मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २५
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
==========
ब-याच चर्चांतले उल्लेख वाचून हेवापूर्ण शंका:
अमेरिकेत किंवा ते नच जमल्यास अन्य प्रगत देशात जाणे आणि स्थायिक होणे यासाठी काय करावे लागते?
स्थायिक होणे
स्थायिक होणे हा क्लॉज सोडल्यास नुसतेच "प्रगत देशात जाण्यासाठी" :-
भला मोठा प्रचार -गाजावाजा आणि भाषणबाजी करुन अतिप्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाचा पी यम व्हावे लागते.
.
.
.
"स्थायिक होणे " ह्या क्लॉजबद्दल :-
तहव्वुर हुसैन राना आणि डेव्हिड हेडली ह्यांच्यासारखी कर्तबगारी दाखविल्यास थोर यू एस सरकार स्वतःच तुम्हाला घेउन जायला पुष्पक विमान पाठिवते.
तुम्ही जगाच्या कोणत्या का कोपर्यात असेनात.
हे दोघे आता कायमचे यू एस मध्येच असावेत.
तेही संपूर्णपणे अमेरिकन सरकारच्या खर्चाने!
भला मोठा प्रचार -गाजावाजा आणि
भला मोठा प्रचार -गाजावाजा आणि भाषणबाजी करुन अतिप्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाचा पी यम व्हावे लागते
असेच काहि नाही.
असा गाजावाजा इत्यादी करून आलेला पीयम असताना फक्त एखाद्या च्यानेल वरील बर्यापैकी परिचित पत्रकार झालेलेही पुरते. ;)
अवांतरः सध्या कोणता पत्रकार भारतात आहे? असा प्रश्न मला कालच पडला
नवा मंत्र कोणता?
महनीय पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा आपल्याला कोणती नवी घोषणा देईल?
ती मिळवण्यासाठी इथे बसून काय
ती मिळवण्यासाठी इथे बसून काय करता येते?
एकतर अतिशय उच्च दर्जाच्या संस्थेतून उच्चशिक्षण घेऊन थेट कॅम्पसवरच परदेशी नेमणूकपत्र पदरी पडणे किंवा सद्य भारतीय / भारतातल्या कंपनीनेच परदेशात धाडणे हेच दोन मार्ग आहेत का?
एखाद्याला सध्याच्या अनुभव आणि शिक्षणावरुन (प्रगत) परदेशात नोकरीसाठी संधी आहेत का हे कसे कळते?
मिडल ईस्ट वगळता.. कारण तिथे भारतातून रिक्रूटमेंटचे बरेच मार्ग रीतसर असलेले दिसतात.
शिक्षण विदेशात नसताना, कँपस
शिक्षण विदेशात नसताना, कँपस सिलेक्शन आणि कंपनीने धाडणे हे दोन्ही नाही झाले तरी, प्रगत देशात नोकरी अगदी आरामात करता येते. पण ते व्यक्तिगत कौशल्यावर आहे. भारतीय शिक्षण आणि अनुभव असेल तर विदेशी नोकरी करता येत नाही असं कै नै. आय टी मधे तर चिकार लोक गेले आहेत. पण शिक्षण, कँपस, ऑनशोर, डायरेक्ट नोकरी, इ इ मधे व्हीसा आणि नागरीकत्व मिळण्याचे लोचे वेगवेगळे आहेत.
--------------------------
सेक्टोरल अनुभवाऐवजी ( जसे फर्टीलायजर, टायर) फंक्शनल अनुभव (जसे फायनान्स, मार्केटिंग) असेल तर ज्यूनिअर लेवलला स्कोप संभवत नाही. सिनिअर लेवलला दोन्हीकडे स्कोप संभवतो, पण रेलेवन्स असेल तर. उदा. फ्रान्सचे अकाउंटींग आणि टेक्स लॉज इतके वेगळे असणार कि भारतात कितीही अनुभव घेतला तर निरुपयुक्त. तेच लॉच्या अनुभवाचे. सेक्टोरल अनुभवातही फारच कॉमन असलेले कौशल्य असेल तर स्कोप संभवत नाही.
------------------
अशी नोकरी मिळवणे भयंकर टेक्सिंग आणि कंटाळवाणे काम आहे. पण तरीही -
१. भारतीय कंपन्यांचे जिथे व्यवसाय आहेत तिथे अप्प्लाय करावे. त्यांना भारतीयाचा कोणता सीवी चांगला कोणता वाईट हे कळायची शक्यता असते.
२. युनो, एडीबी, इ इ च्या बर्याच आंतरराष्ट्रीय बॉड्यांच्या खूप जागा खूप देशात निघत असतात. त्याला अप्प्लाय करत राहावे. त्यांचे सिलेक्शन फेअर असते. त्यांचे फॉर्म लांबलचक असतात, पण बहुतेक एकदाच भरायचे असतात.
३. जगातल्या मोठमोठ्या एम एन सी च्या करीयर सेक्शन मधे रजिस्टर करावे. त्यांना देखिल भारतातला कोणता सीवी बरा कोनता नाही हे कळते.
४. आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम केले असले तर ते डिट्टेलमधे हायलाईट करावे.
५. पेशन्स असेल तर अगोदर मधली उडी मारावी. उदा. भारतातून फिलिपिन्सला जाणे खूप सोपे आहे. तिथून पुढे प्रगत देशात जाणे मग संभव होते.
६. आंतरराष्ट्रीत रिक्रूटमेंट करणार्या रेप्यूटेड एजन्सीज असतात. त्यांचेकडे जावे.
७. उदा. भारताच्या स्वीडनमधील आणि स्वीडनच्या भारतातील वकालतींच्या गतीविधीवर (मंजे समजून घ्या) लक्ष ठेवावे.
८. भारतात एम एन सी त नोकरी असेल तर जर्मन इ एच क्यू ची भाषा शिकून घेणे.
----------------
तुमच्याकडे स्किल्स असणे आणि तिकडे गरज असणे आणि इतर अपेक्षा पूर्ती होणे अध्याहृत आहे.
