ही बातमी समजली का? - २६
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा.
------------
आणखी काही पुस्तकांवर बात्राकृपेने प्रकाशकांची अवकृपा.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/india/RSS-welcomes-100-FDI-in-defence...
आरेसेस च्या इतिहासात प्रथमच आरेसेस शहाण्या मुला सारखी वागत्ये.
रशियाकडून आपण अनेकदा शस्त्रे/क्षेपणास्त्र तंत्रज्ञान्/युद्धनौका विकत घेतलेली आहेत. फ्रान्स कडून मिराज, ऑस्ट्रेलिया कडून कॅनबेरा, अमेरिकेकडून रिकॉनसन्स/ट्रान्सपोर्ट, इस्रायल् कडून अॅवॅक्स/बराक क्षेपणास्त्रे, स्वीडन कडून बोफोर्स .... लिस्ट लांब आहे. यापैकी अनेक केसेस मधे प्रत्यक्ष बनवणार्या खाजगी कंपन्याच आहेत. मग एफडीआय ला विरोध का - हा प्रश्न अनुत्तरितच होता. एफडीआय ने अशी नेमकी कोणती "थ्रेट टू नॅशनल सेक्युरिटी" निर्माण होते जी मॅन्युफॅक्चरिंग परदेशात असल्याने निर्माण होत नाही ? (उत्तर ठरलेले - आपल्याकडे अजून मॉनिटरिंग & गव्हर्नन्स इन्स्टिट्युशन्स बळकट नाहीयेत.)
फायदे इतके आहेत की संकुचित वृत्तीमुळे आपले प्रचंड नुकसान झालेले आहे. संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक ही स्किल्स डेव्हलपमेंट, जॉब्स (??), कॉस्ट कन्ट्रोल या सगळ्यासाठी सहाय्यक नाहिये का ? संशोधनास ही चालना मिळू शकते. इंटरनेट चा शोध डार्पा मधे लागला होता असे मी ऐकले. खरं खोटं जगन्नियंताच जाणे.
आरेसेस चा हा शहाणपणा नसून पराकोटीचा दुटप्पीपणा आहे. रिटेल मधे एफडीआय १००% करावे म्हंटले तर उमा भारतीने वॉलमार्ट स्टोअर जाळून टाकायची धमकी दिली होती. (नोट - मी त्यांचा उल्लेख एकेरी केलेला आहे.). (आता लगेच उमा भारती ह्या भाजपाच्या असून आरेसेस च्या नाहीत - हा डायलॉग ठरलेला.)
संरक्षण सामग्रीत १००% एफ्डीआय
संरक्षण सामग्रीत १००% एफ्डीआय या धोरणाला पाथिंबा आहे. मात्र आता त्याची अंमलबजावणी कशी होते - त्यात घोटाळे होतात का - ते बघायचे!
बाकी दोन्ही 'डायलॉग' तुम्हीच बोलून चिटिंग केल्याने लांबलचक प्रतिसाद मिळाणार नाही ज्जा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बाकी दोन्ही 'डायलॉग' तुम्हीच
गब्बरभाऊंना बुद्धिबळ खेळताना दोन्ही पक्षांच्या मूव्ह्ज करण्याची सवय आहे. म्हणजे ते स्वतःची मूव्ह करतात, आणि समोरच्याची काहीशी लंंगडी मूव्हही करतात. आणि मग समोरच्याला 'खेळायचं का पुढे?' असं विचारतात. पूर्वी काही लोक तयार होत असावेत, कारण गेल्या बऱ्याच काळात कोणी त्यांची बेट स्वीकारली नसली तरी त्यांची सवय कायम आहे.
पडोसन मधला सायरा बानू चा बाप
पडोसन मधला सायरा बानू चा बाप (आघा) आठवा.
जब जब जो जो होना है
तब तब सो सो होता है
आणि समोरच्याची काहीशी लंंगडी
आणि समोरच्याची काहीशी लंंगडी मूव्हही करतात.
That is designed to dissuade others from making ambitiously excessively basic counter-arguments.
झाली एकदाची भेट
वेंडी डॉनिजर आणि इतरांच्या मागे लागलेले दीनानाथ बात्रा स्मृती इराणींना भेटले आणि सेंट्रल बोर्डाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची त्यांनी इराणींकडे मागणी केली.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पूर्वी जेत्याला फक्त इतिहास
पूर्वी जेत्याला फक्त इतिहास लिहिता यायचा.. आता जेते अख्खा अभ्यासक्रम लिहितात
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नैतर काय
नैतर काय ?
अवांतर :-
स्वातंत्र्यानंतरची बहुतांश वर्षे जेते कोण होते ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
स्वातंत्र्यानंतरची बहुतांश
याचे उत्तर राज्यागणिक बदलेल.
या सीबीएससीचे पेव फुटल्यावर NCERT ला इतके महत्त्व आलेय, नैतर अभ्यासक्रम हा राज्य स्तरावरच ठरे हे लक्षात घ्यायला हवे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बलात्कार आणि जात
भारतातल्या बलात्कारांमागची जातीय समीकरणं दुर्लक्षून चालणार नाहीत असं म्हणणारा 'न्यू यॉर्क टाइम्स'मधला लेख.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बलात्कार काही वेळा योग्य, काही वेळा गैर...
http://in.reuters.com/article/2014/06/05/uk-india-rape-idINKBN0EG1EX2014...
राजकारण्यांच्या बलात्काराबद्दल तारे-तोड विधानांपैकी लेटेस्ट...
#PuneRiots ?
