंत. पण हे वाक्य
विचारात पाडलंत.
पण हे वाक्य जाम आवडलं. अतिशय व्हर्सटाईल वाक्य आहे.
उदा:
जीवनात फक्त पैसा सर्व काही असतो का त्याच्यापलीकडे काहीच जग नाही का?
जीवनात फक्त प्रेम सर्व काही असतं का त्याच्यापलीकडे काहीच जग नाही का?
जीवनात फक्त मुलंबाळं सर्व काही असतात का त्याच्यापलीकडे काहीच जग नाही का?
जीवनात फक्त मित्रमंडळी सर्व काही असतात का त्याच्यापलीकडे काहीच जग नाही का?
जीवनात फक्त सुख सर्व काही असतं का त्याच्यापलीकडे काहीच जग नाही का?
जीवनात फक्त रात्री बाहेर जाण्याचे स्वातंत्र्य सर्व काही असते का त्याच्यापलीकडे काहीच जग नाही का?
जीवनात फक्त हवे ते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य सर्व काही असते का त्याच्यापलीकडे काहीच जग नाही का?
सरप्राइज सेक्स हवा-हवासा
सरप्राइज सेक्स हवा-हवासा वाटला पाहिजे असे ती नटी म्हणाली नसावी असे वाटते. रेप झाला म्हणजे सर्वस्व गेलं अशी भावना असू नये असा हेतू असण्याची शक्यता आहे.
It is not crime, it is surprise sex चा अर्थ 'सर्वस्व गेलं अशी भावना असू नये' असा काढायला ........ हृदयी खूप सहानुभूती लागत असावी.
व्हाट द फक इज सरप्राइज सेक्स ?
इफ सेक्स = प्लेजर देन होप सरप्राइज वर्ड इज युजड्ड इन द कॉटेक्स्ट ऑफ अ जॉय एक्सपिरीअन्स .... ऑर फन.
नाउ रेप मय बी अ सप्राइजींग एवेण्ट ? बट क्न्सीडरींग इट्स डायनामीक्स इट इज डेफिनेटली नॉट फाल अंडर दी कटेगरी ओदर दॅन मिसहॅप... नॉव लेट मी क्नोव इज मिसहॅप अ जोय अॅट ऑल ? इफ नॉट देन हाउ कम रेप = सरप्राइज सेक्स कॅन पोसीबलीबी अ राइट अजमशन ?
भारतातील पुरुषी विचार
भारतातील पुरुषी विचार त्यांच्या खर्याखुर्या नग्नावस्थेत जगापुढे येतात इतकेच काय ते भारताच्या दृष्टीने म्हटले तर लज्जास्पद आहे असे 'राष्ट्रवादी' लोक म्हणू शकतील.
अलिकडे विद्यमान सरकार कसे अनावश्यक, कालत्याज्य राष्ट्रवादी भावनांना खतपाणी घालते आहे हे दाखवण्याची अहमहमिका लागलेली आहे. भारताची सच्चाई लपवणे हे एकच काम सरकारला असल्याचे हे लोक मानतात. पण त्याच वेळी हे लोक विसरतात कि -
१. याच उजव्या विचारसरणीच्या पार्टीने आधी संडास, मग मंदीर असे निवडणूकीच्या आधी म्हटले.
२. लालकिल्यावर 'आमच्या बायकांना खुले में शौच के लिए जाना पडता है ' हे १५ ऑगस्टला म्हणून देशाची इज्जत स्वतः घालवली.
३. देश किती घाण आहे हे उभ्या जगाला प्रचंड जाहिराती निर्मून दाखवले.
४. पोरींना जगवा म्हणून तुम्हाला मी भीक मागतो म्हणत पुन्हा पुरुषांची इज्जत घातली.
डॉक्युमेंटरीबद्दल
(वरच्या प्रतिसादात अॅडकवता येत नाही म्हणून इथे.)
माहितीपट पाहिला.
@माहितीपट - चांगला आहे. घडलेल्या प्रसंगाचे पुनःसादरीकरण थोडं भडक वाटलं- तेवढं सोडलं तर बाकी दर्जा उत्तम आहे.
