नरेंद्र दाभोलकरांची हत्या: आदरांजली
प्रखर विवेकवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व 'साधना' साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात ओंकारेश्वर पुलाजवळ आज सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 'अंनिस'च्या माध्यमातून समाजात विविध बदल घडवण्यासाठी त्यांनी योजलेले उपाय उल्लेखनीय होते. त्यांचा असा अंत दु:खदायक आणि उद्वेगजनक आहे.
समाजात परिवर्तन करणार्या या विवेकी व्यक्तीस 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांतर्फे विनम्र आदरांजली!
सदर धाग्यावर संबंधित घटनेवरील आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात व आदरांजली वाहण्यात यावी.
प्रतिक्रिया
डॉ नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात हत्या
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात हत्या.
बापरे खरीय का बातमी? अवघड
बापरे :O खरीय का बातमी? अवघड आहे...
अरेरे
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
धक्कादायक!!!
पुण्यात गोळ्या झाडून हत्या!!काय बोलावे तेच कळत नाही!
:( त्यांची हत्या करण्यामागे
त्यांची हत्या करण्यामागे कोणता स्वार्थ असेल काय माहिती.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक.
अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक.
धक्कादायक, संतापजनक,
धक्कादायक, संतापजनक, असहिष्णू, भ्याड
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
अहो! सवय झालीय आम्हाला.
धक्कादायक - का बरे! अनेक मोठ्या व्यक्तींच्या आणि कार्यकर्त्यांच्या हत्या अश्या प्रकारे होत असतात. मोठ्या मोठ्या शहरात असं होतंच असतं.
अहो! सवय झालीय आम्हाला.
संतापजनक - कोणाला संताप होणार आहे. ज्यांनी हत्या केली आणि जे अंधश्रद्धा सोडत नव्हते त्यांना बरेच वाटले असणार. आपला सुसंस्कृत समाज ज्याने अंधश्रद्धा सोडावी म्हणून ही संघटना कार्य करत होती तो समाज त्यांसाठी संतापणार आहे काय.
अहो! सवय झालीय आम्हाला.
असहिष्णू, भ्याड - अहं असं म्हणायचं नाही बा. मारेकऱ्याने खुलेआम हत्या केली आहे. आपण सारं सहन करायचं.
अहो! सवय झालीय आम्हाला.
सुहास
झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो
लाजिरवाणी घटना
मराठी माणूस असल्याची शरम वाटावी अशी घटना. विवेकाचे आणि विवेकी माणसांचे दिवस संपत आले आहेत याचे चिन्ह. 'ही कसली पौर्णिमा? ही तर अमावस्या !' हे वृत्तवाहिन्यांवरचे शीर्षक यथार्थ आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
दाभोलकरांचे पार्थिव
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे पार्थिव दुपारी अडीचच्या सुमाराला 'साधना'च्या शनिवार पेठेतील कार्यालयात आणले जाईल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सुन्न करून टाकणारी घटना. खूप
सुन्न करून टाकणारी घटना. खूप मोठा माणुस गेला. आपल्या प्रकाशासारख्या विचारांसाठी प्राणांची किंमत देणार्या मूठभर माणसांत आणखी एक भर.
माणुस गेला तरी विचार मरत नाहीत हेही तितकेसे खरे नाही. कारण उरलेल्यांना ते तितकेसे पटलेले असतीलच किंवा मांडता येतीलच असे नाही. शिवाय सर्वांना संभाळून घेणारे नेतृत्व आहे आपले. गेल्या काही वर्षातल्या घटना पाहता आपल्याला अशा घटनांना सामोरे जाण्याची तयारी केली पाहिजे. संतसूर्य तुकाराम घ्या, भांडारकर घ्या नाहीतर जात-पंचायतींची वाढती सुलतानी घ्या. महाराष्ट्र हा तोच का असे विचारण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र हा तोच का असे
महाराष्ट्राचा यूपी बिहार होत चाललाय खरंच बापजाद्यांच्या पुण्याईवर काय जे चाल्लंय ते चाल्लंय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आदरांजली _/\_ दाभोलकरांच्या
आदरांजली _/\_
दाभोलकरांच्या कार्याला सर्वसामान्य माणुस कशा पद्धतीने पुढे नेऊ शकतो याविषयी मार्गदर्शन/चर्चा करावी.
मी स्वतः कुठलाही देवधर्म, रितीरीवाज पाळत नाही. अजुन काय करु शकतो?
