Skip to main content

नाशिक

(लहान असतना लिहिलेली कविता)

नाव माझ्या गावाचे नाशिक,
आहेत त्याचे खुप रसिक!!!

इतीहास आहे त्यात सहभागी,
सापडत नाही इथे कोणी अभागी!!!

नदी ईथली गोदावरी,
निर्माण झाली जेव्हा शंकरांनी केली जटाधरी!!!!

रामाने पुर्ण केला इथे वनवास,
गुन्हेगार भोगतात इथे कारावास!!!

साजरा करतात महाउत्सव कुंभमेळ्याच्या सणाला,
अशा माझी आहे नशिक मागे पाडील सार्‍या जगाला!!!!!!!!!

ऋषिकेश Wed, 08/04/2015 - 13:25

कविता वाचून वय? असा प्रतिसाद देणार होतो. इतक्यात हे पाहिले

(लहान असतना लिहिलेली कविता)

तेव्हा ठीक.

ऐसीवर स्वागत. मोठेपणी लिहिलेल्या कविता/लेखनही इथे येऊ द्या

बॅटमॅन Wed, 08/04/2015 - 15:59

In reply to by आदूबाळ

उद्गारचिन्हे सोडा हो.

कुम्भ्मेळ्य्च्या

अशी इतकी कॉम्प्लिकेटेड जोडाक्षरे लहानपणी लिहू शकणे म्हणजे बाकी हाईट आहे.

मिहिर Wed, 08/04/2015 - 17:52

In reply to by बॅटमॅन

कुम्भ्मेळ्य्च्या

अशी इतकी कॉम्प्लिकेटेड जोडाक्षरे लहानपणी लिहू शकणे म्हणजे बाकी हाईट आहे.

अहो, लहानपणीच मनोबांचे लेखन पाहून प्रभावित झाले असतील. ;) मनोबांनी ह. घ्यावे.

बॅटमॅन Wed, 08/04/2015 - 17:56

In reply to by मिहिर

प्रह्बवित झाले असतिल असं म्हणायच्म आहे का? ;)

पण मी लहानपणी वआतेल ते लिहीत असे, उदा. आज डब्यात खूपच उद्बोधक दिलंय, भाजी खूपच रोचक आहे, असं कायच्याकाय बोलत असे.

घनु Wed, 08/04/2015 - 14:16

आहो काय त्या कुंभमेळ्याचं कौतुक सांगता, कसलं वाईट्ट नी घाणेरडं शहर करुन टाकतात त्या मेळ्यात आणि त्याबरोबर साथीचे रोग येतात ते एक वेगळंच. पण असो, लहानपणी लिहीलेली म्हणताय कविता तर फार आग ओकत नाही इथे.

ऐसीवर स्वागत!

गवि Wed, 08/04/2015 - 14:26

कविता आवडली. अजुन फुलवता आली असती. तीन ओळींचा फॉर्मॅट या कवितेसाठी जास्त चांगला ठरेल असं मला वाटतं.

तशा आकारात माझ्या मतानुसार कविता पुन्हा खाली लिहिली आहे.

-गविंजय

नाव माझ्या गावाचे नशिक,
आहेत त्याचे खुप रसिक!!!
राहणी त्यांची खुप बेसिक!!!!

इतीहास आहे त्यात सहभागी,
सापडत नाही इथे कोणी अभागी!!!
गुरखाही इथला रात्री न जागी!!!!

नदी ईथली गोदावरी,
निर्माण झाली जेव्हा शन्करानी केली जटाधरी!!!!
घाटावर बसती अनेक भिकरी!!!!

रामाने पुर्ण केला इथे वनवास,
गुन्हेगार भोगतात इथे करवास!!!
द्राक्षांची इथल्या आहे मजा खास!!!!

साजरा करतात महाउत्सव कुम्भ्मेळ्य्च्या सणाला,
अशा माझी आहे नशिक मागे पाडील सार्‍या जगाला!!!!!!!!!
जूनमधे इथे कळ लागते ढगाला..!!!!!

अमुक Wed, 08/04/2015 - 14:36

(लहान असतना लिहिलेली कविता)
...........नक्की कोण लहान होते ?

तुमच्या लहानपणी तुम्ही रचलेली असेल तर आत्ता इथे त्याच स्वरूपात देण्याचे प्रयोजन ?

