मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग ११
व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
==========
ऐसी अक्शरे चा राजीनामा देण्याची सुविधा उपलब्ध आहे काय? खाते बन्द कसे करता येईल?
काहीतरी पूर्वपीठीका द्या की.
काहीतरी पूर्वपीठीका द्या की. का राजीनामा द्यायचा आहे, व्यसन लागलं आहे, कुर्बुरी झाल्या आहेत किंवा अन्य काही कारण?
बाकी तुमचा एकच लेख आहे. "अब की बार" का काहीतरी. असू देत की तो.
लॉगिन करु नका , दूर रहा.
कदाचित ते NDE बद्दल वाचून घाबरले
कदाचित ते NDE बद्दल वाचून घाबरले असावेत >)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
वा!!! या म्हणतात चोराच्या
वा!!! या म्हणतात चोराच्या .... बा!!!
म्हणजे भुतान खेतान चे धागे अस्वल्जीकाढतात अन आळ आमच्यावर .... ये बहुत नाइन्साफी है रं साम्भा!!!
ये बहुत नाइन्साफी है रं
ये बहुत नाइन्साफी है रं साम्भा!!!
तुमच्या दयाळू माहीतीसाठी - सांबा हा माझा व्यक्तिगत असिस्टंट आहे. तो फक्त ३ कामे करतो -
१)सरकारी कारवायांबद्दलची माहीती पुरवणे (उदा. गब्बर के सर पे कितना इनाम रखे है सरकार...),
२)निशाणा साधणे, व
३)दारूच्या बाटल्या फोडणे (बसंती नृत्य करायला लागली की तिला छळायला).
---
इन्साफ व नाइन्साफी चे निर्णय फक्त गब्बर स्वतः करतो. (उदा. गब्बर के ताप से तुम्ही सिर्फ एकही आदमी बचा सकता है. खुद गब्बर.)
तेवढं इनाम ...
तुमच्या डुईवर कितीसं इनाम आहे तेही सांबाच लक्षात ठेवतो.
गब्बरभौ, तेवढं जरा बघा. नाय म्हन्जे आर्थिक गोष्टींत तुम्हीच लक्ष घातलेलं बरं! नाही तर घपला व्हायचा.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
गब्बरची डुई पाहता सौ गब्बरही
गब्बरची डुई पाहता सौ गब्बरही थोडं इनाम देत असतील अशी शंका येते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माणसाच्या दयाळूपणाचे दुध ;)
<तुमच्या दयाळू माहीतीसाठी> . मुलाचा शाळेतील इंग्लिश गृह्पाठ घेताना आम्ही टवाळी करत ,'मिल्क ऑफ ह्युमन काइण्ड्नेस'चे रुपांतर
'माणसाच्या दयाळूपणाचे दुध' असे केल्याचे आठवले .
+१
दयाळूऐवजी आम्ही कॄपाळू म्हणायचो त्याची आठवण जाहली. तर्खडकरांच्या भाषांतरपाठमालेतले एकेक दिव्य शब्द पाहता भाषांतरेही शुद्ध देशी तुपातली व्हायची, उदा.
त्याला चार मुले आहेत- him has four children. इ.इ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हल्ली म्हणे 'कृपा' शब्द
हल्ली म्हणे 'कृपा' शब्द वापरता येत नाही, मंडळी रडु लागतात
अर्थात कृपाळु कदाचित चालुन जावे पण कशाला विषाची परिक्षा नै!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
?
क्रिपा के जगह क्रिपाळू वापरना शुरू करो, क्रिपा आनी शुरू हो जायेगी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काय झालं? पगार कमी पडतो का?
काय झालं? पगार कमी पडतो का? वर्क-लाइफ बॅलन्स नीट साधला जात नाही का? राजीनामा देण्यापूर्वी थोडी चर्चा करू की, तुमचे प्रश्न कसे सोडवता येतील याची... वी व्हॅल्यू एम्प्लॉयीज. दे आर अवर बिग्गेस्ट असेट.
मी कधीही कोणालाही असं
मी कधीही कोणालाही असं म्हणताना ऐकलेलं नाहिये की - I value my company and my job is my biggest asset.
जसं मी कोणत्याही एम्प्लॉयी ला असं बोलताना पाहिलेलं नाहिये - की अमुक अमुक मॅनेजर मला खूप चांगले वागवतो. व म्हणून मी त्या मॅनेजर साठी चांगलं काम करतो/करीन. (आता लगेच असा मॅनेजर अस्तित्वातच नसतो - हा युक्तिवाद ठरलेला.)
मायबाप
मायबाप कम्पनी / इंडस्ट्री
ककिंवा "अन्नदाता " हे शब्द ऋऋण व्यक्त ककरण्यासाठी खूपदा ऐकले
आहेत. असेट्स असं कुणी म्हणत नसेल , भाव तोच.
अशातच कुणीतरी " पक्ष ही माझी आई आहे " असं कयतरी बोल्ला.
शिवाय
I value my company and my job is my biggest asset. असं विविध कंपन्यांचे ceo पदावरील एम्प्लॉयी
बोलताना दिसतातच की मुलाखतींमधून.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तुम्ही अजुन मला भेटला नाहि
तुम्ही अजुन मला भेटला नाहि आहात. त्याचा परिणाम आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
की अमुक अमुक मॅनेजर मला खूप
मला भेटा
एकदोन अपवाद वगळता माझ्या बॉसेसबद्दल मला आदर वाटला आहे. जे काही चांगलं काम हातून झालेलं आहे ते बॉसने दिलेल्या प्रोत्साहनामुळे किंवा not to let her/him down या भावनेपोटी. कंपनी ही बिनचेहेर्याची, कोरडी एंटिटी मोटिव्हेट करू शकत नाही.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
+१
बरेचदा लोक आपला जॉब सोडून नवा जॉब, किंवा टीम धरतात, त्यामागे बॉस हे एक महत्त्वाचे कारण असते. त्याउलट एखादा बॉस जेव्हा नव्या जागी जातो, तेव्हा बरेचदा आपल्या पूर्वीच्या सहकार्यांना निमंत्रित करतो, असे स्वानुभवावरुन पाहिले आहे.
चांगला professional rapport असलेला बॉस हा फार उच्च motivational फॅक्टर आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
भगताचा नाग्या हा राहूल
भगताचा नाग्या हा राहूल गांधींचा आयडी आहे काय?
बायदवे, व्हाय ओनली अॅसेट
बायदवे, व्हाय ओनली अॅसेट व्हेन वन कॅन हॅव, इगलेट्स, पिगलेट्स, एट ऑल?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कारण त्यात श्लेष आहे.
कारण त्यात श्लेष आहे.
कारण त्यात द्विरुक्ती आहे.
कारण त्यात द्विरुक्ती आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अॅस-श्लेषाचे ग्रहयोग रोचक
अॅस-श्लेषाचे ग्रहयोग रोचक आहेत खरे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काल नरेंद्र मोदी रडले ते खरे
काल नरेंद्र मोदी रडले ते खरे का खोटे हि चर्चा विद्वानांत काही टी वी चॅनेलवर चालू होती. बर्याच जणांना विश्वास होता कि तो पूर्ण ड्रामा होता. सी एन एन -आय बी एन वर डोक्यूमेंटरी फिल्ममेकर आनंद पटवर्धन यांनी अतिशय कडवट भूमिका घेतली. शायना एन सी मोदींना डीफेंड करत होती.
देशाच्या लोकांनी अत्यंत धक्कादायक, चूक, इ इ निर्णय घेतला आहे, मोदी नट आहेत, त्यांचे रडणे खोटे होते, तो भावनाहिन आहे, जनसंघ, संघ, बीजेपी नि मोदी यांचा अख्खा इतिहास राष्ट्रद्रोही आहे, इ इ म्हणू लागले. अँकर, शायना नी बरेचदा सांगायचा प्रयत्न केला कि - You are being completely unfair, at least to the democracy. You should talk of the PM with dignity. पण छ्या. गडी बधेना. असे तुम्ही का म्हणता म्हटल्यावर -"का मला असे म्हणायचा अधिकार नाही का?" असे म्हणू लागला.
आता मला पटवर्धनांना काय काय म्हणायचा अधिकार आहे याचा विचार मनात आला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ते गंगाआरती, रडणं आणि नमस्कार
ते गंगाआरती, रडणं आणि नमस्कार जरा शोबाजी होती असं माझही मत आहे, पण त्यावरुन पटवर्धनांची मते पटत नाहीत.
नाही.
