Skip to main content

भाषिक, प्रांतिक, जातीय, इ. इ. अस्मिता

अवांतरात मोडेल पण एक किस्सा सांगितल्याशिवाय रहावत नाही.

स्थळः कोथरूडमधल्या एका डॉक्टरांच्या क्लिनिकची वेटिंग रूम. एक हुच्चभ्रू मध्यमवयीन मराठी महिला येते आणि शेजारच्या खुर्चीवर बसते. चेहेर्‍यावर चिंता करते विश्वाची छाप भाव. अचानक माझ्याकडे वळते:

हुममः मला एक सांगा...डॉक्टरांचं नाव करमाळकर आहे का करळकर?
मी: (स्वगत) त्याने काय फरक पडतो, मावशी. औषध गिळा आणि गप पडा की. (प्रकट) काही कल्पना नाही.
हुममः विचारून घ्यायला पाहिजे त्यांना.
मी: (न रहावून) पण त्याने काय फरक पडतो?
हुममः नाही कसा पडत? नावा, आडनावांचा उच्चार स्पष्ट असावा. ("ष"चा खर्ज कानात गुदगुल्या करून गेला.)आमचं आडनाव कुकर्णी पण लोक सर्रास कुकर्णी म्हणतात. चूक आहे हे... (पुढे माझा नंबर येईपर्यंत बरीच शिकवणी घेतली!)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/02/2014 - 21:08

In reply to by आदूबाळ

तंत्रज्ञानामुळे ही अशी सांस्कृतिक देवाणघेवाण होते आणि त्या समीक्षकांना चिंता सपाटीकरणाची!

'न'वी बाजू Wed, 12/02/2014 - 21:21

कुळकर्णी-कुलकर्णी भेदाबद्दल कल्पना आहे. करमाळकर-करमळकर भेदास असा काही सिग्निफिकन्स आहे काय?

आदूबाळ Wed, 12/02/2014 - 21:41

In reply to by 'न'वी बाजू

काय की! पण त्या बैंच्या आविर्भावावरून त्या अस्सल छिद्रान्वेषक वाटत होत्या. त्यामुळे सिग्निफिकन्स असला नसला तरी त्यांना फरक पडत नसावा.

नितिन थत्ते Thu, 13/02/2014 - 10:08

In reply to by आदूबाळ

एका व्यक्तीचे नाव अग्रवाल असे न लिहिता अगरवाल लिहिले गेल्याने ती व्यक्ती अत्यंत वर्क्ड अप झालेली पाहिली आहे.

मन Thu, 13/02/2014 - 10:31

In reply to by नितिन थत्ते

जात पात वगैरेचा कट्टर अभिमान असणार्‍या देशात अग्गरवाल व अग्रवाल ह्यात प्रचंड फरक असणे स्वभाविक आहे.
गुजरात्,राजस्थान्,दिल्ली व काही प्रमाणात यूपी- एम पी इथल्या पब्लिकला विचारल्यास तपशीलवार माहिती मिळेल.
(दोघांची जात वेगळी, ज्याला त्याला आपल्या जातीचा अभिमान असे कायसेसे आहे, विशेषतः दिल्लीत तर ह्या गोंधळावरून पब्लिक भडकते.)
अगदि "ठाकूर महेंद्रप्रताप " असे म्हणण्याऐवजी चुकून एकजण "महेंद्रपताप ठाकूर" असे म्हणाला (prefix ऐवजी suffix वापरले)
म्हणून ठाकूरसाहेब लै भडकले. एक दीड खंबे रिचवून ताठ बसलेले ठाकूर थेट " साले गोली से उडाता हूं" म्हणत पोचले.
त्यांना इतर झिंगलेल्या पब्लिकनं महत्प्रयासानं आवरले.
नंतर साहेब सोबर असताना वदले "अरे वो ठाकूर पेहले लगाते हैं हम असली ठाकूर - खानदानी जमीनदार, ये भोसडिके नाई (न्हावी) लोग बाद में लगाते है | मुझे उनके लाइन में खडा़ कर रहे हो |" (जो नाव सांगताना नंतर ठाकूर हा शब्द लावतो तो न्हावी असतो. तो न्हावी असतो मह्णून तो क्षुद्र व नालायकही असतो असा त्यांचा सिद्धांत.)
नंतर त्यांना रात्री शांत बसवल्याबद्दल त्यांएने मनःपूर्वक आभार मानले. खरोखरीच त्यांच्याकडे बंदूक होती व त्यांनी एखादेवेळेस गोळीही घातली होती असे म्हणत होते.
उत्साहात बंदूक आणून (व चालवून !) दाखवतो म्हटल्यावर मात्र आम्ही निरोप घेतला. पुन्हा भेट नाहीच.
जात पात अशी थेट जिवंत आहे उत्तर भारतीयंत असे दिसते.
महाराष्ट्रात निदान शहरी भाग तरी सुधारलेला दिसतो.

ऋषिकेश Thu, 13/02/2014 - 10:38

In reply to by मन

महाराष्ट्रात निदान शहरी भाग तरी सुधारलेला दिसतो

पुन्हा एकदा जाज्वल्य, झणझणीत वगैरे असहमती!!!!

एकाच भागातील - भाषेचे लोक जिथे जिथे संख्येचे अधिक आहेत तिथे ही तथाकथित सुधारणेच्या चिंध्या होताना दिसतात. अनेक भाषिकांची सरमिसळ असणार्‍या भागात (एममेकांविषच्या व बद्दलच्या/जातींच्या अज्ञानामुळे) या सुधारणेचा भास होतो इतकेच!

अनुप ढेरे Thu, 13/02/2014 - 10:53

In reply to by मन

महाराष्ट्रात निदान शहरी भाग तरी सुधारलेला दिसतो.

मला वाटतं की ज्यांच्या आधीच्या १-२ पिढ्या शहरात होत्या त्या लोकांमध्ये जातपातीचा असला फाल्तू अभिमान कमी असतो. आणि उगाच लोकांच्या जातीबद्दल उत्सुकता कमी असते. पण ज्याच्या आधीची पिढी खेड्यामध्ये होती किंवा ज्याचं बालपण खेड्यात गेलंय त्यांच्यात इतरांच्या जातीबद्दल उत्सुकता जास्तं असते.

अर्थात वरच्या विधानांच्या समर्थनार्थ विदा माझ्याकडे नाही. ही फक्तं माझी निरिक्षणं आहेत.

ऋषिकेश Thu, 13/02/2014 - 11:08

In reply to by अनुप ढेरे

पश्चिम भारतात, डिग्री ऑफ कट्टरता पेक्षा 'मोड ऑफ रिअ‍ॅक्शनमध्ये' सुधार आहे असे मला वाटते.
अतिउत्तरेला/दक्षिणेला मारायला धावत असतील तर ते इथे टाळले जाते किंवा किमान आधी शब्दात समजवायचा प्रयत्न होतो ही सुधारणा मान्य आहे.
पण कट्टरता तेव्हढीच असावी.

