पुरोगाम्यांचा विजय
पुरोगामी विचारसरणी आणि प्रतिगामी (किंवा कॉंझर्व्हेटिव्ह) विचारसरणी यात नक्की फरक काय? माझ्या मते मुख्य फरक हा आहे की प्रतिगामी म्हणतात 'ही व्यवस्था आजपर्यंत चालू आहे म्हणून चालू राहाणार, राहिली पाहिजे. त्यासाठी व्यक्तिगत स्वातंत्र्यांवर घाला आला तरी बेहत्तर.' याउलट पुरोगामी विचारतात 'ही व्यवस्था चालू ठेवण्याचे नक्की फायदे काय? जर तोटेच जास्त असतील तर ही व्यवस्था सोडायला हवी. जर या व्यवस्थेतून थोड्यांचा फायदा आणि अनेकांचा तोटा होत असेल तर ती टाकून अधिकांचा फायदा होईल असे बदल त्या व्यवस्थेत करायला हवेत'. पुरोगाम्यांना चांगल्यासाठीचे बदल हवे असतात, तर प्रतिगाम्यांचा 'कुठचाही बदल म्हणजे ऱ्हास' यावर ठाम विश्वास असतो. म्हणून प्रतिगामी 'व्यवस्थेसाठी व्यवस्था' म्हणतात तर पुरोगामी 'स्वातंत्र्य, समता, बंधुता' यांकडे जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतात.
गेल्या अनेक शतकांचा इतिहास बघितला तर बदल हा आपल्या आयुष्याचा स्थायीभाव झालेला आहे. त्यामुळे कुंपणं घालून या बदलांना मर्यादा घालण्याचे प्रयत्न उधळताना दिसलेले आहेत. 'इथे आम्ही कुंपणं घातलेली आहेत, याच्या पलिकडे जायचं नाही म्हणजे नाही' असं तत्कालीन प्रतिगामी म्हणतात. काही काळ उलटतो तसा सगळाच समाज ती कुंपणं ओलांडून गेलेला दिसतो. मग प्रतिगामी पुन्हा नवीन कुंपणं घालतात, आणि पुन्हा तेच म्हणतात. काही दशकांनी ती कुंपणं पायदळी तुडवली जातात. आणि हे चक्र सतत चालूच राहातं. प्रतिगाम्यांचं हे नवनवीन कुंपणं घालत राहाणं इतिहासाच्या पार्श्वभूमीवर फारच केविलवाणं वाटतं. कारण आत्तापर्यंत अनेक सामाजिक बंधनांना धिक्कारत पुरोगामी या मर्यादा विस्तारण्याचं आपलं काम सातत्याने करताना दिसत आहेत. खाली काही उदाहरणं आहेत.
१. शिक्षण - गेली अनेक शतकं संपूर्ण जगभरच शिक्षण ही फारच थोड्या मर्यादित लोकांची मांदियाळी होती. शतकानुशतकं ९५ टक्क्यांहून अधिक लोक 'काला अक्षर भैंस बराबर' या स्थितीत जन्मले, वाढले, जगले. पण ग्युटेनबर्गने छपाईच्या तंत्रज्ञानाचा शोध लावला आणि माहिती साठवून ठेवणं, ती इतरांकडे पोचती करणं हे फारच स्वस्त झालं. त्याआधी बायबलमध्ये काय सांगितलं आहे हे ऐकण्यासाठी धार्मिक दलालांकडेच जावं लागायचं. ते त्यांना सोयीस्कर अर्थ सांगायचे. भारतात तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती होती. त्यात शिक्षण कोणाला मिळणार हेच वर्णव्यवस्थेने मर्यादित केलेलं होतं. त्यात शूद्रांना केवळ वेदशब्द ऐकण्याबद्दल कानांत शिसं ओतण्याची शिक्षा ठोठावली होती. सामान्य माणसासाठीही जे काही ज्ञान होतं ते संस्कृतमध्ये होतं. ज्ञानेश्वरांनी भग्वद्गीतेचं भाषांतर मराठीत करणं हेही क्रांतीकारक पाऊल होतं. चर्च काय किंवा पैठणेतली पीठं काय, सामान्य माणसाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात त्यांचा स्वार्थ होता. ज्ञानाच्या नाड्या आपल्या हातात ठेवून घेण्यात त्यांचा फायदा होता. त्यामुळे जगभरच प्रत्येकाने आपला परंपरागत व्यवसायच करत राहाणं आणि ज्ञानाच्या मागे न लागणं ही व्यवस्था जपण्यात ज्ञानावर मालकी असणारांचा कल होता. वेळोवेळी अनेक पुरोगाम्यांनी ज्ञानाचा विस्तार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला.
गेल्या आठशे वर्षांपूर्वीची परिस्थिती बदलून आता जगभर सगळ्यांना शिक्षण मुक्तपणे उपलब्ध आहे. प्रतिगाम्यांनी शिक्षणावर निर्बंध घालण्याचे जे काही प्रयत्न केलेले होते त्यांचा पूर्ण फज्जा उडालेला आहे. गेली काही दशकं जगभरच लोक अधिक सुशिक्षित होत आहेत. इंटरनेट क्रांतीमुळे तर ज्ञानावर आणि माहितीवर नियंत्रण ठेवणं महाकर्मकठीण झालेलं आहे. 'सर्वांनी सुशिक्षित व्हावं, शिक्षणाच्या बाबतीत कोणी काय शिकावं याबाबत निर्बंध असू नयेत, आणि काही मूलभूत ज्ञानावर एकाधिकार असू नये - जेणेकरून वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येकाला निर्णय घेणं शक्य व्हावं' या पुरोगामी विचाराचा विजय होत चाललेला आहे.
२. आरोग्य - जागतिक आरोग्यात सुधारणा होण्याची इच्छा ही काही पुरोगाम्यांची मक्तेदारी नाही. मात्र शिक्षणाचा प्रसार, वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाढ यामुळे वैद्यकीय ज्ञानात प्रचंड प्रगती झाली. प्रेतावर शस्त्रक्रिया करून शरीराचा अभ्यास करणं याला अनेक प्रतिगाम्यांचा, अनेक कारणांसाठी विरोध होता. रोग का होतात याविषयी जुन्या संकल्पना जपून ठेवणारेही होते. या कल्पनांना आव्हान देत सत्य काय आहे हे शोधून काढण्याची प्रवृत्ती ही पुरोगामी प्रवृत्ती. या पुढे जाण्यामुळेच वैद्यकात क्रांती घडलेली आज आपल्याला दिसते. सनातन काळापासून असलेली ३०-३५ वर्षांची आयुष्य-अपेक्षा वाढून आता जगभर ती ७० च्या आसपास गेलेली आहे, याचं श्रेय पुरोगामी विचारांच्या झगड्याला आणि त्यात मिळवलेल्या विजयालाच आहे.
३. पृथ्वी आणि विश्व - पृथ्वी सपाट आहे, आणि सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी तिचा जन्म झाला असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. त्याविरुद्ध काही बोलणाऱ्यांचा इन्क्विझिशनकडून हालहाल करून छळ व्हायचा आणि त्यांना मृत्यूदंड दिला जायचा. सत्य काय आहे यापेक्षा कुठच्यातरी पोथीत काय म्हटलेलं आहे हे महत्त्वाचं मानणं, आणि त्याविरुद्ध ब्रही काढण्याची मुभा न देणं ही खास प्रतिगामी विचारसरणी झाली. चारशे वर्षांपूर्वी हे सर्रास चालायचं. आकाशात दिसणारे तारे हे सूर्यासारखेच इतर आहेत, खूप लांब असल्यामुळे आपल्याला ते ठिपक्यांसारखे दिसतात असं ज्योर्दानो ब्रुनो मानायचा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असंही तो मानायचा. त्याला मृत्युदंड देण्याची क्षमता धर्मसंस्थेत - प्रतिगामी व्यवस्थेत - होती. गेल्या चारशे वर्षांत पुरोगामी विचारसरणीचा इतका विजय झालेला आहे की पृथ्वी गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते हे तर सर्वमान्य ज्ञान झालेलं आहेच. पण त्याहीपलिकडे धर्मसंस्थेला अशा 'पाखंड्यांना' शिक्षा देण्याचा अधिकार राहिलेला नाही. प्रतिगाम्यांचा हा प्रचंड पराभव आहे.
४. देवाबद्दलची संकल्पना - देवाबद्दलची श्रद्धा ही सनातन काळापासून सर्वच समाजांत दिसून आलेली आहे. या वैयक्तिक श्रद्धेचं रूपांतर सामूहिक धर्मांत करून अनेक धर्मांनी देवाकडे जाण्यासाठीचे मार्ग आपल्या ताब्यात घेतले. श्रद्धा, पूजा ही कशी व्हावी याबद्दल नियम बनवले. ही व्यक्तींवर आलेली बंधनंच आहेत. हे शतकानुशतकं चाललं. या श्रद्धेचा फायदा घेऊन चर्चांनी पापमुक्तीसाठी रोखे विकण्यापर्यंत मजल गेली. 'देवाच्या नावाने काहीतरी कर्मकांड करून देवाच्या दलालाला अमुक इतकी रक्कम, दक्षिणा द्या, म्हणजे तुमची पापं धुतली जातील' हे सांगणं तर सर्वत्रच होतं, अजूनही आहे. त्यासाठी स्त्रियांना बंदी, अस्पृश्यांना बंदी अशीही थेरं झाली, अजूनही चालतात. मात्र गेल्या काही दशकांत याबाबतीत प्रतिगाम्यांची माघार होताना दिसते आहे. अनेक युरोपीय देशांत चर्चेसमध्ये जाणाऱ्यांची संख्या घटताना दिसते. जे जाताहेत त्यांचीही सरासरी वयं वाढताना दिसत आहेत. म्हणजे नवी पिढी या सगळ्याला कंटाळून संस्थात्मक देवाला नाकारताना दिसते आहे. देव आणि त्याची आराधना ही कल्पना कदाचित व्यक्तिगत पातळीवर ही पिढी बाळगत असेल. पण आपल्या देवाच्या पूजनावर मंदिर-मस्जिद-चर्च वाली यंत्रणा बनवून ती भावना नियंत्रण करणारी प्रवृत्ती दूर ढकलणारा विचार म्हणजे पुरोगामी विचार. या विचाराचा विजय होताना दिसतो आहे.