जाणकारांनी सुरुवात करावी
आपण जर प्रलंबित जादू टोणा विधेयक किंवा त्याची लिंक इथे देऊ शकलात तर बरे होईल.
हे विधेयक इतका वेळ का प्रलंबित आहे, त्यापाठी राज्य शासनाची आणि अंनिसची भूमिका काय होती, त्या अनुषंगाने इथे चर्चा पुढे चालविता येऊ शकेल.
हे नम्र आवाहन खासकरून ऋषिकेश यांना, आपण या विषयांत विशेष आहात म्हणून.....
सुहास
झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो
सदर बिल केंद्रात नव्हे तर
सदर बिल केंद्रात नव्हे तर राज्यस्तरावर सादर होणार होते.
अंनिसच्या संकेतस्थळावर याबद्दल माहिती मिळेल. या बिलासंबंधी मुद्देसुद गोषवारा त्याच स्थळावर इथे वाचता येईल.
बाकी विधानसभेतील विधेयके व मसुदे मिळण्यासाठी लोकसभा/राज्यसभेप्रमाणे संकेतस्थळ मला मिळालेले नाही त्यामुळे विधीभवनात त्यावर चर्चा झाली काय, असल्यास काय चर्चा झाली वगैरे प्रश्नांची उत्तरे सध्या तरी माहिती नाहित.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
भयंकर
अत्यंत लाजिरवाणी आणि भयंकर घटना. संताप व्यक्त करायला शब्द पुरेसे नाहीत.
उत्क्रांतीविषयी वाचन केलं तेव्हा धार्मिकांच्या उत्क्रांतीवादाला असलेल्या विरोधाविषयी वाचलेलं होतं. मी विचार करत होतो की भारतात उत्क्रांतीच्या विचारांना असा विरोध का झाला नाही? त्यावेळी तरी मला असं वाटलं होतं की भारतात विचारांना विरोध वगैरे करण्याची फारशी गरज पडत नाही, कारण विचार मांडणाऱ्याकडे लक्ष कोण देतो? कोणी चार बुकं लिहिली म्हणून संस्थात्मक पातळीवर धर्मावर, बुवाबाजीवर ढिम्म परिणाम होत नाही.
हे अर्थातच आता तरी खरं नाही हे या हत्येवरून दिसून आलेलं आहे.
अत्यंत निंदनीय
ज्या कोणी हलकटांनी या थोर माणसाची हत्या केली त्यांना कठोरात कठोर शिक्षा तर व्हावीच, शिवाय ते अंधश्रद्ध असल्याने,त्यांना भीति वाटेल असे भयानक शाप, लोकांनी त्यांना द्यावेत. म्हणजे फाशीच्या प्रदीर्घ प्रतीक्षेत, त्या शापांच्या विचाराने त्यांचा मानसिक छळही होईल.
शोकसभा आणि मूकमोर्चा
सायंकाळी साडेपाच वाजता एस्. एम्. जोशी सभागृहामध्ये शोकसभा होईल. त्यानंतर हत्येविरोधात मूकमोर्चा निघेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दाभोळकरांनी काय दिले?
शोकाचा आणि संतापाचा पहिला कढ ओसरल्यावर काहीशा शांत मनाने दाभोळकरांनी आम्हाला नेमके काय दिले याचा मागोवा घेणे शक्य झाले आहे.
दाभोळकरांनी विवेकाचा आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा सतत न कंटाळता आणि (शक्य तोवर) न चिडता पाठपुरावा करायला शिकवले. सभोवताली कर्मकांडांचे आणि बुवा, माता, गंडे, अंगारे, उपासतापास आणि नवस यांचे जोरदार पीक आलेले असताना दाभोळकरांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाची कास धरायला शिकवले. दाभोळकरांनी आम्हाला चिकित्सा करायला शिकवले. कोणत्याही गोष्टीवर अंधपणाने विश्वास न ठेवता आपल्या मतीवर आणि विवेकावर त्या गोष्टीचा कस बघून मगच ती स्वीकारायची की नाही हे ठरवायचे आम्ही दाभोळकरांकडून शिकलो.
