तुमची सध्याची वादग्रस्त मते कोणती? - १
कोणताही विषय चालेल. त्या विषयावरचे तुमचे वादग्रस्त / प्रवाहाविरुद्ध मत कोणते ते थोडक्यात सांगा.
कृपया एका कमेंट मधे एकच मत लिहा. दुसऱ्या मतासाठी दुसरी कमेंट वापरा.
उप प्रतिसादांमधून त्या मतावर चर्चा अपेक्षित आहे.
धन्यवाद.
या सगळ्या उदाहरणामधून फक्त
या सगळ्या उदाहरणामधून फक्त एवढेच कळते की बरेच लोक , बऱ्याच वेळा आ. के. असतात. पण यावरून आ.के. पणाचे जगाला फायदे काय झाले हे समजले नाही. Moreover why should it be an ideal?
१) संपत्तीची निर्मीती मुख्यत्वे आत्मकेंद्रीपणातूनच होते हा जगाला झालेला फायदा आहे. संपत्तीची निर्मीती हा गरीबीवर मात करण्याचा उपाय आहे.
२) व्यक्ती सहकार्य करते ते सुद्धा आत्मकेंद्रीपणातूनच करते.
३) असे ही शक्य आहे की तो मिळालेल्या पैशातील एक भाग आत्मकेन्द्री न राहता दुसर्यांसाठी खर्च करत असेल. - दुसर्यासाठी खर्च करणे ह्यातून आत्मकेंद्रीपणा दिसत नाही ? दुसर्यासाठी खर्च करणे ही त्या खर्च करणार्या माणसाची भावना नसते ? तो स्वतःला असं सांगतो - की - मला दुसर्यासाठी खर्च करण्याची कोणतीही भावना नाही पण तरीही मी दुसर्यासाठी खर्च करणार आहे ?? - असं तो स्वतःला सांगतो ? आत्मकेंद्रीपणाविरहित वागायचंच असेल तर तो ते पैसे दुसर्यासाठी खर्च न करता ते पैसे अस्तित्वातच नसल्याचं स्वतःशीच मान्य करेल.
४) कोणतीही देवाणघेवाण ही बळजबरीने होत नसेल तर दोन्ही पार्टींना मूल्यवान वाटली तरच होते. मग त्याला दुसर्यासाठी खर्च करून जे समाधान मिळतं ते तो खर्च करून मिळवतो.
५) आत्मकेंद्रीपणा हे संपत्ती निर्माण करण्याचे इंजीन आहे म्हणून ते सर्वोच्च मूल्य असावे.
तुमचा आक्षेप कळला मला. तो
या टाईप च्या संदेशांबद्द्ल म्हणायचं होतं. फक्त आत बघण्यातच वेळ घालवल्यास जगाचे प्रश्न (सामाजिक , वैज्ञानिक) कोण सोडवणार.
तुमचा आक्षेप कळला मला. तो हेल्दी आणि हिशेबी आत्मकेंद्रीपणास नसून, रुमी वगैरेंसारख्या मेडिटेटिव्हली आत वळण्याकडे आहे. जसे सूफी लोक तासन तास गिरक्या घेत आत्ममग्न असे वेड्यासारखे नाचतात, काही संत समाधीत लीन होतात.
हां या प्रकारचे न्कोणतेही एक्स्ट्रिम टोक त्याज्यच म्हणावे लागेल.
लहानखुरे स्तन हा प्रयोग ऐकला
लहानखुरे स्तन हा प्रयोग ऐकला आहे. तसेच घोटीव, प्रमाणबद्ध नितंब हाही.
घोटीव वगळता प्रस्तुत संदर्भात बाकी विशेषणे वापरली जातात हे मान्य. (घोटीव चा वापर मी पाहिला नाय इतकेच.)
पण प्रयोग ऐकलावाचला नसला समजा, तरी काय बिघडलं? आपण आपल्याला योग्य वाटलं तर करू शकतोच की.
लोल, याला आक्षेप कधी होता? काही क्लिशे विशेषणांची मक्तेदारी आहे इतकेच सांगावयाचे होते. उदा. हात नेहमी राकट वगैरे. =))
गच्च आणि टण़क ही विशेषणे
गच्च आणि टण़क ही विशेषणे सुध्दा वाचली आहेत.
पण टणक ही उपमा काय निट रुचली नाही. उद्या एखाद्या एक्समेन मधील आयर्नवुमनला (जी होपफुली अजुन अस्तित्वात नाही) टणक उपमा सुट होइलही तरीही कालच्या सर्वसाधारण मराठी वांग्मयात टणक :O ? मेबी आ मिझांदरस्तँद समदींग आग्गेस.
आम्हाला हिन्दी फेमिनिष्ठांची खेचण्यासाठीची लय गाणी माहीतेय
पण मराठी नाही माहीत हे एक आत्ता तुमच्या मुळे माहीत झाल धन्यवाद
हिन्दी तली काही
१- रजनीगंधा फुल तुम्हारे महके यु ही जीवनमे , यु ही महके प्रीत पियाकी मेरे अनुरागी मनमे
अधिकार ये जब से साजन का हर धडकन पर माना मैने
मै जबसे उनके साथ बंधी, ये भेद तभी जाना मैने
कितना सुख है बंधन मे
२-सजना है मुझे सजना के लीए
इ.