निर्भया-ज्योतीच्या आईवडिलांच्या मुलाखती आणि तिची गोष्ट हा माहितीपटाचा हायलाईट आहे. आरोपीच्या मुलाखतीला फुटेज बरंच असलं, तरी त्याची मुलाखत विरोधाभासासाठी वापरली आहे. It only highlights the contrast between her dreams and the brutal reality she had to suffer.
.
@निर्बंध - का घातला ते खरंच कळलं नाही. वकीलांच्या, आरोपीच्या मुलाखतीतून प्रचंड आक्षेपार्ह असं नवं काहीच ऐकलं नाही कारण त्याच अर्थाची विधानं ह्याआधीही बर्याच वेळा मिडीयात बर्याच लोकांनी केली आहेत. पुन्हा आरोपीची मतं, पश्चात्तापाची भावना अजिबात नसलेली त्याची विकृत मनोवृत्तीच दाखवतात.
.
डॉक्यु. असं काय आहे ज्यामुळे त्यावर बॅन यावा? हे कळलं नाही. सगळ्यात दुख:द आहे ते म्हणजे ज्योती सिंगसारख्या कर्तबगार मुलीची ही कथा असतानाही ती हायजॅक करून आरोपी आणि वकीलांची कथा बनवली जाते आहे.
माझं मत
मी माहितीपट पाहिला आहे. व्यक्तिश: मला त्यात काही आक्षेपार्ह आढळलं नाही. (ह्याचा अर्थ माहितीपट विशेष दर्जेदार आहे असा मात्र नाही.) बंदी घालण्यासाठीच्या सरकारच्या आक्षेपांचा चांगला समाचार एन. राम ह्यांचा 'हिंदू'मधला हा लेख घेतो. ते पाहता -
१) असे निर्बंध घालणे कितपत योग्य? - योग्य नाही.
२) असे निर्बंध कायद्याने घालावेत काय? - नाही.
ही उत्तरे द्यावीशी वाटतात.
३) असे निर्बंध घालणे शकय आहे काय? - अशा निर्बंधांची अंमलबजावणी करणं आताच्या परिस्थितीत अशक्य आहे. केवळ चीन, रशिया किंवा आधुनिक प्रसारमाध्यमांवर कठोर निर्बंध घालणाऱ्या देशांत ते शक्य आहे. भारतात ते शक्य नाही.
जाता जाता : त्याच त्याच सदस्यांच्या त्याच त्याच अवांतरांचा आता कंटाळा येतो. त्यामुळे मूळ चर्चाप्रस्तावाच्या संदर्भात काहीही मौलिक भर पडत नाही. ते टाळता आलं तर असे धागे अधिक वाचनीय होऊ शकतील.
जाता जाता
जाता जाता : त्याच त्याच सदस्यांच्या त्याच त्याच अवांतरांचा आता कंटाळा येतो. त्यामुळे मूळ चर्चाप्रस्तावाच्या संदर्भात काहीही मौलिक भर पडत नाही. ते टाळता आलं तर असे धागे अधिक वाचनीय होऊ शकतील.
+१
.
.
म्हणूनच कशावरच काहिच बोलावसं वाटत नाही;सारच कसं ठरीव नि तेच तेच
१) असे निर्बंध घालणे कितपत
१) असे निर्बंध घालणे कितपत योग्य? - खूप योग्य. पाश्चिमात्य देश अजूनही रेसिस्ट प्रकारच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. वर हे सगळं बघून ते भारतीयांना (अजून जास्त) नीच समजू लागतात.
२) असे निर्बंध कायद्याने घालावेत काय? - घालावेत. याने उगाच रेरेस्ट ऑफ रेर केसेसना प्रातिनिधिक मानसिकता म्हणून पाहण्याची वृत्ती वाढते. दिल्ली मेट्रोमधे स्त्रीकडे टक लावून पाहणारा पुरुष आणि निर्भयावर बलात्कार करणारा पुरुष यांच्यातील अंतर ही डोक्यूमेंटरी पाहणार्या स्त्रीच्या मनात आवश्यकतेपेक्षा जास्त कमी झालेले असेल.
