मराठी भाषा दिन व भाषाभ्रम

मराठी भाषादिनानिमित्त टिप्पण करणारा डॉ. प्रकाश परब यांचा एक रोखठोक लेख मराठी भाषा दिन व भाषाभ्रम लोकसत्तात वाचला. मराठी भाषा अस्तंगत होते आहे, आणि काहीतरी जनजागृती उत्सव करून ती टिकेल हा भ्रम आहे असा लेखाचा रोख आहे. लेख मुळातच वाचावा, पण सारांश खाली मांडतो आहे
- मराठी दिनानिमित्त शुभेच्छांचा पाऊस पडतो, भाषेचा अभिमान असल्याचं जाहीर होतं, पण खरं चित्र काय आहे? इंग्रजी ही लोकभाषा व ज्ञानभाषा होणार आहे हे सत्य आपण 'पोपट मेला' प्रमाणे उच्चारायचा धीर करत नाही.
- मराठी ही ज्ञानभाषा कधीच होऊ शकणार नाही हे मान्य करायला हवं, कारण ती शिक्षणभाषा म्हणूनही टिकू शकलेली नाही. जी ज्ञानभाषा नाही ती जागतिकीकरणाच्या धबडग्यात टिकूच शकणार नाही.
- मराठी भाषा टिकवण्याचा प्रश्न सामाजिक किंवा सांस्कृतिक नाही - तर आर्थिक आहे. जी भाषा अर्थार्जन पुरवू शकत नाही तिची पाळंमुळं दुर्बळ होणार. आणि कधी ना कधी तो वृक्ष उन्मळून पडणार.
- भाषा सुदृढ नसताना ती आहे असं म्हणत राहणं धोकादायक आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर मराठी शाळा मरताना दिसतात, मराठी महाविद्यालयांना अवकळा आलेली आहे. हा ऱ्हास थोपवण्यासाठी सरकारने काही करणं अत्यावश्यक असूनही सरकार निष्क्रिय आहे. इतर भाषांबाबत हे प्रयत्न होताना दिसतात.
- स्वभाषा हे मूल्यच राहिलेलं नाही.

या मांडणीकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे हे निश्चित. गेली तीसपस्तीस वर्षं तरी मराठी मरत चालली आहे, आजकाल कामवाल्या बायकांनाही त्यांची मुलं इंग्लिश शाळेत घालण्याचा सोस असतो वगैरे ऐकू येतं आहे. त्याचबरोबर आपल्याला परबांनी म्हटल्याप्रमाणे अनेक शाळा सेमीमराठी होताना दिसताहेत. यावरून मराठी भाषा पुढची पन्नास-शंभर-दोनशे-पाचशे वर्षं टिकेल असं म्हणता येईल का? ऐसीकरांना याविषयी काय वाटतं?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

यावरून मराठी भाषा पुढची पन्नास-शंभर-दोनशे-पाचशे वर्षं टिकेल असं म्हणता येईल का? ऐसीकरांना याविषयी काय वाटतं?

आर्थिक कारण योग्य व पटण्याजोगे आहेच
मला समजणारी, मला व्यक्त व्हायला पुरक अश्या भाषेचा अभ्यास / भाषेतून संभाषण कमी होत जाईल याबद्दल वाईट वाटेलच - वाटतही. पण ते तितक्यापुरतंच. जर मराठी मरायची असेल तर ती मरेलच. तिला जरा अधिक काळ वा अधिक मानाने जगवायचे काही उपाय सुचतातही पण ते होणे नाही, त्यामुळे निसर्ग आणि मातृभाषा वगैरे वाचवण्याच्या वल्गना करायच्या / आरोळी द्यायच्या निरर्थक फंदात मी पडायचे नाही असे ठरवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला समजणारी, मला व्यक्त व्हायला पुरक अश्या भाषेचा अभ्यास / भाषेतून संभाषण कमी होत जाईल याबद्दल वाईट वाटेलच - वाटतही.
मराठी का (आणि कशी) मरत चालली आहे यावर सदर वाक्यातून काही प्रकाश पडतो, असे वाटते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

परबांचं म्हणणं मी वरती मांडलं. पण मला नेहमीच प्रश्न पडतो की भाषेसारख्या बाबतीत ती वृद्धिंगत होते आहे की तिचा ऱ्हास होतो आहे याची मोजमाप कशी करावी?

- प्रमाणभाषा लिहिता बोलता येणारांची संख्या. - ही तर गेली काही दशकं वाढतानाच दिसते आहे. (इथे मी टक्केवारीपेक्षा अॅब्सोल्यूट संख्या मोजतो आहे)
- प्रमाणभाषेत निघणाऱ्या दैनिकांचा खप - हाही वाढतच गेलेला असावा असा अंदाज आहे.
- प्रमाणभाषेत शिक्षण घेणारांची संख्या - हीही वाढते आहे बहुतेक. कारण शहरी भाग सोडला तर अजूनही शिक्षण मोठ्या प्रमाणावर सरकारी शाळांतूनच होतं.
- प्रमाणभाषेत होणारं साहित्यिक लिखाण - याबद्दल मला कल्पना नाही.
- प्रमाणभाषेत होणारं दूरचित्रवाणी प्रसारण - हे वाढलेलं आहे. अनेक चॅनेल्स मराठीतच असतात. दर्जाविषयी काही बोलत नाही, पण संख्या वाढलेली आहे.

यापलिकडे काही मोजमाप करता येण्यासारखे निकष आहेत का? मुळात हे निकष तरी लागू आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमकं!

फक्त

प्रमाणभाषेत शिक्षण घेणारांची संख्या - हीही वाढते आहे बहुतेक. कारण शहरी भाग सोडला तर अजूनही शिक्षण मोठ्या प्रमाणावर सरकारी शाळांतूनच होतं.

याबद्दल साशंक आहे. मात्र अर्थातच विदा बघावा-शोधावा लागेल

बाकी, मुळात भाषा मरणं म्हणजे काय? हा त्या मेघनाच्या धाग्यावर टाकलेला प्रश्न पुन्हा टाकतोय.
त्या प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे, भाषा बोलीभाशा म्हणून मोठ्याप्रमाणात वापरली जात असेल मात्र त्यात आर्थिक गणितांमुळे त्यात मोठ्या प्रमाणात सकस साहित्यनिर्मिती होत नसेल तर भाषा जिवंत की मृत म्हणावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुसरा प्रश्न मला पडतो तो म्हणजे 'ज्ञानभाषा नसल्यास मृत्यू' हे गृहितक कितपत सत्य आहे? स्थानिक संवादांसाठी एक भाषा आणि व्यवहारासाठी दुसरी भाषा असं द्वैभाषिकत्व अनेक जण प्रयत्नांनी स्वीकारू शकतात. म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच भाषा मावण्याची जागा असते, तेव्हा इंग्लिश वाढली की मराठी नष्ट होणार असा झीरो सम गेम का गृहित धरावा?

समजा, पुढे कधी असं तंत्रज्ञान निघालं की ज्यायोगे मी मराठीत बोललो तर समोरच्याला ते कामचलाऊ इंग्लिशमध्ये (अगर कुठच्याही हव्या त्या भाषेत) ऐकू येईल. मग इंग्लिशच शिकली पाहिजे हा अट्टाहास कमी होणार नाही का? शंभर वर्षांपूर्वी अशा तंत्रज्ञानाची कल्पनाही संभवत नव्हती. आता तशी कल्पना करता येते. मग तंत्रज्ञानामुळे भाषा टिकून राहील, व लोक अधिक सहजपणे बहुभाषिक होतील हे शक्य नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा, पुढे कधी असं तंत्रज्ञान निघालं की ज्यायोगे मी मराठीत बोललो तर समोरच्याला ते कामचलाऊ इंग्लिशमध्ये (अगर कुठच्याही हव्या त्या भाषेत) ऐकू येईल. मग इंग्लिशच शिकली पाहिजे हा अट्टाहास कमी होणार नाही का? शंभर वर्षांपूर्वी अशा तंत्रज्ञानाची कल्पनाही संभवत नव्हती. आता तशी कल्पना करता येते.

असल्या तंत्रज्ञानातून आंतरराष्ट्रीय / आंतरभाषिक गैरसमज - आणि तेही प्रमाणाबाहेर - वाढण्याचीच शक्यता अधिक. (कधी गूगल ट्रान्स्लेटर वापरलाय काय?)

त्यापेक्षा, नकोच ते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Engelberg, स्वित्झर्लंड येथील हॉटेल रूममधे:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा गोष्टी पाहिल्या की अधूनमधून यांत्रिक भाषांतरकारांबद्दल वाटणारं चुकार भयही नाहीसं होतं आणि निदान १० वर्षं तरी भाकरीची ददात पडणार नसल्याचं सुख दाटून येतं.

गवि, आभारच आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुढे कधी असं तंत्रज्ञान निघालं की ज्यायोगे मी मराठीत बोललो तर समोरच्याला ते कामचलाऊ इंग्लिशमध्ये (अगर कुठच्याही हव्या त्या भाषेत) ऐकू येईल.

मला वाटतं इथे तुम्ही उलट विचार करत आहात. असे तंत्रज्ञान येण्यासाठी मराठीला महत्त्वाची भाषा हे स्टेटस आधी मिळवावे लागेल. अशा वेळी इतर लोक मराठी शिकतील. फ्रि मार्केट वाल्यांनी इथे मला समर्थन देणं अपेक्षित आहे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

असं तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे. संसदेतही ते वापरलं जातंय. अजून पुरेसा प्रसार झालेला नाही इतकंच. जनसामान्यांना ते उपलब्ध होण्यासाठी काळ जावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

संसदेत म्हणजे सरकार, म्हणजे फ्री मार्केट नाहीच! Wink

इंटरेंस्टिंग आहे. अधिक माहिती काढायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

इंडिक लँग्वेज प्रोसेसिंग इतके कटिंग एज इ. असेल याबाबत शंका आहे. इतर बहुतेक शास्त्रशाखांप्रमाणेच इथेही भारतीय भाषा इंग्रजीच्या मागे आहेत.

याबद्दल जमेल तशी अधिक माहिती कॄपया द्यावी अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विकीच्या पानावरुन मिळालेल्या दुव्यावरील हि परिक्षा भाषेचा कस(सद्य परिस्थितीचे आकलन) शोधण्यात मदत करण्यास उत्तम आहे असे वाटते.

स्वतःपुरते - साधारण ३ पिढ्यांमधील स्वभाषेत संवाद साधण्याची क्षमता सांख्यकी शोधल्यास भाषा कुठल्या पंथाला लागली आहे हे लक्षात येऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कळीचा प्रश्न. माझ्या डोक्यात या प्रश्नांबद्दल बरेच गोंधळ आहेत, हे आधीच स्पष्ट केलेलं उत्तम. तरी यावर म्हणायचंही चिकारच आहे.

- मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे (मायमराठीच्या नावानं कढ काढण्याहून निराळे) आणि तोटे (इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नसणे या तथाकथित गंडाहून निराळे) पुरेशा प्रमाणात चर्चिले जात नाहीत, असं एक निरीक्षण. (पालकनीतीच्या अंकाचा दुवा देऊ नये. तो वाचला आहे. पण तो काही मुख्य धारेतल्या माध्यमांमध्ये मोडत नाही, हे आपण स्वीकारू या.)

- एका मित्राच्या निरीक्षणानुसार दहावीपर्यंतचं सगळं शिक्षण मातृभाषेत घेण्याचा पर्याय देणार्‍या काही मोजक्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. निदान तूर्तास परदेशात स्थायिक होऊ पाहणार्‍या पिढीच्या प्राथमिक शिक्षणाच्या काळात तरी होता. इतर राज्यांतून असा पर्यायच असत नाही. (या विधानाच्या पुष्ट्यर्थ विदा नाही. कुणाकडे बाजूनं वा विरोधातही असला, तर प्लीज द्या.)

- माझ्या शहरात माझी मराठी माध्यमाची शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहे. काही मराठी शाळा आधीच बंद पडल्या आहेत. आजूबाजूच्या लोकांच्या मताचा अंदाज घेतला असता असं दिसतं की,

  • मुलांनी मातृभाषेतून शिकावं असं लोकांना मुळातून वाटतंच नाही. ('आमचं नुकसान झालं, तसं त्यांचं व्हायला नको...' हा एक न्यूनगंडात्मक बचाव. काय नुकसान झालं, या प्रश्नाचं उत्तर 'इंग्रजी बोलता आलं नाही, म्हणून लाज वाटली' इतकंच असतं.)
  • मातृभाषेत शिक्षण देणार्‍या 'चांगल्या' शाळा उपलब्ध नाहीत. (चांगल्या म्हणजे काय, हे कुणालाच धड सांगता येत नाही. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून दिला जाणारा अवांतर गोष्टींवरचा भर पुन्हा पुन्हा उगाळला जातो.)
  • शिक्षणाचं माध्यम आणि साहित्याची भाषा या दोहोंत लोकांची प्रचंड गल्लत होते. (आमची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली, 'तरी' 'स्वामी', 'मृत्युंजय'सारखी 'मोठ्ठाली' पुस्तकं वाचतात.... अशी सारवासारव.)
  • मराठी शाळेत कामवाल्या बायांची (याला मोलकरीण असा शब्द पूर्वी असे. हल्ली... असो.) मुलं येतात. त्यांच्या संगतीत आपल्या मुलांना राहू देणं पालकांना धोक्याचं वाटतं. (शिव्या, घाणेरडी राहणी, मारामार्‍या यांचा संबंध सरळसरळ आर्थिकदृष्ट्या खालच्या वर्गाशी लावला जातो. यात आपण काहीतरी मूलभूत अन्यायकारक बोलतो आहोत, असं कुणालाच वाटत नाही. मग मुलाचा संबंध भोवतालाशी येऊ देण्याची जबाबदारी वगैरे तर दूरच राहिली.)

- या पार्श्वभूमीवर येत्या काही दशकांत माझी भाषा निदान शहरातून तरी हद्दपार होईल, असं मला वाटतं. भाषेचा लवचीक, जोरकस वापर हे आत्मविश्वासाचं एक प्रमुख साधन असणार्‍या मला या परिस्थितीची भीती वाटते. कारण निदान माझ्याकरता तरी हे माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या एक सबळ बाजूचं खच्चीकरण ठरेल.

मात्र हे केवळ भरल्या पोटी केलेलं रूदन आहे की खराच प्रश्न, असल्यास त्यावर तोडगा काय, असा तोडगा काढावा की काढू नये, काढलाच तर तो उपयोगी ठरेल की क्षीण प्रयत्न ठरेल, याबद्दल डोक्यात स्पष्टता नाही. चर्चाविषयाकरता मात्र आभार. वाचतेय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघनाशी सहमत.

