.
.
इतरांचं काय मोटिव्हेशन असतं
इतरांचं काय मोटिव्हेशन असतं माहीत नाही.
माझं मोटीव्हेशन असं काही नव्हतं. मला जो पुरुष आवडायचा, आवडतो त्याला लग्न करायचं होतं. लग्न केलं काय आणि न केलं काय मला फार फरक पडत नव्हता. त्याची इच्छा होती म्हणून केलं लग्न. तो ही कुंपणावरचा किंवा पुरता नास्तिक असता तर नसतं केलं.
थोडं स्वातंत्र्य घेतलं,
थोडं स्वातंत्र्य घेतलं, आस्तिक/नास्तिक या शब्दांच्या परंपरागत अर्थाचं पावित्र्य* मोडलं आणि नवीन अर्थाने शब्द वापरला. मला काय म्हणायचं आहे त्याबद्दल काही गैरसमज झालेला दिसतो. अवतरणात हा शब्द लिहीला असता तर कदाचित ते टळलं असतं.
*इथेही पावित्र्य हा शब्द नेहेमीपेक्षा निराळी अर्थछटा वापरून लिहीला.
संपत्तीत हिस्सा
आपल्या जोडिदाराच्या स्वकष्टार्जित किम्वा वडिलोपार्जित संपत्तीचा मनमोकळा उपभोग लीगली घेता येणे अॅड्वांटेज नाही का?
शिवाय त्याच्या मृत्यूपश्चात पत्नीनं नॉमिनी असणं अपेक्षित आहे. लीगल अॅडवंटेज.
कायदेशीररित्या तिची अपत्ये अधिक अशा संपत्तीची वारसदार ठरतात. हाही काही(खरे तर बहुतांश) स्त्रियांच्या मते अॅडवांटेज ठरावा.
आपल्या जोडिदाराच्या
आपल्या जोडिदाराच्या स्वकष्टार्जित किम्वा वडिलोपार्जित संपत्तीचा मनमोकळा उपभोग लीगली घेता येणे अॅड्वांटेज नाही का? >> ठिकाय. मग 'स्वतःच घर नाही, १बीएचकेच आहे, आईवडीलांसोबतच राहणार' अशा कारणांने मुली नकार देतायत असे रडगाणे गाऊ नका (हे तुला नाही. रडगाणे गाणार्याँसाठी आहे.)
शिवाय त्याच्या मृत्यूपश्चात पत्नीनं नॉमिनी असणं अपेक्षित आहे. >> अपेक्षीत आहे. पण कंपल्शन नाही ना?
कायदेशीररित्या तिची अपत्ये अधिक अशा संपत्तीची वारसदार ठरतात. हाही काही(खरे तर बहुतांश) स्त्रियांच्या मते अॅडवांटेज ठरावा. >> पहिले उत्तर पहा. + स्त्रीला अपत्ये नको असतील किँवा एकटी पोसायला समर्थ आहे, वारसदार वगैरे कंसेप्टवर विश्वास नाही हेही होउ शकत.
नॉमिनेशन
>>शिवाय त्याच्या मृत्यूपश्चात पत्नीनं नॉमिनी असणं अपेक्षित आहे. >> अपेक्षीत आहे. पण कंपल्शन नाही ना?
कम्पल्शन आहे. नवर्याने नॉमिनेट केले आहे की नाही याने काही फरक पडत नाही. नवर्याने तिसर्याच व्यक्तीस नॉमिनेट केले तरी पत्नीचा वारसा हक्क शाबूत राहतो. नॉमिनी म्हणजे वारस नव्हे.
नुसती जास्त कमावते म्हणून नाही पण.....
लागू शकते. नवरा अपंगत्वामुळे कमावण्यास असमर्थ असेल तर.
In certain cases under personal law, the Indian courts have adopted a lenient view and granted the husband the right to receive maintenance. Such right however, is conditional and typically conferred upon the husband, only if he is incapacitated due to some accident or disease and rendered incapable of earning a livelihood. Such an entitlement is not available to an able person, doing nothing for a living or a ‘wastrel’.
बेकार असला तरी नवर्याने बायकोला पोटगी दिलीच पाहिजे- उच्च न्यायालय
लैच लीगल अॅडव्हाण्टेजेस आहेत.
तो बेकार मनुष्य कुठला देतोय
तो बेकार मनुष्य कुठला देतोय पोटगी. पळुन जाइल दुसर्या राज्यात. तिकडेपण नवीन घरोबा करेल. कुठे शोधत हिँडणार.
पण हो नोकरी न करणार्या, स्वतःची प्रॉपर्टी नसलेल्या पण कायद्याची जाण असलेल्या स्त्री साठी आहेत लैच फायदे, कमीतकमी कागदोपत्री तरी आहेत. फक्त मागेल तेव्हा शरीरसुख आणि एकपत्नीव्रता रहावच लागेल. म्हणुनच तर कवाची सांगतेय पुरुषांनो प्रिन्युप करा :-D
हे ही पहा
हे ही पहा
http://www.lawweb.in/2013/05/wife-is-liable-to-maintenance-to.html
नवरा बायको मिळून धंदा करत होते. नंतर बायकोने नवर्याला हाकलून दिले आणि तो धंदा बायको एकट्यानेच करू लागली.... तेव्हा बायकोने नवर्याला पोटगी द्यायला हवी. (नवरा बेवडा असला तरी).
असला तरी झाट उपयोग नाही
असला तरी झाट उपयोग नाही.
परवाच चर्चा चालली होती ग्रुप अम्ध्ये.
सदर मुलगा अगदि जवळून ठाउक आहे.
त्याने लग्नामध्ये छदाम घेतला नाही.
(खरं तर त्यात मिरवण्यासारखं ,सांगण्यासारखं नाही, हे ठाउकय. पण पुढील घटनांसंदर्भात महत्वाचं ठरावं.)
लग्नानंतर काही वर्षांतच "का गं तुझ्या नावावर नाहीये का काही" असं त्यानं सहज विचारलं बायकोला.
चर्चा सुरु होती तिच्या वडलांच्या प्रॉपर्टीच्या वाटणीबद्दल. चांगली बागायती शेती चाळीसेक एकर सहज असेल, त्याशिवाय इतर गोष्टी(राहता फ्लॅट, इतर प्लॉट्स वगैरे.एकुनात तगडी पार्टी होती.). त्याची वाटणी ती स्त्री आणि तिचे दोन भाउ; अशा एकूण तीन वाटेकर्यांत व्हायला हवी असे कायदा सांगतो. प्रत्यक्षात ती केवळ दोन भावातच केली गेली. नवर्याने चुकून हा विषय काढताच "पैशाला हपापलेला अहेस का" वगैरे वगैरे संतापयुक्ल्त बोलणी ऐकावी लागली. "तो भावांचाच हक्क असतो" वगैरे ऐकून घ्यावे लागले. आणि "अशा प्रकारे अधिकच्या (पूर्वी घ्याय्च्या राहून गेलेल्या)हुंड्याची मागणी करतो आहेस" हा आरोप ऐकावा लागला पोराला.
बिचारं तोंड लटकवून बसलं. शिवाय दिमाग इतकं आउट झालं की ह्या सगळ्या घरातल्या गोष्टी पोरगं बाहेर बोलू लागलं. वाईट वाटलं बिचार्याबद्दल.
.
.
"हुंडा देउ नका" हा कायदा पाळला जातो.
पण स्त्रीलिंगी अपत्यासही पुरुष अप्त्यांइतकाच अधिकार असतो हे खुद्द स्त्रियांनाही मान्य नाही. तिथे कायदा कोण पाळत नाही. शिवाय पती हा थेट अधिकारी व्यक्ती नसल्याने काही बोलू शकत नाही.
.
.
लोक कायदा सिलेक्क्टिवली पाळतात, असे दिसते.
त्याची वाटणी ती स्त्री आणि
त्याची वाटणी ती स्त्री आणि तिचे दोन भाउ; अशा एकूण तीन वाटेकर्यांत व्हायला हवी असे कायदा सांगतो. प्रत्यक्षात ती केवळ दोन भावातच केली गेली.
कायदा असे कंपल्सरी करतो का? जो बाप आहे त्याच्या मनाप्रमाणे तो वाटणी करू शकत नाही?? नसेल तर का???? कुच तो गडबड है दया.
ओक्के. म्हणजे वडिलांनी स्वतः
ओक्के. म्हणजे वडिलांनी स्वतः वारसाहक्काने मिळवलेली मालमत्ता असेल तर मुलांमध्ये वाटणे कंपल्सरी.
पण इथे खालील दोन ऑप्शन्सपैकी कुठला व्हॅलिड आहे?
१. प्रत्येक मालमत्तेत सर्व पोरांचा हिस्सा पायजेच.
