ही बातमी समजली का? - ९०
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
-------------------------------------------------------------------------------------------
Why Free Markets Make Fools of Us
George Akerlof and Robert Shiller offer a much more general, and quite damning, account of why free markets and competition cause serious problems.
गब्बर स्टाईलने केवळ लिंक दिली आहे. कृपया गोड मानून घ्या.
Congress: Modi’s silence sign
Congress: Modi’s silence sign of tacit approval?
अगदी बरोबर - २००९ मधे मुंबई हल्ला झाला तेव्हा अडवाणी मुंबईत आले व त्यांनी ममोसिं यांना फोन वरून विनंती केली की आपण दोघांनी जॉईंट स्टेटमेंट देऊया. तेव्हा ममोसिं यांनी मौन की बात केलेली होती. (ही बातमी खरी असेल तर) - ममोसिं चा हल्ल्याला पाठिंबा होता असं पण म्हणावं म्हंजे काये की बॅलन्स होईल.
एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने माणूस मारावा का ? उत्तर - हो.
खरंच?
>>ममोसिं चा हल्ल्याला पाठिंबा होता असं पण म्हणावं म्हंजे काये की बॅलन्स होईल
ममोसिंगच्या लोकांनी (कॉंगी /सिक्युलर) हल्ला केला नव्हता. आणि समर्थन सुद्धा केलेलं नव्हतं. इथे हल्ला करण्याचे आरोपी बीजेपीवाले आहेत. बीजेपीचे नेते हत्येचं समर्थन* करतायत. दोन्ही गोष्टी सारख्या आहेत? खरंच?????
*त्यांनी खरंच गोमांस खाल्लं असेल तर..... अशा अर्थाची विधानं.
हे करायचे आहे आणि मोदी त्याकडे डोळेझाक करणार आहेत असा विश्वास लोकांना आहे म्हणूनच (निदान एका सिग्निफिकंट गटाने) मोदींना मतं दिली आहेत.
दोन्ही गोष्टी सारख्या आहेत?
दोन्ही गोष्टी सारख्या आहेत? खरंच?????
नाहीतच. व तोच माझा पण मुद्दा आहे.
पण मोदींवर शरसंधान का ?? हल्ला दादरी मधे झालाय. युपी मधे मोदींचे सरकार नाही. मोदींकडून यावर भाष्य का व्हावे ? मोदींनी राज्यसरकारात सत्तेवर असले काय किंवा केंद्रसरकारात असले काय सगळी भाष्ये त्यांनीच करावी ?? आणि राज्यसरकारांनी नुसत्या "सेक्युलरिझम" च्या गफ्फा माराव्यात ?? दादरी मधली कायदा व सुव्यवस्था ही राज्यसरकारच्या अखत्यारीत येते ना ? की हा भोळसट प्रश्न आहे ??
नमोरुग्ण (गब्बर)
निदान गृह मंत्रालयाने दखल
निदान गृह मंत्रालयाने दखल घेतली आहे.
http://timesofindia.indiatimes.com/india/Centres-advisory-to-states-Ens…
केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही टीकेचा सूर आळवला आहे.
http://timesofindia.indiatimes.com/india/Dadri-like-incidents-hurt-coun…
?
मोदींनी यावर भाष्य अवश्य करावे पण फक्त - उत्तर प्रदेश सरकारवर टीका करण्यासाठी.
का बरं? मोदींवर फक्त उत्तर प्रदेश वगळता उर्वरित भारताची जबाबदारी आहे काय? खाली अहमदच्या घड्याळाचं चपखल उदाहरण दिलंय. निव्वळ अपमानास्पद वागणुकीची दखल अमेरिकेच्या अध्यक्षाला घ्यावीशी वाटते आणि घृणास्पद खुनाची दखल भारताच्या पंतप्रधानाला घ्यावीशी वाटत नाही हे चित्र योग्य नाही.
का बरं? मोदींवर फक्त उत्तर
का बरं? मोदींवर फक्त उत्तर प्रदेश वगळता उर्वरित भारताची जबाबदारी आहे काय? खाली अहमदच्या घड्याळाचं चपखल उदाहरण दिलंय. निव्वळ अपमानास्पद वागणुकीची दखल अमेरिकेच्या अध्यक्षाला घ्यावीशी वाटते आणि घृणास्पद खुनाची दखल भारताच्या पंतप्रधानाला घ्यावीशी वाटत नाही हे चित्र योग्य नाही.
मोदीनी उत्तरप्रदेशाच्या पोलिसांवर (व उत्तरप्रदेशाच्या गृहमंत्र्यांवर) टीका करावी कारण ते पोलिस त्यांची जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरले. उत्तरप्रदेश सरकार हे स्थानिकांच्या सुरक्षिततेस (Local law and order) वचनबद्ध असायला हवे. प्रथम जबाबदारी राज्यसरकारची आहे.
ते हल्लेखोर भाजपाचे कार्यकर्ते होते की नव्हते हे कारण नसून सबब आहे.
>>मोदींनी यावर भाष्य अवश्य
>>मोदींनी यावर भाष्य अवश्य करावे पण फक्त - उत्तर प्रदेश सरकारवर टीका करण्यासाठी.
जरूर. निदान त्यातून त्यांना या गोष्टीबद्दल आनंद झालेला नाही एवढे तरी कळावे. त्यांनी उत्तरप्रदेश सरकारची कानौघाडणी न करणे म्हणजे उप्र सरकारने दोषी व्यक्तींवर कारवाई करावी असे त्यांना वाटत नाही असे समजावे लागेल. (दॅट अमाउंट्स टु टॅसिट अॅप्प्रूव्हल)
दॅट अमाउंट्स टु टॅसिट
दॅट अमाउंट्स टु टॅसिट अॅप्प्रूव्हल
या घटने बद्दल भाष्य न करणे हे टॅसिट अप्रूव्हल आहे हे पटत नाही.
व्हिक्टिम्स ची संख्या, हल्ल्याचे मोटिव्ह, हल्ल्याचे स्वरूप, हल्लेखोरांची संख्या, हल्लेखोरांची व्/वा व्हिक्टिम्स ची ओळख, घटना जिथे घडली त्या ठिकाणाचे राजकीय गुण - यातला कोणाताही एक किंवा सगळे विचारात घेतले तरीही पटत नाही.
केवळ मिडियाने व्/वा विरोधकांनी मुद्दा उचलून धरला आहे व/वा हल्लेखोर भाजपाचे आहेत म्हणून तर नाहीच नाही. भाष्य न करण्याने चुकीचा संदेश जातो हे सुद्धा फारसे पटत नाही.
ओके डाव समजला......असल्या
ओके डाव समजला......
असल्या गोष्टी आपले सरकार नाही अशा राज्यांत घडवायच्या. तिथे आपला खरा अजेंडा पुढे रेटायचा. आणि ओरडा झाला तर तो राज्यसरकारचा प्रश्न आहे असे भक्तांनी डिफेंड करायचे.
मीनव्हाइल फॉर द इन्टरेस्टेड पीपल
In the similar important event in history...........