पटवर्धनांना काहीएक म्हणायचा तुम्हांला अधिकार नाही. त्यांचं ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य, तुमची ती व्यक्तिगत टीका.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अधिकार आहे
तुम्ही संख्येनं आमच्याहून अधिक आहात म्हणून आमच्याहून योग्य आहात, असं होत नाही.
लोकशाही ह्याचा अर्थ बहुसंख्यांनी* अल्पसंख्यांवर वरवंटा फिरवायचा असा होत नाही.
लोकशाहीचा अर्थ असा की ज्याला जे वाटतं आहे ते उघड बोलण्याचा अधिकार हवा.
उदा :- आख्खे संकेतस्थळ तुम्हाला लै भारी म्हणत असले आणि मला तसे वाटत नसेल; तर तुम्हाला
मठ्ठ म्हणण्याचा अधिकार मला हवा(किंवा उलट). असे असेल तर संकेतस्थळावर लोकशाही आहे असे म्हणता यावे.
अधिक लोकांनी निवडून दिलेलं आहे; म्हणून इतरांनी आहे ते जशास तसं मान्य करु नये.
आक्षेप वैधानिक पद्धतीनं नोंदवत रहावेत.
*
अल्पसंख्य - बहुसंख्य हे धार्मिक अर्थानं वापरलेलं नाही; खरोखर संख्यावाचक अर्थानं वापरलं आहे.
उदा :- समलिंगींचा मुद्दा घेतला, तर भारतात समलिंगींना आक्षेप घेणारे बहुसंख्य. समलिंगी असणारे
किंवा त्याबद्दल आक्षेप न घेणारे हे अल्पसंख्य.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत.
तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत. तंतोतंत.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अल्पसंख्यांवर वरवंटा फिरवणे
अल्पसंख्यांवर वरवंटा फिरवणे आणि वरवंट्याला हातही घातलेला नसताना-नव्हे, जवळ वरवंटाच नसतानाही-अल्पसंख्यांनी वरवंटा म्हणून वराडणे आणि त्या वराडण्याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून गोंजारणे यात काही फरक आहे की नाही?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वराडण्याचं स्वातंत्र्य =
वराडण्याचं स्वातंत्र्य = अभिव्यक्तिस्वातंत्र्य. ते वृथा आहे का सकारण आहे, हा मुद्दाच नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मग अल्पसंख्यांच्या मताविरुद्ध
मग अल्पसंख्यांच्या मताविरुद्ध मत कुणी मांडलं तर इतकं पिसाळायचं काम नाही. विरुद्ध बाजूच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल अनकम्फर्टेबल असलेल्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल कुणी उदासीन असेल तर नक्कीच समजू शकतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वादग्रस्त
वरवंट्याला हातही घातलेला नसताना
sure?
"अजून घातलेला नाही" हे म्हणताना हिश्ट्री विसरता येत नाही.
-नव्हे, जवळ वरवंटाच नसतानाही
again---sure?
एका विशिष्ट समाजगटाला काहिसं भयभीत झाल्यासारखं आणि त्यातून चिडल्यासारखं का वाटतय असं तुला वाटतं;
ते ही वरवंटा नसताना ???
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
एका विशिष्ट समाजगटाला काहिसं
काय राव. सरळ सांग ना, मुसलमान समाज म्हणून. तो आक्षेप कै नवीन नाही. पण या निवडणुकीत मुसलमान मतेही दाबून मोदीला मिळालेली आहेत बॉ. इतकी भीती जर त्यांना वाटत असती तर "नेहमीप्रमाणे एकगठ्ठा" मते काँग्रेसला दिली असती, नै? तदुपरि मुसलमानांना नक्की काय वाटतं हे सांगणारे सगळे तिच्यायला हिंदूच! मज्जाच आहे खरी.
इतिहासावर माझे लै प्रेम आहे. पण तो बिनकामी उगाळण्यात मला काडीमात्र रस नाही. कमॉन, दुसरा मुद्दा बोला की राव. संसदेच्या पाया पडले, गंगेची आरती केली. त्यातला सिंबॉलिझम हुडकून मग त्यावर टीका करा की. तेच तेच तेच तेच....बोअर होतं राव.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कमॉन, दुसरा मुद्दा बोला की
त्याबद्दल खुद्द मोदींनाही माहित नसावे, इतरांचे काय घ्या.
किंवा
वेट फॉर १ मोर इयर.
पण या निवडणुकीत मुसलमान मतेही
बाकी आपले नेहमीचे चालुच राहिल, पण हे विधान मी पश्चिम युपीपुरते (जिथे वरवंटा फिरत असतानाही सपासरकार स्वस्थ होते तिथे)स्वीकारायला तयार आहे.
बाकी भारतातही असे झालेय याला काहि आधार?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तिथही मान्य करायची गरज
तिथही मान्य करायची गरज नाही.
http://www.thehindu.com/opinion/op-ed/not-how-many-but-who-voted-made-th...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
रोचक आहे. मात्र मुसलमान
रोचक आहे. मात्र मुसलमान समाजातील तरुणांनी बीजेपीला भरून मते दिलेली असण्याची शक्यता या लेखानेही नाकारली जात नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
>>मात्र मुसलमान समाजातील
>>मात्र मुसलमान समाजातील तरुणांनी बीजेपीला भरून मते दिलेली असण्याची शक्यता
(मुस्लिम) तरुण जुने विसरून खरोखरच पुढे जात असतील तर ते क्रेडिटेबल आहे. विशेषतः ते त्यांच्याबरोबर जात आहेत जे ४००-५००-१००० वर्षापूर्वीच्या गोष्टींवर/घटनांवर देश पेटवायला अजूनही तयार आहेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
(मुस्लिम) तरुण जुने विसरून
+१०१०१००!!.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अहो तेज पाल
अहो बैल सुध्धा मोदीमागे गेले
मुसल्मान तरूण काय धरुन बस्लाय
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
@ ऋषिकेश
लोकसभेच्या निवडणूका एक्झॅक्ट पाच वर्षांनी होत नसाव्यात. म्हणजे २६ मे २०१४ ला पंतप्रधान झालेल्या माणसाने २५ मे २०१९ मधे निवडणूका घेण्यात, वा दुसरे सरकार बनवण्यात, इ इ टाळाटाळ केली, वेळ मागीतला, इ इ तर जास्तीत जास्त किती वेळ असे त्याला करता येईल? याला नियंत्रित कोण करतो. उदा. मोदी म्हणाले कि मला निवडणूकच डिसेंबर २०१९ मधे घ्यायची आहे तर कोण कोण ऑब्जेक्शन घेईल नि कसे कसे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काही नियम आहेत १. लोकसभेचा
काही नियम आहेत
१. लोकसभेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो. जर लोकसभा त्याहून आधी विसर्जित केली गेली नाहि, तर लोकसभेच्या पहिल्या सत्रापासून पाच वर्षांनी ती आपोआप डिसॉल्व्ह होते (याला अपवाद आणीबाणीचा व राष्ट्रपती राजवटीचा आहे, अन्यथा अपवाद नाही. आणीबाणी नसलेली राष्ट्रपती राजवटही सहा महिनेच ठेवता येते.).
२. लोकसभा विसर्जित करायचा अधिकार पंतप्रधानाप्रमाणेच काही विशिष्ट परिस्थितीत लोकसभाअध्यक्षांनाही आहे. जर पंतप्रधानांनी कार्यकाळ संपल्यावरही लोकसभा विसर्जित करायची शिफारस केली नाही तर लोकसभाध्यक्ष आपल्या अधिकारात लोकसभा विसर्जित करू शकतात (हे फक्त पाच वर्षे पूर्ण झाल्यावर अन्यथा अध्यक्षांना पंतप्रधानांच्या शिफारसीशिवाय हे करता येत नाही)
३. संसदेच्या दोन सत्रांमधील अंतर ६ महिन्यांहून अधिक असु शकत नाही. तेव्हा लोकसभा विसर्जित झाल्यापासून ६ महिन्यांच्या आत नवे सत्र भरवावे लागते त्यामुळे निवडणूक आयोगाला निवडणूका त्या दरम्यान घ्याव्याच लागतात.
त्यांना तसे करता येणार नाही. समजा पहिले सेशन पावसाळी अधिवेशन असेल जे समजा जुलैमध्ये सुरू झाले तर ५ वर्षांनी त्याच दिवसापर्यंत लोकसभेचा कार्यकाळ असेल. २०१९ च्या बजेट अधिवेशनाच्या पहिल्या भागानंतर त्यांना लोकसभा विसर्जित करायची शिफारस करावी लागेल. तसे न केल्यास जुलैमध्ये ती आपोआप विसर्जित होईल. त्या आधी निवडणूका होणे व नवे लोकसभा सदस्य निवडून आणणे बंधनकारक असेल.
