भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते. तसेच ते ज़ीया ना भुट्टो यांच्याबद्दल पण होते.त्यानी भुट्टो यांच्यावर निरनिराळे आरोप लावून त्याना मृुत्यदंड मिळेल याची व्यवस्था केली. पिलू मोदी या आपल्या जवळच्या मित्राला शेवटच म्हणून भेटायला पाकिस्तान मध्ये गेले. जवळचे मित्र असल्याने त्याना भुट्टो ना तुरुंगात जाउन भेटण्याची परवानगी लगेच मिळाली. भुट्टो हे तसे प्रचंड भारत विरोधक. १९७१ च्या युध्ाच्या वेळेला युनो मध्ये केलेले 'इंडियन डॉग्स' असा भारतीयांचा वारंवार उल्लेख करून केलेले भाषण खूप गाजले होते. इंटरनेट वर त्या भाषणाच्या क्लिप्स पण उपलब्ध आहेत. पण त्या शेवटच्या भेटीत भुट्टो यांच वेगळच रूप मोदी याना बघायला मिळाल. भुट्टो यानी मोदी याना सांगितल ,'' आम्हाला नेहमी भारतीय सांसदीय लोकशाहीची खिल्ली उडवायला आवडत. पण हे सांसदीय लोकशाहीच भारताच बलस्थान आहे. तुमच्या संसदेत नेहमी आरडाओरडा असतो, बजबजपुरी असते. पण या सगळ्यात एक उर्जा आहे. एक सुसूत्रता आहे. या लोकशाहिमुळेच भारत एकसंध आहे. नाहीतर भारताचे आतापर्यंत अनेक तुकडे झाले असते. " या कट्टर भारत विरोधकाने भारतीय लोकशाहीला दिलेली ही एक सलामीच.

हा किस्सा पुन्हा आठवायचे कारण म्हणजे पुन्हा काही पाकिस्तानी लोकांकडून हीच प्रतिक्रिया क्वेटा मध्ये झालेल्या भीषण बॉम्बबलास्ट नंतर ऐकायला मिळाली. मी http://www.defence.pk/ या पाकिस्तानी संस्थळाचा सदस्य आहे. हे एक डिस्कशन फोरम आहे. इथे अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा होत असत. जरी हे पाकिस्तानी संस्थळ असल तरी इथे कुणीही चर्चा करू शकत असल्याने अनेक राष्ट्रियत्वाचे लोक मेंबर आहेत. भारतीय, चिनी, बांगलादेशी, अमेरिकन, युरोपियन, आणि अगदी विएतनाम चे पण नागरिक पण विविध विषयांवर इथे आपली मत देत असतात. पाकिस्तानी संस्थळ असून पण हे चक्क लोकशाही धर्तीवर याचे काम चालते. म्हणजे तुम्ही पाकिस्तान वर इथे जहाल भाषेत टीका पण करू शकता. पाकिस्तान च्या राष्ट्रीय धोरणांवर पण टीका करू शकता. (अवांतर- याच धर्तीवर एक भारतीय डिस्कशन फोरम पण आहेत. पण बहुतांशी संस्थळ ही अती उजव्या व आक्रमक भारतीय राष्ट्रवादचा पुरस्कार करणार्यांकडून कडून चालवली जातात. त्याना सोयीस्कर तेवढीच मत तिथ स्वीकारली जातात. वेगळी मत असणारी लोक तिथे स्वीकारली जात नाहीत. त्यामुळे निष्पक्ष चर्चा होण्याला मर्यादा पद्तात.त्यामुले अनेक संतुलित विचार करणारे भारतीय पण या फोरम पेक्षा पाकिस्तान डिफेन्स फोरम ला पसंती देतात.) सार्वजनिक संस्थळ असल्याने अनेक भारतीय व पाकिस्तानी कट्टर पंथीय पण तिथे धुमाकूळ घालत असतात. पण त्याचबरोबर अनेक देशामधले विचारवंत, मुत्सद्दी, निवृत्त लष्करी अधिकारी पण आपली अभ्यासू मत देत असतात. त्यात अनेक पाकिस्तानी लोकांचा पण समावेश आहे. सध्या पाकिस्तान मध्ये जे काही चालू आहे त्यामुळे या विचारवंतामध्ये अस्वस्थ विचारमंथन चालू आहे. आपल्यासोबतच स्वतंत्र झालेला भारत आज अनेक समस्या शी लढत इंच इंच पुढे जात आहे आणि आपण आपल्या अस्तित्वाचाच लढा लढत आहोत ही वस्तुस्थिती या 'Intellectuals' ना अस्वस्थ करत आहे. परवा क्वेटा इथे बॉम्बस्फोट होऊन ८४ शीया मारले गेल्यावर या अस्वस्थेचा स्फोट झाला. आणि या स्फोटा बद्दल भारताला जबाबदार धरणार्‍या काही पाकिस्तानी मेंबेर्स ला एका सीनियर पाकिस्तानी डिप्लोमॅट ने धारेवार धरले आणि भारतीय लोकशाही बद्दल झुल्फीकार अली भुट्टो च्या जवळ जाणारे हेच मत मांडले.

