दवणे एक असणे !!!! दवणे एक जगणे !!!!!!!!!!!!!!
प्रातःस्मरणीय दवणे जेव्हा प्रातःस्मरणीय पदवीस प्राप्त झाले नव्हते त्या काळातला हा प्रसंग आजही मनकातळावर नाजुक स्मृतींनी कोरला गेलाय.
दवणेंचे गुरुवर्य वपुलं बाल दवणेंना म्हणाले
गुरुवर्य : " प्रवीण, मराठी वाचकांच्या अभिरुचीची घसरण आता बघवली जात नाही रे "
प्रवीण : " काय होतय गुरुवर्य नेमकं "
गुरुवर्य : " डाचतोय रे मला डाचतोय हा टचटचीत शब्द , हा शब्द म्ह्टला की वाचकांना तेच का आठवावे वहीनींची ती .......
हे ऐकुन प्रवीण कावराबावरा झाला, खर म्हणजे थोडासा लाजला सुद्धा मनातल्या मनात मग त्याने मनाशी चंग बांधला टचटचीत ला मी एक नवी जोडी देणार . मग प्रवीण तरुण झाला, मग एक दिवस पाऊस पडला, मग त्याच्या मनात एक ललित लेख पाझरु लागला, त्याची लेखणी झरु लागली अन तिने प्रसवलं हे महावाक्य
"कणीस घरी गॅसच्या चुलीवर भाजणं ही अगदी खास शहरी मध्यमवर्गीय तडजोड आहे. पण कणसाची टचटचीत दुधाळ सुरवट चव पावसाच्या आहे-नाही वाटेवर जवळच्या बागेच्या, तळ्याच्या, समुद्राच्या साक्षीनेच ! डोंगरमाथा नि पावसाचा वळण रस्ता असेल तर भाग्यच ! पण पावसाला अस चवदार करणं ही ज्याची त्याची खवय्या कसोटी. पुढे हे पदार्ध आपण खाउ; पण चवीचा आतला चवदार गाभा चाखायचा असेल तर पाऊसच हवा."
तर अशा रीतीने दवणे यांनी टचटचीत शब्दाला एक नवा आयाम दिला एक नवी अभिरुचीसंपन्न सात्विक जोड दिली. तरी काही नतद्र्ष्ट वाचक कणसाचा फ्रॉइडीयन संबध जोडतीलच तर अशांकडे आपण दुर्लक्ष करुन पुढे जाऊ या
दवणेंच्या ललित लेखांची शिर्षके पण् किती सुंदर !!!! सात काळजाच्या आत जपुन ठेवावी अशी !!!!!!!!!!!!!! उदाहरणार्थ हे वरील वाक्य ज्या लेखातील आहे त्याचे नाव शिर्षक बघा " पंचसंवेदनांचा साक्षात्कार " !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
दवणेंच्या ओळींना ओळी कसल्या मुर्तिमंत सौंदर्याची खाण जणु एकेक ओळ !!!!! तर या ओळींना माझ्या मते एक उद्गार चिन्ह पुरेसं नाही शेकडो उद्गारचिन्हे जरी दवणेंच्या श्रीखंडीय चॉकलेटी मखमली शैलीतील ओळींना लावली तरी ते अपुर्णच आहे!!!
उदा. याच लेखातील या ओळी बघा आणि खरं खरं सांगा एक उद्गारचिन्ह पुरेसे आहे का ? या ओळींमागच्या भावाने जे आनंदाने कोलमडुन जाणं आहे ते व्यक्त करायला !!!
तर ओळ अशी आहे.
आता हे आषाढरंगी उसळते थेंब श्रावणपंखी फुलपाखरु झाले आहेत. थेंबात आभाळ धारण करणार्या या सुखाला झेलण्याचा हा क्षण ! नुसता क्षण नाही ; सणच ! "प्रत्येक क्षण चिंब जगुन घ्या " सांगत नश्वर आयुष्याला अक्षर करणारा ! सत, चित, आनंदाच मुर्तिमंत रुप होणारा !
आहे की नाही एकेका शब्दाची ताकद ! स्त्रवतोय की नाही डोपामाइन शब्दागणिक !!!! ओळीगणिक !!! स्त्रवलाच पाहीजे !!!!
हल्ली मला दवणे हे नुसतं नाव वाचलं तरीही मेंदुतुन डोपामाइन स्त्रवु लागतो...............!!!!!!!!!!!!!!!