३) असे निर्बंध घालणे शकय आहे काय? - शक्य आहे. भारतात पायरेटेड विंडोज (सॉफ्टवेअर) खूप आहेत. अमेरिकेत नाहीत. शक्य तर आहेच. आणि शक्य नसेल तर करून दाखवावे. भारतीय कायदा व्यवस्थेची प्रतिमा या निमित्ताने उंचावली तर इष्टच.
==========================================
जे लोक ही डोक्यूमेंटरी दाखवावी म्हणतात त्यांच्यासाठी एक प्रश्न -
बलात्कार्यांनी निर्भयासोबत काय केलं, नक्की काय केलं हे सर्वाना अगोदरपासूनच माहित आहे. असं करणारांची मानसिकता काय असावी याची कल्पना देखिल त्यांच्या कृतींवरून लगेच येते. तरीही त्यांची नक्की मानसिकता काय आहे हे त्यांच्याच शब्दांत लोकांना सांगण्यात काय हशील आहे? अगदी मधुचंद्राचा प्राथमिक उल्लेख रोमांचक वाटतो. अजून थोडे डिटेल दिले तर रोमँटिक वाटतात. पण अगदीच डिटेलमधे कोणी पब्लिकली सांगायला लागलं तर? ते घाण वाटू लागतं. मग इथे तर क्राईमची केस आहे. पब्लिकला काय काय किती डिटेल मधे सांगायचं, पब्लिकने काय काय डीटेल चर्चायचे याला मर्यादा असावी. या स्पेसिफिक केस मधे मुकेश सिंगला अतिशय सामान्य शब्द वापरून अतिशय घृणास्पद आशय मांडायची महारथ हासिल दिसते.
सत्य लपवू नये हे मान्य, माध्यमांना स्वातंत्र्य असावे हे मान्य, त्या त्या क्षेत्रातील तज्य लोकांना प्रोफेशनसाठी गुन्हेगारांची मानसिकता माहित असावी हे मान्य, राजकारण्यांनी देशाची घाण जगासमोरून लपवू नये हे मान्य, असलं सगळं तत्त्वतः चांगलं मान्य करू. ही तत्त्वे सुरक्षित रहावित म्हणून डॉक्यूमेंटरी प्रसारित व्हावी म्हणणे वेगळे. पण आंतरिक दृष्ट्या (तत्त्वरक्षण नव्हे तर एक कृती म्हणून) अशा प्रसारणाचे काय महत्त्व आहे? How will it help general society? In what? How? (ती फिल्म पाहणार्या सगळ्या?) स्त्रीयांना (सगळ्या?) पुरुषांचे अंतरंग कळतील? कशी काळजी घायची, किती घ्यायची ते कळेल? 'बलात्काराला विरोध नाही तर जीव सुरक्षित' चा काय अर्थ काढून नक्की काय करावे याबद्दल काय बोध घेता येईल? !!!? पुरुषांना अपराधी वाटणं वाढेल? त्यांचा दृष्टीकोन सुधरेल? कि अरे पहा, बाकीचे काय विचार करतात, आपण अगदीच बुळे आहोत असे वाटेल?
थोडक्यात डॉक्यूमेंटरीचा समाजाला 'बलात्कार या समस्ये संदर्भात' फायदा काय?
(ह्याचा अर्थ माहितीपट विशेष
(ह्याचा अर्थ माहितीपट विशेष दर्जेदार आहे असा मात्र नाही.)
ही कलेचा आस्वाद घ्यायची जागा नाही, परंतु बीबीसी डॉक्युमेंट्री म्हटल्यावर एक वेगळी अपेक्षा असते (ती उगाचच ही असू शकते) तशी ती का दर्जेदार नाही याची उत्तरं तुम्हीच तुमच्या प्रतिसादात दिली आहे.