धाग्याशी अतिशय विसंगत आणि टोटल अवांतर
हा माझ्या कुतूहलाचा विषय आहे. म्हणून इथे अवांतर करते आहे. पुढे चर्चा वाढल्यास वा इथे विशोभित वाटल्यास हलवायलाही माझी अज्याबात हरकत नाही.
मी स्वतःला स्त्रीवादी व्यक्ती मानते. पण एकेकदा मला ही असली समर्पणप्रधान गाणी अतिशय आवडतात, त्यातल्या भावनेशी एकरूप वाटतं. मागेही कधीतरी एका कवितेबद्दल काहीतरी बोलत असताना मी हे मत खरडल्याचं मला आठवतं. आपल्याला अतिशय आवडणार्या वा जवळच्या वाटणार्या व्यक्तींविषयी समर्पणाची भावना वाटल्याचं मी अनुभवलं आहे. जोडीदाराच्या संदर्भात एरवी स्त्री-पुरुष नात्यामधल्या शोषणावर मी निबंधच्या निबंध लिहू शकीन, मोर्च्यात सहभागी होऊ शकीन, वादविवाद करून जिंकू शकीन. पण जोडीदाराला आपल्या जोडीदाराबद्दल स्वामित्वाची भावना चाटून गेल्यास तिचा उगम तरी मला समजूच शकतो. (त्यातून पुढे होऊ शकणार्या संभाव्य अन्यायांचं हे समर्थन नव्हे, त्या वाटेला चर्चा न नेण्याची कळकळीची विनंती.) आणि हे फक्त स्त्री (>समर्पिंग टू>) पुरुष अशाच एका वाटेनं होतं असं नव्हे. कोणत्याही एका व्यक्तीला दुसर्या व्यक्तीबद्दल असं होऊच शकतं. जोवर हे परस्परसंमतीनं होतं आहे, निरोगी आहे, कुणावर अन्याय-दडपणूक-शोषण नाही, तोवर हे सुंदर आहे असं मला वाटतं.
ही भावना एकाच लिंगाच्या व्यक्तींना वाटलीच पाहिजे अशा उघड वा छुप्या अपेक्षा सुरू होतात, तिथून अडचणीला सुरुवात होते. एरवी 'विसरू नको श्रीरामा मला'सुद्धा मला आवडतं आणि 'सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी'सुद्धा. (द्या मला आता फाशी. :प)
श्रीरामा मला'सुद्धा मला आवडतं
श्रीरामा मला'सुद्धा मला आवडतं
मलाही
सजना है मुझे आणि रजनीगंधा तील ती ओळ - वेडी होते मी.
हे फक्त स्त्री (>समर्पिंग टू>) पुरुष अशाच एका वाटेनं होतं असं नव्हे. कोणत्याही एका व्यक्तीला दुसर्या व्यक्तीबद्दल असं होऊच शकतं. जोवर हे परस्परसंमतीनं होतं आहे, निरोगी आहे, कुणावर अन्याय-दडपणूक-शोषण नाही, तोवर हे सुंदर आहे असं मला वाटतं.
खूप छान लिहीलं आहेस.
___
स्त्री-पुरुष नात्यामधल्या शोषणावर
या विषयावरती प्लीज एखादा लेख लिही. किती पातळ पदर असतात या शोषणाचे - अकाऊंट जॉइन्ट करण्याचा तगादा लावणे, सातत्याने बॉडी इमेज डिस्टॉर्ट करणे, मुद्दाम सासू-सून असा विवाद निर्माण करुन स्वतःची सत्ता दोघींवरती ठेवणे - हे झाले पुरुषांनी शोषण करण्याचे प्रकार असे "मॅनिप्युलेटिव्ह" प्रकार अनंत आहेत.
.
स्त्रियाही काही कमी नसतात - १० वर्षांपूर्वी झालेला क्षुल्लक अपमान (त्यांच्या मते) लक्षात ठेवतात, व्हर्बली नॅग करुन हॅरॅस करतात, काही बायका अशा पाहील्यात ज्या मुद्दाम फॅन्/दिवे चालू ठेवत का तर बिल नवरा भरतो, नवर्याला मनी-पर्स संबोधणार्या बायका माहीत आहेत.
दोन्ही प्रकारात घृणास्पद वागणुक आढळते.
मला अजिबात कोणत्याही जेंडरबद्दल त्यामुळे ओलावा नाही. डिझर्व्ह इच अदर.
____
विवाहसंस्था हीच चिखल आहे. त्यातल्यात्यात कमळ म्हणशील तर प्रेम, समर्पण याच विमल भावना.
____
असो. पण स्त्रीमुक्तीवादाबद्दल फार आवडच निर्माण झाली नाही कारण हे "मॅनिप्युलेशन, नॅगिंग्,हॅरॅसमेन्ट " पाहीली आहे. इट कॅनॉट बी अनडन.
बारीक, पण महत्त्वाची असहमती
स्त्रीमुक्तीवादाबद्दल फार आवडच निर्माण झाली नाही कारण हे "मॅनिप्युलेशन, नॅगिंग्,हॅरॅसमेन्ट " पाहीली आहे.
