दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ मार्च
जन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)
मृत्युदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)
---
राष्ट्रीय नौका दिन.
१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला
१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.
१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.
१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.
१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.
१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.
१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.
१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सुनील
प्रतिक्रिया
ह्म्म्म
चारोळी प्रकार जितका ताकदवान तितकाच फसवाही आहे. ही चारोळी फारशी नाही आवडली.
'कधीकाळी' शब्द तालभंग करतो आहेच 'आता' या शब्दामुळे त्याची गरजही नाही.
त्यापेक्षा
ठीक वाटेल का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद...
धन्यवाद...
खरतर "कधीकाळी" हा शब्द मी मुद्दामच वापरला आहे...
"तो काळ माझ्या जीवनाचा एक महत्वाचा टप्पा होता किंवा तो काळ, त्या आठवणी सध्या मला सलतायेत" हे सांगण्यासाठी...
तरीही, तुमच्या प्रतिक्रियेवर मी नक्कीच विचार करेन...
पुन्हा एकदा धन्यवाद...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
माफ करा
पण चारोळी तितकी आवडली नाही. उगाच ओळीला ओळ जोडल्यासारखी वाटली.
अर्थात अशा चारोळ्यांच्या उगमाचा दोष आम्ही 'चंगों'च्या माथी मारुन आधीच मोकळे झालो आहोत.
गंमत म्हणून विडंबन करतो आहे. कृपया ह. घ्या.
भलतेच चारोळीकार जन्माला येतात हल्ली
'मी माझा' वाचल्यावर..
आता जिलब्याच जिलब्या दिसतात
कधीकाळी साहित्याला वाहिलेल्या आंतरजालावर..
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
"काय सुधारणा करता येऊ शकते" हे सांगितलं असतं तर....
विडंबना आवडली... छान आहे...
हो, "चंगो" यांच्या चारोळ्या अप्रतिम असतात, त्यात वादच नाही...
आणि चारोळी हा प्रकार त्यांच्यामुळे खूप प्रचलित झाला हे देखील मी मान्य करतो...
माझ्या मते कुठल्या ना कुठल्यातरी काव्यप्रकाराची सुरुवात कुणी एक व्यक्ती करतं आणि नंतर तो प्रचलित होतो...
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार...
पण, इतर गोष्टींपेक्षा, तुम्ही जर का "काय सुधारणा करता येऊ शकते" हे सांगितलं असतं तर लेखनात मला त्याचा नक्कीच फायदा झाला असता...
कारण माझ्या मते, "ऐसी-अक्षरे" किंवा अश्या इतर Blogs चा उपयोग (तुम्ही दिलेल्या मौल्यवान प्रतिक्रियेने) माझ्या किंवा इतरांच्या लेखनात, त्याच्या मांडणीत सुधारणा होण्यास नक्कीच होउ शकतो...
असो, पुन्हा धन्यवाद...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
धन्यवाद हो. आम्ही काय कवी
धन्यवाद हो.
आम्ही काय कवी वैग्रे नाय पण प्रयत्न करतो तुमच्यासाठी.
भलतेच प्रश्न उभे राहतात हल्ली,
एकांतात आकाशाची साथ लाभल्यावर..
चंद्रावरही डाग का जाणवतात,
पोर्णीमेची साथ असल्यावर...
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
धन्यवाद...
तुमची चारोळी चांगली आहे... धन्यवाद...
परंतु, माझ्या चारोळीचा आशय वेगळा होता... तो कदाचित कळला नसेल...
*म्हणून* मी नक्कीच माझ्या लेखनात बदल करेन...:)
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
फारशी अर्थगर्भ अथवा
फारशी अर्थगर्भ अथवा भावनोद्दीपन करणारी नाही वाटली.
किंचित क्लिष्ट वाटली रचना.
किंचित क्लिष्ट वाटली रचना. खालच्या चारोळीत तुम्हाला म्हणायचं ते सगळं येत नाही, पण एक साधेपणा आहे. तसा आणता आला तर बघा.
एक असाही काळ होता
जेव्हा आकाशाचा प्रश्न पडत नसे
आणि चंद्राकडे पाहिल्यावर
फक्त तिचा चेहरा दिसत असे
धन्यवाद...
रचना छान आहे...
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."