मला खटकलेले आणखी काही मुद्दे- तिच्या ट्यूटर लोकांच्या भावनेला हात घालण्यासाठी तिच्याबद्दलची माहिती विशेष ठिकाणी पॉझ घेत, कॅमेर्याच्या आणि प॑र्यायाने लोकांच्या डोळ्यात बघत सांगतो. तिने मारधाडीचा सिनेमा न पाहता 'लाईफ ऑफ पाय' पाहाणं पसंत केलं किंवा तिची पर्स चोरणार्या बालगुन्हेगाराला तिने कशी मदत केली या घटनांनी काहीच व्हॅल्यू अॅडिशन होत नाही. किंबहुना, हे प्रसंग असल्याने किंवा नसल्याने तिच्यावरती झालेला अन्याय कमीअधिक होत नाही. त्या माणसाचं बोलणं खोटं आणि नाटकी वाटलं.
मुकेश सिंग पाठ केल्यासारखं आणि थंडपणे बोलत होता. इतर ठिकाणी वाचल्याप्रमाणे तो जर बलात्कार्याचा चेहरा म्हणून लक्षात राहणार असेल तर इतर बलात्कार करू धजावणारेही निर्ढावून त्याच्यासारखी आर्ग्युमेंट्स करू लागतील. काही असो. त्याला पढवले छान होते. त्यामानाने आरोपीच्या वकिलांनी आरोपीची बाजू घेणे क्रमप्राप्त असले तरी त्यासाठी मांडलेले मुद्दे अगदीच ढिसाळ व अतिवाईट होते. मला त्यांच्या भूमिकेवर आक्षेप असण्यापेक्षा त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर अधिक आहे.
डॉक्यूमेंटरीचा समाजाला
डॉक्यूमेंटरीचा समाजाला 'बलात्कार या समस्ये संदर्भात' फायदा काय?
कुठलीही कलाकृती किंवा मिडीया मधे येणारे काहीही समाजाला फायदा व्हावा असेच असावे असे तुमचे म्हणणे आहे काय?
पाश्चिमात्य देश अजूनही रेसिस्ट प्रकारच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. वर हे सगळं बघून ते भारतीयांना (अजून जास्त) नीच समजू लागतात.
भारतीय लोक तरी रेसिस्ट मानसिकतेतुन बाहेर आले आहेत का? भारतातुन अमेरिकेत गेलेले सुद्धा तिथल्या काळ्यांना कमीच समजतात. थोड्या का होइना गोर्या बायकांनी काळ्यांशी लग्न केली आहेत, अश्या भारतीय मुली कीती असतात.
भारतातली जाती व्यवस्था, कोणाला भैय्या म्हणुन नाहीतर कोणाला चिंकी म्हणुन वेगळी वागणुक दिली जात नाही का?
आधी लिहीले होते तेच पुन्हा आरश्याला लपवुन पण ठेवु नका किंवा आरश्यातल्या प्रतिमेला मेक-अप करु नका. स्वताचे ( तुमचे वैयक्तीक नाही अजो ) थोबाड सुधारा आपोआप आरश्यातली प्रतिमा सुधारेल.
माझे मत
"माझ्या मनातील काही विचारांचे साम्य या रेपिस्टच्या विचारांशी आहे - तर माझे काही विचार याच्या विचारांशी तंतोतंत जुळतात असे लक्षात आल्याने क्षणभर धास्तावलो" असे माझ्या परिचयातील एकापेक्षा अधिकांच्या बोलण्यात आले.
तेव्हा, अनेक पुरूषांना आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडणारी ही डॉक्युमेंटरी भारतातच नाही तर जगभरात दाखवली पाहिजे असे वाटते. शेवटी हा निव्वळ भारतीय प्रश्न नसून जागतिक प्रश्न आहे - तितकाच मोठा व तितकाच तीव्र!
आज आयबीएन वर अवनींद्र पांडे -
आज आयबीएन वर अवनींद्र पांडे - ज्योती सिंगसोबत असलेला मुलगा-त्याने त्या ट्यूटरची गोष्ट खोटी आहे असं सांगितल्याची बातमी आहे.
http://ibnlive.in.com/news/nirbhayas-friend-who-was-with-her-on-the-fat…
त्यालाही या मुलाखतीसाठी विचारण्यात आलं होतं पण त्याने नकार दिला.
अवनींद्र पांडेचे आक्षेप?
