Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६७

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

----
डोळे खाली केले की स्वतःचे नाक स्वतःला दिसते का? मला माझे दिसत नाही. पण काही लांब नाकाच्या लोकांना कदाचित दिसत असेल. प्लीज कन्फर्म ;)

आडकित्ता Tue, 12/07/2016 - 19:44

दिसत नाही असं कसं शक्य आहे?

बेसिकली, 'व्हिज्युअल फिल्ड' ज्याला म्हणतात, त्याचा सुमारे २०% भाग हा नाकामुळे ब्लॉक होतो. दोन डोळे असल्यामुळे तो कॉम्पेन्सेट होतो. तेव्हा प्रत्येकाला नाक आडवे येतेच. ;)

Field

.शुचि. Tue, 12/07/2016 - 20:52

In reply to by आडकित्ता

ओह ओके. थँक्स. काहीतरी दिसतं पण ते इतकं कमी आणि शॅडोसम दिसतय, ते नाकच असणार.
____
एकेक डोळा बंद करुन खाली दृष्टी नेली तर दिसतय बरं का. नीट दिसतय नाक :)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/07/2016 - 22:17

In reply to by .शुचि.

आत्तापर्यंत ह्याचा विचार केला नव्हता. बरेचदा वाचताना, काही बघताना मान किंचित झुकवून डोळे/बुब्बुळं वर करून बघितलं जातं, असं लक्षात आलं.

तिरशिंगराव Thu, 14/07/2016 - 12:12

In reply to by .शुचि.

तुम्ही पिकासोच्या चित्रातल्या सारखा चेहेरा करा, मग नाकच काय, तुमच्या एका डोळ्याला दुसरा डोळा सुद्धा दिसेल.

उपप्रश्नः पूर्वी ज्यांच्या दांतांची फणी बाहेर आलेली असायची त्यांना आपले दांत पण दिसत असतील का ?

नितिन थत्ते Wed, 13/07/2016 - 13:43

मला दिसते. अर्थात नाकाचा शेंडा दिसत नाही. पण नाकाच्या बाजू दिसतात. त्यासाटी डोळे खाली वळवण्याबरोबरच साइडला पण वळवावे लागतात.

नाकपुड्या फेंदारल्या तर त्यांची हालचाल डोळ्यांना दिसते/जाणवते.

सिद्धि Wed, 13/07/2016 - 00:32

मी लहानपणी खाली बघून वाचताना नाक मध्ये येतं म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टर हसले फक्त. आता बहुतेक सवय झालीये :D

मिहिर Thu, 14/07/2016 - 04:54

हा प्रश्न प्रामुख्याने अमेरिकेसंबंधित आहे. (भारतात असताना ऑनलाईन खरेदीसाठी कधी कार्डे न वापरल्याने भारतातल्या स्थितीची कल्पना नाही)
अॅमेझॉन.कॉम, गूगल वगैरे कंपन्या आपला क्रेडिट कार्ड क्रमांक साठवून ठेवण्यासाठी इतक्या उत्सुक का असतात? ह्या दोन्ही ठिकाणी काही खरेदी केली तर त्या वेळेपुरती कार्डची माहिती टाकता येत नाही. कार्डची माहिती टाकली की ती खात्यात आपोआप जोडली जाते आणि पुढच्या खरेदीवेळी एका क्लिकमध्ये काम होते. जर असे नको असेल तर सव्यापसव्य करून हा क्रमांक खात्यातून काढावा लागतो. तसेच काहीसे क्रोमबद्दलही. क्रोम खात्यांचा पासवर्ड साठवू का विचारते, तशा प्रकारे अनेकदा क्रेडिट कार्ड साठवू का असेही विचारते. मात्र पासवर्डसाठी 'हो', 'नाही' व 'कधीच नाही' असे पर्याय असतात, तर कार्डासाठी 'कधीच नाही' हा पर्याय नसतो. ह्या संस्था असा केवळ त्या त्या वेळी क्रेडिट कार्डाचा क्रमांक टाकू न देण्यामागे काही विशिष्ट कारण आहे का?
अमेरिकेत OTP वगैरे काही भानगड नसल्याने हे फार धोकादायक व‌ाटते.

दगड Thu, 14/07/2016 - 08:38

In reply to by मिहिर

सोप्पंय. क्रेडिट कार्ड साठवून ठेवलं की युजर्सना इम्पल्स खरेदी करताना त्रास होत नाही, ज्यामुळे ते शेवटच्या क्षणाला खरेदी टाळण्याचा प्रकार कमी करतात. कंपन्यांना सेल क्लोज करणे महत्वाचे असते, त्यामुळे त्यांना फायदा होतो. कंपन्यांना दुसरा अजून १ फायदा म्हणजे वारंवार (रिकरिंग) खरेदी करणे सोपे जाते. आपोआप खरेदीमध्ये ग्राहक टिकून राहाण्याची शक्यता जास्त असते.

अमेरिकेत OTP वगैरे प्रकार लागत नाहीत कारण नुसता फोन उचलून कुठलाही चार्ज डिस्प्युट केला की क्रेडिट कार्ड कंपनी लगेच त्याचे क्रेडिट देते. त्यामुळे ग्राहकाला सुरक्षित वाटतेच. उलट OTP मुळे खरेदीची प्रोसेस उगीचच त्रासदायक होत नाही.

बहुसंख्य गिर्‍हाईकांना सारखं सारखं क्रेडिड कार्ड नं टाकणं नको असतो. अनेकांकडे अनेक क्रेडिट कार्ड्स असतात शिवाय क्रेडिक कार्टला पुष्कळ सिक्युरीटी असते त्यामुळे तसं काळजीचं फार कारण नसतं. शिवाय, जिथे दिवसागणिक इतकी ट्रांन्झ्याक्शन्स क्रेडीट कार्डावर होतात तिथे वन टाईम पासवर्ड वगैरे गोष्टी केल्या तर सगळी सिस्टीम हळू होऊन जाईल.

तरीही, तुम्हाला नको असल्यास पर्याय उपलब्ध आहेत. १-क्लिक डिसेबल करता येते. (एक्सेप्ट डिजीटल ऑर्डर्स, आय थिंक). क्रोममध्ये (किंवा इतर ब्राऊझर्समध्ये) इनकॉग्नीटो गेल्यास क्रेडीट कार्ड वगैरे माहिती सेव्ह होणार नाही, आय बिलीव्ह. पण त्याने सोयीपेक्षा गैरसोय होण्याचीच शक्यता जास्त.

दगड Sat, 16/07/2016 - 23:12

१. मोबाईल फोनवर मराठी भाषेसाठी केलेली काही अ‍ॅप्स आहेत का? तुम्ही कुठली वापरता का?
२. परदेशात राहणार्‍यांना तेलगु टीवी इंटरनेटवर लाईव बघता येतो, तसे मराठी टीवी/लाइव चॅनेल कसे बघता येतील?

आदूबाळ Mon, 18/07/2016 - 14:55

धुळ्याच्या इतिहास संशोधक मंडळाची (राजवाडे संशोधन मंडळ?) वेबसाईट मध्यंतरी कोणीतरी दिली होती. तेव्हा बुकमार्क करायचं विसरलो. आता सापडत नाहीये. कोणी मदत करू शकेल का?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 19/07/2016 - 21:19

In reply to by Nile

बातमीतला काही भाग, तिरपा ठसा माझा -

According to the art project's organizer and photographer Spencer Tunick, over 1,800 women signed up to claim one of the 100 slots available and he hopes the courageous gesture will play a part in paving the way for a society where women are regarded as equals on every level. "I have two daughters—9 and 11—and I want them to grow up in a progressive world with equal rights and equal pay and better treatment for women,"

गब्बर सिंग Thu, 21/07/2016 - 10:58

In reply to by अनु राव

गब्बु कसला क्लिव्हलँड ला जातोय, तो तर लिबरल म्हणवतो स्वताला.

लिबर्टेरियन.

--

मी इथेच आहे, दोस्तानु.

सायुरी Wed, 20/07/2016 - 14:01

विकिपीडिया वर दिलेल्या माहितीप्रमाणे सिकन्दराचा जन्म इ.स.पूर्व ३५६ मध्ये २०/२१ जुलै या तारखेस झाला. जालावर शोध घेता त्याचा जन्म Attic calendarमधील Hekatombaion महिन्याच्या ६व्या दिवशी झाला अशी माहिती सापडत आहे.
ही तारीख म्हणजेच Gregorian calendarमधील २०/२१ जुलै हे कसे शोधुन काढता येईल याची माहिती कोणी सांगू शकेल काय? सिकन्दराच्या जन्मतारखेसंदर्भातली माहिती देणारे खात्रीशीर sources कुठले?