न्यूनगंडग्रस्त लोकांचं एक सोडून द्या. पण चांगली मराठी शाळा मिळाली तर पोरांना त्यात घालू अशी भूमिका असलेलेही बरेच लोक आहेत.

सध्या मराठी माध्यमाच्या शाळांत चांगला क्राउड न येणे, शिक्षक चांगले नसणे, इ. अनेक बोंबा आहेत. चांगला क्राउड म्ह. काय अभिप्रेत असते, ते मेघनाने सांगितले आहेच. ढोंगीपणाचा आरोप सहन करूनही परिस्थिती बदलेल, अशी स्थिती नाही. चांगले शिक्षक न उरणे आणि उच्चवर्गाचा फोकस इंग्रजीवर जाणे या दोन कारणांमुळे मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा खालावत आहे. संख्या वाढत असली तरी दर्जा खालावत आहे. माझ्या शाळेच्या अनुभवावरूनही हे मी सांगू शकतो. कमीअधिक फरकाने सगळीकडेच असे होते आहे.

खुद्द मिरजेत दोन हुच्चभ्रू कॉन्व्हेंट शाळा आहेत अन अन्य इंग्रजी माध्यमाच्याही शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांचे ग्लॅमर खुद्द मिरजेत तरी आता आजिबात दिसून येत नाही-पण कधीकाळी तत्रस्थ मध्यमवर्गात बरेच होते. माझ्यानंतरच्या माझ्या शाळेत शिकलेल्या पोरांकडून उत्तरोत्तर अधोगतीचेच रिपोर्ट येताहेत. सांगलीत तुलनेने स्थिती अंमळ बरी असेल असा अंदाज आहे, पण विदा नाही. विचारले पाहिजे. कोल्हापूरबद्दलही काहीसे असेच म्हणता यावे. तुलनेने पुण्यात स्थिती बरीच उत्तम आहे असे वाटते. ठाणे-मुंबैचं माहिती नाही. उरलेल्या महाराष्ट्रातही सांगली-मिरजेत दिसलेला ट्रेंडच दिसून येईल असे वाटते.

शिक्षणक्षेत्राची दुरवस्था सर्वपरिचित आहेच- त्यात परत इंग्रजीच्या तुलनेत मराठी ही सवतीची लेक झाल्यामुळे तिची अजूनच वाट लागली. पुण्यात मराठी शाळांचा एलिटपणा अजून जरा टिकून आहे हे पाहून कसे बरे वाटते. बट ब्याक होम, ऑल ग्लोरी इज लॉस्ट.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगल्या शाळेचे निकष नक्की काय असतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तसे तर बरेच आहेत, पण इन जण्रल अपेक्षा पाहिल्या तर शिक्षक चांगले असणे, क्राउड 'चांगला' येणे व बेशिक सोयीसुविधा ठीकठाक असणे, विविध परीक्षा घेणे, इ. निकष मुख्य ठरावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेघनाचा आय्डी अरुण जोशींनी चोरलाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खून चोर्‍अय दरवडेखोरी ह्यांचे शिक्षण शाळेत न मिळणे.
शाळेतील मुले विविध स्पर्धांत आपणहून भाग घेत असणे.
काही ना काही करण्यास त्यांना वाव मिळणे.
जे अभ्यासात हुशार असतील त्यांना त्यात ऑलिम्पियाड, ntse वगैरे कडे उपलब्धी असणे.
सर्व चुलीत जाउ दे.
निदान मुले पास होणे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या मते, जी शाळा सगळ्यांना आर्थिक व मानसिक पातळीवर झेपेल अशी.
मी ज्या शाळेत शिकलो ती तरी बरेच अर्थी तशी होती.
आज मराठी माध्यामीक शाळेमध्ये आठ्वी पर्यंत परीक्षा बंद केल्यायेत "सो निदान मुले पास होणे!" हा मुद्दा बाद.

वाईला एक मराठी शाळा बघितलेली दुवा. पुण्यातपण ग्राममंगलची एक शाळा आहे.

या शाळांमध्ये जो शिकवण्याची पध्द्त आहे ती मुर्त कडुन अमुर्त (concrete to abstract) अशी आहे.ही पध्द्त मला पटते. उलट अमुर्त कडुन मुर्त गेल्यास माती/वस्तुस्थीती शी समंध तुटायची शक्यता नाकारता येत नाही.
उदा. आलेख शिकवातांना वेगवेगळी झाडं मोजुन या आणि त्याचा पाय-चार्ट बनवा.
माझा असा अंदाज आहे की या अश्या शाळेत शिकलेल्यांना मी इंटीग्रेशन/ डेरिव्हेटीव्ह का शिकलो? हा प्रश्न कधीही पडणार नाही.

वाईच्या शाळेत सगळी मुलं-मुली गरीब कष्ट्करी वर्गातील आहेत आणि सगळीच्या सगळी स्कॉलरशिप ची परीक्षा पास होतात. २-३ मेरिट.
२-३ चे विद्यार्थी ज्या कविता करतात त्या वाचुन ऐसीकरांना देखिल कॉप्लेक्स यावा अश्या. व्यक्तीस्वातंत्र/ओपनकल्चर इतकं की मी तिकडे माझा आवडता प्राणी गाढव हा निबंध पण वाचला, सगळे निंबध नोटीस बोर्ड वर पोस्ट केले जातात.
परत कधी गेलोच तर असं काही पोस्ट करतो ऐसीवर. इंग्रजी पण विद्यार्थांना व्यवस्थीत जमते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लीज लिही याबद्दल. हा सॉलिड रोचक विषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

२-३ चे विद्यार्थी म्ह्न्जे दुसरी-तिसरीचे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चेमध्ये गप्प बसायचे ठरवले होते.
पण एकूणात काय दिसते आहे आसपास, माझ्या शहरात ते सांगतो.
पुण्यात नूमवि, मुंबैत बालमोहन ह्या बर्‍यापैकी नावाजलेल्या, जुन्या शाळा आहेत असे ऐकले आहे.
तशीच माझ्या शहरातली माझी शाळाही जुनी, नावाजलेली.
स्वातंत्र्यसैनिकांनी १९१४ साली स्थापन केली. अत्यंत सचोटिचे लोक चालवतात म्हणून नावाजलेली गेलेली .
अत्यंत आघाडीची शाळा.मी मराठी मिडियमात शिकलो.
बारावी नंतर फारसा संपर्क राहिला नाही. माझा मी गुंगून गेलो.
आता दशकभरानं जे काही पाहिलं त्याने मोठाच धक्का बसला.
शाळेचा बट्त्याबोळ, खेळखंडोबा झालेला आहे.
तेथील मुले गरिब आहेत ही तक्रार नाहिच.
(आमच्या वेळीही सारे काही श्रीमंत नव्हते. अगदि गरिबाघरचेही होते बरेच; काही श्रीमंत, बरेचसे मध्यमवर्गीय व त्याहून अधिक आमच्यासारखे निम्नमध्यमवर्गीय.)
आता गरिब मुलेच जात आहेत ही तक्रार नाही हो.
एकूणात शाळेचा रिपोर्ट पाहिला. अवस्था पाहिली.
बघवत नाही.
स्लँग भाषेत बोलायचं तर शाळेची मारल्या गेली आहे वाईट.
इतर मित्रांशी बोललो. त्यावेळचे आमचे विविध स्पर्धापरिक्षा, वक्तृत्व स्पर्धा , वगैरे मधले कट्टर स्पर्धक अशा विविध जिल्ह्यातील मित्रांशी बोललो. त्यांच्या जिल्ह्यांतही अशा ज्या कुठल्या शाळा होत्या, त्यांची अवस्था काही फार वेगळी नाही.
नक्की होतय ते चांगलं, वाईट ठाउक नाही.
कशामुळे होतय हे ही ठाउक नाही. (आधी कोंबडी की आधी अंडं ?)
पण काहीतरी खतरनाक होतय खास.
बरं ; "प्रत्येकच पिढीला आपल्या वेळची शाळा आता राहिली नाही; असं वाटतच असतं " ही घिसीपीटी लाइन मारुन समाधानही करुन घेता येत नाही.
कारण?
माझे वडील व आजोबा हेसुद्धा त्याच शाळेत काहीकाळ शिकले होते.
त्यांचीही मतं मोठी झाल्यावर नोकरी धंद्याला लागल्यावर अशीच होती की "आपली शाळा चांगली आहे.
आपल्या पोराला तिथेच घालू" तेच वाक्य म्हणायची माझी हिम्मत होत नाही.
माझे वदील, ज्यांनी पन्नासेक वर्सहपूर्वी शाळा पाहिली असेल्,त्यांच्या बालपणी व नंतर माझ्याही बालपणी त्यांनी पाहिली; त्यांचेही म्हणणे आहे की शेवटच्या ज्या काही धद बॅचेस ह्या शाळेतून बाहेर पडल्या त्यापैकी तुझी एक.
नंतर साराच आनंदी आनंद झालाय.
मुले गरिब आहेत, हा प्रॉब्लेम नाहिच.
काहीतरी त्याहून भयंकर आहे.
शाळेचं रिपोर्ट कार्ड गंडलय.
वातावरण नासलय.
हे इतरही जिल्ह्यांत होतय असं माझ्या एकेकाळच्या स्पर्धक मित्रांचं त्यांच्या मराठी माध्यमाच्या शालांबद्दल मत आहे.
.
.
पुन्हा तेच, बदल होतोय तो(मराठी कडून इंग्लिश कडे जाणारा मध्यमवर्ग वगैरे) चांगलं - वाईट मी काहिच म्हणत नाहिये.
पण शाळांचा बट्ट्याबोळ होतानाही
"हॅ हॅ हॅ...सगळ्याच पिढ्यांना असच वाटतं" असं म्हणणारी पाद्री लाइन तोंडावर मारु नका प्लीझ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यग्झाक्टली हेच म्हणायचे होते. मराठी शाळांची वाईट्ट मारल्या गेली आहे एकदम असा रिपोर्ट सगळीकडून येतो आहे. शिक्षकांची क्वालिटी हे एक महत्त्वाचे कारण त्यामागे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवांतरः कदाचित मराठी माध्यमाच्या शाळा असा धागा वेगळा काढावा लागेल.

"शिक्षक 'आनिपानी' बोलतात / मावा खातात." आणि "शाळेत झोपडपट्टीतली, कामवाल्या बायांची मुलं येतात." हे सोडून शाळांवर नक्की आक्षेप काय आहेत? आमची शाळा आमच्या काळातही फार थोर नव्हती. 'माळ्यासाळ्यांची शाळा' असंच तिचं विशेषण होतं. अतिशय गरीब घरातली मुलं शाळेत येत असत. मुलं जनरली करतात, ते सगळे धंदेही करत असत (शाळेतून पळून जाणे, शाळेचे पंखे वाकवून ठेवणे, पोरापोरींची लफडी होणे.. इत्यादी). तरीही इतर अवांतर गोष्टीही बर्‍याच चालत. रामायणाच्या परीक्षा, टिमविच्या परीक्षा, चित्रकलेच्या परीक्षा, संस्कारवर्ग, कराटे, मल्लखांब, राज्य पातळीपर्यंत पोचलेला खोखोचा संघ... अनेक.

मला माझी शाळा फार थोर होती असं वाटत नाही, तसंच फार नासलेली इत्यादी होती असंही वाटत नाही. उलट माझ्यासारख्या चष्मिष्ट पोरांना एक प्रकारे एक्स्पोजर होतं. माझं शाळेमुळे काहीच नुकसान झालं असं वाटत नाही.

मग 'चांगली' शाळा या गोष्टीचे निकष तरी नक्की काय आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"शिक्षक 'आनिपानी' बोलतात / मावा खातात." आणि "शाळेत झोपडपट्टीतली, कामवाल्या बायांची मुलं येतात."

या दोहोंचे प्रमाण पूर्वीपेक्षा बर्‍यापैकी वाढून

तरीही इतर अवांतर गोष्टीही बर्‍याच चालत. रामायणाच्या परीक्षा, टिमविच्या परीक्षा, चित्रकलेच्या परीक्षा, संस्कारवर्ग, कराटे, मल्लखांब, राज्य पातळीपर्यंत पोचलेला खोखोचा संघ... अनेक.

याचे प्रमाण बर्‍यापैकी कमी झाले असेल तर? म्ह. जण्रल परीक्षा सोड, पण टिमवि, एनटीएस , इ. परीक्षांबद्दल म्हणतोय.

अन मुख्य म्हंजे असा फीडब्याक काही शिक्षकांकडूनच मिळत असेल तर चिंतेस वाव नक्कीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता हा युक्तीवाद मानायचा तर कामवाल्या बायांची पोरंदेखील इंग्रजी शाळांत जातात. मग आम्ही आमची मुले फ्रेंच शाळेत घालायची काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी अजूनही माझ्या लेकीला कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालायचे हे नक्की केले नाहीये.

पण एक विचार मी करते. आपल्या पालकांच्या पिढीने (निदान त्यातील बहुतांशी) पोरांना शाळेत घालताना फार काही गहन विचार केला नव्हता. शिकवायचे आहे, घराजवळ, फी परवडते, आजूबाजूचे, नात्यागोत्यातले बरेचसे जण आपली मुले इथे घालताहेत वगैरे निकष वापरून शाळा निवडल्या.

आपण शिकून नोकर्‍या शिकायला बाहेर पडेपर्यंत नुकतेच जागतिकीकरणामुळे नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या होत्या, आणि मागणी भरपूर असल्याने आपण लगेच कुठे ना कुठे कामाला लागलो, यथावकाश स्थिरावलो.

पण आपल्या पुढची पिढी जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडेल तेव्हा जागतिकीकरण ही गोष्ट जुनी झाली असेल, शिकणार्‍यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने पुरवठा सुद्धा वाढला असेल अशा वेळी त्यांना जर स्पर्धेत टिकायचे असेल तर आपण जे काही, जितके काही आणि मुख्य म्हणजे "ज्या पद्धतीने" शिकलो तेवढं पुरेल? मला नाही वाटत!

एक काळ होता (१९६० वगैरे) फक्त B.A. झाले असेल तरी उत्तम नोकरीची हमी असायची, आज माझ्याकडे काम करणार्‍या बाईचा मुलगा B.A. होऊन फुटकळ सिक्युरिटी गार्डची नोकरी करतोय.

त्यामुळे मी १५-१६ वर्षांनी काय लागेल याचा विचार करतेय.

