काकस्पर्श ऊर्फ बाजूला बसलेली बाई
बरेच दिवस हा विषय डोक्यात होता. पण निमित्त अदितीच्या प्रतिसादाचं झालं. त्यामुळे या धाग्याचं पापपुण्य अदितीलाच लखलाभ.
***
मासिक पाळीच्या अनुषंगानं येणारं तथाकथित अपावित्र्य, त्या दिवसांबद्दलचे गैरसमज, 'पण बायकांना ३ दिवस विश्रांती मिळते, उगाच नाही जुन्या लोकांनी नियम केले'छापाचे युक्तिवाद... हे सगळं इतिहासजमा झालं असा माझा गोड समज होता. पण एका मैत्रिणीच्या कुटुंबीयांसोबत थोडं पर्यटन करण्याचा योग आला आणि माझा समज रीतसर उद्ध्वस्त झाला.
पर्यटनात काही तीर्थस्थळांचाही समावेश होता. मैत्रिणीची पाळी चालू. मैत्रिणीची आई म्ह्टलं तर आधुनिक आणि म्हटलं तर धार्मिक. आईनं आईपुरत्या गोष्टी पाळायच्या असत्या तर काही प्रश्न नव्हता. पण मुलीनं 'चालू' असताना देवळात येऊन देऊळ 'विटाळू' नये, अशी तिची तीव्र आणि भावनिक इत्यादी इच्छा होती. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मैत्रिणीनं ती पाळली. मैत्रिणीला आईच्या धर्मभावनेची शपथ आणि मला या सगळ्या विनोदी प्रकाराचा निषेध करण्याची खुजली. परिणामी दिवसभर भटकताना देऊळ आलं रे आलं की मैत्रीण आणि मी हिरण्यकश्यपूच्या उपासक असल्यासारख्या मागे थांबून टाइमपास करत असू.
यात अनेक वाद निघाले. अनेक निरर्थक श्रद्धा-अंधश्रद्धांचा खल झाला.
"या दिवसांत बायकांच्या शरीराचं तपमान वाढलेलं असतं. म्हणून तुळशीला पाणी घालू नये. झाड नक्की करपून जातं."
"बायकांना या दिवसांत विश्रांतीची नितांत गरज असते."
"नि मुद्दामहून विषाची परीक्षा पाहायला जावं कशाला?"
"एकीची चालू झाल्याचं कळलं की लगेच दुसरीची चालू होतेच होते..."
"पपई / खजूर झाल्यानं अंगावरून जास्त जातं..."
"सॅनिटरी नॅपकिन्स वाईट. त्यानं कॅन्सर होऊ शकतो. त्याहून मऊ सुती कापडाच्या घड्या वापराव्यात."
...
एक ना दोन. यातल्या बर्याच गोष्टींमधला निरर्थकपणा स्वयंस्पष्ट होता. वाद घालावा, इतकीही त्या गैरसमजांची लायकी नव्हती. पण मुदलात या विषयावर काही बोलायची अनिच्छा / संकोच / भीती, विषयाबद्दलचे गैरसमज आणि भल्याभल्या शिक्षित घरांमधे चालू ठेवली जाणारी निरर्थक परंपरा - हे सगळं अंगावर आलं खरं. तेव्हापासून काही प्रश्न डोक्यात घोळताहेत.
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
२. केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणण्याचा तुम्हांला संकोच वाटतो का? का?
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत असल्यास पाळीच्या दिवसांत तिकडे न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? का?
४. घरातल्या मुलीची पाळी सर्वप्रथम आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?
***
'ऐसी' हे तसं आधुनिक संस्थळ आहे याची मला कल्पना आहे. इथे इतक्या मूलभूत प्रश्नांची गरज कदाचित नसेलही. चिंजंनी म्हटल्याप्रमाणे अनेकांना या विषयावर बोलणं काहीसं किळसवाणंही वाटू शकेल.पण माझ्या मैत्रिणीच्या अनुभवानंतर मी या विषयाबद्दलची लोकांची मतं ऐकायला आणि त्यांच्या घरांतल्या प्रथा जाणून घ्यायला उत्सुक आहे. प्रश्नांची ही सैल चौकट केवळ सुरुवात करण्यापुरतीच आहे. त्यात प्रश्नांची भर घातली, अनुभव सांगितले, निराळ्या दिशेनं चर्चा गेली, तरीही ते स्वागतार्हच आहे. (नसून सांगता कुणाला?! ;-))
शंका
बाकीचं ठीक आहे; पण
बायकांना या दिवसांत विश्रांतीची नितांत गरज असते.
हे मी खरं आहे असं समजत होतो. ते चूक आहे का ?
( ह्या दिवसात अशक्तपणा येतो. पोट वगैरे दुखते. काहीवेळेस हिमोग्लोबिन कमी होते असे सारे ऐकले आहे.)
.
.
पपई / खजूर झाल्यानं अंगावरून जास्त जातं...
पपई ही खतरनाक उष्ण असल्यानं स्त्रियांच्या जननेंद्रियाशी संबंधित काहीतरी झोल होतो फ्यामिली डोक्टरच्या अंकात वाचलं.
.
.
सॅनिटरी नॅपकिन्स वाईट. त्यानं कॅन्सर होऊ शकतो. त्याहून मऊ सुती कापडाच्या घड्या वापराव्यात.
नॅपकिन्सला कुनी वाईट वगैरे म्हटलेलं ऐकलं नाही; पण सुती कापडही खरोखर उपयुक्त असतं असं ऐकलं आहे.
खखोस्त्रीजा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
फ्यामिली डोक्टरच्या अंकात वाचलं. .
हा तोच अंक का? सकाळमधे बालाजी तांबे नामक एका भोंदु वैदूने जी जागा विकत घेतली आहे, व जिथे हा निर्लज्ज माणूस काय वाट्टेल ते निरर्थक ज्ञान पाजळत असतो ते?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
ओ आडकीत्ता ,तुमच्या कफाला
ओ आडकीत्ता ,तुमच्या कफाला वातदोष झालाय ,म्हणुन तुमचे पित्त बाहेर पडत आहे .
तुमी असे करा ,शुद्ध आयुर्वेदीक संस्कार झालेले गायीचे तूप एक एक थेंब रात्री झोपताना नाकात टाका ,व पंचधातूच्या वाटीने आपले तळव्यांचे मर्दन करा व रोज रात्री पीततांब्रवर्णकटुघृताचे चार चार पेग घेत चला ,साधारणतः दोन वर्षात तुमचे वात कफ पित्त संतुलन होईन जाईल..
™ ग्रेटथिंकर™
नेपाळ
नेपाळमध्ये ही प्रथा अधिक कडकपणे पाळली जाते असं दिसतं. दोन-एक वर्षांपूर्वी एका सोळा वर्षाच्या मुलीचा यामुळे मृत्यूही ओढवला होता.
त्यासंबंधी अलीकडेच गार्डियन आणि अल जझीरात आलेले लेख.
१. हो. कारण सवय. दबक्या
१. हो. कारण सवय. दबक्या आवाजाविषयी खात्री नाही.
२. नाही. तसेही आता ते सुपरस्टोअरमध्ये स्वतः उचलता येतात.
३. गैरलागू.... घरात रोज वगैरे देवपूजा होत नाही.
४. नाही
५. नेहमीच शहरात राहिलो. माझ्या माहेरी सुद्धा वेगळे बसण्याची पद्धत नव्हती. [त्यावर माझ्या वडिलांना काम करायचं नसे म्हणून ती पद्धत नव्हती अशी आईची खवचट कमेंत होती].
अर्थात आमचे घर प्रातिनिधिक नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आईची कमेंट खतरा आहे!
आईची कमेंट खतरा आहे!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हो ना .... पुरुषांनी वागावं
हो ना .... पुरुषांनी वागावं तरी कसं?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
१. 'माझी पाळी चालू आहे' असं
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
यावरुन एक गम्मत आठवली...तेव्हा सॅनिटरी पॅड्स असे सरसकट सगळीकडे मिळत नव्हते, फक्त मेडिकल स्टोरस मधेच मिळायचे. घरात आम्ही सगळ्याच बायका, आई आणि ३ मुली. तेव्हा माझी आई एका चिठोर्यावर 'मेडीकल' असा शब्द लिहून वडिलाना द्यायची आणि वडिलच ते घेउन यायचे.
पण यावरुन एक जाणवते कि अगदी पाळी असा शब्द जरी उच्चारला जात नव्हता तरी वडिलानी पॅड्स आणुन द्यायचे ईतपत मोकळेपणा तरी घरात होताच. देव ई. बाबतित काही पाळले जात नव्ह्ते. ते सासरी होते प्रकरण. अर्थात सासु ८५ ची आहे हि पण एक महत्त्वाची बाब आहेच. त्यामुळे समजावणे बिमजावणे ई. च्या भानगडित ना पडता आम्ही बरेचदा आळिमिळी गुपचिळी चा पर्याय स्विकरतो.
उत्तरे
१. आहे, कारण टॅबू.
२. नाही.
३. हो, कारण प्रश्नाच्या पुर्वाधातच आहे.
४. नाही.
५. शहर, निमशहर, गामिण भाग - >>शिक्षणाची परंपरा << म्हणजे? - नाही.
उत्तरे
आईच्या पिढीत पाळी चालु आहे असे न म्हणता, एम्सी चाली आहे किंवा पिरीएड्स चालु आहेत असे भाषांतर हटकून व्हायचे. एकुणच मराठीत जे बोलणे समाजसंमत नव्हते त्याला हा इंग्रजी मुलामा देणे पळवाट आहे की कोशाबाहेर येण्याचा मार्ग यावर मी मत बनवु शकलेलो नाही. मात्र पाळी म्हणजे काय? या माझ्या प्रश्नाला आईने शाळेत (बहुदा ७-८वीत) मला समजेल इतपत व्यवस्थित उत्तर दिले होते.
माझ्या पिढीतल्या मैत्रिणींपैकी काही कॉलेजात हे उघड सांगत तर काही आडून - गंमत म्हणजे त्यातील बहुतांश अमराठी होत्या. काही अपवाद सोडले तर बहुतांश मराठी मुली काहीच बोलत नसत / विषय टाळत वा फिस्सकन हसत.
नाही.
मलाही "बाहेर जातोच आहेस तर पॅडही घेऊन हे" अशी आकाशवाणी झाल्यावर बायकोसाठी पॅड्स आणताना संकोच वाटत नाही नी ते मला सांगताना बायकोलाही. मात्र मी पॅड्स मागितल्यावर केमिस्ट थोडा संकोचतो हे खरं!
बायको स्वतःच पॅड आणते तेव्हाही ती संकोचते आहे असे वाटले नाही. तिला कधी विचारले नाही.
माझ्या आईच्या पिढीतील घरातील बायका थोड्या प्रमाणात पाळतात. आजी कडकपणे पाळत असे. बायको देवपूजा/धार्मिक कृत्येच करत नाही, पाळी नसतानाही! त्यामुळे हा प्रश्न उद्भवत नाही. मात्र एका गणेशोत्सवात तिची पाळी असताना आईने "ज्यांच्याकडे जातोय त्यांना सांगु नकोस, पण चल दर्शनाला, काही होत नाही" असा उपदेश केला होता. आता हे पाळणे म्हणावे का नाही माहिती नाही.
माझ्या माहितीत तरी नाही.
घरातले लोक किती धार्मिक आहे त्याने फरक पडेलसे वाटते. बाकी ग्रामिण/शहरी, शिक्षित/अशिक्षित यांच्यात फार मोठा फरक नसावा.
अर्थातच कल्पना नाही, पण हे पोटदुखी /अशक्तपणा असलाच तर काही तासांचा असतो ४-५ दिवस नक्कीच नसावा असा अंदाज. अर्थात हे ऐसीकर स्त्रियाच सांगु शकतील. शिवाय महिला एरवी किती व्यायाम/शारीरीक श्रम करतात त्यावरही हे अवलंबून आहे ही ऐकीव माहिती. 'ऐसे-डॉक्टर' सांगु शकतील नक्की काय ते
.
पपईतील एका घटकामुळे गर्भाशय आकुंचन पावतं, ते गर्भवती महिलेच्या संभाव्य अपत्याला घातक ठरू शकत.
मात्र स्त्री प्रेगग्नंट नसेल तर पपई खाल्ल्याने काही प्रॉब्लेम होऊ नये असे आमच्या गायनॅकने सांगितल्याचे पुसटसे आठवते आहे.
(बाकी तु सकाळच्या फ्यामिली डॉक्टर बद्दल म्हणत असशील तर मी गप्प बसतो. मला तोंड उचकायचं नाहीये - लाऊ नकोस )
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
उत्तरे
१. आहे, कारण टॅबू.
२. नाही.
३. हो.मी क्वचितच पूजा करतो.रोजची पूजा वडील करतात. पाळीच्या काळात बायको माझ्या वडिलांना म्हणजे तिच्या सासर्यांना सांगते कि आज पूजा करू नका.
४. नाही.
५. शहर, शिक्षणाची परंपरा? म्हणजे? - नाही. घरातील लोक जास्त धार्मिक नाहीत. बायकोच्या माहेरीचे जास्त धार्मिक आहेत. म्हणून बायको हे सर्व पाळत असावी असे वाटते.
->बायकांना या दिवसांत विश्रांतीची नितांत गरज असते.
मी पण हे खरं आहे असं समजत होतो. ते चूक आहे का ? माझ्या बायकोला तर पहिले दोन दिवस कम्बर दुखीचा खुप त्रास होतो.
"एकीची चालू झाल्याचं कळलं की लगेच दुसरीची चालू होतेच होते..."
"न्हाले कि पाळी लवकर येते"
->हे मी पण बायकोकडुन ऐकले आहे.
पाळीला बायका "अडचण" ह शब्द सर्रास वापरतात असा अनुभव आहे. "अडचण आहे" असे म्हणाले की एखाद्या ठिकाणी जायचे नसेल तर कोणी काहि बोलत नाही.
शिक्षणाची परंपरा: घरातली
शिक्षणाची परंपरा: घरातली तुमच्या आधीची पिढी शिकलेली आहे की तुमची पिढी पहिलीच शिकलेली... असा विचारण्याचा उद्देश.
विश्रांतीच्या गरजेबद्दलः हे व्यक्तीव्यक्तीनुसार निराळं असतं. पण एखाददोन तासांची पोटदुखी/कंबरदुखी वगळता इतर काहीच त्रास होत असल्याचं सहसा ऐकू येत नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
१. होती आता नाही२. नाही३.
१. होती आता नाही
२. नाही
३. देव गुंडाळुन कपाटात ठेवलेत
४. नाही
५. शहरात राहते. माझ्या शिकण्याने+कमवण्याने घरात फरक पडला (अशी माझी मीच समजुत करुन घेतलीय ;-))
विश्रांतीच्या गरजेबद्दलः हे व्यक्तीव्यक्तीनुसार निराळं असतं. पण एखाददोन तासांची पोटदुखी/ कंबरदुखी वगळता इतर काहीच त्रास होत असल्याचं सहसा ऐकू येत नाही >> मला वयाच्या २६व्या वर्षीपासून पहील्या दिवशी सिवीअर क्रेम्प्स चालू झाले. बेशुद्ध पडणे, उलट्या, पोट-मांड्या जबरदस्त दुखणे. its like attack. पेनकिलर घ्यावे लागायचे. नेहमीच व्हायच असं नाही पण पाळीच्या आधी किँवा चालु झाल्यावर थोड काही हेक्टीक केल तर व्हायचे. बहुतेक तेव्हा माझ वजन खूप कमी असल्याने होत असेल. आता वाढलय, तरीही रिस्क नको म्हणुन मी पहील्या दिवशी झोपुनच असते.
समांतर दुवे:
दुवा१
दुवा२
बेशुद्ध? बाप रे! हे मी
बेशुद्ध? बाप रे! हे मी प्रथमच ऐकलं. माझ्या एका मैत्रिणीला पोटदुखीचा खूप त्रास होत असे. पण चालू झाल्या झाल्या दोन ग्लास पाणी पिणं, थोडा वेळ आराम करणं, महिनाभर नियमितपणे व्यायाम करणं.. अशा साध्या उपायांनीच तो कमी झाला. इतकं टोकाचं दुखणं मी प्रथमच ऐकतेय.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हम्म्म्म्म...
परवाच कोण बरे 'नकळत आपण किती व्यक्तिगत माहिती रिव्हील करतो', 'ती खरच तेवढी व्यक्तिगत असते का' वगैरे कुतूहल नेमके कोठे व्यक्त करत होते... विसरलो. आठवेल पुन्हा कधीतरी. (बहुधा प्रश्न इर्रेलेवंट झाल्यावर. स्मरणशक्तीचे अस्सेच असते - जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे ते नेमके आठवत नाही, नि गरज संपल्यावर लख्ख आठवते. याला वाढत्या वयोमानाचा परिणाम म्हणावा की काय म्हणावे, कळत नाही.)
असो. वरील प्रतिसादास 'रोचक'१ अशी श्रेणी द्यावी, की 'माहितीपूर्ण'२, याबद्दल संभ्रमात असल्याकारणाने श्रेणी तूर्तास हातची राखून ठेवलेली आहे. योग्य निदान३ झाल्यावर सढळहस्ते प्रदान करण्यात येईलच.
------------------------------------------------------------------------------------------------------------
१ प्रस्तुत तपशील हे एखाद्या वैद्यकीय व्यावसायिकास (विशेषतः, स्त्रीरोगतज्ज्ञास) निश्चित रोचक वाटतील, याबद्दल खात्री आहे.
२ प्रस्तुत प्रतिसाद हा (तपशिलाच्या बारकाव्यांसहित) माहितीने ओतप्रोत(२),(३)२अ भरलेला आहे, याबद्दल दुमत संभवू नये. (चूभूद्याघ्या.)
२अ श्री. यशवंत रामकृष्ण दाते यांच्या 'महाराष्ट्र शब्दकोशा'नुसार:
३ श्रेणीचे.
हम्म 'नकळत' नाही रिव्हील
हम्म 'नकळत' नाही रिव्हील केली ती माहिती पण तपशील बहुतेक जरा जास्तीच झालेत. एक्चुली मी प्रतिसाद देइपर्यँत बरेचजण फार त्रास नसतो असेच म्हणत होते. त्यामुळे it depends सांगायच होत. माझ्या अतिरिव्हीलीँग तपशीलामुळे थोडा अवेअरनेस वाढला तर चांगलच आहे.
...
बिंगो!
होईनातका! तपशील तुमचे. देणार्या तुम्हीच. किती द्यायचे, हा सर्वस्वी तुमच्या मर्जीचा मामला, नाही का?
पोष्ट-र्याशनलायझेशन१ म्हणून हे ठीकच आहे, पण त्याची गरज नसावी. 'मला लिहावेसे वाटले, मी लिहिले. काय म्हणणे आहे?' एवढे पुरेसे ठरावे, नाही का?
असो.
--------------------------------------------------------------------------------
१ पोष्टचे - प्रतिसादाचे - र्याशनलायझेशन, अशा अर्थी.
१. 'माझी पाळी चालू आहे' असं
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
- पद्धत आहे. "तिला आज नाही करायचीय पूजा", "आज ती बाजूला बसलीय", "अडचण" इत्यादी. माझी आई असे काहीही शब्दप्रयोग वापरत नसे, त्यामुळे सासूने वापरले की मला सुरुवातीला समजायचंच नाही. नंतर कळू लागलं.
२. केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणण्याचा तुम्हांला संकोच वाटतो का? का?
- अगदीच नाही
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत असल्यास पाळीच्या दिवसांत तिकडे न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? का?
- नॉर्मल कन्डिशन्समधे कदाचित पाळल्या गेल्या असत्या कदाचित सगळ्या प्रथा, पण मी सगळं जाणीवपूर्वक सोडून दिल्यापासून माझ्यापुरत्या तरी बंद आहेत.
पण जवळच्या बर्याच घरांमधे अमकी ढमकी पूजा आहे, आणि एकच सुवासिनी घरात आहे म्ह्णून तिने नाही नाही त्या सगळ्या प्रकारच्या गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलावी, त्यासाठी तब्येतीवर कितीही वाईट परीणाम झाले तरी ते करावं अशी अपेक्षा असलेले लोक पाहीले आहेत. आणि सगळ्यात फ्रस्ट्रेटिंग गोष्ट ही असते की ज्या मुलीला हे करावं लागतं, तिलाही यात आक्षेपार्ह काहीही वाटत नसतं
४. घरातल्या मुलीची पाळी सर्वप्रथम आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
- नाही
५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?