बॅटमॅन Mon, 25/07/2016 - 04:26

In reply to by तिरशिंगराव

उद्या भिलवडी गाव धुंद नै झालं म्हणजे मिळवली. इंडोनेशियात असंच पोलिसांनी ढिगारेच्या ढिगारे जाळले, त्याच्या धुराने अख्ख्या गावाला नशा चढल्याची न्यूज़ होती. =))

अनु राव Thu, 21/07/2016 - 11:02

In reply to by .शुचि.

त्यातला थोडासा भाग प्रसिद्धी माध्यमांना दाखवायला काढुन ठेवतात, मग तो जाळतात वगैरे. मोठा भाग पुन्हा मार्केट मधे येतो आणि बर्‍याच लोकांना बरेच पैसे मिळतात.

रेड बुल Thu, 28/07/2016 - 18:48

In reply to by अनु राव

पण आपली रॅशनल मते मला आवडतात/पटतात. आपन असा हा विदा नक्कि कोठुन जमवता ? तुमी सरकारी अधिकारी आहात की मोठ्या खाजगी कंपनीच्या महत्वाच्या भानगडी हातळणे हे आपले अक्युपेशन हाय ? की अशा फेमीलीत जल्म झाला आपला ? काहीही असो, आपले अभिनंदन. आपल्या प्रतिक्रीया रोचक असत्यात.

अतिशहाणा Thu, 21/07/2016 - 23:50

In reply to by अनुप ढेरे

हो आणि डेटा + एपीआय वगैरे दिलाय हे तर आणखीच मस्त आहे. एपीयसाठी लॉगिन रजिस्टर करावं लागतंय. वेळेअभावी मी लॉगिन वगैरे केले नाही पण हा एपीआय फ्री आहे की पैसे देऊन वापरायचाय हे कळले नाही.

हे वाचलंय काः https://www.valueresearchonline.com/story/h2_storyView.asp?str=31544

Transparency was so bad that NAVs for mutual fund would be calculated barely once a quarter and would not be revealed to anyone without a great deal of effort. As the country's first mutual fund analyst, I can vouch for the fact that in the early 90s, one often had to physically visit funds' offices to wheedle the NAV out of someone. My craziest experience was when an official in the mutual fund department of a Delhi-based bank gave me the asset register and said that if I wanted to know the NAV so badly, then I would have to calculate it myself.

अनुप ढेरे Fri, 22/07/2016 - 12:14

In reply to by अतिशहाणा

हा हा हा! कहर. नो वंडर म्हातारे लोक ष्टॉक मार्केटाला घाबरून असतात.

रच्याकने, धिरेंद्र कुमार आणि देबाशिश बसू हे ष्टॉक मार्केट आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर लिहिणारे बेस्ट लोक आहेत.

नितिन थत्ते Fri, 22/07/2016 - 17:31

In reply to by अतिशहाणा

>>I can vouch for the fact that in the early 90s,

९० मधल्या परिस्थितीचा २०१६ मध्ये काय संदर्भ? तंत्रज्ञान मागास असण्याच्या काळात एन ए व्ही ताबडतोब न मिळणे यात आश्चर्यकारक काही नाही.

आज बँकांनी दिवसाला व्याज द्यावे असे रिझर्व बँक म्हणू शकते कारण तितकी कंप्युटिंग पॉवर आज उपलब्ध आहे. ९० साली ते शक्य नव्हते.
-----------------------
२०१६ मध्ये परिस्थिती सुधारली आहे हे म्हणण्यासाठी फारतर २०१२-१३ शी तुलना योग्य ठरेल.

नितिन थत्ते Fri, 22/07/2016 - 20:58

In reply to by अनुप ढेरे

>>would not be revealed

हा प्रॉब्लेम ९१ सालापासूनच टप्प्याटप्प्याने कमी होत गेला आहे. या गोष्टी आज लिहिण्याचं कारण कळलं नाही. "तुम्हाला काय माहित आम्ही किती अडचणींत काम केलं आहे" असं म्हणण्याखेरीज यातून काही साध्य होण्यासारखं नाही.

अनुप ढेरे Fri, 22/07/2016 - 21:41

In reply to by नितिन थत्ते

अहो आज लिहिला कारण आत्ता १९९१च्या सुधारणांना २५ वर्ष झाली म्हणून. २५ वर्षात काय बदललं याचाच आढावा आहे तो. २५ वर्षापूर्वी इतकी वाईट स्थिती होती आणि आता बरच छान आहे हाच मुद्दा आहे लेखाचा.

आदूबाळ Fri, 22/07/2016 - 21:40

सहज ब्रिटिश लायब्ररीची Archives and Manuscripts साईट चाळत होतो. त्यात १८९४ च्या "पूना रायट्स" (Riots at Poona between Hindus and Mohammedans) बद्दल बरीच कागदपत्रं आहेत. ही काय भानगड आहे? याबद्दल मराठी साहित्यात काहीच कसं नाही?

चार्वी Sat, 23/07/2016 - 00:00

In reply to by आदूबाळ

पुण्यातली १८९४ सालची हिंदू-मुस्लिम दंगल सार्वजनिक गणेशोत्सवाला असलेल्या विरोधातून झाली होती. मशिदीसमोरून गणपतीचा 'मेळा' वाजत-गाजत गेला म्हणून मेळ्यावर हल्ला करण्यात आला. परिमला रावांच्या टिळकांवरील पुस्तकात या दंगलीविषयी थोडी माहिती आहे.

अतिशहाणा Sat, 23/07/2016 - 00:20

In reply to by आदूबाळ

या दंगलीचे संदर्भ टिळक, भावे, सावरकर यांच्या लेखनात वाचलेत ब्वॉ. मला वाटतं फुल्यांनीही कुठंकुठं उल्लेख केलाय.

मारवा Sat, 23/07/2016 - 19:03

महान कवी अरुण कोलटकर गेल्यानंतर त्यांचा वैयक्तिक पुस्तक संग्रह आवरतांना अशोक शहाणे व इतर यांच्यात झालेल्या संवादाचे दोन व्हीडियो इथे.

https://www.youtube.com/watch?v=DrImA6b5BBw
https://www.youtube.com/watch?v=gvrwKkmsQCQ

अ‍ॅन रॅन्ड च्या दोन मुलाखती एक माइक वॉलेस ने घेतलेली १९५९ मधली
दुसरी डोनाह्यु च्या शोवरची १९७९..इथे.
https://www.youtube.com/watch?v=1ooKsv_SX4Y
https://www.youtube.com/watch?v=3u8Jjth81_Q

शायद किसे इंटरेस्ट हो.

अनु राव Mon, 25/07/2016 - 11:59

बातमी - अब्जाधीश वडलांनी मुलाला नोकरी साठी पाठ्वले.

ह्यात मुलानी मला पैसे आणि कष्टाची किंमत कळली असे म्हणले आहे. मला प्रश्न असा पडला आहे की, जेंव्हा त्या मुलाला पक्के माहीती आहे की हे २-३ महिने झाले की अब्जावधी रुपये आपलेच आहेत. असे असताना त्याला "खरी" किम्मत कळली असेल का? व्हर्चुअल रीयालिटी गेम मधे कधी प्रत्यक्ष परीस्थितीतला ताण जाणवु शकतो का? का तसा तो जाणवला अशी स्वताची समजुत करुन खुष होयचे?

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/billionaire-dad-sends-son…

दुसरा प्रश्न : अश्या प्रयोगामुळे मुलगा जर त्याच्याकडच्या नोकरांबद्दल अतिकनवाळु झाला तर धंद्याचे बारा वाजण्याची शक्यता आहे का?

राजेश घासकडवी Mon, 25/07/2016 - 12:42

In reply to by अनु राव

असे असताना त्याला "खरी" किम्मत कळली असेल का?

हे एकदम बरोबर. पूर्वी कधीतरी एका सुंदरीने फॅटसूट घालून दोन दिवस काढले आणि तिला लोकांकडून मिळणाऱ्या वागणुकीत केवढा प्रचंड फरक पडला याबद्दल सांगितलं. ते फरकाचे अनुभव ठीकच. पण तिला स्वतःला परकायाप्रवेशातून कितपत शिकायला मिळालं असेल याबद्दल शंका आहे. कारण आपण खरे तर असे नाहीच्चोत ही खंबीर जाणीव तिला कायम होती.