अाशा भोसलेंच्या वाढदिवसापासून
अाशा भोसलेंच्या वाढदिवसापासून ते हगल्यापादल्या प्रसंगांचे सेल्फी आणि ट्विट्स करणाऱ्या पंतप्रधानांना यावर १४० शब्दांची प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही यातून नक्कीच चुकीचा संदेश जातो.
अतिशहाणा, तुमचा हा मुद्दा ठीक ठाक आहे. पण अनेक लोक रोज मारले जातात. खून पडतात. हा जमावाने केलेला व धर्माच्या आधारावर झालेला खून आहे. तरीही प्रधानमंत्र्यांची जबाबदारी नसेल तर तो भाग ऐच्छिक होत नाही का ??
Also - why talk about something gloomy ? और भी गम है जमाने मे मुहोब्बत के सिवा.
--
संदेश जातो
यातून असाही संदेश जातो की - सारखा आरडाओरडा केला की आपण कलेक्टिव्ह व्हिक्टिम आहोत हे सिद्ध करता येतं.
पण अनेक लोक रोज मारले जातात.
पण अनेक लोक रोज मारले जातात. खून पडतात. हा जमावाने केलेला व धर्माच्या आधारावर झालेला खून आहे. तरीही प्रधानमंत्र्यांची जबाबदारी नसेल तर तो भाग ऐच्छिक होत नाही का ??
म्हणजे? ऐच्छिक? काय म्हणाय्चं ते नाही कळलं.
सीबीएस्सी बोर्डाच्या १० वी च्या परिक्षांवेळी मोदींनी 'मनकी बात' मध्ये अभ्यास या विषयावर बात केली होती. आणि एकाला जमाव मारुन टाकतो(अगदी ते गोमांस प्रकरण खरे असते तरी एखाद्याला मारुन टाकणे?) या बद्द्ल त्यांना काहीही चार शब्दही बोलावे वाटत नाही? काही पटत नाही बुवा.
म्हणजे? ऐच्छिक? काय म्हणाय्चं
म्हणजे? ऐच्छिक? काय म्हणाय्चं ते नाही कळलं.
सीबीएस्सी बोर्डाच्या १० वी च्या परिक्षांवेळी मोदींनी 'मनकी बात' मध्ये अभ्यास या विषयावर बात केली होती. आणि एकाला जमाव मारुन टाकतो(अगदी ते गोमांस प्रकरण खरे असते तरी एखाद्याला मारुन टाकणे?) या बद्द्ल त्यांना काहीही चार शब्दही बोलावे वाटत नाही? काही पटत नाही बुवा.
१) मोदींनी त्यावर भाष्य करणे हे ऐच्छिक. कारण स्थानिक सुरक्षितता ही केंद्रसरकारची जबाबदारी नाही. राज्यसरकारची आहे. हल्लेखोर भारतीय नागरिक आहेत. व व्हिक्टिम सुद्धा. हल्ला भारतातल्या एका सरकारच्या व एका राज्याच्या हद्दीत झालेला आहे व म्हणून हा मुद्दा फक्त स्थानिक सुरक्षिततेच्या (राज्यसरकार) खाली येतो.
२) पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतात येऊन हल्ले करणे - हे केंद्रसरकारच्या अखत्यारीत येते. नॅशनल सिक्युरीटी. म्हणून त्यावर मोदींनी (पंतप्रधानांनी) भाष्य करणे व महत्वाचे म्हंजे कृति करणे (त्याहून महत्वाचे हल्ले प्रिव्हेंट करण्याची कृति) इष्ट.
३) सीबीएस्सी बोर्डाच्या १० वी च्या परिक्षांवेळी मोदींनी 'मनकी बात' मध्ये अभ्यास या विषयावर बात केली होती - ऐच्छिक बाब आहे. त्यांना वाटलं त्यांनी केलं.
४) एकाला जमाव मारुन टाकतो त्याबद्दल - ऐच्छिक असले तरी मोदींनी हे भाष्य करू नये हे माझे मत. (संभाव्य आक्षेप - नैतिक जबाबदारी म्हणून मोदींकडून भाष्याची अपेक्षा आहे. )
रोचक आणि उद्बोधक
>> १) मोदींनी त्यावर भाष्य करणे हे ऐच्छिक
३) ऐच्छिक बाब आहे. त्यांना वाटलं त्यांनी केलं.
४) ऐच्छिक असले तरी मोदींनी हे भाष्य करू नये हे माझे मत.
अशा सूर्याखालच्या-वरच्या सगळ्या ऐच्छिक बाबींपैकी कशाकशावर मोदी भाष्य करतात हे पाहणं त्यामुळेच तर रोचक आणि उद्बोधक होतं ना! मौनीबाबाचा मौन हा स्थायीभावच होता. पण बोलबच्चनचं मौन रोचक वगैरे. ;-)
चार खडे बोल पक्षातल्याच काहींना सुनवायची गरज आहे
एफडीआय आणण्यात चमकदार कामगिरी करणार्या सरकारमधल्या 'काही लोकांना' (फ्रिंज इलिमेंट्स-खूप चलनी झालाय हा शब्द आजकाल) घटनेचं गांभिर्यच कळत नाही. दादरीच्या घटनेचे सर्वात वाईट वाटले ते या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून. (त्यात Despite of being Muslim वाले सांस्कृतिक मंत्रीही आले) 'बीफ खाल्लं म्हणून ठेचून मारलं' ही बातमीच मूळात इतर जगासाठी 'तालिबानी' वृत्तीपेक्षा वेगळी नाही. तरूण विजय यांच्या लेखातून तर अशा लोकांची नेमकी मानसिकता कळते. शेखर गुप्ताने त्यावर त्यातल्या त्यात खूपच सौम्य भाषेत समाचार घेतलाय. शेखरचा हा मूद्दा मला पटला. "Hindutva groups have discovered cow politics has no opposition". सेक्युलर म्हणवणार्या बर्याच जणांनी फक्त सांत्वन केलंय, पक्ष पातळीवर निषेध वगैरे दूरच (जनमानसिकतेविरूद्द जायची इच्छा नाही). हरियाणा सरकारने तर गोहत्या बंदीचा कायदा येवढा कडक केलेला आहे की, आता परदेशी कर्मचा-याच्या अटकेची बातमी फार दूर नसावी. विशेष म्हणजे हा कायदा पास करायला काँग्रेसनेही पूर्ण सहकार्य आणि अभिनंदन केलेले आहे. 'अहमदच्या घडाळ्यावर' ओबामा चार शब्द बोलून 'राजधर्म' पालन करू शकतात तर मोदी का नाही?
प्रताप भानू मेहता मात्र तरूण विजयवर गुप्ताच्या मानाने चांगलाच उखडलेला दिसतो. द्वेषाचे विष पसरविणार्या वाढलेल्या घटनांसाठी त्याने मोदींनाच जबाबदार धरले आहे.
*त्यांनी खरंच गोमांस खाल्लं असेल तर..... अशा अर्थाची विधानं.
*त्यांनी खरंच गोमांस खाल्लं असेल तर..... अशा अर्थाची विधानं.
या एकंदर घटनेत गोमांसाची तपासणी वगैरे प्रकार फार विचित्र वाटला. समजा गोमांस असते तर ही हत्या समर्थनीय होती का? गोमांस सापडले नाही - त्यामुळे चुकून हत्या झाली असावी - असा अर्थ सुचवणाऱ्या बातम्या आणि प्रतिक्रिया हा भयंकर प्रकार आहे.