फेसबुक वगैरे ठिकाणी बदनामीकारक मजकूर आढळल्यावरून एकाची हत्या- ही बातमी वाचली.
ट्विटरवर सध्या #PuneRiots हा ट्यागदेखील पाहिला, अजून एका ठिकाणीही दगडफेक वगैरे बातमी पाहिली.
प्रश्न असा की पुण्यात "दंगल" म्हणावं, असं काही खरंच घडलंय का?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
दंगल म्हणजे तुम्हाला काय
दंगल म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे ते कळले तर बरे होईल!
जिवंत जाळली जाणारी शेकडो माणसे, संचारबंदी, लष्कराला पाचारण अशा गोष्टी घडल्याशिवाय दंगलीचा फिल येत नाही का?
मी खालील गोष्टी स्वतः पाहिल्या आणि ऐकल्या!
- रस्त्यावर पायी आणि गाड्यांवरून भगवे झेंडे घेऊन घोळक्याने फिरणारी रिकामटेकडी जनता
- विशिष्ट समाजाच्य घरांवर, वाहनांवर आणि सापडल्यास माणसांवर झालेले हल्ले
- दमदाटी करून अघोषित बंद पाळायला लावणे
- कोणी बंद पाळण्याची सूचना ताबडतोब न ऐकल्यास (किंवा पुर्वीचा स्कोर सेटल करायचा असल्यास उगाच) बेफाम दगडफेक
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
दंगल झाली हे वाईट. पण असं
दंगल झाली हे वाईट.
पण असं काही झालं, हे बर्याच लोकांपर्यंत न पोचणं (न पोचवलं जाणं?) जास्त गंभीर वाटतंय.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
माहिती आणि निष्कर्ष
सुमारे २०० बसेसचं नुकसान; पोलीस जखमी. निष्कर्ष आपणच काढा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नक्कीच दंगल आहे. पण कुठल्याही
नक्कीच दंगल आहे.
पण कुठल्याही मुख्य वेबसाईटवर काहीच तरंग उमटले नाहीत. त्यामुळे काही समजायला मार्ग नव्हता.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
आमचा नवनिर्वाचित खासदार
नुकत्याच पुण्यात झालेल्या हत्येविषयी आमच्या नवनिर्वाचित खासदाराची मुक्ताफळं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हा खून झाल्यादिवशीच प्रकाशित
हा खून झाल्यादिवशीच प्रकाशित झालेलं हे पोस्ट. फिअर माँगरिंग? हुह.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
चांगले पोस्ट
चांगले पोस्ट. वास्तविक आजच्या भारतात मुसलमान हे अत्यंत खालच्या पातळीवरचे जीवन जगतात. एखादा सुशिक्षित मुसलमान व्हाईट कॉलर नोकरी करुन घरच्यांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो व त्याचाच खून होतो तेव्हा फारच हळहळ वाटते.
हिंदू समाजातील दलितांना निदान आरक्षणाचे/अॅट्रॉसिटी अॅक्टसारख्या कायद्यांचे संरक्षण आहे. मुसलमानांसाठी काही केले तर लांगूलचालन हे लेबल लागण्याची शक्यता मात्र वाढते. येणाऱ्या काळात 'सबका विकास' होणार असल्याने मुसलमानांकडे वेगळे लक्ष दिले जाईल अशी काडीमात्र चिन्हे दिसत नाहीत.
चाचणी
विधानसभा निवडणूकीच्या पूर्वसंध्येला घडणार्या 'घटना' मिडियाच्या, सरकारच्या, राजकीय पक्षांच्या आणि जनतेच्या प्रगल्भतेच्या चाचण्या असतात असं म्हणता यावं काय?
+१
असेच म्हणतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आणि मराठी संस्थळ-सदस्यांच्या
आणि मराठी संस्थळ-सदस्यांच्या राहिलंच
हा हा हा, अगदी अगदी
हा हा हा, अगदी अगदी
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आधी कलमाडी आता हे ....
आधी कलमाडी आता हे .... पुण्यनगरी फार पुण्यवान आहे असले खासदार मिळतात!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
पी. साईनाथ पुण्यात
पी. साईनाथ यांचे आज पुण्यात व्याख्यान आहे.
विषय : 'मनी, मीडिआ अँड पॉलिटिक्स'
स्थळ : सिंबायॉसिस विश्वभवन, सेनापती बापट रस्ता
वेळ : शुक्रवार ६ जून, सायं ५:३० वा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जळजळ.
जळजळ.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हिंदू राष्ट्र सेनेविषयी
पुण्यात मुस्लिम युवकाच्या खुनासंदर्भात जिची चौकशी सुरू आहे त्या हिंदू राष्ट्र सेनेविषयी 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये आलेली बातमी.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हम्म
सकाळमधील बातमीला आलेला एक प्रतिसाद चांगला होता. त्या निष्पाप मुलाचा खून करणारे थोरात, लाडगे, गंभीरे, कंधारे, सोनावणे, साठे, सुन्नावे, अगाम, यादव वगैरे आडनावांचे हे आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचे सैनिक होते. या आडनावांच्या व्यक्तींना हिंदू राष्ट्रात किंवा हिंदू समाजव्यवस्थेच्या उतरंडीत नक्की काय स्थान आहे बॉ? यांच्या पूर्वजांना हिंदू समाजात ना शिक्षणाचा अधिकार होता, ना संपत्तीचा. मग नक्की कशासाठी खून करताहेत?
मोदींचे फॅन्स आणि त्यांना असलेली माहिती, ज्ञान, इ.