५. धर्म-राज्य विभक्तता - एकेकाळी राज्यसंस्थेमध्ये धर्माला प्रचंड महत्त्व होतं. कारण लोकांवर धर्माचा प्रचंड पगडा होता. त्यामुळे जनतेच्या धार्मिक भावना दुखावू नयेत यासाठी राजा धर्मसंस्थेला शिरोधार्य मानत असे. काही वेळा स्वतःलाच तो देवाचा अवतार म्हणवत असे. पण मी राजा आहे, मी राज्य चालवणार, धर्म वेगळा - असं ठामपणे म्हणणं अनेक राजांना सहजशक्य नव्हतं. राज्याचे कायदे हे धर्माने ठरवून देणं हे शरीयामध्ये दिसतंच. मनुस्मृतीचे कायदेही समानतेवर आधारित असण्यापेक्षा धर्मप्रचलित असमानतेला राज्यव्यवस्थेत सामावून घेण्याचा प्रयत्न करणारे होते. सर्व राजांना कमीअधिक प्रमाणात हे धर्माचं आक्रमण चालवून घेणं भाग होतं. धर्म वेगळा आणि राज्यव्यवस्था वेगळी हा पुरोगामी विचार आहे. कारण धर्म हे पुरातन काळातल्या जीवनपद्धतीची अपेक्षा करतात. एखाद्या पोथीत कधीकाळी काहीतरी लिहिलेलं आहे, त्यामुळे ते बदलणं अशक्य आहे हे मानतात. राज्यसंस्थेवरच धर्मसंस्थेचा पगडा असणं म्हणजे राज्याची शक्तिमान व्यवस्था ही पूर्वापार चालत आलेली कुंपणं बळकट करत राहाणं ठरतं. त्यापासून सामान्य समाजाची सुटका करायची झाली तर धर्म-राज्यसंस्था विभक्त असणं महत्त्वाचं ठरतं. आज जगभर पाहिलं तर कायदेशीररीत्या तरी धर्मसंस्था व राज्यसंस्था यांची फारकत झालेली आहे. अर्थातच काही मुस्लिम देशांचे अपवाद आहेत. मात्र एकेकाळी जो नियम होता तो आता अपवाद म्हणून शिल्लक आहे, हे पुरोगामी शक्तींच्या प्रगतीचंच लक्षण आहे.
६. लोकशाही - राजसत्ता धर्मसत्तेपासून स्वतंत्र होणं ही केवळ एक पायरी झाली. मात्र जोपर्यंत राजेशाही, एकाधिकारशाही होती तोपर्यंत जनतेचा राज्यसत्तेवर अंकुश नव्हता. आपल्याला हवी तशी मनमानी करण्याचा अधिकार राजा, त्याचं निकटचं मंत्रीमंडळ आणि त्यांना सावरून धरणारे सरदार-दरकदार-जमीनदार-व्यापारी यांना होता. जनतेचं भलं होण्यासाठी राजसत्ता राबावी हा विचार आधुनिक आहे. त्याआधी जनता उठाव करणार नाही इतपतच जेमतेम काम जनतेसाठी राजा करत असे. ही व्यवस्था सरंजामशाहीला पोषक होती. अर्थातच समानतेचं आधुनिक मूल्य त्यामुळे पायदळी तुडवलं जायचं. लोकशाही पद्धतीमुळे हे चित्र अधिक संतुलित झालं. कुठलीच लोकशाही परिपूर्ण नाही, पण त्याआधीच्या सरंजामशाही आणि वसाहतवादी राज्यकर्त्यांपेक्षा बहुतांश अधिक चांगल्या चालतात. 'लोकशाही राज्यांत दुष्काळाचे बळी पडत नाहीत (किंवा नगण्य पडतात)' या अर्थाचं अमर्त्य सेनांचं वाक्य प्रसिद्ध आहे. लोकांकडे अधिक शक्ती देणारी ही राज्यव्यवस्था आता जवळपास जगभर पसरलेली आहे. पुरोगामी मू्ल्यांच्या विजयाची ही घोडदौड चालू आहे.
७. स्त्री-पुरुष समानता - दोनतीनशे वर्षं मागे गेलं तर प्रत्येक धर्माने, प्रत्येक देशाने स्त्रीला दुय्यम स्थान दिलेलं आहे. प्रत्येक स्त्रीला साताठ मुलं होत, आणि तिचं आयुष्य घरकाम, बालसंगोपन यातच अडकून पडे. स्त्रियांना शिक्षण देणं दूरच - तिला कुठचंच स्वातंत्र्य देऊ नये, पायातली वाहाण पायातच ठेवावी या प्रकारची वचनं प्रत्येक धर्मग्रंथात आढळतात. विसाव्या शतकात जगभर हे चित्र बदलत गेलं. संततिनियमनामुळे फर्टिलिटी रेट सातवरून दोन ते अडीचच्या दरम्यान जगभरच आलेला आहे. स्त्रिया अधिकाधिक प्रमाणात शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहाण्याच्या मार्गावर आहेत. स्त्रीला ही शक्ती, स्वातंत्र्य मिळू नये आणि ती कायम पुरुषावर अवलंबून राहावी, त्याची दासी बनून राहावी याची काळजी घेणारी प्रतिगामी व्यवस्था मोडून पडलेली आहे. पुन्हा, अपवाद सापडतील. पण नियम बदलेले आहेत. आणि त्यातून मिळणारं स्वातंत्र्य हे पिढ्यानपिढ्या वाढतच जाणार हे चित्र स्पष्ट आहे. स्वातंत्र्य, समानता ही दोन महत्त्वाची मूल्यं जगाच्या निम्म्या लोकसंख्येला मिळवून देण्यात पुरोगामी शक्ती यशस्वी झालेल्या आहेत.
८. गुलामगिरी - माणसाला माणसाचा गुलाम करून त्याला प्राण्याप्रमाणे साखळदंडांनी बांधून त्याच्याकडून मरेस्तोवर काम करून घेत त्याला एखाद्या बैलासारखं वागवणं ही स्वातंत्र्य, समानतेच्या आणि बंधुतेच्या मूल्यांच्या विरुद्ध जाणारी व्यवस्था. ही व्यवस्था अनेक शतकं प्रतिगामी लोकांनी आपल्या फायद्यासाठी राबवली आणि त्यात कोट्यवधी लोकांना ती खितपत टाकलं. ही व्यवस्था आता साफ मोडून पडलेली आहे. ती वाईट का होती, आणि ती मोडणं चांगलं का यावर काही लिहिणंही हास्यास्पद ठरेल इतकं ते उघड सत्य आहे. ती नष्ट झाली हा प्रतिगाम्यांचा पराभव आणि पुरोगामी विचारांचा विजय आहे.
९. दलित, अस्पृश्य संकल्पना - प्रत्यक्ष दिसणाऱ्या साखळ्या न वापरता लोकसंख्येच्या एका मोठ्या भागाला गुलाम करण्याची पद्धती म्हणजे भारतात राबवली गेलेली वर्णव्यवस्था. अमेरिकेत काळ्या माणसाला जसं गोऱ्यांनी स्वतःपेक्षा हीन समजलं तसं कोट्यवधी लोकांना त्यांच्या जाती लक्षात ठेवून इतरांनी हीन समजलं. त्यांना पाणीही मिळण्याची चोरी व्हावी इतक्या टोकापर्यंत ही व्यवस्था राबत असे. या दलितांना आणि अस्पृश्यांना शिक्षण मिळण्याला मज्जाव करून त्यांना विशिष्ट हीन कामं करायला भाग पाडलं गेलं. अमुक जातीत जन्म झाला की तुम्ही पुढे काय करू शकाल हे ठरलं जायचं. भारतीय संविधानाने हा भेदाभेद नष्ट करून देशावरचा हा कलंक पुसून टाकलेला आहे. अजूनही सुंभ जळून पीळ शिल्लक असला तरीही आज कोणालाही 'तू अमुक जातीचा म्हणून तुला शिक्षण मिळणार नाही' असं म्हटलं जात नाही. कोट्यवधी दलितांनी शिक्षणाद्वारे स्वतःची प्रगती करून घेतलेली आहे. संपूर्ण समानता गाठायला अजूनही वेळ असला तरीही प्रवास प्रतिगामी कुंपणं तोडून पुरोगामी विचारांच्या दिशेने चालू आहे.
१०. कुटुंबसंस्था - पुरुषप्रधान व्यवस्था, एकत्र कुटुंबपद्धती, यात एक आंतर्गत पोलादी व्यवस्था होती. घरच्या मुलींकडे दुसऱ्याघरी पाठवण्याआधीपर्यंत सांभाळायची धोंड या दृष्टीने पाहाणं त्यात अंतर्भूत होतं. घरात आलेल्या मुली व स्त्रिया यांच्याकडे मुलं निर्माण करणारी यंत्रं आणि घरात राबण्यासाठीच्या (बिन)मोलकरणी या दृष्टीने पाहाणं हेही त्यात अंतर्भूत होतं. व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच आणि कुटुंबाच्या अपेक्षांचं ओझं हे एकत्र कुटुंबपद्धतीत सर्रास होतं. आता हे चित्र बदलून चौकोनी कुटुंब अधिकाधिक दिसायला लागलेली आहेत. मुलांना कुठचातरी एकच एक धंदा शिकवणे किंवा शेतात राबायला पाठवणं यापलिकडे उच्च शिक्षण देऊन अधिक विकल्प निर्माण करणं याकडे आधुनिक कुटुंबांचा कल दिसतो. एकत्र कुटुंबाची कठोर, जाचणारी व्यवस्था टिकवून ठेवणं आणि त्यापासून बदल होण्याला विरोध करणं ही प्रतिगामी वृत्ती होती. ती कमी होऊन स्वातंत्र्य, मोकळेपणा, शिक्षण या पुरोगामी मूल्यांचा अंगिकार जागोजागी होताना दिसतो आहे.
ही काही उदाहरणं झाली. यातली अनेक एकमेकांत गुंतलेली आहेत. ही पाहून लक्षात येतं की मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्वच क्षेत्रांमधल्या जाचक व्यवस्था मोडून पडून अधिक मोकळ्या, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना पोषक ठरणाऱ्या मूल्यांकडे प्रवास चालू आहे. हा प्रवास संपलेला नाही, पण थांबलेलाही नाही. हे पुरोगाम्यांचे विजय असेच दशकानुदशकं, शतकानुशतकं होत जावोत.
प्रतिक्रिया
चांगला आहे लेख.जे लोक पक्के
चांगला आहे लेख.जे लोक पक्के एका बाजूचे असतात ते मला वाटतं कधीच आपल्या कृतींचं,विचारांचं मूल्यमापन करत नसतील.
परवाच एक रस्त्यात पाटी पाहिली ती अशी-
// जन्मापुर्वीचा फीटसस्कोप करून मिळेल.
मोबाइल नं : अमुक अमुक//
- तर हा प्रतिगाम्यात दडलेला पुरोगामीपणा म्हणायचा का?
हा लेख मला गूगल कॅशेमध्ये
हा लेख मला गूगल कॅशेमध्ये सापडला. http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:xRIOw-Z6tCsJ:aisiak...
ऐसी सगळं व्यवस्थित झालं की प्रत्येकाने आपापले प्रतिसाद कॉपी पेस्ट करून पुन्हा टाकावे अशी विनंती करतो.
वेबकॅशे शोधण्याचं template
वेबकॅशे शोधण्याचं template काय?
गूगलवर शोधून आपल्याला हवी
गूगलवर शोधून आपल्याला हवी असलेली लिंक मिळाली की तिच्यावर क्लिक न करता, लिंकच्या शेवटी दिसणारा हिरवा निरोधचा त्रिकोण टिचकवायचा. मग तिथे कॅशेड असा शब्द दिसतो. त्यावर क्लिक केलं की आपल्याला त्या धाग्याचा कॅशेड कंटेंट दिसतो.
निष्कॅशीकरण (कॅश रिन्यूड)
वेबकॅशचे नूतनीकरण झाल्यासारखे दिसते आहे, तिथे आता काही थोडेच प्रतिसाद दिसत आहेत.
ओके.
ओके.