स्वानुभवः
मुंबईत असताना मला माझ्या जातीचा विचारही मनात येत नसे. मला नाव विचारल्यावर पूर्ण नाव सांगायची सवय नाहीये.
पुण्यात आल्यावर मात्र लोकांना माझ्या आडनावात भल्ताच इंटरेस्ट असलेला दिसला. काहिशा गोंधळात टाकणार्‍या आडनावामुळे मला थेट जात विचारली जाऊ लागली.
मी सर्दच झालो.. सवय नव्हती..

माझ्या समोर कित्येकांना केवळ जातीमुळे टाळणे, "त्याला कशाला बोलावलंस आपल्यासोबत? विषय वेगळे पडतात, शिवाय त्यांना काय अक्कल?" असे थेट सांगितले जाणे, "केटरिंग वगैरे नको करूस हा, शेवटी काही झालं तरी ते आचारीपण, आपल्याला शोभत नाही" वगैरे ड्वायलाग इथेच आल्यावर ऐकले आहेत. शेवटी शेजार्‍यांचा पोपट आवडला नाही एवढ्या कारणाने चाळ बदलणार्‍या धोंडु जोशी सारखा मी वैतागुन पुण्यातला 'तो भाग' सोडला! ;)

सिफ़र Thu, 13/02/2014 - 11:15

In reply to by ऋषिकेश

डिग्री ऑफ कट्टरता पेक्षा 'मोड ऑफ रिअ‍ॅक्शनमध्ये' सुधार आहे.

डिग्री ऑफ कट्टरता कमी असल्यामुळेच/झाल्यामुळे 'मोड ऑफ रिअ‍ॅक्शनमध्ये' मध्ये सुधार आहे असं वाटत.

नितिन थत्ते Thu, 13/02/2014 - 11:20

In reply to by सिफ़र

शहरी भागात इंटरडिपेंडन्स जास्त असतो. गावात सर्वोच्च असलेला माणूस शहरात ऑलमोस्ट सामान्य असतो. त्यात गावात त्याच्याकडे जी पॉवर असते ती शहरात नसते. म्हणून [कट्टरता तितकीच असली तरी] मोड ऑफ रिअ‍ॅक्शन सौम्य असते.

ऋषिकेश Thu, 13/02/2014 - 11:21

In reply to by सिफ़र

शिवाय शिक्षणात सुधार, कायद्याचे काहीसे अधिक प्रभावी राज्य, अ‍ॅट्रॉसिटी सारख्या कायद्यांचा कठोर वापर वगैरे मुळे मोड ऑफ रिअ‍ॅक्शनमध्ये फरक आहे असे माझे मत.

मन Thu, 13/02/2014 - 11:45

In reply to by ऋषिकेश

अकर्यकारणभाव नक्की काय , कसा आहे ह्याबद्दल टंकण्यापेक्षा एक निरीक्षण नोंदवतो.
महारआष्ट्रात , त्यातही शहरी भाग आंतरजातीय विवाह अधिक होतात.
त्यांना होणारा त्रास खाप पंचायतीकडून होणार्या त्रासापेक्षा लै म्हणजे लैच सुसह्य म्हणायला हवा.
( नात्यातील चार चौघे फटकून वगैरे वागू शकतील. पण बंदुका,तलवारी निघणार नाहित.
आता विदा मागत असाल तर मी म्हणेन जा फुटा.
सामान्य निरिक्षणास विदा नसतो.
(महाराष्ट्र काश्मीरपेक्षा उष्ण आहे, हे सामान्य निरीक्षण आहे.
कीम्वा तमिळनाडूपेक्षा महाराष्ट्रात हिंदीची जाण अधिक लोकमानसात आहे.
ही सामान्य निरीक्षणे आहेत. विदा वगैरे काही नसतो ह्याला.)
)
.
.
सगोत्र तर लै म्हंजे लैच कॉमन झालय.
फक्त मुलगा व मुलगी बावचळलेले नसले, तर सर्व व्यवस्थित होते महाराष्तृआत.
कैकदा मुलगा किम्वा मुलीचा भन्नाट ब्रेनवॉश करत घाबरवून सोडल्याने अवसान गळते.
पण जर जोडप्यानं हिंमत दाखवली तर बंदुका,तलवारी निघत नाही. कुणी दगडाने डोके फोडत/चिरडत नाही.

मी Thu, 13/02/2014 - 11:47

In reply to by मेघना भुस्कुटे

अहो टिव्हीवर ५-१० वर्षे सिरिअल्स चालतात बायकांच्या, ३०० प्रतिसादांचं काय घेऊन बसलात.

आणि हो - वैज्ञानिक अस्मिता, विदा अस्मिता, नास्तिक अस्मिता वगैरे पण शिल्लक आहेतच.

घाटावरचे भट Thu, 13/02/2014 - 11:49

In reply to by मी

सध्या एक डिटेक्टिव्ह अस्मिता असते म्हणे कुठल्याकी मराठी च्यानलवर. पण ती स्त्रीवादीय आहे की नाही ते ठाऊक नाही....

बॅटमॅन Thu, 13/02/2014 - 12:25

In reply to by मी

हो ना! अस्मितांच्या मांदियाळीत स्त्रीवादाला डावलले गेल्याची तक्रार कोणीतरी करण्याअगोदर तिलाही घ्या बॉ.

बाकी वरील प्रतिसादास भडकाऊ श्रेणी देणार्‍यांबद्दल मनात अपार दया दाटून आलेली आहे हेवेसांनल.

आनंद घारे Thu, 13/02/2014 - 12:45

करमाळकर का करमळकर? यात भाषिक, प्रांतिक, जातीय, इ. इ. अस्मिता कुठून आली? कुळकर्णी आणि कुलकर्णी असे भेद असतात पण त्यांच्यात भाषिक, प्रांतिक, जातीय, इ. इ. अस्मिता असते हे मी पहिल्यांदाच वाचले किंवा ऐकले.
माझा व्यक्तीगत अनुभव असा आहे की घारे हे मला एवढे सोपे वाटणारे नाव सहसा कोणीसुद्धा धडपणे उच्चारत नाही. खरे, घरे, खारे, गारे, गरे वगैरे त्याचे उच्चार ऐकून ती आपल्याला मारलेली हाक आहे हे मला ओळखावे लागते. एकदा चेन्नै एअरपोर्टवर अनाउन्स करणा-या इसमाने चक्क घोष असा पुकारा केला होता, पण त्यावेळी कोणी बोंगाली बाबू तिथे दिसत नसल्यामुळे आणि मीच तेवढा अशा हाकेची वाट पहात उभा असल्यामुळे काउंटरवर गेलो.
घारे हे आडनाव अनेक जातींमध्ये आणि मुसलमानांमध्ये सुद्धा आहे. कदाचित त्यामुळे सगळेच मला आपला जातभाई समजतात आणि चांगली वागणूक देतात.