ज्यांनी मोदींना मत दिलं अशा मुंबई-दिल्लीतल्या काही लोकांना विचारलेले प्रश्न आणि त्यांची उद्बोधक उत्तरं -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
डुकाटाआ
.
मोदी राष्ट्रपती(सुद्धा) कधी(पासून) झाले?
(सुमारे १:१०. जाड ठसा माझा.)
बाकी, मोदी 'हेड ऑफ स्टेट' आहेत की 'हेड ऑफ गवर्मेंट' हेसुद्धा माहीत नसणार्यांनी लोकांना मोदींबद्दल किती माहिती आहे याची चिकित्सा करणे रोचक वाटले.
हे विडीओ बनवणार्यांना माहीत
हे विडीओ बनवणार्यांना माहीत नसाव की मोदी नक्की कुठले हेड आहेत. त्यांनी प्रश्न विचारणार्यांना असं नसाव विचारल की हेड ऑफ स्टेट बद्दल त्यांना काय वाटत?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हो, पण...
...या सगळ्या एक्सरसाइझमागे कोणाचीतरी संकल्पना असेलच ना? त्याने तपासायला (मराठीत: प्रूफरीड करायला) नको, आपण काय प्रसिद्ध करीत आहोत ते?
हॅ हॅ हॅ फारच अवाजवी अपेक्षा
हॅ हॅ हॅ
फारच अवाजवी अपेक्षा बुवा तुमच्या
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तो तुमच्या हेडचा प्रॉब्लेम आहे.
भारतातली यंदाची निवडणूक 'प्रेसिडेन्शिअल इलेक्शनच्या' चालीवर लढली गेली. तेव्हा ते 'प्रेसिडेंट' होणार हे नक्की. मोदी नक्की कुठले हेड आहेत ते तुमच्या हेडमधे घुसलं नाहिये अजून. ते घुसायला हेड जाग्यावर असावं असं वाटत असेल, तर हळूहळू हेडवर भगवी टोपी घालायला सुरुवात करा अत्तापासून. हेड(गेवार) वगैरे नावं पेरायला शिका बोलण्यातून.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
वा! मोदींनी मी लोकसभेची
वा! मोदींनी मी लोकसभेची निवडणूक राष्ट्रपती बनण्यासाठी लढतोय असं लोकांना सांगितल होतं का? असेल तर मला खरच नव्हतं माहित. सॉरी हं.
आणि रहाता राहिलं टोपीचं आणि आमच्या हेडचं. मागितले नसताना फुकाचे सल्ले नका देउ, आमचं हेड आहे ताळ्यावर. फक्त तुम्हालाच काय ती अक्कल आहे असं नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/india/Shashi-Tharoor-a-virtual-defect...
काँग्रेस मधील लिडरशीप क्रायसिस वरून लक्ष दुसरीकडे वेधण्याचा क्षीण यत्न.
(आता ठरलेला प्रश्न - काँग्रेस मधे लिडरशीप क्रायसिस आहे हे कशावरून ??)
http://blogs.timesofindia.ind
http://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/modi-must-say-no-to...
चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केलेल्या ५४,००० कोटीच्या प्याकेज वर स्वामीनाथन अय्यर यांचा लेख.
http://economictimes.indiatim
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/centre-to-p...
हा बजेटरी सपोर्ट जनरल आहे की कर्जमाफीसाठी आहे ते कळले नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
टुरिंग टेस्ट
युजिन गुस्तमन* नामक संगणक प्रणालिने आपण १३ वर्षिय युक्रेनिअन तरुण आहोत असे भासवून टुरिंग टेस्ट यशस्वीरित्या पास केली. आता भविष्यात मराठी संस्थळांवरही अशा संगणक प्रणाल्या विविध नावांनी प्रतिसाद लिहित्या झाल्यावर काय होईल ह्याची कल्पना रोचक आहे ;).
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*उच्चार सदोष असू शकेल.
'हर' आठवला!
'हर' आठवला!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
भविष्यात???
हा आमचा वैयक्तिक अपमान समजावा काय?
माफीनाम्याच्या प्रतीक्षेत...
सिद्धता
चला तर आमचा माफीनामा इथे वाचा आणि सांगा काय वाचले ते.
???
'ओव्हरलूक्स' आणि 'इन्क्वायरी' असे दोन शब्द (कसेबसे१) वाचता आले. ही तुमची क्षमायाचनेची संकल्पना आहे काय?
................................................
१ कृपया हस्ताक्षर सुधारावे, हा प्रेमळ सल्ला अधिक कळकळीची विनंती.
आयला
प्रणाली कॅपचा वाचू शकत असली तरी(पक्षी: सॉर्ट ऑफ टुरिंग टेस्ट पास करु शकत असली तरी) तिने माझी डिप 'इन्क्वायरी' इन्टू ऑपोलॉजी 'ओव्हरलूक्स' केली म्हणून सुधारणेला वाव आहे असा माझा प्रेमळ सल्ला देऊ इच्छितो, त्याचबरोबर कंटेटमधल्या सल्ले देण्याच्या स्टाईलवरुन तिचे प्रोग्रामिंग पुण्यात झाले असावे असे दिसते.
...
४११ ०३०.
इस में कोई शक?
इस में कोई शक?बे-शक साथ(वा)ह
बे-शक अथवा सातवाहन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ज्याने मत दिलं त्याचच काम
ज्याने मत दिलं त्याचच काम करणार - पासवान
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जर का मतं दिली नाहीत तर पाणी
जर का मतं दिली नाहीत तर पाणी तोडू असं म्हणणार्या अजितदादाचे बंधू दिसतात हे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
स्मार्ट टिव्ही नॉट स्मार्ट इनफ
स्मार्ट टिव्ही देखिल हॅक केला जाऊ शकतो.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/social-media/a...