काही शंका
सर्वांनी सुशिक्षित व्हावं, शिक्षणाच्या बाबतीत कोणी काय शिकावं याबाबत निर्बंध असू नयेत, आणि काही मूलभूत ज्ञानावर एकाधिकार असू नये >>> याबाबत सहमत आहे.
मात्र स्पेसिफिक मुद्दे आहेत त्यावर काही शंका -
शिक्षण - शतकानुशतकं नक्की कोणते शिक्षण इतरांपासून लांब ठेवले गेले? ती व्यवस्थाच अशी होती की आपल्या जातीचा जो व्यवसाय असेल तेवढेच शिक्षण मिळायचे. आत्ता ज्याला आपण शालेय शिक्षण म्हणतो ते शिक्षण तेव्हा आस्तित्वातच नव्हते. धार्मिक शिक्षण ही एका जातीची मक्तेदारी, तशीच इतर कोणत्याही व्यवसायाचे शिक्षण ही त्या त्या जातीची मक्तेदारी होती. दुसर्या कोणालाही ते घेता येत नसे, पण व्यवस्थाच अशी होती की एखाद्याने घेतले, तरी त्याला त्यात काही करता आलेच नसते.
त्यात छपाईची व्यवस्था नसल्याने आधी मुळात लेखी स्वरूपात उपलब्धता कमी. शिक्षण बरेचसे मौखिक स्वरूपात. ते मोठ्या समाजापर्यंत पोहोचविणे हे कष्टाचे काम. त्यात धर्मशिक्षण हे काही फार पैसे मिळवून देणारेही नव्हते. थोडेफार धर्मसत्ता हातात असलेले लोक सोडले, तर बाकी धर्मशिक्षण घेतलेले लोकही गरिबीतच असत. त्यामुळे इतरांना आपले परंपरागत व्यवसाय सोडून ते आवर्जून घेण्यात काही इंटरेस्ट असेल असेही नाही. मुळात "सोशल कॉण्ट्रॅक्ट" सोडले तर एकमेकांपासून पूर्ण आयसोलेटेड असेलेले समूह मुद्दाम कशाला एकमेकांना शिक्षण द्यायला जातील?
त्यामुळे आत्ताच्या शालेय/महाविद्यालयीन शिक्षणासारखे सार्वत्रिक व सर्व प्रकारच्या नोकर्यांसाठी आवश्यक असलेले मूलभूत शिक्षण तेव्हा मोठ्या समाजाला नाकारले गेले असे नाही. कोणत्याही राज्यव्यवस्थेत लागणार्या लोकांची संख्या धरली, तर १. शेती २. सैन्य ३. पैशाशी संबंधित नोकर्या ४. बलुतेदारी हीच बहुतांश लोकांची उदरनिर्वाहाची साधने असावीत, आणि धर्मशिक्षणाचा यातील कशालाही उपयोग नव्हता.
>शतकानुशतकं नक्की कोणते
>शतकानुशतकं नक्की कोणते शिक्षण इतरांपासून लांब ठेवले गेले?<
जुन्या काळपासून संस्कृत भाषा ही मोजक्या लोकांसाठी होती. ज्ञानेश्वरांनी भग्वद्गीतेचं भाषांतर सामान्य माणसाच्या भाषेत करणं हे क्रांतीकारी पाऊल होतं. एकंदरीत जगभरच धर्माबाबत हीच मक्तेदारी होती. उदाहरणार्थ, आपल्याकडे संस्कृत तशी युरोपातही लॅटिन भाषा हे राखीव कुरण होतं. तसंच सर्वच जगभर बापाने केलेला व्यवसाय मुलाने शिकून घ्यायचा आणि करायचा ही पद्धत होती. मात्र आपल्याकडे जी घट्ट वर्णाधिष्ठित व्यवस्था होती तशी जगभर नव्हती. त्यामुळे परंपरागत व्यवसाय करणाराला अॅडव्हांटेज असला तरी इतरांना त्या व्यवसायात शिरण्याची संधी होती. कुंभारकी करणाराच्या पोराला आपल्या हिमतीवर चार अक्षरं शिकून कारकुनी करण्याला तत्त्वतः मनाई नव्हती.
छपाईचा उल्लेख आला त्याबद्दल थोडं. ग्युटेनबर्गने छपाईचं यंत्र तयार केलं ते पंधराव्या शतकाच्या पहिल्या अर्ध्यात. तेव्हा भारत हा श्रीमंत देशांपैकी होता. मुळात आपल्याकडे तो शोध का लागला नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट असली तरी, कोणीतरी शोध लावल्यावर तो भारताने ताबडतोब आत्मसात का केला नाही? याचं कारण म्हणजे ज्ञानावर मक्तेदारी बाळगण्याची संस्कृती होती. युरोपात ती मक्तेदारी नसल्याने बहुतांश अशिक्षित असले तरी शिक्षणाचा, ज्ञानाचा प्रसार लवकर झाला. पंधरावं ते अठरावं शतक यामध्ये युरोपात जे संशोधन झालं; गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, तंत्रज्ञान यामध्ये जी प्रगती झाली ती भारतात झाली नाही. या काळात दरडोई उत्पन्न भारतात बरंच अधिक होतं, तरीही झाली नाही. त्याचाच परिणाम म्हणून युरोपीय सर्व जगभरावर राज्य पसरवण्यात यशस्वी झाले. भारतात ज्ञानाच्या प्रसारावर प्रचंड बंधनं होती, त्याचा परिणाम म्हणून पंधरावं शतक ते विसावं शतक आर्थिक ऱ्हास होत गेला. त्यातून अजूनही आपण बाहेर आलेलो नाही. १६-१७ टक्के लोकसंख्या असलेला आपला देश जागतिक जीडीपीच्या ३ ते ५ टक्के इतकंच जीडीपी निर्माण करतो.
Interesting
मध्ययुगीन शस्त्र आणी युद्ध तंत्रज्ञान बद्दल माझ्या मनात नेहमी हा विचार येतो. बाबराने बंदूक पहिल्यांदा वापरली तरीही बंदूक हिंदू राज्यकर्त्यांनी उचलली नाही (शेवटच्या शिंदे वगैरे सरदारांकडे असावी. म्हणजे जवळपास दीडशे वर्षे नंतर ) . तोफखाना आणि दारुगोळा बाबत तीच रडगाणी. मराठ्यांच्या राज्यात तोफखाना चालवणारे बहुतेक पठाण होते. म्हणजे कौशल्या सुद्धा आत्मसात करता आले नाही. दारुगोळा सुद्धा इंग्रज किंवा पोर्तुगीझांना कडून विकत घ्यावा लागे. Manaufacturing कधीच जमलं नाही. यात तत्कालीन बलुतेदारी आणि धार्मिक प्रथांचा दोष मानता येईल.
yaa baabatit thoda vegala
yaa baabatit thoda vegala drushtikon.
Typing in English instead of roman marathi.
I worked in product development department in two of reputed companies from 1984 to 1995. Our main focus was to indiginously develop products and sell in domestic market. Govt was giving actively encouraging such efforts and the owners of the companies were also supporting such efforts.
After liberalization in 1991, slowly the owners of the company started feeling (and stating) that trying to develop the products indigenously was akin "Reinventing the wheel". Why do it if the products are readily available? They thought that product development is waste of resources. They could of course make money by merely importing and trading the products (which they were anyway doing till may be 1950s).
So urge to learn the know-how is not the necessary quality of "controllers of investment". Same must be holding true in that era. Why learn and develop foundry technology, explosives technology, material science and operating skills when they are readily available?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
असहमत
दोन मुद्दे
१. readily available : हे पूर्ण खरे नाही. इंग्रज आणि पोर्तुगीझ या मार्केट वर टोटल कंट्रोल ठेवून होते. त्यांना कंपेटिशन नव्हती. त्यामुळे त्यांच्या इतर जाचक किंवा त्यांना सोयीस्कर अटी मान्य केल्या शिवाय सप्लाय कशाला करतील. सप्लाय सुद्धा लिमिटेड ठेवत असणार.
२. ३rd पार्टी वर अवलंबून राहण्यात उघड धोका: तोफखाना आणि दारुगोळा यांचा योग्य उपयोग केल्यावर प्रचंड advantage मिळत होते. सिलिकॉन valley भाषेत "disruptve tech ". शेवटची पेशव्यांची आणि इंग्रजाच्या लढाई (कोरेगाव भीमा?) was a no contest .
product development
थत्त्यांशी असहमत. मीही अनेक वर्षे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभागात काम केले आहे. मोठ्या कंपन्यांचा कल कदाचित, थत्ते म्हणतात तसा झाला असेल. पण अनेक छोट्या कंपन्यांत काम करताना, माझा अनुभव असा होता की , माहीत असलेल्या प्रॉडक्ट च्या ज्या कृती केमिकल जर्नल्स मधे मिळायच्या वा पेटंट मधे मिळायच्या त्यापेक्षा कितीतरी कमी खर्चात आणि जास्त यिल्ड देणार्या प्रोसेस आम्ही विकसित केल्या. त्याची पेटंटस घेणे वा त्या जर्नल्स मधे छापणे हे आम्ही कटाक्षाने टाळले आणि आमच्या मायबाप कंपन्यांना बक्कळ फायदा करुन दिला. आमचे एक वरिष्ठ तर नेहमीच म्हणत की, जोपर्यंत तुम्हाला थिअरीच्या जवळचा यिल्ड मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक केमिकल प्रोसेस मधे सुधारणा करायला वाव असतो.
Marathas had bandooks right
Marathas had bandooks right from the days of Shivaji, although it was not THE main weapon of choice.
As for gunpowder- during 1760s, after Panipat, the Panse clan, whom the Peshwa had entrusted the responsibility of artillery division, had a gun factory in Shukrawar peth Pune. "Panse Gharanyacha Itihas" is a book published by Bharat Itihas Sanshodhan Mandal, Pune. It mentions these details. So it is not like we were completely unaware of such things.
Also, pls restore Devanagari.....
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
exception rather than rule
ठीक. पण हे exception असल्या सारखे वाटते.
शस्त्र आणी युद्ध तंत्रज्ञान : 5 points of interest
Just a few points to consider:
1. Shivaji had directed that if the 'Topikar Ingraj" refused to sell cannons, the Dutch should be approached.
2. In 1803, in the "Maratha wars", the Duke of Wellington was (unpleasantly) surprised by the Maratha skill and quality of gunnery, mostly adopted from the French.
3. Speaking of India overall, one Frenchman who had developed a better canon, went all over the Indian princely courts, looking for orders (late 1700s?), but found no interest. He writes about it despairingly.
4. The reason behind the ease with which the British defeated the Ottoman empire, was that one British mathematician developed techniques which made British gunnery vastly more accurate.
5. The British had developed a technique: One line of British gunmen would kneel, while another behind them would stand. one line would fire, while the other loaded. This gave a machine-gun like effect, allowing the defeat of far bigger numbers.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
यात तत्कालीन बलुतेदारी आणि
यात तत्कालीन बलुतेदारी आणि धार्मिक प्रथांचा दोष मानता येईल.>>>>>>>>>> भारतात नवीन शोध लागूच शकत नव्हता ? रियली ?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
//आपल्याकडे संस्कृत तशी
//आपल्याकडे संस्कृत तशी युरोपातही लॅटिन भाषा हे राखीव कुरण होतं.//
There were no caste or religious restrictions on learning Latin. Same goes about Sanskrit. Only restriction was teaching the Vedas. That was the preserve of Brahmins. Other things were routinely taught to non-Brahmins, mostly from upper or intermediate castes. Therefore, it is hardly the preserve of the 3.5% ppl.