- अतीशय हुशार, व्यवस्थीत उच्च (अगदी विज्ञानशी संबंधित विषयात वगैरे) शिक्षण घेतलेल्या बायका आणि पुरुषांना सगळ्या प्रथा आपापल्या सोयीनुसार वापरताना पाहीलेलं आहे. त्यामुळे शिक्षणाचा/शहरात राहील्याचा काही संबंध असावा असं वाटत नाही. देवधर्म, प्रथा यांची भीती सगळ्यांच्याच मनात इतकी खोलवर रुजलेली आहे की त्यापुढे तर्कशास्त्राचे घोडे नाचवणार्यांना फक्त - "तुला काय कळतंय", "उगाच रिस्क नको" असं सांगून गप्प बसवलं जातं.
पण हा "टॅबू" हळूहळू नष्ट होइल असं वाटतंय. आज जी मुलं मुली शाळेत आहेत, त्यांना या सर्व गोष्टींबद्दल पुरेसं लैंगिक शिक्षण दिलं जातंय (स्वतः वाचलंय इ.१०वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात). मे बी पुर्वी ज्या गोष्टी गुपचुप हळूच फक्त मुलींनाच सांगितल्या जायच्या, त्या आता रीतसर पाठ्यपुस्तकांमधेच आल्याने शाळेत शिक्षकांना तरी उघड बोलणं कंपल्सरी झालंय. त्यामुळे ही परिस्थीती बदलेल पुढच्या पिढ्यांमधे अशी आशा आहे.
कावळा शिवणे
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
उत्तर :- हो आहे. माझ्या शिवाय आणखी कोणाला हे कळु नये म्हणुन.
२. केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणण्याचा तुम्हांला संकोच वाटतो का? का?
उत्तर : सुरवातिला वाटायचा, आता नाही.
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत असल्यास पाळीच्या दिवसांत तिकडे न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? का?
उत्तर:- मी एकटिच पाळते ( कारण माहेराहुन तसेच धडे मिळालेत) सासरी जास्त धार्मिक पणा नाही. त्या मुळे तिकडुन फार काही बोलले जात नाही.
४. घरातल्या मुलीची पाळी सर्वप्रथम आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
उत्तर : हो . गोड्धोड केल जात.
या दिवसांत बायकांच्या शरीराचं तपमान वाढलेलं असतं. म्हणून तुळशीला पाणी घालू नये. झाड नक्की करपून जातं."
उत्तर : पाणि घातल्याने झाड करपत नाही
"बायकांना या दिवसांत विश्रांतीची नितांत गरज असते." : हे त्या स्त्रीच्या शरिरावर कि॑वा तिला त्या दिवसा॑त होण्या-या त्रासावर अवल॑बुन आहे.
"नि मुद्दामहून विषाची परीक्षा पाहायला जावं कशाला?" : काही गोष्टित मि हे करुन बघितल आहे.
"एकीची चालू झाल्याचं कळलं की लगेच दुसरीची चालू होतेच होते...":- या बाबतित अजुन काही ऐकल आहे आणी त्या वर विश्वासही आहे. कारण वर म्हणल्या प्रमाणे काही गोष्टी मी मुद्दमुन करुन बघितल्या आहेत आणी त्या अनुभवल्याही आहेत . उदा लवकर पाळी हवी असल्यास त्या बाईच्या शेजारी जाउन बसणे, त्या बाईकडुन टाळी घेणे, उशिरा हवी असल्यास तुळशित सुपारी खोचुन ठेवणे, पाळी चालु असलेल्या बाईच्या जवळ न जाणे ई.
"पपई / खजूर झाल्यानं अंगावरून जास्त जातं..." : या दिवसात शरिरातिल उष्णता खुप वाढलेलि असते. हे दोन्हि पदार्थ उष्ण्ता वाढवणारे असल्यान शरिराच तापमान अजुन वाढुन त्रास होत असावा ( खर तर हे पण प्रत्येकिच्या तब्येतिवर अवल्॑बुन आहे) बायका सरळ काही सा॑गुन ऐकत नसाव्यात म्हणुन अस॑ काही सान्गितल असाव अस॑ मला वाटत. करण मी मासिक पाळित पपई खाते. पण गरोदर असताना खाउ नये. याचे उत्तर वरिल प्रतिसादात काहि॑नि दिलेले आहे
"सॅनिटरी नॅपकिन्स वाईट. त्यानं कॅन्सर होऊ शकतो. त्याहून मऊ सुती कापडाच्या घड्या वापराव्यात."
उत्तर : त्या मधे जी जेल वापरलि जाते त्या मुळे गर्भाशयाच्या मुखाचे काही त्रास होउ शकतात असे माझे मत आहे. माझ्या माहिति प्रमाणे २ तासा पेक्षा जास्त वेळ नॅपकिन्स वापरु नयेत. पण आपल्या कडे मात्र अस घडत नाही. त्या नॅपकिन चा पुरेपुर उपयोग केला जातो. त्या मुळे काही स्॑सर्ग होउन त्रास होउ शकतो.
या बाबतित फार आधि एक लेख वाचला होता , कशात ते आठ्वत नाही. पण त्यात लिहिल्या प्रमाणे परदेशातिल स्त्रिया दर दोन तासाने नॅपकिन्स बदलतात.( पण आपल्याकडे नॅपकिन्स बदलायला जातानाही ते लपवुन जावे लगते , उघड्पणे कोणी जात नाही , त्या मुळे ते सारख बदलायला कोणी जात नसाव अस मला वाटत.)
खरं तर
अनुभव नसल्याने आम्ही यांत बोलू नये, पण इतक्या गंभीर विषयावर सुद्धा ऐकलेली कोटी या वाक्याने आठवली.
उदा लवकर पाळी हवी असल्यास त्या बाईच्या शेजारी जाउन बसणे, त्या बाईकडुन टाळी घेणे,
या वाक्यावरुन 'नाचरे मोरा' या गाण्यातील
'आता तुझी पाळी, वीज देते टाळी' ही ओळ आठवली.
ह. घ्यावे.
लहानपणी ज्या वाड्यात रहायचो,
लहानपणी ज्या वाड्यात रहायचो, तिथे असलेल्या काही मैत्रिणी वयाने पाच-सहा वर्षं मोठ्या होत्या. या ओळींवर त्या आपापसात "इन जोक" असल्यासारख्या हसायच्या. मला कळायचं नाही की माजरा क्या हय? विचारलं तर खुसूखुसू हसायच्या. पुढे अनेक वर्षांनी उलगडा झाला.
-
हायस्कुलात असताना वर्गमैत्रिणींना पाळी यायला सुरुवात झाली होती. बहुदा पहिली पाळी पूर्वसूचना न देता येत असावी, किंवा आगोदरपासून तयारीत रहावं वगैरे शहाणपणा अद्याप यायचा असावा. अशा वेळेसाठी मुख्याध्यापिका बाईंच्या केबिनमधल्या एका कपाटात सॅनिटरी नॅपकिन्सचा साठा ठेवलेला असे. "पुरोहितकडे जाणे" हा त्यासाठी परवलीचा शब्द बनला होता. (पुरोहित म्हणजे मुख्याध्यापिका बै.)
-
मुलींचं "सिस्टरहूड" बनायला पाळी येणे हा मैलाचा दगड ठरत असावा. तोपर्यंत आम्हां पोरांबरोबर आमच्यासारखेच खेळ खेळणार्या मुली अचानक आपल्या-आपल्यात घोळका करून रहायला लागल्या. कुजबुज वाढली. आम्हां पोरांसाठी हा अचानक बदल गोंधळवून टाकणारा होता.
-
"खेळायला येणार नाही, पाळी आली आहे" असं थेट (या शब्दांत) सांगणारी एकच मैत्रीण होती. आणि आम्हाला वैताग यायचा, कारण ती उत्कृष्ट बॅट्सवुमन (?) आणि फील्डर होती. तिच्याकडे इतका ओपननेस कुठून आला देव जाणे - त्यांचं कुटुंब काही "प्रागतिक/मोकळं" वगैरे नव्हतं. (पुढे ती कॉलेजकडून आणि महाराष्ट्र संघाकडून खेळली. तेव्हा काय करायची विचारायला हवं.)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
शंका
ह्या विशेष दिवसात अशक्तपणा येतो वगैरे ऐकले आहे.
मग स्त्रियांचे फुटबॉल , क्रिकेट, कबड्डी हे सामने नेमके कसे होतात ?
"विशेष दिवस असल्याने" कोणी ना कोणी खेळाडू बाहेर राहणार असे व्हायलाच हवे.
नेमके टीम म्यानेजमेंट कसे होते खेळाडू स्त्रियांचे ?
किंवा पूर्वी मध्ययुगापर्यंत स्त्रिया लढाईवर वगैरे जात. मोठ्या मोहिमात भाग घेत.
विशेष सुविधा नसताना त्यांना हे सगळे सहज कसे जमे ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सर्वच स्त्रियांना असह्य त्रास
सर्वच स्त्रियांना असह्य त्रास होतोच असे नाही. ज्यांना होतो त्या अर्थातच अशा स्पर्धांमध्य नसतात. काही वेळा हा अशक्तपणा मुळातल्याच कुपोषण, अॅनिमिया इ शी निगडित असतो. भारतात त्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप आहे. या गटात मोडणार्या मुली स्पर्धात्मक खेळांच्या संघात असण्याचे प्रमाण कमी असते. एक तर तसेच खेळतात किंवा गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलतात.
गोडसेभटजींच्या 'माझा प्रवास' पुस्तकात झाशीच्या लढवैया राणीबद्दल उल्लेख आहे: फौजेसकट झाशी सोडून पळून जाताना मधेच ह्या विटाळ- चांडाळाच्या प्रथेनुसार अमूल्य वेळ फुकट घलवून तीन दिवसांचा ब्रेक घ्यावा लागल्याचा उल्लेख आहे.
मध्ययुगात काय करत कोण जाणे.
मनोबाचीच शंका मलाही आली होती.
मनोबाचीच शंका मलाही आली होती. माहितीकरिता धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आम्हां पोरांसाठी हा अचानक बदल
आम्हां पोरांसाठी हा अचानक बदल गोंधळवून टाकणारा होता.
आम्हाला असा थेट अनुभव नसला तरी पौगंडात पोरींच्या पाळीसंबंधी काही नॉनवेज जोक्स व्ह्यायचे. निरामय कामजीवन हे विठ्ठल प्रभुंचे पुस्तक इयत्ता सातवीत हातात पडल्याने नंतर पाळीसंबंधी एकप्रकारचा तट्स्थपणा आल्याने अश्या विनोदांत काही मला फारसा रस उरला नाही.
तुमच्या प्रतिसादावरुन मात्र एकदम Only Yesterday या चित्रपटातल्या प्रसंगांची आठवण झाली.
त्या मध्ये मुलींची चेष्टा करण्याचा जो मुलांचा मोकळेपणा आहे तो काही वेळाने आपल्या शाळांमध्ये दिसेल असे वाटते.
पाळी -प्रश्नोत्तरे
दोन प्रश्न
१. उत्क्रांतीमधे स्त्रीयाच मागे का राहिल्या असाव्यात? इतर प्राण्यांच्या माद्यांना पाळी का येत नाही? याला तुरळक अपवाद आहेत का?
२. जेव्हा वस्त्रांचा (अगदी चामड्यांचा वापर करायचा देखिल) शोध लागला नव्हता तेव्हा हे दिवस स्त्रीयांनी कसे मॅनेज केले असतील?
मेघनास उत्तरे -
५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?
आमचे घर यांनी मला दोन गोष्टी उद्बोधतात - १. सध्याचे लहान शहरी घर २. जुने लहानपणीचे ग्रामीण घर. मी दोहोंची उत्तरे दिली आहेत.
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
--- लहानपणी स्त्रीयांना न शिवता बाहेर बसवणारे पाहुणेलोक खूपच मोकळेपणाने पाळीबद्दल (म्हणजे एखादीला शिवायचे आहे कि नाही हे) बोलायचे. जवळजवळ ती पाळी जगजाहीर, जगदृश्य असायची. मामींना पाळी असेल तर आणि संदर्भ असेल तर कोणीही कुठेही पाळी शब्दाचा उल्लेख करायचा असे आठवते. पाळी शब्द उच्चारताना जवळच्या पाहुण्यांत संकोच असल्याचे पाहिले नाही. तेव्हा माझ्या दृष्टीने याचे कारण पाळी म्हणजे "न शिवणे" इतकाच साधा लावला जायचा हे असावे. पण हे लहान मुलाच्या नजरेने झाले. मोठ्यांना अर्थातच नीट कारण माहीत असणारच. त्यांच्यात का संकोच नव्हता हे मी सांगू शकणार नाही.
घरी सध्याला त्या मानाने दबकी पद्धत आहे असे म्हणू शकतो. कारण संडासला जाणे ऐवजी बाथरूमला जाणे ऐवजी फ्रेश होणे म्हणणे ही आजची फॅशन आहे. हा दबकेपणा लाज आहे कि शिष्टाचार कि अजून काही ते सांगता येणार नाही. शिवाय (लहानपणीच्या सवयीने) मी कोणा अन्य स्त्रीच्या पाळीचा दबका उल्लेख केल्यासही बायकोला ते मुळीच आवडत नाही. तो उल्लेख technical च हवा.
२. केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणण्याचा तुम्हांला संकोच वाटतो का? का?
मला असे बरेच संकोच वाटतात. उदाहरणार्थ शिंप्याकडे थांबलो आणि सहजच त्याचे कपडे चाळत असलो तर बरेच शर्टस, पँटस मी आरामात चाळेन. पण तिथेच बाजूला ब्राज, पँटीज पडलेले असतील तर कुतुहल म्हणून उचलून पाहू लागणार नाही. मला प्रचंड संकोच वाटेल. अगदी कंडोम विकत घेताना मला संकोच वाटतो. वायगरा वैगेरे या वयात घेत नाहीत. पण त्याची नुसती चौकशी करायचाही संकोच वाटतो. माझ्या मते अश्या आयटम भोवती एक संकोचाचे वलय असते. काही लोकांना ते पार करणे कठीण पडते. मी एकदा पॅडस आणली, ती चुकीची आणली. त्यानंतर आणली नाहीत.
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत असल्यास पाळीच्या दिवसांत तिकडे न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? का?
---------पाळी साधं जीवशास्त्र आहे आणि अशा परंपरा तिच्याशी निगडित असू नयेत. दुर्दैवानं लहानपणी पाळी फार कडकपणे पाळली जायची. कदाचित म्हणून त्या शिवाशिवीची मला तिडिक बसली. शिवाय आमचे न्यूक्लिअर कुटूंब असल्याने आमचे (मुलांचे) चार दिवस प्रचंड हाल व्हायचे. ब्राह्मणांत हा प्रकार जास्त होता. त्यामानाने लिंगायत लोक, जे आमचे अधिकतर शेजारी होते, ते जास्त प्रगत होते. बस्वेश्वरांनी मुद्दाम पाळीच्या काळात स्त्रीयांनी पूजा करावी असे त्यांच्या ग्रंथात लिहून टाकले. शिवाशिव मानू नये. इ इ . ब्राह्मणांतला असला कर्मठपणा (वा मूर्खपणा) पाहून आंतरजातीय लग्न करावे हा माझा विचार प्रबल झाला होता.
आताच्या घरीदेखिल पाळीच्या काळात मंदीरात जाणे आणि देव्हार्यास स्पर्श करणे वर्ज्य आहे. अर्थातच प्रबोधन करणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे, तितके आवश्यक नाही आणि शिवाय त्याने गृहकलह वाढतो. एक दिवस मला तुळशीला पाणी द्यावे लागते. नैवेद्याचे फळ/अन्न देव्हार्यातून काढावे लागते. महिन्यातून ही दोन कामे करावी लागतात. शिवाय घरात बायकोकडच्या माहेरची संस्कृती असेल असा अप्रत्यक्ष करार आहे, त्यामुळे मी एका मर्यादेबाहेर हस्तक्षेप करत नाही.
४. घरातल्या मुलीची पाळी सर्वप्रथम आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
--------नाही. पण लिंगायत लोकांत आहे. ब्राह्मणांत नाही म्हणून त्यांना खुंदक द्यायला बस्वेश्वरांनी काढली आहे असे उडत उडत ऐकले आहे.
या निमित्ताने अपरिचित, अल्पपरिचित आणि फॉर्मली रिलेटेड पण परिचित अशा स्त्रीयांशी पाळी तर जाउच द्या पण काहीही 'असलं' पुरुषांनी बोलू नये असं मी म्हणेन. अगदी आपला उद्देश तांत्रिक चर्चा करण्याचा असेल तरी. कोणत्या वाक्यावर समोरची स्त्री दुखावेल ते काहीच सांगता येत नाही. ते अशी चर्चा न करण्याचे पुरेसे कारण असावे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
"ईट का जवाब पत्थर से"
दर महिन्याला पाळी येते म्हणून मानव जमातीमधल्या स्त्रिया अनुत्क्रांत किंवा कमी उत्क्रांत हा विचार विनोदी वाटला. तशी बरीच "बॅड डिझाईन्स" आहेत. पण हे बॅड डिझाईन असल्याचा दावा पुरुष आयडीने करावा हे आणखी विनोदी आहे.
इतर सस्तन प्राण्यांमधे माद्यांना मासिक पाळी येत नाही. त्या वर्षातून ठराविक वेळांनाच माजावर येतात, आणि तेवढ्याच काळात संभोग करतात. (गर्भाशयात गर्भ चिकटण्यासाठी, त्याच्या पोषणासाठी, आत तयार झालेलं आवरण गर्भ तयार झाल्यामुळे वापरलं जातं, ते पडून जात नाही म्हणून पाळी येत नाही.) बहुतांश प्रजातींमधे माद्याही पुरेशा (नरांइतक्या नसल्या तरीही) शक्तिवान असतात की त्यांच्याशी बळेच संभोग, बलात्कार करता येत नाही. त्यामुळे सतत संभोगासाठी तयार असणाऱ्या नरांची पंचाईत होते. त्यांना आपली कामभावना मर्यादित ठेवावी लागते.
इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे माणसांतही स्त्रियांची सरासरी कामभावना, पुरुषांपेक्षा कमी असते. पण स्त्रियांना मासिक पाळी येते, आणि त्या माजावर वगैरे येत नाही. वर्षभर, कोणत्याही दिवशी मानवी स्त्रिया संभोगासाठी तयार असू शकतात. (ही भावना महिनाभरात कमी-जास्त होते, वयानुसार कमी होते इ.) माणसांमधे संभोग हा फक्त पुनरुत्पादनापुरता मर्यादित न राहता, निव्वळ आनंदासाठीही केला जातो. हे करता येतं, मानवी स्त्रियांची कामभावना इतर सस्तन माद्यांपेक्षा जास्त असते, वर्षभर जागृत असते, याचं कारण उपरोल्लेखित 'बॅड डिझाईन'.
पण आता "ईट का जवाब पत्थर से" देण्याची जबाबदारी आल्यामुळे लिहून टाकते. पुरुषांमधे फक्त Y हे गुणसूत्र स्त्रियांपेक्षा निराळं असतं. आणि ते आकाराने फारच लहान असतं. ते कदाचित आणखी लहान झालं असतं, पण मधेच कधीतरी (काही लाख वर्षांपूर्वी वगैरे असेल, ते तपशील आता विसरले) X गुणसूत्रातला छोटा भाग त्याला 'चुकून' चिकटला म्हणून एवढी लांबी तरी आहे. काही(!) काळानंतर माणसातलं Y गुणसूत्र नाहीसं होईल असंही काही शास्त्रज्ञांना वाटतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अभिनिवेश कशासाठी?
ईट का जवाब पत्थर से, प्रश्नाला दावा म्हणणे या गोष्टी इथे आणण्याची काही गरज नाही.
प्रश्न कळला नाही हा अजून मोठा विनोद आहे. पण असो. ज्या मानवेतर सस्तन मादीचे मेटींगच होत नाही तिला तरी किमान पिरियड यायला हवा. तो येत नाही. म्हणून ते बॅड डिजाईन आणि वर्षभर केव्हाही आनंदचा लो़जिक इथे कामाचं नाही. समजा मांजरीची सायकल ६ महिनेची आहे आणि त्या काळात तिचे मेटींग झाले नाही तरीही तिला पिरियड येत नाही. तिला कधीच पिरियड येत नाही, पुनरोत्पादनक्षम मांजरी असेल आणि आयुष्यभर मेट झाली नसेल तर एकही पिरियड येत नाही. स्त्रीयांचे असे होत नाही. हा प्रश्न आहे. अगेन, हा प्रश्न आहे, अशी मला पक्की माहिती आहे असे नाही. पक्व , न वापरलेले अंडे त्यागायचे, इ काम सर्व माद्यांत समान प्रकारे व्हायला पाहिजे असा प्राथ्मिक अंदाज असताना स्त्रीयांवर अन्याय का?