माझा "चांगली शाळा" चा निकष. (शिक्षक आणि इतर येणारी मुले हेही आहेतच)

१. मिळणार्‍या सुविधा, त्यांचा दर्जा - यात मी पायाभूत सुविधा म्हणतेय (मी ज्या शाळेत गेले तिथले स्वच्छतागृह - हरहर - आठवले तरी अंगावर काटा येतो).
२. शिकवण्याची पद्धत - फक्त सरधोपट पोपटपंची न करता मुलांना आकलनशक्तीला वाव देणारे - अर्थात हे मी कितपत निवडू शकेल आणि भारतात असे चांगले पर्याय असतील का हे अजून माहीत नाही. एक उदाहरण देते - माझी भाची सध्या परदेशामध्ये आहे, तिथल्या पहिलीमध्ये जाते. त्यांना "अल्फाबेट" शिकवून झाल्यावर स्पेलिंग किंवा व्याकरण न शिकवता सध्या फक्त एखाद्या शब्दातले स्वर उच्चारावरून ओळखून तसे लिहायला सांगतात. (मुळात लिहीणे फारसे नसतेच, वाचन आणि आकलनावर भर) त्यामुळे तिने "आंटी" चे स्प्लेलिंग - anti असे लिहीले तर ते बरोबर असते. पुढच्या वर्षी त्यांना योग्य स्प्लेलिंग काय आणि ते तसे असण्याचे कारण अशा पद्धतीने शिकवले जाणर.

आठवा, आपल्याला इंग्रजी कसे शिकवले गेले? स्पेलिंग पाठ करा, व्याकरणाचे नियम पाठ करा. सगळे पाठ करा. अरे पण "असे का?" हे समजावून सांगायचे का?

३. पुस्तकाबाहेरचे पण समाजात वाप्रताना उपयोगी पडणारे शिक्षण सुद्धा असावे. एक सुजाण नागरिक होण्याची सुरूवात तिथे व्हावी.

अजून पण आहे पण आता टायपायचा कंटाळा आला.

हे वरचे आणि शिवाय घरापासून असणारे अंतर, मला परवडेल अशी फी असणे असे बरेच निकष आहेत.

सर्वात जास्त निकष पुर्ण करणारी शाळा निवडणार, माध्यमाने निदान प्राथमिक शिक्षणात तरी काडीचाही फरक पडत नाही असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मराठी बालमोहन अजून चालू आहे?
बहुतेक नसावी. इंग्रजी माध्यम चालू करण्याचे कारण 'आतल्या गोटातून' कळले ते असे- 'मुले ज्या घरांतून येतात तो वर्ग बदलला. मध्यमवर्गी,सुशिक्षित पालक आता बालमोहनसारख्या प्रतिष्ठित शाळेतही मराठी माध्यमामुळे मुले घालत नाहीत.'
नूमवित गणित- विज्ञान इंग्रजी माध्यमात आहे असे ऐकले आहे ते खरे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नूमवित गणित- विज्ञान इंग्रजी माध्यमात आहे असे ऐकले आहे ते खरे आहे का?

नूमवित गणित-विज्ञान (आठवीपासून पुढे) इंग्रजी माध्यमातून (सक्तीचे - वैकल्पिक नव्हे!) गेला बाजार पस्तीस ते चाळीस वर्षांपूर्वीपासून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर बॅटमॅन यांनी विचारल्यामुळे एक अनुभव. सध्या तिथे रहात नसल्याने माझ्या सांगलीतील शाळेची सद्यपरिस्थिती नक्की ठाऊक नाही, पण आंम्ही खेळायचो त्या मैदानावर प्रचंड बांधकामे केली आहेत. पॉलिटेक्निक काढले आहे. आमच्या वेळी कानडी भाषेचा प्रभाव शिक्षकांच्या बोलण्यावर जाणवायचा, ते आता जरा नीट मराठी बोलत असावेत असा अंदाज आहे. (उदा. मी त्याला मारलो) त्या शाळेत सध्या प्रवेश सहज मिळतो अशी माहिती आहे.
भावाने सांगलीत त्याच्या मुलाला इंग्रजी माध्यमात व मुलीला मराठी माध्यमात घातले होते. या वर्षी मुलीलाही ईंग्रजी माध्यमात घातले आहे. त्यासाठी बराच आटापिटा केला, पण नोकरी बदलली तर प्रोब्लेम नको असा विचार केला. त्याला येत्या वर्षी महाराष्टराच्या बाहेर जावे लागणार आहे.
माझी मुले मात्र पुण्यात प्रयोगशील मराठी शाळेत जातात. त्यांचे ईंग्रजी बर्याच ईंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांच्यापेक्षा बरे आहे असे वाटते. पुढे तर ते आणखीनच चांगले होईल. त्यामुळे निर्णय ठीकच आहे. त्यांच्या पुण्यातील मराठी शाळांना तरी काही घरघर लागलीय असे वाटत नाही.
- स्वधर्म.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'प्रयोगशील मराठी शाळा'?

ही कुठे आहे आणि कशी आहे? नाव वेगळंच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पेप्रातून अशा मिळतात वाचायला कधीमधी.
पण त्या आपल्या आसपास कधीच नसतात.
मुद्दा पुन्हा सिद्ध होतो.
"ही बघा, ही मराठी शाळा चांगली आहे.(कींवा निदान वाईट नाही)" असे वेगळे सांगावे लागते.
आसपासच्या जितकय मराठी शाळा असतात त्या बाय डिफॉल्ट गंडलेल्या असतात असे आता वाटायला लगले आहे.
(हा पहिल्यांदा मला धक्का होता. अगदि अलिकडपर्यंत असे काही असते ह्याचा मला पत्ता नव्हता.
खुद्द माझ्या शाळेची ब्यांड वाजलेली पाहिल्यावर तर चक्कर आली.)
बाकी जातीयवादी वगैरे आरोप अस्ले तर ते चुकीचे आहेत हे संगू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'प्रयोगशील मराठी शाळा'हे विषेशण आहे, नांव नव्हे.
मुलगा वर सिफर यांनी उल्लेख केलेल्या ग्राममंगल संस्थेच्या 'लर्निंग होम' या शाळेत आहे. ती पुण्यात कोथरूडला गांधी भवन शेजारी आहे. नुकतेच शाळेचे एक प्रदर्शन झाले. दरवर्षी फेब्रुवारीमधे असते. तिथे मुलांचे या वर्षी केलेले काम पहायला मिळते. वर आणखी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लेखन-वाचनावर भर नसतो. मुलगी पुण्यातील 'अक्षरनंदन' या शाळेत आहे. तिकडे मात्र पाठ्यपुस्तके व लेखन-वाचनावर बर्‍यापैकी भर असला, तरी प्रकल्प पद्धतीने शिकवले जाते.
एकंदर अनुभव पाहता, मी मुलांना ईंग्रजी माध्यमात न घालता मराठी शाळांत घातले या गोष्टीच्या तोट्यांपेक्षा फायदे आधिक झाले असे वाटते. म्हणजे माझ्या मुलांचा माझ्या आईवडीलांशी चांगला संवाद आहे. ती जर ईंग्रजी माध्यमात असती तर त्यांच्या विश्वात ईंग्रजी न येणार्‍या आजी-आजोबांना कितपत प्रवेश मिळाला असता? पण हे व्यक्तीसापेक्ष आहे. राहिला मुद्दा ईंग्रजी चांगलं येण्याचा. ईंग्रजी त्यांना बोलायची वेळ येईपर्यंत ते शिकतीलच असे वाटते. अहो, ते पुण्यासारख्या ठिकाणी आताशा ते इतकं वापरलं जाऊ लागलंय, कि त्यासाठी मुलांना ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायची काही गरजच वाटत नाही. बरेच लोक चांगलं ईंग्रजी येणे आणि ईंग्रजी माध्यमातून शिकणे याचा गोंधळ करतात आणि आपल्या मुलांचं शिकणं आनंददायक व्हायच्या ऐवजी ती एक ड्र्जरी होते, असं वाटतं.
-स्वधर्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुत रोचक!

असे काही असणे हे लै आशादायक आहे. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अक्षरनंदनची शिकवण्याची प्रकल्प बेस्ड पद्धत खूप वेगळी आहे, यासाठीच काल पासून शाळेच नाव आठवायचा प्रयत्न करत होतो अन् ते काय क्लिक होत नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच लोक चांगलं ईंग्रजी येणे आणि ईंग्रजी माध्यमातून शिकणे याचा गोंधळ करतात आणि आपल्या मुलांचं शिकणं आनंददायक व्हायच्या ऐवजी ती एक ड्र्जरी होते, असं वाटतं.

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

(इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नसणे या तथाकथित गंडाहून निराळे)

इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नसणे हा गंड तथाकथित वगैरे नसून संपूर्ण खरा आहे. दहावीपर्यंत संपूर्ण मराठी माध्यमात आणि अगदी अकरावी-बारावीलाही मराठीतून भूगोलाचा पेपर असणाऱ्या व टँजंट म्हणजे स्पर्शिका असे समजावून सांगणाऱ्या शिक्षणाचा लाभार्थी असल्याने अस्मादिकांना तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी लागून दोन तीन वर्षे होईपर्यंत इंग्रजी बोलण्याचा काडीचाही आत्मविश्वास नव्हता. या आत्मविश्वासाच्या अभावापायी मुख्य कामासंदर्भात काडीचीही अक्कल नसलेले मात्र इंग्रजीतून पोपटपंची करता येऊ शकणारे अनेकजण नोकरीत बढती वगैरे मिळत गेलेले पाहिले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे अगदी पटलं. पण बिगर-इंग्रजी माध्यमाची शिक्षणपद्धतीच न्यूनगंडावर उभारलेली आहे - कृत्रिम परिभाषा असो, इंग्रजी अभ्यासक्रमाच्या साच्यात वर्नॅक्युलर मसाला भरणे असो, किंवा दैनंदिन वातावरणात कायम तथाकथित आदर्श आणि आकर्षक इंग्रजी माध्यमाशी तुलना असो. सार्वजनिक शिक्षणाची कल्पना भारतात आल्यापासून हेच चालू आहे कारण अँग्लो-वर्नॅक्युलर शिक्षणपद्धतीच या उतरंडीवर उभारलेली आहे.

माझ्या (बोर्डिंग) शाळेत दोन्ही माध्यमं होती - १-१०वी इंग्रजी, आणि ८-१०वी मराठी माध्यम. आधीच बोर्डिंग म्हटल्यावर पैशाचा, वर्गवर्चस्वाचा देखावा असायचाच, पण मराठी माध्यमातील मुलांना "वर्नॅक्स", "घाटी" म्हणून फारच छळलं जायचं. बोर्डिंग्मधे असलेल्या अगदी पैसेवाल्यांनाही हे ऐकावं लागायचं; आसपासच्या गावातून आलेल्या डे-स्कॉलर्सची अवस्था तर जाऊच द्या. आता शाळेत दोन माध्यमं टिकून आहेत की नाही कोण जाणे, पण ठरवून बोर्डिंगला लांब मराठी माध्यमात शिकायला आपल्या मुलांना आता कोणी पाठवत असेल असं वाटत नाही.

आम्ही इथल्या अशाच दोन्ही माध्यमं असलेल्या एका शाळेबद्दल चौकशी केली. एका कोलीग ने सांगितले, की मास्तरच बंगाली माध्यमाच्या मुलांना "तुम्ही ढ आहात, तुमचे पुढे काही होणार नाही कारण तुम्ही इथे आडकला आहात, इंग्रजी माध्यमात तुम्हाला चान्स नाही" असे सारखे सांगून हिणवत होते. शाळा एरवी मात्र काँवेंट विरुद्ध "राष्ट्रीय" "भारतीय" "बंगाली" मूल्ये जपणारी म्हणून नावाजलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मराठी माध्यमातील मुलांना "वर्नॅक्स", "घाटी" म्हणून फारच छळलं जायचं.

मास्तरच बंगाली माध्यमाच्या मुलांना "तुम्ही ढ आहात, तुमचे पुढे काही होणार नाही कारण तुम्ही इथे आडकला आहात, इंग्रजी माध्यमात तुम्हाला चान्स नाही" असे सारखे सांगून हिणवत होते.

असे अनुभव माझ्यासकट अनेकांचे आहेत. ही कसली पराभूत मनोवृत्ती आहे देव जाणे. सुदैवाने अकरावी सायन्सला आल्यावर सुरुवातीच्या ५-६ महिन्यांत हे सगळे ईव्हन आऊट झाले. नंतरही असेच जर होत असेल तर मग इतका आरडाओरडा कशाला काय माहिती.

दहावीला माझ्या वर्गात मी धरून ६० जण होते. सर्वजण शुद्ध मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेले. विशेष अडचण कुणालाच आली नाही इंग्रजीची. साली एक भाषा तर शिकायची आहे, किती बाऊ करावा हैट्ट आहे खरीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असे अनुभव माझ्यासकट अनेकांचे आहेत. ही कसली पराभूत मनोवृत्ती आहे देव जाणे. सुदैवाने अकरावी सायन्सला आल्यावर सुरुवातीच्या ५-६ महिन्यांत हे सगळे ईव्हन आऊट झाले. नंतरही असेच जर होत असेल तर मग इतका आरडाओरडा कशाला काय माहिती.


दहावीला माझ्या वर्गात मी धरून ६० जण होते. सर्वजण शुद्ध मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेले. विशेष अडचण कुणालाच आली नाही इंग्रजीची. साली एक भाषा तर शिकायची आहे, किती बाऊ करावा हैट्ट आहे खरीच.

मी ह्यांना सक्सेस स्टोरिज म्हणेन. अरे तुम्हाला जमू शकतय म्हणून इतरांनाही जमलच पाहिजे असा हट्ट होतोय मित्रा हा.
इंग्लिशमध्ये शिकावे लागणे हा मी नाइलाज मानतो. पर्याय उपलब्ध असताना मी सदैव स्थानिक(मायभाषा नाही; स्थानिकच) भाषेचीच निवड केली असती.
आपल्याला सर्वसाधारण वाटणार्‍या गोष्टी सर्वांनाच तशा वाटतीलच असे नाही.
तुला तपशीलवार विज्ञान/गणित शिकायचय ना ? जा जाउन आधी ती अमुक तमुक भाषा शिकून ये.
असा पवित्रा घेतल्यामुळे कैक लोक जे कदाचित विजान्/गणितात किम्वा अजून कशातही बर्‍यापैकी बरे असू शकले असते; ते दूर राहिलेत.
आपण ते ट्यालंट गमावलय; त्या लोकांनी ती संधी गमावलिय.
असे लोक थोडेच असतील; पण आहेत ना. तेही एका चमत्कारिक कारणामुळे.
त्यांच्यापासून शेकडो हजारो मैल दूर उगवलेली भाशा पुरेशी शिकू शकले नाहित म्हणून.
मला नेमकं सांगता येत नाहिये; पण "एकच तर भाषा शिकायची आहे" हे स्पर्धेतला विजेता म्हणून म्हणणं ठीक आहे.
पण इतरांबद्दल सहानुभूती असावी.

