जेएनयूमधली सभा, पुढची कारवाई, वगैरे...
जेएनयूमधल्या सभेचा हा व्हिडो फिरतो आहे. मजेशीर आहे. यात काय आक्षेपार्ह आहे समजत नाही.
New video from JNU. Theres no ABVP around. Just pure hatred by Rahul-Yechury-AAP backed anti-nationals. See & spread pic.twitter.com/eiFyNdRbre
— IBTL (@IndiaBTL) February 14, 2016
Taxonomy upgrade extras
कन्हैय्या कुमार ज्या सभेमध्ये
कन्हैय्या कुमार ज्या सभेमध्ये 'ते' स्लोगन्स दिले गेले त्याचा आयोजक असेल तर अल्टिमेटली जबाबदारी त्याची असेल. त्याने नंतर कितीही भावनेनी थबथबलेली तुपकट भाषणं केली तरी.
हे कम्युनिस्ट नेते, ए.राजा वगैरे आत्ता फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन वगैरे डिंग्या मारतायत. याच लोकांनी दोन महिन्यापूर्वी, बिजयंत पांडा नावाच्या बिजू जनता दलाच्या एका नेत्याविरुद्ध प्रिविलेज मोशन आणली होती. का तर त्याने राज्यसभा रिफॉर्म करावी असा विचार मांडून काही सजेशन दिली होती. सो ए.राजा वगैरेंच्या मताला माझ्या दृष्टीने काहीही किंमत नाही.
अजून एक, FOE बद्दल आत्ता अनेक लोक तावातावाने भांडतायत. महिन्याभरापूर्वी कमलेश तिवारी म्हणून एका हिंदूमहासाभेच्या माणसाने प्रेषित महंमदाबद्दल अपमानास्पद उद्गार काढले म्हणून उ.प्र सरकारने NSA खाली त्या माणसाला अटक केली आहे. त्याला फाशी द्या म्हणून उ.प्र. विधानसभा बंद पाडली होती लोकांनी. तेव्हा काहीही बोलले नाहीत हे लोक. याची वॉटबाउट्री वगैरे म्हणून संभावना करता येइल. पण सेलेक्टिव्ह आउट्राज/ किंवा सेलेक्टिव्ह चॅंपिअनिंग ऑफ FOE हे उघड आहे.
दोन महिन्यापूर्वी हेच लोक रामदेव बाबांचं भाषण हाणून पाडत होते. केवळ स्वतःच्या FOE बद्द्ल काळजी असलेल्या या लोकांबद्दल का कळवळा वाटावा?
( घोषणा दिल्याबद्दल सेडिशनचे आरोप लावावेत असं वाटत नाही. तो कायदाच नको असही वाटतं. सरकारने सेडिशन वगैरे लाऊन राजकीय सेल्फ गोल केला आहे असं नक्की वाटतं. पण या लोकांवर वेगळी कडक कारवाई नक्की व्हावी असं वाटतं.)
जाताजाता: JNU बद्द्ल हे एक अनमोल रत्न मिळालं.
"तेव्हा कुठे गेला होता
"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?"छाप कमेंटांना माझ्या लेखी काडीमात्र किंमत नाही. ज्यांना असले प्रश्न पडतात, त्यांनीच त्या त्या वेळी त्यांना जमेल त्या प्रकारे आवाज उठवायला हवा, कंत्राटं देणं शक्य नसतं, घेणंही, हे माझं ठाम मत आहे. त्यामुळे त्याबाबतच्या सगळ्या मतांकडे ठार दुर्लक्ष.
बाकी कंसातलं वाक्य माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आभार.
"तेव्हा कुठे गेला होता
"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?"छाप कमेंटांना माझ्या लेखी काडीमात्र किंमत नाही. ज्यांना असले प्रश्न पडतात, त्यांनीच त्या त्या वेळी त्यांना जमेल त्या प्रकारे आवाज उठवायला हवा, कंत्राटं देणं शक्य नसतं, घेणंही, हे माझं ठाम मत आहे. त्यामुळे त्याबाबतच्या सगळ्या मतांकडे ठार दुर्लक्ष.
म्हणूनच FOE बद्दल लोकांच्या उमाळ्यांबद्दल काहीही वाटत नाही. हे लोक फ्रॉड आहेत असा प्रचार मात्र करावासा वाटतो. यथाशक्ति करतो देखील.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे समर्थक त्यांना जिथे गळचेपी झालेली दिसते, तिथे बोलतात. अभिव्यक्तिस्वातंत्र्यसमर्थकांचे विरोधक अशी उदाहरणं हुडकून काढतात, जिथे अ०व्य०स्वा०समर्थक पोचलेले नाहीत. पण हे विरोधक स्वतः त्या काळोखात राहिलेल्या पीडितांसाठी बोलताना दिसतात का? नाही. त्यांचं प्राधान्य असतं अ०व्य०स्वा०समर्थकांच्या विरोधात प्रचार करण्याला. अशा वेळी कुणाचे प्राधान्यक्रम काय असतात आणि त्यामागचे हेतू काय असतात याचं अतिशय गमतीदार चित्र दिसतं.
कधीकधी खंत वाटते, बरेचदा गंमत. असो.
सभा जरी DSU ने आयोजित केलेली होती तरी
सभा जरी DSU ने आयोजित केलेली होती, त्यांच्या प्रायोजित कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाने अंतिम क्षणी परवानगी
नाकारली. आता प्रशासनाने परवानगी द्यावी म्हणून JNUSU, SFI आणि ASFI यांनी त्यांना समर्थन दाखवत कार्यक्रम चालू करू देण्याची मागणी प्रशासनाला केली आणि ती मान्य झाली.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा जो वर विडिओ आहे त्यात या संघटनांचे देखील विद्यार्थी आहेत. आता याउपर आणखी काय पाहिजे कन्हैयाची जबाबदारी सिद्ध करायला?
कुतूहल
>> ज्या सभेमध्ये 'ते' स्लोगन्स दिले गेले
>> या लोकांवर वेगळी कडक कारवाई नक्की व्हावी असं वाटतं
डावे, उजवे वगैरे ज्या कुणा लोकांना ह्या सगळ्याचं राजकारण करायचं आहे त्यांना तात्पुरतं दूर ठेवू. 'त्या' स्लोगन्सवर आणि 'त्या' लोकांवर कारवाई का व्हावी? आणि ती भारतीय दंड विधानातल्या नक्की कोणत्या कलमांच्या उल्लंघनासाठी?
घासु गुर्जींचा, इथला कुठला
घासु गुर्जींचा, इथला कुठला पॉईंट लागु होतोय का?
एकंदरीत जिथे जिथे व्यक्तीच्या अधिकारापेक्षा तो अधिकार बजावण्याने इतर समाजाला होणारं नुकसान प्रचंड मोठं असतं तिथे तो अधिकार लागू होत नाही. हे कायदे सर्व जगभर असतात.
काही विशिष्ट अभिव्यक्ती मर्यादित असतात - आणि त्याची रेषा वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी असते.
१. राष्ट्राच्या चिन्हांचा अपमान होऊ शकेल अशी अभिव्यक्ती.
२, लैंगिक अभिव्यक्ती
३. सिगरेट, दारू यांच्या जाहिराती.इतर अभिव्यक्तींवरची बंदी - या प्रकारच्या बंदी बऱ्यापैकी आर्बिट्ररी असतात.
१. अमुकतमुक केल्याने आमच्या भावना दुखावतात.
२. अमुकतमुक न केल्याने आमच्या भावना सुखावतात. (पर्यूषणकाळातली बीफबंदी)
भावनाओंको समझाओ
>> मी काही तुमच्यासारखा कायदेतज्ञ नाही. पण त्या घोषणा देणार्यांना शिक्षा व्हावी असं वाटतं खरं. IPC द्वारे नाही तर विद्यापिठाच्या नियमांतर्गत तरी.
कायदेतज्ज्ञ असण्याचा माझा दावा नाही. मी फक्त तुमच्या भावना / तर्क समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण 'असं मला वाटतं' ह्यापेक्षा अधिक तपशीलात तुम्ही त्या जोवर व्यक्त करत नाहीत तोवर माझ्या आकलनातल्या पोकळ्या भरणार नाहीत.
कायद्याचं कुठलं कलम हा तपशील
कायद्याचं कुठलं कलम हा तपशील म्हणाल तर तो माझ्याकडे नाही हे वर म्हटलं आहेच. पण त्या घोषणा भडकाऊ होत्या. (वर शेअर केलेला व्हिडो खरा आहे हे गृहितक.) हिंसक कृत्य करणार्यांना प्रेरणा देतील अशा होत्या. ते लोक उद्या लगेच बंदुका घेऊन रस्त्यावर उतरतील असं नाही. पण हे त्यादिशेच पाऊल आहे असं वाटतं.
भारत सरकारने फंड केलेल्या विद्यापिठात शिकून यादेशाचे तुकडे होवोत ही इच्छा करणं. हा शुद्ध कृतघ्नपणा आहे हेही वाटतं. याबद्दल कोडतात नाही पण विद्यापिठाच्या नियमांत कारवाई व्हावी. बाबारे असेल एवढं अत्याचारी सरकार\देश का मग त्यांच्या विद्यापिठात शिकता? (हा मुद्दा इंग्रज आणि त्यांच्या देशात शिकलेले स्वातंत्र्य योद्धे यांना लागू पडतो का? मेबी हो.)
अनैसर्गिक आशावाद
इथे म्हटल्याप्रमाणे अशी भावना अनेक काश्मिरींची असू शकते. त्यातूनच उद्धृत -
परंतु भारत सरकारच्या सर्व सवलती आदी ओरपून पाकिस्तान िझदाबादच्या घोषणा देणे हे पूर्णत: असमर्थनीय. ही कृती निश्चितच अविवेकी. परंतु समंजसदेखील अविवेकी असणाऱ्या समाजात तरुणांकडून विवेकाची अपेक्षा बाळगणे हा अनैसर्गिक आशावाद ठरतो.
परंतु या विद्यार्थ्यांच्या अविवेकी, अतिरेकी कृतीस सरकारने दिलेला प्रतिसाददेखील तितकाच अविवेकी आणि अतिरेकी ठरतो. जेएनयूत जे काही घडले ती फार फार तर विद्यापीठ कुलगुरूंची डोकेदुखी ठरते.
ह्या विचाराशी तुम्ही सहमत आहात का?
कश्मिरचं स्वातंत्र्य
कश्मिरचं स्वातंत्र्य लेजिटिमेट मागणी आहेच. ती समजून घेण्याची मॅचुरिटी अजून तरी लोकांच्यात नाही हे मान्य. पण त्यासाठी इतर प्रांतांना वेगळं होण्यासाठी भडकावणं हे काये? (केरल मांगे आझादी वगैरे घोषणा होत्या तिथे)
"विद्यार्थी अविवेकी होते, जाऊ द्या" हे विवेचन मला तरी पटत नाही.