आणि य गुणसूत्रांवर शास्त्रज्ञांनी खाल्लेल्या कोलांट्या उड्या आणि इतर जिमनास्टिक्स पाहून (हसून हसून) सारीच गुणसूत्रे वितळून जातील. शिवाय ते गुणसूत्र लहान , इ प्रकार फार चिप वाटतो. स्त्रीयांचा मेंदू लहान असतो, म्हणून काय त्या कमी हुशार असतात का? अगोदरच्या अजस्त्र संगणकापेक्षा आताच्या छोट्या चिपा प्रचंड क्षम आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ज्या मानवेतर सस्तन मादीचे
पाळी येण्यासाठी फक्त संभोग आणि बीजांड-स्पर्म (मराठी?) यांचं मीलन होणं एवढंच गरजेचं नाही. हे झालं नाही तर, आता गर्भाशयाच्या आतले स्तर निरुपयोगी आहेत, ते टाकून दिले जावेत अशा प्रकारचा संदेश देणारा अंतस्राव (hormone) तयार झाला पाहिजे. तो होईपर्यंत पाळी येत नाही. मानवी स्त्रियांमधेही बीजांडं तयार झाल्यापासून पुढचे 2-3 दिवसच गर्भ तयार होऊ शकतो. पण त्यापुढे पाळी यायला साधारण 10-12 दिवस लागतात.
इतर प्राण्यांमधे पाळी येतच नाही असं मला ठामपणे माहित नाही. इतर सस्तन प्राण्यांमधे, माजावर आलेल्या मादीने संभोग केला नाही तर पुढे काय होतं याची मला अजिबात कल्पना नाही. त्यामुळे त्याबद्दल काही विधान करणार नाही.
पाळी येणं याला अन्याय का समजावा हे समजले नाही. उलट पुनरुत्पादन क्षमता शाबूत असेपर्यंत स्त्रियांना हृदयरोग, कर्करोग वगैरे अनेक व्यथांपासून नैसर्गिक संरक्षण असतं. त्याचा जो काही त्रास होतो तो मनुष्यजात संशोधन करून, पेनकिलर्स तयार करून, सॅनिटरी पॅड्स आणि ते बदलण्यासाठी स्त्रियांसाठी खासगी जागा तयार करून त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
"ईट का जवाब पत्थर से" हा विनोद होता. पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार केले की सध्याच्या पुरुषांवर आणि आपल्या नात्यागोत्यातल्या लोकांवरच प्रहार केले असं निष्कारण स्वतःवर ओढवून घेणारे लोक दिसतात तशातलीच गत. गुणसूत्र लहान असण्याचा माणसाच्या गुणावगुणांशी काहीही संबंध नाही. तसंच पाळी येते का येत नाही यातून कोणीतरी कमी किंवा अधिक उत्क्रांत झालंय असं म्हणता येत नाही इतपतच मर्यादित तर्क होता. (त्यात बहुदा "अजोमोड सुरू" असं मुद्दाम, वेगळं न लिहील्यामुळे गोंधळ झाला असावा. :प)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
राग!
ज्या मानवेतर सस्तन मादीचे मेटींगच होत नाही तिला तरी किमान पिरियड यायला हवा. तो येत नाही.
<<
तुमचा नीच भाषेत धिक्कार करू का? देवाशपथ. अहो महोदय, आपल्याला कळत नाही, माहीती नाही, तर मान्य करावे तसे. देवाने तुम्हाला इतर काही दिले नसेल तर गूगल तरी दिलेय ना?
बहुतेक प्राणी/पक्षी/मासे/अगदी झाडे देखिल. वर्षातून एकदा=दोनदा सीझनली माजावर येतात. त्याची कारणे उत्क्रांती शास्त्रात लिहिलेली आहेत. जर सस्तन प्राण्यांची मादी, जिला गर्भाशय आहे, ती 'फळली' नाही तर तिला पाळी येते. घरात एक कुत्री पाळा, भादव्यात किंवा वर्षभरच, बांधून ठेवा अन बघा, तिला पाळी येते की नाही ते. यडपट स्टेटमेंट्स करीत जाऊ नका.
*
१. उत्क्रांतीमधे स्त्रीयाच मागे का राहिल्या असाव्यात? इतर प्राण्यांच्या माद्यांना पाळी का येत नाही? याला तुरळक अपवाद आहेत का?
२. जेव्हा वस्त्रांचा (अगदी चामड्यांचा वापर करायचा देखिल) शोध लागला नव्हता तेव्हा हे दिवस स्त्रीयांनी कसे मॅनेज केले असतील?
<<
हास्यास्पद.
http://answers.yahoo.com/question/index?qid=20080525072901AAy75OO
http://en.wikipedia.org/wiki/Menstruation_%28mammal%29
आकलनाचाच नाही, तर गूगलायचाही दुष्काळ आहे इथे.
ही, मांजर --> http://pets.thenest.com/female-cats-menstruate-8374.html
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
यांना माझ्याकडून मार्मिक द्या
यांना माझ्याकडून मार्मिक द्या हो कुणीतरी...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मार्मिक, माहितीपूर्ण रोचक आणि भडकाऊ
प्रतिसाद मा. मा. आणि रो आहे यात शंकाच नाही. त्या सर्व भागाशी सहमत.
पण खालील भाग अनावश्यक आणि वैयक्तिक वाटला.
वरील भाग वगळून हाच प्रतिसाद आला असता तरीही आपल्याला काय म्हणायचे आहे, कुठला मुद्दा खोडायचा आहे हे स्पष्ट झालेच असते.
अरुणजोशी यांच्या बर्याच मतांशी मीही सहमत नाही. पण ते येथील सदस्य आहेत आणि त्यांना त्यांची मते, पश्न माडण्याचा हक्क असावा असे माझे मत आहे. विशेषतः त्यांनी कुठेही वैयक्तिक स्वरूपाची टिप्पणी केली नसताना नीच भाषेत धिक्कर, देवाने त्यांना काय दिले आहे आणि काय नाही इ असे उल्लेख अयोग्य वाटले.
+१
डागदरसाहेब, जरा थंड घ्या!
-कुलोत्तम सर्वद्वेष्टे
-Nile
व्यक्तिगत टिप्पणी, तिची
व्यक्तिगत टिप्पणी, तिची अनावश्यकता हा सगळा भाग मान्य आहे. पण "देवाने गूगल दिलेलं आहे" हा नास्तिक विनोद, विशेषतः उत्क्रांतीचा विषय सुरू आहे, म्हणून आवडला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असे लिहिण्यापूर्वी किमान
असे लिहिण्यापूर्वी किमान गुगलून पाहायचे, किमान जो विषय चर्चेत आहे तो.
तुम्ही मला पहिल्या प्रतिसादाच्या पहिल्या उत्तरात जी माहीती दिली ती दर दिवसाआड टाईम्सच्या कोण्या ना कोण्या पुर्वणीत आलेली मूलभूत माहीती आहे. मी विचारलेला प्रश्न त्यापेक्षा वेगळा आहे हे देखिल तुम्हाला कळले नाही. प्रश्न आपणास कळला नाही असे मी स्पष्ट लिहूनही, स्वतः न गुगलून, आपण पून्हा गुगुल जोकास दाद देता म्हणजे ऐसीचे भाग्यच.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ऐसीचं भाग्य थोर आहे (असंच
ऐसीचं भाग्य थोर आहे (असंच म्हणायचं आहे ना? मला कळलंय की नाही नीट कुणास ठाऊक!) हे बाकी खरंच!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सर्व प्रतिसाद वाचले.
मला दोन शक्यता दिसताहेत.
१. जोशी मुद्दामहून (त्यांच्या एकंदरीत विचारसरणीला अनुसरून) खोचक शेरे मारतात. (यामुळे काहींचा 'इनडिरेक्टली' अपमान होऊ शकतो.)
:- समजा हे खरे आहे असे मानले तरी काय फरक पडतो? मुख्य म्हणजे चुकीच्या थेअरीजने/समजुतींनी मांडलेले मुद्दे अशा प्रकारे मांडल्याने विश्वासार्ह तर होत नाहीतच. (उलट, अशा प्रकारे मांडल्याने जोशींचे मुद्दे कमकुवत होत आहेत असेच त्यावरची प्रतिक्रीया पाहून दिसते, या विषयी जोशींनी जरूर विचार करावा.)
राहिला मुद्दा अपमानाचा, तर जोवर थेटपणे अपमान होत नाही, तोवर कोणालाही 'बेनिफिट ऑफ द डाऊट' द्यावा असे माझे मत आहे. (त्याच थाटात तुम्हीही प्रतिवाद करू शकताच की.)
२. जोशींची वादाची पद्धतच तशी आहे.
:- तरी यामुळे जर कोणाला जोशींशी वाद घालणे व्यर्थ आहे असे वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या* प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे.
*अगदीच एखादा प्रतिसाद चीड येणारा वाटला तर त्याचा प्रतिवाद करावा. पण तसाच प्रतिवाद कोणी आधीच केला असेल तर आपले ब्लड प्रेशर सांभाळावे.
-Nile
वैयक्तिक भाषेतली टिप्पणी
वैयक्तिक भाषेतली टिप्पणी अनावश्यक हे आपण एक वेळ मान्य करू. पण आपल्या तथाकथित निरागस कुतूहलजन्य प्रश्नांतून आणि काही भाषिक मर्यादांतून अरुणजोशी काही जणांना अवमानकारक वाटतील अशी विधानं सर्रास करत असतात, हे मी एकाहून जास्त वेळा अनुभवलेलं आहे. हे इथे काहीसं अवांतर होईल, तरीही नोंदते आहे. समलिंगी लोकांना 'स्टुपिड', 'व्यंगात्मक' असं संबोधणं, स्त्रिया कमी उत्क्रांत असतात असा अर्थ सकृद्दर्शनी तरी निघेल अशी संदिग्ध विधानं करणं, इत्यादी. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे हे मान्यच, पण आपल्या बोलण्यामुळे लोकांचा कळतनकळत अपमान होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारीही त्या अधिकारासोबत येते, हे मान्य असावं.
एकतर्फी समजूतदारपणाची आणि भावना बाजूला ठेवून तर्कसुसंगत विचार करण्याची जबाबदारी सगळ्यांना सगळ्या वेळी पेलतेच असं नाही. हे मानवी आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
पण आपल्या तथाकथित निरागस
अगदी सहमत आहे. प्रश्नांतून जजमेंट डोकावत असतेच. ते सर्व नाकारणे रोचक वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काही जणांना अवमानकारक वाटतील
प्रतिवादाला अवमान समजणे अयोग्य आहे. मी एकदाही कोणाचाही अवमान केलेला नाही.
तुमच्या या विधानात प्रचंड विनोदमूल्य दडलेलं आहे. एक तर यात स्त्रीयांची तुलना पुरुषांशी नाही. ती अन्य माद्यांशी आहे. दुसरं कमी उत्क्रांत का तर " 'मनुष्यसदृष्य' पाळीचा त्रास"!!! हा एक सामाजिक मुद्दा आहे का जीवशास्त्रीय आहे ते माहित नाही. मुद्दा आहेच कि नाही ते माहित नाही. पण असली पाळी म्हणजे त्रास ही भावना सर्वसामान्य आहे. तिसरं सर्वात महान विनोदमूल्य म्हणजे कमी उत्क्रांती होणे यात फेमिनिझम आणणे. उत्क्रांती कमी होवो वा जास्त, त्यात आजच्या स्त्रीयांचा काय दोष? हे म्हणजे माकडा समोर थांबून त्याला चिडवणे 'माकडा माकडा तुझी कमी उत्क्रांती झाली आहे' या प्रमाणे आहे कि काय?
स्पष्टीकरण - जरी पाळी जैविक सत्य, आवश्यक, इ इ असली तरीही शेवटी पुरुषा आणि इतर माद्यांपेक्षा विशेष पद्धतीने त्रासदायकच (माझ्यातरी ऐकण्या पाहण्यात) अशी तिची प्रतिमा आहे, म्हणून मी कमी उत्क्रांती असा तांत्रिक शब्द वापरला आहे. इतर माद्या असा त्रास न घेता पुनरुत्पादन करू शकत असतील तर स्त्रीयांनाच असा त्रास का, म्हणून "कमी उत्क्रांती" असा शब्दप्रयोग केला आहे.
मी उभ्या आयुष्यात कोणाला मूर्ख मानल्याचे मला आठवत नाही. समलैंगिक माणूस मूर्ख असतो असे मी कधी लिहिले? "समलैंगिकता नैसर्गिक आहे असे मानणे" (हा विचार, कोणी माणूस नाही) मूर्खपणाचा आहे असे म्हटले असेल. भारताचे सर्वोच्च न्यायालय त्याला गुन्हेगारी मानते तर मी मूर्खपणाचे हा शब्द वापरणे ऑफेंसिव का ठरते? आणि तो व्यंगात्मक शब्द देखिल तसाच. हार्मोन बॅलेंन्स "सामान्य नाही" म्हणून व्यंग आहे, इलाज करावा असे मी म्हणतो, तो "इतर वेगळा सामान्य बॅलॅन्स" आहे असे आपण म्हणता. इथेही ऑफेन्स कुठे आला. मला तरी ही साधी मतभिन्नता वाटते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सहमत आहे
अजो अपमान करतात ह्या मेघनाच्या आशयाशी सहमत आहे.
अजो अपमान करत नाहित; ह्या अजोंच्या मताशीही सहमत आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बाकी मरो. मी मनोबाशी सहमत
बाकी मरो. मी मनोबाशी सहमत आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुम्ही उद्मेखून अपमान करत
तुम्ही उद्मेखून अपमान करत असाल असं नाही. पण तो अजाणता होऊ नये म्हणून पुरेशी काळजीही घेत नाही, असं माझं मत आहे. कुणाचा आणि कसा अपमान होतो हे तुम्हांला समजावून सांगण्याची प्रक्रिया बरीच वेळखाऊ, किचकट आणि कदाचित निष्फळही आहे, असं पूर्वानुभव सांगतो. त्यामुळे मी हा वाद पुढे नेणार नाही.
बाकी चालू द्या!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
कुणाचा आणि कसा अपमान होतो हे
या अर्थाची कितीतरी विधाने आपण पूर्वी केली आहेत. वास्तवतः हीच अवमानजन्य आहेत असे मी मानू शकतो. कदाचित आपणांसही ती अवमानजन्य म्हणूनच अभिप्रेत असावीत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
थकलो
@ अॅडमिन - आडकित्ता यांनी नीच भाषेत धिक्कार करायचा मानस जाहीर केला आहे. कृपया त्यांना संस्थळाची नियमावली सांगा. संस्थळाच्या नियमांत त्यांना मला नीच भाषेत बोलायचा अधिकार असेल तर कृपया मला कळवा. नीच भाषा वापरायची वा वापरायची धमकी द्यायची मुभा असेल तर (नसेलच, पण) या संस्थळावर मत मांडायची इच्छा नाही.
@इतर-
मी लिहिलेले प्रतिसाद लिहिण्यापूर्वी मला काय काय माहित होते -
१. एम सी सर्व (मॅमल) माद्यांत असते.
२. तिचे दोन प्रकार असतात. एक रक्ताचा स्राव होणारी आणि दुसरी अंतशोषण होणारी.
३. मनुष्यात रक्तस्राव होणारी पाळी येते.
४. चिंपाझीमधे येत असावी, इतर माकडांमधे येत असावी, पण निश्चित माहीत नाही.
५. इतर कोणत्या अशी रक्तस्राववाली एम सी, प्राण्यात येत नाही. हे निश्चित माहित आहे.
मला काय माहित नव्हते-
१. ओव्हर्ट एम सी असे ज्याला विकिपेडीयात म्हटले आहे ती वटवाघुळांत असते.
२. विकिपिडियात ज्याला variably expressed आणि weak एम सी म्हटले आहे ते काय आहे.
३. इतर माद्यांत अफलित ओव्हमच्या अंतःशोषणाचा मेकॅनिझम काय असतो. (आताही नीट कल्पना नाही.)
मला अजून काय काय माहित नव्हते -
१. काही ऐसीकरांना आणि आडकित्ता यांना "मनुष्यसदृष्य पाळी" आणि "एम सी इन अॅनिमल्स" या संज्ञा एकच वाटतील. मी जेव्हा पाळी स्त्रीयांनाच का येते म्हणालो तेव्हा मला पुनरुत्पादन करणारे अंडे बनण्याची सायकल माणसांतच का असते असे म्हणायचे नव्हते.
२. मी जेव्हा फक्त स्त्रीया म्हणालो तेव्हा मला "a large part animal kingdom" vis-a-vis "human beings" असे म्हणायचे होते. याला चूकूनमाकून एक म्हणजे एकही अपवाद नाहीच असे म्हणायचे नव्हते.
मी उत्क्रांती आणि अन्याय या संज्ञा का वापरल्या -
या विषयावरील माझ्या माहितीचे दोन स्रोत आहेत. सामान्य माणसाला जितके जीवशास्त्रीत ज्ञान असावे त्याकरिता केलेले वाचन आणि याची सामाजिक, इ अंगे समजून घेण्याकरता केलेले वाचन. पैकी दुसर्या प्रकारच्या वाचनात स्त्रीयांचा एक घोळका या विषयावर चर्चा करताना तक्रारवजा सुर अवलंबतात. यात एक तक्रार असते पुरुषांना असली अडचण का नाही. दुसरी असते इतर माद्यांना का नाही.( इतर माद्यांना अंतशोषणाने कमी त्रास होतो हे त्यांना अध्याहृत असावे. )त्यात दोन प्रकारच्या स्त्रीया असतात. धार्मिक आणि वैज्ञानिक. धार्मिक म्हणतात कि देवाने आमच्यावरच अन्याय का केला? वै़ज्ञानिक म्हणतात कि आमचीच उत्क्रांती अशी का झाली. अर्थातच हे लेखन/वाचन जे काय होते ते गंमत जास्त आणि शास्त्र कमी प्रकारचे होते. Assuming that MC has a good amount of nuisance value as biological process in social life of ontemporary women, especially in comparison with females of other species of animal kingdom,...माणूस आपापल्या विचारधारेनुसार वाक्यरचना करतो हे खरे आहेच, पण अगदी त्याचा वकिली अर्थ लावून मूळ मुद्दा टाळू नये.
अगेन -
Let me reiterate, माझ्या पहिल्या प्रतिसादाच्या आरंभी विचारलेला पहिला प्रश्न उत्तरायचा उरतो. मनुष्यांतच अशी उत्क्रांती का झाली असावी असे म्हणा वाटले तर, कारण कमी उत्क्रांती झाली आहे असे म्हटले तर लोक दुखावतात म्हणून तशी वाक्यरचना टाळू. हा प्रश्न अवघड नाही, कोणीही सामान्य डॉक्टर याचे बर्यापैकी समाधानकारक उत्तर देऊ शकेल. तुम्ही म्हणाल, अजो फारच खेचून धरतात. असे नाही. आडकित्ता यांनी दिलेल्या लिंक्स माझ्या या प्रतिसादाच्या संदर्भात पून्हा वाचून पाहा. आणि अरे हो, मी मांजरीच्या पाळीबद्दल बोललो आणि आडकित्तांनी लिंक दिली. त्यात काय लिहिले आहे ते इथे पेस्टवणे गरजेचे आहे.
Vaginal Bleeding
If you happen to notice any bleeding in your cat during heat, however, notify your veterinarian about it. Bloody vaginal discharge is associated with a variety of different health conditions -- and even may be a sign of miscarriage in a pregnant cat. If you think that your pet is menstruating just like a human, she may actually just be miscarrying a litter of kittens, so take her to the vet immediately.
@आडकित्ता - तांत्रिक चर्चा डिसपॅशनेटली कराव्यात अशी विनंती. आपण डॉक्टर आहात तेव्हा आपले ज्ञान माझ्यापेक्षा जास्त असणारच. पण माझ्या प्रश्नांत जे मी लिहिले नाही ते शोधून भडक भाषा लिहिण्यात अर्थ नाही. ओवर्ट पाळी आणि अंतःशोषण याचे फायदे तोटे काय आहेत या रोचक प्रश्नाचे रोचक उत्तर द्याल अशी अजूनही अपेक्षा आहे.