२. प्रत्येक मालमत्ता कुठल्या तरी पोराला दिली जाईल, त्यात शेअरिंग होईल की कसे, नसल्यास कुठल्या पोराला द्यावी इतपत स्वातंत्र्य बापाला आहे. म्हणजे बापाने ठरवले की मला क्षयझ मालमत्ता माझ्या एकाच पोराला द्यायची आहे दुसर्याला नै. तर तो तसे करू शकतो की नाही?
आणि जिथे मालमत्तेचा प्रश्न
आणि जिथे मालमत्तेचा प्रश्न आहे तिथे अविश्वास हा असणारच. पाहिलंय जवळून.
उलट उदाहरण आणि/किंवा अपवाद अजून पाहिलेले नसावेत. नाहीतर "हे काय मी कमावलेलं नाही, वापर तू आणि तुझ्याकडेच ठेव" असेही संवाद घडतात. बहिणीचं लग्न 'स्पेशल मॅरेज अॅक्टा'खाली रजिस्टर झालं तर तिचा हिस्सा तिला मिळावा याची भावाला वाटलेली काळजी असाही संवाद ऐकलेला आहे.
माझ्या माहितीप्रमाणे
माझ्या माहितीप्रमाणे वडिलोपार्जित मालमत्तेतही भावंडांपैकी काही भाऊ/बहिणींनी आम्ही स्वखुशीने हा हक्क डावलत आहोत अश्या अर्थाचे अॅफिडेव्हिट दिल्यास उर्वरीत भावंडांत ही संपत्ती वाटली जाते.
वडिलोपार्जित जमिनीवर किंवा अगदी वडिलांनी मिळवलेल्या जमिनींवर (ज्यात वडिलांनी मृत्यूपूर्वी कोणतीही स्पेसिफिक वाटणी केलेनी नाहिये) हल्ली सातबारा वगैरेवर नाव बदलून घ्यायचे असेल तर सर्व अपत्यांची (स्त्री/पुरूष) नावे बाय डिफॉल्ट लागतात अन्यथा ज्यांचे नाव नको आहे त्यांना स्वखूशीने हक्क सोडत असल्याचे अॅफिडेव्हीट द्यावे लागते.
त्यामुळे यात फारसे अन्याय्य वाटले नाही
कल्पना आहे
तसे करता येते ह्याची कल्पना आहे.
मी अर्धवट उदाहरण दिले , क्षमस्व. सदर स्त्रीने प्रथमपासून सुखासीन जीवनशैलीचा मोह धरला होता.
अधिकाधिक सुखचैनीच्या वस्तू ज्मवण्याचा तिचा छंद होता, आवड होती.पतीवर त्यासाठी अधिकाधिक दबाव टाकला जाई.
आवाक्याबाहेरच्या गोष्टी जमतच नसल्यास हिणवले जाई ("काय तुम्ही...छ्या... नै तर ते शेजारचे पहा..." ह्या स्टाइल डायलॉग.)
*********************************
अवांतर सुरु:-
असा सुखचैनीचा अनावश्यक मोह, आणि वाटेल त्या मार्गाने त्या सुविधा मिळवण्यासठीचा
दबाव ह्यातूनच गैरमार्गांची , भ्रष्टाचार वगैरेची सुरुवात होते असे वाटते.
अवांतर संपले.
*********************************
पती आहे तितक्यात चालवून घेण्याचा प्रयत्न करी. तोही घरचा बरा असला ( बागायती शेती, प्लस बर्यापैकी वर्षाकाठी उत्पन्नाचा शहरी जॉब वगैरे)
तरी "एसी शिवाय चालणारच नाही" अशा हल्ली हल्ली सुरु झालेल्या पंथाचा तो सदस्य नव्हता.
अशा स्थितीत स्वतःला अधिकाधिक संपत्तीचा उपभोग घेण्याची आवड असताना समोरच्यावर दबाव टाकत राहून स्वतःचे जे हक्काचे आहे ते का सोडून दिले गेले ते
कधीच कळू शकले नाही. कारणे देताना "माझ्या भावांना नको का ते", "त्यांना नाही का गरज त्याची" अशी कारणे त्यावेळी ऐकवण्यात आली.
जर भावाची इतकी काळजी आहे, तयच्यावर आर्थिक ओझे पडू नये असे वाटत असेल, तर मग नवर्यावर दया का येत नाही?
शिवाय नवर्याने मात्र घरातील वाटणीत नवर्याच्या वडलांकडून bigger half पदरात पाडून घ्यावा ह्यासाठी लकडा सुरुच होता.
"तुम्हाला नको असेल हिस्सा. पण माझ्या मुलांना नको का त्यांच्या आजोबाकडली म्दत? ती आदव्नारे तुम्ही कोण" वगैरे वगैरे संवाद झाले.
हेच उलट बाजूने चालत नाहित का? नवरा बायकोला "तुला नको असेल हिस्स, पण माझ्या मुलीला तिच्या आजोबांकडून( "नाना"कडून) मिळणारी संपत्ती अड्दवणारी तू कोण"
हा सवाल तार्किकदृष्ट्या चूक ठरतो का? का ठरतो?
नवर्याला "छी ...थू ....बाईच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेस" हे का ऐकावे लागते देव जाणे.
अशा केसेस पाहिल्यावर आपल्याकडे भरपूर संपत्ती नाही ते बरेच आहे असे वाटून जाते क्षणभर.
पूर्ण केस सविस्तर आधी दिली नाही; सॉरी.
ओके. इन अदॅट
ओके. इन अदॅट केस:
वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क सोडण्याची मुभा जशी स्त्रीला आहे तशीच पुरूषांना आहे. सदर केसमध्ये कायद्यांची आडकाठी किंवा कायद्यामुळे होत असलेला अन्याय दिसत नाही. ही केस अगदी प्रातिनिधीक असो नसो, नवरा बायकोतील सामंजस्याचा अभाव (प्रसंगी आपल्या विचारधारेला सुटेबल जोडिदार न मिळाल्याने होऊ शकणारी परिस्थिती) वगैरे कॅटेगरीत जाते असे प्राप्त माहितीवरून तयार झालेले हंबल मत आहे.
उगा कायद्याला का श्या देतायसा? ;)
>>नोकरी करणार्या स्त्री ने
>>नोकरी करणार्या स्त्री ने लग्न करण्यातले लीगल अडवांटेजेस कोणी सांगेल का?
१. आपल्या नवर्याच्या प्रॉपर्टिवर "आपोआप - बाय डिफॉल्ट" मिळणारा समान हक्क (हेच उलटही लागू पण तुम्ही स्त्रीचे म्हंटाय म्हणून इथे आणि यापुढल्या मुद्द्यांत एकच बाजू देतो. बाकी याला एखादी वेगळी 'न' वी बाजू असल्यास कळवावे ;) )
२. स्त्रीच्या नवर्याकडून (अथवा जोपर्यंत समाजाला माहित नाही तोपर्यंत कोणाहीकडून) झालेल्या अपत्यांस स्त्री व पुरूषाच्या प्रॉपर्टित मृत्यूपश्चात मिळणारा समान हक्क.
३. स्त्रीच्या नवर्याकडून (अथवा जोपर्यंत समाजाला माहित नाही तोपर्यंत कोणाहीकडून) झालेल्या अपत्यांस मिळणारी लेजिटिमसी.
याव्यतिरिक्त काही फायदे सुचत नैयेत.
माझ्यापुरतं सांगायचं तर लग्नानंतर कमावलेल्या पत्नीच्या प्रॉपर्टिवर हक्क असावा तसंच, (अपत्यप्राप्ती झाली तर) माझ्या व पत्नीच्या पश्चात आमच्या अपत्याला आमच्या प्रॉपर्टित फार कायदेशीर झंझट न करता आपोआप हक्क मिळावा व त्यास लेजिटिमसी मिळावी म्हणून लग्न केले. आणि ही पश्चातबुद्धी नाही. लग्न करायच्या आधीच हा विचार केलेला होता. पत्नीशी माझ्या या उद्देशावर लग्नाआधीच चर्चाही केली होती. तिचीही या उद्देशाबाबत सहमती होती.
(बाकी गोष्टी, जसे जोडिदारावर प्रेम असणे/नसणे, मुलांना जन्म देणे, एकत्र रहाणे वगैरे गोष्टिंसाठी लग्नाची गरज नाही यात आम्हा दोघांत एकमत आहे)
गंमतीने सांगायचं तर:
-- मंगळसूत्र घालायला मिळणे
-- हळदीकुंकवाला बोलावणे मिळणे.
-- मंगळागौर साजरी करायला मिळणे
-- सवाष्ण म्हणून फुकटात जेवण ओरपायला मिळणे
वगैरे फायदे (काही प्रसंगी कितीही तिडिक आणणारे असले तरी) अगदीच नजरेआड करण्यासारखे नाहीत
१. आपल्या नवर्याच्या
१. आपल्या नवर्याच्या प्रॉपर्टिवर "आपोआप - बाय डिफॉल्ट" मिळणारा समान हक्क (हेच उलटही लागू पण तुम्ही स्त्रीचे म्हंटाय म्हणून इथे आणि यापुढल्या मुद्द्यांत एकच बाजू देतो. बाकी याला एखादी वेगळी 'न'वी बाजू असल्यास कळवावे ) >> ज्याची प्रॉपर्टी आहे (स्त्री/पुरुष), त्याच्या दृष्टिने हा अत्यंत निगेटीव मुद्दा आहे. हे माझ मत. परत एकदा sigh प्रिन्युपशिवाय पर्याय नाही.