इंग्लिशमध्ये शिकण्यास तूर्तास पर्याय नाही हे दिसत आहे; पण तेच स्वाभाविक आहे; असे मानू नये; असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

इंग्लिशमध्ये शिकण्यास तूर्तास पर्याय नाही हे दिसत आहे; पण तेच स्वाभाविक आहे; असे मानू नये; असे मला वाटते.

स्वाभाविक आहे असा दावा मीही कधी केलेला नाही. पण प्राप्त परिस्थितीत काय 'स्वाभाविक' आहे, ते पाहिलं तर मी म्हणतोय ते लक्षात यावं. तांत्रिक ज्ञान मराठीत आणावं की नै हा मोठ्या लोकांच्या अखत्यारीतला इशय. तसा निर्णय होत नै तवर आपण लाख अपशब्दकोश त्या शिक्षणमंत्र्यासमोर उपडा केला तरी घंटा फरक पडणार नाही. आपल्या हाती उरतं ते फक्त आहे त्या व्यवस्थेत शिकणे. त्याला गत्यंतर नाही.

जर गत्यंतर नसेल तर कुचकुचत बसण्यात प्वाइंट काय, हे मला माहिती नाही. गेट इट ओव्हर विथ असे माझे म्हण्णे आहे. फक्त एक भाषा शिकणे हे लै वाटत असेल तर त्याला माझी सहानुभूती नाही. बहुभाषिक होणे प्रत्येकास जमत नसले म्हणून काय झाले? एक भाषा आत्मसात करणे हे तथाकथित अ‍ॅव्हरेज/रेम्याडोक्या माणसासही सहज जमू शकते. सबब या एका कारणासाठी रडत बसू नये. विशेषतः आपल्या अभ्युदयाच्या आड ते कारण येत असेल तर आजिबात रडू नये. त्यावर आपापल्या परीने मात करून मग परिस्थिती बदलावी, मात्र तोवर रडना मना है.

आणि त्याहीपुढे जाऊन मी विचारतो. सायन्स अन इंजिनिअरिंगमध्ये मराठी माध्यमातल्या पोरांचे आधिक्य असलेल्या शाळाकॉलेजात मी शिकलो. कुणाला काही अडचण आल्याचे तितके वाटले नाही. तुझा अनुभव नक्की किती अन कुठे वेगळा आहे ते ऐकायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक शक्यता - अर्थात वैयक्तीक अनुभव व निरीक्षणातून, बहुतेकवेळेला, इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नसणे, ह्यापेक्षा इन जनरल आत्मविश्वास नसणे हे जास्त होतं, पहिली ते दहावी मराठीतून शिकलेल्या माझ्यासारख्या अत्यंत 'देशी' माणसाला इंग्रजीत प्रवचने देताना काहीही अडचण येत नाही (ऐकणाऱ्याला येत असल्यास.. गेलात उडत) उलट अत्यंत चुकीची माहिती अत्यंत आत्मविश्वासाने सांगितल्यामुळे लोक चुकीचे इंग्रजी गपगुमान ऐकून घेतात याचा स्वानुभव आहे.

भराभर बढती मिळणारे लोक, भरभर इंग्रजी बोलल्यामुळे गेले, कि वरवर दिसणाऱ्या कॉन्फीडन्समुळे गेले याचा अभ्यास रोचक ठरेल.

अवांतर - भरभर इंग्रजी बोलणे आणि बरोबर इंग्रजी बोलणे यातील फरक लोकांना क्वचितच कळतो असे निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेघनाप्रमाणेच माझ्या मनातही गोंधळ आहे ह्या विषयाबद्दल. पण मेली तर मेली, काय फरक पडतो असे वाटत नाही.
वरती राजेश घासकडवींनी जो युक्तिवाद केला आहे तो फसवा वाटतो. प्रमाणभाषा लिहिता-वाचता येणार्‍यांची संख्या वाढली आहे कारण मराठीभाषक असणारा पण लिहिता-वाचता न येणारा वर्ग आता लिहायला शिकू लागला आहे. ह्या आधी असलेल्याच पण दिसत नसलेल्या आणि आता दिसू लागलेल्या गोष्टीला नवीन निर्माण झाल्याप्रमाणे वागवणे चुकीचे वाटते. उलट शहरांमधून फारसे प्रमाण मराठी न वाचणार्‍या लोकांची संख्या वाढलेली दिसते.
इतर भाषांबद्दल काय परिस्थिती आहे ह्याचे कुतूहल आहे. उदा. माझ्या तेलुगुभाषक मित्रांपैकी फारच कमी तेलुगु पुस्तके वाचणारे दिसतात. ह्या मित्रांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आसपासही फार जास्त तेलुगु वाचणारे असे कोणी नाही, मात्र तेलुगु चित्रपटांचे वेड, त्याच्याबद्दल चर्चा वगैरे चिक्कार होतात. आमच्या कॉलेजात तर लहानपणापासून हैदराबादमध्ये वाढलेला, तेलुगु मातृभाषा असलेला, तेलुगुचा अभिमान बाळगणारा, पण तेलुगु अजिबात लिहिता-वाचता न येणारा एक सिनिअर आहे. मला झेपलंच नाही हे प्रकरण! त्याचप्रकारे तेलुगु माध्यमाच्या शाळेत शिकलेलेही फारसे पाहण्यात नाहीत. इतरभाषक मित्रांमध्ये बंगाली, कन्नड, मलयाळम, हिंदी ह्या भाषांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले मित्र आहेत. बंगाली आणि मलयाळी मित्रांना त्यांच्या मातृभाषेतील पुस्तके वाचताना पाहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्यभाषीय निरीक्षणाबद्दल सहमत आहे.

हिंदीवाल्यांपैकी आजवर एकदोघेच अंमळ हिंदी वाचणारे भेटले. स्वभाषीय साहित्याबद्दल इतकी उदासीन आणि (पार्डन मी) अडाण** जमात आजवर पाहिली नाही.

तेलुगुही तसेच. एरवी राडे करतील पण मातृभाषेबद्दल घंटा माहिती नसते.

तुलनेने बंगाली लोक मराठी लोकांसारखेच.

तमिळांचा अनुभव नाही, कन्नडिग तरी भैरप्पा इ. वाचतात, अ‍ॅटलीस्ट माहिती तरी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जोपर्यंत मी........
१) दररोज काहितरी मराठीत वाचतोय (वर्तमानपत्र / ब्लॉग / पुस्तक किंवा इतर काही), मराठीत लिहितोय
२) महिन्या / दोन महिन्यातून एक तरी मराठी चित्रपट पाहतोय
३) घरात / कार्यालयात मराठीत बोलतोय (यात मराठी / अमराठी दोन्ही आले)
४) राग आला / भांडण झाले की दोन चार कचकचीत मराठी शिव्या (मनातल्या मनात / किंवा उघडपणे) देतो. आनंद झाला की मराठीतच व्यक्त करतोय.
५) एटीएम मधे गेलो की मुद्दामहुन मराठी मेनू निवडून व्यवहार करतो.
६) चार वर्षाच्या मुलाला ह्या शब्दाला मराठीत हे म्ह्णतात, इंग्रजीमधे हे म्हणतात असे सांगून त्याच्याशी संभाषण करतो
७) शक्य तिथे मराठीतच व्यवहार करतो.
तोपर्यंत माझ्यापुरती मराठी मेलीय / मरणाला लागलीय असे म्हणणार नाही.
आप मेला जग बुडाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजूबाजूच्या लोकांच्या मताचा अंदाज घेतला असता असं दिसतं की,
•मुलांनी मातृभाषेतून शिकावं असं लोकांना मुळातून वाटतंच नाही. ('आमचं नुकसान झालं, तसं त्यांचं व्हायला नको...' हा एक न्यूनगंडात्मक बचाव. काय नुकसान झालं, या प्रश्नाचं उत्तर 'इंग्रजी बोलता आलं नाही, म्हणून लाज वाटली' इतकंच असतं.)
•मातृभाषेत शिक्षण देणार्‍या 'चांगल्या' शाळा उपलब्ध नाहीत. (चांगल्या म्हणजे काय, हे कुणालाच धड सांगता येत नाही. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून दिला जाणारा अवांतर गोष्टींवरचा भर पुन्हा पुन्हा उगाळला जातो.)
•शिक्षणाचं माध्यम आणि साहित्याची भाषा या दोहोंत लोकांची प्रचंड गल्लत होते. (आमची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली, 'तरी' 'स्वामी', 'मृत्युंजय'सारखी 'मोठ्ठाली' पुस्तकं वाचतात.... अशी सारवासारव.)
•मराठी शाळेत कामवाल्या बायांची (याला मोलकरीण असा शब्द पूर्वी असे. हल्ली... असो.) मुलं येतात. त्यांच्या संगतीत आपल्या मुलांना राहू देणं पालकांना धोक्याचं वाटतं. (शिव्या, घाणेरडी राहणी, मारामार्‍या यांचा संबंध सरळसरळ आर्थिकदृष्ट्या खालच्या वर्गाशी लावला जातो. यात आपण काहीतरी मूलभूत अन्यायकारक बोलतो आहोत, असं कुणालाच वाटत नाही. मग मुलाचा संबंध भोवतालाशी येऊ देण्याची जबाबदारी वगैरे तर दूरच राहिली.)

- या पार्श्वभूमीवर येत्या काही दशकांत माझी भाषा निदान शहरातून तरी हद्दपार होईल, असं मला वाटतं.

या आजूबाजूच्या लोकांपैकी मी एक आहे. उलट मला ती मुले स्वामी वैगेरे वाचतात म्हणून सांगायची गरजही वाटत नाही. आपली निरीक्षणे अचूक आहेत पण या वर्गाबद्दल वापरलेली भाषा/विशेषणे जास्त कडक वाटली. व्यक्तिगत अनुभवावरून माझ्या कुटुंबातून मराठी हद्दपार व्हावी आणि तिचे स्थान प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय भाषांनी घ्यावे असे मला प्रामाणिकपणे वाटते. (१). इथे मराठीच्या जागी हिंदी म्हटले तरी चालेल. आपण म्हणताय कि आपल्याला कोणी धड उत्तरे दिली नाहीत, पण मी प्रयत्न करू शकतो.

(१) या माध्यमाच्या सदस्यांच्या मराठीबद्दल संवेदना पाहता हे वाक्य नाही लिहायला पाहिजे होते. पण त्याशिवाय मी मुलाला 'मराठी/हिंदी माध्यमात घालायचा विचारही का करू शकत नाही' हे खरेपणाने सांगता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ह्या विषयावर मतप्रदर्शन करत नाही. फक्त वस्तुस्थितीत एक दुरुस्ती सुचवतो :
आज माझ्या परिसरातल्या (मुंबई-पुणे) श्रमजीवी वर्गाचीही मुलं मराठी शाळेत जात नाहीत. जागतिकीकरणानं उपलब्ध झालेल्या आर्थिक संधींचं आकर्षण हेच त्या मागचं मुख्य कारण आहे. त्यामुळे मी त्यांना अजिबात दोष देणार नाही. दुसरीकडे प्रमाण भाषेच्या जवळ जाणारी ज्यांची बोली भाषा नाही त्यांना प्रमाण भाषेविषयी प्रेम नाही. हे लोक महाराष्ट्रात बहुसंख्य आहेत. त्यामुळे प्रमाण भाषेत लिहिता-वाचता येणारे लोक वाढणं वगैरे फक्त तात्पुरतं आहे; शाश्वत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दुसरीकडे प्रमाण भाषेच्या जवळ जाणारी ज्यांची बोली भाषा नाही त्यांना प्रमाण भाषेविषयी प्रेम नाही.

शिवाय यातीलच अनेकजण मातृभाषेतील शिक्षणाचा पुरस्कारही मात्र तावातावाने करतात. मात्र वेळ आली की इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाट धरतात. त्यात चुकीचे काही नाही फक्त एक निरीक्षण मांडले. Wink

त्यामुळे प्रमाण भाषेत लिहिता-वाचता येणारे लोक वाढणं वगैरे फक्त तात्पुरतं आहे; शाश्वत नाही.

हाच मुद्दा मला मराठी विकीसंदर्भातल्या चर्चेत मांडायचा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

शिवाय यातीलच अनेकजण मातृभाषेतील शिक्षणाचा पुरस्कारही मात्र तावातावाने करतात. मात्र वेळ आली की इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाट धरतात. त्यात चुकीचे काही नाही फक्त एक निरीक्षण मांडले.

हाच मुद्दा जवळपास ह्याच शब्दांत काही ऐसीकर मित्रांशी वॉट्सॅपवर बोलताना मांडला होता.
बादवे, भाषावगैरे बद्दल वाद घालण्यात मला काहीही इंटारेस्ट नाही; पण शळा-माध्यम ह्याबद्द्दलची अधिकाधिक माहिती मिलववी, मांडावी म्हणोन धाग्यावर येत आहे.
तो दैनंदिन आयुष्याशी निगडित प्रश्न वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सर्व चर्चेत मला प्रस्तुत वाक्य सर्वाधिक महत्त्वाचं वाटलं.

"मराठी भाषा टिकवण्याचा प्रश्न सामाजिक किंवा सांस्कृतिक नाही - तर आर्थिक आहे. "

भाषा मरेल का जिवंत राहील, जिवंत रहाण्याची नक्की व्याख्या काय, मराठीतल्या साहित्य आणि इतर सांस्कृतिक घडामोडी कुठल्या दिशेने जात आहेत, कुठल्या गोष्टी जोम धरत आहेत आणि कुठल्या कमी होत आहेत या बाबी महत्त्वाच्या , रोचक आहेत; परंतु मला उपरोल्लेखित "पाळंमुळं कमजोर असण्यामुळे एकंदर वृक्षाची वाढ थांबल्यागत असणं" हे पटतं.

आपण आपल्या भाषेत आपल्याला जिव्हाळ्याच्या वाटणार्‍या असंख्य गोष्टी बोलू/वाचू/लिहू/गाऊ/ऐकू/पाहू शकतो हे बरोबर आहे. आणि असं करणार्‍यांची संख्या दहा-अकरा कोटींच्या घरात आहे हेही खरंच आहे. त्यामुळे "मराठी मेली किंवा मरू घातली आहे" हे काही म्हणणं अतिच झालं.