मनोज गीत Wed, 08/04/2015 - 17:56

In reply to by अमुक

आत्त्ता लिहिलेल्या कविता शुध्द स्वरुपात टकावयच्या आहेत....म्हणुन शुद्धलेखनचा सराव करण्यासाटी लहानपणी ची कविता टाकली...

तिरशिंगराव Wed, 08/04/2015 - 17:35

शुद्धलेखनाच्या चुका सुधारण्यासाठी 'जीमो' या आयडीची मदत घ्यावी. जालावर कुठेतरी सापडेल तुम्हाला.

- नाशिकराव तिरशिंगे

जीमो एक आदमी नहीं. जीमो एक सोच है.

जीमो जहाँ नुक्ता डालते है, शुद्धलेखन वहींसे शुरू होता है.

ग्यारह मुल्कों के शुद्धलेखन चिकित्सक उन्हें ढूंढ रहे है.

- राँर्बर्ट आणि कैरीचा चाहता आदूबाळ

नगरीनिरंजन Wed, 08/04/2015 - 18:17

In reply to by शुचि.

ते घाटावर यजमानाला लुबाडून यथेच्छ जेवून हाताचा वास घेत बसणार्‍या पंड्यांबद्दल म्हटले आहे बहुतेक. ;-)

धर्मराजमुटके Wed, 08/04/2015 - 18:52

नाशिकच्या आठवणी जाग्या झाल्या. मागच्या कुंभमेळाल्या लावलेली हजेरी, ते त्र्यंब्यकेश्वरचे स्नान, सगळे सगळे आठवून गेले. भर गर्दीत एकांताचा अनुभव आणि वरुन कितीही अपवित्र / घाण वाटलं तरी त्या पाण्यात केलेले भावभक्तीपुर्ण स्नान आणि स्नानानंतर मनात जागलेली पवित्रता ! आहाहा !
यंदाच्या कुंभमेळयालाही नक्की हजेरी लावणार.

पिवळा डांबिस Thu, 09/04/2015 - 00:03

लहानपणी "जर शिकला नाहीस तर भिक्षुकी करावी लागेल आयुष्यभर!" असा दम मातापित्याकडून अनेक वेळा खाल्ला होता...
दहा वर्षांचा असताना आत्याच्या निधनानंतर तिचं अस्थीविसर्जन करायला बाबांबरोबर नाशिकला गेलो होतो. तिथे ते घाट आणि त्यावर मोठ्या प्रमाणात चाललेले धार्मिक विधी पाहून न शिकलेले लोकं 'नाशिक'ला येऊन रहातात आणि खरोखरच भिक्षुकी करतात असं वाटलं. त्याची त्या वयात इतकी दहशत खाल्ली की चुपचाप अभ्यास करून 'शिकलो'!
:)

पिवळा डांबिस Thu, 23/04/2015 - 23:09

In reply to by मनोज गीत

अहो, हा समज आताचा नाही, दहा वर्षांचा असतांनाचा बालपणातला आहे!

जसं तुम्ही बालपणी केलेल्या कवितेत बाळगलेले खालील समज चुकीचे आहेत,

नदी ईथली गोदावरी,
निर्माण झाली जेव्हा शन्करानी केली जटाधरी!!!!
रामाने पुर्ण केला इथे वनवास,

तसंच आहे ते!
आता आम्ही आमच्या बालपणीच्या चुकीच्या समजांतून बाहेर पडलो.
तुम्ही?
:)

राजन बापट Thu, 09/04/2015 - 04:16

नाव आमच्या सायटीचे अक्षरेऐशी
करून टाकू सार्‍यांची ऐशी की तैशी

दुन्याभरची भुतावळ येथे सहभागी,
सापडत नाही इथे जो नाही अभागी!!!

याडमीण ईथली आदिती,
निर्माण झाली जेव्हा घासकडवीन्नी पिटली छाती!!!

अधून मधून "बरं कायतरी" लिहिल्याचा होतो जरी भास,
भौतेकदा सभासद भोगतात "नाशिक"चा कारावास!!

कीटककृमीचिंतूजंतू येऊन चावती नको त्या भागाला
अशी माझी आहे "ऐशी" मागे पाडील सार्‍या जगाला!!!!!!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 09/04/2015 - 08:03

In reply to by राजन बापट

घासकडवींनी छाती पिटली तेव्हा याडमीण अदिती निर्माण झाली, हा जालीय इतिहास नवाच की मुसुमामा.