California governor signs
California governor signs bill legalizing physician-assisted suicide
.
(१) California only the fifth U.S. state to legalize assisted suicide for terminally ill patients. Physician-assisted suicide is already legal in the states of Oregon, Washington, Montana and Vermont.
(२) The law, which goes into effect Jan. 1., makes it a felony to pressure anyone into requesting or taking assisted suicide drugs.
(३) The latest bill was introduced amid nationwide publicity over the case of Brittany Maynard, a 29-year-old brain cancer patient who moved from California to Oregon to take advantage of that state's assisted suicide law and died there.
(४) The California bill was strongly opposed by some religious groups, including the Roman Catholic Church, as well as advocates for people with disabilities, who said unscrupulous caregivers or relatives could pressure vulnerable patients to take their own lives.Opponents also said the bill would invite insurance companies to take advantage of poor patients by offering to pay for the cost of life-ending drugs but not for the expensive treatments that could save lives.
____
बाप रे! या विषयावरची स्कॉट अॅडॅम्स यांनी पूर्वी लिहीलेली ही पोस्ट प्रचंड इन्टेन्स आहे. इतकी की त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल संशय यावा.
बिल ला हिलरी चांगले ठोकुन
बिल ला हिलरी चांगले ठोकुन काढायची म्हणे.
http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news…
(फक्त प्रौढांसाठी मोड ऑन) पण
(फक्त प्रौढांसाठी मोड ऑन)
पण बिल च्या चेहर्यावरचे/शरीरावरचे व्रण हिलरीने बिल बरोबर भांडतानाचे असतील कशावरून ?? हिलरीबरोबर (किंवा इतर स्त्रीयांबरोबर) रतिक्रीडा करतानाचे नसतील कशावरून ? (हिलरी ला डिस्काऊंट करत नैये. हिलरी ला अमेरिकेत लोक बोनरश्रिंकर म्हणतात म्हणून काय झाले .... अनसेक्सी स्त्रियांना रतिक्रीडेवर समान अधिकार असावा असं डेमोक्रॅट बिल चं मत असेल व त्यानुसार बिल ने काही क्रिएटिव्ह प्रयोग करण्याचा यत्न केलेला असेल तर ???) .
(फक्त प्रौढांसाठी मोड ऑफ)
दिसायला सेक्सी असणं आणि
दिसायला सेक्सी असणं आणि रतिक्रीडेत निपुण असणं ह्या दोन असंबंधित गोष्टी आहेत.
अगदी मान्य.
पण माझा रोख नैपुण्याकडे नव्हता. स्वारस्याकडे/दिलचस्पीकडे होता. स्त्री सेक्सी असेल तर स्वारस्य जास्त असेल व त्यामुळे क्रिएटिव्ह काहीतरी करायचा यत्न होईल. वैसे बिल (बंबैय्या भाषामें) बहोत "शाणा" था.
काय सांगता! रतीक्रिडेत निपुण
काय सांगता! रतीक्रिडेत निपुण पण प्लेन जेन किंवा अगदी बोनर-श्रिन्कर असली तर क्रिएटीव्हिटीमधील रस कमी होतो?
.
काय सुपरफिशिअल आहेत ना पुरुष! खरच सिद्धच होतय. रुप-गुण यामध्ये या अल्टिमेट मुद्द्यातही त्यांचा कल रुपाकडेच झुकतो आहे.
_____
मला शुक्रवार चढायला सुरुवात झालेली आहे.
काय सुपरफिशिअल आहेत ना पुरुष!
काय सुपरफिशिअल आहेत ना पुरुष! खरच सिद्धच होतय. रुप-गुण यामध्ये या अल्टिमेट मुद्द्यातही त्यांचा कल रुपाकडेच झुकतो आहे.
रूप व गुण यांच्यातल्या द्वंद्वाची मी बात करत नैय्ये. दिसायला सुंदर असणे वा नसणे याच्या फरका बद्दल बोलतोय मी. मी असं म्हणालो की स्त्री ही दिसायला बर्यापैकी असेल तर पुरुष क्रिएटिव्ह होण्यास प्रेरित होण्याची शक्यता जास्त. इंट्युटिव्ह आहे हे. (पुरुष दिसायला सुंदर असेल तर स्त्री सुद्धा क्रिएटिव्ह होण्यास प्रेरित होऊ शकेल.) बिल हा दिसायला सुंदर आहे असे अमेरिकन स्त्रिया म्हणतात असे मी ऐकलेले आहे. पण तरीही हिलरी का क्रिएटिव्ह झाली नसावी ?? बिल चे लक्ष मोनिका कडे का गेले असावे ?
एक म्हणजे हिलरी प्लेन जेन
एक म्हणजे हिलरी प्लेन जेन वाटत नाही मला, समहाऊ गोडच वाटते. अन दुसरं मोनिका चक्क डुक्करीण वाटते. टेस्टलेस शब्द वापल्याबद्दल माफ करा. आणि हेही माहीत आहे की गोड पेक्षा पुरषांना फॉक्सी/कॅटी बायका आवडतात. ते एक असोच.
(पुरुष दिसायला सुंदर असेल तर स्त्री सुद्धा क्रिएटिव्ह होण्यास प्रेरित होऊ शकेल.
हाच्च माझा मुद्दा आहे बिल देखणा असूनही हिलरी का नाही झाली क्रिएटीव्ह? कारण स्त्रिया फक्त बाह्यसौंदर्यानेच टर्न ऑन होत नाहीत.
.
याउलट पुरुषांकरता ती एकमेव कंडिशन नेसेसरी & सफिशिअन्ट (पुरेशी) असते. = पुरुष अतिशय सुपरफिशिअल असतात. तुम्हीच म्हणालात हिलरीला लोक (अर्थात बहुसंख्य पुरुष) बोनर-श्रिन्कर म्हणतात. तेच माझं म्हणणं आहे, एखाद्या प्लेन जेन स्त्रीचे sexual prowess पुरुष पुढे जाऊन पहाणारच नाहीत, ती पहील्याच राऊंडमध्ये एलिमिनेट करतील. तिचे गुण गेले की नाही वाया? अर्थात गुणांपेक्षा रुपानेच पुरुष लग्गेच आंधळे होतात.
.
wait a minute पण बिलनी लग्न केलं म्हणजे .... त्याला ती आवडली.
.
बिलचं लक्ष मोनिका कडे का गेलं
परत माझाच मुद्दा "तारुण्य" = पुरुष सुपर....
_____
पॉवर- पॉवरच्च!!!!
पॉवर- पॉवरच्च!!!! जगातील सर्वात बलाढ्य देशाच्या राष्ट्रपतीस तालावर नाचविणे. नाहीतर तिने तो ड्रेस कशाला जपून ठेवला असता?
___
सेक्स हा मुख्यत्वे पॉवर गेम असतो किंबहुना तसा असेल तरच मजा असते - शुचिमामी.
कोणाला सही करायची असल्यास करा रे/गं ;)
I bet it must be ultimate turn On to make hime writhe in pleasure of her command , the person who has power to change map of the world.