मात्र कट्टर राष्ट्रवादाचे चष्मे चढवून इथे येणार्‍या प्रत्येकाला सावधानतेचा इशारा. वर्षानुवर्ष आपण जपलेली काही ऐतिहासिक भ्रम इथे चकनाचुर होऊ शकतात. काय आहेत हे ऐतिहासिक भ्रम. १९६५ च युद्ध खरच आपल्याला सांगितल्या गेल तास आपण क्लीन स्वीप करून जिंकल होत का? का इतर आंतरराष्ट्रीय माध्यमानी या युध्ाला स्टेल मेट (म्हणजेच बरोबरीत सुटलेल युद्ध) ठरवल होत? कारगिल युद्ध खरच वाजपेयी सरकारने ढोल बडवाल्याप्रमाणे महान राष्ट्रीय विजय होता का सरकार आणि लष्कर यांच्या अक्षम्य दुर्लक्षाचा कारगिल युद्ध हा परिपाक होता? टाइगर हील जवळील पॉइण्ट ५३५३ हे शिखर अजुन पण पाकिस्तान च्या ताब्यात आहे. जर आपण हे युद्ध जिंकल असु तर हे शिखर अजुन पाकिस्तांन च्या ताब्यात का? कारगिल मध्ये नेमके किती जवान धारतीर्थी पडले? प्रश्न आणि नवीन प्रश्न. भारतासारख्या लोकशाही देशात जिथे मुक्त माध्यम आहेत त्या देशात पण राष्ट्रवादाचे ढोल बडवत सत्याचा कसा लोप केला जातो हे समजल्यावर मन खिन्न होत.

अजुन एक महत्वाच म्हणजे अनेक भारतीय मुस्लिम या संकेतस्थळावर भारत हा कसा सेक्युलर देश आहे हे हिरीरीने मांडत असतात. समाजातल्या एका 'brainwashed' हिश्श्याने या समाजाला कधीच 'पाकिस्तानी' असे घोषित करून वाळत टाकले आहे तरी पण ते हिरीरीने आपल्या देशाची बाजू मांडत असतात हे विशेष.

आपल्या जखमेवर मीठ शिंपडणारी अजुन एक गोष्ट म्हणजे पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई दलावर अनेक चकमकित वर्चस्व गाजवले आहे. पुढची महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा बाळगणार्‍या या देशाचे लष्कर सध्या युद्ध चालवायला खरेच सक्षम आहे का? आपले रणगाडे रात्री धावू पण शकत नाहीत. तोफांच्या बाबतीत पाकिस्तान पण आपल्यापेक्षा वरचढ आहे. पाकिस्तान चा क्षेपणास्त्र कार्याक्र्म् आपल्या पेक्षा काकणभर सरस च आहे. ही तथ्य कळली की भारताने संसदेवरील हल्ल्यानंतर आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यांनंतर पाकिस्तान ला का प्रत्युत्तर दिले नाही हा प्रश्न पडेनासा होतो.

