ऐसीअक्षरे दिवाळी कट्टा - प्राथमिक चर्चा
दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात (११/१२ किंवा १९/२० ऑक्टोबर) एखादा जंगी कट्टा करायचा झाल्यास कुणी इंट्रेष्टेड आहे का?
पुणे किंवा ठाणे किंवा मुंबई, सोईची तारीख (अनेकांना नोव्हेंबर वा डिसेंबरात सोईचं असल्यास तशी तारीख), वेळ, जागा... सगळंच लोकसहभागानुसार ठरवता येईल.
त्या सुमारास गब्बर, अमुक, अपरिमेय ही मंडळी भारतात येणार असल्याचं ऐकलं आहे. इतरही कुणी असतील, तर सांगा.
श्रेयस
अवं नसलं लग्नात म्हनून काय... स्रेयस (श्रेयस) मदी जावा की ... मिळतय तिथं येकदम त्ये बामनाच्या लग्नावानी जेवन... तिथं लोक बी येकदम लग्नाला आल्यावानी जरीच्या साड्या, गजरे, अत्तरं नी बाप्ये लोक झब्बे घालून येतेत...जनू लग्नच कुनाचं...
=))
बाकी लग्नात काही श्रेयस् (ऑर फॉर द्याट म्याटर क्वचित प्रेयस) असो वा नसो, पण श्रेयसात लग्न नक्कीच असते ;)
अळूची पातळ भाजीप्रेमींच्या
अळूची पातळ भाजीप्रेमींच्या दयाळू माहितीसाठी:
परवाच माबोवर वाचले (धागा सापडला की लिंक देते) की 'लग्नाच्या पंगतीत जी अळूची भाजी मिळते तशी चव घरच्या भाजीला येत नाही; कारण जिलेबीचा उरलेला पाक त्यात घातलेला असतो. श्रेयस, जनसेवा, आशा डायनिंग वगैरे ठिकाणी ती मिळेलच. पण आनंद किंवा इतर मंगल कार्यालयातही फोन केल्यास त्या दिवशीच्या मेनूत ती असेल तर विकत आणता येते.'
ते दयाळू माहिती वाचलं की मला
ते दयाळू माहिती वाचलं की मला फुटायला होतं
परवा एका श्राद्धाला आंबट चुका, मुळा इत्यादि घातलेली आणि भरपूर तेलाची मेथीदाणा वगैरे घालून फोडणी दिलेली (घरी केलेली)अळु भाजी खाल्ली, इतकी उत्कृष्ट भाजी खाल्लि म्हणून सांगू, मी आजवर खाल्लेल्या सर्वोत्तम अळु भाजीमध्ये पहिला नंबर देईन मी बहुदा तिला!
आता श्राद्धासारख्या प्रसंगी परतपरत मागुन किती खायचे, या लाजेखातर तिसर्या वाढपानंतर मी थांबले!
मलाही वाडेश्वर त्याच
मलाही वाडेश्वर त्याच कारणासाठी सुचवावं वाटलेलं. तिथे तसं निवांत बसता येतं खूप वेळ - दुपारी विशेष गर्दी नसते, त्यात २६ ऑक्टोबर तारीख असेल तर फार गर्दी नसावी कारण सगळे विद्यार्थी (होस्टेलाईट्स) त्या दरम्यान पुण्याबाहेर असतात आणि बरेच पुणेकर पण कोकणात असतात. अर्थात वडेश्वर चे लोक माज आहेत, टेबल जोडून देणे वगैरे मदत करतील का ह्याबद्दल साशंक.
तिथे ६-७ पेक्षा जास्त्ं लोक
तिथे ६-७ पेक्षा जास्त्ं लोक एका टेब्लावर नाही बसू शकणार. पण जागा आणि खाणं बेष्ट आहे.
आणि कधी एकदा यांचं गिळून संपतंय आणि जागा मोकळी होतेय अशा अविर्भावात डोकावणारे प्रचंड वेटिंग पब्लिक.
टेबल-जोड नावाचा प्रकार करता येईल, इथल्या लोकांची खाद्यभुक बघता निदान वेळेवर रुपालीवाला तरी आक्षेप घेणार नाही, उरलं पब्लिक, त्यांना फाट्यावर मारता येत नसेल तर तिकडे कृपया फिरकु नका.