या दोन गोष्टींचा काय परस्परसंबंध आहे? अशा प्रकारे भुणभुण करणं, कटकट करणं, या बोटावरची त्या बोटावर करणं - हा मानवी स्वभाव आहे. स्त्रीवाद हे करायला लावतो वा शिकवतो वा त्याला खतपाणी घालतो अशी काही तुझी समजूत आहे का?
ह्म्म्म! जर दोघंही एकमेकांना
ह्म्म्म! जर दोघंही एकमेकांना छळतच असतील तर फक्त एका पार्टीला दोष का द्यावा? पुरुषही तितकेच शोषीत असतात. त्यातल्यात्यात छळाचा सामना करण्याची गरज कोणाला असेल तर ती "विवाहबंधनातून उपजलेल्या निरागस लहान मुलांना; ज्यांचा काहीही दोष नसताना हाल होतात.
विवाहात फक्त एक प्रश्न असतो भक्ष्य कोण आणि भक्षक कोण. कोणीतरी एक ओपनली हलकट असतो तर दुसरा मग डिव्हिअसली हलकट असतो. पण समसमान. कदाचित फक्त प्रॉब्लेमॅटिक विवाहात असे असेल. हे फार सरसकटीकरण झाले असेल. पण जयवंत दळवींची अशीच एक कथा माहीत आहे. त्यात वरवर सुखी दिसणारी लग्नेही विद्रुप असतात असे काहीसे दाखविले आहे. सहसा लैंगिकता ही बाजू त्यांच्या लेखात आढळते. या कथेत पुरुष सेक्सकरता लाचार दाखविला आहे.
विवांहांतर्गत
विवांहांतर्गत विसंवादासंदर्भात कुणालाच एकाला सरसकट दोष देता येत नाही सहसा, दिला जात नाहीही. पण समाजव्यवस्था फार पूर्वीपासून स्त्रीला अन्यायकारक अशी आहे हेही वास्तव आहेच. व्यक्तीच्या जडणघडणीत तिचा वाटा असतो. आता व्यक्ती त्यामुळे त्रासदायक झाली असली (उदा. पत्नी), तो फक्त समाजव्यवस्थेचा दोष नसला व आत्ताच्या परिस्थितीत व्यक्ती पूर्णत: दोषमुक्त होत नसली; तरी मुळापासूनची उत्तरं शोधायचा प्रयत्न करताना व व्यक्तीच्या वागण्यामागची कारणपरंपरा ('हे सर्व कोठून येते?'प्रकारचे प्रश्न विचारताना) शोधताना समाजव्यवस्थेचा विचार अपरिहार्य ठरतो.
दुसरं म्हणजे हे फक्त स्त्रीच्या वागण्यालाच लागू नाही, पुरुषांच्याही आहे. तेही त्याच व्यवस्थेचे बळी ठरलेले असतात. शोषक काही निरोगी नसतो. त्याला वरवर फायदे मिळताना दिसत असले, तरी तोही त्याच व्यवस्थेमुळे किडत गेलेला असतो-त्याचं व्यक्तिमत्त्व निराळ्या टोकाकडून एकांगी-एकाकी होत गेलेलं असतं, हे अनेकदा भल्याभल्यांना विसरायला होतं.
समाजव्यवस्था फार पूर्वीपासून
समाजव्यवस्था फार पूर्वीपासून स्त्रीला अन्यायकारक अशी आहे हेही वास्तव आहेच
अगदी मान्यच आहे हे वाक्य.
संतुलित प्रतिसाद. आवडला.
तेही त्याच व्यवस्थेचे बळी ठरलेले असतात.
१००% सत्य आहे.
पण मग फिंगर पॉइन्टींग हे कितपत बरोबर आहे? ज्याला दोष दिला जातो ती एन्टिटी अधिकाधिक डिफेन्सिव्ह तसेच कडवी होत जऊ शकते.
जर समाजव्यवस्थेचा दोष आहे तर मग मिळूनच तोडगा काढला पाहीजे तसेच बदल हळूहळूच होणार. स्त्रीमुक्तीमुळे बदल होताहेत हे स्वागतार्हच आहे.
पण मला वाटलेलं की पाळीचा स्त्राव दाखवत पण ही स्त्रीमुक्ती नव्हे. पुरुष उघड्यावर वीर्य्स्खलन करत नाहीत, जिथे सुविधा आहेत तिथे उघड्यावर विधी करत नाहीत. मग स्त्रियाच "पाळीचा स्त्राव दाखविण्याला" मुक्तीतील पुढचे पाऊल का समजतात?
____
अर्थात यावर सखोल चर्चा झालेली आहे ती आता जाऊन परत वाचते. - http://aisiakshare.com/node/4327
ह्म्म्म राघांचा हा प्रतिवाद - http://aisiakshare.com/node/4327#comment-110469
.
असो. परत परत तू लिहावस अशाकरता मी लिहीले नाही. पण मला मूळातच ते पटलेले नाही. लीव्ह इट नाऊ.
पाळीचा स्राव दाखवणे हे
पाळीचा स्राव दाखवणे हे चळवळीच्या एका टप्प्यावर वापरलेलं एक अस्त्र आहे. त्याला तितकं(च) महत्त्व आहे.