As to whether Indians innovated or adapted- the debate is far from being settled. Gunpowder came to India in 1500s, paper some centuries before that. Indians routinely used muskets from the time of Akbar at least. And not only Muslim kings- even Shivaji and many other Marathas are mentioned as having musketeers in their army. Marathas also used rockets way before Tipu Sultan, for ex. Shivaji used rockets in 1664 south konkan campaign against Khawas Khan nearby Vengurla. The Dutch envoy at Vengurla got scared by that and had to wait to convey his message to Shivaji.
So it's not that Indians were an isolated bunch on an island. We did adapt many things and innovated some as well. The British colonization of India is in no way a case of technological determinism as some would have it. It was the triumph of their political and economical manoeuvres (spelling check?) . Hence, blaming the backwardness of Indian technology for the colonization is misplaced because there are many counterexamples. Do read Randolf Cooper's book on Anglo-Maratha campaigns.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Dhanyawaad
Randolf Cooper's shodhun vachen.
My understanding is that tech adoption was not as widespread as the english and perhaps even moguls. As for innovation, seriously doubt if it ever took place (meaning major innovation), but will correct myself if your references show otherwise.
आपल्याकडे तो शोध का लागला नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट
यशस्वी तंत्रज्ञान निर्मितीसाठी लागणारी तिन्ही कौशल्ये ( बौद्धिक काम; ब्राह्मण, हाताने करायचे काम: शूद्र आणि व्यापारी वृत्ती/कौशल्य : वैश्य) एकाच माणसात उपलब्ध असावी लागतात. एडिसन सारख्या यशस्वी तंत्रज्ञान निर्मात्यात ती सहज दिसून येतात. आपल्या वर्णव्यवस्थेने ती तीन वर्णात विभागून, यशस्वी तंत्रज्ञान निर्मिती जवळपास अशक्य केली .
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
आपल्या देशात वनवसी लोक्
आपल्या देशात वनवसी लोक् अवैदिक् आहेत्. त्यांचयात का महणे एडिसन्न नाही ज्न्मला?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
The fact that Udgir produced
The fact that Udgir produced an Ajo is much more surprising than the non-existence of a vanavasi Edison.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पैसा (वेळ आणि सामग्री) आणि तंत्रविषयक शिक्षण
कारण तंत्रज्ञान निर्मितीला लागणारी दुसरी गोष्ट म्हणजे पैसा (वेळ आणि सामग्री). एडिसनचे दिव्याबाबतचे हजारो अयशस्वी प्रयोग आठवत असतीलच. आणि तंत्रविषयक शिक्षण . ज्याचे पोट हातावर आहे, त्या गरिबाला हे कसे परवडणार ?
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
Indian culture and scientific attitude
Dear Milind,
My reply is the context of a subtle observation made by Far End. Rajesh has made an assertion to which Far End has countered. You have merely restated Rajesh's contention than rebutting Far End.
You, according to me, are unnecessarily dragging our ancient Vedic culture in blaming your alleged absence of scientific thinking amongst Indian people. Keeping that apart, my argument is, if for a moment I accept your theory, there is a probability that Indian non-Vedic people ought to have made a lot scientific discoveries. There are 15% Muslims, 10% tribals, 3% Sikhs and 3% Christians in India. Looking at 15% global population with India, this really very large mass. Note that is more than US population. Both are non-Vedic. My question is how you can attribute the alleged unscientific thought to our Vedic origin?
Now, you haven't answered this question. You have made a diversionary comment that the non-Vedic people of India are not economically well-placed to explore science arena. This statement makes two big (and baseless assumptions):
1. A person doing scientific exploration must be very rich.
2. Non-Vedic people of India are pathetically poor.
3. Whatever a few number of scientists that are born in India were away from Vedic culture.
If you look at the list of people across the world who have reached from rags to riches, it seems initial poverty does hamper many people, but it never eliminates the possibility of birth of some. Not all kind of search requires huge money. Let alone this, many scientists in the West, didn't even get good education due to economic condition. https://www.quora.com/What-are-the-best-examples-of-scientists-who-made-... Many who could get, were very poor in academics in early childhood. Hence, the kind of correlations you are drawing are baseless. Why can't Michael Faraday take birth in tribal India? How do Vedas stop this happening?
Secondly, look at the influence of Indian culture on famous Indian scientists. Why don't you read what C V Raman says about Indian culture and science before making deriving such conclusions. Wasn't Ramanuj Vedic and didn't he use to cite weird religious stuff when he was asked to explain how he discovered mathematical theories? So how can you say that Vedic thinking is a hurdle in being a scientist?
=====================================
It is amply clear that Indian culture and Vedas have nothing to do with the extent of scientific research and development in our country. So far Vedic people are concerned, the culture is inquisitive and interrogative. So far as non-Vedic are concerned, they should have the same probability of giving birth to scientists as any other region in the world. You may be partially right in relating poverty and discoveries, but that applies equally to all. Dragging our culture in between is completely unwarranted. It is a modern itch to blame each and everything on our past.
=======================================
There are many countries that are not Vedic and don't produce scientists. There was no segregation of education, arm power, entrepreneurship and labor there too. This has nothing to do with so called absence of so called scientific thinking in Indian mind. We need to trace the real reasons for the same and address the issues.
========================================
Modern urban India is not Vedic by farthest stretch of imagination. Yet, there are no scientists winning Nobel prizes.
========================================
I am always intrigued by the tendency of the liberal people of India of blaming everything bad about the country on our culture. This speaks volumes of British success to inculcate inferiority complex in Indians.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
tumhee itake moTheThe
tumhee itake moTheThe pratisaad kase kaay liheetaa ho AaJo?
अजो रोज क्षीरसागराचं मंथन करत
अजो रोज क्षीरसागराचं मंथन करत असतील त्यामुळे मोठमोठे प्रतिसाद बाहेर येतात. आपली शाइची दौत बदलायला झालीय.टाकसुद्धा.
what a load of BS! Brahmins'
what a load of BS! Brahmins' monopoly was only over Vedas, not even Sanskrit language. Go read some History.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बोंबला
<<<<<<< यशस्वी तंत्रज्ञान निर्मितीसाठी लागणारी तिन्ही कौशल्ये ( बौद्धिक काम; ब्राह्मण, हाताने करायचे काम: शूद्र आणि व्यापारी वृत्ती/कौशल्य : वैश्य) एकाच माणसात उपलब्ध असावी लागतात. एडिसन सारख्या यशस्वी तंत्रज्ञान निर्मात्यात ती सहज दिसून येतात. आपल्या वर्णव्यवस्थेने ती तीन वर्णात विभागून, यशस्वी तंत्रज्ञान निर्मिती जवळपास अशक्य केली . >>>>>>>>
बोंबला
मुख्य तक्रार "त्या कंपनीत हाताने काम करावे लागते "
हे आपल्यात पक्के रुजले आहे. अनेक उच्चवर्णीय इंजिनियर मुलांची नोकरी सोडण्याची मुख्य तक्रार "त्या कंपनीत हाताने काम करावे लागते " ही असते.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
आपली लोकसंख्या जगाच्या १५%
आपली लोकसंख्या जगाच्या १५% आणि अर्थव्यवस्था ३% असण्याचे कारण मागे संस्कृत काही लोकांकडे होती हे नसून आज काही लोकाकडेच इंग्रजी आहे हे आहे. आपला कायदा, व्यवसाय, माध्यमे नि संशोधन हि एका अपरिचित भाषेत चालवण्यात काही मूर्खांना भूषण वाटते . मग सगळा देश काय होत आहे याकडे बघ्यांसारखे बघत असतो.
=============
भारतात का शोध लागला हा प्रश्न विचित्र आहे. कागदावर कसे प्रिंट करतात याचा शोध लागण्याआधी कितीतरी शे वर्ष भारतात कापडावर प्रिंट करण्याचा शोध लागला आहे. आवड असते एकेकाची!
==============
भारतात जे जैन , बुद्ध , मुसलमान , शीख , आदिवासी , ईशान्य भारतीय, ज्यू , पारशी , ख्रिशन, होते ते काय वर्णव्यवस्थेला बांधील नव्हते आणि गरीबही नव्हते .
=============
कोणीतरी शोध लावल्यावर तो भारताने ताबडतोब आत्मसात का केला नाही? याचं कारण म्हणजे ज्ञानावर मक्तेदारी बाळगण्याची संस्कृती होती. >>>>>>>>>>> कोणी पुरोगामीच , ज्याला नको तिथे वर्णव्यवस्था आणण्याची सवय आहे, तो असे म्हणू शकेल . क्षणभर आपण "मानू" कि भारतात ज्ञानावर मक्तेदारी होती. मग? ज्यांची मक्तेदारी होती त्यांना परदेशी लागलेला शोध आत्मसात करायला बंदी नव्हती ना? मक्तेदारी म्हणजे "इथल्या" नि "काही" लोकांना बंदी . इथले शूद्र विदेशात जायचे का? (जायचे तर मग त्यांना फार जाच नव्हता असे म्हणता येईल.) नाही. मग जे सवर्ण जात , त्यांना कोणती बंदी होती? उगाच आपलं काहीही .
===========
आणि मुद्रण व्यवस्था नि (तुमचा) ज्ञानप्रसार यांचा फार कौतुक करायचं नाही. युरोपीय लोकांनी मुद्रण त्या काळी फक्त आणि फक्त धर्म प्रसारासाठी वापरला . आज जग ख्रिश्चन बहुल म्हणूनच आहे. ज्या काळी ते अन्य कामासाठी वापरले जाऊ लागले तेव्हा भारतात देखील मुद्रण तितकेच फोफावले होते.
=======================
थोडक्यात वरील टीका म्हणजे कागद छापून तुम्ही धर्म प्रसार का केला नाही अशी आहे.
===============
(अजून पुढे कोणी शंका घेण्या आधी - नि भारतात व्हिडीओ तंत्रज्ञानाचा शोध का लागला नाही असे विचारण्याआधी - स्पष्ट करण्यात येते कि आमचे कडे .... असो.)
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>>>अजून पुढे कोणी शंका घेण्या
>>>अजून पुढे कोणी शंका घेण्या आधी - नि भारतात व्हिडीओ तंत्रज्ञानाचा शोध का लागला नाही असे विचारण्याआधी - स्पष्ट करण्यात येते कि आमचे कडे .... असो.)<<<<
जोशी बुवा , असे थांबू नका असो म्हणून , येऊ द्या त्या .......... च्या पुढे काय म्हणायचंय ते , धमाल येईल !!!
१)धर्माचा पगडा फार. २)त्यातही
१)धर्माचा पगडा फार.
२)त्यातही चमत्कारावर भर जास्ती.
३)काही जी "पवित्र" घोषित केलेली पुस्तकं /ग्रंथ यांना विरोध करण्यास मनाई.
जी परिस्थिती चार हजार वर्षांपुर्वी होती त्याच्या दहापट आता आहे.
पुरोगाम्यांना जोर जास्तीच लावायला हवा.