मन Thu, 13/02/2014 - 12:56

In reply to by आनंद घारे

माझे दिओन मित्र :-
साने आणि पागे दोघे नावामध्ये एकच A वापरतात म्हणून त्यांचा लै छळ होतो

बोले तो sane व page ह्यांचा उच्चार वाचणयचय नादात कैकदा लोक सेन (insane-sane मधला sane) आणि पेज असा करतात.मी त्यांना paage व saane अशी नावे करा, कीम्वा होणार्या घोटाळ्यावर निदान चिडू नका असे सुचवून थकलो.

बॅटमॅन Thu, 13/02/2014 - 18:19

In reply to by 'न'वी बाजू

असेलही. जितक्या नावांची मोडतोड ऐकली त्यांत हे नाव कसे काय राहून गेले काय माहिती. अनवधानाने राहून गेले भौतेक, पण उच्चार सुसंगत आहे. 'अ' हा स्वरच बंगालीत नसल्याने तसे काहीसे व्हॅरिएशन होणे क्रमप्राप्त आहे.

'न'वी बाजू Thu, 13/02/2014 - 19:14

In reply to by बॅटमॅन

'प्याटेल' (१) कधीतरी कोठेतरी वाचल्यासारखे अंधुकसे आठवते, आणि (२) 'पटेल' आडनावाच्या एका (भूतपूर्व) सहकर्मीचा उल्लेख एक (पुन्हा, भूतपूर्व) बंगाली सहकर्मी 'प्याटेल' असाच करत असे, असेही (पुन्हा, अंधुकसेच) आठवते.

तेही असो. स्पेलिंगानुसारी मोडतोडीनुसार 'पटेल'चे 'प्याटेल' (अथवा 'गोखले'चे 'गोखेल') हे (एक वेळ) समजू शकतो. 'जनरल'चे 'जेनारेल' हे कोठल्या न्यायाने होते, ते समजत नाही.

(अर्थात, बंगालीत कशाची मोडतोड कशी करावी, हा बंगाल्यांचा प्रश्न. आपण फक्त 'मम' म्हणावे, कसें?)

=====================================================================================================

फारा वर्षांपूर्वी.

अर्थात कोठल्यातरी बंगाली प्राथमिक पाठ्यपुस्तकात. आमची बंगाली वाचनाची धाव तिथपर्यंतच.

हेही कोठेतरी वाचल्याच्या धूसर स्मृती जागृत होतात. असेच होते ना? (चूभूद्याघ्या.)

बॅटमॅन Thu, 13/02/2014 - 19:33

In reply to by 'न'वी बाजू

पटेल चे प्याटेल असे रूप असले तरी मराठी उच्चारातील 'प्या' तिथे नसणार शकतो. त्यांचा उच्चार 'पॅ' च्या जास्त जवळ जातो. लिहिताना मात्र 'प्या' असे लिहितात.ते चिन्ह अवग्रहागत दिसते- नाव आहे 'जॉफोला'.

जनरल या शब्दाबद्दल सहमत आहे. पण त्या मोडतोडीतही काहीएक प्याटर्न असावा असे वाटते, यद्यपि अपुर्‍या ज्ञानामुळे ते तूर्तास पिनप्वाइंटवू शकत नसलो तरी.

अन शेवटी मम म्हणायचे तर बंगालीत 'मोमो' होईल. इंडियन चैनीज फूडची सुरुवात कोलकात्याहून झाली सबब हेही उचितच.

====================================================================
बॉङ्गोभाषेत अर्थातच प्याटार्न.

खरे तर 'मॉमो' असे रूप होईल, परंतु कोट्यर्थ तेवढे मुआफ़वावे.

'न'वी बाजू Thu, 13/02/2014 - 19:52

In reply to by बॅटमॅन

त्यांचा उच्चार 'पॅ' च्या जास्त जवळ जातो. लिहिताना मात्र 'प्या' असे लिहितात.ते चिन्ह अवग्रहागत दिसते- नाव आहे 'जॉफोला'.

हो, याची कल्पना आहे. (किंबहुना, 'अ‍ॅस्पिरिन' हा शब्ददेखील 'अ'ला तो 'जफला' की काय तो वापरून लिहिलेला पाहिलेला आहे.)

अन शेवटी मम म्हणायचे तर बंगालीत 'मोमो'२ होईल. इंडियन चैनीज फूडची सुरुवात कोलकात्याहून झाली सबब हेही उचितच.

'मोमो'चा उगम/प्रादुर्भाव नेपाळात/तिबेटात असण्याबाबत समजूत होती. कदाचित दार्जीलिङ्-मार्गे तेथे गेला असावा काय?

बॅटमॅन Thu, 13/02/2014 - 19:55

In reply to by 'न'वी बाजू

येस, अ‍ॅस्पिरिन तसाच लिहिलेला पाहिला आहे.

अन मोमो यद्यपि नेपाळ/तिबेटातला असला तरी उर्वरित भारतास याचा परिचय बंगालमार्फत जाहला, हेन्स द स्टेटमेंट.

'न'वी बाजू Thu, 13/02/2014 - 20:13

In reply to by बॅटमॅन

अन मोमो यद्यपि नेपाळ/तिबेटातला असला तरी उर्वरित भारतास याचा परिचय बंगालमार्फत जाहला, हेन्स द स्टेटमेंट.

'नेपाळास मोमोचा परिचय बंगालमार्फत झाला' असा (रोचक नि क्रांतिकारी) निष्कर्ष काढता येण्याची शक्यता असताना, 'मोमो नेपाळ/तिबेटातले आहे' या पारंपरिक समजुतीस दुजोरा देण्याबद्दल तीव्र निषेध!

मन Thu, 13/02/2014 - 22:20

In reply to by 'न'वी बाजू

चायनिज भेळ ह्या प्रकाराचा परिचय चीनला भारतामुळे झाला!
आता बोला

'न'वी बाजू Thu, 13/02/2014 - 22:23

In reply to by मन

चैनीज़ भेळ हा प्रकार अद्याप चीनपर्यंत पोहोचला असण्याबद्दल साशंक आहे. (याबद्दल काही खात्रीलायक माहिती असल्यास जरूर खुलासा करावा.)

नितिन थत्ते Fri, 14/02/2014 - 09:44

In reply to by 'न'वी बाजू

मोमोची ओळख जगाला रत्नांग्री जिल्ह्यातून उद्भवलेल्या मोदकापासून झाली असावी असा निश्चित निष्कर्ष आधीच काढल्या* गेलेला आहे.

