दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१४ मे
जन्मदिवस : छत्रपती संभाजी (१६५७), चित्रकार थॉमस गेन्सबरो (१७२७), लैंगिक तज्ज्ञ व समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणारा मॅग्नस हिर्शफेल्ड (१८६८), संगीतसंयोजक ऑटो क्लेम्परर (१८८५), वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधन करणारा पिएर ओजे (१८९९), सिनेदिग्दर्शक मृणाल सेन (१९२३), 'स्टार वॉर्स'चा निर्माता, दिग्दर्शक जॉर्ज लुकस (१९४४), 'बॅक टू द फ्यूचर'मुळे प्रसिद्ध दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिस (१९५१), अभिनेत्री केट ब्लँचेट (१९६९), सिनेदिग्दर्शिका सोफिया कोपोला (१९७१), संगणकतंत्रज्ञ प्रणव मिस्त्री (१९८१), फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग (१९८४), मॉडेल, अभिनेत्री झरीन खान (१९८४)
मृत्युदिवस : नाटककार ऑगस्ट स्टिंडबर्ग (१९१२), लैंगिक तज्ज्ञ व समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणारा मॅग्नस हिर्शफेल्ड (१९३५), कायदेपंडित व समाजसुधारक ना. ग. चंदावरकर (१९२३), भाषाकोविद आणि कोशकार डॉ. रघुवीर (१९६३), लेखिका जीन ऱ्हीस (१९७९), अभिनेत्री रीटा हेवर्थ (१९८७), गायक, अभिनेता फ्रँक सिनात्रा (१९९८), समाजसुधारक असगर अली इंजिनियर (२०१३), मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके (२०२०)
---
स्वातंत्र्यदिन : इस्राएल
१७७६ : एडवर्ड जेन्नरने पहिली देवीची लस टोचली.
१८४४ : मोर्स कोडचा जनक सॅम्युअल मोर्स याने अमेरिकेतील टेलिग्राफद्वारा पहिला संदेश पाठवला.
१८७९ : भारतातल्या वेठबिगारांचा पहिला समूह फिजी बेटावर आला.
१९२५ : व्हर्जिनिया वूल्फची कादंबरी 'मिसेस डॅलोवे' प्रकाशित झाली.
१९२९ : प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये विल्फ्रेड ऱ्होड्सने ४०००वा बळी घेतला.
१९४८ : डेव्हीड बेन गुरीयन यांनी इस्राएल या स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीची घोषणा केली. लगेचच शेजारच्या अरब राष्ट्रांनी त्याच्याशी युद्ध सुरू केले.
१९५५ : शीतयुद्ध : सोव्हिएत संघ आणि पूर्व युरोपातील साम्यवादी देशांनी वॉर्सा करार मंजूर केला. 'नाटो'च्या निर्मितीला हे प्रत्युत्तर होते.
१९७० : 'बादर-माईनहॉफ गट' या कट्टर डाव्या विचारांच्या विद्रोही गटाची प. जर्मनीत स्थापना.
१९७३ : पहिले अमेरिकन अवकाशस्थानक 'स्कायलॅब'चे यशस्वी प्रक्षेपण.
१९७६ : भारत-पाकिस्तानमध्ये मैत्रीला चालना देण्यासाठी आपसांत विमान आणि रेल्वेवाहतूक सुरू करण्याचा निर्णय.
१९९८ : 'साईनफेल्ड' या टीव्ही मालिकेच्या शेवटच्या भागाचे प्रसारण.
२००२ : भारत सरकारने मारुती उद्योग लिमिटेड या कंपनीमधील आपल्या हिश्शाची रक्कम कमी केली आणि तो भाग सुझुकी मोटर कॉर्पोरेशनला एक हजार कोटी रुपयांना विकला.
२०१३ : 'बोको हराम'च्या दहशतवादी कृत्यांमुळे नायजेरियात आणीबाणीची घोषणा.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- Rajesh188
- भाऊ
प्रतिक्रिया
मस्त लिहिलंय, बाकी ते
मस्त लिहिलंय, बाकी ते अंबाडी तांदळी पोकळा माठ चाकवतादींचा उल्लेख राहिला वाट्टे. कोल्हापुरातील मंडईतील खरेदीचा माझा अनुभव बाकी तोकडाच- एकदाच खरेदी केलेली. नववी-दहावीत असेन तेव्हा. आतेभावाबरोबर जाऊन दोन जुड्या पालक घेऊन आलो तेव्हा साफ करताना आत्याच्या लक्षात आले की त्या जुडीत भुंगा लपलेला होता. कळायचं बंद झालेलं तेव्हा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छान आहे ललित. कृष्णा आता
छान आहे ललित. कृष्णा आता वाहात नाही आणि काठाची वांगी इतर वांग्यांसारखीच आहेत.