सरकारची कृती अविवेकी आहे हे वरच मान्य केलेलं आहे. ( राजकीय सेल्फ गोल देखील आहे.) विद्यापिठाने तरी कारवाई केली पाहिजे. (नक्की काय ते माहित नाही.)
विडीयोबद्दल आभार! जर हा
विडीयोबद्दल आभार!
जर हा विडीयो खरा असेल तर अशा घोषणा देणार्या नागरीकांवर भादंविनुसार देशद्राहाखाली खटला दाखल करणे का गैर आहे हे समजले नाही.
बहुतांश देशात देशाच्या विघटनाच्या खुल्या घोषणा देणे हा शासनातर्फे देशद्रोह (किमान देशद्राहास फूस लावण्याचा गुन्हा) समजला जातो असे वाटते. देशाची सीमा बदलण्याचा अधिकार घटनेने केवळ संसदेला दिला आहे. तुम्ही त्यात बदलाची मागणी घटनात्मक चौकटीत जरूर करू शकता पण तुकडे करण्याची भाषा कायद्याच्या दृष्टीने देशद्रोह ठरवता येईल असे वाटाते.
गैर की लागू?
>> अशा घोषणा देणार्या नागरीकांवर भादंविनुसार देशद्राहाखाली खटला दाखल करणे का गैर आहे हे समजले नाही.
ज्यांना हवं त्यांनी खुशाल नागरिकांना कोर्टात खेचावं, पण तसं करण्यात कायद्याचं ज्ञान दिसतं का, हा प्रश्न आहे. ह्या लेखानुसार (आणि असे विधितज्ज्ञांचे इतर ताजेशिळे लेखही सापडतील)
माझ्या मते ही कृती ठराविक
माझ्या मते ही कृती ठराविक व्यक्तींनी केली आहे आणि त्या घोषणेत म्हटलं आहे त्या दृष्टीने काहीतरी प्रत्यक्षात करण्याची त्यांची योजना होती इतकं पोलिस सिद्ध करु शकले तर किमान सेशन्स कोर्ट यास देशद्रोह ठरवेल!
अशा बाबतीत, पोलिसांकडे नक्की काय साक्षीपुरावे आहेत हे माहित नसताना त्यांनी दाखल केलेला गुन्हा लागू आहे की नाही सांगणे आततायी होईल!
खात्री
>> त्या घोषणेत म्हटलं आहे त्या दृष्टीने काहीतरी प्रत्यक्षात करण्याची त्यांची योजना होती इतकं पोलिस सिद्ध करु शकले तर
असं सिद्ध करण्याइतपत पुरावा सापडणार नाही. अरुंधती रॉय काही म्हणत असली तरीही ती घरी बॉम्ब किंवा मिसाईल वगैरे ठेवत नसणार ह्याविषयी मला जितपत खात्री आहे तितपत खात्री जेएनयूमधल्या विद्यार्थ्यांबद्दलही आहे. :-)
मुळात सरकार हे एका राजकीय
मुळात सरकार हे एका राजकीय पक्षाचे असते. व ते टिकून रहाण्यासाठी आपल्या मतदारांकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही सरकारला परवडणारे नाही.
अशावेळी हा खटला या कलमांतर्गत दाखल करणे हा सुयोग्य राजकीय निर्णय आहे असे मला वाटते.
१. गुन्हा दाखल केला म्हणजे सदर व्यक्ति देशद्रोही होत नाही. त्या गुन्ह्याची शहानिशा कोर्ट करेल तोवर स्वत: जज बनणेही तितकेच अयोग्य आहे.
२. हे एक राजकीय स्टेटमन्ट देखील आहे. ही केस कोर्टात किती टिकेल यापेक्षा (जेव्हा विडियो वेगाने मतदारांत पसरतो आहे) तेव्हा सरकार याला देशद्रोह मानते अशी भूमिका सल्वसामान्य मतदारांना दिलासा देणारी ठरू शकतो.
बाकी अफजल हा न्यायालायात गुन्हा सिद्ध झालेला गुन्हेगार होता हे लक्षात घेतलेले बरे
>>हो आणि ते सुद्धा
>>हो आणि ते सुद्धा मौनीबाबांच्या राज्यात.
हे बहुधा खरे नाही. त्याची केस २००४ पर्यंत पूर्ण झाली होती. २००५ मध्ये सुप्रीम कोर्टाने फायनल शिक्कामोर्तब केले.
The initial conviction and sentence was made by a special Prevention of Terrorism Act Court in 2002, which was confirmed in 2003 by the Delhi High Court. In 2005, his appeal was rejected by the Supreme Court of India
अवघड जागचं दुखणं
>> बाकी अफजल हा न्यायालायात गुन्हा सिद्ध झालेला गुन्हेगार होता हे लक्षात घेतलेले बरे
ते सर्व ठीकच, परंतु, १. अफझल काश्मिरी होता, २. काश्मीर हे भारताचं अवघड जागचं दुखणं आहे आणि (लोकसत्तेतल्या अग्रलेखातून उद्धृत) -
३. फासावर लटकावला आणि अफझल यास काश्मिरातील अनेकांच्या घरांतील िभतीवरच्या तसबिरीत स्थान मिळाले.
ही बाबही नाकारण्याजोगी नाहीच. त्यामुळे हे सर्व राजकारण आहे हे उघडच आहे आणि सर्व बाजू त्याचा जमेल तितका फायदा उठवू पाहात आहेत हेसुद्धा उघड आहे.
दृक्-श्राव्य माध्यम
>> जेएनयूमधल्या सभेचा हा व्हिडो फिरतो आहे. मजेशीर आहे. यात काय आक्षेपार्ह आहे समजत नाही.
एका शुद्ध, दृक्-श्राव्य माध्यमाच्या विश्लेषक वृत्तीनं पाहिलं तर ह्यात काय दिसतं?
- खूप कमी रिझोल्यूशनची प्रतिमा - त्यात कुणी तरी हात वर करून घोषणा देत असावं असा अंदाज फार तर करता येतो.
- प्रतिमा खूप दुरून घेतलेली असल्यामुळे कुणाचेही ओठ हलताना स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे जो साउंडट्रॅक ऐकू येतो आहे त्यानुसार ओठ हलत आहेत असं अजिबातच म्हणता येत नाही. हा साउंडट्रॅक पूर्णपणे वेगळा ध्वनिमुद्रित करून नंतर ह्या प्रतिमांवर टाकला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
- जे लोक घोषणा देत आहेत, ते विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपैकी कुणी आहेत की बाहेरून आलेले कुणी हेसुद्धा (चेहरे दिसत नाहीत त्यामुळे) ठरवणं कठीण आहे.
ह्या परिस्थितीत कोणत्याही अंगानं ह्या व्हिडिओची विश्वासार्हता तपासणं कठीण आहे. इंटरनेटवर काहीही फिरत असतं, आणि त्यावर विसंबून चुकीची माहिती प्रसारित करणं आणि भावना भडकावण्याचा प्रयत्न करणं गुन्हा आहे असं सायबर सेलचे लोक सारखं सांगत असतात. उदा हे पाहा :
Making false allegations against the character of a person or character assassination could also qualify as grossly offensive and having menacing character
Information containing malicious, mischievous character assassination
त्यामुळे अशा परिस्थितीत ह्या व्हिडिओवरून कोणते निष्कर्ष निष्पक्षपणे काढता येतील, ह्याचा विचार ऐसीकरांनी आपला आपण करावा आणि मगच आपलं मत ठरवावं.
या विषयाबद्दल मी वाचलेले काही लेख
१. मुकुल केशवन यांचा एक छोटा लेख. संघ परिवाराची विचारशैली कशी आहे ते कन्हैया कुमार कोण, याबद्दल छोटेखानी विचार; आणखी विस्ताराने लिहिला असता (निदान वेबसाईटसाठीतरी) तर बरं झालं असतं. पण तरीही -
The wicked uncle again
- Rajnath Singh versus Kanhaiya Kumar
लेखातले दोन परिच्छेद -
Kanhaiya is a PhD student. His home is Begusarai, in Bihar. His father is a partly paralyzed peasant, his mother is an anganwadi worker who earns Rs 4,000 a month. This is the poor, politically engaged young man that Rajnath Singh and Smriti Irani want us believe is India's Public Enemy No 1. As I write, the deputy commissioner of police (South) has recommended that his case be handed over to the Delhi Police's Anti-Terrorism Squad. An elected student leader has been charged with sedition and might be given over to the tender mercies of a notorious ATS because sloganeering students outraged nationalist sensibilities? Have we all gone mad?
What we are seeing in JNU and what we saw in the University of Hyderabad, is a textbook demonstration of the sangh parivar working as a joint family. The ABVP, looking for campus turf, complains to a BJP patron (in this case Maheish Girri, an MP) who has a word with the home minister or human resource development minister, who in turn visits retribution on the ABVP's rivals. In Hyderabad, this scheme was thwarted by Rohith Vemula's tragic suicide; this happy family has now gone fishing again, looking this time for live catch.
२. प्रताप मेहता हे सध्या 'सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च' या जगन्मान्य think-tankचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये या सर्व प्रकरणावर लेख लिहून त्यांचे मत व्यक्त केले आहे, ज्यात त्यांनी "anti-national" असणे म्हणजे आपोआप 'क्रिमिनल' असणे नव्हे असा मुद्दा मांडला आहे. (हे शब्द आणि दुवा शैलेन यांच्याकडून मिळाले.)
‘Modi govt threatened democracy; that is the most anti-national of all acts’
या लेखातला काही भाग -
The crackdown signals an utter lack of judgment in the government, where ministers manage to manufacture a national crisis out of what were always, at best, minor affectations in student politics. The ABVP’s constantly seeking government interference in university affairs on ideological grounds does not portend well for the future. It has even given all those not on the Left a reason to rally with the “Left.” JNU’s importance to national intellectual life had been waning; the BJP has just resurrected it. ... The BJP does not also understand one subtle point: that unless there is real and immediate violence involved, a democracy that cuts “anti-nationals” some slack is a robust democracy. For the fact that even people who push the boundaries of expression are safe makes us all feel safe.
३. कायदाभ्यासक आणि वकील लॉरेन्स लियांग यांनी मेहतांच्या मताला पुष्टी देणारा लेख लिहिला आहे.
Sedition and the Status of Subversive Speech in India
हा त्या लेखातला शेवटचा परिच्छेद -
It is abundantly clear that freedom of speech and expression within the Indian legal tradition includes within its ambit any form of criticism, dissent and protest. It cannot be held hostage to narrow ideas of what constitutes “anti national” speech and we hope that the courts will step in not merely to defend free speech but also pass strictures on those who abuse the legal process to create a chilling effect on constitutional rights. This is particularly important in the context of the ongoing case against the students of Jawaharlal Nehru University because if free speech and thought is curtailed within universities, we run the risk of endangering one of the most crucial spaces of political freedom in the country.
