ही बातमी समजली का? - १०३
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____
http://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/kanhaiya-kumar-case-1206790/
फक्त लिंका न डकवता, किमान
फक्त लिंका न डकवता, किमान एखाददोन तरी वाक्ये मराठीत लिहावीत अशी विनंती.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
वि. धु. ला. ये. आ.
वि. धु. ला. ये. आ.
ईंटर्नेट ऑफ थिंग्स : स्मार्ट बेड्स
भयंकर बातमी आहे-
जॉन्सन & जॉन्सन बेबी टाल्कम पावडर ने ओव्हेरियन कॅन्सर बहुधा होऊ शकतो
Some studies suggest a link between talcum powder and ovarian cancer, but scientists say it's not clear yet whether products containing talc can cause the disease.
"Studies of personal use of talcum powder have had mixed results, although there is some suggestion of a possible increase in ovarian cancer risk," the American Cancer Society says on its website. "There is very little evidence at this time that any other forms of cancer are linked with consumer use of talcum powder."
___
ओबामा यांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामध्ये कोणते गुण आवश्यक आहेत -
_____
ज्या बाळांचा सिझेरिअन वापरुन जन्म होतो, त्यांच्यात एक प्रकारचे जंतू नसतात जे की नॉर्मल डिलिव्हरीमधुन आलेल्या बाळांमध्ये असतात. हे जंतू आवश्यक असल्याने, "swabbing" करतात. त्याची ही जुनी बातमी
In other words, babies who were seeded with the gauze had a microbiome closer to a baby born vaginally than those born via C-section – results which were still present after one month. “While it’s not equivalent to a baby born vaginally, there is some important restoration happening,” Bello says.
पण ती पद्धत तितकीशी सुरक्षित नसल्याची ही नवी बातमी
_____
शरीराचे वजन अगदी अत्यल्प जरी कमी केले तरी दिसण्यात फायदे नसतील पण आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते.
_____
रात्री इपॅड, फोन, लॅपटॉप वगैरे, लाइट-एमिटिंग उपकरणे वापरल्याने झोपेची वाट तर लागतेच, व त्यामुळे शरीर तसेच मानसिक आरोग्यावरती घातक परिणाम होतात.
_____
glioblastoma नावाचा मेंदूचा कर्करोग असलेले फक्त ३०% पेशंट २ वर्षांपेक्षा अधिक काळ जगतात कारण सर्जनने ट्युमर जरी काढून टाकला तरी, एक प्रकारची (वेलीसदृश?) घातक वाढ, मेंदूभर फोफावते व ट्युमर परत उगवतो. पण आता रिप्रोग्रॅम्ड अशा त्वचापेशी मेंदूमध्ये इम्प्लान्ट करतात ज्या पेशी, कर्करोगाच्या पेशींना शोधून, त्यांचा नाश करतात.
________
मेक्सिकोची माजी राष्ट्रपती म्हणाली की आम्ही बॉर्डरवरची ती फ*** भिंत बांधायला मुळीच आर्थिक सहभाग देणार नाही. तर ट्रंप जे स्वतः इतकी भयानक भाषा वापरतत त्यांनी त्या शब्दाबद्दल विन्सेन्ट फॉक्स यांच्याकडे माफीची मागणी केली आहे.
____
अमेरीकन राजकारण इतक्या खालच्या थराला गेलय की आता रुबियो म्हणतायत की त्यांच्या टीकेमुळे ट्रंप यांची पँट ओली झाली.
_______
ईंटर्नेट ऑफ थिंग्स : स्मार्ट बेड्स - या पलंगात्/गादीत बिल्ट इन सेन्सर्स आहेत जे सतत तुमच्या फोनवर्/टॅबलेटवर डेटा पाठवत रहातात. काही कालावधीत,इतका डेटा मिळतो की, टेक्नॉलॉजे एहे सांगू शकते की किती वेळ तुम्ही झोपलात, झोपेचा दर्जा किती चांगला होता शिवाय तुम्हाला सूचनाही सुचविल्या जातात की - खोलीचे तापमान कमी करा किंवा जास्त करा, झोपेची वेळ इतकी असू द्यात, व्यायाम करा वगैरे वगैरे
फ्लिप/फ्लॉप मिट
प्रस्तुत बातमी 'ओनियन'मधली वाटेल, पण तसं नाही. तर मिट रॉमनीआजोबांनी डॉनल्ड ट्रम्पने त्याचे टॅक्स रिटर्न्स जाहीर करावेत, अशी मागणी केली आहे.
दुवा: http://www.nytimes.com/politics/first-draft/2016/02/24/mitt-romney-says-...
उद्धृतः
मिट रॉमनी (आजोबा) निवडणुकांच्या रिंगणात?
आजच सकाळी एनबीसीच्या 'टुडे' या शोमध्ये कदाचित मिट रॉमनी (आजोबा) निवडणुकांच्या रिंगणात उतरतील अशी (स्वयंघोषित) कैच्याकै शक्यता वर्तवली होती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इंग्रजी टेक्स्टमध्ये टेल्कम
इंग्रजी टेक्स्टमध्ये टेल्कम पावडर लिहिलेले दिसले "जॉनसन" आणि "बेबी" हे कुठे आहे?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
A St. Louis jury late Monday
A court case involving the family of an Alabama woman who blamed the talc in baby powder for causing their mother's fatal ovarian cancer is raising questions about the product's safety — especially for feminine hygienic use.
A St. Louis jury late Monday ordered Johnson & Johnson to pay the woman's family $72 million in damages. After her cancer diagnosis, Jackie Fox joined dozens of women suing the company for what they said was a failure to inform consumers about the dangers of talc. Johnson & Johnson says its products are safe.
प्रधानमंत्री ग्राम सडक
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा परिणाम जोखणारा लेख. लेखाच्या शेवटी केलेली नरेगा आणि या योजनेची तुलना देखील रोचक आहे.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/pradhan-mantri-g...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
ह्यामागचं अर्थकारण फार सोप्या सरळ भाषेत आठ दहा वर्षापूर्वीच स्वामीनाथन सांगून गेलेत.
http://swaminomics.org/roads-will-lead-to-rural-prosperity/
.
.
http://swaminomics.org/building-infrastructure-is-not-keynesian/
.
.
गब्बरला हे पटण्याची शक्यता नाहिच. माझ्यात त्याच्याशी भांडत बसायचीही ताकत नाहिच.
building-infrastructure-is-no
building-infrastructure-is-not-keynesian
ह्याच्याशी मला सहमत व्हायला आवडेल.
केनेशियन नीती असं सांगते की (Deficit spending is expansionary.). म्हंजे - "मंदीच्या कालात केंद्रसरकारने राजकोषिय तूट असू द्यावी व त्यासाठी भरपूर खर्च करावा. म्हंजे पैसा सरकारकडून श्रमिक लोकांच्या हातात जातो व लोकांना तो खर्च करावाच लागतो कारण दैनंदिन गरजा भागवायच्या असतात. श्रमिक तो खर्च करतात व अर्थव्यवस्थेची चक्र जोरात फिरायला सुरुवात होते. परिणामस्वरूप अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर यायला सुरुवात होते".
इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यामागे मूळ हेतू मंदी घालवून तेजी आणणे हा खरंतर नसतो. आणि म्हणून स्वामिनाथन अय्यर यांच्याशी मला सहमत व्हायला आवडेल.
ही योजना वाजपेयींच्या सरकारची
ही योजना वाजपेयींच्या सरकारची आहे असे पुसटसे आठवते. लेख वाचलेला/उघडलेला नाही नंतर आरामात वाचेन
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
येस. लेखात म्हटल्याप्रमाणे
येस. लेखात म्हटल्याप्रमाणे गोल्डन क्वाड्रिलॅटरल मुळे झालेला फायदा सगळ्यांनाच माहितिये आणी त्याचं ड्यू क्रेडिट वाजपेयी सरकारला दिलं जातं. त्याच सरकारच्या या योजनेचा परिणाम त्याच मॅग्निट्यूडचा असून याला इनफ प्रसिद्धि मिळत नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+/- माझ्या मते गोल्डन
+/-
माझ्या मते गोल्डन क्वाड्रीलॅटरल पेक्षा ही योजना अधिक सक्सेसफुल होती, मात्र याचा उपयोग जाणवायला ४-५ वर्षे जावी लागली.
महाराष्ट्रात याचा प्रभाव विशेष जाणवला नाही कारण (बहुधा यशवंतरावांच्याच काळात चुभुदेघे) 'गाव तिथे रस्ता' योजना आली होती तर (बहुदा नाईकांच्या/पवारांच्यावेळी पुन्हा चुभेदेघे) 'रस्ता तिथे यस्टी' ही बाब सुरू झाली. त्यामुळे या योजने अंतर्गत करायला महाराष्ट्रात फार काम शिल्लक नसावे असा कयास
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
स्मृती इराणी फॅक्ट चेक
स्मृती इराणी यांनी काल संसदेत केलेल्या विधानांची सत्यता पडताळून पाहण्याचा एक प्रयत्न इथे दिसला.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Fact check: The university’s
विद्यार्थी अॅब्स्काँडिंग होते ही सोयिस्कर गोष्ट विसरली गेली आहे.
चौथि-पाचवीमध्ये हे शिकवणं बरोबर आहे/नाही हे सोडा. मुदलात तीस्ता सेटलवाड यांच काय क्वालिफिकेशन आहे इतिहास संशोधनामध्ये/शिक्षणामध्ये की त्यांनी पुस्त़कं लिहावीत हा मूळ प्रश्न आहे. आपल्या बगल्बच्च्यांना पुस्त़कं लिहिण्याचं काम देणं हे जर लिबरल सरकार करत असेल तर आत्ताच्या सरकारमध्ये आणि लिबरल सरकारमध्ये काय फरक?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तपशीलात दडलेला सैतान
त्यांनी नक्की कोणती पाठ्यपुस्तकं लिहिली होती अन् कुणासाठी हे तपशील मला माहीत नाहीत. त्यामुळे त्यावर काही म्हणता येणार नाही. पण गूगल केलं तर 'सेक्युलर' सरकारांच्या पाठ्यपुस्तकांवर टीका करणारं तीस्ता ह्यांचं हे लिखाण सापडलं. हा लेख २००१चा दिसतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
लेख वाचला. भक्त लोकांच्या
लेख वाचला. भक्त लोकांच्या ज्या आर्ग्य्मेंट्सना विचारवंत वॉटअबाउटरी म्हणून हिणवतात त्याच छापाचं वाटलं लिखाण. मुस्लिम लीग बद्दल लिहिलं तर हिंदू महासभेचं काय?? असं विचारलय.