आता मसालेभात, बटाटाभाजी, अळूची पातळभाजी आणि मठ्ठाही हल्ली नसतो असे नका हो सांगू..
कुठे पंगत आहे त्यावर आहे, ब्राह्मण भुवन मधे मिळते अळूची भाजी, मठ्ठा वगैरे. बाकी ठिकाणी पनिर आणि तत्सम उत्तरेकडच्या भाज्यांनी आक्रमण केले आहे.
त्यापेक्षा पुण्यात कोणाच्या
त्यापेक्षा पुण्यात कोणाच्या ओळखीत लग्न आहे का? असेल तर तिकडेच जाऊयात. अळूची भाजी, मसालेभात, जिलब्या मठ्ठा सगळं खाता येईल.
हान तेजायला. लग्न्, मुंज काहीही चालेल. मागच्या वर्षी भाच्याची मुंज आनंद मंगल कार्यालयात होती. काय जेवण राव !!! पैजा लावून खाल्लं.
बॅट्याचा बार उडवुया का?
त्यापेक्षा पुण्यात कोणाच्या ओळखीत लग्न आहे का? असेल तर तिकडेच जाऊयात. अळूची भाजी, मसालेभात, जिलब्या मठ्ठा सगळं खाता येईल.
बॅट्याचा बार उडवुया का ?
अमेरिकेतून येणारे व्हाया युरोप आले तर उत्तम.
एखाद्या ग्रीक मुलीचं स्थळ घेउन या.
आपली पार्टीपण होइल; कट्टापण होइल.
काका-काकूंना कोण कॉण्ट्याक्ट करणार ते पाहून घ्या बुवा.
माझं ऐका.. भट्टुरड्या ठिकाणी
माझं ऐका.. भट्टुरड्या ठिकाणी कट्टा ठेवण्यापेक्षा इराणी कॅफेत ठेवा कट्टा. खिमापाव, बिर्याणी, बन ऑम्लेट वगैरे सर्वकाही मिळणारे कॅफे पुण्यात अजून जिवंत असेल तर तिथे ठेवा कट्टा.
कै. लकीस श्रद्धांजली.
गुडलकचे हल्ली थाळी रेस्टॉरंट झालेय असे ऐकले. खखो पुणेकर जाणोत.
क्याम्पातल्या बेकरीखेरीज
क्याम्पातल्या बेकरीखेरीज वरिजनल श्रूजबरी बिस्किटे जिथे उपलब्ध असायची (ग्लासातल्या चहासोबत) असे गुडलक हे माझ्या माहितीत एकमेव ठिकाण होते.
श्रूजबेरी नावाने बिस्किटे बर्याच ठिकाणी मिळायची तशी, पण ती कयानीची नसायची.
झालस्तर लांबडे खारीबिस्कीट आणि भरपूर लोणीयुक्त आणि पोटभरीचा बनमस्का. चित्र गुडलकचेच, जालावरुन साभार आणि थेट मूळ सोर्सवरुन डकवलेले.

म्हणजे तुम्हाला आवडतो की नाही
म्हणजे तुम्हाला आवडतो की नाही हा चहा ? असंच उत्सुकता म्हणून विचारतोय. मला जाम आवडतो इराणी चहा, चवीत सगळं कसं एकदम बॅलन्सड असल्यासारखं वाटतं.
ह्या चहा बनवण्याची पद्धत घरी करून पाहिल्यावर चव बर्यापैकी तशीच आली. अर्थात इराणी हाटेलात बसून चहा पिण्याची लज्जत काही औरच.
नॉस्टॅल्जिक श्रीमंती व्हर्जन
मला जाम आवडतो इराणी चहा, चवीत सगळं कसं एकदम बॅलन्सड असल्यासारखं वाटतं.
वरील वाक्याची ह्याची नॉस्टॅलजिक श्रीमंती व्हर्जन :-
वा वा.
काय तो इराण्याचा चहा.
वाटतं लिमोझिन मधून उतरून ग्लेनफिडिच पीत इथे अमेरिकेत उभं राहण्यापेक्षा जाउन इराण्याकडे नुसतं एक कटिंग मारत बसावं.
वा वा.
काय तो चहा मिळायचा भारतात.
आता त्या सगळ्या आठवणी सकाळच्या ग्रीन टी आणि मधात बुडवून काढतो.