वाळकं
काही दुर्दैवी लोकांना ती गुळगुळीत खिरा काकडी म्हणजेच काकडी असं वाटतं. वाळुक न खाल्लेली काही माणसं ओळखीत आहेत पुण्यातली.
अजून एक म्हणजे गाजर.
दोडका जर अर्ध्या फुटापेक्षा मोठा असेल तर माझी आजी तो सरळ म्हशीला घालते. पुण्यात लहान कोवळी दोडकी मिळणं महामुष्कील. बंगलोरला तर लहान कोवळी दोडकी खाणे म्हणजे पाप आहे की काय असं वाटतं.
काशी बोरं आणि देशी बोरं असे दोन बोरांचे प्रकार. हे सगळीकडे मिळतात. सांगली-मिरज-कोल्हापूर इकडे भाज्या खरंच मस्त ताज्या मिळतात.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
दोडका जर अर्ध्या फुटापेक्षा
हाहाहा खूप छान्. निबर खाववत नाही.
भाज्या
प्रत्येक गांवी, भाज्या वेगळ्या चवीच्या मिळतात, असा अनुभव आहे. मुंबईत रहात असताना, कोबी, फ्लॉवर या भाज्यांना, शिजवल्यावर, एक प्रकारचा उग्र वास जाणवत असे. त्यांत कोबीच्या भाजीला तर, घासाच्या शेवटी, एक कडवट चव जिभेवर जाणवायची. अर्थातच, ती फक्त माझ्यासारख्या खवय्यांनाच जाणवायची. आता पुण्याला आल्यावर फरक जाणवतो. कोबीची भाजी नुसतीच खाऊ शकतो, पाहिजे तेवढी. फ्लॉवरचा उग्रपणा तेवढा जाणवत नाही. वांगी कधीही कडु निघत नाहीत. आम्ही एवढ्यावरच खूष! मग कोल्हापूरला गेलो तर याहून चांगल्या चवीच्या भाज्या मिळतील, हे कळले.
बडोद्याला, खंडेराव मार्केटमधे फारच छान भाज्या मिळायच्या. वांगी तर फारच चांगल्या चवीची. पुढे, कामानिमित्त कंपनीच्या गेस्ट हाऊसवर गेल्यावर, त्या राजस्थानी महाराजच्या हाताला तर अशी काही चव होती की साधाच स्वयंपाक पक्वान्नासारखा वाटायचा. आमटी तर किती वाट्या प्यायचो, त्याची गणनाच नाही.
काही गोष्टी आठवल्या. जमेल त
काही गोष्टी आठवल्या. जमेल तशा लिहितो.
मलाही अगोदर कळायचं नाही की हे लोक दोन-दोन किलो वांगी घेऊन का जातायत त्यांच्या गावी. एकदा मावशीच्या घरी फलटणला गेलो असताना तिने बाकी काही नको फक्त वांगी आणि खवा घेऊन ये (मिरजेच्या विटा डेअरीत उत्तम खवा मिळायचा) असं सांगितल्याचं आठवतंय. ती घेऊन गेलो तर तिच्या मिस्टरांनी खुश होत "वाह कृष्णाकाठची वांगी!!" असं म्हणल्याचं आठवतंय. त्यावेळी आम्हाला त्याच नावाचा मराठीत एक धडा होता ते झटकन मला तिथे क्लिक झालं.पुस्तकात वाचलेल्या गोष्टींचं ते पाहिलं प्रात्यक्षिक वगैरे असावं.
त्यात पण सगळ्यात बेस्ट वांगी म्हणजे नरसोबाच्या वाडीची. हिरवट पांढरी. त्या वांग्याची भरली भाजी काय होते म्हणून सांगू. माणूस वाडीला जाणार असेल तर त्याला बासुंदी,कवठाची बर्फी आणि किलोभर वांगी घेऊन येण्याची ऑर्डर हमखास मिळते आजही घरच्यांकडून.
इथे मुंबईतली जांभळी वांगी अजिबात आवडत नाहीत त्यामुळे आजही घरून जाताना वांगी घेऊन जाणं होतच.
अख्ख्या पुण्यात मला वाळकं कुठंच दिसली नव्हती, सगळीकडं त्या फिकट हिरव्या रंगाच्या गुळगुळीत काकड्या. मी तोपर्यंत त्या कधीच खाल्ल्या नव्हत्या. फक्त ओटी भरताना असतात तसल्या या काकड्या वाटतं असं वाटलेलं. पण त्या अजूनच वेगळ्या हे नंतर समजलं.