बाकी गंमतीने सांगितलेल्या मुद्द्यांसाठी हॉ हॉ हॉ.
..तर लग्नच करू नये.
माझं मत थोडं वेगळं आहे.
लग्न करतोय म्हणजे / लग्न करतेवेळीच आपण आपापल्या प्रॉपर्टिवरचे हक्क आता समान शेअर करणार आहोत हे परस्परांनी मान्य केलं असल्यास व त्याची पूर्ण जाणीव असल्यास - समजा सेपरेशनची वेळ आली तर एकमेकांचे हक्क न देऊ पाहण्याचा व ते देताना वाईट वाटण्याचा प्रश्न तितका तीव्र रहात नाही.
उलट लग्न म्हंजे प्रेम किंवा मुलं किंवा एकत्र राहणं वगैरे कल्पना असल्यास सेपरेशनच्यावेळी अचानक प्रॉपर्टि, प्रेन्युप वगैरे स्तरावर येणं मानसिकदृष्ट्या किती कष्टप्रद होतं हे आजुबाजूला बघत असतोच.
थोडक्यात जर आपल्या प्रॉपर्टिवर आपल्या जोडिदाराचा व (झालेल्या / दत्तक घेतलेल्या) अपत्याचा समान हक्क मान्य नसेल तर लग्न करू नये. फक्त प्रेम बिम असल्यास किंवा निव्वळा मुलांची हौस असल्यास लीव-इन रहावे.
???
लग्न करतोय म्हणजे / लग्न करतेवेळीच आपण आपापल्या प्रॉपर्टिवरचे हक्क आता समान शेअर करणार आहोत हे परस्परांनी मान्य केलं असल्यास व त्याची पूर्ण जाणीव असल्यास - समजा सेपरेशनची वेळ आली तर एकमेकांचे हक्क न देऊ पाहण्याचा व ते देताना वाईट वाटण्याचा प्रश्न तितका तीव्र रहात नाही.
असे कोण म्हणतो?
लग्न ही एक वेळ जंटलमेन्स (किंवा खरे तर लेडीज़ अँड जंटलमेन्स) अॅग्रीमेंट असू शकेलही, परंतु (सेपरेशनसमये प्राप्ते) सेपरेशन हीसुद्धा एक (लेडीज़ अँड जंटलमेन्स) अॅग्रीमेंट असते, म्हणून कोणी सांगितले?
उलट, खरे तर ही (अॅट बेस्ट) स्वतःचे हक्क प्रतिपक्षापासून शक्य तितके सुरक्षित राखण्याची चढाओढ ठरावी. (अन्यथा मुळात बहुधा सेपरेशनची वेळच येती ना.) द्याट वुड जनरली बी द मोस्ट प्र्याक्टिकल कोर्स ऑफ अॅक्शन.
(सेपरेशनसमये प्राप्ते-सुद्धा) तुम्ही भले (स्वतःशीच) ठरवाल, की (तुमच्या लिंगाप्रमाणे) जंटलमन (किंवा लेडी) राहायचे म्हणून. पण तुम्ही असे ठरवलेत, म्हणून प्रतिपक्षही तसे ठरवेलच, याची ग्यारण्टी काय? असे मानणे हे अॅट बेस्ट विशफुल थिंकिंग आणि अॅट वर्स्ट अंधश्रद्धा ठरावी.
उलट (तितकी वेळ आली असता) प्रतिपक्ष तसे वागणार नाही, या गृहीतकाखाली चालणेच श्रेयस्कर (आणि, मी तर म्हणेन, विवेकवादी)!
(बाकी, प्री-नप वगैरे प्रकारांच्या एन्फोर्सेबिलिटीबद्दल कल्पना नाही, त्यामुळे व्हेदर ऑर नॉट दे आर वर्थ द पेपर दे आर टाइप्ड अँड साइन्ड ऑन, याबद्दल काहीही बोलू इच्छीत नाही. परंतु, मुळात प्री-नप वगैरे करण्याची गरज भासत असेल, तर त्या लग्नात अर्थ तरी काय, असले जुनाट, भोळसट, बुरसटलेले, अंधश्रद्ध आणि अविवेकी विचार बाळगून अजूनही वावरत असल्याकारणाने, त्या प्रकारांबाबत आकर्षण नाही.)
उलट लग्न म्हंजे प्रेम किंवा मुलं किंवा एकत्र राहणं वगैरे कल्पना असल्यास सेपरेशनच्यावेळी अचानक प्रॉपर्टि, प्रेन्युप वगैरे स्तरावर येणं मानसिकदृष्ट्या किती कष्टप्रद होतं हे आजुबाजूला बघत असतोच.
लग्न म्हणजे प्रेम किंवा मुले किंवा एकत्र राहणे वगैरे कल्पना असल्यास, सेपरेशनचीच वेळ आली, तर प्रॉपर्टी किंवा प्री-नप वगैरे ही मानसिक क्लेशाची कारणे बहुधा ठरू नयेत. (व्यवहार हा तितकीच वेळ आली असता माणसास निदान या बाबतींत तरी कठोर व्हावयास शिकवत असावाच.) रादर, अशा प्रसंगी क्लेशाची कारणे ही काही वेगळीच असावीत, अशी अटकळ आहे.
प्रश्न असा आहे की
प्रश्न असा आहे की काँट्रॅक्टच्या पलिकडे असलेले बरेच काही मिळवायला/करायला काँट्रॅक्टची गरज आहे का?
ते तर त्या काँतृअॅक्टमध्ये न शिरताहि मिळते.
मात्र तुम्ही जेव्हा लग्न या काँट्रॅक्टमध्ये शिरता तेव्हा त्यातील टर्मचा (आणि फक्त टर्मचाच) विचार क्रमप्राप्त आहे. बाकी पलिकडील गोष्टी या त्याच्या पलिकडेच असतात "त्यात" नाहीत एवढी जाणीव लग्न करताना- खरंतर करण्यापूर्वी - असल्यास लग्न करायचं की नाही हे ठरवणं सोपं जावं
+
सहमत आहे.
लग्न हा एक करारच आहे. आणि त्याची काही इम्प्लाइड कलमे परंपरेने ठरवलेली आहेत.
लग्न ठरवताना आपले लग्न मोडले तर काय करायचे असे डिस्कशन १० हजारात एक जोडपे तरी करत असेल का? लग्न न मोडण्यासाठी करायचे असते अश्या समजुतीनेच केले जाते.
अवांतरः समजा एका काल्पनिक प्री-नप मध्ये स्त्री गृहिणी राहील आणि पुरुष कमावता राहील आणि त्या गृहिणीला रिझनेबल आयुष्य देईल असे ठरले आहे. त्या नुसार १०-१५ वर्षे व्यवस्थित चालले आहे. त्यानंतर काही अपघाताने पुरुषास अपंगत्व आले आणि त्याला आता पूर्वीप्रमाणे व्यवसाय करणे शक्य होणार नाही. शिवाय त्याच्या अपंगत्वाच्या निमित्ताने बर्यापैकी वैद्यकीय खर्चसुद्धा कुटुंबाच्या मागे लागला आहे. अशा वेळी पूर्वी जे "रिझनेबल" आयुष्य गृहिणीला मिळत होते ते आता शक्य नाही कारण तशी नवर्याची क्षमता आता उरली नाही. तर हा ब्रीच ऑफ प्री-नप समजून स्त्रीने विभक्त व्हावे आणि ब्रीच बद्दल नुकसान भरपाई मागावी का? की नवीन पोस्ट-नप करार निगोशिएट करावा?
लग्न हा एक करारच आहे. आणि
लग्न हा एक करारच आहे. आणि त्याची काही इम्प्लाइड कलमे परंपरेने ठरवलेली आहेत. >> परंपरेने किँवा भारतीय कायद्यानेही जी कलमे ठरवली आहेत त्यात बर्याच गोष्टी गृहीत धरल्या आहेत. माझ्या सगळ्यात पहिल्या प्रतिसादात त्यातल्या काही दिल्या आहेत.
लग्न ठरवताना आपले लग्न मोडले तर काय करायचे असे डिस्कशन १० हजारात एक जोडपे तरी करत असेल का? लग्न न मोडण्यासाठी करायचे असते अश्या समजुतीनेच केले जाते. >> छे हो लग्न ठरवताना बोलण्यासाठी इतर बर्याच म्हत्वाच्या गोष्टी आहेत. जसे की पत्रिका जुळते का आणि देण्याघेण्याच काय स्वैपाक येतो का वगैरे :-P
अवांतर बद्दल १० १५वर्षाँत त्यांच रिलेशन कस डेवलप झालय त्यावर तो निर्णय घेतला जाइल. प्रिन्युप मधे दर ३वर्षाँनी टर्मस कंडिशन्स चा आढावा घेण्याची, अपग्रेड करण्याची कंडिशनपण टाकता येइल.