बातमी वाचली. त्याचे आक्षेप -
"The documentary is unbalanced as the victim's viewpoint is missing. The facts are hidden and the content is fake. Only Jyoti and I know what happened on that night and the documentary is far from truth,"
हे आक्षेप फारसे ग्राह्य वाटले नाहीत. त्यानं स्वतःहून नकार दिला. वर तो म्हणतो की तिथे काय झालं ते इतर कुणालाच माहीत नाही. ठीक. पण माहितीपटात घटनेचे तपशील आणि झाल्या प्रकाराची माहिती पुरेशी आहे. मग आक्षेप नक्की कशासाठी? त्याला कोणता चित्रपट पाहायचा होता हा तपशील चुकला म्हणून?
मुलाने फार प्रतिकार केला नाही
मुलाने फार प्रतिकार केला नाही गप मागे पडुन राहिला असे विधान ड्रायवरने केले होते त्यामुळे कदाचीत... तो जास्त दुखावला गेला असावा. त्याने बीबीसीला मुलाखतीस नकार दिला होता हे अतिषय योग्य वाटत आहे. जे काही आहे ते कोर्टात बोलुन झालेले असल्याने आता परत मुलाखत कशाला हा प्रश्न निर्माण होतोच. निर्भयावर माहितीपट बनणे वेगळे आणी त्यामधे पुन्हा आरोपी, साक्षीदार, बचाव वकीलांच्या मुलाखती घेणे वेगळे, जणू अजुन एक अप्रत्यक्ष ट्रायलच...
दोन्ही बाजूंनी बोलणं
मुलाखतीला नकार देण्याचा निर्णय योग्य असो वा अयोग्य, तो त्यानं घेतला. नंतर तपशील चुकीचे ठरवणं म्हणजे दोन्ही बाजूंनी बोलण्यासारखं होतं. जर खरी माहिती तुझ्यापाशीच आहे, तर ती तू द्यायची होतीस. तू दिली नाहीस तर मग आता इतरांनी दिलेली माहिती जगासमोर खरी म्हणून येणार ह्यात दोष नक्की कुणाचा?
नंतर तपशिल चुकीचे कुठे ठरवले
नंतर तपशिल चुकीचे कुठे ठरवले ? त्याने व गुन्हेगारांनीही त्याची बाजु कोर्टात मांडली आहे ते पुरेसे आहे. हे झाले गुन्ह्याबाबत. आणी डॉक्युमेंटरीला मुलाखतीसाठी नकार देणे हे झाले त्यागोष्टीचे भांडवल करायची इछ्चा नसण्याबाबत. आत डॉक्युमेंटरीमधे गुन्हेगारानी, त्याच्या वकीलांनी जे दिवे पाजळले त्याबाबत त्याने निषेधही करायचा नाही ? का तर त्याला डॉक्युमेंटरीमधे रस न्हवता म्हणून ? उद्या या चर्चेतील तुमचा रस संपला व तुम्ही थांबलात अन मी मात्र प्रतिसादातुन तुमच्यावर गलीछ्च राळ उठवणे चालु केले तर तो दोष तुमचा ठरेल ?
सहमत. मला सांगायचं नाही पण
सहमत.
मला सांगायचं नाही पण कोणी खोटं सांगीतलं तर ते खोटं आहे इतकं सांगायचं इतकी भूमिका कोणी करू शकतं.
---------------------
शिवाय त्याला भारतीय पुरुष आणि कायदा व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था एका विशिष्ट प्रकारे प्रोजेक्ट करत मुलाखत द्यायला सांगीतले असेल म्हणून तो चिडला असेल. त्याच्या शब्दांवरून तसेच वाटतेय.
जबाबदारी कुणाची?
Only Jyoti and I know what happened on that night and the documentary is far from truth
- जे झालं ते फक्त मला आणि एका मृत व्यक्तीला माहीत आहे.
- मी बोलणार नाही.
- चुकीची माहिती समोर येते आहे म्हणून तक्रार मात्र करणार.
अरे मुला, जर माहीत असलेली एकमेव जीवित व्यक्ती तू असशील आणि तूच जर बोलला नाहीस, तर चुकीची माहिती समोर येण्यात तुझ्या मौनाचा काहीच हातभार नाही का?
