ही बातमी समजली का? - ५१
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा/जाईल.
===========
माझे मत : चुकीच्या जागी योग्य माणूस. हे मत प्राथमिक आहे. नीती आयोग म्हंजे नेमके काय व या आयोगाचा स्कोप काय आहे हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाही. पण तरीही - This is a bad beginning. कारण नियोजन आयोग बरखास्त करून त्याजागी दुसरा आयोग नेमणे व त्याचा आवाका संदिग्ध असणे ("संदिग्ध ठेवणे" अशा शब्द्प्रयोग मी करत नाहिये.) हे फ्री मार्केट च्या संकल्पनेस कितपत धरून आहे हा माझा प्रामाणिक प्रश्न आहे.
---
पण मोदींवर टीका करणारी काही मंडळी बदललेली आहेत. मोदी कसेही वागले तरी अतर्क्य टीका करीत राहणे हा आपला राष्ट्रीय छंद झालेला आहे की काय अशी शंका यावी. पूर्वी मोदी अतिरेकी वेगाने निर्णय घेतात व राबवतात व Democracy's primary founding principles is to increase deliberation (even if it slows down the process) - असल्याने मोदींची काम करण्याची (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह) स्टाईल भीतीदायक आहे असा मुद्दा असायचा.
आता "प्लेटांच्या च्या वाजण्याचा आवाज येतोय लेकिन खाना नही आ रहा" किंवा "कृती होताना दिसत नाहिये" किंवा रिझल्ट्स दिसत नाहियेत - असा आरडाओरडा सुरु झालेला आहे. शरद यादवांनी तर परवा नियोजन आयोग बरखास्त करणे हा मोदींचा एककेंद्रीपणा कडे वाटचाल करणारा निर्णय आहे असा "शून्य = शंभर" अशा स्टाईलचा आरोप केला होता.
जयराम रमेश तर अक्षरशः नुसते आरोप करीत सुटलेले आहेत. "मर्डर ऑफ डेमोक्रॅटिक इंडिया" काय व "एबीसीडी" काय !!! जरा इतिहासाचे भान ठेवा म्हणावं. मनमोहन सिंग हे अत्युच्चशिक्षित, स्वच्छ चारित्र्याचे, प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले, जागतिक स्तरावरचे विशेषज्ञ, आंतरराष्ट्रीय संघटनांमधे सुद्धा काम केलेले, नीतीवान प्रधानमंत्री होते. २००९ - २०१४ या कालात तर त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा ५ वर्षांचा पूर्व अनुभव सुद्धा होता. परंतु २००९ मधे जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा पहिल्या सहा आठ महिन्यांत त्यांनी स्वतःच (२००४ - २००९ दरम्यान) निर्माण केलेला ९%+ चा जीडीपी ग्रोथ रेट चार टक्क्यांच्या आसपास घसरला होता. आणि त्यावेळी तर त्यांचे "२००४ - २००९ दरम्यान पाय ओढणारे" कम्युनिस्ट्स सुद्धा अल्पमतात असल्याने निष्प्रभ होते. हे मान्य आहे की त्यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड उथलपुथल होत होती. मंदी होती. पण Why was such a PM with all the requisite credentials not able to manage the crisis better ?
माझ्या मते नियोजन आयोग कधी ना
माझ्या मते नियोजन आयोग कधी ना कधी बरखास्त होणारच होता. तशी गरजही होती.
मात्र हा निती आयोग काय आहे हे कळेपर्यंत मोदींची स्तुती वा टिका करण्याइतका ऐवज माझ्यापाशी नाही. मात्र अनेक स्तुतीपाठकांकडे व त्यांच्या कट्टर विरोधकांकडे तो असल्यास वाचायला जरूर आवडेल. देताय का कोणी?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नियोजन आयोग हाच तद्दन
नियोजन आयोग हाच तद्दन मूर्खपणा होता. आपल्या चमच्यांची रोजीरोटी ची सोय करण्यासाठी काढलेली नादान संस्था होती. मोदींनी ती बंद करुन नविन काहीच चालु केले नसते तर अभिनंदनास पात्र ठरले असते.
गब्बु - तुझे हे विचार वाचुन ममोंना सुद्धा हसायला आले असेल.
तुला ह्या विषयातले जास्त कळते म्हणुन सांग. ममोंनी ते RBI gorverner असताना काय विषेश दिवे लावले होते ( जसे आपण सुब्बाराव, राजन यांच्या विषयी चांगले बोलू शकतो तसे ). भावे आणि पाटील ह्यांनी जशी NSDL आणि NSE ची निर्मीती वेळेत करुन दाखवली तसे काही ह्यांचे कर्तृत्व आहे का? किंवा शेषन नी निवड्णुक आयोगच बदलून टाकला तसे काहीतरी?
त्यांना स्वताला अर्थशास्त्रीय अशी काही स्वताची मते तरी होती असे पण दिसले नाही. बॉस जे म्ह्णेल त्याची कागदपत्र तयार करायची आणि त्याच्या हो मधे हो म्हणायचे. इंदीराबाई, प्रणवदादा असले की त्यांच्या प्रमाणे. राव साहेब आले की त्यांच्या प्रमाणे. नंतर सोगा आणि रागा म्हणतीत तसे. नशिबानी मधे रावसाहेब ह्यांचे बॉस झाले आणि त्यांच्या कर्तृत्वाचे क्रेडीत हे खावुन बसले.
चारीत्र्य आणि नितीमत्ते बद्दल न बोलणेच चांगले.
राव यांच्या रुपाने एक चांगले
राव यांच्या रुपाने एक चांगले नेतृत्त्व भारताला लाभले याच्याशी सहमत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
त्यांच्या कर्तृत्वाचे क्रेडीत
लीडरशीप रावांची असेल, आणि उदारीकरण राजीव बाबा आणि इंदिराबाईच्या समाजवादी गाढवपणामुळे फारच ओवरड्यू झाले होते असेही मानू, पण मनमोहनसिंग यांचा त्यातला रोल कमी महत्त्वाचा नाही. ही भाषा त्यांच्याकरता अयोग्य आहे.
च्यायला, ऐसीवर एरवी हे शब्दही बॅन आहेत (म्हणजे अर्थहिन आहेत), पण अचानक त्यांना महत्त्व दिलेच आहे तर - ममो व्यक्तिशः प्रचंड चारित्र्यवान आणि नितिमान आहेत हे वादातीत आहे. चर्चा त्याचा देशाला किती फायदा झाला याबद्दल करता येईल.
बाकी राजकीय व्यक्तित्व इतके लेचेपचे होते कि साले मनस्वी समर्थनही करावे वाटत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ममो व्यक्तिशः प्रचंड
कोणाच्या नाकाखाली मारन, राजा, दर्डा, पटेल, कोणीतरी तो रेल्वेमंत्री ( तो म्हणे ममोंच्या पत्नीची शिफारस होता ), आणि असे अनेक लोक शेकडो, हजारो कोटी गायब करतायत आणि काहीही अॅक्शन घेतली जात नाही. हे चारीत्र्याच्या आणि नीतीच्या कुठल्या व्याख्येत बसते अजो?
कमीतकमी राजीनामा देणे तर हातात होते ना? तो न देता खुर्चीला चिकटुन रहाणे हे हे चारीत्र्याच्या आणि नीतीच्या कुठल्या व्याख्येत बसते अजो?
सोगा तर सतत अपमान करायच्या आणि प्रणवदा तर काडीची किंम्मत देत नव्हते, पण हे फक्त सहन करत राहीले.
हा समाजवादी गाढवपणा करण्यात ममोंचा डायरेक्ट हात होता कारण ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि RBI Governer होते.
मी वर तेच म्हणले होते. बॉस समाजवादी की हे समाज वादी, राव आले की रांवाच्या मागेपुढे. स्वताची काही मते होती की नाही.
हा समाजवादी गाढवपणा करण्यात
असं नका हो म्हणू. इंदिरा गांधी म्हटल्या तर सगळे खासदार लुगडी घालायला तयार असा मामला होता. बिचारे एकटे मनमोहन घेऊन असे झोडपणे बरे नाही. शिवाय नेहरूंच्या लेगसीमुळे इंदिरा गांधी समाजाबद्दल एक्सेसिवली क्रेझी होती. राजीवही तसलाच गधडा. ममोच तेवढे बर्यापैकी रॅशनल होते.
पण असो, ममोंचे यापलिकडे समर्थन करायचा काळ नाही. पण व्यक्तिगत चारित्र्याबद्दल माझे ममो आणि मोदी दोहोंबद्दल खूप हाय ओपिनियन आहे. त्याला व्यक्तिगत प्रोफेशनल अनुभव कारणीभूत आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कमीतकमी राजीनामा देणे तर
कमीतकमी राजीनामा देणे तर हातात होते ना? तो न देता खुर्चीला चिकटुन रहाणे हे हे चारीत्र्याच्या आणि नीतीच्या कुठल्या व्याख्येत बसते अजो?
तुम्ही प्रश्न अजोंना विचारलेला आहे. पण मुद्दा मान्य. एकदम.
गब्बर, अनु - स्वतःचा मानीपणा
गब्बर, अनु - स्वतःचा मानीपणा आणि (स्वतःच्या मते) देशहित याची तुलना करायची मोठ्या लोकांची पद्धत वेगळी असते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
देशहीतासाठीच म्हणतीय मी अजो.
देशहीतासाठीच म्हणतीय मी अजो. ममोंनी २००८ साली राजीनामा देवुन जर घोटाळ्यांची भांडी फोडली असती तर २००९ साली वेगळे सरकार आले असते. तसेच ममोंकडे भरपुर आणि ऑथेंटीक माहीती असल्यामुळे बर्याच लोकांना तुरुंगात जावे लागले असते.
तसेच ममोंकडे भरपुर आणि ऑथेंटीक माहीती असल्यामुळे बर्याच लोकांना
तुमचे सर्व प्रतिसाद रोचक पण
हे प्रचंड विनोदी वाक्य जाम आवडले आहे हे गंभीरपणे नमूद करु इच्छितो.
ऑथेंटिक माहिती असणे यात
ऑथेंटिक माहिती असणे यात विनोदी काही वाटत नाही.
जर ममो यांनी ती सगळी रिलीज़ केली असती आणि त्यावर कार्यवाही झाली असती तर बरेच लोक तुरुंगात गेले असते हे खरेच आहे.
आत्याबाईला मिशा असत्या तर काका-मामा इ. म्हटलेच असते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा जर आणि तरच महत्त्वाचा आहे.
हा जर आणि तरच महत्त्वाचा आहे. ऑथेंटिक माहिती असणे यात विनोदी काही वाटत नाही नव्हे तसे ते नाहिच. बहुधा माझी शब्दरचना चुकली. मला असे म्हणायचे होते की सर्व प्रतिसादांत ममोंनी मम म्हणण्याशिवाय काहिच केले नाही असा सुर आणि एकदम त्यांच्याकडून माहितीविस्फोटाची अपेक्षा करणे म्हणजे फारच होतेय. आता कदाचित ममो ही सर्व माहिती देतील पण कधी ? आत्मचरीत्र प्रकाशित केल्यावरच. तेही बहूधा एखाद्या इलेक्शनच्या वेळीच योगायोगाने प्रसिद्ध होईल. इट डिपेन्डस. तोपर्यंत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेलेले असेल नव्हे आ़ख्खा पुलही वाहून गेलेला असू शकेल.