अश्या प्रयोगामुळे मुलगा जर त्याच्याकडच्या नोकरांबद्दल अतिकनवाळु झाला तर धंद्याचे बारा वाजण्याची शक्यता आहे का?

बहुतेक वेळा अश्या प्रयोगांचा उद्देश असा असतो की तळागाळातले लोक कशा खोट्या तक्रारी करतात हे समजून घेता येतं. 'साल्येहो, तासाला पन्नासच पोती आणलीत प्रत्येकी? मी स्वतः सत्तर नेलेली आहेत!' असं ठणकावून सांगता येतं.

आदूबाळ Mon, 25/07/2016 - 13:03

In reply to by अनु राव

माझ्या माहितीतली एक केसः

पुण्यातल्या एका प्रसिद्ध तयार-कपडे-शोरूम मालकाचा मुलगा माझ्याबरोबर कॉलेजमध्ये होता. एसवाय बीकॉमला त्याने वडिलांना ('दादां'ना) जाऊन सांगितलं की मला धंद्यात घ्या. दादांनी त्याला सिक्युरिटीशेजारी बसवला. कॉलेजातले मित्र-मैत्रिणी, परिचित वगैरे दुकानात ये जा करत असत, आणि हे साहेब सिक्युरिटीचा निळा गणवेष घालून दाराबाहेर बसलेले असत. त्याला त्यात कमीपणा वाटत नसे - बहुदा दादांचा हेतूही तोच असावा. सिक्युरिटी, अशर, सेल्समॅन असे टप्पे पार करत पाच-सहा वर्षांनी दादांनी त्याला खर्‍या अर्थाने धंद्यात 'घेतलं'. आता त्याने धंदा भरपूर वाढवला आहे, नव्या लाईन्स सुरू केल्या आहेत. दादा नुकतेच रिटायर झाले असं ऐकलं.

तुमच्या प्रश्नांबद्दलः

ह्यात मुलानी मला पैसे आणि कष्टाची किंमत कळली असे म्हणले आहे.

दादांचा हेतू तो नसावा. आपल्या धंद्याची सांगोपांग माहिती व्हावी आणि धंद्यातलं कोणतंही काम करायला लाज वाटू नये ही कारणं असावीत.

अश्या प्रयोगामुळे मुलगा जर त्याच्याकडच्या नोकरांबद्दल अतिकनवाळु झाला तर धंद्याचे बारा वाजण्याची शक्यता आहे का?

काय की! भेटला की विचारतो.

अनु राव Mon, 25/07/2016 - 13:29

In reply to by आदूबाळ

हे साहेब सिक्युरिटीचा निळा गणवेष घालून दाराबाहेर बसलेले असत. त्याला त्यात कमीपणा वाटत नसे

आबा - हाच तर माझा प्रश्न आहे किंवा हेच तर माझे म्हण़णे आहे. तुमच्या मित्राला सिक्युरिटीचा निळा गणवेष घालून दाराबाहेर बसायला लाज वाटणार नाहीच, कारण त्याला माहीतीये की तुम्हाला माहीती आहे की दुकान त्याचेच आहे.
पण एखाद्या खर्‍या गरीब मुलाला जर सिक्युरीटीची किंवा वेटरची नोकरी करावी लागली आणि कॉलेज मधले मित्र समोर आले तर त्या गरीब मुलाला वाटणारी लाज/ कमीपणा तुमच्या मित्राला अनुभवण्यास येणार नाही.

धंद्याचे शिक्षण हा वेगळा मुद्दा आहे पण आयुष्यातले गरीबीचे किंवा अभावाचे अनुभव त्याला कधीच येणार नाहीत. तात्पुरते दिले गेले तरी भिडणार नाहीत.

आदूबाळ Mon, 25/07/2016 - 13:52

In reply to by अनु राव

आबा - हाच तर माझा प्रश्न आहे किंवा हेच तर माझे म्हण़णे आहे. तुमच्या मित्राला सिक्युरिटीचा निळा गणवेष घालून दाराबाहेर बसायला लाज वाटणार नाहीच, कारण त्याला माहीतीये की तुम्हाला माहीती आहे की दुकान त्याचेच आहे.

सहमत आहे.

पण बाकी व्यापार्‍यांच्या मुलामुलींनी तेवढंही केल्याचं आठवत नाही. रसिकशेट धारिवालांची मुलगी शोफरड्रिव्हन कारने कॉलेजला येत असे. तिने माणिकचंदचं कॉर्पोरेट ऑफिस तरी कधी बघितलं असेल का याबाबत शंका आहे. ते सोडा - एक कॉण्ट्रॅक्टरपुत्र 'राज' एवढी हवा करत असे की त्याचं नाव "शमीम हवा" पडलं होतं. त्या पार्श्वभूमीवर याचं वागणं उठून दिसत असे.

अनु राव Mon, 25/07/2016 - 13:57

In reply to by आदूबाळ

कसे आहे की अब्जाधीश माणुस फाल्तू कपडे घालुन महाग हॉटेलात गेला तरी त्याचे कौतुकच ( साधेपणाचे ) होते. ते तसे होणार आहे हे त्यालाही माहीती असतेच.

तुमच्या मित्राच्या वडीलांची पॉलिसी उत्तमच आहे. फक्त मी वेगळ्या ट्रॅकवर होते बातमी सांगण्याच्या उद्देशाच्या बाबतीत..

चिंतातुर जंतू Mon, 25/07/2016 - 14:00

In reply to by अनु राव

अनु राव जहाल डाव्या आहेत असा निष्कर्ष काढायचा का? श्रीमंत माणसानं काहीही केलं तरी त्यांना त्याचं काही नाहीच. ;-)

अनु राव Mon, 25/07/2016 - 14:09

In reply to by चिंतातुर जंतू

एकदा डावरेपणाचे इन्फेक्शन होऊन गेल्यावर माणुस पूर्ण बरा थोडाच होणार? मधुन मधुन ते दडुन बसलेले जिवाणु उचल खातातच, मग प्रतिजैवक घ्यायचे.

आडकित्ता Tue, 02/08/2016 - 21:10

In reply to by अनु राव

अ‍ॅक्चुअल दुकानदारी करणारे व धंदा करणारे (मारवाडी) लोक, व त्यांच्यातल्या 'धंदा' व त्याबद्दलच्या कन्सेप्ट्सबद्दलचं माझं ऑब्जर्वेशन असं सांगतं, की त्या मुलाला नक्कीच पैशाची व कष्टाची किम्मत अधिक खोलवर समजली.

करोडपती बापाच्या दुकानाचा/धंद्याचा भार सांभाळायचा आहे हे ठाऊक असणारी मुलं शाळा कॉलेजात टीपी करतील, पण इतरवेळी दुकानात काउंटरला फडका मारतानाही दिसतील. धंदा शिकायच्या बाबतीत ते हयगय करीत नाहीत.

आमच्या मारवाडी मित्राच्या घरात बाप व मुलात धंद्यासाठी सरळव्याजाने पैसे वापरायला देण्याची पद्धत पाहिली आहे. नशीब, तिथे चक्रवाढ व्याज वापरत नव्हते.

याच मित्राच्या नवीनच सुरू केलेल्या कपड्याच्या दुकानात, काऊंटरपाठी उभे राहून मी स्वतः शर्टही विकले आहेत. त्या काळात अत्यंत नवखा डॉक्टर होतो. व ससूनमधे काम करताना पेशंटकडून पैसे नामक प्रकार घ्यायचा असतो, व जे पैसे आपण मागतो, ती भीक नसून आपल्या सल्ल्याचा मोबदला असतो, ही कन्सेप्ट डोक्यात फिट झालेली नव्हती. अ‍ॅक्चुअल दुकान चालवल्यानंतर, 'गिर्‍हाइक' हा प्रकार काय असतो, त्याच्याशी नेहेमी गोडच का व कसे बोलावे, धंदा कसा करतात, बँकेशी कसे डील करतात, हिशोब कसा लिहावा व ठेवावा, स्टाफ मॅनेजमेंट म्हणजे काय, या व इतरही बाबींचे बरेच शिक्षण झाले. (डिग्री घेऊन प्रॅक्टिस सुरू करण्यादरम्यानच्या काही महिन्यांतली ही गोष्ट आहे.)

It is a good idea/practice for heir of a dynasty to start with the foot-soldiers and rise up in the ranks, proving his own worth along the way. It also wins him loyalty of his subordinates.

