.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
मस्त लेख
मस्त लेख. साध्यासुध्या शब्दांत त्या भयंकर घटनेचं वर्णन केलेलं आहे.
अपघात किंवा दुर्घटना झाल्यानंतर लगेचच भावनांचा कल्लोळ उठतो. त्या गदारोळात नक्की काय झालं हे तपासून पहाण्यापेक्षा असं व्हायला नको या तिडीकीपोटी कोणावर तरी ठपका ठेवण्याचा प्रयत्न होतो. ९११ नंतर वल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती पुरेशा मजबूत होत्या का असा प्रश्न उठला. सर्वच इमारती विमानाचा धक्का सहन करण्याइतक्या मजबूत कराव्यात अशीही मागणी भावनेच्या भरात झाली होती. अर्थातच ते करणं शक्य नाही हे उघड झालंच.
कुठचीही व्यवस्था परिपूर्ण नसते. सुरक्षिततेसाठी थोडी माया ठेवलेली असते, पण वजन इतकं वाढल्यावर धागे उसवतातच.
मी
औरंगाबाद मध्ये पाऊल ठेवण्याच्या एक वर्षे आधीची ही घटना.. नंतर तो रस्ता बंद करुन लांबचा बायपास सुरु ठेवला व अंबाजोगाई एस टी चे भाडे २ रुपये वाढले... ( विद्यार्थी दशेत मोठी चाट होती खिशाला :).. ट्रक आणि विमान अपघात कसा झाला असेल हे पटण्या पलिकडे होते... नंतर बरेच दिवस पोलिस केस आणि तपास वाचत होतो... औरंगाबाद च्या आठवणी जाग्या केल्याबद्द्ल धन्यवाद...
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन मेले!! भयंकर!!
दोन टन एवढं जास्त वजन आहे हे पायलटला समजलं नाही का? म्हणजे पायलटला कुठे दिसत नाही का की आपण कीती वजन उचलतोय ते?
जे कोणी सामान भरण्याचा मुख्य होतं त्यांना " चालतंय, विमानाला एवढं सामान म्हणजे कैच नै!! भरा रे!! उरकुन टाका" अशा प्रकारे काम करावंसं वाटलं त्याअर्थी त्यांना त्याविभागाचं ज्ञान नसताना काम दिलं होतं जे संवेदनशील काम आहे अन लोकांचे प्राण जाउ शकतात..
असो..होउन गेलं पण आतातरी लोकं नेमुन दिल्याप्रमाणे कामं करंत असतात का? का भ्रष्टाचार आहेच...(काय तरी प्रश्न विचारलाय मी!! :-S) :sick:
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग वाचत असताना या सिरिज मधे औरंगाबाद येईल अशी अपेक्षा होतीच...
या अपघाताचा उल्लेख औरंगाबादमधे आजही अधुन मधुन एकायला मिळतो.
या अपघातानंतर अपघाताच्या कारणांबद्दल अनेक वावड्या उठल्या होत्या. त्यातली एक म्हणजे पायलट आणि को-पायलट यांचात असणारे अफेअर.
आज या बद्दलची अधिक माहिती मिळवत असताना संसदेच्या साईट वर चर्चेची एक लिंक मिळाली
http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses6/13270493.htm
मस्त लेखन गवि. एकदम त्या
मस्त लेखन गवि. एकदम त्या क्षणी तिथे आहोत असे वाटले.
खरच, आपण खूप गोष्टी चालवून घेत असतो. "चलता है" ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून कमी होईल तो सुदिन.