____
शुक्रवार फारच चढलाय ;)
सेक्स हा मुख्यत्वे पॉवर गेम
सेक्स हा मुख्यत्वे पॉवर गेम असतो किंबहुना तसा असेल तरच मजा असते
किमान दोन स्त्रियांच्या तोंडी अशा अर्थाची वाक्ये ऐकलेली आहेत. त्यातल्या एकीने तर चक्क - माझ्या पुरुषाने बेड मधे माझ्यावर विजय मिळवावा व राज्य करावे असा डायलॉग मारलेला होता. मुंबईची होती. गुज्जु/मारवाडी टाईप. माझी ऐकताना विकेटच पडली होती. बोलता बोलता तिने - स्वयंवर हे सुद्धा स्त्री ला सुपिरियर पुरुष मिळवता यावा यासाठी असायचे - अशी पुस्ती जोडली होती.
प्रतिवाद
>> किमान दोन स्त्रियांच्या तोंडी अशा अर्थाची वाक्ये ऐकलेली आहेत. त्यातल्या एकीने तर चक्क - माझ्या पुरुषाने बेड मधे माझ्यावर विजय मिळवावा व राज्य करावे असा डायलॉग मारलेला होता. मुंबईची होती. गुज्जु/मारवाडी टाईप. माझी ऐकताना विकेटच पडली होती. बोलता बोलता तिने - स्वयंवर हे सुद्धा स्त्री ला सुपिरियर पुरुष मिळवता यावा यासाठी असायचे - अशी पुस्ती जोडली होती.
- दोन स्त्रिया हा विदा खूप कमी आहे.
- स्त्रियश्चरित्रम्... पाहता अशीही एक शक्यता जाणवते की त्या स्त्रीची तुम्हाला काही संदेश देण्याची इच्छा होती - उदा. तुम्ही तेव्हा कोवळे तरुण असाल किंवा मध्यमवयीन मवाळ (त्यात घाटी!) सद्गृहस्थ असाल, तर 'तुला मी झेपणार नाही त्यामुळे नाद सोड' असा संदेश, किंवा 'मला तुझ्यात रस नाही' असा संदेश ;-)
- 'सुपीरियर पुरुष' म्हणजे 'बेडमध्ये माझ्यावर विजय मिळवणारा'? - फारच मर्यादित अर्थनिर्णयन आहे.
तर 'तुला मी झेपणार नाही
तर 'तुला मी झेपणार नाही त्यामुळे नाद सोड' असा संदेश, किंवा 'मला तुझ्यात रस नाही' असा संदेश
अगदी. Her personality was such that she will suck many a man dry.
I would have loved for her to be my dominatrix. पण कदाचित ते ही तिला रुचले नसते कदाचित.
----
सद्गृहस्थ असाल
तुमचा मुद्दा समजतोय मला .... पण .... मला सद्गृहस्थ म्हणणारी स्त्री जन्माला यायचीय अजून. :-)
मला सद्गृहस्थ म्हणणारी स्त्री
मला सद्गृहस्थ म्हणणारी स्त्री जन्माला यायचीय अजून. (स्माईल)
गब्बर, तू कितीही गब्बर् वगैरे नाव घेउन आणि "फडतुसांना जाळुन टाका" असे काहीतरी लिहुन वेगळी प्रतिमा तयार करत असलास, तरी आत तू अतिच सद्गृहस्थ असावास असे मला वाटतय. नुस्ता सद्गृहस्थ नाही तर हळवा वगैरे.
गब्बर नाव घेणे हे कॉम्पेन्सेशन चा भाग असावा.
तुझे काय म्हणणे ह्यावर
अनु, चल सांगून टाकतेच. गब्बर
अनु, चल सांगून टाकतेच. गब्बर एकदम विनोदी प्राणी आहे आणि डॅम्बिस आहे, बोलघेवडा आणि एकदम हसरा आणि हसवत ठेवणारा आहे.
He is no goody goody gentleman & the beauty is that women (मी तरी) don't mind that.
त्याला भेटणं हा मस्त अनुभव होता.
___
त्याला कट्ट्याला फार चहाटळपणा करायचा वेळ अन मोका मिळाला नसेल.
____
मी त्याला मवाळ्/सद्गृहस्थ पेक्षा डॅम्बिस आणि हसरा ही विशेषणे लावेन.
याने काही कारणाने मला खरडी करण्याचं सोडलय म्हणून काल "मवाळ मवाळ, सज्जन, सज्जन" म्हणून वचपा काढत होते :)
नाही गं बाई तो सज्जन प्राणी नाही. =))
कट्ट्याला जायचा योग आला नाही
कट्ट्याला जायचा योग आला नाही पण मी बॅट्या, टिंकू, गब्बरला भेटले आहे. तो बोलघेवडा आहे. he is very courteous to women.... to the fault कारण मी त्याच्याकडून एक आईसक्रीम चकटफु उकळले आहे. मी ५ पुस्तके विकत घेतलेली होती व त्याला एक ऑफरही केलेले, पण त्याने पोलाइटली नाकारले.
.
गब्बर यातलं काय खरं नाही ते सांग. आणि आता सांग तुला सद्गृहस्थ का म्हणू नये?
.
इतका वेळ मी गप्प राहीले म्हटलं बघू मान्य करतोय का ते.
____
अजुन एक कार नसल्याने माझ्या भावजयीने मी, गब्बरने रिक्षा केली त्यात याने आम्हाला आधी राईड दिली, आम्ही व्यवस्थित पोचल्यावरच तो त्याच्या घरी गेला. बरं मी रिक्षाभाडे देऊ केलेले नाकारत होता. बळजबरीने द्यावे लागले. यातलं काय खरं नाही गब्बर? आणि सज्जनपणा हा गुणच आहे.
.
तेव्हा या सार्यांच्या खवचटपणास बळी पडू नकोस. आहेस तसाच रहा बाबा. :)
चांगलच आहे की ते. अजुन एक इथे
चांगलच आहे की ते. अजुन एक इथे सर्वांना वाटतं मी नेहमी तुझ्या बाजूने बोलते पण माझ्याने रहावत नाही. तुझ्या फॅन क्लबात है मै ;)
तू नीट वागला नसतास तर मी फॅनक्लबात आलेही नसते. इन फॅक्ट भेटलेय म्हणून फॅन क्लबात आहे. तेव्हा बदलू नये ही इनंती. :)
तू सद्गृहथ आहेस की नाही ते मी डायरेक्ट बोलतच नाहीये आणि मी ती टिप्पणी टाळतेय कारण अॅक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. मी काय किंवा कट्ट्याला आलेल्या अन्य मुली काय आम्ही सद्गृहस्थ आहेस असे सांगून किंवा नाहीस असे सांगून काय फरक पडणारे. जे आहे ते आहे. यु रॉक.
____
वाईट एकाच गोष्टीचं वाटतय की today is not your day :( मी सोडून बाकीचे नावं ठेवतायत. अर्थात मजेमजेने पण .... :(
मला सद्गृहस्थ म्हणणारी स्त्री
मला सद्गृहस्थ म्हणणारी स्त्री जन्माला यायचीय अजून. (स्माईल)
किती ते गैरसमज!