अस म्हटल जात की प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. तुमची, समोरच्याची आणि सत्याची. डोळे उघडे ठेवून सत्य स्वीकारायच का राष्ट्रवादाचा काळा चष्मा लावून त्याकडे बघायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

:).
तुर्तास चर्चा वाचतो आहे इतकेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://mr.upakram.org/node/3455
http://www.misalpav.com/node/19154
लेखाच्या शेवटाची माझी वाक्ये :-

आपल्यातल्या काहिंना वाटते तसे हे युद्ध आपण १००% जिंकले, अशातला भाग नाही. आपण काही फार कमावले नसले तरी गमावले नाही इतकेच.वर आपले पंतप्रधान हे करार केल्याबरोबर एका रात्रीतच हृदयविकाराच्या झटक्याने कसे काय गेले ह्याबद्दल एक संशयी चर्चा दबक्या आवाजात कायम सुरु राहिली ते वेगळेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

@मन खूप छान आणि संतुलित मांडणी आहे तुमच्या लेखात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

रोचक लेख. डिफेन्स.पीके आणि जय महाराज नामक ट्रोलबद्दल कधीकाळी थोडेसे वाचले होते, पण आता अजून बरेच इकडेतिकडे पहावे लागेल असे वाट्टेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान चांगले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई दलावर अनेक चकमकित वर्चस्व गाजवले आहे. पुढची महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा बाळगणार्‍या या देशाचे लष्कर सध्या युद्ध चालवायला खरेच सक्षम आहे का? आपले रणगाडे रात्री धावू पण शकत नाहीत. तोफांच्या बाबतीत पाकिस्तान पण आपल्यापेक्षा वरचढ आहे. पाकिस्तान चा क्षेपणास्त्र कार्याक्र्म् आपल्या पेक्षा काकणभर सरस च आहे.

याबद्दल अधिक वस्तुनिष्ठ तपशील वाचायलाही आवडेल.

पाकिस्तान हे कसं नरक आहे आणि भारतमात्र स्वर्ग आहे अशा भ्रमातून बाहेर येणं आपल्यासाठी हिताचं. युद्ध करून भलं होईल अशी कोणत्याही देशाची पत आत्ता नाही हे समजलं तरी चिकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@आदिती जरा या लिंक बघ

http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/nimittamatra/entry/%E0%A4%B...

http://www.infa.in/index.php?option=com_content&task=view&id=1631&Itemid=38

SUNDAY TIMES, London, September 19, 1965.

"Pakistan has been able to gain complete command of the air by literally knocking the Indian planes out of the skies if they had not already run away.
Indian pilots are inferior to Pakistan's pilots and Indian officer's leadership has been generally deplorable. India is being soundly beaten by a nation which is outnumbered by a four and half to one in population and three to one in size of armed forces".

Peter Preston, The Guardian, London.
September 24, 1965.

"One thing I am convinced of is that Pakistan morally and even physically won the air battle against immense odds.
Although the Air Force gladly gives most credit to the Army, this is perhaps over-generous. India with roughly five times greater air power, expected an easy air superiority. Her total failure to attain it may be seen retrospectively as a vital, possibly the most vital, factor of the whole conflict.
Nur Khan is an alert, incisive man of 41, who seems even less. For six years until July he was on secondment and responsible for running Pakistan civil airline, which in a country, where now means sometime and sometime means never, is a model of efficiency. He talks without the jargon of a press relations officer. He does not quibble about figures, immediately one has confidence in what he says. His estimates proffered diffidently, but with as much photographic evidence as possible, speak for themselves. Indian and Pakistani losses, he thinks are in something like the ratio of ten to one.
"The Indians had no sense of purpose, the Pakistanis were defending their country and willingly taking greater risks. The average bomber crew flew 15 to 20 sorties. My difficulty was restraining them, not pushing them on".
" This is more than nationalistic pride. Talk to the pilots themselves, and you get the same intense story".