थकलो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
... वै़ज्ञानिक म्हणतात कि
अरे कर्मा! (बेशुद्ध होण्यापूर्वी शेवटची आरोळी) मेघनाऽऽऽऽ
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अहो, ज्या स्त्रीयांचा देवावर
अहो, ज्या स्त्रीयांचा देवावर विश्वास नाही, त्या अशी तक्रार कशी करणार? कोणाला करणार?
आणि देव न मानणारांनी उत्क्रांतीला दोष दिला असं त्या विडंबनाच्या लेखकाने लिहिले आहे, मी नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
देव न मानणाऱ्यांनी
देव न मानणाऱ्यांनी उत्क्रांतीला दोष दिला, हा विनोद आहे. तो उत्क्रांती म्हणजे काय, हे समजून उमजून केलेला विनोद आहे; हे त्या धागालेखकाच्या आधीच्या लेखनामुळे माहित आहे.
खरं सांगायचं तर, मी १२ वर्षांची असताना पाळी आणि त्यासंबंधीच्या गैरसोयी फक्त मलाच, भावाला नाहीत याबद्दल तक्रार करायचे. पण नंतर मी मोठी झाले.
देव मानणाऱ्या स्त्रियांचेही प्रतिसाद इथे आहेत, त्यांनीही तक्रार न करता वस्तुस्थिती स्वीकारलेली दिसते आहे. (सगळ्या) देव न मानणाऱ्या स्त्रिया या गोष्टीबाबत तक्रारच करतात आणि कोणालातरी दोष देतातच हे गृहितक (पुन्हा एकदा) विनोदी आहे. ज्यांना उत्क्रांती म्हणजे काय, ती कशी झाली हे नीट समजतं ते लोक, जे आहे त्याबद्दल तक्रारी करत नाहीत. तक्रार करणं निष्फळ आहे हे आधीच्या आकलनातून समजतं. म्हणून आधीच्या प्रतिसादात, पाळी सुरू असेपर्यंत, विवक्षित संप्रेरकांमुळे कर्करोग, हृदरोग होण्याचं प्रमाण खूप कमी होतं हे लिहीलेलं आहे. शिवाय आता तंत्रज्ञान वापरून अडचणी, त्रास कमी करता येतात याचा उल्लेख आहे. माझ्या पहिल्या प्रतिसादातही "फार रक्त जात असेल तर गर्भनिरोधक गोळ्या वापरण्याचा विचार करा" असं वाक्य आहे. हे तंत्रज्ञानाचा वापर करून माणसाचं आयुष्य सुखकर करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे.
तरीही सगळ्यात खोड्याच शोधणाऱ्या निराशावादी लोकांचं समाधान कधीच होणार नाही. पण निदान उत्क्रांती म्हणजे काय हे खरोखर समजलं असेल तर कोणीही उत्क्रांतीला दोष देणार नाही. बाकीच्या कच्च्या मडक्यांबद्दल काय बोलायचं?
<अजोमोड ऑन> तुमच्या घरातल्या स्त्रिया तक्रार करतात का?<अजोमोड ऑफ> करत असतील तर त्याचं सरसकटीकरण सगळ्यांवर लादू नका. करत नसतील तर तो तुमच्या मनाचा खेळ असण्याची शक्यता जास्त आहे. धाग्यावरचे प्रतिसाद वाचा; कोणीही तक्रार करत नाहीये, अगदी "फार दुखतं, त्रास होतो" असे प्रतिसाद आहेत ते वस्तुस्थितीचं वर्णन करणारे आहेत. त्यात "आम्हालाच का, पुरुषांना का नाही किंवा इतर सस्तन माद्यांना का नाही" असं कोणीही म्हणत नाहीयेत.
पुरेसे पैसे असणाऱ्या, यापुढे मुलं नकोत असं म्हणणाऱ्या बहुतांश स्त्रियासुद्धा पाळीची कटकट टाळण्यासाठी गर्भाशय काढून घेण्याची शस्त्रक्रिया घाऊक प्रमाणात करत नाहीत. बहुतांश स्त्रियांना पाळी येण्याबद्दल किती तक्रार आहे (खरंतर नाही) हे अशा प्रकारच्या आकडेवारीवरून सहज समजतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वरचा अख्खा प्रतिसाद अरे
अरे कर्मा! (बेशुद्ध होण्यापूर्वी शेवटची आरोळी), कोणाचे नाव घेऊ? इथे मला आरोळी मारायला देखिल कोणी नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सहमत आहे. अरूण जोशींचा
सहमत आहे. अरूण जोशींचा प्रश्न कंप्लीट ट्विस्ट करून उत्तरं दिली जात आहेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हे वाचून सुखावलो.
हे वाचून सुखावलो. धन्यवाद.
बहुधा काही लोक मी काय लिहितो ते नीट वाचत नसावेत. वाचले तर एका स्ट्राँग बायसच्या लाईटमधे काहीच्या काही अर्थ काढत असावेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नीट काय ते ठरवा हं. तुमची एकच
नीट काय ते ठरवा हं. तुमची एकच प्रतिक्रिया मला कळली आणि कळली नाही असं दोन्ही म्हणणारे तुमचेच प्रतिसाद, याच धाग्यावर आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लॉस्ट इन ट्रान्सलेशन
प्रतिसाद आणि त्याचे रुढ अर्थाने होणारे ट्रान्सलेशन ह्यात फरक असल्याने हे घडते असा अनुभव आहे.
उत्क्रांतीचा संबंध त्रासाशी आहे ह्यावर काही संदर्भ उपलब्ध आहे काय? नसल्यास 'कमी उत्क्रांत' ह्या शब्दरचनेचा 'रुढ'(रुड?) अर्थ मनुष्यापेक्षा 'कमी दर्जाचे' असे होणार नाही काय? व तसे ट्रान्सलेशन तुमच्या प्रतिसादाचे होत असल्यास चांगले वाटणे अपेक्षित आहे काय?
दृष्टीकोन
उत्क्रांतीचा संबंध त्रासाशी आहे का हा प्रश्न ठीक आहे. किंवा कमी उत्क्रांत प्राण्यांमध्ये अंडी घातली जातात त्यामुळे त्या माद्यांना मूल जन्माला घालण्याइतक्या वेदना होत नसतील म्हणून पाळीचा/बाळंतपणाचा त्रास न होणे हे उलट कमी उत्क्रांतीचे द्योतक आहे असा युक्तिवाद करता येऊ शकतो. त्या प्रकारच्या युक्तिवादास अरूण जोशी ओपन असतील बहुधा.
पण अरूण जोशींनी दोन प्रश्न मांडले.
१. उत्क्रांतीमधे स्त्रीयाच मागे का राहिल्या असाव्यात? इतर प्राण्यांच्या माद्यांना पाळी का येत नाही? याला तुरळक अपवाद आहेत का?
२. जेव्हा वस्त्रांचा (अगदी चामड्यांचा वापर करायचा देखिल) शोध लागला नव्हता तेव्हा हे दिवस स्त्रीयांनी कसे मॅनेज केले असतील?
हे प्रश्न ज्या प्रतिसादात मांडले त्याच प्रतिसादात मूळ धाग्यावरच्या सर्व्हेसदृश प्रश्नांना जेन्युइन उत्तरे दिली.
(इतर प्राण्यांच्या माद्यांच्या संदर्भात लिहिले) असूनही स्त्रिया मागे राहिल्या या प्रश्नाला 'पुरुषापेक्षा मागे' असं ट्विस्ट करून त्या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरात अकारण वाय गुणसूत्रं कशी लहानशी असतात आणि ती कालौघात नष्ट होऊन पुरुषच कसे नष्ट होतील वगैरे अनावश्यक मजकूर लिहिला गेला.
दुसर्या प्रश्नाचा अर्थ "जुन्या बायकांनी मॅनेज केलं ना? आजच्या बायका का उगाच तक्रार करतायत?" असा पूर्वग्रहदूषित घेतला गेला असावा.
निदान इथे तरी अरुण जोशींना पाठिंबा देणे गरजेचेच आहे.
One should keep prejudices out.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
Agreed, I support mr. Arun
Agreed, I support mr. Arun joshi in this case. Although it is a case of lost in translation.
दुसर्या प्रश्नाचा अर्थ
माझ्यापुरता तरी नाही. कारण आजही कोणी तक्रार करताना मला दिसत नाही, हे आधीच लिहीलेलं आहे. समजून घेण्याची अपेक्षा ठेवलेली दिसते, त्यात मला काही गैर वाटत नाही. इतर कोणाला वाटत असेल तर माहित नाही.
यातल्या 'अकारण' या शब्दासाठी स्पष्टीकरण आधीच दिलेलं आहे, तो विनोद होता. दुहेरी अवतरणांमधे "ईट का जवाब पत्थर से" लिहीण्यामागे नेहेमीचा अर्थ घेऊ नये असा संकेत वापरला होता. त्याउप्पर आणखी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता वाटत नाही. पण त्या निमित्ताने नानावटींनी चांगला संदर्भ सुचवला त्याबद्दल त्यांचे आभार.
पुरुषच कसे नष्ट होतील वगैरे अनावश्यक मजकूर मी लिहीलेला नाही. सबब तो आरोप कोणावर केला आहे हे मला समजलं नाही.
आणि त्यातल्या प्रश्न क्र एकबद्दल काही माहिती, "ईट-पत्थर" विनोद करण्याआधीच्या परिच्छेदात आहे.
इतर सस्तन प्राण्यांमधे माद्यांना मासिक पाळी येत नाही. त्या वर्षातून ठराविक वेळांनाच माजावर येतात, आणि तेवढ्याच काळात संभोग करतात. (गर्भाशयात गर्भ चिकटण्यासाठी, त्याच्या पोषणासाठी, आत तयार झालेलं आवरण गर्भ तयार झाल्यामुळे वापरलं जातं, ते पडून जात नाही म्हणून पाळी येत नाही.) बहुतांश प्रजातींमधे माद्याही पुरेशा (नरांइतक्या नसल्या तरीही) शक्तिवान असतात की त्यांच्याशी बळेच संभोग, बलात्कार करता येत नाही. त्यामुळे सतत संभोगासाठी तयार असणाऱ्या नरांची पंचाईत होते. त्यांना आपली कामभावना मर्यादित ठेवावी लागते.
इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे माणसांतही स्त्रियांची सरासरी कामभावना, पुरुषांपेक्षा कमी असते. पण स्त्रियांना मासिक पाळी येते, आणि त्या माजावर वगैरे येत नाही. वर्षभर, कोणत्याही दिवशी मानवी स्त्रिया संभोगासाठी तयार असू शकतात. (ही भावना महिनाभरात कमी-जास्त होते, वयानुसार कमी होते इ.) माणसांमधे संभोग हा फक्त पुनरुत्पादनापुरता मर्यादित न राहता, निव्वळ आनंदासाठीही केला जातो. हे करता येतं, मानवी स्त्रियांची कामभावना इतर सस्तन माद्यांपेक्षा जास्त असते, वर्षभर जागृत असते, याचं कारण उपरोल्लेखित 'बॅड डिझाईन'.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ऊप्स
>>पुरुषच कसे नष्ट होतील वगैरे अनावश्यक मजकूर
वाय गुणसूत्रे नष्ट होतील वगैरे अनावश्यक मजकूर असे वाचावे.....
ईंट का जवाब पत्थरसे देण्याची जबाबदारी कोणी टाकली होती? अरुण जोशींनी तर असं सुचवलं नव्हतं. की स्त्रिया 'पुरुषांपेक्षा मागे' राहिल्या असा अर्थ घेतल्यामुळे जबाबदारी घ्यावीशी वाटली?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तो मुद्दाम, जाणूनबुजून ओढवून
तो मुद्दाम, जाणूनबुजून ओढवून घेतलेला आक्रस्ताळेपणा विनोदासाठीच केलेला होता. अवतरणाचं कारण तेच, आणि त्याचं स्पष्टीकरण पुढच्या प्रतिप्रतिसादातही लिहीलेलं आहे. "गुणसूत्राच्या लांबीवरून माणसाचे गुणावगुण ठरत नाहीत" या वाक्यासकट.
माझ्या मते, गुणसूत्राच्या लांबीवरून माणसाला जोखू नये, ही गोष्ट स्पष्ट आहे. जेव्हा तसं कोणी करतं ते विनोदी असतं. असा तिरकसपणा ठरवून केला तर तो हास्यास्पद ठरत नाही. असो तो विनोद केला तेव्हाच विनोदी होता, आता शिळा झाला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१
+१
+१
+१ टू थत्ते
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
@ अॅडमिन - आडकित्ता यांनी
@ अॅडमिन - आडकित्ता यांनी नीच भाषेत धिक्कार करायचा मानस जाहीर केला आहे. कृपया त्यांना संस्थळाची नियमावली सांगा. संस्थळाच्या नियमांत त्यांना मला नीच भाषेत बोलायचा अधिकार असेल तर कृपया मला कळवा. नीच भाषा वापरायची वा वापरायची धमकी द्यायची मुभा असेल तर (नसेलच, पण) या संस्थळावर मत मांडायची इच्छा नाही.
<<
अॅडमिन यांना नव्हे तर तुम्हाला विचारले आहे, अमुक करू का?
अर्थात, मी तुमची नम्रपणे परवानगी विचारलेली आहे. होय कि नाही?
*
@आडकित्ता - तांत्रिक चर्चा डिसपॅशनेटली कराव्यात अशी विनंती. आपण डॉक्टर आहात तेव्हा आपले ज्ञान माझ्यापेक्षा जास्त असणारच. पण माझ्या प्रश्नांत जे मी लिहिले नाही ते शोधून भडक भाषा लिहिण्यात अर्थ नाही. ओवर्ट पाळी आणि अंतःशोषण याचे फायदे तोटे काय आहेत या रोचक प्रश्नाचे रोचक उत्तर द्याल अशी अजूनही अपेक्षा आहे.
<<
अगदी अगदी.
तुम्ही जितक्या निरागसपणे गळ्यात स्टेथो अडकवला की सगळे समजते काय, असे विचारले होते, तितक्याच निरागसपणे वरील अधोरेखांकित वाक्यही लिहिलेले आहे यची माझी खात्री पटलेली आहे.
यापुढले प्रतिसाद डिस्प्याशनेटली करा असे आपण सांगता, पण माझ्या तोंडात भडक जीभ चुकून बसवली गेली आहे, हे माझे दुर्दैव मी मान्य करतो.
बाकी,
सदर चर्चा, 'काकस्पर्श, उर्फ बाजूला बसविल्या गेलेल्या स्त्रिया' यांबद्दल आहे.
यात, मानव नामक प्राण्याच्या माद्यांत झालेल्या योनीतील रक्तस्त्रावास 'विटाळ' समजून होणार्या सामाजिक प्रकारांबद्दल चर्चा अभिप्रेत वगैरे आहे. तुमचे आकलन वेगळे आहे याबद्दल संशय नव्हता व नाही.
जाता जाता, हे आठवले -->
रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळोन जाला गाळ।
त्या गाळाचेच केवळ, शरीर हे॥
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
या सुंदर चर्चेला दोन
या सुंदर चर्चेला दोन सदस्यांच्या आपापसातल्या गैरसमजामुळे गालबोट लागलं याचं वाईट वाटतं. चर्चा थोडी गरमागरम होणं ठीक असतं, मात्र काही वेळा आपण रेषा ओलांडत तर नाही ना, याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी.
हे वाक्य माझ्या मते रेषेच्या आतबाहेर आहे. ऐसीच्या धोरणांत सांसदीय भाषा वापरावी असं लिहिलेलं आहे. अर्थातच या प्रश्नात नीच भाषा वापरण्याची नुसती धमकीच आहे, आणि प्रत्यक्षात नीच भाषा नाही. पण कृपया कितीही राग आला तरी इतरांविषयी नीच भाषा वापरू नये. सांसदीय भाषा म्हणजे निव्वळ अमुकतमुक शब्दांचा वापर टाळणं नव्हे. ज्या व्यक्तीशी संवाद साधतो तिचा एक विशिष्ट मान राखणं हेही त्यात अंतर्भूत असतं.
डॉक्टरसाहेबांकडे ज्ञानाचं भांडार आहे, आणि अरुणजोशींना ज्ञानपिपासा आहे. त्यांचाही मर्यादित का होईना, पण अभ्यास आहे. फारच थोड्या लोकांचा एखाद्या विषयात परिपूर्ण अभ्यास असतो. त्यामुळे ज्यांचा अभ्यास आहे त्यांना त्यांचे प्रश्न अनेकवेळा 'इल फॉर्म्ड' वाटतात. ते समजले नाही म्हणून कधीकधी 'इतके साधे आणि चुकीची गृहितकं असलेले प्रश्न का विचारले जातात?' अशी चिडचीड होते खरी. पण ज्यातून दोघांचंही भलं होईल, आणि इतर सदस्यांनाही ज्ञान मिळेल अशा स्वरूपात चर्चा व्हावी.
हे आले
जरा कुठे काही खमंग मसाला बनू लागला की तडका द्यायच्या ऐवजी पाणी ओतणारे हे आले.
अरे काठावर बसून मजा पहा की.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
Y गुणसूत्राचे भविष्य
पण आता "ईट का जवाब पत्थर से" देण्याची जबाबदारी आल्यामुळे लिहून टाकते. पुरुषांमधे फक्त Y हे गुणसूत्र स्त्रियांपेक्षा निराळं असतं. आणि ते आकाराने फारच लहान असतं. ते कदाचित आणखी लहान झालं असतं, पण मधेच कधीतरी (काही लाख वर्षांपूर्वी वगैरे असेल, ते तपशील आता विसरले) X गुणसूत्रातला छोटा भाग त्याला 'चुकून' चिकटला म्हणून एवढी लांबी तरी आहे. काही(!) काळानंतर माणसातलं Y गुणसूत्र नाहीसं होईल असंही काही शास्त्रज्ञांना वाटतं. <<
यासंबंधीचे एक वाचनीय पुस्तक!
मॅमल्स
ज्या प्राण्याच्या पोटात मुल वाढत नाही त्यांना पाळी का येत नाही हे स्वयंस्पष्ट आहे. मनुष्याच्या 'जैव-जवळच्या' (चुलत, मावस) प्राण्यांना पाळी येते.
-Nile
आयटी क्राऊड
आयटी क्राऊड या मालिकेच्या एका भागात पुरुषांना पाळी येण्याचा प्रसंग आल्यास काय होईल याबाबतचा छान भाग आहे.
http://theitcrowd.wikia.com/wiki/Aunt_Irma_Visits
उत्तरं
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
अशी पद्धत मी लहान असतांना होती. माझी बायको "माझे पिरियड्स" असं म्हणते. पाळी शब्द आवडत नाही किंवा तो म्हणण्याची पद्धत नाही. बहुदा "परसाकडेला जातो" किंवा "संडासला जातो" असं म्हणण्याची पद्धत जशी कमीकमी होत गेली तसंच हे असावं.
सर्वसाधारणपणे बोलायचं तर व्यक्तिगत स्वच्छतेच्या संदर्भात इंग्रजी भाषेचा प्रयोग हा बहुदा सबकॉन्शसली होत असावा; कारण या संदर्भात प्रादेशिक भाषेशी असलेली असोसिएशन्स ही गैरसोयीशी, कुंचबणेशी, धर्मिकतेच्या पगड्याशी निगडित असणारी आहेत. "परसाकडेस जाणें" यामधे उघडउघड (Pun unintended) कुचंबणा आहे. "बाथरूममधे जायचं आहे" यामधे स्वच्छतेबरोबर खाजगीपणाचं अधिष्ठानही आहे. इथे कदाचित इंग्रजी भाषेची गुलामगिरी किंवा देशी बांधव आणि संस्कृतीचा तिरस्कार (आणि नेमाडपंथीय लोक जे काय म्हणतील ते ) असं कुणी म्हणेल. तर मी "ठीक आहे बुवा. असेल तसं. " इतपत म्हणेन
"पाळी" या शब्दामागच्या संकोचाचं एक कारण त्या शब्दाशी निगडित कुचंबणा हे असोसिएशन असू शकतं. कदाचित ते असोसिएशन पुरेसं अर्थपूर्ण नसावं. पण ही एक मोठी शक्यता आहे खरी.
२. केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणण्याचा तुम्हांला संकोच वाटतो का? का?
