माध्यमं गिधाडं आहेत का आणि चिंजंच्या प्रतिसादास उत्तर (ताजा, अॅडवलेला परिच्छेद इटॅलिक्स फॉण्टमध्ये)
चिंजंचा हा प्रतिसाद रोचक वाटला --
http://www.aisiakshare.com/node/5830#comment-150022
.
.
अमिताभ आणि शाहरुखने दिले नाही 'तिला' उत्तर ही बातमी वाचली. पण.......
माफ करा; कुणाला ऐकायला असंवेदनशील वाटू शकेल; पण... हा प्रकार मला गळेपडूपणा वाटतोय. कुणाहीसाठी आप्ताचा मृत्यूही अत्यंत दु:खदायक गोष्ट असणार ; पण तिच्या ट्वीटला अमक्या तमक्या स्टार्सनं उत्तर दिलं की नै; वेळेत का नै दिलं; ह्याची बातमी करणं हे शुद्ध दबावतंत्र आहे; गळेपडूपणा आहे. बिझी असतील यार ते स्टार्स.
आणि ह्या प्रकाराला गळेपडूपणा म्हणणं असंवेदनशीलता असेल; तर अशा प्रकारात बातमीमूल्य शोधणं ही गिधाडवृत्ती आहे पेपरवाल्यांची.
मुळात सध्या माध्यमं चेकाळल्यासारखी करताहेत; पब्लिकला गंडवताहेत आणि पब्लिकमधल्या बहुसंख्यांनाही हल्ली तेच हवय असं वाटतं. अगदि ठरवून माध्यमं "अमुक विष्जयावर चर्चा घडलीच पाहिजे; आणि त्याचा निष्कर्ष हाच आला पाहिजे" छपाचं काहीतरी करताहेत की काय असं वाटतं.
अमक्या तमक्या कॉलेजात कुणी पोरगं/पोरगी काय बडबडलं हे एकदम ठळ्ळक आणि भडक्क पद्धतीनं भसकन् समोर येतं वॉट्स अॅप फेसबुकवगैरेवर. लोकं तावातावानं बोलतात; त्त्वेषानं बोलतात. इतकच काय, निर्णय देउन मोकळे होतात. आणि बोलताना असं काहीतरी बोलून जातात की एखादं तरी वाक्य टोचतच; तेचुकीचं आहे हे धडाधडित दिसतं. मग आपणही ते कसं चुकीचं आहे ते सांगायला जातो. सांगताना माध्यमाच्या मर्यादेमुळे आणि वेळेच्या मर्यादेमुळे एखादी गडबड करुन जातो. आपले प्रतिसाद अजून काही प्रतिसादांना कारणीभूत होतात; आणि चेन रिअॅक्शनचा आपण हिस्सा बनून जातो.
अक्षरशः आपल्या डोक्याचं प्रोग्रामिंग होतय की काय; असं वाटतं खूपदा.
सध्या किंचित गडबडित आहे. फुरसतीत अधिक टंकतो.
.
.
आताच चिंजंचा प्रतिसाद दिसला. हे चिंजंना माझं उत्तर --
संपूर्ण प्रतिसादास +१.
माणूस व्यग्र असू शकतो हे मान्य आहे; आणि तोच मुद्दाही आहे.अमिताभही चिंजंसारखे बिझी असू शकतात. त्याचच प्रात्यक्षिक म्हणून एखादं यादृच्छिक्/रॅण्डम नाव टाकावंसं वाटलं धाग्यात.ते माझ्या डोक्यात आलं त्यावेळी ताजा प्रतिसाद चिंजंचा दिसला; आणि त्यांच्याच नावाचा उल्लेख केला. बिझी माणूस त्याच्या नावाचा उल्लेख असलेली गोष्ट पाहू शकेलच आणि त्यास उत्तर देउ शकेलच असं नसतं; हेच मांडायचं होतं. हेच त्याचं प्रात्यक्षिक. अर्थात ह्यात तुमचा उल्लेख केलेलं खटकत असेल तर दिलगीर. सहज त्यावेळी समोर दिसलेलं नाव घ्यावंसं वाटलं; आणि थोडाबहुत का असेना जालिय परिचय होता; त्यामुळे हा थोडासा धसमुसळेपणा केला. खेद आहे. दिलगीर आहे.
अर्थात ह्या दरम्यान इतर काही परिचितांचं नाव घ्यावंसं वाटलं तरी घेतलं नाही; कारण एकतर ते त्यावेळी सक्रिय नव्हते आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते अशा डामरटापणाला पुरुन उरतात; सवा शेर आहेत. --अनु राव , बॅटमॅन वगैरे.
त्यांनी शुद्ध दुर्लक्ष करुन खात्मा केला असता.
--मनोबा
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
सध्या किंचित गडबडित आहे.
सध्या किंचित गडबडित आहे. फुरसतीत अधिक टंकतो.
(१) अधिक टंकण्यापेक्षा जे काही लिहिलंयस ते एक किंवा दोन परिच्छेदांत कन्सॉलिडेट कर.
(२) मिडियाला नावं ठेवणं हे बहुतांश वेळा चूक असतं.
(३) A and B trying to decide what C should do for D - असं होतंय का ? - ची चाचणी वापरली तर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात.
सर्वेपि बिझिना जंतू
माफ करा; कुणाला ऐकायला असंवेदनशील वाटू शकेल; पण... हा प्रकार मला गळेपडूपणा वाटतोय. कुणाहीसाठी माध्यमांचं गिधाडं असणं ही अत्यंत दु:खदायक गोष्ट असणार ; पण त्याच्या धाग्यावर अमक्या तमक्या जंतूनं उत्तर दिलं की नै; वेळेत का नै दिलं; ह्याची बातमी करणं हे शुद्ध दबावतंत्र आहे; गळेपडूपणा आहे. बिझी असतील यार ते जंतू.