Patrick Seale, The Observer, London.
September 12, 1965.

"Pakistan's success in the air means that she had been able to deploy her relatively small army___ professionally among the best in Asia___ with impunity, plugging gaps in the long front in the face of each Indian thrust.
By all accounts the courage displayed by the PAF pilots is reminiscent of the bravery of the few young and dedicated pilots who saved this country from Nazi invaders in the critical Battle of Britain during the last war".

Roy Meloni, Correspondent of ABC,
September 15, 1965.

"I have been a journalist now for 20 years and want to go on record that i have never seen a more confident and victorious groups of soldiers than those fighting for Pakistan right now.
"India is claiming all out victory, i have not been able to find any trace of it. All i can see are troops, tanks and other war material rolling in a steady stream towards the front.
If the Indian Air Force is so victorious, why has it not tried to halt this flow?
The answer is that it has been knocked from the skies by Pakistani planes. These Muslims of Pakistan are natural fighters and they ask for no quarter and they give none.
In any war, such as the one going on between India and Pakistan right now, the propaganda claims on either side are likely to be startling, but if i have to take bet today, my money would be on Pakistan side.
Pakistan claims to have destroyed something like one third of the Indian Air Force, and foreign observers, who are in a position to know say that the actual kills may be even higher, but the PAF authorities are being scrupulously honest in evaluating these claims. They are crediting PAF only those killing that can be checked and verified from other sources.

Everett G Martin, General Editor, Newsweek,
September 20 1965.

"One point particularly noted by military observers is that in their first advances the Indians did not use Air power effectively to support their troops. By contrast, Pakistan, with sophisticated timing swooped in on several Indian bases and destroyed dozens of planes without any resistance from the Indians.
By the end of the week, it was clear that the Pakistanis were more than holding their own".

INDONESIAN HERALD,
September 11 1965.

"The chief of Indian Air Force could no longer ensure the safety of Indian air space. A well known Indian journalist, Frank Moraes, in a talk from All-India Radio also admitted that Indian Air Force had suffered severe losses and it was no use hiding the fact and India should be prepared for more losses.........".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

September, 1965.!!!
इतक्या वर्षात काहीच बदल झाला नाहिये असे कशाच्या आधारावर म्हणावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश ही लिंक पाहा

http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/nimittamatra/entry/%E0%A4%B...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

आपल्या तयारीतल्या तृटि दाखवणारा हा लेख आहे हे मान्य पण आपली तयारी पाकिस्तानपेक्षा कमी आहे हे यातून कुठे प्रतीत झाले आहे?

पाकिस्तान , चीन यांच्या आधुनिकीकरणाच्या तुलनेत तर आपली तरतूद खूपच कमी आहे.

हे एकमेव वाक्य हवाई दलाच्या बाबतीत तुलना करू पाहते तेही आर्थिक तरतुदींची, सैन्याची, हवाई दलाची तयारी २०१३मध्येही पाकिस्तानपेक्षा मागे आहे याचा वस्तुनिष्ठ पुरावा या लेखात नाही. (म्हणजे आपण पुढे आहोत असे नाही पण मागे आहोत असेही सिद्ध होत नाहीच)

थोडक्यात कोणतेही निष्कर्ष काढायला ही माहिती अपूर्ण आहे.

बाकी, यावर उतारा म्हणून शत्रुच्या राज्यात प्रकाशित होणारे (आनि असेच तिथल्या जन्तेला घाबरवणारे) हे असे लेख वाचावेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मागे एकदा असे वाचनात आले होते की पाकिस्तान वर वर्चस्व ठेवायच असेल तर दोन्हिकडच्या लष्कराच प्रमाण (लष्करी तैयारि, साधनासामुग्री, संख्याबळ या निकषांवर) २:१ असे हवे. मागे वि. पी. सिंग
पंतप्रधान असताना हे प्रमाण ढासालले होते आणि तेंव्हा सिंग यानी त्याबद्दल जाहीर चिंता व्यक्त केली होती. आता पण दारुगोल्याचा अभाव, रात्री लढू शकणार्‍या टॅंक्स चा अभाव आणि प्रलंबित शस्त्र डील्स यामुळे पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण zआलि होती. माजी लष्कर प्रमुखानि ते पदावर असताना मनमोहन सिंघ याना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. लष्कराची परिस्थिती हंकी डॉरी नक्कीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