राज्यसरकारचा तीव्र निषेध.
भारत श्रीलंका संबंधात
भारत श्रीलंका संबंधात मासेमारांचा प्रश्न मोठा आहे. त्याचा श्रीलंकेतील तमिळ जनतेचा दृष्टीकोन मांडत पुढे सरकणारा अतिशय रोचक लेख.
या प्रश्नाची गुंतागुंत अर्थातच या लेखात पुरती आलेली नाही तरी वेगळी बाजू उत्तमपणे प्रकाशात आणली आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आयला अवघड आहे. अत्याचार
आयला अवघड आहे. अत्याचार अत्याचार म्हणून ओरडायचे आणि इथे स्वतःच ज्यांची वकिली करतो त्यांनाच त्रास होईल असे वागायचे!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सानिया मिर्झा डबल्समध्ये
सानिया मिर्झा डबल्समध्ये सहाव्या क्रमांकावर पोचली आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पुस्तके फाडून टाका - प्रथम
पुस्तके फाडून टाका - प्रथम वर्ग न्याय दंडाधिकार्यांचा एक खळबळजनक निकाल.
अर्थात सत्र न्यायालय, उच्च न्यायालय इथे हे प्रकरण जाईलच.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी
नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीतील विजयांची व एकुणच प्रतिमांची, विचाराची तुलना करणारा एक रोचक लेख
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
http://timesofindia.indiatime
This comment has been moved here.
आबा पाटलांनी तोंड उघडलं आणि
आबा पाटलांनी तोंड उघडलं आणि पुन्हा नवीन वादाला आमंत्रण दिलं (अर्थात ह्याचं 'रेकॉर्डींग' अजून प्रेसला मिळालं नाहीये. पण आबा नेहमीच असं वादग्रस्त काहीतरी बोलतात त्यामुळे रेकॉर्डींग ची वाट न पाहता प्रेस वर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. अर्थात नेहमी प्रमाणे आबा हे ही 'इनोसंटली' म्हणतात की मला असं म्हणायचंच नव्हतं वगैरे). तर प्रेस आणि उपस्थित आमदारांच्या मते, आबा जे बोलले (राज्यातील वाढत्या बलात्कार नी महिला अत्याचारा बद्दल) :
१. "'प्रत्येक घरी पोलिस दिला तरी महिला असुरक्षितच" किंवा "महिलांवरील बलात्कार्/अत्याचार थांबणार नाहीत."
२. "'नैतिकतेमध्ये झालेली घसरण, जाहिराती, अश्लील चित्रांमुऴे बलात्काराचे प्रमाण वाढले आहे."
वरील पहिले वाक्य ही जरी वस्तुस्थिती असली तरी सत्ताधारी राजकीय नेत्याने/ गृहमंत्र्यांनी असं बोलावं हे काही पटत नाही. तेच स्वतः हतबल असल्यासारखे वावरत असतील तर मग कठीण आहे.
वरील दुसरे वक्तव्य म्हणजे सरळ सरळ स्वतःच्या जबाबदारीतून हात झटकण्याचा प्रकार आहे. जेवढं अश्लील आणि हीन दर्जाचं जाहिरातीकरण आणि चित्रण होतं त्यामानाने नक्कीच चांगल्या आणि सोबर दर्जाच्या कलाकृती निर्माण होत असतात त्यामुळे एवढ्या मोठया गुन्हे/अत्याचाराला हे असं कारण देणंच मुळात हास्यास्पद आहे.
प्रत्येक घरात पोलीस दिला काय आणि सुरक्षा दिली काय - जे गुन्हे व्हायचे ते होणार आणि होत असतात. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे गुन्हे झाल्या नंतर पिडीत व्यक्तीला पोलीस आणि शासनाचं त्वरित सहाय्य मिळतं का?
गुन्हेगाराला त्वरित शिक्षा होते का?
एक गुन्हा झाल्यानंतर त्यावर होणारी कारवाई आणि गुन्हेगाराला झालेली शिक्षा ह्याचं स्वरूप पाहता इतर (वुड बी) गुन्हेगारांना जरब बसेल का व ती बसावी एवढ्ं गंभीर त्याचं स्वरूप असतं का?
गुन्हेगाराला ह्यातून सही-सलामत सुटण्यास वाव असतो वा तो ठेवावा का?
त्यामुळे घरो-घरी पोलीस देऊ नेका पण अत्याचार करणार्या गुन्हेगारांना असा धडा शिकवा की असे गुन्हे करायची कोणी पुन्हा हिंम्मत करणार नाही आणि कदाचित ह्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. आणि हे सर्व केवळ सत्ताधारी नेत्यांच्याच हतात आहे, जनतेच्या नाही त्यामुळे जनतेला किंवा इतर कुठल्याही स्त्रोतास असे गुन्हे होण्यास जबाबदार ठरवणं वा दोष देणं ह्या राजकारण्यांनी थांबवावं.
१२०० वर्षांची गुलामी
http://www.firstpost.com/politics/1200-years-of-servitude-pm-modi-offers...
नरेंद्र मोदी म्हणतात देशवासियांना १२०० वर्षे गुलामीची सवय झालेली आहे. त्यातले पहिले वर्ष कोणते नि गुलाम करणारा सत्ताधीश कोणता? शेवटचा कोणता?