जर मोदींना निवडणुका त्याही पुढे लांबवायच्या असतील तर आणीबाणी आणणे याव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मिस्क
काल फार मोठी अँटी मोदी लॉबी थंड पडलेली पाहिली. नंदिता दास, महेश भट, इ इ. संतोष वाटला. हे लोक भावनिक पण प्रामाणिक आहेत.
यू आर अनंतमूर्तींचे दर्शन झाले. सी एन एन आय बी एन वर सागरिका रोज या सिनिक्सना बोलावते आहे. अनंतमूर्तींना राईट ऑफ करावेसे वाटले. तो मूल प्रामाणिकपणा तिथे आढळला नाही.
काँग्रेसवाल्यांनी भाजप व मोदींचे नाव न घेता नव्या सरकारचे अभिनंदन केले व वर आम्ही नव्या सरकारला पूर्ण सहकार्य करू म्हणाले.
नितिश कुमारांना मोदींचे अभिनंदन करायला सवड मिळाली.
आनंदीबेन मुख्यमंत्री झाल्याने स्त्रीवाद ५०० वर्षे मागे जाण्यावर शिक्कामोर्तब झाले असे म्हणणारे थोडे नमते घेतील अशी आशा आहे.
राहुल प्रियंका अमेठीला जाऊन आगग्रस्त लोकांची सेवा करत आहेत पण काही भाजप्यांना ते नाटक वाटत आहे.
मोदी पंतप्रधान आहेत कि अभिनेते नट आहेत यावर ज्याप्रमाणात, ज्या खुलेप्रमाणे चर्चा होत आहे ते पाहता देशात प्रचंड अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे याची प्रचिती आली. पण मूल्ये कोणाकडेच नाहीत ही भावना भारतात किती प्रबल आहे याचा प्रत्यय आला.
सिक्किमचे पवन चामलिंग हे पाचव्यांदा मुख्यमंत्री बनत आहेत. त्यांनी केलेला प्रांताचा विकास नि त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे मोदींना तोडीस तोड आहे याची दखल एका माध्यमाने घेतलेली नाही.
जगात केजरीवाल आहेत तोपावेतो पिच्चर पाहायला तिकिट काढायची गरज नाही. मोदीच्या शपथविधीपर्यंत केजरीवालांना जेलमधे जायचे होते पण जजही चालू निघाला, त्याने दोनच दिवस जेलात घातले.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शपशविधीला पाकिस्तानसकट सगळ्या
शपशविधीला पाकिस्तानसकट सगळ्या सार्क राष्ट्रप्रमुखांना बोलावण्याचे मोदींचे पाऊल धाडसीही आहे व कौतुकास्पदही!
आरएसएसच्या व शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता त्यांनी पाकिस्तानसकट सर्व शेजारी देशांशी संबंध सुधारायला पावले उचलली पाहिजेत.
बाकी ते खरच रडले का वगैरे प्रश्न गौण आहेत. अशा गोष्टींपेक्षा त्यांची कृती अधिक महत्त्वाची आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वेळ पडल्यास पाकिस्तान वर
वेळ पडल्यास पाकिस्तान वर अतिक्रूरपणे प्रक्षेपणास्त्रांचा मारा करायची तयारी पण ठेवली पायजे. अशा पद्धतीने की भारत म्हंजे कसल्याही परिस्थितीत "गो बाय द बुक" जाणार व शांतता अॅट ऑल कॉस्ट्स - असल्या खुळचट संकल्पनांना जाहीर तिलांजली देऊन तसे क्रेडिबल सिग्नल्स पाठवले पायजेत. बीड्ब्ल्युसी/सीड्ब्ल्यूसी मधून अंग काढून घेणे हे एक पाऊल उचलू शकतो आपण.
-१
ऑन द ग्राउंड आजवरच्या सरकारांनी (जनसंघयुक्त जनता पार्टी, काँग्रेस, भाजपसमर्थित जनता दल, भाजपयुक्त एनडीए) ताब्यात असलेला कुठलाही भूप्रदेश गमावलेला नाही. काश्मीरचे जे भाग आज ताब्यात नाहीत ते १९४७ मध्येही ताब्यात नव्हते. सियाचेन प्रदेश हा अधिकचा प्रदेश ताब्यात आणला आहे.
व्हॉटेव्हर द गव्हर्नमेंट मे व्हर्बली से ऑर क्लेम...... शांतता अॅट ऑल कॉस्ट्स अशी खुळचट कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा ६२ वर्षांचा इतिहास नाही. चीनशी झालेले युद्धसुद्धा भारतातर्फे (भारत क्लेम करीत असलेल्या) सीमेचे एन्फोर्समेंट सुरू झाल्यामुळे उद्भवले असे दिसते.
the late G Parthasarathi, met Nehru on the evening of 18 March 1958, after all concerned had briefed him prior to his departure for Peking as the new Indian Ambassador to China. GP recorded what Nehru said in these terms: “So GP, what has the Foreign Office told you? Hindi-Chini-bhai-bhai? Don’t you believe it! I don’t trust the Chinese one bit. They are a deceitful, opinionated, arrogant and hegemonistic lot. Eternal vigilance should be your watchword. You should send all your telegrams only to me — not to the Foreign Office. Also, do not mention a word of this instruction of mine to Krishna (then Defence Minister VK Krishna Menon). He, you and I all share a common worldview and ideological approach. However, Krishna believes — erroneously — that no Communist country can have bad relations with any Non-Aligned country like ours.”
नेहरू शांतीच्या गोष्टी करत असले तरी शस्त्रांचे कारखाने त्यांच्या काळात उभारले गेले.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
चीनशी झालेले युद्धसुद्धा
ते युद्ध "व्यवस्थित" भारताने (नेहरूंनी) चालू केले होते. कदाचित ते त्यांना जिंकणे जमले नसावे हा भाग वेगळा. भारताने (१०००० वर्षांत?)कधी कुठे हमला केला नाही असे इथले लोक मोठ्या पुळक्याने सांगतात. काश्मिरच्या एका राजाने (सध्याच्या) तुर्क्मेनिस्तानवर हमला केला होता. अशोकाचे, चंद्रगुप्ताचे राज्य अखंड भारताच्या पलिकडे होते. आग्नेय आशिया भारताने कोलोनायझेशन केले. असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ललितादित्य
काश्मीरचा दूरवर हल्ला करणारा राजा म्हणजे ललितादित्य म्हणत असावात.
अशोकाचे आणि चंद्रगुप्ताचे राजे आजच्या saarc च्या बाउंडर्यांमध्येच प्रामुख्याने होते.
भारतात राज्धानी ठेवून सर्वात दूरवर जाणारा प्राणी कुषाण सम्राट कनिष्क.
त्याने मथुरा राज्धानी ठेवत मध्य आशियातील पामिर पठाराच्या पलिकडे मजल मारली होती.
प्लस, ट्रान्सनोक्शिया मधून चीनी राजाशी लढाया करुन काही प्रदेश हस्तगत केला.
(कुषाण हे ही शक - हूण ह्यांच्यासारखेच "बाहेरचे आक्रमक" गृहित धरले, ते "एतद्देशीय " नाहित असे मानले,
तर गोष्ट वेगळी. जसं, मंगोलांनी तुफान हल्ले करुन अर्धे जग ताब्यात घेतले. हलागु खान हा चंगीझ खानाचा नातू,
नॉन मुस्लिम मंगोल वंशाचा व्यक्ती इराणच्या सिंहासनावर बसला. त्याला इराणी लोक थोर पर्शियन सम्राटांच्या यादीत
धरत असतील का, ही शंकाच आहे. त्यांच्यासाठी तो "बाहेरचा आक्रमक"च असेल, असा अंदाज. )
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
काश्मीर अन तुर्कमेनिस्तान
काश्मीर अन तुर्कमेनिस्तान यांमधील डिस्टन्स पाहता लै काही मोठा प्रकार नाहीये तो. मराठी साम्राज्य तंजावरपर्यंत पसरले त्याहीपेक्षा कमीच विस्तार असावा. फक्त तथाकथित हद्दीपार काय गेला तर कौतुक. अरे तो जवळच होता, जाणारच. लोक डिस्टन्स न पाहता फक्त हिंदुकुश ओलांडण्याचं कौतुक करतात. तसं तर उत्तरेतून दक्षिणेत येतानाही लै कायकाय ओलांडावं लागायचं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सहमत
बहुतांश सहमत.