७. एंबॅसीज, कमिशन्स, ट्रेड
७. एंबॅसीज, कमिशन्स, ट्रेड बॉडीज मधे दोन देशांत काय काय घडामोडी, व्यवहार, इ इ होणार आहेत याची सुरुवात होते. त्याचा ट्रॅक ठेवणे फायद्याचे ठरते.
उदा. http://www.swedenabroad.com/en-GB/Embassies/New-Delhi/Work--Live-in-Swe…
इथे काही महिती.
पुढे त्यात जी लिंक दिली आहे
http://work.sweden.se/
इथे काही माहिती मिळते.
पण दोन देशांत जे एकूण काय काय नवे, महत्त्वाचे चालू आहे ते इथे कळते.
८. जनरली तुम्ही भारतात इटालियन कंपनीत असाल तर इटालियन शिका. काम तेच्च असेल, तर ते तुम्हाला मुख्यालयासाठी घेऊ शकतात. एच क्यू ची भाषा येणे फार आवश्यक आहे.
६. एजंन्सी असतात. मी एजन्सी कडे कधी गेलो नाही म्हणून सांगू शकत नाही. पण बरेच जातात.
सेक्टोरल अनुभवाऐवजी ( जसे
सेक्टोरल अनुभवाऐवजी ( जसे फर्टीलायजर, टायर) फंक्शनल अनुभव (जसे फायनान्स, मार्केटिंग) असेल तर ज्यूनिअर लेवलला स्कोप संभवत नाही.
याबद्दल किंचितशी असहमती.
फारच कॉमन असलेले कौशल्य असेल तर स्कोप संभवत नाही.
हे एकदम बरोबर आहे. कॉमन नसलेलं कौशल्य असेल तर तुम्ही सेक्टोरल की फंक्शनल, जूनियर की सीनियर याने फरक पडत नाही.
एखादं कौशल्य किती कॉमन आहे हे देशपरत्वेही बदलतं. उदा. मलेशियामध्ये नवीन GST कायदा आला आहे. तो कायदा भारताच्या VAT कायद्यावर आधारित आहे म्हणे. त्यामुळे सध्या मलेशियन कंपन्या / कन्सल्टिंग फर्म्स भारतातल्या अप्रत्यक्ष करांशी संबंधित अनुभव असलेल्या लोकांना भरभरून नोकर्या वाटताहेत.
कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया
कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांत तुमचा अनुभव आणि शिक्षण या दोन गोष्टींच्या आधारावर सरळ परमनंट रेसिडेन्सिसाठी अर्ज करता येतो. तुम्ही अर्ज करतेवेळी त्या देशांत असणार्या वेगवेगळ्या क्षेत्रातील रिकाम्या जागा आणि संधी याच्या आधारे सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी त्या वर्षासाठी जागा उपलब्ध केलेल्या असतात त्या याद्यांकडे नजर टाकावी. केवळ ठराविक क्षेत्रातल्या आणि उच्चशिक्षित व्यक्तींसाठी संधी असतात हा चुकीचा समज आहे. कॅनडासारख्या देशात कुशल कामगारांचीही मोठी गरज असते त्यामुळे हवी ती कागदपत्रे असल्यास त्यांनाही मोठ्या संधी असतात. मागे एकदा सरकारच्या अधिकृत याद्यांमध्ये 'एक्सॉटिक डान्सर्स' साठीही काही जागा आहेत हे पाहिले होते :-)
घृतदण्डिकान्याय (अर्थात, घी देखा, लेकिन...)
तुमच्या क्षेत्रात तुम्हाला अनुभव असेल, आणि तुमच्या क्षेत्राकरिता मागणी असेल (अधिक तुमचे इंग्रजी - किंवा कॅनडाच्या क्वेबेक प्रांताकरिता फ्रेंच - चांगले असेल), तर रीतसर अर्ज करून आणि फी भरून थेट कॅनडाची किंवा ऑस्ट्रेलियाची पर्मनंट रेसिडेन्सी सहज मिळवता येते, हे बहुधा अजूनही बव्हंशी खरे असावे. (१९८०च्या दशकात ऑस्ट्रेलियात अशा प्रकारे स्थलांतर जोरात होते. आता ते तितके सोपे राहिले असावे की नाही, कल्पना नाही. कॅनडासाठी हे बहुधा अद्यापही खरे असावे.) शिवाय, अशा प्रकारे रेसिडेण्ट वीज़ावर तेथे जाऊन पोहोचल्यावर नोकरी मिळेपर्यंत सुरुवातीचा काही काळ तरी थोडीफार सरकारी आर्थिक मदत मिळते, असेही ऐकलेले आहे.
परंतु, याला एक दुसरी बाजू आहे. (डिस्क्लेमर: पुढील परिच्छेदांतील प्रतिपादने ही अंशतः ऐकीव माहिती आणि अंशतः परिचितांचे अनुभव यांवर आधारलेली असून, या बाबतीत मला स्वतःला वैयक्तिक अनुभव नाही.)