संपादक: चर्चा चांगली चालुय. योग्य वाटल्यास वेगळा धागा काढावा. ती ब्याट्याने दिलेली बातमी या सगळ्याच ट्रिगर आहे.
मुळात प्री-नप वगैरे करण्याची
मुळात प्री-नप वगैरे करण्याची गरज भासत असेल, तर त्या लग्नात अर्थ तरी काय, असले जुनाट, भोळसट, बुरसटलेले, अंधश्रद्ध आणि अविवेकी विचार बाळगून अजूनही वावरत असल्याकारणाने, त्या प्रकारांबाबत आकर्षण नाही
:) प्री-नप करण्याची गरज असो नसो, लग्नात नक्की काय अर्थ आहे? ;)
बाकी, मुळात लग्न करणारा/री जुनाट/भोळसट/बुरसटलेले/अंद्रश्रद्ध/अविवेकी विचार करतो/ते अश्या स्वरूपाचे विधान माझा एक अविवाहित मित्र करतो त्याची आठवण झाली ;)
रादर, अशा प्रसंगी क्लेशाची कारणे ही काही वेगळीच असावीत, अशी अटकळ आहे.
असेलही कल्पना नाही. मात्र जी उदाहरणे लांबून बघितली आहेत त्यांच्यात प्रेमबंध वगैरे उरले नव्हते. (किमान एका बाजूला) सेपरेशन "उरकायची" घाई होती. अशावेळी हे ऐहिक अडथळे आणि त्यावरून भांडणे अत्यंत क्लेषकारक आणि दमवणारी होती. त्यात हाच का तो जोडिदार जो आता कुकर, स्कूटर, चादरी व उशा कोणाच्या यावर निवाडा करायला कोर्टात जाणार? असे विचार खिन्नतापूर्वक बोललेले ऐकले आहेत.
माझं मत थोडं वेगळं आहे. लग्न
माझं मत थोडं वेगळं आहे. लग्न करतोय म्हणजे / लग्न करतेवेळीच आपण आपापल्या प्रॉपर्टिवरचे हक्क आता समान शेअर करणार आहोत हे परस्परांनी मान्य केलं असल्यास व त्याची पूर्ण जाणीव असल्यास - समजा सेपरेशनची वेळ आली तर एकमेकांचे हक्क न देऊ पाहण्याचा व ते देताना वाईट वाटण्याचा प्रश्न
तितका तीव्र रहात नाही. >> असा विचार करणे रोचक आहे. पण यात एक डिसएडवांटेज हा वाटतो की लग्न २ महिने टिकल की २ वर्ष की ५ १०, हे शेअरीँग समानच असणार. हे चूक वाटतय. त्याऐवजी जसा कालावधी वाढत जातो तसा शेअरिँगचा वाटा वाढत जावा.
ज्यांना लग्नाच्या
ज्यांना लग्नाच्या उपयुक्ततेविषयी जर्राशीदेखील शंका आहे त्यांनी अजिबात लग्न करु नये. फायदेतोटे किंवा अन्य पर्कस् किंवा कोणतीही वॉरंटी गॅरंटी अशा अपेक्षेने करायचे असल्यास लग्न ही निरुपयोगी गोष्ट आहे. सेपरेशन करण्याची वेळ आलीच तर त्यावेळचा समंजसपणा हा प्रत्येक व्यक्तीवरच अवलंबून आहे. प्री-नप किंवा तत्सम काही करारमदार करुन ठेवलेत किंवा नाही यावर "मनस्ताप" कमीजास्त होत नसतो.
एनीवे.. मला एक प्रश्न आहे.. एका प्रौढाला आपल्यासोबत झोपवणे, वस्तूंची वाटणी, प्रॉपर्टी, एकत्र केलेली कमाई, विवाहपूर्व आणि पश्चात कमाई, त्यांच्या वाटपाची सूत्रे, मोनोगमीची सक्ती, शरीरसंबंध, स्त्रीवरच अन्याय, मन मारुन पुरुषाला सुख देणे, स्त्रीला मारहाण, पुरुषाने फक्त शरीर ओरबाडणे, मॅरिटल वा अन्य प्रकारचे रेप्स, प्रेम किंवा बाकीच्या भावना भंकस, सर्वकाही आधीच "क्लियर" असणे, स्पष्ट कल्पना देणे, बुरसटलेले नसणे, रुढी मोडणे किंवा अशा शेकडो गोष्टी तसंच वेगवेगळे विचार क्षणभर बाजूला ठेवून आपण स्वतःच्या (खुद्द आपल्या) लग्नाविषयी काही विचार करु शकतो का?
मी सांगतो, आपलं लग्न कसं व्हावं आणि नातं कसं असावं हे आपल्या स्वतःच्या केसवर अवलंबून आहे. नियम समाजमान्यता काय आहेत यावर नाही.
लग्नामधे ते मोडल्यास काय करायचे याचा आधीच करार करणे ही पूर्वी मला फार युक्तीची गोष्ट वाटली होती. पण मग लक्षात आलं की अरे.. असल्या प्रकारचे करार हे लग्न करतानाच करायचे? म्हणजे एकमेकांवरच्या "प्रेमा"चा पहिला भर ओसरला की आकर्षण कमी होतं आणि मग शारिरीक किंवा मानसिक तृप्तीपेक्षा सहजीवन जास्त महत्वाचं होतं. एक पार्टनर म्हणून जोडीदार जास्त आवश्यक होतो.
त्यामुळे शारिरिक किंवा मानसिक सुखप्राप्तीचं अमिष नसतानाही जे टिकवून ठेवायचं असतं ते म्हणजे लग्न असं माझं मत आहे. यासाठी निव्वळ कमिटमेंट हवी.
यामधे सेपरेशन वगैरेच्या वेळचा करार आधीच करुन ठेवायचा असेल तर तुम्ही या नात्याला कितपत विश्वासाने जोडताय? जोडूच नका ना.. लग्न केलंच पाहिजे असा काही कायदा नाही.
पतीचं पत्नीवर किंवा पत्नीचं पत्नीवर सदैव प्रेम नसतं. एखाद दिवशी खूप प्रेम वाटतं त्या क्षणी ते असतं, दुसर्या दिवशी प्रचंड राग आणि तिटकारा वाटतो त्याक्षणी ते नसतं. अशा बेभरवश्याचा जगात एक कमिटेड जोडीदार मिळावा या उद्देशाने लग्नाकडे पाहून बघा.
भांडणातून आणि घटस्फोटातून पोरांची कशी अवस्था होते आणि त्या पोरांच्या वाटपाचं काय असले प्रश्न उभे राहण्यापेक्षा मुळात लग्नातून मूल होणं हीच किती अप्रतिम गोष्ट असते याचा विचार करा. आपलं स्वतःचं मूल आपल्याला आई, किंवा बाबा म्हणून चिकटतं तेव्हा लग्नच काय तेजायला सगळ्या जन्मातल्या सर्व गोष्टी योग्य वाटायला लागतात. छोटासा जरी पराक्रम करुन आलं तरी सांगायला बायको आहे हा खूप मोठा आनंद असतो. तिच्या चेहर्यावर कौतुक दिसो वा न दिसो, ती खत्रूड असो वा नसो.. पण ती कायम आपल्या सोबत आहे हे फीलिंग अत्यंत सुखद आहे. बाळांचे कुल्ले धुणं, त्यांच्या चोची भरवणं, शाळेत अॅडमिशनला रांगा लावणं, कॉलेजसाठी तरतूद करता येईल की नाही म्हणून चिंता करणं, मोठा झाला की त्याचे उपदेश ऐकणं हा सर्व गुंता जगण्यासाठी अत्यावश्यक आहे.
पण असं काहीच ज्याला वाटत नसेल आणि लिव्ह इन पद्धतीने मुळातच कधीही इकडून तिकडे जाण्याचा मार्ग मोकळा ठेवणं हाच उद्देश असेल तर मग "गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा" अशा पद्धतीने तसंच रहावं.. लग्न बिग्न सामाजिक बिमाजिक बंधनाची शा* आवश्यकता नाही.
स्वतःलाच "कितना सुख है बंधन में" हे कळत नसेल तर... काय बोलावं..
मुळात लग्न करुन फायदा काय यासोबतच फॉर अ चेंज... लग्न अॅज इज "करण्यात" काय संकट आहे? असा प्रश्नची कधीमधी विचारावा..
की रुढी आहे ना.. मग तोडा तिच्यायला .. असं आणि इतकंच?