५. हा लेख उजव्या किंवा डाव्या कोणत्याही विचारधारेला न मानणाऱ्याकडून मिळाला. लेखाचा दुवा देणाऱ्याला मोदी किंवा काँग्रेस कोणाबद्दलही फार प्रेम नाही असा माझा समज आहे.
मोहनदास पै यांचा लेख. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आणि प/. बंगालमधली विद्यापीठं डाव्यांच्या पंखाखाली गेली आहेत; त्यातून वाताहत झालेली आहे (कशी ते लिहिलेलं नाही; वाचायला आवडेल.) अशी साधारण लेखाची सुरुवात.
Dear JNU Students, We Fund Your Studies, Not Your Politics
मध्येच हा परिच्छेदही येतो -
Prodded by an enraged public opinion offended by the anti-national slogans, the government's response has been unduly harsh, slapping sedition charges on students, arresting the student union leader and sending the police into the campus.
.
.
.
One would have hoped that the government would be more magnanimous, allowing the university to enquire and take any disciplinary action, rather than wading in and arresting students, thereby escalating this conflict. Such arrests are worrisome because we do not want any government to intrude on our freedom of speech or our freedom of association even when people have "extreme" views - so long as there is no violence or a call to violence.
बराच वेळ विद्यापीठं, त्यातलं राजकारण, देशद्रोहाचा गुन्हा, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांबद्दल बोलून अचानक पै फी-सबिसड्या यांच्या अर्थकारण-राजकारणावर कसे उतरतात कोण जाणे! आणि लेखाचं शीर्षकही त्याच ५० शब्दांमधून उचललेलं.
सब्सिडाईझ्ड एज्युकेशन
इथे झी टीव्हीचे पत्रकार रोहित सरदाना यांनी असा मुद्दा उपस्थित केलाय की जे-एन-यु मधे जे विद्यार्थी जातात त्यांच्या शिक्षणाचा खर्च करदात्यांनी सब्सिडाईझ्ड केलेला असतो. व म्हणून या विद्यार्थ्यांनी या देशाच्या संविधानास व कायद्याच्या राज्यास आव्हान देणारे कारनामे करू नयेत. परवा अरणब गोस्वामी यांनी पण असाच मुद्दा उपस्थित केलेला होता. इथे. की भारतीय टॅक्सपेयर ने सब्सिडाईझ्ड केलेले शिक्षण घेत आहात व भारताच्या बरबादीच्या गोष्टी करता ? या धाग्याचा मूळ व प्रमुख मुद्दा करदात्यांनी सब्सिडाईझ्ड केलेले शिक्षण याबद्दलचा नाही. धागाकर्त्याला तसे अभिप्रेत नसावे असा माझा कयास आहे. पण ओमर, लेनिन, इशान यांच्या तीर्थरूपांनी असाच कर दिलेला नाही का ? कराची जी गंगाजळी आहे त्यात या तिघांच्या तीर्थरूपांचे कोणतेही योगदान नाही का ? जसे इतर करदाते आहेत तसेच या तिघांचे तीर्थरूप नाहीत का ? ( या उप्पर कोणी असे म्हणणार का की त्यां तिघांच्या तीर्थरूपांनी दिलेला टोटल कर हा इतरांनी दिलेल्या टोटल कराच्या तुलनेत खूप कमी आहे व म्हणून इतरांना या तिघांची अभिव्यक्ती प्रतिबंधित करण्याचा अधिकार मिळतो ?)
----
विद्यापीठ व अभिव्यक्ती - याबद्दल अमेरिकेत पण विवाद चालू आहेत. इथे, आणि इथे.
कर, शिष्यवृत्ती,
कर, शिष्यवृत्ती, विद्यावृत्ती, सबसिडी यांबद्दल काही बरं लेखन वाचलं आहे का? गब्बरच नाही, इतरही कोणी?
शिष्यवृत्ती, विद्यावृत्ती, सबसिडी या गोष्टी विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी दिल्या जातात. विद्यार्थी/शिक्षकांनी आपापलं काम केल्यावर उरलेला वेळ कोणता चित्रपट बघितला, कोणाचं भाषण ऐकलं किंवा काय बोलले या विषयांत इतरांचा संबंध काय? हे सगळे विद्यार्थी, शिक्षक १८ वर्षांच्या वरचे असल्यास इतरांना त्यांच्याबद्दल बोलण्याचा हक्क असतो; (हो, नाहीतर पुन्हा देशद्रोह, अभिव्यक्तीस्वातंत्र्य सुरू होईल) पण ती वायफळ बडबड का समजू नये?
---
वरच्या लिंकेतला झी न्यूजचा व्हीडीओ बघितला. एक मिनीटाआधी विद्यार्थी प्रतिनिधीने म्हटलंय, "मला दोन मिनीटं द्या स्पष्टीकरण देण्यासाठी." त्यावर तो रोहित सरदाना का कोण जो अँकर आहे तो आरडाओरडा करून विद्यार्थी प्रतिनिधीला विचारतोय, "ब्ला, ब्ला, ब्ला .... आप पढालिखा कहते है अपने आप को".
हं... हे करदाते; हे शिकलेले लोक; हे पत्रकार आणि यांना ठरवायचंय यांच्या पैशांनी कोणी राजकारण करावं किंवा नाही!
---
फेसबुकवर ही कविता सापडली.
सांचिया डिसूझा असं लेखिकेचं नाव समजलं.
Sedition
Section 124A in The Indian Penal Code
101 [124A. Sedition.—Whoever, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards, 102 [***] the Government established by law in 103 [India], [***] shall be punished with 104 [imprisonment for life], to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine. Explanation 1.—The expression “disaffection” includes disloyalty and all feelings of enmity. Explanation 2.—Comments expressing disapprobation of the measures of the Government with a view to obtain their alteration by lawful means, without exciting or attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section. Explanation 3.—Comments expressing disapprobation of the administrative or other action of the Government without exciting or attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section.]
सर्वप्रथम लांबलचक
सर्वप्रथम लांबलचक प्रतिसादाबद्दल क्षमस्व !
०९-१० फेब्रुवारीला घडलेल्या जेएनयूतील घटनेवर ऐसीवर इतक्या लवकर धागा निघेल असे वाटले नव्हते.(धागाकर्त्याबददल माझा काहीही वैयक्तिक आक्षेप/आकस नाही हे नम्रपणे नमूद करतो).अपेक्षेप्रमाणेच धाग्यावरील प्रतिक्रियांचा रोख जेएनयूत घडले ते कितपत निषेधार्ह/स्वीकारार्ह आहे यापेक्षा त्यावरची सरकारने केलेली कारवाई कितपत योग्य आहे याकडे आहे, याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही.
जेएनयूबाबत असे काही वादग्रस्त प्रकरण उपजेल असे मला गेला काही काळ वाटत होते. तसे मी येथे लिहिलेही होते. पांचजन्यच्या त्या लेखाप्रमाणे जेएनयूत चालत आलेले प्रकार ही आजवर एक 'झाकली मूठ' होती. परंतु आता प्रत्यक्ष विडीओच समोर आल्याने काही बुद्धिमंतांना आता याविषयावर मीडीयात नाईलाजाने चर्चा करणे भाग पडते आहे
काही बाहेरच्या लोकांनी घुसखोरी केली किंवा देशविरोधी प्रचार गेल्या काही दिवसातलाच आहे , विद्यार्थी मूळचे निरागस आहेत वगैरे कारणे तकलादू वाटतात. 'भारत की बरबादी तक...' किंवा 'बंदूक के दमपर लेंगे आझादी' वगैरे घातक घोषणा द्यायला शिस्तबद्ध, सततचे असे ब्रेनवाशिंग अधिक क्रीमिनल इंटेटची मशागत केलेली असणे आवश्यक असते. .तरीही या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अनेक विचारवंत (निदान मराठी)लोक जास्त बोलत नाहीयेत असे वाटले. राहुल गांधींकडून ती अपेक्षा नाही. सरकारने देशद्रोहाचे गुन्हे दाखल केल्याने स्वत:ची पंचाईत करून घेतली आहे असे काहींचे मत आहे. पण मला उलट वाटते, राहुल गांधींनी अतिरिक्त घाई केल्याने उलट कॉंग्रेस प्रवक्त्यांची पंचाईत करून ठेवली आहे. कारण सरकारने केलेली कारवाई ही आधी त्यांची संवैधानिक/कायदेशीर जबाबदारी आहेत (राजकीय भूमिकाही असेल पण ती सेकंडरी आहे) याउलट राहुल गांधींची भूमिका तद्दन राजकीय आहे. हे राजकीय तारतम्य असल्यामुळेच की काय शरद पवार, मुलायम, ममता बॅनर्जी, मायावती इत्यादींनी सावध पवित्रा घेतलेला दिसतो. नितिश यांच्या पक्षानेही काल भूमिका मवाळ केली. असो.
लोकसत्ताच्या कालच्या 'अर्धवट' अग्रलेखाने काहींना थोडा हुरूप आलेला दिसतो. लोकसत्ता व इंडियन एक्स्प्रेसवर अशी भूमिका घेण्यासाठी कुठल्या प्रकारचा आर्थिक/वैचारिक/राजकीय दबाव आहे हे कळत नाही. की आपण किती बुद्धिमंत आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याचा गंड आहे? निदान लोकसत्तबाबत तरी तसे वाटते. एक्स्प्रेसबाबात संशय येण्याचे कारण म्हणजे गेली काही वर्षे एक्स्प्रेसने घेतलेली भूमिका. विशेषत: जनरल वि.के.सिंग स्थलसेनाप्रमुख असताना त्यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केल्याची पुडी सोडण्यापासून हे प्रकार वाढले ते 'अॅंड दे हॅन्गड याकूब' पर्यंत. एक्स्प्रेससारख्या वैचारिक, विश्वासार्ह पत्राचे माध्यम वापरून कोणीतरी पडद्याआडून आपला दुसराच लॉन्गटर्म अजेंडा राबवत आहे अशी शंका येत राहते.