अहो युधिष्टीर - ममो काही
अहो युधिष्टीर - ममो काही जणांना चारीत्र्य संप्पन्न आणि नीतीवान वाटतात. मी फक्त लिहीले होते की जर हा हायपोथिसिस ( ममो चारीत्र्यवान आणि नितीवान )खरा असेल तर त्यांनी काहीतरी करेक्टीव्ह अॅक्शन घेतली असती.
ज्या अर्थी त्यांनी तसे काही केले नाही, त्या अर्थी हायपोथिसीस चुकीचा आहे.
ममो काही जणांना चारीत्र्य संप्पन्न आणि नीतीवान वाटतात
अहो मी देखील मागल्या जन्मात चारीत्र्यवान आणि नीतीवान होतोच ना ? पण तरीही मला रणांगणावर "नरो वा कुंजरो वा" म्हणावे लागलेच ना ? चारीत्र्य ही काही ठराविक वेळेतच सिद्ध करायची गोष्ट आहे काय ? शिवाय ममो तर सरकारी नोकर. आता सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण तुम्ही ऐकली नाहिये काय ? अभी तो जिंदगी बाकी हय ! थांबा आणि वाट पहा. काम चालू आहे.
अर्थातच.
अर्थातच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ममोंनी ते RBI gorverner
ममोंनी ते RBI gorverner असताना काय विषेश दिवे लावले होते
चलनवाढ -
१९८० = ११%
१९८१ = १३%
१९८२ = ७.८%
१९८३ = ११.८%
१९८४ = ८.३%
१९८५ = ५.५%
१९८६ = ८.७%
ममोसिं चा कार्यकाल (रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर) निळ्या रंगात दर्शवलेला आहे. त्यांच्या या कार्यकालातील चलनवाढीचा दर हा सरासरी ८.४% होता. ते पदावरून दूर झाले तेव्हा सुद्धा (म्हंजे १९८६) चलनवाढीचा दर कमी च राहिला (रिस्पॉन्स लॅग).
डाटा इथून डाऊनलोड करता येईल. http://data.worldbank.org/indicator/FP.CPI.TOTL.ZG/countries/1W-IN?displ...
गब्बर - चलनवाढीचा दर तू दिला
गब्बर - चलनवाढीचा दर तू दिला आहेस पण दिवे काय लावले ते सांगितले नाहीस.
१. काही महत्वाचे धोरण बनवणारे निर्णय? काही ठसा उमटवणारे निर्णय?
२. आत्ता सुब्बाराव, राजन ऐवजी ममो असते आणि चिदंबरम आणि जेटलींनी रेपो रेट कमी करा म्हणले असते तर धावुन धावुन केले असते. त्यांनी १% कमी करा म्हणले असते तर ह्यांनी २% कमी कले असते. सोगांनी सांगितले असते xyz ला बॅ़कींग लायसन्स द्या की लगेच मध्यरात्री सुद्धा दिले असते.
३. RBI Governer चा चलनवाढ करण्यात किंवा कमी करण्यात खरेच कीती हात असतो? अर्थशास्त्रज्ञ म्हणुन सांग. मधे काहीवर्षे तर चलनवाढीचा दर बराच कमी होता, तो काय RBI Governer मुळे काय?
आर्थिक नीतीचे मॉनेटरी आणि
आर्थिक नीतीचे मॉनेटरी आणि फिस्कल असे दोन भाग असतात. रिझर्व बँक मॉनेटरी पॉलिसी ठरवते तर सरकार-अर्थमंत्री फिस्कल पॉलिसी.
रिझर्व बँक ओव्हरऑल अर्थनीती ठरवत नाही. ती (लोकनियुक्त) सरकार ठरवते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१ उदाहरण
ह्याचे एक उदाहरण म्हंजे युरोपिअन युनिअन, युरोझोन.
युरोपातील काही देशांनी एकत्र येउन (त्यात फ्रान्स -जर्मनी सारखे आघाडीचे देशही आले, ग्रीस्-पोर्तुगाल ह्यासारखे आता मागे पडू लागलेले देशही आले) एकच चलन स्वीकारले.
एका अर्थाने त्यांची एकच एक कॉमन सेंट्रल ब्यांक (आपल्या रिझर्व्ह ब्यांकेसारखी) तयार झाली. "युरो " हे चलन प्रचलित झाले.
म्हंजे त्यांचे मॉनिटरी युनिअन झाले.
.
.
पण सगळ्यांची सार्वभौम सरकारे वेगळी होती, त्यांच्या गरजा वेगळ्या प्रमाणात होत्या, डेमोग्राफी वेगळी होती.
पर्यायाने त्यांचे अर्थसंकल्पही वेगळे , अर्थमंत्रीही स्वतंत्र.
म्हंजे फिस्कल युनियन झाली नाही.
.
.
फिस्कल पॉलिसी व मॉनिटरी पॉलिसी ह्यांचा ताळमेळ न बसणे हे मागच्या काही वर्षात युरोपात आलेल्या स्लो डाउनच्या कारणांपैकी एक म्हटले जाते.
(portugal italy greece spain वगैरे पिग्ज देश गोत्यात आले. कारण आणीबाणीच्या वेळी त्यांना चलन नियंत्रण स्वतःच्या मर्जीप्रमाणे करता आले असते;
पण चलनावर आता ह्यांचे एकेकट्याचे नियंत्रण नसल्याने ह्यांना चलनाच्या बाबतीत विशेष काही करता आले नाही.
.
.
अर्थात ही पूर्णतः ऐकिव माहिती आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चलनवाढीचा दर १३% वरून ८% वर
चलनवाढीचा दर १३% वरून ८% वर आणणे हे अवघडच आहे. विशेषतः काँग्रेससारखे (क. क. च्या ला. च्या गरीबांची कड घेणार्यांचे) सरकार असताना.
---
अर्थशास्त्रज्ञ म्हणुन सांग. मधे काहीवर्षे तर चलनवाढीचा दर बराच कमी होता, तो काय RBI Governer मुळे काय?
अधोरेखित शब्दास आक्षेप. मी अर्थशास्त्राचा हौशी वाचक आहे.
चलनवाढ - केंद्रसरकार व RBI Governor हे दोघे जबाबदार असतात. केंद्रसरकार अप्रत्यक्ष व RBI Governor प्रत्यक्ष. चलनवाढ ही तयार करण्याचे काम रिझर्व्ह बँकेतच होउ शकते. अर्थात सरकार दबाव टाकून (Debt Deflation करण्यासाठी) मनी सप्लाय वाढवायला सांगू शकते व तसे करते सुद्धा व त्यावेळी (व आत्ताही) करायचे सुद्धा. काँग्रेस सरकार जास्तच करायचे. आणि म्हणूनच ममोसिं ची कामगिरी सरस आहे.
बाकी दुष्काळ, तेलाच्या कीमती
बाकी दुष्काळ, तेलाच्या कीमती हे फॅक्टर नसतात?
गेल्या २ महीन्यात महागाई कमी झाल्याचे दिसते आहे त्यात राजन आणि मोदी ( जेटलींचे ) कर्तृत्व आहे असे तुला म्हणायचे आहे?
दुसरे म्हणजे महागई कायमच जास्त राहु शकत नाही. २-३ वर्ष जर २ आकडी महागाई राहीली तर नंतर ती कमीच होते. कारणे २
१. आधीचा बेस जास्त असतो
२. २-३ वर्षाच्या सलग महागाई मुळे ग्राहकांचे कंबरडे मोडलेले असते आणि ते आपल्या खर्चात कपात करतात आणि महागाई वर आपोआप लगाम बसतो.
तू कुठल्याही ५-७ वर्षाची चलनवाढीचे आकडे घेवुन बघ, ममोंच्या कारकीर्दीसारखेच दिसतील. त्यात विषेश काहीच नाही.
बाकी दुष्काळ, तेलाच्या कीमती
बाकी दुष्काळ, तेलाच्या कीमती हे फॅक्टर नसतात? (उत्तर - नसतात. खरंच नसतात. कॉस्ट पुश इन्फ्लेशन ही बाष्कळ संकल्पना आहे.)
--
गेल्या २ महीन्यात महागाई कमी झाल्याचे दिसते आहे त्यात राजन आणि मोदी ( जेटलींचे ) कर्तृत्व आहे असे तुला म्हणायचे आहे?
गेल्या १४ महिन्यात महागाई क्रमाक्रमाने कमी होत गेलेली आहे. राजन यांचे श्रेय सर्वात जास्त. नंतर त्याचे प्रेडिसेसर सुब्बाराव यांचे. जेटलींचे जवळपास नगण्य (I mean Jetley has allowed Rajan to do Rajan's job. That is Jeyley's credit.).
खर्या अर्थाने गेल्या ३-४
खर्या अर्थाने गेल्या ३-४ महीन्यात महागाई कमी आली आहे.
त्याला मी दिलेली खालची २ कारणे नसतील?
१. आधीचा बेस जास्त असतो
२. २-३ वर्षाच्या सलग महागाई मुळे ग्राहकांचे कंबरडे मोडलेले असते आणि ते आपल्या खर्चात कपात करतात आणि महागाई वर आपोआप लगाम बसतो.
भारतात डीझेल, पेट्रोल १०-१५ % कमी झाले, तो इफेक्ट काढुन टाकला तर चलन वाढ कशी दिसली असती?
लाँग टर्म नसतील, पण तात्कालीक असतात.
कॉस्ट पुश इन्फ्लेशन ही बाष्कळ
गब्बर, अनु
कॉस्ट पुश कशाला, इन्फ्लेशन हीच संकल्पना बाष्कळ नव्हे का? शेवटी असते ते रिलेटिव इन्फ्लेशन. आणि लाँग टर्म मधे ते शून्य असते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आणि हो, इफेक्टीवली घासकडवींचे
आणि हो, इफेक्टीवली घासकडवींचे मते असलेच तर लाँग टर्म इन्फ्लेशन निगेटीव असते. म्हणजे प्रगती होत जाते तसे सगळे स्वस्त पडते, नसलेले मिळते, जास्त मिळते, फुकट मिळते, इ इ अर्थांनी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>>कॉस्ट पुश इन्फ्लेशन ही
>>कॉस्ट पुश इन्फ्लेशन ही बाष्कळ संकल्पना आहे
कॉस्ट पुश इन्फ्लेशन शब्दशः म्हटले तर कॉस्ट वाढल्या म्हणून प्राइस वाढतात. तसे भांडवलशाहीत होत नाही ही गोष्ट खरी. पण कॉस्ट कव्हर करून प्रॉफिट होण्याइतकी प्राइस मिळाली नाही तर विक्रेते क्रमाक्रमाने बाजारातून बाहेर पडतात. त्यामुळे बाजारातला सप्लाय कमी होऊन बाजारातली त्या वस्तूची प्राइस वाढते (अर्थात चपखल पर्यायी वस्तू स्वस्त उपलब्ध नसेल तर).
शेवटी गोल फिरून कॉस्ट वाढल्यावर भाव वाढतात असेच म्हणावे लागेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पण कॉस्ट कव्हर करून प्रॉफिट
पण कॉस्ट कव्हर करून प्रॉफिट होण्याइतकी प्राइस मिळाली नाही तर विक्रेते क्रमाक्रमाने बाजारातून बाहेर पडतात. त्यामुळे बाजारातला सप्लाय कमी होऊन बाजारातली त्या वस्तूची प्राइस वाढते
प्राईस वाढली की भारतीय मार्केट्स परकिय उत्पादकांना आकर्षक बनतात. भारताची आयात वाढते. भारतातील बाजारातला सप्लाय वाढतो. किंमती कमी होतात.