सुपरस्टोअरमधे जाऊन मी (अन्य पंधरा गोष्टींबरोबर) बायकोकरता सॅनिटरी नॅपकीन्स जाऊन आणले आहेत. त्या आईल्स मधे कधीकधी पुरुष जात असताना मी पहातो. पण मी पाश्चात्य देशांत रहातो ही एक अपवादभूत परिस्थिती इथे लागू होईल.
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत असल्यास पाळीच्या दिवसांत तिकडे न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? का?
घरात देवपूजा होत नाही. कुणाकडे गणपती किंवा पूजेच्या निमित्ताने आमंत्रण असलं आणि बायकोची पाळी असली तर काही न बोलता जाऊन येतो. देवासमोर आरत्या म्हणतो. प्रसाद खातो, गप्पा मारतो. परत येतो.
४. घरातल्या मुलीची पाळी सर्वप्रथम आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? कायाप
नॉट याप्लिकेबल्.
५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?
होय. एका पिढीपूर्वी घरातली कर्ती मंडळी धार्मिक होती. बायका नि पोरं निमूटपणे अन्याय सहन करीत होते. यापैकी सर्व बायका कमावत्या होत्या आणि तरी धार्मिक बाबतीतली कुचंबणा त्यांनी सहन केली. लहान मुलांचा काय प्रश्नच नाही. जितका पुरुष अधिक धार्मिक तितकी बायका मुलांची कुचंबणा अधिक. धर्म म्हणजे कुचंबणा हे समीकरण मनात अगदी लहानपणापासून पक्कं आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
तपशीलात रमतो तो सैतान?
सर्व प्रश्नांची उत्तरं 'नॉट अॅप्लिकेबल'. फक्त, तपशीलात एक दुरुस्ती सुचवेन. मी 'किळस' असा शब्द वापरला नव्हता, तर -
म्हणजे 'अनिच्छा' किंवा 'कंटाळा' म्हणता येईल, पण 'किळस' शब्दाची जबाबदारी मी उचलत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सैतान?
=))=))
या संदर्भात पाशवी म्हणावं.
या संदर्भात पाशवी म्हणावं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ओ हसतांव काय रुचीतै? तप
ओ हसतांव काय रुचीतै?
तप करूनही शीला नामक स्त्रीत रमणारा तो सैतान असे म्हणायचे आहे त्यांना. चुकलं काय त्यात?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुम्ही परराष्ट्रदूत म्हणून
तुम्ही परराष्ट्रदूत म्हणून किंवा राजकीय प्रवक्ता म्हणून काम का नाही हो करत? एकेका शब्दाबद्दल इऽतऽकं सावध असलेल्या माणसाचं खरं तिकडेच चीज व्हायचं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
When I use a word
त्यावरून आठवलं -
- Through the Looking-Glass, Lewis Carroll
आता, हे अजोंबद्दल घ्यायचं की चिंजंबद्दल की आणखी कुणाबद्दल ते आपलं आपण ठरवा मात्र
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
१. 'माझी पाळी चालू आहे' असं
मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादात आल्याप्रमाणे, इंग्लिश किंवा संकेतार्थी शब्द. पण सामान्य आयुष्यात फरक पडत नसेल तर मुद्दाम बोललं जात नाही. कृतींवरून लक्षात येतं.
नाही.
माझी आई गेली तेव्हा मी शाळेत होते. माझ्यापेक्षा दोन वर्ष मोठ्या मैत्रिणीने मला काही महिन्यांतच विचारलं, "तू बाबांना पॅड आणायला सांगतेस का?" माझं उत्तर हो, असं होतं. मी बाबांना हे सांगू नये हे सांगण्याचा तिने प्रयत्न केला. माझं म्हणणं, "बाबा त्या अशा कोणत्या दुकानाच्या जवळून जाणार असतील तरच सांगते. माझ्यासाठी मुद्दाम रस्ता वाकडा करायला सांगत नाही." पण तिचा मुद्दा होतो "बाबांना विचित्र वाटेल, म्हणून तू असं काही करू नकोस." मला ते त्या वयातही काही समजलं नाही. "मी बाबांसाठी शेव्हींग क्रीम, रेझर-रीफील्स वगैरे आणते. तेव्हा मला लाज वाटत नाही, त्यांना कशाला वाटेल?" असा माझा मुद्दा होता.
असो. माझ्या घरातल्या बाप-भाऊ-नवरा या पुरुषांना असं काही करण्यात लाज किंवा विचित्र वाटत नाही.
आई-वडील असेपर्यंत देवपूजा होत असे. पण मला पाळी आली असता आई किंवा वडलांनी पूजा करायची नसते, ही गोष्ट घरून समजली नाही. त्यामुळे त्या काळात, ही गोष्ट बघायची, बोलायची राहिली. आता ते विचारायला फार उशीर झाला.
दुसरं म्हणजे, खास शहरी घरांप्रमाणे, आमच्याकडे देवघर फ्रिजच्या वर, भिंतीला डकवलेलं होतं. पाळी आहे म्हणून फ्रीजमधे हात लावायचा नाही असं मी कधी केलं नाही. मला सांगितलंच गेलं नाही.
नाही, अशी प्रथा असते हेच मुळात ऐसीवर अगदी सुरुवातीला आलेल्या पेड्डामानिषी या चर्चेमुळे समजलं.
बहुदा होय. शिक्षणाबद्दल माहित नाही पण (अ)धार्मिकपणामुळे जरूर.
---
इतर काही, अनुभवातून मिळालेलं माहितीवाटप -
१. पाळीच्या वेळेस प्रचंड वेदना होत असतील तर स्त्रीरोगतज्ञाकडे जाऊन, गर्भशयात फायब्रॉईड (गाठ) आहे का हे तपासून घ्या. फायब्रॉईड असणं जीवावर बेतणारं नाही, पण ज्यांना पुढे मुलं होऊ देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. शिवाय फायब्रॉईड काढून टाकायचं असेल तर त्याचाही विचार करता येईल.
२. बरंच रक्त जात असेल आणि मूल होऊ देण्याचा विचार नसेल तर स्त्रीरोगतज्ञाशी बोलून गर्भनिरोधक गोळ्यांचा विचार करून पहा.
३. माणसाच्या शरीरात साधारण पाच लिटर रक्त असतं. त्यातलं महिन्यातले ३-५ दिवस मिळून ~१०० मिली रक्त गेल्यामुळे अशक्तपणा येत असेल तर ती व्यक्ती अॅनिमिक असावी. रक्तदान करताना जेवढं रक्त एका वेळेला काढलं जातं तेवढं रक्तसुद्धा ३-५ दिवसांच्या कालावधीत जात नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१
रक्तदान करताना ३००-३५० मिली रक्त काढतात तेव्हाही असे कधी अनुभवाला आले नव्हते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सबजेक्टीव्ह
तुम्हाला अनुभवास नसेल आले. रक्तदान करून बेशुद्ध पडलेले लोक मी पाहिले आहेत. (बहुतेक, म्हणूनच रक्तदान करण्याकरता किमान वजन असावं अशी अट असते.)
-Nile
रक्त
मी तर इतर लोक रक्तदान करत असताना पाहिले अन धपकन पडलो होतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हम्म ओके. अदितीने सांगितलेला
हम्म ओके. अदितीने सांगितलेला अॅनिमिकवाला अथवा तत्सदृश फ्याक्टर इथेही लागू पडतो असे दिसते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नाही
रक्तदान करुन बेशुद्ध पडणारी लोक अॅनिमिक नक्कीच नसतात. एक तर अॅनिमिक लोकांचं रक्तच दान करुन घेणार नाहीत. रक्तदान करुन झाल्यावर ती व्यक्ती अचानक अॅनिमिक झाली असंही होणार नाही. रक्त पाहिल्याने भोवळ येण्यासारख्या वेसोवेगल सिंकोप वगैरे प्रकारांनी बेशुद्ध पडण्याची शक्यता जास्त आहे.
निळोबांच्या प्रतिसादावरून असे
निळोबांच्या प्रतिसादावरून असे कारण असावे असे वाटत नै.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वजन
ठराविक वजनापेक्षा जास्त वजन नसेल तर रक्तदान करून घेतच नाहीत हे खरे आहे. मला स्वतःला भारतात कित्येकदा रक्तदान करता आले नव्हते, ते याच कारणामुळे. पण बॉर्डरलाईन असाला तरीसुद्धा रक्तदान केल्यानंतर चक्कर येणे, बेशुद्ध पडणे वगैरे होऊ शकते.
-Nile
हम्म. खरे आहे.मात्र
हम्म. खरे आहे.
मात्र अस्मादिकांचे वजन कोणे एके काळी जेमतेम पन्नाशीत असताना रक्तदान केलेले आहे. (गेले ते दिवस उरले ते वजन. ) आमच्याबरोबरच्या एका मित्रवर्यांचे वजन तेव्हा ४६ असतानाही त्यांनी तेव्हा आरामात (अन मित्रांचे सल्ले धुडकावून वगैरे) रक्तदान केल्याचे स्मरते. अन तो नंतरही निवांत होता. कै झालं नै. थ्रेशोल्ड किती असावा काय की.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कपडे काढून
४५ किलो.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
ओह अच्छा, धन्यवाद. आमचे मित्र
ओह अच्छा, धन्यवाद. आमचे मित्र काठावर पास झाले म्हणायचे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इतर काही माहितीवाटपात एक
इतर काही माहितीवाटपात एक मुद्दा लिहायचा राहिला -
सामान्यतः सगळे लोक रात्री आठेक तास झोपतात. पाळी येणाऱ्या मुली-स्त्रियासुद्धा. एवढ्या काळात सॅनिटरी नॅपकीन्स बदलले जात नाहीत. बहुतेकींना त्याचा त्रास होत नाही. योनीभागातली त्वचा किती संवेदनशील आहे त्यावरही हे अवलंबून असतं. आठ तासांची नोकरी, तिथे जाण्या-येण्यासाठी करावा लागणारा प्रवास, कामाचं स्वरूप यानुसारही किती वेळाने नॅपकीन बदलता येईल याची कल्पना स्त्रियांना येते, करावी लागते. त्यानुसार वेगवेगळ्या आकाराचे नॅपकीन्स मिळतात. माझ्या माहितीनुसार, वेगवेगळ्या आकाराचे नॅपकीन्स, गरजेनुसार वापरले जातात. त्यात बचत हा मुद्दा असला तरी सोय (खरंतर सोयींचा अभाव) हा मुद्दा शहरी, कमावत्या स्त्रियांना सगळ्यात महत्त्वाचा वाटत असावा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रश्नांची उत्तरे
घरात परवलीचे शब्द वापरले जात नाहीत. पण काही कारण असल्याशिवाय आवर्जून सांगण्याचीही पद्धत नाही. शिवाशिव, धार्मिक विधी इ काही नसल्यामुळे मुद्दम घरात सांगावे अशी वेळच फारशी येत नाही. पाळी कधी आणि केव्हा इतरांना कळून त्याचे ते काय करणार?
पण पाळी शब्द शाळा- कॉलेजात 'काकूबाई छाप', 'ग्रॅनी वर्ड' पैकी समजला जात असे त्यामुळे इंग्रजी शब्द प्रचलित असत.
नाही. पण भारतात पद्धत अशी की केमिस्टच, इतर गिर्हाइकांना एक तर आधी त्यांच्या गोष्टी देऊन किंवा दुकानाच्या कोपर्यात लक्षात येणार नाहीसे बघून झटपट कागदात बांधून देतात. पुरुषांनी सॅ पॅ विकत घेणे किंवा स्त्रियांनी गर्भनिरोधक विकत घेणे केमिस्ट्लाही अवघड वाटते.
नाही.
नाही
शहरी भागात. शिक्षणपरंपरा आहे. घरातले फारच थोडे पक्के अधार्मिक, पण अतिरेकी कर्मठ कोणीच नाही. वडिलांच्या घराण्यात सुधारकी वातावरण असल्यामुळे ती आजी शिवाशीव कधीच पाळत नसे. आईची आई लग्न होऊन सासरी आली तेव्हा घरात मुले-माणसे भरपूर आणि कर्ती स्त्री ही एकटीच. त्यामुळे सोयीचा विचार करून तिने विटाळ पाळणे सोडून दिले. त्यामुळे साहजिकच पुढच्या पिढ्यांना यातून मुक्ती मिळाली. ह्या दोन्ही आज्या फक्त अकरावीपर्यंत शिकलेल्या होत्या.
क्र. ४ चे उत्तर
क्र. ४, पाळी येणे संदर्भात धार्मिक विधि, समारंभ केला जाणे ही रीत ब्राह्मण समाजात १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत व्यवस्थित चालू असावी. अशा मुलीला 'न्हाणवली' म्हणत असत आणि नहाण आलेल्या मुलीला मखरात बसवून तिच्याभोवती आनंददर्शक गाणी म्हणण्याची आणि तिला कपाडचोपडाचा अहेर देण्याची पद्धत होती. '२३ जून १८९७' ह्या चित्रपटात चाफेकर बंधूंपैकी एकाच्या बायकोस नहाण आले ह्या संदर्भात 'सीताबाइला चाफेकळीला नहाण आलं' असे गाणे आहे.
पेशवाईच्या काळात रजोदर्शन हा एक महत्त्वाचा प्रसंग मानला जाई. त्याचे मनोरंजक तपशील 'पेशवाईच्या सावलीत' (सं. ना.श्री.चापेकर) ह्या पुस्तकाच्या १७व्या पानावर आहेत. रजोदर्शन म्हणजे पिशाचाची बाधा हा खालच्या जातीतील समज आणि म्हणून अशी मुलगी वेगळ्या घरात जाऊन राहात असे. वरच्या समाजात ह्याचेच रूपान्तर अशा मुलीने 'मखरात बसण्या'मध्ये झाले. ऋतुप्राप्ति म्हणजे शरीरसुखाची तयारी आणि वंश चालू राहण्याचे पहिले पाऊल अशासाठी आनंदोत्सव करण्याची प्रथा सुरू झाली. न्हाणवलीला अन्य घरातून वाढून येत असे ह्याला 'वाढून नेणे' असा वाक्प्रचार होता. ह्या वाढण्यावर मिठाई, बत्तासे, इलायची, बुक्का, अत्तर, गुलाबपाणी येत असे. तसेच कापडचोपडहि अहेर म्हणून मिळत असे. न्हाणवलीस पहिल्या दिवशी हिरवे, दुसर्या दिवशी गुलाबी, तिसर्या दिवशी पिवळे आणि चौथ्या दिवशी पांढरे लुगडे अहेर म्हणून येत असे. चौथ्या दिवशी न्हाणवलीला घरी बोलावून तिला शालू, बिछाना आणि झोळणा (म्हणजे पाळणा असा माझा तर्क) दिल्याचा उल्लेख आहे.
ह्यानंतर गर्भाधान (अर्धशिक्षितांच्या शब्दांत गर्भदान) हा विधीहि गाजावाजाने साजरा केला जाई आणि असेच अहेर त्या प्रसंगाने केले जात. गर्भाधानप्रसंगी नायकिणीची ओटी भरली गेल्याचा उल्लेख सापडतो.
ह्याच संदर्भात 'ऋतु देणे' असा शब्दप्रयोग मी इतिहासात वाचला आहे.
पहिले 'नहाण' की दरवेळी?
हा प्रकार दर महिन्याला होत असे? पहिल्या 'नहाणाला' असे काही होत असेल तर समजण्यासारखे आहे.
-Nile
अर्थातच पहिल्या नहाणाला. दर
अर्थातच पहिल्या नहाणाला. दर म्हैन्याला करायला कै खौ आहे का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
२३ नव्हे, २२ जून १८९७
हे ते गाणे. १:३७मि. - ४:३७मि.
कलाश लोक - अवांतर
मायकल पेलिनच्या हिमालय दौर्यादरम्यान तो पाकिस्तानातील कलाश लोकांना भेटतो. हे कलाश लोक म्हणजे मुसलमान नव्हेत. या समाजातील स्त्रिया बुरखा घालत नाहीत. हे अलेक्झांडरच्या स्वारीत मागे राहिलेल्या लोकांचे वंशज असावेत असे तो म्हणतो. (त्यांचा वर्ण, डोळे वगैरे वेगळे- युरोपियन आहेत असे निरीक्षण तो व्यक्त करतो.) या कलाश लोकांमध्ये आख्ख्या गावातील पाळी आलेल्या स्त्रियांना, आजही, एका वेगळ्या इमारतीत ठेवले जाते. पुरूषांना प्रवेश बंद. याच जागेत स्त्रिया मुलांना जन्मही देतात. त्यानंतर त्या स्त्री व मुलाला पुरूष 'प्युरिफिकेशन' सोहळा करून पुन्हा घरात घेतो. पहा. (३० मिनिट पुढे). कलाश आणि हिंदु संस्कृतीतली साम्यही रोचक आहेत.
एकंदरीतच मायकल पेलिनची ही हिमालया सिरीज पाहण्यासारखी आहे. खैबर खिंडीपासून सुरू होऊन भारताच्या ईशान्य पुर्वेकडील देशांत हिमालयाबरोबर तो प्रवास करतो. संपूर्ण हिमालयाच्या कुशीत राहणार्या या लोकांमधील साम्य (धर्म वगैरे कितीतरी वेगळे असूनही) विलक्षण आहे. त्याच बरोबर असलेलं वैविध्य अत्यंत मोहक! मायकल पेलिनही धमाल, त्याबद्दल नंतर कधीतरी.
-Nile
कदाचित माझा अनुभव थोडा वेगळा
कदाचित माझा अनुभव थोडा वेगळा असू शकेल.
माझं इंजिनिअरिंग होईपर्यंत मी तालुक्याच्या गावात राहिले. तालुका असला तरी अगदी गांवच म्हणावं इतकं लहान. ना धड शहर ना खेडं. घरी आई आणि दोन मोठ्या बहिणी. आई कधी बाजूला बसत नसे, पण कधीमधी आजी आणि तिची भांडणं होत. मुद्दा- तू मुद्दाम लपवतेस, मला त्रास व्हावा म्हणून तू असं वागतेस इ. कधी कधी आई बहिणींना रात्री १०-११ वाजता आजी झोपली असताना उठवे आणि मग त्या बाहेर जाऊन काहीतरी धुऊन येत, पाण्याचा-भांड्यांचा आवाज न होऊ देता. गांव असल्याने न्हाणी-पाण्याचा हैद घराबाहेर्च असायचा. मात्र कधी कधी हा लपवाछपवीचा कारभार बाहेर पडायचा आणि मग बहिणींना दूर बसावे लागे. त्यांची पिण्याच्या पाण्याची भांडी वेगळी, अंथरूण-पांघरूण सगळंच वेगळं. ते त्यांनी त्या चार दिवसांनंतर धुऊन ठेवायचं. आईला मात्र आपल्या मुली किती आळशी आहेत हे माहित असल्याने ती कधी हे उघडकीस येऊ द्यायची नाही. पण हा प्रकार काय चालतो हे कळायला मला स्वतःला अनुभव आला तेव्हाच कळालं. कन्या शाळा असूनही या प्रकाराबद्दल आधी शाळेतून काहीच माहिती दिली गेली नव्हती वा घरात इतक्या बायका सून त्यांनीही नाही. नंतर मात्र शेजारच्या शाळेतल्या एका मुलीला प्रत्येकीला,"तू शहाणी झालीस का?" असं विचारायची खोड होती. मी अगदी ताठ मानेनं,"मी जन्मापासूनच शहाणी आहे" असं तिला सांगितल्याचंही लख्ख आठवतंय.