पण गावाकडची अर्थव्यवस्था आणि शहराकडची अर्थव्यवस्था यांच्यामधे शहरीकरण जिंकतंय आणि गावाकडची अर्थव्यवस्था वर्षानुवर्षं अधिकाधिक क्षीण होत गेलेली आहे. या घटनेचा माझ्या मते मराठीच्या अस्तित्त्वाशी नव्हे तरी तिच्या महत्तेशी, तिच्या रिलेव्हन्सशी महत्त्वाचा संबंध आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि तिची अर्थव्यवस्था यातला मराठी व्य्वहाराचा टक्का खूपच कमी आहे. राज्यव्यवहार काही प्रमाणात होत असेलसुद्धा, परंतु मुख्य म्हणजे कॉर्पोरेशन्स, कंपन्या, वित्तसंस्था, उद्योगधंदे, या सर्वांचा व्यवहार इंग्रजीतूनच चालतो. कामगारांपासून कारकूनांपर्यंत प्रत्येकाला किमान इंग्रजी येत असलं तरच तो वर्ग आपापली कामं करू शकेल. न्यायव्यवस्था, टॅक्सेशन (कर भरण्याची व्यवस्था) , हे सगळं इंग्रजीतून.

पुणं, औरंगाबाद, नागपूर या शहरांमधेही क्रमाक्रमाने इंग्रजीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. जिथे औद्योगीकरण आहे तिथे इंग्रजीला पर्याय नाही. त्यामुळे शेती आणि तिच्याशी संबंधित अर्थव्यवस्था यांचा टक्का जसजसा कमी होत जाईल, सहकारक्षेत्रांसारख्या गोष्टी जसजशा महाराष्ट्रात अधिकाधिक कमकुवत होत जातील तसतसं मराठीचं (माझ्यामते आधीच दुय्यम बनलेलं ) स्थान अधिकाधिक कमकुवत बनत जाताना दिसतं.

याचा अर्थ मराठीमधले वाचिक, लेखी, सांस्कृतिक व्यवहार संपलेले आहेत असं नाही. भूतकालाच्या हिशेबात यांच्यात वाढच झाली असं म्हणता येईल. पण लोकंसख्या जितक्या वेगाने वाढली, बाकी अर्थव्यवस्था जितक्या वेगाने वाढली, त्यामानाने हा वेग एकतर कमी तरी आहे किंवा त्या गोष्टींचा उपजीविकेच्या साधनांच्या बाबतचा वाटा फार कमी असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वरच्या प्रतिसादांत खूप वैयक्तिक निरीक्षणं आलेली आहेत. ती चुकीची आहेत असं म्हणत नाही. पण माझा प्रश्न असा आहे

'असा कुठचा निकष आहे जो मोजत राहिल्याने आपल्याला भाषेची पाळंमुळं मजबूत होत आहेत की नाही हे व्यक्तिनिरपेक्षरीत्या ठरवता येईल?'

काही आकडे सांगतो. बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात (लोकसंख्या सुमारे ३ कोटी) ५ टक्के लोक साक्षर होते (सुशिक्षित नाही, साक्षर). म्हणजे जास्तीत जास्त १५ लाख लोकांना लिहिता वाचता येत असे. त्यावेळी प्रमाण भाषा कमी वापरात होती, बोलींचा प्रादुर्भाव होता. आज १० कोटी लोकसंख्येत ७५ ते ८० टक्के साक्षर आहेत. म्हणजे जास्तीत जास्त ८ कोटी लोकांना लिहिता वाचता येतं. १५ लाखांवरून ८ कोटीवर जर १०० वर्षांत प्रगती झाली, तर भाषा मरतेय अशी बोंब कुठच्या आधारावर ठोकत रहावं? 'मला माझ्या आसपास असं दिसतंय' हा युक्तिवाद फार फसवा असतो. इथे लिहिणारे जवळपास सगळे जण आआर्थिक शैक्षणिक दृष्ट्या वरच्या पाच ते दहा टक्क्यात आहेत. अशांच्या 'आसपास'वरून भाषेचं काय चाललंय हे कसं ठरवणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशांच्या 'आसपास'वरून भाषेचं काय चाललंय हे कसं ठरवणार?

अगदी योग्य प्रश्न.

पण इतिहासात पाहिले तर या वरच्या ५-१०% लोकांच्या कलावरूनच एखादी भाषा फक्त मौखिक रूपात राहील की तिचे वाङ्मय होईल हे ठरते. युरोपात लॅटिनच्या वरवंट्याखाली इटलीमधील अन्य भाषा कशा सपाट झाल्या अन बाकी रोमन साम्राज्यातल्या भाषाही कशा मरतझुरत राहिल्या त्याचे विवेचन शेल्डन पोलॉकच्या पुस्तकात इत्थंभूतरीत्या आलेले आहे. भारतात संस्कृतचा वरवंटा तयार झाला नाही कारण प्रसाराचे मॉडेलच वेगळे होते. युरोपात लॅटिनने स्थानिक भाषांना कमीतकमी रोमन एंपायर जिवंत असताना शक्य तितके खाऊन टाकले होते. तुम्ही म्हणता तसेच अन भाषा बोलणारे लाखो लोक होते पण त्यांना प्रतिष्ठा नव्हती. शेवटी लॅटिनबरोबर मिक्स होत कधीतरी त्या रोमन प्रभाव संपल्यानंतर ५००-६०० वर्षांनी परत जगलेल्या दिसतात. अन त्यातही लॅटिनेतर एलेमेंट्स बरीच कमी दिसतात.

तस्मात इंग्लिशकडे असाच कल राहिला तर काही शे वर्षांनी या भाषा परत उसळी मारतीलही कदाचित, पण तोपर्यंत भाषिक-सांस्कृतिक जाणिवा पूर्णपणे बदललेल्या असतील अन इंग्लिशपूर्व मराठीशी आपले कसलेच नाते राहणार नाही. तसे ते आत्ताही ब्रिटिश प्रभावामुळे कमीच आहे ते एक सोडाच-पण नंतर अजून जास्त मिक्श्चर होईल.

या सर्व बदलाला शेकडो वर्षे लागतील म्हणून ते इर्रिलेव्हंट आहे असे कुणाला म्हणायचे असेल तर म्हणो बापडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण इतिहासात पाहिले तर या वरच्या ५-१०% लोकांच्या कलावरूनच एखादी भाषा फक्त मौखिक रूपात राहील की तिचे वाङ्मय होईल हे ठरते.

इतिहासात फक्त हे पाच-दहा टक्के शिकायचे. आज ती परिस्थिती नसताना तेच इथे कसं लागू होईल? असो. माझ्या अवतरणातल्या प्रश्नाचं कोणी उत्तर दिलेलं नाही. निकष कुठचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आज इतके लोक शिकू लागले तरी शेवटी इंग्रजीकडे कल वाढतोच आहे. तुमचे म्हणणे काही अंशी पटते पण अभिजनवर्ग हाच कधीही सामाजिक टेस्टचा प्राईम मूव्हर असतो. इंटरनेटमुळे ही मक्तेदारी मोडल्यासारखी वाटतेय पण हा गेल्या दहाबारा वर्षांतला गोंधळ आहे. अजून काही वर्षे गेल्याखेरीज हे समजणार नाही असे वाटते. संक्रमणकाळ असल्याने परस्परविरोधी अनेक गोष्टी दिसताहेत.

पण आज वय वर्षे २० पेक्षा कमी असलेल्या जन्तेकडे पाहिले तर मराठीच्या दृष्टीने आशादायक काय दिसते? फारसे नाही. तस्मात तुमच्याशी असहमत आहे.

असो. पण तूर्तास वेट & वॉच असेच म्हणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शाळा वगळता मला मोजावेसे वाटणारे काही सोपे निकष खालीलप्रमाणे. यावरुन मराठीचा अवकाश हा उंबऱ्याच्या आत घरापुरताच मर्यादित झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल. हा प्रकार शहरांपुरता मर्यादित नाही हे निश्चित.

१. आजकाल सर्वसामान्य व्यक्ती बँकांचे व पोस्टाचे (विमा किंवा म्युच्युअल फंड्स वगैरे) व्यवहार करताना कोणत्या भाषेत अर्ज व चेक भरतो?
२. सर्वसामान्य व्यक्तीला या व अर्थविषयक वा इतर व्यवहारांमध्ये या संस्थांकडून कोणत्या भाषेत संपर्क केला जातो?
३. सर्वसामान्य व्यक्ती इतर सरकारी खात्यांमध्ये कोणत्या भाषेत व्यवहार करतो?
४. पीएमटीची नवी तिकिटे किंवा पुण्यात फाडल्या जाणाऱ्या टोलच्या पावत्या कोणत्या भाषेत आहेत?
५. सर्वसामान्य व्यक्ती इतर खाजगी व्यवहारांमध्ये कोणती भाषा वापरतो (उदा. गॅसचा 'नंबर' लावण्यासाठी किंवा डॉक्टरकडे 'नंबर' लावण्यासाठी गेल्यावर तिथली रिसेप्शनिस्ट कोणत्या भाषेत रजिस्टरमध्ये नोंदणी करते)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. मी देखील याच प्रकारे वर मत मांडलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हे व असे निकष रास्त वाटतात. विशेषतः कॉंप्युटरायझेशन झाल्यापासून इंग्रजीत डेटा एंट्री करणं सर्रास झालं आहे. देवनागरी आकडे जाऊन इंग्लिश आकडे आले तसंच व्यवहारात आपल्या देवनागरी नाव पत्त्याऐवजी इंग्लिश भाषेतला नाव-पत्ता आलेला आहे. भारतीय भाषांमध्ये डेटा एंट्रीसाठी सीडॅकने काही उपक्रम राबवले होते. पण ते कितपत पूर्णत्वाला गेले कोण जाणे.

कदाचित हे चित्र बदलेलही. युनिकोड क्रांती ही गेल्या काही वर्षांमधली आहे. तिचं लोण पोचून काही बदल होऊन मराठी थोडी पुन्हा प्रवेश करूही शकेल.

४. पीएमटीची नवी तिकिटे किंवा पुण्यात फाडल्या जाणाऱ्या टोलच्या पावत्या कोणत्या भाषेत आहेत?

हा हा. हे वाचून, मनसेचं टोलविरोधी आंदोलन हे त्या पावत्यांच्या भाषेबद्दलच होतं हे लक्षात आलं. न रहेगा टोलबूथ, न फटेगी अंग्रेजी पावतियॉं! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील निकषांशी सहमत आहे. तरीही असे निकष लावून काही विदा गोळा करणे व त्याला संख्याशास्त्राच्या काही चाचण्या लावून त्यावरुन एखादी भाषा जिवंत आहे की मरु घातली आहे याविषयीचा निष्कर्ष काढणे योग्य वाटत नाही. तथापि, एखाद्या भाषेमध्ये एकूण किती शब्द आहेत, त्यामधील साधारणतः वापरात असणारे शब्द किती, एखाद्या भाषेत दरवर्षी किती नवीन शब्दांची भर पडते, भाषेतले वाक्प्रचार आणि म्हणी यांचा किती टक्के लोकांना बिनचूक अर्थ माहिती असतो, भाषेचे शुद्धलेखनाचे नियम कोणते, ते ठाऊक असणारे आणि ते पाळणारे लोक किती,एखाद्या भाषेत प्रकाशित होणारी पुस्तके किती (ती कोणती पुस्तके आहेत व त्यांचा दर्जा काय हा मुद्दा येथे गैरलागू ठरावा), त्यातली किती टक्के पुस्तके लोक वैयक्तिक अखत्यारीत खरेदी करतात (संस्थांनी खरेदी केलेली पुस्तके हाही मुद्दा येथे गैरलागू ठरावा) असे काही निकष लावले तर त्या भाषेचा वर्तमानकाळ (आणि कदाचित भविष्यकाळ) यावर काही भाष्य करता येईल, असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

शब्दसंख्या, वापरातली शब्दसंख्या, प्रकाशित होणारी पुस्तकं, वैयक्तिक खरेदी होणारी पुस्तकं हे निकषही आवडले. हे कोणी दर पाच वर्षांनी पद्धतशीरपणे मोजले तर आपल्याला निश्चितच ट्रेंड समजू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याला भाषेची पाळंमुळं मजबूत होत आहेत की नाही हे व्यक्तिनिरपेक्षरीत्या ठरवता येईल का ?
- बहुतेक नाही. उलट भाषेला कुठे मुळं असतात असा जीवशास्त्रीय प्रश्न विचारता येईल.

भाषा मरतेय अशी बोंब कुठच्या आधारावर ठोकत रहावं?
- कुठल्याच नाही. इथे कुणी भाषा मरतेय असं म्हण्टलेलं दिसत नाही. काही मते प्रतिपादित झाली आहेत.

इतरांच्या मताला बोंबा ठोकणं म्हणता येईल का ?
- येईल.

बाकी चालू द्यात,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

भाषा मरतेय अशी बोंब कुठच्या आधारावर ठोकत रहावं?
- कुठल्याच नाही. इथे कुणी भाषा मरतेय असं म्हण्टलेलं दिसत नाही. काही मते प्रतिपादित झाली आहेत.

बोंब ठोकणं हे मूळ लेखाला उद्देशून होतं. 'पुरेसा भक्कम विदा नसताना काहीशा भीतीयुक्त शब्दात आकाश कोसळतंय असं म्हणणं' याला मी सुटसुटीतपणे बोंब ठोकणं असं म्हटलेलं आहे. कदाचित माझा शब्दप्रयोग चुकला असेल. पण भावना समजून घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी शाळेत मुलांना घालण्याबाबत व्यक्तिगत निरीक्षण नोंदवतो. ते कदाचित अस्थानी किंवा कैच्याकै सुद्धा असेल.

मी (१९६८-७८ दरम्यान) मराठी शाळेतून शिकलो. मी अगदी बालपणी चाळीत आणि नंतर फ्लॅटमध्ये राहिलो. माझ्या आसपासची मुले अर्थातच मराठी माध्यमाच्या शाळेत जात असत.

परंतु याचबरोबर माझ्या (आणि माझ्या चाळीतल्या इतरांच्या) नात्यातली काही मंडळी थोड्या वरच्या क्लासमध्ये होती. उदा. माझी एक मावशी आणि तिचे यजमान टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये शास्त्रज्ञ होते. दुसरे एक दोन नातेवाईक खाजगी कंपनीत मॅनेजर वगैरे हुद्द्यांवर होते. आणखी एक नातेवाईक स्वतःचा बर्‍यापैकी व्यवसाय करीत. त्यांची मुले मात्र त्याही काळी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असत.

मी किंवा माझ्या आसपासच्या मुलांचे पालक कारकून, शिक्षक किंवा कामगार अशा वर्गातले होते. आम्ही मराठी शाळेत जात होतो. आमच्या (माझ्या आणि माझ्या मित्रांच्या) उच्चभ्रू नातेवाइकांची मुले इंग्रजी माध्यमात शिकत.

आज जे घडले आहे की त्यावेळच्या बर्‍याचश्या कारकून कामगारांची मुले आज कामगार - कारकून राहिलेली नाहीत. थोडी वर सरकली आहेत. आमच्या उच्चभ्रू नातलगांच्या (त्या वेळच्या) उदाहरणावरून असे वाटते की मराठी माध्यमाच्या शाळांत 'आनीपानी न करणारे शिक्षक' असते आणि 'गुटखा खाणारी मुले' नसती तरी (आर्थिक दृष्ट्या वरच्या वर्गात सरकलेल्या) आम्ही आमच्या* मुलांना इंग्रजी शाळेतच घातले असते.