(म्हणजे :- बघा. मी कसा दुधामधानं न्हाउन र्हायलोय भुकेल्या भुक्कड भारत वासीयांनो.)
.
.
शिवाय :-
वा वा.
काय ती चाळीतली माणुसकी. आता तशी माणुसकी कुठे अनुभवायला तरी येते का ?
(कशी येणार ? जगात माणूस शिल्लकच नैय्ये, नै का ?)
सगळं कसं एकमेकांत शेयर करायचो. हल्ली तसं काहिच नाही.
(फोकलिच्या शेयर करणं हा नाइलाज होता. कॉमन संडासही शेयर करायचात की तासतासभर तपश्चर्या करीत.
शेयर न करुन सांगतोस कुणाला.
ये ना लेका इकडे. इकडे शेयर करायला बरेचजण तयार असतील भारतात अजूनही.
दे की तुझ्या प्रॉपर्टीला अॅक्सेस.
)
कळ्ळं नै तुम्हाला
मी ह्या बातमीबद्दल बोअल्तो० आहे :-
http://khabar.ndtv.com/topic/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4…
.
.
.
भारतीय जनता पार्टी के प्रधानमंत्री पद के प्रत्याशी नरेंद्र मोदी ने एक चुनावी रैली में नई भूल की। अपने भाषण में नरेंद्र मोदी ने मोहनदास करमचंद गांधी की जगह महात्मा गांधी को मोहनलाल करमचंद गांधी के नाम से संबोधित किया।
व्वा गूडलक रादर कुठलही इराणी
व्वा गूडलक रादर कुठलही इराणी हॉटेल चालेल. पण तिथे एवढ्या लोकांना बसायला जागा असेल का? (फार वर्षात गेलो नाहीये, नवीन काही जागा वाढवली असेल तर चांगलच आहे)
बादवे, डेक्कन कॉर्नर ला रेल्वे रिझर्वेशन शेजारी देखील हॉटेल पॅराडाईझ नामक इराणी रेस्टो. आहे.. पण तिथे खाण्याचे फार प्रकार नाही - गूडलक इतके. अर्थात तो सिग्रेट फुकणार्यांचा अड्डा झाला आहे, त्यामूळे नकोच...
भुगाव भुकूम
भुगाव की भुकूम इथं एक प्रायव्हेट तळं आहे. त्याच्याकाठावर एक रिसॉर्टही आहे.
पुण्यापासून १०-१५ किमी दूर फार तर.
नैतर लवासाला जाउन पर्यावरण वाचवलं पायजेल; भ्रष्टाचार मिटवला पायजेल;
माजोरड्या नवउच्चमध्यमवर्गाला पैशाची लैच सूज आलिये वगैरे स्टाइअलही गप्पा मारता येतील.
हाटेल रणजित, भांडारकर रोड हे
हाटेल रणजित, भांडारकर रोड हे राहण्याचे हॉटेल असले तरी तिथले रेस्टॉरंट उत्तम असून पदार्थांची रेंज मोठी आणि चविष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे (पुन्हा एकदा जुन्याच) ते ग्रूप असल्यास टेरेसवर वेगळी बसण्याची सोय करुन देतात. भरपूर जागा आणि आयसोलेशन. मिक्स ग्रूपसाठीही चांगली आहे जागा.
अनेकानेक ऑप्शन्स सुचतील.
अनेकानेक ऑप्शन्स सुचतील. तूर्तास आपले निकष नक्की करू या.
१. किमान १५ लोक नीट बसले पाहिजेत.
२. आवाजाला आक्षेप येता कामा नये.
३. किमान ४-५ तास तरी बसण्याला आक्षेप असता कामा नये.
४. टेक्निकली तरी पुण्यात (मध्यवर्ती असण्याच्या दृष्टीनं) असलेलं आणि ठाण्याहून येणारांस सोईचं असावं.
५. सौंदिंडियन वा कुठल्याही एकाच प्रकारचं नसल्यास, उत्तम व्हेज ऑप्शन्स देणारं असल्यास, दारूकामासही सोईचं असल्यास सोन्याहून पिवळं.
इतकं सगळं मिळालं, तर दरडोई किमान ५०० रुपये तरी खर्चायला लागतीलच. त्यामुळे महाग-स्वस्त वाद करण्याचीही आयती सोय होईल.