संभाव्य आक्षेप - गब्बर, मग इन्फ्लेशन झाल्यावर हे आयात वाढणे व किंमती कमी होणे हा प्रकार होतो की नाही. व होत असल्यास .....
-----
जपान, चीन, पाकिस्तान, बांग्लादेश, भारत, श्रीलंका ही सर्व राष्ट्रे (अॅपल्स टू ऑरेंजेस अशी तुलना असूनही) तेलावर सारखीच अवलंबून आहेत. त्यांचे गेल्या ६ महिन्यांचे इन्फ्लेशन चा डेटा काढून पहा. म्हंजे दिसेल की तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे चलनवाढ कुठे कुठे कमी/जास्त झालेली आहे ते. (माझ्या अंदाजानुसार) जपान अजूनही डिफ्लेशन च्या च सावटाखाली आहे.
@गब्बर - मला नेहमी असे वाटत
@गब्बर - मला नेहमी असे वाटत आलय की चलनवाढीचे पण ग्राहकांच्या वर्गा प्रमाणे ५-६ वेगवेगळे इंडेक्स असायला हवेत. त्यात्या वर्गात वेगवेगळ्या कॅटेगरीवर जेव्हडा खर्च होतो त्या वेटेज प्रमाने.
ज्यांचे उत्पन्न खुप कमी आहे, समजा महीन्याला ५००० आणि ते सर्व फक्त खाण्यावरच खर्च होतात, त्यांच्या साठी खाद्य पदार्थाचे भाव १० टक्के वाढले तर डायरेक्ट १० टक्के चलन्वाढ वाटेल.
पण ज्यांचे उत्पन्न ५०००० आहे आणि त्या पैकी फक्त १०००० खाण्यावर खर्च होतात तर त्यांच्या साठी चलनवाढ २% च असेल.
सध्याची चलनवाढ नीट परीणाम दाखवत नाही. मध्यमबर्ग, जो शिक्षण, मेडीसीन, प्रवास ह्यावर जास्त खर्च करतो त्यांच्या साठी चलनवाढ सरकारी आकड्यांपेक्षा खुप जास्त आहे.
Inflation is always and
Inflation is always and everywhere a monetary (printing press) phenomenon. ___ Milton Friedman (Father of Monetarism)
मला नेहमी असे वाटत आलय की चलनवाढीचे पण ग्राहकांच्या वर्गा प्रमाणे ५-६ वेगवेगळे इंडेक्स असायला हवेत. --- पण करन्सी एकच असल्याने काय फरक पडेल???
---
Think of inflation as increase in quantity of currency and coin supply in economy. Supply increases, its purchasing power declines. Purchasing power declines, you have to pay more currency to obtain the same goods you purchases last time-period. More currency and coins enter into market and chase the same number of goods. हीच भाववाढ.
इन्फ्लेशन हे मनी सप्लाय वरून
इन्फ्लेशन हे मनी सप्लाय वरून काढले जाते. शॉर्ट टर्म मध्ये मनी सप्लाय वाढला पण वस्तूंची उपलब्धता तेवढीच राहिली तर भाववाढ आणि चलनवाढ समानच असेल.
पण मनी सप्लाय दीडपट झाला आणि त्याच बरोबर वस्तूंची उपलब्धता दीडपट झाली तर भाववाढ होणार नाही.
सो इन्फ्लेशन इज नॉट सेम अॅज प्राइस राइज
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सो इन्फ्लेशन इज नॉट सेम अॅज
सो इन्फ्लेशन इज नॉट सेम अॅज प्राइस राइज
५०% करेक्ट.
१) आरबीआय इन्क्रीजेस इन मनी सप्लाय (all other things being the same .... including quantity of goods imported.)
२) all other things being the same - जर मनी सप्लाय वाढला तर परिणामस्वरूप भाववाढ होत नसेल तर काय होईल ??
मी काहीतरी वेगळे म्हणत होते,
मी काहीतरी वेगळे म्हणत होते, मला नीट मांडता आले नाही.
समजा समाजाचे गरीब, मध्यमवर्ग आणि श्रीमंत असे तीन वर्ग केले तर प्रत्येक वर्गासाठी महागाई ( चलनवाढ ) वेगवेगळी असेल.
उदा : जर गेल्या वर्षभरात फक्त खाद्य पदार्थाचेच भाव १०% नी वाढले तर गरीब ( जे ५०% खर्च खाण्यावर करत असेल ) त्यांच्यासाठी महागाई ५% नी वाढेल. मध्यमवर्ग ( जे २०% खर्च खाण्यावर करत असेल ) त्यांच्या साठी महागाई २ टक्क्यानी वाढेल. आणि श्रीमंतांसाठी कदाचित फक्त ०.५% नी वाढेल.
त्यामुळे असे ३-४ वेगवेगळे CPI असले तर चांगले नाही का होणार?
बरोबर आहे....तसे CPI काढले
बरोबर आहे....
तसे CPI काढले जातात. उदा. औद्योगिक कामगारांसाठी शहरागणिक सीपीआय काढले जातात. तसेच शेतमजूरांसाठी असतात.
http://labourbureau.nic.in/indnum.htm
पेपरमध्ये फक्त होलसेल प्राइस इंडेक्स्वर आधारित महागाई सांगतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
Inflation is always and
कीपिंग एव्हरीथिंग एल्स कॉन्स्टन्ट असे याला एक शेपूट हवे का?
सध्या अबेनॉमिक्सने जपानमध्ये मॉनेटरी पुश आहे पण जपान डिफ्लेशनमधून बाहेर येत नाहीय आणि त्यात ऑईल प्राईसेस कोसळल्याने व एकूणच डिमांड कमी असल्याने कमोडिटीजच्या किंमती कमी होत आहेत. म्हणजे निव्वळ मॉनेटरी उपाय पुरेसे नाहीत. विशेषतः इन्फ्लेशन वाढवण्याच्या बाबतीत मॉनेटरी उपाय हे पुशिंग ऑन द स्ट्रींग असतात असे म्हणतात त्यावर जाणकारांचे मत ऐकायला आवडेल.
इतरत्र गब्बरसिंग यांनी सरकार अप्रत्यक्षपणे इन्फ्लेशन नियंत्रण करु शकते असे म्हटले आहे त्यामुळे वरचे फ्रीडमन यांचे वाक्य कोणत्या परिस्थितीत लागू होते तेही कोणी समजावून सांगितले तर बरे.
इतरत्र गब्बरसिंग यांनी सरकार
इतरत्र गब्बरसिंग यांनी सरकार अप्रत्यक्षपणे इन्फ्लेशन नियंत्रण करु शकते असे म्हटले आहे त्यामुळे वरचे फ्रीडमन यांचे वाक्य कोणत्या परिस्थितीत लागू होते तेही कोणी समजावून सांगितले तर बरे.
१) केंद्रसरकार हे अप्रत्यक्षपणे इन्फ्लेशन नियंत्रण करू शकते - फिस्कल तूट खूप असेल किंवा फिस्कल कर्ज खूप असेल तर केंद्रसरकार ते भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर दडपण आणू शकते व जास्त मनी प्रिंट करा असे सांगू शकते. इतिहासात याची अनेक उदाहरणे आहेत. व रिझर्व्ह बँक ही सरकारला जबाबदार असल्याने ती तसे करते सुद्धा.
२) फ्रिडमन चे ते वाक्य - केंद्रसरकारच्या दबावाच्या अनुपस्थितीत इन्फ्लेशन फक्त रिझर्व्ह बँक निर्माण करू शकते किंवा कमी करू शकते.
३) तुम्ही अबेनॉमिक्स चा विषय काढला आहे. पण जोडीला अमेरिकेत सुद्धा ही चर्चा गेली ३ ये ४ वर्षे रंगलेली आहे. QE1 ... QEn मुळे. यावर मार्टिन फिल्डस्टाईन यांनी एक लेख लिहिलेला होता - प्रोजेक्ट सिंडिकेट मधे. मला काही तो समजला नाही. हा - http://www.project-syndicate.org/commentary/the-inflationary-risk-of-us-...
ग्राहकांचे प्रकार आणि
ग्राहकांचे प्रकार आणि वस्तूंचे प्रकार यांवर आधारित सर्व प्रकारचे महागाईचे आकडे मोजले जातात. पण त्याचा काही उपयोग नाही कारण मनि सप्प्लाय विशिष्ट ग्राहक किंवा विशिष्ट वस्तू यांच्यासाठी नसतो. तो सगळ्यासाठी एकच असतो. अशी टार्गेटेड महागाई कमी करायची असेल तर देशात १०० प्रकारची चलने असावी लागतील.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ग्राहकांचे प्रकार आणि
ग्राहकांचे प्रकार आणि वस्तूंचे प्रकार यांवर आधारित सर्व प्रकारचे महागाईचे आकडे मोजले जातात. पण त्याचा काही उपयोग नाही कारण मनि सप्प्लाय विशिष्ट ग्राहक किंवा विशिष्ट वस्तू यांच्यासाठी नसतो. तो सगळ्यासाठी एकच असतो. अशी टार्गेटेड महागाई कमी करायची असेल तर देशात १०० प्रकारची चलने असावी लागतील.
यही तो मै कह रहा हूं.
नितिनजी - पण कॉस्ट कव्हर करून
इथेच का थांबायचं? परकीय उत्पादक भारताला निर्यात करू लागले कि तिथे सप्प्लाय कमी होतो. तिथे किमती वाढतात. तिथल्या लोकांना भारताला निर्यात करण्यात काही अर्थ उरत नाही. उलट भारतीय उत्पादकच तिथे निर्यात करू शकतात. मग ते क्रमाक्रमाने बाजारात परत येतात.
-------------------
As many causes and effects one may trace in economies, their circular references bring the final situation to the original point. So we should trace the origin of events outside economies that impact them. Now what is an event outside economy?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बाकी दुष्काळ, तेलाच्या कीमती
बाकी दुष्काळ, तेलाच्या कीमती हे फॅक्टर नसतात? गेल्या २ महीन्यात महागाई कमी झाल्याचे दिसते आहे त्यात राजन आणि मोदी ( जेटलींचे ) कर्तृत्व आहे असे तुला म्हणायचे आहे?
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे भारतीय बाजारात तेल स्वस्त झाले आहे असे गृहित धरा. त्यामुळे ग्राहकांची बचत होत आहे कारण प्रतिलिटर त्यांना तेलावर कमी पैसे खर्च करावे लागतात. बरोबर ???
म्हंजे त्यांच्या हातात जास्त पैसा खेळू लागला. बरोबर ?
पण तेलाच्या किंमती कमी होणारेत हे उत्पादकांना आधी माहीती नव्हते. त्यामुळे त्यांनी उत्पादनाची क्वांटीटी कमी/जास्त केलेली नाहीये. म्हंजे उत्पादन (क्वांटीटी) तेवढीच आहे.
म्हंजे - There is more money chasing same quantity of goods. Right ? मग असे जर असेल तर भाववाढ व्हायला पायजे ?? नैका ????