माझी आज्जी अस्सल कोल्हापुरी. आम्ही सरसकट सगळ्याच प्रकारांना काकडी म्हणायचो. पण ती मात्र वाळकं काकडी असे दोन शब्द वापरायची. स्वैपाक करताना वाळकाची कोशिंबीर करू काय असं विचारायची. वाळकं आणि काकडी कशी ओळखतात ते मला समजायचं नाही. आज किती दिवसांनी वाळकं हा शब्द ऐकला.
कोल्हापुरात मिळणारी अजून एक भारी पालेभाजी म्हणजे पोकळा जो आमच्या बाबांना अतिशय आवडायचा आणि आजी मिरजेला येताना न चुकता दोन पोकळ्याच्या पेंड्या घेऊन यायची. बाबांनी प्रचंड शोधूनही त्यांना शेवटपर्यंत मिरजेत-सांगलीत पोकळा मिळाला नाही कधी. अजून पण मिळतो की नाही माहित नाही.
चवीला काय लागायची ती भाजी. कितीही मोठी पेंडी असली तरी भाजी करताना इतकी आळायची की जेमतेम दोघांना पुरेल इतकीच भाजी बनायची. पण अफाट चव होती. खूप वर्षं झाली खाल्लाच नाही पोकळा.
केवळ पन्नास किलोमीटर अंतर असूनही सांगली आणि कोल्हापूरच्या ठेवणीतल्या शब्दांत कमालीचं अंतर आहे. उदा. आमच्या इथे हरभरा डाळ वाटून केलेल्या तिखट पदार्थाला "वाटली डाळ" म्हणतात तर कोल्हापुरात त्याच पदार्थाला "मोकळं तिखट" म्हणतात. हे एक उदाहरण झालं बाकी अनेक असतील.
सहमत. पोकळ्याबद्दल क्व
सहमत. पोकळ्याबद्दल क्वचित कधीतरी ऐकलं पण भाजी कधीच नै खाल्ली. सांगली-मिरजेत पोकळा मिळत नाही हे खरेच.
वाळुक हा शब्द आजी-आजोबा वापरत. काकडी अन वाळूक यांत काय फरक आहे ते मला अजूनही माहिती नाही. आईबाबांनी मात्र कधी हा शब्द वापरल्याचे आठवत नाही. 'आळणे' हाही खास तिकडचाच शब्द.
विटा डेअरीतील खवा अजूनही उत्तम आहे.
वाटली डाळ हा एक अतिप्रिय पदार्थ. त्याला कोल्हापुरात मोकळं तिखट म्हणतात हे माहिती नव्हते. रच्याकने हळदीकुंकवातली ती कसलीशी कोशिंबीर असते तीही फार आवडते. लहानपणी आईसोबत कधी हळदीकुंकवात जात असे तेव्हाच ती केली जाई, अदरवाईज कधी केल्याचे आठवत नाही.
काकडीबद्दल अजूनेक म्ह. आमचे उत्तरभारतीय मित्रही ककडी आणि खीरा असे दोन शब्द वापरतात. पण त्यांचे म्यापिंग काही केल्या लक्षात येत नाही.
माईनमुळा हा प्रकारही बहुधा मला वाटते विशेषकरून आपल्या भागातलाच असावा. धारवाड भागात होत नाही हे नक्की.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पोकळा खाऊन बघ बॅटमॅन,
पोकळा खाऊन बघ बॅटमॅन, त्याच्याच जातीतली तांदळी/तादूळसा/तांदूळजाची भाजी. नुसतीच परतून भाकरीबरोबर खायलाफार मजा येते. इथं पोकळा मुबलक मिळतो.
वाळकं म्हणजे हिरव्या रंगाची बारकी (कधी सरळ, कधी वाकडी) असणारी काकडी. ती त्या खिऱ्या काकडीसारखी गब्दुल असत नाही आणि गुळगुळीतपण असत नाही. तिला अगदी बारीक लव असते.
आम्ही अस्सेच आहोत
तांदळी खाल्ल्याचे अंधुक आठव
तांदळी खाल्ल्याचे अंधुक आठवते. एके वर्षी पाऊस खूप झालेला तेव्हा बागेत नेहमीच्या झाडांखेरीज हेsssss नुस्त्या पालेभाज्या उगवल्या होत्या त्यात तांदळीही होती.
वाळकं बहुधा बघितलेली आहेत पण खात्री नाही.
कोल्हापुरात जेव्हा येईन तेव्हा खाईनच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मिरजेच्या बसाप्पाचा पेढा जगात
मिरजेच्या बसाप्पाचा पेढा जगात भारी असतोय.
होय मोकळ तिखट म्हणजे वाटली डाळ, काळा भात म्हणजे मसाले भात. इथं जरा निराळे शब्द असतात खरं.