वस्तुनिष्ठता बाजूला ठेवून
वस्तुनिष्ठता बाजूला ठेवून धर्मनिष्ठता फार वाढवली की सामाजिक रोगराई वाढते.एखादा जोशी पोथ्यापुरांणापेक्षा लावण्या चांगल्या समजू लागला तर त्याला किती विरोध झाला होता हे पाहतोच. तसेच वंचित लोकांपैकी कुणास ग्रंथात गति होती त्याला थांबवण्यात आले.
आतासुद्धा काही चांगली प्रगती पाहायची असेल तर मुलांचे कोचिंग क्लासिजचे बाळामृत ( एंजिनिंअरिंग शिक्षणापर्यंत चालू असते - एका विषयाचे एका सेमिस्टरचे रु दोन हजार )बंद केले पाहिजे.भारतात हजार ओएस निर्माण होतील. स्वतंत्र विचार करून प्रश्नाला भिडण्याची वृत्ती कापली जाते बाळामृताने.
हे चॉइसेस करणे सोपे नाही .
+1
अमेरिकेत 'स्वतंत्र विचाराचे शिक्षण" अगदी सहाव्या वर्षांपासून दिले जाते. कोणतीही गोष्ट वर्गात शिकविल्यावर परीक्षेत ती "स्वतःच्या शब्दात" मांडता यावी अशी अपेक्षा असते. "मला कॉलेजात जायचे नाही" हा निर्णय १८ व्या वर्षी मुलेमुली आपला-आपण घेऊ शकतात- आम्ही असा विचारसुद्धा करू शकत नव्हतो! . स्वतंत्र विचाराचे नागरिक निर्माण झाले तर समाजातली आज्ञाधारकता आणि त्यामुळे शिस्तबद्धता कोसळेल ही भीती अनाठायी नसली तरी मेंढरे निर्माण होण्याची भीती त्याहून मोठी मानली जात असल्यामुळे स्वतंत्र विचारांची रिस्क स्वीकारली जाते. यातून समाजधारणा/कुटुंबव्यवस्था काही प्रमाणात खिळखिळी होते, पण सर्व क्षेत्रात सतत नवीन क्रांती होत रहाते. हे चॉइसेस करणे सोपे नाही . भारतात 'स्वातंत्र्य" च्या आधी आपण एक 'फाजील" असे सुप्त विशेषण लावूनच ठेवलेले असते. आपल्या मुलाचे भवितव्य आपणच घडविणार असा निर्धारही प्रत्येक पालकाचा असतो.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
American free thought
I don't think American are taught about free thinking at any point of time in whole life, forget sixth standard. This is based on my interaction with them in technical and commercial matters. They work within very strict boundaries and can't think a word beyond that.
=====================
Except for a few children of urban hyper parents, all kids in India do choose what they want by 12th. The number of students who actually decide not to attend college is far higher in India than USA.
====================
Indian education system doesn't produce any brainwashed sheep. And the American concept of freedom is more misplaced than that of India.
====================
I think Milind has completely confused the concepts of education, social discipline, social order, social obedience, social transformation and social lumpishness.
==================
Calling Indian concept of freedom as unwarranted is also out of pure inferiority complex.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
More than him, it's you who
More than him, it's you who has misplaced everything.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
I think you are completely
I think you are completely wrong, for the following reasons:
1. most new science, and the high prizes such as Nobel prize etc., in Science, go mostly to Americans. This is not possible without independent thought.
"The number of students who actually decide not to attend college is far higher in India than USA.": Is this a joke? This happens because they cannot afford college,: both the money and the time, to go to college. This is a tragedy.
"Indian education system doesn't produce any brainwashed sheep": How do Indian kids end up with the same set of prejudices as their parents and teachers?
And the American concept of freedom is more misplaced than that of India.: How? Please explain. Have you even understood the American concept of freedom?
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
<<<< And the American concept
<<<< And the American concept of freedom is more misplaced than that of India.: How? Please explain. Have you even understood the American concept of freedom? >>>>
Well Said.
Ajo will have to begin with Federalist Papers, Declaration of Independence, and then Tocqueville's Democracy in America.
I challenge Ajo to even try to define the word "freedom" (from an Indian or American or ANY other perspective that he wants). Even if he does that he will have achieved a lot.
चर्चा चालू द्या
चर्चा चालू द्या, पण कृपया व्यक्तिगत पातळीवर उतरून आव्हान देण्याची भाषा करू नये, ही विनंती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
<<<< पण कृपया व्यक्तिगत
<<<< पण कृपया व्यक्तिगत पातळीवर उतरून आव्हान देण्याची भाषा करू नये, ही विनंती. >>>>>
आव्हान देण्यातून काहीही अनुचित घडत नाही. आणि यात व्यक्तिगत पातळीवर उतरून काहीही बोलले गेलेले नाही. मी ज्या प्रकारे आव्हान दिलेले आहे त्या आव्हान देण्यातून ऐसीच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत नाही. मी नियम पुन्हा एकदा वाचले.
तेव्हा आपल्या विनंती ला बाजूला ठेवण्यात येत आहे.
American definition of freedom
Gabbar (dear needn't be explicitly mentioned in your case.),
American freedom constitutes the following:
1. Kill all the gullible tribals on unknown islands.
2. Purchase a lot of slaves from other superpowers.
3. Support all the wrong (read autocratic) governments in the globe because they are puppets.
4. Force naturally endowed countries to pay royalties to US companies, else eliminate the legitimate rulers there.
5. Suck all the intelligent people all over the world giving personal incentives rendering the rest of world unmanageable.
6. Eat from royalties.
7. Be socially more criminal than a third-world country despite economic prosperity.
8. Make nations fight to sell weapons.
9. Drop nuclear bombs on innocent citizens.
10. Flout diktats of UNO and bring about a situation like pre -WWII.
11. Kill/ discriminate against people who are not typical Americans.
12. Be Rashaphobic.
AND PREACH PREACH PREACH FREEDOM
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
America has not promised
America has not promised EQUAL FREEDOM to all humanity. Whatever definition of FREEDOM they have is good for their own citizens. Period. सगळ्या जगाचे goody goody करणारी चॅरिटी संस्था अमेरिका नाही.
Dear Milind, You are making
Dear Milind,
You are making many assumptions in saying that much of American scientific success is attributable to American concept of social free thought.
1. http://data.worldbank.org/indicator/SP.POP.SCIE.RD.P6 This link substantiates what you say. While American researchers are around 4000 per million, Indian ones are only 160 as per UNESCO. But don't we need to adjust these statistics for immigrant scientists? Or you believe that people start thinking free in scientific domain once they reach USA?
2. Free social thought can't be seen only in scientific success. What about comparison of number of political parties in Indian and USA?
3. R&D effort is driven by government's and industry's R&D budget. Our budget is less for economic reasons and we need adjustments to the statistics to this effect.
4. Despite it being an explicit policy of the US government to attract all the global talent, the percentage of R&D activity in US is low.
5. You may go through the link http://www.strategyand.pwc.com/reports/2015-global-innovation-1000-media... to understand the degree of ridiculousness in your argument. The corporate R&D, which is agile as compared to its government counterpart, is shifting to Asia, specifically to India. You should appreciate that the corporate honchos must have knowledge of correlation between 'social free thought' and 'success of R&D' otherwise they would have never made such waste investment. Corporates conduct a very deep analysis of investment and they must have taken into social barriers, if any.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>> most new science, and the
>> most new science, and the high prizes such as Nobel prize etc., in Science, go mostly to Americans. >>
By tha way - नोबल पारितोषकाच्या कमिटीवरती कोणत्या देशातील लोक आहेत? कोणी भारतिय आहे का? असल्यास का नसल्यास का नाही? आणि सर्वात महत्वाचे - असण्या नसण्याने काही फरक पडतो का?
>>मुलांचे कोचिंग क्लासिजचे
>>मुलांचे कोचिंग क्लासिजचे बाळामृत ( एंजिनिंअरिंग शिक्षणापर्यंत चालू असते - एका विषयाचे एका सेमिस्टरचे रु दोन हजार )बंद केले पाहिजे.भारतात हजार ओएस निर्माण होतील. स्वतंत्र विचार करून प्रश्नाला भिडण्याची वृत्ती कापली जाते बाळामृताने.
I don't know about coaching classes in US. But I have seen British "Digests" & "Guides" for commerce/accounting subjects at British Library in Mumbai.
And I have used them when I was doing ICWA.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हं?????
>>>> भारतात हजार ओएस निर्माण होतील. <<<<
उपयोग काय? नि त्याहीपेक्षा, गरज काय?
समजा उद्या हजार भारतीयांनी हजार ओएस बनवल्या. पण भारतातल्या काय किंवा जगातल्या काय, मार्केटला इतक्या हजार ओएसांची गरज आहे काय? नि त्या हजार ओएसा कनझ्यूम करण्याची कप्याशिट्टी आहे काय?
नि मग या हजार ओएसा मार्केटमध्ये एकमेकींशी कॉम्पीट करू लागल्या, की जातील ना मग साऱ्याच्या साऱ्या बाराच्या भावात! (वेल, नॉट नेसेसरिली सगळ्याच्या सगळ्या. त्यातली एखाददुसरी इतरांपेक्षा बरीच बरी असली तर टिकेलसुद्धा कदाचित, किंवा काही काळापुरती भरभराटीस येईलसुद्धा. पण बाकीच्यांचे कदाचित नामसुद्धा शेष राहायचे नाही. मग उपयोग काय झाला हजार ओएसा निर्माण होऊन? पावसाळ्यात उगवून नंतर मरून जाणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या?
त्यापेक्षा हजार भारतीयांनी एकत्र येऊन एकच पण दणकट ओएस जर बनवली, तर काहीतरी फायदा होऊ शकेल. कदाचित.
बाकी, आपली साल्या इंडियन्सची - आणि आय एम्प्लॉय द्याट टर्म मोअर अज़ अ रेस द्यान अज़ अ न्याशन्यालिटी (तत्त्वत: आणि तांत्रिकदृष्ट्या मी तूर्तास 'आपला' नाही - फॉर द्याट म्याटर कोणाचाच नाही नि नव्हतो (इनअज़मच अज़ कोणीही कोणाचे नसते. त्या आकाशातल्या हत्तींना विचारून पाहा; ते कन्फर्म करतील. तर ते एक असो.) - आणि अज़ फार अज़ न्याशन्यालिटी गोज़ मी तर साला इंडियनही नाही. भारत सरकारला विचारा; ते सांगतील, की ओसीआइज़ आर नॉट इंडियन्स, नि इंडियन सिटिझनशिप लॉ डझ नॉट प्रोव्हाइड फॉर ड्युअल सिटिझनशिप म्हणून. तर तेही असो.) - हीच खासियत म्हणायची काय, की (लोकसंख्येमुळे म्हणा किंवा वृत्तीमुळे म्हणा, पण) कोठेही गेलो, तरी ब्लडी इंडियन्स विल - अँड डू - कॉम्पीट विथ (अँड अगेन्स्ट) ब्लडी इंडियन्स?
असो चालायचेच! (किंवा, चलता है, हिंदुस्तान है|)
कॅालेजमध्ये असताना Shaum
कॅालेजमध्ये असताना Shaum series ची गणिताची पुस्तको एकदोन वाचायला मिळाली होती ( नंबर थिअरी,सेट थिअरी) काय एकेक जाडजुड पुस्तक आणि वाचत गेले की सहज समजत जायचे.