+०.५ खरं काय ते त्याने
+०.५
खरं काय ते त्याने कोर्टात सांगितलं आहे. त्याला पब्लिक स्पेसमध्ये डिबेट नको आहे.
अशावेळी फक्त त्याने पब्लिक स्पेसमध्ये येऊन आपल्याकडील माहिती दिली नाही तर तो दोषी आहे हे म्हणणे तितकंसं पटत नाही.
मात्र त्याचे वेळी जर हे खोटं आहे हे तो पब्लिक स्पेसमध्ये येऊन सांगतो आहे तर "मग बाबा, खरं काय ते तरी सांग! नुसतं खोटं आहे म्हणालास तर आम्ही कशाच्या आधारावर तुझं म्हणणं मानायचं?" अशी विचारणा होणारच!
नक्की काय चुकीचं?
>> आपल्याकडील माहिती दिली नाही तर तो दोषी आहे हे म्हणणे तितकंसं पटत नाही.
मात्र त्याचे वेळी जर हे खोटं आहे हे तो पब्लिक स्पेसमध्ये येऊन सांगतो आहे तर "मग बाबा, खरं काय ते तरी सांग! नुसतं खोटं आहे म्हणालास तर आम्ही कशाच्या आधारावर तुझं म्हणणं मानायचं?" अशी विचारणा होणारच!
पण त्यानं माहितीपटासाठी माहिती दिली नाही ह्याबद्दल मी त्याला दोष देत नाही. तो त्याचा व्यक्तिगत निर्णय झाला. माझी अडचण ही 'माहितीचा एकमेव स्रोत मीच आहे' असं त्यानंच म्हणणं, आणि त्यानंच मौन बाळगायचं ठरवलं असताना चुकीची माहिती समोर येते आहे म्हणून त्यानंच तक्रार करण्याविषयी आहे.
निर्भया का?
मला वाटते हा शब्द त्या मुलीच्या २३ वर्षांच्या लहान आयुष्यात तिने ज्या पद्धतीने आपला आणि आपल्या कुटुंबाचा विकास करण्याची आणि दारिद्र्यातून बाहेर पडायची धडपड दाखविली त्याला उद्देशून असावा. डॉक्युमेंटरीमध्ये तिचेच एक वाक्य कानावर येते - A girl can do anything. तिचा हाच विचार 'निर्भया'तून सुचवायचा असावा.
अस्वस्थ
दिल्ली मध्ये मी २०११ मधले आठ महिने काढले.
मुनिरका जिथे हा निर्भायचा प्रसंग झाला त्या रूट वरून मी नेहमी प्रवास करायची. मुनिरका ते जवळच मेट्रो स्टेशन म्हणजे हौज खास ( जिथे आय आय टी दिल्ली आहे) जाण्यासाठी एकाच ऑप्शन आहे खासगी बस किंवा सिक्स सीटरने प्रवास करणे
मुनिरकाच्या स्टोपवर बस थांबवून चौदा पंधरा वर्षाची मुल कधी कधी मोठी कळकट दिसणारी माणसे उभी असतात. “हौज खास, हौज खास, हौज खास” अस ओरडत. या खासगी बसेस म्हणजे खूपच वाईट अवस्थेमध्ये असतात. पाच ते दहा रुपये तिकीट घेऊन इच्छित ठिकाणी सोडतात. बर्यापैकी शाळेतली मुले याच बसचा वापर करतात.
रात्री अपरात्री जेएनयुच्या कॅम्पस मध्ये जाऊन टाईमपास करणे हा माझा नित्याचा प्रोग्रॅम होता. त्यामुळे कायम वेळ होई आणि अश्या बसने प्रवास करायला लागे. एक दिवशी रात्री अकरा साडेअकरा वाजता मी बस मध्ये चढलो.