सोय करून दिलीच आहे
आणि सोय करून देण्याचा स्पेशल उल्लेख केलाच आहे, तर या सोयीचा लाभ घेतलाच पाहिजे.
इतकं सगळं मिळालं, तर दरडोई किमान ५०० रुपये तरी खर्चायला लागतीलच.
असं खरंच असल्यास कठीण आहे. पण तसं नसावं असा अंदाज आहे. हल्ली खरेदी करायला थेट मॉलच लागतात, प्रवास करायला थेट रिक्षाच लागतात आणि खायला थेट पाश्चात्य धाटणीची, मोठ्या स्टेटसची हाटलंच लागतात म्हणून तसं वाटत असावं.
असो. मी कट्ट्याला येणार नाहीये. तेव्हा कट्ट्यावर येण्यासंबंधी ज्या व्यक्ती गांभीर्याने विचार करत आहेत, आणि ज्यांना सर्वांच्या सोयीची, स्वस्त हाटलं शोधणं गरजेचं नाही, असं वाटतं, त्यांनी खुशाल या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावं. इतरांना टपल्या मारण्यासाठी खास आमंत्रण :ड
भाबै
भाबैची (भारतीय बैठक) सोय असलेलं कोणतं हॉटेल नाही काय पुण्यात?
आणि मी काय म्हणतो, इतकी चर्चा करण्यापेक्षा घरून डबे आणून कोणत्या तरी रँडम ईमारतीच्या गच्चीवर बसायचं का??? आणि जमल्यास तिथेच चुलीची वगैरे सोय करून इथे पाकृ टाकून छळणार्या लोक्स ना कामाला लावावं का???
.
मला जमत असल्यास ऐन वेळेस कळवेन.
अशा उपायांनंतर येणार्या
अशा उपायांनंतर येणार्या अडचणी:
१. बहुतांश पुरुष मंडळी निरागसपणे तंगड्या पसरून इकडची काडी तिकडे न करता निवांत बसून गप्पा ठोकत राहतात.
२. अंगच्या कंडिशनिंगमुळे बायका मंडळी धावून धावून ताटं मांड, वाढावाढी कर, हवंनको बघ, नंतर आवर, सुपारी फिरव असल्या उद्योगाला लागतात.
३. काही पुरुष सदस्य मदतीला येतात / स्वतःहून हलतात, नाही असं नाही. पण त्यांना 'हे आले पुरोगामी' असल्या छ्द्मी, कुजकट टोमण्यांना तोंड द्यावं लागतं.
४. पुरुष-स्त्रियांच्या समाजदत्त भूमिका आणि त्यांतून होणारे छुपे व उघड अन्याय अशा सर्वकालीन लोकप्रिय विषयावर वाद सुरू होऊन वातावरण गरम होतं.
५. काही रसिक खवय्यांच्या हस्ते पडलेल्या एखाद्या सर्वाधिक सरस पदार्थाचं इतर लोकांपर्यंत पोचायच्या आधीच स्वर्गारोहण होतं आणि त्या पदार्थाला मुकलेल्या लोकांमध्ये असंतोषाचा जन्म होतो.
तरी 'ऐसी'च्या 'खेळकर आणि पुरोगामी आणि आधुनिक' वातावरणाला गालबोट लागू नये म्हणून असे उपाय टाळण्याची अनुभवी शिफारस मी करीत आहे.
शिवाय
बहुतांश पुरुष मंडळींचे निरागसपणे तंगड्या पसरून इकडची काडी तिकडे न करता निवांत बसून गप्पा ठोकत राहणे, अंगच्या कंडिशनिंगमुळे बायका मंडळींनी धावून धावून ताटं मांड, वाढावाढी कर, हवंनको बघ, नंतर आवर, सुपारी फिरव असल्या उद्योगाला लागणे, सदस्य मदतीला येणार्या पुरुष सदस्यांना 'हे आले पुरोगामी' असल्या छ्द्मी, कुजकट टोमण्यांना तोंड द्यावं लागणं, पुरुष-स्त्रियांच्या समाजदत्त भूमिका आणि त्यांतून होणारे छुपे व उघड अन्याय अशा सर्वकालीन लोकप्रिय विषयावर वाद सुरू होऊन वातावरण गरम होणं, काही रसिक खवय्यांच्या हस्ते पडलेल्या एखाद्या सर्वाधिक सरस पदार्थाचं इतर लोकांपर्यंत पोचायच्या आधीच स्वर्गारोहण होणं आणि त्या पदार्थाला मुकलेल्या लोकांमध्ये असंतोषाचा जन्म होणं या सर्व अडचणींवर उपाय म्हणून माणशी ५०० रु. खर्च करण्यापेक्षा पुढील उपाय कसे वाटतात?
