खास लकबी
संवाद साधण्याच्या काहि लोकांच्या खास लकबी असतात..
एम आय डी सी ला अस्ताना आमचा एक मित्र होता एखादी चर्चा असली व त्याने त्या विषयावर तोंड उघडले कि आधि
"मला एक समजत" अशी सुरवात केल्याशिवाय तो पुढे बोलायला सुरवात करत नसे..
तर एक यु पी वाला होता तो "वो क्या है न जी" अशी सुरवात करित असे.
काहि लोकाना " मी काय बोलतो ते लक्षात येते ना" म्हणायची सवय असते..्
तर काहि लोक्स २ पेग पोटात गेले कि फाड्फाड कोकाटे ईंग्लिश बोलु लागतात....
शेवटी व्यक्ति तितक्या प्रक्रुति
प्रतिक्रिया
खास लकबी
आवडले.
कापूसकोन्ड्या
माझी एक मैत्रीण काही समजाउन
माझी एक मैत्रीण काही समजाऊन सांगितल की हात उलटापालटा करुन तीनदा अच्छा अच्छा अच्छा म्हणायची.
लिहीण्याची एक वेगळीच पद्धतदेखील एकीची होती. शक्यतो अंगठा तर्जनी मधे पेन पकडायचे आणि मधले बोट खाली सपोर्टला असते. त्याऐवजी अंगठा आणि मधल्या बोटात पेन आणि वरुन तर्जनीने दाब दिलेला... वेगळच वाटलेलं ते पहायला...
Taking the second point first
आमच्या एका मित्राला काहीहि बोलतांना अशी सुरुवात करण्याची सवय होती, "I have to mention two points here. Taking the second point first..."
अनेकदा हे ऐकून आमच्या विनोदी मित्राने त्याला अडविले आणि विचारले, "This time for a change why don't you take the first point first?"
आपण होय ला मान वर खाली हलवतो
आपण होय ला मान वर खाली हलवतो अन नाही ला साईडवेज. हेच मुळी अनेक पाश्चात्यांना विनोदी वाटतं
होय म्हणताना मान व्हर्टिकल
होय म्हणताना मान व्हर्टिकल अॅक्सिसभोवती ३०-४० अंशातून फिरवणे ही लकबही खास भारतीय म्हणता यावी. त्यासाठी मान वर खाली हलवणे ही लकब भारतीय आहे का? साशंक आहे जरा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अरे आपण हो कसं म्हणतो तोंडात
अरे आपण हो कसं म्हणतो तोंडात घास असेल तर? मुंडी हलवतो ना?
शी हा मुंडी शब्द गावठी वाटतो
ओक्के. बाकी गावठीपणाचा
ओक्के. बाकी गावठीपणाचा तिरस्कार हेही एक खास भारतीय लक्षण असावे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गावाचा/गावाकडील गोष्टींचा
गावाचा/गावाकडील गोष्टींचा नाही हो पंतोजी. गावठाण/ठीपणाचा तिरस्कार!!!
मग मीही तेच तर म्हणालो! तो
मग मीही तेच तर म्हणालो! तो तिरस्कार हे खास भारतीयांचे वैशिष्ट्य असावे. वरणभाताला शिव्या घालणारे शेवटी तिथवरच येतात.असो, अवांतर होईल म्हणून थांबतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुला काय बोलायचय अजीबात
तुला काय बोलायचय अजीबात कळलेलं नाही. कोणाला वरणभाता आवडत नाही? मला बुवा खूप आवडतो. अन तिरस्कार करण्याइतकं कोणी किंवा काही मला तरी अजून महत्त्वाचं वाटलेलं नाही. उगाच वादाकरता वाद झालं.
असो. अवांतरभयास्तव थांबतो.
असो. अवांतरभयास्तव थांबतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अजून दोन
उत्तर कोकणातल्या बर्याच पुरूषांना (स्त्रियांमध्ये दिसत नाही हे प्रमाण जास्त) कोणतंही प्रतिपादन करून झाल्यानंतर शेवटी "काय समजलेंत?" असं (लें सानुनासिक)विचारायची सवय असते....
गोवेकरांना अशाच अर्थाने "कळ्ळें?" असं विचारायची सवय असते. आपण त्यावर जर का 'नाही' म्हणालो तर मात्र, "अँक! अशें कितें करतां? साऽऽमको मारें तू!!!" हे वर नक्की ठेवलेलं!!!!