धागा volatile आहे. नंतर
धागा volatile आहे. नंतर आलेल्यांना गूढ वाटणार आहे असे भविष्य वर्तवते. कारण "चिंजं इग्नोर मारतायत का?" हा मूळ मुद्दा आता शीर्षकातून गायब झाला आहे. मग मनोबाने दिएले स्पष्टीकरण नक्की कशाचे असा प्रश्न पडू शकतो.
मूळ नाव होते - माध्यमं गिधाडं आहेत का आणि चिंजं इग्नोअर मारतायत का?
____
पण दाखल्याशी सहमत. प्रॅक्टिकलमुळे थिअरी उलगडली.
मनोब, तुला ती गोष्ट माअहिती आहे ना
मनोब, तुला ती गोष्ट माहिती आहे ना एका मुलाची? तो मुलगा नेहमी त्याच्यासमोर एक रुपयाचं कॉइन ठेवलं आणि दोन रुपयाचं ठेवलं; तर एक रुपयाचं कॉइन उचलत असतो. सगळ्यांना वाटतं किती येडचोट आहे. म्हणून त्याचा येडेपणा बघायला तर दरवेळी एक रुपयाचं एक अन् दोन रुपयाचं दुसरं असं कॉइन ठेवतात समोर.
ज्या दिवशी तो दोन रुपयाचं कॉइन उचलेल त्या दिवशी खेळ खल्लास
मनोबा ऐसी या माध्यमाचा वापर करुन
भडक शीर्षक वापरुन ,
चिंजं या सेलिब्रीटी चा वापर करुन
त्यांना हव्या त्याच विषयावर चर्चा करायला भाग पाडत आहेत.
आता या लेखामागची प्रेरणा मन यांनी विशद केल्यास
माध्यमे का अशी वागतात ते नक्कीच उदाहरणासहीत कळेल
हा प्रतिसाद चेन रीॲक्शनचाच हीस्सा समजावा
हा मनोबा ने चिंजं च्या गळ्यात पडण्याचा व मी मनोबा चा गळा दाबण्याचाच एक प्रकार आहे हे माध्यमसराइतांस वेगळे सांगणे न लगे
मान्य.
होय, तो गळेपडूपणाच आहे. अगदीच भावनाशून्य शब्दांत सांगायचं तर नवर्याचा मृत्यू वसूल (Death Encash, for the lack of a better word) करण्याचा प्रकार वाटतो.
ह्यामागची कारणमिमांसा:
मला (आणि माझ्या आप्तस्वकीयांना) तरी, जवळचं कोणी गेलं तर फेसबुक स्टेटस अपडेट करावंसं वाटणार नाही. साधारण काही महिन्यांनी मी एक औपचारिक स्टेटस अपडेट टाकेन, ज्यात सहानुभूती दाखवणार्यांचे आभार मानलेले असतील. बस्स. संपलं. आता तिने काय लिहावं हा अर्थातच तिचा प्रश्न आहे, पण ते स्टेटस अपडेटही बर्यापैकी दिखाऊ वाटतंय. त्यातही नीट पाहिलं तर, जे लोक सोमींवर जास्त Active असतात त्यांनाच तिने व्यवस्थित टॅग केलेलं आहे.
हा सगळा योगायोगही असू शकतो, आणि तिच्या भावना खरंच शुद्धही असूच शकतात. पण ते स्टेटस वाचल्यानंतर माझ्या मेंदूने त्याचं असं अॅनॅलिसिस केलंय. #कॉल्मीअसेडिस्ट.
तरीही,
मटाने त्याचं जे काही केलय, ते फक्त आणि फक्त गिधाडगिरी आहे.
कुचिभोटलाच्या हत्येचे पडसाद अमेरिकेत आणि भारतात उमटत असतानाही या दोन आघाडीच्या अभिनेत्यांनी सुनयना यांची पोस्ट वाचण्याचीही तसदी घेतलेली नाही. अमिताभ बच्चन 'सरकार ३' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे तर शाहरुख त्याच्या फॅन्सना बॉडी स्क्लप्टरमधला व्हिडिओ दाखवण्यात धन्यता मानतोय.
हे क्काये ? आता मटाकडून संवेदनशीलता शिकावी का अमिताभ/शाहरुखने? फक्त मृत्यूचं भावनिक (Sacrosanct) कारण पुढे करून तो टुकार लेख उगीच व्हायरल होईल अशी बालिश अपे़क्षा दिसतेय संपादकांची.
(३) A and B trying to decide what C should do for D - असं होतंय का ? - ची चाचणी वापरली तर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात.
गब्बरसिंगनी एका वाक्यात गेम आटपलेला आहे.
त्या दोघांनी जरा दिलासा द्यायला हरकत नव्हतीच, पण मटाने ते त्यांना करायला सांगू नये. किंवा आता ते दोघं काय करतायत आणि त्याऐवजी त्यांनी काय केलं पाहिजे, हे सांगणं हे मटाचं, किंवा कोणाचंच काम अजिबात नाहीये.
मिडीया ला नावे ठेवण्यात अर्थ
मिडीया ला नावे ठेवण्यात अर्थ नाही मनोबा. त्यांची रोजीरोटी आहे. इमोशनल अत्याचाराचा मुळ बिंदु मिडीयाच्या थोडा आधी आहे.