१. पुरुष मंडळींचे निरागसपणे तंगड्या पसरून इ. इ. स्त्रियांनी निरागसपणे तंगड्या पसरून डोळे भरून पाहत राहणे आणि कंटाळून पुरुष मंडळी स्वतःचे ताट स्वतः वाढून घेऊ लागली की 'आता उठलाच आहात तर आमचीही ताटं वाढून देता का' असे विचारणे. भांडण कशाला सुरू करा असा विचार करणार्या पुरुषांच्या भांडणरोधी मानसिकतेचा लाभ घेऊन काही आयती वाढलेली ताटे, पदरात/ओढणीत/ शर्टाच्या ओच्यात पाडून घेणे आणि एखाद्या पुरुषवादी पुरुषाला 'आपली ताटे आपण वाढून घ्या' अशी डरकाळी फोडावीशी वाटलीच तर 'तशीही समानता आपल्याला मान्य आहेच' हे आठवून स्वतःची ताटे वाढून घ्यायला स्वतः उठणे.
२. 'हे आले पुरोगामी' असले छ्द्मी, कुजकट टोमणे स्वतः न मारणे आणि इतर कोणी मारल्यास त्यांकडे दुर्लक्ष करणे.
३. पुरुष-स्त्रियांच्या समाजदत्त भूमिका वगैरे वगैरे विषयांवर वाद सुरू झाल्यास त्याला हवा न देता आपल्याला हव्या असलेल्या दुसर्या एखाद्या विषयावर वाद सुरू करणे किंवा 'च्यायला, होऊन जाऊ दे काय तो एकदाचा वाद' असा विचार करून बाह्या सरसावून, पदर कमरेला खोचून वगैरे वगैरे कडाडून वाद घालणे किंवा वातावरण गरम होऊ न देता शांतपणे वादाला प्रतिवाद करणे.
४. सर्वच पदार्थांचे रेशनिंग करणे जेणेकरून सर्वाधिक सरस पदार्थ सर्वांच्या जिभेवर पडतीलच, शिवाय सर्वाधिक वाईट पदार्थ उरणारही नाही.
वा वा, मला तर वाटलेलं की फुटक्या दमड्यांखेरीज फार काही खिशात पडू न देणार्या अशा फ्रीलान्सिंग लिंग्विस्ट या कर्ममार्गावर बौद्धिक समाधानाखेरीज काहीच हाती पडणार नाही. पण इथेतर पैसे खर्च करावे न लागता योजता येतील अशे उपाय सुचणे या फायद्याचीही भर पडतेय.
याची मला जाणीव होईल असे वातावरण निर्माण केल्याबद्दल धन्यवाद.
याला १००% अनुमोदन
कट्टा कसाहि/कुठेहि/कितीहि पैशात का होईना, राधिकाचे मुद्दे अगदि योग्य आहेत. अशा कामचुकार मंडळीना (यात "बहुतांश पुरुष" तू म्हंटलंच आहेस तशी मंडळी आणि तशा बायका आल्या) काय करायला हवंय याची जाणीव करून द्यायला लागते. त्यात आपल्याला वाईटपणा येउ शकतो / येतो. पण गप्प बसून असला प्रकार चालवून घेण्यापेक्षा ते बरं. आणि असा प्रकार होतो म्हणून प्रसंगच टाळणं हे एखाद्या "आमच्या ह्याना किनई गरम गरम पोळ्याच लागतात" म्हणून त्यांचं ताट सजवणार्या एखाद्या माउलीपेक्षा वाईट - तिच्या बाबतीत "You dont know what you dont know" असला प्रकार असतो सहसा त्यामुळे वेगळी अपेक्षा करणंच कठीण असतं! पण असा प्रकार जाणीवपूर्वक खपवून घेणं म्हणजे.....जाउंद्या. धागा कट्ट्याचा आहे, मी त्यात नाही त्यामुळे थांबतो. पण हा असा प्रसंग बरेच वेळा येतो - "कट्टा कमी खर्चात करावा" यामुळेच येतो असं नाहि. त्यामुळे तुझ्या मुद्द्याना जोरदार अनुमोदन देण्यासाठी हा प्रतिसाद.