म्हंजे - There is more money
संपूर्ण सात्विक लोकांच्या देशात, म्हणजे जिथे १००% पांढरी अर्थव्यवस्था आहे, तिथे १०० रुपये १००*क्ष होतात (क्ष = मनि मल्टीप्लायर) आणि ज्ञ (रुपये/प्रतिवर्ष) गतीने फिरतात. तेव्हा वर्षभरात १०० रुपयात १००*क्ष्*ज्ञ इतक्या मूल्याचे व्यवहार होतात. आदर्शतः लोकांमधले व्यवहार व्हायला पैसेच आवश्यक नसतात.
आपण "अलिकडे माणूस पैश्याच्या फार मागे लागला आहे" असे म्हणतो. पण वास्तवात पैसा कोणालाही नको असतो. साधारणतः लोक फार तर फार ५००० रु खिशात ठेवतात. त्यापेक्षा जास्त झाले कि बँकेत टाकतात किंवा खर्चून टाकतात. तेलाचे भाव उतरले आणि समजा बाकी सगळे तशास तसे आहे तर लोकांकडे चार पैसे जास्त राहणार. त्यांनी ते "दुसरे काहीतरी" खर्चायला वापरले तर त्याचे भाव वाढणार. बँकेत टाकले तरी कोणीतरी ते कर्ज घेऊन पुन्हा दुसर्या कशावर तरी खर्चणार. मग त्याचे भाव वाढणार.
पण तेलाच्या कमी झाल्याने जे लोक 'इतर खर्च' वाढवणार नाहीत किंवा तेलच जास्त वापरणार नाहीत त्यांचा फायदा आहे. आदर्शतः अर्थव्यस्थेत कॅपिटल गुडस नाहितच असे मानले तर बेसिक गोष्टी जितक्या स्वस्त होतील तितके बरे. गरीबांच्या गरजा स्वस्त होऊ लागल्या कि श्रीमंतांच्या गरजा आपोआप महाग होऊ लागतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
गब्बर - २००० ते २००४ ही पाच
गब्बर - २००० ते २००४ ही पाच वर्षे महागाई ५% च्या खाली होती. तुम्हाला गवर्नर चे नाव तरी आठवतय का?
आणि हा पराक्रम काय बाजपाई सरकारचा होता असे तुमचे मत आहे?
गब्बर - २००० ते २००४ ही पाच
गब्बर - २००० ते २००४ ही पाच वर्षे महागाई ५% च्या खाली होती. तुम्हाला गवर्नर चे नाव तरी आठवतय का?
काय हो असं म्हणता ? बिमल जलान. त्यांच्या कामगिरीचा प्रभाव एवढा होता की त्यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. भाजपाचे लोक इतके घाणेरडे आहेत की पूछो मत. (पोलिटिकल ग्रेप वाईन अशी होती की - Vajpayee did not want to see an Alan Greenspan emerge in South Asia). (नंतर २००९ मधे ग्रीनस्पॅन यांच्यावर ही प्रचंड टीका झाली हा भाग निराळा.)
अर्थशास्त्रज्ञ म्हणुन सांग.
मी सांगू? चलनवाढ जाऊच द्या, एकूणातच भारतीय अर्थव्यवस्था आणि भारत सरकार यांचा संबंध आहे का असा प्रश्न मला बर्याचदा पडतो. हे बरंच अति झालं, पण पडतो खरा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो > +१००००
अजो > +१००००
टुली ने म्हणल्या प्रमाणे फंक्शनिंग अनार्की आहे भारत म्हणजे. मोदी बघु काही बदलतात का ते.
मार्क टुली असे म्हणाला त्याला
मार्क टुली असे म्हणाला त्याला २५ वर्षे झाली. [फंक्शनिंग अनार्की हा गब्बरच्या स्वप्नातील स्वर्गच की].
मार्क टुली आजही असे म्हणतो का?
ज्यांचा सरकारशी कमीतकमी संपर्क येतो वर्षातून एक-दोनदा फक्त त्यांना सरकार नावाची गोष्ट काही करत नाही किंवा त्यांनी काही केल्यामुळे काही होत नाही असे वाटणे साहजिक आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मार्क टुली आज म्हणतो का ते
मार्क टुली आज म्हणतो का ते माहीती नाही, पण मी मात्र म्हणते.
ज्यांचा सरकारशी कमीतकमी संपर्क येतो वर्षातून एक-दोनदा फक्त त्यांना सरकार नावाची गोष्ट काही करत नाही किंवा त्यांनी काही केल्यामुळे काही होत नाही असे वाटणे साहजिक आहे.>>>> असे कसे हो, क्षणाक्षणाला सरकारशी संबंध येतो ( फक्त बर्याच वेळेला सरकार अस्तित्वात नाहीये असे वाटते ). ज्या रस्त्यावरुन जाते ते रस्ते सरकार बनवते, जो कर भरते तो सरकारला च जातो, वापरणार्या बर्यास गोष्टींचे दर सरकार ठरवते, वीज आणि पाणी मला मिळु द्यायचे की नाही ते पण सरकार ठरवते. कायदा सुव्यवस्था जी कधी अनुभवाला येत नाही ते सरकारच करते. गणपती, दहीहंडीचे उत्सव बघितले की सरकार अस्तित्वात नाहीये ह्याची जाणिव होते.
ज्यांचा सरकारशी कमीतकमी
दुर्दैवाने प्रोफेश्नली आमचा संबंध सरकारशी संबंध प्रचंड आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुमचा संबंध प्रोफेशनली येतो
तुमचा संबंध प्रोफेशनली येतो तर सरकार काहीच करत नसते असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
@नितीन - १०० गोष्टी करणे
@नितीन - १०० गोष्टी करणे अपेक्षीत असताना १० च करत असेल तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे सरकार "काहीतरी" नक्की करतय. माझ्या साठी १०० मधल्या १० हे प्रमाण फारच वाईट आहे.
करण्याचा देखावा १००% करते.
करण्याचा देखावा १००% करते. प्रोसिजर्स सगळ्या आहेत. पण सरकारची जी उद्दिष्टे असतात ती पूर्ण करण्याची धमक, इच्छा, बुद्धिमत्ता अजिबात सो कॉलड प्रामाणिक राजकारण्यांत आणि अधिकार्यांत नाही. आपला पिछवाडा सुरक्षित ठेवणे हेच त्यांचे सर्वात मोठे कौशल्य आहे. जनता आणि मिडिया कशावर काहीही टिका मूर्खासारखी करत सुटतात. त्याला हे इतके घाबरलेले असतात कि आपले सरकार ठप्प मानता येते. नरेंद्र मोदी मात्र निडर आहे पण तो किती व्हिजनरी, कुशल आणि या बथ्थड लोकांकडून काम करून घेण्यात यशस्वी निघेल हे कळायला अजून अवकाश आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>>नियोजन आयोग हाच तद्दन
>>नियोजन आयोग हाच तद्दन मूर्खपणा होता. आपल्या चमच्यांची रोजीरोटी ची सोय करण्यासाठी काढलेली नादान संस्था होती.
जाड ठशातला शब्द बरोबर नाही. तो काढला तेव्हा तो चमच्यांची सोय म्हणून नव्हता. पुढे तिचे स्वरूप आपल्या चमच्यांची रोजीरोटी ची सोय करण्यासाठी वापरलेली नादान संस्था असे उरले असेलही.
बाकी प्लॅनिंग कमिशन ही समाजवादाची लीगसी म्हणून डिसमिस करायची गरज नाही. सगळ्या मोठाल्या कॉर्पोरेट्समध्ये स्ट्रॅटेजी अॅण्ड प्लॅनिंग टीम्स असतात. आणि प्लॅनिंग कमिशनच नको इथून सुरुवात करून मोदींनी नीती आयोग उभारला आहे. तसा तो उभारला आहे हे चांगलेच आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बाकी प्लॅनिंग कमिशन ही
बाकी प्लॅनिंग कमिशन ही समाजवादाची लीगसी म्हणून डिसमिस करायची गरज नाही. सगळ्या मोठाल्या कॉर्पोरेट्समध्ये स्ट्रॅटेजी अॅण्ड प्लॅनिंग टीम्स असतात.
नियोजन आयोग हा समाजवादाची लीगसी नसून central building block आहे समाजवादाचा.
-
अधोरेखित भाग - नियोजन आयोग बरखास्त करण्याच्या निर्णयावरील अपेक्षित आक्षेप आहे. पण महाप्रचंड फरक आहे.
हलकाफुलका संदर्भ - हेन्री मिंट्झबर्ग चे राईझ अँड फॉल ऑफ कॉर्पोरेट प्लॅनिंग.
सांगे वडिलांची कीर्ति, तो येक
सांगे वडिलांची कीर्ति, तो येक मूर्ख.
लोकसत्ताचा फर्मास अग्रलेख!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+ १००
आई शप्पत फर्मास.
हेच आणि असंच म्हणायचं होतं.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
संपादका, डोन्ट प्रीच. म्हणे
संपादका, डोन्ट प्रीच.
म्हणे अतिरेकी राष्ट्रवाद. अबे म्हणावं, १/३ भारत दिल्लीच्या अधिपत्याखाली तरी आहे का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रत्येक मूल जन्माने मुस्लीम
प्रत्येक मूल जन्माने मुस्लिमच!
व्हिडिओ.
आता लगेच - ते असे म्हणालेच नाहीत किंवा त्यांचे म्हणणे "आऊट ऑफ काँटेक्स्ट" क्वोट केले गेले - अशी सारवासारव कुणी कशीकाय केली नाहिये ???? आश्चर्य आहे !!!
Owaisi is consistent.
अब्राहमिक धर्मांची थोडीही माहिती असेल तर ओवेसी म्हणतोय ते त्याच्या हायपोस्थिसिस्/गृहितक/श्रद्धा ह्यानुसार सुसंगतच आहे; हे लक्षात येइल.
ज्याला त्याला आपल्या श्रद्धा बाळगायचा पूर्ण अधिकार आहे. ते मान्य केले तर ओवैसीच्या विधानावर आक्षेप घेणे योग्य नाही.
.
.
इस्लामच्या मेनस्ट्रीम श्रद्धांनुसार :-
***********************इस्लामिक श्रद्धा सुरु************************************
ईश्वराने प्रथम विश्वनिर्मिती केली. मग गार्डन ऑफ ईडन मध्ये पहिला मानव निर्माण केला.
हा मानव म्हंजेच आदम(बाबा आदम) किंवा पाश्चात्त्य भाषेत अॅडम.
मग ईश्वराने जगातली पहिली स्त्री निर्माण केली तिचे अरबी नाव "हव्वा" (ईव्ह).
अॅडम/आदम हा जगातला पहिला मानव. तोच पहिला प्रेषित.
त्याचे इरादे नेक होते,वागणूक चांगली होती. ईश्वराची मर्जी त्याने संपादन केली होती.
ईश्वराने त्याला आणि ईव्ह/हव्वा ह्यांना मानवजात विस्तारण्याची आज्ञा केली.
ते पवित्र कार्य मानून आदमाने संतती वाढवली. (आजची मानवजात ही त्या आदमच्याच मुलांची(आणि पर्यायाने आदमची) संतती. )
(इस्लाममध्ये आदम व हव्वा ह्यांनी काही मोठ्ठे पाप वगैरे केले असे मानले जात नाही. ज्यू व ख्रिश्चन मात्र त्यांनी पाप केल्याचे मानतात.)