*कोणी काढला? अहो आम्हीच !!! :)

गवि Thu, 13/02/2014 - 16:30

In reply to by मन

अमराठी अन महाराष्ट्रापासून दूर एका ठिकाणी आम्हाला एक नवीन विषय शिकवायला एक तज्ञ येणार होते. मिस्टर गोगेट विल कन्डक्ट द कोर्स असे ऐकून कोण फॉरेनर येणार अशी वाट बघत होतो.

नंतर कळलं की पुण्याहून येणारेत.. Gogate.

यानिमित्ताने डमेल किंवा डमाले नावाच्या पुलंच्या मारकुट्या मास्तरांची आठवण झाली. :)

बॅटमॅन Thu, 13/02/2014 - 16:33

In reply to by गवि

गोगेट =))

त्यावरून आठवलं, पळशीकर हे आडनाव नसून दोन आज्ञांचे एकत्रीकरण आहे असे म्हणून त्या आडनावधारकांस चिडवत असू त्याची आठवण झाली.

'न'वी बाजू Thu, 13/02/2014 - 18:58

In reply to by आनंद घारे

कुळकर्णी आणि कुलकर्णी असे भेद असतात पण त्यांच्यात भाषिक, प्रांतिक, जातीय, इ. इ. अस्मिता असते हे मी पहिल्यांदाच वाचले किंवा ऐकले.

'कुलकर्णी' बोले तो देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. 'कुळकर्णी' बोले तो चांद्रसेनीय कायस्थ प्रभू.

हा झाला ढोबळमानाने फरक.

आता अस्मितांचेच बोलायचे, तर 'कुलकर्णी' मंडळींना 'कुळकर्णी' म्हणून संबोधले जाण्याचे उदाहरण डोळ्यांसमोर नसल्याकारणाने 'कुलकर्णी'मंडळींच्या प्रतिक्रियेबद्दल विधान करू शकत अथवा इच्छीत नाही, परंतु 'कुळकर्णी'मंडळींना (अनवधानानेसुद्धा) 'कुलकर्णी' म्हणून संबोधल्यास सहसा (१) वस्स्कन अंगावर येतात, आणि/किंवा (२) ताबडतोब, तातडीने दुरुस्त करतात, असे एक सामान्यनिरीक्षण आहे.

=====================================================================================================================================

'कुलकर्णी'-प्रतिनिधींनी जमल्यास आणि इच्छा असल्यास योग्य तो खुलासा जरूर करावा; त्यांचे स्वागत आहे.

बॅटमॅन Thu, 13/02/2014 - 19:02

In reply to by 'न'वी बाजू

'कुलकर्णी' बोले तो देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. 'कुळकर्णी' बोले तो चांद्रसेनीय कायस्थ प्रभू.
हा झाला ढोबळमानाने फरक.

ही माहिती नव्याने कळाली. धन्यवाद!

मन Thu, 13/02/2014 - 19:35

In reply to by मी

+१
सही आवरा बॅट्याराव नायतर भाषांतर तरी द्या बुवा.

मी Thu, 13/02/2014 - 19:17

In reply to by 'न'वी बाजू

परंतु 'कुळकर्णी'मंडळींना (अनवधानानेसुद्धा) 'कुलकर्णी' म्हणून संबोधल्यास सहसा (१) वस्स्कन अंगावर येतात.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण भुमिका> हे प्रभूलोक तर ब्राह्मण सुद्धा नव्हेत ह्यांना मान दिल्यामुळे खरतरं अपमान आमचा व्हायचा पण ह्येच कावून राह्यले, जौदे, आपण बरं आपलं काम बरं.देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण भुमिका>

पाटी - हा प्रतिसाद विनोदी आहे, विनोद कळला नसल्यास व अस्मिता दुखावली गेली असल्यास क्षमस्व.

शहराजाद Thu, 13/02/2014 - 21:13

In reply to by मी

एका कुलकर्णी मैत्रिणीने दुसर्या एका कुळकर्णी मुलीबद्दल सांगितले होते- ' ते कु कर्णी आणि आम्ही कु कर्णी. ल वाले ब्राम्हण असतात, ळ वाले ब्रम्हण नसतात.'

सुनील Fri, 14/02/2014 - 11:55

In reply to by रोचना

मोडी लिपीत "ल" आणि "ळ" वेगळा दर्शवण्याची सोय असेल तर, जुन्या कागदपत्रांतून/बखरींतून शोधता येईल (कोणी एव्हाना शोधले असेलही!)

ज्ञानेश्वरांचे आडनाव कुकर्णी असे होते. हे खरे ना?

गब्बर सिंग Thu, 13/02/2014 - 13:21

It is not possible for society to maintain the so called "diversity" without each group/sect fiercely attempting to maintain its own distinct identity.

प्रत्येकाने स्वतःची अस्मिता (जातीय, प्रांतिक, धार्मिक) अवश्य जपावी. अगदी वेहेमंटली.

चिंतातुर जंतू Thu, 13/02/2014 - 13:38

In reply to by गब्बर सिंग

>> It is not possible for society to maintain the so called "diversity" without each group/sect fiercely attempting to maintain its own distinct identity.

प्रत्येकाने स्वतःची अस्मिता (जातीय, प्रांतिक, धार्मिक) अवश्य जपावी. अगदी वेहेमंटली.

ठीक. पण त्यात इतरांच्या अस्मितांची किंवा मानवी हक्कांची पायमल्ली होत नाही ना, तेवढे मात्र पाहावे. माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे इतरांच्या अस्मितेला तुच्छ लेखणे नव्हे, पण तसे होताना अनेकदा दिसते.

मन Thu, 13/02/2014 - 13:53

In reply to by चिंतातुर जंतू

माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे इतरांच्या अस्मितेला तुच्छ लेखणे नव्हे, पण तसे होताना अनेकदा दिसते.

व्यवहारात असे होणे शक्य नाही.
मी असा काहीतरी वेगळा आहे , म्हणजेच इतरांपेक्षा काही अधिकचे गुणावगूण माझ्यात आहेत असा अर्थ होतो.
अस्मिता, sense of belongingness.
तस्मात, इतांहून अधिकचे गुण जे माझ्यकडे व माझ्या belonging वाल्यांकडे आहेत, त्यापेक्षा इतर आपोआप तुच्छ ठरतात; निदान जे गुण माझ्यात अधिक आहेत असे मानले त्यात.
अर्थात इतरांना तुच्छ मानणेही श्रेयस्करच आहे, अशी टिपिकल मांडणी गब्बर करणार ह्याची खात्री आहे.
.
.
एक उदाहरण :-
समता पाळून अस्मिता सांभाला. हे म्हणणं मला आख्ख्या बोकडाचं मटन पचवून उपास पाळा म्हणण्यासारखं वआटतं.
वास्तवात हे शक्य नाही.
माझ्या धार्मिक अस्मिता डिफाइन होतानाच मला जर "अमुक एक गोष्ट अक्रणारे वाईट " असे शिकवले गेले असेल तर काय झाट तुच्छता मानणे थांबवू शकणार आपण ?
समजा मला "मूर्ती फोडणे हे प्रथमावश्य्क व मानवसंहाररक्षक आहे" अशी शिकवण आहे, तर मी प्रामाणिकपणे मूर्त्या फोडणार.
दुसरा "मूर्तीमध्येच सारे काही आहे" असे म्हणत आपली अस्मिता त्याच्याशी जोडू पहात असला, तर तुच्छता, उच्च्-नीचता , आपसात वैर येणार.
थोडक्यात अस्मिता एकमेकांना छेदतात तिथे संघरष होतो.
अस्मिता एकमेकांन छेदणार नाहितच; असे होणे युटोपिया सोडून कुठे शक्य आहे?