कारण यानंतर आता येणार असते सुंदर शब्दांची कधीही न संपणारी मेजवानी !!
दवणेंच्या बालपणीच्या काही नोंदी आहेत त्यातील एक अशी की दवणे हे बालपणी जेव्हा "आनंद मेळ्या" त जात असतं. तेव्हा त्यांच्या बरोबरीचे सवंगडी सिंहाचे हिंस्त्र रींगमास्टरांचे खेळ बघत असतं, बंदुकी घेऊन समोरचे फुगे फोडणे, वेगवान झोक्यांचा थरार अनुभवणे किंवा मौत का कुआ इत्यादीतील मोटरसायकलींचा जीवघेणा थरार इत्यादी खेळतं असे. मात्र बालदवणेना या गोष्टीत कधीच रस नव्हता. आणि आला नाही ते केवळ दोनच खेळणे विकत घेण्यास जात असतं, त्यात एक म्हणजे कॅलिडीस्कोप ज्यात काचेचे तुकडे असतं आणि ते फिरवुन त्यातुन बघितले की त्याच काचेच्या तुकड्यांचे विविध आकार डिझाइन्स बनत असत. दुसरं खेळणं म्हणजे पाण्याचे रंगीत बुडबुडे बनवुन फुंकुन फुंकुन उडवणे. त्यांना त्याच त्याच काचेच्या तुकड्याने किती शेकडो डिझाइन्स बनवता येतात तसेच त्याच त्याच "जीवना" चे किती असंख्य आकाराचे रंगीबेरेंगी बुडबुडे बनवता येतात उडवता येतात याचे अप्रुप वाटत असे. मोठेपणी कोण होणार या प्रश्नाला बालदवणे म्हणत मी बुडबुडे वाला होणार बुडबुडे उडवणार.
दवणेंची शैली श्रीखंडीय आहे की चॉकलेटीय आहे की मखमलीय आहे की सर्वांचे एक अदभुत असे एक जालिम मिश्रण आहे याविषयी समीक्षकांत वाद आहेत. पण माझ्यामते ती उकडमोदकीय शैली आहे !!!! बाहेरुन जरी थोडी सपक बिनचवीची भासली तरी जसे आपण उकडीचा मोदक तोंडात टाकल्यानंतर आतील गोड मालाचा गोडवा जसा हळुहळु आपल्या जिभेचा ताबा घेऊ लागतो तशी दवणे यांची शैली आहे असे माझे एक सामान्य वाचक म्हणुन मत आहे.
दवणे यांचे ६७.५ टक्के तरुण वाचक pre diabetic आणि ९७.७ टक्के जुने वाचक confirmed diabetics आहेत अशी माहीती नुकत्याच एका पी एच डी च्या "दवणेंच्या ललित लेखाचे मराठी माणसांच्या आरोग्यावर झालेले परीणाम आणि उपाय योजना " हे शिर्षक असलेल्या प्रबंधातुन बाहेर आली.
प्रबंधात विवीध उपाय जे सुचविले आहेत त्यात नामदेव ढसाळ उतारा म्हणुन घ्या असे सुचविण्यात आलेले आहे असे कळाले. तर एका ढसाळांच्या वाचकांच्या ढासळलेल्या आरोग्यविषयक प्रबंधात थोडा प्रविण दवणेंच्या ललिताचा काढा घेत चला असे सुचविल्याचे ऐकिवात आहे. तर ते एक असो.
पण म्हणुन कोणी असे समजत असेल की प्रवीण दवणे सुबोध आहेत शाळकरी आहेत तर असे अजिबात नाही. त्यांच्या लेखनात एक मति गुंग करणारी गुढता नेहमीच आढळून येते.
त्यांनी फारच subtle आणि गुढ असे ललित लेखन केलेले आहे हा एक नमुना बघा यातील साटल्य बघा.
" चाळीतल्या , वाड्यातल्या दहा बाय बाराच्या अपुर्या जागेत , अधुर्या स्वप्नांना आकाश देणारी दिवाळी आमच्या पिढीनं पाहीली. एका फुलबाजीला स्पर्श करुन प्रत्येक शेजार्याची फुलबाजी झडतांना, आपली मिटत जाताना समोरच्या हातातली फुलबाजी बरसते, तेव्हा आनंदाची रुजवात होताना विस्तारणार्या मनात दिवाळी जाणवली. हाडं गोठवणार्या थंडीत अंगणातल्याच चौथर्यावर घंघाळ आणुन सर्वसाक्षी झालेली ती अभ्यंगस्नानं ! आधी थंडीनं आणि मग उष्ण पाण्यानं केलेलं "ओय ओय " अनाराचं झाड बहरताना विरुन जाई. दोन दिवस आधीपासुन घमघमणार्या भाजणीच्या वासाला आता चेहरा आलेला असे आणि सारणाच्या पिठीनं कानवल्याची चंद्रकोर होऊन रसवंतीत प्रवेश केलेला असे !