अकाउंट्सच्या बाबतीत बोलायचे तर तो माझा विषय नसताना पुस्तके वाचून शिकलो.या विषयात हे असंच करायचे असते वगैरे प्रमाण अकाउंट्स ठरलेली असतात. तसेच करायचे असते. तिथे गणित/विज्ञान विषयाप्रमाणे काही बुद्धिमत्ता चालवून उत्तर काढायचे नसते.
जुन्या घटनांवर आपण काहीच करू शकत नाही पण आताचे पायंडे बदलायला हवेत.
इकडे अकाउंट्स विषयाला बॅलन्स
इकडे अकाउंट्स विषयाला बॅलन्स शीटचा "चॅप्टर" वर्षाच्या शेवटी गुंडाळण्यासाठी ठेवतात तो पहिल्या दिवशी शिकवला पाहिजे.चुकीच्या पद्धतीने अकाउंट्स शिकवतात.ज्ञान चुकीच्या पद्धतीने दिले जाते याचाही विचार करा.
The existing approach is
The existing approach is correct.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उडाला
लंबाचौडा प्रतिसाद उडाला.
परत टंकायचा कंटाळा आला
छे छे छे...
पुरोगाम्यांनी असं कंटाळून कसं चालेल? एवढी असहिष्णुता माजली असताना तुम्हाला कंटाळा येतोच कसा? एकतर आमीरखानाने देशभक्तीपर सिनेमा काढून पुरोगाम्यांचा विश्वासघात केला. त्यात असा कंटाळा? ते गुर्जी बघा. खरी कॅश शोधायाच्या ऐवजी गुगल क्याष शोधायाले.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
देशभक्त
आमीर खानला पुरोगामी समजता! देशभक्त कुणीकडचे!
(गुर्जी माफ करा.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तो लेख होता ना कुठला तरी
तो लेख होता ना कुठला तरी दंगलवरचा. त्यात पुरोगामी अभ्यासक होते ते म्हणालेले की आमिरखानाकडे पुरोगामी लोक आशेनी पाहू लागले होते.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
असं कसं?
कंटाळलेले पुरोगामी अशी क्याटेगारी असू शकते ना?
आळसावलेले.सुस्तावलेले,पस्तावलेले,माजलेले,गांजलेले,गंजलेले,संपलेले पुरोगामी आहेतच की. त्यात आणखी एक.
बाय द वे, आळसावलेले आणि कंटाळलेले पुरोगामी एकच ना? नाही म्हणजे पोस्टात जमा झालेल्या जुन्या नोटा आणि स्टेट बेंकेत आलेल्या त्याच नोटा असं डबल काऊटिंग नको व्हायला. तसंही पुरोगामी आपली संख्या फुगवून फुगवून किती फुगवणार? बेडकाने....वगैरे.
>> पुरोगामी आपली संख्या
>> पुरोगामी आपली संख्या फुगवून फुगवून किती फुगवणार? बेडकाने....वगैरे.>>
hahaha
https://www.nytimes.com/2017/
https://www.nytimes.com/2017/01/10/world/europe/swiss-muslim-girls-must-...
freedom to deny freedom to their women ?
For their own sake, the Muslims must integrate in the society they live in (they should have no freedom to deny freedom to their women!). If they stand out like sore thumbs, they will be attacked on the streets, as it is happening in France, Germany, Sweden. As it is, the European countries are doing them a huge favor by allowing them in, and some of them are returning it by sexually attacking European women. If I were a European, I would be furious, too.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
हजार ओएस होण्याचा तो एक
हजार ओएस होण्याचा तो एक वडापावछाप डाइलॅाग(rhetoric)होता. मुद्दा आधारित प्रयोग नको निर्मिती कल्पना हवी.
मला आत्तापर्यंतचे प्रतिसाद
मला आत्तापर्यंतचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली. लेखाचं शीर्षक 'पुरोगाम्यांचा विजय' असं असलं तरी खरंतर वर्णन 'चांगल्या गोष्टींच्या विजया'चं आहे. कोणालाच याचा मनापासून आनंद झालेला दिसलेला नाही. कदाचित ज्यांना आनंद झालेला आहे ते गप्प असतील. कदाचित पुरोगामी हा शब्द वापरल्याने काही लोकांना त्रास झालेला असेल.
बरं, ज्यांनी आक्षेप घेणारे प्रतिसाद दिलेले आहेत, त्यांनीही अगदी फुटकळ, लहानसहान वाक्यांना आक्षेप घेतलेले दिसतात. मुळात गेल्या काही शतकांत या चांगल्या घटना घडल्या, वाईट परंपरा मोडून पडल्या (पूर्णपणे नष्ट झाल्या नसल्या तरीही) हे कोणालाच अमान्य नाही. अशी नक्की काय मानसिक बैठक आहे की एवढ्या प्रचंड चांगल्या गोष्टीचं कौतुक होण्याऐवजी त्यातल्या बारक्याशा कमतरतेबद्दल आपण तक्रार करत बसतो?
'हा अरबी घोडा शक्तिवान आहे, उत्तम धावतो हे सगळं ठीक आहे, पण त्याच्या शेपटीचे हे सहा केस वाकडे आहेत, त्याचं काय?'
माझ्यापुरते
माझ्यापुरते उत्तर देतो. स्त्री पुरूष समानता, गुलामगिरी, धर्मसंस्थेचे राजकीय अधिकार, लोकशाही, अस्पृश्यता, व्यक्तिस्वातंत्र्य याबाबतीत पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी जे बदल घडवून आणलेले आहेत त्याबद्दल काहीच वाद नाही. ते अॅक्नॉलेज करायला हवे होते हे मान्य आहे.
बाकी बाबतीत काही मतभेद, तर काही वाक्यांबद्दल शंका होत्या/आहेत त्याबद्दल चर्चा व्हायला हा फोरम योग्य वाटला म्हणून तसे लिहीले. तशी चर्चा झाली सुद्धा - जरी कन्क्लुझिव्ह वाटली नाही तरी. अजून एक दोन मुद्द्यांबद्दल आहेत - मुख्य भागावर चर्चा होउन गेली की लिहू शकतो.
मानसिक बैठक
> अशी नक्की काय मानसिक बैठक आहे की एवढ्या प्रचंड चांगल्या गोष्टीचं कौतुक होण्याऐवजी त्यातल्या बारक्याशा कमतरतेबद्दल आपण तक्रार करत बसतो?
लोक जर बारक्याशा कमतरतेबद्दल तक्रार करत असतील, तर याचा अर्थ असा नव्हे का की त्यांनी याआधी झालेली खूप मोठी प्रगती गृहीत धरलेली आहे? कॅनडातले लोक सरकारबद्दल कुरकूर करतात. पण नीरो, अटिला, पॉल पॉट, निक्सन, मुगाबे इत्यांदींच्या सरकारांपेक्षा कॅनडातलं आजचं सरकार खूप म्हणजे खूपच उजवं आहे हे त्यात अध्याहृतच असतं. आपलं सरकार विरोधी पक्षातल्या लोकांचे खून पाडत नाही याबद्दल रोज रात्री फटाके वाजवून आनंदोत्सव कोण साजरा करत बसेल? जसजशी प्रगती होते तसतशी बेसलाईन उंचावत जाते ही यामागची मानसिक बैठक आहे.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
मार्मिक
.
मला खरंच वाटत नाही की या
मला खरंच वाटत नाही की या सगळ्या अध्याहृताची लोकांना जाणीव असते. अनेक लोक 'जग बिघडत चाललं आहे' असा समज धरून आपलं आयुष्य जगतात. त्यांना मनापासून 'अहाहा, तो भूतकाळ काय सुंदर होता म्हाराजा!' असं वाटत असतं. आणि भूतकाळापेक्षा आजचं सर्वसाधारण जीवन किती चांगलं आहे हे समजावून सांगितल्यावर आनंद होण्याऐवजी आपल्या जिव्हाळ्याच्या विचारांना धक्का लागल्याचा त्रास होतो.
आणि अध्याहृत असणं ही एक गोष्ट झाली. ज्यांना खरोखरच या सगळ्या प्रगतीची कल्पना आहे, त्यांनीही रोजच्या रोज त्याबाबत आनंदोत्सव साजरे करण्याची गरज नाही. मात्र एखादी बातमी वाचल्यावर ते अध्याहृत आहे खरं, असं एखादवेळा आठवून म्हणणंही होत नाही. याउलट एखादी नकारात्मक बातमी आली की 'सगळं कसं सालं बिनसलेलं आहे' हे पुन्हापुन्हा उगाळलं जातं. याला मी विशिष्ट मानसिक बैठक म्हणतो. हीही का येते हे उत्क्रांतीतून समजतं. पण केवळ उत्क्रांतीने आपल्याला असं बनवलं आहे म्हणून 'ठेविले उत्क्रांतीये तैसेचि राहावे' असं का करावं?
बार उंचावत जाणंही ठीकच आहे - ते हेडॉनिस्टिक ट्रेडमिल वगैरे काय म्हणतात ते तेच. पण अधूनमधून अॅब्सोल्यूट विचार केला तर अधिक माणसं अधिक आनंदी राहातील असा माझा दावा आहे. मी जर पूर्वी केवळ पायी, सायकलने किंवा फारतर लालडब्बा एसटीने प्रवास करत असेन आणि आता बहुतांश कार, विमान वगैरेने प्रवास करत असेन तरीही 'आजकाल खड्डे फार असतात ब्वॉ रस्त्यात.' किंवा 'एअरहोस्टेस सर्व्हिस देताना हसत नाहीत लेकाच्या' असल्याच तक्रारी करत राहायचं का? म्हणून थोडं परिप्रेक्ष्य बाळगावं इतकीच अपेक्षा आहे.
अर्थात, झालेल्या प्रगतीबद्दल आनंद मानायचा की अजून बाकी असलेल्या गोष्टींबद्दल रडगाणं गात राहायचं हा वैयक्तिक चॉइस आहे, हे मला मान्यच आहे. मात्र बहुतांश लोक दुसरा मार्ग निवडतात हे मला किंचित आश्चर्य वाटायला लावणारं निरीक्षण आहे.
<<<<<<<<<<अनेक लोक 'जग बिघडत
<<<<<<<<<<अनेक लोक 'जग बिघडत चाललं आहे' असा समज धरून आपलं आयुष्य जगतात. त्यांना मनापासून 'अहाहा, तो भूतकाळ काय सुंदर होता म्हाराजा!' असं वाटत असतं. आणि भूतकाळापेक्षा आजचं सर्वसाधारण जीवन किती चांगलं आहे हे समजावून सांगितल्यावर आनंद होण्याऐवजी आपल्या जिव्हाळ्याच्या विचारांना धक्का लागल्याचा त्रास होतो.>>>>>>>>>>>
एकदम सहमत. शॉल्लेट.
---
"च्यायला आमच्या वेळी हे असल नव्हत"
मी जर पूर्वी केवळ पायी,
मी जर पूर्वी केवळ पायी, सायकलने किंवा फारतर लालडब्बा एसटीने प्रवास करत असेन आणि आता बहुतांश कार, विमान वगैरेने प्रवास करत असेन तरीही 'आजकाल खड्डे फार असतात ब्वॉ रस्त्यात.' किंवा 'एअरहोस्टेस सर्व्हिस देताना हसत नाहीत लेकाच्या' असल्याच तक्रारी करत राहायचं का? म्हणून थोडं परिप्रेक्ष्य बाळगावं इतकीच अपेक्षा आहे.