शेवटचा मुद्दा म्हणजे गेले काही दिवस नक्षल-माओवाद्यांच्या शहरी भागातील घुसखोरीबद्दल चर्चा चालू आहे. जेएनयूतील प्रकरण त्याचाच एक परिपाक आहे असे वाटते. अतिडाव्यांनी आता आपले गोलपोस्ट बदलले आहेत. ग्रामीण आदिवासी, दलित, शोषित,वंचित यांच्यावरील अन्यायाचे अपील त्यातील तोचतोचपणा, अतिरिक्त प्रचार आणि गेल्या २०-२५ वर्षांतील काहीच प्रमाणात का असेना पण ट्रिकल डाऊन झालेली खाउजाने आणलेली आर्थिक सक्षमता इत्यादींमुळे कमी झाले आहे. त्यामुळे वरील मुद्द्यांना थोडे बाजूला सारून आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवतावाद, व्यक्तिस्वातंत्र्य , भ्रष्टाचारविरोध, धर्मनिरपेक्षतावाद अशा उदात्त विचारांच्या बुरख्याआड लपून आपला राज्यविरोधी हिंसात्मक अजेंडा राबवणे चालू आहे. या उदात्त विचारांना समर्थन आणि संघविरोधी बोलायला एक चांस मिळतो या भावनेने बोलताना आपण कळत नकळत हिंसाचाराचे, अराजकतावादाचे समर्थन व त्याला एक वैचारिक बैठक तर मिळवून देत नाही आहोत ना असा विचार तथाकथित विचारवंतांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मी आधीही एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भारतापुरता विचार केला तर शस्त्र हातात घेतलेल्या भरकटलेल्या लोकांपेक्षा त्यांच्या कृत्यांना न्याय्य म्हणणारे भरकटलेले बुद्धीमंत आणि सामान्य लोकमानसावर मोठा प्रभाव असलेले भरकटलेले माध्यमकर्मी हा अधिक मोठा धोका आहे.
सरकारने देशद्रोहाचे गुन्हे
सरकारने देशद्रोहाचे गुन्हे दाखल केल्याने स्वत:ची पंचाईत करून घेतली आहे असे काहींचे मत आहे. पण मला उलट वाटते, राहुल गांधींनी अतिरिक्त घाई केल्याने उलट कॉंग्रेस प्रवक्त्यांची पंचाईत करून ठेवली आहे. कारण सरकारने केलेली कारवाई ही आधी त्यांची संवैधानिक/कायदेशीर जबाबदारी आहेत (राजकीय भूमिकाही असेल पण ती सेकंडरी आहे) याउलट राहुल गांधींची भूमिका तद्दन राजकीय आहे.
+१ पूर्ण सहमत
वर म्हटल्याप्रमाणे सरकारची कृती मला सुयोग्य (राजकीयदृष्ट्या + प्रशासकीयदृष्ट्या) वाटते.
संशयाचे कन्फर्मेशन ?
आपण नोव्हेंबरमध्ये ज्या अर्थी हे सूचित केले होते त्या अर्थी हे प्रकरण प्लॅण्टेड स्वरूपाचे आहे असे तुम्ही सुचवत आहात का?
म्हणजे आपल्या विचारधारेशी विरोधी विचारधारेचे मूलस्थान(?) किंवा फाउंटनहेड असणार्या संस्थांमध्ये असे प्रकार घडवून आणणे आणि त्या निमित्ताने त्यासंस्थांमधून आपली माणसे घुसवून त्या संस्थांवर ताबा मिळवून विरोधी विचारधारेचे उच्चाटन करायचे. त्यासाठी डायरेक्ट देशद्रोह वगैरे भावनिक मुद्दे घेऊन सोशल मीडियावरील ट्रोलांच्या झंझावातातून सामान्य जनतेची सहानुभूती आपल्याकडे ओढून घ्यायची.
एका विद्यापीठात घडलेल्या घटनेवरून थेट देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यात लक्ष घालणे हा त्याचाच भाग असू शकेल.
कितीही टोकाचं वक्तव्यं असलं
कितीही टोकाचं वक्तव्यं असलं तरीही त्याबद्दल कुणाला देशद्रोहाच्या कलमाखाली अटक होणं समर्थनीय कसं काय ठरू शकतं हे मला अनाकलनीय आहे. ("मग काय रिकाम्या धरणात मुतू?" असा उद्गार पचवणार्या महाराष्ट्राला तरी माझा अचंबा कळायला पाहिजे.) खून ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे, पण असली वक्तव्यं मात्र धोकादायक आहेत अशाही आशयाचं एक मत खाली व्यक्त झालं आहे (नो वंडर, डिअर अनुताई). सत्याग्रह / भाषण / मतप्रदर्शन / अन्नग्रहण (केल्याचा संशय) केल्याबद्दल आपल्याकडे अटका, देशद्रोहाचे आरोप, मारहाणी, खून होताहेत; त्याही सरकारी हस्तक्षेपासह वा निष्क्रियतेसह. आणि यात राजकारण वगळता का-ही-च दिसू नये?
पण "देश बरबाद करु/करा",
पण "देश बरबाद करु/करा", "देशाचे तुकडे करा" ही वक्तव्ये देहद्रोही कशी नाहीत?
बाऊंड्री कुठे आखायची? मी चौकात ओरडू लागले की "देशाचे विभाजन करा" आणि कुत्रही फिरकलं नाही तर देश्द्रोहाच्या गुन्ह्याखाली मला अटक होइल की नाही?
- समजा अटक नाही झाली तर मग मी ३-४ मित्र-मैत्रिणींना प्रभावीत करु शकले तर होइल का?
- समजा अटक झाली तर मग मी रस्त्यावरुन जाताना एखाद्या व्यक्तीला हळूच म्हटलं की "देशाचे साले तुकडेच झाले पाहीजेत" तर तेव्हाही अटक होइल का?
___
अर्थात "देशद्रोही आहे की नाही" हा निर्णय फार सापेक्षी (सब्जेक्टिव्ह) झाला.
बाऊंड्री कुठे
बाऊंड्री कुठे आखायची?
त्यासाठी न्यायालये आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा अगदी अचुक परीस्थिती डीफाईन करु शकत नाही. अश्या केसेस मधे तर नाहीच.
पण प्रायमाफेसी जर गुन्हा वाटत असेल तर पोलिस अटक करणारच ना, त्या विरुद्ध बोंबलायची काय गरज आहे. जामिन पण मिळेल लगेच.
न्यायालय ठरवेल काय बाऊड्री आहे ते.
प्रत्येक गोष्टीसाठी कायदा
प्रत्येक गोष्टीसाठी कायदा अगदी अचुक परीस्थिती डीफाईन करु शकत नाही.
असं का? कारण इथे करता येत नाहीये पण आपल्याला असं "वाटतय" की शिक्षा व्हावी. आपण बुद्धीपेक्षा भावनेने घेत आहोत म्हणुन बाकी काही नाही.
____
अर्थात तू हे काऊंटर अर्ग्यु करु शकली असतीस नव्हे मलाच हा प्रश्न पडला की "देशद्रोही कृत्याची" माईंड यु कृत्य. फक्त नारेबाजी नाही. उदा - मी भ्रष्टाचार केला तर तो देशद्रोह ठरतो की मी डायरेक्ट बॉम्ब च टाकला तर ठरतो. इथेही बाऊंडरी आहेच पण न्यायालयाने काहीतरी ठरविली आहे.
मे बी तद्वत जे एन यु सारख्या प्रसंगीही बाऊंड्री ठरवता येणं शक्य आहे.
कायदा ख्ररंच नाही करु शकत
कायदा ख्ररंच नाही करु शकत प्रत्येक परीस्थिती डीफाईन. म्हणुन तर न्यायालये आहेत आणि न्यायाधीश आहेत.
ह्या भाषणाबद्दल चे च एक उदाहरण बघ.
एखाद्या माणसावर समजा सरकारी यंत्रणेनी खुप अन्याय केला किंवा तत्सम काहीतरी. आणि त्या माणसानी एका क्षणी खूप वैतागुन देशाला शिव्या दिल्या वगैरे. पण नंतर शांत झाला.
पोलिस त्याला अटक करतीलच पण न्यायालय त्याला निर्दोष सोडेल.
पण संघटना बनवून बाकीच्यांना चिथावणी द्यायला लागला आणि तसे वारंवार करु लागला. तर गोष्ट वेगळी होते. कृती तिच पण तिचा अर्थ वेगळा.
मे बी तद्वत जे एन यु सारख्या प्रसंगीही बाऊंड्री ठरवता येणं शक्य आहे.
नक्की शक्य आहे, आणि न्यायालय ती ठरवेलच. वर त्या निर्णयाचा उपयोग पुढील खटल्यांमधे होइल. पण अटक करायची नाही, खटला भरायचा नाही असल्या मागण्या चूक आहेत.
कायद्याच्या चौकटीतली नागरिकत्वाची संकल्पना
कितीही टोकाचं वक्तव्यं असलं तरीही त्याबद्दल कुणाला देशद्रोहाच्या कलमाखाली अटक होणं समर्थनीय कसं काय ठरू शकतं हे मला अनाकलनीय आहे.
मग आपल्यामते देशद्रोह म्हणजे काय ? बंदूक घेऊन लोकांना मारणे हाच देशद्रोहाचा पुरावा असू शकतो काय? बरे असे म्हणावे तर सशस्त्र संघर्ष करणार्यांना स्वातंत्रसैनिक (काश्मीर/माओवादी) म्हणणारे विचारवंत आहेतच की.
मुळात अतिउदारमतवादी विचारवंताना एक प्रश्न विचारवासा वाटतो की, कायद्याच्या चौकटीतली नागरिकत्वाची संकल्पना, सार्वभौम राष्ट्राची संकल्पना त्यांना मान्य आहे का की ते स्वत:ला एक मुक्तात्मा (फ्री सोल) समजतात? असे असेल (म्हणजे मुक्तात्मा) तर मग पुढची चर्चाच खुंटली. परंतु अशी नागरिकत्वाची संकल्पना मान्य असेल तर त्यासोबत येणार्या जबाबदार्या आणि बंधनेही मान्य केली पाहिजेत अन्यथा अशा मुक्ताम्यांनी नागरिकत्वाचे फायदे विशेषत: आर्थिक आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार तरी का उपभोगावा? ज्या सार्वभौम राज्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कायदा करून दिला आहे त्याच राज्याच्या सार्वभौमत्वाला (आणि पर्यायाने त्याच्या नागरिकांच्या सर्वोपरी असलेल्या 'जगण्याच्या अधिकारा'लाच) त्याच अभि.स्वातंत्र्याचा अधिकाराखाली आव्हान देणे ही मला सर्वोच्च प्रकारची आणि आजवर कधीही न पाहण्यात आलेली गुन्हेगारी दांभिकता वाटते. तसेच या जीवघेण्या दांभिकतेला मिळणारे बौद्धिक समर्थन पाहून भीती वाटते.
मी तो परिच्छेद
मी तो परिच्छेद अतिउदारमतवाद्यांना उद्देशून लिहिला होता. आपण का उगाच पदरात विस्तव घेताय ? :)
असो.