एखाद्या माणसाच्या अन्यायी वागण्याला प्रत्युत्तर म्हणून आपला देह कष्टवणे हे कितपत तार्किक आहे? पण सत्याग्रह म्हणून हे अस्त्र अभिनव होतं, प्रभावी ठरलं. तसंच याही अस्त्राचं. पाळी ही गोष्ट त्याज्य, लाजिरवाणी मानली गेली आणि त्याचा वापर बाईच्या खच्चीकरणासाठी केला गेला हा इतिहास आहे. (मातृदेवता प्रभावी असलेल्या क्षेत्रांमध्ये लाल वस्त्र हा देवीचा प्रसाद मानला जातो असं ढेरे यांच्या पुस्तकात वाचल्याचं आठवतं. (अचूक संदर्भ पाहून सांगितल्यास आभारी असेन.) याचा संबंध थेटच पाळी ही गोष्ट निर्मितीचं अधिष्ठान व म्हणून पवित्र मानण्याशी आहे. मग हे प्रकरण अपवित्र कधी आणि का झालं असेल?) त्याला प्रत्युत्तर म्हणून 'पाळी ही गोष्ट लाजिरवाणी मानत नाही' हे सांगण्याची प्रतिक्रिया येते. तिच्यात अमुक इतपत मूर्तिभंजन - धक्का देणं - बंड करणं अभिप्रेतच असतं. त्याला थोडा सनसनाटीपणाचा वास असतो. पण तो काही वेळा उपकारकच ठरतो.
त्या अस्त्राला त्याहून महत्त्व देऊ नये, असं माझं मत.
पुरुषांच्याही आहे. तेही त्याच
पुरुषांच्याही आहे. तेही त्याच व्यवस्थेचे बळी ठरलेले असतात.
पुरुष बळी असु शकतात पण स्त्री आणि पुरुषांच्या बळी पडण्यातल्या दर्जात फरक आहे. असे माझे मत आहे. पुरुषांचे बळी पडणे हे स्त्रीच्या बळी पडण्यापेक्षा फारच हलके असते.
दुसरे म्हणजे ९९% पुरुषांना बळी न पडण्याचा ऑप्शन असतो, त्यांनी ठरवले तर ते बळी पडणे टाळु शकतात किंवा त्यातुन बाहेर पडु शकतात.
पण कित्येक स्त्रीयांच्या बाबतीत हे शोषणा पासुन दुर पळणे शक्य च नसते.
बर्याच स्त्रीयांना आहे हे शोषण कींवा त्यापेक्षा जास्त शोषण ह्याच्यातच चॉइस करावा लागतो.
असच काही नाही मानसिक शोषण
असच काही नाही मानसिक शोषण दिसत नसेल पण ते तितकच (शारीरीक शोषणाहून जास्त नाही तरी निदान तितकच) सिव्हिअर असतं की.
पण अश्या मानसिक शोषणाच्या बळी पुरुषांना त्यातुन बाहेर पडायचा ऑप्शन असतो. मानसिक शोषण करु न देण्याचा पण ऑप्शन असतो. शेवटी आपण करु दिले तरच आपले मानसिक शोषण होते.
शाररीक शोषणा बद्दल तसे नसते, ते जबरदस्तीने लादले जाऊ शकते.
एक तोचि आधार
>> ही भावना एकाच लिंगाच्या व्यक्तींना वाटलीच पाहिजे अशा उघड वा छुप्या अपेक्षा सुरू होतात, तिथून अडचणीला सुरुवात होते.
ह्यावर माझं एक वादग्रस्त मत - तुम्ही पुरेसे फ्रेंच सिनेमे पाहात नाहीत आणि त्यांना शिव्या घालत नाहीत. तिथे सारखे बिच्चारे बाप्ये ढॅण्टॅडॅण बायांच्या मागे वेडे होतात, बाया मस्त एन्जॉय करतात आणि त्यांना छळतात. ;-)
अंत्वानच्या गोंधळाबद्दल दोन्ही स्त्रिया त्याची लावतात. त्याच्या वयाची, तरुण मैत्रीण सरळच 'तुला माझ्यात रस नाही म्हणतोस तर जा **त' असा अॅटिट्यूड दाखवून देते. त्याच्यापेक्षा अनुभवी न-मैत्रीण त्याला सिड्यूस करते. (स्त्रियांनी माज करणं म्हणजे स्त्रीवाद, तो हा असा!) ती स्वतः अटी ठरवते आणि अंत्वान तिच्यासमोर दबून अटींना होकार देतो.
समर्पण विरोध
फेमिनिझम = अँटाय समर्पण
समर्पण = अँटाय-फेमिनिझम
यात एक पदर अपेक्षेचा असतो आणि अपेक्षा लादणं अन्यायकारक असतं हे मेघनाने लिहिलेलं आहेच. पण एकंदर व्यक्तिच्या विकासात स्वत्व नसण्याने अडथळा येऊ शकतो. त्यामुळे व्यक्तिकेंद्री विचारसरणीतही समर्पण त्याज्यच. एका व्यक्तीने समर्पण करावं आणि समाजाचं भलं करावं हे ज्यांना पटत नाही, त्यांच्यासाठी समर्पण हा अवगुण ठरतो. माझ्या मते, निरीश्वरवादाचं एक अंग म्हणजे व्यक्तीपूजा न करणं. व्यक्तीपूजा शक्य नसेल तर समर्पण तरी कसं जमणार?