कट्ट्याला भेटल्यावर ऐसीवरच्याच काही स्त्रियांचे तुम्ही सद्गृहस्थ आहात असे मत झाले आहे. तेव्हा तश्या स्त्रिया केव्हाच जन्मल्या आहेत
मला एकदम गब्बररूपी कंस आठव्या मुलीला मारण्यास धावल्यावर "अरे माणसा, अर्थात तुझ्या गैरसमजाचा नि:पात करणारी स्त्री केव्हास जन्मास आली आहे आणि दूरदेशी पुण्यनगरीत वास्तव्य करून आहे" असे सांगणारी दुर्गाच झाल्यासारखे वाटतेय ;)
बिल हँडसम आहे हे मी बर्याच
बिल हँडसम आहे हे मी बर्याच भारतीय बायका/ मुलींकडुन ऐकले आहे.
तो जेंव्हा प्रेसिडंट होता तेंव्हा भारतात रहाणार्या मुलींमधे पण पॉप्युलर होता.
आम्हाला ते अंगच नाही (बिलमध्ये सौंदर्य दिसण्याचं) (डोळा मारत)
तुम्हाला बिल सुंदर दिसण्याचे अंग नाही म्हणजे तुम्ही रेघेच्या इकडच्या बाजुलाच आहात. लाईन क्रॉस करा मग कदाचित बिल सुंदर दिसेल पण.
माझ्या नावाखाली लोक आपली मते
माझ्या नावाखाली लोक आपली मते माडायला लागली आहेत.
दिसायला सेक्सी असणं आणि रतिक्रीडेत निपुण असणं ह्या दोन असंबंधित गोष्टी आहेत
हे एकदम बरोबर
त्यांना एकत्र करायला बिल मूर्ख आहे का?
ह्याबद्दल कल्पना नाही. पण हिलरी बरोबर इतकी वर्ष काढली म्हणजे सहनशील तर नक्कीच असणार.
येते प्रतिक्रियेची आठवण
बरोबर चूक याला फारसं महत्व नाही हो. पण बाकी तुमच्या या प्रतिक्रियेची प्रकर्षाने आठवण झाली खरं.
या प्रतिसादातून खालील गोष्टी
या प्रतिसादातून खालील गोष्टी सुचवल्या जाताहेत:
१) अरुणजोशी यांना ऐसीवर टारगेट करण्यात आलं.
२) ते मुद्दामहून ठरवून करण्यात आलं.
३) नंतर त्यांना ऐसीवरून हाकलून देण्यात आलं.
४) आता अजो गेल्यानंतर हेच सगळं अनुराव यांच्या बाबतीत करण्याचा बेत आहे.
५) याबद्दल काहीतरी गुप्त / पद्धतशीर / अन्यायकारक कट आहे.
मला यातली एकही गोष्ट मान्य नाही. असं घाटावरचे भट का सुचवताहेत हे ते सांगतील का?
तथ्य आहे
उल्लेख केलेल्या पाचपैकी किमान अर्ध्याहून अधिक मुद्द्यांत किमान काही अंशी तथ्य आहे असं मला वाटतं.
अर्थात ह्याबद्दल एकदम चर्चा,वाद वगैरे करायला कुणी उतरणार असेल तर अवघड आहे.
काही गोष्टी समोर दिसतात; जाणवतात. पण त्याबद्दल बोलायची सोय नसते.
(ते हरामखोर धर्मांध खुनशी पिसाट माणूसमारे आणि ह्या देशातली एकमेव समस्या असणारे उजवे नाहित का प्रच्चंड नीचपणा करतात; पण सालं नेमकं शाबितही करता येत नाही. तरीही ते त्यांनीच केलय; असं आपण ठरवून मोकळे होतो ना; तसच.)
मला सिद्ध करता येणार नाही; तार्किक वाद/चर्चा करुन दाखवून/पटवूनही देता येणार नाही; पण मला तसं एकूण प्रसंगांवरुन पाच पैकी काही मुद्द्यांत तथ्य आहे वाटतय हे मात्र खरं.
कॉन्स्पिरसी थियरी वगैरे...
>> काही गोष्टी समोर दिसतात; जाणवतात. पण त्याबद्दल बोलायची सोय नसते.
मला सिद्ध करता येणार नाही; तार्किक वाद/चर्चा करुन दाखवून/पटवूनही देता येणार नाही; पण मला तसं एकूण प्रसंगांवरुन पाच पैकी काही मुद्द्यांत तथ्य आहे वाटतय हे मात्र खरं.
हे सगळं माझ्या 'अनु राव मोड'मुळे चालू झालं आहे आणि बोलणारे मनोबा आहेत म्हणून उत्तर देतोय. माझ्यासाठी 'अनु राव मोड' म्हणजे -
- कसलंही संतुलन वगैरे ठेवण्याचा आव न आणता प्रतिसाद हाणणे.
- सभ्य शब्द न वापरता असांसदीय शब्द वापरणे
ही शैली मी ह.घ्या. टाइप प्रतिसादांना वापरतो आणि तरीही ती वापरून व्यक्त केलेल्या मतांची जबाबदारी मी घेतोच. शिवाय, 'टार्गेट करणं' वगैरे म्हणण्याआधी इथे एक अगदी साधा मुद्दा लक्षात घ्यायला हवा : जो माणूस आक्रस्ताळ्या शैलीचा वापर करतो त्याला 'दोन दिले तर दोन घेता यायला पाहिजेत' हा नियम आपोआप लागू होतो. माझी नैसर्गिक शैली आक्रस्ताळी नाही हे इथे नियमित येणारे लोक जाणतात. त्यामुळे मी फक्त ह्या न्यायापुरती आक्रस्ताळी शैली वापरतो हेदेखील उघड आहे. ह्याचं अर्थनिर्णयन 'टार्गेट करणं' वगैरे ज्यांना करायचं असेल ते खुशाल करू शकतात. मात्र, ज्याला कातडी गेंड्याची करता येत नाही त्याला आक्रस्ताळी शैली वापरणं परवडत नाही हे माझं स्पष्ट मत आहे. झालंच तर, 'जानी, जिन के घर शीशे के ...' वगैरे. लालू प्रसाद यादव मला आवडतात ते त्यांची मतं पटतात म्हणून नव्हे, तर त्यांच्या शैलीमुळे. त्यांच्याइतकं मनोरंजनमूल्य नमोंना नाही ते केवळ विनोदबुद्धीकमी पडते म्हणून . असो.
जाता जाता : मनोबा, सभ्य शब्द वापरले तर तुम्ही तक्रार करता. असांसदीय (इथे : मूर्ख) शब्द वापरले तरी तक्रार करता. असं नाय ब्वॉ चालणार ;-)
बरोबरे
जो माणूस आक्रस्ताळ्या शैलीचा वापर करतो त्याला 'दोन दिले तर दोन घेता यायला पाहिजेत' हा नियम आपोआप लागू होतो
ह्या मुद्द्यात तथ्य आहे असं वाटतं.
आणि
ह्याचं अर्थनिर्णयन 'टार्गेट करणं' वगैरे ज्यांना करायचं असेल ते खुशाल करू शकतात. मात्र, ज्याला कातडी गेंड्याची करता येत नाही त्याला आक्रस्ताळी शैली वापरणं परवडत नाही हे माझं स्पष्ट मत आहे
आणि ह्यातही.