आम्ही अस्सेच आहोत
बसाप्पाचा पेढा भारी हे खरेच
बसाप्पाचा पेढा भारी हे खरेच, पण हाडाचा मिरजकर असूनही माझे मत वाडीच्या पेढ्याला. त्याची सर कशालाच येऊ शकत नाही. ताजा ताजा खवा करतात, डोळ्यासमोरच दूध आटवतात. त्याची चव जगात भारी असते. वाडीला जेवायचं आणि खिद्रापूरचं देऊळ पाहून मिरजेला परतायचं हा प्रोग्र्याम स्ट्याण्डर्ड आहे. तेवढा तिथपर्यंतचा रस्ता नीट बनवा म्हणावे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाडीत करदंट मिळतो तो पण भारी
वाडीत करदंट मिळतो तो पण भारी असतोय.
सहमत! अन बासुंदी.
सहमत! अन बासुंदी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
वाडीचा पेढा आणि बासुंदी लै भारी. पण ती तिथेछ खायला मज्जा येते. वाडीच्या मंदिराच्या रस्त्याला लागून असलेल्या गल्लीत १-२ मस्त दुकानं आहेत. सकाळी-सकाळी गेलं तर आपल्यासमोर खवामशीनमध्ये दूध आटत असतं. फक्त तेव्हा मिळणारी बासुंदी गार नसते. १०-११च्या सुमाराला गेलात तर थंडगार बासुंदी मिळते.
हो. बादवे मध्यंतरी मिरजेत
हो. बादवे मध्यंतरी मिरजेत सुभाषनगर रोडला "जय हिंद भोजनालय " नावाची नवीन मांसाहारी खाण सापडली. जबरदस्त मटण. अगोदर कधीच ऐकलं नव्हतं या जागेबद्दल पण एकंदरीत गर्दी पाहता आजूबाजूच्या भागात प्रचंड फेमस असली पहिजे.
असं? लक्षात ठेवीन. तूर्त म
असं? लक्षात ठेवीन. तूर्त मला सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलजवळचे अनुराधा हे एक उत्तम मटन थाळीवाले हाटेल माहिती आहे. मिरजेतला रेहेमतुल्ला म्ह. नुस्ते नावच मोठे, लक्षण इतके कै खास नै. पवार बंगल्याजवळ पटेल म्हणून नवीन हाटेल सुरू झालेय तेही बरे आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मटनाच्या हाटेला ला हे नाव
मटनाच्या हाटेला ला हे नाव म्हणजे अनुराधा नावाचा गैरवापर आहे. ठोकले पाहिजे मालकाला.
बरोबरे, अनुराव असे नाव
बरोबरे, अनुराव असे नाव ठेवायला सांगितले पाहिजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अजून
अजून म्हणजे बसाप्पाकडचा खाजा झालंच तर वाडीला मिळणारी कवठ बर्फी विसरायलाय तुम्ही .
-सिद्धि
कवठ बर्फी नाय आवडत सब
कवठ बर्फी नाय आवडत सबब कधी फारशी खाल्लीच नाही. खाजा बाकी उत्तमच!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
करदंट गोकाकचा खायचा बघा, एक
करदंट गोकाकचा खायचा बघा, एक नंबर असतोय.
आम्ही अस्सेच आहोत
सोमणांकडचं जेवण जबरी आवडतंय,
सोमणांकडचं जेवण जबरी आवडतंय, त्यांच्याकडं मिरचीचा एक ठेचा असतोय तो मस्त असतो एकदम. वाडीचा गोडापेढा मला आवडायचा लहानपणी खूप. कवठाची बर्फी आवडते पण त्यानं तोंड येतं रंगामुळं.
आम्ही अस्सेच आहोत
बरोबर काळा भात. अजून एक,
बरोबर काळा भात. अजून एक, चहासोबत जो कडकडीत बटर आपण खातो त्याला वर्की म्हणतात बहुतेक ते पण फक्त कोल्हापुरातच.
बटर वरून
शाहुपुरीतल्या खेमराजबद्दल तुम्हाला काय वाटतं?
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
खेमराजबेकरीचा ताजा गरम ब्रेड,
आम्ही अस्सेच आहोत
खेमराजबेकरीचा ताजा गरम ब्रेड,
खेमराजबेकरीचा ताजा गरम ब्रेड, खारी, वरक्या, क्रीमरोल आणि मावाकेक मस्त असतोय. बाकी त्याच्याबद्दल काय वाटायचं?
आम्ही अस्सेच आहोत
हे करदंट काय प्रकरण
हे करदंट काय प्रकरण आहे?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Karadantu
डिंक डेसर्ट. कर्नाटक पेश्शल, बॉर्डरकडं फेमस.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आभार! भारी प्रकार दिसतोय
आभार! भारी प्रकार दिसतोय!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
त्या विकिपिडियाच्या फोटोवर
त्या विकिपिडियाच्या फोटोवर जाउ नकोस, अॅक्चुअलि लै भारि दिसतो.