असो, पुस्तकं लिहिण्यासाठी त्यांची क्वालिफिकेशन्स काय हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दृष्टीआड सृष्टी
मुद्दा असा आहे की बाई सेक्युलर सरकारांवरही टीका करतच होत्या, मात्र भक्तांना ते (कदाचित सोयीस्करपणे किंवा अज्ञाानापोटी) दिसत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अंहं
मुद्दा तो नाहीच. मुद्दा तीस्ता सेटलवाड या इतिहासाची पुस्तकं काय कॅपॅसिटीत लिहीत होत्या हा आहे. त्याकडे त्या तथाकथित फॅक्टचेकर ने सोयिस्कर दुर्लक्ष केलेलं आहे.
रच्याकने, सेक्युलर NCERTने देखील यांच्या पुस्तकावर टीका केली होती.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तीस्ता सेटलवाडांनी
तीस्ता सेटलवाडांनी पाठ्यपुस्तकं लिहिली आहेत हे ऐकून मलाही आश्चर्य वाटलं. कारण कुठलीच एक व्यक्ती सरकारी पाठ्यपुस्तकं लिहू शकत नाही. म्हणून नेटवर इकडेतिकडे उचकापाचक केली. खोज नावाची एक न-सरकारी संघटना आहे, ती बहुधा त्यांची आहे. खोजतर्फे सेटलवाड यांनी शालेय मुलामुलींसाठी लिहिलेली पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. इराणींच्या भाषणात आलेला आलेला संदर्भ या पुस्तकांचा असावा, असं वाटतं. ही संस्था शाळाशाळांत जाऊन काही उपक्रम करत असावी, त्यांची पुस्तकं काही शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाचायला दिली असावीत असा माझा अंदाज आहे.
सहमत
माझाही हाच अंदाज आहे. मात्र, तीस्ताबाईंचं नाव घेताच लोक ज्या प्रमाणात एक्साईट झाले आणि जी विचहंट चालू केली ती पाहता नक्की कुणासाठी ही पुस्तकं लिहिली गेली, आणि कुणी ती वापरली वगैरे तपशील शोधण्यात आणि तोवर संयत प्रतिक्रिया देण्यात कुणालाच रस दिसला नाही. तीस्ताबाईंचं नाव घेऊन सनसनाटी साधण्याचाच स्मृती इराणींचा हेतू असावा आणि लोक आपल्या वर्तनातून तो सिद्ध करत असावेत असंच चित्र त्यामुळे उभं राहतं आहे. सार्वजनिक संभाषित किती उथळ झालं आहे ह्याचा अंदाज यायला टीव्ही पाहायची अजिबात गरज नाही; ऐसीवरही त्याचं प्रतिबिंब दिसतं; ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय त्या निमित्तानं आला. असो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्हीच दिलेल्या फॅक्ट चेकर
तुम्हीच दिलेल्या फॅक्ट चेकर मधून उधृत
यावरून तरी ती ऑफिशिअल पुस्तकं असावीत असा कयास बांधता येतो.
विरोधी मताला उथळ म्हणणं चालू द्या.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
गंमत
उद्धृतात पुस्तकांच्या अधिकृततेविषयी काही भाष्य नाही. इराणीबाईंच्या मुद्द्यात फार अर्थ नाही एवढंच म्हटलं आहे. ती नक्की कोणती पुस्तकं हे त्यातून कळत नाही. मूळ ले़खात तीस्ताबाईंचं हे विधान सापडलं -
मिशनरी शाळेत पुस्तकं केंद्राची असू शकतात, राज्याची असू शकतात आणि खाजगीही असू शकतात. डॉन बॉस्को नावाच्या एकाहून अधिक शाळा मुंबईतच आहेत. कोणती शाळा, कोणता अभ्यासक्रम, कोणतं क्रमिक पुस्तक ह्याविषयी काहीही तपशील माहीत नसता पुस्तकांच्या अधिकृततेबद्दल बातमीतून काय निष्कर्ष काढता येईल ते मला माहीत नाही. बाकी विचहंट चालू द्या.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आमच्या शाळेत जम्माडी जंमत
आता त्या पाठ्यपुस्तकांबद्दल ही बातमी आली आहे -
Stopped using controversial textbook long time ago, clarifies Don Bosco school to Smriti Irani
बातमीतून उद्धृत -
स्मृतीताई पुरेश्या माहितीअभावी संसदेत बोलतात, की मुद्दामहून खोटं बोलतात हा मुद्दा वेगळाच, पण ह्यावरून आपल्याबद्दल अनेक मुद्दे उपस्थित होतात. इथे मी पुन्हा पुन्हा सांगत होतो की पुरेश्या माहितीअभावी काही नक्की सांगणं अवघड आहे, पण स्वतःला सुशिक्षित, सुजाण वगैरे म्हणवून घेणारे आणि आपण पूर्वग्रहदूषित नाहीत असं मानणारे अनेक लोक तीस्ताबाईंचं नाव वाचताच खवळले. पुस्तकं अधिकृतच असणार, यूपीए सरकारसाठीच तीस्ताबाईंनी लिहिलेली असणार वगैरे इमले बांधून लोक शाब्दिक हाणामारी करायला सुसज्ज झाले. 'हे सर्व कोठून येते?' हा विजय तेंडुलकरांना पूर्वी पडलेला प्रश्न मग मला पडू लागतो. इथले काही जण तरी हे वाचून अंतर्मुख होतील अशी आशा करतो. कारण आशेशिवाय माझ्या हातात आता काही नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मान्य. मी घाई केली.
मान्य. मी घाई केली.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बघा चिंज ० काहीतरी शिका
बघा चिंज ० काहीतरी शिका ढेरेशास्त्रींकडुन. त्यांनी कसे लगेच मान्य केले काही चुकले असले तर.
ऑफिशियल पुस्तक नाही
http://indianexpress.com/article/india/india-news-india/don-bosco-refute...
आणखी थोडे
थोडक्यात विद्यार्थ्यांसाठी नवनीत गाईड किंवा प्रगती पुस्तकमाला असे असते त्या स्वरुपाचे शिक्षकांसाठी हे एक गाईड होते असे दिसते. - ज्याचा वापर २००१ मध्येच बंद केला आहे.
बघ्यांसाठी
इराणीबाईंचा संसदेतला आणखी एक दावा प्रश्नांकित केला जात आहे -
Smriti Irani's Comments Disputed By Doctor Who Declared Rohith Vemula Dead
रोहित वेमुला आत्महत्येविषयीच्या त्यांच्या पूर्वीच्या दाव्यांवर शंका उपस्थित झाल्या होत्याच -
Rohith Vemula's Suicide: Smriti Irani Is Lying, Say SC/ST Professors At Hyderabad University
एकंदरीत, खूप गंमत आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
स्मृतीताईंचा खोटारडेपणा
आता खुद्द रोहित वेमुलाची आईच म्हणते आहे की इराणीबाई खोटं बोलतात -
Rohith Vemula’s mother has a request for Smriti Irani: Stop spreading lies
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
@ स्मृती इराणी --- 'बाई मर्द आहे' - श्रेयअव्हेर पु. ल.
एक गंमतीशीर ट्विट वाचलं.
" काल स्मृती इराणी बाईंनी संसदेत जे केलं तसा ट्रेंड बनला तर सचिन तेंडुलकरला आज संसदेत क्रिकेट खेळुन दाखवायला लागेल"
कपिल शर्मा, मंत्री दिल्ली सरकार
स्मृती इराणी राजीनामा दया !!!
स्मृती इराणी राजीनामा दया !!!
स्मृति इराणींच्या भाषणानंतर त्याची केलेली चिकित्सा. लेखक मिलिंद धुमाळ. एक मुद्दा कैच्याकै आहे पण तो गौण आहे. पण कठोर चिकित्सा करण्याचा यत्न.
-----
अबकी बार कंडोम गिनने वाली सरकार
भाजपाच्या आमदाराला एक ते तीन हजार आकडे मोजता येतात याचा दुसरा पुरावा आहे का ? (हा ओरिजिनल कणेकरांचा डायलॉग आहे. मी फक्त चोरून थोडा ट्विस्ट केलाय.)
-----
अमेरिकन खासदार (राष्ट्राध्यक्षपदाचे माजी उमेदवार) John McCain म्हणतात की पाकिस्तानला एफ-१६ जातीची विमानं विकण्याचा निर्णय भारत-अमेरिका संबंधांना बाधक आहे.
भारत अमेरिका संबंध हे चीन वर वचक ठेवण्यासाठी आहेत असे संकेत दिसतात.
------
Does chocolate make you smarter?
चॉकलेट खाण्याचा व्यक्तीच्या कॉग्नीटिव्ह अॅबिलिटिज बरोबर असलेला संबंध. वारंवार चॉकलेट खाणार्यांचा स्मार्टनेस वाढतो किंवा कसे ? ९६८ लोकांचा सर्व्हे केला गेला ज्यांची वयं २३ ते ९८ या रेंज मधे आहेत.
माझं खरंच मनावर घेऊन अलीकडे
माझं खरंच मनावर घेऊन अलीकडे मराठीतून लिहिता, त्याबद्दल आभार.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
.
>>भारत अमेरिका संबंध हे चीन वर वचक ठेवण्यासाठी आहेत असे संकेत दिसतात.
कै च्या कै. ते संबंध आपले पंतप्रधान आणि बराक यांच्या वैयक्तिक मैत्रीचा परिपाक आहेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नाय नाय. त्यांचं वाक्य तसं
नाय नाय. त्यांचं वाक्य तसं सूचित करतं असं मला म्हणायचंय. भारत हा अलिप्त पणाकडे झुकलेला आहे हे बरंचसं स्पष्ट आहे.
धुमाळेंच्या पोस्टला प्रतिसाद
मिलिंद धुमाळे हे फेबुवरील पॉप्युलर लेखक आहेत.
त्यांचे लिखाण वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्ध होताना दिसते. जबरदस्त उर्जा आहे. पण बहुतेक सगळी उर्जा एकांगी लिहिण्यात खर्च होताना दिसते. ते जेव्हा केव्हा विविध मुद्द्यांच्या दोन्ही बाजू पडताळून लिहायला लागतील तो सुदिन ठरेल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा.