चिमणराव Mon, 25/07/2016 - 13:44

//अब्जाधीश वडलांनी मुलाला//
असं का वाटलं?हे पैसे मलाच मिळणारेत?
तिकडे दोन तीन लग्न घटस्फोट होतात आणि इस्टेट कुत्र्या,मांजराला,एखाद्या संस्थेलाही देऊन टाकतात.मुलांना खात्री नसते हे सर्व आपल्यालाच येईल."सांगे वडिलांची कीर्ती" शक्यता कमीच.मारवाडी लोक मुलांना दुसय्राकडे नोकरीला ठेवतात.लाड नको म्हणून.सरदारजी ट्रान्सपोर्टवाले वेगळीच युक्ती करतात.

दगड Tue, 26/07/2016 - 07:08

In reply to by चिमणराव

"अब्जाधीश वडलांनी मुलाला नोकरीसाठी पाठ्वले" या बातमीवरून आठवलेला १ जोक.
एकदा ६० वर्षांचा एक अब्जाधीश त्याच्या २५ वर्षाच्या चि़कण्या बायकोला घेऊन पहिल्यांदाच मित्राकडे पार्टीला जातो. त्याच्या सुंदर बायकोला बघून तो मित्र हैराण होतो. आपल्या मित्राला एका कोपर्‍यात बोलवून हळूच विचारतो की अरे तू हे कसं काय जमवलंस?
अब्जाधीश हळूच म्हणतो,अरे मी माझं वय खोटं सांगितलं.
मित्र म्हणतो, ओह, तू ४०-४५ वय सांगून पण तुला बरीच तरूण आणि सुंदर बायको मिळाली तर.
तर अब्जाधीश डोळा मिचकावत म्हणतो, अरे हट, मी तर तिला माझं वय ८५ सांगितलं.

राही Mon, 25/07/2016 - 17:43

गेल ऑम्वेट या विदुषींच्या एका पुस्तकाचा बिपिन कार्यकर्ते आणि उत्पल यांनी केलेला अनुवाद काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालाय. तो कुठून (विकत) मिळेल? त्या वेळी लिंक दिली गेली होती वाटते. आता शोधायचा कंटाळा आलाय.

राही Tue, 26/07/2016 - 17:58

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ठीक. बाजारात आल्यावर नक्की लिंक द्या.
आणि अभिनंदन. (तेव्हा करायचे राहिले. म्हटले वाचून झाल्यावर अभिनंदनासकट सविस्तर कळवीन.)

चिमणराव Tue, 26/07/2016 - 18:54

युरेनस ग्रहाच्या भ्रमणातल्या त्रुटींवरून आणखी एक ग्रह ( = नेपच्युन ) अमुक ठिकाणी असावा असे गणिताने काढले म्हणतात दीडशे वर्षांपुर्वी. तर त्यांनी नक्की कोणते गणित केले त्यावेळी ?

मिहिर Tue, 26/07/2016 - 20:32

पाश्चात्य ह्या शब्दाचा मूळ अर्थ काय? 'पश्चात्'वरून 'नंतरचे' असा काहीतरी अर्थ असावा असे वाटते. हा शब्द पाश्चिमात्य ह्या अर्थाने कधीपासून वापरला जाऊ लागला?

चार्वी Tue, 26/07/2016 - 21:56

In reply to by मिहिर

पश्चात् या शब्दाचा अर्थ मागून, मागच्या बाजूने, नंतर, शेवटी, तसेच 'पश्चिमेकडून' असाही होतो. त्यामुळे पाश्चात्यचा एक (मूळ) अर्थ पाश्चिमात्य असा होतो. मला वाटते पाश्चिमात्य हा तुलनेने नवा शब्द आहे, पाश्चात्य जुना.

राजेश घासकडवी Wed, 27/07/2016 - 00:36

In reply to by मिहिर

कदाचित दिशांना मिळालेली नावं हीच, सूर्य आधी दिसतो ती पूर्व, आणि नंतर दिसतो ती पश्चिम अशी पडली असतील. उत्तर या शब्दालाही पुढची असा अर्थ आहे. दक्षिणचा मात्र असा कालवाचक अर्थ माहित नाही.

गब्बर सिंग Wed, 27/07/2016 - 06:51

खालीलपैकी कोणता नेमका उच्चार बरोबर आहे -

(१) दाण्याचे कूट
(२) दाण्याचा कूट

( गेले अनेक दिवस यावरून आमच्या घरात युद्ध चालू असल्यामुळे ... आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच... अशा उद्देशाने लिहित आहे. माझे म्हणणे "दाण्याचे कूट" हा शब्दप्रयोग बरोबर आहे. बायकोचे म्हणणे "दाण्याचा कूट" हे बरोबर आहे.)

मी हा प्रश्न ऐसी वर विचारतोय म्हंटल्यावर - Who cares about what they say ? ---- असा प्रतिप्रश्न "शत्रूपक्षाकडून" आलाच.

नितिन थत्ते Wed, 27/07/2016 - 07:03

In reply to by गब्बर सिंग

तुम्ही प्रश्नांची वाटणी का करून घेत नाही?
आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रश्नांवर तुमचे मत फायनल समजायचे. घरगुती प्रश्नांवर..........

राही Wed, 27/07/2016 - 07:44

In reply to by गब्बर सिंग

गृहखात्याशी संबंधित प्रश्न हे नेहमीच कूटप्रश्न असतात.
तरीही : 'कूट' या शब्दाचा अर्थ चूर्ण, पूड, भुकटी असा असेल तर तो नपुंसकलिंगी शब्द असतो. एरवीही, कोडे-उखाणा या अर्थीसुद्धा, तो नपुंसकलिंगीच असतो.
अवान्तर : अलीकडे मराठीत नपुंसकलिंगी शब्दांचा पुंलिंगी वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. उदा. धाबे, ऋण, अळू, पितळ, जस्त, कथील इत्यादि. मी तर लिंबूसुद्धा तो लिंबू असा वापरलेला ऐकला आहे. हे हिंदीच्या प्रभावामुळे होत असावे. शिवाय इथल्या गेल्या तीन पिढ्या नपुंसकलिंगनिदर्शक अनुस्वाराशिवाय वाढल्या. त्यामुळे संदिग्धता आली.
शब्दांचा वापर उभयलिंगी करण्याचे प्रमाणही वाढते आहे. गूळ हा तो किंवा तें असू शकतो. लसूण (लशुन) संस्कृतमध्ये नपुंसकलिंगी पण मराठीत ती किंवा तो. मोती जुन्या मराठीत तें मोतीं असायचे. अनेकवचन मोत्यें. आता मात्र 'तो'च. हेच इतर काही रत्नांसंबंधी. माणिक, पाचू वगैरे.

गब्बर सिंग Wed, 27/07/2016 - 09:23

In reply to by राही

गृहखात्याशी संबंधित प्रश्न हे नेहमीच कूटप्रश्न असतात.

कूटप्रश्न ते कूटनीती असा प्रवास होऊ शकतो.

बाकी "शेंगदाण्याचे कूट" असा सर्च मारलात तर ४१८० रिझल्ट्स मिळतील.

"शेंगदाण्याचा कूट" या सर्च ला २०२० रिझल्ट्स मिळतात.

बिटकॉइनजी बाळा Wed, 27/07/2016 - 11:21

In reply to by राही

कूट -> चूर्ण - ते चूर्ण; पूड- ती पूड; भुकटी-ती भुकटी;
-> कोडे - ते कोडे; उखाणा-तो उखाणा.
म्हणजे अर्थांनी कूट सर्वलिंगी आहे तर!

मिहिर Wed, 27/07/2016 - 21:12

In reply to by राही

रोचक.

धाबे, ऋण, अळू, पितळ, जस्त, कथील इत्यादि.

वरीलपैकी ऋण, पितळ, जस्त, कथील हे पुल्लिंगात कधी वाचलेले, ऐकलेले आठवत नाहीत. 'त्याने ऋण काढला आणि सण साजरा केला' किंवा 'विरल हायड्रोक्लोरिक आम्लात जस्त घातला की हायड्रोजन वायू मुक्त होतो' अशा प्रकारची वाक्ये खरेच वापरली जातात का?
लिंबू पुल्लिंगीच आहे असा समज होता. लिंबू चिरला, दोन लिंबू आणले इ. अधिक विचार केल्यावर 'खारवलेली लिंबं' वगैरे प्रयोग आठवले.
कोल्हापुरात अनेकदा मुली/बायका पुल्लिंगी होतात आणि मुले नपुंसकलिंगी!

