दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२३ एप्रिल
जन्मदिवस : चित्रकार जे.एम.डब्ल्यू. टर्नर (१७७५), पुंजसिद्धांताचा जनक, नोबेलविजेता माक्स प्लान्क (१८५८), समाजसुधारक पंडिता रमाबाई (१८५७), समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे (१८७३), संगीतकार सेर्गेई प्रोकोफिएव्ह (१८९१), सुएझ कालवा प्रश्न सोडवणारा कनेडीयन पंतप्रधान लेस्टर पीअर्सन (१८९७), आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवलप्रवाहावर संशोधन करणारा नोबेलविजेता बर्थिल ओहलिन (१८९९), गायिका अन्नपूर्णादेवी (१९२७), अभिनेत्री शर्ली टेंपल (१९२८), गायक-संगीतकार रॉय ऑर्बिसन (१९३६), पार्श्वगायिका एस. जानकी (१९३९), दिग्दर्शक मायकल मूर (१९५४), अभिनेता मनोज बाजपेयी (१९६९), टेनिसपटू दानियेला हांतुखोवा (१९८३), अभिनेता देव पटेल (१९९०)
मृत्युदिवस : नाटककार विल्यम शेक्सपिअर (१६१६), कवी विल्यम वर्डस्वर्थ (१८५०), गायक उस्ताद बडे गुलाम अली खाँ (१९६८), सिनेदिग्दर्शक सत्यजित राय (१९९२), गायिका शमशाद बेगम (२०१३)
---
जागतिक ग्रंथ दिन
जागतिक प्रताधिकार दिवस
संयुक्त राष्ट्रांचा इंग्रजी भाषा दिन
१९२७ : 'बालदिना'ची सुट्टी साजरी करणारा टर्की हा पहिला देश ठरला.
१९४२ : हिटलरपासून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेला ज्यूवंशी लेखक श्टेफान झ्वाईग आणि त्याची पत्नी यांनी आत्महत्या केली (२२ किंवा २३ एप्रिल). वाढती असहिष्णुता, वर्चस्ववाद आणि नाझी विचार यांमुळे मानवजातीच्या भविष्याविषयी सर्व आशा संपुष्टात आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. "I think it better to conclude in good time and in erect bearing a life in which intellectual labour meant the purest joy and personal freedom the highest good on Earth"
१९६७ : अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह याला घेऊन रश्याचे अंतराळयान सोयुझ-१ अंतराळात.
१९७१ : रझाकार आणि पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आता बांग्लादेश) मध्ये ३००० हिंदूंची कत्तल केली.
१९८४ : एड्स होण्यामागे कारणीभूत असणाऱ्या एच.आय.व्ही. विषाणूचा शोध.
१९९३ : मतदान करून एरित्रियनांनी इथिओपियापासून स्वातंत्र्याचा कौल दिला.
२००५ : 'यूट्यूब'चा सहनिर्माता जावेद करीम याने पहिला व्हिडीओ यूट्यूबवर चढवला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- Rajesh188
प्रतिक्रिया
अपेक्षित
खरोखर दाद द्यावी अशी बातमी. हेच धोरण उन्हाळ्यापर्यंत राबवले की 'शिवनेरी' अधिक तोट्यात जायला हरकत नाही. सरकारी निर्बुद्ध बाबुगिरीचे एक खास उदाहरण.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आधीच
आधीच स्वारगेट-बोरिवली बसला प्रायव्हेटचे भाडे ३५०/- असताना शिवनेरीचे ४३५ ठेवून पायावर धोंडा पाडून घेतलाच आहे. आता चटके देऊन गिर्हाईके पळवून लावा.
संपूर्ण भारताचेच एक 'मेंटल हॉस्पिटल' झाले आहे असे वाटते.
हा हा
पडदे काढून टाकले की प्रवासी कमी होतील. आणि मग एखादीच तरुणी आणि साताठ पोरांचं टोळकं एवढेच लोक प्रवास करत असण्याची शक्यता वाढेल.