डायरेक्ट इमिग्रेशन वीज़ा / पर्मनण्ट रेसिडेन्सी मिळणे ही कोणत्याही प्रकारे तेथे पोहोचल्यावर तुमच्या क्षेत्रातील चांगली नोकरी मिळण्याची शाश्वती नाही. (बेसिकली, यू आर ऑन युअर ओन स्टीम. कॅनडात यायचा आणि राहायचा परवाना तुम्हाला दिलेला आहे, पण तेथे पोहोचल्यावर तुमचे तुम्ही.) शिवाय, हातात नोकरी नसल्यास सुरुवातीच्या काळात जी सरकारी आर्थिक मदत (अधिक काही परिस्थितींत तात्पुरती निवासव्यवस्था) वगैरे मिळते, ती अगदीच तुटपुंजी (अधिक बेअरबोन्स/बकाल) असते. मग पुन्हा नोकरी मिळवताना तुमचा भारतातला अनुभव स्थानिक प्रोफेशनल लायसेन्सशिवाय अनेकदा ग्राह्य धरला न जाणे, स्थानिक-प्रोफेशनल-लायसन्स-नाही-म्हणून-नोकरी-नाही-म्हणून-स्थानिक-अनुभव-नाही-म्हणून-नोकरी-नाही-दुष्टचक्र, शिवाय सरकारी-यादीप्रमाणे-काही-क्षेत्रांत-कॅनडाला-कुशल-कामगारांची-असलेली-प्रचंड-गरज आणि प्रत्यक्ष-परिस्थितीत-त्या-क्षेत्रातली-मागणी यांच्यातील प्रचंड तफावत, या सगळ्या भानगडींना तोंड देत देत तुम्हाला प्रत्यक्षात केव्हा नोकरी मिळेल तेव्हा मिळेल, तोपर्यंत कसेबसे दिवस काढायचे नि पोटापाण्यासाठी काय वाटेल ते करत राहायचे, हेही होऊ शकते. अशा परिस्थितीत मायदेशात चांगली डॉक्टर वगैरे असलेली आणि ठीकठीक उत्पन्न असलेली मंडळी कॅनडात टॅक्सी चालवताहेत, असेही ऐकायला मिळते. (माझ्या परिचयाच्या एका उच्चशिक्षित अनुभवी केमिकल इंजिनियरला कॅनडात पोहोचल्यानंतर बराच काळ बेकार राहिल्यावर काही काळ टेलेमार्केटर बनून लोकांना फोन करून रंगाचे डबे विकण्याचे काम पत्करावे लागले होते. कॅनडाला पोहोचल्यानंतर दीडदोन वर्षांनी कोठे इष्ट क्षेत्रातील ठीकठाक पगाराची नोकरी प्रथम मिळून ही व्यक्ती पुढे स्थिरस्थावर झाली. ही साधारणतः १९९९-२००० सालच्या आसपासची गोष्ट आहे.)
बोले तो, योग्य अनुभव असल्यास या देशांत कायमस्वरूपी प्रवेश मिळवणे सहज शक्य आहे, परंतु एकदा तेथे पोहोचल्यावर चांगली नोकरी मिळेपर्यंत सुरुवातीचा बराच काळ हलाखीचा असू शकतो. (पूर्वीच्या काळी - किंवा कदाचित अजूनसुद्धा - मंडळी मुंबईत नशीब काढायला येत, त्याची आंतरराष्ट्रीय आवृत्ती.)
मात्र, कॅनडाच्या बाबतीत (पुन्हा, ऐकीव माहितीप्रमाणे) आणखी एक बाब अशी आहे, की तेथे पर्मनण्ट रेसिडेन्सी मिळवून राहू लागल्यावर तेथील नागरिकत्वासाठी अर्ज करण्याकरिता पात्र होण्याकरिता लागणारा काळ (यूएसएच्या) तुलनेने कमी आहे (खरे तर यूएसएत नुसते ग्रीनकार्ड मिळवण्याकरिता लागणार्या काळापेक्षाही बहुधा बराच कमी असावा), आणि एकदा कॅनडाचे नागरिकत्व मिळाले, की मग कॅनडा आणि यूएसएमधील कराराच्या आधारे यूएसएत नोकरीसाठी परवाना मिळविणे हे (इतर देशांतून थेट यूएसएच्या एच१बीच्या तुलनेत) त्या मानाने बरेच सोपे होते. (पुन्हा, अर्धवट आणि ऐकीव माहिती. गरजूंनी तपशील तपासून पहावेत.)
(उलटपक्षी, यूएसएत थेट एच१बीवर येऊ शकल्यास त्यानंतर कायमस्वरूपी स्थायिक होणे ही दीर्घकालीन, किचकट आणि काहीशी बेभरवशाची प्रक्रिया असू शकते, परंतु थेट नोकरीवर येत असल्यास निदान आल्याआल्या नोकरी शोधण्याचा / पोटापाण्याचा प्रश्न तरी भेडसावत नसतो, हाही एक भाग आहे.)
इतर पर्याय
कॅनडा, ऑस्ट्रेलिया याशिवाय न्यूझीलंड हा अजून एक पर्याय आहे. L&T मधील माझा ज्यूनियर मित्र न्यूझीलंडला गेला आणि नंतर अजून २ मित्रांनाही त्याने तिथे बोलावले. (सध्या तो न्यूझीलंडमधून ऑस्ट्रेलियात स्थाईक झाला आहे.) कॅनडात कॅलगरी भागात ऑईल कंपन्यांना बरेच मनुष्यबळ लागते, असे मित्रांकडून ऐकून आहे, तो पर्याय पण तपासून बघा.
अमेरिकेत EB-5 नावाचा व्हिसा प्रकार आहे, त्यात तुम्ही १ मिलियन डॉलर गुंतवणूक केली तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना इमिग्रेशन करता येते. (१ मिलियन डॉलर गुंतवणूक कठीण प्रकार आहे, पण निव्वळ माहिती म्हणून देत आहे). देवळात पुजारी किंवा आचारी म्हणून सहज येता येते असे ऐकून आहे, तसे येणारे पण माहीत आहेत, पण बहुतेक पुजारी साऊथ इंडियन असतात. (मी तरी अजून इतर कोणी पाहिले नाहीत). अमेरिकेतील सध्याची परिस्थिती बघितली तर आय.टी. क्षेत्रात H1B वर येणे आणि ग्रीनकार्ड मिळवून स्थाईक होणे, अशक्य नसले तरी कठीण वाटते. Ph.D. असेल तर EB-1 मध्ये ग्रीनकार्ड लवकर मिळते, असे ऐकून आहे.
