सिरियातील रासायनिक हल्ला आणि भारत
सिरियातील असद सरकारने आपल्याच नागरीकांविरुद्धनागरी सरीन(sarin) या प्रतिबंधित रासायनिक वायूचा उपयोग केला व त्यात सुमारे ८६ मृत्युमुखी व ५४६ रुग्णालयात दाखल आहेत.
लगेचच जगाच्या शांततेच्या ठेकेदाराने(अमेरिका) सिरियाच्या त्या हवाई तळावर क्षेपणास्त्र सोडले जेथून संभावतः ते रासायनिक हल्ले झाले. हा हवाई तळ दुसरा ठेकेदार (रशिया) वापरत होता.
लगेचच जगाचे दोन तुकडे झाले अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान इत्यादी विरुद्ध सीरिया रशिया इत्यादी. परंतु यात भारत कुठे आहे. United nation मध्ये स्थायी सदस्यत्व मिळवण्याच्या तयारीत असलेल्या देशाची अशी शांतता? भारत इतर जगापासून वेगळा आहे का?
भारताचे सीरिया, अमेरिका व रशिया सोबत चांगले संबध आहेत.गेल्या वर्षी सिरियाच्या उपपंतप्रधान यांनी भारताला भेट दिली बदल्यात भारताचे mj अकबर यांनी सीरिया ला भेट दिली नंतर सिरियाच्या राजदूताने अशी प्रतिक्रिया दिली ज्यात त्याने भारताच्या काश्मीर मधील भूमिकेचे समर्थन केले होते.
भारतानेही गेल्यावर्षी सिरियाविरुद्ध च्या UN ठरावात अनुपस्थि दाखवली जो कॅनडाने मांडला होता व ज्यात सिरियातील ceasefire ची मागणी होती.
भारत आणि रशिया चे संबध हि जगजाहीर आहेत(अपवाद रशिया-पाकिस्तान संयुक्त सैन्य प्रशिक्षण).
परंतु तरीही जो देश पश्चिमेकडे कोठेही हल्ला झाला तर निषेध करतो तो या दोन्ही बाजूच्या हल्याबद्दल काहीच प्रतिक्रिया देत नाही.भारत अजूनही नेहरूंनी बनवलेल्या तिसऱ्या जगात आहे...
वापरल्या गेलेल्या रासायनिक अस्त्र विषयी
जे रसायन असद सरकारने आपल्या नागरीकांविरुद्ध वापरले त्याच नाव 'sarin' आहे. हे रसायन रंगविराहित व वासविराहित असते.पाण्यामध्ये मिळवू शकतो. हे रसायन शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते ज्यामुळे १० मिनिटांच्या आत मृत्यू येतो.हे रसायन भोपाळ दुर्घटनेच्या रसायनाहून २६ पटीने धोकादायक आहे. सुरवातीला कीटकनाशक म्हणून शोधलेल्या या रसायनाचा उपयोग नाझी जर्मनी ने युद्धात केला
परंतु यात भारत कुठे आहे.
भारताने सुद्धा वैश्विक् शांततेचे ठेकेदार बनावे अशी तुमची अपेक्षा आहे का ?
युरोपात
जे ५ जण un चालवतात त्यांच्यासोबत बसायचं असेल तर उर्वरित जगापासून निवृत्ती योग्य नाही. कमीत कमी दोन्ही बाजूंचा निषेध तर करू शकतो.
जे ५ जण un चालवतात
(१) चीन ने काय केलं आहे ? निषेध ? कारवाई ?
(२) ज्यांनी कारवाई केली त्यांना "शांतिचे ठेकेदार" म्हणून हिणवायचं आणि ज्यांनी कारवाई केली नाही त्यांना "कारवाई केली नाही व निषेध सुद्धा केला नाही" असं फटकारायचं - हे दोन्ही एकाच वेळी कसं जमतं ओ तुम्हाला ?
भारत सध्या गायींच्या
भारत सध्या गायींच्या देशांतर्गत वाहतुकदारांवर लक्ष ठेवून आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हे चूक आहे असे जर तुम्हाला
हे चूक आहे असे जर तुम्हाला म्हणायचे असेल तर् नेमके चूक काय आहे ?
अंतर्गत प्रश्न
भारताला आधीच, भरपूर अंतर्गत प्रश्न आहेत्. त्यांतच, बाहेरच्या प्रश्नांमधे नाक खुपसायला जाऊ नये, हे धोरणच योग्य आहे. रासायनिक अस्त्रांचा वापर, ही अत्यंत गंभीर घटना असली तरी, आपण उठवलेल्या आवाजाला, बाहेर कोणीही किंमत देत नाही, हेही तितकेच खरे आहे.
किंमत
हा तुमचा भ्रम आहे युरोप च्या बाहेर सर्व जग भारताला एक शांतताप्रिय देश मानतो.(पाकिस्तान सोडून) व पूर्ण जगात UN साठी योग्य उमेदवार मानतो.
युरोप च्या बाहेर सर्व जग
ही ही ही.
हा तुमचा भ्रम आहे युरोप च्या
हे निरिक्षण आहे कि गृहितक कि निष्कर्ष कि आडाखा की मनोराज्ये ?
भारताला आधीच, भरपूर अंत
विश्वातील प्रत्येक राष्ट्रास अंतर्गत प्रश्न आहेत्. खूप मोठे प्रश्न्.
रशिया, फ्रान्स, चीन, अमेरिका, ब्रिटन या सर्वांना अनेक व मोठे अंतर्गत प्रश्न आहेत्.
जपान, जर्मनी, ब्राझिल या इतर बड्या देशांना सुद्धा.
असद च्या विमानतळावर
असद च्या विमानतळावर प्रतिकात्मक का होईना हल्ला केल्या बद्दल ट्रंपोबाचा निषेध्.