आताही मंत्री स्मृती इराणी यांच्या लोकसभेतील परवाच्या भाषणावरून त्यांनी एक पोस्ट लिहून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पोस्टच्या शेवटी त्यांचीच आणखी एक ताजी पोस्ट दिली आहे. मी जे म्हणतोय त्याचा ती पोस्टही आणखी एक उत्तम नमूना ठरावा.
प्रभावित झालेले लोक भाबडे नाहीत, त्यांनी मुद्दे समजून घेऊनच त्यांचे कौतुक केलेले आहे. पण काही जणांना भलतेच मुद्दे काढण्याची सवय आहे, ते काही तरी खुसपट काढत राहणार. प्रश्न हा नाही की इराणी यांच्या उत्तरात काही चुका होत्या का, प्रश्न असा अहे की अशी खुसपटे काढणा-यांना त्यांच्या भाषणात काहीच तथ्य सापडले नाही का? त्यामुळे अशी एकांगी टीका करणा-यांची खोडसाळ वृत्ती ओळखायला हवी.
आवेशपूर्ण भांडणात स्त्री अधिक खुलते म्हणजे काय? पुरूष काय आवेशपूर्ण भाषणात खुलत नाही काय? चला ते सोडून देउ.
इराणी यांनी भाषणामध्ये गद्दारांच्या उद्योगांबद्दल सांगताना त्या चाणक्याचे वचन उद्धृत केले असते तर त्यांच्यावर भगवेपणाचा आरोप झाला असता असे म्हटले. त्यामुळे त्यांनी चिसेरो (नक्की उच्चार माहित नाही)चे वचन सांगिलते. धुमाळेंचा हा आक्षेपही तसाच आहे. त्यांनी पत्रव्यवहाराच्या निमित्ताने हिंदूचे नाव घेतले असते, तर धुमाळेंनी तो दलित होता का हे कशावरून विचारले नसते? इतर धर्मियांचे काय असे कशावरून विचारले नसते? त्यामुळे का मुस्लिमाचेच नाव सांगावेसे वाटले हे दुर्दैव म्हणावे की त्यांनी खरोखर तशी मदत केली असेल, तर तो मुस्लिम आहे म्हणून नाही, तर त्या खोटेतरी बोलत नाही ना, हे तपासून पहाणे योग्य? तेव्हा इराणींचे म्हणणे नव्हे, धुमाळेंचा दृष्टिकोन दुर्दैवी आहे.
आता मॅडमनी त्या पारशाशी लग्न करू का असे धुमाळेंना विचारायला हवे होते का? कोणत्याही इतर धर्मियाशी लग्न करणे हे आव्हानच असते ना? एखाद्या उच्चशिक्षित मुस्लिमाशी किंवा दलिताशी लग्न केले तर अन्याय-अत्याचार होतोच असे असते का? अगदी शहरातल्या सवर्ण हिंदूने खेड्यातल्या सवर्ण जातीतल्या कोणाशी लग्न केले तरी ते आव्हानात्मकच असते की नाही? तेव्हा त्यांनी काहीही म्हटले तरी धुमाळेंनी त्यात खुसपट काढायचे असे दिसते. बरे, वाकडे लावण्याचा प्रकार पाहता इराणींनी दलिताशी लग्न केले असते तरी धुमाळे ‘त्यांना त्याची जाहिरात करावीशी वाटते हे निषेधार्ह आहे’ असे म्हणाले नसते कशावरून?
असे आहे, की तेथे रोहित वेमुलाने आत्महत्या केली म्हणून धुमाळेंना राग आहे. आज तो जिवंत असता आणि जो काही अन्याय होतो असा तक्रारी होत्या ते सहन करत असता तर जणू धुमाळेंची त्याला हरकत नसती. कारण एरवी २०१२मध्येच प्रत्येक केन्द्रिय विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होऊ नये म्हणून अँटिडिस्क्रिमिनेटरी अधिकारी नेमण्याचे ठरले होते. त्याचे पुढे काही झाले का? तेव्हा तर काही इराणींचे सरकार नव्हते. तेव्हा खरे तर धुमाळेंना राग कशाबद्दल हवा?
रोहितची हत्या होते, असे म्हणणे हा त्यांचा आणखी एक खोडसाळपणा. त्यांचा असा आक्रस्ताळेपणा आधीही दाखवला आहे. मुळात निलंबित झालेल्या विद्यार्थ्याबद्दल काय करता येईल याबद्दल संघटनेच्या विद्यार्थ्यांची बैठक चालू असताना रोहित कोणालाही काही न सांगता तेथून निघून जातो, हे कोणाच्याच लक्षात येत नाही, निलंबित झाल्यामुळे त्याला वसतीगृहात जाण्यास परवानगी नसतानाही त्याला मित्राच्या खोलीत गुपचूप जाता येणे, व नंतर तो फासावर सापडणे, या घटनाक्रमाबद्दल कोणी बोलताना दिसते का? त्या बैठकीत असे काय झाले, की त्याला तेथून जाऊन असे करावसे पाटले? यावर आजवर कोणी प्रकाश टाकलेला आहे काय? अभाविपने या विद्यार्थ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकला होता असे म्हणण्याचा खोडसाळपणाही झाला होता.
उदाहरण म्हणून सांगतो, आता जेएनयुमध्येही आरोप असलेल्यांपैकी एकजण दलित आहे असे कळते. मी कोणाची जात शोधत बसत नाही. बरखा दत्तसमोर त्याने स्वत:च सांगितले. तो अजून पोलिसांच्या हवाली झालेला नाही, पण आम्ही पोलिसांना आमचे फोन नंबर देऊन पूर्ण सहकार्याची हमी दिल्याचे सांगत आहे. आता या सा-याचे टेंशन येऊन त्याने जीवाचे बरेवाईट करू नये म्हणून सर्वांनी प्रार्थना करायला हवी व पुरेशी काळजी घ्यायला हवी. अन्यथा पुन्हा हे त्यावरून त्याच्या दलित असण्याचे भांडवल करायला तयार.
आत्महत्या विविध प्रकारांनी होतात. अगदी आईवडील रागावले म्हणून ते इतर कोणत्याही कारणाचा विचार करा. शेतक-यांच्या आत्महत्यांवरून निव्वळ राजकारणच होताना दिसते की नाही? त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतो का? तसेच दलितांच्या आत्महत्यांच्या बाबतीतही तसेच होताना दिसते की नाही? शेतक-यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत केवळ परंपरागत म्हणजे अकार्यक्षम पद्धतीनेच शेती करणे किंवा करावी लागणे हाही एक प्रश्न आहे की नाही? त्याचप्रमाणे दलितांना शिक्षणाच्या बाबतीतच काय पण मुळात शहरांच्या मोठ्या परीघात आल्यानंतर जे बुजायला होते, ते दलित म्हणून असते की त्या वातावरणाची सवय नसण्यामुळे होते? अशा समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठातच काय, कॉलेजमध्येही एक समुपदेशक नेमला पाहिजे असे मी मागे अनेकवेळा सुचवले आहे.
बिहार-उप्रमध्ये कित्येक ठिकाणी तर सवर्ण, दलित, मुस्लिम यांची वेगवेगळी हॉस्टेल्स असतात, त्यांच्या मेस वेगवेगळ्या असतात. हे मोडून काढण्यासाठी काही आंदोलन होताना दिसते का? अगदी मायावतींचे सरकार तेथे येऊनही हे प्रकार बंद झालेले आहेत का? परंतु कोणी आत्महत्या केली की त्यामुळे उद्वेग करणारे हे महाभाग आहेत. हा निव्वळ निवडक संवेदनशीलतेचा (selective sensitivity) प्रकार आहे.
आज मिळालेल्या तपशीलाप्रमाणे झिलारूल्ला नावाच्या विद्यार्थ्याने कळवल्यानंतर पाचेक मिनिटांमध्ये म्हणजे संध्याकाळी साडेसात वाजता विद्यापीठातील डॉक्टर तेथे पोहोचल्या. तोपर्यंत मुलांनी वेमुलाचा देह खाली काढून खोलीतील कॉटवर ठेवलेला होता. त्यांनी त्याची तपासणी केली, व काहीही उपाय करणे शक्य नसल्यामुळे मृत घोषित केले. त्यानंतर काही काळानंतर पोलिस तेथे पोहोचले. डॉक्टरांनी पोलिसांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंततरी मृतदेह तेथेच होता असे त्या म्हणाल्या. कारण त्यानंतर त्या तेथून निघून गेल्या, त्यानंतर काय झाले हे त्यांना माहित नाही असे त्या म्हणाल्या. त्या असेही म्हणाल्या की त्या तेथे पोहोचण्याच्या अंदाजे दोन तास आधीच ही घटना घडून गेली होती, त्यामुळे जीव वाचवण्याच्यादृष्टीने काही करणे शक्य नव्हते. त्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर साधारण पाऊण तासांनी पोलिस तेथे पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
धुमाळेंच्या म्हणण्याप्रमाणे तेलंगणचे खासदार म्हणतात की मृतदेह खाली उतरवू दिला नव्हता, जमाव प्रक्षुब्ध होता, डॉकटर म्हणाल्या की तेथे कसलाही गोंधळ नव्हता, विद्यार्थ्यांनी त्यांना थेट त्या खोलीत नेले व मृतदेह खाली उतरवून ठेवला होता. तेव्हा डॉक्टरांच्या व खासदारांच्या विधानांमध्ये विसंगती दिसते का? कोणाचे विधान खरे मानायचे? मंत्री म्हणतात की त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला, पण ते दुस-या कामात असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर आजतागायत त्यांचा फोन आलेला नाही. तेव्हा कोणाचे म्हणणे खरे मानायचे हे तुम्ही ठरवा.
भाजप किंवा अभाविपच्याच लोकांनी त्याला म्हणजे रोहितला त्याच्या मित्राच्या खोलीत मारले असा संशय आहे का? तसे असेल तर थेट आरोप करा की. माझ्या मृत्युसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे त्याने लिहिलेले आहे हे तर वास्तव आहे की नाही? कोणालाच जबाबदार धरले नाही म्हणून ते प्रकरण सोडून दिले आहे का? त्या प्रकरणाची चौकशी चालू आहे, याचेही भान नाही का?
पोलिसांनी अंत्यसंस्कार बळजबरीने कसे उरकले असे धुमाळे विचारतात. आता, हे पोलिस तेलंगण सरकारचे होते की केन्द्र सरकारचे? ज्या तेलंगणच्या खासदारांचा ते उल्लेख करतात की त्यांचे सहकारी रोहितच्या खोलीत पोहोचले होते, त्यांनाच हे का विचारले जात नाही, की तेव्हा घाई का केली, घरच्यांनाही का भेटू दिले नाही? हे प्रश्न मंत्र्यांना विचारणे योग्य आहे का?