====================
विषय ऐसीच्य सदस्यांनी आयुष्यात किती प्रगती केली हा आहे का सामान्य लोकांचा आहे?
तुम्ही सायकल वरून विमानात गेलात ते ठीक आहे. भारी आहे. पण ज्या पणजोबाकडे १०० एकर शेती होती त्यांचे नातू आज मुंबईत १० बाय १० खोलीत राहतात नि जिच्या पेक्षा नरक उत्तम अशा लोकल मध्ये प्रवास करतात. अशा लोकलच्या प्रवासापेक्षा बैलगाडीचा प्रवास कधीही छान.
===========
" सगळं कसं मस्त चाललंय " हे जगातल्या सगळ्यात श्रीमंत, सुरक्षित ( शोषक ) देशात बसून वाटणे साहजिक आहे. स्त्रियांना चुलीच्या धुराचा त्रास होत नाही म्हणायचं नि सगळी दिल्ली रोज सरासरी २० सिगारेट पिते हे सोडून द्यायच ही देखील एक विचित्र मानसिक बैठकच आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो चा हास्यास्पद प्रतिसाद.
अजो चा हास्यास्पद प्रतिसाद.
kaare gabbu?
kaare gabbu?
//तुम्ही सायकल वरून विमानात
//तुम्ही सायकल वरून विमानात गेलात ते ठीक आहे. भारी आहे. पण ज्या पणजोबाकडे १०० एकर शेती होती त्यांचे नातू आज मुंबईत १० बाय १० खोलीत राहतात नि जिच्या पेक्षा नरक उत्तम अशा लोकल मध्ये प्रवास करतात. अशा लोकलच्या प्रवासापेक्षा बैलगाडीचा प्रवास कधीही छान.//
ज्यांची जमीन गेली त्यांनी रडावं, आणि ज्यांची उन्नती झाली त्यांनी हसावं. शिवाय इतका कळवळा असेल तर बसा की बैलगाडीत, कशाला करता नरकयातनासम प्रवास. मॉडर्न सोयीसुविधांचा पुरेपूर उपभोग घेऊन त्यांबद्दल चार बरे शब्दही कधी बोलायचे नाहीत हा जातिवंत खोटारडेपणा आणि कृतघ्नपणा आहे. ते सेपरेटिस्टांना पाठिंबा देणारे फुर्रोगामी आणि तुम्ही या दोहोंची विचारसरणी सेम टु सेमच आहे. शहरे वाईट असतील तर खेड्यात रहा, नपेक्षा निव्वळ कुढत राहणे हे म्हणजे खाल्ल्या घरचे वासे मोजण्यापैकी आहे. ऊठसूट खेडवळांच्या नावाने नॉस्टॅल्जिक रडणार्याने खेड्यात न राहणे आणि त्याकरिता काहीही प्रयत्न न करणे याला आमच्यात तरी ढोंग म्हणतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शब्दाशाब्दाशी सहमत. अजोवाद
शब्दाशाब्दाशी सहमत.
अजोवाद नावाचा नवीन वाद जन्माला आलेला आहे. हा परंपरावाद नाही. हा अजोवाद आहे. ( याचा निशिगंधा "वाद" शी काहीही संबंध नाही.)
क्या बात है, अतिनेमके.
क्या बात है, अतिनेमके. परंपरेवरती अजोवादाचे आक्रमण होऊ घातलेय.
बायदवे अलका कुबल आणि निशिगंधा वाड यांत मला नेहमी कन्फूजन होतं.
बायदवे "थांब लक्ष्मी कुंकू लावते" च्या धर्तीवर एक फेसबुक पेज पाहिलेलं त्याचं शीर्षक होतं "थांब टकल्या भांग पाडतो".
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
<<<<< बायदवे अलका कुबल आणि
<<<<< बायदवे अलका कुबल आणि निशिगंधा वाड यांत मला नेहमी कन्फूजन होतं. >>>>>>
ब्याट्या,
भलत्याच गोष्टीबाबत तुझे कन्फ्युजन होते.
अलका कुबल ही फक्त अलकाकाकू आहे आहे. तिच्या मागे सुलोचना, आशा काळे अशी भक्कम परंपरा आहे.
बायदवे अलका कुबल आणि निशिगंधा
बायदवे अलका कुबल आणि निशिगंधा वाड यांत मला नेहमी कन्फूजन होतं.>>>>>>>>
Batya , he ase hone mhanaje kalajich aahe.
गब्बर, किमान तू तरी प्रतिसाद
गब्बर, किमान तू तरी प्रतिसाद वाचायला पाहिजे होतास. "विमानापेक्षा बैलगाडी भारी असते" असं कोणी माझया प्रतिसादातून वाचायचा प्रयत्न करत असेल तर त्या बुद्धीची कीव करायला हवी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
<<<<< "विमानापेक्षा बैलगाडी
<<<<< "विमानापेक्षा बैलगाडी भारी असते" असं कोणी माझया प्रतिसादातून वाचायचा प्रयत्न करत असेल तर >>>>>>
अजो ने असे विधान केले की अलका कुबल ही निशिगंधा वाड पेक्षा भारी आहे तरी मी दुसरा गाल पुढे करेन.
But you indeed said that
But you indeed said that BAILGAADEE is better than HELLISH LOCAL.
BATYA said that, that is ungratefulness.
I agree with BATYA.
तुम्हाला कशातलं काहीही कळत
तुम्हाला कशातलं काहीही कळत नसेल तर विषयाशी असंबंधित प्रतिक्रिया देणे टाळा. ते कैकदा सुद्न्यपानाचे ठरते.
=============
चारच काय चार करोड शब्द कमी पडावेत इतके माझे मॉडर्न गोष्टीवर प्रेम आहे. पण प्रतिसाद वाचायला शिका.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
विषयाशी असंबंधित प्रतिक्रिया
विषयाशी असंबंधित प्रतिक्रिया देण्याचे नोबेल तुम्हांला सर्वानुमते मिळालेले आहे अगोदरच. त्याच्या पासंगालाही आम्ही पुरणार नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बरोबर आहे.
तुमचं दोघांचंही सगळं बरोबर आहे.
जाहीर प्रतिक्रिया देताना त्या व्यक्तिगत पातळीवर उतरून देऊ नयेत, असं ऐसीचं लिखित मार्गदर्शक तत्त्व आहेच. त्याशिवाय, प्रतिक्रिया वाचून इतरांचं मनोरंजन, माहितीवर्धन आणि/किंवा ज्ञानवर्धन होत नसल्यास प्रतिक्रिया प्रकाशित करण्यापूर्वी थोडा विचार करावा अशी अलिखित अपेक्षाही आहे.
ट्रंपचा प्रेस सेक्रेटरी आज एनबीसीवर म्हणत होता, 'पण पहिले खोडी त्या जॉन लुईसनं काढली'. तेव्हा मुलाखत घेणारी पत्रकार म्हणाली, 'आपण दुसरीतल्या मुलांसारखं तक्रारी करणं थोडं बाजूला ठेवायचं का?' मी तेच म्हणण्यासाठी आजची ताजी गोष्ट इथे लिहिली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी विषय एके विषय असे लिहायचा
मी विषय एके विषय असे लिहायचा प्रयत्न करत असतो. मात्र ज्याच्याशी आपण संवाद करत आहोत त्याचे काही मुद्दे वर्णिताना त्या व्यक्तीचेच वर्णन अप्रत्यक्षरीत्या होत राहते. हे बहुद्धा टाळता येत नाही.
==========
काही लोक मात्र प्रतिसाद न वाचता स्वतःला फार अक्कल आहे नि दुसर्याला अजिबात नाही इ इ समजून सगळे ध्यान त्या व्यक्तीचे वाईट चित्र उभे करण्यात वेळ वाया घालवतात. असे लोक मी दुर्लक्सितो पण गब्बर सारखे लोक त्यांच्या कह्यात आले तर करेक्शन आवश्यक असते.
============
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+420 To Batman
SolliDDD!!!
एक नंबर
जबरा प्रतिसाद आणि अतिशय सहमत.
(या अशा प्रतिसादांमुळे आम्ही गुर्जींचे प्रतिसाद सिरियसली घेतो आणि पटले नाहीत तर त्यांच्या मागे लागतो.. )
सदैव शोधात..
Meaningless Supposition
Jaydeep, to make a correct assessment of what Rajesh is saying, one needs to first come out of Canada, at least psychologically.
To celebrate the joys of new times in real sense, as Rajesh expects us to do, the number of Neros and Mugabes IN THE WORLD should have gone down.
Now if there is a Kim Jong II in Korea, a Shwe is just retired but making life hell of Sue kyi in Myanmar, an Assad is in Syria, a Bagdadi in Islamic State, a Saud, ... this is in fact very long list. Secondly in older times there used to be kings but the deadliest dictators belong only to last 100 years. What about the places where there is no dictator? (India never elected second party in many years. There were many eliminations - Shashtri, Mukherjee, Malviya. It is a different matter that the purogamis don't have any consideration of this. But that doesn't mean all was well.) China has no choice of second party. USA has no choice of third party for all practical purposes. Why don't pay attention to what Phillipines president said on TV last month? He said I killed with my own hands. http://edition.cnn.com/2016/12/14/asia/duterte-philippines-davao-killings/ These CNN reporters are idiots. He didn't admit. He was explaining to nation how killing should be done with courage.
The problem is that when people sit in Canada, for them the world becomes of the size of Canada. Please watch all the power transitions in the world and make an opinion.
================
So let's decide whether we are talking of Canada or India or world. Many western countries are doing great as compared to past and no doubt about it. (Whether they could do that if the entire world was on same footing is a separate economics question). But in the same world situation is pathetic in many nations. 5 among 1000 people die in Mediterranean Sea yet millions (number not bloated at all) flee. Isn't that too high probability of death?
==================
प्रगती होत जाणं वेगळं आणि नवीन नवीन शोध लागत जाणे वेगळं. जास्त शोध लागून जास्त लाभ झालेल्या समूहात तुम्ही आहात म्हणजे जगाचे कल्याण झाले आहे असे समजू नका. मुगाबे तुमचा राजा नाही म्हणून प्रगती झाली आहे असे होत नाही. आज पुरोगाम्यांना नको असलेला (मला नव्हे) ट्रम्प आहे, उद्या मुगाबे असेल. ट्रम्प ६ महिन्यांपूर्वी असंभव होता, आज (अमेरिकन) मुगाबे असंभव वाटतोय.!?
==================
If one has to be really happy about something one should base one's happiness on the qualitative reforms in the world order. As I see, the United States is overpowering UNO and this was one of the reasons that led to WWII.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
वाइट वाटून घेऊ नका हो. काय
वाइट वाटून घेऊ नका हो. काय आहे पुरोगाम्यांचा घौडा दौडला असता परंतू प्रतिगाम्यांनी गाडा इतका मागे नेऊन ठेवलाय की तो गाडा रेषेवर आणण्यातच घोडं थकून जातय. आता रेषेवर आणण्यात कसला आनंदोत्सव करणार? उगाच ते शेपटीतले सहा वाकडे केस व्हायोलिनच्या बो'ला लावता येणार नाहीत म्हणून जरा पुरोगामी खट्टु झालेत.
