पुण्यात ४ ठिकाणी बॉम्बस्फोट
नुकतीच टीव्ही चॅनेल्स वर बातमी पाहिली
पुण्यात ४ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत. जंगली महाराज रस्त्याच्या आसपासचा परिसर यासाठी निवडण्यात आला होता.
चारही स्फोट कमी क्षमतेचे असल्यामुळे जिवीत हानी झाल्याचे वृत्त नाहिये. फक्त १ व्यक्ती जखमी झाली आहे अशी अधिकृत बातमी दिली जात आहे.
१. बालगंधर्व रंगमंदीर
२. मॅक्डोनल्ड्स पाशी
३. गरवारे चौक
४. देना बँकेमागे
५. खैबर पाशी / दरबार चौक ??
बॉम्बस्फोट झालेली ठिकाणे:
ठिकाणे एवढीच माहिती आहेत. अद्याप सविस्तर वृत्त कळायचे आहे.
प्रतिक्रिया
हम्म
मन सुन्न झाले.काही लोक हे असे का करतात तेच कळत नाही. पुण्यात काही आप्तेष्ट आहेत पण सुखरूप आहेत.
(चिंतीत) रमाबाई
'ई-सकाळ'मधील एक
'ई-सकाळ'मधील एक प्रतिक्रिया:
स्फोटके वापरण्याच्या कंजूषीवरून हे कोण्या अस्सल पुणेकराचेच काम आहे हे सिद्ध होते.
एका गटाच्या खास वैशिष्ट्याचे
एका गटाच्या खास वैशिष्ट्याचे श्रेय सगळ्या पुणेकरांनी घेण्याचा निषेध.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्रतिसाद भारी
प्रतिसाद भारी
टाईम्समधली ही बातमी थोडी
टाईम्समधली ही बातमी थोडी चिंताजनक आहे.
http://timesofindia.indiatimes.com/india/Bomb-design-flaw-averted-major-...
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बाप रे!!!
बाप रे!!!
हं
म्हणजे केवळ अतिरेक्यांच्या तांत्रिक अकार्यक्षमतेमुळे मोठे स्फोट झाले नाहीत. दाट लोकवस्ती असूनही आणि प्रमुख शहरांपैकी एक असूनही गुप्तचर, दहशतवादविरोधी पथक किंवा पोलिसांना स्फोट घडण्यापूर्वीच खबर मिळू नये हे जास्तच चिंताजनक आहे.
असो. मोठमोठ्या शहरात अशा छोट्यामोठ्या गोष्टी घडतातच. लंडन, न्यूयॉर्क सारख्या किरकोळ शहरांत बाँब फुटण्याआधीच किंवा ठेवण्याआधीच पकडणे सोपे असेल कदाचित पण पुण्यासारख्या अतिभव्य महानगरात ते कसे शक्य आहे?
परवाच एक मित्र नात्यातल्या लग्नाला सांगलीला जाऊन आला. माननीय गृहमंत्री त्या लग्नाला उपस्थित होते सांगत होता.
परवाच एक मित्र नात्यातल्या
एका मैत्रिणीच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी २००३ साली हैद्राबादेत गेले होते. तेव्हा चंद्राबाबू मुख्यमंत्री होते आणि मैत्रिणीचे वडील चंद्राबाबूंचे सेक्रेटरी (IAS). चंद्राबाबू तिथे दोन-पाच मिनीटं येऊन गेले हे आम्ही त्या मैदानाच्या दुसर्या टोकाहून पाहिलं. त्या समारंभस्थळी पोहोचण्यासाठी विमानतळांवर आता असते त्यापेक्षा अधिक सिक्यूरिटी होती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.