नागरिकत्व आणि सार्वभौम राष्ट्राची संकल्पना मान्य असणे म्हणजे विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा हे मला ठाऊक नव्हतं. आता कळली नवीन व्याख्या
हे खरे नाहीतर काय? उदा. एखाद्याने अ देशाचे नागरिकत्व त्यागून ब देशाचे नागरिकत्व घेतले तर त्याला ब या देशातील 'रीझनेबल रिस्ट्रिक्शंस' मान्य आहेत असाच अर्थ होत नाही का किंवा काही ठिकाणी ती बंधने एक्स्प्लिसिटली मान्य करावी लागतात की नाही? कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है. प्रॅक्टीकली अॅब्सोल्यूट असे विचारस्वातंत्र्य व अभिव्यक्तिस्वातंत्र्य आपल्याला कोण देणार ?
'रीझनेबल' हा सापेक्ष शब्द आहे
'रीझनेबल' हा सापेक्ष शब्द आहे ही यातली अडचण आहे. बाकी विचारस्वातंत्र्याची आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गरज आणि त्यातून होणारे फायदे आणि त्याचा आपल्यातल्या प्रत्येकाशी असलेला संबंध यांबद्दल बरंच काही लिहिता येईल. पण जंतू यांनी खाली लिहिलेला एकच प्रतिसाद पुरेसा आहे. पुनरुक्ती नको.
सध्या डाव्यांसाठी ही "कुछ करो
सध्या डाव्यांसाठी ही "कुछ करो या मरो" अशी परीस्थिती आहे. थोड्याफार प्रमाणात काँग्रेस साठी पण.
डाव्यांकडे एकही सरकार नाही. पैश्याचा प्रचंड अभाव त्यांना जाणवतो आहे. आणि पक्ष चालवायला आणि निवडणुका लढायला पैसे नसतील तर काही उपयोग नाही. त्यामुळे डाव्यां पक्षांचे अस्तीत्व पूर्ण पणे माओ अतिरेक्यांवर अवलंबुन असणार आहे कारण ते पैसेवाले आहेत. सीपीम ( दोन्ही ) पक्ष नजिकच्या काळात माओवादी अतिरेक्यांनी हायजॅक केलेले दिसतील. किंवा सीपीम ( दोन्ही )नसण्याची पोकळी नक्षल अतिरेकी भरुन काढतील. येचुरी/कारथ यांचे राजकीय दिवस संपले आहेत.
काँग्रेस कडे पण पैश्याची वानवा निर्माण होइलच पुढच्या २०१९ च्या निवडणुकी पर्यंत. अश्या काही आगी लावल्या तरच त्यांना त्यांचे अस्तीत्व आहे असे दाखवुन भांडवलदारांकडुन आणि देशाबाहेरुन पैसे मिळवता येतील.
पण २०१९ साली, काँग्रेस ला सत्तेत भागीदारी मिळाली नाही तर पक्ष संपेल.
(जे एन )'यु टर्न'
जे एन यु तील आणखी एक प्राध्यापक गिलानी यांना काल देशद्राहाच्या कलमाखाली अटक करण्यात आली कारण त्यांनी अफजल गुरूचा उल्लेख शहिद म्हणून केला म्हणे!
मुळात नथुराम गोडसे काय, अफझल गुरू काय यांना न्यायालयाने फाशी देऊन (रेअरेस्ट ऑफ रेअर कृती करणारा) गुन्हेगार ठरवले आहे, अशा व्यक्तींची महती गाणार्यांकडे कोणत्याही सरकारला फार सहृदयतेने बघता येणार नाही - बघु नये!
असे असतानाही, यावेळी मात्र एखाद्याला काही (गोडसेला देशभक्त किंवा अफजलला शहिद) म्हणणे हे एखाद्याला द्र्शद्रोही म्हणण्यास पुरेसे वाटत नाही.
आधीच्या केसमध्ये - मुळ व्हिडियोत - किमान देशाच्या विभाजनाची चिथावणी होती. गिलानी यांनी तर तसेही म्हटलेले नाही. तेव्हा आता मात्र सरकारच्या कृतीचे समर्थन करणे कठीण होत चालले आहे. स्वतःच्या जाळ्यात सरकार फसते आहे का ते पहायचे! (या अशा कृतींमुळे अधिक लोकांना आपले म्हणणे पटवून देणे फुटीरवाद्यांना सोपे जाते इतके सरकारला समजत नसेल काय?)
एवढेच कारण नसावे
मूळ बातमीत हेही आहे-
‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर १० फेब्रुवारीला दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये गिलानी यांनी देशविरोधी भाषण ठोकले होते. भाषणात काश्मीरच्या स्वातंत्र्याचे आणि अफझल गुरू, मकबूल भट्ट यांचा उल्लेख शहीद असा केला होता
.
अफजल गुरूचा उल्लेख शहिद म्हणून केला म्हणे एवढेच कारण नसावे. पोलिस इतकेही मूर्ख नसतात असे वाटते. कुठला खटला चालवायचा आहे, कुठे आरोपीला जामीन मिळावा म्हणून अटक करायची आहे,कोणाला नुसतीच धौंस द्यायची हे त्यांना बरोबर ठाऊक असते. काल अजित दोभाल यांनी एक इमर्जंन्सी बैठक घेतली. ही कारवाई त्यानंतर झाली असल्याची शक्यता आहे.
ऋ - तांत्रीक फरक आहे.
ऋ - तांत्रीक फरक आहे. नथुरामनी एका माणसाला मारले. माणुस कोणी का असेना, त्याला मारणे हा खून होऊ शकतो, देशद्रोह वगैरे असेलच असे नाही. राजकारणातल्या वरच्या पातळीवरच्या माणसाला खून वगैरे हे ऑक्युपेशनल हॅझार्ड असतातच. त्यात काही विषेश नाही.
अफजल गुरु वर देशाशी युद्ध पुकारण्याचा गुन्हा होता ( जसा कसाब वर होता ).
नथुरामनी भारताला बर्बाद करीन वगैरे म्हणल्याचे वाचले नाही.
तुलना चूक आहे.
नथुराम हा फाशीची शिक्षा
नथुराम हा फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार आहे तसाच अफजल गुरू.
फाशीची शिक्षा अनेक कारणांमुळे होते, तो काही पॅरँमिटर ठरत नाही.
मी वर लिहीलेले तुम्ही वाचले नाही. अफजल विरुद्ध देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा गुन्हा होता.
आणि अफजल ला पाकीस्तानात शहिद म्हणु देत की, काही चुक नाही.
न्याय सुद्धा एका विविक्षीत दृष्टीकोनातुन काम करतो.
>>नथुरामनी एका माणसाला मारले.
>>नथुरामनी एका माणसाला मारले. माणुस कोणी का असेना, त्याला मारणे हा खून होऊ शकतो, देशद्रोह वगैरे असेलच असे नाही.
अहो एका माणसाला विरोध असणे (प्रत्यक्ष तो व्यक्त करणे गरजेचे नाही) हा देखील हल्ली देशद्रोह* ठरू लागला आहे. (खून दूरची गोष्ट झाली).
*म्हणजे सोशल मीडियात..... अजून सरकारी पातळीवर नाही. (तसे १९७५-७७ काळात झाले असल्याचे स्मरते).
दोन तटांबाहेरची गंमत
धाग्यावरच्या आणि इतरत्र प्रतिक्रिया (काही सन्माननीय अपवाद वगळता) साधारण दोन उघड तटांत पडतात. पण खरी गंमत ह्या दोन तटांबाहेरच आहे.
- सर्वप्रथम, कुणाला मान्य असो नसो, JNU ही मानव्य ज्ञानशाखांमधली (ह्युमॅनिटीज) भारतातली अत्यंत महत्त्वाची संस्था आहे हे तथ्य नाकारण्याजोगं नाही.
- अशा संस्थांमध्ये जे टोकाचं विचारस्वातंत्र्य अपेक्षित असतं त्यात चाकोरीबद्ध व्यवस्थाधार्जिण्या विचारांपेक्षा व्यवस्थाविरोधी (अॅन्टी-एस्टॅब्लिशमेंट) विचारांचं प्राबल्य असणं आणि सरकारधार्जिण्या विचारांना फारसं स्थान नसणं ही भारतातलीच नव्हे, तर पाश्चात्य देशांमधलीही जुनी परंपरा आहे.
- इथे एक फॅक्टॉईड (कॉन्ग्रेसची पाठराखण करणारे किंवा आणीबाणीविरोधात 'आमचे' लोक कसे लढले होते हे छाती ठोकून सांगणारे लोक अशा दोघांसाठीही) रोचक ठरावं - ७ जुलै १९७५ : आणीबाणीदरम्यान विद्यापीठ आवारात CRPF जवानांचा गराडा पडला होता आणि ६० विद्यार्थ्यांना अटक झाली होती. (संदर्भ : Indian Express, 29 June 2015)
- सांगायचा भाग असा, की हे सगळे लोक काँग्रेसचे कधी फार आवडते होते अशातला भाग अजिबातच नाही; मात्र, कोणत्याही अवघड जागच्या दुखण्यासारखं त्यांना सहन केलं जायचं. त्याचं कारण स्पष्ट होतं : शेवटी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर सरकारला बुद्धिवादी लोकांची गरज पडते. त्यासाठी अशा संस्था अस्तनीतले निखारे असावेत त्याप्रमाणे ठेवल्या जात.
- (फ्रान्ससारखे काही सन्माननीय अपवाद वगळता इतर अनेक देशांमध्ये) बुद्धिवादी लोकांची एक अडचण अशी असते, की ज्या पद्धतीच्या संभाषिताची (डिसकोर्स) त्यांना सवय असते त्याला सर्वसामान्यांचं आकलन (आणि पाठिंबा) सहसा कधी लाभत नसतंच. सार्वजनिक संभाषित जिथे प्रामुख्यानं भावनिकच असतं अशा भारतासारख्या (किंवा अगदी अमेरिकेसारख्याही) देशात तर ही दुष्प्राप्यच गोष्ट असते.
- ह्या पोकळीचा फायदा घेणं सरकारांना शक्य असतंच, पण बुद्धिवाद्यांना जिथे समोर ठेवणं अंतिमतः आपल्याच फायद्याचं ठरतं असे प्रसंग आणि अशा जागा त्यांना ठाऊक असतात. त्यामुळे सुज्ञपणे बुद्धिवाद्यांना (सरकारधार्जिणं नसूनही) सहन केलं जातं. भाजप आणि त्यांच्या थिंक टँकांना प्रिय असलेल्या इस्राएलसारख्या देशातही हे होतं ह्याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे 'इस्राएली बुद्धिवाद्यांवर बॅन आणा' सारख्या घोषणा पाश्चात्य डाव्या गटांकडून जेव्हा येतात तेव्हा मला नेहमीच गंमत वाटत राहते. असो.
तर अशी परिस्थिती कमीअधिक फरकानं सर्वत्र असताना आता नक्की काय बदललं आहे?
