पुन्हा ऐरणीवरः समलैंगिकता!
सुप्रीम कोर्टाचा धक्कादायक निकाल. समलैंगिंक संबंध ठेवणे बेकायदेशीरच!
मुळात "नॅचरल" काय हे कोर्टाने कसे ठरवले हे समजले नाही.
या निकालानंतर सरकारला सुबुद्धी होवो आणि घटनेत/या कलमात बदल करून संमतीपूर्वक ठेवलेल्या (अत्यंत नैसर्गिक अश्या) समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळो ही मनःपूर्वक सदिच्छा!
निकाल वाचून फारच वाईट वाटले
संपादकः सदर चर्चा समलैंगिकता, अश्या संबंधांची नैसर्गिकता, संबंधीत कायदेशीर बाबी आदी विविध अंगांनी चर्चा करण्यास सोपे जावे म्हणून मूळ धाग्यातून वेगळी करत आहोत. यावर अधिक विस्ताराने सम्यक चर्चा होईल अशी अपेक्षा
टोलवाटोलवी
मुख्य मुद्द्याला बगल देऊन काहीतरी हास्यास्पद आणि काल्पनिक घटनांना पुढे आणून चाललेली टोलवाटोलवी म्हणजे तुमच्याकडे ठोस मुद्दे नाहीत याचे द्योतक (का काय ते) आहे. तुर्तास इतकेच मत नोंदवतो.
-Nile
आपल्याला माझ्या
आपल्याला माझ्या व्यक्तित्वाबद्दल इतकी खात्रीलायक माहिती असेल तर आपण एकमेकांना प्रतिसाद देण्याचे टाळलेले बरे. पण तरीही मी म्हणतो, तो एक थेरॉटिकल प्रश्न्न आहे. उचित वाटला नाही तर टाळा. प्रश्न विचारणेच चूक आहे म्हणणे मला रास्त वाटत नाही. तो का आवश्यक वाटला तेही मी वर अदितीजींना उत्तर देताना लिहिले आहे.
माझे विचार बर्याच मोठ्या मनातल्या प्रमाणातल्या समाजमनाचे (ज्याला आपण मागास समजता) प्रतिनिधित्व करतात. मी जे जे ऐकून / विचार करून माझी मते बनवली आहेत तेच मी इथे लिहितो. You should not read into this more than what I am writing.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काहीही अवांतर
व्यक्तित्व? मी दिलेला प्रतिसाद तुमच्या ह्या धाग्यांवरील प्रतिसादांतल्या मुद्द्यांवर होता आणि आहे.
एखाद्याच्या प्रतिसादांवर कोणाचे प्रतिसाद यावेत येऊ नये, हे जाहिर स्थळांवर, त्याच्या हातात नाही. तेव्हा, क्षमस्व.
प्रश्न मुद्द्याला सोडून आहे. हे मत पटत नसेल तर या पैकी हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे गृहित धरून तुमच्या प्रश्नाच्या उत्तराने काय साध्य होईल ते स्पष्ट करा.
-Nile
अहो मी वर म्हटले आहे ना,
अरुणभाऊ,
अहो मी वर म्हटले आहे ना, भविष्यात जर मला एखाद्या समान लिंगाबद्दल शारीरिक आकर्षण वाटले तर मी खुश्शाल समलैंगिक संबंध ठेवीन.
आता त्याचे पुढे काय? ह्या डेटा पॉइंटमुळे तुमच्या थिअरीत कोणता फरक पडेल वा पडणार नाही?
अर्थातच पडेल, ते वैयक्तिक
अर्थातच पडेल,
ते वैयक्तिक फायद्याचं पण आहे. मला माझा मुलगा समलैंगिक निघाला असता तर जबरदस्त धक्का बसला असता. बरेच लोक अशी मानसिक तयार बाळगून आहेत हे पाहिल्यावर मी माझे समज /गैरसमज पडताळून घेईन, आणि तो कमी बसेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रश्न मुलाचा आहे की स्वतःचा?
प्रश्न मुलाचा आहे की स्वतःचा? एकीकडे प्रश्नात स्वतः तयात आहात का म्हणायचं आणि दुसरीकडे मुलाच्या वागणुकीचा संबंध जोडायचा याला काय अर्थ आहे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धाग्याच्या सुरुवातीला धनंजय
धाग्याच्या सुरुवातीला धनंजय यांच्या दोन लेखांचे दुवे दिलेले आहेत, ते वाचले नसतील तर जरूर वावाचावे ही आग्रहाची विनंती.
माझ्या कुटुंबात मागच्या पिढीतील एक पुरुष समलैंगिक आहे. चारचौघांप्रमाणे चांगले आरोग्य, उच्च बुद्धिमत्ता आणि कर्तबगारी असलेला. जनरीतीप्रमाणे मुलगी बघून लग्न झाले. मूल झाले. उत्तम पिता, मोठ्या पदावर असलेला, सर्व कौटुंबिक जबाबदार्या व्यवस्थित पार पाडणारा. त्याचा लैंगिक कल बहुतांश पुरुषांपेक्षा वेगळा असणे यापैकी कुठल्याही गोष्टीच्या आड आलेले नाही. पण नैसर्गिक ओढीला मारून मुटकून बदलता येत नाही. त्यांचे लग्न कायम असले तरी लैंगिक अर्थाने जोडीदारी केव्हाव संपली. त्याच्या तरुणपणी तर समलैंगिकता फारच दडपलेली बाब होती. खूप वर्षांपासून परदेशी वास्तव्य आहे ते याही कारणामुळे असावे. हा माणूस कुठल्याही बाबतीत चारचौघांपेक्षा विचित्र किंवा हिंदी चित्रपटातल्या चित्रणांप्रमाणे हास्यास्पद नाही. आता काळ बदलतो आहे. पुढच्या पिढीतील मुलांना एवढा विरोध सहन करावा लागणार नाही. पण तसे व्हावे म्हणून तुमच्या आमच्यासारख्यांनी आपल्याला कदाचित आकर्षण वाटेल किंवा नाही याची वाट का पहावी? आत्ता अनेक समलिंगी व्यक्ती समाजात आहेतच की. या बाबतीत पुष्कळ प्रमाणात शास्त्रीय माहितीही उपलब्ध आहे. तुम्ही ठेवलेला मोकळा दृष्टिकोन अधिक व्यापक करणे इतकेच आवश्यक आहे.
(अवांतर)
का कोण जाणे, पण 'एक रुका हुआ फ़ैसला' पिच्चर उगाचच आठवला.
मत
समलैंगिकता - समान लिंगी व्यक्तीबरोबरचं मैथुन हे त्यात आलं - बेकायदेशीर असावी का ?
नाही. लैंगिक व्यवहाराला उभयपक्षी संमती असणार्या दोन प्रौढ व्यक्तींमधल्या गोष्टी या मधे काहीही बेकायदेशीर असणं बरोबर नाही. यामधे न्यायालय, पोलीस, सरकार किंवा अन्य लोक यांचा काही संबंधच नाही.
थोडक्यात
- बळजबरीने केलेल्या लैंगिक क्रिया
- शोषणाधारित व्यवस्थेमधे अंतर्भूत असलेला लैंगिक व्यवहार
- कायद्याच्या दृष्टीने अज्ञान असणार्या मुलामुलीबरोबरचा (अगदी त्या मुलाने/मुलीने संमती दिलेली असली तरीचा) लैंगिक व्यवहार
- सार्वजनिक ठिकाणी केलेला लैंगिक व्यवहार
या गोष्टी कायद्याच्या कक्षेत येणार्या आणि पर्यायाने बेकायदेशीर असाव्यात. त्या तशा आहेतच. याची अंमलबजावणी कशी होते, कितपत परिणामकारक रीतीने होते, होते की नाही वगैरे प्रश्न निराळे. "ऑन पेपर" या गोष्टी अवैध आहेत. आणि त्या अवैध असणं मला बरोबर वाटतं.
दोन प्रौढ व्यक्तींमधला समलैंगिक व्यवहार यामधे येऊ नये असं मला वाटतं. बस्स. इतकंच.
सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे या अशा "कन्सेंटींग अॅडल्ट्स"मधल्या खासगी व्यवहाराला बेकायदेशीर ठरवले गेलेले आहे. हा मूलभूत वैयक्तिक स्वातंत्र्यावरचा बडगा आहे. त्याचा मी विरोध करतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
सार्वजनिक ठिकाणी केलेला
हे का गैर असावं?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
माझ्यामते
माझ्यामते सार्वजनिक ठिकाणी केलेला लैंगिक व्यवहार अश्लीलतेच्या कलमामधे यावा.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
अश्लीलतेच्या कलमात काय काय
अश्लीलतेच्या कलमात काय काय येतं? आणि अश्लीलतेत वाईट किंवा हानिकारक काय असतं की ज्यामुळे त्यावर बंदी यावी?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कल्पना नाही.
>> अश्लीलतेच्या कलमात काय काय येतं? <<<
कल्पना नाही. पण सार्वजनिक लैंगिक व्यवहार आणि शरीर प्रदर्शन येत असावं असा अंदाज आहे. आणि ते येणं योग्य आहे असं माझं मत आहे.
>> आणि अश्लीलतेत वाईट किंवा हानिकारक काय असतं की ज्यामुळे त्यावर बंदी यावी? <<<
हे थोडंसं ध्वनीप्रदूषणासारखं आहे. सार्वजनिक स्पेसमधे प्रत्येकाने हेडफोन्स लावावेत आणि हवा तितका व्हॉल्युम ठेवावा. मात्र लाऊडस्पीकर लावून लोकांवर नको तो अत्याचार करणं यावर बंदी आहे (असं मला वाटतं.) आणि ही बंदी योग्य आहे (असं मला वाटतं)
तद्वतच सार्वजनिक ठिकाणच्या अश्लीलतेबद्दलचं आहे. इतरेजन जेथे वावरतात त्यांना नको असलेली नग्नता आणि लैंगिक व्यवहार यावर बंदी आहे (असं मला वाटतं.) आणि ही बंदी योग्य आहे (असं मला वाटतं).
अवांतर :
अश्लीलतेबद्दल वेगळा धागा सुरू करा. इतरही धागे सुचू शकतात :
"हिंसेत, खुनात, बलात्कारात, शोषणात वाईट किंवा हानिकारक काय असतं की ज्यामुळे त्यावर बंदी यावी?"
"बंदी यावी असं खरोखरच देशात/समाजात/जगात काही असू शकतं का ?"
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
ढेरे
ढेरेंच्या प्रश्नास बगल दिली गेल्याचे जाणवते.
त्यांची शंका मला समजली तशी मांडतो. जमल्यास उत्तर देणे.
"हिंसेत, खुनात, बलात्कारात, शोषणात वाईट किंवा हानिकारक काय असतं की ज्यामुळे त्यावर बंदी यावी?"
"बंदी यावी असं खरोखरच देशात/समाजात/जगात काही असू शकतं का ?"
ह्यात इतरांना इजा होत आहे. समजा क्ष य झ ह्या तीन व्यक्ती आहेत. क्ष आणि य ह्यांच्या जाहीर लैंगिक व्यवहारातून झ ला इजा होत नाही.
तरीही झ ह्या व्यक्तीला क्ष आणि य ह्यांच्या लैंगिक कृत्यांबद्दल आक्षेप का असावा?
त्याला अश्लीलता वगैरे गोष्टी चूक वाटतात म्हणून इतरांना कपडे घालण्याची जबरदस्ती का असावी?
जाहीर ठिकाणी हेडफोन्स असावेत हे ठीक. पण जाहीर ठिकाणी दोन व्यक्तींनी आपसात बोलूच नये असा कायदा नाही.
तस्मात दोन व्यक्ती लैंगिक व्यवहार सार्वजनिक ठिकाणी करतो म्हटले तर नक्की चूक काय आहे?
उद्याने, रिकामे फूटपाथ किंवा इतरत्र कुठेही त्यांनी ती कृती करणे ह्यात नेमके वावगे काय?
शेकहँड करणे आणि संभोगक्रिया करणे ह्यात उदारमतवादी आणि प्रोग्रेसिव्ह लोक भेद करतात का?
का करतात?
शेकहँड मध्येही दोन अवयव जवळ येतात. त्यात आणि इतर काही अवयव एकमेकांजवळ येणे ह्यात नक्की फरक काय आहे?
शिवाय अजून एक मुद्दा :-
माकडांनी कपडे घातले नाही तर चालतं. खरं तर कपडे न घालणं हेच "नैसर्गिक" आहे.
वस्त्रांकित असण्याचा किमान मापदंड असणे ही जबरदस्तीच नव्हे का?
मानवांनी का निर्माण केला? का पाळतात?
.
.
इतरेजन जेथे वावरतात त्यांना नको असलेली नग्नता आणि लैंगिक व्यवहार यावर बंदी आहे (असं मला वाटतं.) आणि ही बंदी योग्य आहे (असं मला वाटतं).
इतरांची हानी होत नसेल, इजा होत नसेल तर एखादी कृती करण्याचं एखाद्या व्यक्तीचं स्वातंत्र्य का हिरावून घेतलं जातय?
तुम्हाला ते योग्य का वाटतय? अरे, आज कपडे घालण्याची सक्ती करत आहात.
उद्या काळ्या रंगाचेच कप्डे घाला अशी सक्ती कराल. तुमच्या किबोर्डाला काही हाड?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कोणते नियम पाळायचे हे आधी
कोणते नियम पाळायचे हे आधी अनेकदा म्हटल्याप्रमाणे स्थळ-का़ळ-व्यक्ती सापेक्ष आहे. उदा. द्यायचं तर सध्याच्या काळात भारतात बहुतांश समाजांत कपडे घालणं हे सामाजिक संकेतांना धरून आहे. भारतातच (जारवांसारखे) कित्येक अल्पसंख्य समाज आहे जे सदर संकेत मानत नाहीत म्हणून ते काही 'क्रिमिनल गुन्हा' करताहेत असे मानावे का? माझ्या मते नाही.
कपडे न घालणे हा भारतात क्रिमिनल गुन्हा नसावा (नाही हे योग्यच आहे). अन्यथा सर्व दिगंबर साधु, न्युड बीचेस वर सूर्यस्नान घेणारे पर्यटक व इतर अनेक व्यक्ती जेलात असत्या.
सध्या भारतात बहुतांश समाजात उघड्यावर संभोग करणे केवळ संकेतबाह्य नसून समाजसंमतही नाही. त्यामुळे सध्या भारतात त्याविरोधी कायदा आहे. इतर काही देशांत जाहिर चुंबन घेणे वगैरे समाजसंमत नसल्याने तसे करण्यावर बंधने सैल आहेत. (भारतातच असाही काळ होता जेव्हा पुष्करिणीत रतक्रीडेत रममाण झालेल्या मदिराक्षींची वर्णने वाचता येतात. अश्वमेध यज्ञही जाहिरच व्हायचे ). विकीपान युकेमध्ये "सेक्स ऑन प्रीमायसेस वेन्यु" मध्ये वाढ झाल्याचे सांगते आहेच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
समाजसंमत
सध्या भारतात बहुतांश समाजात उघड्यावर संभोग करणे केवळ संकेतबाह्य नसून समाजसंमतही नाही. त्यामुळे सध्या भारतात त्याविरोधी कायदा आहे.