इराणींचा फिल्मी डायलॉग का? प्रत्येक गोष्टीकडे दलित चष्म्यातून पाहणा-या व त्यातूनही दलितांचे फार कल्याण न करणा-या मायावतींनी राज्यसभेत चालवलेले उद्योग पाहिले का? चर्चा चालू असताना प्रत्येक वक्त्याच्या प्रश्नाला तिथल्या तिथे मंत्री उत्तर देत नाहीत, ही पद्धत आहे. तरीही मायावती यांनी आताच उत्तर हवे असा आग्रह धरला. रोहित व जेएनयु या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनीच केली होती. तरीही त्या वेळ घालवत राहिल्या. मंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगूनही त्या तसे करत राहिल्या. ज्युडिशियल चौकशीतही कोणी दलित असलाच पाहिजे हा आग्रह योग्य आहे का व मायावतींना अपेक्षित असलेलाच दलित तेथे असण्याचा आग्रह योग्य आहे का असेही इराणी यांनी विचारले. हे धुमाळेंना दिसले का? मुळात मायावतींना तळागाळातल्या दलितांचे खरे हित साधायचे आहे अशी धुमाळेंची समजुत आहे का?
इयत्ता चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांना कॉग्रेसच्या राजवटीत काय शिकवले जात होते, याची इराणींनी दिलेली उदाहरणे धुमाळेंना मान्य आहेत का? की त्यापेक्षा रामायण-महाभारत शिकवणे बरे? अर्थात त्यांचा त्याला आक्षेप असेल तरी हा अगदी अलीकडचा नियम आहे, त्याला विरोध करता येईलच की. शिवाय मंत्री भगवेकरणाबद्दल जे म्हणाल्या ते विद्यापीठांबद्दल. की भगवेकरणाबद्दल कोणाचा काही आक्षेप असेल तर या कुलगुरूंना विचारा म्हणून. सगळ्या केंद्रीय विद्यापिठाचे कुलगुरू रास्व संघाचे आहेत असे खोटे विधान पप्पूने केल्याचेही त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की वीस कुलगुरू असे आहेत की ते आधीच्या सरकारने नेमलेले होते. थोडे विषयांतर, पण याच कुलगुरूंनी मोठा राष्ट्रध्वज व तोही उंचावर फडकवण्यास मान्यता दिली. मी म्हटले तसे रामायण-महाभारताबद्दल तुम्हाला आक्षेप असेल तर जरूर विचारा.
आज अरूण जेटलींनीदेखील एक प्रश्न विचारला की तुम्ही फोटो लावणार (म्हणजे संघटनेला नाव घेणार) डॉ. आंबेडकरांचा आणि कामे करणार याकूब मेमनच्या फाशीच्या विरोधाची. हे चालते का? हाच प्रश्न जेएनयुच्या संदर्भातही विचारला.
आज गुलाब नबी आझाद यांच्या संसदेतील बोलण्यातही आले की रोहित त्याच्या मित्रांच्या खोलीत थेसिससंबंधी काम करण्यासाठी जात असे, त्याप्रमाणे तो गेला होता आणि त्यानंतर आत्महत्या केली. आजवर जे सांगितले जात होते की निलंबित केल्यावर त्याला होस्टेलवर जायला बंदी होती. तरीही मग तो मित्रांच्या खोलीवर कसा जात असे? याला जोडून त्याच्यावर व निलंबित केलेल्या विद्यार्थ्यावर अभावपने सामाजिक बहिष्कार घातला होता असाही आरोप होता. त्यांच्यामागे सतत अभाविपचे विद्यार्थी असत. तरीही तो निलंबित झाल्यावर मित्राच्या खोलीवर थेसिसच्या कामासाठी जाऊ शकत होता? तेव्हा सामाजिक बहिष्कार घातल्याचा कांगावाच होता की नाही?
शिवाय निलंबित झालेल्या विद्यार्थ्यासाठी एक बैठक आयोजित केली होती, रोहितही त्यात सहभागी होता. तो चार वाजण्याच्या सुमारास या बैठकीतून अचानक निघून गेला व त्यानंतर हे उघडकीस आले. हे आधीपासून सांगितले जात होते. मात्र आता वेगळा सिक्वेन्स सांगण्यात आझाद यांचाही काही अंतस्थ हेतु आहे, असे म्हणायचे का?
त्याच्या आईवडलांनाही त्याचे अंत्यदर्शन घेता आले नाही याबद्दलचा भाग वर आलेलाच आहे. पण आज डॉ. राजश्री यांच्या बोलण्यात आले की रोहितच्या देहाची तपासणी केल्यानंतर त्यांना रात्रीच पुन्हा बोलवण्यात आले, कशासाठी, तर रोहितच्या आईची तब्येत ठीक नसल्याचे त्यांना कळवले गेले म्हणून. तेव्हा त्यांना त्याचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते हेही खरे आहे का? त्याचे पोस्टमॉर्टेमही करण्यात आले असे रोहितचा त्याच्याबरोबर निलंबित झालेला मित्र प्रशांत टीव्हीवर सांगत आहे. याआधी पोस्टमॉर्टेम न करताच घाइघाईत त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले असे सांगण्यात आले होते.
आझाद यांनी जो घटनाक्रम सांगितला. त्यातला एक भाग रोहितने कुलगुरूंना लिहिलेल्या पत्राचा होता. त्यात त्याने लिहिले की विद्यापीठात प्रवेश घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला विषाची बाटली किंवा फास घेण्यासाठी दोरखंड दिला जावा. हे विचारायला हवे की विद्यापीठात जितके दलित विद्यार्थी आहेत, त्या सर्वांनाच त्रास होता असे काही पुढे आले आहे का? रोहित व त्याच्या संघटनेने याकूबच्या फाशीविरूद्ध आंदोलन केले, पोस्टर्स लावली. जरी त्यांच्या संघटनेचे नाव आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन होते, पण वर म्हटल्याप्रमाणे हे उद्योग आंबेडकरांच्या नावावर खपवण्यासारखे आहेत का? हे विद्यार्थ्यांनी करण्याचे उद्योग म्हणून त्याचे समर्थन करता येते का? यांचे उद्योग राजकीय स्वरूपाचे होते. त्यावरून त्याला राजकीय विरोध झाला, तर मात्र विद्यापीठातल्या सगळ्या दलित विद्यार्थ्यांच्या नावाने गळा काढायचा. हे योग्य आहे का? तरीही आझाद म्हणाले की त्याच्या सुइसाइड नोटमध्ये जरी त्याने कोणाला दोष दिलेला नसला तरी कुलगुरुंना लिहिलेले हे पत्रच त्याच्यावर अन्याय कोण करत होते याचा पुरावा समजावे. ते पत्र लिहिले होते कुलगुरूंना उद्देशून व त्यात चीफ वॉर्डनचाही उल्लेख होता. अाता हे चीफ वॉर्डन प्राध्यापक आहेत व ते दलित आहेत. तेव्हा हे पत्र म्हणजे रोहित व निलंबित झालेल्या त्याच्या संघटनेच्या मित्रांचा कांगावाच समजले पाहिजे.
आत्महत्येच्या कारणांपैकी एक कारण सांगितले गेले होते की निलंबित केलेल्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती काही महिन्यांपासून थकवलेली होती. त्यावरून निलंबित केलेल्या या दलितांचा छळ करायचा म्हणूनच सरकारने मुद्दाम त्यांच्या पोटावर पाय देण्याचे हिणकस कृत्य केले असा आरोप केला गेला. यामागचे वास्तव असे होते की युजीसीकडून ही जी शिष्यवृत्ती दिली जाते त्याच्या पद्धतीत काही बदल झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची काही महिन्यांची शिष्यवृत्ती थकली होती व ती काही काळानंतर एकरकमी परत दिली जाणार हे मागेच इंडियन क्सप्रेसमध्ये आली होती तरीही असा बेजबाबदारपणे केलेला हा आरोप हा त्यावरून केलेल्या राजकारणाचाच भाग होता. आता त्याबद्दल कोणी बोलतही नाही, पण अनेकांनी असे आरोप करून आपले हात धुवून घेतले.
शिवाय विद्यापीठातले सगळेच दलित विद्यार्थी यांच्या संघटनेचे सदस्य तरी आहेत का व दलित विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी व प्रगतीसाठी जे करायला हवे ते सोडून याकुब मेमनसारख्या दहशतवाद्याच्या फाशीशी संबंधित उद्योग करायचे हे या सगळ्या दलित विद्यार्थ्यांना मान्य आहे का? विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलने करण्याचा हक्क हवाच असा आग्रह धरला जातो, पण त्यात असे विषयही असले पाहिजेत हे योग्य वाटते का? तेव्हा हा या संघटनेच्या पदाधिका-यांचा बेजबाबदारपणा आहे हे मान्य करणे जाऊ दे, तसा सूर तरी आपल्याला यांच्याकडून आजवर ऐकू आला का हो?
तुम्हाला हे सरकार आवडत नसेल, मंत्री आवडत नसतील, सगळे समजू शकतो. पण एखाद्या प्रकरणावरून कांगावा केला नाही तर सत्यस्थिती समोर येईल. यात दलितांचे हित पाहण्याचा हेतु तर दिसतच नाही. एकच प्रश्न. लोकसभेतील दीर्घ चर्चेवर मंत्र्यानी दीर्घ उत्तर दिले. त्यातला एकही मुद्दा धुमाळेंना आवडलेला किंवा पटलेला दिसतो का त्यांच्या या पोस्टवरून. तर अशी एकांगी पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन ते करत आहेत.
असो.
++++++++++++++++++++++
आताच धुमाळे यांची ताजी पोस्ट पाहण्यात आली. ती खाली दिली आहे. खोडसाळपणाला अंत नाही. आता त्यांना न्यायव्यवस्थेबद्दलही आक्षेप आहे. कमाल आहे.