लिव्ह इन मधे फक्त फॉर्मल कमिटमेंट वजा होऊन बाकीचा गुंता तसाच उरतो हे भरपूर केसेसमधे पाहिलेलं आहे. पार्टनर त्याच लिव्ह इन न्यायाने सोडून गेला की व्यसनाधीन झालेले आणि फ्री फॉल अध:पात करुन पूर्ण एकटे पडलेले अन गाळात गेलेले बहुतांश लोक पाहण्यात आहेत.
लग्न हे प्रेम नसून खरोखर तोच इटसेल्फ एक करार आहे. आणि त्याच्या आजुबाजूला अन्य वीस करार विणणार्यांची किंवा त्या एका करारातूनही सुटू पाहणार्या "स्वातंत्र्यात अडकलेल्या" जीवांची दया येते.
प्रतिसाद अतिशय आवडला.. अगदी
प्रतिसाद अतिशय आवडला..
अगदी प्रेन्युप वगैरे टोके जाऊंदे.. पण कोणत्याही प्री-न्युप शिवायही साधे चारचौघांसारखे "लग्न" करताना तुम्ही म्हणताय त्या गोष्टी अध्यारूत असतीलही पण मुख्यतः तुम्ही एक कायदेशीर करार करताय व आपल्या जोडिदाराला (व कदाचित होऊ घातलेल्या मुलांना) आपल्या मनात वगैरे स्थान असो नसो आपल्या प्रॉपर्टित (व पर्यायाने आपल्या - आतापर्यंत खाजगी असलेल्या - स्पेसमध्ये) भागीदार करतो आहोत याची जाणीव (+तयारी) असावी इतकंच म्हणायचं आहे. किंबहुना ही तयारी नसली की तडजोडी करायला नकार वगैरे सुरू होते. ही तयारी नसल्यास लग्नच करू नये हेच म्हणायचे आहे.
(लग्नानंतर हक्क मागणे वगैरे एकाला दुसर्याच्या हक्कांची जाणीव नसण्याने होते. दोघांनाही आपल्या हक्कांसोबत दुसर्याच्या हक्कांची जाणीव असल्यास "मागण्याचा" प्रश्नच उद्भवत नाही, असा स्वानुभव आहे)
>>पण असं काहीच ज्याला वाटत
>>पण असं काहीच ज्याला वाटत नसेल आणि लिव्ह इन पद्धतीने मुळातच कधीही इकडून तिकडे जाण्याचा मार्ग मोकळा ठेवणं हाच उद्देश असेल तर मग "गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा" अशा पद्धतीने तसंच रहावं.. लग्न बिग्न सामाजिक बिमाजिक बंधनाची शा* आवश्यकता नाही.
पण हे तरी कुठे लिव्ह-इनवाद्यांना* मान्य आहे. लिव्ह-इन मध्ये सुद्धा हक्क वगैरेच्या गोष्टी सुरू आहेत ना?
लिव्ह-इन मध्ये नक्की काय लग्नावेगळे हवे आहे हेच मला तरी अजून कळलेले नाही.
स्त्रीवाद्यांच्या वर्तुळाशी स्फोटक चर्चा करत असताना "लग्न केले की जुळले नाही तर घटस्फोट वगैरे गोष्टीत अडवणूक होते म्हणून लिव्ह-इन" असा विचार पुढे आला. तसे असेल तर मग लिव्ह-इन मधले हक्क वगैरेचा प्रश्न कुठे येतो?
लिव्ह इन जर ट्रायल म्हणून असेल (म्हणजे जर जुळलं तर पुढे लग्न करण्याची कल्पना असेल) तर लिव्ह-इन चा सर्व काळ नेहमी हे सहजीवन कधीही मोडू शकते हा विचार कायम डोक्यात ठेवूनच रहायला हवे. इमोशनल इन्वॉल्वमेंट-डिपेंडन्स इज स्ट्रिक्टली नो-नो. मूल स्ट्रिक्टली नो नो. कॉमन प्रॉपर्टी नो नो. तसं झालं तर लिव्ह-इन रिलेशनशिपमधील हक्क वगैरे काही उद्भवतच नाही.
*पर्सनली मला लिव्ह-इनची कल्पना मान्य आहे. (म्हणजे लग्नाशिवाय सहजीवन असायला काही हरकत नाही). पण लिव्ह-इनचा निर्णय घेण्यापूर्वी पुरता विचार करायला हवा. माझ्या माहितीत दोन जोडप्यांनी ४-५ वर्षे लिव्ह इन करून नंतर लग्न केलेले आहे आणि त्यांचे लग्न व्यवस्थित टिकून आहे असे दिसते.
हाउ मेनी लिव्ह-इन्स आर यू विलिंग/प्लॅनिंग टु हॅव हे ही ठरवायला हवे. म्हणजे एक फसले तर दुसरे, तिसरे वगैरे.
अवांतरः विवाहित व्यक्तीला दुसरा विवाह करता येत नाही म्हणून त्या व्यक्तीबरोबर लग्नाशिवाय रहाणे हा लिव्ह-इनचा प्रकार मला मान्यच नाही.
संरक्षण
कुठल्याही पार्टनरशिप कराराप्रमाणे ह्यात अब्युज होउ नये म्हणुन कायदा हवा, हे म्हणजे लग्न(लाईट व्हर्जन)आहे, कायमस्वरुपी आणि कॉन्ट्रॅक्टवर घेतलेल्या नोकरांमधला जो फरक आहे तोच, हक्क दोघांना असतात, रिस्क एकात जास्त असते. पण अब्युज होउ नये म्हणुन दोघांना संरक्षण हवे.
पण हे तरी कुठे
पण हे तरी कुठे लिव्ह-इनवाद्यांना* मान्य आहे. लिव्ह-इन मध्ये सुद्धा हक्क वगैरेच्या गोष्टी सुरू आहेत ना?
खरे आहे. "सगळे-सगळे लग्नासारखे पण लग्न नाही" म्हणजे काय?
माझा लीव्ह-इन रहाण्याला पाथिंबा आहे. मात्र तसे रहाताना एकमेकांच्या मालमत्तेवरील, वेळेवरील हक्क, जबाबदार्या वगैरे नसणे हा त्या प्रकाराचा USP आहे.
याशिवाय लिव्ह इन हे (लग्नाप्रमाणे) बलात्कार करण्याचे लायसन्स असु शकत नाही - असु नये - नाहिये असेही मला वाटते
लिव्ह-इन मध्ये नक्की काय लग्नावेगळे हवे आहे हेच मला तरी अजून कळलेले नाही.
खाली मी म्हणतात तसे अब्युजपासून व फसवणूकीपासून सुरक्षितता हवी आहे असे सकृतदर्शनी वाटते.
लग्न, लिव्हइन,
लग्न, लिव्हइन, बहुपत्नी/बहुपती(जाणीवपुर्वक/अजाणतेपणी) काहीही असो, जसजसा एकत्र घालवलेला काळ वाढत जाईल तसतसे(च) पर्कस्, हक्क वगैरे वाढत जावेत.
लिव्हइन मधे जे USP ऋ यांना वाटतायत (खास करुन मालमत्तेवर हक्क नसणे), त्यांचा दुरुपयोग होउन एका पक्षावर (शक्यतो स्त्रीच) अन्याय होउ शकतो (वाचा सायलेँट वाइफ, फिक्शन आहे, पण थोडी आयड्या येइल). म्हणुन हक्कांच संरक्षण हवं. परत ऋ म्हणतायत तसे बलात्काराचा हक्क (??) लग्नात आहे तसा तो लिव इन मधे नाहीय हा फार मोठा फरक आहे.
लिव्हिनमध्येच कशाला?
अब्यूज़पासून संरक्षण लिव्ह-इनमध्ये काय किंवा लग्नात काय, दोन्हींत असावे.
(बाकी, लग्न करण्याचे किमान वय हे 'एज ऑफ कन्सेंट' संकल्पनेवर आधारित असेल, तर (भारतातसुद्धा) लग्नात 'बलात्काराचा हक्क' वगैरे असतो, हे पटत नाही. ग्राउंड रियॅलिटी अर्थात याहून वेगळी असणे अशक्य नाही, परंतु त्या परिस्थितीत तो फॉल्टी इंप्लिमेंटेशनचा मामला आहे, आणि अर्थात तो प्रसंगी चळवळीनेसुद्धा बदललाच पाहिजे. मात्र, लग्नात 'बलात्काराचा हक्क' असतो वगैरे म्हणणे बकवास वाटते.)
तर (भारतातसुद्धा) लग्नात
तर (भारतातसुद्धा) लग्नात 'बलात्काराचा हक्क' वगैरे असतो, हे पटत नाही.
आयपीसी मध्ये बलात्काराच्या कायद्यात एक खास एक्सेप्शन आहे. ते काय म्हणते?:
Exception: Sexual intercourse by a man with his own wife, the wife not being under fifteen years of age, is not rape.