माझ्या घरानंतर एक घर सोडून आत्या राहाते. तिच्या सुनांना हे पाळणं वगैरे पसंत नसे. पण माझ्या आत्याच्या गळ्यात 'दर्शन' आहे. (रेणुकेचे भक्त-मुख्यतः भक्तिणी गळ्यात लाल-पांढर्या छोट्या मण्यांची माळ घालतात. बहुतेक चार लाल आणि चार पांढरे मोती एकाआड एक गुंफलेले असतात) तर त्या दर्शनाच्या आसपासची व्यक्ती विटाळ पाळत नसेल तर धारण करणार्या व्यक्तीस मरणप्राय यातना होतात. माझ्या आत्याच्या पोटात खूप दुखे-अगदी गडबडा लोळून,किंचाळून घर डोक्यावर घेईपर्यंत. तिची मुलगी म्हणे हुशार होती, "कधी झाली हे कुणाला कधी कळून दिलं नाही", असं माझी आजी-आत्या कौतुकाने सांगत. पण तीच हुशारी आम्ही दाखवली की आम्ही त्यांच्या जीवावर उठलेल्या असू. नंतर 'लग्न न झालेल्या मुलींच्या पाळीचा विटाळ नसतो' असं सवडीशास्त्र निघालं आणि आम्ही सुटलो. आत्याच्या सुनांना मात्र अजूनही विटाळ पाळावा लागतो. कपडे धुण्यासाठी वेगळ्या पाण्याचा हौद आहे. तो ती दिवसभर काही ना काही (टॉवेल्/चादरी/जास्तीचे कापडे) धुऊन रिकामा करते, कोरडा झाला की परत कुणीतरी भरून देतं. एका जागी बसून बरीचशी भांडी घासणे, घरातल्या म्हशींचं पाहाणे, म्हशी धुतल्यानंतर तिथल्या ओल्या जागेत आत्या पायात चप्पल घालून जाते आणि तिला त्याचा विटाळ होत नाही. शाळा फारशी शिकली नसली तरी नक्की काय तिच्या पुरतं बॅड कंडक्टर आहे हे तिला पूरेपूर ठाऊक आहे. मोठी सून नवीन असताना दुपारी दोन-तीन वाजता 'ताई मला जेवायला वाढा ना' म्हणत यायची (नात्यांचा नसता गोंधळ आणि सासरघरच्या श्वानालासुद्धा अहोजाहो करणे असलं कैतरी भलतंच त्रांगडं आहे हे, त्यामुळे आत्याची सून मला अहोजाहो का बोलते हे विचारू नका) तेव्हा मला कळवळायला व्हायचं. दिवसभर अस्पृश्यतेच्या नावाखाली मान मोडेतोवर काम आणि तिला पाणी-जेवण न देता आत्याचं नेमक्यावेळी घराबाहेर राहाणं याचा मला खूप राग यायचा.
यथावकाश या दोन्ही सुनांना मुलं झाली, आणि आपण काय बोलतोय हेही न कळण्याच्या वयात 'आमच्या मम्मीला य्म्शी आलीय' असं बोबड्या बोलात सांगूही लागली. बरं, हे आमच्याच घरचं नाही, तर आसपास सगळ्यांच्या घरी थोड्याफार फरकानं असंच. माझी कोकणस्थ ब्राह्मण मैत्रिण सर्वांदेखत 'आईला अडचण आहे म्हणून आज मला चटणी/लाडू/तत्सम काहीही करायचंय' असं म्हणून आमच्या गावातल्या मुला-मुलींच्या होऊ घातलेल्या इंजिनिअर्सच्या मिटिंगा/स्नेहसंमेलनाला गैरहजर राहिलीय. ज्यांच्या घरी विटाळ कसोशीने पाळला जातो, त्यांच्याकडे ही अभिमानाने सांगायची पद्धत होती. आणि त्या मापदंडावर माझी आई आणि तिच्या तीन मुली असलं काही पाळत नसल्याने आत्या आमच्या घरचं पाणीही पीत नाही(तसंही मोजून दहा पावलात तिचं घर येतं), आजीला कधीही आमचा संशय येतो आणि त्या दिवसापासून चार दिवस मोजून ती आमच्याकडे काही खात-पीत नाही. वर तुम्ही घरात चार बायका, प्रत्येक वेळी कुणी ना कुणी असेलच असा तिला दाट संशय आहे. पण तसं म्हणून तिला आयतं सगळं हातात मिळण्याची संधी सोडायची नाही, त्यामुळे हे अस्त्र ती हवं तेव्हा हवं तसं वापरते.
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
आहे. कधीतरी कुठल्या प्रसिद्ध लेखकाची गोष्ट वाचली होती. तीमध्ये खूप दिवस घराबाहेर असलेला नवरा बायकोला असोशीने भेटायला जातो आणि पाहतो तर तर काय, 'तिचा तांब्या पालथा झालेला'!!! आता यातला विनोद मागे पडून असं म्हणण्याची सवय लागलीय. पण त्या आधीही आई-आत्या पिढीतल्या स्त्रिया सोडल्या तर एमसी अथवा पिरियड्स म्हणायची पद्धत होती. इतरांना कळू नये होस्टेलमध्ये असताना 'बड्डे होणे' 'मावशी(एमसी'येणे' असे परवलीचे शब्द ऐकले होते. यावरून या संबंधीचे एक अॅप डाऊनलोड केले असता त्यात तुमचे 'सायकल' किती दिवसाचे आहे आणि शेवटची पाळी केव्हा आली होती यावरून दोन दिवस आधी 'आँट फ्लो इज कमिंग' असे नोटिफिकेशन यायचे. ही मावशी/आंट सगळीकडेच सारखी कशी काय याचे नवल वाटल्यावाचून राहावले नव्हते.
सा.बा. मला विचारताना थेट विचारतात, बाहेरच्यांशी बोलताना 'अडचण' म्हणून संबोधतात.
२. केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणण्याचा तुम्हांला संकोच वाटतो का? का?
आधी वाटायचा. मैत्रिणीचे बाबा घरातल्या सगळ्या स्त्रियांसाठी पॅड्स आणतात म्हटल्यानंतर आश्चर्य वाटले होते. कदाचित आपल्या घरात जे घडत नाही हे इतरत्र पाहिले की पहिल्यांदा धक्का बसतो, नंतर हे असेच असते असे वाटून आपणच वेगळे होतो की काय असे वाटू लागते.
घरून ही पॅड्स वापरण्याबाबत आधी विरोध होता. आजीच्या लुगड्याचे कपडे तलम असत, पण ते आम्हांस मिळतही नसत. सुती कपड्याने खूप त्रास होई. परंतु वापरलेले पॅड्स फेकून द्यावे लागतात, तिथे कचर्यात सापाने ते पॅड चाटले की मुलीस कायमची गर्भधारणा होत नाही असा ठाम समज होता. आणि आई होण ही मुलीच्या आयुष्यातली दुसरी इतिकर्तव्यता असल्यानं तिथं विवाद्/मतांतराला वाव नव्हता. आताही ओळखीतल्या काकू आपल्या मुलीला ते पॅड्स आधी स्वच्छ धुऊन मगच फेकू देतात!!! आता इथे शरीरापासून वेगळं झालेलं पॅड आणि नंतर चाटलेलं पॅड आणि व्यक्ती यांचा परस्पर संबंध नक्की कसा लावला जाऊन ती गर्भधारणा कायमची नाहीशी होते? (थोडक्यात या Remote Communication algorithmचं कोडं अजून कुणी सोडवलं नाहीय, पण ती संकल्पनाही कुणी सोडायला तयार नाही, हे ही आहेच.
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत असल्यास पाळीच्या दिवसांत तिकडे न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? का?
माझ्या घरात (जिथे नवरा-बायको दोघेच राहातो तिथे) नाही. खरंतर देवांची पूजाच केली जात नाही पण ते रोजच्या वावरण्याच्या ठिकाणी आहेत. सासरी विशेष दिवस सोडून काही हरकत नाही. मात्र गौरी-गणपती सारख्या दिवसांत पाळी नसूनही सोवळं पाळलं जात असल्यानं मी बाहेर चकाट्या पिटत बसते. माझ्यावर अजून असे देवांचे आणि माझे विशेष दिवस एकदमच येण्याचा रक्तशर्करा योग अजून आला नसल्याने अधिक तपशील नाहीत. घरी मंगलकार्याच्या दिवसांत जवळच्या नातेवाईक स्त्री बाजूला न बसता व देवाकडे न जाता कार्यक्रमात सहभागी झाल्याची ऐकले आहे. माझ्या स्वतःच्या घराच्या वास्तुशांत पूजेच्या वेळेस माझ्या जवळच्या नातेवाईक स्त्रीस मी पूर्णपणे व्हावयास लावले होते. आईच्या विरोधाला ' ज्या देवाची पूजा तू हिला करू देत नाहीस त्याच देवाने हा प्रकार तिला दिला आहे, तस्मात् तो यात दोषी आहे-ती नाही' असं म्हटल्यानं पुढे काही बोलता आलं नव्हतं.
बरेच ठिकाणी बाहेरच्या अविवाहित मुलीला सुद्धा कुंकू लावल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही अशी प्रथा दिसली. अशा दिवसांत इतका वेळ त्या मुलीला शिवलं असेल तरी कुंकू लावताना संबंधित मुलीने अडचण आहे असं म्हणणं आणि मग आधीच स्पर्शित झालेल्या (पण स्वतःला पवित्र मानणार्या) यजमानिणबाईंनी वरून हातावर हळदीकुंकू टाकणं हा बराच रोचक प्रकार आहे.
इथलं सवडीशास्त्र असं आहे की, नव्याकोर्या कपड्यांत/रेशमी वस्त्रांत्/ओलेत्याने पाळीच्या दिवसांत पूजेला बसलं किंवा पूजा केली तर चालते म्हणे.
४. घरातल्या मुलीची पाळी सर्वप्रथम आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
नाही. लिंगायत धर्म बसवेश्वरांनी मुळात जाती=पाती मोडून काढण्यासाठी केला असला तरी त्यात पुन्हा लिंगायत माळी-लिंगायत वाणी, लिंगायत कुंभार असल्या पोटजाती चालत राहिल्या. वाणी समाजात मुलीस मखरात बसवणे, संमारंभ करणे प्रकार होतात, सर्वच लिंगायतांमध्ये नाही. अगदी बसवेश्वरांनी व्यक्तीपूजा नको, हवे तर एका देवाला माना असे सांगितले असूनही '१०८ स्वामी ' जे महाभारतातल्यासारखे सोन्याचे वरचे कपडे-कंबरपट्टे आणि मुकुट लावून दिवसभर बसतात, ते आहेत आणि त्यांचा उदो उदो लिंगायत वाणीच मुख्यत्वे करून करतात.
नाही म्हणता नहाण आल्यानंतर मामाने साडी घेण्याची पद्धत आहे, पण सर्रास तसे केले जातेच असे नाही. न करण्यामागे इच्छेपेक्षाही सधनतेचा अभाव हेही कारण असू शकते.
५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?
जातीपरत्वे याचा टोकदारपणा कमी अधिक होतो असं माझं वयक्तिक मत आहे. माझ्या दोन्ही (सासर्/माहेर) दोन्हीकडच्या मतांत आणि माझ्या मतांत पुष्कळ फरक आहे. दोन्हीकडचे लोक सुशिक्षित आहेत, त्यांच्या जडणघडणीचा परिसर वेगवेगळा होता, तरीही आई/सा.बांच्या पिढीतल्या स्त्रियांची मते साधारण सारखी दिसतात. सध्याच्या पिढीत फरक पडतो. ग्रामीण भागात हे अधिक असावं असं जरी प्रथमदर्शनी समजलं तरी माझ्या नवीन स्वयंपाकीण बाईने 'महिन्यातल्या त्या दिवसांत तुमच्याकडे स्वयंपाक केलेला चालतो का? मला चार ठिकाणी ASAP कळवत जा अशा ष्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत' असे म्हटल्यावरून असं ग्रामीण्/शहरी काहीही नसतं असं मी सध्या मानून घेतलंय.
चालक-मालक-संस्थापक- रोजच्या वाचनमात्र सदस्येने लेखाच्या चारपट लांबीचा प्रतिसाद दिल्याने तिचे पुण्य दहाने वाढवावे अशी सूचनावजा विनंती
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
तुझ्याकडून प्रत्यक्षात या
तुझ्याकडून प्रत्यक्षात या बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत, पण सापाने पॅड चाटलं वगैरे ऐकलं नव्हतं. अजूनही आश्चर्य वाटणं संपत नाही. "आमच्या घरी टॅबू नाही, त्यामुळे मला त्याचं कशाला काही वाटायला पाहिजे," अशाप्रकारच्या स्वतःच्याच जगातल्या कल्पनांना पुन्हा हादरा बसतो.
पुण्य वाढवलं असतं पण तू नेहेमी बाजूलाच बसलेली असतेस हा मुद्दा तुझ्याविरोधात जातो!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इतकं सगळं वाचल्यानंतर यामुळे
इतकं सगळं वाचल्यानंतर यामुळे किती मुली/स्त्रियांच्या आयुष्यात केवढा मोठा फरक पडतो हे जाणवलं.
!
!
हे सगळं मी स्वतः अनुभवलेलं
हे सगळं मी स्वतः अनुभवलेलं नाही. पण वडलांच्या माहेरी याच धर्तीवरचे प्रकार सर्रास चालत. अजूनही चालत असतील म्हणा.
त्या तीन दिवसांत बाईनं बाजूला बसायचं. स्वैपाघरातला एक कोपरा आणि त्यावर एक बस्कर. परसात गोठ्याच्या जवळ एक कुडाची न्हाणी आणि त्यात एखादी बालदीभर पाणी हीच व्यवस्था त्या तीन दिवसांत वापरायची. जेवणाचं ताट घासण्यापासून ते फडकी धुण्यापासून सगळ्यासाठी. या दिवसांत बाई बाजूला बसली, तरी तिनं धान्य निवडणं, शिवण-बिवण, डाळिंब्या सोलणं आणि तत्सम कामं करायला कुणाची ना नसे. ते जे काही काम केलेलं असेल, त्यावर पाणीबिणी शिंपडून तथाकथित शुद्धिकरण करून घेतलं की झालं. चौथ्या दिवशी सकाळी कुणीतरी डोक्यावर पाणी घातलं की न्हाऊन ही बाई परत घरात खपायला मोकळी होई.
'मी बाजूला बसलेय' अशी जाहिरात करणारे हे प्रकार बायका कशा काय खपवून घेतात (आणि तिकडे गेल्यावर आई क-धी-च बाहेरची होत नाही, हे कसं काय - ;-)), असा प्रामाणिक प्रश्न मला पडे. तरी त्यांची कुणाची या अपमानास्पद प्रकाराबद्दल जराही तक्रार असलेली कधी दिसली नाही. उलट एक लांबचा काका वरचेवर आजारी पडला, तर त्याच्या बायकोनं 'बसायचं सोडून दिल्यापास्नं हो हे...' अशी कुजबुज ऐकल्याचं आठवतं. मुलाचं लग्न जमल्यावर कौतुक कसलं, तर 'तिच्याही घरी बाजूला बसायचं वळण आहे हो...' याचं. हसावं की रडावं, ते कळत नसे.
शिक्षणाचा आणि विचार करून तर्कसंगत वागण्याचा काहीही संबंध नसतो, हे कळण्यात पहिलीवहिली मदत याच लोकांची झाली, याबद्दल एक कृतज्ञता वाटते हल्ली.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
कन्फ्यूज्ड
>>'मी बाजूला बसलेय' अशी जाहिरात करणारे हे प्रकार बायका कशा काय खपवून घेतात
मी कन्फ्यूज झालो आहे. म्हणजे जाहिरात करावी/ओपनली बोलावं की संकोचून गुपचुप सगळं करावं? धागाप्रस्ताविकेचं यावर काय मत आहे?
म्हणजे अन्यायकारक आहे हे मान्य आहे पण नक्की विरोध कशाला आहे हे कळेना...
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नैसर्गिक शरीरधर्माची जाहिरात
नैसर्गिक शरीरधर्माची जाहिरात करणं आणि नैसर्गिक शरीरधर्माची लाज वाटणं - यांच्या अधेमधे कुठेतरी निरोगी दृष्टिकोन असतो असं मी मानते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आता,
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
<<
यातल्या 'का' चं संभाव्य उत्तर.
पाळी येणे ही 'इस्ट्रस फेज' चे डेफिनिटिव्ह अंतिम दिवस असतात. यावरून वयस्क मानवी पुरुषास किमान सर्वसाधारण अनुभवाने वयस्क मानवी स्त्रीच्या 'ओव्हुलेटरी फेज'चा अंदाज बांधणे सोपे असते. या काळात, नैसर्गिकत:, संप्रेरकांच्या प्रभावाने स्त्री अधिक मिलनोत्सुक असते. व याचा फायदा नर घेउ शकतात.
प्राणी जगतात 'हुंगून' याचा सुगावा नरांना लागतो.
मानवांत वास नीटसा येत नाही, पण ओरडून 'माझी पाळी चालू आहे' असे जाहीर केल्यास, पुढील नैसर्गिक प्रक्रिया, प्रणयाराधन इ. गोष्टींस सामोरे जाण्याचे प्रमाण वाढू शकते.
हे 'एक' लॉजिक आहे.
कोड्वर्ड्स मधे बोलल्याने हाच परिणाम येणार नाही असे नाही, याची पूर्ण कल्पना आहे. किंबहुना किमान अननुभवी नवतरूण नरांची दिशाभूल होईल.
या प्रकर्णास 'संस्कार' अस म्हणतात.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
१. उत्क्रांतीमधे स्त्रीयाच मागे का राहिल्या असाव्यात?
खरेच?? मागे राहिल्यात? राहिल्या असाव्यात??
Does this "man" seriously believe that females are behind him in evolution??
Do you seriously belive that, Mr. Joshi?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
मला वाटतं त्यांना मानवी
मला वाटतं त्यांना मानवी माद्या का मागे राहिल्या, किंवा मानवी माद्या इतर मॅमल माद्यांपेक्षा वेगळं जीवशास्त्रीय वर्तन का करतात असे प्रश्न विचारायचे असावेत. मानवी स्त्रिया आणि मानवी पुरुष यांच्यात तुलना अपेक्षित नसावी.
गुर्जी,
पेसिफायिंग ठिकेय,
पण,
गर्भाशय नामक अवयवाच्या योगे, पुनरुत्पादन करण्याची युनिक शक्ती शरिरात धारण करणारा स्त्रिलिंगी प्राणी, जो इन व्हिट्रो फर्टिलाईज केलेला एम्ब्रियो 'सरोगेट मदर' म्हणून धारण करू व नव्या जीवास (कोणत्याही पुरुषी हस्तक्षेपा वा लिंगक्षेपाशिवाय) जन्म देऊ शकतो, तो पुरुषापेक्षा उत्क्रांतीत 'मागे'???? बाय व्हॉट लॉजिक??
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
नाही हो, त्यांचं मानक पुरुष
नाही हो, त्यांचं मानक पुरुष आहेत तेवढं खाली नाही, इतर सस्तन प्राण्यांमधल्या माद्या असं आहे.
पण बाकीच्या प्राण्यांमधेही पाळी येते असं म्हटल्यावर काय प्रतिक्रिया आहे ते पाहू या.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
याचं उत्तर वर दिलेलं आहे.
याचं उत्तर वर दिलेलं आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उत्क्रांतीचे जाऊ द्या, तुम्ही
उत्क्रांतीचे जाऊ द्या, तुम्ही प्रश्न नीट वाचायला कधी शिकाल?
" १. उत्क्रांतीमधे स्त्रीयाच मागे का राहिल्या असाव्यात? इतर प्राण्यांच्या माद्यांना पाळी का येत नाही? याला तुरळक अपवाद आहेत का?" असे लिहिले होते.
अगदी नाईलने पटकन तुरळक अपवादाची लिंक तत्काळ दिली. घासकडवींना तर संपूर्ण प्रश्न कळला. अदितीलाही कळला, पण ती गमतीची स्मायली टाकायची विसरली.
मेघनाला आणि तुम्हालाच असा विचित्र अर्थबोध का झाला? Does this "man" seriously believe that females are behind him in evolution?? इथे धिस मॅन लिहायची गरज होती का? समोरच्याला किती मूर्ख समजायची किती सवय असावी यालाही एक मर्यादा असते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नक्की ठरवा हो एकदा.
नक्की ठरवा हो एकदा. याच धाग्यात वर लिहीलं आहेत मला प्रश्न समजला नाही. इथे लिहीता आहात, मला समजला. आणि तुमच्या प्रतिसादावरून एवढे प्रतिसाद येत आहेत ... खरंच ऐसीचं भाग्य थोर आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रतिसादांची वेळ आणि कंटेट
प्रतिसादांची वेळ आणि कंटेट वाचायचेच नाही असा विडा उचललेला दिसतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
विड्याचं ठाऊक नाही.
सुपार्या कातरण्याचं काम हिकडं हाये
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
१. 'माझी पाळी चालू आहे' असं
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
मी पिरियड्स चालू आहेत असं म्हणते, पण असं सांगण्याची वेळ येते कश्याला? मुळात माझा कल स्वत:चा खाजगीपणा जपण्याकडे असल्याने कुठल्याचं गोष्टींची उगाचच वाच्यता करत नाही.
२. केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणण्याचा तुम्हांला संकोच वाटतो का? का?
मला संकोच वाटत नाही. पण केमिस्टला साध्या आवाजात सांगितलं तरी आजूबाजूला पुरुष ग्राहकवर्ग असेल तर तो संकोचतो.
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत असल्यास पाळीच्या दिवसांत तिकडे न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? का?