मस्त चौकोनि ठोकळे, डिंक, सुकामेवा ठासुन भरलेले. एकच लंबर तब्येत बनवायला.
अगदी अगदी.
अगदी अगदी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सहमत. प्रत्यक्षात दिसताना
सहमत. प्रत्यक्षात दिसताना त्या फोटोपेक्षा लैच भारी दिसतो. म्हणजे दिसताक्षणीच खायची इच्छा व्हायला लागते. आणि खाताना त्यात मध्ये मध्ये डिंक लागला की तोंडातच त्यातलं किसलेलं खोबरं डिंकात मिक्स करून चावायला तर लै मजा येते.
बोले तो...
डिंकाच्या लाडवाचा वितळवून, काजूबदाम वगैरे घालून केलेला काही प्रकार समजावा काय? 'डिंकाचा हलवा'?
प्रकार रोचक दिसतोय तर खरा.
गोंदपाक/गोंदकाहलवा वेगळं
गोंदपाक/गोंदकाहलवा वेगळं असतंय. करदंटाची रेसिपी आईला, काकूला माहिताय.
आम्ही अस्सेच आहोत
आबा , भर पुण्यात नवीन पुणे
आबा , भर पुण्यात नवीन पुणे तिसात ( म्हणजे कोथरूड , कर्वेनगर , सिंहगड रोड ईस्ट * )मध्ये सगळीकडे जोशी स्वीट्स मध्ये मिळतंय . ( हे जोशी स्वीट्स वाले जोशी /परचुरे का जे कोण ते हुबळी का धारवाड चे आहेत . एकमेकांशी कानडीतच बोलतात )
* म्हणजे सिंहगड रोड विठ्ठलवाडी पर्यंत . धायरी ते किरकिटवाडी पुणे तिसात नाही येत .
अगदीच मोठे आभार! हे अगदीच
अगदीच मोठे आभार! हे अगदीच घरापर्यंत पोचलं!
(सिंहगड रोडावरच्या त्या जोशी स्वीट्सच्या शेजारी शेगाव कचोरी नावाचं एक भयाण दुकान झालं आहे. चुकूनही त्यात जाऊ नये. मूळ शेगावची कचोरी कशी असते माहीत नै, पण ही भीषण आहे.)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
त्याचं काय आहे की
मूळ शेगाव कचोरीही तशी सुमारच असते.
काहीही
शेगाव ला पण दोन कचोऱ्या मिळतात, त्यात ती लाल डगलेवाल्या शर्माजींची कचोरी मस्त अस्ते.
पुण्याला मला वाटते डेक्कन ला मिळते. बावधन ला ही.
मुंबई मध्ये मात्र नाहीच मिळत कुठे, पारल्यात विदर्भ वडापाव म्हणून एक दुकान आहे, बंधुराज तिथून शेगाव कचोरी घेऊन आले, एकदम बंडल...
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
मुंबई मध्ये मात्र नाहीच
-१
ठाण्यात मिळते शेगाव कचोरी. जशीच्यातशी. गजानन वडापावपासून काही मीटर्सवर.
-१ ?
ठाणं मुंबईत केव्हापासून यायला लागलं म्हणे???
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
आमची कोठेही शाखा नाही.
प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि धडाडीचे पुणेरी व्यावसायिक जागतिकीकरणाच्या लाटेला धैर्यानं तोंड देत, व्यवसाय वाढवण्यासाठी मुंबई सोडून गेले. तेव्हापासून जिथेजिथे लोकल ट्रेन जाते, तो सगळा भाग मुंबईत मोजला जायला लागला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
निषेध निषेध निषेध..!!!
अस्सल मुंबईकरासाठी मुंबई फक्त बोरीवली ते चर्चगेट (वेस्टर्न लाईन वाले) आणि अन्धेरी ते सी एस टी (हार्बर लाईन वाले) येवढीच आहे. बाकी ते सेन्ट्रल वाल्यांना मुलुंड परेन्त घ्यावं लाग्तय म्हणून पण चंबूर (ऋषि कपूर तिथे राहतो हे सोडून बाकी काय अस्तय माहीत नाही.), घाटकोपर, कुर्ला(एकदम कंडम / बाद जागा असं ऐकल्याने तिथे जायचं कशाला?) गोवंडी (तडीपार लोक राहणार नंबर एक) इ. इ. ही असली भिकार ठेसनं मुंबईत येत नाहीत.
पुणेकरांना काय चार पुणेकर एकत्र जमून टुकार मिसळपाव वाल्याला पण "धन्यवाद, थोर" वगैरे संबोधतात आणि अख्खं पुणं तिथे लोटतं. तस्मात पुणेकरांनी पुण्याला काय वाटेल ते म्हणावं मुंबईच्या वाटेला जाऊ नये.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
बायदवे
तुम्ही कन्व्हर्टेड मुंबैकर आहात अशी शंका आहे.