पण मग ह्यातून "टार्गेट केलं गेलं नाही" हे सूचित होत नाही. "टार्गेट केलं गेलं ; आणि तेही समर्थनीय आहे" हेच सूचित होतं ना.
अर्थात तसे असेल तरी त्यातही तथ्य असावे.
लॉजिक
>> पण मग ह्यातून "टार्गेट केलं गेलं नाही" हे सूचित होत नाही. "टार्गेट केलं गेलं ; आणि तेही समर्थनीय आहे" हेच सूचित होतं ना.
अर्थात तसे असेल तरी त्यातही तथ्य असावे.
'आमचं काही प्रेम वगैरे नाही, वी आर जस्ट फ्रेंड्स' असं म्हटल्यामुळे 'जस्ट फ्रेन्ड्स' आहेत असंही सिद्ध होत नाही आणि नाहीत असंही सिद्ध होत नाही. त्यामुळे ते म्हणण्यात मला काही हशील वाटत नाही. आणि सत्य काय आहे ते त्या दोघांना तरी माहीत असेल का, ह्याबद्दलही मला खात्री नसते, कारण अनेकदा मी अशी उदाहरणं पाहिलेली आहेत की जोडीमधल्या एकाला वाटतंय त्याची तीव्रता आणि दुसऱ्याला वाटतंय त्याची तीव्रता ह्यात फरक असतो. त्यामुळे माझं लॉजिक असं आहे - 'अनु राव मोड' म्हणजे काय आणि तो वापरण्यामागची माझी कारणमीमांसा मी स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला पटलं तर पटलं. नाही तर नाही. ह्याउप्पर मी काय बोलणार? मी मला पाहिजे ते करतो. त्याची जबाबदारी मी घेतो. लोकांना अर्थनिर्णयन करण्याचा हक्क दिलेला असतोच. मी कोण आलो तो काढून घेणारा? कुणाला पटो न पटो, माझ्या उदारमतवादाचा हा एक अविभाज्य भाग आहे. म्हणून : "ह्याचं अर्थनिर्णयन 'टार्गेट करणं' वगैरे ज्यांना करायचं असेल ते खुशाल करू शकतात."
असे समज लोकांचे आहेत हे बघुन
असे समज लोकांचे आहेत हे बघुन मात्र अतिशय खेद झाला आहे.
इतके पारदर्शकपणे संस्थळाची धोरणे राबवूनही कोणत्याही सबळ कारणाशिवाय असे मत का बन(व)ले आहे हे कळायला मार्ग नाही. तशी विचारणा केली असता "अंदाज अपना अपना" या व्यतिरिक्त उत्तर नाही. हे क्लेशकारक आहे.
मग अश्या नोंदवलेल्या अफवेचे काय करावे असा प्रश्न पडतो. इथे कोणत्याही सदस्याला काढलेले नाही वा हाकलूनही लावलेले नाही. इथे सर्वांची खाती होती तश्शीच आहेत व ते सदस्य सध्या लॉग इन करत नसतील तरी कधीही लॉगिन करूच शकतात इतकेच नोंदवून शांत बसतो. संस्थळाने अजून नक्की काय करावे?
त्या सदस्यांना घाऊकमध्ये ऋण
त्या सदस्यांना घाऊकमध्ये ऋण श्रेणी मिळतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी काही प्रतिसादांना मिळालेल्या ऋण श्रेणींनंतर लगेच ते दाखवले आहे.
आता सदस्य श्रेणी देतात. त्याला संपादक काय करणार? संस्थळाचे असे काही धोरण नाही. संस्थळ कोणाला ब्लॉक करत नाही असे म्हणणे जरा भाजपच्या बाबरी/दादरी प्रकरणातल्या स्टँडसारखंच वाटतं आहे.
हास्यास्पद
>> त्या सदस्यांना घाऊकमध्ये ऋण श्रेणी मिळतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी काही प्रतिसादांना मिळालेल्या ऋण श्रेणींनंतर लगेच ते दाखवले आहे.
आता सदस्य श्रेणी देतात. त्याला संपादक काय करणार? संस्थळाचे असे काही धोरण नाही. संस्थळ कोणाला ब्लॉक करत नाही असे म्हणणे जरा भाजपच्या बाबरी/दादरी प्रकरणातल्या स्टँडसारखंच वाटतं आहे.
मी वर मांडलेला 'दोन दिले तर दोन घेता यायला पाहिजेत' हा न्याय पटतो का? ज्यांची व्यक्त होण्याची शैली इतकी आक्रस्ताळी असते आणि ज्यांना सतत कुणाला तरी हाणण्याची खुमखुमी असते त्यांनी ऋण श्रेणीबाबत तक्रार करणं मला मुळातच हास्यास्पद वाटतं. हे माझं व्यक्तिगत मत आहे. संस्थळाचं धोरण नाही. मला स्वतःला अनेकदा ऋण श्रेणी मिळतात. गेल्या चोवीस तासांतच ५-६ मिळालेल्या आहेत. इथे ४००हून अधिक सदस्यांना श्रेणीदानाचे अधिकार आहेत. कुणालाही चुकीच्या श्रेणी मिळत आहेत असं वाटत असलं तर त्या दुरुस्त करणं तुम्हा आम्हा प्रत्येकाच्याच हातात आहे. जर कुणालाच ती ऋण श्रेणी दुरुस्त करावीशी वाटत नसेल, तर जबाबदारी सर्व सक्रीय श्रेणीदात्या सदस्यांवर पडते, कारण ती शक्ती त्यांच्याच हातात आहे.
ऋण श्रेणी मिळण्याचं कारण -
ऋण श्रेणी मिळण्याचं कारण - (१) अॅक्च्युअली ऋण शैली मिळणे याबरोबरच (२) धन श्रेणींची वानवा असणे
असा आहे.
अजोंना धन द्यावी वाटत असूनही मी देत नसे. म्हणजे आवर्जुन ऋण देतच नसे पण सुयोग्य जागी धन अजिबात देत नसे. याला कारणही होते. एकच होते पण ते मला लागलेले होते. असो स्वत: अजो नाहीत म्हणून जास्त बोलतही नाही आणी असते तरीही मेगाबा....
____
अवांतर -
सुयोग्य - गब्बरने सवय लावलीये या शब्दाची
हे आता नवीन वाक्य अर्धच सोडून देणं पण या खुबीने की मुद्दा चाणाक्षांच्या लक्षात यावा = त्याचीच सवय.
एकेक नवे पायंडे पाड म्हणावं.
आता सदस्य श्रेणी देतात.
आता सदस्य श्रेणी देतात. त्याला संपादक काय करणार? संस्थळाचे असे काही धोरण नाही. संस्थळ कोणाला ब्लॉक करत नाही असे म्हणणे जरा भाजपच्या बाबरी/दादरी प्रकरणातल्या स्टँडसारखंच वाटतं आहे
खिक्.. थत्तेचाचांकडून अपेक्षित प्रतिसाद!