आता एक गंमत अशी झाली आहे, की 'देशासाठी प्रसंगी ते (बुद्धिवादी) गैरसोयीचे ठरत असले तरीही त्यांची देशाला गरज आहे' हे गृहीतकच आताच्या सरकारला मान्य नाही. (हा दृष्टिकोन योग्य की अयोग्य ह्या वादात आता पडायला नको.) त्यामुळे सरकार पद्धतशीर रीतीनं त्यांचं निर्दालन करत आहे. त्यासाठी मीडियाचं प्रभावी साधन वापरून सरकार त्याविरोधात जनमत तयार करत आहे. (ही एक प्रकारची Manufactured consent आहे.)
दुसरी गंमत अशी आहे : सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरच्याच गोष्टींमध्ये बुद्धिवादी इतकी वर्षं अडकलेले असल्यामुळे आणि अशा छळाची सवयच इतक्या वर्षांत राहिलेली नसल्यामुळे त्या प्रकाराला सामोरं जाण्यासाठीची योग्य सामग्रीच बुद्धिवाद्यांकडे उरलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कृती आणि उक्ती सरकारच्या हाती कोलीतच देणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे सरकारला सर्व दोष देता येत नाही.
माध्यमांच्या आणि पर्यायानं जनतेच्या लक्षात ही गोष्ट येते आहे असं आता तरी दिसत नाही : अखेर जनमत तयार करणं माध्यमांच्याच हाती आहे; आणि माध्यमांमध्ये जिथे जिथे सरकारला विरोध करण्याची इच्छा आहे तिथे अखेर ह्या बुद्धिवाद्यांचाच आधार घ्यावा लागतो आहे; त्यामुळे त्या पर्यायी संभाषिताला पुन्हा त्या बुद्धिवाद्यांच्याच मर्यादा भेडसावत आहेत.
त्यामुळे ह्या बुद्धिवाद्यांचे आवाज क्षीण होत जाणार ह्याला सध्या तरी काही पर्याय दिसत नाही. त्यांना पर्याय म्हणून वेगळ्या प्रकारचे बुद्धिवादी सरकारकडे फारसे नाहीत. त्यामुळे ज्या प्रकारची माणसं सरकार सगळीकडे आणून ठेवत आहे, त्यांनाच बुद्धिवादी म्हणा असा पर्याय (किमान अक्कल असलेल्यांना तरी) घेता येत नाही. ह्या परिस्थितीचे दीर्घकालीन परिणाम हळूहळू दिसू लागतील. कुणाच्या मते ते चांगले असतील, तर कुणाच्या मते वाईट. काय होत आहे ते बघण्याशिवाय आता काही पर्याय नाही. कारण, जनमताचा रेटा सरकारच्या बाजूनं आहे आणि सामर्थ्यही अर्थात सरकारच्या बाजूनं आहे.
फ्रेंच अवांतर
फ्रेंचाच्या बुद्धिवादाची ग्वाही मीच नाही, दोन्ही तटांवरच्या बुद्धिवाद्यांच्या भिंतीच्या भिंती देऊन राहिल्या आहेत. आता हेच पाहा -
They think, therefore they are
हेच चोर फ्रेंच, फॅसिझम नी
हेच चोर फ्रेंच, फॅसिझम नी आक्रमण केल्यावर लगेच फ्रांस फॅसिस्ट लोकांच्या ताब्यात देऊन मोकळे झाले.
त्यांचे काम झाले, पॅरीस चे काहीही नुकसान झाले नाही. त्यांचे व्यवहार चालू राहीले, नाटके, पार्ट्या जोरात चालु होत्या. दुसर्यांनी फ्रांस परत मिळवुन दिल्यावर, युद्धानंतरचा तो युरोप मधला सर्वात संप्पन देश होता.
आपल्याकडचे तसेच चोर - अवान्तर
आपल्याकडेहि डावे आणि उजवे हे अशाच प्रकारचे चोर आहेत. ब्रिटिशांच्या ताब्यातून भारत सोडवण्यासाठी ह्यांनी - आपापल्या कारणांसाठी - त्या वेळी बोटहि उचलले नाही. ते काम काही प्रमाणात युद्धपश्चात परिस्थितीने आणि काही प्रमाणात गांधींच्या नेतृत्वाखालील 'ना डाव्या ना उजव्या' असलेल्या अशा सर्वसामान्य जनतेने केले.
दलितांची भूमिकाच वेगळी होती. 'ब्रिटिश गेले म्हणजे स्वातन्त्र्य' ही व्याख्याच त्यांना मंजूर नव्हती.
अतिशय उत्तम प्रतिसाद हे वाचून
अतिशय उत्तम प्रतिसाद
हे वाचून एका परदेशस्थ भारतीय मित्राने एका खाजगी इ-चर्चेत योगायोगाने आजच काढलेले उद्गार आठवले ते असे:
फॅसिझम येईन येईन म्हणता म्हणता अालासा दिसतोय. पॉप्युलर नेता, एकाधिकारशाहीचा सोस अाणि भांडवल होतंच. राष्ट्रवादाचा हैदोस राहिलेला. अाता चौकडी पूर्ण झाली. अामच्या काही मित्रांना अजूनही वाटतं की छे हे काही फासीवादी नव्हे. सांगून येईल तो. कीव अधिक भीती. झोप येत नाही कधी कधी.
प्रायर्स
याच साच्यातली आर्ग्यूमेंट्स बरेच दिवस वाचतो आहे.
चर्चवर भुरट्या चोरांनी दगड मारलेल्या घटनांना अल्पसंख्या़कांवर हल्ले वगैरे लेब्लं लावली गेली आहेत.
इस्टरला कुठलीतरी बैठक ठेवली तर पंतप्रधांनांना शिव्या घालणे. अल्पसंख्यांकांचा अनादर केला म्हणून.
खाण-सामान विकणार्या कंपनीत झालेल्या स्फोटाला गोध्रा-२ची तयारी वगैरे म्हटलं गेलं आहे.
इशरत जहानला हीरो बनवणे.
अशा घटनांच अवडंबर भरपूर केलं गेलं आहे. सद्ध्याची घटना याच साच्यातली आहे असं वाटतं आहे.
पण वरील विधान त्या साच्यातील
पण वरील विधान त्या साच्यातील नाही असे वाटत नाही का? जरा नीट एकवार वाचा. पटलं पाहिजे असं नाही पण ते अशा आरोपांच्या पुढे जाऊन बरंच काही बोलु पहातं.
बाकी फिअरमाँगरिंग म्हणजे आपल्या फायद्यासाठी खोट्या भितीचा प्रसार करणे. हा फार गंभीर आरोप आहे.
एखाद्याला नागरीकास अशी खरोखरच भिती वाटत असेल (इतकी की त्यामुळे झोपही उडाली असेल) आणि उलट ती खरी ठरल्यास ती सांगणार्याचे नागरीक म्हणून फायदा जाऊदे उलट प्रत्यक्षात प्रचंड नुकसान असेल तर ते फिअरमाँगरिंग कसे?
उलट कायम असं ओरडत रहाण्याने
उलट कायम असं ओरडत रहाण्याने 'लांडगा आला रे' सारखं देखील होऊ शकतं. वरील उदाहरणांमध्ये सुरूवातील एकदम जोर्दार, गंभीर आरोप झाले. त्यातून बाहेर काय आलं तर शष्प. आत्ता जे काही होतय त्याबद्दल गांभिर्य लोकांना वाटत नाहिये अशी तक्रार असेल तर त्यात नेहेमी क्षुल्लक घटनांनंतर "अरे बापरे! बघा काय झालं" असं करणार्यांचा दोष आहे.
आत्ता जे काही होतय त्याबद्दल
आत्ता जे काही होतय त्याबद्दल गांभिर्य लोकांना वाटत नाहिये अशी तक्रार असेल तर त्यात नेहेमी क्षुल्लक घटनांनंतर "अरे बापरे! बघा काय झालं" असं करणार्यांचा दोष आहे.
काही अंशी मान्य आहे.
पण म्हणून खरोखर गंभीर गोष्टींच्या वेळी गप्प बसणे अधिकच दोषपूर्ण ठरेल नै का? आणि मुळात यातील कोणतीही एक घटना एकटी तितकी घातक वाटणार नाही/नाही. पण जर हे अनेकदा दिसत असेल तर 'वरी अॅड्स अप'!
प्रत्येक वेळी हे फिअरमाँगरिंग आहे असे म्हणून दुर्लक्ष करणे सगळ्यांनाच नुकसानकारक नाही काय? भिती खोटी ठरली तर चांगलेच आहे, पण खरी ठरली तर लक्षात येऊनही दुर्लक्ष केल्याचा सल मनातून जाईल काय?
ही ती माहिती
न्यूज एक्स ची ही बातमी पाहा. खरे खोटे माहीत नाही.
सोली सोराबजीपण म्हणतायत की जर
सोली सोराबजीपण म्हणतायत की जर घोषणा खरच दिल्या असतील तर देशद्रोह आहे.
Bhakta Soli Sorabjee says JNU slogans amount to Incitement and Sedition. I urge media to do hitjobs on him pic.twitter.com/Lzogy0OYvY
— India in Emergency (@IdeaofEmergency) February 16, 2016
सोराबजी आणि कायद्याची भाषा
>> सोली सोराबजीपण म्हणतायत की जर घोषणा खरच दिल्या असतील तर देशद्रोह आहे.
सोली सोराबजी जे म्हणत आहेत त्यातले अर्थाचे पदर समजून घेतले तर लक्षात येईल की ते अनेक पद्धतीनं असं म्हणत आहेत की मूळ विधानं नक्की काय होती, कोणत्या संदर्भचौकटीत होती वगैरे लक्षात घ्यायला हवं.
इथून उद्धृत -
What did he do? Did he merely shout slogans like ‘Pakistan zindabad’? Arresting him for that? I mean that’s deplorable. That is not sedition.
Even if you say ‘Hindustan murdabad’, it is a borderline case since those words have a tendency to create law and order problem.
Asked if, by booking Kumar under sedition, the signal that might have gone out is that India is so weak that a speech by a university students’ union leader, even if he did say what he is alleged to have said, can disturb the unity of the country, the eminent lawyer said, “I agree.I don’t know if he did say ‘Hindustan murdabad’. We should take things in the right perspective. I feel we should not overreact. If we overreact, on the contrary, it makes matters worse.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेवटी आहे - हा देशद्रोह आहे की नाही ह्यापेक्षा आपला देश इतका निर्बल आहे का?
We must go by the actual
We must go by the actual words they used, the actual acts they did and see if that amounts to sedition.
ते लोक जे म्हणाले त्यावर जायला पाहिजे हे बरोबर आहेच. वाद पाकिस्तान झिंदाबाद हे सेडिशन आहे का हा नसून (अॅटलिस्ट फॉर मी), भारत तेरे तुकडे होंगे, हर घर से अफ्झल निकलेगा या वाक्यांबद्दल आहे.