आधुनिक युद्धतंत्रात सैनिकांच्या संख्येचे महत्त्व तुलनेने कमी आहे.
बाकी माजी लष्कर प्रमुखानी जे केले त्याबद्दल न बोलणेच इष्ट.. त्यांच्या राजकीय निष्ठा/आकांक्षा नंतरच्या काळात बाहेर आल्या आहेतच असे म्हणावयास जागा आहे.
बाकी, कोणतेही सरकार (कोणत्याही पक्षाचे) लष्करप्रमुखांच्या तक्रारीची दखल न घेता बसून राहिल असे वाटत नाही.

अन् मुख्य लेखात वायुसेनेच्या तुलनात्मक कमतरतेची चर्चा आहे. आता लष्कराचे म्हणताय.. नक्की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसाद माहितीपूर्ण. देशभक्तीचा अभिनिवेश सोडून पाहिलं तर एक्दा तरी "आपण कुठं सुधारणा करणं आवश्यक आहे" हे लक्षात येइल. खरं ख्कोटं ठाउक नाही. पाक एअर फोर्सचा इतरत्रही बोलबोला आहे. इस्राइअलशी युद्धात कुठले तरी ह्यांची वायूदलाची पलटण गेली होती म्हणे. इस्राइलच्या हवाइ हल्ल्यांना सडेतोड उत्तर देणारं एकमेव मुस्लिम राष्ट्र त्यावेळी पाकिस्तान ठरलं होतं.
.
अजून एक :-
१९६५ला पाक ने कुरापत काढण्याचं कारणच कित्येकदा दबक्या आवाजात चर्चिलं जातं की "भारताला आपण लष्करीदृष्ट्या कमकुवत समजत होतो. पण १९६२ च्या जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर त्यांच्या सैन्य दलांचं आधुनिकीकरण फुल स्विंग मध्ये सुरु आहे. एकदा ते पूर्ण झालं तर मग लष्करीदृष्ट्या कुठलही misadventure करता येणार नाही. आहे, ती शेवटची संधी आताच आहे. एक प्रयत्न करुन पाहू." असं म्हणत त्यांनी मुजाहिदीन घुसवायचा प्रयत्न केला. आपल्या कुरापतींचा पत्ता लागणार नाही;(बाहेरच्या पाक घुसखोरांनी एकदा सुरुवात केल्यावर काश्मीरी जनता स्वतःच उठाव करुन "परकिय" भारतीय सरकार काश्मीरातून उलथवून लावेल अशी अपेक्षा होती.फाइट काश्मीरी- विरुद्ध भारतीय लष्कर अशी करण्याचा डाव होता.) शिवाय लढाई झालिच तर ती काश्मीर विभागापुरती मर्यादित राहिल ; असा पाकचा अंदाज.पण नेमकी भारताने दुसरी आघाडीही उघडली. काश्मीर्-पंजाब्-राजस्थान सगळीकडून चढाईच्या शक्याशक्यतांचा विचार होउ लागला.
.
आपल्याला थाउक नसलेली अजून एक घटना म्हणजे १९६५मध्ये एक कच्छच्या रणाच्या आसपास उडणारं नागरी विमान पाक वायुदलानं पाडलं होतं.जीवित हानी झाली होती. आजही तो पाक ऑफिसर "ते मुद्दाम पाडलं नव्हतं.गफलतीनं झालं होतं.नागरी वस्त्यांवर आणि नागरी वाहतूकीवर हल्ला करणे आमची संस्कृती नाही." असं सांगताना मिडियात दिसतो.आपल्या नितीमत्तेचीचाड आहे; हे ते वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपण समजतो तितके ते असंस्कृत नसावेत असे कधीकधी वाटते.(वर्षभरापूर्वी आपलं भरकटून P O K मध्ये गेलेलं विमान किरकोळ चौकशी नंतर त्यांनी सोडून दिलं होतं. अर्थात सौरभ कालिया आणी परवाच्या भारतीय सैनिकांची क्रूर विटंबना विसरता येत नाहीच. पण त्याच वेळी नाण्याची ही दुसरी बाजू भ्रमित करुन जाते.).