ही गुलामी दरम्यानच्या काळात सातत्याने होती असे म्हणता येईल का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हात्तेच्या
१२०० वर्षे भारत कायम गुलामीखाली होता. मुस्लिम हेच इथले शासक होते हे आडून आडून सुचवणार्या आणि पसरवणार्या भुक्कड
काँग्रेसचा चांगलाच समाचार घेत सावरकरांनी सहा सोनेरी पाने वगैरे लिहिले.
त्याचा एकूणात ढोबळ सारांश असा :-
भारत सलग १२०० वर्षे गुलामीत वगैरे काही नव्हता. सतत १२०० वर्षे युद्धमान मात्र जरुर होता. काही काळ परकीयांची तात्पुरती
सरशी झाली खरी; पण ती लाट वेळीच दरवेळी उलटवलीही गेली. भिकारड्या पाश्चात्त्य (किंवा काँग्रेसी, किंवा कुणीही अ-सावरकरवादी मंडळींनी)
"पराभूत भारत", "१२०० वर्षे गुलामीतला भारत" असले समज पसरवले.
तर सांगायचं म्हणजे सावरकर चूक की बरोबर हा मुद्दा इथे नाहिच.
मला वाटायचं की भुक्कड कॉम्ग्रेसींनी लिहिलेल्या पूर्वग्रहदूषित इतिहासापेक्षा सावरकर व इतर उजव्यांनी/राश्टृवाद्यांनी/नॉनस्यूदोसेक्युलरलिष्टांनी
लिहिलेल्या इतिहासाचे नमो पाइक वगैरे आहेत. पण तेही त्या भुक्कड थर्डक्लास काँग्रेसी इतिहासावरच विश्वास ठेवतात असे दिसते आहे.
ता क :-
बातमीचे पान इथून उघडत नाही. बातमीच्या मथळ्याबद्दल अ.जो.-बांनी/अजोबांनी दिलेल्या प्रतिसादावरून हा संपूर्ण प्रतिसाद लिहिला आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
१२०० वर्ष गुलामीमध्ये
१२०० वर्ष गुलामीमध्ये भारतातली जनता होती की नाही हा नसून १२०० वर्ष गुलामगिरीत असल्याची मानसिकता होती का हा आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
प्रत्यक्ष गुलामगिरी नसेल
प्रत्यक्ष गुलामगिरी नसेल (किंवा तिचा इतिहासही नसेल अगोदर) तर गुलामगिरीची मानसिकता कशी काय होणार बॉ?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
हेच बोल्तो
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मुळाअत १२०० वर्षांपूर्वी
मुळाअत १२०० वर्षांपूर्वी सध्याचा भारतच नव्हता. सध्या दिसतोय ते भारताचे रूप गेल्या दोनशे वर्षात तयार झालेले आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुळात ४.५ अब्ज वर्षांपूर्वी
मुळात ४.५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीच नव्हती. आणि २-३ वर्षांपूर्वी ऐसीही नव्हते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ऐसीधर
मग काय, घासकडवीनी 'लेट देअर बी ऐसी' असे म्हंटले असावे काय किंवा इतर संस्थळीय 'नंथिंग' मधून विस्फोट होउन ऐसी तयार झाले असावे?
हम्म...शक्यता नाकारता येत
हम्म...शक्यता नाकारता येत नाही. कोण जाणे, तेव्हाचे काही कॉस्मिक रेज़ संस्थळीय अवकाशात अजूनही बर्यापैकी इंटेन्सिटीने तरंगत असावेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तेव्हाचे काही कॉस्मिक रेज़
अवकाश ताण फार बसला नसल्याने ते तरंगतच असतात, दुसरा बँग इतक्यात होणे नाही.
काञ की बॉ. सृष्टिकर्त्याने१
काञ की बॉ. सृष्टिकर्त्याने१ मनात आणले तर तेही औघड नाही
१सृष्टीचे बाबा न्हवे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
@ ऋ
देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....
http://www.aisiakshare.com/node/1104
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
शिवाय
दोस्तांशी आजच्या मथळ्यांबाबत गप्पा होत असताना आलेली कमेंट :-
बाराशे वर्षे जर भारत वासियांनी गुलामगिरी भोगलेली असेल तर भारतीय स्त्रियांनी त्याहीपेक्षा जास्त गुलामगिरी भोगलेली आहे.
१) १२०० वर्षे पुरुषांची + परकीयांची.
२) व त्यापूर्वी फक्त भारतीय पुरुषांची.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अहो तेव्हा भारतच नव्हता.
अहो तेव्हा भारतच नव्हता. अमेरिकेगत नुस्ते आदिवासी पसरले होते इकडेतिकडे.
शिवाय ग्रीकांनी आपल्या ग्रंथांत लिहिल्याप्रमाणे भारतात-ऊप्स, सॉरी, तेव्हा भारत नव्हताच, नै का. भारतीय उपखंडात-नै नै नै, इराणच्या पूर्वेस अन चीनच्या पश्चिमेस असलेल्या, दक्षिणेस समुद्र इ.इ. असलेल्या राष्ट्रहीन इ.इ. माणसे राहत असलेल्या भागात गुलामगिरी नव्हती. अन ग्रीक(पाश्चिमात्यांचे आद्यगुरू) लिहितात तेच खरं असतं, त्यामुळे ही गुलामगिरी आत्ताच उपटलेली आहे.