अवांतर
फेसबुकवर काल नोआम चॉम्स्कीच्या लेखनाचा दुवा मिळाला. या लेखात अमेरिकन चॉमस्की अमेरिकेला सगळ्यात मोठा दहशतवादी देश असं संबोधतो.
Noam Chomsky | The Leading Terrorist State
ही सहजच आपली माहितीची देवाणघेवाण.
इंडियन ऑक्युपेशन ऑफ कश्मिर
उमर खलिद (राय?) या विद्यार्थ्याबद्दल फारशी माहिती मिडियात आलेली दिसत नाही. कन्हैया कुमारला अडकवून स्वतः मात्र पळून गेला.
कन्हैयाही आता जरी म्हणत असला की तो देशभक्त वगैरे आहे तरी इथे - 'मकबूल मांगे, अफझल मांगे, गर तुमना दोगे, तो लडके लेंगे, छीन के लेंगे आजादी' वगैरे घोषणा देतोय. उमर खलिद तर स्वच्छपणे 'इंडियन ऑक्युपेशन ऑफ कश्मिर' म्हणतोय.
'आजादी म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच' वगैरे.. हे नंतर त्यांना कुणीतरी पढवलेले आहे.
चर्चा
या चर्चेत भाग घेणारे कुणीच असं म्हणत नाहीयेत की, विद्यार्थ्यांनी विद्यापीठात जाऊन अभ्यास करायचा असतो आणि (जमलं तर) डिग्री घ्यायची असते. तिथे जाऊन राजकारण करायची जरुर काय ? त्यासाठी शिक्षण पूर्ण झाल्यावर उभे आयुष्य पडलेलेच आहे.
प्रक्षोभक घोषणा देणे, हा गुन्हा आहे की नाही, हे कोर्ट ठरवेलच.
विद्यार्थी!
ब्रिटीश साम्राज्याविरोधात असणार्या अभिनव भारत, फ्री इंडीया सोसायटी अश्या संघटनांचे सदस्य विद्यार्थीच होते.
ते तर ब्रिटीशांच्या वसाहतीतले नेटीव मग ब्रिटीशांच्या कृपेने त्यांच्या देशात जाऊन शिकत असताना उघड उघड ब्रिटीशांविरुद्ध जनमत करण्याचे काम करत होते.
आता आपण त्यांना क्रांतिकारक म्हणतो.
विद्यार्थी हे प्रत्येक देशातल्या बुद्धीमत्तेचे आणि तारूण्याचे सळसळते प्रतिक आहेत.
चीन भारत असूदे की मध्यपूर्व! विद्यार्थी चळवळी या राजकारणात नेहमीच महत्त्वाच्या ठरत आलेल्या आहेत.
एकवेळ शाळेतले जाऊदे, पण विद्यापीठात शिकणारे, मतदानाचा अधिकार असणारे, लग्नासारखे निर्णय घेण्याचा अधिकार असणारे तरूण राजकारणाबद्दल आपली मते उघड न करता किंवा समाजकारणात भाग न घेता केवळ अभ्यास एके अभ्यास करत बसावेत अशी अपेक्षाच फारफेच्ड नाही का?
(उद्या चुकून कश्मिर स्वतंत्र झालाच तर आजचे दहशतवादी आपल्या इतिहासाच्या पुस्तकातही कश्मिरी स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरवावे लागतील. जे एन यू ला 'कश्मिर हाऊस' सारखा दर्जा मिळेल. वगैरे वगैरे)
विद्यार्थी
आपला प्रतिसाद वाचून सखेद आश्चर्य वाटलं. ब्रिटिश राज्य आणि भारत सरकार याची तुलना तुम्हाला 'फारफेच्ड' वाटत नाही का ?
आम्हीही जन्माला येताना डायरेक्ट साठीच्या पुढे नाही आलो. विद्यार्थीदशेतले सर्व अनुभव गांठीला आहेत. भरल्यापोटी तत्वज्ञान सुचते असे म्हणतात. आमच्या वेळी एक वर्षही वाया जाऊन परवडण्यासारखे नव्हते. तरीसुद्धा सर्व तेवढ्या कार्यक्रमांत आम्ही सहभागी व्हायचो. कालिना चे सध्याचे विद्यापीठ तेंव्हा बांधत होते. त्याच्या श्रमदानातही हातभार लावलेला आहे. अभाविपचे कार्यकर्ते त्यावेळीही आमच्या आसपास होते. आम्ही त्यांच्यापासून चार हात दूरच असायचो. आमच्यातला अगदी गुंडातला गुंड विद्यार्थीही कधी देशविरोधी कार्यक्रमांत दिसला नव्हता.
काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दल काहीजणांना सहानुभूति दिसते. पण काश्मीर देऊन टाकले तरी प्रकरण तेवढ्यावर थांबण्यासारखे नाही. अतिरेकी कारवाया चालूच रहातील. गेल्या पिढीतल्या, 'हंसके लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्तान' या घोषणा आम्ही विसरु शकत नाही.
पुन्हा एकदा
१. विद्यार्थी हे १८ वर्षांपेक्षा वयाने मोठे आहेत. राज्यघटनेने त्यांना राजकीय मतदानाचा हक्क दिलेला आहे.
२. विद्यार्थी अभ्यास पुरेसा करत नसतील तर त्यांना त्याबद्दल विद्यापीठातल्या योग्य लोकांनी, त्यांच्या शिक्षकांनी जाब विचारणं रास्त आहे. सानिया मिर्झा या मुलाखतीत म्हणते, 'मी एकाद्या मॅचमध्ये चांगली खेळले नाही तर मागच्या आठवड्यात केलेल्या पार्टीबद्दल गॉसिप सुरू होतं'. (सानिया मिर्झाच्या स्पॉन्सर्सना शेवटी आपणच पैसे देतो; त्यांची उत्पादनं विकत घेऊन.) विद्यार्थ्यांच्या राजकीय लढ्याबद्दल आपलंही हेच होतंय का?
२अ. विद्यार्थी पुरेसा अभ्यास करतात का नाहीत याबद्दल जाब विचारण्यासाठी मुळात पुरेशी माहिती आपल्याकडे आहे का?
२आ. पुरेसा अभ्यास करत असतील तर उरलेल्या वेळात त्यांनी काय केलं याबद्दल बोलण्याचा इतर कोणालाही हक्क आहे का?
२इ. सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात काहीही बोलायचं नाही अशी परिस्थिती आणीबाणीच्या काळात होती. आजही तसंच काही असावं, सरकारच्या जागी फारतर सरकार+करदाते असं समीकरण बनतंय का? असल्यास त्याला फासिझमचा वरवंटा म्हणावं का?
२ई. असहिष्णुता, पुरस्कार वापसी प्रकरणांपासून भारतीय शास्त्रज्ञही तथाकथित डाव्या बाजूने बोलत आहेत. त्याच काळात त्यांनी गुरुत्वीय लहरींच्या संशोधनातही भाग घेतला. भारताची गुरुत्वीय दुर्बीण बनवण्यावर काम सुरू आहे. तर त्या शास्त्रज्ञांनाही हाच न्याय लावला जातोय का? का?
३. हे विद्यार्थी सर्वसामान्य कुवतीचे नसून भारतातल्या चांगल्या दर्जाच्या मानल्या गेलेल्या विद्यापीठात राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्र इत्यादी शिकणारेही विद्यार्थी आहेत. राज्यशास्त्राच्या या बुद्धिमान विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान मिळवावं अशी अपेक्षा आहे का? मेकॉलेला श्रेय मिळतं त्या शिक्षणव्यवस्थेततले कारकून छापायचे आहेत का?
३अ. कारकून छापायचे असं म्हटलं तरी ते खरोखर तसं करता येतं/येईल का? हिटलरला पोलंडमध्ये असंच करायचं होतं; आख्खी बुद्धीवंतांची पिढी त्याने नष्ट केली. आज तिथे कोणीही प्रज्ञावंत लोकच उरलेले नाहीत असं वाटतं का?
४. हे विद्यार्थी फक्त पाकिस्तानच्या बाजूने, आजाद कश्मीरबद्दल घोषणा देतात असं नाही. चार्वीने लिहिलंय त्यानुसार किमान वेतनासाठीही आंदोलन करतात. थोडक्यात या विद्यार्थ्यांना परपीडा समजते. (वैष्णव जन तो तेने रे कहिये ...) मग त्यांच्या काही तरुण वयातल्या अविचाराकडे (अविचार असं आपण धरून चालू) आपण दुर्लक्ष करू शकत नाही का किंवा त्यांना राग नक्की कसला आहे, हे समजून घेऊ शकत नाही का?
सरकार विरोधात काहीही बोलायचं नाही
सरकार विरोधात काहीही बोलायचं नाही>> या प्रकरणाचे स्वरूप 'सरकारविरोधात बोलणे' इतकेच मर्यादित आहे का?
१ मुळात ज्या अफजल गुरूच्या फाशीबद्दल हा वाद सुरू आहे ती फाशी 'या' सरकारच्या किंवा 'या पक्षाच्या' सरकारच्या काळात दिलीच गेली नाही.
२ अफझलच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध वाद सुरू आहे की काश्मिरच्या स्वातंत्र्याबाबत?
३ केवळ फाशीच्या शिक्षेविरुद्ध वाद सुरू आहे की अफजलच्या 'न्यायालयीन हत्ये'बाबत?
४ फाशीची शिक्षा केवळ मुस्लिम आणि दलितांना होते म्हणून वाद सुरू आहे की एकुणातच फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून?
५ मुस्लिम आणि दलितांच्यावर अत्याचार होत आहेत म्हणून वाद सुरू आहे की फक्त त्यांना होणार्या फाशीबाबत?
जाताजाता, तुम कितने क्षयज्ञ मारोगे? हर घर से क्षयज्ञ निकलेगा... ही घोषणा प्रथम जुल्फिकार अली भुट्टो यांच्याबद्दल दिली गेली होती
शायर - नासीर कवी.
https://www.youtube.com/watch?v=ET2-mGy3oys
फक्त सरकारविरोधात घोषणाबाजी
फक्त सरकारविरोधात घोषणाबाजी झाली नसेल तर 'आमच्या'विरोधात झाली असेल. चार विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली म्हणून ते खरं होतं का?
(कश्मीरचा प्रश्न सहजसोपा नाही. पण या आणि या प्रतिसादांमध्ये काही दुवे आहेत. इन्शाल्लाह कश्मीर नावाचा एक माहितीपट आहे. यांत जे काही म्हटलं आहे, सामान्य लोकांना जो त्रास होतो ते मात्र भीषण आणि गंभीर आहे. ह्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा असंतोष समजेलसा आहे. कश्मीर प्रश्न नक्की काय, कसा सोडवायचा वगैरे गोष्टी माझ्या आकलनापलिकडच्या आहेत.)
