संस्कृती
सभ्यता आणि सम्यकता
Taxonomy upgrade extras
आजच्या जमान्याची एक खासियत आहे. ही खासियत सांगण्यापूर्वी आजचा जमाना म्हणजे काय ते सांगणे गरजेचे आहे. हा जमाना एका विशिष्ट कालबिंदूवर जन्म घेत नाही. प्रत्येक घरात, कुटुंबात, गावात, जातीत, धर्मात, देशात, क्षेत्रात, धर्मात तो विचित्रपणे चालू होतो, बंद होतो, पून्हा चालू होतो. पण गेल्या ५० एक वर्षांपासून बर्यापैकी सतत चालू आहे आणि त्याचा जोर आणि व्याप्ती फारच वाढली आहे. असो. काय आहे ही खासियत? ती आहे माणसाला असलेल्या अकलेचा शोध. लोकांना अचानक असा आत्मसाक्षात्कार झाला आहे कि त्यांना प्रचंड अक्कल आहे.
- Read more about सभ्यता आणि सम्यकता
- 217 comments
- Log in or register to post comments
नियोग ही परंपरा असलेला समाज आणि विकी डोनर सिनेमा ची गरज !
Taxonomy upgrade extras
विकी डोनर सिनेमा
विकी डोनर या चित्रपटात असे पात्र दाखविले आहे की ज्याचा व्यवसाय पैसे घेउन वीर्य विकणे हा आहे. आणि त्याच्या वीर्याचा वापर अपत्यहीन जोडप्यांना मुल व्हावे यासाठी केला जातो.या चित्रपटाद्वारे एक संदेश देण्यात आला आहे की अशा प्रकारे आपले वीर्य विकणे यात काहीही गैर नाही आणि याने अपत्यहीन जोडप्यांच्या आयुष्यात मुल यायचा मार्ग मोकळा होतो आणि त्यांचे जीवन आनंदी होते. चित्रपटाच्या शेवटी सर्वजण यातील नायकाच्या या कामाचे कौतुक करतात व त्याचा स्विकार करतात व चित्रपट वीर्यदान कशी चांगली गोष्ट आहे हे त्याचा अंगिकार केला पाहीजे हे ठसवितो.
वीर्यदान आणि नियोग एक तुलना
पांडव आणि राम ह्यांचे आदर्श.
Taxonomy upgrade extras
'पांडव/राम हे वंद्य आहेत ही तर भारतीय संस्कृतीची आधारभूत भूमिका' असे आजच दुसर्या एका धाग्याच्या प्रतिसादात मी लिहिले. तेथपासून ही पुढील विचारधारा निर्माण होते.
पांडवांनी राज्याचा वाटा मिळविण्यासाठी कौरवांशी निकराचे युद्ध केले आणि अपरिमित जीवनहानीनंतर त्यांनी नुसता वाटाच नाही, पूर्ण राज्य ताब्यात घेतले ही महाभारताचे मुख्य कथानक. त्यांनी हे जे केले त्याबद्दल सर्व भारतीय त्यांची स्तुतिगीते गात आले आहेत. अशा स्तुतीला ते कितपत पात्र होते आणि, त्याच्याहि पुढे जाऊन, आपल्या वर्तणुकीमधून त्यांनी पुढच्या पिढयांना काय शिकवणूक दिली आणि त्या शिकवणुकीतून पुढच्या पिढयांना कितपत लाभ अथवा नुकसान झाले?
पांडवांच्या पूर्वीच्या अनेक पिढयांकडे नजर टाकता असे दिसते की भारतात बापाकडून मुलाकडे राज्य primogeniture (थोरला मुलगा हा सर्वोत्तम वारस) मार्गाने संक्रमित होत असे. कुरुकुलातहि भरतापासून हीच पद्धति चालू होती. (पांडवांच्या पूर्वीच्या कुरुकुलातील राजांची नावे महाभारतातील आदिपर्वाच्या अध्याय ९४ आणि ९५ येथे पहा - गांगुली भाषान्तर). कौरवपांडवांच्या काळच्या अधिक जवळ आल्यावर दिसतात शंतनूचे दोन मुलगे चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगद गंधर्वांशी लढतांना पडला आणि विचित्रवीर्य राजा झाला. त्याचे तीन मुलगे - धृतराष्ट्र, पंडु आणि विदुर. धृतराष्ट्र अंध असल्याकारणाने तो जरी राजा झाला तरी कारभार प्ंडु करीत असे. ऋषीच्या शापामुळे पंडूला स्वत:चे पुत्र होणार नाहीत असे दिसल्यावर पंडु विरक्त होऊन वनवासात गेला आणि त्याच्या सूचनेवेरून कुंतीने तीन आणि माद्रीने दोन देवांपासून पुत्रोपत्ति करून घेतली तेच पाच पांडव.