खेरीज,
हा प्रतिसाद गंभीरपणे लिहिलेला आहे आणि असे असले तरी रागावून नाही याची कृपया नोंद घ्यावी.
कट्ट्यावरील काही व्यक्तींच्या असंतोषाचा मुद्दा निघाला आहे म्हणून हे आणखी एक लिहिते.
ठाणे कट्ट्याच्या वेळेला खास कारणाशिवाय* ३५० रु. खर्च करणे मला परवडणारे नव्हते. परंतु सर्वांना भेटायची इच्छा होती म्हणून कट्ट्याला येईन पण जेवणार नाही असे जाहीर करून कट्ट्याला आले. असे असूनही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत कट्टा पॉप टेट्सवरून हललाच नव्हता. शिवाय सर्वांना मध्यवर्ती पडेल असे ठिकाण निवडा ही रास्त सुचवणी धुडकावून कट्टा ठाण्यात आयोजित केलेला असल्याने कट्ट्याच्या आधी दोन तास निघून मला यावे लागले होते. सबब संध्याकाळी मला जबरदस्त भूक लागली होती आणि कट्ट्यावरील मंडळींची सोबत सोडून वाजवी दरातल्या उदरभरणासाठी इतरत्र जाणे किंवा कट्ट्यावरील मंडळींची सोबत राखण्यासाठी मुश्किलीने परवडणारी किंमत मोजणे हे दोनच पर्याय माझ्यासमोर होते. त्यातला दुसरा पर्याय मी निवडला आणि तो निवडण्याची जबाबदारी पूर्णपणे माझी. पण यातून मला जो असंतोष अनुभवाला आला तो लक्षात घेणे कोणाला महत्त्वाचे वाटते का?
* अत्यंत भारी किंवा अत्यंत वेगळे जेवण मिळणार असेल तर त्यावर ३५० रु. खर्चणे मला अयोग्य वाटणार नाही. परंतु, पॉप टेट्स येथले जेवण मला यांपैकी कोणत्याही वर्गात मोडणारे वाटले नाही. येथे वैयक्तिक टीका करण्याची मुळीच इच्छा नाही हे कृपया ध्यानात घ्यावे.
राहून राहून आश्चर्य वाटते
फुकटात किंवा स्वस्तात उपलब्ध असलेल्या पर्यायांपासून सुरुवात करण्याला जबरदस्त विरोध केला जात आहे याचं मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे.
त्यामागे पुढीलपैकी एक किंवा तत्सम गृहीतक असल्याशिवाय अशी तात्त्विक भूमिका घेतली जाईल असे वाटत नाही.
१. इतर ऐसीकरांना भेटू इच्छिणार्या सर्व ऐसीकरांना खास कारण नसताना एका जेवणासाठी ५०० रु.च्या आसपास खर्च करणे परवडत असेल.
२. परवडत नसल्यास चालवून घेण्याची त्यांची इच्छा असेल.
३. परवडत नसल्यास आणि चालवून घेण्याची इच्छा नसल्यास त्यांनी न आलेले त्यांना आणि परवडत असणार्या आणि परवडत नसले तरी चालवून घेण्याची इच्छा असलेल्या इतरांना चालेल.
या माझ्या गृहीतकात काही चूक असल्यास निदर्शनास आणून देणे.
प्राथमिकता
प्रत्येकाने आप-आपली प्राथमिकता सांभाळावी असे वाटते, सर्वांना भेटावेसे पण वाटते पण अमुक एक खर्च करणे तत्त्वात बसत नाही असे असु शकते त्यासाठी सगळ्यांना भेटून पुढील खर्च टाळून मी परत जाऊ शकतो, किंवा सोय असल्यास नुसत्याच गप्पा मारुन चहा/कॉफीवर भागवु शकतो, ह्याचा इतरांना त्रास होण्याचे कारण नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचे स्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्येकाची प्राथमिकता थोड्याफार प्रमाणात सांभाळली जाऊ शकते.