आहे की नाही गुढ ! कळले का काही ? सर्वात गुढरम्य ओळ अनाराचं झाड बहरताना विरुन जाई. ही आहे
कुणी बघितलं असेल बालदवणेंना तशा अवस्थेत ? आणि अनाराच झाड ? आणि ते बहरताना विरुन जाण !
याचं मानसशास्त्राच्या अंगाने विश्लेषण होणं गरजेचं आहे
वाह वाह वाह !! शंकर रामाणींच्या गुढ कवितेला लाजवणारं !!!! मतकरींच्या गुढ कथेला "चकवा" देणारं !!!!!!! सासणेंच "लाल फुलांच झाडं" विसरवणारं हे दवणेंचं अनाराचं झाड !!!!!!
मला नेहमी एक वाटतं प्रतिभावंतांना अनुकुल भुमी मिळाल्यास त्यांची प्रतिभा नक्कीच बहरत असावी. जसे गालिब ने प्रवास केला बनारस वगैरेचा तर त्यातुन चराग ए दैर वगैरे सारखी रचना निर्माण झाली. अर्थात थोर प्रतिभेला त्याची गरज नाही पण अनुकुल भुमी प्रतिभेला बहर आणते इतकेच म्हणायचे आहे. जसे बालकवी मला नेहमी वाटते रेव्हरंडांनी त्यांना काश्मिर ला पाठवले असते तर ! विचार करा अजुन किती सुंदर कविता आम्हास लाभल्या असत्या. तर दवणें विषयी सुद्धा मला एक फॅन्टसी आहे. दवणे यांचे असणे दवणे यांचे लिहीणे एक आनंदगाणे च जणु आहे. दवणेंचे लेखन हा एक सकारात्मकतेचा मांगल्याचा एक अखंड कोसळणारा नायगारा आहे. ज्याने दु:खाचे वेदनेचे सर्व आवाज कापरासारखे विरुन जातात. तर दवणे यांच्या सकारात्मक विचारांची मोठी गरज आज गाझा आणि युक्रेन ला आहे. गाझामधील भुयारं, युक्रेन मधले ढीगारे या पार्श्वभुमीवर दवणेंचे लेखन उठुन दिसेल. तेथे ही एक सकारात्मकतेची सुनामी येइल. मांगल्य नांदेल दवणेंचे असणे इतके महत्वाचे आहे. दवणेंच्या नुसत्या असण्याने खुप काही होऊ शकते.
तर सध्या बाहेर पाऊसपुर्व वातावरण झालयं मी मस्तपैकी कॉफी पितोय (चाणाक्ष वाचकांनी ओळखलचं असेल मी मस्तपैकी कॉफी गटाचा सदस्य आहे ) दवणेंनी यावरही भयानक सुंदर लिहीलयं.
मेघाळलेल्या निळाईत जेव्हा कृष्णमेघांचे भोवरे फिरु लागतात ; बरसायचं तर आहे ; पण ते पहीलं पाऊल टाकण्याचा तो "क्षण"! अगदी अश्वाने लाल मातीत धुरळा उडवीत धावण्यापुर्वी , निमिषभराचा विराम घ्यावा, तशी ती मन निस्तब्ध करणारी स्तब्धता!!!
अजुन एका ठिकाणी दवणे लिहीता
अशा कोर्या क्षणांची कोरी वही म्हणजे आयुष्य होतांना प्रेमाचं एक शिशीररुपही उभं ठाकतं. संपुर्ण पर्ण झडलेल्या तरुडहाळीवर बर्फफुलांनीच रेंगाळाव तस आयुष्यं
आता वाचवत नाही !!!! आता लिहीवत नाही ! दिलसे निकली है बस एक ही आवाज !!!!!!!
बस कर पगले ! अब रुलायेगा क्या !!!
अनाराचं झाड
>> आहे की नाही गुढ ! कळले का काही ? सर्वात गुढरम्य ओळ अनाराचं झाड बहरताना विरुन जाई. ही आहे
यात न कळण्यासारखं गूढ काय आहे? खालील ओळीत दवणे बहुधा फटाकड्यातील अनाराच्या झाडाचा उल्लेख करत आहेत.