हे सर्व लक्षात घेतले की पांडवांचा राज्याचा वाटा मागण्याचा दावा पोकळ होता असे दिसते. ते औरस होते वा नव्हते हा विचार न करताहि पांडवांची अर्ध्या वाटयाची मागणी प्रस्थापित ’राजाच्या थोरल्या मुलाचा हक्क’ ह्या तत्त्वाच्या संपूर्ण विरोधात होता. ’पंडूने काही काळ राज्य केले’ हाही विचार येथे करता येत नाही कारण थोरला भाऊ असतांना पंडु केवळ त्याचा regent म्हणून राज्य करीत होता आणि त्यामुळे त्याच्यापासून पांडवांकडे कोणताच अधिकार संक्रमित होत नाही.
तरीही पांडवांनी इतके मोठे युद्ध केले. ’इतिहास विजेते लिहितात’ ह्या तत्त्वानुसार अर्थातच पांडव हे तत्त्वासाठी भांडणारे आणि कौरव त्यांना विरोध करणारे दुष्ट हा विचार प्रस्थापित झाला पण तो योग्य होता का?
हा प्रश्न केवळ पांडवांच्या झगडून वाटा मिळविण्याइतकाच मर्यादित नाही. त्यातून पुढे मालमत्ता ही संपूर्ण कुटुंबाची आणि प्रत्येक पिढीतील पुरुष सदस्याला त्यातील भाग तोडून मागण्याचा अधिकार आहे ह्या विचाराला चालना मिळाली आणि हा विचार नाना स्मृतींमध्ये ग्रंथबद्ध होऊन भारतीय संस्कृतीचा एक भाग बनला.
भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा विचार विनाशकारक ठरला असे दिसते. एकतर जुन्या मालमत्तांचे लहानलहान तुकडे पडत गेल्याने व्यक्तींची आर्थिक क्षमता पिढीमागून पिढी घसरत गेली. मोठ्या मालमत्तांमधून होणारा भांडवलाचा संचय होऊ शकला नाही. दुसरीकडे काहीतरी भाकरतुकडा घरातच उपलब्ध व्हायची शाश्वती मिळाल्याने धडपड करून बाहेर पडण्याला आणि नवे प्रदेश, नवी क्षितिजे शोधण्याला काही अर्थ राहिला नाही. युरोपीय संस्कृतींमध्ये कुटुंबाच्या समाईक मालकीची आणि पिढी-दरपिढी वाटपाची पद्धत नव्हती. मिळकतदार घराण्यांमध्ये सर्व मिळकत बहुतांश थोरल्या मुलाला मिळत असे. अन्य मुलांना स्वत:च्या उपजीविकेचे मार्ग शोधायला लागत असत. काहीजण सैन्यात, काहीजण वकिली-वैद्यकी-चर्च अशा व्यवसायांचे शिक्षण घेऊन तर काहीजण अमेरिका-पूर्वेकडचे देश असे आपापले मार्ग चोखाळत. ह्यातून त्यांचा वैयक्तिक लाभ तर होईच पण त्यांच्या त्यांच्या देशांचा प्रभावहि दूरवर पसरे. ह्यातील काहीच आपल्याकडे घडले नाही आणि त्याला कारण महाभारताने आपल्यापुढे ठेवलेला ’वाटणी मागणे आणि त्यासाठी वेळप्रसंगी एकमेकांच्या उरावर बसणे योग्यच’ हा धडा.
पांडवांप्रमाणे राम हा आपला एक आदर्श. पण त्याचे वागणे सर्वकाळ आदर्शवत् होते काय? सीतात्यागाच्या बाबतीत त्याचे वर्तन मला वैयक्तिक पातळीवर निंदनीय आणि राजा म्हणून कर्तव्यच्युति दर्शविणारे वाटते.
रावणाच्या पराभवानंतर आणि वधानंतर सीता रामाकडे परत आली आणि त्याने तिला आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्य करून दाखवायला सांगितले. (फेमिनिस्टांचा पहिला आक्षेप येथेच आहे पण माझा मुद्दा तो नाही.) ती दिव्याला उतरली आणि हे रामाने स्वत: पाहिले. तरीहि काही वर्षांनंतर एका धोब्याने काही शंका व्यक्त केली आणि एव्हढयावरून त्याने सीतेचा त्याग केला. ’स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि। आराधनाय लोकानां मुञ्चतो नास्ति मे व्यथा॥’ असे त्याचे कारणहि दिले.