सध्या भारतात बहुतांश समाजात गे संबंध ठेवणे केवळ संकेतबाह्य नसून समाजसंमतही नाही. त्यामुळे सध्या भारतात त्याविरोधी कायदा आहे.
.
.
हे अनुपजींना हे असं म्हणायचं असावं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सध्या भारतात बहुतांश समाजात
वर दिलेली उदाहरणे ही सार्वजनिक डोमेनमधील असल्याने सोशल मत विचारात घेणे गरजेचे ठरते.
उघड्यावर गे संबंध ठेवले तरी ते त्या कायद्याने गैर ठरवावेत.
मात्र सद्यस्थितीत, खाजगी जागेत परस्परसंमतीने दोन सज्ञान व्यक्तींनी असे संबंध ठेवणे बेकायदेशीर ठरते आहे. किंबहुना कोणत्याही दोन व्यक्तींनी (अगदी भिन्नलिंगीसुद्धा) आपापल्या बेडरूममध्ये गुदमैथून करणे क्रिमिनल ऑफेन्स होत आहे. हे व्यक्तीस्वातंत्र्याच्या आड येते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद !
माझा प्रश्न चांगला माडल्याबद्दल धन्यवाद!
दोघांमधला कुठलाही व्यवहार तिसर्याला त्रास देत नसेल तर त्या तिसर्यानी का आक्षेप घ्यावा?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आक्षेप?
एक प्रतिप्रश्न - तुमची(आस्तिक/नास्तिक/उदारमतवादी) प्रवृत्तीची उपस्थिती मला त्रासदायक वाटत असल्यास आक्षेप चालेल काय?
टिप - तुमच्यावर वैयक्तिक टिप्पणी हा हेतू नाही.
मुख्य धाग्याबद्दलःनिकाल
मुख्य धाग्याबद्दलः
निकाल दुर्दैवी आहे. ऋषिकेशनं म्हटल्याप्रमाणे याविरुद्ध चळवळ होईलच, त्याला माझा जाहीर पाठिंबा असेल.
*************************************************************************
अरुण जोशी यांस
तुमची मतं वाचल्यानंतर (जोतिबा फुलेंनी काही फारसे थोर काम केले नाही, बायकांवर पुरुषांनी कधीही अन्याय केला नाही, समलैंगिकतेला 'उत्तेजन' देऊ नये इत्यादी) पहिली प्रतिक्रिया अविश्वासाची होते. दुसरी सरळसरळ हिंसक म्हणता येईल अशा रागाची. आपली बाजू मांडण्याकरता कोणताही विदा नसताना सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ गोष्टींबद्दल हा माणूस इतका अन्याय्य पवित्रा कसा घेतो, यातून आलेली. वादांत शक्यतोवर व्यक्तिगत बाबींवर उतरायचे नाही, म्हणून ही प्रतिक्रिया गिळली जाते आणि युक्तिवाद होतात. पण त्यावरही तुम्ही दुसर्या बाजूच्या न्याय्य मुद्द्यांकडे सरळ दुर्लक्ष करता आणि अतिशय संदिग्ध अशा भाषेत आपली निरर्थक आणि हास्यास्पद (होय, हे शब्द वादग्रस्त आहेत, मला ठाऊक आहे) मते आणि तर्क मांडत राहता. त्यावर थंड डोक्यानं युक्तिवाद केले, तरी तुम्ही भाषेबिषेसारख्या नि:शस्त्र गोष्टीला दोष देऊन नामानिराळे राहता. त्यामुळे तुमच्या नादी लागण्यात अर्थ नाही, असा विचार करून लोक शांत बसतात. फार तर थोडी चिडचिड, माफक खवट मस्करी, क्वचित कुचेष्टा करतात. बास.
पण या धाग्यात गोष्ट इतकी साधीसरळ नाही.
वर अनेक लोकांनी धनंजयच्या काही अनुभवकथनांचा संदर्भ दिला आहेच. (ही याच संस्थळावर झालेली चर्चा.) धनंजयनं हे जालावर जाहीर केले आहे. असेही अनेक लोक या व्यासपीठावरही असतील, आहेत, ज्यांनी धनंजयप्रमाणे आपले लैंगिक स्टेटस जाहीर केलेले नाही. पण ते समलिंगी / उभयलिंगी / समलिंगी संबंधांना खुलेपणानं पाठिंबा देणारे आहेत. किंबहुना जोवर दोन (किंवा जास्तही) सज्ञान माणसांची संबंधांना संमती आहे, तोवर त्या माणसांना अडवण्याचा समाजाला काहीही अधिकार नाही असे मानणारे अनेक लोक इथे आहेत. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या लोकांकरता हा कोरडेपणाने तत्त्वचर्चेसाठी घेण्याचा प्रश्न नाही. धनंजयबद्दल इथल्या बहुतांश लोकांना फार आदर + आत्मीयता आहे. त्यात त्याच्या ऋजू, विद्वान, अभिनिवेशरहित जालीय व्यक्तिमत्त्वाचा वाटा आहे, तसाच अशा प्रकारची भूमिका जाहीरपणे घेण्याचा, तिचे तर्कशुद्ध + मानवी स्पष्टीकरण देण्याचा, त्यातून अनेकांचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलण्याचाही मोठा वाटा आहे.
त्यामुळे समलैंगिकतेबद्दल (किंबहुना लैंगिकतेबद्दलच) अशा प्रकारची बेजबाबदार अद्वातद्वा विधानं करून - आणि वर शहाजोगपणे तर्कशुद्ध तत्त्वचर्चा करत असल्याचा आव आणून तुम्ही या सगळ्या लोकांचा अपमान करता आहात. एरवीच्या कोरड्या चर्चेत डोकं शांत ठेवणं प्रयत्नसाध्य असतं (खरं तर नसतं. बाई म्हणून तुमची मतं वाचताना अहिंसेचं तत्त्व पाळण्याची कसोटी लागते. पण ते असो.). पण इथे प्रश्न थेट मित्रांशी येऊन भिडतो. डोकी तत्काळ भडकतात. हे टाळायचं असेल, तर असं करू नका, खुलेपणानं विचार करून पाहा, असं तुम्हांला सांगावंसं वाटतं. नाहीतर या चर्चांतून शतकी धागे आणि एकमेकांबद्दलची अप्रियता वाढण्याखेरीज काहीही निष्पन्न होणार नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मी कोणतेही आक्षेपार्ह विधान
मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. लैंगिकतेचा आणि बुद्धिमत्तेचा संबंध लावला नाही. आणि कोणत्याही व्यक्तिच्या कसल्याही वागण्याला आक्षेप घेतला नाही.
अवांतर - स्त्रीयांवर अन्याय झाला नाही: सतत १% स्त्रीभ्रूणहत्या २५००० वर्षे झाली तर मानवजातच नष्ट होते याचे एक्सेल फाईल आजच मी दुसर्या धाग्यावर पोस्ट केली आहे. वाचा ही विनंती.
मला माझे नम्रतेनेच नोंदवायचे आहे. पून्हा सांगेन, Please do not read what I have not written.
संकेतस्थळालाच विरोधी विचारसरणी मान्य नसेल तर स्पष्ट सांगावे. मी इथे लिहिणे सोडून देईन. दारू पिणार्या (वा न पिणार्या) चमूत जाऊन दरच वेळी त्यांचा रसभंग करण्याचा माझा मानस नाही. काही लोक आपापल्या सर्कल मधे सुखी असतात. If the editors(/mamanagement) of this site feel that I am too odd to be accomodated here, and to be spoken with respect here, I am happy to leave. मला उद्देशावरच चर्चा नको आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
असो. दुर्लक्ष हाच उत्तम उपाय
असो. दुर्लक्ष हाच उत्तम उपाय आहे तर.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
तुमच्यापैकी (समर्थक) कोण कोण
नाही. तुम्ही उद्देश्य स्पष्ट कराल काय? तुम्हाला चर्चाच करायची आहे ह्याबद्दल माझे दुमत नाही.
चावट
वाह्यात्,चावट विनोद एक ग्राफिटी आणि सदर प्रतिसाद ह्यावरून आठवला.
ग्राफिटी :-
"तुम्ही दारु पिता का?" -- "हा प्रश्न आहे की आमंत्रण?"
.
.
"तुमच्यापैकी (समर्थक) कोण कोण जण एक प्रयोग म्हणून समलिंगी संबंध करायला तयार आहे?"
"हा प्रश्न आहे की..."
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
(No subject)
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
चुकीची विधाने करून त्यांचे
चुकीची विधाने करून त्यांचे राउंड अबाउट समर्थन करणे याला विरोध केलेला खपत नसेल तर त्याला काय अर्थ आहे?
स्त्रीभ्रूणहत्या जुन्या काळात नव्हती कारण भ्रूण स्त्री की पुरुष हे कळण्याइतके तंत्रज्ञान विकसित नव्हते. तंत्रज्ञान विकसित होताक्षणी भ्रूणहत्या होते याचा दोष तंत्रज्ञानाकडे लावणार की मूळ प्रवृत्तींकडे? जे दिसत नाही त्याचे अस्तित्व अमान्य करणे हे कितपत बरोबर? इंडक्टिव्ह फॉलसीत अडकणे दर्शवूनही आग्रह सुटत नसेल तर याला अर्थ काय?
बाकी, ऐसीवर काही वेळेस महत्त्वाचे मुद्दे सोडून बीटिंग अरौंड द बुश केलेले पाहिले आहेच-पण इथे ओनस तुमच्यावर आहे. तुम्ही शब्दजंजाळात अडकवून तो सुटत नाही.
ती एक्सेल फाईल कुठे आहे हे कळाल्यास मत नोंदवता येईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी मुद्दाल विषय फिरवत आहे
मी मुद्दाल विषय फिरवत आहे म्हणत असशील तर असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रश्नाच्या उत्तरावरुन
अरुणजोशी,
येथे समलिंगी संबंध ठेवण्यास कोणकोण तयार आहे असा प्रश्न (बहुतकरुन) भिन्नलिंगी संबंध ठेवणाऱ्या समूहास विचारल्यानंतर येणाऱ्या नकारात्मक उत्तरांवरुन तुमच्या लक्षात यायला हवे की आपण लैंगिक संबंध कोणत्या स्वरुपाचे ठेवावेत ही निवड स्वभावाचा किंवा आवडीचा भाग नसून शरीर (किंवा मेंदू)च्या रचनेची आहे.
भिन्नलिंगी संबंध ठेवण्याची रचना मेंदूमध्ये असल्यास त्यांना समलिंगी संबंध ठेवणे न आवडणे हे जसे नैसर्गिक आहे तसेच समलिंगी संबंधच ठेवण्याची रचना मेंदूमध्ये असल्यास त्या व्यक्तींना समलिंगी संबंधच ठेवणे आवडणेही नैसर्गिकच आहे. यात आवडीचा किंवा संस्कारांचा किंवा नैतिकतेचा काहीही संबंध नाही.
शरीराची रचना म्हणावी तर
शरीराची रचना म्हणावी तर पुरेशी स्पष्ट आहे.
मेंदूची रचना म्हणाला तर शास्त्रांचा अभ्यास अपुरा आहे. अगदी मीठ आणि कॉफीबद्दल, त्यांच्या मेंदूच्या संबंधाबद्दल दर, महिन्याला परस्परविरोधी संशोधने होत असतात. बायसेक्शुअल लोक सोडले तर इतरांच्या भावना क्लिअरकट असाव्यात अशी अपेक्षा आहे. नसतील तर काही प्रश्न उभे राहतात -
१. लिंग एक आणि मानसिकता परलिंगी असणार्या लोकांना आपली मानसिकता कशी कळते? कधी कळते?
२. अशा लोकांना त्यांचे जोडीदार कसे ओळखू येतात?
३. लैंगिक मानसिकता वयानुसार बदलते का?
४. आधुनिक गॅजेट्स सोडली तर समलैंगिकता, विशेषतः स्त्रीयांमधे, कशी अनुभवता येते?
५. असे लोक भिन्न लिंगी व्यक्तीशी विवाह झाल्यावर लगेच ओळखता यायला हवेत? त्यांची भिन्नलिंगी लग्ने कशी यशस्वी होतात?
म्हणून हा प्रश्न मी अशास्त्रीय समाजभावनेचा प्रश्न देखिल मानतो.
इथे अन्य समलिंगी प्रजातींबद्दल दुवा दिला तिथे मी वेगळा प्रतिसाद देईन.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ह्या धाग्यातील अरुण जोशी
ह्या धाग्यातील अरुण जोशी ह्यांची बरीच मते मलाही न पटणारी आहेत, परंतु येथे धनंजय अथवा इतरही कोणाबद्दलही 'वैयक्तिक' स्वरूपाची अद्वातद्वा चिखलफेक त्यांनी केली आहे असे मला वाटत नाही.
+१
सहमत. अरुणजोशी 'आव' आणत आहेत असे वाटत नाही. कदाचित त्यांचे बरेच गैरसमज असावेत. मात्र ते आक्रमक न होता समजून घेऊन चर्चा करत आहेत हे महत्त्वाचे.
+१
त्यांना काही बाबतीत माझे विचार पटवून देणे मला आवडेल, पण ते सहजी होणारे नाही. तरीही ते हेतुपुरस्सर अपमान कतत आहेत असे अजिबात वाटत नाही. त्यंच्या काही प्रतिसादांत ते विचार जास्त व्यापक करण्यास खुलेही असावेत असे दिसते. उलट, त्यांची विचारसरणी, भले ती मला न पटो, व्यक्तिगत पातळीवर न उतरता मांडत आहेत जे असे विचार मांडणार्या अनेकांना जमत नाही. अशा अनेक लोकांसाठीही हा धागा विचारांची देवाणघेवाण / प्रबोधन करणारा ठरेल.
अगदी असेच आहे. कोणत्याही
अगदी असेच आहे. कोणत्याही विचारसरणी वा आचारसरणीचा तात्त्विक विरोध करणे वेगळे आणि कोणाचा अपमान करणे वेगळे. आणि हा शुद्ध विरोध देखिल नाही. केवळ संवाद आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मेघनाच्या प्रतिसादानुसार,
मेघनाच्या प्रतिसादानुसार, आकलनाच्या अभावी अरुण जोशींनी केलेली विधानं बेजबाबदार, अद्वातद्वा प्रकारची ठरतात. आकलन कमी आहे हे मान्य न करता तर्कशुद्ध तत्त्वचर्चा करत असल्याचा आव आणून तुम्ही या सगळ्या लोकांचा अपमान करता आहात. (अधोरेखित शब्द माझे)
"अभ्यास वाढवा", "मोठे व्हा" प्रकारची, मराठी संस्थळांवर प्रसिद्ध असणारी विधानं सातत्याने आठवावीत असे प्रतिसाद अरुण जोशींनी या धाग्यातही दिलेले आहेत. मेघनाची जशी चिडचिड होते तशी माझीही होतेच. म्हणून अशा अभ्यासहीन प्रश्न-विधानांकडे दुर्लक्ष करून, त्यापेक्षा काहीतरी भरीव करण्याचा प्रयत्न मी सुरू केला आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुम्ही ज्या प्रकारे आकलन शब्द
तुम्ही ज्या प्रकारे आकलन शब्द वापरला आहे ते पाहता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला अक्कल नाही आणि तुम्हाला आहे असा त्याचा एकून अर्थ होतो. माझे मत न्यायाधीशांपेक्षा बरेच सौम्य आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
असहमत.
मेघना तुझी चिडचिड मी समजू शकते पण अरूण जोशींनी त्यांना काय वाटतं ते प्रत्यक्ष न म्हणता सर्वसाधारणपणे इथल्या इतरांना पटेल अशी भूमिका घेतली तर ते अधिक धोक्याचं आहे. ज्या विषयांवर अजून समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत, लोकमत दुभंगलेले आहे त्याबद्दल अशा चर्चा त्रासदायक झाल्या तरी त्या व्हायला हव्यात. एखाद्याला विचार करायला लावून त्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सोपा असतो असे मुळीच नाही पण त्या निमित्ताने इतर चारजण विचार करून आपल्या विचारांतल्या विसंगती तपासत असतील तर तसे व्हायलाच हवे. नाहीतर अरूण जोशी म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या वर्तुळात सुखी असतो!
समलैंगिकतेच्या बाबतीत अनेक नातेवाईकांची, सुशिक्षित आणि सर्वसाधारणपणे सुसंस्कृत लोकांची मते ऐकूनही कधीकधी चक्राऊन जायला होतं! केवळ आपल्याशी सहमत असलेल्या मित्रमंडळावरून समलैंगिकतेबद्दल भारतीय (खरंतर जागतिक) समाजाची धारणा तपासायला गेलं तर ती किती मोठ्ठी घेडचूक आहे याचा अनुभव मी घेतला आहे. या विषयावर 'प्रचंड' शिक्षणाची गरज आहे आणि आपला संयम सुटता कामा नये. इथेही त्यांची एक प्रतिक्रिया मला लक्षणीय वाटते ज्यात ते म्हणतात की 'इतरांना समलैंगिकता आक्षेपार्ह्य वाटत नाही असे समजल्यावर समजा त्यांचा मुलगा समलैंगिक निघाला तर त्यांना कमी धक्का बसेल', माझ्या मते ही एका अर्थाने सुधारणाच आहे.
अरूण जोशींनी त्यांच्या लोकप्रियतेवर काय परिणाम पडतो याचा विचार न करता त्यांना काय वाटते ते मांडणे गरजेचे आणि धाडसाचे आहे. त्यांनी फक्त चर्चा करताना मुद्द्यांना बगल देऊन व्यक्तिगत आणि बेजबाबदार वक्तव्ये करणे टाळले तर बरे होईल असे मलाही वाटते.
तुला मुद्दामहून उत्तर देते
तुला मुद्दामहून उत्तर देते आहे, कारण तुझे प्रतिसाद इतके संतुलित असतात की कितीही बहकलेलं डोकं तत्काळ ताळ्यावर यावं.
धाडसाबद्दल शंका नाही, कधीही नव्हती. पण तर्क, कारणमीमांसा, संतुलित युक्तिवाद - या सगळ्याची परिणती 'नाही, पण मला बॉ अस्संच वाटतं,' असं म्हणण्यात होते हे मी अनुभवलं आहे. तो अनुभव ताजा आहे. आणि हा विषय अगदी जवळचा. (माझे काही जवळचे मित्र-मैत्रिणी या गटात मोडतात.) बरं, तर्काधारित चर्चा करतो असं म्हणणार्या माणसानं जसं वागावं, तसे जबाबदारपणे जोशी वागत नाहीत म्हणून ते 'तसा आव आणतात' असं माझं मत (अनेक लोकांना तसं वाटत नसलं तरीही). या तिन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून माझी ती प्रतिक्रिया होती. 'जरा जपून बोला, भडकाभडकी होईल...' अशी.
त्याचा परिणाम उलटाच झाला.
ज्या माणसांना खरंच माणसांना समजून घ्यायचं असतं, ते व्यक्तिगत अनुभवांना जास्त झुकतं माप देतात असाही माझा अनुभव आहे. त्यातली सत्यासत्यता अनुभवल्यावर मग तर्क येतो. पण जोशींना धनंजयच्या अनुभवकथनाबद्दल काय म्हणायचं आहे हेही त्यांनी इथे कुठे नोंदलेलं नाही. समलैंगिकतेला एक संस्था म्हणून प्रोत्साहन देऊ नये (का कुणास ठाऊक) इतकंच ते ठामपणे (धाडसीपणे, बाणेदारपणे, अभिमन्यूप्रमाणे इत्यादी) धरून आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मी वाद घालणार नाही. पण लग्नसंस्थेच्या धाग्यावरची तुझी प्रतिक्रिया वाचून मी जीभ चावली होती, त्यामुळे तुला स्पष्टीकरण देऊ लागते मी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
स्पष्टीकरण.
मी आधीच म्हटल्याप्रमाणे मी समजू शकतेच. माझेही काही मित्रमैत्रिणी या गटात मोडतात आणि हा विषय मलाही म्हणूनच अधिक महत्वाचा वाटतो. लोकांचे समज-गैरसमज, अर्धवट किंवा चुकीची माहिती आणि त्याच्या जोरावर नैतिकतेचा गप्पा, कुटुंबसंस्था धोक्यात आल्याची चेतावणी वगैरेनी मलाही भयंकर त्रास होतोच. पण मला म्हणायचे असे होते की माझ्या (आणि तुझ्याही) समलैंगिक मित्रमैत्रीणींसाठी मला या विषयावरची चर्चा त्रासदायक झाली तरीही चालू ठेवाविशी वाटते. ज्यांना आपली मते चुकीच्या तर्कावर आधारलेली आहेत हे कळूनही बदलायची इच्छा नसते त्यांचं सोडून दे पण चर्चा वाचणारे इतर अजून ठाम मत न बनलेलेही लोक असतीलच ना, त्यांच्या फायद्यासाठी तर संयमित चर्चा (त्रासदायक होऊनही) चालू ठेवावी लागेलच असे आपले मला वाटले. अरूण जोशी म्हणतात त्यापेक्षा कितीतरी असभ्य आणि अप्रस्तुत भाषा समलैंगिकांच्या बाबतीत अगदी जवळच्या (नात्यातल्या किंवा सामाईक मित्रमंडळी असलेल्या)वाटत असलेल्या (भारतीय आणि परदेशीही!) लोकांकडून ऐकल्यावर मला असं वाटायला लागलंय की या बाबतीत आपल्याइतकंच प्रबोधन इतरांचही झालं असेल हे गृहितक फार चुकीचं आहे. तुझा पेशन्स संपला असेल तर तेही समजू शकते पण मला काय म्हणायचं होतं हे तुझ्या लक्षात आलं असेल अशी अपेक्षा आहे
होय, समजतं आहे. प्रबोधन
होय, समजतं आहे. प्रबोधन झालेलं नसणं अगदी सहजशक्य आहे. मात्र भोंदू हट्टाग्रहाचा त्रास होतो, झाला.
पण एकाच व्यक्तीला इतकं महत्त्व देण्याचं काही कारण नाही, तिच्या निमित्तानं का होईना इतर लोकांना समजत असेल तर हा वितंडवाद सार्थ आहे हे मान्य आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
दुवा
तुम्ही दिलेल्या दुव्यातून http://www.aisiakshare.com/tracker हे पेज उघडत आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पुन्हा चळवळ, पुन्हा नाहक तळमळ
पुन्हा चळवळ, पुन्हा नाहक तळमळ.
मत
कोर्टाने सरसकट अशा संबंधांना अवैध ठरवणे हे मला अयोग्य वाटले. कलम ३७७च्या कडक अर्थनिर्णयनानुसार निकाल कदाचित योग्यही असू शकेल.
जगात इतरत्र समलिंगी संबंधांना भिन्नलिंगी संबंधांप्रमाणे मान्यता मिळवण्यासाठी सामाजिक आणि राजकिय पातळीवर लढा सुरू आहे. भारतातही हा लढा सुरू असावा पण त्याची व्यापकता तितकीशी जाणवत नाही. कायदा करावा/बदलावा लागणे हा पर्याय जाचक वाटत असला तरी त्यामुळे समलिंगी लोकांच्या हक्काचा लढा अधिक व्यापक होईल अशी आशा वाटते.
लोक हो, जरा थांबा...
माझा असा अनुभव आहे की कोर्टाचा अमुक निर्णय काय आणि का आहे हे जाणण्यासाठी वर्तमानपत्रातील ताज्या बातमीपेक्षा अधिक चांगला स्रोत पाहिजे. बातमीमध्ये त्यातील सनसनाटी भागच तेव्हढा येतो, त्यामागचे विचार नाहीत.
बातम्या वाचून मला असे दिसत आहे की (possibly)ह्या बाबतीत स्पष्ट कायदा करण्याची जबाबदारी शासन/संसद टाळत आहेत आणि परस्पर पाव्हण्याकडून साप मारण्याची अपेक्षा करावी तसे कोर्टानेच सगळे ठरवावे अशी शासनाची चाल आहे हे कोर्टास अमान्य आहे. (न्यायालयांनीच कायदा बनविण्यालाहि काहींचा विरोध असतो कातण कायदा बनविणे हे संसदेचे काम आहे आणि त्याचे स्पष्टीकरण करून कायदा काय आहे हे ठरविणे इतकेच कोर्टाचे काम असते. Judge-made law हे शब्द इतक्या अर्थानेच खरे आहेत.)
कोर्टाने दिलेला निर्णय उरफाटा आहे हे कोर्टाचा मूळ निकाल वाचल्यशिवाय ठरविणे घाईचे आहे. त्याहि पलीकडे जाऊन तो निर्णय तसा का दिला असेल ह्यावर मल्लीनाथी करणे - जज्जाला कोणी 'प्रपोज' केले असावे इ. - हे तर बालिशपणाचे वाटते.
येथे तारस्वराने मते नोंदविणार्यांना जे दिसते ते कोर्टाच्या अनुभवी आणि विद्वान न्यायमूर्तींना दिसत नाही हे मला तरी पचत नाही.
शंका....
पेप्रातील मथळे पाहून प्रतिक्रिया देणे मलाही पटत नाही. पण क्वचित मथळ्यातूनही जो अर्थ ध्वनित होतो, त्याबद्दल शंका अहेत; त्या माम्डल्या आहेत.
सधयचा निकाल हा नुसता समलैंगिकांबद्दल नाहीच मुळी. अगदि नवरा - बायकोने जरी "अनैसर्गिक संभोग" क्याटेगरीत येणारे काही केले तरी ते चूक आहे
असे ठरवले जाइल. पूर्वी कोर्टाने असाच एक निर्णय दिला आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
काही स्पष्टीकरणे वाचल्यावर
काही स्पष्टीकरणे वाचल्यावर आता मलाही असेच वाटू लागलेय खरे. आय ष्ट्यांड कर्रेक्टेड.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्या दोन व्यक्तीतल्या एकाच्या
त्या दोन व्यक्तीतल्या एकाच्या मृत्युनंतर होऊ शकणारे मालमत्ता वाद , दोघांना घट'स्फोट घ्यायचा झाल्यास पोटगी द्यायची कुणी ? कौटुंबिक हिंसाचार कायदा , ४९८ अ कसे लागू होणार , त्याचे निकष काय असणार ? यावर या संबंधाना मान्यता मागणार्यांनी आणि समर्थकांनी मते मांडावीत .
इथे दोन विषयांची गल्लत होते
इथे दोन विषयांची गल्लत होते आहे असं वाटतं. मालमत्ता वाटप, पोटगी, घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार, ४९८ अ हे सगळे लग्नाच्या कराराचे/हक्काचे भाग आहेत. जर समलिंगी संबंधांची वैधताच नाकारली तर मग त्या हक्कांचा प्रश्नच येत नाही. याउलट 'समलिंगी संबंध हा गुन्हा नाही' असा कायदा करूनही लग्नाचे हक्क नाकारता येतात (जे अमेरिकेत बहुतांश ठिकाणी चालू आहे) त्यामुळे वैधतेचा अधिकार अधिक मूलभूत आहे.
पोटगी, ४९८अ, कौटुंबिक
पोटगी, ४९८अ, कौटुंबिक हिंसाचार याविरोधात असणाऱ्या कायद्यांमधल्या तरतूदींचं मूळ, वेगवेगळ्या पातळीवर असणारी स्त्री-पुरुष असमानता हे आहे. समलैंगिक विवाहांमधे ही असमानता (व्याख्येनुसारच) रद्दबादल होते. मालमत्ता, कौटुंबिक हिंसाचाराचे कायदे ही असमानता विसरून करता येतीलच. (उदा: वंशपरंपरागत संपत्तीचं वाटप बहिण-भावांमधे समसमान पद्धतीन होतं तसंच). ४९८अ या कायद्याचं प्रयोजनच रद्द होईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाहीतर काय
हॉस्टेल्स किती प्रकारची ठेवावी लागतील ते पाहा-
१. मुलांचे हॉस्टेल
२. मुलींचे हॉस्टेल
३. समलिंगी मुलींचे होस्टेल
४. समलिंगी मुलांचे होस्टेल
५. भिन्नलिंगी पण समलैंगितकता मानणार्या पुरुष मुलगा आणि स्त्री मुलगी असे हॉस्टेल
६. भिन्नलिंगी पण समलैंगितकता मानणार्या पुरुष मुलगी आणि स्त्री मुलगा असे हॉस्टेल
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कोर्टाच्या निकालाचा अर्थ
चिंज ह्यांनी दिलेल्या दुव्यावरून मी मूल निकाल वाचू शकलो.
मला असे दिसते की कोर्टाचे म्हणणे असे आहे:
34.....After the adoption of the IPC in 1950, around 30 amendments have been made to the statute, the most recent being in 2013 which specifically deals with sexual offences, a category to which Section 377 IPC belongs. The 172nd Law Commission Report specifically recommended deletion of that section and the issue has repeatedly come up for debate. However, the Legislature has chosen not to amend the law or revisit it. This shows that Parliament, which is undisputedly the representative body of the people of India has not thought it proper to delete the provision. Such a conclusion is further strengthened by the fact that despite the decision of the Union of India to not challenge in appeal the order of the Delhi High Court, the Parliament has not made any amendment in the law. While this does not make the law immune from constitutional challenge, it must nonetheless guide our understanding of character, scope, ambit and import.
33. It is, therefore, apposite to say that unless a clear constitutional violation is proved, this Court is not empowered to strike down a law merely by virtue of its falling into disuse or the perception of the society having changed as regards the legitimacy of its purpose and its need.
अनेक संधि उपलब्ध झालेल्या असूनहि ज्या अर्थी संसदेन कलम ३७७ मध्य्र बदल केलेला नाही. ह्याचा अर्थ असाच लावता येईल की कायद्याची इष्ट स्थिति तेथेच आहे. असे असेल तर तो बदलणे कोर्टाच्या अखत्य्रात येत नाही. (ज्याला मी वरच्या माझ्या प्रतिसादात Judge-made Law असे म्हटलेले आहे त्याच्या मर्यादेच्या बाहेर हे आहे.)
थोडक्यात म्हणजे समलिंगी संबंधांना मान्यता द्यायची असेल तर तसा स्पष्ट कायदा संसदेने करावा. कोलांटया उडया मारून कोर्टाने तो अर्थ शोधून काढावा आणि संसदेला ह्या अवघड कामापासून वाचवावे हे कोर्टास मान्य नाही.
मला तरी हा विचार संसद आणि न्यायालय ह्यांच्या कार्यकक्षांच्या संपूर्ण आत पडणारा वाटतो.
कार्यक्षांच्या
म्हणजे, दोघांपैकी कोणाच्याही कार्यकक्षेत हे यावे असे म्हणायचे आहे का दोघांच्या एकत्र कार्यकक्षेत?
समांतर उदाहरण द्यायचे झाल्यास, अमेरीकेतील डिफेन्स ऑफ मॅरेज अॅक्टचे (डोमा, a United States federal law) घेता येईल. अमेरिकन हाय कोर्टाने डोमा unconstitutional असा निकाल दिला आहे. तसेच भारतीय सुप्रिमकोर्ट का देऊ शकत नाही हे कळले नाही. (अमेरिकेप्रमाणेच) भारतीय ज्युडीशियल सिस्टीम ही स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह सरकारी शाखा आहे असे मला वाटते.
-Nile
कार्यकक्षा
म्हणजे संसदेची कार्यकक्षा आहे आणि तशीच न्यायालयाची जी कार्यकक्षा आहे त्यांच्यामधील सीमारेषा हा निर्णय पाळतो. मी असे लिहिले असते तर मला काय म्हणावयाचे आहे ते अधिक सुस्पष्ट झाले असते. (कोर्टाच्या मते हा प्रश्न संसदेच्या कार्यकक्षेच्या आत पडतो आणि ह्या परिस्थितीत काही बदल हवा असेल अतर तो बदल घडवून आणण्यासाठी संसदेने पुढाकार घ्यावा.)
माझ्या ह्यापूर्वीच्या प्रतिसादात क्र. ३४ असा परिच्छेदाचा क्रमांक चुकीचा पडला आहे. तो खरा '३२' असा आहे. ह्या दुरुस्तीसह प्रतिसाद वाचावा.
मुद्दा ३३, पहिला भाग ठोस, ३२ उगाच पसारा
वरील मुद्दा ३३ महत्त्वाचा :
दिल्ली हाय कोर्टाच्या निकालाच्या मते घटनेचे उल्लंघन होते. तसे उल्लंघन होत नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे.
घटनेचे उल्लंघन होत असल्यास कायदा रद्द ठरवण्याचे काम कोर्टाचे आहे. दिल्ली हायकोर्टाने तज्ज्ञ साक्ष आणि अन्य देशातील अभ्यास/कायदे हे मुद्दे मान्य केले. त्यावरून घटनात्मक हक्कांचे विनाकारण उल्लंघन होत असल्याचे मान्य केले. सर्वोच्च न्यायालयाने मुद्दे मान्य केले नाहीत. इतकेच.
मुद्दा ३२ लेचापेचा आहे. "सेपरेशन ऑफ पावर्स"चे तत्त्व भारतीय घटनेत स्पष्ट नाही. आणि मार्गदर्शक तत्त्व म्हणूनसुद्धा अगदी लवचिकपणे वापरले जाते :
मागे एकदा (डिसेंबर १९९६) सुप्रीम कोर्टाने ताज महालाच्या परिसरात कुठल्या प्रकारचे इंधन वापरावे, प्रदूषण कसे टाळावे, वगैरे तपशीलवार निर्णय दिला होता. (सी.एन.जी इंधन वापरावे, वगैरे.) हे असले धोरणात्मक कायदे (सेपरेशन ऑफ पावर्स असलेल्या देशांत) संसदेच्या आख्त्यारीत येतात. प्रदूषणविषयक कायदे कित्येक वेळा विधिमंडळात झाले होते, परंतु "सी.एन.जीच वापरा" असा कायदा भारतीय संसदेने किंवा उत्तर प्रदेश विधान सभेने कधी केला नव्हता. तरी "संधी असून हे धोरण संसदेने अंगीकारले नाही, म्हणजे त्याच्या विरुद्ध धोरण करण्याचे संसदेचे सुविचारी मत होते" अशी कुठली बूज कोर्टाने राखली नाही.
अशा प्रकारचे निर्णय सर्वोच्च न्यायालय खूपदा देते. हे उदाहरण आठवले, म्हणून दिले.
मात्र या निर्णयात कोर्ट "सेपरेशन ऑफ पावर्स" तत्त्वाला आपण मान देणार, असे म्हणते, खरे :
n fact a constitutional duty has been cast upon this
Court to test the laws of the land on the touchstone of the Constitution and
provide appropriate remedy if and when called upon to do so. Seen in this light
the power of judicial review over legislations is plenary. However, keeping in
mind the importance of separation of powers and out of a sense of deference to
the value of democracy that parliamentary acts embody, self restraint has been
exercised by the judiciary when dealing with challenges to the constitutionality of
laws.
आणि त्याबाबत संदर्भसुद्धा देते.
(मागे अशाच कुठल्याशा तपशीलवार धोरणात्मक निर्णयाच्या वेळी मला अचंभा वाटला, म्हणून मी "सेपरेशन ऑफ पावर्स" आणि "भारतीय घटना" यांच्याबाबत शोधून थोडेफार वाचन केले होते.)
आणखी एक उदाहरण
http://www.thehindu.com/news/national/oral-instructions-undermine-accoun...
(सरकारी नोकरांनी तोंडी नव्हे तर लेखी निर्देश द्यावे, असा निर्णय. नोव्हेंबर १, २०१३)
"१९६२ मध्ये संतानम आयोगाने, २००४ मध्ये होता समितीने असाच सल्ला दिला होता" पण विधिमंडळाने काहीच केले नाही. म्हणून विधिमंडळाने सल्ला अयोग्य ठरवला, असे काही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले नाही. उलट The Bench, therefore, directed all State Governments and Union Territories to issue in three months directions like Rule 3(3) (iii) of the All India Services (Conduct) Rules, 1968.
त्या वृत्तात असेही वाक्य आहे : "They submitted that lack of good governance affected the quality of life and violated the guarantees provided under Article 21 (right to life and liberty) of the Constitution." परंतु हे कोर्टाचे म्हणणे आहे, की याचिकेतील म्हणणे आहे, ते वृत्तात स्पष्ट नाही.
असे असेल तर तो बदलणे
कोर्ट ही मर्यादा आपल्या सोयीने ठरवते असे दिसते.
२G घोटाळ्यात यापूढिल स्पेक्ट्रम अलोकेशन "केवळ लिलावाद्वारेच" झाले पाहिजे हा निकाल देताना ही सीमारेषा ओलांडत आहोत असे बरे कोर्टास वाटले नाही?
तेव्हा तो निकाल समाजात सहज स्वागतार्ह ठरला असता आणि आता मात्र सामाजिकदृष्ट्या सेंसिटिव्ह निकाल देताना कोर्टाने हात झटकले असे का बरे वाटू नये?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
निर्णय योग्य का वाटतो?
वरील लांबलचक चर्चेवरूनच ध्यानात यावे की समलिंगी संबंध ह्या विषयावर लोकांच्या भावना किती तीव्र असू शकतात. स्पेक्ट्रम अलोकेशन आणि सीएनजीसारख्या पूर्णतः व्यावहारिक बाबींच्या खूपच पलीकडे जाणारा हा विषय असून माणसे जीवनमूल्ये आणि Core values काय मानतात अशा मुद्द्याला स्पर्श करणारा हा विषय आहे आणि म्हणूनच कोर्ट म्हणते की ह्या विषयांवरील निर्णय दोन न्यायाधीशांनी देण्यापेक्षा लोकशाही पद्धतीमध्ये संसदेनेच द्यावा. हा विचार त्यांनी कायद्याच्या jargon मध्ये मांडला आहे कारण कोर्ट दुसर्या कोठल्याच भाषेत बोलू शकत नाही.
संसद धैर्य करून ह्या विषयाला का हात घालू शकत नाही? का काही स्पष्ट भूमिका घेण्याची लोकप्रतिनिधींना भीति वाटते? अशी भीति स्वाभाविक आहे कारण कोणतीहि भूमिका घेतली तरी कोठलातरी गट नाखूषच होणार! असेच जर असेल तर लोकप्रतिनिधि केवळ भत्ते आणि पेन्शन उकळण्यासाठीच संसदेत जातात काय?
संसद धैर्य करून ह्या विषयाला
सह्मत आहेच. संसद आपले काम या बाबतीत करत नाहिये म्हणून अनेकांना कोर्टाकडून आशा होती.
मात्र कोर्ट देखील संसदेतील खासदारांप्रमाणेच केवळ 2G, रामजन्मभूमी वगैरे "सोप्या" गोष्टींच्या बाबतीत कधी मर्यादेचे उल्लंघन तर कधी कायद्याच्या बाहेर जाऊन निकाल देणे असे करताना दिसते मात्र अशा व्यक्तीस्वातंत्र्याशी निगडीत बाबतीत हात झटकते हा कुठेतरी दुटप्पीपणा वाटतो हे ही खरेच!
या विषयावरील लोकसत्ताचा अग्रलेख ही भुमिका अधिक स्पष्टपणे मांडतो:
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अनैसर्गिक?
कोर्टाचा हा निर्णय 'समलैंगिक संबंध अनैसर्गिक आहेत' या आधारावर आहे. अनैसर्गिकचा अर्थ 'जे निसर्गात नाही ते' असा होतो. आज सकाळी मी काय अनैसर्गिक कृती केल्या त्याची यादी खालीलप्रमाणे:
१) मी माझे दात घासले : निसर्गात दात घासणारा मनुष्य हा एकटाच प्राणी असावा..म्हणून अनैसर्गिक.
२) मी चहात गायीचे दूध घालून प्यालो : निसर्गात इतर इतर प्रजातींचे दूध पिणारा मनुष्य हा एकटाच प्राणी असावा...म्हणून...
३) मी शिजवलेले अन्न खाल्ले : निसर्गात शिजवलेले अन्न खाणारा मनुष्य हा एकटाच...म्हणून...
४) मी कपडे घातले : निसर्गात कपडे घालणारा मनुष्य हा ...म्हणून...
५) मी गाडीने कामाला गेलो : निसर्गात यंत्र वापरणारा मनुष्य ...म्हणून...
या गोष्टी फक्त सकाळच्या तासाभरात केलेल्या गोष्टी होत्या. तर ते एक असो.
आता निसर्गात समलैंगिक संबंध ठेवणार्या इतर प्रजातींची यादी इथे पहा. शास्त्रीय संशोधनाप्रमाणे ४५० ते १०००० प्रकारच्या प्राण्यांमध्ये समलैंगिक्ता आढळते. इथे थोडी अधिक माहिती.
पण कायद्याप्रमाणे समलैंगिकता अनैसर्गिक आहे ...रोचक आहे खरेच.
शेवटी नैसर्गिक की अनैसर्गिक या गोष्टी बहुमताच्या पर्स्पेक्टिव्हवरच ठरतात असे दिसते. हा भेदभाव थांबवायचा असेल तर बहुमत शास्त्रीय आधारांवर ठरावे यासाठी लैंगिक शिक्षणाची आणि त्यात समलैंगिक संबंध अंतर्भूत करण्याची गरज आहे.
“We all know what to do, we just don’t know how to get re-elected after we’ve done it.” Jean-Claude Juncker
ऑफिसात जाता जाता एक खूनही
ऑफिसात जाता जाता एक खूनही पाडायचात. बरेच प्राणी करतात तसे. नंतर कोर्टाला ते नैसर्गिक आहे म्हणून मला सोडून द्या असं सांगता आलं असतं.
हा प्रतिसाद भडकाऊ वाटला आहे म्हणून स्पष्टीकरण:
समलैंगिकता नैसर्गिक आहे वा नाही याचे उत्तर क्षणभर आहे असे मानू. पण जे जे काही नैसर्गिक आहे ते मानव समाजात मान्य आहे असे नाही. आणि जे जे नाही ते नाही असेही नाही. म्हणून समलैंगिकता नैसर्गिक आढळली तरी तिच्या इष्ट्याइष्टतेचे निकष भिन्न आहेत. सबब नोंद.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हॅलो!
तुमची काय मते असतील ती असतील पण न्यायसंस्थेने केवळ 'अनैसर्गिक' म्हणून समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवलेय. बाकी खूनाचे उदाहरण देऊन तुम्ही ओ नाम्या यांचीच बाजू बळकट करता आहात यातला विरोधाभासही तुमच्या लक्षात येत नाहीय का?
मला इतकंच म्हणायचं आहे कि
मला इतकंच म्हणायचं आहे कि कोर्टला आणि नाम्या यांना अभिप्रेत असलेला 'नैसर्गिक' वा 'अनैसर्गिक' शब्दांचा अर्थ एकच नाही. केवळ नाम्या म्हणतात त्या अर्थाने कोर्टाने नैसर्गिक हा शब्द घेऊन निकाल दिलेला नाही.
आणि पुन्हा - कोर्टाने समलैंगिकतेला गुन्हा म्हणणे मला पटलेले नाही. म्हणून 'गुन्हा' म्हणण्याबद्दल माझेही कोर्टाशी पटत नाहीय. अपवाद -पण जेव्हा एक सामाजिक समस्या प्रमाणाबाहेर जाते तेव्हा कायदेशीर प्रतिबंध हवा असतो. माझ्या मते सध्याला तीही परिस्थिती नाही.
तत्वतः एक सामाजिक संस्था म्हणून समलैंगिकता उभी राहू नये असा माझा विचार आहे. तो का आहे हे वर गविंना उत्तर देताना विषद केले आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नुसत्या शाब्दिक कसरती व
नुसत्या शाब्दिक कसरती व शब्दोच्छल चालला आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक सजगते ची संधी घालवली. काल आयबीएन लोकमत वर आजचा सवाल मधे यावर चांगली चर्चा झाली.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
मी कुणावर प्रेम करावे व
मी कुणावर प्रेम करावे व कुणाशी लग्न करावे या निर्णयावर प्रत्यक्ष परमेश्वरासही अधिकार द्यायला तयार नाही मी. सुप्रीम कोर्टाची काय कथा ???
वेळ आल्यास या बाबतीत परमेश्वरावर अण्वस्त्रप्रयोग करण्याची ही इच्छा बाळगून आहे मी.
काल बाहेर गेल्यामुळे हा लेख
काल बाहेर गेल्यामुळे हा लेख आणि चर्चा चाचली बव्हती. मागील हायकोर्टाच्या निर्णयाच्यावेळी मिसळपाववर चर्चा केली होती.
यावेळी होत असलेली वर्ची चर्चा वाचून भाग घ्यायचा उत्साह मावळला आहे. नॉर्मली विचारी दिसणार्या सदस्यांचे बरेच प्रतिसाद अतिरेकी वाटले.
जाता जाता: कोर्टाने हा निकाल देताना "हे न्यायालयाच्या कार्यकक्षेबाहेर आहे" असे म्हटले आहे". इतर वेळी मी वैयक्तिक रीत्या न्यायालयाने त्याच्या कार्यकक्षेबाहेर निकाल देऊ नयेत असे म्हणतो. या वेळी न्यायालयाने तसे म्हटल्याचे स्वागत करतो. या वेळी माझ्या मताविरुद्ध न्यायालयाचा निकाल लागला म्हणून यावेळी न्यायालयाने कार्यकक्षा ओलांडावी असे मी म्हणणे सयुक्तिक वाटत नाही.
मागील मिसळपाववरील चर्चेत मी हा प्रतिसाद दिला होता. त्यातला भाग इथे चिकटवत आहे.
समलिंगी संबंध समाजाने मान्य करावेत / निषेधावेत / पुरस्कृत करावेत यापैकी कोणतेही रेकमेंडेशन देण्याचा अधिकार न्यायालय या संस्थेला नाही. तो अधिकार जनतेचा आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधीमंडळांचा आहे.
म्हणजे जनतेला हे संबंध मान्य नसतील तर जनता आपल्या प्रतिनिधींकरवी घटना दुरुस्ती करून अशा संबंधांवर एक्सप्लिसिट बंदी घालू शकेल असे वाटते.अशी घटना दुरुस्ती झाली तर न्यायालये काही करू शकणार नाहीत.
अवांतरः मागील वेळी ३७७ कलम घटनेच्या कुठल्याशा कलमांशी विसंगत आहे असे दिल्ली उच्च न्यायालयास वाटले होते. ते सर्वोच्च न्यायालयाने अग्राह्य ठरवले आहे (म्हणजे ३७७ कलम वैध ठरवले आहे). त्यातल्या नुआन्सेसची मला खास जाण नसल्याने त्यावर भाष्य करू शकत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
+१
हेच आणि इतकच मलाही म्हणायचय.
"मम" म्हणतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
निळ्या मताशी सहमत आहेच.
निळ्या मताशी सहमत आहेच. संसदेचे ते कर्तव्य आहेच आहे. आणि ते करण्यासाठी आता पुन्हा चळवळ --> जनमताचा दबाव वगैरे लांबचा मार्ग अवलंबणे प्राप्त आहे हे मान्यच. (आणि म्हणूनच असे जाहिर म्हटले की जो पक्ष समलिंगीसंबंधाच्या गुन्हेगारीकरणाला थोपण्यासाठी पावले उचलेले/ वचन देईल त्या पक्षाला माझे मत देईन. सध्या तरी काँग्रेसनेच आपले मत दिले आहे - ते ही काहिसे संदिग्ध आहे. बाकी सारे मौन बाळगून आहेत )
पण यातून न्यायालयांचाही "सोयीस्कर" दुटप्पीपणा दिसतो असे माझे मत दृढ होत चालले आहे. त्याची कारणमिमांसा वर दिली आहेच.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
>>जो पक्ष समलिंगीसंबंधाच्या
>>जो पक्ष समलिंगीसंबंधाच्या गुन्हेगारीकरणाला थोपण्यासाठी पावले उचलेले/ वचन देईल त्या पक्षाला माझे मत देईन.
त्या पक्षाचे इतर गुण लक्षात न घेता केवळ या कारणासाठी मत देण्याइतका हा विषय (माझ्या) प्रायॉरिटीवर नाही.
कायदा बदलायलाच हवा असे नाही. हेलमेट घालण्याची सक्ती असलेला कायदा आहे. पण सरकार बहुतांश शहरांत एल्मेट न घालण्याकडे दुर्लक्ष करते. तसे या केसमध्ये करता येईल. अशा विषयातल्या तक्रारी आल्या तर पोलिसांनी फार लक्ष घालू नये अशा तोंडी सूचना देता येतील.
समजा सरकारने ३७७ कलम दुस्रुस्त करून त्यात समलिंगी संभोग हा त्यातून "एक्स्प्लिसिटली एक्सक्लूड" केला तर?
इतर गोष्टी बेकायदेशीरच राहतील.
समलैंगिकांना केवळ डीक्रिमिनलायझेशन हवं आहे की सोशल अॅक्सेप्टन्स? सोशल अॅक्सेप्टन्स कायदा करून लगेच मिळेलच असं नाही. (जात पाळण्याविषयी आपल्याला अनुभव आहेच).
>>पण यातून न्यायालयांचाही "सोयीस्कर" दुटप्पीपणा दिसतो असे माझे मत दृढ होत चालले आहे. त्याची कारणमिमांसा वर दिली आहेच.
तसे असेल तरी म्हणून आपणही दुटप्पीपणे न्यायालयाला हस्तक्षेप करायला सांगू नये असे वाटते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हेलमेट घालण्याची सक्ती असलेला
मान्य आहेच. पण तसे सरकारने केल्याचे दिसत नाहिये
सहमत आहे. फक्त एकालाच वगळले जाऊ नये अशी इच्छा आहे.
कायदा मुळातून अबॉलिश होऊ नये असे वाटते कारण इतर प्राण्यांबरोबरचा संभोग बेकायदेशीर ठरवला आहे जे (प्राण्यांचा कंसेन्ट घेता येत नसल्याने) योग्यच आहे.
अॅक्सेप्टन्स ही मोठी प्रोसेस आहे. तुर्तास पहिले पाऊल म्हणून माझ्यामते डिक्रिम्निनलायझेशन व्हावे. त्यामुळे अनेक दबलेले जीव जे स्वतःला गुन्हेगार समजून आत्महत्या करत आहेत, ज्यांच्यावर कुटुंबांतून भयंकर मानसिक दबाव येत आहे, ज्यांना पोलिस अनेकदा हरॅस करत आहेत, ज्यांना आपले ओरीएंटेशन जाहिर केल्यावर थेट "क्रिमिनल" असा शिक्का बसण्याची भिती वाटते अशा सार्यांसाठी डिक्रिम्निनलायझेशन अत्यावश्यक आहे. कारण त्याच्याशी "वैयक्तीक स्वातंत्र्य" जोडलेले आहे.
बाकी अॅक्सेप्टन्स, लग्न, इतर हक्क वगैरे सामाजिक गोष्टींसाठी कायदेशीर + सामाजिक लढाई लढावी लागेलच. पण ती पुढील पायरी असेल.
उरले मतदान, तर मतदान करताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हा वैयक्तिक चॉईस असल्याने मी केवळ माझे मत दिले. माझ्यासाठी व्यक्तीस्वातंत्र्यावर इतका मोठा हल्ला होत असताना इतर कोणतेही सामाजिक/राजकीय/आर्थिक मुद्दे दुय्यम ठरतात. इतरांच्या मताचा/मतभेदाचा आदर आहेच.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ज्यांना पोलिस अनेकदा हरॅस करत
दिल्ली हायकोर्टाच्या निकाला आधी या कायद्याखाली किती समलैंगिक लोकांवर गुन्हे दाखल केले गेले आणि किती केसेस निकाली निघाल्या याचा काही विदा आहे का कोणाकडे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
केसेस दाखल होतात की नाही
केसेस दाखल होतात की नाही यासंबंधी विदा माझ्याकडे नाही. मात्र काही परिचितांचे अनुभव माहिती आहेत.
बीबीसीची बातमी काय म्हणते बघा:
बाकी, एकेकाळी बलात्काराच्याही केसेस कमी होत्या म्हणजे बलात्कार कमी प्रमाणात होत होते असे नव्हे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बलात्काराचं रिपोर्ट होण्याचं
बलात्काराचं रिपोर्ट होण्याचं प्रमाण केवळ १०-२०% आहे हे मला पण माहीत आहे. मला त्या पोलीस हरॅसमेंट बद्दल असल्यास विदा हवा होता.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
>>पण तसे सरकारने केल्याचे
>>पण तसे सरकारने केल्याचे दिसत नाहिये
बरोबर. हेन्सफोर्थ अशा ऑर्डर्स दिल्या जाऊ शकतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
म्हणजे?
ह्या दोन गोष्टींपैकी एकच मिळणार असं काही आहे का?
मुळात त्यांना गुन्हेगार ठरवा आणि मग हा प्रश्न विचारा, वा!
-Nile
थत्तेचाचा असं कुठं म्हणताहेत?
थत्तेचाचा असं कुठं म्हणताहेत? उगा कायपण ?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काय म्हणायचं आहे?
उद्धृत वाक्याने नक्की काय म्हणायचे आहे?
-Nile
त्यांना असं म्हणायचं आहे की
त्यांना असं म्हणायचं आहे की नुस्त्या कायद्याने समलैंगिकांना सामाजिक स्वीकृती मिळेलच असे नाही. हे तर ऑब्व्हियस आहे. तस्मात,
१. कायदा काहीही का म्हणेना, समाजाचा त्यांप्रती निकोप दृष्टिकोन हवाय. म्हणजे
२. कायदा आपल्या बाजूने हवा मग समाजाचे हिडीसफिडीस एकवेळ चालेल.
या दोहोंपैकी काय पाहिजे असा तो प्रश्न आहे. दोन्हीही एकाचवेळी मिळत नाही हे जातीसारख्या उदाहरणांवरून दिसतेच आहे.
त्यात त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रश्नच कुठे आला?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उत्तर
या दोहोंपैकी काय पाहिजे हा मुद्दाच चुक आहे, असे मी म्हणतो आहे. (म्हणून वर प्रतिसाद दिला)
त्यांना 'गुन्हेगार' हे आत्ताच्या निकालाने ठरवले (थत्तेंनी नाही). पण कायद्याने समलिंगी संबंधाना मान्यता हा त्यांचा बेसिक राईट आहे, 'दोहोंपैकी काय पाहिजे' सारखा मुद्दा नाही.
निखळ समाजमान्यता केव्हा मिळेल याचा काही नेम नाही, आणि कायदे करून ते मिळतही नाहीत. (अजूनही 'क्लॅन' अमेरिकेत आहे.) पण या दोघांची तुलनाच चुक आहे, ह्या करिता तो प्रतिसाद दिला आहे.
-Nile
या दोहोंपैकी काय पाहिजे हा
अर्थातच, पण सद्यःस्थितीत तरी आहे हे असेच आहे. त्याला इलाज काय आहे? इमिजिएट इलाज म्हंटोय.
निखळ समाजमान्यता या संज्ञेचा अर्थ फार ताणू नये. सफिशियंट नंबरवाल्यांनी हो म्हटलं तरी बास. कट्टर फ्रॅक्शन समाजात नेहमीच असतो आणि राहील.
सद्यःस्थितीस अनुलक्षून असे म्हटले आहे इतकेच. असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
समलिंगी संबंध समाजाने मान्य
दुसरे असे, की रेकमेंडेशनचा अधिकार न्यायसंस्थेस नसला तरी कायद्याचा अर्थ लावायचा आहे.
३७७ हा तसा नि:संदिग्ध कायदा असला तरी सदर कायदा सर्व पुरूषांना लागु आहे की सामान्यतः भिन्नलिंगी संबंध ठेवणार्यांनाच लागु आहे हे सांगायचा अधिकार कोर्टास आहे.
बदलत्या काळानुसार कायद्याचा योग्य तो अर्थ (अंतरीम निकालाद्वारे) लावला असता किंवा सरकारला यावर सुधारीत कायदा करण्यास ठाम टाईमफ्रेम दिली असती तर अधिक संयुक्तिक झाले असते असे वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नाही.
कृपया हे पहा.
Constitution gives an extensive original jurisdiction to the Supreme Court in regard to enforcement of Fundamental Rights.
एक 'विचार' (अवांतर)
(नॉर्मली अथवा अन्यथा विचारी दिसण्याचे अथवा दिसणार्यांचे म्याण्टल कोणत्याही प्रकारे न स्वीकारता), न्यायाधीश न्याय देत नसून न्यायाधीश देतो तो जेणेंकरून न्याय, तद्वत, नॉर्मली विचारी (दिसणारी ऑर अदरवाइज़) मंडळी विचार करत नसून नॉ. वि. (दि. ऑ. अ.) मंडळी करतात तो विचार, असे का मान्य करू नये?
इथे आणि इथे सुधारित दुवे
इथे आणि इथे सुधारित दुवे आहेत.
कालच्या प्रतिक्रियेविषयी:
अरुणजोशींनी व्यक्तिगत चिखलफेक केली आहे, असं माझं म्हणणं नाही, नव्हतं. मात्र जेव्हा कसलाही तर्क / विदा / सुसंगत कारण न देता, आपण दिलेल्या कारणांना कानाआड करून व्यक्तिगत प्राधान्यक्रमांवर आधारित टोकाची वक्तव्यं केली जातात आणि ती आपल्या निकटवर्तीयांच्या आणि पर्यायानं आपल्या रोजच्या आयुष्याशी येऊन भिडतात, तेव्हा एरवी प्रयत्नांनी राखला जाणारा संयम सुटण्याची शक्यता असते. मग त्या वादांतून काहीही निष्पन्न होत नाही. केवळ कटुता वाढते, इतका इशारा द्यायचा होता. सुमारे अडीच दिवस एक वाद शांतपणे घालून मग मी या निष्कर्षावर पोचले आहे.
दुसरी गोष्टः
भावना दुखावणे हा प्रकार काय फक्त सनातन्यांची मिरासदारी आहे काय? पुरोगामी लोकांना भावना नसतात? की कुणी कसंही वागलं तरीही त्यांनी शांतपणे, न चिडता, उपरोधही न वापरता, 'जगाला शहाणं करून सोडण्याचं' व्रत आचरतच राहायचं असतं आणि कधी त्याविरुद्ध ब्रही काढायचा नसतो? 'व्यंग', 'अनैसर्गिकता', 'अलाउ करणे' इत्यादी शब्दप्रयोग वापरताना आणि आपण अतिशय स्फोटक विषयावर काही बोलतो आहोत याचा विचार करून काळजी घेतली जायला नको? आणि ती घेतली नसेल, तर त्याविरुद्ध निषेधही नोंदवायचा नाही? हे केवळ अजब आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
शांत
शांत गदाधारी भीम शांत.
(भीम म्हणावे की भामिनी?)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भावना दुखावणे हा प्रकार काय
मी कोणत्याही झुंडीत भाग घेत नाही, ती सनातन्यांची असो नाहीतर पुरोगाम्यांची.
'व्यंग', 'अनैसर्गिकता', 'अलाउ करणे' या शब्दांत काय चूक आहे ते अजून कळलं नाही. पण ते मी आणि गवि चर्चित आहोत. आपण माझे प्रतिसाद आपणच म्हटल्याप्रमाणे दुर्लक्षा हे बरे.
अवांतर -
बाय द वे, या धाग्यावर कोल्ह्टकरांना निरर्थक श्रेण्या मिळत आहेत हे पाहत आहे. (प्रतिसादातले लॉजिक पाहून) हे अपेक्षित नव्हते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अवांतराबद्दल: त्या मी देत
अवांतराबद्दल: त्या मी देत नाहीय हे सिद्ध करायची जबाबदारी माझी आहे काय?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मुळीच नाही.
मुळीच नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अवांतराबद्दल (अवांतर)
(त्या श्रेण्यांबद्दल कोणतेही इंप्लिसिट किंवा एक्स्प्लिसिट उत्तरदायित्व न स्वीकारता), 'निरर्थक'चा अर्थ 'जे आपल्याला समजले नाही ते' असा लक्षात घेता, त्या श्रेण्यांत वावगे असे आपल्याला नेमके काय आढळले? किंबहुना, श्री. कोल्हटकर यांचा प्रतिसाद 'समजला नाही' अशी ती श्रेणी म्हणजे प्रांजळ कबुली असू शकत नाही काय?
ते त्यांच्या रेप्युटेशनच्या
ते त्यांच्या रेप्युटेशनच्या फार विपरित आहे हेच वावगेपण आहे.
सहसा त्यांचे लेखन कळणारे आणि मार्मिक असते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
म्हणून काय झाले?
Must that be held against him?
Is he condemned to be always understood or to the point?
आम्हाला तर बाबा अरुण जोशी ही
आम्हाला तर बाबा अरुण जोशी ही व्यक्ती नसून प्रवृत्ती वाटते.पण व्यक्ति म्हणुन त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. अरुण भाउ तुम आगे बढो ये टाईम हम तुमारे साथ नही है!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
केवळ वादासाठी वाद न घालता
केवळ वादासाठी वाद न घालता किंवा वाढवता खरोखर उत्तम मनःशांतीने, सद्यस्थानी प्रवाहाच्या विरुद्ध असूनही, आपल्या मतांचा डिफेन्स करणारं अरुण जोशी यांचं व्यक्तिमत्व काबिले तारीफ आहे. त्यांची मते योग्य की अयोग्य यापेक्षाही त्यांची मतं सिन्सियर आणि स्वतःशी प्रामाणिक आहेत हे महत्वाचं. हे असं वर्तन कोणत्याही वादंगस्थानी खूप दुर्मिळ दिसतं.
मी काही इतक्याची स्तुतीच्या
मी काही इतक्याची स्तुतीच्या पात्रतेचा नाही. पण ऋषिकेश, बॅटमॅन, अदिती आणि मेघनांना माझ्या त्याच प्रतिसादांत असं आहे असं वाटत नाही. असं आहे असं वाटणं संवाद पुढे चालू राहण्यासाठी आणि मतपरिवर्तानासाठी फार आवश्यक आहे. त्यासाठी काही करता येईल काय?
कोणाच्या भावना दुखवून काय मिळते? आपण आपल्या शंका मांडाव्यात, बायस सोडावा, प्राधान्य पाहावे नाही सुत जमले तर नाही. तो विषय आजच सोडवावा हे काही बंधनकारक नाही. शिवाय विरोधकच आपली मते रिफाईन करत असतात, म्हणून त्यांच्याशी जितके जास्त सख्य तितके बरे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पण ऋषिकेश, बॅटमॅन, अदिती आणि
तुम्ही लाख प्रामाणिक असाल हो, तुमची मतं कैच्याकै आहेत त्याचं काय? तरास जो कै होतो तो त्याचमुळे. अन्यथा तुम्ही प्रामाणिकच आहात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रामाणिकपणा किंवा इतर कुठलेही मूल्य
प्रामाणिकपणा किंवा इतर कुठलेही मूल्य ह्यास स्टँडअलोन असे काहिच विशेष अस्तित्व नसते.
मूल्याम्चा एक पॅकेज म्हणूनच विचार करणे योग्य.
अरबस्थानातील काही फॅनॅटिक मुतव्वे किंवा तालिबानी ह्यांच्यातील काही मंडळी क्रूर , बिनडोक असली तरी नितांत प्रामाणिक असू शकतात.
मूल्यांचा हा एकत्रित जांगडगुत्ता आहे तो खरोखर अमूल्य. सुट्या सुट्या मूल्यास अर्थ नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
+१
समाजाच्या काय किंवा संस्थळांच्या काय सर्वसाधारण प्रवृत्ती असतात. त्यातील बहुसंल्ख्यांची धारणा काय यावर ती प्रवृत्ती ठरते. बहुसंख्यांच्यापेक्षा एखाद्याची धारणा वेगळी आहेत किवा बहुसंख्यांना ती साफ चुकीची वाटतात, तरीही ती माडण्यावे स्वातंत्र्य त्यांना आहेच. त्या बहुसंख्यांत कधीकधी मी स्वतः असेन, पण एक वेळ त्यांच्या एखाद्या विचाराला विरोध असला तरी तो तसा बाळगण्याचे आणि माडण्याचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित रहावे असे माझे मत आहे.
अगदी.
समलैंगिकांना त्यांच्या
समलैंगिकांना त्यांच्या धारणेप्रमाणे वागू द्यावे, जोडीने राहू द्यावे. त्यांना वाळीत टाकल्यासारखी वागणूक देऊ नये याच्याशी सहमत आहे.
त्यांच्यासाठी मुद्दामहून विवाहविषयक कायदे करण्याची गरज नाही असे वाटते. (अरुणजोशी यांच्याशी अंशतः सहमत आहे). त्यांना जोडीने रहायचे असेल तर भागीदारी/असोसिएशन ऑफ पर्सन्सप्रमाणे करार करून त्यांना राहता येईल. वारसा कायदे त्यांना लागू नसतील. पण जोडीदाराने आपले वारस असावे असे वाटत असेल तर तसे मृत्युपत्र दोघांनी करावे.
समलैंगिकता नैसर्गिक आहे की अनैसर्गिक ही चर्चा फोल आहे. ती आचरणे मान्य करायचे आहे ते वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणून (समजा ती अनैसर्गिक ठरली तरीही).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गंमत
फार रिस्क घेतली आहे ब्वॉ आपण! पण धन्स.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
त्यांच्यासाठी मुद्दामहून
हे या धाग्यावर, सध्याच्या निकालावर काहिसे अवांतर आहे.
पण विषय काधलाच आहात म्हणून फक्त माझे प्रतिकुल मत/प्रतिप्रश्न नमूद करून थांबतो:
"भिन्न लिंगी जोडिदारांसाठी मुद्दामहून विवाहविषयक कायदे करायची काय गरज आहे?"
चर्चा वेगळ्या धाग्यावर (कोणी काढलाच तर.. माझ्यात शक्ती नाही) किंवा व्यनीमध्ये होऊ शकतेच. इथे मात्र न राहवून हा प्रतिसाद दिला. पण या उपविषयावर शेवटचा.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नैसर्गिक का अनैसर्गिक ही
नैसर्गिक का अनैसर्गिक ही चर्चा मलापण फोल वाटते कारण अनैसर्गिक या शब्दाची सर्वमान्य व्याख्या करणंच फार अवघड आहे. जे काही होतं ते नैसर्गिकच असतं असं माझं मत आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अगदी. मानव समाज काय स्वीकार्य
अगदी. मानव समाज काय स्वीकार्य आहे आणि काय नैसर्गिक आहे यांचे निकष भिन्न आहेत. खून करणे, हात उचलणे नैसर्गिक आहे मोप पण कायदा, समाज असे होऊ नये असेच इच्छितो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
निकालाबद्दल काही मुद्दे
कायदेशीर बाबींचा माझा अभ्यास नाही, पण काही विवेकी व्यक्तींकडून आलेल्या माहितीनुसार निकालातल्या ह्या गोष्टी अयोग्य आहेत -
मुखमैथुनासारख्या कृती सज्ञान, परस्परसंमतीच्या विषमलिंगी संबंधांतही अनैसर्गिक आणि म्हणून ह्या कायद्याच्या कक्षेत बेकायदेशीर मानणं.
पूर्वीचे उद्धृत निकाल हे बळजबरी संभोग किंवा सज्ञान नसलेल्या व्यक्तीशी संभोग ह्या प्रकारचे असल्याची जाणीव असूनही -
आणि असं म्हणणं -
हे जबाबदारी टाळणं आहे असं एक मत आहे. तसंच पुढे जाऊन असं म्हणणं -
थोदक्यात, वेगळा काही वर्ग नाही, तर अगदी नवरा-बायकोमध्ये असे शरीरसंबंध आले तर तेही बेकायदेशीर ठरतील असं मानणं ह्याला लोकांचा आक्षेप आहे.
संविधानातल्या मूलतत्त्वांच्या विरोधातल्या कायद्यान्वये ज्यांना त्रास होतो ते लोक पुरेसे अल्पसंख्य असले किंवा कायद्याची अंमलबजावणी पुरेशी कडक नसली, तर कोर्टाला त्यात पडायची गरज नाही असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. असा बहुसंख्याकवाद घातक आहे असं एक मत आहे.
आधी वेगळा वर्ग नाही असं सूचित केल्यानंतर (तथाकथित) अनैसर्गिक संभोग करणारे लोक असा एक वर्ग आहे असं कोर्ट नंतर म्हणतं -
पण त्या वर्गाचा छळ होतो असं सिद्ध करणारे पुरेसे पुरावे समोर आले आहेत असं कोर्टाला वाटत नाही -
संदर्भासाठी - येल लॉ स्कूलमध्ये LLM करणारे गौतम भाटिया ह्यांचा हा लेख.
privacy-dignity claims बद्दल विचार करताना दिलेल्या जुन्या निकालातले हे शब्द -
खाजगीपणाचा भंग नैतिकतेसाठी केला जाऊ शकतो ही शक्यता, आणि ह्या प्रश्नात पडण्याचा विचार टाळणारा जुना निकाल उद्धृत करून कोर्टानं एक प्रकारचा पुराणमतवाद आणि पलायनवाद स्वीकारला असं एक मत आहे.
'The issues of bodily integrity and the right to sexual choices' ह्याविषयी विचार करताना महिलेचा गर्भपाताचा हक्क किंवा एखाद्या व्यक्तीचं एच.आय.व्ही.बाधित असणं लपवून ठेवणं अशी उदाहरणं घेणं. गर्भपात वेळात केला नाही तर त्यामुळे शारिरीक इजा होऊ शकते किंवा विशिष्ट परिस्थितीत एका व्यक्तीचं एच.आय.व्ही. बाधित असणं लपवल्यामुळे इतरांना बाधा होऊ शकते. पण लैंगिक संबंध कुणाशी ठेवावेत ह्यातला 'चॉइस' असा नाही, तद्वत तुलना अप्रस्तुत आहे असं एक मत आहे.
थोडक्यात, खटल्यात मांडलेले सर्व आधुनिक मुद्दे दुर्लक्षित केले गेले आहेत, पुराणमतवादी मुद्दे उचलून धरले गेले आहेत आणि जबाबदारी घेणं शक्य असूनही ती घेणं ज्या कारणांमुळे सयुक्तिक ठरेल असेही मुद्दे कोर्टानं डावलले आहेत असे आक्षेप घेतले जात आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
झकास....
मुद्दाम एखाद्या त्रयास्थानं बातमी द्यावी त्या धर्तीवरचा प्रतिसाद. किंवा विकीपिडियावरील काही पानांत ज्या धर्तीवरचा मजकूर असतो, अगदि त्याच धर्तीवरचं लेखन.
म्हणजे जे म्हणायचं आहे, ते म्हणून मोकळं व्हायचं; व काळजीपूर्वक "अमुक अभ्यासकांचं असं निरिक्षिक्षण आहे की..."
किंवा "...असंही कोर्टाच्या विपरित एक मत आहे." असं म्हणत "त्यांचं मत" ,"त्यांचं म्हणणं " म्हणणं म्हणत पॉलितिकली करेक्ट रहायचं.
हा प्रतिसाद जशास तसा घेउन भारतीय कोर्टात नेला तरी चिंतातूर जंतावर काही कारवाई होण्याची शक्यता नाही.
आणि कोर्टाच्या भीतीनं आपली मतं लपवलीएत, असाही प्रकार नाही.
जे म्हणायचय ते अगदि कायदेशीर चौकटित बसेल असं, वैधानिक तर्क मांडत.
अगदि सुरक्षितपणे आपला ष्ट्यांड मांडलाय.
आवडलं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
समलिंगी विवाह
समलैंगिक संबंधांना मज्जाव नसावा पण विवाहसंस्थेत समलैंगिकतेला स्थान नसावे असा सूर काही प्रतिसादांत (इथे आणि अन्यत्र) आढळला. तर नेमक्या कुठल्या गोष्टींमुळे समलैंगिकांच्या विवाहाला अडचण आहे हे या प्रतिसादांतून कळू शकलेले नाही. म्हणजे आंतरजातिय/आंतरवांशिक/आंतरधर्मीय लैंगिक संबंध चालतील पण विवाह नको या युक्तिवादापेक्षा 'समलैंगिकांचे विवाह नाकारणे' हे नेमके कसे निराळे आहे हे कुणी स्पष्ट करेल काय?
उत्तर
<सारक्याझम मोड>'आम्हांस वाटते म्हणून' हा युक्तिवाद पुरेसा नाही काय?</सारक्याझम मोड>
(अन्यथा, 'हे काम कोर्टाच्या अखत्यारीतले नाही; समलिंगी संबंधांना "मान्यता द्यायची" असेल तर तसा स्पष्ट कायदा संसदेने [पक्षी: "लोकांच्या प्रतिनिधींनी"] करावा' या आर्ग्युमेंटास याहून वेगळा काय अर्थ आहे? येथे समलिंगी संबंधांना "मान्यता देण्याचा" प्रश्न उद्भवतोच कोठे? हा सरळसरळ 'ईक्वल प्रोटेक्शन अंडर लॉ'चा मामला होण्यास आणि त्यास तडा देणारा कोणताही कायदा खारिज करणे हे कोर्टाच्या अखत्यारीत असण्यास नेमका काय प्रत्यवाय असावा, हे मज अडाण्यास कळत नाही. अर्थात, मी काही अनुभवी किंवा विद्वान न्यायमूर्ती नाही. ["नॉर्मली विचारी" वगैरे दिसत असल्यास कल्पना नाही; मागच्या खेपेस आरशात पाहिले होते, तेव्हा असे काही जाणवले तरी नव्हते बुवा!])
+१
बरोबरच आहे. समलिंगी संबंधांना "मान्यता द्यायची" असेल तर तसा स्पष्ट संसदेने करावा' असे म्हणण्याऐवजी 'कालबाह्य झालेला समलैंगिक संबंध अनैसर्गिक म्हणून गुन्हेगारी ठरविणारा कायदा संसदेने रद्दबादल ठरवावा' असे न्यायमूर्ती महाशयांनी म्हटले असते तर कदाचित त्याला काहीतरी अर्थ उरला असता. निकाल कोणत्या बाजूने लागला हे महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर न्यायालयाची भाषा आणि टिप्पण्याही महत्वाच्या असतात असे वाटते, या वेळेस दोन्ही बाबतीत न्यायालयाने ती संधी गमावली आहे असे वाटते.
जेवढे वाचले त्यानुसार
जेवढे वाचले त्यानुसार ३७७ वगैरे कलमाचा वापर लहान मुलांच्या लैंगिक शोषणविरोधातही केला जातो. त्यामुळे संसदेने विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे काहीजणांचे म्हणणे आहे. दुर्दैवाने दुवे लक्षात राहिले नाहीत त्यामुळे चू.भू.द्या.घ्या.
बाकी काँग्रेस अध्यक्षांनी जाहीरपणे कोर्टाच्या निर्णयाशी असहमती दाखवल्याचे पाहून बरे वाटले.
बरोबर आहे.
बरोबर आहे पण त्याऐवजी बलात्काराच्या विरोधी कायद्यात सुधारणा करून त्यामध्येच तशी तरतूद झाल्यास असा तिरपा घास घेण्याची गरजच उरत नाही! असले युक्तीवाद केवळ हे कायदे पाठीशी घालण्यासाठी वापरले जातात आणि मुळात बहुसंख्यांचा एकतर याला मूक पाठिंबा तरी असतो किंवा त्यांना याच्याशी काही देणेघेणे नसते. त्यामुळे परदेशी माध्यमांसमोर आणि पुरोगामी जनतेसमोर तोंडदेखले 'कोर्टाच्या निर्णयाशी असहमती' वगैरे दाखवायचे उद्योग करण्याऐवजी आमचे सरकार आले तर आम्ही हा कायदा रद्दबादल ठरवू असे स्पष्ट म्हणण्याची कोणत्याच राजकीय पक्षाची दुर्दैवाने तयारी नसते, त्यामुळे असल्या ढोंगी वक्तव्यांनी काही बरेबिरे वाटत नाही.
हा विषय इतका पोलिटिकल लँडमाईन आहे आणि मुळात सामान्य जनताच इतकी बुरसटलेली आहे की काल आलेल्या तत्वनिष्ठ अशी छबी असलेल्या आ.आ.पा.ला जरी त्यांच्या पक्षाची याविषयी धोरणे विचारली तरी ते प्रतिक्रिया नाकारतील असा कयास आहे.
स्पष्ट म्हणण्याची तयारी
जितके वाचले आहे त्यानुसार सोनिया गांधी, राहूल गांधी, चिदंबरम वगैरे काँग्रेस नेत्यांनी ठामपणे कायद्यात सुधारणा करु असे म्हटले आहे. समाजवादी पक्षाने ठामपणे समलैंगिकांना विरोध केला आहे. आणि भाजपाने नेहमीप्रमाणे (त्यांच्या सनातनी व्होटबँकेला वाईट वाटू नये म्हणून) गुळमुळीत भूमिका घेतली आहे. आआपनेही प्रतिक्रिया नाकारली आहे.
निदान ठाम भूमिका घेण्याचे श्रेय काँग्रेसला मिळाले पाहिजे.
जितके वाचले आहे
जितके वाचले आहे त्यावरूनच कोणत्याही पक्षाने ठामपणे आपण सत्तेत आल्यास हे विधेयक रद्दबादल करू असे म्हटलेले नाही, "कायदयात सुधारणा करण्याच्या शक्यतांचा विचार करू" वगैरे वाक्ये मला गुळमुळीतच वाटतात. एकीकडे पुरोगाम्यांना बरे वाटावे असे म्हणून उगीच उदारमतवादी धोरणे असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे आरोग्यमंत्री म्हणून आपल्या पक्षाच्या नेत्याने "समलैंगिकता हा आजार आहे" असे म्हटले की त्याच्याकडे कानाडोळा करायचा असल्या ढोंगीपणाची किळस येते. भाजपाच्या बाबतीतल्या तुमच्या अनुमानाशी सहमत आहेच आणि त्यांचा ढोंगीपणा उघडच आहे. आधी म्हटल्याप्रमाणे आआपाची प्रतिक्रियाही अपेक्षितच होती, शेवटी लोकमत काय आहे यावरच पक्षांची धोरणे ठरत असल्याने लोकशिक्षणाला पर्याय नाही!
'हिंदू' मध्ये आलेला हा परिच्छेद पहा,
Mr. Rahul Gandhi said he agreed with the Delhi High Court’s view on decriminalising gay sex, stressing that his “personal view” was that it was a matter of “personal freedom” that should be left to the individuals concerned.
The Aam Aadmi Party, too, said the Supreme Court’s verdict violated human rights, went against the liberal values of the Constitution, and the spirit of the times.
ते तर असोच
हे तर झालेच. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायाधीशांच्या (वसाहतवादभ्रष्ट?) पूर्वग्रहांना या निर्णयापुरते मान्य करून टाकू. पण काही अन्यथा पूर्वग्रहदुषित नसलेल्या व्यक्तिही हक्कांचा संकोच करणारी अशी (विवाह नाकारणारी) भुमिका घेतात तेव्हा भारतीय सामाजिक मानसिकतेशी संबंधित काही विशेष गोष्ट मज (पाश्चात्य उदारमतवादाने भ्रष्ट झालेल्या) पामराला ध्यानात येत नसावी अशी शक्यता वाटते. म्हणून देशी उदारमतवादी किंवा (विवेकी?) परंपरावादी (हे सामान्यतः जातींविरुद्ध असतात म्हणून) यातील कोणीतरी विवाह का नाकारला जावा? याचे उत्तर देण्याची विनंती केली.
प्रश्न उद्भवतो कोठे?
तशी भूमिका घेऊ पाहणारांस (किंवा, फॉर द्याट म्याटर, अफेक्टेड पार्टीज़ वगळता अन्य कोणांस / समाज-अॅट-लार्जास) या मामल्यात काही लोकस स्टॅण्डाय असण्याचा प्रश्न मुळात कोठून (आणि का) उद्भवावा?
आजच्या परिस्थितीत, सदरहू भूमिकाग्राहींतील विवाहेच्छुकांपैकी (अगदी विषमलिंगी विवाहेच्छुकांपैकीसुद्धा) कोणा गृहस्थास अथवा गृहिणीस कोण्या त्रयस्थाने (मग हा त्रयस्थ भले लग्न लावण्याची ऑथॉरिटी असलेला रजिष्ट्रार/भट/पाद्री/काज़ी असो नाहीतर शेजारचे गुंडोपंत किंवा सोसायटीतल्या देशपांडीणकाकू) 'यह शादी हरगिज़ नहीं हो सकती', कारण 'तो तुझ्या जातीतलाच नाही/तिचे नाकच नकटे आहे/त्याला पगारच कमी मिळतो/तिला मंगळच आहे/तो हगतानाच पादतो/व्हॉटेवर' म्हणून सांगितले, तर मशारनिल्हे सद्गृहस्थ अथवा सद्गृहिणी ते गुमान ऐकून घेतील, की प्रश्नांकित रजिष्ट्रार/भट/पाद्री/काज़ी/गुंडोपंत/देशपांडीणकाकूंस शुद्ध मराठीत 'तुझ्या नानाची टांग' (अथवा, पर्यायाने, 'नन ऑफ युअर *** बिझनेस') म्हणून ऐकवतील?
तो.ति.जा. नसल्याने/ति.ना.न. असल्याने/त्या.प.क.मि. असल्याने/ति.मं. असल्याने/तो.ह.पा. असल्याने/व्हॉ.मुळे त्याचे नि तिचे जे काही भलेवाईट होणार असेल, ते आपले आपण पाहून घ्यायला 'तो' आणि 'ती' समर्थ नाहीत काय? र./भ./पा./का./शे.गुं./सो.दे. यांचा संबंधच काय येतो अडवण्याचा? र./भ./पा./का. यांचे काम फक्त (१) विवाह फ्यासिलिटेट करणे, आणि/किंवा (२) विवाहाची रीतसर नोंद करणे एवढाच आहे, आणि शे.गुं./सो.दे. यांचा रोल फक्त (आमंत्रित केलेले असल्यास) लग्नास उपस्थित राहून पंगतीचे हादडणे, एवढाच आहे ('आलात, तर तुमच्यासह, नाहीतर तुमच्याविना; आणि टू हेक विथ द अहेर्स'); लग्नात मोडता घालणे नव्हे.
राहता राहिली गोष्ट समलिंगी विवाहांकरिता (म्हणजे, प्रामुख्याने, विवाहसोहळ्यांकरिता आणि/किंवा नोंदणीकरिता) परंपरेमुळे समाजात/शासनदरबारी मेक्यानिझम उपलब्ध नसणे. ही तात्पुरती अडचण असू शकते; विरोधाचे कारण होऊ शकत नाही. तशी मेक्यानिझम निर्माण करणे फारसे जिकिरीचे तर नसावेच, आणि एका समाजगटाला समान हक्क नाकारण्याची ती पळवाट असू नये.
असो.
राघवजी (त्यातला जबरदस्ती हा
राघवजी (त्यातला जबरदस्ती हा भाग समलैंगिकत्वाचाच दोष आहे असे न म्हटले) व आणि गिरिष कर्नाड यांच्यासारखी उदाहरणे. या लोकांनी दोन्ही प्रकारचे संबंध आयुष्यात ठेवले आहेत. त्यांना बायका मुले आहेत. याचा काय अर्थ काढायचा? अशी अजून कोण कोण मंडळी आहेत? समलैंगिकतेचा एक जीवनपद्धेती म्हणून पुरस्कार करणारी मंडळी राघवजी आणि कर्नाड यांच्यावर आणि त्यांच्या पत्नींवर अन्याय झाला(कदाचित त्यांनी वेगळे व्हावे) असे म्हणतील काय?
बरीच माणसे देव मानतात. देव म्हणून कोणी (व्यक्ति) जीवनात सतत शेजारी आहे जणू असेच ते आयुष्य जगतात. ही एक मेंटल कंडीशनींग आहे. तसेच आपण समलैंगिक आहोत, शाकाहारी आहोत अशा मानसिकता असू शकतात. अशा प्रत्येक मानसिकतेला एक संस्था स्वरुप आधार दिला तर समाजात नको ते स्तर निर्माण होतात, आजही अशा भावनांचे चिकार स्तर आहेत - (उदा. अस्तिकांची देवळे, नास्तिकांचे क्लब, शाकाहारी हॉटेल्स, मांसाहारी हॉटेल्स, इ). या सगळ्या गोष्टींना मानसिक कंडिशनींग शिवाय दुसरा आधार नाही.
विवाह हा स्त्री आणि पुरुषाचा होतो. त्याचे उद्देश स्पष्ट आहेत. ते समलैंगिक विवाहात मात्र एल जी बी टी या प्रकारांपैकी बी (ज्यांच्यावर निसर्गाने अन्याय केला आहे, ज्यांच्या लैंगिकतेची अभिव्यक्ति कशी व्हावी याबद्दल मला)प्रकाराकरिता विवाहसंस्था असावी, त्यांना सामाजिक मान्यता आणि सन्मान असावा. एल आणि जी कॅटेगिरीबद्दल मात्र त्यांची संस्था नसावी असे वाटते. जे लोक अन्यथा सामान्य लैंगिक संबंधास शारिरिक्दृष्ट्या क्षम आहेत त्यांनी आत्मघोषित मानसिकतेचा पडदा वापरून सामान्य जीवनापासून दूर पळणे योग्य नव्हे. कर्नाड म्हणतात मी समलैंगिक संबंध ठेवले होते. मग त्याचा अर्थ त्यांनी जीवनभर पत्नीवर (आणि स्वतःवरही) अन्याय केला आहे असा होतो (जे खरे नसावे.त्या जोडप्याशी परिचित लोक जास्त सांगू शकतील). आता जर कर्नाड जेव्हा समलैंगिक संबंध ठेवत तेव्हा हे संबंध कायदामान्य, समाजमान्य असते तर त्यांनी सामान्य विवाहच केला नसता. कर्नाडांच्या आत्मचरित्रात मात्र त्यांनी आपले जीवन 'एका नैसर्गिक प्रवृत्तीला दाबल्याने समलैंगिकतेला दाबल्याने माझे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले' असे म्हटलेले नाही. ते आनंदीच होते म्हणतात. हे कसे काय? राघवजींना आज मुले आहेत. समजा त्यांचे प्रकरण उघडे पडले नसते तर (आणि आजही) ती मुले त्यांच्या आयुष्यातून जावीत (मुलांचा पिता बनणे माझे नैसर्गिक ओरियन्टेशनच नव्हते म्हणत) असे वाटत असेल का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
राघव कौन है?
राघव कौन है?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मध्य प्रदेशचे माजी
मध्य प्रदेशचे माजी अर्थमंत्री. समलैंगिक होते. (ते संबंध त्यांनी जबरदस्तीने नोकरासोबत ठेवले होते हा भाग वेगळा). लग्न करून सुखीही होते.
राघवजींची केस अवघड पडत असल्यास मला कर्नाड तरी समजून द्याल का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भारतासारख्या देशात जिथे
भारतासारख्या देशात जिथे straight लोकांच्या लैंगिक भावनाची प्रचंड गळचेपी होते त्या देशात समलैंगिक लोकाना कसल्या कसल्या यातनामधून जाव लागत असेल हा विचार केला तरी अंगावर काटा येतो . अजून एक म्हणजे एखाद्या ठार खेड्यातला माणसाला आपण समलैंगिक आहोत याची जाणीव झाल्यावर त्याचे काय होत असेल ? स्वतःच्या शारीरिक गरजा कश्या पूर्ण करत असेल तो ? शहरात निदान थोडी बरी स्थिती आहे . बाकी जाती -धर्म आणि अनेक compartment वरून माणसाला जज करणारया समाजात समलैंगिक म्हणून जन्माला येण हा शापच.
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
तुमच्या वरिल प्रतिसादातला
तुमच्या वरिल प्रतिसादातला शब्द-नि-शब्द खरा आहे...
त्यातला त्यात हे खालिल वाक्य वाचुन खरंच खुप वाईट वाटले... पण काय करणार तिच सत्य परिस्थीती आहे....
>>>बाकी जाती -धर्म आणि अनेक compartment वरून माणसाला जज करणारया समाजात समलैंगिक म्हणून जन्माला येण हा शापच.>>>
मी तयार आहे
मला पुष्ट गाई आवडतात
मला बैलसुद्धा आवडतात, पण 'तसे' नाही
नुस्ते संगतीनी कडबा चघळायला वगैरे.
पण प्रयोग म्हणून करायचा झाला, तर...
अरुणजोशीसरांना प्रयोगापुरतं बैल मानायला मी तयार आहे.
(मी बैल आहे त्यामुळे माझ्यासाठी ही शिवी नाहीए उगाच चिडू नये)
मी कंडोम वापरेन.
मला एड्स नाही.
मी पुष्ट आहे, पण खूप नाही
इतर शंका असल्या तर विचारू शकता.
माझ्या बैलबुद्धीनुसार उत्तर मिळेल.
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
प्राण्यांशी संभोग? शांतम्
प्राण्यांशी संभोग? शांतम् पापम्. शांतम् पापम्.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
"शी" नाही.
"कडून".
हा तर माझा पुरुषी इगो
हा तर माझा पुरुषी इगो दुखावणारा प्रतिसाद निघाला. माझे नैसर्गिक ओरियंटेशन कडून नसून कडे आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इदं न मम
मी फक्त बैलजींच्या ऑफरचे इंटरप्रेटेशन सांगितले. याहून माझा यात काहीही संबंध नाही. (हातही नाही.)
You can not interprete it
You can not interprete it like that. Even a woman can make all those statement, include the one on condom.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शांतम् चालेल
फक्त एक प्रयोग म्हणून तरी?
-Nile
निळूभाऊ, लगे रहो!
=))निळूभाऊ, लगे रहो!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अश्लील!!!
काळा मठ्ठ बैल हा प्रयोग करतच
काळा मठ्ठ बैल हा प्रयोग करतच असतात. तुम्हाला या प्रयोगाची व्याप्ती वाढवायची असेल तर त्यांना संपर्क करा. मला दिलेले आमंत्रण ट्रान्सफरेबल नाही असे त्यांनी लिहिले नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धाग्यावरील वातावरण निवळले
धाग्यावरील वातावरण निवळले आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पित्त
इथे बर्याच सदस्यांना समलैगिकांबद्दल खरीखुरी सहानुभूती असावी. परंतु असे न मानणे सामान्य सौजन्यांच्या नियमांची प्रतारणा होते. मानणे मला अवघड गेले. म्हणून मी दांभिकता आणि प्रामाणिकपणा वेगळा काढण्यासाठी 'तो' प्रश्न विचारला.
उदाहरण - समजा आपण शाकाहारी (सरळ) आहोत नि आपल्याला मांसाहार्याबद्दल (ज्यांना आपल्या समाजात निगेटीव अर्थाने घेतात) अतीव सहानुभूती आहे. अशी सहानुभूती असणार्या शाकाहार्यास 'तू, प्रयोग म्हणून, वा तत्त्वतः, मांस खाशील का?' म्हटले तर काय व्हावे? त्याने हो म्हणावे, नाही म्हणावे वा विचार करेन , इ इ म्हणावे. पण त्याचे पित्त खवळले तर त्याला मांसाहार्यांबद्दल खरी सहानुभूती आहे का असा प्रश्न उभा होतो.
कोणाच्या भावना दुखवायचा हेतू नव्हता/नाही.
समलैंगिकता मानवतेचा प्रोत्साहनीय भाग आहे हे मला पटत नाही पण जे जे उदात्त मानवी आहे ते ते सगळं स्वीकार्य आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>>त्याने हो म्हणावे, नाही
>>त्याने हो म्हणावे, नाही म्हणावे वा विचार करेन , इ इ म्हणावे.<<
मी नाही म्हंटले आहे.
प्रयत्न
हा प्रतिसाद श्री जोशी यांच्या या उपप्रतिसादास आहे. हा धागा प्रचंड लांबल्यामुळे शोधाशोध करण्यात खूपच वेळ जातो.
________________
राघव, कर्नाड यांच्या कामव्यवहारांची मला अजिबातच माहिती नाही. कर्नाड किंवा राघव हे बायसेक्स्च्युअल (द्विलैंगिक?) असू शकतील. त्यांनी त्यांच्या समलैंगिक कामव्यवहाराविषयी त्यांच्या सहचारिणींस कितपत माहिती दिली, त्या पत्नींना काय भावनिक प्रश्न आले, त्यांची यास हरकत नव्हती का? वगैरे काहीच माहिती नसतांना त्यांच्यावर अन्याय झाला किंवा कसे हे सांगू शकत नाही. भिन्नलैंगिक विवाहबाह्य संबंध ठेवणार्या पुरूषांपेक्षा कर्नाड, राघव निराळे कसे? विवाह हा करार सामाजिक (एन्फोर्सर) असतो तसाच दोन व्यक्तिंमधलाही (बायलॅटरल) असतो आणि हा बायलॅटरल भाग सततच उत्क्रांत होत असतो. त्यात केव्हा केव्हा धडधडीत अन्यायही खपवला जातो पण त्याचा (अन्यायाचा) सुलभपणे फक्त लैंगिक ओळखीशी संबंध लावणे मला अयोग्य वाटते.
अनके वैविध्यांत (हेटरोजेनिइटीज) काही समान सूत्रात बांधता येते म्हणून संस्था टिकू शकतात. प्रत्येक विवाह स्वतंत्र असतो पण दोन व्यक्तिंचीया सहजीवन जगण्याची प्रेरणा (प्रत्येक विवाहात) सारखीच असते. समलैंगिक जोडप्यांमध्ये ही प्रेरणा भिन्नलैंगिकांइतकीच प्रबळ असावी. संस्था म्हणून देवळे-क्लब्ज (मोकळा वेळ घालवण्याच्या जागा) उपहारगृहे (लोकांच्या खाण्याची जागा) यांत अशीच समानता शोधता येईल.
माझ्या परिसरात विवाह पुरूष-पुरूष, स्री-स्त्री असाही होतो. टिकतो. मी पाहिले/पाहत आहे. तुमच्या-माझ्यापेक्षा मी पाहिलेल्या समलैंगिक जोडप्यात अपत्याची चांगली काळजी घेतली जाते. भिन्नलैंगिकांप्रमाणे समलैंगिक विवाहही अपयशी असतच असतील, हे नाकारत नाही पण जर एखाद्या समाजाने समलैंगिकांचे अस्तित्त्वच नाकारले तर तिथे असा काउंटरफॅक्च्युअल (समलिंगी विवाह) कसा पाहता येईल?
समलैंगिक प्रेरणा असलेल्या व्यक्तिंना भिन्नलिंगी संबंध (सामाजिक दबाव/वैयक्तिक प्रयत्नाचा भाग म्हणून) ठेवावे लागतात. त्या भिन्नलिंगी संबंधातून अपत्यनिर्मिती व इतर सूख मिळते. त्या सुखांना न नाकारताही अशा व्यक्तिंच्या दु:खाची कल्पना एक संवेदनशील माणूस म्हणून करता येते. प्रयत्न करून पहा.
ऐसीसारख्या उसळत्या बॉलिङ्ग
ऐसीसारख्या उसळत्या बॉलिङ्ग पिच्चवर तब्बल दोन अन अडीच अशी साडेचार शतके ठोकल्याबद्दल मा. श्री. अरुणजोशी यांना "ऐसीचे तेंडुलकर" किंवा "लारा" का खिताब देण्यात यावा अशी सिफारस करतो.
-वाल्गुदनाथ बॅटगिरी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा हा
ऐसीवरची सगळी अक्षरे अरुणरावांच्या मतांची पालखी वाहायला आसुसलेली वाटत आहेत
अमेरिका कशी घडली ह्यामध्ये ह्याचे उत्तर आहे
This comment has been moved here.
भाजपाचा नेहमीप्रमाणे चक्रमपणा.
This comment has been moved here.
माझे आवडते पत्रकार अँड्र्यु
माझे आवडते पत्रकार अँड्र्यु सुलिव्हन यांचा लेख -
(ऑगस्ट १९८९ मधे लिहिलेला)
http://www.newrepublic.com/article/79054/here-comes-the-groom
लेखाची समंजसपणाची भूमिका
लेखाची समंजसपणाची भूमिका आवडली. कुठेतरी एक रेषा आखून 'यापलिकडे जे आहे त्याला लग्न म्हणायचं, आणि ज्याला लग्न म्हणता येत नाही त्याला काही नाही म्हणायचं' हा युक्तिवाद दिसतो. त्यासाठी समलैंगिकांनी लग्न करण्यास संमती द्यावी, मात्र लग्न न झालेल्यांना - घरगुती जोडीदारांना - लग्नाच्या सुविधा मिळू नयेत असा मुद्दा आहे.
वास्तव असं आहे की जसजसे स्त्री-पुरुष स्वावलंबी होतात, तसतसे पारंपारिक 'कुटुंब' ही घट्ट संस्था सगळ्यांनीच तयार करावी हे बंधन ढीलं पडायला लागतं. तसं होत असताना काही जोडपी लग्न न करताच तेच नातं निभावू शकतील यावर विश्वास ठेवावा या मताचा मी आहे. 'असं नातं आमच्यात आहे' हे जाहीर करण्याचा लग्न हा एक मार्ग आहे. इतर मार्ग पुरेसे प्रस्थापित झालेले नाहीत. ही कमतरता समाजाने भरून काढलेली नाही हा त्या लग्न न झालेल्या जोडप्याचा दोष नाही. 'रिश्तो का इल्जाम' कुठेतरी आवश्यक आहे हे खरं आहे, पण त्याला लग्न हेच नाव असण्याची गरज नाही.
माझ्या ऑफिसमधे, मित्रांमधे मी
माझ्या ऑफिसमधे, मित्रांमधे मी थोडासा फीडबॅक घेतला. सर्वांचं म्हणणं असं पडलं कि साधारणतः ७०-८०% लोक या प्रसंगांतून वा भावनांतून जातात. त्यात अनैसर्गिक असं काही नाही. सबब कोर्टाने त्यात गुन्हा वैगेरे पाहू नये. परंतु ती एक सर्वस्वीकृत जीवनपद्धती म्हणून डिस्करेज केली जावी.
अवांतर -
लोकहो, या धाग्यात त्रिशतक व्हावं इतका हा विषय महत्त्वाचा आहे का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
विषय?
इथे विषय ह्या शब्दावर कोटी होउ शकते.
मुळात "समलैंगिकता" हा विषय तुम्ही म्हणताय की "व्यवस्थेनं/कोर्टानं/कायद्यानं किंवा इतर कुणीही खाजगी गोष्टीत नाक खुपसणं"
(breach of privacy) हा विषय मानताय त्यावरही बरच अवलंबून आहे.
शिवाय कुणासाठी काय किती महत्वाचं आहे ; हे सांगता येणार नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सुसंगत
डिस्करेज करायचं म्हणजे नक्की काय करायचं? 'तंबाखू हानिकारक आहे' म्हणतात तसं? पण प्रवृत्ती जर जनुकीय असेल आणि सिगरेटमुळे होतो तसा त्यामुळे जर इतर कुणाला त्रास होत नसेल, तर ह्याला काय अर्थ आहे?
तुम्ही धागा नीट वाचलात, तर कदाचित हे लक्षात येईल, की समलैंगिकतेला धाग्यावर विरोध झाला म्हणून धागा लांबला. अन्यथा तशी काही गरज नव्हती. म्हणजे तुमच्या ऑफिसातला फीडबॅक आणि ह्या धाग्यावरचा फीडबॅक परस्परसुसंगत आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
उलट
समलैंगिकतेला धाग्यावर विरोध झाला म्हणून धागा लांबला. अन्यथा तशी काही गरज नव्हती.
ह्याउलट कोर्टाच्या निर्णयाला धाग्यावर विरोध झाला म्हणून धागा लांबला. अन्यथा तशी काही गरज नव्हती. असं कुणी का म्हटलं तर नक्की चूक काय? किंवा
समलैंगिकतेचं समर्थन झालं म्हणून धागा लांबला. अन्यथा तशी काही गरज नव्हती. असं म्हटलं तर?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
म्हणजे तुमच्या ऑफिसातला
मी न्यायालयापेक्षा सौम्य भूमिका घेत आहे हे सांगूनही चर्चा लांबली. मित्रांनी हे % कसे काढले देव जाणो. उद्या ह्या सर्वांना हेच नॉर्मल आहे वाटले तर आली का पंचाईत?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
?
नेमकी कोणाला पंचाईत?
मला.
मला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मियाँ-मियाँ (किंवा बीवी-बीवी) राज़ी...
...तो क्या करेगा अरुणजोशी?
सुप्रिम कोर्ट आहे ना माझ्या
सुप्रिम कोर्ट आहे ना माझ्या सोबतीला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कोर्ट
कोर्ट हुक्माचे(पक्षी कायद्याचे) ताबेदार.
उद्या संसदेने कायदा बदलला तर तेही आक्षेप घेणार नाहित.
तस्मात, कोर्ट तुमच्या बाजूला सदैव राहिलच ह्याची शाश्वती नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
काळजी नको अरूण'भाई'
असे झालेच येत्या एकदोन वर्षात, तर तुम्ही आपले थेट सौदि अरेबिया नाहीतर अजून कोणत्यातरी कट्टर इस्लामिक देशात जाऊन रहा. तिथे काही असले सर्वसमावेशक कायदे अजून पन्नास साठ वर्षे येतील असे दिसत नाही.
-Nile
नाईल, दिल्ली हायकोर्टाच्या
नाईल, दिल्ली हायकोर्टाच्या यापूर्वीच्या समलैंगिकतेच्या बाजूने दिलेल्या निर्णयाच्या वेळी संसदेने विपरित भूमिका घेतली होती हे विसरू नका.
आणि मला (तो कर्नाटकचा मोदी पी एम झाले तर भारत सोडून (हिंद महासागरात) जाईन म्हणणारा) कृष्णमूर्ती का कोण इतकं महत्त्व द्यायची गरज नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं एक पृथक्करण
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं एक पृथक्करण 'कायदा' ह्या विषयाला वाहिलेल्या एका ब्लॉगवर वाचता येईल -
Taking Sexuality Seriously: The Supreme Court and the Koushal Case - Part I
Taking Sexuality Seriously: The Supreme Court and the Koushal Case - Part II
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
परत परत तेच उगाळण्यात अर्थ
परत परत तेच उगाळण्यात अर्थ नाही. फक्तं एवढेच म्हणावे वाटते की,
१. प्रमोट केल्याने समलैंगिकता किंवा समलैंगिक संबंध वाढत/पसरत नाहीत.
२. तेच अलाऊ करण्याबद्दल.
३. कोर्टाने मान्यता दिल्यावर पसरायला हा साथीचा रोग नाही.
४. डिसकरेज करायला ह्यात वाईट/घृणास्पद/हानिकारक असं काही नाही.
५. ह्यात "स्टुपिड" असंही काही नाही.
हे सगळं सगळ्यांना उमजेल तो सुदिन!
-अनामिक
पाने