गंमत म्हणजे एकदा इथल्या हॉस्पिटलमधून मला मराठी ते इंग्लिश असे भाषांतर करायला पण बोलावले होते. माझ्याऐवजी मी बायकोला पाठवले होते. असे भाषांतराचे काम नेहमीच तुम्हाला मिळाले तर बघा. :)
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/43025097.cms
महाराष्ट्रातील सरकारी आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका होत असताना पुदुच्चेरी (पॉँडिचेरी) या केंद्रशासित प्रदेशातील 'जिपमेर' हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी, बायपासपासून ते रेडिओथेरपी, केमोथेरपी आदी अनेक उपचार मोफत मिळत आहेत. सरकारी आरोग्य यंत्रणा गरिबांसाठी किती फायदेशीर ठरू शकते, याचे हे मूर्तिमंत उदाहरण पुदुच्चेरीच्या दौऱ्यात पाहायला मिळाले. त्याच धर्तीवर, ससूनसारख्या राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व आरोग्य सुविधा मोफत असूनही त्या सहजरीत्या उपलब्ध का होत नाहीत?
खासगी हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा अद्ययावत असल्या तरी त्या सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे नागरिक मोठ्या अपेक्षेने सरकारी आरोग्य सेवेकडे येतात. परंतु, डॉक्टर आहेत तर सुविधा नाहीत, सुविधा असल्या तर परिचारिका आणि अन्य यंत्रणांसह औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची वानवा अशा अवस्थेत सरकारी आरोग्य सुविधा काही ना काही कारणाने 'आजारी' असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. त्यामुळे एखादी सरकारी आरोग्य यंत्रणा खरंच फायदेशीर ठरू शकते का, यावर माझाच काय कोणाचाच विश्वास बसणार नाही. यामुळेच सरकारी आरोग्य संस्थांकडे पाठ फिरवत गरिबांनादेखील लूटमार करणाऱ्या खासगी हॉस्पिटलची पायरी चढावी लागते.
ऑप्थॅल्म्मो
त्या शहरातल्या इतर कुठल्याही खाजगी हॉस्पिटलपेक्षा कोणत्या तरी सरकारी इस्पितळातलं ऑप्थॅल्मो सुसज्ज आणि आधुनिक आहे असं परवाच आडकित्ता म्हणाले.
प्रतिसादाचा दुवा नाही.
शिवाय मला वाटतं बाळ ठाकरे वगैरेंची एक दोन ऑपरेशनं सरकारी इस्पितळातच झाली होती.
माझ्यापुरते :-
इतरत्रही ससून, बीजे वगैरे वाईट नाहित असे ऐकले.
ते दूर आहेत, म्हणून जाणे होत नाही इतकेच.
दिल्लीत ऐम्स तुफानी प्रसिद्ध
दिल्लीत ऐम्स तुफानी प्रसिद्ध आहे. माझ्या दिल्लीतच काय अख्ख्या भारतात ऐम्सचं सॉलिड रेप्यूटेशन आहे. शेजारच्या देशांत सुद्धा!!! दिल्लीतल्या कोणत्याही खाजगी हॉस्पिटलचा बाप आहे. जनरली कोठेही न सुटलेले प्रोब्लेम घेऊन लोक इथे येतात. हे डॉक्टर किती चांगले (चांगले मंजे फक्त तज्ञ) आहेत आणि उपकरणे, सुविधा किती आहेत या दोनच निकषांवर खरे आहे. बाकी सगळा सरकारी भिकारचोटपणा तिथे आहेच.
----------------
बाकी ससून आणि चांगले (तुम्ही वाईट नाही असं लिहिलं आहे ते) म्हटलं कि माझं माथं ठणकतं. असह्य गलिच्छ आणि बेजबाबदार कर्मचारी असलेली जागा आहे. मला एका माझ्या माजी कँपस एम्प्लॉयर तिथून हेल्थ सर्टीफिकेट आणायला सांगीतलेलं. (२००३). मी १-२ चकरा टाकून चौकशी केली. नंतर कंपनीला फोन केला कि मी काही "ससूनमधून कोणतं सर्टीफिकेट आणणार नाही, इ इ , (शेवटी) जॉइन करू का नको?
-------------
पण खाजगी इस्पितळांत देखिल अलिकडे उपकरणे अद्ययावत होत आहे.
ससूनमधे सर्टिफिकेटं
ससूनमधे सर्टिफिकेटं देण्यासाठी संपूर्ण करप्ट असा एक 'सिव्हिल सर्जन/मेडीकल सुपरिंटेंडंट' नामक प्राणी असतो.
याचा अन ससून 'हॉस्पिटल'चा काही संबंध नाही.
ट्रीटमेंट करणारे मेडिकल कॉलेजातले प्राध्यापकापासून ज्यु. रेसिडेंटपर्यंतचे डॉक्टर्स असतात.
आपण सरकारी सर्टिफिकेटाबद्दल बोलत नसून तेथील वैद्यकीय उपचारसुविधेच्या दर्जाबद्दल बोलत आहोत.
*
"त्या" हॉस्पिटलचे नांव 'जेजे' आहे. डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रयत्नांनी नावारूपास आलेले.
आपण सरकारी सर्टिफिकेटाबद्दल
आपण सरकारी सर्टिफिकेटाबद्दल बोलत नसून तेथील वैद्यकीय उपचारसुविधेच्या दर्जाबद्दल बोलत आहोत.
सहमत. आपल्याला कळत नै, पण लोक म्हणतात कि नावाजलेल्या सरकारी इस्पितळात डॉक्टर आणि 'उपकरणीय सेवा' हे दोन्ही किमान आजतरी प्रायवेटपेक्षा जास्त चांगले आहे.
------------
सध्याला गुरगावाच्या मेदांतने ऐम्सला चांगलीच रेप्यूटेशनची टक्कर दिली आहे. नैतर अगोदर "ऐम्सच्या तुलनेत" अशी फ्रेजच नसायची दिल्लीत.
महाराष्ट्र सरकार
निवडणूक होउन नवीन सरकार यायला दोन चार आठवडे असतानाच महाराष्ट्र सरकारातून राष्ट्रवादी हा घटकपक्ष बाहेर पडला आहे.
राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या आदेशावर प्रणबदांनी सहीसुद्धा केली आहे.
तांत्रिकदृष्ट्या ह्या सरकारने कार्यकाळ पूर्ण केलेला नाही, असे म्हणावे लागेल ना ?
की निवडणुकीचा काळ "कार्यकाळ" ह्या संज्ञेत धरला जात नाही?
उद्या केबीसी मध्ये खालीलपैकी कोणत्या सरकारने कार्यकाळ पूर्ण केलेला आहे/नाही असा प्रश्न असेल ;
आणि त्यात एक नाव ह्या २००९ नंतरच्या काँग्रेस आघाडीचे असेल तर कोणता पर्याय टिक करावा ?
व्यवस्थापकः नव्या विषयावरील लेखन/प्रश्न/विचार नव्या व ताज्या धाग्यावर लिहावेत. ताजा धागा कुठला हे समजायची सोय उजवीकडील आयकॉन्सवर केलेली आहे.
अर्थात कार्यकाळ पूर्ण केला
अर्थात कार्यकाळ पूर्ण केला नाहि असे धरले जावे. पण मुळात तसे झाले नसते तरी या सरकारचा कार्यकाळ पूर्ण नसता. पृथ्वीबाबा मधुनच आले आहेत.
आधी अशोक चव्हाणांचे सरकार होते. त्या सरकारने कार्यकाळ पुरा केला नाही. नंतरच्या या सरकारला मुळातच कार्यकाळ पूर्ण करायची संधी नव्हती.
गृहितक: चर्चा फक्त तांत्रिक अंगाने करायची आहे.
bed artwork
Tracey-Emins हिचं bed artwork विकलं गेलं.
कितीला विकलं गेल ? केवळ २.२ मिलियन स्टर्लिंग पाउंडला विकलं गेलं.
म्हणजे २२ लाख पाउंड!
(१ पाउंड हा साधारण ६० ते ८० रुपये इतक्या किमतीदरम्यान फिरताना आढळतो.)
http://www.dailymail.co.uk/news/article-2677048/Britains-expensive-bed-…
.
.
हे नक्की कोणत्या कलेमध्ये येतं? (फोटोग्राफी,चित्रकला ह्याहून हे वेगळं आहे का ? की हे ही दृश्य माध्यम आहे ?)
आणि ह्या कलाकृतीमधील सौंदर्य कुणी सांगू शकेल का ?
(गंभीरपणे विचारतोय.)
ह्यातल्या कोणत्या गोष्टी रसिकांच्या मनाचा ठाव घेउन गेल्या असाव्यात ?
च्यामारी टोपी... आमच्या
च्यामारी टोपी...
आमच्या मातोश्रींना हा दुवा फॉर्वर्ड करत आहे. माझ्या अनमेड बेड आर्ट्वर्कचं महत्त्व त्यांना कधी कळलंच नाही. भारतात कलाकारांची अशीच गळचेपी वगैरे वगैरे.
हा जो प्रकार आहे तो "इन्स्टॉलेशन" या कलाप्रकारामध्ये यावा. ट्रेसीचं सौंदर्य पोचलं, पण कलाकृतीतलं सौंदर्य जाणून घ्यायला आवडेल.
(अतिअवांतरः पौंड सध्या १००च्या आसपास असतो.)
आयटी कंपन्या
आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात इंजिनियरांची भरती करतात. ह्यांतील अनेक जणांचे शिक्षण त्या क्षेत्रातले नसते. मेकॅनिकल, प्रॉडक्शन, सिव्हिल इंजिनियरिंग करून आयटीत गेलेले लोक पाहिले आहेत. ऐवीतेवी शिक्षण संबंधित विषयातले नसेल, तर इंजिनियरांना प्राधान्य का दिले जाते? इंजिनियरांना चार वर्षे जोरदार घासायची (असाईन्मेंट वगैरेमुळे) सवय झालेली असते, हे ऐकीव कारण हेच प्रमुख कारण आहे का? ;)
इथे आयटी कंपनीत भरती करणारे कोणी आहेत का? इंजिनियर सोडून इतरांचा विचार कितपत केला जातो? उदा. बीएस्सी केमिस्ट्री वगैरे (काँप सायन्स नव्हे.)?
रिक्रूटमेंटचा मला अण्भव शून्य
रिक्रूटमेंटचा मला अण्भव शून्य आहे. पण कंपनीच्या इंटर्नल मेलामेलीत कैक पोझिशनसाठी आर्ट-सायन्स-कॉमर्स वाले लोकच पायजेत असेही आवर्जून सांगितले जाते. यापैकी काही पोझिशन्स बीपीओ साठी असतात, तर काही डोमेनवाल्या असतात. नेहमीच्या कोडिंगसाठी मात्र यांचा विचार प्राधान्याने केला जात नसावासे वाटते. जाणकार अधिक माहिती देतीलच.
तसं बघायचं झालं तर त्या
तसं बघायचं झालं तर त्या ईजिनेअर्सकडून काय काम होण अपेक्षित आहे ते बघावं. बर्याचदा कामचलाऊ कोडिंग करायला तुम्ही संगणक शिक्षणाची गरज नाही. लॉजिक/ अॅनॅलिटिकल थिंकिंगची जास्तं गरज असते. खाली म्हटल्याप्रमाणे एंजिनीअर्सचं लॉजिक, गणित त्यातल्यात्यात बरं असतं. संगणक अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात प्रोग्रामिंग फार कमी प्रमाणात शिकीवतात. जी थिअरी, अल्गोरिदम्स, डिसाईन शिकवली जाते ती बाकीचे इंजिनीअर्स थोड्या काळात आत्मसात करू शकतात. हार्डवेअर वगैरेचं काम फार लागत नाही बहुतांश कामांमध्ये. जिथे लागतं तिथे असे मिळतील ते ईजिनिअर्स नाही घेत.
सो मुद्दे असे,
१. बर्याच भारतीय आयटी कंपन्यांमध्ये काम अजिबात हायफंडू नसतं. थोडफार डोकं असलेला माणूस थोड्याच काळात ती कौशल्य आत्मसात करू शकतो.