या सगळ्याहून महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूला सगळेच दीप मंदावत असताना हातात एक मिणमिणती का होईना पण जिवंत पणती घेऊन एखाद्याला वाटचाल करता येते हा विश्वास दाभोळकरांनी दिला. विचारांची लख्ख स्पष्टता, शब्दांची अचूक निवड आणि तल्लख बुद्धिमत्ता याच्या आधारावर दाभोळकरांनी विवेकवादाचे एक रोपटे तरारते ठेवले. सगळ्या लोंढ्याच्या विरुद्ध जाऊन 'नाही' म्हणायला दाभोळकरांनी शिकवले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर दाभोळकरांचे जाणे अतीव क्लेशदायक आहे. त्याहूनही अधिक म्हणजे ज्या सनातन शक्तींचा आज क्षणभर तरी विजय झाला आहे, त्या शक्तींच्या फोफावण्याची शक्यता मनात काहूर माजवणारी आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आणखी एक भर
सहमत. आणखी एका मुद्द्याची भर घालेन, आणि तो म्हणजे त्यांची सहृदयता. साने गुरुजी आणि त्यांच्या 'साधना' परिवारातून आलेली त्यांची सहृदयता इतकी पराकोटीची होती की विरोधक कितीही खालच्या पातळीवर जावोत, नरेंद्र दाभोलकरांच्या तोंडून एक अनुचित शब्द पडलेला कधी ऐकायला आला नाही. अशी माणसं विरळा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मनःपूर्वक आदरांजली.
मनःपूर्वक आदरांजली.
ज्याप्रमाणे महात्मा गांधीच्या भ्याड हत्येमुळे मूलतत्त्ववाद्यांना बॅकफूटवर जावे लागले आणि अहिंसेला व सहिष्णुतेला असलेली राजमान्यता आणि जनमान्यता अधिकच दृढ झाली; तसेच, या भ्याड व उद्वेगजनक हत्येनंतर श्रद्धावाद्यांचे विरोध बोथट होऊन ,विवेकवादाला राजाश्रय व जनाश्रय मिळू लागेल अशी मनःपूर्वक आशा व्यक्त करतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आदरांजली
प्रचंड संताप झाला ही बातमी वाचून.
"त्यांनी चूक केली तर आम्ही का नाही करायची" असे उफराटे तर्क मांडणार्यांनी प्रत्यक्ष बळी घेतला.
डॉ. दाभोलकरांच्या भाषणाची एक फीत:
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आदरांजली.
दाभोळकर यांना आदरांजली.
-------------------------------------------------------------------------------------------
चेचेन्यात जन्माला आलो असतो तर
मारला गेलोसतो
रशियन सैनिकांकडून
व्हिएतनाममध्ये
चुकवता आला नसता
अमेरिकन विमानांचा ससेमिरा
युगांडात
कुठल्यातरी भीषण रोगाच्या साथीत
पडलासतो बळी
पाकिस्तानमध्ये
कापला गेलासतो शिया-सुन्नींच्या
वाढत्या दंगलीत
जर्मनीमध्ये ज्यू म्हणून
आफ्रिकेत नागवला गेलासतो
वर्णद्वेषाच्या मुस्कटदाबीत
कंदहारमध्ये धडावेगळा झालासतो
फतव्याविरुद्ध सिनेमा पाहिला
मोठ्यांदा हसलो म्हणून
कोलंबोत किंवा हमासमध्ये
सतत वावरत राह्यलोसतो गर्दीच्या ठिकाणी
मानवी बाँबच्या भीतीनं
सौदीत
तोडून घेतलेसते हातपाय
चुकून बाईला धक्का लागला म्हणून
कुठे नं कुठे
मारलातुडवलाकापलाकिंवाउडवला गेलाच असतो
भारतात काय किंवा इतर ठिकाणी काय ?
- कवी वर्जेश सोलंकी.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
(No subject)
मनुष्य त्यांच्या कार्यास चालू ठेवोत
मनुष्य त्यांच्या कार्यास चालू ठेवोत.
अतिशय वाईट वाटले.
आधार घेण्याची वास्तवता आणि
करुणेचा आणि सहृदयतेचा संदेश एका नास्तिकाकडून यावा, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तथाकथित धार्मिकांकडून बंदुकीच्या गोळ्या याव्यात! आयरनी आयरनी म्हणतात ती हीच असावी.
आदरांजली
पुरोगामी लोकांना एकत्र ठेवण्याचे संघटन कौशल्य डॊ दाभोलकरांच्यात होते. अनेक वर्षांच्या व्यक्तिगत स्नेहामुळे बातमी समजल्यावर धक्काच बसला.माझी आदरांजली पण आणि श्रद्धांजली पण!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
हा प्रकार धार्मिक लोकांनी
हा प्रकार धार्मिक लोकांनी केला असल्याच्या गृहितकावर इथल्या वैचारिक प्रतिक्रिया अयोग्य वाटतात.
सहमत.
सहमत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
असहमत
जरा बदल.. गृहित हे कृत्य धार्मिक लोकांनी केले असे नसून धर्मवादी लोकांनी केले असल्याचे आहे.