बस मध्ये जास्ती गर्दी नव्हती मी मागच्या बाजूला उभारलो होतो. समोर चार पाच मुल बसच्या पुढच्या भागात उभारली होती. त्यांनी मध्ये पाय ठेवून जागा अडवली होती. ज्याला कुणाला उतरायचं आहे त्यावेळेस फक्त ती मुल पाय तिथून हटवायची आणि जागा करून दयायची. बस मध्ये एक मुलगी चढली. तिने कंडक्टर कडे जाऊन पैसे दिले तिकीट घेतले आणि लेडीज सीटवरती जाऊन बसली. साधारण दिसणारी नॉर्मल दिल्ली मधली मुलगी. कपडे अगदी साधे पंजाबी ड्रेस .सर्वात पुढे उभारलेली चार मुलांनी तिचा स्टोप आल्यावर तिला बाहेर पडायला जागा दिली नाही. तसेच पाय मध्ये अडवून उभे राहिले. शेवटी ती पुन्हा उलटी फिरली आणि मागाच्या दाराने उतरली. नंतर ती चार मुल भरपूर हसत होती.
“बोला था ना मैने नही रूकेगी”
बस मध्ये मी धरून एकूण १० -११ लोक होतो. त्या प्रसंगाला कुणीच काही नाही केल. ५ ते १० सेकंद मध्ये हे सगळ घडल. त्या मुलांनी तिला जागा नाही दिली आणि ती मागच्या दाराने उतरली बस्स.
आणि हि दिल्लीची सरकारी बस होती.
नंतर कधी दिल्लीला जायचा योग आला नाही. आता माहीत नाही कशी परिस्थिती आहे. आज इंडीयाज डॉटर बघत होतो. पहिल्याकाही शॉटस मध्ये खासगी बस दाखवली आहे. पूर्ण प्रसंग पुन्हा रिक्रीअट केला आहे.
सुरवातीला नेहेमीसारखी माहिती देणारी डॉक्युमेंटरी वाटली. जेव्हा मुकेश सिंग चा इंटरव्यू सुरु झाला तेव्हा तो जे बोलत होता ते खूप विचित्र/nauseatic वाटत होत.(नक्की काय वाटत होत याला शब्द नाही म्हणून विचित्र लिहील आहे)
तो जेव्हा बोलतो कि तीच आतड हेर बाहेर काढलं तेव्हा खूपच कसतरी वाटल. इतका क्रूर प्रकार?शरीरावारती असंख्य चावे , अबडोमिनल जखमा....
एकवत नव्हत.
इतक्या क्रूरपाने लोक कसे काय वागू शकतात?
डॉक्युमेंटरी खूपच अस्वस्थ करणारी होती.सविस्तर लिहीन.
जगात अनेक प्रकारच्या विकृत
जगात अनेक प्रकारच्या विकृत मानसिकता आहेत. अशा अनेक प्रकारच्या (कारण यांच्यापैकी कोणतीही कधीही कुणाच्याही नशीबी येऊ शकते) विकृतींचे "निश्चित रुप" जाणण्यात काय हशील आहे? कारण इतरांच्या प्रत्येकच उदाहरणावरून मला प्रत्येकच बाबीची काळजी घ्यायची असेल तर मी पराकोटीचा पॅरानॉइड होईन.
मध्ययुगीन समाज
डॉक्युमेंटरीत आक्षेपार्ह असेल तर एकच गोष्ट आहे, ती म्हणजे त्या मुलीचे नांव जाहीर केले आहे. बाकी सर्व डॉक्युमेंटरी प्रत्येक सुजाण नागरिकाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. बहुजनसमाजातली स्त्रीविषयीची मते अजून मध्ययुगातच आहेत हे स्पष्ट होते. अर्थात असे सुजाण नागरिक अत्यल्प असल्यामुळे, त्यावर विचार करण्याऐवजी, तथाकथित संस्कृतीसंरक्षक, राजकारणी आणि अडाणी जनता त्याविरुद्ध गदारोळ करत आहे.
असे निर्बंध घालणे हे अयोग्य आहे.
कायदा करण्यापेक्षा, प्रत्येक केसचे मेरिट तपासून, त्या त्या वेळी निर्णय घेतला पाहिजे.
असे निर्बंध घालणे फारतर या देशांत शक्य आहे. बाकीच्या जगांत ते शक्य नाही आणि तशी मागणी करणे हे ही हास्यास्पद आहे.