Nile Thu, 28/07/2016 - 15:29

In reply to by मिहिर

लिंबू चिरला, दोन लिंबू आणले

लिंबू हे अनेकवचन आहे? एकवचनी लिंबू हे नपूसकलिंगीच ऐकलंय मी तरी. आणि अनेकवचनात लिंबं.

चिंतातुर जंतू Wed, 27/07/2016 - 14:20

In reply to by गब्बर सिंग

>> माझे म्हणणे "दाण्याचे कूट" हा शब्दप्रयोग बरोबर आहे. बायकोचे म्हणणे "दाण्याचा कूट" हे बरोबर आहे.

"मी हा प्रश्न ऐसी वर विचारतोय म्हंटल्यावर - Who cares about what they say ? ---- असा प्रतिप्रश्न शत्रूपक्षाकडून आलाच." असं गब्बरनं म्हणूनही एकाही ऐसी सदस्याकडून "बाहेर कुणी कितीही गब्बर असो, घरात बायकोच बब्बर असते" अशी प्रतिक्रिया आली नाही म्हणून ती देतोय.

चिंतातुर जंतू Wed, 27/07/2016 - 15:46

In reply to by नितिन थत्ते

>>आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रश्नांवर तुमचे मत फायनल समजायचे. घरगुती प्रश्नांवर..........

अंहं हे पुरेसं एमसीपी नाही होत आहे. त्या तर्कशास्त्रानुसार घरात आर्थिक प्रश्नांवर जरी तुमचं मत फायनल असलं तरी मग बायको बब्बर नाही ठरत. पुणेकर कसे, तुम्ही कोणत्याही विषयात तज्ज्ञ असाल तरी स्वतःलाच शहाणे समजतात तसं असायला हवं ;-)

चिंतातुर जंतू Wed, 27/07/2016 - 15:59

In reply to by अनुप ढेरे

पुरेसा आधुनिकोत्तर असल्यामुळे अस्मिता भंजाळलेल्या आहेत. त्यामुळे उत्तर द्यायला मी क्वालिफाईड नाही. तुमच्या मते मी कोणच्या गावचा असल्यासारखा वागतो? :-)

चिंतातुर जंतू Wed, 27/07/2016 - 18:36

In reply to by अनुप ढेरे

>>आयला, आधुनिकता इतक्या शिंपल प्रश्नाला कॉम्प्लिकेटेड बनवते?

आधुनिकता नव्हे; आधुनिकोत्तरता! :-)

आता हेच पाहा, भारतात कुणीही तुम्हाला 'तुमचं मूळ गाव कोणतं?' असं विचारतं. पूर्वीच्या भूधारकांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा असे, पण त्याचं उत्तर सोपं असे, कारण कोणत्या तरी गावी तुमच्या पूर्वजांची जमीन, शेती, जुनं घर वगैरे असे. आताच्या काळातही काही लोकांसाठी ते मूळ गाव सुटीत जाण्याचं किंवा / आणि स्मरणरंजनाचं वगैरे असतं. पण तुम्ही पुरेसे आधुनिकोत्तर असाल, तर तुमचं त्या गावाशी काही नातंच नसतं. शहरीकरण झाल्यानंतरही लोकांना 'मी कोल्हापूरकडचा / पुणेकर / मुंबईकर' वगैरे सांगण्यात अभिमान वाटे. पण आता पुरेसं जागतिकीकरण आणि त्याला जोडून नोकरीधंद्यासाठी कुठे कुठे भटकणं (तुमच्या आईवडिलांचं आणि / किंवा तुमचं) खूप झालं असलं तर असं एकच एक कोणतं तरी गाव तुमचं अस्मितादर्शक असं काही खरं तर असत नाही (तुम्ही ते हवं तर मानू शकता अर्थात).

आता ही केस पाहा :

  • माझे आजोबा तीन वर्षांचे असताना त्यांचं 'मूळ गाव' सुटलं. नंतर ते एका गावी थोडं शिकले, एका गावी पुढे शिकले, मग अनेक ठिकाणी फिरतीच्या नोकरीवर राहिले. एका ठिकाणी सर्वात अधिक काळ राहिले (पुणे). माझी आजी लहानपणापासून जवळपास आयुष्यभर पुण्यात राहिली. माझ्या मते आजी-आजोबांचं अस्मितादर्शी गाव तेच. (आधुनिक काळ : उत्तर देणं सोपं जातं.)
  • माझे वडील पुण्यात शिकून नोकरीनिमित्त बाहेर पडले, तेसुद्धा अनेक ठिकाणी फिरतीवर राहिले. एका ठिकाणी सर्वात अधिक काळ राहिले (मुंबई). आईही सर्वात अधिक तिथेच (आणि तिचे माहेरचे नातेवाईकही तिथेच). माझ्या मते तरीही वडिलांचं अस्मितादर्शी गाव पुणेच राहिलं (आणि त्यांचे माहेरचे नातेवाईकही तिथेच). (आधुनिक - आधुनिकोत्तर सीमेवर : उत्तर थोडं गुंतागुंतीचं.)
  • मी असाच अनेक गावी राहिलो. सर्वात अधिक काळ पुण्यात राहिलो. त्याहून थोडा कमी मुंबईत. मी माझ्या 'मूळ गावी' कधीही गेलेलोदेखील नाही; तद्वत माझ्या लेखी तो माझ्या आयडेंटिटीचा भागच नाही.

आता तुमच्या मते माझं अस्मितादर्शी गाव कोणतं? :-)

अनुप ढेरे Wed, 27/07/2016 - 18:43

In reply to by चिंतातुर जंतू

एक माप म्हणजे तुमचं अपब्रिंगिंग ( साधारणतः तुमचा सगळ्यात इंप्रेशनेबल काळ. माझ्यामते हायस्कूल + जु. कॉलेज हा सगळ्यात इम्प्रेशनेब्ल काळ असतो.) जिथे झालं ते तुमचं गाव. त्या काळातल्या क्यारॅक्टरीस्टिक टिकून रहातात असं मत आहे. नॉट नेसेसरीली वाडवडिलार्जित जागा असलेलं/ वाडवडील जिथून आले ती जागा.

चिंतातुर जंतू Wed, 27/07/2016 - 18:55

In reply to by अनुप ढेरे

>> माझ्यामते हायस्कूल + जु. कॉलेज हा सगळ्यात इम्प्रेशनेब्ल काळ असतो.) जिथे झालं ते तुमचं गाव. त्या काळातल्या क्यारॅक्टरीस्टिक टिकून रहातात असं मत आहे. नॉट नेसेसरीली वाडवडिलार्जित जागा असलेलं/ वाडवडील जिथून आले ती जागा.

आधुनिक काळातच ह्यात अडचणी आहेत -

  • 'विशीपर्यंत मला काही कळतच नव्हतं. तिशीत खरी अक्कल आली' असं सांगणारे किती तरी लोक मला माहीत आहेत. मग त्यांचं 'इम्प्रेशनेबल' वय पुढे जातं.
  • 'आयआयटीत गेलो तेव्हा खरं जग कळू लागलं' असं सांगणारे किती तरी लोक असतात (आयआयटी उदाहरणादाखल). आणि त्यांचं वर्तन / स्वभावही त्याला साजेसे असतात. मग त्यांचं 'इम्प्रेशनेबल' वय पुढे जातं.
  • 'कोंकणस्थ / देशस्थ' वगैरे अस्मिता कधी कधी इतक्या पक्क्या असतात, की 'इम्प्रेशनेबल' काळात तिथून दूर जरी तुम्ही वाढला असलात, तरी कुटुंबातल्या वातावरणामुळे ठसा 'मूळ गावा'चाच पडलेला असतो.
  • तुम्ही नवी मुंबईत वाढला असलात, आणि कामानिमित्त अनेक वर्षं दक्षिण मुंबईत जात राहिलात, तर तुमच्यावर दक्षिण मुंबईचे अनेक संस्कार होतात. मग 'नवी मुंबई' केवळ दक्षिण मुंबईत घर परवडत नाही म्हणून राहण्याची जागा राहते.

आधुनिकोत्तर काळात हे खूपच गुंतागुंतीचं होतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 27/07/2016 - 22:38

In reply to by चिंतातुर जंतू

पुढे कधीही, कोणत्याही पुणेकरांनी माझ्या खवचटपणाचं श्रेय परस्पर पुण्याला देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना 'तुम्ही पुरेसे खवचट नाही, इंग्लिश टीव्ही पाहत जा थोडा' असं सुचवता येईल.