(कन्व्हर्टेड पुणेकर) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटोबा, पुणेकर जमात ही पार
बॅटोबा, पुणेकर जमात ही पारश्यांसारखी आहे. तिथे क्न्व्हर्ट होऊन एन्ट्री मिळते का?
किंवा कमीतकमी ज्यु जमातीसारखी आहे. बऱ्याच टेस्ट पास झाल्या की अॅक्सेप्टंस मिळतो.
जंतुंना पटेल ही थिअरी
बापटाण्णांनी आपणहून मला
बापटाण्णांनी आपणहून मला पुण्याचे ऑनररी नागरिकत्व बहाल केलेले आहे. विषय संपला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
म्हणजे तू टेस्ट पास केल्या
म्हणजे तू टेस्ट पास केल्या असाव्यात्.
मनोबा ला ऑफर केले आहे का नागरिकत्व्?
माहिती नाय. काय रे मनोबा?
माहिती नाय.
काय रे मनोबा?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आम्हि कन्व्हर्टिझमच्या विरोधात आहोत
गॉथम खेडं पुण्यात येतं वाटतं...
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
अन आम्ही कन्व्हर्ट होऊनही
अन आम्ही कन्व्हर्ट होऊनही मूळ विसरत नाही.
गॉथमखेडं मनात आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खिक्क!!
खिक्क!!
तुम्ही "अस्सल" मुंबैकर नाहीत हेच सिद्ध होतय!
जिथे रिक्षा जात नाहीत तीच "अस्सल" मुंबै!!
(जन्माने चौपाटीकर) सुनील
पुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
तुम्ही आंग्लाळलेले म्हंजे सोबो वाले मोठे लोकं आहात.
मी इथेच जन्माला आलेली आहे.. आणि परकीयांना आम्ही मुंबईचं नागरीकत्व देत नाही. फक्त जन्माने मुंबैकर असू शकतात
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
खरा मुंबईकर
ह्यावर माझ्या परिचयातले स्वतःला खरे मुंबईकर समजणारे काय म्हणतात ते पाहा :
ज्यांची मुंबईत पिढीजात जमीन आणि शेती होती ते आम्ही खरे मुंबईकर. बाकी सगळे नंतर आलेले लोक. (त्यांची खरोखर शेतजमीन होती. त्यांची कुळं कोळी होती. अजूनही त्यांच्या घरच्या गणपतीला दर वर्षी नेमानं नैवेद्य म्हणून ते कोळी लोक ताजे मासे घेऊन येतात.) मुंबईत माझ्या माहितीतले असे लोक बाणगंगा तलावापासून पार कांदिवली-बोरिवलीपर्यंत आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे तर आद्य हुच्चभुभु दिस
हे तर आद्य हुच्चभुभु दिसतात. कुळांकडून जमीन कसून घेणारे. हे कै भूमिपुत्र नव्हेत. कोळी हेच खरे भूमिपुत्र मुंबैकर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
झुकावावर सहमती
सहमत. डावीकडे झुकलेला उदारमतवाद.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हात्तेरेकी, काडी वाया गेली.
हात्तेरेकी, काडी वाया गेली. काय खरं नाही अलीकडे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छे छे
आपण एकाच बाजूला आहोत. काडी तर गौराक्कांसाठी आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बॅटोबांनी आमच्याशी मैतरी
बॅटोबांनी आमच्याशी मैतरी केली असल्याने आम्हाला त्यांच्याकडून बॅट प्रोटेक्षन आहे.
हो कि नाही हो बॅटमॅनराव पुणेवाले???
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
अर्थात!
अर्थात!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तस्मात पुणेकरांनी पुण्याला
इतका जाज्वल्य अभिमान असणारी मुंबईकर व्यक्ती पहिल्यांदाच दिसली.
ठाणं मुंबईत केव्हापासून
हम्म. बरं.
पण तरी एकंदरीत ठाण्यात ही कचोरी मिळते आणि मुंबईवाले आले तरी त्यांनाही देतात. नाही म्हणत नाहीत.
ठाणं मुंबईत केव्हापासून
त्याचे काय आहे, तत्त्वत: आणि तांत्रिकदृष्ट्या ठाणे हे यमशीजीयमच्या हद्दीत येत नसेलही (तेच पिनकोड आणि तेच एष्टीडीकोड शेअर करत असले तरी - चूभूद्याघ्या), परंतु बाहेरच्या माणसाशी बोलताना अनेकदा ठाण्याचेच काय, पण पार डोंबिवली/उल्हासनगर/कल्याण इतकेच कशाला, अगदी बदलापूरपर्यंतचे लोक "आम्ही 'बॉम्बे'त (आता 'मुंबई'त) राहातो" म्हणून सांगतात, असे निरीक्षण आहे ब्वॉ. (सन्माननीय अपवाद असतीलही - चूभूद्याघ्या.)
