ज्ञात अज्ञात पंढरपूर ८ लोकमान्य विद्यालय

ज्ञात अज्ञात पंढरपूर ८
लोकमान्य हाय स्कुल
लोकमान्य विद्यालय
साऱ्या पंढरपूरकरांना परिचित असणारी हि वास्तू आहे लोकमान्य विद्यालयाची. पुर्वीची हि मुख्य इमारत. मुळ इमारत. गावाच्या पुर्वोत्तर बाजूस नदिकाठावर जमिनीवर कमरे एवढ्या उंचीच्या जोत्यावर संपूर्ण २ मजली त्यावर १ खोली किंवा एकाच वर्गाचा तिसरा मजला अशी खाशा व्हिक्टोरियन कालखंडाच्या खुणा दर्शविणारे ब्रिटिश शैलीत बांधकाम असलेली बहु कमानींची दगडी आणि लाकडी वास्तु. आतले वर्गही प्रशस्त, भरपूर उजेड असणारे आणि हवेशीर असे आहेत. त्यातुन नदिकाठावर असल्याने नदीचा गार वारा सदैव वर्गात येत असतो. ज्यामुळे सुस्ती येवून अनेकांनी मास्तरांचा मार खाल्याच्या कथा पंढरीत अनेकजण सुरसपणे सांगतात. शिवाय शाळेला जायचे म्हणून घरी सांगून शाळेतच्या ज्ञानगंगेत डुंबण्या एेवजी अनेकांनी चंद्रभागेच्या जलगंगेत डुंबणे पसंत केल्याचे अनेकांना स्मरते. अन् त्या पायी कधी मास्तरांच्या तर कधी पित्याच्या ताडणाला तोंडही द्यावे लागलेले ही त्यांना आठवतेच.
पंढरपूर नगरपरिषदेकडून चालविले जाणारे शाळेची हि पश्चिमाभिमुख वास्तु ऐसपैस असुन दुसऱ्या मजल्यावरचे मध्यवर्ती ३ कमानी पैकी मधले कमानीत शालेची घंटा. त्याचे वरचे वर्गाला पश्चिमेला लहाना सज्जा ज्याठिकाणी ध्वजवंदनासाठी काठी, प्रयोगशाळा आदी व्यवस्थांनी सुसज्ज असलेली हि वास्तू म्हणजे पंढरपूरकरांचे स्मरणस्थान. कारण इथे पंढरीतील नुसते अनेक लोक नाही तर पिढ्या शिकल्या. त्या शिक्षणाच्या आणि शाळा बुडवून वाळवंटात खेळण्याच्या, पोहण्याच्या आठवणी याचे पिढ्यानपिढ्या पंढरी नगरीत स्मरण आहे. जे स्मरण येथिल द मा मिरासदार, बुवा गुरूजी आदी साहित्यिकांनी आपल्या विविधांगी लेखनातून व्यक्तही केले आहे. या शाळेतून प्रेरणा घेवून अनेक शाळा पंढरीत निर्माण झाल्या त्यामुळे या विद्यालयास पंढरीतील शिक्षणाची गंगोत्रीच म्हटले पाहिजे. इथे शिक्षलेले अनेक विद्यार्थी आज भारतभर विखुरले आहेत काही परदेशातही आहेत. शाळेत न जाता बुडविणे पसंत करणार्यांनी तयेच बॅक बेंचरस् नीही ही भरपूर कीर्ती मिळविलीय
इथे केवळ पुस्तकी शिक्षणच देत नसत तर जीवन जगण्यासाठीजी आवश्यक जीवनमुल्येही शिकविली जात असत. कौशल्येही शिकविली जात. येथील विद्यार्थ्यांना पूर्वी पोहायला शिकविले जायचे, त्याचे कडून व्यायामही करू घेतला जायचा. कुस्ती, मल्लखांब, लाठी, काठी, पट्टा सारखे मर्दानी खेळही शिकविले जायचे. ज्याच्या आठवणी कित्येक जण सांगतात.
सन १८७८ मधे शाळेच्या स्वतंत्र संस्थेची स्थापना करून सन १८८१ चे नोव्हेंबर महिन्यातील २३ व्या दिनांकाला या ठिकाणी शाळेच्या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. तत्कालिन ब्रिटिश अमलाखालील मुंबई राज्याचे गवर्नर सर जेम्स फर्ग्युसन याचे हस्ते हा समारंभ झाला. नगरपालिकेच्या रकमेतून आणि त्यांचेच नियंत्रणात हि शाळा आजही उभी आहे. स्थापनेवेळी शाळेचे नाव होते व्हिक्टोरिया ज्युबिली हायस्कूल. भारतीय स्वातंत्रयुद्धाचे कार्यकाळात पंढरीतील देशभक्तांनी हि परकिय शिक्षण देणारी शाळा म्हणून ती जाळण्याचा प्रयत्नही केला होता. जो फारसा यशस्वी झाला नाही. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शाळेचे नाव बदलून लोकमान्य विद्यालय करण्यात आले. ते अद्यापी आहे. आमच्या बडवे कुटुंबातील अनेक पिढ्या इथेच शिकल्या कारण एन ए बडवे सर, वै. वा. श्रीकांत नारायण तथा अप्पासाहेब बडवे सर वै. गो. गो. बडवे सर वै. दत्ता बडवे हे तेथे घरचे शिक्षर असल्याने हक्काने मुले तेथे शिकायला नेली जात. सर मंडळीं पैकी काही जण मुख्याध्यापकही झाले होते. तसेच बाबा देवधर सर, नम्र सर, वसंतराव उत्पात, गोसावी सर, निकते सर गोपाळ पुजारी, तरकसबंद आदी मान्यवर शिक्षकही या शालेत होते तसेच भारतीय स्वातंत्रलढ्यात आपले जीवाची बाजी लावणाऱ्या क्रांतीकारकांचे सहकारी असलेले भिडे मास्तर इथे शिकवायला होते. त्यांनी इथल्या विद्यार्थांना शरिर संवर्धनाचे शिक्षण दिले.
तसेच शिक्षकही निर्भिड बाण्याचे पहार देतो म्हणून संस्था चालकाची चाटूगिरी करणारो नव्हते याचे बंडकाका सबनीसांनी सांगितलेली आठवण त्यांचेच शब्दात पुढीलप्रमाणे---
वै. का. दि. सबनीस सर ,हे एक गाजलेले हेड मास्तर होते.
त्यांचा एक किस्सा, पंढरपूरचे शिक्षण समितीचे सभापती, गणपतराव अभंगराव आपल्या मुलाला शाळेकडे घेऊन चालले होते. वाटेत त्यांना नगराध्यक्ष भगवानराव भादुले भेटले, त्यांनी विचारले '"काय गणपतराव, कुठे निघालात? तेही पोराला हाताला धरून?" गणपतराव बोलले ,सबनीस मास्तरांना जाब विचारायला "नगरपालिकेच्या हायस्कुलमध्ये सभापतींचा मुलगा फेल होतो म्हणजे काय?"
शांतपणे भगवानराव भादुले म्हणाले, घरी जावा "जेथे नगराध्यक्षांचा मुलगा नापास होतो. तिथे तुमचे काय?" असे निर्भिड शिकक्ष या शाळेला लाभल्याने तिचा लौकिक साता समुद्रापार गेलाय.
पंढरपूरातील उमा महाविद्यालयची सुरूवात झालेवर त्याचे प्रारंभीची काही वर्षे याच इमारतीत त्यांचे कामकाज चालत होते. त्यामुळे हि इमारत उमा महाविद्यालयाची मातृसंस्था म्हटले तरी चालेल.
महाराष्ट्रात इतक्या जुन्या काळापासूनच्या चालू असणाऱ्या शाळा क्वचितच असतिल. असतील त्याची पट्टी केली तर त्यात लोकमान्य विद्यालयाचा पहिला क्रमांक लागेल. १९८१ साली या शाळेने शताब्दी पुर्ण केल्याने पंढरपूर नगरपरिषदेने पुढे मोठा समारंभ घडवून आणला होता. ज्यात अनेक विविध कार्यक्रमांबरोबर महाराष्ट्रभुषण शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्र व्याख्यानमाला करण्यात आली होती. जी आजही माझे स्मरणात आहे.
पंढरी नगरीतील हि पहिली शाळा. सर्वात जुनी शाळा. आज जवळ जवळ १३९ वर्षे येथे विद्यादानाचे कार्य अविरत चालू आहे. पूर्वी हि एकच इमारत होती कालांतराने विद्यार्थी संख्या वाढल्याने दुसऱ्या जागेची गरज पडली म्हणून जुन्या कोर्टासमोर इमारत बांधून तिथे काही वर्ग चालले. नव्या महागड्या नावाजलेल्या परग्रामी शिक्षणसंस्थाच्या शिक्षणाचे लाट सर्वत्र पसल्यामुळे आता मात्र विद्यार्थीसंख्या घटली, जुनी इमारत जीर्ण झाली त्यामुळे इथले वर्ग सांप्रत बंदच झालेत. पुन:श्च या विद्यालयाला गत वैभव प्राप्त करून देणे हे खरेतर सर्व पंढरपूरकराचे हातात आहे. तरच हा पंढरीचा शैक्षणिक वारसा सांगणारा ठेवा सुरक्षित राहिल.
© आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आज काय घडले....