म्हणजे यात संस्थळाने नक्की काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? (याच उत्तर द्याल अशी अपेक्षा नसली तरी आशा आहे)
मी माझ्या श्रेण्या अनेकदा मला गैर वाटलेल्या श्रेण्या सुधारण्यासाठी वापरत आलो आहे. एक सदस्य म्हणून तुम्हालाही तो हक्क आहे. त्या उप्पर काय करायला हवे होते? जर अनेक सदस्यांना एखाद्या प्रतिसाद निगेटिव्ह वाटतो तर संपादकमंडळाने त्या सदस्यांवर पॉसिटिव्ह श्रेण्यांची जबरदस्ती करायला हवी होती असे तुम्हाला वाटते का? असल्यास, का वाटते?
उगाच
अरूण जोशींना श्रेण्या नाही तरी त्यांचा मताविरोधी प्रतिसाद पुष्कळ देणार्यांपैकी मी एक होतो म्हणून खुलासा.
श्रेणी व्यवस्था नसती तर जोशी सोडून गेले नसते असा तुमचा दावा आहे का? इथे यायच्या अगोदर, बहुतेक मराठी संस्थळावरच पहिला जोशींचा धागा त्यांनी काढला होता तो मी मराठी संस्थळावर. न्युटनचे नियम कसे चूक होते वगैरवर. (थत्ते यांनीही तिथे प्रतिसाद दिले होते असे आठवते.) त्यानंतरही एक दोन धाग्यांवर त्यांना तसाच अनुभव आलेला होता. तिथेच शे दिडशे प्रतिसाद मिळाले होते, आणी बहुतेक सर्व त्यांच्या विरोधात (पुन्हा, दाव्यांच्या विरोधात). थोडक्यात अरूणजोशींना पुष्कळ विरोध श्रेण्या नसतानाही आणि इतर संस्थळावरही झालेला आहे. जर श्रेण्या नसत्या तर इथेही तसाच झाला असता. आत जर एखाद्याला इतके विरोधी प्रतिसाद पचवता येतात तर श्रेण्यांचं अपचन का बरं व्हावं? असो.
तुमच्या मित्राचा ब्रेकअप /
तुमच्या मित्राचा ब्रेकअप / घटस्फोट झाला तर तो गर्लफ्रेंडला / बायकोला दिलेल्या सगळ्या गिफ्ट, डिनर, पिच्चरची तिकिटं, किस वगैरे परत मागतो का?
घटस्फोट झाल्यावर गर्लफ्रेंड/बायको कडुन मिळणारे बेनिफिट तरी बंद होतात. असे अॅवॉर्ड परत करुन नक्की स्वताचे काय नुकसान होते? उलट त्या निमीत्ताने पेपर ला नाव छापुन येते.
घटस्फोट झाल्यावर
घटस्फोट झाल्यावर गर्लफ्रेंड/बायको कडुन मिळणारे बेनिफिट तरी बंद होतात. असे अॅवॉर्ड परत करुन नक्की स्वताचे काय नुकसान होते? उलट त्या निमीत्ताने पेपर ला नाव छापुन येते.
एकदम सहमत.
अॅवॉर्ड परत करणे हे प्रतिकात्मक आहे असे मानू.
सिंपल सिग्नलिंग मॉडेल वापरले तरी - अॅवॉर्ड परत करण्यातून असा कोणता क्रेडिबल सिग्नल पाठवला जातो ?? अॅवॉर्ड हे जनता देते व सरकार हे फक्त फॅसिलिटेट करणारे असते. जनतेच्या वतीने सरकार देते अशी माझी समजूत आहे. म्हंजे अॅवॉर्ड वापस करण्याने सरकारला स्नब केल्यासारखे होत नसून जनतेला स्नब केल्यासारखे होत नाही का ?? व जनतेला स्नब करण्यात काय हशील आहे ??
जनता व सरकार हे अद्वैत आहे की द्वैत ?
मी माझें मोहित राहिलें निवांत । एकरूप तत्व देखिलें गे माये ॥१॥
द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं । विश्वरुपें मिठी देत हरी
लाखाची गोष्ट
ह्या बातमीनुसार अकादमीला एक लाख रुपयांचा चेकही दिला आहे. एक लाख रुपये ही बहुधा पुरस्काराची आजची रक्कम आहे. वाजपेयींना मिळाला तेव्हा रक्कम कमी असावी असा अंदाज.
These are very difficult times for literature, the arts, tradition and culture.The plurality, accommodation and inclusion, openness, multi-linguality and multi-religiosity which have sustained and energised us for us are all under assault constantly.
We are on the brink of a tyranny of uniformity and parochialism. Violence, murder, intolerance, bans are creating a fearful ethos. Being in a minority is almost a crime.
In such times, we, the members of the creative community, cannot keep quiet and watch these trends helplessly.
At this juncture, the silence of the Sahitya Akademi is very objectionable. You are a national body of writers. Some of them have been murdered in broad daylight and the Akademi has said nothing about it nor has it pressurised the government to have these stopped and ensure the prompt arrest of the killers.
In this sad context, as a writer all that I can do is to return the Sahitya Akademi Award (which I received in 1994) by way of protest.
I do not remember the amount I received.
A cheque of one lakh rupees is enclosed.
Ashok Vajpeyi,
October 6, 2015
लवकर वटवा तो चेक, डेट आणि सही
लवकर वटवा तो चेक, डेट आणि सही वगैरे आहे का ते पण बघा.
जर तो चेक खरच वटला तर, सीबीआय मागे लाऊन ही एक लाखाची सुपारी कोणी दिली होती त्याचा शोध घ्या.
मुलायल, लालू, मायावती सारखी लोक राज्यांचे मुख्यमंत्री होतात हे बघुन कोणाला पुरस्कार परत करावासा वाटला नाही. मुलायम आणि लालू च्या राज्यात स्वच्छ काम करणार्या आएएस अधिकार्यांना माफिया मारतात ( आणि तरी पण अटक वगैरे होत नाही ), तेंव्हा पुरस्कार परत करावा वाटत नाही.
दिल्लीच्या दंगलीतले गुंड काँग्रेस खासदार म्हणुन निवडुन आणते तेंव्हा पुरस्कार परत करावा वाटत नाही. आता एकदम काय खाज येते?
कमाल आहे.
नयनतारा सेहगल
आधीच्या असल्या घटनांनंतर अॅवॉर्ड परत का केलं नाही हे विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर रोचक आहे.
When I ask Nayantara Sahgal why she didn't return award during previous attacks/riots, she says: this is diff, now we have a Hindutva govt.
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) October 6, 2015
काँग्रेसी किंवा समाजवादी राजवटीत हे झालं तर एवढं सिरियस नाही असं म्हणतायत बहुधा त्या.
ह्म्मराजकारण हे प्रतिमांचा
ह्म्म
राजकारण हे प्रतिमांचा खेळ असते. सद्य सरकारची नव्हे पंप्रंची प्रतिमा ही अश्या प्रकरणांना पाठीशी घाल्णारे असे केले जात आहे. सरकारपक्षा तर्फे गृहमंत्री व अर्थमंत्र्यांनी खेद व्यक्त केलाय पण अत्यंत लहानसहान गोष्टींवर बोलणारे पंप्र यावर गप्प आहेत हे स्पष्ट करून त्यांची प्रतिमा ते या प्रकरणात चुकीच्या बाजुला उभे असल्याची करून देणे चालु आहे (मागेसुद्धा मनमोहनसिंगांनीच बोलावे असा आग्रह चालु असे. तेव्हाही सरकरचे मंत्री बोलत. यात नवे काहीच नाही.)