माझ्या माहेरी आई ’कावळा शिवला’ म्हणून बाजूला बसत असे. मी सुरुवातीला आजीचं मन मोडू नये म्हणून बसले. मग मात्र मी ती प्रथा पाळायला नकार दिला. आजीने समजून घेतलं पण देवघराजवळ यायचं नाही या अटीवर. तेव्हा मी गुरुवारी दत्ताच्या देवळात जात असे. ते पाळी मात्र असतानाही जायचे. "देवाला मी पाळीच्या दिवसात देवळात यायला नको असेल तर त्याने गुरूवारी पाळी आणू नये" हा त्यामागचा विचार किंवा युक्तीवाद. आता नियमित देवपूजा, देवदर्शन करण्याएवढी श्रद्धाळू मी राहिलेले नाही. नवरा देवपूजा करत नाही. सत्यनारायण वगैरेही नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही.
४. घरातल्या मुलीची पाळी सर्वप्रथम आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
नाही. पण मी माझ्या मुलीच्या आवडीचं, ती सांगेल ते काहीतरी करेन (मग ते मॅगी ही असू शकेल) असं म्हणते कारण त्या वेळेस जी रडावसं वाटण, चिड्चिड होणं या सगळ्यात मी तिच्याबरोबर आहे असं तिला वाटावं म्हणून आणि इतरांच्या नजरेतली " आता जप गं बाई" ची जाणवणारी धार तिला जखमी करू नये म्हणून.
५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?
मी शहरात जन्मले, वाढले; पण त्यामुळे उतारात फरक नसावा. कारण मला जी गोष्ट पटते ती करायला संस्कार, परंपरा फारश्या आड येत नाहीत.
अवांतर: मी या दिवसात बाजूला बसत नसले, तरी ती सोय असती तर नवर्याला त्या चार दिवसात स्वयंपाक करणे, घर आवरणे, कपडे, भांडी यांचा पसारा आवरणे वगैरे सगळीच कामे मॅनेज करायला लागली असती, असा एक सुडाचा( ) विचार मनात येतो. एकदा माझ्या सहकार्यांबरोबर गप्पा मारत असताना लक्षात आलं की आमचे ( समानता मानणारे आमचे) नवरे फक्त सांगकाम्या बाळकोबा आहेत मात्र आम्हा सर्वांचे वडिल घरकामात नेहमी मदत करत नसले तरी त्यात तयार होते आणि आणि त्याचं कारण म्हणजे विटाळ पाळण्याची पद्धत. अर्थात हे या प्रथेचं समर्थन नाही, होऊ ही शकत नाही.
व्वा! ऐसीवर इतकी छान चर्चा
व्वा! ऐसीवर इतकी छान चर्चा बर्याच दिवसांनी वाचतोय.. आणि इतक्या सदस्यांचा इतक्या तपशीलात सहभागही आनंददायी आहे. धागा महत्त्वाचा आहेच नी त्यावरील ही चर्चा माझ्यासाठी माहितीपूर्ण, रोचक काही वेळा धक्कादायकही (मकीने दिलेले सापाचे उदा तर अतर्क्य आहे! पण काय बोलायचे! असो. ) आहे. मेघनाचे आणि सर्वांचेच आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एक सुचवण
प्रस्तुत चर्चेचे सध्याचे शीर्षक - काकस्पर्श उर्फ बाजूला बसलेली बाई - हे अत्यंत सपक आहे, असे सुचवू इच्छितो.
त्याऐवजी,
'काकस्पर्शिता'... अर्थात, 'बाजूला बसलेली बाई'!
असा बदल सुचवू इच्छितो, जेणेंकरून
(१) शीर्षक अधिक लक्षवेधक होईल,
(२) 'बाजूला बसलेली बाई'मधील अनुप्रास अधोरेखित१ होऊन दिलखेचक ठरेल, आणि
(३) 'काकस्पर्शिता'मुळे ते केकता क्कपूरच्या मालिका२अनामांसदृश (आणि एकंदरीतच हिंदी मालिकांतील नायिका२बनामांसदृश) होऊन पझाझ वाढेल.
पहा बुवा विचार करून!
------------------------------------------------------------------------------------------------
१ स्थानमाहात्म्य, हो, स्थानमाहात्म्य!
२अ, ब अनादिकालापासून आम्हांस नेहमी भेडसावणारे दोन सनातन प्रश्न यावरून आठवले.
- 'नायक'चे स्त्रीलिंग जर 'नायिका', तर 'मालक'चे स्त्रीलिंग 'मालिका' का नाही?
- उलटपक्षी, 'मालक'चे स्त्रीलिंग जर 'मालकीण', तर 'नायक'चे स्त्रीलिंग 'नायकीण' का नाही?
नावात काय आहे?
नावात काय आहे?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
असला गोंधळ विंग्रजी भाषेत जरा
असला गोंधळ विंग्रजी भाषेत जरा जास्तच आहे.
हेडमिस्ट्रेस म्हणजे मुख्याध्यापिका, पण मिस्ट्रेस म्हणजे...
आणि त्या हिशोबाने हेडमिस्ट्रेस म्हणजे ... पट्टनाटकशाळा का?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पोच
'पट्टनाटकशाळा' भयंकर आवडले.
अगागागागागा पट्टनाटकशाळा
अगागागागागा
पट्टनाटकशाळा फुटलो _/\_
खरे तर मास्टरचे स्त्रीलिंग म्हणजेच मिस्ट्रेस आहे ना?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
१. 'माझी पाळी चालू आहे' असं
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
घरी फक्त "सुरू आहे" असं होतं. कारण आमची आई ही परवलीच्या शब्दांचा एक कोशच आहे. "बिन-बोभाट" हे तिचं ब्रीद वाक्य आहे. पाळी ला पीरियड्स म्हणतात हे कळल्यावर शाळेत तासांना पीरियड म्हटल्यावर अनावर हशा. शाळेत तो जोक कायकी शिळा झालाच नाही. त्यात कोणा शिक्षिकेचा तास असला तर डबल हशा. कॉलेज मधे विविध परवलीचे शब्द - चम्स, गेटिंग डाउन, आँट फ्लो इज विजिटिंग. कॉलेज हॉस्टेल मधे मुलींचे दोन ग्रूप होते- एक स्पष्टवक्ता असण्याचा भयानक अभिमान बाळगणारा, आणि दुसरा या ग्रूप ला काही म्हटलं की श्श्श्श्श्श्शीईईईईईईईई असं म्हणणारा. हे परवलीचे शब्द होस्टेल शब्दावलीत तडजोड म्हणून वापरले जात होते असं वाटतं.
२. केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणण्याचा तुम्हांला संकोच वाटतो का? का?
नाही. घरी वडिलही आणून देत असत. पण अनेकांनी म्हटल्याप्रमाणे केमिस्ट तरी नाहीतर आजूबाजूचे ग्राहक कधी संकोचतात असं वाटतं. पण आजकाल सर्रास मॅक्सी कि रेग्युलर? विंग्स वाला चाहिये? रात वाला मॅक्सी असं ही सरळ विचारणारा केमिस्ट आहे. गुड फॉर हिम. मला दुकानात थेट विचारण्यापेक्षा कोणाच्या घरी टीवी बघत असताना जाहिरातीत पॅड वर शाई घालून दाखवतात त्याची का कोण जाणे किळस वाटते. इतकं भडक, तरी गोग्गोड, खोटं खोटं.
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत असल्यास पाळीच्या दिवसांत तिकडे न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? का?
आजोळी "कावळा शिवला" म्हणून सगळ्या बहिणी-आत्या बसायच्या, पण मी मोठी होईपर्यंत हे सगळं बंद झालं. आमच्या घरी आधीपासूनच नव्हतं - माझ्या आत्या शिक्षणासाठी बाबांकडे रहायला आल्या तेव्हा त्यांनी बंद केलं. माझ्या लहानपणीचा एक भीतीदायक प्रसंग मला अजूनही चांगला आठवतो. माझी आतेबहीण बाजूला बसली होती, कोपर्ञात निजली होती. आजोळी दिवाळीची गजबज चालू होती, रंगकाम, फराळ करणे वगैरे. दुपारचा चहा तयार आहे, सगळ्यांना बोलाव असं मला काकूने सांगितल्यावर मी ताईला हात लावून हलवलं. मला काही कळायच्या आत चारचौघांनी मला धरून कपडे काढायला, वेण्या सोडवायला सुरुवात केली, "अय्यो मुट्टिदलू, मुट्टिदलू" (शिवली, शिवली) असे ओरडत. मी अतिशय भिऊन हात पाय लाथाडायला, किंचाळायला लागले. एका काकीच्या हनवटीवर चांगलीच लाथ बसली तेव्हा ती मला सोडून खाली बसली. गदारोळ ऐकून बाहेरून बाबा आत आले आणि मला आत नेऊन शांत केलं, आणि सगळ्यांना सुनावलं. हुंदके देत देत नंतर आईला पापड लाटायला मदत केल्याचं अजूनही आठवतं.
पूजेला हजर रहायची पाळी आलीच तर मी कोणाला सांगत नाही. देव असलाच तर त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही याची खात्री आहे. एकचाच मी पाळीची पळवाट निवडली होती - तिरुपतीला सगळे गेले असता लाइनीत उभं रहायचं भयानक बोर काम करायचं नव्हतं - पाळीचं निमित्त सांगून होटेलात स्वस्थ बसून पुस्तक वाचलं.
४. घरातल्या मुलीची पाळी सर्वप्रथम आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
हो. पुन्हा आजोळी, चुलत भावाच्या मुंजीच्या वेळीच त्याच्या मोठ्या बहिणीची पाळी प्रथमच सुरू झाली. तिला ओवाळून ओटी भरली का काय केलं, पण सगळ्यांना "मुंजवी मणीग मुट्ट ब्याडा" (मुंज झालेल्या मुलाला शिवू नको) हे एवढं एकच तिला सांगायला सुचत होतं त्याचा प्रचंड म्हणजे प्रचंड वैताग आला.
५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?
कॉलेज पर्यंत लहान गाव. घरातले लोक खूपच धार्मिक. बायका पुरुषांपेक्षा कर्मठ, पाळीचे, उपवासाचे नियम पाळले जात आहेत की नाही याची पोलिसिंग एकमेकांवर हमखास करत. पण आता गावात काय, शहरात काय, कोणी बाजूलाही बसत नाही, उपवास म्हणजे साबुदाण्याच्या खिचडीचे निमित्त.
बाकी -
"एकीची चालू झाल्याचं कळलं की लगेच दुसरीची चालू होतेच होते..."
या मागचं वैद्यकीय कारण मला माहित नाही, पण हॉस्टेल मधे दीर्धकाळ वास्तव केलेल्या बर्याच मुलींना याचा अनुभव आहे, मला ही. रूममेट्स ना एकत्र चम्स येतात म्हणून त्यांना "चंपा-चमेली" म्हणण्याचा म्हणूनच आमच्या हॉस्टेल मधे रिवाज होता.
"सॅनिटरी नॅपकिन्स वाईट. त्यानं कॅन्सर होऊ शकतो. त्याहून मऊ सुती कापडाच्या घड्या वापराव्यात."
कॅन्सर म्हणजे फारच झालं, पण वर कुणी म्हटलं तसं काही डिस्पोजेबल नॅप्किन्स च्या जेल मुळे आणि कडेच्या कागदाच्या धार मुळे इन्फेक्शन्स होऊ शकतात. सगळ्यांनाच नाही, पण अनेकांना. अर्थात सुती कापड स्वच्छ नाही ठेवलं तरी होऊ शकतात. पण चांगले क्लॉथ पॅड्स वापरणं पर्यावरणाच्या दृष्टीनं ही चांगलंच आहे. अमेरिकेत माझ्या अनेक मैत्रिणी "दीवा कप" किंवा "कापडी पॅड्स" वापरतात. गरजेच्या वस्तूचे बाजारीकरण न होऊ देणे हा या उपक्रमांमागचा विचार आहे. आपल्याकडे पाळीचे असो, लहान मुलांचे असो, डिस्पोजेबल नॅप्किन्स चे मार्केट मोठे आणि वाढतं आहे त्यामुळे जाहिरातीत ही त्यांच्या "सोई"चा, स्त्रीमुक्तीला साजेसं असं खूप गाजावाजा केला जातो, आणि कापडी म्हणजे मागासलेलं, पारंपारिक, घाण, असं बिंबवलं जातं. दोन्ही बाजूंचा अतिरेक चुकीचा आहे. इथे ही जुन्या लुगडींच्या चिंध्यांना आता काही काही पर्याय आहेत.
अवांतर!!!
काही वर्षापूर्वीचा प्रसंग. आमच्या मिलिटरीसदृश ऑफिसमध्ये एका तरुण मेजरचे पोस्टिंग झाले होते. CSD कँटीनमधून सॅनिटरी नॅपकिन्स आणण्याचे फर्मान त्याच्या ‘मॅडम’ने सोडले असावे. त्याला स्वतःला कंटीनमध्ये रांगेत उभारून सर्वासमोर नॅपकिन विकत घेण्यास जड वाटत होत असावे म्हणून ऑफिसमधल्या एका शिपायाच्या हातात पैसे व पिशवी देत ‘चार पॅक’ आणण्यास कँटीनला पाठवतो. हा शिपाई मात्र सॅनिटरी नॅपकिन्सचे पॅक्स पिशवीतून न आणता तळ मजल्यापासून तिसर्या मजल्यापर्यंत हातात धरून घेऊन येतो व वाटेत विचारणार्या सर्वांना ‘मेजरसाठी’ म्हणून सांगत सुटतो. हा सर्व प्रकार मेजरच्या कानापर्यंत कुणीतरी पोचवतो.
परत आल्यावर रागाने लालबुंद झालेल्या मेजरने “पिशवीतून का आणला नाहीस?” असे विचारल्यावर “साहेब इतके छान पॅकेज लपून छपून आणणे बरे दिसणार नाही म्हणून पिशवीत नाही टाकले” असे कबूल करतो.
कदाचित यानंतर कधीही मेजरने ‘असले सामान’ शिपायाकडून मागवले नसतील!
खल्लास किस्सा त्या शिपायाने
खल्लास किस्सा त्या शिपायाने तसे बुद्ध्याच केले असण्याची शक्यता जास्त. खाशी जिरली
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माझ्या लहानपणी माझ्या मोठ्या
माझ्या लहानपणी माझ्या मोठ्या काकाच्या घरी गौरी गणपती ला आम्ही सगळे एकत्र जमत असू. मला ६ चुलत बहिणी आहेत, त्यातल्या ४ माझ्यापेक्षा मोठ्या आणि एक फक्त एक वर्षाने लहान. अता त्यातली एखाद दुसरी ही 'बाजूला बसलेली' असायचीच गौरी-गणपतीला. अश्यावेळी तिला घराच्या एका कोपर्यात एका गोधडी वर दिवसभर बसावं लागायचं, तिचं ताट, लोटी-भांड, कप हे सगळं वेगळं असायचं. मला खूप वाईट वाटायचं ... (पुर्वी तर म्हणे त्यांना घरातलं गोड-धोड पण द्यायचे नाहीत कारण ते नैवेद्याचं असतं आणि त्यांना ते चालत नाही.) ह्याही पेक्षा क्रूर गोष्ट म्हणजे संध्याकाळी सगळ्याजणी नटून थटून इकडे तिकडे मिरवत असतांना 'ह्यांना' मात्र भले नटून थटून पण बाजूलाच बसावं लागायचं, खूप संताप व्हायचा - मी बोलायचो हे चुकीचं आहे, पण माझं कोण ऐकतय.. नेमकं कधी ते लक्षात नाही पण माझी सगळ्यात मोठी चुलत बहिण 'कॉलेज' ला जायला लागल्यापासून (थोडक्यात जरा मोठी झाल्यापासून) तिने हे असलं सगळं धुडकावून लावलं आणि अपोआप मग लहान बहिणींवरचं हे असलं बंधन कायमचं संपलं (म्हणजे घरच्यांनी सगळं सोडून दिलं होतं असं नाही पण अगदीच बाजुला बसणं, वेगळे भांडे असले प्रकार बंद केले- निदान घरात मनमोकळं फिरता यायचं बहिणींना अश्या उत्सवात).
सुदैवाने अता असले काहीच प्रकार घरात होत नाहीत, ह्याला प्रगतीच म्हणावी
बाकी "गंध" सिनेमातला "बाजुला बसलेली बाई" हा भाग मला फार अवडला होता. असं वाटलं बरं झालं त्या कथेतल्या मुख्य पात्राला (निना कुलकर्णी) पाळी येते नाहीतर ऐन नणंदेच्या बाळंतपणात केवढी कामं करावी लागली असती. तो वेळ ती किती छान घालवते (भाच्या बरोबर खेळते, जरा लहान होऊन त्याच्याशी गप्पा मारते, त्याचा अभ्यास घेतांना त्या कवितेत रमून जाते, गरम गरम जेवणाचं आयतं ताट आणि निवांत जेवण करते) पुर्वीच्या काळी ज्या बायांना असे पहाटे पासून रात्री पर्यंत मर-मर कामं असायची त्यांच्यासाठी महिन्यातले हे पाळीचे दिवस अंधश्रद्धेने च्या नावा खाली का असेना पण त्यांना तेवढाच चार दिवस चांगला आराम करायला मिळायचा. हे असं बाजूला बसणं त्यांच्या दृष्टीकोनातून तेव्हा चांगलंच होतं असं वाटून गेलं
तेवढाच आराम त्यांना असं वाटतं
तेवढाच आराम त्यांना असं वाटतं रे... पण बर्याच घरांत अशावेळी बाईला कोरडी कामे दिली जात. निवडणं टिपणं वगैरे. आराम द्यायचा तर तो एरवीही देता येतो. त्यासाठी पाळीचे चार दिवस कशाला? आराम देणं न देणं हा मनोवृत्तीचा भाग आहे, पाळी तो सिर्फ बहाना है.
बिपिन कार्यकर्ते
हो ते ही आहेच की ह्या काळातही
हो ते ही आहेच की ह्या काळातही त्यांना शांत बसू देत नसतील तर त्याला कसला आराम म्हणायचा. पण माझं म्हणणं हेच होतं की पुर्वी ज्या मोठ्या एकत्र रहाणार्या कुटुंबात सारी घर-कामं स्त्रियांना करावी लागायची त्याच्या मानाने आणि जेव्हा की त्यांच्या घरातल्यांची (मोठ्यांची थोडक्यात - सासू सासरे वगैरे ) ही मानसिकताच नव्हती की ह्या स्त्रियांनी जरा आराम करावा, जरा स्वतःसाठी वेळ द्यावा अश्या ठिकाणी भले स्त्रियांना ह्या ४ दिवसात कोरडी कामं करावी का लागत असेना पण त्यांना इतर दिवसांच्या रोजच्या कामाच्या मानाने जरा तरी आराम मिळत असावा असं वाटलं .... पण मुळातच त्या काळात नेमकं काय व्हायचं अश्या घरांमधून किंवा स्त्रियांसोबत ते कधी प्रत्यक्ष पाहिलं/ऐकलं नसल्याने माझा आपला त्यांच्या मानसिकतेबद्दल अंदाज.
त्यातपण एक वाक्य असयं की "खरच
त्यातपण एक वाक्य असयं की "खरच पाळी आलीय का उग (काम टाळण्यासाठी)/(स्वतःला मुळबाळ नसल्यानै येणारी असूया टाळण्यासाठी ) ढोंग आहे.
Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.
नेहमी वाचनमात्र असणार्या
नेहमी वाचनमात्र असणार्या किती जणांनी या धाग्यावर लिहिलं आहे. नव्या नि जुन्या, सगळ्यांचेच आभार मंडळी.
***
एकमेकांशी काही संबंध नसलेलं, पण या विषयाशी निगडीत असलेलं काही...
- पाळी येण्याला स्त्रीच्या सर्जनक्षमतेची बाह्य खूण मानता यावं. हे वयात येणं संस्कृतीला साजरं करावंसं वाटलं याचं नवल वाटत नाही. जननक्षमतेचं उदात्तीकरण करण्याची (ओटी भरण्याला असलेलं अनन्यसाधारण महत्त्व, 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव'प्रकारचे आशीर्वाद इ.) आणि निर्मितिक्षमतेचा गौरव करण्याची संस्कृतीची प्रथा पाहता, हे सुसंगतच वाटतं. पण मग ही गोष्ट शरमेची, लपवून ठेवण्याजोगी, संकोचून टाकणारी नक्की कधी आणि कशी होत गेली असावी? मातृदेवतांची ठाणी प्रभावहीन होत जाणं आणि रजोधर्माला शरमेची बाब मानलं जाणं, यांत काही लागेबांधे सापडतात का?