हिंदुकुश ओलांडण्याचं नाही, पण पामिर ओलांडणं मात्र मर्यादित प्रमाणात उल्लेखनीय वाटतं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सहमत.
सहमत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भारत म्हंजे कसल्याही
असे पर्सेप्शन भारताने प्रयत्नपूर्वक / आपोआप जपले असेलही, पण प्रत्यक्षात भारताची वर्तणूक इतर कोणत्याही देशाइतकीच स्वार्थी/स्वकेंद्रित आहे - नी जे योग्यच आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
.
स्पोकन लाइक अ ट्रू राइटविंग ट्रोल.
"वेळ पडली तर" बोले तो? म्हणजे, इतकी जी काही प्रक्षेपणास्त्रे बनविण्याचे, विकसित करण्याचे काम देशात चालते, ते काय दिवाळीत शिवकाशीचे रॉकेटचे उत्पादन एतद्देशीय मागणी पुरविण्यास अपुरे पडते, त्यामुळे ग्राहकांची अडचण होते, तिच्या निवारणार्थ चालते, अशी आपली प्रामाणिक समजूत आहे काय? ('प्लान्ड इकॉनॉमी', 'प्लान्ड इकॉनॉमी' म्हणतात, ती हीच असावी काय? काही केल्या या समाजवादी लेगसीचे भूत उतरायला तयार नाही ब्वॉ! पण आता "अब की बार मोदी सरकार" आल्यावर "अच्छे दिन" येतील, असे म्हटलेलेच आहे, तर आगे आगे देखो होता है क्या!)
मुळात क्षेपणास्त्रे आहेत, आणि ती विकसित करण्याच्या कामात खंड पडलेला नाही, एवढा सिग्नल पुरेसा क्रेडिबल नाही काय? साध्या एखाद्या क्षेपणास्त्राची चाचणी केली, तर "प्रतिपक्षा"कडून बोंबाबोंब होतेच ना? ती काय लुटूपुटूची असते काय? नि मग, "प्रतिपक्ष"ही आपापली क्रेडिबल क्षेपणास्त्रे उत्तरादाखल बनवतातच की! ती काय आपल्या सिग्नलला रेंज मिळाल्याशिवाय?
"वेळ पडली तर"ची तयारी दोन्ही पक्ष चांगलेच करून असतात. ती अशी पब्लिकली बोलून, प्रत्येक नागरिकाला डिट्टेलवार पोष्टकार्डाने कळवून करत नाही कोणी. आणि "वेळ पडली तर"ची तयारी आहे, म्हणून गरज असो नसो, तिचा स्पेक्टाक्युलर डिस्प्ले करायचीही गरज नसते. की आपली आहे आर्मी, म्हणून घुसवली इराकात. या असल्या 'सनसनाटी अॅक्शन्स' डोमेष्टिक पोलिटिकल कन्झम्प्शनसाठी चांगल्या असतात, पण त्यांचे दूरगामी परिणाम देशासाठी चांगले असतातच, असे नाही.
"प्रतिपक्षा"वर अतिक्रूरपणे मारा करायचा म्हणताय, "प्रतिपक्ष" काय तेच करू शकत नाही, केळी (किंवा, नवाझ शरीफांच्या लाडक्या भाषेत, "गवत") खात बसेल, इतके का ते सोपे आहे? तरीही वेळ पडली, तर तेही करण्याची तयारी आहे, म्हणूनच तर मुळात क्षेपणास्त्रे बनविण्याचे तरी कष्ट घेतले (आणि खर्च उचलले) जात आहेत ना? ती प्रत्यक्षात वापरायची वेळ आल्यास कॉष्ट आणि बेनेफिटचा नीट, थंडपणे विचार करूनच करावी लागणार. उगाच आततायीपणे नव्हे. "बुके" ही काही कारणासाठीच बनविलेली असतात, आणि त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे त्या "बुकां"प्रमाणे जाता यावे, हेही असते.
(आणि तसेही काय म्हटले आहे आपल्या "बुकां"त? की आम्ही "पहिला हल्ला" करणार नाही म्हणून? पहिला हल्ला आमच्यावर झाला, तर प्रतिहल्ला न करता मूग गिळून स्वस्थ बसू, असे "बुका"त नेमके कोठे लिहिले आहे, दाखवा पाहू? ती 'सेकंड स्ट्राइक केप्याबिलिटी'ची चर्चा चालते, ती काय तोंडीलावणे, "चखणा" म्हणून?)
बाकी, युद्धाला (आणि त्यातल्या प्रत्येक मूव्हला) किंमत असते, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज आहे काय? युद्धाचीच वेळ आल्यास, ती किंमत जोखून, शक्य तितक्या कमी किमतीत शक्य तितका जास्त फायदा मिळवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात (आणि अगोदर शक्य तोवर युद्ध टाळण्यात) शहाणपण असते, उगाच आहेत म्हणून ढॅणढॅण फटाकेबाजी करण्यात नव्हे.
(बाकी, एरवी स्वतःला 'फिस्कल कन्झर्वेटिव' म्हणवणारे युद्धाच्या बाबतीत मात्र नेमका हा खर्चाचा मुद्दा कसा विसरतात, ही रोचक बाब आहे. तरी बरे, "To jaw-jaw is always better than to war-war" असे चर्चिल नावाचा एक कन्झर्वेटिवच म्हणून गेला. (गेला बिचारा!))
- (रेसिडेण्ट लेफ्टविंग ट्रोल) 'न'वी बाजू.
हमार इंग्लिसवा कुठल्याशा
हमार इंग्लिसवा
कुठल्याशा धाग्यात इंग्रजी आर्टिकले वापरण्यासंबंधात नवीबाजू आणि अजो'बांचा संवाद वाचला. आर्टिकले गाळण्याची भारतीय सवय वगैरे. मला ही सवय आहे. वरिष्ठांना काही लेखन रिव्ह्यूला दिलं की आर्टिकलांची फुलपाखरं काढून परत येतं. गोष्ट छोटीशी आहे, पण दर वेळी "ये पीएस्पीओ नही जानता" छाप नजरांना तोंड द्यायला नको वाटतं.
कोणी मला इंग्रजी आर्टिकलांसंदर्भात सोपा नियम सांगू शकेल का?
--
मागे a कधी वापरायचं आणि an कधी वापरायचं यावर एक जबरदस्त नियम मराठी संस्थळावरच कळला होता. "अ, आ, ..., अ:" यापासून सुरू होणार्या इंग्रजी शब्दांना an लावायचं, बाकीच्यांना a. हा नियम वापरून "an university" सारख्या बावळट चुका टाळायला शिकलो. असा सोपा प्रकार कोणी सांगू शकलं तर उपकार होतील.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
http://esl.fis.edu/grammar/ru
http://esl.fis.edu/grammar/rules/article.htm
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हलकेच घ्या
हे बघा, अनेक वर्षे मराठी समाजाला इंग्रजीत पारंगत करणारे आपले तर्खडकर गुरुजी.
_/\_
पाय लागू गुरुजी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मिठाचा सत्याग्रह
मीठाचा सत्याग्रह का मिठाचा सत्याग्रह?
असो.
बादवे,तो सत्याग्रह करताना दिलेलं कारण म्हणजे
"मीठ ही जीवनावश्यक वस्तू आहे.सरकार त्यावर कर आकारत आहे.
आम्ही ह्या कर आकारणीस विरोध करतो."
पण मला वाटतं स्वतंत्र भारतात सुद्धा ह्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लावला जातो आहे.
ही माहिती बरोबर आहे का ?
असल्यास :--
गांधींची भूमिका चुकीची होती का?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मीठ
माझ्या आजोबांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. त्या सत्याग्रहासंबंधी आजीकडून कळले ते असे : आता मीठ स्वतः तयार करून स्वतःसाठी वापरण्यावर कर किंवा बंदी नाही, ते विक्रीसाठी करून विकण्यासाठी कर आहे. पूर्वी तसे नव्हते आणि सत्याग्रह त्यासाठी होता. अर्थात मीठ हे सत्याग्रहाच्या चळवळीतले एक निमित्त होते. उद्देश, कुठलातरी अगदी क्षुल्लक अन्याय्य कायदा घेऊन तो मोठ्या प्रमाणावर तोडणे हे होते.