गब्बर सिंग Thu, 13/02/2014 - 14:07

In reply to by चिंतातुर जंतू

ठीक. पण त्यात इतरांच्या अस्मितांची किंवा मानवी हक्कांची पायमल्ली होत नाही ना, तेवढे मात्र पाहावे. माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे इतरांच्या अस्मितेला तुच्छ लेखणे नव्हे, पण तसे होताना अनेकदा दिसते.

This is just an overly politically correct statement. तेव्हा असहमत.

सर्वसामान्यपणे - तुच्छ हा शब्द उगीचच पॉलिटिसाईझ केला गेलेला आहे. दुसर्‍यास तुच्छ समजण्यात काहीही चूक नाही. सगळ्यांना समान सोशल स्टेटस असावे ह्या गोड गैरसमजातून हा विचार बळावलेला आहे. मला तुम्ही खुशाल तुच्छ् समजू शकता कोणत्याही पॅरॅमिटर वर.

माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे माझ्या दृष्टीने माझी अस्मिता माझ्या दृष्टीने तुमच्या अस्मितेपेक्षा जास्त मूल्यवान आहे असे मानणे. म्हंजे माझ्या दृष्टीने तुमच्या अस्मितेस कमी मूल्य देणे. आता "दुसर्‍याच्या अस्मितेस कमी मूल्य देणे" ह्यास "तुच्छ" हा शब्द योग्य आहे की नाही हा वादाचा विषय होऊ शकतो.

If ASMITA is based on realistic performance indicators then those groups, which do not fare well on those performance indicators should essentially be considered तुच्छ and nothing other than तुच्छ. उदाहरणार्थ - आदिवासी हे शिक्षण, सामाजिक विकास, आर्थिक विकास, इहलौकिक विकास ह्या ३ पॅरॅमिटर्स वर शहरी शिक्षित वर्गापेक्षा अत्यंत कनिष्ठ आहेत. याला मी तुच्छ हा शब्द अवश्य वापरेन. उगीचच मखलाशी करणार नाही.

प्रश्न उरतो तो फक्त - realistic performance indicators कोणते (उदा. शिक्षण, सामाजिक विकास) व कोण ठरवणार हा.

Try to name 2 individuals who do the same task equally well.

मन Thu, 13/02/2014 - 14:12

In reply to by गब्बर सिंग

This is just an overly politically correct statement. तेव्हा असहमत.

हेच बोलतो.

सर्वसामान्यपणे - तुच्छ हा शब्द उगीचच पॉलिटिसाईझ केला गेलेला आहे. दुसर्‍यास तुच्छ समजण्यात काहीही चूक नाही.
हे असं म्हणणार आधीच भाकित केलं होतं वरती मी.
.
सगळ्यांना समान सोशल स्टेटस असावे ह्या गोड गैरसमजातून हा विचार बळावलेला आहे. मला तुम्ही खुशाल तुच्छ् समजू शकता कोणत्याही पॅरॅमिटर वर.

आय मीन हो. जर एकूणात मला जाणवत असेल की मी अत्युच्चशिक्षित आहे. माझ्या कुटुंबातील मागील काही पिढ्यातील लोकही अत्युच्च शिक्षित आहेत, आणि ह्याबबत माझी अस्मित असलेली चालेल; तर मी अशीच बाळगेन की "आम्ही लै भारी. शेजारचे भिकारडे शिक्षणात मागे आहेत. आम्ही श्रेष्ठ."
.
.


माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे माझ्या दृष्टीने माझी अस्मिता माझ्या दृष्टीने तुमच्या अस्मितेपेक्षा जास्त मूल्यवान आहे असे मानणे.

+१
.
.
उदाहरणार्थ - आदिवासी हे शिक्षण, सामाजिक विकास, आर्थिक विकास, इहलौकिक विकास ह्या ३ पॅरॅमिटर्स वर शहरी शिक्षित वर्गापेक्षा अत्यंत कनिष्ठ आहेत. याला मी तुच्छ हा शब्द अवश्य वापरेन. उगीचच मखलाशी करणार नाही.

अवांतर होइल.
आदिवासी सामाजिक विकासात मागे आहेत ?
साहेब कैक आदिवासी समाजत नागर स्त्रियांपेक्षा मानाचे स्थान आहे ; किम्वा एकूणातच नॉर्मल वागवले जाते.
वर्-खाली अशी मांडणी तिथे नाही. बाकी सगळं ठीक आहे.

ऋषिकेश Thu, 13/02/2014 - 14:15

In reply to by मन

साहेब कैक आदिवासी समाजत नागर स्त्रियांपेक्षा मानाचे स्थान आहे ; किम्वा एकूणातच नॉर्मल वागवले जाते.
वर्-खाली अशी मांडणी तिथे नाही. बाकी सगळं ठीक आहे

मग तर गब्बरच्या मते ते नक्कीच मागास आहेत
असं समान काही असतं का? नस्ते साम्यवादी नखरे!
हो की नै हो!?

ऋषिकेश Thu, 13/02/2014 - 14:40

In reply to by गब्बर सिंग

दुसर्‍यास तुच्छ समजण्यात काहीही चूक नाही. सगळ्यांना समान सोशल स्टेटस असावे ह्या गोड गैरसमजातून हा विचार बळावलेला आहे. मला तुम्ही खुशाल तुच्छ् समजू शकता कोणत्याही पॅरॅमिटर वर.

जर त्याच्यासारख्या/गटातल्या नसणार्‍या समोरच्याला तुच्छ समजून त्याला संपवणे करणे हीच त्याला गवसलेली अस्मितेची ओळख असेल व अशी अस्मिता बाळगणारा माणूस तुमच्या समोर आला, तर तो समोर आल्यावर त्याला त्याच्या अस्मितेशी तुम्ही प्रामाणिक राहु द्याल का? अर्थात तुम्ही स्वत:ला त्याला सपवू द्याल का?