मुद्दा एवढाच, समर्पणाचा विरोध हा फक्त स्त्रीवादाचा भाग नसून निरीश्वरवाद आणि व्यक्तिवादाचाही भाग आहे.
प्रकाश घाटपांडे यांनी एका
प्रकाश घाटपांडे यांनी एका प्रतिसादात छान लिहीले होते भक्ती, कुठेतरी डोके टेकविणे ही काही लोकांची गरजही असू शकते.
____
अशांचा व्यक्तित्वविकास समर्पणातूनच अधिक चांगला होऊ शकतही असेल. तेव्हा समर्पण व्यक्तित्वविकासामधील मोठ्ठी धोंड आहे असा हार्ड & फास्ट (कट्टर) नियम म्हणता येणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती.
सिमॉन डी बुव्वा
सिमॉन डी बुव्हॉ
बुव्हॉ यांच्या साहित्याची टीका कोणी लिहिलेली आहे का ? (नालस्ती नव्हे.) टीका.
-
हायेक च्या पुस्तकाची टीका मी अनेकदा वाचलेली आहे. उदा. ग्रेग मॅनक्यु यांनी रोड टू सर्फडम ला "स्लिपरी स्लोप" ने भरलेले अशी टीका केली होती. हर्मन फायनर यांनी रोड टू सर्फडम ला "रिअॅक्शनरी" असे संबोधले होते. क्रुगमन यांनी मिल्टन फ्रिडमन यांच्या अनेक मुद्द्यांवर टीका केली होती ती सुद्धा मी वाचलेली आहे. अर्थशास्त्री जेम्स ब्युकॅनन यांच्यावरची टीका मात्र मला कधी सापडली नाही. (अर्थात मी खूप प्रयत्न केला असं ही नाही.).
आहे की, तिच्यावरचीही टीका
आहे की, तिच्यावरचीही टीका आहे. पण भक्तिणींना काय त्याचे? :)
एक उदा.
सिमोन दी बोव्हार?
तुम्हाला सिमोन दी बोव्हार म्हणायचं होतं का काय? आधीचं ममव देवनागरीकरण माझ्या डोक्यावरून गेलं.
गब्बरच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. साहित्य, ललित लेखन, नाटक या गोष्टी मला नीट समजत नाहीत; मी मुद्दलात मूळ लेखनच फार वाचत नाही तर त्याच्या समीक्षेचं व्याज कुठून भरणार!
व्यक्तिकेंद्री विचारसरणीतही
व्यक्तिकेंद्री विचारसरणीतही समर्पण त्याज्यच.
असा कोणताच एक गुण संदर्भचौकटीविना त्याज्य वा शिरोधार्य असतो असं मला वाटत नाही. पण ठीक. ते एकवेळ व्यक्तिसापेक्ष म्हणून सोडून देऊ! ;-) पण व्यक्तिपूजा शक्य नसेल तर समर्पण कसं करणार, हा प्रश्न मात्र अगदी नाही कळला. समर्पण म्हणजे स्वत्वाचा लय नव्हे. समर्पण आणि जागृत दृष्टी या दोन्हींच्या धारेवरून चालणं अवघड आणि पुष्कळ काही मागणारं आहेच. पण म्हणून अशक्य? उलट आव्हानात्मक आणि जिवंत नव्हे का?
१. पुण्यातल्या मुलीं/बायकांनी
१. पुण्यातल्या मुलीं/बायकांनी सगळे संस्कार सोडुन डोक्यावर पदर घेणं बंद केल्यामुळेच सुर्यदेव कोपलेले आहेत. (शिक्षा : चेहर्याला फडके) ... संस्कारी (टुकटुक) सिफ़र
२. एका साधारण माणसाला महीन्याकाठी १ लाख रुपये लागतात हे सत्य न स्विकारता, गुर्जींनी अजोंना पगारवाढ न दिल्यामूळेच अजो सोडून गेले आहेत. त्यांना पगारवाढ देऊन परत आणावे तरच ऐसिला अच्छे दिन येतील ... अजोंचा पंखा
३. मेघना भुस्कुटे आणि 'ष' उच्चारणारा एक माणुस हे दोघे कट्टयाला बोलतांना सुस्पष्ट उच्चार करून आम्हाला गंड देतात, जोवर हे दोघे असं करायचं थांबवणार नाही तोवर मि कुठल्याही कट्ट्याला हजेरी लावणार नाही. ('ष' माणसाचं बोलणं विकत घ्यावं लागतं ते बरचं) ... जळका सिफ़र
(No subject)
'ष' माणूस ओळखा नि षंभर रुपये कमवा ;)
https://drive.google.com/file/d/0B5T_SQsXiPnBY1UxMnpKdG5SMkU/view?pref=…
आपला वेगळा संसार मांडलेल्या
आपला वेगळा संसार मांडलेल्या लोकांनी त्या संसारातचं जे काय यश अपयश असेल ते साजरे करावे, पुन्हा बाहेर येऊन आमच्या चुलीवर चहा किती बघा किती छान होतो असे इतरांना ओरडून ओरडून सांगून त्यांच्या कौतुकाची अपेक्षा करू नये.