"केजरीवाल प्रवृत्ती"
ह्या असल्या कायदे मोडण्याच्या कार्यक्रमांमधूनच "केजरीवाल प्रवृत्ती" वाढीला लागते हो … माझ्या मनाप्रमाणे झालं नाही .. मोड कायदा आणि जा तुरुंगात … अशा गोष्टीला सत्याग्रह वगैरे नका म्हणू …
बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "
जोपर्यंत कायदा मोडल्याबद्दल
जोपर्यंत कायदा मोडल्याबद्दल माणसाला तुरुंगात टाकलं जातंय / तो जातो आहे (शिक्षेची अंमलबजावणी होते आहे), तोवर नक्की प्रॉब्लेम काय आहे???
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बर्वेसाहेबांनी गांधीजींच्या
बर्वेसाहेबांनी गांधीजींच्या मीठाच्या निमित्ताने केलेल्या सत्याग्रहाची तुलना केजरीवालांच्या नौटंकीशी केली त्याची खंत आहेच, पण-
म्हणताना "जितके कितके खुनी आहेत ते सगळे शिक्षा भोगत आहेत तर प्रोब्लेम काय आहे?" असले विचित्र लॉजिक लावल्यासारखे वाटले. व्यवस्थेचा उद्देश शिक्षा करणे हा'च' नाही, सन्मूल्ये प्रस्थापित करणे, जोपासणे, त्यासाठी सगळे काही करणे हा आहे. कायद्याचं जाऊ द्या, अगदी साध्या वागण्यातही उद्या दिल्लीतल्या सगळ्या अधिकार्यांनी न सांगता एक महिना सुट्टी घेतली नि "म्हणून" त्यांना कंपन्यांनी काढून टाकले तर "प्रॉब्लेम काय ?" म्हणणार काय?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हो, तसंच आहे लॉजिक. गुन्हे
हो, तसंच आहे लॉजिक. गुन्हे कमी व्हावेत म्हणून प्रयत्न करता येतात. गुन्हे घडणं कसं बंद करणार? बंदी तर त्यांवर आत्ताही आहेच!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मग कशाला सत्याग्रह म्हणू
मग कशाला सत्याग्रह म्हणू म्हणे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कायदा
कायदा एखाद्याला का मोडावासा वाटतो ह्याचा विचार करुन पहा ना मालक.
सर्वसाधारण परिस्थितीत कायदा पाळणं हेच शहाणपणाच आणि चांगुलपणाचं मानलं.
सगळेच कायदे सगळेचजण तोडातात असं नाही.
पण एखाद्या शासन यंत्रणेनं कायदाच चुकीचा, मानवतेविरुद्ध केला तर काय करावं?
उदाहरणच द्यायचं तर नाझी राजवटीत काही विशिष्ट जनसमूहांना कायद्यानुसारच "दुय्यम" म्हणून शिक्का बसला म्हणतात.
एका सांगोवांगीच्या कथेनुसार १२व्या शतकात स्कॉटलंड राज्य इंग्लंडनं जिंकून घेतलं;
तेव्हा अधिकृतरित्या स्कॉटिश बायका ब्रिटिश सैनिकांनी भोगयचा "कायदा" बनवून घेतला.
तो braveheart फेम विल्यम वॉलेसनं मोडला. (असा कायदा खरोखरिच होता किंवा नाही; ह्यावर वाद आहेत.
पण असूही शकतो. भावनाओं को समझो.)
उद्या एखाद्य yz शासकाला "डावखुरे लोक हे भयंकर अनैसर्गिक आहेत; आणि त्यांचं संपूर्ण निर्दालन तरी करावं;
किंवा त्यांना सुखानं जगायचं असेल तर त्यांनी सर्टिफाइड उजवाखोर तरी व्हावं" असा कायदा/फर्मान काढलं तर ?
थोडक्यात -- कायदा हा मूलभूत मानवतेशी , नैतिक मूल्यांशी प्रतारणा करीत असला तरी पाळत रहायचा का ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
थोडक्यात -- कायदा हा मूलभूत
वाक्य वरकरणी प्रचंड सरसकट वाटेल पण तरीही - मानवी सभ्यतेचा प्रत्येकच व्यवहार मानवतेशी, नैतिक इ मूल्यांशी प्रचंड प्रतारणा करत आहे असे सिद्ध करता येते. अशी प्रतारणा कालांतराने ब्रेनवॉश इफेक्ट उतरल्यावरच लक्षात येते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
रोचक.
धन्यवाद.
बाकी चालू द्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
१५ ऑगस्ट १९४७
१५ ऑगस्ट १९४७ नंतर इथला ब्रिटिश अंमल संपला.
तोवर इथून त्यांना घसघशीत कर जात असणार. भरपूर उत्पन्न मिळत असनार्.
त्याला ब्रिटिश समाजजीवन सरावलेले असणार.
इथला ताबा निघून गेल्यावर त्यांच्यावर मोठाच परिणाम झाला असेल, नाही?
त्याचे कुठे उल्लेख आहेत का ? पडसाद कुठे कुठे उमटले ?
१९४६ सालचा ब्रिटिश पार्लमेंटचा अर्थसंकल्प १००० कोटिंचा होता, आणि लागलिच पुढल्या वर्षी तो
एकदम आकुंचित/shrink होउन ६०० कोटी वगैरेंवर आला, असे काही झाले असणार.
हे सगळे त्यांनी कसे पचवले? त्यावेळी ह्यातून घडलेल्या प्रमुख घटना कोणत्या ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
७० रु.
घाउक प्रश्न विचारल्यास ७० रु. पडतील.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
कैरी
डायबेटिक व्यक्तिंना आंबा वर्ज्य असतो; तशीच कैरीही असते का ?
आंब्यात साखर असते; ती कैरीत असल्याशिवाय येत नसणार.
कैरीमधीलच काही घटक साखर रुपात बनत असणार आंब्यात.
म्हणजे कैरीत पूर्वीचीच साखर होती असे म्हणता यावे.
तर्क बरोबर आहे का ?
कैरित साखर्/ग्लुकोज्/फ्रुक्टोज अशी एखादी शर्करा किम्वा शर्करेचे असे एखादे भावंड (स्टार्च वगैरे) असते का ?
असल्यास --
ते डायबेटिक लोकांना चालते का?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तर्क!
वाइनमध्ये अल्कोहोल असतो, तो द्राक्षांत असल्याशिवाय येत नसणार.
द्राक्षांमधीलच काही घटक अल्कोहोल रुपात बनत असणार वाइनमध्ये.
म्हणजे द्राक्षांत पूर्वीचाच अल्कोहोल होता असे म्हणता यावे.
तर्क बरोबर आहे का ?
(आणखीही उदाहरण देणार होतो, अन्ननलिकेतून इकडून तिकडे जाणार्या अन्नपदार्थांच्या संदर्भात. पण... जाऊ द्या.)
नक्की काय असते, कल्पना नाही, पण कोणतासा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट नक्कीच असणार, ज्याचे आंबा पिकण्याच्या प्रक्रियेमध्ये शर्करेत (हीसुद्धा नक्की कोणती, तपासावे लागेल.) रूपांतर होत असणार.
कागदाचा लगदा डायबेटिक लोकांना चालावा का? (टीप: हा विनोदी प्रश्न नाही. केवळ, तर्कास दिशा देण्याचा गंभीर प्रयत्न आहे.) कारण, कागदाच्या लगद्यात सेल्युलोज़ असते, आणि सेल्युलोज हा अंतिमतः कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे.
'डायबेटिक लोकांना चालते का' या प्रश्नाच्या उत्तरासाठी, अन्नात केवळ शर्करा/कार्बोहायड्रेट आहे की नाही, यापेक्षासुद्धा, कोणत्या प्रकारचे कार्बोहायड्रेट आहे, आणि पचनप्रक्रियेत त्याचे विघटन होऊन ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन ती ग्लुकोज 'रक्तात भिनण्याचा' दर किती, हे महत्त्वाचे. अधिक माहितीसाठी ग्लायसीमिक इंडेक्सबद्दल वाचावे, असे सुचवू इच्छितो.
(फायबरसुद्धा अंतिमतः कार्बोहायड्रेट आहे. पण फायबरचे ग्लुकोज़मध्ये रूपांतर होऊन ती रक्तात भिनण्याचे प्रमाण नगण्य आहे. उलटपक्षी, स्टार्च हा तत्त्वतः शर्करा नाही, काँप्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, पण त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन ती रक्तात भिनण्याचे प्रमाण प्रचंड आहे.)