*माझी मुलगी मराठी शाळेतच जाते.

या वरून अर्थातच मोलकरणी-कामगारांची मुले इंग्रजी माध्यमात का जातात याचा उलगडा होत नाही हे खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एका वेगळ्या फोरमवर झालेल्या याच चर्चेतील मत इथे नव्याने मांडतोय. मराठीच्याच नव्हे तर एकूणच भारतीय भाषांच्या संभाव्य र्‍हासाला काहि प्रमाणात आर्थिक बाजु कारणीभूत आहे हे मुळ लेखातले पटण्यासारखेच आहे. पण इथे मला थोडे अधिक खोलात शिरून वेगळे मत मांडायचे आहे. पुढिल प्रतिसाद मुक्त चिंतनासारखा आहे, त्यामुळे संभाव्य विस्कळीतपणाबद्दल आगाऊ क्षमस्व!

=========
चांगली शाळा: अनेकांसाठी या तथाकथित "चांगली शाळा" म्हणजे काय? तर "आनि-पानि" न बोलणारे शिक्षक आणि "चांगल्या" मुलांची संगत!
असे मत असणार्‍या व्यक्तींशी अधिक बोलल्यावर "चांगली संगत" म्हणजे काय? तर "इतरां"बरोबर संगत नसणे. पण "इतरांच्या" संगतीत काय वाईट आहे? असं विचारलं तर वर मेघना म्हणते तसं 'शिव्या, घाणेरडी राहणी, मारामार्‍या' वगैरे. आणि याचा संबंध घाऊकपणे समाजातील एका वर्गाशी लावला जातो.

तर या व्याख्येचे तात्पर्य इतकेच की 'चांगली शाळा म्हणजे जिथे ठराविक वर्गातील - अर्थात बहुजन समाजातील - व्यक्तींना पोचणे कठीण' असते.

थोडक्यात हा उच्चभ्रुंचा वर्गवाद-जातीवाद मराठीच्या संभाव्य र्‍हासाला कारणीभूत आहे असा माझा दावा आहे.

या दाव्याला पुष्टी देण्यासाठी अजून एक निरिक्षण मांडतो.

समाजाचा बहुजन वर्ग व उच्चभ्रु मंडळींपर्यंतच जेव्हा शिक्षण सिमीत होतं त्यावेळी त्यांनी स्वतःला जन्मतःच येणार्‍या संस्कृत, मराठीत शिक्षण पुरेसे मानले. इंग्रज आल्यानंतर त्या भाषेमुळे विशेष आर्थिक लाभ दिसू-मिळू लागल्यावर मुळातच शिक्षणाचं अंग असणारा हा समाज स्वाभाविकपणे पुढे सरसावला. अर्थात शिक्षण घेणे व देणे हे त्याकाळच्या आर्थिक गरजेमुळे घडत होते. मात्र याच बरोबर इंग्रजांच्या काळात शिक्षण हे धार्मिक न रहाता, रोजगाराचं साधन झालं नी ते बहुजन वर्गातील काहींनी आत्मसात केलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बहुजनवर्गात हळुहळू जागृती होत होती. आरक्षणामुळे अनेक वंचितांनाही शिक्षण मिळु लागले. आणि ८०-९० च्या दशकांत ही नवशिक्षित पिढी शिक्षक म्हणून पुढील पिढ्यांना शिकवायला येऊ लागले.

आणि इथे या 'उच्चभ्रु'चे आसन डळमळीत झाले. जेव्हा बहुजनवर्ग अभिजनवर्गाने आखलेला रस्ता वापरत त्याच्यापर्यंत पोचतो तेव्हा अभिजनवर्गाला आपले श्रेष्ठत्त्व अबाधित ठेवण्यासाठी अधिक वेगळे काही करावे लागते. पुन्हा त्यांच्या मागे बहुजन वर्ग जातो, तोवर अभिजन वर्गाने आणखी चार पावले पुढे टाकली असतात. व अभिजनवर्गाने आखलेल्या म्हणा, जोखलेल्या म्हणा मार्गाने ढोबळपणे समाजाची प्रगती होत असते असे म्हणता येते. शिक्षणाच्या बाबतीत मात्र वर दिलेल्या कारणांने आपल्याकडे 'अस्मितां'चा शिरकाव झाला. त्यात कायदेशीर पाठबळ व आरक्षणामुळे बहुजनवर्गाला संधी नाकारता येत नव्हती नी त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन सोडा, त्यांच्या हाताखाली काम करणे, त्यांनी आमच्या मुलांना शिकवणे या वर्गाला सहन होईनासे झाले.

याच काळात मुलांना 'इंग्रजी' शाळांत घालायचा उपाय निघाला. व मराठी शाळेत बहुजनवर्गातली पोरे जाऊ लागली कारण तिथेही शिक्षणाचे महत्त्व पटू लागले होते. मात्र आपली जन्मभाषा सोडण्यात अभिजनवर्गाची मोठी चुक झाली असे मला वाटते. अस्मितांच्या आहारी न जाता तेव्हा बहुजनवर्गाला त्यांनी मोठ्या मनाने आपल्याशी तुल्यबळ मानले असते तर भारतीय भाषांवर ही वेळ आली नसती.

इंग्रजीत नोकरीच्या संधी आहेत किंवा तिथे आर्थिक फायदे आहेत हे दुय्यम झाले. आता जेव्हा बहुजन वर्गातील मुले इंग्रजी शाळेत जाऊ लागली आहेत तेव्हा अभिजन वर्गाने सीबीएससीत मुलांना घालणे सुरू केले आहे. काहिंनी तर इंटरनॅशनल शाळांत घातले आहे. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की वर मेघनाने म्हटलेली कारणे ही बोलायची कारणे झाली. इथे प्रेम मराठीचेही नाहिये नी इंग्रजीचेही नाहिये. त्याच्या मुळाशी प्रखर जातीवाद-वर्गवाद आहे.

=====

आमच्यावेळी कसे छान (म्हणजे ब्राह्मण) शिक्षक होते. आताच्या आनिपानींनी वाट लावली आहे वगैरे दांभिक वाक्ये याच विचारधारेतून येतात. प्रत्यक्षात अजूनही ५०% जागा उच्च वर्गीयांना आहेतच. फक्त आरक्षित जागा भरल्या जात आहेत कारण त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. जे खरंतर स्वागतर्ह (नी अनेकदा कौतुकास्पद) आहे. अभिजनवर्ग शिक्षकीपेशातून कमी झाला तो आर्थिक गणिते बदलल्यानंतर. कष्टाने घडवलेली पुढिल पिठी अमेरीकादी देशांत तरी गेली नाहितर इथेच बरेच कमवु लागली . तेव्हा कमी पगारांत बरेच राबवून घेणारी शिक्षकी नोकरी करण्याची गरज उरली नाही. दुसरे असे की शिक्षकी पेशा हा पुर्वीच्या सनातनी/पारांपरिक घरांमध्येही स्त्रियांसाठी स्वीकार्ह ऑप्शन होता व ते घरात लक्ष देण्यासाठी सोयीचेही होते. इतर कष्टाच्या किंवा फिरत्या नोकर्‍या स्त्रियांनी करणे तेव्हा समाजमान्य नव्हते. आता तीही परस्थिती नाही. तेव्हा सहाजिकच अभिजनवर्गाने शिक्षकीपेशाकडे पाठ फिरवली.

====

बाकी आनिपानि ही प्रमाणभाषा नसेलही पण ती 'वाईट' कशी ठरते हे कळत नाही. चित्रकला, इतिहास किंवा गणिताच्या शिक्षकाची मराठी प्रमाण नसल्याने मुळ विषयाला काय तडा जातो समजत नाही.

====

असो. या विषयावर लिहिण्यासारखे बरेच आहे. पण या आनिपानींनी शिक्षणाची/मराठीची वाट लावली हे ऐकलं की डोक्यात तिडीक जाते. किंबहुना सध्या जी काही मराठी वापरात आहे ती तिथेच आहे. पोकळ गळे काढणार्‍यांनी ती केव्हाच विकून खाल्ली आहे! Sad

===

अभिजन वर्गाने आपले सामाजिक श्रेष्ठत्त्व टिकवायला नको होते का? तर माझे तसे मत नाही. समाजाच्या प्रगतीसाठी अभिजनवर्गाने पुरोगामी रहाणे गरजेचेच असते व ते जबाबदारीचेही असते. अभिजन वर्गात पोकळ जातीय अस्मितांचा शिरकाव झाला नी तेव्हापासून कित्येक बाबतीत हा एकेकाळी विविध सामाजिक सुधारणांत गुंतलेला वर्ग आणि त्याच बरोबर मराठी समाज आणि भाषा एका चक्रव्युहात अडकले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुद्द्यावर नेमके बोट ठेवणारा प्रतिसाद. जिव्हाळ्याचा विषय असल्याने इतके दिवस वाचनमात्र असलेला ऐसी वरचा वावर थाम्बवून सदस्यत्व घेऊन, हा पहिलाच प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न.
१.

चांगली शाळा म्हणजे जिथे ठराविक वर्गातील - अर्थात बहुजन समाजातील - व्यक्तींना पोचणे कठीण' असते

सम्पूर्ण सहमत.
हल्ली हल्लीच एकपेक्षा अधिक सहकारी मित्रानी अभिमानपूर्वक मला सान्गितले आहे, की शाळेने सरकारी अनुदान घेण्याचे ठरवल्यावर पालकानी त्याची शाळा बदलली, कारणे: त्यामुळे येणारी शिक्षक वर्गातील आरक्षणे आणि कमी झालेल्या फीमुळे "खालच्या वर्गातील" मुले शाळेत येण्याची निर्माण झालेली शक्यता.
याच मित्राना मी स्वत १० वी पर्यन्त मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळेत शिकल्याचे सान्गितल्यावर बसलेला धक्का त्यान्च्या चेहर्‍यावर दिसलाच, पण नन्तरही काही काळ वेर्नि म्हणून चिडवणेही मनोरन्जक म्हणावे असेच.

२. आज इन्ग्रजी(बोलता/ वाचता/ लिहिता) येण्याचे आर्थिक फायदे अमान्य करता येणारच नाहीत, परन्तु इन्ग्रजी शाळेत जाऊन अथवा मराठी माध्यमात पहिलीपासून इन्ग्रजी शिकून हे जमते का याबद्दल साशन्क आहे. अनेक मराठी व अमराठी सहकार्‍यान्शी बोलल्यावर, आणि पदव्युत्तर पातळी वरच्या अनेकानी लिहिलेल्या उत्तरपत्रिका पाहिल्यावर शाळा/ माध्यम आणि इन्ग्रजी बोलण्याची क्षमता यातील परस्परसम्बन्ध इतका सरळ नसावा असे मानायला जागा आहे.

३. एका अवान्तर विषयाकडे यानिमित्ताने लक्ष वेधावेसे वाटते. तथाकथित "चान्गल्या" मुलामधे/ शाळेत न शिकता ही इतर कोणत्याही बाबतीत वेगळेपणा वाटला नसला, तरी अमेरिकन/ ब्रिटिश टीव्ही व पॉप सन्गीता मधे माझ्या उपरोल्लेखीत सहकार्‍यान्इतकी रुची आणि व्यासन्ग मला कमवता आलेला नाही. यात कोणताही न्यून्गन्ड नसला, तरी रुटीन सम्भाषणात हे वेगळेपण उठून दिसते ही गोष्ट खरीच. आता या अज्ञान/ अरुचीचा सम्बन्ध शिक्षणातील फरकाशी जोडता येईल का यावर मते ऐकायला आवडेल.

पहिल्यान्दाच मराठी टायपिन्गचा प्रयत्न करत आहे. अजून अनुस्वार कसे द्यावेत हे कळलेले नाही. त्यामुळे झालेल्या शुद्धलेखनाच्या चुकान्बद्दल क्षमस्व.

सविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुस्वाराकरता M वापरावे. उदाहरणार्थः अं = aM

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऐसीवर स्वागत. प्रतिसाद आवडला.

पहिल्यान्दाच मराठी टायपिन्गचा प्रयत्न करत आहे. अजून अनुस्वार कसे द्यावेत हे कळलेले नाही. त्यामुळे झालेल्या शुद्धलेखनाच्या चुकान्बद्दल क्षमस्व.

अनुस्वारासाठी कॅपिटल एम् (M) हे अक्षर वापरावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल आभार आणि ऐसीवर स्वागत Smile

शाळा/ माध्यम आणि इन्ग्रजी बोलण्याची क्षमता यातील परस्परसम्बन्ध इतका सरळ नसावा असे मानायला जागा आहे.

सहमत आहे. शेवटी माध्यम हे "माध्यम" असते. माहिती पोचवायचे मिडीयम असते. ते अधिक कठीण वा मुलाच्या स्वाभाविक विचारभाषेत न ठेवल्याने मिळणारे ज्ञान किती रुजेल हे समजणे-ठरवणे कठीण आहे.

तरी अमेरिकन/ ब्रिटिश टीव्ही व पॉप सन्गीता मधे माझ्या उपरोल्लेखीत सहकार्‍यान्इतकी रुची आणि व्यासन्ग मला कमवता आलेला नाही.

हा अनुभव मलाही आहे. मात्र तो सवयीचा/वातावरणाचा परिणाम असावा.
या वाक्यामुळे एक अवांतर-समांतर आठवले:
पुलंनी न्यूजर्सीला एक (बहुदा ७६ साली) भाषण केले होते ते मी एकदा कुठेतरी ऐकले होते, त्यात त्यांनी एक सांगितले होते त्याचा माझ्या आठवणीतल्या शब्दांत मांडतो आहे. पुलंचे शब्द अर्थातच वेगळे होते. "महाराष्ट्रातल्या अगदी लहान मुलांना इंग्रजी शिकवायचा आणि अमेरिकेतल्या तुमच्या मुलांना मराठी शिकवायचा धोशा लावणे त्यांना मुळातून उखडण्यासारखे असते. भाषा ही नुसती भाषा नसते तर ती आपल्याबरोबर एक स्वभाव-संस्कृती-सवयी घेऊन येते. प्राथमिक स्तरावर यात झालेला बदल तुमचा स्व-भाव बदलून टाकतो. जर तुमची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे तर मुले आपोआप पॉप संगीताकडे वळणार, त्यात गैर वा वाईट काहीच नाही."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मित्रा, या प्रतिसादासाठी तुझे आभार, खरतर तु यावर अजुन लिहावेस, हव तर याच प्रतिसादाचा एक नविन धागा काढ.