माघ शु. ४

श्रीगणपतीचा जन्मदिवस :

माघ शु. ४ हा दिवस श्रीगणपतीचा जन्मदिन म्हणून मानला जातो.

गणपति हा शंकर-पार्वतीचा पुत्र असला तरी तो अयोनिज आहे. पद्मपुराण, मत्स्यपुराण, स्कंदपुराण ... आदि ग्रंथांतून याच्या जन्माच्या कथा दिल्या आहेत. पार्वतीने आपल्या अंगावरील उटण्याची मूर्ति बनवून ती सजीव केल्यावर गणपति निर्माण झाला; अदितीच्या पोटी हा महोत्कटरूपाने जन्मास आला; पार्वती स्नान करीत असतां द्वाररक्षकाचे काम करणा-या गणपतीने शंकरालाहि मज्जाव केला, त्यामुळे युद्ध झाले आणि शंकरांनी याचे मस्तक तोडले, परंतु पार्वतीच्यासाठी शंकरांनी परत इंद्राच्या हत्तीचे मस्तक बसविलें ; शनीच्या दृष्टिपाताने गणपतीचे मस्तक जळाले, पण देवांनी तेथे हत्तीचे मस्तक बसविलें. इत्यादि अनेक कथा पुराणग्रंथांतून वर्णन केल्या आहेत. कित्येक ठिकाणी गणेशाच्या बालचरित्राचेंहि वर्णन आढळते. 'गणानां त्वा गणपति' हे ऋग्वेदांतील सूत्र गणपतीचे मानतात. महाभारतासारख्या अवाढव्य ग्रंथनिर्मितीच्या वेळी गणेश हाच 'लेखकु' झाल्याचा उल्लेख आहे. सुमुख, एकदन्त, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाश इत्यादी बारा नांवे याची प्रसिद्ध.आहेत. गणपतीला गृत्समद, राजा वरेण्य व मुद्गल यांसारखे थोर भक्त मिळाले आहेत. सुखकर्ता दुःखहर्ता -' म्हणून गणपती हे भारतीयांचे आराध्यदैवत बनले आहे. शैव-वैष्णव या दोन्ही पंथांचे लोक गणपतीची उपासना करतात. तामिल देशांत तंचिकाई अलवर म्हणजे बुद्धिवान् गजानन आहे. तंजावर येथेही प्रसिद्ध असे गणपतीचे देवालय आहे. त्रिचनापल्लीला उच्छि पिल्लेयर हे अत्यंत भव्य असे गणेश-मंदिर आहे. गणपतीच्या उपासकांचा गाणपत्य पंथ मान्यतेस पावला आहे. गणपतीचे अनेक अवतार मानले गेले आहेत. कृतयुगांत विनायक, त्रेतायुगांत मयूरेश्वर, द्वापरयुगांत गजानन, ... असे त्याचे वर्णन आढळते..पेशव्यांचे आराध्य दैवत गणपति हेच होते. महाराष्ट्रांतील मोरगांव, थेऊर, लेण्याद्रि, सिद्धटेक आदि अष्टविनायकांची स्थाने प्रसिद्ध आहेत
ganesh janm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागालेखकास सूचना : येथील टिप्पणी पाहावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0