( याचा संबंध एका प्रसिद्ध गाभारा/कोनाडाशी लागत असल्यास तो चुकून नाही याची नोंद घ्यावी. ;) )
माझ्या एका वहिनीने नवीन लग्न
माझ्या एका वहिनीने नवीन लग्न झाल्या झाल्या याच जातीचा प्रस्ताव मांडला होता. (प्रेमविवाह असल्यामुळे ती सगळ्यांशी परिचित होती आणि संकोच नव्हता हे खरं. पण तरी तिची सूचना ऐकून लोक तिचे पंखे झाले!) अनेक वडीलधार्या माणसांना नवपरिणित दाम्पत्यानं नमस्कार करायचा होता. यावर बाई म्हणाल्या, "मी सगळ्यांना वाकून नमस्कार करत फिरण्यापेक्षा मी इथेच वाकून नमस्काराच्या पवित्र्यात उभी राहते, तुम्ही सगळे जण माझ्यासमोरून ओळीनं जा. ते सोपं पडेल. चालायचं नसेल, तर मोठा गोल करून उभे राहा. मी मध्ये उभी राहते नि वाकून स्वतःभोवती प्रदक्षिणा घालते. झालं, हाय काय नि नाय काय!"
हा प्रकार साखरपुड्यात मी केला
हा प्रकार साखरपुड्यात मी केला आहे. पुढचे दोन दिवस कमरेत ठणका लागून "पाँव भारी हो गया" पोजमध्ये हिंडत होतो.
लग्नात हे होऊ देणं (फॉर ऑबवियस रीझन्स) शक्य नसल्याने प्रंप्रेची कास धरली.
त्यामुळे - जेव्हा आऊटगोईंग नमस्कार इनकमिंग नमस्कार, तेव्हा या मताचा जरूर आग्रह धरावा.
मानवी दोष
महान हे विशेषण फक्त भारतीय संस्कृतीसाठीच जन्माला आलेले आहे असा आविर्भाव असतो.
हा दोष मानवी अत एव जागतिक असावा, असे वाटते. ('द ग्रेटेस्ट कण्ट्री ऑन अर्थ', वगैरे वगैरे.)
शेवटी, इण्डियन्स आर ऑल्सो ह्यूमन्स, यू नो! वी ह्याव टू ग्र्याण्ट देम द्याट.
(बोलला लिबरल साला!)
गुजरात मधे सवर्णपण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण
गुजरात मधे सवर्णपण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण
हे असे आरक्षण रद्द केले जावे. व घटनादुरुस्तीविधेयकाद्वारे सवर्णांना (विशेषतः ब्राह्मणांना) कोणतेही आरक्षण कधीही दिले जाणार नाही असे घोषित करावे.
तलाक तलाक तलाक म्हणण्याचा
तलाक तलाक तलाक म्हणण्याचा अधिकार नवरा बायको दोघांनाही असता तर तुमचे म्हणणे योग्य आहे !!
किंचित असहमत.
स्त्री विवाह करते तेव्हाच इम्प्लिसिटली इम्प्लिसिटली स्वतःचा ट्रिपल तलाक चा अधिकार forego करते असं गृहितक असेल तर ? विवाहात तिला सुद्धा विचारले जाते की "निकाह कुबूल है ?" तेव्हा तिला माहीती असते ना = की आपल्याला ट्रिपल तलाक चा अधिकार नाही व नसणार आहे व आपल्या शौहर ला तो अधिकार असणार आहे ?? ही असिमेट्री असते हे तिला माहीती असतेच की. तरीही ती "कुबूल है" असं म्हणते. म्हंजे बघा....
अर्थात विवाहात "कुबूल है" हे ती अनेकदा पालकांच्या प्रेशर मुळे म्हणत असेल तर समस्या आहेच.
सोप्पंय
स्त्री विवाह करते तेव्हाच इम्प्लिसिटली इम्प्लिसिटली स्वतःचा ट्रिपल तलाक चा अधिकार forego करते असं गृहितक असेल तर ?
असं असेल तर (मला माहीत नाही, मी मुस्लिम कायदा, कुरान वगैरे काही वाचलेलं नाही.) निकाह आणि लिव्हिन यांची तुलना होऊ शकत नाही. मग मूळ मत फक्त वादग्रस्त राहतं, त्यात काही दम राहत नाही.
गब्बर, तुला प्रणवचं मत पटलंय हे सरळच का मान्य करत नाहीस!
निकाह आणि लिव्हिन यांची तुलना
निकाह आणि लिव्हिन यांची तुलना होऊ शकत नाही.
लिव्हिन हे मला जास्त बरं वाटतं कारण दोन्ही पार्टीज ना चयन करता येतं. Remember the basic lesson of trade ? आता नातेसंबंध हे trade नसते असं म्हणायचा मोह होईलच.
--
गब्बर, तुला प्रणवचं मत पटलंय हे सरळच का मान्य करत नाहीस!
हो. प्रणव चा मुद्दा जास्त insightful आहे.
आता नातेसंबंध हे trade नसते
आता नातेसंबंध हे trade नसते असं म्हणायचा मोह होईलच.
