मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९५
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या जवळ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---
अजूनही सिनेमाच्या सुरुवातीला सर्टफिकेटवर 【 हिन्दी 】 【 रंगीन 】 【 सिनेमास्कोप 】 असं टाईप करतात का?
कंसाची नक्षी जरा वेगळी असायची लहानपणी.
इतक्यात लक्षच गेलं नाही.
माझी आई आज मेली. किंवा कालही
हे वाक्य बहुतेकांनी ऐकलं असणारच हे मान्य, पण "तिच्या मरण्याचा आनंद मी आज साजरा करावा कि कालच करायला पाहिजे होता नक्की माहित नाही" असं विधान ऐकवायला अदितीच लागते.
आता हे खूपच अबसर्ड विनोदी होत चाललं आहे, कारण ह्या वाक्यांनी सुरू झालेल्या काम्यूच्या कादंबरीत ज्याची आई मेलेली आहे त्या मरसोवर तो आईच्या मृत्यूविषयी पुरेसा हळवा नसल्याचे, म्हणजेच असंवेदनशील असण्याचे आरोप होतात.
इत्यलम्
उद्या कादंबरीत एखादं महाभयंकर पात्र एका विशीश्ट पद्धतीनं वागलं म्हणजे तुम्ही तसं वागणार का? लेखकाचा कल्पनाविलास वेगळा आणि खरे कटुअन्य्भव वेगळे.
एखादं चमकदार वाक्य तुमच्यापर्यंत पोचलं आहे पण कादंबरी पोचलेली नाही हे ह्या प्रतिक्रियेवरून उघड आहे. त्यामुळे मी आणखी काही म्हणत नाही.
काय संबंध? लोक आपली अस्वस्थ इ
काय संबंध? लोक आपली अस्वस्थ इ इ प्रतिमा बनवत असतील म्हणून योग्य प्रश्न विचारणं थांबवायचं का? जालावरच्या असल्या कोणत्या विक्षिप्त व्यक्तिच्या विक्षिप्त लिहिण्यानं अस्वस्थ होणारांपैकी असतो तर कामच झालं असतं. Unless the matter is directly connected to me, it doesn't affect me. Suppose (note I am writing suppose) someone is happy from death of parents or child or suppose one is even killing parents or child, how does that matter to me? Let me make a black joke - Aditi's parents are nobodies to me and I don't give damn whether they are alive or dead and if dead, timely or untimely. I am worried about the larger social principle- what should human reaction to death, especially of the one from the core family.
१४वे, चाबुक जोरात चालतोय.
१४वे, चाबुक जोरात चालतोय.
इथल्या प्रत्येकाला आपापल्या पालकांवर भरपूर प्रेम आहे हे लेखनातून जाणवतं. कितीही कडक/तिरपी भाषा वापरून त्यांचे संवाद घरी होत असले तरी एकमेकांना समजूनच असणार.