ह्याहून अधिक काही बोलल्लो तर तथाकथित राष्ट्रप्रेमी आणि विशेषतः हिंदुत्ववादी माझी अवस्था पाकडे करणार नाहित इतकी बिकट करतील म्हणून गप्प बसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाडल्या गेलेल्या त्या विमानात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री बलवंतराय महेता आणि काही महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. ते विमान मुख्यमंत्र्यांना टेहेळणी/पाहणी करायची होती म्हणून उडत होते असाही प्रवाद होता, पण तो खरा नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याची कल्पना नव्हती.
सीमावर्ती भागातील मुख्यमंत्री स्वतः टेहळणीसाठी युद्धकालिन स्थितीत जाउ शकतील असे वाटत नाही.राज्याच्या हाती असते ती पोलिस यंत्रणा आणि इतर राखीव दले. ती सिव्हिलिअन्ससाठी असणार ना? परकियांशी लढणे, टेहळणी , पा।अणी व गुप्तहेरी हे सर्व तर केंद्र सरकार पाहणार.
(ह्याच तर मुद्द्यावरून बलिष्ठ केंद्र की बलिष्ठ (व सेनादलांशी सुसज्ज) राज्य सर्कारे मुद्द्यावरून भारत्-पाक फाळणीची शेवटची ठिणगी पडली म्हणतात.)
युद्ध ही प्रामुख्याने केंद्र सरकरची जिम्मेदारी आहे असे समजत होतो.राज्य सरकरचे काम मुख्यतः सेनादलांना/केंद्राला स्थानिक पातळीवर मदत करणे,facilitator/लॉजिस्टिक्सवाले म्हणून इतकेच असणार असे वाटत होते.( केंद्रातही सेनादल व वित्त विभाग ह्यांना युद्धकालीन विशेषाधिकार असतात. इतरांना काहीप्रमाणात फाट्यावार मारण्याची सूट असते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे प्रतिसादातच लिहिले आहे. शिवाय युद्धग्रस्त आकाशात मुख्यमंत्रीपदासारख्य महत्त्वाच्या व्यक्तीने नागरी विमानातून फिरणे हे सैन्याच्या आपत्कालीन प्रोटोकॉल मध्ये बसतही नसणार. पण आपल्या वीआय्पींची अवर्षणग्रस्त,पूरग्रस्त,दंगलग्रस्त भागाची 'वरून' पहाणी करण्याची हौस लक्षात घेता सर्व सुरक्षा-विनंत्या/आदेश डावलून उड्डाण जारी राखण्याचे मूर्ख साहस केले गेले नसेलच असे नाही.पण याची शक्यता अशासाठी नाही कारण ती एक नेहमीची सिविलिअन फ्लाइट होती,बहुधा चार्टर्ड असावी आणि त्यात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याव्यतिरिक्त इतरही अनेक व्यक्ति होत्या. त्या काळी मुख्यमंत्र्यांचा ताफा जरूर असे पण त्याचे लवाजम्यात रूपांतर झालेले नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लष्करी युद्धं आता कारगिल सारखीच छोट्या स्केलचीच असतील, कोणालाही मोठे युद्ध परवडणारं नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता फ़ार काळ चालणारं मोठं युद्ध आपल्याला परवडणारं नाही. पण एक समोरच्यावर धाक निर्माण करण्याइतपत लष्करी शक्ती बाळगावीच लागेल. भारताने ती शक्ती बाळगलेली नाही. खरंतर चीनशी बरोबरी करायला हवी, पण सध्या पाकिस्तानला मॅच करतांनाही आपली दमछाक होतेय. पाकिस्तानही त्यांच्या बजेटच्या १०-१५% डिफ़ेंसमधे खर्च करतोय निव्वळ भारताला मॅच करता यावं म्हणुन. त्यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आलेली आहे.