बाकी, मूळ प्रश्नाबद्दल:
१. हा गंभीर प्रश्न असेल (पक्षी: याच्या उत्तरावर कोण्या प्रत्यक्षातल्या व्यक्तीने कैरी खावी किंवा खाऊ नये, याचा निर्णय अवलंबून असेल), तर हा प्रश्न एखाद्या तज्ज्ञ डॉक्टर अथवा डाएटीशियनला विचारावा. मी ती जबाबदारी घेऊ इच्छीत नाही, अथवा घेण्यास पात्रही नाही; मी कोणत्याही प्रकारे या विषयातील तज्ज्ञ नाही; पुढील विवेचन हे वैद्यकीय सल्ला मानू नये, आणि मिठाच्या खड्याबरोबर घ्यावे. (तसे नसल्यास, केवळ सामान्यज्ञान - तेही बरेचसे अर्धवट - म्हणून ढोबळमानाने पुढीलप्रमणे मांडू इच्छितो.)
२. पिकलेल्या आंब्यात त्वरित रक्तात भिनू शकणारी शर्करा ज्याप्रमाणे लगेच आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असावी, त्या प्रमाणात ती कैरीत उपलब्ध नसावी, आणि कैरीतील कार्बोहायड्रेटचे शर्करेत रूपांतर होऊन ती रक्तात भिनण्याचे प्रमाण हे पिकलेल्या आंब्याच्या तुलनेत खूपच कमी असावे, असे वाटते. सबब, कैरी ही पिकलेल्या आंब्याच्या तुलनेत डायबेटिक व्यक्तीने खाण्याच्या (अर्थात, प्रमाणात!) दृष्टीने बहुधा निर्धोक असावी, अशी अटकळ आहे.
३. तसेही, डायबेटिक व्यक्तीस आंबा काय किंवा कोठलेही कार्बोहायड्रेटयुक्त अन्न काय, वर्ज्य असते हा एक प्रचलित गैरसमज आहे. कार्बोहायड्रेट वर्ज्य नसते; कार्बोहायड्रेट हा आवश्यक घटक आहे. मात्र, प्रमाण महत्त्वाचे.
(डायबेटिक व्यक्तीकरिता साखर वाढण्यापेक्षा साखर वाजवीपेक्षा कमी होणे हे अधिक धोकादायक असते - साखर वाढण्याचे दुष्परिणाम दीर्घ कालावधीत हळूहळू होतात, तर साखर कमी झाल्यास आणि त्यावर वेळीच उपाय न झाल्यास त्याचे दुष्परिणाम तात्काळ उद्भवतात आणि गंभीर असू शकतात; प्रसंगी प्राणघातकसुद्धा ठरू शकतात - याची आपल्याला बहुधा कल्पना असावीच.)
४. ह्याविंग सेड द्याट, पिकलेल्या आंब्याच्या बाबतीतसुद्धा, एखाद्या डायबेटिक व्यक्तीने एखाददिवशी मधल्या वेळच्या खाण्याऐवजी एक पिकलेला आंबा खाल्ला, तर बहुधा नुकसान होऊ नये, बहुधा तेवढेच कार्बोहायड्रेट जावे, आणि कैरीने तर नुकसान होऊ नयेच नये, असे प्रतिपादण्याचे दु:साहस करतो. (अर्थात, डॉक्टरच्या अथवा डाएटीशियनच्या सल्ल्यानेच असे निर्णय घ्यावेत.)
शनिवार-रविवार मध्ये खूप कमी
शनिवार-रविवार मध्ये खूप कमी प्रतिसाद येतात असं वाटतय. इतर वारी टपाटप प्रतिसाद पडत असतात. बहुतांश पब्लिक ऑफिसातूनच ऐसीचा जास्तित-जास्तं वापर करतं का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
एस. मी तरी.
एस. मी तरी.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
जास्त वेळ
शनिवार-रविवारी जास्त रिकामा वेळ मिळतो म्हणून जास्त वेळ यावे तर प्रतिसादच येत नाहीत काही.
हो. असल्या कुचाळक्या करायला
हो.
असल्या कुचाळक्या करायला मोकळा वेळ फ़क्त हापिसातच मिळू शकतो.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
बायकोमुलांसोबत वेळ घालवणे,
बायकोमुलांसोबत वेळ घालवणे, त्यांना सिनेमा, बगीचा, हॉटेलात नेणे, बाजारहाट, जमल्यास थोडीफार विश्रांती यामुळे वेळ मिळत नसावा.
८० च्या दशकात जन्मलेल्यांना
८० च्या दशकात जन्मलेल्यांना कोणकोणत्या लस दिल्या जायच्या? मला फक्त देवीची लस दिलीय इतर कुठलीही नाही.
मी धनुर्वाताची (बरेचदा)
मी धनुर्वाताची (बरेचदा) घेतल्ये. देवी, क्षय नाही. गोवर, कांजिण्या होऊन गेल्यात. पोलिओची लस तेव्हा असायची काय?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी शाळेत असताना बीसीजी
मी शाळेत असताना बीसीजी (क्षयाची) लस घेतलेली आहे. तसेच एकदा नाशिकला जायचे होते तेव्हा कॉलर्याचीसुद्धा घेतल्याचे आठवते.
पण अदरवाइज ट्रिपल लस अजूनही देतात. आणि काहीजण हेपेटायटिस-बी, मेनिंजायटिस च्या लसी मुलांना देतात.
आम्रिकेत तर लोक इन्फ्लुएन्झाची लस सुद्धा घेतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
(अवांतर)
इन्फ्लुएंझाची लस ही १. 'प्रासंगिक' क्याटेगरीत मोडते, २. पूर्णतः ऐच्छिक आहे, आणि ३. त्यात्या 'हंगामा'पुरतीच (पक्षी: वर्षापुरतीच) प्रभावी असते. (या वर्षीची पुढच्या वर्षी उपयुक्त नसते. घ्यायचीच असेल, तर दर वर्षी नव्याने घ्यावी लागते.)
ऐला देवीची नाही घेतली तू?
ऐला देवीची नाही घेतली तू? जन्मल्यावर १० १५ दिवसातच देतात की. दंडावर खूण उमटते त्याची. आजकाल ड्रॉप्स असतात बहुतेक. देवीला इंग्रजीत काय म्हणतात?
गोवर, कांजिण्या, कावीळ मलापण होऊन गेलय <१० असतानाच. measles मंजे कांजिण्या ना?
पोलीओ लस असणार तेव्हादेखील. परवडायची कितीजणांना हा प्रश्न आहे. माझ्या चुलतबहिणीला झालेला पोलीओ. देशभरात पोलीओ निर्मुलन मोहीमतर बर्याच नंतर चालू झाली. लेट ९०?
हात् साला!
'देवी'ला इंग्रजीत 'गॉडेस' म्हणतात, एवढी शिंपल गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही? मग काय इंग्रजी शिकलात तुम्ही?
(आमच्या इंग्रजी माध्यमाच्या सदाशिवपेठी, मराठमोळ्या प्राथमिक शाळेत आपापसात बोलतानासुद्धा मराठीत बोलणे हा (शाळेच्या धोरणान्वये) दंडनीय अपराध होता. चुकूनसुद्धा अशी आगळीक झाल्यास मास्तरणी - हो, एकजात सगळ्या मास्तरणी होत्या, आणि अर्ध्याअधिक मराठी नि उरलेल्या मद्राशिणी - मराठी असल्यास रागे भरत, नि मद्राशिणी असल्यास प्रथम छडी मारत नि मग उरलेला तासभर त्याबद्दल अकांडतांडव करत. शिवाय, अशा आगळिकींबद्दल एकमेकांविरुद्ध चुगल्या करण्याचे ट्रेनिंग आम्हां सर्वांनाच बहुधा उपजतच असावे. अशा परिस्थितीत, आमच्या एका तत्कालीन वर्गमित्राने देवमाशाबद्दल बोलताना त्याचा 'गॉडफिश' केला होता, त्याची या निमित्ताने आठवण आली.)
(विनोदाचा भाग सोडल्यास, 'स्मॉलपॉक्स'.)
बाकी, मीझल्स म्हणजे कांजिण्या नव्हेत. मीझल्स म्हणजे (बहुधा) गोवर. (चूभूद्याघ्या.) कांजिण्या म्हणजे चिकनपॉक्स.
(अतिअवांतर: या निमित्ताने चिकनपॉक्सचे पुनर्मराठीकरण 'कोंबडीदेवी' असे - आणि स्मॉलपॉक्सचे 'छोटीदेवी' असे - करण्यात यावे काय? त्याचबरोबर, 'बटरफ्लाय'करिता 'लोणीमाशी' याही पर्यायावर विचार व्हावा. धन्यवाद.)