कन्हैयाकुमारला आधी पकडले. त्यानंतर दोघेजण आता पकडलेत. त्यतल्या एकाने व त्याच्या वडलांनी तो फरार असताना त्याच्या मुस्लिम असल्याचे भांडवल करून पाहिले. अखेर उच्च न्यायालयाने खमकेपणा दाखवत पोलिसांसमोर हजर होण्याचा आदेश दिल्यावर त्याने तसे केले. आणखी तिघे अजूनही जेएनयुमध्येच आहेत. आम्ही पोलिसांकडे जाणार नाही पण त्यांना चौकशीत सहकार्य करू अशी अजब भूमिका त्यांनी घेतली आहे व त्याबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही. उमर यानेही काही अटी घालण्याचा प्रयत्न केला होता. पण उच्च न्यायालयाने खवपून घेतले नव्हते.
कन्हैया सोडून इतर पाचजण पळून गेले नसते तर आणि तेव्हा त्यांच्याविरूद्ध सरकारकडे फक्त तो 'डॉक्टर्ड' व्हिडियो असता, तर ते एव्हाना जामीनावर का होईना, सुटलेही असते की नाही? आधी कन्हेेैयाच्या जामीनाला विरोध करणार नाही असे म्हणणारे दिल्ली पोलिसही आता त्यांच्याकडे आणखी पुरावे असल्याचे सांगत आहेत.
आजच तो उमर खलिद प्रत्यक्ष देशविरोधी घोषणा देण्यात सहभागी होता असे दाखवणारा व्हिडियो पुढे अाला आहे. काल हाच उमर खलिद नागपूरमध्ये नक्षलवाद्यांच्या संपर्कात असलेला दाखवणारा व्हिडियोही पुढे आला आहे. कन्हैया व हा उमर दोघेही जेएनयुचे, दोघेही कम्युनिस्ट. एकाच प्रकरणात पकडलेले. या सर्व गोष्टींचा यांच्या जामीनावर परिणाम होणार की नाही?
तरीही न्यायव्यवस्थेबद्दल संशय नाही म्हणत ती चालवणा-यांबद्दल शंका घ्यायची याला काय म्हणावे? ही न्यायव्यवस्था कोण चालवतो असे विचारणे म्हणजे धुमाळे ज्या सरकारच्या विरोधात आहेत, ते सरकारच ही न्यायव्यवस्था चालवते असे सुचवण्यासारखे अाहे का?
अशा एकांगी पोस्ट्सनी ते काय मिळवत आहेत कोणास ठाऊक. त्यांची पोस्ट.
"बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार भेटायचा होता न्यायालयात त्याविरोधात याचिका केली गेली.तिची सुनावणी ताबडतोब एक दिवस आधी घेतली,
निर्णय दिला गेला.पुरस्कार सुद्धा दिला.
याकुबला फाशी देण्यासाठी अर्ध्या रात्री कोर्ट उघडले जाते,
सगळ्यांनी न्यायालयाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले.
याकुबच्या फाशीची शिक्षा कायम ठेवून सकाळी फाशी दिली जाते.
त्याबद्दल काही म्हणायचे नाही.
कन्हैयाच्या सुनावणीवर मात्र वारंवार चालढकल कशासाठी केली जात असावी?
हा खटला लांबावा असे कुणाला वाटत असावे? यात कुणाचा फायदा आहे?
न्यायालयावर संशय नाही परंतु हा विरोधाभास ठळक दिसतो त्याचे काय ?
हि न्यायव्यवस्था नक्की कोण चालवतो?"
https://www.facebook.com/bipin.kulkarni.52/posts/10154252385408352
खोडसाळीकृतं
राकुखोडसाळीकृतं जगत्सर्वं!
हा खोडसाळ, तो खोडसाळ.
राकुंच्या नजरेतून आंतरजालावर मराठीत लिहीणारे ते स्वतः सोडून कोण खोडसाळ नाही असा प्रश्न पडलाय!
दरम्यान
दरम्यान (रोहित वेमुला, जेएनयू, स्मृती इराणींचा भाषणड्रामा वगैरे सुरू असताना)
राष्ट्रवादीच्या वाटेने भाजपचे ‘सिंचन’
पाच वर्षं मिळालंच आहे तर लवकर काम सुरू केलेलं बरं असं असेल का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इतर धुराळ्यात ही महत्वाची
इतर धुराळ्यात ही महत्वाची बातमी मिअस होऊ नये.
http://www.livemint.com/Politics/DjHGLceLzgEwrNcomMJ6IN/UPA-govt-deleted...
एखाद्या अतिरेक्याचा आणि IBचा आधीच्या सरकारने राजकीय फायद्यासाठी वापर कसा केला हे माही गृह सचिव सांगतायत. माजी सुरक्षा सल्लागारांनी हेच सांगितलय.
याच विषयावरचा हा लेख वाचानीय आहे.
http://www.sundayguardianlive.com/news/3423-manmohan-ministers-tried-imp...
याला देशद्रोही नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कुठे आणि कोणाला विचारताय
कुठे आणि कोणाला विचारताय तुम्ही ढेरे शास्त्री?
राजेश कुलकर्णी आणि राजेश घासकडवी यांस नम्र विनंती !
राजेश कुलकर्णी आणि राजेश घासकडवी यांस नम्र विनंती की कोणीतरी आपला आयडी (कमीतकमी प्रथम नाम) बदलून इथे लिहा. वर कुलकर्णींचा मोठा प्रतिसाद वाचला. क्षणभर आडनाव विसरल्यामुळे रा.घा. एकदम विरुद्ध पार्टीत कसे असा विचार आला. परत वर जाऊन प्रतिसादकर्त्याचे नाव वाचले तेव्हा डोक्यात उजेड पडला. दोन्ही व्यक्तींचे आडनाव पुर्णपणे वेगळे, विचारसरणी पुर्णपणे वेगळ्या तरीही केवळ पहिल्या नावाने माझ्यासारख्या वाचकाच्या मनात उडणारा गोंधळ. हे माझ्याच बाबतीत होतेय की इतर कुणाचा देखील असा गोंधळ होतो काय ?
बहुतेक जालीय संन्यास घ्यायची वेळ झालीय आता.
नावामुळे किती घोळ होतो पहा.
नावामुळे किती घोळ होतो पहा. येथे कोणी लिहिले अाहे हे दिसायची सोय नसती तर लोकांनी निष्पक्ष होऊन वाचले असते, दोन्ही बाजू समजून घेतल्या असत्या. नावामुळे घोळ होतात ते खरे
आपल्या नावाव्यतिरिक्त वेगळा
आपल्या नावाव्यतिरिक्त वेगळा आयडी घेणे ही एक बारीकशी सोय उपलब्ध आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
Plan to largely privatize
Plan to largely privatize PSLV operations by 2020: Isro chief
२०२० पर्यंत पीएसएल्व्ही विभागाचे खाजगीकरण करणार - इस्रो चे अध्यक्ष किरण कुमार यांचा इरादा.
http://www.nydailynews.com/li
http://www.nydailynews.com/life-style/health/cleveland-surgeons-perform-...
अमेरीकेतील पहीली गर्भाशयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
आमच्या ओळखीत एक मलगी होती जिला गर्भाशय नव्हते. अशा लोकांना उपयोग होऊ शकेल का?
चांगली बातमी.
चांगली बातमी.
या पहिल्या वाक्यात जितपत वैद्यकीय माहिती दिलेली आहे त्यातून मला दोन प्रश्न पडले -
१. ही मुलगी XX स्त्री आहे का XY?
२. गर्भाशय जन्मापासूनच नाही का पुरेसं वाढलेलं नाही?
शून्य वैद्यकीय शिक्षण असताना मला जर हे प्रश्न पडतात, तर अभ्यासकांना यापेक्षा बरेच जास्त प्रश्न पडू शकतात. थोडक्यात हा विषय बातमीत मांडला आहे त्यापेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचा असावा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
‘चाइल्ड पोर्नोग्राफी’वर बंदी
अशी लोकसत्तात बातमी आहे. आता मोर्चे काढायला पाहिजेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपले म्हणुन. ऐसी वरचे कोण कोण येणार?
?
Since child is not competent to enter a contract, child pornography is not an activity with mutual consent. Hence it can't be under freedom of expression (of the porn maker)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
"देन दे विल कम फॉर मी" अशी
"देन दे विल कम फॉर मी" अशी भिती कायम पसरवणार्यांना ह्या निर्णयात काही व्यक्ती स्वातंत्र्याला धोका नाही दिसला?
आज चाइल्ड पॉर्नो, उद्या अॅडल्ट पोर्नो वर बंदी आणतील, परवा सॉफ्टकोर वर आणि तेरवा माझ्या घरात सेक्स करायला मला बंदी घालतील. काय मुस्कटदाबी आहे.
---------------
हे लॉजिक जसे मूर्ख पणाचे आहे, तसेच सध्या चालू असलेले फियर माँगरींग मूर्ख पणाचे किंवा स्वार्थप्रेरित आहे.
हे दाखवण्यासाठी हे उदाहरण.
फिअर माँगरिंग
>>हे लॉजिक जसे मूर्ख पणाचे आहे, तसेच सध्या चालू असलेले फियर माँगरींग मूर्ख पणाचे किंवा स्वार्थप्रेरित आहे.
हे दाखवण्यासाठी हे उदाहरण.
पहा बुवा.....
पुढचे लक्ष्य टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस.
टाटांच्या देशभक्तीच्या खोट्या-खर्या कथांवर फेसबुकी देश(?)भक्तांचा निर्वाह चालतो. त्यांच्याच संस्थेला लक्ष्य करणार म्हणजे....
(बादवे टिस हे लक्ष्य आहे म्हणजे आमच्या घरापर्यंत पोचलं प्रकरण !! )
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
स्थानिक+पर्यावरण विरुद्ध WTO
The WTO Just Ruled Against India's Booming Solar Program
थोडक्यात -
भारतात आता साधारण ५००० मेगावॉट वीज सौर ऊर्जेतून बनते. हे प्रमाण सातत्याने वाढतं आहे. भारतात सौर पॅनल्स विकत घेताना स्थानिक मालाला झुकतं माप दिलं आहे. अमेरिकेने याविरोधात फिर्याद केली आणि WTO ने भारताविरोधात निकाल दिला. या निकालात पर्यावरणाची आम्ही कदर करत नाही, आमच्यासाठी जुने व्यापारी नियमच पवित्र, असा पवित्रा घेतला आहे. मात्र भारताविरोधात फिर्याद करणाऱ्या अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये स्थानिक माल, कच्च्या मालाला झुकतं माप दिलं जातं.
चला; राष्ट्रवादाला सध्या कार्पेटखाली सरकवून अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांच्याबद्दल विचार करू या -
१. भारत अमेरिकेच्या विरोधात कज्जा करू शकतो का?