खवचट अशी श्रेणी दिली आहे.
खवचट अशी श्रेणी दिली आहे.
कुठे गेल्या त्या खोडसाळ आणि भडकाऊ?
अनु राव???
अनु राव???
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
मला मालकिणबै श्रेणीसुविधा
मला मालकिणबै श्रेणीसुविधा द्यायला तयार नाहीत
तुम्ही तोंडी देऊन टाका... कि
तुम्ही तोंडी देऊन टाका... कि फर्क पेंदा.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
दादर (प.) मुंबईत नाही? बरं!
मुंबई मध्ये मात्र नाहीच मिळत कुठे
........शिवाजी पार्क, सेना भवन, दादर पश्चिम परिसर येत असेल तुमच्या मुंबईत, तर जिप्सी कॉर्नरच्या शेजारी एक चहावाला आहे, त्याच्याकडे आहे शेगाव कचोरी. ती ला. ड. शर्माजींची की कसे ते नाही ठाऊक. तिथूनच माहीमच्या दिशेने जाताना अय्यंगार बेकरी लागते. तिच्या आसपासही आहे एक दुकान.
अय्योय्योय्यो... खरं की
अय्योय्योय्यो... खरं की क्काय्य्य्य्य्य्.... माय माझी दादरलाच जाते रोज.. सांगाया पाहिजे आणायला...
शर्माजींची निघाली तर तुम्हाला एक फ्लायींग किस्स्स्स्स्...
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
लेख आवडला
लेख आवडला. मी देखील ठाण्यात गावदेवी मार्केटमधे एका ठिकाणाहून भाज्या घेतो. विक्रेता म्हणतो की त्या भाज्या पुण्यापलीकडून म्हणजे सातारा वगैरे भागातून येतात. महाग असतात पण चव उत्तम असते.
मस्त. कपिलतीर्थ मंडई
मस्त. कपिलतीर्थ मंडई भुलभुलैय्या आहे एक .. कुठून कुठे निघायचो कळायचंच नाही.
बाकी भाजीविक्रेत्यांप्रमाणेच इथले रिक्षावाले पण उर्मट नाहीत. विशेषतः पुण्याहून आल्यावर हा फरक लगेच जाणवतो.
अवांतर : अवंतीचं कांदेपोहे प्रकरण पण आवडलेलं . त्यावर लिहायचं होतं पण आळस ...
आता तर आमच्या कोल्हापूरची आहे म्हणून अजूनच आवडली अवंती.
-सिद्धि
खूप्पच छान लेख.
खूप्पच छान लेख.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
घारगावचे पेढे
दरवर्षी सुट्टीत नाशिकला जाताना, घारगावचा पेढा मला वडिल घेऊन द्यायचे. अजुनही तो मला फार आवडतो. पण आता तशी चव राहीली नाही. गडद तपकीरी रंगाचा मोठा चपटा गोल आकाराचा पेढा एस टी च्या खिडकीतून विकत घ्यायचा. साध्या वर्तमान पत्रात गुंडाळून तो पेढा माझ्या हातात यायचा. काय आनंद व्हायचा तेव्हा.
तसच नगर माझ आजोळ तिथून नेहमी बोर पुण्याला आणली जायची. आधी वाटायच की पुण्यात पण मिळतात की. जेव्हा ती बोर खाल्ली त्या वेळी चवीतला फरक कळाला.
घारगाव
आळेफाट्याहुन नगर ला जाताना लागतं तेच का हे?
एकदा मावशी मी आई आणि काका आळेफाट्याहून येवल्याला जाताना काकांनी घारगाव ला एका जागी मलई रोटी, शेव भाजी आणि अक्खा मसूर खायला घातलेला.. गव्हाच्या जाड दोन रोट्या एका वर एक दाबलेल्या आणि मध्ये लाल तिखट घालून कालवलेल्या मलईचा जाड थर. नुस्ती गरम गरम रोटी सुद्धा भारी लागती. हॉटेल अगदीच टपराट होतं.
हॉटेल लक्ष्मी नाव होत त्याचं.. मुख्य म्हंजे, हॉटेल मियाभाईचं आहे.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
लाल तिखट घालून कालव
तिखट आणि मलई म्हणजे अगदीच ईईईईई
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी पण येवल्याहुन येताना
मी पण येवल्याहुन येताना त्याच एरीआत "चौरंगीबाबा" किंवा अश्या नावाच्या सेमीटपरी कम धाबा हॉटेलात उत्कृष्ट जेवण खाल्ले होते.