गवि वि मुसु अशी लढत होणार का काय?

'न'वी बाजू Fri, 10/04/2015 - 16:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

घासकडवींनी छाती पिटली तेव्हा याडमीण अदिती निर्माण झाली, हा जालीय इतिहास नवाच की मुसुमामा.

हा इतिहास, की पौराणिक कथा?

नाही म्हणजे, बाबा आदमची बरगडी की काय ती कापली तेव्हा हव्वाबाई निर्माण झाली, या बिब्लिकल कथेची एलेमेंटे त्यात आहेत, म्हणून म्हटले.

शिवाय, छाती पिटण्यात नि बुभु:कारातसुद्धा एका प्रकारची व्हेरिसिमिलिट्यूड आढळते, ही बाबदेखील दुर्लक्षणीय नाही. बोला बजरंग बली की जय!

..........

समहाउ, ती 'बरगडी' यूफ़ीमिष्टिक असावी, अशी शंका आम्हांस नेहमीच येत राहिलेली आहे. असो.

राजन बापट Fri, 10/04/2015 - 16:25

In reply to by 'न'वी बाजू

'न'वी बाजू यांचा "ल्युसिफर" नावाचा डुप्लिकेट आयडी आहे काय हे पहाणें आले :-)

धनंजय Fri, 10/04/2015 - 17:03

In reply to by 'न'वी बाजू

दिमाग-जिगर-दिल, अनुक्रमे :
झूसाने डोके फोडून त्यातून अथीना उद्भवली
आदमाच्या कमरेतली छोटी फासळी* फाडून काढून हव्वा उद्भवली
घासकडवीनी छाती बडवून अदिति उद्भवली

(कंबर कमनीय करण्याच्या अतातायी उपायांपैकी ही फासळी काढून टाकणे हा एक शल्यचिकित्सकीय उपाय आहे.)

बॅटमॅन Fri, 10/04/2015 - 17:07

In reply to by धनंजय

(कंबर कमनीय करण्याच्या अतातायी उपायांपैकी ही फासळी काढून टाकणे हा एक शल्यचिकित्सकीय उपाय आहे.)

बापरे!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/04/2015 - 17:40

In reply to by धनंजय

म्हणजे बाबा आदमाच्या जमान्यात पुरुषही फासळ्या काढून कमनीय बनायचे का काय?

'न'वी बाजू Fri, 10/04/2015 - 17:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हो. परंतु, त्यातून स्त्रियांची लोकसंख्या हकनाक वाढते ही बाब लक्षात आल्याने ही प्रथा पुढे लवकरच बंद पडली.

'न'वी बाजू Fri, 10/04/2015 - 17:34

In reply to by धनंजय

म्हणून 'कन्यारत्न', 'पुत्ररत्न'-आदि संज्ञांचे प्रयोजन.

(आणि, 'चौदावे रत्न'? चौदा??????)

बॅटमॅन Fri, 10/04/2015 - 17:54

In reply to by 'न'वी बाजू

धृतराष्ट्र अन गांधारी या दोघांची अपत्ये १०० पैकी १४ होती, असे वाचल्याचे स्मरते. चूभूद्याघ्या.

अस्वल Thu, 09/04/2015 - 11:45

नव्या कवींना wow मिळत नाही इथे,याचा जाहीर निषेध.
ऐसीसारख्या संस्थळावर होणार्‍या नवकवींच्या गळ्च्पीचा निषेध.
एक होतकरू नवकवी ह्या नात्याने माझं परखड मत मी मांडतो आहे.

"देश का पेहला लाँग डिस्टन्स कॉलिंग कार्ड- गीत. उन लोगो के लिये, जो ज्यादा बातें करना पसंद करते है."
~जब वी मेट.

अमुक Thu, 09/04/2015 - 11:55

In reply to by अस्वल

हा शुद्ध हलकटपणा आहे माने.
........... _/\_
हे वाक्य तुमच्या लक्षात राहिलेलं पाहून तुमच्या उडत्या झुरळांवरच्या लेखामागची सुप्त प्रेरणाही ध्यानात येत आहे ;).