झालंच तर तेव्हा स्त्रियांवरही अत्याचार होत नसत. कारण जिथे भारतच नव्हता, तिथे तथाकथित भारतीय संस्कृतीही नव्हती- फक्त पोषक हवामानामुळे खंडीभर माणसे होती इतकंच. अन बलात्कार हे संस्कृतीचे अपत्य आहे, सबब ना रहेगी संस्कृती ना रहेगा बलात्कार. इतकं कळू नये तुम्हां झंटलमन लोकांना?
हा शोध तर एकदम जबरीच लागला की ओ. भारतच नाही, सबब भारतीय संस्कृती नाही, सबब अत्याचार नाही. झालंच तर जे कै शिलालेख अन देवळे अन ग्रंथ दिसतात ते कुणा एलियन्सनी केले म्हटले की काम संपले! तसेही हिष्ट्री च्यानेलवर अजिंठा-वेरूळवाली लेणी एलियन्सनी बांधल्याचा कधीकाळी उल्लेख आला होता. आता पाश्चिमात्य सांगताहेत म्हंजे तेही बरोबरच असणार नै का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
किती तो त्रागा! मजा आली!
किती तो त्रागा!
मजा आली!
बाकी भारत नव्हता मकोणी म्हटलंय बॉ? मी तर सध्याचा भारत म्हटलंय.. तरी त्रागा करायचा तर करा. डु मज्जा!
आम्ही इतिहास संशोधक नी अभ्यासक वगैरे नसलो तरी तेव्हा हा उपखंड अनेक राज्यांत विभागला गेला होता असे ऐकून आहोत बॉ!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
=))
त्रागा करायला आम्ही लिबरल विचारवंत थोडीच लागून गेलोत? 'आयव्हरी टॉवरांत बसून चिंता करितो विश्वाची' छाप त्राग्यावरची त्यांची मक्तेदारी हिरावू पाहणारे आम्ही कोण
सध्याचा भारत नव्हता वैग्रे टिपणी अगोदरच्या प्रतिसादानंतरची शुद्ध मखलाशी आहे. अगोदरचा प्रतिसाद म्हंजे त्या बातमीतली हवा काढून घेण्याचा प्रकार होता हे स्वयंस्पष्ट आहे. मुद्दा आणि प्रतिसादाचा संबंध नाही, शिवाय स्वतःची मखलाशी तेवढी चालते अन प्रतिमखलाशी मात्र त्रागा!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सदर बातमीत काढून घ्यायला हवा
सदर बातमीत काढून घ्यायला हवा होती?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गेली १२०० वर्षे
भारतीयांनी गुलामगिरी भोगली असे कुणी म्हटले तर 'त्या काळी सध्याचा भारतच नव्हता' या प्रतिवादाला औचित्यपूर्ण कसे म्हणता येईल ते कळत नाही. किंवा शिवपूर्वकालीन मराठ्यांवर अन्याय झाला म्हटले तर तेव्हा मराठेच नव्हते म्हटल्यापैकी आहे.
प्रतिवाद करायची इच्छा नसेल हे समजू शकतो, पण मग पाश्चात्य प्रभावाखालचे औटडेटेड इम्प्लिकेशन्स सारण्यात काय औचित्य आहे? वसाहतवादी ऊप्स स्यूडोलिबरल मानसिकता अजूनही न गेलेल्याचा पुरावा आहे.
असो, चालूद्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काहिहि काय? १२०० वर्षे कुणी
काहिहि काय? १२०० वर्षे कुणी गुलामगिरी भोगली? कोणत्या भारताबद्दल बोलताय?
सध्याच्या दक्षिण भारतात १२०० वर्षे गुलामगिरी होती? सध्याच्या पुर्वेला, पुर्वोत्तर राज्यांत होती? पंजाबात पूर्ण १२०० वर्षे गुलामगिरी होती? की महाराष्ट्रात होती?
मुळात भारत कशाला म्हणताय हे स्पष्ट झाल्याशिवाय असल्या विधानांना प्रतिवाद करायची इच्छाच कशी होईल
त्या बातमीपेक्षा वरील त्रागासुद्धा अधिक सुत्रबद्ध आणि मुद्देसूद आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मग नव्हती असे सरळ म्हणता येते
मग नव्हती असे सरळ म्हणता येते की नाही? की त्याजागी पाश्चात्य औटडेटेड माल सारलाच पाहिजे?
भारतात होती म्ह. कुठे होती असे काहीसे बोलणे योग्य की घाऊक 'तेव्हा भारतच नव्हता' छाप इम्प्लिकेशन्स योग्य?
असो, पसंद आपापली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आयव्हरी टॉवरांत बसून चिंता
आयव्हरी टॉवरांत बसून चिंता करितो विश्वाची' छाप त्राग्यावरची त्यांची मक्तेदारी हिरावू पाहणारे आम्ही कोण
नुस्तं आयव्होरी टॉवर्स मधून नाय काय.....
आयव्होरी टॉवर्स मधे बसून अ वर टॅक्स लावायचे प्रपोझल बनवून ते पैसे ब ला देऊन ब करवी क च्या जीवनात स्थित्यंतर घडवून आणण्याचा प्लॅन बनवणारे....
२०१४-१२०० = ०८१४ कि १९४७
२०१४-१२०० = ०८१४ कि १९४७ -१२०० = ०७४७ ?
या इसवीसनांत कोण आले होते भारतात?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>>२०१४-१२०० = ०८१४ कि १९४७
>>२०१४-१२०० = ०८१४ कि १९४७ -१२०० = ०७४७
पहिलीच वजाबाकी बरोबर असावी कारण १९४७ साली कुठे स्वातंत्र्य मिळालं? ते २०११ मध्ये मिळता मिळता राहिलं आणि आत्ता कुठे सोळा मे वीसशे चौदा रोजी मिळालं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आँ?
