Submitted by वैभव आबनावे on सोमवार, 08/11/2021 - 04:08
आनंदाची अशी एक व्याख्या होऊ शकते : आपण अजाणतेपणे बाळगून असलेल्या क्षमता स्वतःमध्ये सक्रिय क्षमता म्हणून असल्याचा शोध लावणं. जग कसं बदलायचं? याचं उत्तर खरोखरच उत्साहवर्धक आहे : आनंदी राहून. पण याची आपल्याला किंमत मोजावी लागते, ती म्हणजे, वेळोवेळी खरोखरच असमाधानी असणं. ही एक निवड आहे, आपल्या आयुष्यामधील खरी निवड. ही खरी निवड खरं आयुष्य जगण्याशी निगडित आहे.
Submitted by वैभव आबनावे on सोमवार, 08/11/2021 - 04:00
आज खरी विरोधी भूमिका, खरा उठाव, 'आता राजकारण नको, राजकारणाबद्दल बडबड पुरे!' असे म्हणण्यात नक्कीच नाही. किंबहुना, आपण आपल्याला असे काम नेमून दिले पाहिजे जे पक्के याच्या अगदी उलट म्हणेल : अखेर राजकारण, अस्सल राजकारण! राजकारणाच्या बहुलतेसाठी एक पुनर्रचित अवकाश. लांबच्या पल्ल्याचे राजकारण. - आलँ बादियु
Submitted by बालमोहन लिमये on शुक्रवार, 05/11/2021 - 08:05
शिक्षक म्हणून केलेल्या ह्या प्रवासात मीही अनेक गोष्टी शिकलो. या लेखात माझ्या आय. आय. टी.मधील चव्वेचाळीस वर्षांच्या अनुभवांविषयी लिहिणार आहे. हे अनुभव इतर ठिकाणी थोड्या-फार फरकाने लागू पडतीलही. प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील अखेरचा भाग.
Submitted by अवंती on गुरुवार, 04/11/2021 - 06:28
प्रस्तुत लिखाण आहे याच मालिकेतल्या भीष्म सहानी यांच्या 'तमस' कादंबरीवरचं. Name your poison म्हणतात ना. तर हा 'अमुचा प्याला दु:खाचा.'
Submitted by प्रविण देशपांडे on गुरुवार, 04/11/2021 - 06:22
पदार्थविज्ञानात गेल्या हजारो वर्षांत लावलेले/लागलेले निरनिराळे शोध, तांबं, कांत्स, लोखंड, पोलाद, सिरॅमिक, नॅनो टेक्नॉलॉजी आणि त्यांचा मानवी संस्कृतीवर झालेला परिणाम याचा आढावा.
Submitted by अबापट on गुरुवार, 04/11/2021 - 06:15
आधुनिक वैद्यकशास्त्रात झालेल्या बदलांचा, रसाळ शैलीतला तपशिलवार आढावा, डॉ. पद्माकर पंडित यांच्या मुलाखतीतून.
Submitted by वैभव आबनावे on गुरुवार, 04/11/2021 - 06:02
"बदल हाच जगाचा नियम आहे," असं जगच बदललं पाहिजे, असं आलँ बादियु का म्हणतात? त्यांनी २०१२ साली दिलेल्या व्याख्यानाचं भाषांतर.
Submitted by प्रियांका तुपे on बुधवार, 03/11/2021 - 07:10
झरझर वाचून संपवलेलं पत्र संपदानं खाली ठेवलं. तिला आता शाल्मलीचा राग आला होता. म्हणजे या कारणामुळे तिचं अभिषेकसोबत जमलं नाही तर. पण हिने मला काहीच कसं सांगितलं नाही. आणि शिरीषबद्दल तर शंका होतीच, पण आता तर हे स्पष्टच झालं. संपदा स्वत:शीच बोलत होती. शाल्मलीचं अभिषेकसोबत जुळलं नाही याचं वाईट वाटून घ्यावं की तिचं आणि शिरीषचं काही तरी सुरू आहे, अशी शंका आपल्याला होती ...
नक्की काय सुरू होतं या मुलीचं?
Submitted by विवेक घोडमारे on बुधवार, 03/11/2021 - 07:05
कागद रंगवून लिखाण घडण्याचा प्रश्नच नव्हता. आणलेले कागद तसेच पडले होते. मन जाग्यावर नव्हतंच. त्या दिवशी घरून निघाल्यावर विघ्नेश थेट गावाला बाबांकडे गेला होता. दिवेलागणीची वेळ. बाबा बाहेरच खुर्चीवर बसले होते. बाजूलाच काकूही होती. आई गेल्यावर बाबांची काळजी काकूच घेते. तिने घरात येऊन राहायला विघ्नेशची आधीपासूनच ना नव्हती. मोठ्याचा, विनोदचा विरोध अपेक्षित होताच.
Submitted by चिन्मय धारूरकर on बुधवार, 03/11/2021 - 07:02
दुसरं उदाहरण – मिस्टर. याला यजमान, पती, नवरा, धनी इत्यादी पर्याय असले तरी प्रत्येक पर्याय हा कोणतं तरी वेगळंच वापराचं क्षेत्र दर्शवतो. यजमान – पूजा, यज्ञविधी, पती – कायदेशीर, नवरा – अनौपचारिक, धनी – ग्रामीण. त्यामुळे यांपैकी काहीच नको आणि इंग्रजीतून उसनवारी होते...
मराठीतले भाषाव्यवहार, भाषांतरांबद्दलची मतंमतांतरं आणि भाषेतली आधुनिकता याबद्दल भाषातज्ज्ञ चिन्मय धारूरकर यांचा लेख
पाने