पण माझ्या प्राथमिकतेसाठी इतरांनी त्यांची प्राथमिकता बदलावी असे मला वाटणार नाही, मात्र सगळ्यांच्याच प्राथमिकतेनुसार मध्यम-मार्ग निघाल्यास सगळेच आनंदी होतील.
प्राथमिकता
म्हणजे काय? प्राधान्य असे आपल्याला म्हणायचे असल्यास क्रयशक्ती आणि प्राधान्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे नमूद करू इच्छिते. शिवाय अमुक एक खर्च करणे तत्त्वात बसत नाही हा मुद्दान नसून अमुक एक खर्च करणे परवडत नाही हा मुद्दा आहे. पुढील खर्च टाळून घरी जाणे, नुसत्याच गप्पा मारून चहा/कॉफीवर भागवणे, आपला त्रास इतरांना होऊ न देणे यातले काहीहे मला मान्य ्नाही.
प्रश्न स्वातंत्र्याचा नसून क्षमतेचा आहे.
असो.
प्रश्न स्वातंत्र्याचा नसून क्षमतेचा आहे.
क्षमता नसल्याने खर्च न करण्याचे स्वातंत्र्य असा अर्थ घेतला असतात तरी चालले असते, असो.
पुढील खर्च टाळून घरी जाणे, नुसत्याच गप्पा मारून चहा/कॉफीवर भागवणे, आपला त्रास इतरांना होऊ न देणे यातले काहीहे मला मान्य ्नाही.
तुमचे स्वातंत्र्य. असोच.
हा प्रतिसादही गंभीरपणे
हा प्रतिसादही गंभीरपणे लिहिल्यासारखा वाटत नसला, तरी गंभीरपणे आणि न रागावताच लिहिला आहे. (असा इशारा लिहावासा वाटावा असे वातावरण निर्माण केल्याबद्दल राधिकाचे अभिनंदन आणि निषेध. ;-))
तर -
कोणत्याही पर्यायाला जबरदस्त तर सोडाच - विरोधच नाही, याची लिंग्विस्टबाईंनी कृपया नोंद घ्यावी.
१. मात्र बहुतांश लोकांना जिथे कट्ट्याला येणे सोईचे आहे आणि हमखास येणारे सदस्य जिथे येण्याचा प्रस्ताव मांडतील अशा ठिकाणी कट्टा होतो. एकमत झाल्याशिवाय निर्णय नाही अशी प्रथा काही समाजांत असते. पण तिथेही सरसकट सगळ्या निर्णयांकरता ती वापरली जात नाही. 'ऐसी'च्या कट्ट्याबाबत आधीच इतक्या चर्चा आणि काथ्याकूट होतात, की एकमतासाठी थांबल्यास कट्टा कल्पान्तापर्यंत घडायचाच नाही. त्यामुळे बहुमत घेणेच बरे पडते.
२. बहुमत बदलण्यासाठी प्रयत्न करण्याला कुणाचाच विरोध असत नाही. मात्र हे प्रयत्न यशस्वी होणे न होणे हे कट्ट्यासाठीची एकूण उत्सुकता, हवेतला मूड, पाठिंबा देणार्यांचे संख्याबळ, आपली पटवून देण्याची चिकाटी आणि आपली एकूण प्रतिमा यांवर ठरते. मुदलात असे प्रयत्न करण्यासाठी फार आधीपासून छुपी आणि प्रकट मोर्चेबांधणी करावी लागते, हेही आहेच.
३. आपल्याला सोईच्या नसलेल्या ठिकाणी कट्टा झाला, तरी तो आपले खिसाबळ न पाहता, मुद्दामहून गैरसोईच्या ठिकाणी आयोजित केला गेला आहे असे मानण्याचे काही कारण नाही. बहुमत आपल्या विरोधात गेले, इतकेच काय ते. अशा वेळी कट्ट्यानंतर वा खुद्द कट्ट्यातही टपकून आपला निषेध पुरेशा खेळकर खवचटपणे नोंदल्यास 'ऐसी'च्या चर्चील वातावरणाला अधिकच खुमारी चढते. पुढच्या वेळी आपल्या मताची दखल घेतली जाण्याची शक्यता काही अंशांनी बळावते.