- कधीतरी वाचनात आलेला आणि स्मरणात राहून गेलेला तपशीलः कोणत्याशा आदिवासी जमातीत मासिक पाळी म्हणजे स्त्रीला चंद्रापासून राहणारा गर्भ असं मानलं जातं. चंद्राच्या मासिक चक्राशी त्याचा सहज संबंध जोडता आल्यामुळेही असेल. पण एरवी हमखास 'मामा' करून टाकलेल्या चंद्राची ही रंगेल बाजू वाचून मजा वाटली होती.
- वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदी रज:स्वला असल्याचा उल्लेख आहे. म्हणजे तेव्हा तरी शिवाशिवीची प्रथा नसावी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
वस्त्रहरणाच्या प्रसंगी
असं सांगता नै येणार. एवीतेवी तिचं वस्त्रहरण करायचंच होतं म्हणून तिला हात लावला इतकंच. प्रथा काय होती हे त्यावरून कळत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आहेस खरा इतिहासाभ्यासक.
आहेस खरा इतिहासाभ्यासक.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
असेच
शिवाशीव असेल की नाही सांगता येत नाही. पण तिला दरबारात आणवले गेले, तेदेखील ती रजस्वला आणि एकवस्त्रा असताना, असे म्हटले आहे. त्यावरून रजस्वला स्त्रीने आडोशाला रहावे, चारचौघांत येऊ नये अशी प्रथा असू शकेल असे वाटते. (रजस्वला असल्यामुळे एकवस्त्रा का असावी हे उमजत नाही. शिवाय चोळी आणि फेडले जाणारे अधोवस्त्र अशी दोन वस्त्रे अंगावर असल्याचे पाहिले आहे. - संदर्भग्रंथ: अमर चित्र कथा.)
यग्जाक्टलि. रजःस्वला आणि
यग्जाक्टलि.
रजःस्वला आणि एकवस्त्रा हे दोन्ही शब्द आगेमागे येतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
- पाळी येण्याला स्त्रीच्या
कनिष्ठ वर्गाच्या तुलनेत अभिजन वर्गात एकूणच लैंगिकतेबद्दल येत गेलेली नकारात्मकता, उघडपणे न बोलणं वगैरेमुळे असावं. तरीही, विरोधाभासाची गंमत वाटते, की लग्नाला खुलेआम, अगदी पत्रिका छापतानाही शरीरसंबंध वगैरे म्हणण्याचा प्रघातही होताच.
शिवाशिवीचं माहित नाही, पण त्या दिवसात वेगळेपणा असावा, द्रौपदी त्यावेळी रजःस्वला असल्यामुळे एकवस्त्रा असल्याचे उल्लेख आहेत. (लहानपणी रजःस्वला हे अस्वलासारखे काही असावे वाटायचे. तसेही रामायणात जांबुवंत वगैरे होतेच त्यामुळे माझी थिअरी अशक्य वगैरे वाटलीच नाही.)
बिपिन कार्यकर्ते
+१
शिवाशिवीचं माहित नाही, पण त्या दिवसात वेगळेपणा असावा, द्रौपदी त्यावेळी रजःस्वला असल्यामुळे एकवस्त्रा असल्याचे उल्लेख आहेत.
हेच टंकायला आल्तो.
शिवाय "रजस्वला असताना कशाला चार चौघात बोलावतोस" असं काहीतरी ती सेवकाला सांगून परत पाठवते.
ती सेवकाने सांगितलेल्या संदेशावरून येत नाही असे लक्षात येताच मग नंतर दु:शासनाची रवानगी तिला आणायला होते.
म्हणजे "चारचौघात येउ नये" असा काही संकेत त्या दिवसांसाठी होता की काय असे वाटते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चारचौघांत येणं जरा अवघडच
चारचौघांत येणं जरा अवघडच असणार, एकवस्त्रा इत्यादी असताना.
असो. ही मला आवडलेली एक पोस्ट.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
तसं नसेल
>>पाळी येण्याला स्त्रीच्या सर्जनक्षमतेची बाह्य खूण मानता यावं. हे वयात येणं संस्कृतीला साजरं करावंसं वाटलं याचं नवल वाटत नाही. जननक्षमतेचं उदात्तीकरण करण्याची (ओटी भरण्याला असलेलं अनन्यसाधारण महत्त्व, 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव'प्रकारचे आशीर्वाद इ.) आणि निर्मितिक्षमतेचा गौरव करण्याची संस्कृतीची प्रथा पाहता, हे सुसंगतच वाटतं. पण मग ही गोष्ट शरमेची, लपवून ठेवण्याजोगी, संकोचून टाकणारी नक्की कधी आणि कशी होत गेली असावी? मातृदेवतांची ठाणी प्रभावहीन होत जाणं आणि रजोधर्माला शरमेची बाब मानलं जाणं, यांत काही लागेबांधे सापडतात का?
वेगळं बसणं आणि लपवणं या वेगळ्या गोष्टी आहेत बहुधा. ज्यांच्याकडे बाजूला बसत असतील त्यांच्याकडे ते लपवलंच जात असेल असं नाही. त्याचे उल्लेख टाळणे वगैरे इतर टॅबूबाबत असतं तसंच असावं. एका साताठ वर्षाच्या मुलाने काका-काकू वेगळ्या खोलीत (एकत्र) का झोपतात असं विचारलं तर जसं थेट उत्तर टाळलं जाईल तसंच असावं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
'बापरे'
घरात-जवळच्या नातेवाईकात कधीच कोणती बंधने नव्हती त्यामुळे विटाळ वगैरे काही मानतात हे टी व्ही मालिकांमधून(आनंदी गोपाळ वगैरे असावी) 'पुर्वी असे काही असायचे' इतपत माहिती झालेले. ह्या विषयावर बोलावे अशी कोणी मैत्रीणही नव्हती. आजही मला खरतर काही फारसं माहित नाही....या धाग्यातल्या प्रतिक्रीया चाळताना तर 'बापरे' म्हणायची वेळ आली- बायकांची कुचंबणा आणि स्वतःला परिस्थितीचे नसलेले भान या दोन्हीसाठी.
रस्त्यावर रहाणार्या बायका, बांधकामाच्या इथल्या मजूर बायका नेमके कसे काय सोसत असतील असं नेहमी त्यांना पाहून मनात येतं...पण बहुतेक वेळा मनातच ठेवलेलं.
डोन्ट वरी
हा प्रकार ब्राह्मणांत अतिरेकी प्रमाणात आहे. इतर सर्वणांत थोडा आहे. इतरांत (ओबीसी, मागासवर्गीय, मुस्लिम, इ )जवळजवळ नाहीच. म्हणजे जास्तीत जास्त लोकांत नाही. अर्थात माझा सखोल अभ्यास नाही, पण निरीक्षण आहे.
आपण सर्वात पुढरलेली आणि अग्रणी जात आहोत असा ब्राह्मणांचा सहसा समज आढळतो. वास्तव कितीतरी बाबींत एकदम उलटे आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
या प्रतिसादाचा नक्की मुद्दा
या प्रतिसादाचा नक्की मुद्दा काय आहे?
-आपण एलिट आहोत असे ब्राह्मणांना वाटते आणि ते चूक आहे.
-आपण एलिट आहोत आणि त्यामुळे बाकीच्यांबद्दल कणव येते. मुळात एलिट असणेच चूक असल्याने या कणवेचा पाया तकलादू आहे सबब कणवेला अर्थ नाही.
-बाकी जातींचे लोक असा त्रास करून घेत नाहीत. ब्राह्मण असा त्रास करून घेतात अन त्याची शेखी मिरवतात, पण दिव्याखाली अंधार आहे तिकडे कुणाचे लक्ष जात नाही.
यांपैकी नक्की काय म्हणावयाचे आहे?
झालंच तर कणव कुणाला यावी याचे काही मापदंड आहेत का? असले तर ते कोण ठरवणार? अन एकाने ठरवलेले मापदंड बरोबर असे इतरांनी का मानायचे? स्वतःत जराही काही दोष असतील तर दुसर्याची कणव येऊ नये का? नसेल तर का? शिवाय या कणवेचा प्राधान्यक्रम कोण ठरवणार? अन एकाने ठरवलेला प्राधान्यक्रम बरोबर असे इतरांनी का मानायचे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ये रे माझ्या मागल्या
हीच चर्चा, कणव वगैरे, झालेली आहे बहुदा. त्याचा, as usual, काही निष्कर्ष नव्हता निघाला.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
चर्चा अगोदर जाहली असल्यास
चर्चा अगोदर जाहली असल्यास माहिती नाही.
वरील प्रश्नमालिका ते वैयर्थ्य अधोरेखित करण्यासाठीच आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
http://www.aisiakshare.com/no
http://www.aisiakshare.com/node/2631#comment-49011
हे वाचा.
बाकी वैयर्थ्य शब्द नव्याने कळाला. धन्यवाद.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
रैट्ट. धन्यवाद.
रैट्ट. धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अहो इथे सोसण्याबद्दल जे चाललं
अहो इथे सोसण्याबद्दल जे चाललं आहे ते मुख्यत्वे, शारिरीक स्थिती सांभाळून इतकी अवघड कामे कशी करत असतील ते ही चार चौघात असे काहीसे आहे बहुधा. त्याचं स्तोम माजवण्याबद्दल नाहीये.
बिपिन कार्यकर्ते
'...शारिरीक स्थिती सांभाळून
'...शारिरीक स्थिती सांभाळून इतकी अवघड कामे कशी करत असतील...'
...नाही हा मुद्दा नाहीये. टॉयलेटची सोय नसणे हा मुद्दा मला चिंताजनक वाटतो.
हो! साधारण असेच. म्हणजे
हो! साधारण असेच. म्हणजे शारिरीक भोग व्हर्सेस स्तोम असा मुद्दा होता माझा.
बिपिन कार्यकर्ते
किमान आडोशाची जागा+पाणी
किमान आडोशाची जागा+पाणी (टॉयलेट) ही सोय नसताना काय करत असतील हे मला माहित नाही- समूहात राहून त्यांनीच त्यावर तोडगे काढलेले असणार.
कुचंबणा होणे -सोसावे लागणे या अर्थी लिहिले.
या धाग्यातल्या प्रतिक्रीया
माझा प्रतिसाद सॅनिटरी फॅसिलिटीबाबत नव्हता. इथल्या प्रतिक्रिया अशा फॅसिलिटींच्या अभावाबद्दल नव्हत्या. पाळीचे स्तोम, तिच्याशी निगडीत अन्याय या विषयावर होत्या. माझे निरीक्षण मी या दिशेने नोंदबले आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मुळातच काही न्याय असेल तर
मुळातच काही न्याय असेल तर थोडा अन्याय होऊ शकेल. ज्या समाजालाच साधारण वाळीत टाकलेलं असतं, नटणं, मुरडणं, चारचौघांत मिसळणं हे करता येत नाही त्यांना आणखी किती बाहेर काढणार? वरच्या बऱ्याच प्रतिसादांमधे लोकांनी (उदा नितिन थत्तेंचा प्रतिसाद) लिहीलेलं आहे, पर्याय नव्हता म्हटल्यावर बाजूला बसणं बंद झालं. पोटाची खळगी भरायची बोंब नसते तेव्हा हे असे चोचले सुचतात. सगळ्यांना आपापला जीव प्यारा असतो (हे पण उत्क्रांतीमधून सुस्पष्ट होतं बरं!) आणि तो जगवण्यासाठी जे काही करावं लागतं ते केलं जातं. गरीब लोक प्रगत किंवा उदारमतवादी आहेत हा निष्कर्ष काढण्याची घाई करू नका.
मजुरांच्या बाबतीत माहित नाही, पण शक्यता आहे की पाळी आलेल्या स्त्रिया कबील्यातल्या मुलांकडे पाहत असतील. पुरेसा मोठा कबीला असेल तर अधूनमधून कोण-ना-कोण बाहेरची असणार. मुलांकडेही पाहिलं जाईल आणि त्यातल्या त्यात शारीरिक श्रमांमधून तिची सुटका होईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अहो जोशीबुवा
परस्त्री-परपुरूषाला किती गोष्टी कळाव्यात याबद्दल भारतीय संस्कृतीत जी काही मानकं आहेत त्याचा विचार करता, तुम्हाला असं निरीक्षण करून कितपत कळेल याबाबत मला शंका आहे. थोडक्यात, खात्रीलायक विदा द्या. (वैयक्तिक निरीक्षणांवरून मोठ्या लोकसमूहाबद्दला निष्कर्ष मांडण्याची वाईट सवय अनेकदा(अनेकांत) दिसते, हेवेसांनल.)
विद्या अभावी ही नुसतीच रँट आहे.
-Nile
अवांतरच पण थोडे समांतर
इथे द्रौपदीच्या एकवस्त्रा असण्याचा उल्लेख झाला आहे. सुमा करंदीकरांच्या 'रास' या आत्मचरित्रात असा उल्लेख आहे की त्यांच्या काळात आणि घरात त्या दिवसांत कपडे वगैरे घेण्याची पद्धत नव्हती. बाईने एक जुनेर नेसून काळोखाच्या खोलीत बसून रहायचे असे. सुमाताईंच्या माहेरच्या कुटुंबात (सांगलीच्या?) राजघराण्यातल्या कोणी बाई लग्न होऊन आल्या आणि त्यांनी ही रीत सासरच्या बायकांना शिकवली. म्हणजे एकवस्त्रा असणे हे आताआतापर्यंतचे वास्तव होते. मला वाटते ह्याचा संबंध वस्त्रांच्या कमतरतेशी असावा. त्या काळी अगदी फाटलेली वस्त्रेही कोणी टाकून देत नसत. नेसूचे विरले तर ते शिवायचे, होताहोईतो त्याला दांड लावून ते वापरायचे, अगदीच कामातून गेले तर त्याचे धडके तुकडे कापून त्याची वाकळ अथवा गोधडी शिवायची, स्वयंपाकासाठी हातपुसणी, गरम भांडी उतरवण्यासाठी हातफडकी बनवायची असा मामला असे. लहान मुलगे तर नुसत्या लंगोटीवरच असत. व्यंकटेश माडगूळकरांच्या एका कथेत बाईच्या अंगावर वस्त्र नसल्यामुळे ती लेखकाचा पाहुणचार करायला पुढे येत नाही, कुडाच्या भिंतीतल्या दरवाजावजा चौकटीआडून केवळ पाण्याचे भांडे पुढे करते असा प्रसंग आहे. वस्त्र किंवा सूत हा महागडा आणि दुर्मीळ प्रकार होता. (मुळात कापसाचे पीक सार्वत्रिक होते का, हाही प्रश्न आहे.आपल्याकडे कृषिसंस्थेचा इतिहास यावर फारसे संशोधन झालेले नाही. अलीकडील डॉ अशोक जोशींसारखे काही अपवाद)) त्यामुळे पुडीचा दोरासुद्धा नीट गुंडाळून ठेवला जाई. आजही काही ठिकाणी हातमागावरचे विणकाम पहायला मिळते ते किती संथ आणि कष्टप्रद असते ते पाहिले तर जुन्या काळातली वस्त्रांची दुर्मीळता समजेल आणि एकवस्त्रा असणेही समजेल. खराब व्हायचेच तर एकच वस्त्र खराब होऊ दे असे काहीतरी असावे.
खूपच जुन्या काळातले वाचन आहे पण माझ्या आठवणीनुसार उषास्तुतीच्या श्लोकांत उषेच्या रक्तिमेचे वर्णन करताना 'ही उषा रजस्वलेसारखी रक्तिम दिसत आहे' असे काहीसे वाक्य आहे. [तसेच अन्य एका ठिकाणी (बहुधा कालिदास) ही उषा ताज्या कोवळ्या मांसखंडाप्रमाणे लाल गुलाबी दिसत आहे असेही वाक्य आहे] कदाचित तेव्हा ऋतुमती होणे ही लपवण्याची बाब नसावी.
द.र. कवठेकरांच्या कादंबर्यांतून (रुपेरी कडा वगैरे) 'मुका नातू होणे' हा वाक्प्रचार वाचनात आला. त्याच कादंबर्यांतून 'नहाणतुली', 'डोहाळतुली' हे शब्द आणि त्या त्या वेळीचे समारंभही कळले. यातल्या 'तुली' शब्दाची खूप गंमत वाटे आणि या प्रसंगी त्या मुलीची (साखर वगैरे पदार्थांनी) तुला करीत असावेत असेही वाटे. हा शब्द मनात इतका रुजला की नंतर कित्येक वर्षांनी मार्क टली (मराठीत टुली किंवा तुली) चा उल्लेख वाचला की हमखास या शब्दाची आठवण येई. या कादंबर्या विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या (१९३०-५० दरम्यानच्या) असाव्या. म्हणजे साठ-सत्तर वर्षांपूर्वीपर्यंत ही प्रथा महाराष्ट्रात होती.
या प्रतिसादामुळे 'बाहेर'
या प्रतिसादामुळे 'बाहेर' बसण्याची प्रथा का निर्माण झाली असेल याचाही अंदाज येतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आणखी थोडे...
या बाबतीत मानववंशशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातल्या कष्टकरी आणि भटक्या समूहांविषयी माहिती मिळवताना असे ऐकण्यात आले की यांच्यातल्या स्त्रिया पाळी सुरू झाल्यावर पोटाच्या स्नायूंची काही विशिष्ट हालचाल करून सगळा विटाळ अंगाबाहेर टाकत. त्यामुळे पाळी लवकर संपे आणि अडचणही. हे खरे की कसे याचा मागोवा घेता आला नाही पण कुठेतरी नमूद करून ठेवावे म्हणून लिहीत आहे. तशीच आणखी एक गोष्ट ऐकण्यात आली की या वर्गातल्या काही जमातींत स्त्रियांना पाळी महिन्याच्यामहिन्याला येत नाही. दोन-तीन महिन्यांनी येते.(येत असे.) दर महिन्याला पाळी येणार्या बाईला 'काय दर महिन्याला बामणांसारखी बसतेस' असे हिणवले जाई. आज अर्थात परिस्थिती बदलली आहे. आहार आणि आरोग्य सुधारले आहे. तेव्हा बदल निश्चितच झाले असतील. आज मुलींना पाळी लवकर म्हणजे ९ ते ११ वर्षांच्या दरम्यान येते आणि रजोनिवृत्तीही लांबली आहे अशा आशयाचा एक लेख टाईम्स ऑव्ह इंडियामध्ये वाचल्याचे आठवते.
पाळीसंबंधी नाही पण दुसर्या एका प्रथेविषयी नक्की माहिती आहे की मुस्लिमांमध्ये पतीपत्नीचा संबंध झाल्यास त्यानंतर पत्नीला डोक्यावरून आंघोळ करावी लागते. भारतीय मुस्लिम आणि पारसी लोकांत पाळीविषयीचे नियम अगदी कडक आहेत. पारसी लोकांत तर बाळंतपणानंतर बाईला तीन महिने 'कन्फाइन्मेंट' पाळावी लागते. खंबाला हिल इथल्या पारसी जनरल हॉस्पिटल मध्ये बाळंतिणीची वेगळी सोय असे. (या सोयीविषयी देखील केवळ ऐकलेच आहे.)
हे अ प्रायरी तरी विचित्र
हे अ प्रायरी तरी विचित्र वाटते आहे. २ महिन्यांनी पाळी येणे हे जीवशास्त्रीयदृष्ट्या नॉर्मल परिस्थितीत शक्य आहे का? एका मुलीला एका प्रयोगात मुद्दाम काळवेळ न कळेल अशा ठिकाणी महिना दोन महिने काढायला लावूनही बरोब्बर २८ दिवसांनी तिची पाळी सुरू झाल्याचा-अर्थातच ती सर्वस्वी इंटर्नल जैविक घड्याळवाली प्रक्रिया असल्याचा निष्कर्ष मध्ये वाचनात आला होता.
शिवाय, वय वर्षे १० पर्यंत पाळी येणे म्ह. जरा जास्तच लौकर नाही का? साधारणपणे १२-१३ व्या वर्षी (साधारणपणे ८ वी पासून) वा नंतर सुरू झाल्याचे पाहिले आहे. हेही अर्थात उष्ण/थंड कटिबंधाशी निगडित आहे असे वाचलेले आहे. उष्ण कटिबंधात लौकर अन थंड कटिबंधात उशिरा येणे इ.इ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पाने