अनुप ढेरे Thu, 28/07/2016 - 13:36

In reply to by चिंतातुर जंतू

इम्प्रेशनेबल असणं हे आपल्या हातात असत का नक्की? म्हणजे आता मी इम्प्रेशनेबल आहे असं ठरवून थोडीच होईल. आपल्या नकळत, त्या वयात, नक्कीच आपलं वागणं, आवडी-निवडी, लकबी, सवयी शेप होत असतात. सो गुंतागुंत असली तरी एका गावाचा/शहराचा/प्रांताचा ठसा आपल्यावर रहातोच असं वाटत.

चिंतातुर जंतू Thu, 28/07/2016 - 15:33

In reply to by अनुप ढेरे

>>इम्प्रेशनेबल असणं हे आपल्या हातात असत का नक्की? म्हणजे आता मी इम्प्रेशनेबल आहे असं ठरवून थोडीच होईल. आपल्या नकळत, त्या वयात, नक्कीच आपलं वागणं, आवडी-निवडी, लकबी, सवयी शेप होत असतात.

एक्झॅक्टली. तुम्ही वर म्हणाला आहात त्या विधानाशी (हायस्कूल + जु. कॉलेज हा सगळ्यात इम्प्रेशनेबल काळ असतो. आणि नंतरच्या सर्व आयुष्यावर त्याचा प्रभाव पडतो) त्यामुळेच मी पूर्णतः सहमत नाही. माझ्या अनुभवात लोकांचा इम्प्रेशनेबल काळ व्यक्तिनिहाय वेगवेगळा असतो. आणि त्यामागचे घटकही आता पूर्वीहून अधिक गुंतागुंतीचे असतात. थोडक्यात,

  • इम्प्रेशनेबल काळ अगदी तिशी-चाळिशीपर्यंत गेलेला आहे अशी स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट उदाहरणं आता दिसतात.
  • आताच्या काळात माणसांची भौगोलिक हालचाल वाढलेली आहे.
  • इम्प्रेशनेवल वयात कशाकशाचं इम्प्रेशन पडतं हे आता अधिक गुंतागुंतीचं झालेलं आहे : गाव, घर, कुटुंब, परिसर, जात, धर्म, भाषा, आर्थिक स्तर हे सगळे जुने घटक आहेतच. शिवाय टीव्ही, सोशल मीडिया, वृत्तपत्रं, पुस्तकं वगैरेंची प्रचंड प्रमाणात उपलब्धता आता आहे. उदा. मी पुण्यात बसून राहतो आणि आरामात जगभरातले प्रभावशाली विचार, किंवा 'पोकेमॉन गो'ची एपीके, किंवा 'गेम ऑफ थ्रोन्स'चे अनसेन्सॉर्ड एपिसोड्स वगैरे माझ्यापर्यंत पोहोचतात.

नंदन Mon, 01/08/2016 - 05:55

In reply to by चिंतातुर जंतू

आधुनिकोत्तर काळात हे खूपच गुंतागुंतीचं होतं.

जेम्स वूडचा 'On Not Going Home' हा लेख आठवला. दुवा: http://www.lrb.co.uk/v36/n04/james-wood/on-not-going-home

चिंतातुर जंतू Mon, 01/08/2016 - 15:27

In reply to by नंदन

लेख / निबंध आवडला.

To have a home is to become vulnerable. Not just to the attacks of others, but to our own adventures in alienation.

हे खरं असावं. साहित्याच्या 'आंतरराष्ट्रीयीकरणा'बद्दलची मतं आणि (प्रूस्तसकट!) इतर साहित्यिक संदर्भही रोचक आहेत. 'सेक्युलर होमलूजनेस' किंवा ‘afterwardness’ची संकल्पनाही. अनेक आभार!

अतिशहाणा Wed, 27/07/2016 - 18:58

In reply to by चिंतातुर जंतू

विचारात पाडणारा प्रतिसाद चिंजं. लवकरच माझंही जन्मगावापेक्षा इतर ठिकाणचं राहणं जास्त होईल. मग मी मूळचा अमुकतमुक गावचा या वाक्याला कितपत अर्थ आहे हा प्रश्न पडतो.

.शुचि. Wed, 27/07/2016 - 19:07

In reply to by गब्बर सिंग

तुमची बायको पुण्याची दिसत नाही गब्बर कारण आमच्या पुण्यात दाण्याचे कूटच म्हणतात :) तुम्ही मात्र पुण्याचे दिसता. काय बरोबरे की नाही ;)

.शुचि. Wed, 27/07/2016 - 19:16

In reply to by अतिशहाणा

ओह रियली :(
एका दाण्याचा कूट आणि अनेक दाण्यांचे कूट!!
आता तुम्ही खिचडी, काकडीचे खमंग यात एकाच दाण्याचे कूट घालत असाल तर माहीत नाही ब्वॉ ;)
___
ऑन सेकंड थॉट एका दाण्याचेही कूटच.

अतिशहाणा Wed, 27/07/2016 - 20:28

In reply to by .शुचि.

मला वाटतं हे थोडं hair आणि hairs सारखं आहे. एकाच प्रकारच्या दाण्याचा असतो 'तो' कूट. वेगवेगळे दाणे घेऊन केला तर 'ते' कूट

बाळ सप्रे Thu, 28/07/2016 - 15:31

In reply to by .शुचि.

इथे दाणा या शब्दाच्या लिंगाविषयी नव्हे तर कूट या शब्दाच्या लिंगाविषयी चर्चा आहे.
तो कूट की ते कूट??

Nile Thu, 28/07/2016 - 16:40

In reply to by अतिशहाणा

दाण्याचा कूट. आणि अनेकवचन करायचं असेल तरी दाण्यांचा कूट. दाण्याचे कूट म्हणजे धोब्याचे धोतर वगैरे प्रकार झाला. तिथे बहूवचन कसे आले?

गब्बर सिंग Wed, 27/07/2016 - 23:04

In reply to by .शुचि.

तुमची बायको पुण्याची दिसत नाही गब्बर कारण आमच्या पुण्यात दाण्याचे कूटच म्हणतात (स्माईल) तुम्ही मात्र पुण्याचे दिसता. काय बरोबरे की नाही (डोळा मारत)

माझी बायको पुण्याचीच आहे ओ. सदाशिव पेठेतल्या शाळेत जायची. ती पेरुगेटाच्या आसपास असलेली शाळा ओ. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ची. शाळेत असताना पहिल्या दुसर्‍या नंबरात होती.

म्हणून तर आम्हाला शंका ओ !!! आमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो अशानं !!!

---

मी काही पुण्याबिण्याचा नाही.

.शुचि. Wed, 27/07/2016 - 23:16

In reply to by गब्बर सिंग

सदाशिव पेठेतल्या शाळेत जायची. ती पेरुगेटाच्या आसपास असलेली शाळा ओ. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ची. शाळेत असताना पहिल्या दुसर्‍या नंबरात होती.
म्हणून तर आम्हाला शंका ओ !!!

हाहाहा सेम हियर. एकच फरक - हुजूरपागा. तुमच्या श्रीमतींची कदाचित रेणुकास्वरुप किंवा अहिल्यादेवी असेल.
.
बाकी नवर्‍याला एकदा शिशुशाळेचा अर्थ मी मजेमजेत सांगीतला होता की लहान मुलं शी आणि शू करतात म्हणून ती शिशुशाळा. त्याला ते खरच वाटलं होतं =))
.
तो कागदं , केसं म्हणाला की मी हमखास (१००%) करेक्ट करते. पण सासूबाईंना नाही ना करता येत :( आणि मग मुलीच्या कानावर चूकीचे शब्द पडतात. एकदा कोणाचा तरी पाय वाकडा होता म्हणण्याऐवजी त्या तोकडा म्हणालेल्या. इतकी सुरसुरी आली होती ना मला त्यांची चूक सुधारायची :( एकदा काय तर उन्हाने डोळे वखवखलेत म्हणे .... मला अज्जिबातच रहावेना ...मी ताबडतोब म्हटलं "हां उन्हाने डोळे तळावले असतील तुमचे आई."