कोणाला? एखाद्या नात्यातून आपल्याला फार काही मिळत नाहीये आणि आपली हानीच अधिक होत्ये हे लक्षात आल्यावर लोक नात्यांतून बाजूला होत नाहीत? मानवी नातेसंबंधांबद्दल बोलताना सहजच 'परस्परांमधले व्यवहार' असे शब्द वापरले जातात.
लिव्हिन हे मला जास्त बरं वाटतं कारण ...
दोन्ही बाजूंना समान अधिकार असतील आणि दोन्ही बाजूंना लग्नच करायचं असेल तर तो पर्यायही ज्यांना हवाय त्यांच्यासाठी असू दे. शिवाय, तू म्हणतोस तसं, आपापला पर्याय लग्न का लिव्हिन बरं वाटतं हे ठरवण्याबद्दल आक्षेप नाहीच. मूळ मुद्दा असा होता की तलाक-तलाक-तलाक आणि लिव्हिन यांची समसमा तुलना होती. ती तुलना गंडकी आहे; हे कदाचित प्रतिसादकर्त्याला समजत नाहीये किंवा समजलं असलं तरी खोडसाळपणा करायचाय.
दुर्दैवाने त्यात काही करमणूकमूल्यही नाहीये. गंमत म्हणून काडेपेटीच्या चार काड्या ओढल्या तर गंमत वाटते. चार काडेपेट्याभर काड्या ओढल्या तर बोअर होतं. त्यातून ही मचप टेप आंजावरही एवढी जुनी आहे ...
ही असिमेट्री असते हे तिला
ही असिमेट्री असते हे तिला माहीती असतेच की. तरीही ती "कुबूल है" असं म्हणते. म्हंजे बघा....
मुळात जर तलाक दिला तर स्त्रिला चरीतार्थसाठी महिन्याला अमुक अमुक रक्कम देणे ठरले आहे आणी तेसुधा कबुल आहे का असे विचारले जाते. त्यामुळे कुबूल है म्हटल्यावर स्त्रिने नवर्याने तिला तलाक द्यायचा हक्क मान्य केला आहे असेच ठरते. तसेच तीसुध्दा नवर्याला मला तलाक दे अशी मागणी करु शकते. (म्हणजे त्याला तिच्या चरितार्थची रक्कम देणे आपोआप भाग पडेल).
घरात म्हणे मेलेल्या
घरात म्हणे मेलेल्या व्यक्तींचे फोटो लावू नयेत ? त्याना अन आपल्याला म्हणे प्रॉब्लम येतात ....
मग काय म्हणता मित्रांनो उद्यापासून सर्वत्र आझाद, फुले, अंबेडकर, टीळक, शिवाजी महाराज यांचेही फोटो लावणे बंद करायचे काय ? म्हणजे घर काय ऑफिस काय फोटो ते फोटोच ना ?
जीवनाच्या काही रहस्यांबद्दल -
जीवनाच्या काही रहस्यांबद्दल - मृत्यु, सेक्स, इतके अवडंबर का माजविले जाते तेच कळत नाही. त्यांना एक गूढतेचे वलय अंगभूत आहे - हे मान्य. पण म्हणून लगेच ..... अंधश्रद्धा जोपासल्याच पाहीजे असे काही नसते. तुम्ही वर दिलेली अंधश्रद्धा ही मृत्युबद्दलची. तर लिंगपूजा, योनीपूजा असली अंधश्रद्धा व उदात्तीकरण हे सेक्स बद्दलचे.
एकंदर लहानपणीच्या पर्या, लेप्रेकॉन्स (परदेशी मुलांचे) हे मनाचे खेळ फक्त लहान मुलांचेच नसतात तर मोठ्यांचेही असतात.
म्हणजे इथे कसे फाईट सीन चालू
म्हणजे इथे कसे फाईट सीन चालू झाला की आवाज़ येतो तसे का?
घुसमट टाळणे अन जबाबदारी टाळणे
घुसमट टाळणे अन जबाबदारी टाळणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहित काय ?
खरे आहे. सुवर्णमध्य साधणे कठीणच आहे. असे करता येऊ शकते की नव्या पीढीने व जुन्या पीढीने, वेगवेगळ्या घरात पण जवळ जवळ रहायचे. पण मग तेवढा पैसा व घराची उपलब्धता हवी.
अजुन एक - जेव्हा नवीन लग्न झालेले असताना अॅडजस्ट्मेन्ट चे इश्युस येतात, भांडाणे, धुसफूस होते तेव्हा या जुन्या पीढीनेच, सावरुन घेतलेले असते. अपत्यसंगोपनात रात्री जागुन , काळजी घेऊन, आई-बाळ व सर्वांचीच काळजी घेऊन फार मोठा हातभार लावलेला असतो. हे कसे विसरता येइल?
नाण्याची एक बाजू - घुसमट असते तशीच दुसरी बाजू, वेळोवेळी झालेली मदतही असतेच की.
१९७५
>> १९७५नंतर लताबाईंनी स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हवी होती.
माझ्या मते ह्यात वादग्रस्त भाग १९७५ एवढाच आहे, कारण माझ्या मते त्यांनी १९६०च्या दशकातच निवृत्त व्हायला हवं होतं. मासल्यादाखल डेटा पॉइन्ट्स - मेरे मेहबूब (१९६३), प्रोफेसर (१९६३). ह्यानंतर केवळ 'गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी'!