अशा प्रकारे सर्वजण सुरुवातीला ईश्वराच्या डायरेक संपर्कात होते. एकाच "खर्या" ईश्वराला भजत होते.
काही पिढ्यांनंतर मात्र बहुतांश मानव त्या खर्या ईश्वराला विसरु लागले. मूर्तीपूजा करु लागले.
मूर्ती नावाच्या दगडाने देव बनवलाय असे मानू लागले.
मग त्यातील एक नेक व पवित्र माणूस -- प्रेषित -- अब्राहम/इब्राहिम ह्याला खर्या सत्याची जाणीव झाली.
त्याने सगळीकडे पुन्हा एकेश्वरवादाचा प्रचार प्रसार सुरु केला. मूर्तीपूजा धिक्कारली.
बरेच लोक पुन्हा खर्या सत्याकडे वळले.पण प्रचार प्रसार पुरेसा झाला नव्हता.
त्यासाठी अजून एक प्रेषित अवतरला. त्याचे नाव मुसा म्हंजेच मोझेस .
त्याने अधिक आक्रमकपणे आपले म्हण्णे ठासून मांडले.
कालांतराने त्याच्याहूनही अधिक विस्तारासाठी ईश्वराने एका प्रेषिताची निवड केली.
त्याचे नाव इसा -- जिझस- येशू ख्रिस्त.
त्यानेही "खर्या धर्मा"चा म्हंजेच एकेश्वरवादाचा प्रचार केला.
मूर्तीपूजेत तथ्य नाही असे सांगितले.
हा "खरा धर्म" म्हंजेच एकेश्वरवाद. म्हंजेच इस्लाम.
अजून पाच सातशे वर्षांनी ह्या सगळ्या दैवी ज्ञानाचा फुल्ल अॅण्ड फायनल कन्सोलिडेशन करुन त्यावर फायनल मोहर उमटवण्याचे देवाने ठरवले.
त्यासआथी प्रेषित मोहम्मद ह्यास ईश्वराने निवडले.
त्यांनी आधीच्याच प्रेषितांची "खरी शिकवण" पुन्हा मांडली.
त्यांच्या मते प्रचलित शिकवण लोक जे मानतात ती "खर्या धर्मा"ची भ्रष्ट/अशुद्ध आवृत्ती आहे.
आधीच्याच प्रेषितांची खरी शिकवण सांगण्याचे दैवी कार्य मोहम्मद करीत आहेत.
आधीच्या सगळ्याच प्रेषितांनी (मोझेस व जिझस धरुन सगळेच) इस्लामचीच शिकवण दिली;
ती तुम्ही- आम्ही -- मानवजात विसरलो.
फार मोठा भाग अज्ञानाच्या घोर अंधारात रहायला लागला एखाद्या जंगली/"जाहिल"/असंस्कृत/रानटी/अशुद्ध माणसासारखा.
तो "जाहिलियत" मध्ये रहात होता.
म्हणून खूपशा देशात(विशेषतः पाकिस्तान, अरबस्थान(बट नॉट द्याट मच इन पर्शिया/इराण अॅण्ड इंडोनेशिया) वगैरेमध्ये जनमानस आहे तो असा :-
इतिहास सुरु होतो तो इस्लामच्या उदयापासून्. इस्लामपूर्व काळ म्हणजे भयानक काळ. अराजकतेचा काळ. रानटी युगाचा , अव्यवस्थेचा काळ.
जाहिलियतचा जमाना म्हणजे इस्लामपूर्व काळ.
आम्ही भयानक काहीतरी वागत सुटलो होतो. आम्हाला माणूस म्हणून कसे रहावे हे समजले प्रेशित मुहम्मदामुळेच.
.
.
सध्याची गैरइस्लामिक माणसेही त्या आदमचीच मुले आहेत. तीही जन्मतःच मुस्लिम आहेत; पवित्र आहेत.
पण त्यांचे धार्मिक्/आध्यात्मिकदृष्ट्या भरकटलेले त्यांचे पालक आपल्या अपत्यांनाही भरकटवतात.
त्याच्या उपजत प्रवृत्तीपासून दूर नेत त्याला गैर-इस्लामी बनवतात.
माणूस हा बाय-डिफॉल्ट मुस्लिम असतो.
पालकांमुळे किंवा इतर फ्याक्टरमुळे भरकटवला जातो.
इस्लाम हा पूर्वापार चालत आलेला आहे. जगातल्या पहिल्या माणसापासून तो अस्तित्वात आहे.
इस्लाम म्हणजे दुसर्ए तिसरे काही नसून जगातल्या पहिल्या माणसापासूनच्या काळापासून ईश्वराच्या माणसाकडून असलेल्या अपेक्षा
आणि आज्ञांचे/मर्गदर्शक तत्वांचे संकलन.
.
.
मुहम्मदाने इस्लाम स्थापला असे नाही.
मुहम्मद हा इस्लामचा पहिला किंवा एकमेव प्रेषित नाही.
इस्लाम पहिलेपासूनच होता. मुहम्मद हा शेवटचा व अंतिम (लास्ट अॅण्ड फायनल )प्रेषित होय.
***********************इस्लामिक श्रद्धा समाप्त************************************
.
.
एकदा हे असे मानण्याचे स्वातंत्र्य ज्याला त्याला दिले की तो जे बोलतो आहे ते त्याच्या श्रद्धांशी सुसंगत आहे; असेच म्हणावे लागेल.
.
.
ह्यातली बहुतांश माहिती इथल्या पब्लिकला असावीच असा अंदाज आहे. पण एखाद मुद्दा ठाउक नसलयस तेवढीच आपली भर टाकावी म्हणून लिहीत आहे.
काल टीव्ही च्यानल बदलताना एका न्यूज च्यानलवरची चर्चा घटकाभर नजरेस पडली.
त्यात प्रो-हिंदुत्ववादी इसम तावातावाने इस्लामचा प्रसार कसा तलवारीच्या जोरावर झालाय हे सांगताना
"अगदि चंगीज खानानेही इस्लाम तलवारीच्या जोरावर केला " असे उद्गार काढले.
वस्तुस्थिती :-
चंगेज खान(खरे नाव :- तेमुजिन, चंगेज खान ही त्याची पदवी; नाव नव्हे. त्याचा मंगोलियन अर्थ :- खानांचा खान, बादशहांचा बादशा, द सुप्रीम खान,द (ओन्ली)सम्राट )
हा मुस्लिम नव्हता. तो चीनच्या उत्तरेला असलेल्या मंगोलियातील भटाक्या टोळींपैकी सुरुवातीस एकाचा प्रमु़ख होता.
अफाट बेफाम युद्धे करत्-जिंकत त्याने त्यावेळपर्यंतचे जगाने पाहिलेले सर्वात मोठे एकसलग साम्राज्य उभारले.
चीनचा भला मोठा भाग जिंकला. मध्य आशियातील कित्येक भाग पादाक्रांत केले.
त्यानंतच्या काळात मंगोलांनी जवळपास आख्खा चीन, आख्खा इराण्,पाकिस्तानचा काही भाग, अफगाणिस्तानचा काही भाग्,तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान उझबेकिस्तान वगैरे रशियाच्या दक्षिणेकडचे -- मध्य आशियातले बहुतांश देश जिंकत अफाट -- अतिप्रचंड -- महाविशाल साम्राज्य उभे केले.
हे करणारे मंगोल बहुतांशाने स्थानिक मंगोलियन प्रथा-परंपरा पाळणारे (काइंड ऑफ पेगन्स) होते. मुस्लिम नव्हते.
चंगीझच्या घराणातले त्याची मुले-नातवंडे-सुना ह्यातील काही ख्रिश्चन, कित्येक बौद्धही होते.
ह्या सगळ्यांनी मध्यपूर्वेत पसरलेल्या , इस्लाम-डॉमिनेटेड जगातल्यांना जबरदस्त चेचून काढले.
अतिप्रचंड स्केलवर मुस्लिमांची हत्याकांडे केली. किमान सलग काही दशके बौद्ध्-ख्रिश्चन राजघराणी सातेकशे वर्षापूर्वी इराणी साम्राज्यातल्या बगदादवर राज्य करत होती.
(हत्याकांड कोणत्या स्केलवर केली असतील ह्याचा अंदाज येण्यासाठी एक प्रचलित समज पहा :-
मंगोलांनी इराणी साम्राज्यातली - इराणी पठावरची इतकी माणसे मारली की मंगोलपूर्व काळात तिथे जितकी लोकसंख्या होती;
तो लोकसंख्येचा आकडा गाठायला इराणला पुढची सातशे वर्षे लागली!!!
इतका मोठा नरसंहार तोही अणुबॉम्ब वगैरे आधुनिक शस्त्रांचा शोध लागण्यापूर्वी!
)
.
.
तर मुख्य मुद्दा :- चंगीझ खान मुस्लिम नव्हता.
"खान" हा शब्दाही त्यापूर्वी मुस्लिम नावात आज वाटतो तितका प्रचलित नव्हता.
.
.
काही हिंदू हे चंगीझ खानला मुस्लिम मानण्याची चूक करतात.
काही मुस्लिम हे सम्राट अलेक्झांडर/सिकंदर ह्याला त्यांचयसारखाच मुस्लिम/एकेश्वरवादी मानण्याची चूक करतात.
( सिकंदराबाबतच्या एका लोककथेतील अंधुकशा उल्लेखामुळे हे होत असावे. मोझेसला मुस्लिम्/एकेश्वरवादी मानणं समजू शकतो.
पण अलेक्झांडरला मानणं म्हंजे जरा अतिच वाटतं राव.पेगन -- मूर्तीपूजक होता ना राव तो.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माहितीपूर्ण आणि रोचक
माहितीपूर्ण आणि रोचक
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मनोबा.. झकास आहे रे ही
मनोबा.. झकास आहे रे ही माहिती. गैरसमजुती आहेत हे खरंच आहे आणि अशी माहिती वाचून ते आणखीनच जाणवतं.
काही समस्या किंवा प्रश्नच अस्तित्वात नाही असं नव्हे, पण त्यातला एक मोठा भाग गैरसमजुतीवर आधारित आहे हे लक्षात आलं तरी जटिलता थोडी कमी होईल.
मार्को पोलो चे पुस्तक वाचा
मार्को पोलो चे पुस्तक वाचा गवि. तो आणि त्याचे वडील चंगीजखानच्या नातवाच्या ( कुबलाई खान ) च्या दरबारात १७ वर्ष होते ( चीन मधे ).
कुबलाई खान नी ज्ञात इतिहासातले सर्वात मोठे साम्राज्य निर्माण केले होते ( चंगीज्खान चे राज्य अजुन वाढवुन ).
जरुर वाचतो. नाव काय
जरुर वाचतो. नाव काय पुस्तकाचे?
धन्यवाद.
Aniconism, मार्को पोलो इ.
प्रतिसाद अतिशय आवडला. अरेबिकमध्ये 'तो' या सर्वनामासाठीही 'होव्वा' असा शब्द आहे, त्यामुळे प्रथम ईव्ह = हव्वा 'ही' माहिती वाचून दचकलो होतो :). अर्थात, हे दोन निरनिराळे 'ह' आहेत. [तो = هو, ईव्ह = حواء].