आभार.
आभार.
...
तशी तर मी टैफोइड-कॉलर्याची लसही अनेकदा घेतलीय. (कधी दंडावर, कधी ढुंगणावर. घेताना काही वाटत नाही, पण नंतर पुढचे दोनएक दिवस जिथे घेतली ती जागा सॉलिड दुखते.)
पण १. अस्मि-तैंना अशा 'प्रासंगिक' लशी अपेक्षित नसाव्यात, नि २. माझा जन्म १९८०च्या दशकात झाला नाही, या दोन्हीं कारणांस्तव प्रस्तुत उदाहरण बाद. (तुमचेही बाद. किमानपक्षी पहिल्या कारणासाठी.)
बाकी, लहानपणी देवीची लस टोचली होती, याचे पुरावे दंडावर अजूनही बाळगून असल्याकारणाने ती टोचली होती, हे ठाऊक आहे. (अवांतर कुतूहल: देवीची लस ढुंगणावर का बरे टोचत नसावेत?) इतर लशींबद्दल कल्पना नाही. (रादर, आठवत नाही.)
(अतिअवांतर: देवीची लस टोचणे भारतात नेमके कधी बंद झाले?)
>>(अवांतर कुतूहल: देवीची लस
>>(अवांतर कुतूहल: देवीची लस ढुंगणावर का बरे टोचत नसावेत?)
माझ्या एका मामेबहिणीला पायावर देवीची लस टोचली होती (१९७१-७२). तेव्हा आजकाल महिला स्लीव्हलेस घालतात त्यावेळी देवीच्या लसीच्या खुणा दिसतात म्हणून मांडीवर टोचली असं सांगितलं होतं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
रोचक!
एक दिवस असा उजाडेल, जेव्हा 'आपल्या देशा'त - नि त्यातही 'आपल्या संस्कृती'त - महिला सरेआम शॉर्ट्स घालून हिंडूफिरू लागतील, हे प्रस्तुत डॉक्टरमहोदयांच्या बहुधा स्वप्नातदेखील आले नसावे. अन्यथा, त्यांनी प्रस्तुत लस बहुधा ढुंगणावरच टोचण्याचा पुरस्कार केला असता, अशी आमची अटकळ आहे. (अर्थात, 'परस्त्री'च्या ढुंगणाशी काही कर्तव्यासंबंधात त्यांचे काही वैयक्तिक 'सांस्कृतिक' आक्षेप/संकोच असल्यास बाब अलाहिदा.)
(बाकी, देवीची लस टोचल्याच्या खुणा दिसल्या, तर कोणाचे नेमके काय बिघडावे, ते कळत नाही. अर्थात, ज्याचातिचा दृष्टिकोन!)
८०च्या दशाकात जन्मला असलात तरीही,
तुम्हाला किमान ट्रिपल व पोलियो व बीसीजी देखिल नक्कीच दिली गेलेली आहे.
अॅक्चुअली, ट्रिपल म्हणजे डिप्थेरिआ, पर्टुसिस, टेटनस. (घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात) उर्फ डीपीटी, नंतर डीटी, अन नंतर १६ व्या वर्षपर्यंत टीटी, म्हणजे धनुर्वाताचे बूस्टर डोसेस घ्यायचे असतात.
त्या आधीच्या दशकात पावसाळ्याच्या तोंडावर कॉलर्याची लस टोचायला येत असे आठवते.
बाकी ८०च्या दशकात म्हणजे १९८० ते १९९० म्हणायचे असेल, (इंग्रजीतले 80s) तर तुम्हाला देवी कशा काढल्यात ते समजत नाही. माझ्या आठवणी प्रमाणे १९७७ला देवी निर्मूलन जाहीर झाले, अन १९८०च्या मे महिन्यापासून देवीची लस देणे बंद करण्यात आले.
असो.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
देवी
८०च्या दशकात देवीची लस निदान निमशहरी भागात दिली जात होती, पुरावा आहे.
देवीच्या रोगाबद्दल फारशी माहिती नसलेल्यांसाठी दुवा. (NSFL)
NSFL - not safe for looking.
जन्मल्यावर १० १५दिवस
जन्मल्यावर १० १५दिवस दवाखान्यात असतो त्या काळात जेवढ्या लशी दिल्या जातात तेवढ्याच मला मिळाल्यात. बीसीजी मिळाली असण्याची शक्यता आहे. ट्रिपलतर पहिल्यांदाच ऐकली. पण पोलिओ नक्कीच दिली नाही. आम्हाला कधी लस द्यायला म्हणून दवाखान्यात नेलच नाही. म्हणूनच विचारत होते की इतरांना कायकाय मिळालय.
१९८० ते १९९० च म्हणायचे होतं. देवीची खूणतरी आहे माझ्या दंडावर. तशा खूणा इतर कशाने येतात का?
स्मॉलपॉक्स
http://www.smh.com.au/national/health/scientists-say-smallpox-virus-shou...
१. स्मॉलपॉक्सने २०व्या शतकात ३० कोटी लोक मेले.
२. ३० वर्षांपूर्वी याचे उन्मूलन झाले.
याचा व्हायरस ठेवायचा (संशोधन, इ) का नाही (दुरुपयोग, धोका, इ) यावर चर्चा चालू आहे.
या रोगाचा पुनरोद्भव झाला तर हा व्हायरस लागेल म्हणजे काय? आपल्याला काय वाटतं?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
थोडी अधिक माहिती.
आजकालच्या लसीकरणाची थोडी सोपी व अधिक माहिती इथे व आय.एम.ए.ची अधिकृत इथे आहे.
हे वैद्यकिय अधिकार्यांसाठीचे हेल्थ मिनिस्ट्रीचे हँडबुक पीडीएफ स्वरूपात आहे.
करायलाच हवे असे नसलेल्या (Non Mandatory) लसीकरणाबद्दलचा एक रोचक लेख इथे आहे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
करायलाच हवे असे नसलेल्या (Non
धन्यवाद, रोटाव्हायरस लस लवकरच नॅशनल शेड्यूलमधे अंतर्भूत करणार आहेत असे समजले, ते कितपत खरे आहे?
www.timesofindia.com/city/pun
www.timesofindia.com/city/pune/Now-more-adults-diagnosed-with-measles/ar... ही बातमी वाचली परवाच.
कांजिण्या -- नागीण
measles म्हणजे कांजिण्याच ना ?
मला लहानपणी झाल्या होत्या.
दीडेक वर्षापूर्वी नागीण झाली.
नंतर समजलेली माहिती :-
नागीण म्हणजेच herpes zoster.
कांजिण्या बर्या झाल्या तरी त्यातील काही विषाणू निद्रिस्त अवस्थेत व्यक्तीच्या तंतूसंस्थेत शेवटपर्यंत -- व्यक्ती हयात असेपर्यंत असतात.
रोगप्रतिकारकशक्ती जर काही काळ कमजोर झाली तर ते लागलिच उचल खातात.
छाती, पाठ ह्यावर उजव्या किंवा डाव्या बाजूला लालसर फोडांचा पट्टा उमटतो.
फोड दुखतात, जरा जऴजळही करतात.
ताप येतो. अशक्तपणा येतो.
ताप उतरेस्तोवर एक दोन आठवडे आराम केल्यास लवकर बरेही होता येते.
ही झाली अवांतर माहिती.
शंका विचारायची आहे ती ही की हे असे नागीणचे रुग्ण सुद्धा measles मध्येच धरले गेले आहेत का ?
की खर्याखुर्या कांजिण्यावाल्यांचीच संख्या दिली आहे ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कांजिण्या नाय रे बाबा. वरचे
कांजिण्या नाय रे बाबा. वरचे प्रतिसाद वाच की :-). कांजिण्या मंजे chicken pox आणि मिझल्स मंजे गोवर.
अर्र र्र
स्वगत :-
स्साला ...नाही तिथं अकलेचं प्रदर्शन भरवायची खोड कधी सुटणार ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मनोबा! मनोबा!! मी काय म्हणतो
मनोबा! मनोबा!! मी काय म्हणतो मिझल्स म्हंजे गालगुंड ना मनोबा!? (फादर! फादर! सॉरी म्हणजे एस ओ डबल आर वाय फादर! च्या चालीवर! :P)
चिकन पॉक्स म्हंजे कांजिण्या (की देवी?)