चिंतातुर जंतू Thu, 13/02/2014 - 14:40

In reply to by गब्बर सिंग

>> माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे माझ्या दृष्टीने माझी अस्मिता माझ्या दृष्टीने तुमच्या अस्मितेपेक्षा जास्त मूल्यवान आहे असे मानणे. म्हंजे माझ्या दृष्टीने तुमच्या अस्मितेस कमी मूल्य देणे. आता "दुसर्‍याच्या अस्मितेस कमी मूल्य देणे" ह्यास "तुच्छ" हा शब्द योग्य आहे की नाही हा वादाचा विषय होऊ शकतो.

If ASMITA is based on realistic performance indicators then those groups, which do not fare well on those performance indicators should essentially be considered तुच्छ and nothing other than तुच्छ. उदाहरणार्थ - आदिवासी हे शिक्षण, सामाजिक विकास, आर्थिक विकास, इहलौकिक विकास ह्या ३ पॅरॅमिटर्स वर शहरी शिक्षित वर्गापेक्षा अत्यंत कनिष्ठ आहेत. याला मी तुच्छ हा शब्द अवश्य वापरेन. उगीचच मखलाशी करणार नाही.

प्रश्न उरतो तो फक्त - realistic performance indicators कोणते (उदा. शिक्षण, सामाजिक विकास) व कोण ठरवणार हा.

प्रत्येक गोष्टीचा संबंध मूल्य आणि परफॉर्मन्सशी लावायला हवा, आणि तो लावला की त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ येणार ह्या भावनेबद्दलच मला शंका आहेत. 'मी माझ्या घरी वरण-भात-भेंडीची भाजी खात वाढलो आणि मला ती आवडते' हे म्हणण्यात माझी अस्मिता आहे, पण त्यासाठी मला इतरांच्या घरी ते जे काही खात वाढले त्याची माझ्या घरच्या जेवणाशी तुलना करून त्यांपैकी एकाला श्रेष्ठ-कनिष्ठ मानण्याची गरजच भासत नाही. ही गोष्ट मान्य झाली, तर अस्मितांच्या बहुविधतेसह समांतर अस्तित्व सहज शक्य होईल. आपल्या अस्मितेची जागा आपल्याला राखता येण्याचं डोळस स्वातंत्र्य हवं असेल तर इतरांच्या अस्मितेला तिची जागा राखता येण्याचं स्वातंत्र्य द्यावं. किंबहुना ते परस्परावलंबी असतं.

नितिन थत्ते Thu, 13/02/2014 - 15:03

In reply to by चिंतातुर जंतू

तुमची अस्मिता टिकवायची असेल तर तुम्ही श्रीमंत व्हा आणि टिकवा तुमची अस्मिता. तुम्ही श्रीमंत नसाल तर अस्मिता टिकवायचा तुम्हाला हक्क नाही. असे काहीतरी गब्बरसिंग यांचे म्हणणे असावे.

मन Thu, 13/02/2014 - 15:26

In reply to by नितिन थत्ते

वरील प्रतिसादात अस्मिता ह्याऐवजी अस्तित्व असा शब्द घातला तर गब्बरची भूमिका अधिक स्पष्ट होते अशी माझी समजूत आहे.
गरिबांना मुळात अस्तित्वात रहायचा अधिकार नाही.

'न'वी बाजू Thu, 13/02/2014 - 19:00

In reply to by चिंतातुर जंतू

'मी माझ्या घरी वरण-भात-भेंडीची भाजी खात वाढलो आणि मला ती आवडते' हे म्हणण्यात माझी अस्मिता आहे, पण त्यासाठी मला इतरांच्या घरी ते जे काही खात वाढले त्याची माझ्या घरच्या जेवणाशी तुलना करून त्यांपैकी एकाला श्रेष्ठ-कनिष्ठ मानण्याची गरजच भासत नाही. ही गोष्ट मान्य झाली, तर अस्मितांच्या बहुविधतेसह समांतर अस्तित्व सहज शक्य होईल.

वर्क्स बोथ वेज़, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.

जयंत फाटक Thu, 13/02/2014 - 13:34

महाराष्ट्रात (म्हणजे पुणे-मुंबई-रत्नांग्री) जास्त त्रास होत नाही. खान्देशात्,वर्‍हाडात्,विदर्भात आणि मराठवाड्यात पण असाच त्रास होतो.(वरील वाक्य वाचल्यानंतर वेगळा खान्देश्,वर्‍हाड आणि मराठवाडा व्हायचे चान्सेस आहेत ले लक्षांत आले असेलच)

पण महाराष्ट्रा बाहेर सुरुवातीला "फाटक"च्या ऐवजी "पाठक" केले की, मला राग यायचा.

शेवटी महाराष्ट्रा बाहेर गेलो, की सरळ सांगायचो.

मेरा सरनेम (आडनांवाला हिंदी मध्ये काय म्हणतात हो?) "P H A T A K " है.तुम गलती से "P A T H A K" ऐसा मत लिहो. (आमचे हिंदी सॉलीड आहे.)

तरी पण लिहीणारा कधी काय गोंधळ घालेल काही सांगता येत नाही.मग सरळ संभाषणाला सुरुवात करायची.

मी : "तुम को वो, रेल्वे का गेट होता है ना.तुम उसको तुम क्या बोलते हो?"

तो : "फाटक"

मी : "हां... तो वही मेरा आडनांव हय."

तो : ऐसा कैसा ?

मी : वो क्या हुवा.अंग्रेजोंके जमानेमे हमारा पुर्वज रेल्वे का गेट बनाता था.तो अंग्रेजोने हमारा नाम बदल दिया.और फिर हमारा आडनांव "गेट" हुवा. फिर १९४२ में वो चले जाव चळ्वळ हुवी ना. उस समय हमारा पुर्वज मुंबई मे था.उस समय हमारा आडनांव बदला और "फाटक" हुवा.

आता इंग्रजांनीच हीच चूक केली आहे म्हणजे, हेच आडनांव बरोबर आहे. असे त्याला समजते आणि मग तो पाठकच्या जागी फाटक करतो.

आणि मी शांतपणे अजून एक किस्सा गाठीला बांधून निघून जातो.तर तिकडे तो बाबु पण हा किस्सा दुसर्‍याच्या कानांत ओतायला निघून जातो.

जयंत फाटक Thu, 13/02/2014 - 13:59

In reply to by ऋषिकेश

दक्षिणेकडची ४ राज्ये सोडली तर उर्वरीत समस्त भारतात "पाठक" आडनांव आहे.

गुजरात मध्ये "जयंत पाठक" हे एक प्रसिद्ध कवी आहेत.बहुदा सुप्रसिद्ध नसावेत्,कारण एकदा मी, गाडीत नुकत्याच ओळख झालेल्या एका प्रवाशाला, माझे नांव सांगीतले.त्याने करायचा तो गोंधळ केलाच आणि मलाच "जयंत पाठक" समजून नमस्कार पण केला.