>> आधी थंडीनं आणि मग उष्ण पाण्यानं केलेलं "ओय ओय " अनाराचं झाड बहरताना विरुन जाई.
ते असो पण दवणे यांच्या लेखनाचे एवढे उत्तम रसग्रहण वाचले नव्हते. बालपणीचे दवणे अगदी साक्षात समोर उभे ठाकले व त्यांच्याच शब्दात सांगायचे तर 'अजी म्या ब्रम्ह पहिले' असा अद्भुतरम्य आनंद झाला.
दवणे ना हलक्यात घेणे
(नबा वरील माझे भुईनळ्या संदर्भातले विधान पुर्णपणे गांडलेले होते हे मी मान्य करतो आणि संस्कृतीशी माझीच नाळ तुटलीय बहुधा असे वाटते)
https://youtu.be/Xwm1A2wSVRA?si=RbPMmcd4jcVvRLaJ
या व्हिडिओ मध्ये "अनार" विविध प्रकारचे दाखविलेले आहे. याला आम्ही कुंडी असे म्हणत असू अनार खरे म्हणजे बहुतांशी हिंदी भाषक म्हणतात. (मी मारवाडी आहे म्हणून मला अनार किंवा कुंडी दोन्ही म्हणण्याचे स्वातंत्र्य आहे ) शिवाय अनेक लोक नुसते झाड असेही म्हणतात. तर दवणेसारख्या शब्दप्रभूला अनार हा हिंदी शब्द का वापरावासा वाटला हे पण एक गूढ आहे. शिवाय ते अनाराच झाडं म्हणत आहेत म्हणजे कुंडी त्यांना अपेक्षित आहे. आणि ते फटाक्याच उदाहरण देत आहे हे मला माहीत आहे.
तुम्ही आता कृपया मागील ओळी जरा बघा.
दवणे यांना सार्वजनिक अभ्यंग स्नान घालण्यात येत आहे.
आणि ते "सर्वसाक्षी" असे स्नान झालेले आहे.
इथे फार नाजूक भावनांचा प्रांत सुरू होतोय.
कुणी बघितलंय त्यांना "सर्वसाक्षी" मध्ये कोण आहे ?
अनाराच्या झाडा सारखे अग्नितुषार थंड पाणी अंगावर पडल्यावर शरीरावर आलेले आहे. शहारा उमटला आहे.
आणि तो उठतोय आणि मग गरम पाणी टाकल्याने विरतोय (शहारा)
आता हा शहारा सांकेतिक आहे
सर्वसाक्षी मध्ये याचे मूळ आहे.
पण तरल ललित लेखाची अशी क्ष किरणीय चिकित्सा करता येत नाही करू ही नये.
ग्रेस यांच्या कवितेतील गूढते विषयी एक जण म्हणतात
त्यांच्या कवितेतील धुके पांघरुन घ्यावेसे वाटते.
आता याहून जास्त चिकित्सा दवणे यांच्या तरल लेखाची करता येत नाही.
पण तरीही अगोदर थंड आणि नंतर ऊष्ण पाण्यानं असे का आले असावे हा ही एक गूढ प्रश्न आहे
मात्र त्याहून गूढ ओय ओय (दिल से निकली आह जैसे )
हा ध्वनी आहे.
शिवाय आंघोळ किंवा अभ्यंगस्नान हे सकाळी च घातले जाते. तेव्हा हे अनाराच झाडं त्या particular अभ्यंगानाना वेळीं च अर्थातच नाही. हे शहारा आलेलं झाडं कुठलं हे एक गूढच आहे.
याला समीक्षीय. भाषेत
पौगंडावस्थेतील मृदुकोमल भावनांचा तरल आविष्कार असे म्हटले जाते.
मला दवणेंचं आत्मकथन वाचायला…
मला दवणेंचं आत्मकथन वाचायला आवडेल. लहानपणी त्यांच्या भोवती काय परिस्थिती होती ते जाणून घ्यायचं आहे. कल्पना स्त्रवण्यासाठी काय काय लागतं. खूप खूप शब्दांच्या विटा एकावर एक रचतात पण त्याची सुबक भिंत होत नाही. बालकवींना जे जमत होतं ते फारच थोड्यांना जमतं "पाय सोडुनी जळात बसला ' असला' औदुंबर".