मग १९९९ ते २००४ होतं ते क्काय?
ते आपलं स्वातंत्र्य १.० हो.
ते आपलं स्वातंत्र्य १.० हो. अल्पजीवी ठरलं. शहाजीराजांनीही नै का प्रयत्न केल्ता? पण रायाराव आला अन गाढवाचा नांगर फिरवून गेला पुण्यावर...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आँ?
रायाराव कोण ?
मला वाटलं तो भटुरडा मुरार जगदेव गाढवाचा नांगर फिरवून गेला.
नंतर त्याच्या लाडक्या आदिलशाहीनच त्याचे डोळे फोडले म्हणे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आय थिंक तो रायाराव होता. जरा
आय थिंक तो रायाराव होता. जरा पाहून सांगतो. तूर्त मुरार जगदेवांचे नाव एकाच संदर्भात आठवते आहे. १६३६ साली निजामशाही खालसा केल्यानंतर अहमदनगरमधील मालाचे मुघल व आदिलशहा असे वाटप सुरू झाले. त्यात ती फेमस 'मुलूखमैदान' (खरे तर 'मालिक-ए-मैदान') तोफ तिथून विजापूरला आणली ती मुरार जगदेवांनी. वाटेत भीमा नदी लागली, तेव्हा ही तोफ नदीत पडली अन पुन्हा उचलून आणल्या गेली असा काहीसा किस्सा.
अन आदिलशहाने मुरार जगदेवांचे फक्त डोळेच काढले नैत, तर नंतर खांडोळी करून ठारही मारलेले आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बेड्या
शहाजींना बेड्या घालणारा हाच मुरार जगदेव ना?
नाही मोस्टलि, यद्यपि पाहून
नाही मोस्टलि, यद्यपि पाहून सांगतो.
शहाजीराजांविरुद्ध आदिलशाही दरबारात एक ट्रायमव्हिरेट होते- मुस्तफा खान, बाजी घोरपडे आणि अफजल खान. मला वाटते मुस्तफाखानानेच ते कृत्य केले असावे. आता आठवण धूसर आहे, पण शहाजीराजांना डेर्यात रात्रीच्या वेळेस पकडून आणले गेले इ.इ. त्यामागे यांचीच फूस होती. शिवाय कनकगिरीच्या वेढ्यात अफजलखानाने वेळेस मदत न केल्याने शहाजीराजांचा थोरला मुलगा संभाजी इ.स. १६५४ साली तिथे कामी आला. त्याचेच नाव पुढे 'शंभूराजां'ना दिले गेले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+०.९५
बरोबरे तुमचं, फक्त स्वातंत्र्य मिळाल्याचे वर्ष परकीय कालगणनेत नको लिहायला.
च्यायला, तसं तर मग 'शक' सुद्धा परकीयच की मग????
अंम्म्म...हो! राज्याभिषेक शक वापरू भेंडी, हाकानाका. हां तर राज्याभिषेक शके ३४३ मध्ये स्वातंत्र्य मिळालं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ठ्ठो
ठ्ठो
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मोदींचा इतिहास लैच कच्चा आहे.
मोदींचा इतिहास लैच कच्चा आहे. उगा काहीही हास्यास्पद विधाने करतात झालं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बातमी
आज बातम्या वाचून("गुलामगिरीच्या मानसिकते"विषयीची बातमी नव्हे) एक लहानशी कथा आठवली :-
तो श्रीमंत होता. तसा त्या नगरातील तो एकटाच, एकमेव श्रीमंत वगैरे नव्हता. पण इतरांच्या, विशेषतः चोर,गुंड ह्यांच्या डोळ्यांवर यावी इतकी संपत्ती तरी नक्केच बाळगून होता. तसंही संपत्ती बाळगून असायला काय जातय? ती त्यानं कमावलेली नव्हतीच. पडली होती आपली पिढीजात त्याच्याकडं. कधी योगायोगानं, कधी मेहनतीनं तर कधी चक्क पालथे,निंद्य उद्योग करुन त्याच्या पूर्वजांनी ती कमावली होती म्हणे.
श्रीमंतच तो. त्यातही जन्मजात पैशेवाला. त्याचे शौक काय कमी असणार ? एकदा त्याला आपल्याला झोपेत असताना सतत कुणीतरी संरक्षण पुरवावं असं वाटू लागलं. खर तर त्याला असं वाटावं हेच अलगद कुणीतरी योजलं होतं. तर इतरही शौकांप्रमाणं पुरेसे पैसे असले, की ते घालवायचे मार्गही आपोआप निघतात; ह्या समजुतीप्रमाणेच घडू लागलं. बर्यापैकी पैसा घेउन दोन अंगरक्षक हे काम करण्यास तयार झाले. शिवाय लगलच तर त्याचं मनोरंजनही ते करुन देत.
असेच काही दिवस गेले. ते त्याचं रंजन करत; त्याला गुंगी येइपर्यंत. गुंगीलाच झोप समजून तो झोपी जाइ. गुंगीबाहेर आला की त्याला फार त्रास होइ. पण ते पुन्हा त्याला गुंगीयेइपर्यंत जादुई कला सादर करीत. नंतर रक्षणासाठी उभे ठाकत.
.