याच संदर्भात, हा लेखही वाचनीय वाटला. विशेषतः शिया पंथीयांना प्रेषितांच्या प्रतिमारेखाटनाबद्दल फारसं नसणारं वावडं आणि इतर धर्मांतही, अगदी छोट्या प्रमाणात का होईना ही Aniconism ची परंपरा कशी अस्तित्वात होती, याची माहिती. (उदा. बौद्ध धर्मातला प्रतिमाविरोध).
. . .
चंगीझ खान आणि मंगोलांबद्दलच्या निरीक्षणांशीही सहमत. स्थिरावलेल्या तिसर्या खिलाफतीच्या (अब्बासिद) राजधानी बगदादची हुलागूच्या नेतृत्वाखाली झालेली वाताहत ही इतकी भयानक होती, की केवळ बुशने WMDच्या नावाखाली घातलेला धुमाकूळ त्याच्या जवळपास यावा. या दुव्यातला हा भाग पहा:
अशा अवाढव्य साम्राज्याच्या सम्राटाने आपला धर्म स्वीकारावा, यासाठी अर्थातच ख्रिश्चन आणि मुसलमानांमध्ये चुरस होती. वर उल्लेख केलेल्या तीन प्रमुख साम्राज्यांपैकी मंगोलियातल्या कुबलाई खानाच्या पदरचे अनेक सरदार मुस्लिम असले, तरी त्याचा कल बौद्ध धर्माकडे होता. इतर दोन मुख्य मंगोल साम्राज्यांनी मात्र (चंगीज खानाच्या मुलाचे चगतई आणि बगदादचा पाडाव करणारे हुलागुचे) यथावकाश इस्लाम स्वीकारला. 'मार्को पोलो'मार्फत ख्रिस्ती धर्म मंगोलापर्यंत पोचवण्याचे प्रयत्न अनेक कारणांनी अयशस्वी झाले; (चौथ्या क्लेमेंटनंतर पुढचा पोप कोण होणार याची तब्बल तीन वर्षं चाललेली निवडणूक, जेरुसलेममधल्या 'दिव्य' तेलाबद्दल झालेला भ्रमनिरास इ.) पण ती कहाणी वाचणं अतिशय रोचक आहे. 'ट्रॅव्हल्स् ऑफ मार्को पोलो' किंवा त्याच मार्गावरून कॉलेजात असताना प्रवास करून लिहिलेलं विल्यम डॅलरिम्पलचं 'इन झानाडू' हे पुस्तक यात ती वाचता येईल. (अगदी अलीकडे नेटफ्लिक्स स्ट्रीमिंगवर 'मार्को पोलो' नावाची मालिका उपलब्ध झाली आहे, पण ती काही फार खास वाटली नाही ऐतिहासिक माहितीच्या दृष्टीने.)
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Sex-in-jail-is-fundamental...
न्यायालयानी ** तोडण्याची परंपरा चालूच ठेवली आहे.
संत समागम महोत्सव
हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा: साक्षी महाराज. केवळ असे म्हणून न थांबता अंमलबजावणीसाठी समागम महोत्सवदेखील सुरू केलेला दिसतोय!
याच वेगानं आणि तीव्रतेनं भगवे
याच वेगानं आणि तीव्रतेनं भगवे चाळे चालोत. लवकरच तंद्रीत स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवतील अशी आशा करायला आपण मोकळे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
निधर्मी चाळ्यांपेक्षा कोणताही
निधर्मी चाळ्यांपेक्षा कोणताही भगवा चाळा देशाला परवडेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
त्या चारांना रोज जेवायला
त्या चारांना रोज जेवायला कोणत्या अन्नछत्रात पाठवायचे ? की अखंड अन्नदान यज्ञ चालू होणाराय ?!
व्हाट द फक- समागम
व्हाट द फक- समागम महोत्सवा???????
हे कुठे दिसलं नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मीरत येथे आयोजित संत समागम
अरे संत समागम महोत्सव. ते वायलं अस्तंय.
(मी पण उत्सुकतेने लिंक उघडली, पण...)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
(मी पण उत्सुकतेने लिंक उघडली,
इतकी उत्सुकता का होती, जर खरच असा महोत्सव असता तर जायचा विचार होता काय घाईने.
तसं नाय. घोटुल, घटकंचुकी,
तसं नाय. घोटुल, घटकंचुकी, कोणकोणत्या म्हाराजांचे दरबार, नाटकांनंतरचे पाचवे अंक असा सर्वांगीण (!!) मचाकीय अभ्यास केल्यानंतर हे काहीतरी णवीण असावं असं वाटून उत्सुकता ताणली गेली.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अं... या विषयावर एकदा
अं... या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे.
~ आपला ज्ञानपिपासू
==================
भूतकाळातील आस्वल्य.
दुसर्या परिच्छेदात पहिली
दुसर्या परिच्छेदात पहिली ओळ.
माझ्या पहिल्या प्रतिसादानंतरची स्मायली पाहायची राहिली का?
हो, पण म्हटलं केलाही असेल
हो, पण म्हटलं केलाही असेल महोत्सव आयोजित. काहीही होऊ शकतं आपल्याकडे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हुरळून जाऊ नका. चार मुले
हुरळून जाऊ नका.
चार मुले महिलांनी जन्माला घालावीत असे म्हटले आहे. हिंदू पुरुषांविषयी काही सांगितलेले नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मी हुरळून काय करू ओ थत्तेचाचा
मी हुरळून काय करू ओ थत्तेचाचा जितकी पोरे जास्त तितक्या जबाबदार्या अन खिशाला भारच जास्त. जुन्या काळातल्यासारखं, पोरं जास्त झाली म्हणून एकाला काकाबरोबर, दुसर्याला तिसर्या गावी असं पाठवता येणं शक्य आहे थोडीच?
अजो, जुन्या काळाच्या तुलनेत नव्या काळाचे हे एक डिसअॅडव्हांटेज सांगितल्याबद्दल एक मार्मिक तो बनता है आप से.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एकाला काकाबरोबर, दुसर्याला
काकाची पोरं कूठे असायची तेव्हा? तिसर्या गावच्या इसमाची पोरे कुठे असत? गणित तरी नीट मांडा ना.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उदगीर सोडून उरलेल्या
उदगीर सोडून उरलेल्या भारताबद्दल बोलतोय हो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
या लोकांच्या पार्श्वभागाशी
या लोकांच्या पार्श्वभागाशी पोकळ बांबूचा समागम घडवून आणला पाहिजे जागीच. फारच डिस्टर्बिंग ट्रेंड आहे हा. "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" काय होणार आहे ते आत्ताच थोडं थोडं दिसायला लागलं आहे. निधर्मी लोकांनी कट्टर आणि आक्रमक व्हायची वेळ (जायला) आली आहे; पण ते होणार नाही.
हिंदूनी लोकसंख्या वाढवली
हिंदूनी लोकसंख्या वाढवली पाहिजे हे पहिल्यानी ऐकलंत का?
बाय द वे, मुसलमान धर्माज्ञेने जास्त पोरे पैदा करतात तेव्हा पार्श्वबांबूयोगाची आठवण का नाही होत? का त्याबद्दल बोलायला जशी पार्श्व लागते तिचा अभाव आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ज्यांना गोळीची भाषा कळते आणि
ज्यांना गोळीची भाषा कळते आणि तीच बोलायची आहे त्यांना पोकळ बांबूने काय होणार? बाकी समभावाबद्दल आमची खडाजंगी करून झालेली असल्याने इथे तेच पुन्हा उगाळत नाही.
ननी - तुम्ही अगदी ममता
ननी - तुम्ही अगदी ममता बॅनर्जींच्या पावलावर पावुल टाकले आहे. त्यांनी पण बांबू चा असाही उपयोग करता येतो हे सांगितले होते.
मिहिरजी, तुमचाही निधर्मी
मिहिरजी, तुमचाही निधर्मी समागम ऐसीवर केव्हाचा चालू आहेच कि. बाकी साक्षी महाराज कोण?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सॉरी, पण -
हा प्रतिसाद उघड भडकाऊ आहे आणि सदस्याला उद्देशून लिहिलेला आहे. मुद्दा काय, आणि प्रतिसादात टार्गेट काय केलं आहे?
एक साधा वाचक म्हणूनही अजिबात आवडलेलं नाही.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
निधर्मी समागम म्हणजे निधर्मी
निधर्मी समागम म्हणजे निधर्मी लोक एकत्र येणे. सं + आ + गच्छ = एकत्र येणे. ऐसीवर निधर्मी लोकांची लॉबी आहे असे म्हणण्यात भडकावू काय आहे?
-------------
बाकी तुम्ही नक्की काय अर्थ काढून भडकलात ते जाणण्यास उत्सुक आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पाहिजे असेलच तर-
मीही त्याच अर्थाने म्हणत होतो.
गंभीर आ़क्षेप आहे तो सदस्यांना टार्गेट करून नको ती विषेशणे लावून प्रतिसाद देण्याबद्दल. तुम्हाला मुद्देसूद चर्चा करण्यात रस असेल तर तसं करावं. उगाच हा पुरोगामी आणि तो निधर्मी आणि अमुकांची लॉबी वगैरे बिनबुडाचे मुद्दे काढू नयेत. आणि हे तुम्ही वरचेवर करता आहात जे अस्थानी वाटलं म्हणून तसं स्पष्ट लिहिलं. ह्यावर पुन्हा लेबलं लावायला तुम्ही समर्थ आहातच.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अहो कोणाला स्यूडो पुरोगामी
अहो कोणाला स्यूडो पुरोगामी किंवा स्यूडॉ निधर्मी म्हणणं चूक असू शकतं. प्रॉपर पुरोगामी किंवा निधर्मी म्हणण्यात काय वाईट आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ते तुम्ही स्वाक्षरीत ठासून
ते तुम्ही स्वाक्षरीत ठासून सांगितलंय की. मग पुन्हा पुन्हा सगऴ्या प्रतिसादात {ऐसी,पुरोगामी,निधर्मी इ.} कॅच फ्रेजेस वापरल्या की झेपत नाही. असो! lets agree to disagree.
विमानांकडे वळूया!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
१००
उगीच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अस्वलजी, तुम्ही ऐसीवरचे
अस्वलजी, तुम्ही ऐसीवरचे मनमोकळे, आनबायस्ड, ह्यूमरस टाइपचे सदस्य आहात. मिहिरने ज्या अर्थाने समागम शब्द वापरला त्याच अर्थाने (आणि दिल्लीत संत समागम दिवसाला १० असतील) मी वापरला. मिहिर साक्षीमहाराजांच्या अनुयायांसाठी जो शब्द वापरतो तो मिहिरच्या अनुयायांसाठी आरामात वापरता यावा.
--------------
@ मिहिर - यातून काही भलताच अर्थ निघाला असेल तर अगोदरच माफी मागतो. मी चर्चा पॅशनेटली करतो पण अंततः ती शुद्ध चर्चा असते. व्यक्तिशः कोणाला दुखवायचा माझा हेतू नसतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बात कुछ जमी नही. अनकॉल्ड फॉर.
बात कुछ जमी नही. अनकॉल्ड फॉर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पॅरिसमध्ये 'चार्ली हेब्दो'वर हल्ला
कसलाही विधिनिषेध न बाळगण्यासाठी प्रसिद्ध असणारं फ्रान्समधलं उपरोधिक नियतकालिक 'शार्ली हेब्दो' (Charlie Hebdo) हे २००८मध्ये प्रेषित मुहम्मदाच्या कार्टून्समुळे चर्चेत आलं होतं. ताज्या वृत्तानुसार तिथे खुनी (दहशतवादी?) हल्ला झाला असून किमान १० वार्ताहर ठार झाले आहेत.