लोकाराधन राजाने करावे हे योग्यच आहे पण त्याला किती महत्त्व द्यावे? ’काहीहि करेन पण लोकाराधन करेन’ इतक्या टोकाला ते नेणे योग्य आहे काय? राजाची अन्यहि कर्तव्ये असतात. प्रजेच्या अधिकारांचे रक्षण हे एक राजाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपल्या पावित्र्याची सत्यता आणि शीलावर डाग न लागणे हा सीतेचा अधिकार होता आणि रामाला तो ठाऊक होता. तरीहि रामाने येथे त्याची पायमल्ली करून लोकाराधनाला प्राधान्य दिले. त्याने हे योग्य केले काय? ’आपल्या सिंहासनाला धक्का पोहोचू नये’ म्हणून त्याने अबलेचा बळी दिला असे म्हणता येईल काय?
आपणांस काय वाटते?
- Read more about पांडव आणि राम ह्यांचे आदर्श.
- 44 comments
- Log in or register to post comments
रसिकांतले काही अग्रणी
Taxonomy upgrade extras
नुकताच, पार्ल्याच्या एका संस्थेत, लताच्या रागदारीवर आधारलेल्या गाण्यांवर एक सुंदर कार्यक्रम झाला. सादर करणारे , स्वतः रागदारी गाणारे होते. एकेक राग थोडक्यांत गाऊन, त्यानंतर त्यावर आधारित लताचे हिंदी चित्रपटातील एक गाणे लावत होते. हजार रसिकांचा श्रोतुवर्ग, तल्लीन होऊन कार्यक्रमाचा एक भागच बनले होते. अतिशय सुंदर अनुभव होता तो. माझ्या बाजूला एक वृद्ध सरदार बसले होते. निव्वळ गाण्याच्या आवडीने ते लांबून आले होते. रागाचे नांव सांगितले की, कुठले गाणे लावणार, याचा त्यांचा अंदाज वाखाणण्यासारखा होता. काहीही ओळखपाळख नसताना ते माझ्याशी मोकळेपणे संवाद साधत होते.
- Read more about रसिकांतले काही अग्रणी
- 7 comments
- Log in or register to post comments
"रोल्स रॉयस
Taxonomy upgrade extras

ज्या प्रमाणे एखादी लोकप्रिय व्यक्ती "लिजंड" बनते व तिच्या भोवती आख्यायिका चे वलय उभे राहते
तिच गोष्ट "रोल्स रॉयस" कार संबंधी आहे..अतिशय उच्च दर्ज्याचे तंत्रज्ञान वापरुन अमीर लोका साठी ह्या विलासी गाड्या बनवल्या जातात..
- Read more about "रोल्स रॉयस
- 11 comments
- Log in or register to post comments
प्रतिज्ञा, दाभोळकरांचा मारुती आणि सान्ताक्लॉज
Taxonomy upgrade extras
भारत माझा देश आहे।
सर्व भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।
- Read more about प्रतिज्ञा, दाभोळकरांचा मारुती आणि सान्ताक्लॉज
- 55 comments
- Log in or register to post comments
इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी विदुषी - प्राची देशपांडे
“ऐसी अक्षरे” परिवारातल्या डॉ. प्राची देशपांडे यांना अलीकडेच बौद्धिक आणि शास्त्रीय ज्ञानविश्वात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ‘इन्फोसिस पुरस्कार‘ मिळाला. त्या निमित्ताने त्यांच्या संशोधकीय कार्याची ही ओळख.
भाषा आणि स्मृती : सैद्धान्तिक व्यूह
Taxonomy upgrade extras

प्रस्तावना
भाषिक स्मृतीचा विचार या लेखात दोन पातळ्यांवर केलेला आहे. मेंदूतील भाषेची साठवण या अर्थाने भाषिक स्मृतीचा उलगडा पहिल्या भागात केला आहे. भाषिक स्मृती सामाजिक पातळीवर समजून घेताना, विशेषतः भाषेच्या संदर्भात, कोणते सैद्धान्तिक पेच आपल्या समोर उभे राहतात याचा विचार दुसऱ्या भागात केलेला आहे.
- Read more about भाषा आणि स्मृती : सैद्धान्तिक व्यूह
- 7 comments
- Log in or register to post comments
आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ४
Taxonomy upgrade extras
दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.
दंगल, स्त्रीवाद, ट्रांजॅक्शन्स कॉस्ट इकॉनॉमिस्ट्स, इ.
Taxonomy upgrade extras
कुस्ती रक्तात असते असं मानणारा आमीर खान शेवटी मूलगा न झाल्याने आपल्या मूलींनाच इतके लायक बनवतो कि त्याच जागतिक गोल्ड मेडल मिळवतात. नितांत सुंदर चित्रपट. सत्याधारित आहे. अवश्य पाहावा.
=============
बरेच शास्त्रीय गैरसमज पसरवणारा नि स्त्रीवाद्यांनी एडीट केलेला पण आहे, पण ते इग्नोरून भाऊकतेने पाहावा.