भारताने डिफ़ेंसवर किती खर्च करावा ह्याचं बरोबर उत्तर असं नाहीच आहे, आपल्या थिंकटॅंकला तो निर्णय घ्यायचाय. सध्यातरी आपण आर्थिक प्रगतीला महत्व देतोय. आर्थिक प्रगतीतुन सुबत्ता निर्माण होते आणि त्यातुन कला-संस्कृतीचा विकासही होतो. उदारमतवादी संस्कृतीच सगळ्यात लवकर जगभरात पसरते.भारताची स्वतःची अशी उदारमतवादी संस्कृती गेल्या ६० वर्षात उदयास आलेली आहे. ह्या उदारमतवादी संस्कृतीचे आक्रमण मिडीया, सिनेमा, इंटरनेट द्वारा पाकिस्तानवर करणे हाच तिथल्या कट्टरतावादावर उपाय आहे. शीतयुद्धात जेव्हा कम्युनिस्टांच्या विळख्यात रशिया होता, तेव्हा त्याचा पाडाव लष्करी मार्गाने झाला नव्हाता. तो अशाच सांस्कृतिक आक्रमणाने झाला होता. उदारमतवादी लोकशाही हा आपल्या संस्कृतीचा भाग बनला आहे. पाकिस्तानी जनतेला तिथल्या इस्लामी कट्टरवाद्यांविरुद्ध लढायची इच्छा निर्माण झाली तर ते उपखंडाच्या राजकारणात मोठा बदल घडुन आणेल आणि ते भारताच्या हिताचा ठरेल. आपल्याला आपले सांस्कृतिक आक्रमण अधिक तीव्र करावे लागेल हे मात्र नक्की. ह्या सांस्कृतिक आक्रमणाला आंतरराष्ट्रीय निती म्हणुन वापर करावा लागेल. कदाचित आपला थिंकटॅंक तसा विचार करतही असावा. उदाहरणार्थ उपखंडाच्या प्राचीन इतिहासाचा प्रचार पाकिस्तानात करणे, आपल्या सामायिक इतिहासाबद्दल-संस्कृतीबद्दल त्यांनाही अभिमान वाटला पाहिजे. पाकिस्तानी राज्यकर्ते मुद्दामहुन तेथील जनतेला भारतीय संस्कृतीपासुन दुर नेऊ इच्छितात.

पाकिस्तानशी युद्ध हे लष्करीच असलं पाहिजे असंही नाही किंवा लष्करी चकमकींमधे आपण किती वेळा वर्चस्व गाजवलं हेही महत्वाचं नाही कारण लष्करी चकमकी ही युद्धातल्या अनेक आघाड्यांपैकी एक आघाडी आहे. संपुर्ण युद्ध जिंकणे म्हणजे पाकिस्तानला भारतमय करणे, त्यातुनच पाकिस्तान हि समस्या कायमची दुर होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकिस्तानही त्यांच्या बजेटच्या १०-१५% डिफ़ेंसमधे खर्च करतोय निव्वळ भारताला मॅच करता यावं म्हणुन. त्यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आलेली आहे.

हे प्रत्यक्ष आकडेवारीच्या विरुद्ध विधान आहे. पाकिस्तानचं डिफेन्स बजेट आहे ६.४ बिलियन डॉलर्स. भारताचं डिफेन्स बजेट आहे ४९ बिलियन डॉलर. दोन्ही देश आपल्या जीडीपीच्या सुमारे अडीच टक्के खर्च करतात. गेल्या काही वर्षांत जगभरातच डिफेन्सचं बजेट जीडीपीच्या सुमारे ३.५ टक्क्यावरून सुमारे २.५ टक्क्यावर आलेलं आहे.