मनीषा Sun, 31/07/2016 - 13:18

In reply to by गब्बर सिंग

दाण्याचा कूट हाच शब्दप्रयोग आमच्या पुण्यात करतात. आणि तोच बरोबर आहे. (हे माझे मत)
'ते कूट ' म्हणजे कोडे
आणि 'तो कूट' म्हणजे काहीतरी कुटुन त्याचा भुगा बनविला जातो तो .. :))

'न'वी बाजू Sun, 31/07/2016 - 17:34

In reply to by मनीषा

मी 'दाण्याचे कूट' म्हणतो. आणि तेच बरोबर आहे असे माझे ठाम मत आहे. आणि मी(ही) (मूळचा) पुण्याचा(च) आहे. (४११०३०.)

एनी ऑब्जेक्षन्स?

(बाकी, हल्ली पुण्यात 'दाण्याचा कूट' म्हणण्याचीच पद्धत जर रुळलेली असेल, तर:
|
|
|
|
|
|
|
<हंबरडा>कोठे नेऊन ठेवले आहे रे पुण्यास माझ्या!!!!!!
</हंबरडा>

राही Sun, 31/07/2016 - 17:59

In reply to by 'न'वी बाजू

'कोठें नेऊन ठेवलें आहे रे पुण्यास माझ्या!'
पुण्यास आता औंध, बाणेर, मगरपट्टा येथें नेऊन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तुमचे पुणे आता तुमचा पुणे झाला आहे. म्हणजे पूर्वी जसा एखाद्याचा कात्रजचा घाट होई, तसा.
बादवे, कात्रजचासुद्धा आता पुणाच झालाय.

नितिन थत्ते Sun, 31/07/2016 - 19:52

In reply to by राही

पुणे म्हणजे शनिवार वाडा (अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे फडके हौद), स्वारगेट आणि लकडी पूल या तीन शिरोबिंदूंच्या मधला भाग.

शिवाजी नगर, म.न.पा भवन, ससून हॉस्पिटल, नागझरी, हे (खर्‍या) पुण्यात धरत नाहीत.

मनीषा Mon, 01/08/2016 - 08:22

In reply to by 'न'वी बाजू

ऑब्जेक्शन काहीच नाही .

'दाण्याचा कूट ' हल्ली नाही , पुर्वीपासून म्हणतात.

तुम्ही पुण्याचे? पण तो मोठ्ठा हंबरडा पाहून वाटलं ......... असो !

(पुणं आजकाल फॉरीन मधे पण असते .)

चिंतातुर जंतू Mon, 01/08/2016 - 15:43

In reply to by 'न'वी बाजू

हंबरडा>कोठे नेऊन ठेवले आहे रे पुण्यास माझ्या!!!!!! /हंबरडा>

आमच्या पुण्यात इतक्या मोठ्यानं हंबरडा फोडायची रीत नाही. त्यामुळे तुमचा पुणेरीपणा पुरेसा अस्सल वाटत नाही ;-)

मनीषा Mon, 01/08/2016 - 08:36

In reply to by राही

हा मुंबईकरांचा भ्रम आहे .. :)

अनेक दाण्यांचा कूट .. तो कमी किंवा जास्तं असेल पण अनेक नाही. म्हणून तो कूट ( आणि 'ते कूट' म्हणलं की अर्थ बदलतो ना?)

कूटात असलेले अनेक दाणे .. म्हणून ते दाणे. ( जसे तो पक्षी =१ पक्षी , ते पक्षी > १ पक्षी )

म्हणून दाण्याचा कूटच बरोबर .

राही Mon, 01/08/2016 - 09:10

In reply to by मनीषा

आत्ता गोंधळ लक्ष्यात आला. दाण्याचे अथवा दाण्यांचे कूट यामध्ये 'चे' हे 'चा'चे अनेकवचन आहे असे मनीषाताई धरून चाल्ल्यात. अर्र्.. अहो ते मुळात दाण्याचें कूट असें आहे हो. आणि कूट हे कलेक्टिव मटीरियल नाउन असल्यामुळे एकाच पदार्थाचे कूट असल्यास त्याला अनेकवचन नाही. वेगवेगळ्या पदार्थांची कुटें असल्यास किंवा वेगवेगळा भरडपणा असल्यास म्हणजे सरसरीत, बारीक, रवाळ तर त्या सर्वांचा एकच समूह (कलेक्शन) होत नाही म्हणून ती वेगवेगळी कुटें आणि अर्थात वेगवेगळ्या जिनसांची उदा. तिळाचे कूट, मिर्‍याचे कूट तर ती सारी कुटें होतात. पण एका दाण्याचें अथवा तशाच समान अनेक दाण्यांचे; कूट तें कूटच. भुकटीचेही तसेच आहे. एका पदार्थाची भुकटी. मग ती एक ग्रॅम असो वा एक किलो पदार्थाची असो. पण अनेक वेगवेगळ्या पदार्थांच्या मात्र भुकट्या.
अरारारारा!! कुठे नेऊन ठेवलें आहे पुणेंकरांनी व्याकरण आमचे!

तिरशिंगराव Wed, 27/07/2016 - 09:37

आम्ही तरी दाण्याचे कूट असेच म्हणत आलो आहोत. पण तरीही तेच बरोबर, असा आग्रह नाही. दाण्याचा कूट किंवा दाण्याची कूट, असे कोणी म्हणाले तर, आम्ही त्यांना 'फडतुसांच्या' यादीत टाकतो.

चिमणराव Wed, 27/07/2016 - 19:23

१)दाण्याच्या जाडसर भरड कुटाला दाण्याचा कूट म्हणत असतील.
२)माणगाव गोरेगाव महाड भागातले लोक "नळाचा पाणी येतो/येत नाही तेव्हा बावडीचा आणावा लागतो." बोलतात.
३)मोठ्या नदीला नद म्हणतात.ब्रम्हपुत्र.

राही Thu, 28/07/2016 - 20:21

अरे बाप रे! फारच कुटाणा झालेला दिसतोय इथे.

चिमणराव Thu, 28/07/2016 - 21:56

खवचटपणा झाला की १) पुण्याचे का? विचारतात तेव्हा मला त्या शहराची फारच कीव येते.इकडे चिंजने सांगितल्याप्रमाणे कोणत्याच गावची अस्मिता आमच्याकडे तीन पिढ्यांत नाही एवढंच नाही तर गिरगाव-कोकण-पुण्यात एकपण नातेवाईक नाही.खवचटपणा अक्वाइर्ड उचललेला असावा अथवा आमच्या कुंडलीतल्या वृश्चिक लग्नावर ढकलणे सोपे ठरेल.

राही Fri, 29/07/2016 - 07:18

आजकाल मुंबईसह सगळा कोंकण 'तो' झाला आहे. आजकाल म्हणजे गेली २५-३० वर्षे. म्हणजे असे की जुन्या काळी मुंबई आणि अर्थात कोंकण 'तें' (म्हणजे तेंडुलकर नव्हेत कृपया.) म्हणजे नेभळट, नामर्द वगैरे होता. नंतर एका ढाण्या वाघाचा उदय झाला आणि अचानक तोपर्यंत हाती भरलेल्या बांगड्या वगैरे खळ्ळ्कन (अलीकडे खट्याक्कन) फुटल्या.
तर 'तो'ला अशी प्रतिष्ठा आहे. म्हणून दाण्याचा कूट 'तो'च असणे काळसुसंगत आहे. अगदी कुटून कुटून खवचट झाला तरी.
पण खरोखर आजकाल तो कोंकण असेच म्हणतात.

Nile Fri, 29/07/2016 - 07:32

In reply to by राही

ते कोकण असेल तर कोकणात जाऊन आलो असे तेव्हा कोकण्यात जाऊन आलो असे म्हणायचे का? (ते पुणे, ते ठाणे, पुण्यात, ठाण्यात वगैरे.) ;-)

राही Fri, 29/07/2016 - 07:56

In reply to by Nile

कोंकण हे 'ए'कारान्त नाही. दळण-दळणाला, काम-कामाला/कामात तसे कोंकण-कोंकणात.
ठाणे, पुणे हे 'ए'कारान्त. पुणे तर पक्के 'ए'कारान्त. तेव्हा त्याला वेगळा नियमनेहमीच!.