२. संगणक अभियांत्रिकीमध्ये जे शिकवतात त्यातला फार थोडा भाग अॅक्चुअल कामात वापर्ला जातो.
३. इंजिनिअर असणे हे मार्केटेबल असाव. क्लायंट्सवर इंप्रेशन टाकायला. अमुक इतके ईजिनिअर्स बाळगतो आम्ही वगैरे.
प्रदर्शनी भागात विक्रीस ठेवता
प्रदर्शनी भागात विक्रीस ठेवता येईल असा माल आणि त्या लेबलखाली एरवी विकला जाणारा माल गरजेचे आहेतच.
तर इंजिनियरांना प्राधान्य का दिले जाते?
'इंजिनिअरिंग'चा वैश्विक अर्थ पहाता त्या दर्जाचे कामगार असतील हि आशा ग्राहकाची असते त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले जाते.
इंजिनियर सोडून इतरांचा विचार कितपत केला जातो? उदा. बीएस्सी केमिस्ट्री वगैरे (काँप सायन्स नव्हे.)?
का नाही, आजकाल कंपन्या अगदी निमशहरी भागातून बीएस्सी वगैरे उचलतात. खाली हैद्राबादमधे तर कॉलेजच्या कॅम्पसवर तर ट्रक उभा असतो, ठेकेदार लायन लावुन पोरं घेतो. ;)
+१
सहमत. शिवाय 10+2+4 अशा स्वरुपाचे अंडरग्रॅज्युएट शिक्षण प्रामुख्याने इंजिनियरांचे असते. काही देशांमध्ये कॉलेज शिक्षणाच्या निकषात तीन वर्षाची पदवी पकडली जात नाही. तिथे चार किंवा अधिक वर्षांची पदवी आवश्यक असते. (पुढेमागे कंपनीला विजा करावा लागला तर अडचण येऊ शकते)
काही कंपन्या बीएससी वगैरेंना पकडून स्टायपेंड स्वरुपाचा पगार देऊन चारचार वर्षे फुल बिलिंग करत होते हे पाहिले आहे. (त्या बदल्यात बिट्स पिलानी येथून एम-एस करता येत असे.)
:)
लॉजिकल रिझनिंग, अनलिटीकल स्कील्स आणि कम्युनिकेशन स्किल्स इंजिनियरांकडे(च) असतात असा (गैर)समज हे सांगायचे कारण!
खरे कारण आयत्यावेळी असाईनमेंट कुठूनही कशीही मिळवून सबमिट करणार्या इंजिनिअर्सकडे, शेवटच्या क्षणी काहिहि करून कुठूनही छापून-आणून-ढापून -- प्रसंगी कस्टमरला 'थूक-पट्टी' लाऊन मागणीतच बदल घडवून-- डिलिव्हरेबल्स देण्याची क्षमता अधिक असावी :P
छोटासा प्रश्न
आजकालच्या एकंदरीतच चर्चा पाहता एक प्रश्न पडला तो विचारतो आहे. (हे विचारतानाच, या प्रश्नाचाही एखादा शंभरी धागा होईल की काय याची मात्र धास्ती वाटून राहीलीए!) आजकाल भारतातल्या लोकांना जरा जास्तच मोकळा वेळ दिसतोय, म्हणजे कामं थंडावली वगैरे आहेत का? (हे निरीक्षण व्हॉट्सअॅप, फेसबुक, संस्थळं इत्यांदीवर अवलंबून आहे, ऐसीवरल्या भारतातील लोकांनी लगेच चावायला येऊ नये.)
असणे वि. वाटणे
विदा द्या हो माय, गरीबाला विदा!
मागे एकदा आम्ही कोड बीड लिहून सविस्तर अभ्यास केलेला होता. * त्यानंतर झालेल्या रडारडीमुळे आम्ही पुढचे भाग लिहायचे टाळले. त्या अनुभवावरून आम्ही इथे निरीक्षण मांडलेले होते. तुम्ही उलट विदा दिलात तर आमचे विधान मागे घेऊ.
*आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्ही रिकामटेकडेच होतो. हे विधान पाहून 'सेल्फ फुलफिलींग प्रॉफसीचा' आनंद लोकांकडून हिरावून घेतल्याबद्दल आधीच माफी.
शिवसेनेच्या जाहिराती नी मुलाखती
शिवसेनेच्या काही जाहिराती पाहिल्या.
बहुतेक सर्वच पक्षांच्या जाहिराती दिसत असतात. या जाहिरात युद्धात नेमका मेसेज अतिशय मनस्वीपणे व बटबटीतपणा टाळून पोचवणार्या शिवसेनेच्या जाहिराती सर्वात प्रभावी वाटत आहेत.
====
एका मुलाखतीत आदित्य ठाकरेचे बोलणे किमान राहुल गांधींपेक्षा नक्कीच उजवे वाटले (आणि उद्धव ठाकरे, तसेचह गडकरी-फडणवीस यांच्यापेक्षाही ;) )
+१
+१
.
संपूर्ण प्रतिसादाला प्लस वन.
पण--
त्या जाहिरातींना मास्-अपील आहे का?
की फक्त खात्या पित्या वर्गातल्या लोकांनाच तो मेसेज वगैरे भावतोय ?
(जितकी आर्थिक परिस्थिती वाईट तितके आवडीनिवडीतले साटल्य कमी होत जाते.
सादरीकरण लाउड्/भडक्क करणे आवश्यक ठरते; असा माझा अंदाज.(माझ्या समजात दुरुस्ती केल्यास आभारी असेन.))
उदा :-
अभिजात संगीत विरुद्ध लोकसंगीत. (एकमेकांशी निगडितच आहेत, पण बाज वेगळा.)
मृदुंग विरुद्ध ढोलकी.
.
.