फाशीच्या शिक्षेला एकूणच विरोध आहे. फाशी हा व्यवस्थेने केलेला खून आहे असं मानत. त्यात कोणाला फाशी दिली (नथुराम असो वा अफजल गुरु) हा मुद्दा गौण आहे.
काश्मिरी, मणिपुरी, दलित,
काश्मिरी, मणिपुरी, दलित, आदिवासी यांच्या पीडेबद्दल -
Heroes are not pawns: Army officer's daughter exposes pseudo nationals
.. .. 'You want free speech?
..
..
'You want free speech? Let's see you acknowledge a man whose words make your blood boil, who's standing center stage and advocating at the top of his lungs that which you would spend a lifetime opposing at the top of yours.' You want to claim this land as the land of the free? Then the symbol of your country cannot just be a flag. The symbol also has to be one of its citizens exercising his right to burn that flag in protest. Now show me that, defend that, celebrate that in your classrooms. Then, you can stand up and sing about the land of the free. ______ President Andrew Shepherd (in the movie The American President.) (आपण भारताबद्दल बोलत आहोत ... अमेरिकेबद्दल नाही - हे सगळ्यांनाच माहीती आहे. अगदी मला सुद्धा.)
..
..
..
त्याला असं म्हणायचंय की
त्याला असं म्हणायचंय की "एखाद्याची अभिव्यक्ती अगदी तुमच्या उसळत्या रक्तास आव्हान देत असेल तरी तिच्यावर प्रतिंबंध घालणे हा स्वातंत्र्याच्या मुळावर हल्ला आहे. त्या व्यक्तीची अभिव्यक्ती तुमच्या अतिप्रिय भूमिकेच्या विरोधी असली तरी तिच्यावर प्रतिबंध घातल्यानंतर तुम्ही मुक्तभूमिचे रहिवासी असं बिरूद मिरवू शकत नाही".
आता काय क्रावं ब्रं?
काय पंचाईत करून ठेवल्ये सगळ्यांची!
JNU case: Police clear Kanhaiya's name
According to inputs from security agencies to the MHA, Kanhaiya Kumar might not have raised anti-national slogans or made inflammatory speech at the event. Home Ministry officials have suggested that slapping of the serious charge of sedition against Kumar could be an act of "over enthusiasm" of some Delhi Police officers.
(No subject)
:)
इथे इंटरोगेशन रीपोर्ट आहे त्यानुसार
Kanhaiya has also said that a lot of the people making the anti-India slogans were not from JNU but had come from outside JNU.
Kanhaiya has told the police that the clip which is being shown in which he is seen checking the identity cards of those who entered the venue is not from February 9, but from an earlier event at JNU.
आयबीच्या जीवावर मै बी उदार
झालंच तर आयबी काय म्हणतंय तेही पाहा :
JNU row: IB reports puncture Delhi cops' claims of video proof
The latest reports by intelligence agencies suggest that there is no video evidence with the Delhi police yet to show JNU student's union leader Kanhaiya Kumar mouthed "anti-national" slogans on the campus. They also rule out the role of terror elements as claimed by Union Home Minister Rajnath Singh.
काल कुठेसं वाचलेलं की
काल इथे वाचलेलं की पाकिस्तानी मिडीयाच्या अनुसार
terror elements as claimed by Union Home Minister Rajnath Singh.
राजनाथ सिंहांचा हा दावा ज्या हाफिज सईदच्या ट्वीटवर आधारीत होता ते ट्विट हँडल डुप्लिकेट व ट्रोल फेक होतं :) त्यामुळे श्री सिंह यांना चुकीची माहिती दिली गेली वा त्यांना योग्य माहिती मिळूनही रेटून बोललं गेलं कल्पना नाही.
बातमीतून उद्धृतः
Perhaps the worst reaction came from Home Minister Rajnath Singh who accused Pakistan's Hafiz Saeed of being behind the protest. It now appears he came to this ludicrous conclusion based on a tweet by a fake Hafiz Saeed account,
वकीलच असहिष्णू?
घटनाक्रम इथूनः
http://www.ibnlive.com/news/india/live-jnusu-president-kanhaiya-kumar-r…
- SC heard a plea by journalist against lawyers who attacked them
- SC ordered Delhi Police to maintain law and order inside courtrooms
- Shortly afterwards, two groups of lawyers clashed at Patiala House court
- Media again attacked by some lawyers
- SC orders Delhi police to act irrespective of profession
- Some lawyers attack JNUSU president Kanhaiya Kumar inside courtroom
- SC rushes a six-member team of eminent lawyers to Patiala House Court. including Kapil Sibal, Rajeev Dhavan, Dushyant Dave, A D N Rao, Ajit Sinha and Harin Raval, to witness the situation at Patiala House Court first hand.
- SC says will sit beyond 4 pm to handle the situation
- Lawyers hoot at SC delegation as the panel members reach Patiala House Court
- SC orally asks Delhi Police counsel Ajit Sinha to communicate to the magistrate to adjourn hearing, evacuate those present in the court room
- Union government has taken cognizance of the issue and is seeking a report from the Delhi Police over unruly scenes at the court complex
- SC orders Patiala House Court to be evacuated immediately.
- Associated Press journalist's camera broken by mob of lawyers. Associated Press photo journalist assaulted by lawyers at Patiala House court. The lawyers also threw bricks at mediapersons from inside the court premises.
- Media defending anti-national people, allege lawyers.
- JNUSU president Kanhaiya Kumar sent to 14-day judicial custody.
हे भयंकर आहे.
न्यायालये आणि मिडियाही आता वेठिस धरली जाणार असतील तर मात्र फासिझमची भिती हे निव्वळ फिअरमाँगरिंग आहे कसे म्हणावे?
दोन लेख
राष्ट्रवादाचा डांगोरा (केतकर?) http://divyamarathi.bhaskar.com/news/edt-editorial-divya-marathi-525163…
राष्ट्रभक्तीचे राजकारण (वागळे) http://divyamarathi.bhaskar.com/news/edt-nikhil-wagle-article-about-pol…
अाणखी दोन
वरील लेखात संदर्भ दिलेला प्रताप भानू मेहता यांचा लेख ज्यात मोदी सरकार हेच राष्ट्रविरोधी आहे असा दावा केलाय
http://indianexpress.com/article/opinion/columns/jnu-sedition-case-kanh…
फली नरीमन यांनी देशद्रोहाच्या कायद्याबाबत केलेले विवेचन. यात विद्यार्थ्यांचे वर्तन देशद्रोही नाही असे निःसंदिग्धपणे म्हटल्यासारखे दिसते.
http://indianexpress.com/article/opinion/columns/jnu-row-a-test-of-free…
मेहता व नरीमन हे सिक्युलर असल्याचे आता सिद्ध करता येईल काय?
यावर विश्वास ठेवावा का?
अभाविपमधून काहींचा राजीनामा.
फेसबुकवर हे वाचनात आलं.
#SAVEJNU #SAVEDEMOCRACY
Dear friends,
We, Pradeep, Joint Secretary, ABVP JNU UNIT, Rahul Yadav, President SSS ABVP UNIT and Ankit Hans, Secretary SSS ABVP UNIT resigning from ABVP and disassociating ourselves from any further activity of ABVP as per our difference of opinion due to the following reasons:
1. Current JNU incident.
2. Long standing difference of opinion with party on MANUSMIRITI and Rohith Vermula incident.
Anti-national slogans on Feb. 9 in university campus were very unfortunate and heart breaking. Whosoever responsible for that act must be punished as per the law but the way NDA government tackling the whole issue, the oppression on Professors, repeated lawyer attacks on Media and Kanhaiya kumar in court premises is unjustifiable and we think there is a difference between interrogation and crushing ideology and branding entire left as Anti-national.
People are circulating #SHUTDOWNJNU but I think they must circulate #SHUTDOWNZEENEWS which has demeaned this world class institution, this biased ZEE news media generalize and related the act done by few people to the whole student community of JNU. JNU is considered as one of the progressive and democratic institution where we can see intermingling of people from lower to upper income strata of the society, notion of equality.
We can’t be mouthpiece of such a govt. which has unleashed oppression on student community, legislature like O P Sharma, govt. which has legitimized the action of right wing fascist forces either in Patiala house court or in front of JNU north gate. Every day we see people assemble at front gate with Indian Flag to beat JNU student, well this is hooliganism not nationalism, you can’t do anything in the name of nation, there is a difference between nationalism and hooliganism.
Anti-India slogans can’t be tolerated in campus or any part of country, JNUSU & some left organization are saying that nothing has happened in the campus but here we want to stress that veiled persons in the event organized by former DSU persons shouted slogans BHARAT TERE TUKADDE HONGE of which there is concrete evidence in videos, so we demand any person responsible for the slogans should be punished as per the law, and in this whole process we also condemn media trial which has culminated in Anti-JNU sentiments throughout the country. Today we all must stand together to save JNU which has given us identity, we need to come across party lines to save reputation of this institution, to save future of JNUites as more than 80% of students don’t belong to any political party so let’s unite to save this JNU culture.
i |VANDE MATRAM |
| JAI BHIM | | JAI BHARAT |
Anti-India slogans can’t be
Anti-India slogans can’t be tolerated in campus or any part of country, JNUSU & some left organization are saying that nothing has happened in the campus but here we want to stress that veiled persons in the event organized by former DSU persons shouted slogans BHARAT TERE TUKADDE HONGE of which there is concrete evidence in videos, so we demand any person responsible for the slogans should be punished as per the law,
यही तो मै केह रहा हू मालिक!
हा २०१६चा धागा आज पॉप्युलर
हा २०१६चा धागा आज पॉप्युलर कन्टेन्टमधे दिसला म्हणून वाचला.
हा व्हिडीओ तो कुप्रसिद्ध टुकडे टुकडे गॅंगवाला आहे कि दुसरा कुठला आहे हे नक्की कळले नाही.
कन्हैय्याकुमारविषयी काही लिखाण यातील प्रतिसादांमधे दिसले.
अपडेट : कन्हैय्याकुमार याला शिक्षा तर सोडाच पण अजूनही अजूनही चार्जशीटही दाखल झाली नाहीये म्हणे.
म्हणजे कोर्टात नेताना देशभक्त वकिलांनी त्याला मारहाण केली याव्यतिरिक्त त्याला काहीही शासन केले गेले नाहीये.
उजळ माथ्याने हिंडत आहे तो,निवडणुकीला भर राजधानीत ऊभा आहे म्हणे.
या देशात कायद्याचे राज्य कधी येणार ?
हा दुवा मला उपयुक्त वाटला.
हा दुवा मला उपयुक्त वाटला.
रोचना जेएनयूची माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांना या प्रकरणावर अधिक विस्ताराने लिहिण्याची विनंती.