नी स्मॉलपॉक्स म्हंजे गोवर ना?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मराठी चित्रपटांतील पाट्या
आजकाल बर्याच मराठी चित्रपटांच्या (उदा. शाळा, पुणे ५२ इ.) पाट्या (श्रेयनामावली) हिंदी चित्रपटांप्रमाणे इंग्रजीत का लिहिल्या जात आहेत? ऐवीतैवी चित्रपट हे परदेशी चित्रपट महोत्सवांसाठीच आहेत आणि मराठी माणसाला काय येतेच की इंग्रजी वाचता, असा विचार आहे का? की डायरेक्टर म्हणवण्यापेक्षा दिग्दर्शक म्हणवणे कमीपणाचे वाटते? इराणी चित्रपटांमध्ये श्रेयनामावली फार्सीमध्ये आणि खाली इंग्रजीमध्ये सबटायटल्स असे पाहिले आहे. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'मध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत पाट्या आहेत.
दुकानांच्या पाट्यांप्रमाणे केवळ चित्रपटांतील पाट्या मराठीत असण्याने/नसण्याने मराठी टिकणे/बुडणे ठरते असे मला म्हणायचे नाहीच, परंतु मराठी चित्रपटांच्या पाट्या मराठीत तरी असाव्यात असे वाटते.
मुळात श्रेयनामावली वाचणारे
मुळात श्रेयनामावली वाचणारे इथे किती असावेत?
मिहिरशी सहमत.
मिहिरशी सहमत.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
एक शक्यता
कदाचित फारएण्ड वाचत असावेत, अशी शंका आहे.
"चित्रपटांच्या पाट्या" ह्यावर
"चित्रपटांच्या पाट्या" ह्यावर कुणाचा ताबा अस्तो? दिग्दर्शकाचा की निर्मात्याचा?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अॅक्शन रिप्ले पाहीलाय का?
अॅक्शन रिप्ले पाहीलाय का? त्यात आदित्य रॉय कपूर वेळप्रवास करून भूतकाळात जातो आणि त्याला रस्त्यावर फूलाफूलांचे शर्ट, आशा पारेखसारखे तंग सलवार कमीज, पांढर्या फ्रेमचे गॉगल, डोक्यावर शर्मिला टागोरसारखं टोपलं अशी लोकं दिसतात.
तर ज्यांनी ६० किंवा ७०च दशक पाहीलय, त्यांना आठवतय का की अशा फ्याशन कितपत कॉमन होत्या?
काही कल्पना नाही ब्वॉ...
बोले तो, १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात नि १९७०च्या दशकात आमची नजर बर्यापैकी अर्भकावस्थेत ते बाल्यावस्थेत असल्याकारणाने खात्रीलायक निरीक्षण नमूद करू शकत नाही; त्याबद्दल आगाऊ क्षमस्व. परंतु, आमचा संबंध त्या काळात मुख्यत्वेकरून ज्या विभागांशी आला, त्या ४११०३०, ४००००२, झालेच तर अल्पांशाने ४११००४ वगैरे पिनकोडांत तरी अशा वर्णनांना ओ देणारे काही पाहिल्याचे निदान आठवत तरी नाही.
हम्म. एकंदर ते हटके प्रकार
हम्म. एकंदर ते हटके प्रकार सिनेमांपुरतेच मर्यादीत असतील. काहीकाही फ्याशन मात्र सर्वसामान्यांपर्यंत पोचली असेल जसे की देवानंदचा केसांचा कोंबडा, अमिताभची बेलबॉटम पँट.
अहो, पुणे -५ (शिवाजीनगर,
अहो, पुणे -५ (शिवाजीनगर, सीओईपी) जगतविख्यात आहे. हे पुणे -३०, पुणे- २, पुणे -४ हे लोकांना माहित असतील असे का गृहित धरता? आणि पुण्यात एकूण किती पिनकोड असावेत त्यापैकी हे तीनच का निवडले? तुम्ही सगळं पुणं फिरत असणार ना? आता त्या लसीवर जितका रोचक प्रतिसाद दिला आहे तसे उत्तर द्या.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अवांतर
४००००२ हा पिनकोड पुण्यापासून (कावळ्याच्या उड्डाणमार्गे) किमानपक्षी सत्तरऐशी मैलांच्या त्रिज्येबाहेर असावा, अशी अटकळ आहे. (चूभूद्याघ्या.)
नाय! पुणे २ हा अप्पा बळवंत
नाय!
पुणे २ हा अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ वगैरे हा भाग आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
...
४००००२. ४११००२ नव्हे.
बाकी चालू द्या.
अर्र्र्र.. गल्ती से मिश्टेक
अर्र्र्र.. गल्ती से मिश्टेक हो गया...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तरीच मला वाटलं कि लोकांना पिन
तरीच मला वाटलं कि लोकांना पिन कोड, जागा इ इ मुखपाठ नसणार. शिवाय त्यांच्या निवडीमागची संकल्पना.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
...
हो हो. 'केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा' असला कायसासा 'सुविचार' आमच्या शाळेत वर्गातल्या फळ्यावर लिहिण्याकरिता कॉमन होता खरा.
बेलबॉटम प्रकाराचीसुद्धा सत्तरच्या दशकात प्रचंड रेज होती.
लुंगी
सत्तरच्या दशकाच्या शेवटी किंवा ऐंशीच्या दशकात पुण्यात मुलींनी घराबाहेर देखील लुंगी नेसण्याची फॅशन होती असे प्रत्यक्षदर्शींकडून ऐकले आहे, पुढे बसमधे चढताना मागच्याचा पाय पडला(टाकलाही असेल) आणि मग ती फॅशन कमी झाली वगैरेही ऐकले आहे.
?
असे काही पाहिल्याचे आठवत तरी नाही. असो.
रअॅपअराउंडची फॅशन ४
रअॅपअराउंडची फॅशन ४ ५वर्षांपुर्वीदेखील होती. त्याआधी लाँग स्कर्ट म्हणून परकर घालायचे.
मणिपूरचा पारंपारिक ड्रेस
मणिपूरचा पारंपारिक ड्रेस रॅपरॉन आहे. म्हणजे आजही आहे. इंफाळमधे बायकांच्या बाजारामधे (म्हणजे त्यांनी'च' चालवलेल्या बाजारामधे)लूंग्यांचे चिकार स्टॉल असतात.
शिवाय मणिपूरी बायकांना मद्राशिणी म्हणून चिडवता येतं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कौंटूंबिक हिंसा(वि)चार.
कौंटूंबिक हिंसा(वि)चार.
म्यानमारी बायकांना जिराफिण्या
म्यानमारी बायकांना जिराफिण्या म्हणून चिडवता येईल. यात कौटुंबिक ते काय?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अहो गंमत केली, चिडवण्यात
अहो गंमत केली, चिडवण्यात हिंसाचाराचे मुळ असते.
यावरच्या प्रतिसादात स्मायली न
यावरच्या प्रतिसादात स्मायली न टाकून तुम्हाला चिवडवायचे ठरवून हिंसाचाराला खतपाणी घातलेले लक्षात घ्या हो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अवांतर
मी यांना चिडवायचे सोडून 'चिवडवायचे' असल्यास अगोदर त्यांचे तुकडेतुकडे तरी केले पाहिजेत, अशी एक आपली विनम्र के साथ सूचना.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
'केस वाढवून देवआनंद
'केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा' असला कायसासा 'सुविचार'
वाह क्या बात हय.
आमच्यापण शाळेत असलाच बकवास चालायचा.
मला तर त्या दोघांमधे फारसा फरक वाटला नव्हता. विवेकानंदांचा कोणता विचार असा आहे की जो .... जाऊ दे...
मला तर त्या दोघांमधे फारसा
असं नाय, शंभर नंबरी धाग्याला मुकणार कसं आम्ही.
दुटप्पी गब्बर - विवेकानंदांचा
दुटप्पी गब्बर - विवेकानंदांचा पुतळा मागे ठेऊन नेहमी मुलाखत देणार्या मोदींचे समर्थन करायचे आणि ...
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्लीझ
वाक्य पूर्ण करच गब्बर.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
www.youtube.com/watch?rl=yes&
www.youtube.com/watch?rl=yes&v=I9mJ2oBONug&feature=relmfu&gl=IN&client=m... याला पाहीलं का? कसला छान दिसतोय! हे असे आकर्षक खलनायक अजून कोणत्या चित्रपटात आहेत? टायटअॅनीक. आणि?
निरीक्षणे - मंत्रिमंडळ
This comment has been moved here.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.