अपडेट : 'आयसिस' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याचे व्यंगचित्र छापल्याने साप्ताहिकाला या हल्ल्याला सामोरे जावे लागल्याचे सांगितले जात आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
(No subject)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"दु:खद" अशा श्रेणीची आवश्यकता
"दु:खद" अशा श्रेणीची आवश्यकता आहे बातमीच्या धाग्यावर.
आरेसेस आणि वरील हल्लेखोरांत
आरेसेस आणि वरील हल्लेखोरांत काहीच फरक नाही, दहशतवादाला धर्म नसतो, इ. वाक्ये लिहायची राहिली बहुधा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आरेसेस आणि वरील हल्लेखोरांत
+१११११११
चिंजंनी चक्क मुसलमानांच्या
चिंजंनी चक्क मुसलमानांच्या अतिरेकाची दखल घेतली. भारतातल्या सत्तांतराचा "निधर्मी" लोकांवर एक चांगला परिणाम झालाय दिसतं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काहीतरीच काय अजो. चिंजं नी
काहीतरीच काय अजो. चिंजं नी दहशतवाद ह्या शब्दानंतर प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे त्यांना शंका आहे. त्यांनी फक्त बातमी दीली आहे.
कदाचित त्यांना चांगला न्याय झाला असे सुद्धा म्हणायचे असेल.
फार वाईट बातमी. इस्लामी
फार वाईट बातमी.
इस्लामी दहशतवादाचा निषेध.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
हेच म्हणतो.
Response in pictures
Response in pictures
एखाद्या स्वामीच्या बिनडोक
एखाद्या स्वामीच्या बिनडोक वक्तव्यावर कशा प्रतिक्रिया येतात आणि १०-११ लोक मेल्यावर कशा प्रतिक्रिया येतात याचा उत्तम वस्तुपाठ बघावयास मिळाला. चालायचेच!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रतिसादाचा रोख?
निव्वळ '१०-११ लोक मेले'? 'शार्ली हेब्दो'नं इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या धमक्यांची पर्वा न करता प्रेषित मुहम्मदाची कार्टून्स छापली होती. उपरोधातून गांभीर्यानं सामाजिक-राजकीय टीकाटिप्पणी करण्यासाठी 'शार्ली हेब्दो' युरोपात प्रसिद्ध आहे. वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य आणि त्यामुळे वार्ताहरांवरचे हल्ले आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत गांभीर्यानं घेतले जातात. उदा. Reporters Without Bordersतर्फे मोजण्यात येणारी Press Freedom Index कशी मोजली जाते त्याबद्दल विकीपीडियावरून उद्धृत -
त्यामुळे प्रतिसादाचा रोख नीटसा समजला नाही.
(मेलेल्या कार्टूनिस्टांचा मी चाहता असल्यामुळे विशेष धक्का बसला, पण ते इथे अवांतर होईल.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
रोख नेहमीचाच आणि स्वयंस्पष्ट आहे.
ऐसीवरच्या प्रतिक्रियांबद्दल म्हणतोय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे समजलं नाही. काय अपेक्षित आहे?
बातमी दु:खद आहे आणि त्याचा निषेध करायलाच हवा. की अजून शाब्दिक निषेध/आक्रमक प्रतिक्रिया अपेक्षित आहेत इथे?
(आणि संतांच्या बातमीवर जास्त प्रतिसाद तुमचेच आहेत ..)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
एक तर लै प्रतिसाद नाहीत, आणि
एक तर लै प्रतिसाद नाहीत, आणि बाकीच्यांचे प्रतिसाद पहा.
तदुपरि अपेक्षा ठेवायला मी ढोंगी पी-सेक थोडाच आहे? पण असेच अत्याचार कोणा हिंदुत्ववाद्यांनी केले असते तर हिंदू दहशतवाद इ.इ. वर जेवढे लिहिले गेले असते त्या तुलनेत धर्माचा साधा उल्लेखही न केलेला पाहून आश्चर्य वाटले, इतकेच. म्हणून म्हणालो की नेहमीच्या स्टॉक फ्रेजेस कशा काय आल्या नाहीत अजून? आम्ही फक्त प्रश्न विचारू शकतो हो. समाजाकडून टिकोजीरावी अपेक्षा ठेवायला आम्ही सिकुलर थोडीच आहोत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ओक्के!
ऐसीवरील T< Tnow चर्चा एवढ्या जास्त तपशीलात न वाचल्याने पास!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
@बॅट्मन - चिजंनी अश्या
@बॅट्मन - चिजंनी अश्या घटनेमधे धर्माचा उल्लेख करणे म्हणजे तुम्ही फारच अपेक्षा करताय चिंजं कडुन. उद्या त्यांनी ते तिन अतिरेकी नव्हतेच तर फ्रान्स मधले गरीब लोक होते आणि अमेरिकेतल्या हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी ( इथे धर्माचा उल्लेख त्यांना चालेल ) त्यांच्या कडुन हे खून जबरदस्ती ने करुन घेतले असे सुद्धा लिहीतील.
अगदी अगदी.
अगदी अगदी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
असो. थोड्याशा वास्तव्यात खूपच
असो.
थोड्याशा वास्तव्यात खूपच जाणकार झालात की जंतूंच्या बाबतीत !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वास्तव्य जुनेच आहे, गेले १+
वास्तव्य जुनेच आहे, गेले १+ वर्ष रीड ओन्ली मोड मधे होते. त्या आधी होते पण संपादकांच्या आवडत्या लेखकावर टीका केल्यामुळे आय्डी बॅन केला. ( आताही तसेच होण्याचा धोका आहे ). त्यामुळे कोणाची काय लाइन आहे ते माहीती आहे.
बॅन?
आजवर इथे तुमचा कोणता आयडी बॅन झाला आहे ते सांगाल काय?
मला इथे आयडी बॅन झालेले आठवत नैय्ये
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माझ्या नावाचाच होता. झाला
माझ्या नावाचाच होता. झाला होता ही वस्तुस्थिती आहे. कारण नंतर लॉगिन करता येत नव्हते. वैयक्तीक रीत्या घेऊ नका. मला फार काही वाईट वगैरे वाटले नव्हते. टोकदार मते असलेकी असे होणे सहाजिक आहे.
इथल्या काही चर्चा इतक्या रोचक होतात की बोटे शिवशिवायची प्रतिक्रिया द्यायला, म्हणुन नविन आयडी घेउन आले.
आयडी आठतोय का? प्लीज
आयडी आठतोय का? प्लीज सांगा
वैयक्तिक नाही मात्र जर इथे आम्ही कोणाला बॅन करत नसु मात्र लोकांना "इथे प्रवेशास मुभा नाही" अशा आशयाचा मेसेज येत असेल तर एकदा सेटिंग्ज व्हेरीफाय करता येतील - करायची आहेत.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जौद्याहो!
सेल्फ-इम्पोज़्ड ब्यान असेल. एवढे काय मनाला लावून घेता?
शेड ईव्हान्स नावाचा एक
शेड ईव्हान्स नावाचा एक व्यावसायिक फूटबॉलपटू आहे. त्याला २ वर्षांपूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली. गुन्हा सिद्ध झाला. आता तो शिक्षा भोगून बाहेर आलाय. त्याला एका क्लबनी त्यांच्या टीममध्ये घेतलं आहे. यावरून बराच वादंग उठला आहे. एका बलात्कार्याला, शिक्षा भोगून झाल्यावर जिथे तो टीव्हीवरही फुटबॉल खेळताना दिसेल आणि पर्यायाने तो लोकांना हायली विसिबल असेल, असा जॉब मिळावा का? किंवा इन-जनरल कुठलाही जॉब मिळावा का? त्यात एक आर्युमेंट अशी आहे की एव्हान्सने गुन्हा स्वतः कबूल केलेला नाही. अजूनही तो मी निर्दोष आहे असेच म्हणतो. तुम्हाला काय वाटतं? अशी ही नोकरी* त्याला मिळावी का?
===
* क्लबकडून फुटबॉल खेळणं ही नोकरी असते. खेळाडुंना रितसर पगार मिळतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
भारतात मस्त असते. तुरुंगातुन
भारतात मस्त असते. तुरुंगातुन सुट्टी घेउन सुद्धा सिनेमात काम करता येते.
वेडाच आहे तो ईव्हान्स, त्याला सांगायला पाहीजे, भारतात ये आणि काय दारु पिउन लोकांना चिरड नाहीतर खुन कर. मग सुपरस्टार कींवा खासदार तरी नक्की होशील.
टीव्हीवर कॉमेंण्ट्री आणि
टीव्हीवर कॉमेंण्ट्री आणि कॉमेडी कार्यक्रमात भागही घेता येतो. शिवाय खासदार सुद्धा होता येते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
त्याच माणसाचे उदाहरण मनात
त्याच माणसाचे उदाहरण मनात होते.
होय. जर शिक्षा भोगून आला असेल
होय. जर शिक्षा भोगून आला असेल तर जॉब का मिळू नये?
अगदी त्याने बलात्कार किंवा खूनही केला असला तरीही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जॉब मिळावा पण प्रश्नाचा रोख
जॉब मिळावा पण प्रश्नाचा रोख "हायली व्हीजीबल" जॉब मिळावा का असा आहे? त्यातुन समाजाला काय मेसेज जातो कारण असे खेळाडु प्रसिद्ध असणार आहेत.
तसेही लहानमुलांवर अत्याचार करणार्याला शिक्षा भोगुन आला तरी शाळेत जॉब मिळु शकत नाही. तिथे तुमचे लॉजिक लावले तर चालेल का?
त्याने टीवीवर सतत दिसेल अश्या
त्याने टीवीवर सतत दिसेल अश्या प्रोफेशन मध्ये, पर्यायाने इंफ्लुएन्शिअल, काम करावे का असाही एक प्रश्न आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
होय. त्याला जे कसब/कला/ज्ञान
होय. त्याला जे कसब/कला/ज्ञान येतं त्याच्याशी संबंधित जॉब मिळावा.
आपण केलेल्या चुकीची/गुन्ह्याची शिक्षा भोगून आल्यावर समाज आपल्याला स्वीकारतो ही जाणीव व परिस्थिती त्या व्यक्तीला पुन्हा गुन्हा न करण्यास अधिक उद्युक्त करते व उपयुक्त ठरते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ओके. म्हणजे तुमच्या मते
ओके. म्हणजे तुमच्या मते शिक्षा भोगुन आलेल्या चाइल्ड मोलॅस्टर ला प्राथमिक शाळेत नोकरी मिळायला पाहीजे ( रादर त्याचा तो हक्कच आहे ). शिक्षा भोगुन आलेल्या रेपिस्ट ला मुलिंच्या हॉस्टेल चे वॉर्डन होण्याचा पण हक्क आहे.
होय.
होय.
त्याला तसे कसब असल्यास व या कारणाने जॉब नाकारला जाऊ नये.
तुमची हक्कांची डेफिनेशन काय आहे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एका व्यक्तीच्या हक्कासाठी जर
एका व्यक्तीच्या हक्कासाठी जर दुसर्या अनेक लोकांच्या भितीमुक्त जगण्याच्या मुलभुत हक्क नाकारला जात असेल तर त्या एका व्यक्तीच्या हक्काचा संकोच होयला पाहीजे.
