दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२७ एप्रिल
जन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)
मृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)
--
स्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)
मुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.
१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.
१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.
१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.
१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.
१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.
१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.
१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.
२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
चित्र छान आहे. व्यंग लक्षात
चित्र छान आहे.
व्यंग लक्षात आले नाही (आकलनशक्तीच्या मर्यादेमुळे )
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
उत्कृष्ट संकल्पना.
उत्कृष्ट संकल्पना. न्यूयॉर्करमधल्या तरल कार्टूनांच्या जातकुळीची. ती पेलून घेणारं चित्रही समर्थपणे काढलेलं आहे.
दोन बैल भरपेट जेवण करून तट्ट झालेले आहेत. आणि त्यातला एक दुसऱ्याला म्हणतो 'पान खाणार?' बैलांचं जेवण म्हणजे गवत, पानं. त्यामुळे त्यानंतर पान खाणं हे गमतीदार आहे. द. मा. मिरासदारांची एक कथा आठवते. त्यात एक दूध, दही, लोणी, तूप विकणारा माणूस पैज लावून एक किलोभर लोणी खायला तयार होतो. सुरूवात ठीक होते. पण जसजसं तो जास्त जास्त लोणी खातो तसतसं त्याला कसंतरी वाटायला लागतं. (हे मी एका वाक्यात लिहिलेलं असलं तरी मिरासदारांनी याचं वर्णन जबरदस्त केलेलं आहे.) शेवटी तो जेव्हा ते संपवतो तेव्हा त्याला अजीर्ण होतं. तो वैद्याकडे जातो. वैद्य त्याला पोट ठीक करण्यासाठी औषध देतो, आणि म्हणतो 'हे कडू आहे. तेव्हा लोण्यात मिसळून खा.' हे ऐकूनच त्याची जी अवस्था होते की विचारायला सोय नाही. थोडासा त्या प्रकारचा विनोद इथे आहे.
पण... पण...
पण... पण... हे कळायला दुर्बोध आहे हो! (मलाही कळले नाही!)
अवांतर: विनोदाचे गाइड काढण्याची गरज पडू लागली, तर 'विनोद फसला' असे म्हणता यावे काय? की विनोदाच्या साटल्याचे कौतुक व्हावे? (पहिले कोणत्या परिस्थितीत व्हावे, नि दुसरे कोणत्या परिस्थितीत व्हावे?)
फसला असे नाही.
पण सामान्यतः सरदार लोकांना जोक्स समजवून सांगावे लागतात असा प्रवाद आहे
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
खुलाशाबद्दल धन्यवाद.
खुलाशाबद्दल धन्यवाद.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
चित्र मस्त काढलय.
चित्र मस्त काढलय.
त्या बैलाच्या खुरावरले पान पाहून
मिले खुर मेरा तुम्हारा
तो खूऽर बने हमारा..
असं गाणं गावंसं वाटाया लाग्लं बा.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
(No subject)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!