Submitted by विवेक पटाईत on शुक्रवार, 31/03/2023 - 10:06
ब्रम्हज्ञानाचा विचारू.
त्याचा ब्राम्हणासीच अधिकारू.
वर्णानां ब्राम्हणो गुरु:(14/7/30)
समर्थ म्हणतात ज्या व्यक्तीने वेद, उपनिषद, दर्शन शास्त्र इत्यादीं वैदिक ज्ञानाचे अध्ययन केले आहे. ज्याला ब्रम्ह विद्येचे ज्ञान झाले आहे. तोच ब्राम्हण आहे आणि त्यालाच चारी वर्णाच्या लोकांनी त्याला गुरु मानले पाहिजे. दुसर्या शब्दांत ब्रम्हज्ञानी व्यक्तीलाच सांसारीक आणि आध्यात्मिक उपदेश देण्याचा अधिकार आहे. भग्वद्गीतेत योगेश्वर म्हणतात गुण आणि कर्मानुसार चार वर्णांची मी निर्मिती केली आहे. मनुस्मृती अनुसार शिक्षणांतर अर्जित ज्ञानाच्या आधारावर जाती ठरते.
Submitted by नील on मंगळवार, 28/03/2023 - 22:51
आधी आपण बघूया प्रोजेक्टच्या सुरुवातीला सेट केलेले अजेंडे आणि नियम किती साध्य झाले वगैरे:
( पहा उपोद्घात )
१. मन्नत:
नवस तर फिटलाच असं म्हणता यावा. सो इकडे मी स्वतःला १०० % मार्क दिल्यास कोणाची हरकत नसावी.
२. मुंबूड्या:
मुंबईत जन्मलो आणि वाढलो तरी गेली १५ वर्षं पोटापाण्यासाठी पुण्यात राहून काम करतोय.
आई आणि बहिणीसाठी मुंबईला येणं होत रहायचं पण एकंदरीत धबडग्यात मुंबईचा टच सुटल्यासारखाच झालेला.
Submitted by नील on सोमवार, 27/03/2023 - 13:17
चौफेर समाचार दिवाळी २०२२ मध्ये माझ्या टॅक्सीनाम्याविषयी विस्तृत लेख प्रसिद्ध झाल्याने, (संपादक अरुण नाईक ह्यांचे विशेष आभार)
शेवटचे दोन लेख लगेच ऐसीवर टाकले नाहीत.
ते आत्ता टाकतोय.
-------------------------------
शेवटचा दिवस...
खरं सांगायचं तर मीही आता ह्यातून बाहेर पडायला आतुरलेलो.
ह्यानंतर रविवारी दुसरं काय काय करता येईल ह्याचे प्लॅन्स ऑलरेडी डोक्यात चालू झालेले.
शनिवारी रात्री पार्ट्या करणं, रविवारी आधी पोहे आणि मग मटण खाऊन लोळत पडणं, किंवा वीकेंड गेटवेजचे प्लान्स करणं हे सगळं राहून जात होतं.
Submitted by अजित गोगटे on शुक्रवार, 16/09/2022 - 10:08
काल गुरुवारी टाकलेल्या पोस्टमध्ये मी माझा विनातिकिट लोकलचा प्रवास व त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. काही जण या संदर्भात आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात की, रेल्वे सरकारची म्हणजे लोकांचीच आहे. लोकांनीच महसूल बुडविला तर सरकारचा गाडा कसा चालणार? त्यामुळे सरकारला प्रामाणिकपणे महसूल देणे हे नागरिक म्हणून लोकांचे कर्तव्य आहे. पण प्रश्न असा आहे की, स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला व त्यांच्या कर्मचाºयांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी व किती ठेवता येईल?
Submitted by अजित गोगटे on गुरुवार, 15/09/2022 - 17:08
माझे वास्तव्य कल्याणला व नोकरी मुंबईत. सन १९७८ ते सन २०२० अशी तब्बल ४२ वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. कल्याण ते बोरिबंदर हे रेल्वेचे अंतर ५६ किमी आहे. मी सरासरी महिन्याला २५ दिवस कामावर गेलो असे गृहित धरले तरी या काळात मी लोकलने केलेल्या एकूण प्रवासाचे अंतर १४ लाख ११ हजार २०० किमी एवढे होते. परंतु मध्यंतरीची सलग १२ वर्षे मी तिकिट किंवा मासिक/त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. म्हणजे माझा विनातिकिट केलेला प्रवास सुमारे चार लाख तीन हजार २०० किमी एवढा होता.
Submitted by अजित गोगटे on बुधवार, 14/09/2022 - 14:41
मी अनुभवलेले काही मासलेवाईक किस्से:
१.