ह्यात मला डावं-उजवं काहिच म्हणायचं नाहिये, पण दोन वर्गांच्या आवडीनिवडी,प्राधान्य वेगळी आहेत असे मात्र वाटते.
वंगीय ठाऊक नाही, पण जळगावकडे
वंगीय ठाऊक नाही, पण जळगावकडे "ळ" चा "ड" केला जातो याचा बराच अनुभव आहे. माझा एक मित्र गूगल chat वर सुद्धा "e mudya chal re khedayla" असे लिहित असे. त्याने "जडगाव" च्या "शाडे"तून १०वी पर्यंत शिक्षण केले आणि मग तो पुण्याला आला… आपल्या ज्ञानात एका व्यंजनाची कमतरता आहे असे त्याला कधीच वाटले नाही. :)
+१-१
पाटिल म्हणजे लेवा पाटिल असावा.
माझे धुळे-जळगाव पट्ट्यातले दोन चार लेवापाटिल दोस्त असा घोळ(घोड!) करताना/करताडा पाहिले/पाहिडे आहेत ;) .
लेवा पाटिल लोकं धुळे जळगावात आहेत. तसेच धु़ळे-जळगाव (धुडे-जडगाव ;) )ला लागून जो गुजरातचा भाग आहे; तिथेही आहेत.
(थोडक्यात गुजरात लागून असलेल्या महाराष्ट्रात व महाराश्ट्राला लागून असेलेल्या गुजरातेत ते आहेत.)
ह्यांच्याकडे भरित चांगले मिळायचे वांग्याचे.
बहुतेक पाटिदार,पटेल, बारहाते आडनाववाले पण काही काही लोक लेवा पाटिल असतात.
वल्लभभाई पटेल जयंतीला ह्यांच्याकडे रक्तदान शिबिरं वगैरे भरतात.
वल्लभभाई गुजरातमधील लेवापाटिल असावेत.
(आता बोंबला मनोबा मित्रांची जात काढतो म्हणून)
तसा तो रुक्ष प्रदेश… तिथल्या
तसा तो रुक्ष प्रदेश… तिथल्या मराठीला अहिराणी ठेका आहे अजूनही… माझे आजोबा मस्त अहिराणी बोलायचे…
आत्ता विकी धुंडाळली असता बहिणाबाई चौधरींचा जन्म जळगाव जिल्ह्यातला आहे असे कळले. अजून प्रसिद्ध व्यक्तींपैकी स्मिता पाटील यांचे आईवडील धुळ्याच्या उत्तरेकडील शिरपूर चे… तसंच, अझिम प्रेमजी यांच्या विप्रो / डालडा ची मुळं खानदेशातल्या अमळनेर मध्ये सापडतात.
इथे अमेरिकेत New York राज्याच्या उत्तरेकडील भागाला "upstate" म्हणतात… महाराष्ट्राचा "upstate" म्हणजे खानदेश… पण पावसाच्या किंवा उत्तम निसर्गसौन्दर्याच्या अपेक्षेने तिथे जाणार असाल तर डायरेक्ट सातपुड्यावर जावे लागेल… तोरणमाळ… अन्यथा निराशा होईल…
समकालीन संदर्भ ;-)
>> मोर्या म्हणजे मोरारजी देसाई.
मात्र संदर्भाबाबत खात्री नाही. बहुधा गुजरात आणि महाराष्ट्र अश्या संयुक्त राज्यनिर्मितीसंदर्भात मराठी म्हणजे कोण असे सांगण्याचा प्रयत्न असावा.
बरोबर. मोरारजी देसाई ह्यांचं मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कर्तृत्व कुप्रसिद्ध आहे. मुंबई महाराष्ट्राला न देऊ इच्छिणाऱ्या एका गुजराथी माणसाला हरामखोर म्हणत 'मराठी म्हणजे काय' ते अत्रे सुनवत आहेत असा संदर्भ आहे. आताच्या तापलेल्या वातावरणात हे जुनं चित्र का फिरत असेल त्याचा अंदाज सूज्ञांना येईलच.
फिरवाफिरवी
>> हे चित्र कुठे फिरतेय?
मला तर केवळ तुम्हीच दिसलात हे चित्र फिरवताना!
मला हे एका इमेल फॉरवर्डमध्ये आलं होतं. 'मीम्स'ची ही वर्तुळं तुमच्या परिचयाच्या वर्तुळांनुसार बदलत असावीत. उदा : मला जहाल हिंदुत्ववादी काहीच येत नाही; पण ते पाहायची मलाच हौस असल्यामुळे मी ते मुद्दाम शोधतो. मात्र, जहाल हिंदुत्ववादी मला काही येत नाही म्हणून ते अस्तित्वातच नाही असा आरोप मात्र मी करू धजत नाही ;-)
मोर्या कोण?
मोर्या म्हणजे मोरारजी असे मलाहि प्रारंभी वाटले होते पण चित्र पाहून असेहि जाणवले की अत्र्यांच्या मागे ढग दाखविले आहेत आणि ते वरून खालच्या दिशेने बोलत आहेत. ह्याचा अर्थ अत्रे स्वर्गामधून बोलत आहेत असा वाटतो. हे जर खरे असेल तर मोर्या म्हणजे मोरारजी ह्याच्याशी तो जुळत नाही कारण मोरारजीवर अत्रे टीका करीत तेव्हा दोघेहि हयात होते.
सदानंद मोरे किंवा अन्य कोणी 'मोर्या'ने असे काही लिहिले आहे काय की ज्यामधून ही प्रतिक्रिया उत्पन्न होऊ शकते? अन्यथा वाइरकरांनाच विचारावे.
सुशेग
उत्तर सदस्य कोल्हटकर यांनी दिलेलेच आहे. माझी थोडी गंमत.
"सुशेगाद" व्यक्तीपाशी "सुशेग" (निवांतपणा, आराम) ही भावना असते. त्यामुळे मला लहानपणी वाटे की शब्द "सुशेगात" असा असावा (आरामात, निवांतपणात), आणि सु-शेग असा म्हणजे चांगला-शेग असा मूळ शब्द असावा, आणि "शेग" म्हणजे "स्थिती" अर्थाचा कोणतातरी तद्भव शब्द असावा.