कारण माझ्या मते त्यांनी
कारण माझ्या मते त्यांनी १९६०च्या दशकातच निवृत्त व्हायला हवं होतं. मासल्यादाखल डेटा पॉइन्ट्स - मेरे मेहबूब (१९६३), प्रोफेसर (१९६३).
.
थाडे रहियो ....
.
.
या वाक्याला तीव्र आक्षेप. हे एक गाणं (१९७० मधलं) इथे डकवत आहे. लताबाईंनी १९७० च्या दशकात सुद्धा अनेक उत्तमोत्तम गाणी गायलेली आहेत हे निदर्शनास आणू इच्छितो. उदा. रैना बीती जाए, पाकीजा (१९७२) मधली अनेक गाणी, अभिमान मधली एकदोन (१९७३), रस्म-ए-उल्फत को निभाए तो निभाए तो कैसे (१९७३) .....
.
.
१९९५
मला तर तिची ऑल्मोस्ट १९९५ पर्यंतची अनेक आवडतात आणि इतर कोणाच्या आवाजात ती आवडणार नाहीत. 'जुनी' लता साधारण १९७० च्या सुमारापर्यंत असेल. पण नंतर ७० व ८० च्या दशकातील तिची गाणी आधीपेक्षा खूप वेगळी आहेत पण प्रचंड श्रवणीय आहेत. आता या काळातील सगळी गाणी चांगली आहेत असे नाही, पण हे १९६० च्या आधीच्या काळापर्यंतही लागू होईल. ही सगळी गाणी आधीपेक्षा खूप वेगळी आहेत, पण तरीही चांगली आहेत. विशेषतः लक्ष्मीकांत प्यारेलाल कडची तिची गाणी जबरी आवाज लागलेली आहेत (राजेश खन्ना व मनोज कुमार च्या पिक्चर्स मधली), ७० च्या दशकातील व अगदी एक दुजे के लिए, हीरो, बेताब (आर्डी) मधली सुद्धा.
डीडीलजे व हआहैको मधलीही आवडतात. नंतरची मात्र नाही आवडत. एखाद दुसरा अपवाद - दिल से मधले ते मल्लू शब्द वाले, एक खामोशियाँ गुनगुनाने लगी का असे काहीतरी शब्द असलेले.
आवाज की दुनिया के दोस्तों
>> माझ्या मते ह्यात वादग्रस्त भाग १९७५ एवढाच आहे, कारण माझ्या मते त्यांनी १९६०च्या दशकातच निवृत्त व्हायला हवं होतं.
इतके लोक ह्याच्याशी असहमत झाले म्हणजे नक्कीच हे मत वादग्रस्त आहे. मला मात्र लताबाईंचा कोवळा आवाजच फक्त आवडतो - बरसात, महलसारखे सुरुवातीचे सिनेमे, किंवा अनिल बिस्वास, सी. रामचंद्र आणि सज्जादकरता गायलेल्या गाण्यांत तो ऐकू येतो. नंतर नौशाद आणि शंकर जयकिशन वगैरेंनी त्यांना इतक्या तारस्वरात आणि इतक्या सातत्यानं किंचाळायला लावलं की त्यांच्या आवाजातला तो गोडवा निघून गेला. नंतरची मदनमोहन वगैरेंची गाणी जरी चांगली असली तरीही लताबाईंचा तो आवाज मला आवडत नाही.
. चिंजं शी या मुद्द्यावर
.
चिंजं शी या मुद्द्यावर बराचसा सहमत.
-
नंतर नौशाद आणि शंकर जयकिशन वगैरेंनी त्यांना इतक्या तारस्वरात आणि इतक्या सातत्यानं किंचाळायला लावलं की त्यांच्या आवाजातला तो गोडवा निघून गेला.
चांगल्यापैकी सहमत.
ये भी तो हो सकता है की लताबाईंना स्वतःला तारसप्तकात गाऊन "ही पहा माझी ताकद" असं शक्तीप्रदर्शन करावंसं वाटलं असेल. सिस्टिम च्या समस्यांसाठी फक्त सिस्टिम बाहेरचेच जबाबदार असतात असं नाही काही. ;-)
तुमच्या अवतीभोवती जी काही
In reply to तुमच्या अवतीभोवती जी काही by गब्बर सिंग
खूपशी संपत्ती आत्म्केन्द्रिपणातून गोळा झाली असेल , तर बाकी नाही .
काही माणसं काही वेळा आत्मकेंद्रित विचार करून काम करतात , काही माणसं काही वेळा आत्मकेंद्रित न राहून काम करतात.
नाही. पण ते असं म्हणू शकतील की स्वत:वर जो खर्च करत आहेत त्याचा उपयोग शेवटी समाजासाठी काम करण्यातच होत आहे. They are just a tool for that.
मोस्टली स्वहित भावनेतून देत असेल. आणि असे ही शक्य आहे की तो मिळालेल्या पैशातील एक भाग आत्मकेन्द्री न राहता दुसर्यांसाठी खर्च करत असेल.
या सगळ्या उदाहरणामधून फक्त एवढेच कळते की बरेच लोक , बऱ्याच वेळा आ. के. असतात. पण यावरून आ.के. पणाचे जगाला फायदे काय झाले हे समजले नाही. Moreover why should it be an ideal?