अर्थात पत्नीचा कंसेन्ट असो वा नसो दोघांमधील संभोग बलात्कार समजला जाणार नाही. अर्थात पत्नीच्या इच्छेला/अनुमतीला न जुमानता संभोग करण्याचे लायसन्स/हक्क पतीला मिळतो.
(लिव्ह इन मध्ये मात्र तीच कृती बलात्कार आहे. अर्थात लिव्ह इन मध्ये स्त्रीयांना त्यांच्या इच्छेविरूद्ध संभोग करण्याची 'कायदेशीर' सक्ती नसते हे मान्य व्हावे)
फॉल्टी इंप्लिमेंटेशन
मुळात व्याख्येनेच जी गोष्ट 'बलात्कार' नाही, तिने 'बलात्कारा'चा हक्क कसा प्रस्थापित होतो, ते कळत नाही.
('बलात्कारा'ची - किंवा खरे तर 'न-बलात्कारा'ची - ही व्याख्या सदोष आहे, वगैरे आगाऊ मान्य. आणि ती - प्रसंगी चळवळ करून - बदलली पाहिजे, हेही मान्य. परंतु हा फॉल्टी इंप्लिमेंटेशनचा मामला आहे. कायद्यामागचा उद्देश 'बलात्काराचा हक्क प्रस्थापित करणे' हा खचितच नसावा१.)
==============================================================================================
१ व्याख्येतील तो 'अपवाद' का करण्यात आला असावा, याबद्दल माझ्या काही अटकळी आहेत. अर्थात, त्यामागील विचारसरणीशी व्यक्तिशः सहमत नसलो, तरी. तूर्तास टंकाळा - आणि रीतसर मांडणी करण्याचे कष्ट घेण्याचा आळस - असल्याकारणाने - किंवा तितक्या खाजेच्या अभावापोटी म्हणू - त्याबद्दल लिहीत नाही; पुढेमागे मूड झाल्यास लिहीनच, आणि तसाही तो स्वतंत्र मुद्दा आहे. परंतु, त्या 'अपवादा'मागे बलात्काराचा 'हक्क' प्रस्थापित करण्याचा कायद्याचा कोणताही उद्देश नसून, फार फार तर इंप्लिमेंटेशनसाठी (बिकॉज़ ऑफ इट्स इंप्लिकेशन्स - इम्प्लाइड कन्सेंट, ती डिस्प्रूव करण्याची जबाबदारी कोणाची, वगैरे) अत्यंत किचकट ठरू शकेल, अशा 'ग्रे एरिया'त पडण्याचे टाळण्यासाठी तत्कालीन कायदे बनवणार्यांनी ही पळवाट शोधून काढून स्वतःची सुटका करून घेतली आहे, असे म्हणता येईल, एवढेच तूर्तास मांडू इच्छितो. अर्थात, या परिस्थितीत सुधारणेस वाव आहे, नव्हे सुधारणेची गरज आहे, हे ओघानेच आले; परंतु यातून बलात्काराचा 'हक्क' वगैरे प्रस्थापित होत नाही, तशी मांडणी करणे इज़ अॅन ओव्हरष्टेटमेण्ट, इतकेच मांडायचे आहे.
१५ वर्षे लिव्ह-इन हे माझ्या
१५ वर्षे लिव्ह-इन हे माझ्या विचारविश्वात नाही.
इतकी वर्षे किंवा कायम लिव्ह इन करायचे असेल तर ते समान (आणि नेसेसरिली उच्च) आर्थिक स्टेटस आणि ताकद असणार्या स्त्री-पुरुषांनीच करावे. अन्यथा ते प्रॅक्टिकेबल होऊच शकणार नाही.
अवांतरः लिव्ह-इन अॅज अगेन्स्ट मॅरेज या ऑप्शन्सची तुलना करणारा धागा काढता येईल का? अॅटलीस्ट लग्न या प्रकारात कोणकोणत्या खटकणार्या गोष्टी आहेत आणि त्या लिव्ह-इनमुळे कशा सॉल्व्ह होतील असा एखादा लेख वगैरे.... बहुतेकांनी लिव्ह-इन या कल्पनेवर कॉम्प्रिहेन्सिव्हली विचार केलेला असतो असे वाटत नाही. सर्वांच्या फायद्याचे होईल. कदाचित वरचे माझे काही प्रतिसाद बाद ठरून जातील.
?
बहुतेकांनी लिव्ह-इन या कल्पनेवर कॉम्प्रिहेन्सिव्हली विचार केलेला असतो असे वाटत नाही.
जिस रास्ते से ग़ुज़रना नहीं, उस रास्ते का ज़िक्र क्यों?
बाकी, ज्यांना करायचे आहे लिव्ह-इन, त्यांना करू द्यात की खुशाल! मी काही त्यांना अडवायला येणार नाही, किंवा विचारणारही नाही, की बाबांनो का केलेत म्हणून. का? का?? का???
सक्ती नाही. आम्हीही लग्न करून
सक्ती नाही.
आम्हीही लग्न करून बसलो असल्याने आम्हाला हा ऑप्शन लागू नाही. बघा पण तुमच्या किंवा माझ्या ओळखीतले असा काही विचार करीत असतील आणि माझे/तुमचे मत विचारले तर मत द्यायला (ते ओळखीचे खड्ड्यत उडी मारत असतील तर त्यांना तसे जाणवून द्यायला) कदाचित उपयोगी होऊ शकेल.
?
बघा पण तुमच्या किंवा माझ्या ओळखीतले असा काही विचार करीत असतील आणि माझे/तुमचे मत विचारले तर मत द्यायला
नाय बॉ, आपल्या माहितीत तरी असे कोणी नाही.
पण असते, तरीही,
(ते ओळखीचे खड्ड्यत उडी मारत असतील तर त्यांना तसे जाणवून द्यायला)
ते खड्ड्यात पडत आहेत, किंवा कसे, हे मी कशावरून नि काय म्हणून ठरवावे? (तसे ठरवायला मी 'विवेकवादी' थोडाच आहे?)
>>वढ्यात ज्या काही लिव्ह इन
>>एवढ्यात ज्या काही लिव्ह इन कोर्ट केसच्या बातम्या आल्यात त्या लाँग टर्मच होत्या की.
त्या प्रॉपर लिव्ह इन केसेस नव्हत्या. त्या केसेसमध्ये स्त्री/पुरुष अगोदरच इतरत्र विवाहित होते. त्यांना लिव्ह इन करायचे नव्हते. लग्न करता येत नव्हते म्हणून लिव्ह इन असे नाव दिले गेले होते. पक्षी या "रिलेशन्शिप्स इन द नेचर ऑफ इल्लिगल मॅरेजेस" होत्या.
>>अवांतर बद्दल: सॉरी मी लिव इन वादी नाही + आधीच इथले काही प्रुड प्रतिसाद डोक फिरवतायत ते पुरेस आहे (दात काढत)
तुम्ही प्रश्न विचारला होता लग्न करण्याचे लीगल फायदे कोणते. ती तुमची शंका मिटली असेल तर चर्चा थांबवून टाकू.
मलाही हा प्रतिसाद खूप आवडला.
मलाही हा प्रतिसाद खूप आवडला. गोमटा आहे. पण त्यात एक चलाख, पदराखाली घेणारा युक्तिवादही आहे.
लग्न, मूल, प्रेम.. या सगळ्याच बाबी शेवटी व्यक्तिगत असतात. आपल्या गळ्यावर सुरी ठेवून काही करायला वा न करायला भाग पाडलं जात नाही अद्याप. ते तर अध्याहृतच आहे. पण अमुक एका सामाजिक कृतीच्या मागे नक्की काय तर्क आहे, त्यातून सामाजिक दबाव निर्माण होतो की नाही, ते बरं की वाईट याची चर्चा करू नये का? 'सोडा हो, प्रेमात पडलायत ना, निभेल सगळं' हा जसा एक दृष्टिकोन आहे, तसाच 'मला तपासून पाहायचं आहे मी हे का करायचं आहे ते' हाही एक दृष्टिकोन आहे. लग्नाबद्दल रोमॅण्टिक भावना डोक्यात घेऊन, वर मांडलेत तसे कोरडे विचार डोक्याच्या जवळपासही फिरकू न देता तर आपण सदासर्वकाळ लग्न या विषयाकडे बघत असतो. ते कधीतरी बाजूला ठेवावं, त्यातल्या प्रॅक्टिकल बाबींची स्वच्छ-लख्ख कल्पना स्वत:ला द्यावी, आपल्या संकल्पना झाडून-झटकून घ्याव्यात असं वाटलं, तर काय हरकत आहे?
नाही, हरकत नाहीच आहे. मला माहीत आहे. पण तुम्ही तुमच्या भारी शैलीनं दुसर्या प्रकारच्या दृष्टिकोनाला रिडिक्यूल करू पाहताय असं एक फीलिंग आलं. तसा तुमचा उद्देश नसेलही कदाचित. पण 'रूढी आहे ना... तोडा तिच्यायला...', '...वेगवेगळे विचार क्षणभर बाजूला ठेवून आपण स्वतःच्या (खुद्द आपल्या) लग्नाविषयी काही विचार करु शकतो का?' अशा वाक्यांतून तसं वाटलं खरं.