बाकी सांस्कृतिक युद्धाची कल्पना मात्र रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खर्च टक्केवारीत, एकूण जीडीपीच्या तुलनेत कमी दिसत असावा. उदा: जीडीपी १० टक्क्यानं वाढलं तर संरक्षण बजेट ८ टक्के वाढलं तरी ते प्रमाण घसरल्यासारखं दिसेल. तंत्रज्ञानाची किंमत जशी उपकारक तंत्रज्ञानासाठी कमी कमी होते आहे(मोबाइल, वैद्यकिय तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्र वगैरे) तसेच संहारक तंत्रज्ञानही स्वस्त होत असावे. त्यामुळे पूर्वीच्या २.५% पेक्षा तसाही आताचा २.२५% मोठाच असणार. त्यात पुन्हा प्रगत तंत्रज्ञानामुळे अधिक संहारक असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

त्याच त्या संरक्षणखर्चातून, संरक्षणासाठी केलेल्या संशोधनातून आंतरजालाचा शोध लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी एकुण बजेटच्या १०-१५% लिहि्लं होतं. ही आकडेवारीही जुनी झालेली दिसते. पाकिस्तानचं डिफ़ेंस बजेट वाढलंय. सध्या पाकिस्तान एकुण बजेटच्या १८.४% डिफ़ेंससाठी बाजुला काढतोय. ही लिंक बघा.

http://www.hindustantimes.com/business-news/WorldEconomy/Pakistan-defenc...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताचं बजेट साधारण २५० ते २७५ बिलियन डॉलर्सचं असतं. त्यात ४९ बिलियन डॉलर्स डिफेन्ससाठी म्हणजे हिशोब साधारण तोच होतो. सुमारे १८%.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथ कोणी संरक्षण तज्ञ आहे का समजवुन सांगायला.

सन २०९० पाकीस्तान ने भारतावर हल्ला केला,
सन २०९१ पाकीस्तान ने भारताचे दिल्ली हे शहर ताब्यात घेतले,भारताचे प्रधानमंत्री सोहेल राहुल गांधी ह्यान्नी अमेरीकेत आश्रय घेतला,

आयला बिनबुडाचे,वांझोटे आरोप आहेत सगळे.नायंटीन सिक्सीटी फाइव चे पेपर आता विकताय व्हय ,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री

गैरसमज होतो आहे. पाकिस्तानी हवाइदलाने भारतीय हवाई दलावर १९६५ मध्ये प्रभुत्व गाजवले होते असे मानण्यात येते. त्यासाठी ही १९६५ ची लिंक दिली आहे. वरच्या अजुन २ लिंक पण पाहा की : )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

http://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Chamb
http://www.indiandefencereview.com/news/1971-war-battle-of-chhamb/
छम्ब जौरियां सेक्टरमध्ये पाक सैन्य खूप खोलवर आत आले होते. सोन्याचा तुकडा छम्ब शेवटी त्यांनी घेतलाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याचदा बोटचेपेपणा* करण्याचे कारण ग्राउंड रिअ‍ॅलिटीची जाणीव हे असते असे यापूर्वी इतरत्र घडणार्‍या चर्चांमधून मी मांडायचा प्रयत्न केला आहे. तेव्हा बहुतेक राष्ट्रवाद्यांना ते पटले नव्हतेच.

आजवर आमचे लष्कर कुचकामी आहे असे म्हणण्याचे आपल्या विविध नागरी सरकारांनी नेहमी टाळले आहे. जरी कुचकामीपणाचे खापर अनेक निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी वेळोवेळी नागरी सरकारवर फोडले असले तरी.....

*काश्मीर युद्धबंदी म्हणा, संसदेवरील हल्ल्यानंतरचा काळ म्हणा, २६/११ नंतरचा काळ म्हणा

अवांतर : भारतात जवानांना बूट कुठचे मिळतात यात पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची अपेक्षा ठेवली जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.