२. भारत WTO च्या निर्णयाला राष्ट्रवाद किंवा काहीही नावाखाली 'अच्चं जालं तल' म्हणू शकतो का?
असं केल्यास पुढचे परिणाम काय-काय होऊ शकतात? पर्यावरणवाद्यांकडे बाँब आणि विमानं नाहीत; ते फार लोकांना नोकऱ्याही देत नाहीत. त्यामुळे त्यांची ताकद अतिमर्यादित आहे. पण भारत चिक्कार मोठा आणि मोठा आवाज असणारा देश आहे. अर्थकारण आणि इच्छाशक्तीची ताकद बरीच जास्त असू शकते.
(ही बातमी छापणारं पत्र, हफिंग्टन पोस्ट, अमेरिकेतलं डावं वृत्तपत्र समजलं जातं. )
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हीच बातमी द्यायला इथे आलो
हीच बातमी द्यायला इथे आलो होतो.
ही चिंताजनक गोष्ट आहे. पुढच्या पाचसात वर्षांत १०० गिगावॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याचं आक्रमक आणि सर्वच दृष्टीने आदर्श ध्येय होतं. यातून जनतेचं भलं, पर्यावरणाचं भलं, आणि दूरगामी परिणाम पाहिले तर आर्थिकदृष्ट्या फायदाही आहे. भारतातच जर सौरपटलांची निर्मिती झाली तर त्यातून खेडोपाड्यांत वीज पोचायलाही मदत होईल. त्यात आता अडथळा यावा हे दुर्दैवी आहे. जर सरकारने राष्ट्रवादाची शक्ती जनसामान्यांना अमेरिकन वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रवृत्त करायला वापरली तर मला आवडेल. पण ते होईल की नाही याबद्दल प्रचंड शंका वाटते.
अमेरीकन वस्तू? अमेरीकेतही ,
अमेरीकन वस्तू? अमेरीकेतही , अमेरीकन वस्तू मिळत नाहीत, सगळा चायनाचा माल मिळतो. मला कळलं नाही नक्की कोणते प्रॉडक्टस तुम्हाला म्हणायचे आहेत ते. "मेड इन अमेरिका" की "इम्पोर्टेड फ्रॉम अमेरीका?". मला वाटतम इम्पोर्टेड असावेत.
उदाहरणार्थ
उदाहरणार्थ भारतीयांनी ठरवलं की नोकिया+मायक्रोसॉफ्टचे फोन घ्यायचे नाहीत; मायक्रोसॉफ्टकडून काहीही विकत घ्यायचं नाही (आहे तशी पायरसी चालू ठेवायची किंवा लिनक्स वापरायचं), अमेरिकन कंपन्यांनी बनवलेली सॉफ्टवर्स सोडून ओपन सोर्स किंवा भारतीय सॉफ्टवरं वापरायची ... अशी अधिकृत भूमिका भारत सरकारने घेतली किंवा डाव्या-उजव्या विचारांच्या संघटनांनी घेतली तर भक्तच काय, अभक्तही यात सहभागी होतील.
पर्यावरण आणि स्थानिकांना रोजगार या मुद्द्यांवर तथाकथित डावे टपलेले असतातच.
आण्खी माहिती इथे मिळेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
१. भारत अमेरिकेच्या विरोधात
WTO चा अभ्यास केला होता उसे भी एक अरसा गुजर गया. माझ्या आठवणीप्रमाणे:
1. भारत त्या कज्जाला उत्तर देऊ शकतो, पक्षी: इंटरव्हेन्शन करू शकतो.
2. WTO म्हणतं की ट्रेड आणि नॉन ट्रेड अडथळे आंतरराष्ट्रीय वाणिज्यात नकोत. जर भारत असं सिद्ध करू शकला, की आमचा स्वदेशीवाद हा वरील प्रकारचा अडथळा नाही, तर WTOचं तोंड बंद होईल.
WTO (किंवा IMF किंवा UN) ही पूर्णपणे "गोऱ्या साम्राज्यवादी हारामखोरांनी चालवलेली काँगी संस्था" नसते. ती तशी असू शकत नाही कारण सगळ्या सदस्य देशांना मताधिकार असतात. त्यामुळे त्यांची काही न्यूसन्स मूल्य आपोआप तयार होतात. दुर्बळ देशही सबळ देशाला फाट्यावर मारू शकतो. एक अर्जन्टिना आणि यूएसची काही मासेमारीवरची केस अंधुक आठवते आहे, त्यात यूएसला गप पडावं लागलं होतं. (वेळ झाला की हे उदाहरण नीट आठवून लिहीन.)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
सॅन फ्रान्सिस्को मध्ये ६०००
सॅन फ्रान्सिस्को मध्ये ६००० बेघर लोकांनी मोर्चा काढला आहे - श्रीमंतांनो , गरीबांवरचे अत्याचार थांबवा.
For years the homeless have been fixtures in neighborhoods across San Francisco, a jarring contrast to the tremendous wealth generated by the technology boom.
.
San Francisco offers free bus tickets out of the city to homeless people who are from out of town, checking first to make sure they have someone waiting for them at their destination. And over the past year, officials have sought to make some shelters more attractive by doing away with curfews, providing storage for belongings, allowing couples to sleep in the same bed and providing facilities for pets.
.
तज्ञांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत
प्रतिक्रिया अशा असतील (कंसात
प्रतिक्रिया अशा असतील (कंसात माझा रिस्पॉन्स) -
१) मोरल क्रायसिस फॉर द सिटी अॅडमिनिस्ट्रेशन - (मोरल क्रायसिस हा नेहमी विकसितांचाच, विकसितांमधेच असतो. जे मागे राहिले त्यांच्यात मोरल क्रायसिस असूच शकत नाही. मागे राहिलेले लोक एकदम मोरली उच्च, नीतीवान, प्रामाणिक, कष्टाळू, सच्चे, काईंडहार्टेड, निष्पाप, सरळमार्गी, नेमस्त असतात.)
२) वुई नीड मोअर कंपॅशन - (अगदी. खरंतर एक मोठी आर्मी उभी करायला हवी की जिचा उद्देश एकमेव असेल. कंपॅशन पुरवणे. मोफत. तुम्हाला कंपॅशन पायजे, ही घ्या. अजीर्ण होईपर्यंत कंपॅशन. )
३) वुई नीड अ प्लॅन दॅट वर्क्स - (प्लॅन सुरळीत काम करायला लागला की बेघरांची संख्या वाढण्याची सुतराम शक्यता नाही. प्लॅन सुरळीत काम करायला लागला की बेघरांची समस्या सुटलीच.)
अजुन एक बातमी . परत
अजुन एक बातमी . परत तज्ञांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत -
आधुनिक इकॉनॉमिस्ट थिअरी की पैशाचा शोध लागण्यापूर्वी जी बार्टर पद्धत होती ती थिअरीच चूकीची आहे म्हणे. काय तरी इकॉनॉमिस्ट मग यांना कसलं हुष्षार म्हणायचं?
अशी साधारण थिअरी आहे की - पैशाचा शोध लागण्यापूर्वी बेकर ब्रेड बनवे व त्याला मांस हवे असेल तेव्हा तो मांसविक्रेत्याला ते ब्रेडच्या बदल्यात देत असे.
पण असा शोध लागला आहे की ही थिअरी चूकीची आहे. काही पद्धती अस्तित्वात होत्या पण त्या एकदम रोचक होत्या.
उदा -
(१) पुरुष माणसं भरपूर धान्य/मांस वगैरे साहीत्य गोळा करुन एका जागी साठा करत व स्त्रिया , वाटपाचे काम पहात
(२) बेकरला जर मांस हवे असेल तर तो त्याच्या पत्नीस तसे सुचवे. मग पत्नी मांस जास्त आहे त्यांच्याकडे जाऊन, तेथील गृहीणीला हिंट देत असे की आम्हाला मांसाची गरज आहे. मग ती दुसरी गृहीणी, म्हणत असे "अगं आमच्याकडे जरा जास्तच आहे. तू का नाही घेऊन जात?"
अशा एकदम क्रिएटीव्ह पद्धती अस्तित्वात होत्या.= money starts to look like less of a natural outgrowth of human nature, and more of a choice.
परत तज्ञांच्या
ब्याट्या, ऐकतोयस ना रे !!! काही लोक म्हणतात की अमूक एक गोष्ट अस्तित्वात होती. या लेखाची लेखिका म्हणत्ये की अस्तित्वात नव्हती. हा मुख्यत्वे इतिहासाच्या अंतर्गत येणारा मुद्दा आहे.
( आद्य भांडवलवादी अॅडम स्मिथ चुकीचा होता असं मान्य करायचं जिवावर येत असल्यामुळे ष्टोरी ला असा स्पिन देण्यात आला आहे असा आरोप होईलच. )
( प़ळा पळा )
हाहाहा. आम्ही बॅट्यालाच
हाहाहा. आम्ही बॅट्यालाच बोलावत होतो इन द फर्स्ट प्लेस. काही लोकांना वाटतं तेच तज्ञ बाकी अज्ञ
.
गब्बर, बघ तू अवांतर केलस म्हणून मलाही अवांतर करण्याचा मोह झाला आता दोघांनाही ती श्रेणी मिळाली आहे
____
हाण्ण!! इकॉनॉमिक्सच्या मूळावरच घाला घातलाय की या बातमीने. मस्त. मस्त!
One reason to love Rand Paul
One reason to love Rand Paul - He opposes the sale of F-16 (fighting falcons) to Pakistan खासदार रँड पॉल यांनी पाकिस्तानला ही F-16 जातीची विमाने विकायच्या प्रस्तावास विरोध केलेला आहे. अमेरिकन सिनेट च्या परराष्ट्र संबंध समितीचे बॉब कॉर्कर यांनी ही असाच विरोध केलेला आहे.
-------------------------------------------
P Chidambaram in his capacity as home minister had personally overseen controversial changes in the Centre's affidavit in the Ishrat Jahan case in 2009 to drop any references to her Lashkar-e-Taiba links, G K Pillai, home secretary at the time, told TOI on Saturday.
चिदंबंरम यांच्या सांगण्यावरून शपथपत्राची भाषा बदलून इशरत जहां यांच्या लष्कर-ए-तायबा शी असलेल्या संबंधांचा मुद्दा वगळण्यात आला.
-------------------------------------------
NASA invites India to jointly explore Mars, send astronauts
नासा चे चार्ल्स इलाची : इस्रो व नासा यांच्या "संयुक्त विद्यमाने" मंगळावर संशोधन मोहिम.