अपेक्षित प्रतिसाद.ते तर
अपेक्षित प्रतिसाद.
ते तर अध्याहृतच आहे. पण अमुक एका सामाजिक कृतीच्या मागे नक्की काय तर्क आहे, त्यातून सामाजिक दबाव निर्माण होतो की नाही, ते बरं की वाईट याची चर्चा करू नये का? 'सोडा हो, प्रेमात पडलायत ना, निभेल सगळं' हा जसा एक दृष्टिकोन आहे, तसाच 'मला तपासून पाहायचं आहे मी हे का करायचं आहे ते' हाही एक दृष्टिकोन आहे.
हो चर्चा करायला काहीच हरकत नाही. माझा प्रतिसाद हा त्याच चर्चेचा एक भाग. :)
पण 'रूढी आहे ना... तोडा तिच्यायला...
काहीवेळा केवळ प्रथा चालू आहे म्हणून कोरड्यात शिरणारे लोक असतात. त्याविषयीची नावड अशी बाहेर पडली असावी. लग्न, प्रेम, मूल ही व्यक्तिगत बाब आहे हे मान्य आहे ना? मग आपण फक्त आपल्या लग्नाचं आपण काय करणार हे पाहणं जास्त योग्य.. जगात लग्नाचं कायकाय चाललंय त्याविषयी पूर्वग्रह किंवा कडवटपणा कशाला ?
विशेषतः लग्नाचे उद्देश म्हणून केवळ आणि केवळ कडवट भावना दिसतात तेव्हा असं नसावं, त्यात बरंच काही इतरही असतं हे लक्षात घेतलं जावं, अशी इच्छा होते. विशेषतः लग्न करुन पाहिल्याने आणि त्याचा अर्थ काही प्रमाणात तरी समजल्याने.
धाग्याशी संबंधित प्रतिसादकांपैकी कितीजणांनी लग्न हा प्रकार अनुभवला आहे ते जाणणं रोचक आहे.
'आधी एक सिनेमा काढून पाहा नि
'आधी एक सिनेमा काढून पाहा नि मग समीक्षा करा' अशा चालीवरचं तुमचं म्हणणं असेल, तर जाऊ द्या. या वादाला अंत नाही. शिवाय या वादाचं काही कारणही नाही. भावनाबिवना आपल्या जागी ठीक आहेत. नि त्यांना तितकं महत्त्व दिलं जातंही. पण भावना बाजूला ठेवून कोरड्या बाबींवर चर्चा करण्याचा उद्देश होता, म्हणून तुमच्या प्रतिसादाला विरोध नोंदवला.
नाही नाही.. लग्न करुन पहा आणि
नाही नाही.. लग्न करुन पहा आणि नंतरच किंवा तरच बोला असं नव्हे.. पण लग्न करुन जुने झालेले लोक याही गटाला चर्चेत इक्वल स्टँडींग असावं इतकंच..
म्हणजे, उदा. त्यांच्या म्हणण्याला एक चलाख, पदराखाली घेणारा युक्तिवाद किंवा तत्सम म्हणू नये.. एका बाजूचा अनुभव असलेलं मत इतकंच समजावं.
हॅ हॅ.. चलाख आहात..
हॅ हॅ.. चलाख आहात.. ;)
बादवे..
मलाही लग्नविषयक असे विचार लग्नापूर्वी होतेच. आता लग्न, मूलबाळ आणि अन्य सांसारिक गुंत्यात पूर्ण वेढले गेल्यानंतरही मला ते बंधन आनंददायक आणि आवश्यक वाटतं. तसं कोणाला लग्नाआधीच नकोसं वाटत असेल तर त्यांनी अजिबात लग्न करु नये इतकंच म्हणायचं आहे.
याचा अर्थ मला लग्नसंस्थेचं अस्तित्व गोरक्षणसंस्थेप्रमाणे पेटी फिरवून टिकवायचं आहे, किंवा मी आता लग्नसंस्थेचा भक्कम समर्थक आणि प्रचारक आहे असं नव्हे. मीही या व्यवस्थेचा एक एन्ड युजर आहे जो दोन्ही बाजू पाहून मत देतोय.
चर्चा उत्तम आहे आणि रोचकही यात वादच नाही.
छे हो
चलाख लोक विचार गुंडाळून ठेअत नाहितच मुळी.
ते समोरच्याचा भावनांना हात घालण्यात अलगद समोरच्याला विचार गुंडाळून ठेवायला नि स्वतःचा स्वार्थ साधण्यात पटाईत असतात.
कुठलाही कल्ट , बहुतांश संघटना पहा.
त्यांचे नेते अगदि भावनिक, आवेशी वगैरे वगैरे बोअल्तील, मरण्यासाठी कार्यकर्त्यांना वापरतील.
चलाख लोक विचार गुंडाळून थेवत नाहित; दुसर्याल त्याचा विवेक्/विचार गुंडाळून ठेवायला लावतात.
एक थोर्थोर नेते हातात ब्रॅण्दीचा चशक घेत "मी काही जेलला घाबरत नाही" वगैरे वगैरे म्हणत.
साहजिक आहे! ह्या टोणग्याला जेलमध्ये जायची गरज पडेल तर ना! मूर्ख भावनिक कार्यकर्ते जेलात जायला,सडायला होतेच की!
ब्रॅण्दी!
एक थोर्थोर नेते हातात ब्रॅण्दीचा चशक घेत "मी काही जेलला घाबरत नाही" वगैरे वगैरे म्हणत.
'ब्रॅण्दी' हा शब्द काळजास भिडला.
किंबहुना, 'भेंडी' ही ज्याप्रमाणे पंजाबी 'भॅण्दी'ची बुळबुळीत मराठी आवृत्ती आहे, तद्वतच 'ब्रँडी' ही पंजाबी 'ब्रॅण्दी'ची पाणी मारलेली मराठी आवृत्ती असावी, याची खात्रीच पटली.
(अवांतर: कोण हो ते थोर्थोर टोणगे?)
नक्की काय हवे आहे?
प्रतिसाद मलाही आवडला, "तुमच्या भारी शैलीनं दुसर्या प्रकारच्या दृष्टिकोनाला रिडिक्यूल करू पाहताय असं एक फीलिंग आलं" हे बरोबर असेलही तरी धाग्याची सुरवात जिथून झाली आहे तिथे लग्न न केलेल्यानी लग्नसंस्था रिडिक्यूल केल्यासारखं वाटल्याने अशा प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच आहे!
"अमुक एका सामाजिक कृतीच्या मागे नक्की काय तर्क आहे, त्यातून सामाजिक दबाव निर्माण होतो की नाही, ते बरं की वाईट याची चर्चा" अशी या धाग्याची सुरवात झालेली नाही.
एकंदर विवाहविषयक कायदे 'पुरुष किँमत चुकती करतो, स्त्रीकडुन शरीरसुख, एकपतीव्रता, मुल (??) मिळण्याची असे वाटतय. लग्नांतर्गत बलात्कार असा काही गुन्हा नाही. लिबिडो लक्षात न घेता एकपतिव्रता असणे आवश्यक आहे. एकमेकांना शरीरसुख नाकारणे चालत नाही. व्याभिचारी आणि नोकरी करणारी वगैरे कारणे सांगुन पोटगी पण नाकारली जाऊ शकते. नक्की गरज काय आहे मग लग्नाची
शरीरसुख फार महाग आहे भारतात!
या वाक्यांतून नक्की काय ध्वनीत होतं? लग्न न केलेल्यांनी लग्नसंस्थेचा असा निवाडा केल्यावर त्यातून "बरं की वाईट याची चर्चा" यापेक्षा लग्नसंस्थाच कशी बुरसटलेली आहे असे ध्वनीत झाले तर मग गवींची प्रतिक्रिया चुकीची वाटत नाही.
शेवटी तुम्हाला काय हवे आहे आणि कोणाबरोबर हवे आहे यात स्पष्टता असेल तर लग्न करायचे की नाही असे प्रश्न पडू नयेत. 'सामाजिक दबाव' अनेक बाबतीत येतच असतो पण त्याला बळी पडायचे की नाही हे आणि एखादी संस्था आपल्यासाठी फायद्याची आहे किंवा नाही हे पूर्णतः आपल्याला काय हवे आहे यावर अवलंबून आहे असे वाटते. फक्त शरीरसुखच हवे असेल तर त्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत, फक्त मूलच हवे तर त्यासाठीही पर्याय आहेत, शुद्ध मैत्रीच हवी असेल तर त्यासाठीही असंख्य पर्याय आहेत. त्याचप्रमाणे लग्न हा देखील एक पर्याय आहे. सक्ती नाही, सक्ती होणे चुकीचे आहे पण एका नात्याच्या फुटपट्ट्या दुसर्या नात्याला लावण्याची उठाठेव कैच्या कै वाटते.