(कारकून मोठ्या सुशेगात=आरामात/बिगरघाईत बसलेला आहे.)
अर्थात "सुशेग" (sossego) आणि "सुशेगाद" (त्या नामाशी संबंधित क्रियापद sossegar चे भूतकालवाचक धातुसाधित रूप sossegado) हे पोर्तुगीझ-उद्भव शब्द आहेत, ते नंतर कळले.
सुशेगाद
'सुशेगाद' हा Sossegado ह्या पोर्तुगीज शब्दाचा गोव्यापुरता अपभ्रंश आहे. ह्याचा अर्थ 'निबांत, घाईगर्दीशिवाय, आरामसे' असा आहे.
'Sossegado' चे अन्य समानार्थी शब्द ameno, brando, calmo, comedido, cómodo, delicado, descansado, despreocupado, imperturbado, pacífico, remansado, repousado, sereno, suave, tranquilo असे दाखविले आहेत. पोर्तुगीज भाषा न समजताहि त्यांचा अर्थ लक्षात येतो.
(मला पोर्तुगीज अगदी जुजबी समजते. वरील माहिती गूगलकृपेने आन्तरजालावरून संग्रहित केली आहे. एकदा काही वर्षांपूर्वी लिस्बनला - पोर्तुगीज उच्चार लिश्बांओ - गेलो असता 'सुशेगाद' शब्द वापरण्याचा प्रयत्न केला पण स्थानिकांना त्यातून काहीच अर्थबोध झाला नाही असे लक्षात आले.)
माझ्या आठवणीप्रमाणे सराफ नी
माझ्या आठवणीप्रमाणे सराफ नी सोनारात एक व्यापारी आणि दुसरा कारागिर/कलाकार असा भेद असावा.
त्यामुळे त्यासाठी दिलेली इतर उदाहरणे समांतर/योग्य नाहित
-- कॉब्लर म्हणजे जोडे रिपेअर करणारा, तर शुमेकर नवे जोडे बनवणारा - आपल्याकडे चांभार हे दोन्ही करतो
-- विककर कापड विणतो तर शिंंपी ते शिवतो
सराफ/श्रॉफ
सराफ हा मूळ अरेबिक शब्द आहे, money changer हा अर्थ - http://en.m.wiktionary.org/wiki/saraf
अधिकृत सरकारी सोय होण्याआधी सोन्याचांदीचे दुकानदार हे काम करत असत, म्हणून कदाचित त्यांच्या पेढीला हा शब्द रूढ झाला असावा. अगदी तुर्कस्थानातल्या एका छोट्या गावी एका ज्वेलर्स शॉपमध्ये चलन बदलून घेत असताना दुकानाच्या पाटीवर हा शब्द पाहिल्याचं आठवतं.
(श्रॉफ हे त्याचेच 'बंदोपाध्याय-बॅनर्जी'सारखे विंग्रजीकरण आहे. बहुतांश श्रॉफ उपनामधारक हे गुजराती भाषक असले तरी (उदा. उदगीरचा जॅकी श्रॉफ), तरी सिंधी भाषकांतही हे आडनाव आहे. सराफ आजवर कोकणी (अशोकमामा) आणि मारवाडी (पश्चिम रेल्वेवरच्या अनेक स्थानकांत बाकड्यांची व पाणपोईची सोय केलेले) भाषकांत पाहिले आहे.)
मला हा प्रश्न नेहमी पडतो -
मला हा प्रश्न नेहमी पडतो - की पक्षांना कसं कळतं की आपण त्यांच्याकडे पहात आहोत म्हणजे त्यांना कुठे माहीत असतं की "डोळे बघू शकतात" तरी आपली पाठ असेल तर पक्षी नि:शंक असतात पण जरा त्यांच्याकडे पाहीलं की सावध होतात :) कळलं ना मला काय म्हणायचय ते?
ही अंतप्रेरणा (इन्स्टिन्क्ट)/ अनुभव असावा की काय?
होय
> ही अंतप्रेरणा (इन्स्टिन्क्ट)/ अनुभव असावा की काय?
होय. ("अंतःप्रेरणा" म्हणजे "उपजत प्रक्रिया" असा अर्थ घेतला आहे.)
> त्यांना कुठे माहीत असतं की "डोळे बघू शकतात"
?
"अन्य प्राणिमात्रावरचे मोजके गडद ठिपके आणि बघणे-दिसणे यांचा संबंध असतो" अशी उपजत जाणीव बर्याच प्राण्यापक्ष्यांत असावी. त्यामुळेच तर काही फुलपाखरांच्या पंखावरील एखाददोनच गडद ठिपके म्हणजे "डोळे" वाटून ती फुलपाखरे खाल्ली जात नाहीत. (मोठाले डोळे असलेला कोणी प्राणी - बहुधा मोठा प्राणी - आपल्याकडे पाहात आहे. त्याच्याजवळ जाऊन त्याला खाण्यापेक्षा दूर गेलेले बरे...)
ख्रिस्त
खिस्त एक वर्षाचा झाला तेव्हा इ स एक होते असे समजू. (ख्रिस्त जन्म = इ स शून्य असे समजू).
म्हणजे ख्रिस्त तीस वर्षाचा होउन खिळला गेला तेव्हा सुरु होते इ स ३०.
ख्रिस्ताची ९९वी पुण्यतिथी होती इ स ९९ ह्या वर्षी.
म्हणजे १ ते ९९ ही वर्षे कोणते शतक होती ?
पहिले शतक. बरोबर ?
खिस्ताची १०१वी पुण्यतिथी आणि १९९वी पुण्यतिथी पहिल्या शतकानंतर जे शतक येते त्यात;
म्हणजे दुसर्या शतकात जाते.
आता समजलं असावं अशी आशा करतो.
मैत्री
आधी कागदाशी मैत्री जुळवावी लागते. ;-)