मी वरच्या प्रतिसादात श्रद्धाळू, श्रद्धावंत वगैरे शब्द जाणीवपूर्वक टाळून 'श्रद्धावादी' हा नसलेला शब्द योजला आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तथाकथित!
अहो त्यांनी 'तथाकथित धार्मिकांकडून' असे म्हटले आहे. सरसकट सर्व धार्मिकांना जबाबदार धरले आहे असे मला वाटले नाही.
अहो ती दरवेळची रड आहे. काही
अहो ती दरवेळची रड आहे. काही झाले की तथाकथितांवर टीका करतो म्हणायचे आणि सरसकट सर्वांवर टीका सुरूच ठेवायची. यावरही बरेच लिहिता येईल पण प्रसंग तसा नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यदाकदाचित
यदाकदाचित ह्या नाटकात कर्णाचं पात्र सारखं ’हा आपला अपमान आहे’ असं बोलतं..तेव्हा दुर्योधन त्याला आठवण करुन देतो की हा आपला नाही तुझा अपमान आहे.
इथून चोप्य-पस्ते
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धार्मिक-धर्मवादी
नुकतीच जावेद अख्तर यांची एक मुलाखत पाहिली होती.
त्यात ऑपोझिट ऑफ रिलिजस (धार्मिक) इज एथिस्ट (नास्तिक) अॅण्ड ऑपोझिट ऑफ सेक्युलर इज फॅसिझम असे म्हटल्याचे आठवते. (मला हे प्रतिपादन आवडले याचे कारण जालावर किंवा इतरत्रही जे धर्मवादी -सावरकर, ठाकरे, जीना, मोदी- लोक दिसतात ते धार्मिक नसतात असे निरीक्षण आहे).
त्या अर्थाने हत्या धार्मिकांनी केलेली नसून कम्यूनल लोकांनी केली असावी.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
-
फार वाईट बातमी.
-Nile
जे झाले ते फारच दु:खदायक आहे.
जे झाले ते फारच दु:खदायक आहे. एका महान विचारांची हत्या झाली. निषेध करावा तितका थोडाच.
डॉ. नरेन्द्र दाभोळकरांना श्रद्धांजली.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
दाभोलकर ऐवजी दाभोळकर
एवढा बदल करावा ही विनंती!
सुहास
झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो
दाभोलकर वायले आणि दाभोळकर
दाभोलकर वायले आणि दाभोळकर वायले. हे दाभो'ल'कर होते असे वाटते कारण त्यांच्या पुस्तकांवर त्यांचे नाव तसे लिहिले जायचे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
असा निर्मळ , निर्भय विचारवंत
असा निर्मळ , निर्भय विचारवंत पुन्हा होणे नाही.
दाभोलकरांची दोन-तीन पुस्तके
दाभोलकरांची दोन-तीन पुस्तके वाचली होती. बरेचसे प्रसंग माझ्या आसपासच्या गावांतले-जिल्ह्यातलेच होते आणि गल्लीबोळात सोकावलेल्या भोंदू बाबांचा माझा रागराग आणखीच वाढला होता.
नक्की कधी ते आठवत नाही पण साधारण १९९५-९६ च्या सुमारास तासगांवात नरेंद्रमहाराजांचं जरा अधिकच वाढू लागलं होतं. उपाय काय तर दर गुरूवारी नाणीजला वारीला या, तिथे इतक्या रूपयांच्या उदबत्त्या रोजच्या बाजूला काढून ठेवा व वारीच्या दिवशी तिथे वाहा, इतके नारळ द्या, इतकी देणगी द्या, वगैरे वगैरे. त्यांच्या 'गजानन विजय ग्रंथा"च्या चालीवर लिहिलेली पोथ्यापुराणांनी तर वात आणला होता. आमचे दुर्दैव असं की आमच्या भिंतीला भिंत लागून असलेले शेजारी दर गुरूवारी शक्य तितक्या लोकांना बोलावून हा गोंधळ घालायचे आणि आम्हाला काहीच करता यायचे नाही. भरीत भर म्हणून तेव्हाचे सगळ्यात मोठे मंगलकार्यालय आमच्याच गल्लीत असल्याने तिथेही यांचे कार्यक्रम चालायचे, कधीकधी आमच्या शाळेच्या आवारातदेखील हे प्रकार चालत.