असो. भावना वगैरे बाजूला ठेऊनही एक लग्न केलेली आणि नवर्याच्या बरोबरीची कमाई असलेली स्त्री या नात्याने अनेकांसाठी लग्नसंस्था कशी फायद्याची असू शकते हे दुसर्या प्रतिक्रियेत लिहिते आहे.
आपणांस खरोखरच कळले नाही
(पक्षी: तो प्रतिसाद निरर्थक आहे. ;))
प्रतिसाद 'आवडला' (अगदी आपल्याला जरी आवडला) तर तो 'निरर्थक' श्रेणीस पात्र ठरतो, असे नसून, प्रतिसाद 'कळला नाही', तर तो 'निरर्थक' श्रेणीस पात्र ठरतो, असा नियम आहे.
(कोणीतरी 'माहितीपूर्ण' द्या रे याला. गेला बाजार 'भडकाऊ' तरी.)
देवा काय कंफ्युजन आहे अरे तू
देवा काय कंफ्युजन आहे =)) अरे तू आधी ती पोटगीची बातमी दिली. त्यावर थत्ते वगैरेँनी प्रतिसाद दिले. मला तिथे उपप्रतिसाद द्यायचा होता पण नक्की कोणाला देउ न कळल्याने मी खाली प्रतिसाद दिलेला (त्याचाच हा धागा बनलाय) आता माझ्या या प्रश्नामागचा ट्रिगर जाणवत नाहीय. म्हणुन म्हणल की तुझ्या त्या बातमीचाच धागा करा...
अगदी टिपिकलच आहेत हे लोक!
सहमत आहे. हा धागा अस्मि यांना त्यांच्या नावे नको असेल तर फार तर मेघनाच्या नावे करावा. बॅटमॅनच्या नको.
अरे असे अरेंज मॅरेजने एकत्र आलेल्या कुटुंबातल्या मंडळींप्रमाणे का भांडता आहात??
हा धाग्यामुळे 'विवाहसंस्थेत' सुधार पडणार असेल तर माझे नाव लावा, पण असे भांडू नका! (तेव्हढाच एखादा धागा वाढेल माझ्या लेखनात!)
स्वारी मी सांगते परत एकदा
स्वारी :-(
मी सांगते परत एकदा माझ काय म्हणण आहे. ब्याट्याच्या पोटगी नै बातमी चा धागा काढा. त्याखालचे प्रतिसाद तिकडे जातीलच. मग तिथेच खाली हा धागा ज्यावरुन बनलाय तो प्रतिसाद आणि त्यावरची चर्चा मायनस दंगा.
आणि मग हा धागा आणि दंगा उडवून टाका.
ठीक आहे का रे ब्याट्या?
ओके ब्याट्या नको म्हणतोय तर
ओके ब्याट्या नको म्हणतोय तर धागा मेघनाच्या नावाने करा आणि हा दंगा उडवा प्लिज. माझी अडचण ही आहे की नीट मुद्देसुद चर्चाप्रस्ताव मांडणे आणि धाग्याची ओनरशीप घेण्याइतका पेशन्स टेलेँट नाहीय माझ्यात. आधीच फक्त कायद्याच बोला म्हणल तरी गविँनी 'भावणा' आणल्यातच आणि त्यावर ३ ४ गलेमिलो प्रतिसाद...
माझी अडचण ही आहे की नीट
माझी अडचण ही आहे की नीट मुद्देसुद चर्चाप्रस्ताव मांडणे आणि धाग्याची ओनरशीप घेण्याइतका पेशन्स टेलेँट नाहीय माझ्यात.
ओके! मग असु देत तुमच्याच नावाने.
सदर प्रस्ताव दुसर्या धाग्यावरून उचलला आहे असे स्पष्टपणे म्हटलं आहे धाग्यावर तेव्हा मुद्देसूद चर्चा मांडण्याची किंवा इतर ओनरशीपची जबाबदारी तुमच्यावर नाहिच्चे :)
सारांश
नोकरी करणारी स्त्री म्हणजे नवर्याच्या बरोबरीची स्त्री असेच काही नसते. नवरा लाखाहून जास्त कमावणारा आणि बायको वीस हजार कमावणारी असे समीकरण (आयटी इंडस्ट्रीतली जोडपी सोडून) सामान्यतः मध्यमवर्गीय लग्नात दिसते (नॉट नेसेसरीली इन दॅट प्रपोर्शन पण नवर्याचे उत्पन्न बायकोपेक्षा खूप जास्त असे).
अशा नोकरी करणार्या स्त्रीला फायनान्शिअल फायदा होतोच.
अतिअवांतरः अनेक स्त्रिया नवर्याचे बँक अकाउंट जॉईंट करण्याबाबत आग्रही असतात. (त्याचे ऑपरेशनल फायदे असतातच). पण माझे अकाउंट आपण जॉइंट करू असे नोकरी करणार्या किती स्त्रिया आपणहून म्हणतात?
कायदेशीर फायदे म्हणावे तर पुरुष प्रोव्हायडर असतो आणि बायको व्हिक्टिम असते अशा पारंपरिक दृष्टीकोनातून (परिस्थिती मोस्टली तशीच असल्याने) कायदे बनतात. त्यामुळे नोकरी करणारीला डब्बल फायदे. नोकरी करत असल्याने काहीसे अधिक स्वातंत्र्य आणि पारंपरिक दृष्टीकोनामुळे कायदेशीर फेवरेबल बायस. :)
अतिअवांतरः अनेक स्त्रिया
अतिअवांतरः अनेक स्त्रिया नवर्याचे बँक अकाउंट जॉईंट करण्याबाबत आग्रही असतात. (त्याचे ऑपरेशनल फायदे असतातच). पण माझे अकाउंट आपण जॉइंट करू असे नोकरी करणार्या किती स्त्रिया आपणहून म्हणतात?
ग्यानबाची मेख हो! याच्या उत्तरादाखल पुन्हा पुरुषांवरच दोष सारल्या जातो की नै ते पहा.
अय्या!
अतिअवांतरः अनेक स्त्रिया नवर्याचे बँक अकाउंट जॉईंट करण्याबाबत आग्रही असतात. (त्याचे ऑपरेशनल फायदे असतातच). पण माझे अकाउंट आपण जॉइंट करू असे नोकरी करणार्या किती स्त्रिया आपणहून म्हणतात?
अय्या! म्हणजे तुमच्यात बायकांचे अकाउंट इंडिविज्युअल असते? आणि ते जॉइंट करून घेण्यास बायकोस सांगावे लागते?
ऐकावे ते नवलच!
(नोकरी करणार्या स्त्रियांचे अकाउंट जॉइंट करण्यातसुद्धा ऑपरेशनल फायदे असतातच. म्हणजे, मला एखादे बिल भरायला माझ्या [पक्षी: मी प्रायमरीली जे ऑपरेट करतो, आणि माझा पगार ज्यात जाऊन पडतो, त्या, जॉइंट] खात्यातून पैसे कमी पडत असले, तर मी [अर्थात बायकोला सांगून, नाहीतर तिचा पुढचा चेक माहीत नसल्यामुळे बाउन्स होऊ नये म्हणून] तिने चेक लिहीत बसण्याची वाट न पाहता तिच्या [पक्षी: ती प्रायमरीली जे ऑपरेट करते, आणि तिचा पगार ज्यात जाऊन पडतो, त्या, जॉइंट] खात्यातून माझ्या सहीने चेक देऊ शकतो.)
(थोडक्यात, आमच्यात नाही ब्वॉ असले. ऑऽबॉ!)
+१
कायदेशीर फायदे म्हणावे तर पुरुष प्रोव्हायडर असतो आणि बायको व्हिक्टिम असते अशा पारंपरिक दृष्टीकोनातून (परिस्थिती मोस्टली तशीच असल्याने) कायदे बनतात. त्यामुळे नोकरी करणारीला डब्बल फायदे. नोकरी करत असल्याने काहीसे अधिक स्वातंत्र्य आणि पारंपरिक दृष्टीकोनामुळे कायदेशीर फेवरेबल बायस.
बास बास बास. हेच म्हणत होतो. दोन्हीकडचे फायदे मिळतात. ते वाजवी आहेत की नाहित ह्याची शहानिशा दरवेळी होतेच, असे नाही.
कायदे पाळताना एकाच बाजूने पाळतात असे म्हटलो तेव्हा ह्याच बद्दल बोलत होतो.
कोण म्हणतं गरज आहे असं?
कोण म्हणतं गरज आहे असं? जोडीदाराची गरज आहे, इथवर ठीक. लग्नाची कुठेय गरज? आता तर लिव्हइन न्यायालयाच्या नजरेतही 'पाप' नाही. (अॅज इफ आधी त्यानं फरक पडत होता!) :ड