-------------------------------------------
Whatsapp, FB shaking up marrriages: Police - कोण म्हणतं फेसबुक व व्हॉट्सॅप हे निरुपयोगी व निरुद्योगी, व्यर्थ, अपव्यय, फिजूल प्रकार आहेत ?
>>चिदंबंरम यांच्या
>>चिदंबंरम यांच्या सांगण्यावरून शपथपत्राची भाषा बदलून इशरत जहां यांच्या लष्कर-ए-तायबा शी असलेल्या संबंधांचा मुद्दा वगळण्यात आला.
Whatever happened to the involvement of L K Advani in Babri Case; his name was dropped by the CBI from the chargesheet while he was Home Minister and Dy PM.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वॉटबाउटरी म्हणतात याला असं
वॉटबाउटरी म्हणतात याला असं आम्हाला शिकवण्यात आलं आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
एक्झॅक्टली. औषधाचा कडू डोस
एक्झॅक्टली. औषधाचा कडू डोस वैद्यालाच द्यायचा प्रयत्न केला.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
'ट्रोल'.इनवर आलेला बारका लेख
चिदंबरम् यांच्या विधानाबद्दल 'ट्रोल'.इनवर आलेला बारका लेख -
How Chidambaram's comments on Afzal Guru expose Congress's dangerously cynical politics
लेखातून उद्धृत -
Chidambaram's party has been attempting to do a cynical dance, somewhat backing its Vice President Rahul Gandhi's decision to suddenly turn up at JNU and give a rabble-rousing speech. But, concerned about being labeled anti-national, the party has also repeatedly qualified its support for the sedition-accused students and barely even attempted to make a case for free speech.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा CBSE शाळेत वापरल्या
हा CBSE शाळेत वापरल्या जाणार्या एका प्रायव्हेट पुस्तकातला उतारा आहे. NCERTच्या पुस्तकांमध्येही हे लवकरात लवकर यायला हवं.
इथून
अजून एक सोर्सः
http://indiatoday.intoday.in/story/rahul-gandhi-english-fiction-class-5-...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बजेटमधला हलकटपणा
बजेटमधला सगळ्यात मोठा बाँब
ईपीएफ/पीपीएफच्या कॉर्पसवर टॅक्स !!! (कॉर्पसच्या ६०% अमाउंटवर अॅक्चुअली)
http://www.business-standard.com/budget/article/budget-2016-17-surprise-...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नियम एन पी एस शी जुळवायचा
नियम एन पी एस शी जुळवायचा प्रयत्न आहे असे म्हटले आहे.
आजवर जमलेल्या कॉर्पसवर टॅक्स नाही असं बातमीवरून वाटतंय !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
असेच म्हणतो
एनपीएस आल्यानंतर पीएफपासून डिसकरेज करण्यासाठी हा निर्णय असावा असे वाटते. अजूनतरी पीपीएफला हात लावलेला दिसत नाही. पण इक्विटी-कॅपिटल गेन्सला टॅक्सेबल करणारे पिलू १ एप्रिलनंतर हळूच बजेटबाह्य सोडतील असे वाटते.
पण इक्विटी-कॅपिटल गेन्सला
हे करायलाच पाहिजे. ही श्रीमंतांना दिलेली सबसीडी आहे. पीएफवर टॅक्स हा फाल्तूपणा आहे.
एक अपडेट वाचली. त्या ६०% अमाउंटची जर अन्युइटी घेतली तर ट्याक्स नाही असं जयंत सिन्हा म्हणाले काल टीव्हीवर आणि सो.मी.वर. पण अन्युइटी घेताना सर्विस टॅक्स पडतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
श्रीमंतांना?
अगदी ५०० रुपयांपासून कोणीही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करु शकतो. मग ही सबसिडी श्रीमंतांना कशी काय? अाधीच रिटेल पार्टिसिपेशन कमी आहे म्हणून सगळेच अर्थमंत्री बोंबा मारत असताता. आता हे सगळं टॅक्सेबल झाल्यावर लोकांनी 'गुंतवणूक' म्हणून सोनं घ्यायला सुरुवात केली तरी सरकारचं तोंड वाकडं नाही का होणार.
पीएफवर टॅक्स मला सुसंगत वाटतो. (समांतर प्रॉडक्ट असलेल्या एनपीएसवर - इक्विटी असूनही - टॅक्स आहे. खात्रीशीर पीएफवर कर नाही आणि मार्केटवर अवलंबून असलेल्या एनपीएसवर कर हे विसंगत चित्र होते. आता थोडे ठीक वाटते). मात्र ह्या टॅक्सेशनच्या इंडेक्सेशन वगैरेच्या नियमांबाबत आधी चिदूबाबानेही स्पष्टीकरण दिले नव्हते आणि जेटलीबाबाही काही म्हणत नाहीत.
होय. आत्ता तरी शेअर बाजाराचा
होय. आत्ता तरी शेअर बाजाराचा मोठा फायदा श्रीमंतांना होतो. त्यावर टॅक्स लावायला काहीच हरकत नाही. अनेक मोठ्या देशांमध्ये हा टॅक्स आहे. सोन्यातली गुंतवणून याने वाढेल हे वाटत नाही. टॅक्स लाऊनसुद्धा एक्विटीचा परतावा सोने/एफ्डीपेक्षा चांगला असेल.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
टॅक्स असावा का नसावा ही वेगळी
टॅक्स असावा का नसावा ही वेगळी गोष्ट आहे. पण जे काही आहे ते सबसीडी नाहीये.
ही जी काही चर्चा सुरू आहे
ही जी काही चर्चा सुरू आहे यांतलं मला बहुतेकसं काही समजलं नाही. शब्द समजले, पण अर्थ पुरेसा पोहोचला नाही. कोणीतरी यावर किमान पाचशे-हजार शब्दांचा लेख लिहाल का? पीएफ, पीपीएफ, एनपीएस या गोष्टींची दोन-चार वाक्यांत माहिती आणि त्यावर कर म्हणजे नक्की काय, कधी, किती, असा काहीसा?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे करायलाच पाहिजे. ही
ढेरेशास्त्री, सबसीडीची डेफिनिशन काय? आणि नसेल कॅपिटल गेन टॅक्स तर ती सबसीडी कशी होऊ शकते हे सांगु शकाल का?
सबसीडीची व्याख्या: A subsidy
सबसीडीची व्याख्या: A subsidy is a benefit given by the government to groups or individuals usually in the form of a cash payment or tax reduction.
विशिष्ट उत्पन्नावर टॅक्स नाही ही सब्सीडीच आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नीट वाचा डेफिनिशन. हे वाचा
नीट वाचा डेफिनिशन. हे वाचा "to groups or individuals"
जर फक्त श्रीमंतांनाच टॅक्स माफ केला असता तर त्याला सबसीडी म्हणता आले असते.
कोणालाच टॅक्स नाहीये, त्यामुळे ती सबसीडी नाही.
उद्या म्हणाल की ५० टक्के आयकर असायला पाहिजे, आत्ता ३० टक्के आहे म्हणजे २० टक्के सबसीडी दिली. असे नसते.
त्याला कॅग भाषेत रेव्हेन्यू
त्याला कॅग भाषेत रेव्हेन्यू लॉस म्हणतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ऋषिकेशराव आनंदी होतील अशी
ऋषिकेशराव आनंदी होतील अशी बातमी.
http://zeenews.india.com/news/india/budget-2016-17-aadhaar-card-to-be-ac...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अब की बार, फोटोशॉप...
फोटोशॉप सरकारची दखल 'न्यू यॉर्क टाइम्स'नं घेतली. कॉन्गी सिक्युलर पेपर आहे एक नंबरचा.
In India, Politics Photoshopped
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
डॉक्टर्ड व्हिडिओ (फोटोशॉप्ड
डॉक्टर्ड व्हिडिओ (बनावट ट्वीट आणि फोटोशॉप्ड चित्रे) दाखवून हिंसाचारास चिथावणी* देण्याबद्दल टीव्ही चॅनेल्स + संबित पात्रा (आणि केंद्रीय गृहमंत्री) यांच्यावर काही कारवाई सुरू आहे का?
ती होत असेल तर सरकार
*वकीलांनी कोर्टात जे केले तो हिंसाचार ....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एकच प्रतिसाद कीती वेळा
एकच प्रतिसाद कीती वेळा "डॉक्टर्ड" करताय थत्ते चाचा.
तुमचे नाव बघितल्या पासुन तुम्हाला थत्ते चाचा म्हणावेसे का वाटले ते कळत नाहीये. आधी पण तुम्हाला कोणी म्हणायचे का "थत्ते चाचा"
आठवली तशी गुन्हेगारांची यादी
आठवली तशी गुन्हेगारांची यादी वाढवत नेत होतो. सध्या एवढी यादी पुरे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
यु मीन "आरोपी", राईट?
यु मीन "आरोपी", राईट?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
(No subject)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
१८ वर्षांखालच्या, अविवाहित,
१८ वर्षांखालच्या, अविवाहित, गुजराती मुलींवर मोबाईल वापरण्यासाठी बंदी. वापरायचाच असेल वडलांचा फोन वापरा म्हणे! (आईचं लग्न झालेलं असूनही आईकडे मोबाईल नसतो का?)
बातमीचा दुवा
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पाकमध्ये राज्यपालांच्या
पाकमध्ये राज्यपालांच्या खुन्याला फासावर लटकावले
एरवी या बातमीमध्ये खास काही म्हणण्यासारखं वाटलंही नसतं. पण बातमीतला हा भाग जरा लक्ष देण्यासारखा वाटला -
... तासिर यांची कादरीने २८ गोळ्या घालून हत्या केली होती. तासिर यांनी पाकिस्तानातील वादग्रस्त ईशनिंदा कायद्यावर टीका केल्याने कादरीने त्यांची हत्या केली होती.
देवाची निंदा करणाऱ्या व्यक्तीचा खून केल्याबद्दल पाकिस्तान (या मुस्लिम, धर्माधिष्ठित देशात) खुन्याला फाशीची शिक्षा दिली. फाशीनंतर पाकिस्तानमधल्या अनेक शहरांमध्ये निषेध केला गेला, अशी बातमी डॉनने छापली आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उगीच बागुलबुवा नको. एकतर आपण
उगीच बागुलबुवा नको. एकतर आपण पाकिस्तानात रहायला जाणार नाही आणि आपण तरी काय तसलेच.. २६ आणि ३० बीएमायचा फरक फक्त.
