आर्थिक

अतिशय उत्तम आणि समतोल अर्थशास्त्रीय लेख

https://www.loksatta.com/vishesh/poverty-rise-in-india-poverty-crisis-in...

वरील लेखाने मी फारच प्रभावित झालो. इतके दर्जेदार अर्थशास्त्रीय विश्लेषण आणि धोरणविषयक लिखाण मराठी वृत्तपत्रांत तरी दुर्मिळच आहे.

दै. लोकसत्तेच्या रविवार विशेषांकात आलेला हा लेख आपण वाचला नसल्यास जरूर वाचावा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बखर....कोरोनाची (भाग ८)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस. 

मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही. 

आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून !

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बखर....कोरोनाची (भाग ७)

इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर? बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना? चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात.

करोना साथीचे मध्यम वर्गावरील परिणाम

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे विविध समाजगटांवर आणि व्यवसायांवर होणारे परिणाम यांचा अनेक लोक अभ्यास करत आहेत आणि करोनोत्तर जगात काय बदल होतील याचाही अंदाज करण्याचा प्रयत्न चालू आहेत. मध्यमवर्गीयांची आयुष्यातली गृहीतके आणि त्यात करोना मुळे होत असलेले बदल काय आहेत?

चीन सरकार अनुदान देते का?

१६ जून २०२० पासून चीनवर एक मोठीच आफत ओढवलेली आहे.

२०१६ साली युरोपिय संघाने चीनविरूध्द दावा दाखल केला होता. संघाचे असे म्हणणे होते की, चीन त्यांच्या उत्पादकांना खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देतो. त्यामुळे युरोपियन संघामधे किंमत पाडून माल विकणे चीनला जमते. त्यामुळे इथले उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढतीय. उद्योग बंद पडल्यावर चिन किंमती वाढवायला सुरवात करतो हेही तोपर्यंत लक्षात आलेले होते. खरेतर हे आरोप चीनवर गेली दोन दशके होत आहेत. पण योग्य व अधिकृत उपाय सापडत नव्हता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कोविड काळातली निरीक्षणं, अनुभव (भाग २)

WFH

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात टाळेबंदी घोषित झाली आणि घराघरांमध्ये उलथापालथ झाली. सकाळी उठून डबा घेऊन नोकरीवर/शाळेला जाणे अचानक बंद झाले. घरातील सगळे सदस्य २४ तास घरात राहू लागले. याचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम झाला.

पत्रकारांच्या नोकऱ्या जाताहेत

गेल्या तीन महिन्यांत दैनिकांची छपाईच बंद झाली, त्यामुळे खप नाही, जाहिराती नाहीत आणि उत्पन्न नाही म्हणून खर्च कमी करा हे धोरण राबवले जात आहे. लॉकडाउन संपल्यावर ताबडतोब दैनिकांचे उत्पन्न पुन्हा मूळपदावर येईल, अशी शक्यता नाही परंतु म्हणून अशी कत्तल करणे, हे मात्र माणुसकीला धरून नाही.

सरकारी खाक्या शेतकऱ्याच्या मुळावर...

सध्या पुणे, मुंबई आणि अन्य शहरांतून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. यातील एखादा जरी करोनाबाधित सापडला की सायरन वाजवत गाड्या गावात घुसतात. बाधिताला उचलतात आणि गावात येणारे सगळे रस्ते सील करतात. अख्ख्या गावाला घरात बसायला सांगितलं जातं. करोनावर ‘लॉकडाउन’ हा सरकारी उतारा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात असल्याने गावंच्या गावं जेरबंद होताहेत. खरीपाचे काउंटडाउन सुरू असताना असं घरात बसून राहणं शेतकऱ्यांना प्रचंड त्रासदायक ठरत आहे. अशा काळात योग्य नियोजन केलं नाही तर यंदाची शेतीही महापुरासारखी पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

तुम तो ठहरे स्वदेशी , अर्थात ‘साले आमची संपत्ती भारताबाहेर नेतात !

स्वदेशीच्या मुद्द्यावर चळवळी सुरु झाल्याला शंभरावर वर्षं झाली. तेव्हाचं एक ठीक होतं : कंपन्याही परदेशी होत्या, आणि त्यांना झुकतं माप घालणारं सरकारही त्यांचंच होतं. पण आजही “अरे स्वदेशी वापरा, स्वदेशी ! आपल्या देशाची संपत्ती ‘बाहेर’ जाऊ देऊ नका रे, बाबांनो !” अशा स्वरूपाचे, देशाभिमानाला आर्थिक फुंकर घालणारे नारे अधूनमधून ऐकू येतात. थोडा काळ चलनी नाण्याप्रमाणे खणखणतात; फेसबुक, वत्सापी फिरतात, आणि विरून जातात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - आर्थिक