माझ्या शाळेचा अजुन एक किस्सा- अगदी खोटा वाटावा असा,
अमरावती मधिल माझी शाळा न्यु हायस्कुल बेलपुरा (नगर-पलिका छाप ),ही १-२ शिक्षक सोडल्यास सगळेच जातीवंत ब्राम्हण,यांनी बॅकलॉग भरलेलाच नव्ह्ता. मी अडॅमिशन घेतली तेव्हा पर्यंत शाळा बरी होती(दरवर्षी १ मेरीट इ.) अचानक एक महार शिक्षीका मुख्याध्यापिका म्हणुन आल्यात. आपल्या'वर' एक महार एकाही सर्वणाला खपलं नाही. यांना कदाचित एखादा मागासवर्गीय चालला असता पण जयभिमवाल्याची किळसच.

आधी शाळेत आमच्या शिक्षीकांचीही मुले शिकायची त्यांनी त्याची ट्रान्सफर दुसरीकडे केली.अक्षरक्षः बर्याच शिक्षीकांनी विद्यार्थांना शिकवणं सोडलं, आणी मग अवकळा काय पुसता? आजही कधी-कधी मी त्या शाळेत का शिकलो याचं वाइट वाटतं.
नविन तीन शिक्षकांची भरती झाली, ती पण ब्राम्हणच खुप मनं लावुन शिकवायची त्याच्यामुळे आम्ही थोडं तरलो. पण त्याचं जास्त काही सिनियर्र पुढे टिकलं नाही. तेव्हा हे उमगत नव्हतं आज विचार केल्यावर ह्यासगळ्याचा अर्थ लागतो.

दोन वर्षापुर्वी शाळेत जाउन आलो, विद्यार्थ्याशी बोलावं म्हनुन गेलेलो. पण सर म्हणाले "ह्या यांच्याशी काय बोलणार?" रडावस वाटत होत? याशाळेत आज मागसवर्गीय पण अ‍ॅड्मिशन घेत नाहीत.

या शाळेचा 'गट ब' चा मी दहावीचा टॉपर गुण ६९ टक्के. दरवर्षी १ तरी मेरीट ते टॉपर गुण ६९ टक्के काय भारी प्रवास आहे ना? त्यानंतर आजवर एकही मेरीट नाही.

सगळ्याच संस्थेमध्ये आपाआपल्या जातीची लोकांची भरती हाच प्रघात आहे, पण विद्यार्थांना शिकवणं सोडणं अगदी घ्रुणास्पद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहायला हरकत नाहि रे, पण उगाचच स्वतःलाच त्रास होतो. एकुणच अस्मितांची घुसखोरी इतकी अफुसारखी असते की त्याच्या आवरणाखालच्या व्यक्तीला/समुहाला मोठी भुरळ पाडते. शेवटी शिक्षकही त्याच समाजाचे भाग असतात हेच खरे.

ब्राह्मण समाज एकेकाळी शिक्षणक्षेत्रात शिरला तो काही समाजकार्यवगैरेसाठी नव्हते तर तो पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यातील काही जण आत्मीयतेने शिकवत असत तरी बाकी बहुतांश पाट्याच टाकत. मात्र ८०-९०च्या दशकांत एकुणच समाजाच्या मानसिकतेत झालेला कोता बदल विदीर्ण करणारा आहे. नव्या सहस्त्रकांत तर व्यक्तीकेंद्रीत समाजामुळे एकमेकांशी बोलणे, समाजाभिसरण अधिकच मंदावत आहे. एक समाज असा भोवती आहे ज्याला या सगळ्याची कल्पनाही नाहीये. माझ्या हाफीसातील अनेकांना याची कल्पनाही नाहीये की ते किती वर्गवादी आहेत. त्यांच्यासोबत बाहेर चाराठ तास काढल्यावर काही वेळाने ते मोकळे झाल्यावर त्यांची एकूणच सामाजिक मते ऐकून शिसारी येऊ लागते.

तु दिलेला किस्सा दुर्दैवी तर आहेच, अतिशय वेदनादायी आहे - फक्त अधिक दुर्दैव हे की धक्कादायक नाही Sad

"आरक्षणाने सगळी बोंब केली आहे. आरक्षण नसतं ना मग कळलं असतं यांना, चार जणांनाही नोकर्‍या टिकवता आल्या नसत्या. आरक्षण आहे म्हणून गमजा करताहेत, नाहितर लायकी आहे का त्यांची" वगैरे वाक्य बोलणार्‍या तथाकथित उच्चभ्रु नी "सभ्य" व्यक्तींना आपल्या बोलण्यातील घृणास्पद परंतू आरक्षणाचे महत्त्वच अधोरेखीत करणारा ढळढळीत विरोधाभास कळतही नाही - किंवा तो कळून घ्यायचा नसतो! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यातील काही जण आत्मीयतेने शिकवत असत तरी बाकी बहुतांश पाट्याच टाकत.

हे तुमचं निरिक्षण आहे का? का हे 'पूर्वी ९९% लोक सुखी असत' या छापाचं विधान आहे.

मात्र ८०-९०च्या दशकांत एकुणच समाजाच्या मानसिकतेत झालेला कोता बदल विदीर्ण करणारा आहे.

हे का झालं असावं? त्या दशकात असं काय झालं की हा तथाकथित 'कोता' बदल झाला असावा? त्या आधी , स्वातंत्र्य मिळाल्यावर ३०-४० वर्षांमध्ये का नाही झालं काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे का झालं असावं? त्या दशकात असं काय झालं की हा तथाकथित 'कोता' बदल झाला असावा? त्या आधी , स्वातंत्र्य मिळाल्यावर ३०-४० वर्षांमध्ये का नाही झालं काही?

ऋषिकेश त्याचा मुद्दा स्वतंत्रपणे मांडेलच.

माझी आई ठाण्यातल्या एका अनुदानित शाळेत सुपरवायझर म्हणून लागली. पुढे (उप)मुख्याध्यापिकाही झाली. ८० च्या दशकाच्या शेवटी शाळेतले जुने शिक्षक सेवानिवृत्त व्हायला लागले. तोपर्यंत 'बॅकलॉग' बराच होता, म्हणजे आरक्षित जागा भरलेल्या नसणं. आधी लोक मिळाले नसतील किंवा आरक्षणाचा सरकारी निर्णय आधीच्या तारखेपासून लागू झाला असेल. हे तपशील मला माहित नाहीत. पण जसजशा नव्या जागा झाल्या, तशा त्या आरक्षितच झाल्या, कारण बॅकलॉग. त्यामुळे अनुदानित शाळांमधे जरा बऱ्या प्रमाणात आडनावांमधली विविधता दिसायला लागली. ठाण्यातल्या बऱ्याच शाळांमधे हे होतंय, अशा गप्पा घरी कानावर पडत असत. माझ्या आठवणीत नव्वदीच्या सुरूवातीला, "आनी-पानी" शिक्षकांबद्दल ओरड, ठराविक विषय शिकवणारे (संस्कृत) शिक्षक आरक्षित जातींमधून मिळतच नाहीत, मग जे (अनारक्षित) मिळतात ते अपुऱ्या पगारामुळे त्रासतात आणि/किंवा टिकत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी कानावर यायला लागल्या.

(ठाण्यातल्या मराठी माध्यमाच्या, अनुदानित शाळांचा, एक शाळासमूह होता/असेल. या शाळांमधे परीक्षा, चाचणी, सहामाहीचा सिलॅबस ठरवणं वगैरे कामं एकत्रिरित्या व्हायची. त्यामुळे या शिक्षकांचा आपसात संपर्क होता. त्यामुळे या शाळांमधली खबर बऱ्याच लोकांना होती.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचं निरिक्षण आहे का? का हे 'पूर्वी ९९% लोक सुखी असत' या छापाचं विधान आहे.

हे निरीक्षण आहे. अगदी जवळून केलेलं. माझी आई स्वतः शिक्षिका होती. एकूणच शिक्षक, त्यांचे 'शिक्षक' या रोलमधून बाहेर आल्यावरचे विचार, बोलणे अगदी जवळून बघितले आहे. त्यापैकी चांगले शिकवणारे शिक्षक होते, पण ते ब्राह्मण किंवा उच्चजातीतील होते म्हणून ते चांगले शिकवत नसत. दे वेअर जस्ट गुड टिचर्स. बाकीच्या बहुतांश (नक्की टक्केवारी सांगता येणार नाही पण संख्येने बरेच अधिक) शिक्षकांची जमात ही पाट्या टाकणार्‍यांचीच होती इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ जात/वर्ग.

हे का झालं असावं? त्या दशकात असं काय झालं की हा तथाकथित 'कोता' बदल झाला असावा? त्या आधी , स्वातंत्र्य मिळाल्यावर ३०-४० वर्षांमध्ये का नाही झालं काही?

वर अदितीने दिलेलं कारण योग्यच आहे, पनाशीच्या दशकांत आरक्षण आलं. ते पुढिल एखाद दशकांत टार्गेट गटापर्यंत पोचलं, मग त्यापुढिल पिढीने शिकायला सुरूवात केली व ८०-९०मध्ये हा "बॅकलॉग" भरायला सुशिक्षित व्यक्ती मिळु लागल्या.
त्यांची भाषा प्रमाण नसेलही पण ते काही चुकीचे शिकवत किंवा आधीच्या शिक्षकांपेक्षा (अगदी माझ्या आईपेक्षाही) एकुणात अधिक चांगले / अधिक वाईट होते असे तेव्हाही वाटले नाही, आजही वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे निरीक्षण आहे. अगदी जवळून केलेलं. माझी आई स्वतः शिक्षिका होती. एकूणच शिक्षक, त्यांचे 'शिक्षक' या रोलमधून बाहेर आल्यावरचे विचार, बोलणे अगदी जवळून बघितले आहे. त्यापैकी चांगले शिकवणारे शिक्षक होते, पण ते ब्राह्मण किंवा उच्चजातीतील होते म्हणून ते चांगले शिकवत नसत. दे वेअर जस्ट गुड टिचर्स. बाकीच्या बहुतांश (नक्की टक्केवारी सांगता येणार नाही पण संख्येने बरेच अधिक) शिक्षकांची जमात ही पाट्या टाकणार्‍यांचीच होती इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ जात/वर्ग.>>>

एकदम बरोबर. आमच्या शाळेत काही अस्सल पुणेरी शिक्षक होते की जे फक्त पोरांना लाथा घालणे आणि मुद्दामहून टोचून बोलणे ह्यापलीकडे काहीही करत नसत. उलट स्वतः क्लास घेवून जे ह्यांच्या क्लासला आले नाहीत त्यांना उगाचच कमी मार्क देणे वगैरे प्रकार करत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'शिव्या, घाणेरडी राहणी, मारामार्‍या' वगैरे.

आपलं पाल्य ज्या शाळेत जाणार आहे तिथे वरच्या गोष्टी नसाव्यात ही अपेक्ष धरणे हे जातीवादी कसं होउ शकतं हे मला नाही समजलं. त्या न्यायानी नवीन घर घेताना आजूबाजूला झोपडपट्टी नसावी ही अपेक्षा धरणं हे पण जातीवादी होइल का?

आणि ८०-९० च्या दशकात अजून एक बदल झाला असं मला वाटतं. तेव्हापासून आरक्षण हे सामजिक समानतेच साधन(tool) न रहाता ते एक राजकीय हत्यार(weapon) बनलं. आपण मागासवर्गीय आहोत हे दाखवण्याची अहमहीकाच सुरु झाली. आता अत्याचार सहन करण्याची तुमची पाळी आहे असं माझ्या माहीतितील कितीतरी तथाकथीत अभिजन लोकांना सांगितलं गेलंय. अभिजन वर्गं सरकारी नोकरी मधून बाहेर जाण्यामागचं हे पण कारण असू शकतं. आता यावरून त्यांनी generelisation करणं चूक आहे असं मला वाटतं. पण वर जसं तु आणि अदिती आपल्या आजूबाजूच्या एखाद-दुसर्‍या उदाहरणाच्या शितावरून भाताची परिक्षा केलियेस त्याप्रमाणे अशीच टेंडंसी अनेक लोकांमध्ये असणं अनाकलनीय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१.

.
दुसरी तक्रार म्हणजे क्रुती व उक्तीत अंतर असतेच असे हल्ली वाटू लागले आहे.
विशेषतः उक्ती जितकी मोठी असेल तितकी तुम्ही ती दुसर्‍याला ऐकवायलाच वापरता, स्वतःची कृती वेगळीच असते, व ती तशीच राहिल असे वाटते.
पण इथे ते मुद्दे काढले वैयक्तिक बोलतोय म्हणून धरुन हाणतील.
पण उच्च विचाराच्या लोकांची वागणूक निर्नायक परिस्थितीत उच्च नसते असेच आजवर दिसत आलेले आहे बहुतांशाने.
त्यामुळे चर्चा , मते, मतांना विरोध सर्वच निरर्थक वाटायला लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अर्थातच हे सगळं बरोबर आहे आणि निर्णय घ्यायची वेळ आली की सगळे असंच करतात-अत्यल्पसंख्य अपवाद वगळता. पण जोपर्यंत अशी वेळ येत नाही तोपर्यंत अर्ग्युमेंट करून कूल पॉइंट्स मिळवण्यासाठी प्रश्न इ. विचारले जातातच- दोन्हींना इलाज नाही Wink शेवटी त्या त्या कंडुअतिशमनार्थ योग्य ते केलेचि पाहिजे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपलं पाल्य ज्या शाळेत जाणार आहे तिथे वरच्या गोष्टी नसाव्यात ही अपेक्ष धरणे हे जातीवादी कसं होउ शकतं हे मला नाही समजलं.

ही अपेक्षा धरणे जातीवादी आहे असे मी कुठे म्हटले आहे? किंबहुना हे जातीवादी नाहीच, मात्र मुळ प्रतिसाद म्हटल्याप्रमाणे अनेकांकडून "याचा संबंध घाऊकपणे समाजातील एका वर्गाशी लावला जातो." . शिव्या, मारामारी कोणत्याही एका जातीशी किंवा वर्गाशी निगडीत नाहीत. तरीझी तसा 'सोयीस्कर' समज बाळगला जातो. आम्ही कुठे जातीवादी आहोत? असे स्वतःला समजावताना या गोष्टींचा पडदा डोळ्यांवर ओढला जातो. जातीच्या उतरंडीवर वरच्या वर्गातील मुले ज्या शाळेत असतील त्या शाळेत असे प्रकार घडण्याची शक्यता कमी आहे असे सर्रास समजले जाते, असे माझे निरीक्षण आहे व त्यावर आधारीत मते आहेत.

८०-९० च्या दशकात अजून एक बदल झाला असं मला वाटतं. तेव्हापासून आरक्षण हे सामजिक समानतेच साधन(tool) न रहाता ते एक राजकीय हत्यार(weapon) बनलं.