एकदा बाहेरच्या आवाजाने तो गोंधळून उठला; दचकून अंथरुणात बसला. आसपास आग लागल्याचं त्याला तुटक्या खिडकितून दिसू लागलं. पण इतक्यात रक्षकांनी त्याला "असं काहीही होत नाहिये. बहुदा आपल्याला दु:स्वप्न पडले असावे. किंवा आता उठल्यावरही तोच भास होतोय." असं समजावलं. दुसर्या कुशीवर झोपायला सांगितलं. आणि काय गंमत! तो तसा दुसर्या कुशीवर झोपल्यावर आग कशी एकदम गायब झाली! समोर नुसतीच भिंत! काही चिंताच नाही. आगीच्या ज्वाळाही नाहित.
फक्त काही किंकाळ्यांचा वगैरे त्रास होत होता. तेवढ्यापुरता तो त्रास त्याने स्वतःपुरता मिटवला. कानात बोळे घालून!
.
आता कसं सारं शांत शांत होतं!कुठे आगही नाही आणि कुठे किंकाळ्याही नाहित. सारं कसं शांत शांत.
स्मशानशांततेकडे वाटचाल करणारं!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ठाणे जिल्हाच्या विभाजनाला
ठाणे जिल्हाच्या विभाजनाला मंत्रीमंडळाची मंजूरी
या बातमीत हा जिल्हा आशियातील सर्वात मोठा जिल्हा अशी माहिती दिली आहे.
ठाणे जिल्हा हा कच्छ, लडाख वगैरेपेक्षाही मोठा आहे काय? का कच्छ व लडाख हे जिल्हे नाहियेत?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मला वाटते ते विथ रिस्पेक्ट टु
मला वाटते ते विथ रिस्पेक्ट टु लोकसंख्या आहे. अन्य कुठल्याही शिंगल जिल्ह्यात १ कोटी + वाली लोकसंख्या नाही इ.इ.
मुंबैची आहे पण त्यात डिष्ट्रिक्ट आहेत वेगवेगळे इ.इ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ह्म्म्ममटाचे भाषिक स्टँडर्ड
ह्म्म्म
मटाचे भाषिक स्टँडर्ड लक्षात घेता सर्वाधिक लोकसंख्येला 'मोठा' म्हणणे शक्य आहेच
उत्सुकतेने विदा बघितला तर २००१ नुसार
ठाणे १.१ कोटी+, मुंबई उपनगर ९८ लाख+, पं. बंगालातील ४० परगणा १ कोटी+, पुणे ९४लाख+ (जुनी सीमा) हे क्लोज कंटेस्टन्ट दिसले
२०११ ला माझ्या अंदाजाने पुणे १ कोटीच्या आसपास (नी नव्या पुण्याची (२०१४चे बदल) हद्द धरली तर १.१ कोटीच्या आसपास लोकसंख्या जाईल). आणि मुंबई उपनगराने कदाचित ठाण्याला पार केले असुही शकते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
अगदी अगदी.
तदुपरि बाकीचे क्लोज़ कंटेस्टंट रोचक आहेत. लोकसंख्येत रेकॉर्ड करण्यात आता भारतीयांचा हात कोणी धरू शकणार नाही हे बाकी खरेच आहे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुण्याच्या हद्दीतले बदल हे
पुण्याच्या हद्दीतले बदल हे पुणे महानगरपालिका हद्दीचे बदल आहेत पुणे जिल्हा हद्दीचे नाहीत बहुधा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
विभाजनानंतरही ठाणे जिल्हा
विभाजनानंतरही ठाणे जिल्हा लोकसंख्येत मोठाच राहणार (सर्वात मोठा नाही राहणार पण) असं दिसतंय. ठाणे भिवंडी उल्हासनगर कल्याण अंबरनाथ शहापूर आणि मुरबाड हे तालुके धरले तर.....
सध्या नवी मुंबई ठाणे जिल्ह्यात धरतात तिचा वेगळा जिल्हा होणार की कसे ते कळत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सध्या नवी मुंबई ठाणे
तसे नसावे तिचा काही भाग नक्की रायगडमध्ये येतो (पनवेल वगैरे)
बहुदा ऐरोली वगैरेपण रायगड जिल्ह्यातच येते का? नकाशा बघावा लागेल.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बहुतांश भाग ठाण्यातच येतो असे
बहुतांश भाग ठाण्यातच येतो असे दिसते.
पनवेल नवी मुंबईत नसावेच बहुदा!
वरील प्रतिसाद मागे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अलिकडेपर्यंत आरटीओ नव्या
अलिकडेपर्यंत आरटीओ नव्या मुंबईत MH04 रजिस्ट्रेशन देत असे.
http://www.cidco.maharashtra.gov.in/RM_Taluka_Thane.aspx
हा चार्ट उपयुक्त ठरेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आभार! म्हणजे आधीचेच बरोबर
आभार!
म्हणजे आधीचेच बरोबर होते. सदर लिस्ट ठाणे तालुक्याची आहे.
सिडकोच्या या साईटवर ठाणे, पनवेल व उरण अश्या तिन्ही तालुक्यातील गावे दिसतात.
अर्थात नवी मुंबई ठाणे व रायगड अशा दोन्ही जिल्ह्यातील तालुके मिळून बनली आहे असे म्हणता यावे काय?
नवी मुंबई महानगरपालिकेत मात्र फक्त ठाणा जिल्ह्यातीलच काही गावे आहेत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नाही, भारतीयांनी तो हल्ला
नाही, भारतीयांनी तो हल्ला केला नाही
आपणच आपले नुकसान करून घेत आहोत अश्या प्रकारची स्पष्ट विधाने करणारा डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्रातील लेख रोचक आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
भगवे कपडे घालणार्या वेटरला
This comment has been moved here.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सौर सायकल
This comment has been moved here.