जावु दे,

माझ्या आडनावाचे बरेच रंगतदार (म्हणजे तुम्हाला रंगतदार ????) किस्से आहेत.

रोचना Fri, 14/02/2014 - 12:05

In reply to by शहराजाद

हेच म्हणते.
आमचे आडनाव देशपांडे. त्याचे रोमन लिपीत उत्तरेत, पूर्वेकडे हमखास Desh Pandey केले जाते याची खूप चिडचिड होते. पण मी कधी फर्डा हिंदीत "हम भी पांडेच, लेकिन वेगळ्याच देश के" वगैरे सांगून पाहिले नाही...

नितिन थत्ते Thu, 13/02/2014 - 13:49

छ्या !!! अजून या धाग्यावर नथुरामचा उल्लेख झाला नाही. (आता मी केला !)

मन Thu, 13/02/2014 - 13:59

In reply to by नितिन थत्ते

थुत त्या काँग्रेसच्या.
झालच तर दारुबाजीचा निषेध असो.
पुरुषी वर्चस्वाचा त्याहूनही निषेध असो.
निसर्ग वाचवणं अपरिहार्य आहे.
तिच्या उन्मळून आलेल्या भावना तिने पत्रावाटे मोकळ्या केल्या.
अमेरिकेला तेलाचा माज चधलाय्.. हिरवा माज.
दलितांनी सर्वणांनाही आपले म्हणावे, चला एकीए घडवूया.
पाइक्स्तानच्या हातात अणुशक्ती आख्ख्या जगाला धोकादायक आहे.
भरिताचे पिठले करायचे असल्यास त्यात थोडा पिझ्झा घालून गोमूत्रात घोळवलयस चांगली चव येते.
मिरचीचे औषधी गुण आहेत. न आवडणार्‍अय पाहुण्याला कचाकचा मिरचा खायला लावल्याने आलेल्या पाहुण्यारुपी संकटाचे निवारण होते.
मद्य हीच एकमेव नशा नव्हे.
नशेशिवायही झिंगता येते.
झिंगल्यावरही लिहिता, तेही ऐसीवर लिहिता /टंकता येते.
गांजामुक्तीचा विजय असो.

बॅटमॅन Thu, 13/02/2014 - 19:02

In reply to by मेघना भुस्कुटे

मद्य, गोमूत्र अन पिझ्झा यांचे साहचर्य पाहून सम'रस'तावादी असण्याची खात्री पटते खरी.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/02/2014 - 01:12

In reply to by बॅटमॅन

इटलीमधे पिझ्झा आणि कापुचिनो एकत्र घेतली तरीही सम'रस'तावादी म्हणतील बहुदा. (या दोन पदार्थांची नावं एका वाक्यात घेतली म्हणून एक इतालियन मित्र माझ्यावर भडकला होता. हा संवाद सुरू असताना आम्ही एका भारतीय रेस्तरॉंमधेच जेवत होतो. वैतागून तो म्हणाला, "मी हा पापड दह्यात बुडवून खाऊ का?". मी शांतपणे, "हो." म्हटलं. आणि वर "आजूबाजूला पाहू नकोस. बाकीचे भारतीय आणि ब्रिटीश तुला हसतील." असाही सल्ला दिला. पण त्यानंतर 'इतालियन अन्नाची शिस्त' या विषयावर एक माहितीपूर्ण लेक्चर मिळालं ... जे मी आता विसरले.)

बॅटमॅन Sat, 15/02/2014 - 01:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

अशी शिस्त बिघडवणार्‍या काही रेशिप्या म्ह. चहाभात अन शिराकांदा कधीकाळी स्मॉल स्केलवर आजमावल्या होत्या त्याची आठवण होऊन अंमळ भडभडून आले.

ऋषिकेश Thu, 13/02/2014 - 14:13

In reply to by मन

नथुराम असा सहज येणार नाही,

आणि हे राहिलं ते साले चीनी कसे टपून बसले आहेत.
आपले सरकार कसे षंढ आहे
गांधी परिवाराने देशाची लावलेली वाट
गुजरात दंगली
मग शीख दंगली
मग हिंसा-अहिंसा
मग क्रांतिकारकांचे त्याग
मग गांधीजी आणि मग नथुराम येईलच

कान्होजी पार्थसारथी Thu, 13/02/2014 - 14:29

In reply to by कान्होजी पार्थसारथी

बाकी अस्मितेची जनुके, त्यांचे स्वार्थीपण, इतिहास सगळं मध्ये फिट बसण्यासार्खं हाये!

Nile Thu, 13/02/2014 - 22:48

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन आणि नवीबाजू यांचा हा जो श्रेणी अक्ष बनतोय इकडे त्याला आवरा रे कोणीतरी.

बाकी या निमित्ताने पाठीला साबण लावणे या वाकप्रचाराची आठवण येऊन काही जुन्या अस्मिता जाग्या झाल्या!! (या वाक्यासाठी या प्रतिसादाला इतिहासाबद्दल अज्ञान असणार्‍यांनी माहितीपूर्ण, इतिहासाबद्दल प्रेम असणार्‍यांनी रोचक, या इतिहासात रंगलेल्यांनी मार्मिक, या इतिहासातच राहिलेल्यांनी खोडसाळ आणि या इतिहासाशी सुतराम संबंध नसलेल्यांनी खवचट श्रेणी देणे!)

Nile Thu, 13/02/2014 - 23:27

In reply to by 'न'वी बाजू

अ‍ॅसिडीटीचा त्रास असलेल्यांनी भडकाऊ द्या हे गृहित असल्याने लिहले नव्हते. ;-)

'न'वी बाजू Thu, 13/02/2014 - 23:35

In reply to by Nile

सामान्य गृहीतक हे 'अ‍ॅसिडिटीचा त्रास असणारांनी ईनो घ्यावे', असे आहे, हे आपणांस ठाऊक नसण्याचे काही कारण नसावे. (म्हणजे, इतिहासज्ञ या नात्याने.)

प्रकाश घाटपांडे Thu, 13/02/2014 - 17:18

डॉक्टरच्या नावाची पाटी विंग्रजीत होती काय? असे असेल तर घोटाळे होतात. आता डॉ दाभोलकर असे लिहिण्याऐवजी डॉ. दाभोळकर असे लिहितात वा संबोधतात.

'न'वी बाजू Thu, 13/02/2014 - 18:11

In reply to by प्रकाश घाटपांडे

(पुन्हा:) कुलकर्णी-कुळकर्णी भेदाबद्दल कल्पना होती. दाभोळकर-दाभोलकर असाही काही (सिग्निफिकंट) भेद असतो, हे नव्याने कळते आहे.

या भेदाचा सिग्निफिकन्स (केवळ सामान्यज्ञान / कुतूहल म्हणून) कोणी विशद करू शकेल काय?