हलकेच घेणे
लोक २०५०, २२६० असे सिनेमे काढतात. (काही लोक १०,००० बी सी असे सिनेमे काढतात. ते एक असो.) https://en.wikipedia.org/wiki/List_of_films_set_in_the_future इथे पण फार तर फार ६६०० सर्वात पुढचा आकडा आहे. हा धागा त्याही पुढच्या प्रतला वर गेलेला दिसतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शिक्षण
शिक्षण - गेली अनेक शतकं संपूर्ण जगभरच शिक्षण ही फारच थोड्या मर्यादित लोकांची मांदियाळी होती>>>>>>>>>> आजदेखील आहे. आताच एका धाग्यावर कोणीतरी म्हणालं कि पशचिमेत शोध लागतात , भारतात नाही. तिकडे शिक्षण देतात नि आपल्याकडे तास नाटक करतात असं म्हणायचं होतं का?
=========
शतकानुशतकं ९५ टक्क्यांहून अधिक लोक 'काला अक्षर भैंस बराबर' या स्थितीत जन्मले, वाढले, जगले. >>>>>> आता १६ वर्षही शिकून अजिबात फायदा नाही. शिकले नाही तर लुटले जाणार हे मात्र निशचित आहे.
========
पण ग्युटेनबर्गने छपाईच्या तंत्रज्ञानाचा शोध लावला आणि माहिती साठवून ठेवणं, ती इतरांकडे पोचती करणं हे फारच स्वस्त झालं. त्याआधी बायबलमध्ये काय सांगितलं आहे हे ऐकण्यासाठी धार्मिक दलालांकडेच जावं लागायचं. >>>>>>> आज देखील घटनेत काय सांगितलं आहे ते ऐकायला वकिलांकडे जावंच लागतं . तिथे देखील कळायची खात्री नाही.
===========
ते त्यांना सोयीस्कर अर्थ सांगायचे. >>>>>>>> आजदेखील आपण कोणत्या अर्जावर का सही करत आहोत हे शिक्षितांना कळत नाही. लोक करारांवर असेच सही करतात. त्यातली भाषा नि कलमे त्यांना अगम्य वाटतात . फार काही फरक नाही.
===========
भारतात तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती होती. त्यात शिक्षण कोणाला मिळणार हेच वर्णव्यवस्थेने मर्यादित केलेलं होतं. त्यात शूद्रांना केवळ वेदशब्द ऐकण्याबद्दल कानांत शिसं ओतण्याची शिक्षा ठोठावली होती. >>>>>> बहुतेक यशस्वीरीत्या भारताला जगापेक्षा वाईट ठरवणे हा सच्च्या पुरोगामित्वाचा कस असावा. नक्की काय काय सांगू ? भारतीय अवैदिक गोष्टींचा, पंथांचा इतिहास (हे एकूण ८० आहेत)? अभारतीय अवैदिक धर्मानचा इतिहास? मध्ययुगीन चर्च किती क्रूर होते ? शिक्षण मर्यादित असायला जगात शिक्षणच कुठे होते? शिवाय हे असं लिहिलं जात आहे जणू काही १००% आरक्षण होते नोकरीमध्ये. दलित लोक जे व्यवसाय करत ते करायला सवर्णांना मुभा होती? शिवाय वेदशब्द ऐकण्यात फालतू वेळ न गेल्यानं शूद्रांचे भले व्हायला पाहिजे होते. शिवाय शिसे बनवणे आणि गावोगावी उकळणे हे ३-४००० बी सी पासून?
=============
सामान्य माणसासाठीही जे काही ज्ञान होतं ते संस्कृतमध्ये होतं. ज्ञानेश्वरांनी भग्वद्गीतेचं भाषांतर मराठीत करणं हेही क्रांतीकारक पाऊल होतं.>>>>>> तितकेच क्रान्तिकारी पाऊल कोणालाच न येणारी इंग्रजी भारतावर लादणे हे होते, नि आजही आहे, नव्या जमान्यात . अजून तरी साधी अक्कल असलेला कोणी ज्ञानेश्वर दिसत नाही.
=========
चर्च काय किंवा पैठणेतली पीठं काय, सामान्य माणसाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात त्यांचा स्वार्थ होता. ज्ञानाच्या नाड्या आपल्या हातात ठेवून घेण्यात त्यांचा फायदा होता. >>>>>>>>>> मुळात प्रत्येकच गोष्ट स्वार्थप्रेरित होती? वेद घोकून काय मिळत असेल? उत्पादक ज्ञान तर सर्व शूद्रांकडे !!! ६००० वर्ष भीक मागायचा अधिकार ठेवला स्वतःकडे . त्याचा इंग्रज आल्यावर फायदा झाला म्हणजे मूळ जुनी प्रेरणा स्वार्थ?
=======
त्यामुळे जगभरच प्रत्येकाने आपला परंपरागत व्यवसायच करत राहाणं आणि ज्ञानाच्या मागे न लागणं ही व्यवस्था जपण्यात ज्ञानावर मालकी असणारांचा कल होता. >>>> व्यवसायाला ज्ञान लागत नाही हा नवा शोध?
=======
वेळोवेळी अनेक पुरोगाम्यांनी ज्ञानाचा विस्तार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला. >>>>>>>>>> इतिहासात कोणी दिसला चांगला मानोस कि म्हणा त्याला पुरोगामी ! याला काही अर्थ नाही. ज्ञानेश्वर कोण्या अंगाने पुरोगामी म्हणे? पुरोगाम्यांची किमान लक्षणे आणि आवश्यक लक्षणे नककी काय? किमान विचार, कोण्या विषयावर क्काय ?
============
गेल्या आठशे वर्षांपूर्वीची परिस्थिती बदलून आता जगभर सगळ्यांना शिक्षण मुक्तपणे उपलब्ध आहे. प्रतिगाम्यांनी शिक्षणावर निर्बंध घालण्याचे जे काही प्रयत्न केलेले होते त्यांचा पूर्ण फज्जा उडालेला आहे. >>>>>> मुक्तपणे म्हणजे काय ते विसरलोच हे वाक्य वाचून ... आणि पुरोगामी लोकांना अज्ञात स्मृती मधलं अज्ञात वाक्य काढायचं , ते आज कसे नाही म्हणायचं नि मग जल्लोष करायचा हे सूत्र मिळालेलं दिसतं . कोणते निर्बंध? कोणते प्रयत्न? चला पुण्यात फुले होते, नागपूर मध्ये कोण? लखनौ मध्ये कोण? देशात आहेतच तीन-चार नावं - आंबेडकर , फुले, शाहू . तीन लोक एका पिढीत सगलं बदलू शकले म्हणजे असे किती निरबम्ध होते मागे? आणि आता ऑफिशियल सिक्रेट्स एक्ट आहेच ना? शिवाय क्लास ३ -४ ला ऑफिस मध्ये आदर आहे. सगळं तस्सच आहे.
=================
गेली काही दशकं जगभरच लोक अधिक सुशिक्षित होत आहेत. इंटरनेट क्रांतीमुळे तर ज्ञानावर आणि माहितीवर नियंत्रण ठेवणं महाकर्मकठीण झालेलं आहे. >>>>>>>>>
हे चांगलं आहे? नक्की?
============
'सर्वांनी सुशिक्षित व्हावं, शिक्षणाच्या बाबतीत कोणी काय शिकावं याबाबत निर्बंध असू नयेत, आणि काही मूलभूत ज्ञानावर एकाधिकार असू नये - जेणेकरून वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येकाला निर्णय घेणं शक्य व्हावं' या पुरोगामी विचाराचा विजय होत चाललेला आहे. >>>>>>> मुळात वैज्ञानिक दृष्टीकोनातून काहीही निर्णय घेता येत नाही. ती उगाच एक म्हण आहे. असलं काही नसत. And please don't talk as if you don't know anything about huge subsidies on R&D on one side out of people's money and a very tight intellectual property regime before you make such statements. ज्ञानाचा एकाधिकार सर्वात जास्त आज आहे.
===============
शिक्षणाची माणसाला नैसर्गिक नावड असते. शिकण्यात १६ वर्षे फुकट जातात. शिकता काय नि करता काय चा काही संबंध नसतो. शिक्षण फार महाग आहे. लोक लेकरे शिकवून कंगाल होतात. शिक्षणामुळे बालपण नष्ट होतो. आजच्य व्यवस्थेत स्पेशलायझेशन करताच येत नाही. एकदा शिकलेले पुरत नाही . आयुष्यभर सतत शिकायचे टेन्शन असते. शिक्षणाचे मूल्य कधी नष्ट होईल सांगता येत नाही. ज्यांचे मायबाप फार शिकलेत त्यांना कंपिट करणे फार अवघड आहे. एकूण बकवास प्रकार आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आधुनिक शिक्षणाचे एक कौतुक
आधुनिक शिक्षणाचे एक कौतुक विसरलोच . अगोदर सुशिक्षित आणि सुसंस्कारित हे जवळजवळ समानार्थी शब्द होते. आता नाहीत . शिक्षण म्हणजे गरीबांना लुटणार्या भ्रष्ट व्यवस्थेत सामील व्हायचा परवाना, किमान सरकारमध्ये .
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
<<<<< शिक्षण म्हणजे गरीबांना
<<<<< शिक्षण म्हणजे गरीबांना लुटणार्या भ्रष्ट व्यवस्थेत सामील व्हायचा परवाना >>>>>
गरिबांच्या कडे लुटण्यासारखे काय असते ?? त्यांच्याकडे जर लुटण्यासारखे काही असेल तर त्यांना गरीब कसे म्हणता ?
अनालॉजी
श्रीमंतांना पैसे मिळवण्याचा अधिकार कशाला पाहिजे म्हणे ? त्यांचे कडे पैसे असतीलच तर कशाला हवेत मग?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
<<<<<< श्रीमंतांना पैसे
<<<<<< श्रीमंतांना पैसे मिळवण्याचा अधिकार कशाला पाहिजे म्हणे ? त्यांचे कडे पैसे असतीलच तर कशाला हवेत मग? >>>>>>>
माझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून प्रश्न विचारलात. ठीकाय.
त्याचे उत्तर :
अधिकार ? पैसे मिळवणे हा विकल्प असतो. अधिकार नसतो.
-
आता मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या ना !!!
रुकावट के लिये खेद है।
(गब्बर आणि अजोंच्या पार्टीत खोडा घालण्याचा माझा हेतू नाही. पण शिंक आल्यावर इलाज नसतो.)
गरीबांकडे बुद्धी, श्रम, वेळ इत्यादी स्रोत असतात. शिवाय गरीबही (दुर्दैवानं!) माणसं असल्यामुळे त्यांनाही अब्रू, स्वाभिमानासारख्या गोष्टी असतात. असं असल्यामुळे ही माणसं गरीब राहत नाहीत, असं कोणाला म्हणायचं असेल तर गरीब आणि श्रीमंत हा भेदच नष्ट होईल. त्यामुळे काही माणसांना - ज्यांना काही लोक श्रीमंत असं लेबल चुकून लावतीलही - अधिक तोशीस पडली, तर त्याबद्दल अजिबात दुःख वाटून घेऊ नये.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वर्ड सॅलड
वर्ड सॅलड ची abridged version.
पाने