मी दिलेल्या उदाहरणात, मी त्या शिक्षा भोगुन आलेल्या माणसाला नोकरी करण्याचा हक्क असु नये असे म्हणत नाहीये. पण एक्स्-रेपिस्ट जर मुलिंच्या हॉस्टेल चा वॉर्डन होउ बघत असेल तर मला त्या मुलींच्या भितीमुक्त जगण्याच्या हक्काची जास्त काळजी आहे.
आणि कोणत्याही माणसाला त्याला झालेल्या शिक्षा पण लपवुन ठेवण्याचा हक्क असु नये असे माझे मत आहे.
पण एक्स्-रेपिस्ट जर मुलिंच्या
बेहद्द सहमत.. ब्राव्हो...!!
त्याला तसे कसब असल्यास व या
आणि त्याच्या कडे रेप करण्याचे पण प्रुव्हन कसब आहे त्याचे काय?
+१
सहमत. अनु राव व गवि यांच्या प्रतिक्रियांशी सहमत. (किंबहुना याच कारणाने भारताच्या एका दंगलग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पंतप्रधानपदाचे कसब असूनही त्यांना ते देऊ नये असे मला मनोमन वाटत होते. पुस्तीः कोणाचेही नाव घेतलेले नाही! उगीच चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा प्रत्यय आणून देऊ नये.)
दंगलग्रस्त राज्यात वापरलेले
दंगलग्रस्त राज्यात वापरलेले कसब संपुर्ण देशात वापरावे अशी जर देशाच्या जनतेची इच्छा असेल तर?
हा हा हा... 'मन की बात' उघड
हा हा हा...
'मन की बात' उघड केलीत की काय?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अहो मालक, दिमाग गलत डायरेक्शन
अहो मालक, दिमाग गलत डायरेक्शन में क्यों चलाते हो? वाहिलेले काँग्रेसी दिसता. प्रगतीबद्दल बोलातायत अनु. आणि हो, करायचाय गुजरात सार्या देशाचा. त्याच साठी निवडला आहे मोदींना.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मी काय वेगळं म्हणालो का?
मी काय वेगळं म्हणालो का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ते कळतं. तसंच असतं तर तुमच्या
ते कळतं. तसंच असतं तर तुमच्या ओरिजनल 'हा हा हा ' प्रतिसादाला खळाळती विनोदी श्रेणी मिळाली असती. त्यात "मर्म" लोकांना दिसलं आहे, खासकरून तुमची वैचारिक काँग्रेसी पार्श्वभूमी पाहून.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
दंगलग्रस्त राज्यात वापरलेले
दंगलग्रस्त राज्यात वापरलेले कसब संपुर्ण देशात वापरावे अशी जर देशाच्या जनतेची इच्छा असेल तर?
कसब नेमके कोणते ?
१) दंगल करण्याचे ?
२) दंगल रोखण्याचे ?
जे काही कसब असेल ते. पण जे
जे काही कसब असेल ते. पण जे काही कसब होते ते लोकांना पाहीजे होते हे नक्की. बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी.
गब्बर - तुमच्या फूटनोट सारखेच मराठीत ही एक वाक्य आहे, मे बी विनोबांचे "सत्तेपेक्षा सत्वाची नशा जास्त असते"
भारतातले दंगलग्रस्त नसलेले
भारतातले दंगलग्रस्त नसलेले राज्य कोणते आहे?
कमाल तुमच्या लॉजिकची. उद्या मणिपूरमधे गेली २० वर्षे टेररिझम आहे म्हणून मणिपूरच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान होऊ देणार नाही कि काय? आणि तुमच्या माहिस्तीस्तव, मणिपूरचा टेररिझम गुजरातच्या दंग्यांपेक्षा अनंत प्रकारे आणि अनंत पटीने वाईट आहे. मग मणिपूरी नागरीकच पंतप्रधान नको असे लॉजिक लावाल काय? बिचार्या अख्ख्या राज्यात एकट्या मुख्यमंत्र्यालाच दोष देणे बरोबर नाही ना?
कि सुप्रीम कोर्टापेक्षा स्वतःची गटफिलिंग महान आहे हे लॉजिक आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
याच कारणाने भारताच्या एका
आयहाय! काय वाक्य आहे राव! मी अनुक्रमे खदखदून हसले, मग चमकले आणि मग विचारात पडले. इतकं मार्मिक काही खूप दिवसांनी वाचनात आलं.
बाकी वर जी काही लोकांची आगाऽग झालीय, ती पाहूनही झकास करमणूक झाली. ...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बाकी वर जी काही लोकांची आगाऽग
बाकी आगाग होणार्या लोकांची साडेसाती संपली आहे हे मात्र नक्की खरे. काही प्रचंडच नालायक लोक सोडले तर नविन सरकारचे सर्वजण कौतुक करत आहेत. किमान टिका रिजनेबल करत आहेत. ज्यांना या सरकारचे महत्त्व कळत नाही त्यांना देवा माफ कर. त्यांना काँसेंट्रेशन कँपातून बाहेर काढ. ही नालायक मंडळी इतकी जास्त पुस्तके वाचतात कि त्यांच्या कल्पनेतील दुनिया आणि असल दुनिया यांचा काही संबंधच उरत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ऋ शी जोरदार सहमत.(भारतीय
ऋ शी जोरदार सहमत.
(भारतीय नागरिक असेल तर) शिक्षा भोगून झाल्यावर त्याने कोणती नोकरी करायची नाही हे डिक्टेट करायचा अधिकार समाज, सरकार व परमेश्वर या तिघांपैकी कोणासही असायला नाय पायजे. व या तिघांपैकी कोणीही एक जण तो अधिकार बळजबरीने अॅश्युम करीत असेल व इतरांना डिक्टेट करत असेल तर अॅश्युम करणाराला निर्दय पणे ठोकून काढून तो अधिकार फक्त नोकरी करणारा व नोकरी देणारा यांच्या करारक्षेत्रात ठेवायला हवा.
या हिशोबाने अत्याचार
या हिशोबाने अत्याचार करणार्याला शिक्षा करण्याचा हक्क समाज, कोर्ट, सरकार वा परमेश्वरालाही नाही. अत्याचारक व अत्याचारित या दोघांनी आपसांत काय ते बघून घ्यावे.
शिक्षा भोगून झाल्यावर - परत
शिक्षा भोगून झाल्यावर - परत काय शिक्षा करणार ? दुसरा अत्याचार केला नसेल तर ?
परत शिक्षा नाही पण परत गुन्हा
परत शिक्षा नाही पण परत गुन्हा होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकतात ना? मला वाटतं गविंचं तेच म्हणणं आहे.
ननि ही काळजी गुन्हेगाराबाबत
ननि ही काळजी गुन्हेगाराबाबत या अॅझम्प्शनमधून घेतली जाते आहे की "तो" परत गुन्हा करु शकतो = "तो" अन्य लोकांच्य ईक्वल फुटींग वर नाही.
का नाही? त्याने शिक्षा भोगली आता तो इतरांसारखाच आहे. नाहीतर मग त्या शिक्षेला अर्थ काय?
अन्य लोकांच्य ईक्वल फुटींग वर नाही.
हे योग्यच आहे.
शिक्षेला अर्थ काय? शिक्षा
शिक्षा म्हणजे पेनल्टी, करेक्शन नव्हे.
भलेही कोणी जन्मतःच गुन्हेगार नसतो पण एखाद्याची वृत्ती तापट आणि खुनशी झाली असेल तर २-४ वर्षे जेलमध्ये काढून ती बदलत नाही, उलट जेल्स अशी असतात की त्यात वाढच होऊ शकते.
समजा घरातल्या कामवाल्या बाईने घरात चोरी केली आणि त्याबद्दल सहा महिने शिक्षा भोगून आली तर तिला आपण पुन्हा घरात पूर्वीसारखेच काम देऊ का? आणि तेही विशेष काळजी न घेता?
(१) ह्म्म शिक्षा म्हणजे
(१) ह्म्म शिक्षा म्हणजे हृदयपालट करण्याची हमी नव्हे.
(२) शिक्षा म्हणजे पीडीताने गुन्हेगारावरती घेतलेला सूड नव्हे.
मग शिक्षा आहे तरी काय? तिचे उद्दीष्ट्य काय? काय साध्य होते शिक्षेतून.
ते जरा तत्त्वज्ञानाकडे झुकतय पण रोचक आहे हा विषय.
____
सापडलं -
Punishments are applied for various purposes, most generally, to encourage and enforce proper behavior as defined by society or family.
समजा घरातल्या कामवाल्या बाईने
समजा घरातल्या कामवाल्या बाईने घरात चोरी केली आणि त्याबद्दल सहा महिने शिक्षा भोगून आली तर तिला आपण पुन्हा घरात पूर्वीसारखेच काम देऊ का? आणि तेही विशेष काळजी न घेता?
आमच्या घरातल्या कामवाल्या बाईने चोरी केली व सहा महिने शिक्षा भोगून आली तर -
१) सरकारला सरकारदरबारी नोकरीस घेताना तिला न घेण्याचा विकल्प असावा. (यावर केस बाय केस विवाद करू.)
२) मला आमच्या घरात तिला नोकरीवर न घेण्याचा अथवा घेण्याचा विकल्प असावा.
३) पण सरकारला असे धोरण राबवायचा अधिकार नसावा की जेणेकरून सरकार मला किंवा इतर कोणासही त्या बाईला घरात कामावर ठेवण्यास प्रतिबंध करेल.
हम्म.
विचारात पडलोय. या उदाहरणाच्या बाबतीत हे पटतंय पण सरसकट सगळ्या गुन्ह्यांना व प्रवृत्तींना हा नियम लावावा की नाही याबद्दल साशंक आहे.
पण प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉयर पासून गुन्हा व शिक्षेची माहिती लपवली जाणार नाही याची सक्ती सरकार करु शकते.
गुन्हा घडल्यावर अन शिक्षा
गुन्हा घडल्यावर अन शिक्षा भोगून आल्यावर समाज आपल्याला पुन्हा जसाच्यातसा स्वीकारतो हे काही फार आवश्यक इन्सेंटिव्ह आहे असे मला व्यक्तिशः वाटत नाही. समाज तसा स्वीकारतही नाही हे सत्य आहे. त्या व्यक्तीकडे नेहमी शिक्क्यासहितच बघितलं जातं. शिवाय शिक्षेने मनुष्य आमूलाग्र बदलत नाही हेही माझं एक व्यक्तिगत मत.
तेव्हा अश्या व्यक्तीला शिक्षा भोगून संपली की कायदेरक्षक सरकारी एन्टिटीने एस्टॅब्लिश केलेल्या वर्क झोन्समधे (कदाचित मनुष्यबळाचा तुटवडा असलेली क्षेत्रं किंवा हेडकाउंट बेस्ड उत्पादनक्षेत्रात) ग्यारंटीड कामं मिळावीत. यात आयसोलेशन असलं तरी त्यातून त्या व्यक्तीला काम मिळण्याची शाश्वती राहील आणि समाजालाही काही वेगळे संदेश जाणार नाहीत. शिवाय त्या व्यक्तींचा मेनस्ट्रीमशी थेट संबंधही कमी येईल.
पाने