गल्ल्याच्या मागे अनिरुद्धबापु चा मोठ्ठा फोटो होता. मालकाला आवर्जुन जेवण चांगले असल्याचे सांगितल्यावर त्याने बापुंची कृपा असल्याचे सांगितले.
घारगाव पुणे नाशिक रस्त्यावर
घारगाव पुणे नाशिक रस्त्यावर संगमनेर च्या आधी आहे . त्या मियाभाई चं लक्ष्मी हॉटेल मीही बघितलंय अनेक वेळा .
ई काय्य्य्य्य्य्
ई ई ई ई काय म्हणता हो बॅटोबा, खाण्याच्या गोष्टींना खाल्ल्याशिवाय नाव ठेऊ नयेत असं शिकवतं नाही का तुम्च्या गॉथम मध्ये...
आणि असं बचकन लाल तिखट घालून देत नाहीत ते... हलकसं असतं. माझ्याकडे फोटो आहे, शोधुन टाकते.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
हो पण तरी मलई आणि तिखट
हो पण तरी मलई आणि तिखट विजोडच कॉम्बो आहे असं वाटतं ब्वॉ. इफ इट वर्क्स, सो बी इट.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शी बाई काय तुम्ही...
...
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
कळ काढू मोड ऑन
खाण्यापिण्याच्या चर्चेत शी शू काय आणता ओ मध्येच. थंड रहायचं बघा की जरा.
(पळा पळा)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उत्तरार्ध तोच असतो..
हा घ्या फोटु, मलई रोटीचा
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
पण चर्चा पूर्वार्धाबद्दल
पण चर्चा पूर्वार्धाबद्दल चालूये म्हणून म्हटलं आपलं की बॉ उत्तरार्ध कशाला...
फोटो दिसत नैये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मास्क काढुन बघा
बॅटमॅनचा मास्क काढुन बघा की...
एक शंका.. मास्क घातल्यावर मोकळ्या डोळ्याजवळच्या जागेत काजळ का घालता हो?
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
ते फक्त कॉलेजह्यूमरच्या
ते फक्त कॉलेजह्यूमरच्या व्हिडिओतली सोंगं करतात. खरा बॅटमॅन कधीच नाही करत असं.
संदर्भ: द डार्क नाईट रायजेस, इंटर्वलच्या आसपास बेन जेव्हा ब्रूस वेनच्या पाठीचा कणा मोडतो आणि मास्क फेकून देतो तेव्हा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काहीपण
अगदी डोळ्याच्या पापणीपर्यंत मास्क घालायचा म्हणजे ज्यास्तच झालं नै?
आणि मग डोळे बंद केलेतरी पापण्या काळ्याच दिस्तात की हो.. मास्कच्या आतुन झडपा बसवल्यात काय?
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
गॉथमवाले (कॅट)वुमनिया ले जायेंगे
बडे बडे सुपरहीरोज में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जाई काजळ
का त्यांचा धंदा मारताय...
------------------------------
शाहरुख आपला फेव्हरीट आहे, त्याच्या सुपरहीरोची मस्करी करणाऱ्यांचा जाहीर निषेध.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
शारुक्खानच्या सुपरहीरोची म
शारुक्खानच्या सुपरहीरोची मस्करी? म्हणजे नक्की कुणाची? जी-१ ची? नूडल्समध्ये दही कालवून खाणारा तोच ना तो?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
डी डी ए ल जे
राज मल्होत्रा सुपरहिरो पेक्शा कमी होता काय, अमरिश पुरी सारखा बाप असताना, एक भुवई वाल्या पोरीला त्याच्या नाकाखालून पळवायचं म्हंजे काय खायची गोष्ट आहे का...
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
खरी गोष्ट वेगळीच आहे. "जा
खरी गोष्ट वेगळीच आहे. "जा बेटी, जी ले अपणी जिंदगी" म्हणताना आमरसपुरीच्या मनात आलेलं की पोरीनं तसंही शेण खाल्लेलंच आहे, तेव्हा ही ब्याद आता घरातून गेलेलीच बरी. नायतर कुलजीते ला राज (नाम तो सुना होगा) नं बंदूक दाखवूनही आमरसपुरीनं गच्च हात धरून ठेवलेला. तस्मात राज (नाम तो सुना होगा) चं कौतुक नाही. काजोलला धावता येईल इतक्याच स्पीडने रेल्वे पळवणारा रेल्वे डायवर आणि तिला जाऊ देणारा आमरसपुरी हेच खरे हीरो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शारुक
जळता हो तुम्ही..
त्याच्या गालावर दोन खड्डे आणि
आता तुमच्या हनुवटीवर सुद्धा एक आलाय नवीन..
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
पाने