दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२ मे
जन्मदिवस : लेखक जेरोम के. जेरोम (१८५९), लेखक मिखाईल बुल्गाकोव्ह (१८९१), युरोपमधली सगळ्यात मोठी डिजिटल प्रकाशनसंस्था काढणारा ॲक्सेल स्प्रिंगर (१९१२), गायक पं. वसंतराव देशपांडे (१९२०), दिग्दर्शक सत्यजित राय (१९२१), वेस्ट इंडियन क्रिकेटपटू ब्रायन लारा (१९६९), फुटबॉलपटू डेव्हिड बेखम (१९७५)
मृत्युदिवस : चित्रकार, शिल्पकार, वास्तुतज्ज्ञ व शास्त्रज्ञ लिओनार्दो दा विंची (१५१९), विचारवंत व संपादक प्रा. दि. के. बेडेकर (१९७३), पॉलिमर्सवर काम करणारा नोबेलविजेता गिलिओ नत्ता (१९७९), चेतापेशींमधल्या संदेशवहनाबद्दल संशोधन करणारा नोबेलविजेता जॉन एकल्स (१९९७), गोवा मुक्तिसंग्रामातील सैनिक पुरुषोत्तम काकोडकर (१९९८), उद्योगपती मोहनलाल पिरामल (२००१)
--
१८६९ : 'फोलीज बर्जर' हा म्यूझिक हॉल पॅरिसमध्ये सुरू. संगीत, गायन, नृत्य, नाट्य इ. ललित कला सादर करण्यासाठीचे युरोपातील हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते
१८७२ : मुंबईत 'व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्यूझियम'चे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन
१९२५ : फरीदपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी इंग्रज सरकारला सहकार्याच्या बदल्यात वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली
१९४५ : दुसऱ्या महायुद्धात बर्लिन रशियन फौजांसमोर पडले; इटलीचा पूर्ण पाडाव
१९५२ : जगातले पहिले जेट विमान लंडनहून जोहान्सबर्गला निघाले
१९५५ : 'कॅट ऑन अ हॉट टिन रूफ'साठी नाटककार टेनेसी विलिअम्सला पुलित्झर पुरस्कार मिळाला
१९६८ : 'मे ६८' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी चळवळीची फ्रान्समध्ये सुरुवात. पाश्चात्य समाज, संस्कृती, शिक्षणव्यवस्था, युद्धविरोधी चळवळ यांत आमूलाग्र बदल घडवणारी ही चळवळ होती
१९८२ : 'द वेदर चॅनल'ची सुरुवात
१९८९ : ऑस्ट्रियालगतच्या आपल्या सीमा हंगेरीने खुल्या केल्या. त्यामुळे पूर्व जर्मन पश्चिमेला पळून जाऊ लागले. अखेर याची परिणती बर्लिनची भिंत पडण्यात आणि शीतयुद्धाची अखेर होण्यात झाली
२००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर
२०११ : अमेरिकन सैन्याच्या गुप्त मोहिमेत कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मृत्यू
२०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
मस्त लेखन गवि. एकदम त्या
मस्त लेखन गवि. एकदम त्या क्षणी तिथे आहोत असे वाटले.
खरच, आपण खूप गोष्टी चालवून घेत असतो. "चलता है" ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून कमी होईल तो सुदिन.
+१
गवि, इतर ललित लिखाणाबरोबर हे लिखाणही येऊ द्या. एयर-क्रॅश प्रकारातल्या डॉक्यूमेंटरी बघण्याएवढा आनंद(?) तुमचे लेख वाचून मिळतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पर्सनल टच
प्रसंगाशी असलेला तुमचा वैयक्तिक अनुभव जास्त प्रभाव पाडून गेला. (विमानाच्या अपघांतांबद्दल अगोदरच असलेल्या तांत्रिक माहितीमुळे असेल कदाचित)
-Nile
मस्त लेख
मस्त लेख. साध्यासुध्या शब्दांत त्या भयंकर घटनेचं वर्णन केलेलं आहे.
अपघात किंवा दुर्घटना झाल्यानंतर लगेचच भावनांचा कल्लोळ उठतो. त्या गदारोळात नक्की काय झालं हे तपासून पहाण्यापेक्षा असं व्हायला नको या तिडीकीपोटी कोणावर तरी ठपका ठेवण्याचा प्रयत्न होतो. ९११ नंतर वल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती पुरेशा मजबूत होत्या का असा प्रश्न उठला. सर्वच इमारती विमानाचा धक्का सहन करण्याइतक्या मजबूत कराव्यात अशीही मागणी भावनेच्या भरात झाली होती. अर्थातच ते करणं शक्य नाही हे उघड झालंच.
कुठचीही व्यवस्था परिपूर्ण नसते. सुरक्षिततेसाठी थोडी माया ठेवलेली असते, पण वजन इतकं वाढल्यावर धागे उसवतातच.
मी
औरंगाबाद मध्ये पाऊल ठेवण्याच्या एक वर्षे आधीची ही घटना.. नंतर तो रस्ता बंद करुन लांबचा बायपास सुरु ठेवला व अंबाजोगाई एस टी चे भाडे २ रुपये वाढले... ( विद्यार्थी दशेत मोठी चाट होती खिशाला :).. ट्रक आणि विमान अपघात कसा झाला असेल हे पटण्या पलिकडे होते... नंतर बरेच दिवस पोलिस केस आणि तपास वाचत होतो... औरंगाबाद च्या आठवणी जाग्या केल्याबद्द्ल धन्यवाद...
२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त
२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त होतं. निष्काळजीपणा भोवला सगळ्यांना.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन मेले!! भयंकर!!
दोन टन एवढं जास्त वजन आहे हे पायलटला समजलं नाही का? म्हणजे पायलटला कुठे दिसत नाही का की आपण कीती वजन उचलतोय ते?
जे कोणी सामान भरण्याचा मुख्य होतं त्यांना " चालतंय, विमानाला एवढं सामान म्हणजे कैच नै!! भरा रे!! उरकुन टाका" अशा प्रकारे काम करावंसं वाटलं त्याअर्थी त्यांना त्याविभागाचं ज्ञान नसताना काम दिलं होतं जे संवेदनशील काम आहे अन लोकांचे प्राण जाउ शकतात..
असो..होउन गेलं पण आतातरी लोकं नेमुन दिल्याप्रमाणे कामं करंत असतात का? का भ्रष्टाचार आहेच...(काय तरी प्रश्न विचारलाय मी!! :-S) :sick:
http://shilpasview.blogspot.com
चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
तुमची गप्पा मारल्यासारखे लिहिण्याची शैली मस्त असते.
ते वांद्रे समुद्रकिनारा इथे का नाही आलं?
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग वाचत असताना या सिरिज मधे औरंगाबाद येईल अशी अपेक्षा होतीच...
या अपघाताचा उल्लेख औरंगाबादमधे आजही अधुन मधुन एकायला मिळतो.
या अपघातानंतर अपघाताच्या कारणांबद्दल अनेक वावड्या उठल्या होत्या. त्यातली एक म्हणजे पायलट आणि को-पायलट यांचात असणारे अफेअर.
आज या बद्दलची अधिक माहिती मिळवत असताना संसदेच्या साईट वर चर्चेची एक लिंक मिळाली
http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses6/13270493.htm
वाचनीय लेख... वैयक्तिक
वाचनीय लेख... वैयक्तिक अनुभवाची पार्श्वभूमी छान कथन केली आहे...
याच अपघातात विडिओकॉनचे उद्योगपती सीनियर "धूत" वारले हे ऐकले होते...
निष्काळजीपणाने झालेला भयंकर अपघात...