तसे नाहीये, ते टुलस होतं ८०-९०पासून उच्चभ्रुंना सरकारी नोकर्‍या मिळणे कठीण झाले कारण आधीची कित्येक दशके बॅकलॉअ भरलेला नव्हता. इतर वर्गांच्या न्याय्य जागा त्यांना मिळत होत्या इतकेच! ८०-९० नंतर तो बॅकलॉग भरू शकणारे उच्चभ्रुं इतकेच शिकलेले, तितकेच हुशार व कर्तबगार अधिकारी विविध पदांवर मिळू लागले नी या कायद्याची झळ उच्चभ्रुंना बसु लागली नी त्यांनी बोभाटा करायला सुरूवात केली.

आता अत्याचार सहन करण्याची तुमची पाळी आहे असं माझ्या माहीतितील कितीतरी तथाकथीत अभिजन लोकांना सांगितलं गेलंय. अभिजन वर्गं सरकारी नोकरी मधून बाहेर जाण्यामागचं हे पण कारण असू शकतं. आता यावरून त्यांनी generelisation करणं चूक आहे असं मला वाटतं.

वर्षानुवर्ष दबलेल्यांना वाट मिळाल्यावरही त्यांच्यात वृथा अस्मितेचा अभाव असेल ही अपेक्षा करणेच चुक आहे. त्यांच्यावर इतिहासात झालेल्या अन्यायामुळे त्यांचे इतके मोठे नुकसान झाले आहे की धगधगणार्‍या अस्मितेला शांत व्हायला काळी काळ जाणारच. त्याचे हे वागणे-बोलणे न्याय्य/योग्य होते/आहे असे माझे म्हणणे नाही, मात्र अभिजन वर्गाला हे अपेक्षितच असायला पाहिजे होते. सामाजिक अभिसरण होत असताना इतका त्याग अभिजन वर्गाने करण्याची अपेक्षा गैर वाटत नाही. जे स्वतःला वरचढ समजतात त्यांनी झळही अधिक सोसावी असे माझे मत आहे. खरंतर, ती उच्चभ्रुंना कायद्याने ही झळ सोसावी लागलीच, फक्त ती स्वेच्छेने सोसली असती तर मनाचा मोठेपणाही दिसला असता नी कडवटपणाऐवजी सौहार्द वाढीस लागले असते. आता, दोन्ही बाजुंनी निव्वळ अस्मितांचा खेळ झाला आहे Sad

पण वर जसं तु आणि अदिती आपल्या आजूबाजूच्या एखाद-दुसर्‍या उदाहरणाच्या शितावरून भाताची परिक्षा केलियेस त्याप्रमाणे अशीच टेंडंसी अनेक लोकांमध्ये असणं अनाकलनीय नाही.

अर्थात अनाकलनीय नाही. फक्त कसंय की माझ्या भोवती लहानपणापासून अठरापगड वस्ती आहे व जन्माने ब्राह्मण असल्याने नातेवाईक/घरांत/परिचयांत कित्येक व्यक्ती शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत व दुसरी बाजुही नको तितकी परिचित आहे. तेव्हा माझ्या मताला कारणीभूत ठरलेला सँपलसेट एकांगी नसून बराच काळ दोन्ही बाजुच्या भरपूर व्य्कतींच्या निरिक्षणातून बनलेला आहे. अर्थात तरीही कमी विविधतेच्या / संख्येने अपुर्‍या सँपलसेटमुळे येणारा दोष माझ्या मतात संभवतो हे मान्य आहेच मात्र तितकाच नी तसाच दोष तुमच्याही मतात संभवतो हे ही मान्य असावेच!

अतिअवांतर:

त्या न्यायानी नवीन घर घेताना आजूबाजूला झोपडपट्टी नसावी ही अपेक्षा धरणं हे पण जातीवादी होइल का?

मी घर घेताना जवळच एखादे गावठव/झोपडपट्टी आहे हे बघुन घर घेतले होते. त्यामुळे घरकामाला मदत करणारे विविध कष्टकरी हेल्पर्स (जसे धुणीभांडी करणारे, स्वयंपाक करणारे, प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन्स, मोबाईल दुरूस्ती, साफसफई, गाड्या पुसणे व इतर कष्टाची कामे करणारे) मिळणे सुकर होते व तुलनेने भरपूर स्वस्तही पडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही अपेक्षा धरणे जातीवादी आहे असे मी कुठे म्हटले आहे?

तुमच्या मूळ प्रतिसादातील
तर या व्याख्येचे तात्पर्य इतकेच की 'चांगली शाळा म्हणजे जिथे ठराविक वर्गातील - अर्थात बहुजन समाजातील - व्यक्तींना पोचणे कठीण' असते.
.
.
.
थोडक्यात हा उच्चभ्रुंचा वर्गवाद-जातीवाद मराठीच्या संभाव्य र्‍हासाला कारणीभूत आहे असा माझा दावा आहे.

या वाक्यांवरून मला तरी असा बोध झाला की तुम्हाला अश्या अपेक्षांमागे जातीवाद लपलेला दिसला. मला तसं नाही वाटत. वाह्यात उच्चजातीय मुलांपासूनपण पालक मुलांना लांब ठेवायचा प्रयत्न करत असतातच. यात जातीचा संबंध लावला जात नाही.

९०च्या आसपास, मंडल आयोगापासून, आरक्षणाचं राजकारण सुरु झालं. प्रत्येक निवडणुका जवळ आल्या की कुठून तरी कोणाच्या तरी आरक्षणाचा वाद उकरून काढायचा हे नित्याचं दिसतं आजकाल. त्यामुळे अभिजन समाजाला insecure वाटलं तर दोष देत येणार नाही.

जे स्वतःला वरचढ समजतात त्यांनी झळही अधिक सोसावी असे माझे मत आहे.

अधिक म्हणजे किती? जर एखाद्या क्षेत्रात नोकरी करायची इच्छा नसेल तरी करत रहायची?

दोन्ही बाजुंनी निव्वळ अस्मितांचा खेळ झाला आहे Sad

दोन्ही बाजूंना फुकाच्या अस्मिता आहेत हे मान्य आहे.

अपुर्‍या सँपलसेटमुळे येणारा दोष माझ्या मतात संभवतो हे मान्य आहेच मात्र तितकाच नी तसाच दोष तुमच्याही मतात संभवतो हे ही मान्य असावेच!

मान्य. फक्तं generelisation तुम्ही केलत पहिल्यांदा.

असो, मूळ मुद्दा बाजूला राहतोय. माझ्यामते हे दोन प्रश्न होते.

१. अभिजन वर्गानी मराठी शाळांमध्ये शिकवणं कमी केल्यापासून मराठी शाळांचा दर्जा घसरला का? आणि पर्यायाने ईंग्रजी माध्यमाकडे लोक वळाले का?
== एकूणच सरकारी नोकरी पासून अभिजन वर्ग दूर गेलाय हे मान्य. (हे माझं निरिक्षण. महाराष्ट्रातलं). आता त्यामुळे दर्जा घसरला का? माहीत नाही.

२. अभिजन वर्गानी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवणं थांबवल्यामुळे (त्यात बहुजन वर्गातील मुलं येतात म्हणून !) मराठी शाळांचा दर्जा घसरला का? आणि पर्यायाने ईंग्रजी माध्यमाकडे लोक वळाले का?
== ईग्रजी माध्यमामध्ये पाठवायचं कारण हे स्पर्धा हे वाटतं. आधी स्पर्धा फक्तं महाराष्ट्रापुरती सिमीत होती. ती पूर्ण भारतातल्या लोकांशी करायची वेळ आली तेव्हा स्पर्धेत टिकायचं असेल ईंग्रजी ला पर्याय नाही हा समज वाढला. आता स्टेट बोर्डापेक्षा CBSE आणि ICSE भारी असतात हा समज वाढतोय. मला त्यामागे जातीवाद वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सुरवातीच्या मुद्द्यांवर नवे लिहिण्यासारखे काही नाही. दोघांच्या बाजु स्पष्ट आहेत. यावर तपशीलात प्रतिसाद खरडीत दिला आहे.
त्याचा सारांश: या सगळ्यामागे जातीवाद/वर्गवाद नाहीये असे तुम्हाला वाटत असेल तर लेट्स अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री! मला माझ्या घरात, परीसरात, ठिकठिकाणी हे वर्गवादी/जातीवादी घाऊक कल्पनांचे इतके अनुभव मला येतात, होताना दिसत असतात. इतकेच काय कित्येकदा माझ्याकडूनही माझ्या नकळत (अगदी क्वचित का होईना कळतेपणीही) असे वर्तन होत असते. जातीवर/वर्गावर आधारीत अशा काही गोष्टी घाऊकपणे अ‍ॅझ्युम/प्रीझ्युम केल्या जातात की या घटनेमागे जातीयता नाही हे मला पचत नाही. Sad

तुम्ही उपस्थित केलेले दोन प्रश्न

१. अभिजन वर्गानी मराठी शाळांमध्ये शिकवणं कमी केल्यापासून मराठी शाळांचा दर्जा घसरला का? आणि पर्यायाने ईंग्रजी माध्यमाकडे लोक वळाले का?
२. अभिजन वर्गानी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवणं थांबवल्यामुळे (त्यात बहुजन वर्गातील मुलं येतात म्हणून !) मराठी शाळांचा दर्जा घसरला का? आणि पर्यायाने ईंग्रजी माध्यमाकडे लोक वळाले का?

मुळात दर्जा घसरल्याने हा वर्ग मराठी शाळांपासून दूर गेला हे गृहितकच मला मान्य नाही. मराठी शाळांमध्ये अठरापगड मुले शिकत होती तोवर तुलनेने बरे चालले होते, काही थोडे अठरापगड शिक्षक आले ( वते चित्रकला, पीटी वगैरे विषयांपुरतेच सिमीत होते) तेही काही वर्गाने खपवून घेतले, परंतू हे शिक्षक जेव्हा उच्चभ्रुंच्या वरचे अधिकारी म्हणून आले (किंवा गणित, विज्ञान आदी विषय शिकवु लागले) व त्यांच्या नियमांनुसार शिक्षणक्षेत्राची दिशा ठरली ते उच्चभ्रुंना सहन झाले नाही व त्यांनी मराठी शाळांना रामराम ठोकला.

एकदा का अभिजन वर्गाने दिशा बदलली की अख्खा समाज दिशा बदलतो. आताचा प्रवास त्याच दिशेने दिसत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेशशी मी सहमत आहे. पण थोडी पुरवणी जोडणं आवश्यक वाटतंय.
माध्यमबदलात जातीयवादाचा जसा मोठा वाटा आहे, तसाच व्यवहारात इंग्रजीला दिल्या गेलेल्या अपरंपार महत्त्वाचा, इंग्रजीसोबत येणार्‍या कृतक प्रतिष्ठेचा आणि आर्थिक वाटा सुकर करण्याच्या इंग्रजीच्या सामर्थ्याचाही वाटा आहेच. कुठल्याच एका कारणावर मराठी शाळांच्या दुरवस्थेचं खापर फोडून नामानिराळं होता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१
ही अशी व आर्थिक कारणे अमान्य नाहितच. मुळ प्रतिसादातील माझे पहिलेच वाक्य त्या कारणांना पाठिंबा दर्शवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठी शाळांची स्थिती वाईट होती "म्हणून" अभिजन बाजूला झाले; हे तुम्हाला पटत नाही; हे ठीक. तिकडे नंतर येउ; पण मुळात पुढील गोष्ट तुम्हाल मान्य आहे की त्यात काही दुरुस्ती सुचवायची आहे ? :-

१.सध्या मराठी शाळांची स्थिती ढासळलेली आहे.
२.जिल्ह्याचे ठिकाण व मेट्रो इथली परिस्थिती पाहता अत्यल्प मराठी शाळा सुस्थितीत आहेत; हे तुम्हाला मान्य आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला पुढील दुरुस्ती सुचवायची आहे

१.सध्या मराठी शाळांची स्थिती ढासळलेली आहे.
२.जिल्ह्याचे ठिकाण व मेट्रो इथली परिस्थिती पाहता अत्यल्प मराठी शाळा सुस्थितीत आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला आणखी दुरुस्ती सुचवायची आहे.

१.सध्या मराठी शाळांची स्थिती ढासळलेली आहे पूर्वीसारखीच आहे. पूर्वी चांगल्या समजल्या जात असलेल्या शाळा आजही चांगल्याच समजल्या जातात. माझी शाळा पूर्वीही फालतू समजली जायची आणि आजही फालतूच समजली जाते. माझ्या चौथीच्या वर्गातली ४० पैकी १०-१५ मुले शाळा सोडून दुसर्‍या शाळेत गेली होती. त्या अर्थी माझी शाळा तेथे मुलांनी शिकू नये अशांपैकीच होती. परंतु माझे अनेक वर्गमित्र माझ्या शाळेची स्थिती 'हल्ली वाईट झाली' आहे असे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१.सध्या मराठी शाळांची स्थिती ढासळलेली आहे पूर्वीसारखीच आहे. पूर्वी चांगल्या समजल्या जात असलेल्या शाळा आजही चांगल्याच समजल्या जातात. माझी शाळा पूर्वीही फालतू समजली जायची आणि आजही फालतूच समजली जाते. माझ्या चौथीच्या वर्गातली ४० पैकी १०-१५ मुले शाळा सोडून दुसर्‍या शाळेत गेली होती. त्या अर्थी माझी शाळा तेथे मुलांनी शिकू नये अशांपैकीच होती. परंतु माझे अनेक वर्गमित्र माझ्या शाळेची स्थिती 'हल्ली वाईट झाली' आहे असे म्हणतात.

सहमत आहे. अभिजन आणि बहुजन वादात पडण्याची इच्छा नाही. स्पर्धेच्या युगात इतरांपेक्षा सरस शिक्षण घेतल्याने अधिक संधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने त्याप्रमाणात खर्च करण्याची क्षमता असलेला वर्गाने (पक्षी- अभिजन) सुरुवातीला इंग्रजी माध्यमाच्या व आता आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांची निवड केली आहे. यात काही जातीयवाद असावा असे दिसत नाही. जातीयवाद सिद्ध करण्यासाठी मुलांच्या भविष्याशी खेळण्याचे प्रयोग करण्याइतके अभिजन वेडे नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणीतरी घासकडवींना डायरेक च्यालेंज केलं ब्वा.
अहो राजेशराव आहात कुठं ?
लवकर या.
इथं कुणीतरी मागच्या काही दशकात सगळयच शाळा खराब झाल्याचं म्हणतोय.
प्लीझ...
@राजेश
लवकर लक्ष द्या ह्या गुस्ताखीकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाने