महाराष्ट्र विधानसभा २०२४ वाढलेल्या मतदानाचे परिणाम
इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती गुरुवारी (14 नोव्हेंबर, 2024) रोजी असे म्हणाले की, https://timesofindia.indiatimes.com/india/invaders-colonisers-ruined-our...
"इतिहास असे सांगतो की वैदिक काळापासून अनेक आक्रमणे होईपर्यंत गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया यातील नवनवीन कल्पनां मांडणारे भारत एक आघाडीचे राष्ट्र होते. या सगळ्यात अध्ययन, अध्यापन व संशोधन यात भारत अग्रेसर होता. "
"पण 700 AD ते 1520 AD याकाळात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधील नेते आणि त्यानंतर ब्रिटिश वसाहतींमुळे भारतीय तरुणांना त्यांच्या विज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी यासह इतर गोष्टींमधे अजिबात प्रगती करता आली नाही. सुमारे 1,000 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना बळजबरीने रोखून धरलेले होते. प्रगतीच्या वाटा रोखून धरलेल्या होत्या."
"इतिहास हे देखील सांगतो की अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राज्यकर्त्यांना विज्ञान, वैद्यक आणि गणिताची फारशी कदर नव्हती. ब्रिटिश विजेत्यांनी गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया या विषयांत महत्त्वाकांक्षी आणि काल्पनिक कार्य करण्याच्या आमच्या इच्छेला तुरळकपणे प्रोत्साहन दिले, परंतु आमची प्रगती मंदावलेलीच राहीली."
"ते पुढे म्हणाले की, भारतीय तरुणांना विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र, निसर्गाचे निरीक्षण करण्याची शक्ती, कुतूहल, अनुमान काढणे, गंभीर आणि विश्लेषणात्मक विचार, शोध आणि नवकल्पना, आणि समस्या व्याख्या आणि समस्या सोडवणे या सर्व गोष्टींपासून १००० वर्षे लांब ठेवण्यामुळे, भारतीय तरूणांचे अतोनात नुकसान झालेले आहे."
श्री. नारायण मूर्ती हे समाजवादी विचारसरणीचे असल्याचे मानले जाते. पण लवकरच त्यांना मोदीभक्तांमधे सामील केले जाईल असे वाटायला लागले आहे.
Wink
मला तर आता भिती वाटायला लागली आहे की, असाच एखादा जेएनयुमधील कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस असेही म्हणेल की, भारतात नवविचार मांडणे, संशोधन करणे याची खूप मोठी परंपरा आहे. जर भारतावर आक्रमणे झाली नसती. इथली ज्ञानसंपदा नष्ट झाली नसती. इथल्या अभ्यासकांना कवट्यांचे मिनार बनून आपले जीव गमवायची पाळी आली नसती तर कदाचित औद्योगिक क्रांती युरोपमधे न होता ती भारतातच झाली असती व ती सुध्दा ६००-७०० वर्षे अगोदरच झाली असती.
Wink
मला तर असेही वाटायला लागले आहे की, मोदींचे अंधभक्त आता वाढायला लागले आहेत. नारायण मूर्तींसारखी जीवनांत यशस्वी झालेली माणसे,आपली बुध्दी मोदींच्या चरणी गहाण टाकायला लागली आहेत हे पाहून त्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटायला लागली आहे. राममंदीर तोडून बाबरी मशिद बांधणाऱ्या बाबराचा उदोउदो करायचे सोडून त्या बाबरालाच दोषी समजायला लागली आहेत. बुरसटलेले विचार पसरवणारी नालंदा, तक्षशीला येथील भव्य ग्रंथालये जाळून नष्ट करणाऱ्या लोकांना नतद्रष्ट म्हणायला लागली आहेत. मोठमोठे ग्रंथ तोंडपाठ असणारे माणसे म्हणजे तर चालती फिरती ग्रंथालये. त्यांची मुंडकी उडवण्याचे व त्या मुंडक्यांचे मनोरे रचण्याचे महान कार्य करणाऱ्या सर्व आक्रमकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे दु:साहस जर नारायण मूर्तींसारखे विद्वान करायला लागले तर भारताची किती वाट लागेल याची कल्पनाच करवत नाही. हिंदूंची मोठमोठी मंदीरे ही तर एकप्रकारची बुरसटलेली विचार मांडणारी छोटीछोटी ग्रंथालयेच होती. त्यातही चालती बोलती फिरती ग्रंथालये असायची. भारतवर्षाला या सगळ्यांतून मुक्ती मिळवून देण्याचे महान कार्याला आज कमी लेखले जायला लागले आहे.
तरीपण बाबर, औरंगजेब असे थेट उल्लेख न करता "उझबेकिस्तानमधील राज्यकर्ते" असे शब्द वापरून नारायण मूर्ती साहेबांनी अजून तरी १०० टक्के मोदीभक्त न झाल्याचे दाखवून दिले आहे. तरीपण योगी आदित्यनाथ यांना मदत होईल अशी व्यक्तव्ये ऐकली की मनाला खूप व्यथा झाल्याशिवाय राहात नाही. Wink
हे वाचल्यावर असे वाटायला लागले की
१. योगी आदित्यनाथ "बटेंगे तो कटेंगे" याचा परिणाम खरोखरच होतो आहे काय ?
किंवा
२. त्यामुळेच मतदान वाढते आहे का?
तसेच
३. हे वाढते मतदान भाजपालाच लाभदायक ठरेल हे कशावरून ?
वाढत्या मतदानाच्या बाजूने फक्त भाजपाच बोलत असल्याने भाजपाच्या चष्म्यातून प्रथम सगळा विचार करायचे ठरवले तेंव्हां खालील मुद्दे जाणवले.
तर लोकहो मतदान वाढेल व ते हिंदूंचे असेल असे समजून मुद्दे शोधायचा प्रयत्न करू.
मतदान टक्केवारी वाढण्याची कारणे खालील असावीत असे वाटते आहे.
१. मोदी शहा आपल्याला गृहीत धरायला लागले आहेत अशी समजून भाजपाला मत देणाऱ्यांची व्हायला लागली होती. त्यांसाठी एक हलकासा धक्का मोदी शहांना बसावा अशी एक सुप्त इच्छा जाणवत होती. पण मोदींचे बहुमत जावं एवढा काही राग नव्हता. त्यामुळे भाजपा २४० पर्यंत आल्यावर त्या लोकांच्या लक्षात आलं की जरा जास्तच जोरात धक्का मोदी शहांना मारलाय. ती लोकं परत येतील.
२. ४००+ पर्यंत आरामात आपण जातोय या नादात काही लोकं फिरकलीच नाहीत. ४००+ नाऱ्यामुळे गाफीलपणा वाढला. पूर्वी शिवाजी महाराज शत्रूगोटात गाफीलपणा यावा यासाठी शरणागतीची हूल उठवत असत. इथे तर आपलीच लोकं गाफील राहण्यासाठी प्रयत्न केला गेलाय. ती चूक दुरूस्त होताना दिसते आहे.
३. यावेळेस आरएसएस सक्रीय झालीय असे वाटतंय. लोकसभेत जरा थंडपणा जाणवला होता. नेहमीची उत्साही मंडळी गायब झाल्याचे लक्षात आले होते. ती परत दिसायला लागली आहेत.
४. बांगला देश फॅक्टर खूप प्रभावी ठरेल असे वाटतंय. सैन्य व रेल्वेच्या खालोखाल वक्फ बोर्डाकडे जमीन आहे हे बऱ्याच जणांना प्रथमच कळतंय असं वाटतंय. वक्फ बोर्डावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही याउलट हिंदूंच्या मंदिरांवर सरकारचे संपूर्ण नियंत्रण हा आपपर भाव प्रथमच हिंदू धार्मिक लोकांच्या लक्षात येतोय. त्यामुळे किर्तनकार, प्रवचनकार, वारकरी आपआपसात काही बोलत असतील तर तो अंडर करंट खूप मोठा असू शकतो.
५. नेमानी सारख्या लोकांनी आपल्या मागण्या ऊघडरित्या मांडायला सुरवात केल्याने मविआची पंचाईत होतीय तर लोकांमधे धृविकरण होतंय. बंद दाराआड करायच्या गोष्टी हा माणूस सर्व दारं खिडक्या सताड उघडून का करतोय हे उबाठामधल्या कित्येकांना कळेनासं झालं असेल.
६. भाजपाच्या धोरणांना आंतरराष्ट्रीय परिस्थिती खूप अनुकूल आहे. आहेरे वर्गातले, सुशिक्षीत, परदेशात राहणारे असे बरेच हिंदू आहेत की ते भाजपाच्या मुस्लीम धोरणांबाबत संपूर्णपणे तटस्थ आहेत. मुस्लीमांनी देवळे फोडली. लोकं मारली हे त्यांना माहीत आहे. पण त्याचे त्यांना सोयरसुतक फारसे नाही. तो इतिहास झाला. तो आता उगाळून आता काय फायदा हा त्यामागे व्यवहार्य विचार असतो. पण मुस्लीम राष्ट्रांत मंदिरे उभारायला मुस्लीमच मदत करताहेत हे पाहिल्यावर तेही प्रथमच विचार करायला लागले आहेत. स्पेन, इंग्लंड, जर्मनी मधे मुस्लीमांचे अतिरेकी वागणे व त्यावर त्या देशांनी केलेली कार्यवाही यामुळे यालोकांना प्रथमच असे वाटायला लागले आहे की भाजपा जे काही मुद्दे मांडतो आहे त्यात काहीतरी तथ्य असावे. बांगलादेशातील घटनांमुळे या सगळ्यावर फोकस पडून जणूकाही त्याकडे बहिर्गोल भिंगातून तपासणी सुरू झाली आहे.
७. कॅनडा प्रकरणातूनही भारताचे हित व अहीत या मुद्यांतून परकीय भारतीय विचार करायला लागले की काय असे वाटायला लागले आहे.
७. यातूनच ट्रंप हा भारताचा मित्र व ओबामा वगैरे भारताचे हितशत्रू असा काहीसा प्रकार अमेरिकेत प्रथमच होऊन डेमोक्रोटीक पक्षाकडील हिंदू मते रिपब्लिकनांकडे वळली असावीत असा संशय यायला लागला आहे. ट्रंप यांचा विजय ऐतिहासीकच मानावा लागेल. दोन्ही सभागृहे व इलोक्टरल मतांनामधील त्यांचा विजय हा काही निसटता विजय म्हणता येत नाहीये . त्याला निर्विवाद विजयच म्हणायला लागेल. या सर्व घडामोडींचे पडसाद त्यांच्या भारतातील नातेवाईक व परिचीतांमधे उमटणे साहजिक आहे. त्यामुळे परदेशीय भारतीयांचे भारतातील नातेवाईक व तत्सम श्रेणीतील आहेरे वर्गातली लोकं प्रथमच भाजपाचा मुस्लीम विरोधाकडे डोळसपणे पहावयास सुरवात करायला लागले असावेत असं वाटू लागलं आहे. याबाबत नारायण मूर्तींचे उदाहरण दिलेले आहेच.
या सगळ्यामुळे हिंदूंचे मतदान वाढेल अशी मी समजूत करून घेतलेली आहे.
त्याच बरोबर यातूनच मी काश्मिर व हरियाना निवडणूकांकडे पाहातो आहे. मला असे वाटते आहे की,
१. हिंदूं हितैषी मतदान वाढण्याचा गेल्या ४० वर्षांचा कल चालूच राहीलेला असून, प्रथमच हिंदूबहुल जम्मूमधून कॉंग्रेस संपूर्णपणे उखडली गेली आहे. पंडितांच्या पलायनाच्यावेळी व त्यानंतरही कॉंग्रेस १०-११ आमदार निवडून आणू शकत असे.
२. हुरियत कॉन्फरन्स किंवा तत्सम उमेदवार खूप मोठ्या प्रमाणावर उभे राहूनही त्यांना काश्मिर खोऱ्याने नाकारलेले आहे. यांच्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच राष्ट्रीय आहे असे माझे मत आहे. त्यांनी नक्कीच काश्मिरसाठी जास्त तुरूंगवास भोगला आहे. हाल सहन केले आहेत. स्वतंत्र उमेदवार जेवढे पाकिस्तान धार्जिणे असतील त्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच कमी पाकिस्तान धार्जिणी असेल. ही गोष्टही भाजपाच्या धोरणाला अनुकूल आहे असे मला वाटते. कारण मुल्ला मौलवी धार्जिण्या मुस्लिमांकडून राष्ट्रीय मुसलमांनाकडे मतदान जाणे ही भारताच्या दृष्टीने खूपच भाग्याची गोष्ट मी समजतो.
३. हरियानामधे कॉंग्रेसची मते २७% वरून ३९% पर्यंत गेली तर भाजपाची ३६% वरून ३९% पर्यंत गेली. धृविकरण झाले लोकसभेचे तंतोतंत प्रतिबिंब विधानसभेत पडले यात वादच नाही. पण वाढलेले मतदान हे सर्वस्वी भाजपाकडेच गेले हे त्यातूनच लक्षात आले. त्यामुळेही माझ्या पहिल्या भागाला पुष्टी मिळाली असेच वाटले.
४. झारखंडातही पहिल्या फेरीचा तोच मतदान वाढीचा कल दिसून येतो आहे.
मोदींच्या बाबतीत काहीही लिहीले की, काही जणांकडून विरोध होतो. त्यामुळे वाचकवर्गातील मोदीविरोधकांना यांत काहीच तथ्य नाही असे वाटते. त्यातून काहीही ते शिकणे शक्यच नसते. त्यामुळे ते आहेत तिथेच राहतात. बऱ्याच जणांची वागणूक शेखर गुप्तांसारखी असते. त्यांना दिसत असूनही पहावयाचे नसते. ते तर मी मांडलेले मुद्दे फारच हिरीरीने खोडून काढतात. माझ्या पोस्टमुळे मोदी विरोधकांचा यत्किंचीतही फायदा होऊ नये याची अत्युच्च दर्जाची काळजी त्यांच्यामुळे घेतली जाते.
याउलट मोदी आवडणारे सगळं वाचतात. त्यांचे मोदीप्रेम वाढते. कुंपणावर बसलेला मोदींकडे सरकायची शक्यता वाढीस लागते. मुख्य म्हणजे ही लोकं माझ्या पोस्टला अनुमोदन देत नाहीत. यामुळे होत काय की, माझ्या पोस्टचा फायदा युतीला किती झाला हे कधीच कळत नाही. त्यामुळे मोदी विरोधक कायमच निकाल येईपर्यंत जिंकलेल्या अवस्थेत राहतात.
मोदी विरोधक गटाचा कानोसा घेतल्यावर असे लक्षात आले की,
वाढते मतदान नेहमीच प्रस्थापितांच्या विरोधात जाते. त्यामुळे मतदान वाढले तर ते प्रस्थापितांच्या म्हणजेच महायुतीच्या विरोधात जाईल.
तर आता आपण वाढलेले मतदानाचे आकडे जिल्ह्याप्रमाणे पाहू. (प्रतिसादामधे वाढलेल्या मतदानाच्या प्रमाणे यादी दिलेली आहे.)
जिल्हा - केंद्राचे नाव : वाढ अथवा घट
Ahmednagar-Shrigonda : 6.12
Ahmednagar-Shrirampur : 6.07
Ahmednagar-Rahuri : 5.8
Ahmednagar-Ahmednagar City : 5.1
Ahmednagar-Shirdi : 4.83
Ahmednagar-Akole : 3.57
Ahmednagar-Sangamner : 3.2
Ahmednagar-Shevgaon : 3.18
Ahmednagar-Karjat jamkhed : 0.68
Ahmednagar-Parner : -0.25
Ahmednagar-Nevasa : -0.56
Ahmednagar-Kopargaon : -5.07
Akola-Murtizapur : 12.07
Akola-Akola West : 6.96
Akola-Akola East : 5.53
Akola-Balapur : 4.55
Akola-Akot : 4.2
Amravati-Teosa : 9.25
Amravati-Melghat : 7.58
Amravati-Amravati : 6.55
Amravati-Morshi : 5.38
Amravati-Badnera : 5.22
Amravati-Achalpur : 4.8
Amravati-Dhamamgaon railway : 3.08
Amravati-Daryapur : 2.89
Aurangabad-Vaijapur : 12.76
Aurangabad-Gangapur : 8.87
Aurangabad-Paithan : 5
Aurangabad-Sillod : 4.85
Aurangabad-Phulambri : 2.34
Aurangabad-Aurangabad West : 1.2
Aurangabad-Kannad : 0.75
Aurangabad-Aurangabad central : -0.35
Aurangabad-Aurangabad East : -0.57
Beed-Ashti : 8.36
Beed-Parli : 2.15
Beed-Kaij : 0.11
Beed-Georai : -1.51
Beed-Majalgaon : -1.62
Beed-Beed : -3.69
Bhandara -Bhandara : 5.11
Bhandara -Tumsar : 3.35
Bhandara -Sakoli : -0.92
Buldhana-Mehkar : 9.42
Buldhana-Chikhli : 6.25
Buldhana-Sindkhed Raja : 5.81
Buldhana-Khamgaon : 5.39
Buldhana-Buldhana : 3.88
Buldhana-Jalgaon (Jamod) : 3.22
Buldhana-Malkapur : 1.86
Chandrapur -Brahmapuri : 9.04
Chandrapur -Ballarpur : 7.36
Chandrapur -Chimur : 7.11
Chandrapur -Warora : 7.04
Chandrapur -Chandrapur : 6.74
Chandrapur -Rajura : 1.56
Dhule-Dhule City : 9.6
Dhule-Sakri : 4.95
Dhule-Shindkheda : 4.49
Dhule-Dhule Rural : 4.18
Dhule-Shirpur : -0.36
Gadchiroli -Gadchiroli : 6.3
Gadchiroli -Armori : 5.42
Gadchiroli -Aheri : 3.54
Gondiya-Gondiya : 6.09
Gondiya-Amgaon : 3.78
Gondiya-Arjuni-morgaon : 0.3
Gondiya-Tirora : -0.44
Hingoli-Kalamnuri : 4.45
Hingoli-Hingoli : 4.04
Hingoli-Basmath : 0.56
Jalgaon-Jalgaon City : 9.57
Jalgaon-Bhusawal : 8.8
Jalgaon-Jalgaon Rural : 6.49
Jalgaon-Erandol : 5.15
Jalgaon-Pachora : 4.85
Jalgaon-Raver : 4.51
Jalgaon-Muktainagar : 3.09
"Jalgaon-Jamner : 2.98"
Jalgaon-Amalner : 2.64
Jalgaon-Chopda : 1.93
Jalgaon-Chalisgaon : -1.38
Jalna-Jalna : 8.51
Jalna-Bhokardan : 6.63
Jalna-Badnapur : 6.02
Jalna-Ghansawangi : 3.95
Jalna-Partur : 1.39
Kolhapur-Chandgad : 6.34
Kolhapur-Kolhapur North : 4.31
Kolhapur-Shirol : 3.37
Kolhapur-Hatkanangle : 3.07
Kolhapur-Radhanagari : 2.7
Kolhapur-Kagal : 1.3
Kolhapur-Ichalkaranji : 1.09
Kolhapur-Kolhapur South : 0.63
Kolhapur-Karvir : 0.63
Kolhapur-Shahuwadi : -1.12
Latur-Latur Rural : 8
Latur-Udgir : 7.05
Latur-Latur City : 5.88
Latur-Nilanga : 3.44
Latur-Ausa : 2.91
Latur-Ahmadpur : 1.81
Mumbai City-Mahim : 6.34
Mumbai City-Shivadi : 6.19
Mumbai City-Worli : 5.55
Mumbai City-Malabar hill : 5.54
Mumbai City-Mumbadevi : 4.75
Mumbai City-Colaba : 4.44
Mumbai City-Wadala : 4.38
Mumbai City-Sion koliwada : 3.09
Mumbai City-Dharavi : 2.45
Mumbai City-Byculla : 2.3
Mumbai Suburb-Andheri West : 10.15
Mumbai Suburb-Goregaon : 9.17
Mumbai Suburb-Versova : 9.06
Mumbai Suburb-Kurla(SC) : 8.23
Mumbai Suburb-Mulund : 7.61
Mumbai Suburb-Vandre West : 7.36
Mumbai Suburb-Borivali : 7.26
Mumbai Suburb-Bhandup West : 6.65
Mumbai Suburb-Jogeshwari East : 6.33
Mumbai Suburb-Ghatkopar East : 5.62
Mumbai Suburb-Dahisar : 5.43
Mumbai Suburb-Mankhurd shivaji Nagar : 5.05
Mumbai Suburb-Charkop : 5.03
Mumbai Suburb-Ghatkopar West : 4.91
Mumbai Suburb-Kandivali East : 4.8
Mumbai Suburb-Andheri East : 4.73
Mumbai Suburb-Vandre East : 4.29
Mumbai Suburb-Magathane : 4.13
Mumbai Suburb-Vile parle : 3.88
Mumbai Suburb-Kalina : 2.78
Mumbai Suburb-Chembur : 2.72
Mumbai Suburb-Dindoshi : 2.29
Mumbai Suburb-Vikhroli : 2.24
Mumbai Suburb-Malad West : 2.17
Mumbai Suburb-Chandivali : 1.16
Mumbai Suburb-Anushakti Nagar : -1.23
Nagpur-Nagpur North : 7.17
Nagpur-Nagpur central : 6.82
Nagpur-Nagpur West : 6.55
Nagpur-Nagpur South : 6.44
Nagpur-Nagpur East : 6.02
Nagpur-Ramtek : 5.58
Nagpur-Kamthi : 5.15
Nagpur-Nagpur South West : 4.61
Nagpur-Umred : 1.71
Nagpur-Savner : 0.77
Nagpur-Katol : 0.15
Nagpur-Hingna : -0.3
Nanded-Loha : 4.96
Nanded-Mukhed : 4.45
Nanded-Deglur : 2.19
Nanded-Bhokar : 2
Nanded-Hadgaon : 1.69
Nanded-Kinwat : 0.85
Nanded-Nanded North : 0.16
Nanded-Naigaon : -0.07
Nanded-Nanded South : -0.13
Nandurbar -Nandurbar : 11.61
Nandurbar -Nawapur : 5.57
Nandurbar -Shahada : 3.38
Nandurbar -Akkalkuwa : -0.29
Nashik-Igatpuri : 11.94
Nashik-Nandgaon : 10.85
Nashik-Nashik central : 9.08
Nashik-Sinnar : 8.98
Nashik-Yevla : 8.61
Nashik-Devlali : 8.58
Nashik-Dindori : 8.39
Nashik-Malegaon outer : 8.19
Nashik-Baglan : 8.1
Nashik-Chandvad : 7.9
Nashik-Nashik East : 7.71
Nashik-Kalwan : 5.88
Nashik-Malegaon central : 2.37
Nashik-Nashik West : 2.22
Nashik-Niphad : -1.03
Osmanabad-Umarga : 4.96
Osmanabad-Osmanabad : 2.53
Osmanabad-Tuljapur : 2.11
Osmanabad-Paranda : 1.52
Palghar -Palghar : 24.36
Palghar -Dahanu : 12.34
Palghar -Vikramgad : 9.36
Palghar -Nalasopara : 5.54
Palghar -Boisar : 0.02
Palghar -Vasai : -0.87
Parbhani -Pathri : 4.19
Parbhani -Gangakhed : 3.73
Parbhani -Parbhani : 2.99
Parbhani -Jintur : 2.08
Pune-Pune cantonment : 9.5
Pune-VADGAON SHERI : 9.24
Pune-Shivajinagar : 7.88
Pune-Kasbapeth : 7.64
Pune-Parvati : 7.11
Pune-Khadakwasala : 5.12
Pune-Chinchwad : 4.73
Pune-Bhor : 4.69
Pune-Daund : 4.51
Pune-Kothrud : 4.48
Pune-Ambegaon : 3.62
Pune-Hadapsar : 3.38
Pune-Baramati : 2.9
Pune-Bhosari : 1.83
Pune-Shirur : 1.61
Pune-Pimpri : 1.57
Pune-Junnar : 1.42
Pune-Maval : 1.38
Pune-Khed alandi : 1.18
Pune-Indapur : 0.57
Pune-Purandar : -4.72
Raigad-Mahad : 4.51
Raigad-Panvel : 4.37
Raigad-Karjat : 4.37
Raigad-Alibag : 4.27
Raigad-Uran : 2.38
Raigad-Pen : 1.53
Raigad-Shrivardhan : 0.33
Ratnagiri -Rajapur : 8.52
Ratnagiri -Ratnagiri : 5.9
Ratnagiri -Chiplun : 3.23
Ratnagiri -Guhagar : 2.42
Ratnagiri -Dapoli : 0.65
Sangli-Miraj : 10.97
Sangli-Tasgaon-Kavathe Mahankal : 6.78
Sangli-Palus-Kadegaon : 4.9
Sangli-Sangli : 4.58
Sangli-Khanapur : 4.16
Sangli-Islampur : 0.98
Sangli-Shirala : 0.31
Satara-Koregaon : 9.93
Satara-Karad North : 7
Satara-Phaltan : 6.25
Satara-Patan : 6.09
Satara-Man : 5.37
Satara-Karad South : 4.45
Satara-Satara : 4.37
Satara-Wai : -0.97
Sindudurg-Kudal : 9.53
Sindudurg-Sawantwadi : 7.72
Sindudurg-Kankavli : 4.13
Solapur-Madha : 6.35
Solapur-Solapur South : 6.07
Solapur-Solapur City North : 5.67
Solapur-Sangola : 5.2
Solapur-Akkalkot : 4.89
Solapur-Mohol : 3.68
Solapur-Solapur City central : 2.1
Solapur-Malshiras : 1.78
Solapur-Barshi : -0.08
Solapur-Karmala : -1.3
Solapur-Pandharpur : -2.19
Thane-Dombivali : 15.38
Thane-Kalyan East : 14.88
Thane-Kalyan West : 13.25
Thane-Bhiwandi Rural (S.T.) : 11.49
Thane-Airoli : 11.45
Thane-Kalyan Rural : 11.22
Thane-Kopri-Pachpakhadi : 10.65
Thane-Belapur : 10.03
Thane-Ovala - Majiwada : 9.37
Thane-Murbad : 8.87
Thane-Thane : 8.25
Thane-Ulhasnagar : 7.55
Thane-Ambernath : 6.55
Thane-shahapur : 5.61
Thane-Bhiwandi West : 4.05
Thane-Mira Bhayandar : 3.34
Thane-Bhiwandi East : 3.25
Thane-Mumbra-Kalwa : 2.08
Wardha-Wardha : 12.19
Wardha-Hinganghat : 5.89
Wardha-Deoli : 5.42
Wardha-Arvi : 4.48
Washim -Washim : 6.44
Washim -Risod : 3.86
Washim -Karanja : 3.66
Yavatmal-Yavatmal : 7.56
Yavatmal-Digras : 5.81
Yavatmal-Arni : 5.01
Yavatmal-Ralegaon : 4.34
Yavatmal-Wani : 3.47
Yavatmal-Umarkhed : 1.92
Yavatmal-Pusad : 1.34
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
माझे मत...
लोकसभेत यश मिळाले म्हणून महाविकास आघाडी हवेत होते. महायुतीने सगळं प्लॅन करून उमेदवार जाहीर करण्यापासून ते प्रचारात सगळीकडे एकसंध कम्युनिकेशन ठेवले जनतेसमोर. एक विचार करा
गेल्या पंधरा वर्षांत कॉंग्रेसच्या मतांमध्ये वाढच झाली नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये महाराष्ट्रात जनतेने कॉंग्रेसला नाकारले आहे. म्हणजे महाराष्ट्रात कॉंग्रेस चुकीच्या लोकांच्या हातात आहे. कारण लोकांमध्ये जनजागृती करून मतदान वाढावं असं काय केले कॉंग्रेसने? कॉंग्रेस लोकसभेत जशी एग्रेसिव्ह होती महाराष्ट्रात तशी विधानसभेत का नव्हती?
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सज्जद नोमानीने घोळ केला नंतर जरांगे ने माती केली. सज्जद नोमानीने उघड उघड महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि सगळं फिरलं. कोण उत्तरेकडील मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा कोणीतरी महाराष्ट्रात काय करावं हे सांगतो आणि इकडं मुस्लिम समाजातील लोकांनी त्यांचं ऐकून मतदान करावं! हे महाराष्ट्रातील लोकांना आवडेल का? जसं मोदी लोकसभेत भटकंती आत्मा, नकली संतान वगैरे बोलून गेले आणि भाजपाला फटका बसला. त्यातून महाविकास आघाडीला सरळसोट विजय आपलाच.. मुख्यमंत्री आपलाच अशीच दिवास्वप्नं पडू लागली. मतदानाचे टक्के वाढले की भाजपाला फायदा होतो म्हणजे वाढीव मतदान विरोधकांना जात नाही ह्याची कारणमीमांसा काय? एक कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त लोकांनी भाजपाला निवडून दिले म्हणजे सगळ्यांना पैसे वाटले का? २६% पेक्षा जास्त मतदान भाजपाला होतंय यावर विरोधकांनी विचार केला पाहिजे. फक्त शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करायचा आणि सरंजामी जहागिरदार कारखानादार वगैरे निवडून आणायचे हे कुठपर्यंत चालणार? भाजपा इज न्यू एज कॉंग्रेस हे लोकांनी स्विकारलेलं आहे.
बाकी धर्माच्या आधारावर मतदान झाले म्हणून महायुतीचा विजय झाला असं म्हणायचं असेल तर महाविकास आघाडीला बहुमत मिळाले असते तर जातीपातीच्या आधारावर मतदान झाले हे मान्य झाले असते का?
एकविसाव्या शतकातील दोन दशके उलटली तरी पुरोगामी, ब्राह्मणेतर, पेशवाई, मनुवादी, वैदिक, सनातनी वगैरे वगैरे गोष्टीत अडकत असाल विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे. आकस्मिक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या आहेत मुस्लिम द्वेष करा हिंदुत्ववादी व्हा! जसं सो कॉल्ड पुरोगाम्यांनी कधीकाळी स्तोम माजवले होते की ब्राम्हणांना शिव्या द्या पुरोगामी बाप्तिस्मा घ्या!
भविष्यात मतदान वाढत जाईल नवीन पिढीला लोकशाही मार्गाने गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न सगळ्या पक्षाकडून होतच राहणार निरंतरपणे. अशावेळी वाढीव मतदान जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कन्व्हर्ट होत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी स्ट्रॉंग कन्व्हिक्शन तयार केले आहे समजायचं का?
भाजपाचा परंपरागत मतदार पण दुखावला होता महायुतीत अजित पवारांना घेतल्यामुळे. पण कमी कालावधीत भाजपाने त्यांना कन्व्हीन्स केले ना?
सभोवताली बदल घडवायचे असतील तर घरापासून बदलण्याची तयारी सुरू केली पाहिजे. तीच घराणी, त्याच कुटुंबातील नवीन पिढी सत्तेवर राहणार तालुका पातळीवर आणि राज्यात बदल घडवून आणू म्हणून फुशारक्या मारणार! हे कसं जनतेच्या गळी उतरेल?
जो समाज जातपात धर्म बघू एकाच राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या असतो त्याचा सामाजिकदृष्ट्या विकास खुंटला जातो. कारण तीच राजकारणाची गुंतवणूक असते.
उदाहरणार्थ महाराष्ट्रात जेव्हा बहुसंख्य असलेला मराठा समाज रस्त्यावर उतरला आरक्षणासाठी तेव्हाच प्रस्थापित मराठा नेत्यांची सर्वात मोठी हार होती.
गावागावांत एकेकाळी प्रबळ असलेला मराठा देशोधडीला लागला तो एकाच जातीच्या नेतृत्वाखाली दिर्घकाळ सत्ता उडवली म्हणून.
मुस्लिम समाजातील कितीतरी समस्या प्रश्न कॉंग्रेस चुटकीसरशी सोडवू शकत होता. पण फक्त आणि फक्त व्होट बँक जपण्यासाठी वापर झाला.
त्यामुळे या विषयावर कितीतरी लिहिले वाद घातला किंवा चर्चा झाली तरी प्रत्यक्षात मात्र ग्राऊंडवर ध्रुवीकरण होणारच आहे. ते व्हावे हीची व्यवस्था मजबूत केली आहे.
जर भविष्यात फक्त आणि फक्त हिंदुत्ववादी अजेंड्यावर मतदान होत राहिले तर हिंदू समाजातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय हा गोत्यात येणार.
कारण तोच सध्याचा भाजपाचा हक्काचा मतदार आहे.
असो. यावर खूप लिहिले जाईल. लेखन विश्रांती!
चुकीच्या लोकांच्या हातात म्हणजे...
संस्थानिकांच्या हातात.
महाराष्ट्रात कॉंग्रेस ही तळागाळापर्यंत पोहोचली आहे. मात्र नेतृत्व पिढ्यानपिढ्या सरंजामी जहागिरदार कारखानादार कुटुंबातील सदस्यांकडेच राहिले आहे.
महाराष्ट्रात अस्सल गांधीवादी सरळ सरळ बाहेर फेकले गेले. राजकीयदृष्ट्या फायद्याच्या दृष्टीने ठराविक गांधीवादी लोकांना जवळ करायचं नंतर सत्तेवर आले की आपापली दुकानदारी जोमाने वाढवायची. हीच कामं कॉंग्रेसच्या काळात झाली. त्यामुळे महाराष्ट्र कॉंग्रेस ही कार्यकर्ते लोकांची राहिली नसून ठराविक कुटुंबातील सदस्यांची मक्तेदारी राहिलेली आहे.
तालुका पातळीवर जे वजनदार संस्थानिक कुटुंब ते एकतर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कॉंग्रेस यांच्याकडून निवडणुकीत उमेदवारी मिळवतात.
असो यावर कितीही लिहा काही फरक पडणार नाही.
२०२४ मध्ये नव्हे
महाराष्ट्रात अस्सल गांधीवादी सरळ सरळ बाहेर फेकले गेले.
हे २०२४ मध्ये घडलेले नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात काँग्रेसमधून अस्सल गांधीवादी बाहेर फेकले जायची प्रक्रीया स्वातंत्र्यानंतर काही वर्षातच सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर सत्तेचे लोणी मिळायला लागल्यावर गांधीवादी आदर्शे आणि तत्वे बासनात गुंडाळली जायला सुरवात झाली. त्याचे परिणाम आज २०२४ मध्ये नव्हे तर पूर्वीपासूनच दिसायला लागले होते.
माझं वाचन तुमच्या इतकं नाही
भारतीय इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र हे विषय शालेय जीवनात जे वाचले ते. त्यानंतर जसं जमेल तसं वाचन करतोय.
मी नुकतंच वाचलेलं ओले बिर्क लॉर्सेन यांचं पुस्तक अनार्की ऑर केऑस पुस्तक वाचलं. त्यातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा वेगळ्या दृष्टिकोनातून धांडोळा घेता आला.
मी भारतीय इतिहास कॉंग्रेसच्या चष्म्यातून पाहत नाही. ना हिंदुत्ववादी लोकांच्या चष्म्यातून पाहतो. सध्या तरी महाराष्ट्रात जे घडलं आहे त्यानुसार माझी मतं मांडली आहेत. दावे केलेले नाहीत. किंबहुना दावे करण्याइतपत माझे बौद्धिक सौष्ठव परिपक्व नाही.
गेल्या दोन तीन दशकांपासून जे जे महाराष्ट्रात घडलं आहे त्या अनुषंगाने माझी निरिक्षणे नोंदवली आहेत.
तुम्हाला जर माझी मतं व्हॉट्सॲप धार्जिणी वाटत असतील तर माझी काहीही हरकत नाही.
कोणाला माझ्या बद्दल काय वाटतं हे मी ठरवू शकत नाही. लोकशाही आहे.
गेल्या पंधरा वर्षांत
गेल्या पंधरा वर्षांत कॉंग्रेसच्या मतांमध्ये वाढच झाली नाही.
गेल्या 40 वर्षांचा कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील मतदानाचा लेखाजोगा घेतल्यास कॉंग्रेसच्या मतांमधे सतत घटच झालेली दिसून येते. अपवाद फक्त 1999 चा आहे.
ती आकडेवारी इथे पाहता येईल.
याचे उलट हिंदूहितैषी पक्षांची मतदान टक्केवारी वाढत जाताना दिसेल.
Hindu हितवदी पक्षांच्या कार्यकाळात
Bjp आणि बाकी कथित हिंदू वदी पक्षांच्या कार्यकाळात किती हिंदू आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आणि हिंदू द्वेष करणारी काँग्रेस च्या काळात किती हिंदू आर्थिक दृष्ट्या वरच्या स्तरावर गेले हे बघा.
हे अल्प ज्ञानी bjp समर्थक तोंडावर पडतील.
एक तर हे अल्प बुद्धी आहेत त्यांच्या शी चर्चा करणेच चूक आहे
मी काय बरोबर व काय चूक किंवा
मी काय बरोबर व काय चूक किंवा काय परिणाम झाले ह्या बाबत बोलत नाहीये. मी फक्त वस्तूस्थिती मांडतोय. त्यामुळे तो अभ्यास तुम्ही करा. आम्ही वाचू. जरा जोडील अधिकृत आकडेवारी द्या म्हणजे आम्हां सर्वांना अभ्यास करायला सोपे जाईल.
मी फक्त 40 वर्षांच्या कालखंडातील माहिती संकलीत करून नियतीने आखलेला कल शोधायचा प्रयत्न करतोय.
, मतदान वाढणे म्हणजे सत्ता धारी निवडून येतात हा दावा म्हणजे लबाड
जास्त लोकांनी मतदान केले की सत्ताधारी निवडून येतात ह्याचे पुरावे देण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे
मतदानाची टक्केवारी ही केवळ एक घटक आहे. निवडणुकीतील यशासाठी अनेक इतर घटकांचा देखील विचार करावा लागतो, जसे की पक्षाची लोकप्रियता, विरोधी पक्षांची कमजोरी, राजकीय धोरणे आणि मतदारांची प्राधान्ये.
तिसरी गोष्ट म्हणजे, निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी ही केवळ एक संख्या नाही. त्यामागे अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटकांचा समावेश होतो.
अंतिमतः, जास्त लोकांनी मतदान केले की सत्ताधारी निवडून येतात ह्याचे पुरावे देताना, या सर्व घटकांचा विचार करावा लागतो.
Bjp ला लोकांनी का मत दिली असतील ह्याचे एक पण योग्य कारण सापडत नाही.
खूप मोठा घोटाळा इथे झालेला आहे.सरकारी यंत्रणानी बेईमानी केलेली आहे
लोकशाही म्हणजे काय काय? हाच
लोकशाही म्हणजे काय काय? हाच प्रश्न सारख पडेल अशी व्यवस्था निर्माण होऊ नये बस इतकीच चिंता आहे. बाकी युती आली कि आघाडी आली हा प्रश्न दुय्यम आहे.
शेवटी सर्व च देशाचे नागरिक आहेत शत्रू देशाचे नागरीक नाहीत.
1) कोणत्याही प्रभावाखाली न येता लोकांना लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे.
2) पण असे दिसत नाही जात, धर्म, प्रांत, आर्थिक स्तर,, vaiyaytik फायदा डोळ्या समोर ठेवून लोक मत देतात.
अशा स्थिती ला लोकशाही ची सर्वोच्च स्थिती म्हणता येणार नाही ही तर लोकशाही ची प्राथमिक अस्वस्था आहे.
म्हणजे 75 वर्ष होऊन गेली तरी आपण लोकशाही व्यवस्थेत kg मध्ये च आहोत.
2) निवडणूक योग्य पद्धतीनी घेतली जाईल अशी व्यवस्था असावी, निवडणूक आयोग निपक्ष असावं. सरकार च बिलकुल प्रभाव निवडणूक आयोगा वर असू नये.
हे लोकशाही ला अपेक्षित आहे.( t. N शेषण ह्यांचा कार्यकाळ आदर्श कार्यकाळ होता )
पण evm वर लोकांना शंका वाटते म्हणजे काही तरी गडबड नक्कीच असणार.
मग लोकशाही मार्गाने सरकार सत्तेत आले असे कसे म्हणता येईल.
मतदान तब्बल साडे चार टक्के
मतदान तब्बल साडे चार टक्के वाढले. याचा अर्थ भाजपची त्सुनामी येणार हे स्पष्ट दिसत होते. बाकी लोकांनी मतदान विकासासाठी दिले. कारण आघाडी काळात अनेक प्रोजेक्टस बंद पडले होते. युती सरकारने ते सर्व पुन्हा सुरू केले. या शिवाय आघाडी सरकार व्होट बँक साधण्यासाठी प्रजातंत्र आणि धर्मनिरपेक्षतेला कचरा पेटी दाखविण्यास तैयार होती. त्याचा परिणाम भोगावा लागला. बाकी हे खरे असेल तर फारच भयंकर आहे. विदेशी मदत
पटाईल विकास म्हणजे काय हे कळत का tumhala
Mumbai पुणे पासून महाराष्ट्र मधील तमाम शहरे गाय patyatil bjp, हिंदू वदी राज्यातील लोकामी ओसंडून वाहत आहेत.
गटार, फूटपाथ, khadya अशा ठिकाणी राहून ही लोक उपजीविका करत आहेत.
बंगाल सोडला तर सर्व च्या सर्व ज्या ज्या राज्यात हिंदू vadi सरकार आहेत त्या राज्यातील आहेत ती लोक नोकरीं साठी ज्या राज्यात bjp ला kadi ची किंमत नाहो त्या राज्यात स्वाभिमान बाजूला ठेवून जात आहेत.
हिंदू द्वेष करणारे पक्ष ज्या राज्यात आहेत.
पूर्ण दक्षिण भारत, पंजाब, महाराष्ट (इथे हिंदू vadi लोकांना स्थान मिळत नाही म्हणून सर्व सरकारी खाती, अफाट पैसा मोदी मीडिया ह्यांचा आधार घेऊन सत्ता मिळवली जाते )
अशा राज्यात पोट भरण्यासाठी येतात.
तरी लाज न वाटतं बिन्दास्त खोटे दावे तुम्ही करत असता.
मतदान तब्बल साडे चार टक्के
मतदान तब्बल साडे चार टक्के वाढले.
इतक्या सहजपणे याकडे पाहता येईल असे वाटत नाही.
जेंव्हा टक्केवारीच्या सहाय्याने निवडणुकांचा विचार केला जातो तेंव्हां असे समजले जाते की, प्रत्येक निवडणुकीत काही तरता मतदार असतो व तो दर निवडणुकीत आपली मते बदलत असतो. तसेच निवडणुकीतील हारजीत ठरवात असतो. असा मतदार हा 3 टक्के असतो असे समजले जाते.
मात्र जर मतदान 3 टक्के पेक्षा जास्त असेल तर मात्र त्याला लाट आली असे समजले जाते. यामधे मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याची शक्यता असते. तरत्या मतदाराला काय वाटते याला महत्व राहात नाही. त्याच्या मताच्या विरोधात जाऊन निकाल लागू शकतात.
मात्र मतदानातील हा फरक 6 टक्के पेक्षा जास्त असेल तर मात्र त्याला त्सुनामी आली असे समजले जाते. अत्यंत अनाकलनीय असे निकाल लावायची क्षमता त्सुनामीमधे असते. त्यामुळे 4.5 टक्केला त्सुनामी म्हणता येणार नाही.
पण लोकांना निकाल अविश्वसनीय वाटत असतील किंवा त्सुनामी आल्यासारखे वाटत असेल तर कारणे शोधणे आवश्यक ठरते.
या अभ्यासासाठीच अनेक तास खपून मतदान टक्केवारीतील वाढ/घट याचा तक्ता मी बनवून लेखात वरती टाकला आहेत. तसेच तो जिल्ह्याप्रमाणे वेगवेगळा करून त्यात परत मतदान टक्केवारीनुसार लावला आहे. CTRL + F चा वापर करून आपण त्यातून हवा तो मतदार संघ शोधू शकता.
तसेच पहिल्या प्रतिक्रियेत उतरत्या मतदान टक्केवारीनुसार तक्ता बनवून दिला आहे. मी जे मुद्दे मांडतो आहे ते तपासून पहायला त्यामुळे मदत होईल. कोणाला नवीन मुद्दे मांडायलाही मदत होऊ शकेल. हे सर्व मी नेहमी करत असलो तरी यावेळेस मी ते सोमीवर टाकत आहे कारण मला असे वाटायला लागले आहे की आहेरे वर्ग किंवा समाजात ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते असे लोक या निवडणुकीकडे गांभिर्याने बघत होते. मतदान प्रक्रियेत भाग घेत होते.
तर वरील तक्त्यावरून असे दिसतंय की,
१) 20 जागांवर मागीलपेक्षा कमी मतदान झालं आहे.
२) 66 जागांवर 0 ते 3 टक्के जास्त मतदान झाले आहे. हा असतो तरता मतदार. एखादा असा निर्णय की त्यामधे काही लाभार्थी असतात.
3) 104 जागांवर 3 ते 6 टक्के जास्त मतदान झाले आहे. याला आपण लाट म्हणू शकतो. असा एखादा सर्वसामान्य घटक असतो की जो अनेक पदरी मतदारांवर प्रभाव पाडतो.
4) 92 जागांवर 6 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले आहे. याला त्सुनामी म्हणतात. दिग्गज लोकांना पराभूत करण्याची ताकद यात असते. प्रस्थापितांना उन्मळून पाडण्याची क्षमता त्सुनामीमधे असते. लोकांची मानसिकता मोठ्या प्रमाणावर बदलली असल्याचे हे द्योतक असते. हा एक टर्निंग पॉइंट म्हणून अभ्यासावा लागतो.
तुमचे साधार मत सविस्तर वाचायला आवडेल
मतदान टक्केवारो वाढली म्हणजे सत्ता धारी लोक च निवडून येतात
असं मी लिहिलंय होय. मलाच हे माहीत नव्हतं.😀
धन्यवाद.
तरीपण सत्ताधारी पक्ष का जिंकला हा मुद्दा मी अजून समर्थपणे मांडलेलाच नाही हे तुमच्यामुळे लक्षात आले. वेळ मिळाला की मांडतो
तोपर्यंत तुमचे खरे व साधार मत सविस्तर वाचायला आवडेल. जोडीला आकडेवारी दिली तर मला अभ्यासाला बरं होईल.
ज्याला डोळे आहेत त्याला विकास
ज्याला डोळे आहेत त्याला विकास दिसेल. काही उदाहरण , भारताचा निर्यात 28 लाख कोटी 2014 ते 2023 62 लाख कोटी झाला. रेल्वे कोच ने कोच विकत घेतले. 2004 ते 14 7000 कोचेस. 14 त 23, 40000 कोचेस. मोबाइल उत्पादन 18000 कोटीहून तब्बल 4 लाख कोटीहून जास्त. मेडिकल जागा 50000 हून 1,15000 हून जास्त झाल्या. 2013 मध्ये 387 जागी आज 776 मेडिकल कॉलेज झाले. इत्यादि इत्यादि. बाकी तुम्ही गूगल करून आंकडे तपासून बघा. प्रत्येक क्षेत्रात मग वीज, रस्ते, रेल्वे, हवाई असो को कृषि सर्व क्षेत्रांत प्रगति अनेक पट झाली आहे.
साधारणत: पैशाच्या आधारे किंवा
साधारणत: पैशाच्या आधारे किंवा लाडकी बहिण वगैरेंच्या सहाय्याने एकूण मतदारांपैकी काहीवर प्रभाव टाकता येतो. हे सगळे घटक 3 टक्के पर्यंत मतदानावर प्रभाव टाकतात असे समजले जाते. तर लाट अथवा त्सुनामीमधे खूपच मोठ्या लोकसंख्येवर प्रभाव टाकत असते व ती सार्वत्रीक असते. त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेमुळे त्सुनामी आली असे वाटत नाही.
जरांगे फॅक्टरचा जो काही प्रभाव पडायचा तो लोकसभेत पडून झाला आहे असे वाटते. त्यामुळे तो प्रभाव विधानसभेत टिकून राहील असे फार तर म्हणता येईल. त्यामुळे तो वाढला हे कारण होऊ शकत नाही. कारण कितीही झाले तरी 21 टक्के मराठा समाज हा 25 ,35 टक्के झाला किंवा एकदम दुप्पट म्हणजे 42 टक्के झाला असे होऊ शकत नाही.
Bjp shasit
ज्या ज्या राज्यात bjp ची सत्ता आहे सर्व मागास राज्य आहेत.
सर्वात जास्त लोक राज्य सोडून ह्याच राज्यातून जातात.
महाराष्ट्र कधीच bjp प्रेमी नव्हते म्हणीन भारत सरकार च्या सर्व सरकारी यंत्रणा इथे bjp ला suport करत होत्या.
गुजरात कोरियन, चीन देशा सारखे राज्य आहे खरी स्थिती bjp काळात कधीच बाहेर येत नाही. पण गुजराती गैर bjp सरकार असलेली जी राज्य आहेत तिथे जास्त विस्थापित होत आहेत.
अमेरिका सारख्यादेशात पण गैर कायदेशीर मार्गाने जात आहेत.
ह्याचा अर्थ सरळ आहे गुजरात पण लोकांचे पोट भरण्यास सक्षम नाही.
Bjp शासित राज्यांची ही अवस्था आहे
कोणता झेंडा घेऊ हाती?
२३ तारखेपासनं महाराष्ट्रातील मोदीभक्त भलतेच जोमात आले होते पण नंतर गोंधळलेले दिसताहेत. म्हणजे सध्याचेच मुम पुढे continue करतील असाच सर्वांचा होरा होता; पण अनपेक्षित वाढीने जागा आल्यामुळे पुढचे मुम कोण होणार हे ठरत नाहीये.
"कोणता झेंडा घेऊ हाती?" असं मोदीभक्तांना वाटतंय की काय?
वाढलेल्या मतदानाच्या प्रमाणे
वाढलेल्या मतदानाच्या प्रमाणे यादी दिलेली आहे.
जिल्हा - केंद्राचे नाव : वाढ अथवा घट
Palghar -Palghar : 24.36
Thane-Dombivali : 15.38
Thane-Kalyan East : 14.88
Thane-Kalyan West : 13.25
Aurangabad-Vaijapur : 12.76
Palghar -Dahanu : 12.34
Wardha-Wardha : 12.19
Akola-Murtizapur : 12.07
Nashik-Igatpuri : 11.94
Nandurbar -Nandurbar : 11.61
Thane-Bhiwandi Rural (S.T.) : 11.49
Thane-Airoli : 11.45
Thane-Kalyan Rural : 11.22
Sangli-Miraj : 10.97
Nashik-Nandgaon : 10.85
Thane-Kopri-Pachpakhadi : 10.65
Mumbai Suburb-Andheri West : 10.15
Thane-Belapur : 10.03
Satara-Koregaon : 9.93
Dhule-Dhule City : 9.6
Jalgaon-Jalgaon City : 9.57
Sindudurg-Kudal : 9.53
Pune-Pune cantonment : 9.5
Buldhana-Mehkar : 9.42
Thane-Ovala - Majiwada : 9.37
Palghar -Vikramgad : 9.36
Amravati-Teosa : 9.25
Pune-VADGAON SHERI : 9.24
Mumbai Suburb-Goregaon : 9.17
Nashik-Nashik central : 9.08
Mumbai Suburb-Versova : 9.06
Chandrapur -Brahmapuri : 9.04
Nashik-Sinnar : 8.98
Aurangabad-Gangapur : 8.87
Thane-Murbad : 8.87
Jalgaon-Bhusawal : 8.8
Nashik-Yevla : 8.61
Nashik-Devlali : 8.58
Ratnagiri -Rajapur : 8.52
Jalna-Jalna : 8.51
Nashik-Dindori : 8.39
Beed-Ashti : 8.36
Thane-Thane : 8.25
Mumbai Suburb-Kurla(SC) : 8.23
Nashik-Malegaon outer : 8.19
Nashik-Baglan : 8.1
Latur-Latur Rural : 8
Nashik-Chandvad : 7.9
Pune-Shivajinagar : 7.88
Sindudurg-Sawantwadi : 7.72
Nashik-Nashik East : 7.71
Pune-Kasbapeth : 7.64
Mumbai Suburb-Mulund : 7.61
Amravati-Melghat : 7.58
Yavatmal-Yavatmal : 7.56
Thane-Ulhasnagar : 7.55
Chandrapur -Ballarpur : 7.36
Mumbai Suburb-Vandre West : 7.36
Mumbai Suburb-Borivali : 7.26
Nagpur-Nagpur North : 7.17
Pune-Parvati : 7.11
Chandrapur -Chimur : 7.11
Latur-Udgir : 7.05
Chandrapur -Warora : 7.04
Satara-Karad North : 7
Akola-Akola West : 6.96
Nagpur-Nagpur central : 6.82
Sangli-Tasgaon-Kavathe Mahankal : 6.78
Chandrapur -Chandrapur : 6.74
Mumbai Suburb-Bhandup West : 6.65
Jalna-Bhokardan : 6.63
Thane-Ambernath : 6.55
Amravati-Amravati : 6.55
Nagpur-Nagpur West : 6.55
Jalgaon-Jalgaon Rural : 6.49
Washim -Washim : 6.44
Nagpur-Nagpur South : 6.44
Solapur-Madha : 6.35
Mumbai City-Mahim : 6.34
Kolhapur-Chandgad : 6.34
Mumbai Suburb-Jogeshwari East : 6.33
Gadchiroli -Gadchiroli : 6.3
Satara-Phaltan : 6.25
Buldhana-Chikhli : 6.25
Mumbai City-Shivadi : 6.19
Ahmednagar-Shrigonda : 6.12
Gondiya-Gondiya : 6.09
Satara-Patan : 6.09
Ahmednagar-Shrirampur : 6.07
Solapur-Solapur South : 6.07
Jalna-Badnapur : 6.02
Nagpur-Nagpur East : 6.02
Ratnagiri -Ratnagiri : 5.9
Wardha-Hinganghat : 5.89
Latur-Latur City : 5.88
Nashik-Kalwan : 5.88
Buldhana-Sindkhed Raja : 5.81
Yavatmal-Digras : 5.81
Ahmednagar-Rahuri : 5.8
Solapur-Solapur City North : 5.67
Mumbai Suburb-Ghatkopar East : 5.62
Thane-shahapur : 5.61
Nagpur-Ramtek : 5.58
Nandurbar -Nawapur : 5.57
Mumbai City-Worli : 5.55
Mumbai City-Malabar hill : 5.54
Palghar -Nalasopara : 5.54
Akola-Akola East : 5.53
Mumbai Suburb-Dahisar : 5.43
Gadchiroli -Armori : 5.42
Wardha-Deoli : 5.42
Buldhana-Khamgaon : 5.39
Amravati-Morshi : 5.38
Satara-Man : 5.37
Amravati-Badnera : 5.22
Solapur-Sangola : 5.2
Jalgaon-Erandol : 5.15
Nagpur-Kamthi : 5.15
Pune-Khadakwasala : 5.12
Bhandara -Bhandara : 5.11
Ahmednagar-Ahmednagar City : 5.1
Mumbai Suburb-Mankhurd shivaji Nagar : 5.05
Mumbai Suburb-Charkop : 5.03
Yavatmal-Arni : 5.01
Aurangabad-Paithan : 5
Osmanabad-Umarga : 4.96
Nanded-Loha : 4.96
Dhule-Sakri : 4.95
Mumbai Suburb-Ghatkopar West : 4.91
Sangli-Palus-Kadegaon : 4.9
Solapur-Akkalkot : 4.89
Jalgaon-Pachora : 4.85
Aurangabad-Sillod : 4.85
Ahmednagar-Shirdi : 4.83
Amravati-Achalpur : 4.8
Mumbai Suburb-Kandivali East : 4.8
Mumbai City-Mumbadevi : 4.75
Mumbai Suburb-Andheri East : 4.73
Pune-Chinchwad : 4.73
Pune-Bhor : 4.69
Nagpur-Nagpur South West : 4.61
Sangli-Sangli : 4.58
Akola-Balapur : 4.55
Jalgaon-Raver : 4.51
Raigad-Mahad : 4.51
Pune-Daund : 4.51
Dhule-Shindkheda : 4.49
Wardha-Arvi : 4.48
Pune-Kothrud : 4.48
Satara-Karad South : 4.45
Nanded-Mukhed : 4.45
Hingoli-Kalamnuri : 4.45
Mumbai City-Colaba : 4.44
Mumbai City-Wadala : 4.38
Raigad-Panvel : 4.37
Satara-Satara : 4.37
Raigad-Karjat : 4.37
Yavatmal-Ralegaon : 4.34
Kolhapur-Kolhapur North : 4.31
Mumbai Suburb-Vandre East : 4.29
Raigad-Alibag : 4.27
Akola-Akot : 4.2
Parbhani -Pathri : 4.19
Dhule-Dhule Rural : 4.18
Sangli-Khanapur : 4.16
Mumbai Suburb-Magathane : 4.13
Sindudurg-Kankavli : 4.13
Thane-Bhiwandi West : 4.05
Hingoli-Hingoli : 4.04
Jalna-Ghansawangi : 3.95
Mumbai Suburb-Vile parle : 3.88
Buldhana-Buldhana : 3.88
Washim -Risod : 3.86
Gondiya-Amgaon : 3.78
Parbhani -Gangakhed : 3.73
Solapur-Mohol : 3.68
Washim -Karanja : 3.66
Pune-Ambegaon : 3.62
Ahmednagar-Akole : 3.57
Gadchiroli -Aheri : 3.54
Yavatmal-Wani : 3.47
Latur-Nilanga : 3.44
Pune-Hadapsar : 3.38
Nandurbar -Shahada : 3.38
Kolhapur-Shirol : 3.37
Bhandara -Tumsar : 3.35
Thane-Mira Bhayandar : 3.34
Thane-Bhiwandi East : 3.25
Ratnagiri -Chiplun : 3.23
Buldhana-Jalgaon (Jamod) : 3.22
Ahmednagar-Sangamner : 3.2
Ahmednagar-Shevgaon : 3.18
Mumbai City-Sion koliwada : 3.09
Jalgaon-Muktainagar : 3.09
Amravati-Dhamamgaon railway : 3.08
Kolhapur-Hatkanangle : 3.07
Parbhani -Parbhani : 2.99
"Jalgaon-Jamner : 2.98"
Latur-Ausa : 2.91
Pune-Baramati : 2.9
Amravati-Daryapur : 2.89
Mumbai Suburb-Kalina : 2.78
Mumbai Suburb-Chembur : 2.72
Kolhapur-Radhanagari : 2.7
Jalgaon-Amalner : 2.64
Osmanabad-Osmanabad : 2.53
Mumbai City-Dharavi : 2.45
Ratnagiri -Guhagar : 2.42
Raigad-Uran : 2.38
Nashik-Malegaon central : 2.37
Aurangabad-Phulambri : 2.34
Mumbai City-Byculla : 2.3
Mumbai Suburb-Dindoshi : 2.29
Mumbai Suburb-Vikhroli : 2.24
Nashik-Nashik West : 2.22
Nanded-Deglur : 2.19
Mumbai Suburb-Malad West : 2.17
Beed-Parli : 2.15
Osmanabad-Tuljapur : 2.11
Solapur-Solapur City central : 2.1
Parbhani -Jintur : 2.08
Thane-Mumbra-Kalwa : 2.08
Nanded-Bhokar : 2
Jalgaon-Chopda : 1.93
Yavatmal-Umarkhed : 1.92
Buldhana-Malkapur : 1.86
Pune-Bhosari : 1.83
Latur-Ahmadpur : 1.81
Solapur-Malshiras : 1.78
Nagpur-Umred : 1.71
Nanded-Hadgaon : 1.69
Pune-Shirur : 1.61
Pune-Pimpri : 1.57
Chandrapur -Rajura : 1.56
Raigad-Pen : 1.53
Osmanabad-Paranda : 1.52
Pune-Junnar : 1.42
Jalna-Partur : 1.39
Pune-Maval : 1.38
Yavatmal-Pusad : 1.34
Kolhapur-Kagal : 1.3
Aurangabad-Aurangabad West : 1.2
Pune-Khed alandi : 1.18
Mumbai Suburb-Chandivali : 1.16
Kolhapur-Ichalkaranji : 1.09
Sangli-Islampur : 0.98
Nanded-Kinwat : 0.85
Nagpur-Savner : 0.77
Aurangabad-Kannad : 0.75
Ahmednagar-Karjat jamkhed : 0.68
Ratnagiri -Dapoli : 0.65
Kolhapur-Kolhapur South : 0.63
Kolhapur-Karvir : 0.63
Pune-Indapur : 0.57
Hingoli-Basmath : 0.56
Raigad-Shrivardhan : 0.33
Sangli-Shirala : 0.31
Gondiya-Arjuni-morgaon : 0.3
Nanded-Nanded North : 0.16
Nagpur-Katol : 0.15
Beed-Kaij : 0.11
Palghar -Boisar : 0.02
Nanded-Naigaon : -0.07
Solapur-Barshi : -0.08
Nanded-Nanded South : -0.13
Ahmednagar-Parner : -0.25
Nandurbar -Akkalkuwa : -0.29
Nagpur-Hingna : -0.3
Aurangabad-Aurangabad central : -0.35
Dhule-Shirpur : -0.36
Gondiya-Tirora : -0.44
Ahmednagar-Nevasa : -0.56
Aurangabad-Aurangabad East : -0.57
Palghar -Vasai : -0.87
Bhandara -Sakoli : -0.92
Satara-Wai : -0.97
Nashik-Niphad : -1.03
Kolhapur-Shahuwadi : -1.12
Mumbai Suburb-Anushakti Nagar : -1.23
Solapur-Karmala : -1.3
Jalgaon-Chalisgaon : -1.38
Beed-Georai : -1.51
Beed-Majalgaon : -1.62
Solapur-Pandharpur : -2.19
Beed-Beed : -3.69
Pune-Purandar : -4.72
Ahmednagar-Kopargaon : -5.07