जर हे सत्य नसेल तर पंप्रनी समोर यावे आणि या घटनेचा निषेध करावा. एक साधा निषेध करायला कितीसा वेळ लागतो? पण तो करायचाच नसेल तर? का एका मोठ्या राश्ट्राच्या पंप्रंचा इगो आड येतोय?
=======
भाजप व काँग्रेस सरकारमध्ये मला तरी अजूनही फरक दिसलेला नाही.
उलट अशा हेकेखोरपणामुळे आधीचे परवडले म्हणायची वेळ जनतेवर येईल लवकरच असे वाटते.
हशिमपुरा हत्याकांड
सहगल बाईंना साहित्य अॅकॅडमी अवॉर्ड परत करून स्वतःची भूमिका मांडायची पहिली संधी मे १९८७ मधेच मिळालेली होती. अॅवॉर्ड मिळाल्यावर साधारण एक वर्षात - हशिमपुरा हत्याकांड घडले तेव्हा. पण त्यावेळी युपीमधे व केंद्रात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे.... बाईंना - हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले - असे वाटले असावे.
आणीबाणी
>> आधीच्या असल्या घटनांनंतर अॅवॉर्ड परत का केलं नाही हे विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर रोचक आहे.
>> काँग्रेसी किंवा समाजवादी राजवटीत हे झालं तर एवढं सिरियस नाही असं म्हणतायत बहुधा त्या.
मग तुम्हाला नयनतारा सहगल यांचा आणीबाणीदरम्यानचा प्रवासही रोचक वाटावा.
Nayantara Sahgal was one of the most bitter opponents of Emergency imposed by her cousin Indira Gandhi.
According to Nayantara, her activities were closely monitored and her telephone was tapped. She was asked to show her book A situation in New Delhi to the censor board for permission but she refused to do so. Later, in A Voice for Freedom, Sahgal eloquently wrote that she felt sick seeing so many admired, veteran leaders in jail alongside other political workers.
The book quotes Sahgal telling Subramanian Swamy, "People need to know that the Jan Sangh does not have three horns and a tail".
जंतूजी, मुद्दा धार्मिक
जंतूजी, मुद्दा धार्मिक असहिष्णुतेचा आणि त्याच्या प्रदर्शनाचा आहे. आणिबाणीचा धर्माशी सबंध नव्हता.
त्यांच्या म्हणण्याचा अर्थ 'एकच घटना कोणाच्या राजवटीत घडली त्यावर घटनेवरची रिअॅ़क्षन अवलंबून आहे' असा आहे. हे का मला समजलं नाही. अशा विधानांमुळेच हेतूबद्द्ल शंका घेण्यास वाव मिळतो.
वेचक-वेधक
>> त्यांच्या म्हणण्याचा अर्थ 'एकच घटना कोणाच्या राजवटीत घडली त्यावर घटनेवरची रिअॅ़क्षन अवलंबून आहे' असा आहे. हे का मला समजलं नाही. अशा विधानांमुळेच हेतूबद्द्ल शंका घेण्यास वाव मिळतो.
आणि मी सहगल यांची वकिली करत नाही आहे. माझा मुद्दा असा आहे, की जी गोष्ट पटत नाही तिच्याविरोधात बोलण्याची सहगल यांची ही पहिलीच वेळ नाही; शिवाय, त्यासाठी त्यांनी आपल्याच परिवारातल्या इंदिराबाईंचा रोषही ओढवून घेतला होता. मात्र, ह्या गोष्टीचा उल्लेख टाळून सहगल ह्यांच्या नेहरू घराण्याशी असलेल्या नात्याचा उल्लेख करणारे ह्या विषयावरचे अनेक मतप्रदर्शक पाहता वेचक माहिती देऊन त्याद्वारे सहगल ह्यांना काँगीहस्तक / नेहरू घराणेशाहीतल्या एक / संघद्वेष्ट्या दाखवून वाचकांची दिशाभूल करण्याचा हेतू त्यात दिसतो.
अद्ययावत : आणखी एक वेधक माहिती : १९८४मधल्या शीख हत्याकांडाची चौकशी करण्यात महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या 'पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज' ह्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी सहगल होत्या, आणि तेसुद्धा ह्या चौकशीच्या काळात.
Sahgal was the vice-president of the People's Union for Civil Liberties, or PUCL. It was under her watch that PUCL became the first to investigate the 1984 anti-Sikh riots and subsequently brought out a detailed report.
http://www.lokmat.com/storypa
http://www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=8330725
आकस्मिक परिस्थितीमुळे असलेला वन नाईट स्टँड किंवा तशाच एखाद्या परिस्थितीमुळे विवाहीत व्यक्तीचे दुस-यासोबत संबंध निर्माण झाले तर तो व्यभिचार ठरत नाही. पण विचारपूर्वक दुस-याशी संबंध निर्माण केले तर मात्र तो व्यभिचार ठरेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
धन्य आहे
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/muslim-rss-leader-commits…
ऐसीचे पंच परमेश्वर - अश्यापण बातम्या येतात हो पेपर ला, त्याही वाचत चला
साहित्याचे नोबेल
ब्येलारूसच्या स्वेतलाना अलेक्सीव्हिच यांना साहित्यातले नोबेल पारितोषिक।इक जाहीर झाले आहे. त्यांच्या लिखाणाविषयी त्यांच्या शब्दांत -
If you look back at the whole of our history, both Soviet and post-Soviet, it is a huge common grave and a blood bath. An eternal dialog of the executioners and the victims. The accursed Russian questions: what is to be done and who is to blame. The revolution, the gulags, the Second World War, the Soviet-Afghan war hidden from the people, the downfall of the great empire, the downfall of the giant socialist land, the land-utopia, and now a challenge of cosmic dimensions - Chernobyl. This is a challenge for all the living things on earth. Such is our history. And this is the theme of my books, this is my path, my circles of hell, from man to man.
स्रोत : विकीपीडिया
'झिंकी बॉइज' पुस्तकाचा परिचय.
Voices from Chernobyl - स्वेतलाना अलेक्सीव्हिच
त्यांना नोबेल मिळायला का हवं ते सांगणारा गेल्या वर्षीचा एक लेख.
निराधार आधार आम्ही गेले
निराधार आधार
आम्ही गेले कित्येक वर्षे बोलत आहोत त्याचा एक नेमका, परखड व सोप्या भाषेतील धांडोळा.. महत्त्वापूर्ण अग्रलेख
बाकी घाटावरचे भट यांनी
बाकी घाटावरचे भट यांनी दाखवलेल्या बहिष्काराच्या आरोपात तथ्य आहे - असे अनुला वाटते का? ;) अनुताईंनी का मीठाची गुळणी धरलीये? ;)
____
अनुने दिलय उत्तर - http://aisiakshare.com/node/4445#comment-114341
पण अशा खुबीने की मोदींनी चरणाशी बसून धडे घ्यावेत ;)

Indeed, the idea that free
बलिर्नेत्रभंजक!!