या धाग्यावरची मी रेकमेंड
या धाग्यावरची मी रेकमेंड केलेली सर्व ठिकाणे रद्दबातल समजावीत. ग्यारंटीड वेगळे आणि खास चवीचे आणि त्यांची किंमत वर्थ ठरवू शकेल असे यात कोणतेही ठिकाण असेलच असे नाही. उगीच जाऊन अपेक्षाभंग नको.
हेही माझे व्यक्तिगत मत आहे. आणि सर्वांची मते स्वीकारण्याच्या संकेतानुसारच व्यक्त केले आहे.
सार्वजनिक बागेत कट्टा करण्याची सूचना चांगली वाटते आहे. फक्त गवताळ उद्यान असेल तर डास,किडे वगैरेचा उपद्रव सुरु होण्याच्या आधी म्हणजे अंधाराच्या आधी कट्टा उरकावा अशी सूचना अनुभवावरुन देतो.
माझे मत
यावर इतकी चर्चा झाल्यावर माझे मत द्यायला हरकत नाही.
माझे मतः
कट्टा हा हॉटेलमध्ये होऊ नये.
खाणे व कट्टा जमवून गप्पा मारणे या वेगळ्या गोष्टी आहेत.
लोकांनी खाऊन यावे वा न जमल्यास एखादे सँडविच/वडापाव वगैरे गोष्टींनी पोटाला शांत करावे. किंवा गप्पा झाल्यावर/पूर्वी समविचारी गटाने आवडत्या ठिकाणी जाऊन हादडावे
सगळ्यांनी जमुन भरपूर गप्पा मारणे मला अधिक आवडेल.
हॉटेलांमध्ये एका लांबलच टेबलावर दुसर्या टोकावर चाललेल्या चर्चेतच प्रत्येकाला रस वाटू लागतो नी त्यात सहभागही घेता येत नाही ;)
च्यामारी
मग मी पु ल देशपांडे उद्यान वगैरे सारख्या स्वच्छ शांत ठिकाणी जागा सुचवत होतो त्याला का खुबीनं टाळलं पब्लिकनं.
गप्पा मारत मारत फिरत रहायचं किंवा नुसतच पडून गप्पा मारत रहायच्या.
हा का ना का.
कुणाला लागलिच भूक तर जाइल की तिथून कर्वेनगर काय किंवा डेक्कन काय जवळच आहे.
जाइल नि हादडून येइल.
वेगळी चर्चा
गेल्या कट्ट्याच्या वेळी मी केलेली एक चूक इथे माझ्या हातून पुन्हा घडली. गेल्या कट्ट्याच्या वेळीही आयोजकांवर कोणतीही व्यक्तिगत टीका करायची नव्हती. केवळ वैचारिक भूमिकेवर टीका करायची होती. ती टीका मी कट्ट्याच्याच धाग्यावर चालू ठेवली आणि माझी वैचारिक भूमिका पटवण्यासाठी हाती असलेल्या कट्टाआयोजनाचे उदाहरण घेतले त्यामुळे मी व्यक्तिगत टीका करत हे असा अनेकांचा गैरसमज झाला.
तीच चूक मी आता पुन्हा करत आहे हे लक्षात आले. त्यामुळे या विषयावर मी वेगळी चर्चा सुरू करते आहे.
शिवाय, मी या कट्ट्यास येणार नसल्याने माझी वरील मते कट्टाआयोजनात ध्यानात घेतली नाहीत तरी चालेल.

त्यामुळे "डिग्निटी ऑफ लेबर"
In reply to हायला, म्हणजे माज करण्याचा by गब्बर सिंग
छ्या छ्या... तुमचं रीडिंग पार गंडलेलं आहे. जिथे उघड उघड स्त्रीवादाचा संबंध आहे, तिथे उगीच अर्थशास्त्र ओढून ताणून आणताय, बाकी काही नाही. अपनों से नीचे वाला सल्ला हा खास पुरुषप्रधान समाजात स्त्रिया कशा पददलित असतात याचं प्रतीक आहे. 'जो आपल्यापेक्षा कमी पातळीवरच्या लोकांशी चांगला वागतो तो आपल्या पत्नीशी/गर्लफ्रेंडशी - जी अर्थातच त्याच्यापेक्षा कमी पातळीची आहे - चांगला वागेल' हा त्यातून अर्थ निघतो. त्या मुलीचा या उतरंडीवर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तिला हा मार्ग पटतो.