रोगापेक्षा उपाय भयंकर?
ब्रिटिश शास्त्रज्ञांद्वारे रासायनिक कीटकनाशकांना पर्याय म्हणून हजारो मॉडिफाइड सुधारित ( जीएम ) किडे युरोप मध्ये विकसित केले केले आहेत.
कीटकनाशके मानवी आरोग्यास आणि वातावरणास भरपूर नुकसान करतात आणि त्यामुळे मधमाश्या आणि इतर किडे लाखो मरुन जातात हे मान्य केले तरी पण मॉडिफाइड सुधारित किडे मॅन्युफॅक्चरिंग हा योग्य उपाय आहे का?
पीक नुकसान करणारे वन्य कीटक मारणेसाठी वापरला जाईल तो जीएम ऑलिव मोठ्या प्रमाणात रिलिझ करण्याचा विचार आहे . त्यांच्या उत्पादनास जबाबदार कंपनी Oxitec आहे . ते शेवटी अळ्या किंवा अळी टप्प्यात मादी अपत्य मृत्यू होतो परिणामी , नैसर्गिकरित्या महिलांची सह सोबती असे जीएम नर ऑलिव सोडून करण्याची योजना आहे . हे झाडं रासायनिक फवारण्याची गरज नाही. तर ऑलिव माशीच्या लोकसंख्येतील घट झाल्याने कीटक-नियंत्रण होइल असा प्लॅन आहे .
Oxitec त्याच्या जीएम किडे क्षेत्रात चाचणी अमलात आणणे परवानगीसाठी स्पॅनिश नियामक अधिकारी जबाब्दार आहे . चाचणी यशस्वी झाल्यास , अधिक चाचण्या ग्रीस मध्ये घेतल्या जाईल आणि इटली मध्ये अखेरीस तसेच ब्रिटिश शेतात जीएम किडे वापरले जातील .
हे भविष्यात घातक ठरू शकते .
अधिक माहिती -
http://www.collective-evolution.com/2013/09/10/thousands-of-genetically-...
थोड्या वेळापुरता जनुकीय किंवा
थोड्या वेळापुरता जनुकीय किंवा जीएम भाग बाजूला ठेवू. नक्की काय करण्याचा प्रयत्न आहे याचा विचार करू. काही हानिकारक किड्यांमध्ये असा बदल घडवून आणायचा जेणेकरून त्यांना पिल्लं होणार नाहीत. हेच झुरळं मारण्यासाठी करता आलं तर? म्हणजे समजा त्यांना असं औषध दिलं की ज्यातून त्यांच्यात वंध्यत्व येईल. म्हणजे त्यांना मुलंच होणार नाहीत, आणि पुढची पिढीच तयार होणार नाही. हे चालेल का? चालेल की नाही हा खरा तर प्रश्नच नाही, कारण ही पद्धत अत्यंत यशस्वीपणे वापरली गेलेली आहे.
आता ही पद्धत का तयार झाली? याचं कारण म्हणजे रासायनिक फवारे मारून झुरळं मारण्याचे उपाय फसले. हे उपाय का फसले? तर या रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे झुरळांमध्ये जनुकीय बदल झाले, जे या रसायनांना प्रतिरोधक आहेत. (खरं म्हणजे या वापरामुळे बदल झाले नाहीत, तर या रसायनांमुळे प्रतिरोधक म्यूटेशन्स टिकून राहिली. आणि ही प्रतिरोधकता नसलेली झुरळं मरून गेली. उरलेली ती प्रतिरोधक). म्हणजे झुरळांच्या बाबतीत अतिरेकी रासायनिक वापरामुळे जनुकीय बदल असलेली झुरळं शिल्लक राहिली. आता असे जनुकीय बदल असलेली झुरळं ही आधीच्या झुरळांपेक्षा पर्यावरणासाठी अधिक चांगली की अधिक वाईट याचा अभ्यास कोणी केला होता का? अर्थातच नाही.
हेच वर दिलेल्या किड्यांबाबतही होऊ शकतं. रसायनं वापरा किंवा हाताने करा - जनुकीय बदल होतातच. कुठले अधिक धोकादायक? सध्या तरी हे किडे वाढणं अधिक धोकादायक असं म्हणून ते मारायचे. त्यातून बचावलेली, कीटकविरहित फळं खायची हे फायदेशीर. आता फळंच खायची नाहीत, जाऊदेत, किड्यांना खाऊ देत हवी तेवढी असं म्हणायचं असेल तर गोष्ट वेगळी.
जरा जास्त सिम्प्लिफिकेशन
जरा जास्त सिम्प्लिफिकेशन झालं. हे किडे अन्नसाखळीत सगळ्यात वरती आहेत का? नसल्यास ते नष्ट झाल्याने कोणकोणात्या प्राण्यांवर परिणाम होईल?
या किड्यांनी खाल्लेली फळे वाया जातात म्हणजे नक्की काय होते? माणसाच्या दृष्टीने वाया गेलेली ही फळे मातीतल्या सुपीकपणास सहाय्यक घटकांना मिळतात का? या प्रश्नांचा उहापोह झालेला आहे असे वाटत नाही.
नष्ट करण्यापेक्षा संख्या नियंत्रित करणे हे चांगले असते आणि ते काम निसर्गात फुकटात होतच असते; पण सगळी फळे माणसालाच मिळाली पाहिजेत आणि इतरांना अजिबात मिळू नयेत असे म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी.
हा नियंत्रणाचाच प्रयत्न आहे.
हा नियंत्रणाचाच प्रयत्न आहे. त्यासाठी भरपूर पेस्टिसाइड्स मारणं तर चांगलं नाहीच. कारण पेस्टिसाइड्स वापरली की पेस्टिसाइड रेझिस्टंट म्यूटेशन्स आपोआप वाढतात - म्हणजे जनुकीय बदल होतोच. त्यापेक्षा वंध्यत्व देणाऱ्या औषधाप्रमाणे इफेक्टिव्ह वंध्यत्व देणारं जेनेटिक बदल करायचे. मुद्दा या दोन बदलांपैकी कुठचा स्वीकारार्ह हे कसं ठरवणार इतकाच आहे.
प्रजातिच्या सर्व्हायवलसाठी
प्रजातिच्या सर्व्हायवलसाठी जनुकीय बदल होणे आणि ती नष्ट करण्यासाठी जनुकीय बदल करणे यात मूलभूत फरक आहे असे मला वाटते.
असो. हा न संपणारा वाद पुन्हा नको.
कारण पेस्टिसाइड्स वापरली की
A misconception about evolution.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
या प्रतिसादाला निरर्थक श्रेणी
या प्रतिसादाला निरर्थक श्रेणी कोणी व का दिली कोण जाणे?
पण अशी जेनेटिक म्युटेशन्स होतील अशी कोणतीही खात्री नसते. अनेक म्युटेशन्सपैकी एखादे योगायोगाने त्या पेस्टिसाईडला प्रतिरोधक ठरले तर ती प्रजाति जगते हे बरोबर आहे.
किंबहुना विशिष्ट कीटकांची संख्या वाढण्यामागे त्यांच्या भक्षक प्रजातिचा पेस्टिसाईड्समुळे सर्वनाश झालेला असणे हे कारण असू शकते.
हे भविष्यात घातक ठरू शकते. हे
हे वैयक्तिक मत आहे की Generic विधान?
- (खूप 'किडे' असलेला) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
पेस्टिसाईड
आत्ताच टॅबी आलेल्या माहितीप्रमाणे पेस्टिसाईड्समुळे मधमाश्यांचा कॉलनी-विच्छेद.