अंनिसचा या प्रकारांना विरोध असे. त्यातूनच एकदा नरेंद्र महाराज आयोजित 'सामुदायिक विवाह'कार्यक्रमास अंनिसने विरोध केला होता. खरंतर सामुदायिक विवाह फक्त नावाला आणि खरा उपक्रम सगळा माल गोळा करून नाणीजला नेण्याचा होता. अंनिसच्या विरोधाला प्रत्त्युत्तर म्हणून त्या लोकांने सरळ नंग्या तलवारी उपसल्या. याचा निषेध म्हणून सर्व व्यापार्यांनी लगोलग बंद पुकारला आणि आम्ही सर्वांनी गावातून मूक निषेध मोर्चा काढला होता.
काल बातम कळाली तेव्हाच धक्का बसला होता. आज सकाळी लोकसत्त्तामध्ये (बहुधा) कुमार सप्तर्षींचा दाभोलकरांना सभेदरम्यान धमकावण्याच्या प्रकाराबद्दलचा लेख वाचला आणि ही आठवण आज इथे लिहाविशी वाटली.
दाभोलकर गेले तरी सारासार विचार करणार्यांची मते बदलणार नाहीत, पण त्यांच्या चळवळीला नक्कीच त्यांची उणीव जाणवत राहील.
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
आपापली पातळी
हे गृहितक कदाचित चुकीचं ठरू शकेल, पण ज्या संस्थेकडे संशयाची सुई आहे त्या 'सनातन' संस्थेचे अभय वर्तक काल एका वाहिनीच्या पॅनलवर असं म्हणत होते, की ह्या हत्येमागे 'अंनिस' संस्थेचा आर्थिक गैरव्यवहार किंवा दाभोलकरांचे एखाद्या बाईशी अनैतिक संबंध असं काहीही असू शकतं. एकीकडे वाहिनीवर अंत्यसंस्काराची लाइव्ह दृश्यं दाखवत होते आणि एकीकडे ह्यांचं हे चालू होतं. लोक आपापली पातळी दाखवून देतात, एवढंच सध्या मी म्हणेन.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट
गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये ही सनातन्यांची परंपरा नाही का?
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
संशय बळावेल
ह्या हत्येमागे 'अंनिस' संस्थेचा आर्थिक गैरव्यवहार किंवा दाभोलकरांचे एखाद्या बाईशी अनैतिक संबंध असं काहीही असू शकतं.
अशाने 'सनातन' चा या हत्येची संबंध असल्याचा संशय बळावेल. राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया तर एकेकाला जोड्याने मारावेसे वाटेल इतक्या भोंदू आहेत. ज्या विनोद तावडेंनी फेसबुकवर दाभोलकरांच्या हत्त्येचा निषेध वगैरे आपल्या फोटोसकट टाकले आणि उथळ्सम्राटांनी ते लगोलग आपापल्या भिंतींवर शेअर केले आहे त्याच तावडेंनी या विधेयकाला किती विरोध केला हे दाभोलकरांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले आहे. भाजप आणि शिवसेना हे विधेयक कधीच संमत होऊ देणार नाहीत असे दाभोलकरांना वाटत असे. त्यांची त्यातल्या त्यात मदार होती ती काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारवर. पण अगदी विलासरावांपासून चव्हाण-आराराबांपर्यंत सगळ्यांनी त्यांच्या तोंडाला पानेच पुसली.
भाजप आघाडीचे सरकार केंद्रात आणि/ किंवा राज्यात आले तर हे विधेयक कधीच संमत होणार नाही आणि झाले तर ते अगदी पुचाट स्वरुपातले नावापुरते असेल असे आता वाटू लागले आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात कोण कमी धोकादायक या प्रश्न याआधीही होता, आता तर तो अधिक उग्र झाल्यासारखा वाटतो आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
कॉमेंट्रेटर्स कर्स
वरील प्रतिसाद लिहून काही तास उलटताच तोच महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी वटहुकूम काढत असल्याचे जाहीर केले आहे. मूळ मसुद्यातील आता फक्त अकराच कलमे या वटहुकुमात समाविष्ट केली जाणार आहेत. दाभोलकरांनी सुचवलेल्या सुधारित मसुद्यातल्या तेरा कलमांपैकी कोणती कलमे या वटहुकुमात गाळली हे मंत्रीमहोदय शिवाजीराव मोघे यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवत नव्हते!
दरम्यान सनातन संस्थेने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मते जे उपद्रवी आहेत त्या लोकांना 'टारगेट' करणे आपण बंद करणार नाही असे म्हटले आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
अतिशय दुर्दैवी
अतिशय दुर्दैवी घटना.
खूप वाईट वाटले.