.....ताक वाढा हो माय!
कल्याणच्या पारनाका भागात सुमारे ३५ वर्षांपूर्वी एक ब्राह्मण व्यक्ती दुपारच्या वेळी वाड्या-वाड्यांमधून फिरून तिला हव्या असलेल्या खाण्याच्या वस्तूचीच फक्त भीक मागत असे. वयाची पन्नाशी ओलांडलेला हा माणूस आमचाच आडनावबंधू म्हणजे गोगटे होता. खरं तर तो त्याच भागातील एका मोठ्या वाड्याचा वडिलोपार्जित मालक होता. परंतु भाऊ आणि भावजयीने वेडा ठरवून घराबाहेर काढल्याने भीक मागून पोटाची खळगी भरण्याची वेळ त्याच्यावर आली होती!
Submitted by सर्व_संचारी on सोमवार, 05/09/2022 - 01:28
आता प्रस्थानाची तारीख जवळ येते आहे. खरेदी , पॅकिंग वगैरे बहुतेक झालेलं आहे. बाबा आजारी आहेत ( आज पुष्कळ बरं वाटतंय , तरी ). घरात आजारी माणूस , हवेत फक्त पाऊस, त्यामुळे गच्चीवर जाऊन वाजवण्याची सोय नाही; सुट्टीवर असल्याने काही रेग्युलर कामही करीत नाहीए, नुसतंच झोपणार आणि वाचणार किती वेळ; अशा वेळी एक प्रकारचा उबग येतो. आज दुपारी ठरवलं, बाहेर पडायचं आणि गावात जायचं. आम्ही नवीन तळेगाव भागात राहणारे. जुनं गाव आमच्यासाठी थोडं लांब आहे, पण मी थोडा चालत , थोडी लिफ्ट असे सर्व जुगाड करून निवांत गावात जातो नेहमीच. रॉयच्या चित्रांना फ्रेम करायला टाकल्या होत्या त्या आणायच्या होत्या.
Submitted by सर्व_संचारी on सोमवार, 05/09/2022 - 01:27
अखेरीस यावर्षी भारतात येणं झालं. महिनाभराचा काळ म्हणलं तर मोठा , म्हणलं तर छोटा ! या काळात मित्रांना/नातेवाईकांना भेटणे , घरातली कामे आटपणे, इतर काही गोष्टी आणि महत्वाचं म्हणजे नाटकबिटक , गाणंबिणं याचा बॅकलॉग भरून काढणे असं सगळं करण्याचा प्लॅन असतो. हा वीकेंड ( तीस/एकतीस जुलै ) दोन प्रयोग पाहण्यात गेला. शनिवार संध्याकाळ भरत नाट्य मंदिरात शेखर नाईक प्रॉडक्शन निर्मित “व्हिन्सेंट वॅन गॉग” अभिवाचनाचा प्रयोग झाला. ही संहिता म्हणजे आयर्विंग स्टोनने लिहिलेल्या पुस्तकाचं माधुरी पुरंदरे यांनी केलेल्या भाषांतराचे ( प्रकाशन साल बहुधा १९७७/७८) काही तुकडे !
Submitted by अजित गोगटे on गुरुवार, 25/08/2022 - 23:18
कल्याणमधील गणेशोत्सव
नवीन पिढीला माहिती व्हावी आणि जुन्या गोष्टींची औपचारिक नोंद व्हावी यासाठी आज मी या पोस्टमध्ये आमच्या ऐतिहासिक कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे.
Submitted by नील on शनिवार, 18/06/2022 - 01:06
आज सेकंड लास्ट दिवस उद्या प्रोजेक्ट संपणार म्हणून रात्रीच टॅक्सी काढली.
वार्डन रोडजवळच्या अप्सरा आईस्क्रीम जवळून चार टिपिकल नवसारीचे गुजराती मुस्लीम उचलले.
बाय द वे. हे वाळकेश्वरचं ओरिजिनल अप्सरा आईस्क्रीम!
आता त्यांच्या मुंबई पुणे आणि इतरही सगळीकडे १०० च्या वर चिक्कार ब्रॅंचेस आहेत.
पण माझ्या माहितीप्रमाणे पान-मसाला आईस्क्रीमचे जनक हेच.
मला स्वतःला हयांचं(च) पान-मसाला आईस्क्रीम भारी आवडतं.
तर नवसारीवाले पॅसेंजर्स:
सैलसर कुर्ते, पांढरे पायजमे, सुरमा, छान मेंदीवाली वगैरे दाढी, डोक्यात नक्षीदार टोप्या आणि अत्तराचा घमघमाट!
पाने