मी तशीही भारताबाहेर राहत
मी तशीही भारताबाहेर राहत असल्यामुळे मला कोणी पाकिस्तानचं तिकीट पाठवणार नाही हे खरंच!
मला ही बातमी आश्वासक वाटली. शेजारच्या राष्ट्रात/देशात युद्ध, मारामाऱ्या, दहशतवाद, असुरक्षितता नांदत असणं कोणत्याही देशासाठी फार चांगलं नसतं. शेजारच्या देशातून सहिष्णुतेची बातमी आली तर मला ती महत्त्वाची वाटते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
The government today has
हे विअर्ड आहे, इतके दिवस एपीएफ आणि पीपीएफ सारखेच समजले जात.
पर्यायी माध्यमांचं आश्वासक चित्र
मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी ज्या मुद्द्यांकडे आणि ज्या माणसांकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे त्यांना उचलून धरत उभ्या राहिलेल्या पर्यायी माध्यमांविषयीचा लेख. रोहित वेमुलाची आत्महत्या हे त्या लेखाचं निमित्त -
Lessons for Indian journalism from Dalit mobilisation online
'जर मुख्य प्रवाहातली माध्यमं माझ्या मते महत्त्वाच्या मुद्द्यांना अनुल्लेखानं मारत असतील किंवा योग्य तो न्याय देत नसतील, तर मी त्यांना नाकारेन आणि लोकांना माझी दखल घ्यायला लावेन' असा पवित्रा गेली काही वर्षं दलित घेताना दिसत आहेत. आता त्यांना यशही मिळू लागलं आहे असं वाटतंय. मला हे आश्वासक वाटतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे फार्फार पूर्वीच होयला हवे
हे फार्फार पूर्वीच होयला हवे होते ,ह्यात विषेश ते काय?
उलट मेनस्ट्रीम माध्यमं दलित
उलट मेनस्ट्रीम माध्यमं दलित वगैरे बाबींना अवाजवी महत्त्व देतात आणि राष्ट्रोत्थानाचे जे कार्य मोदीसरकारकडून सुरू आहे त्याची दखल घेत नाहीत असा आरोप आहे.
उदा. While we were busy discussing Rohit Vemula; India struck a deal with Saudi Arabia that will give cheap crude....... etc.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ये तो सिर्फ झाँकी है
फेकुगिरीची हैट? की ये तो सिर्फ झाँकी है?
‘जेएनयू’तील देशद्रोही घोषणांच्या सातपैकी तीन क्लिप्समध्ये गंभीर फेरफार
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अर्धा ग्लास
चार खर्या आहेत अशीही हेडलाईन झाली असती.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तेरी भी चुप
कित्येक वृत्तपत्रांनी बातमी न देणंच पसंत केलेलं आहे. तर काही ठिकाणी असंही म्हटलं जातंय -
आता कोणती गोष्ट किती गांभीर्यानं घ्यायची ते ठरवा बुवा आपलं आपण.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दिल सच्चा पर चेहरा झूठा
Kanhaiya Kumar bail plea: Delhi High Court reserves order, slams Delhi Police इथून उद्धृत -
काय शिंची कटकट आहे. खरे व्हिडिओ कन्हय्या कुमारला राष्ट्रविरोधी घोषणा देताना दाखवतच नाहीत. बिचारे दिल्ली पोलीस, इराणीताई आणि भक्तगण. देव आणि नियती मोठी निष्ठुर झालेली दिसते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
गृहमंत्रालयातील २ सेक्रेटरी
गृहमंत्रालयातील २ सेक्रेटरी लेव्हल्च्या निवृत्त अधिकार्यांनी चिदु आणि सिब्बु ( हे लाडानी आहे बरं का, वाईट वाटुन घेउ नका ) ह्यांनी दबावा खाली भारतरत्न शहीद इशरत च्या केस मधे खोट्या अॅफेडेव्हिट करायला लावले असा आरोप केला आहे. ( संघानी कुठे कुठे आपली लोक पेरली आहेत. आणि इतके दिवस बरे तोंड गप्प ठेवले ते. चावट मेले )
हे तर खरे तर आधीपासुन च माहीती होते, फक्त आत्ता कोणीतरी बोलले.
चिदु आणि सिब्बु पहिल्यापासुन च खोडसाळ आहेत. त्यांना अश्या गमती जमती करायला आवडतातच.
चिदु चा मुलगा तर लै भारी कॅटेगरीत ला आहे.
विचारवंत
सातपैकी दोन डॉक्टर्ड व्हिडो मिळाल्यावर
इशरत प्रकरण बाहेर आल्यावर
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
देख भाई
अशा बाबतींत तुमच्यासारख्यांवरच ऐसीची भिस्त असते भिडू, पण आज ऋनं खफवर तुम्हा सगळ्यांआधी इशरतसंबंधी बातमी टाकून तिला शॉकिंग म्हटलं होतं. अशी आम्हा ऐसीकरांची निराशा करू नका भौ. बाकी चिदंबरमच्या प्रेमात मी कधीच नव्हतो. त्यामुळे माझ्याकडुन तरी तुम्हाला फुल टू मैदान मोकळं आहे. एन्जॉय माडी
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नाय. परवाच गबरूनी टाकली होती
नाय. परवाच गबरूनी टाकली होती ती बातमी.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
भावनाभडक विधान!
म्हणजे गब्बर ऐसीवरचा विचारवंत नाही? हे भगवान! उठा ले मुझे ऐसे ऐसी से!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बातमी जुनीच आहे चिंज. मी
बातमी जुनीच आहे चिंज.
मी सुद्धा टाकणार होते इथे काल पण असहिष्णु वातावरणामुळे भिती वाटली. सर्व चिदु, सिब्बु प्रेमी डावे माझ्या अंगावर धावुन आले असते म्हणुन टाकली नाही.
कोणाला तरी तर चिदु हा न झालेला महान पंतप्रधान वाटतो.
देख बॉस
अरेरे, मोदी येऊन दोन वर्षं होऊ घातलीत पण तुम्हाला काही अच्छे दिन दिसत नाहीत म्हणजे ऐसीवर. सांगा जरा एकदोन टँक वगैरे धाडायला इकडे. न रहेगा बाँस...
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आमच्या सारख्यांना सवय आहे
आमच्या सारख्यांना सवय आहे असहिष्णु वातावरणाची. गेली अनेक दशके सर्व माध्यमात डावी दडपशाही च अनुभवल्यामुळे ( म्हणजे मी नाही, नाहीतर मला म्हातारी समजाल ) त्याचे काही वाटत नाही.
गेली ५-१० वर्ष कुठे आंतरजाला मुळे काँग्रेसी आणि डाव्या हुकुमशहांची माध्यमावरची पकड कमी होतीय, त्यामुळे आमचा थोडाफार आवाज दिसतो कुठेतरी.
वो सुबह...
अरेरे म्हणजे किती फडतूस करून ठेवलंय तुम्हाला ह्या दुष्ट लोकांनी. आमच्या साहिरनं म्हटल्याप्रमाणे वो सुबह कभी तो आएगी वगैरे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
म्हणुनच मला साहिर फार्फार
म्हणुनच मला साहिर फार्फार आवडतो.
उठा ले!
आज अनुताईंशी सहमती. उठा ले!!!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पण... पण... पण...
...साहिर तर कम्युनिष्ट होता!!!!!!
(म्हणूनच तर त्याला (पाकिस्तानातून) भारतात पळून यावे लागले.)
..........
बाकी, 'मुँह में साहिर, बगल में (फडतुसांना मारायला) छुरी'वाल्या दक्षिणपंथीयांची गंमत वाटते. असो.
..........
(आणि हो, बादवे, मुसलमानसुद्धा होता, बरे का!)
काय सांगता? मला वाटले हिंदु
काय सांगता? मला वाटले हिंदु होता
ह्यात च तुमच्या समजेची गडबड दिसते आहे. कम्युनिस्ट आणि मुसलमान ह्या दोन गोष्टी एकाच वेळी शक्य नसते.
आणि
बघा बघा, आम्ही कसे खरे खुरे ओपन माइंडेड आहोत.
आम्हाला गालिब आवडतो, साहीर, शकील, दाग, अब्दुल करीम खा असे अनेक आवडतात. मगाशीच थत्ते चाचांना सांगीतले तसे नरसिंह राव आवडतात. आणि बाजपाई आवडत नाहीत.
कधी बाहेर पडणार हो तुम्ही थेरड्यांच्या वर्चस्वाखालुन.
अनुताई तुमच्या प्रतिसादातून
अनुताई तुमच्या वरच्या प्रतिसादातून उद्धृत -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नाही.
नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
चिदु आणि सिब्बु पहिल्यापासुन
हा चिदू नानावाडा शाळेत असताना माझा विद्यार्थी होता. तेव्हापासून असाच खोड्या काढायचा. तेव्हाच मी ओळखलेलं हा कोणीतरी मोठा होणार.
-पोतदार-पावसकर मॅडम
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आम्ही करतो फोटोशॉपी, तुम्ही मात्र...
जेएनयूमधल्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी करण्याचीही सोय नाही. आम्ही मात्र फोटोशॉप आणि व्हिडियो डॉक्टरिंगमध्ये दंग! जय हिंद.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हॅहॅहॅ http://maharashtratime
हॅहॅहॅ
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/smriti-irani-was-right-in-...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सिब्बु नी नेमलेले व्हीसी
सिब्बु नी नेमलेले व्हीसी फितवले की काय प्रतिगामी लोकांनी?
टू बॅड, टू लिटल, टू लेट
माझ्या अल्पमतीनुसार आणि माहितीनुसार महिषासुराच्या संदर्भात इराणीताई जे काही बरळल्या त्यापोटी त्यांच्यावर खोटं बोलण्याचा आरोप नव्हता, तर बहुजिनसी भारतातल्या महिषासुर आराधनेच्या प्रदीर्घ परंपरेविषयीचं त्यांचं अज्ञान त्यांच्या खालच्या विधानातून दिसलं असा आक्षेप होता.
Smriti Irani, are India’s Mahishasura-worshipping tribals depraved and anti-national?
Smriti Irani row: Let’s not fight, Jharkhand tribals say, as they pray to Mahishasur
बाकी महिषासुर-दुर्गा कथेला असलेल्या वर्ण/वर्ग वगैरे संघर्षाच्या पदरांविषयी मी पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे. कदाचित इथले काही इतिहासतज्ज्ञ ह्यावर आणखी प्रकाश टाकू शकतील.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अनारक्षित दणका
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.