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता केवळ 'पॅचवर्क' करणे हे तर सरकारी कामांचे वैशिष्ट्य आहे.
जोवर अपराध करणार्यांच्या मनात आपण पकडले जाऊ शकतो ही आणि त्यानंतर होणार्या शिक्षेबद्दल भीती निर्माण होत नाही तोवर ते अपराध करतच राहणार. ह्याबाबत अमेरिकेतील वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण अतिशय चांगले आहे. मुळात वाहतुकीचे नियम तोडल्यावर होणारी शिक्षा जबर आहे. त्यामुळे इथे कोणी सहसा वाहतुकीचे नियम तोडताना आढळत नाही. मी सध्या ज्या शहरात राहतो तिथे 'Yield to pedestrians' हा नियम सगळे वाहनचालक काटेकोरपणे पाळतात असा माझा अनुभव आहे. चालणार्या माणसाने पदपथावरून रस्त्यावर पाऊल टाकल्यावर वाहने त्याच्यापासून जवळपास चार फूट अंतरावर थांबतात. जर आईवडील हा नियम काटेकोरपणे पाळत असतील तर मुलांवर आपोआपच वाहतुकीचे नियम पाळण्याचे संस्कार होतात. सुरुवातीच्या पिढीला कदाचित जाचक वाटतील असे हे नियम पुढच्या पिढ्यांसाठी स्वाभाविक होऊन जातात. इथे येणारे भारतीय लोक भारतात कदाचित कधीही नियम पाळणार नाहीत पण इथे झक्कत पाळतात, त्याचे कारण नियम न पाळल्यास दणकून होणारा दंड. अशी न्यायव्यवस्था/दंडव्यवस्था भारतात अस्तित्वात येणे गरजेचे आहे. जेणेकरून माणसाने अपराध करण्याआधी दहादा विचार करावा.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा 'नक्की' आणि 'लगेच' होणारी शिक्षा अधिक दहशत बसवते असे वाटते. बाकी सहमत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे बाकीच्यांना दहशत बसवणे हेच आहे असे वाटते. ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर 'जे खळांची व्यंकटी सांडो'.
त्यामुळे नक्की आणि लगेच होणारी शिक्षा गरजेची आहेच, परंतु कुठेतरी असे देखील वाटते की जबरी शिक्षा असेल तर दहशत अधिक बसेल. कारण शिक्षा 'नाममात्र' देखील असू शकते आणि तिने काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
सर्कार्चा इजय सो!!!!
सर्कार्चा इजय सो!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सो व्हॉट ?
काय फरक पडतो ?
एखाद्या स्लिपर कोच मधून जाताना आपण १०००/- रुपड्याचे तिकिट काढलेले असून देखील पांघरुण घरुनच घेऊन जातो की. तसेच हवा असेल तर पडदा देखील घरुनच घेऊन जायचा. हाय काय आन नाय काय !
बाकी बाहेरच्यांना दिसू नये असे पडदा लावून लोकांना शिवनेरीत करायचे तरी काय असते?
सरकारने तत्परतेने काही का होईना पण अॅक्शन घ्यायला सुरुवात केली ह्यासाठी आपण सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव इथे आणायला हवा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
१००० रुपये वाले स्लिपर कोच
१००० रुपये वाले स्लिपर कोच वाले माजोरडे दिसतात. ७००-८०० वाले पांघरुण पण देतात.
असो
बातमी वाचुन मजा वाटली. एकुणच नको ते निर्णय घेण्यात सरकार पुढे असते
अंमळ गल्लत होते आहे का ?
मी ते पांघरुण देत नाहीत असे कधी म्हणालो ? मी फक्त आपण घरुनच घेऊन जातो असे म्हणतो आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
पुर्ववत
काही काळानंतर हे सर्व पुर्ववत होईल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
फालतुगिरीला मर्यादा नाही
सरकार काय करेल ह्यचा काय नेम नाही. सकाळी सकाळी उठ्ल्यावर "आज कुछ तुफानी करते है" असे वाटत असावे.