घाटावरचे भट Fri, 29/07/2016 - 16:26

In reply to by राही

पुण्यात तर कोकणे चौकही आहे. अर्थात तो आहे पिंपरी-चिंचवड मनपाच्या हद्दीत, त्यामुळे त्याला पुण्यात म्हणावं की नाही याबाबत वाद होऊ शकतो. पण आजकाल पश्चिमेला तळेगाव-दाभाडे पासून पूर्वेला पार सासवडपर्यंत सगळं पुणंच म्हणायची फ्याशन आहे. असो. :-)

.शुचि. Fri, 29/07/2016 - 19:50

काल आमच्या ऑफिसमध्ये पोलिस प्रेझेन्टेशन झाले. जर कोणी माथेफिरु आलाच तर काय करायचे याविषयक उपायांची चर्चा झाली व शैक्षणिक दृष्टीकोन मिळाला. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे -

(१) जगात ३ प्रकारचे लोक आहेत - मेंढ्या, लांडगे व मेंढ्यांची राखण करणारे धनगरी कुत्रे. तुम्ही कोणत्या वर्गात मोडता हे आधी लक्षात घ्या.
(१-अ) मेंढ्या हे लोक द्याळू, मनमिळाऊ कधीहीकोणालाही इजा न पोचविणारे, ज्यांना अन्य लोकांबद्दल अतिशय सहानुभूती असते असे असतात.
(१-ब) लांडगे ही हिंस्त्र जमात असून यांना अन्य लोकांबद्दल ममत्व यत्किंचीतही नसते
(१-क) धनगरी कुत्रे हे मेंढ्यांवरती हल्ला तर करत नाहीतच पण उलट त्यांचे रक्षणच करतात.
तुम्ही कोण आहात हे सर्वप्रथन जाणून घ्या (हे घरी सांगीतल्यावर नवर्‍या ने जोक केलाच की तू या तीन्हीतही नाहीस. तू गिनीपिग आहेस =)) )
(२) Run-Hide-Act
(२-अ) त्या जागेवरुन लवकरात लवकर पळून जा. पळून जा . पळून जा. अन्य लोक आले नाही तर तुम्ही पळा त्यांच्याकरता थांबू नका. सुरक्षित अंतरावर जा. शक्य झाल्यास अन्य लोकांना घटनास्थळी जाण्यापासून रोखा. ९-१-१ ला फोन करा.
(२-ब) जर पळता आले नाही तर लपा. ज्या खोलीत आहात तेथील दिवे बंद करा. आवाज करु नका. सेल फोन बंद करुन टाका. निदान रिंगर व व्हायब्रेटींग मोड ऑफ करा. जितके म्हणून अडथळे त्या माथेफिरु व तुमच्यात निर्माण करता येतील तितके करा. जसे दाराला कुलूप लावा तेही शक्य नसल्यास दाराचा फटीत wedge घालून दार जॅम-बंद करुन ठेवा. दारापुठे टेबल, कपाट आदि बॅरिकेडस रचा.
(३) आता बंद दाराआड "अ‍ॅक्ट" चीदेखील तयारी ठेवा म्हणजे माथेफिरु आल्यास त्याच्यावर हल्ला करण्यासाठी, हातात कात्री, खुर्ची, घड्याळ जे काही अवजड आहे ते घेऊन आडोशाला ऊभे रहा. सहसा हे माथेफिरु बंद दारे उघडण्याचे श्रम न घेता दिसेल त्या सुट्या व्यक्तीला मारत सुटतात.
(४) घटना सुरु झाल्यापासून, स्वतःला जलदगतीने सुरक्षित करा. पहीली ८ मिनिटे अत्यंत क्रुशिअल असतात.
(५) रेस्टॉरंट, सिनेमागृह, ऑफिस सर्वत्र एक "जागेचे भान"(situational awareness) स्वतःमध्ये निर्माण करा. जसे "exits" कुठे कुठे आहेत हे सदैव ध्यानात ठेवा. Let acquiring situational awareness become your second nature.
(६)OODA loop लक्षात घ्या. observe, orient, decide, and act. जेव्हा तुम्ही एका खोलीत लपता थेव्हा तुम्ही ऑलरेडी observe, orient झालेले असता. आता जर माथेफिरु आत आला, तर तो observe व orient झालेला नसतो. त्या परिस्थितीचा फायदा घ्या. डोळे व अन्य नाजूक भागावर प्रहार करा. चिली-स्प्रे, कीटकनाशक-स्प्रे वापरा, त्याच्या डोळ्यावरती फ्लॅशलाईट मारा. कसे स्वतःला वाचवता येइल ते पहा.हाताची मूठही नाजूक भागावर जबरदस्त प्रहार करु शकते.
शेवटचा मुद्दा - Never never try talking out that person. माथेफिरुंशी संवाद साधता येत नाही. प्रयत्नही करु नका.

गब्बर सिंग Fri, 29/07/2016 - 23:19

In reply to by .शुचि.

आवडेश.

माथेफिरूला हीच माहीती मिळाल्यास तो काय विचार करेल व तो कसा वागेल ?

दुसर्‍या शब्दात - तुम्ही ह्या माहीतीबरहुकुम वागणार आहात अशी त्याची अपेक्षा सेट झाली. आता तो काय विचार करेल ? कसा वागेल ?

.शुचि. Fri, 29/07/2016 - 23:27

In reply to by गब्बर सिंग

मलाही अगदी हेच्च वाटले गब्बर. की अशा माहीतीचा उपयोग त्या माथेफिरुंना होऊ शकतो. तुम्हाला माहीते मला हा विचार केव्हा डोक्यात आला -
(१) जेव्हा पोलिस ऑफिसर म्हणाला की "माथेफिरुंनी नेहमीच त्या घटनेचा खूप अभ्यास केलेला असतो पण त्यांचा एक्झिट प्लॅन शून्य असतो." मी मनात म्हटलं अशा आयडीयाज त्यांना मिळाल्या तर विचारायलाच नको :(
(२) हाच विचार लहानपणी "दक्षता" मासिक (मला खूप आवडे) वाचताना यायचा की असे या तपासाची सर्व इत्यंभूत माहीती मिळाल्याने , गुन्हेगारांना अधिक सावधानता बाळगता येईल :(

मनीषा Sun, 31/07/2016 - 13:24

बर्‍याच वर्षांपूर्वी मी नाथ माधवांची एक कादंबरी वाचली होती , "सोनेरी टोळी " नावाची .
त्यात काही सुशिक्षित बेरोजगार तरूण , कसे लोकाना फसविण्याचा उद्योग सुरू करतात, आणि काही काळासाठी यशस्वी होतात असे काहीसे कथानक होते.
त्यात एक प्रसंग असा --

चर्चा चाललेली, की या महानगरी मुंबईत रहायचे कसे? नोकरी धंदा मिळत नाहीये, काय करावे ?

त्यातला एक म्हणतो (बहुदा राजा की असे काही नाव ) लोकांना मुर्ख बनवायच,, जो पर्यंत सरळ मार्गाने पैसा मिळवणे शक्य नाही होत, तो पर्यंतच . मग तो सांगतो की असे करणे फारसे अवघड नाही. त्याच्या मते एक व्यकी म्हणून माणुस समंजस, विचारी, शहाणा इ. असतो. परंतु समुहात सामील झाल्यावर त्याचे शहाणपण , विचारशक्ती इ. लयाला जाते. आणि तो फक्त अनुकरण करत राहतो.

आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी तो एक प्रयोग करतो.
रस्त्यावर, साधारण लोकांच्या सहज नजरेत येईल अशा जागेवर थांबुन आकाशाकडे नजर लावुन बघत राहतो. अधुनमधुन हातवारे करीत आणि काही अनाकलनीय उद्गार काढीत, वेगवेगळे हावभाव करीत राहतो. थोड्या वेळाने त्याचे एकेक सहकारी त्याच्याभोवती जमुन त्याचेच अनुकरण करू लागतात. बघता बघता अजूनही लोक तिथे जमतात.. वर बघत असतात. होता होता मोठ्ठा समुदाय होतो. प्रत्येकजण वर काय आहे हे दुसर्‍याला सांगत असतो. स्वतःचीच कल्पना शक्ती वापरून . तितक्यात जमावाला पांगवण्यासाठी शिट्ट्या मारीत पोलीस येतात.
या वेळेपर्यंत. आपले हिरोलोक गर्दीतून बाजूला होऊन गंम्मत बघत उभे असतात. पण कुणाच्याच ध्यानी येत नाही, कारण सगळे वर पाहण्यात मग्नं असतात.
पोलीस जेव्हा चौकशी करतात, तेव्हा त्यांना कथा सरित्सागरातील अनमोल मोती प्राप्तं होतात. असंख्य माणसे, आणि अनंत कथा. पण एकातही तथ्यं नाही.

आजकाल राहून राहून मनात विचार येतो, ती कादंबरी नसून सत्यकथा असेल का?

आणि कादंबरीचा काळ पुष्कळ जुना असला, तरी सत्य हे कालातीत असतं .