==================================================================================================

काहीसे "दुसरी भाषा आली नाही, तरी हरकत नाही; दुसर्‍या भाषेतील शिव्या मात्र जरूर अवगत असाव्यात. वेळप्रसंगी उपयोगी पडतात, आणि गेला बाजार कोणी आपल्याला दिल्या, तर देणारा आपल्याला शिव्याच देतोय, आपली प्रशंसा करत नाही आहे, एवढे तरी लक्षात येते," या तत्त्वागत. व्यक्तिशः, आम्हांस 'दाभोळकरां'शीही घेणेदेणे नाही, आणि 'दाभोलकरां'शीही; पण त्यांच्यातले 'डिफरन्सेस' ठाऊक असलेले बरे - कधी कामी येतील, सांगवत नाही.

राजन बापट Thu, 13/02/2014 - 20:12

आमचा एक "प्रभु" आडनावाचा मित्र. मराठी कुटुंब. गुजरातेत जन्मला, गुजराती भाषेत शिक्षण (अगदी चक्क बी एस सी केमिस्ट्री चा पेपर गुजरातीतून !!) . काही पिढ्यांपूर्वी यांच्या प्रभुदेसाई नावाचं कधीतरी प्रभु म्हणून झालेलं होतं. एकंदर आपल्या आईवडलांशी मराठी बोलणारा, पण परिसरातल्या सर्वांशी गुजराती.

तर असा हा गडी मास्टर्स करायला पुण्यात आला. कोथरुड परिसरातलं कुठलं तरी कॉलेज. पेईंगगेस्ट च्या जाहिराती पाहून एकेका घरमालकाला भेटायचं असा एकंदर प्रयत्न. सर्वत्र संवादाचा ढाँचा असा :

घरमालक : अच्छा तुम्ही कोण, प्रभु का ?
मित्र : हो
घरमालक :प्रभु म्हणजे कोण ?
मित्र :कोण ? म्हणजे ?
घरमालक :नाही तसं नाही. तुम्ही मासे खाता का ?
मित्र :नाही हो. मी नॉनव्हेज कधीच खाल्लं नाही.
घरमालक :तुमचं आडनाव नक्की प्रभुच ना ?
मित्र :हो !
घरमालक :तुम्ही कोण सारस्वत का ?
मित्र :म्हणजे काय ?
घरमालक :अहो म्हणजे कसं कोकणस्थ, देशस्थ , तसं सारस्वत.
मित्र :अच्छा. अच्छा. नाही म्हणजे आम्ही ब्राह्मण आहोत हे मला नक्की माहिती आहे.
घरमालक :असं आहे की आमच्याकडे मासे वगैरे तळलेलं नाही चालणार. म्हणून विचारतोय.
मित्र :(मनातल्या मनात) हा काय साला वैताग आहे. मागच्या घरात पण असंच. (उघड) नाही हो, मासे कसले मी अंडं पण नाही खात.
घरमालक : (संशयाने) ओके. आपण पाहूया काय करायचं ते. मी जरा बाहेर जातोय. भेटूच आपण.

तर असा हा आमचा मित्र पुण्यात पंधरा दिवस काढल्यावर पहिल्यांदा आपल्या घरी गुजरातेत शनिवार रविवारकरता गेला. दार वाजवलं. आईने उघडल्यावर उंबरठ्यावरच तो म्हणतो " आई आपण नक्की कोण ?" पंधरा दिवस पुण्याला जाऊन आलेला पोरगा असलं कायतरी विचारतो म्हण्टल्यावर माऊली भंजाळली हो. "तू आधी आत ये पाहू, काय झालं सांग नीट".

त्यादिवशी पहिल्यांदा आमच्या मित्राने "कर्‍हाडे" हा शब्द पहिल्यांदा ऐकला. एकंदर त्याने पहिल्यांदा "कर्‍हाडे ब्राह्मण" हे लेबल धारण केले.

अक्षय पूर्णपात्रे Thu, 13/02/2014 - 20:28

एखाद्या जागेतील आधुनिकीकरण वाढलं तर अस्मितांच्या संख्येतही वाढ अपेक्षित आहे. जर एकाच अस्मितेला कवटाळणारा समाज असेल तर कितीही आधुनिकीकरण होऊदे व्यक्तिला त्या अस्मितेला कवटाळावे लागते. थोडक्यात अस्मितांचा आड तर आहे पण व्यक्तिला मात्र भवतालचा समाज मात्र एखाद्या अस्मितेचाच पोहरा वापरू देतो. थोडक्यात समाजात अशा बहूअस्मित व्यक्तिची ससेहोलपट होते. या व्यक्तिंना 'पोस्ट-मॉडर्न' (पीएम) ही एक नवी अधिअस्मिता मिळाल्यास त्यांना जोमाने आयुष्याशी झगडता येणे शक्य होते.

बाकी, पीएम अधिअस्मितेमुळे झालेले दूरगामी नुकसान कालांतराने भारताला व जगालाही कित्येक अस्मिता मोठ्या प्रमाणात आयात करायला लावेल असे दिसते. विशेषतः या भंजाळण्यासाठी नवनवीन अस्मितांच्या शोधात असलेल्या पीएम व्यक्ति ज्या वेगाने असलेल्या अस्मितांना अंगिकारतात आणि झटकतात, त्यावेगाने या व्यक्ति पसरल्यास पीएम नसलेल्या लोकांना चिकटायला एकसुद्धा अस्मिता राहील का अशी शंका वाटते. आजकाल भारतातील माझे काही मित्र भारतात अस्मितांना न चिकटता आल्याने ऐन भावना दुखावण्याच्या बहरात अमेरिकेत शिफ्ट झालेले दिसतात (मात्र भारतात गेली दोन दशके आधुनिकीकरणाच सोस होता तेव्हा या व्यक्तिंना सुरूवातीला आधुनिकीकरणाचे फायदे तसेच अस्मिता पाळणेही सहज शक्य होत असे). अश्यावेळी हे वरवर दिसणारे - की अट्टाहासाने दाखवले जाणारे? - आधुनिकीकरण लांबचा विचार करता मोठाच घात करेल अशी भितीही वाटते.

(या प्रतिसादातील कारणमिमांसा ही भ्रष्ट नक्कल असल्याने प्रस्तुत उपटसुंभ प्रतिसादकास दाखले-बिखले मागण्याच्या फंदात पडू नये.)

अक्षय पूर्णपात्रे Thu, 13/02/2014 - 23:09

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

ही कारणमिमांसा नक्की कशी काम करते हे जाणण्यासाठी जिज्ञासूंनी ही चित्रफीत पहावी किंवा हे (येथे गाळलेली कार्यकारणसाखळी मात्र वाचकास स्वतः कल्पावी लागते) वाचावे.