ही बातमी समजली का? - ५५
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १०० च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा/जाईल.
===========
हे रम...!!
Maharashtra government declares Chandrapur as 'dry' district
पूर्ण महाराष्ट्रात असं होण्याची शक्यता कितपत आहे ?
पूर्ण भारतात असं होण्याची शक्यता कितपत आहे ?
मोदी सरकारचा यात कितपत सहभाग ?
गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मणिपूर (पार्शल म्हणे), मिझोराम, नागालँड यांच्या ओळीत महाराष्ट्र बसणार का?
गोव्याचे असे झाले तर मग कुठे जायचे ?
जराशी मेहनत आणि वास सहन करावा
जराशी मेहनत आणि वास सहन करावा लागेल!
अगदी खरं आणि ह्याच बरोबर खूप पेशन्स पण हवेत, कारण वाईन मुरायला बराच वेळ जाऊ द्यावा लागतो.
माझा एक सहकारी बनवतो घरी वाईन (एक वर्कशॉप त्याने अटेंड केलेलं). माझ्या मित्राची निफाड ला वायनरी ही आहे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे वाईन स्पेशल द्राक्ष त्या त्या सिझन मधे घेऊन वाईन बनवली की ती जास्त चांगली लागते/होते ( वाईन स्पेशल द्राक्ष त्यांच्या हंगामा नंतरही थोड्याफार प्रमाणात उपलब्ध असतात पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे, जो खरा जोमाचा/हंगामाचा काळ असतो तेव्हाच ते घ्यायला हवे).
नाही! बीयर फर्मेंट केलेली
नाही!
बीयर फर्मेंट केलेली असते, डिस्टील्ड आणी मॅच्युअर्ड (कास्कमधे) केलेली नसते. त्यामुळे बीयर जितकी ताजी तितकी चांगली. ड्रॉट (ड्राफ्ट) बीयर उत्कृष्ट बीयर. बॉटल्ड बीयरचे शेल्फ लाइफ वाढण्यासाठी नेमके काय करतात हे नक्की माहिती नाही, प्रत्येक कंपनीचे ते ट्रेड सिक्रेट असते, पण त्याने चव बदलते.
- (साकिया) सोकाजी
गेल्या दशकातील धर्मनिहाय
गेल्या दशकातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मिळालेल्या या अहवालातील ताज्या आकडेवारीनुसार, मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर आजही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे
देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के असला तरी २००१-२०११ या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे.
The person who has written
The person who has written the Firstpost article seems to have no understanding of simple mathematics. There are two different terms - percentage and percentage points.
The actual decadal population growth rate of Muslims is higher than that of the Hindus and there is no doubt about that. However, the deceleration of this rate is faster in Muslims but there are no sufficient data points to understand when would the falling Muslim population growth rate would match the falling Hindu population growth rate.
Percentage of Muslims in India grew by just 0.8 in last decade: What are political parties fussing over?
This title is highly misleading. This is not percentage. They are percentage points. If there is status quo of all rates - how much time it will take for to become a Muslim majority country? Let's consider 51% as majority. (51%-14.2%)/0.8 = 46. India will be Muslim majority country in 460 years from now. If we look at the nature of Islam in our region, once it achieves the critical mass, it expands exponentially.
Personally, I have no issues with India becoming an Islamic country within 500 years, before or after. But the issue is that Muslims may just make life hell for religious minority and may disown India's glorious history.
500 years is nothing in the history of a nation. The Islamic population growth rate has potential to change the cultural profile of this nation for eternity. And that is not a joke.
देशातील लोकसंख्या वाढीचा
देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के असला तरी २००१-२०११ या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे.
पण असे असल्याने नेमका काय फरक पडतो?
मला तर काहीच फरक पडत नाही कोणत्याही धर्मियांची संख्या कमी-जास्त झाली तरी!
तालिबान लोकांनी बुद्धाच्या
तालिबान लोकांनी बुद्धाच्या प्रतिमा अफगाणिस्तानात फोडल्या. अजंता एलोरा असे तोफा लावून फोडले तर तुम्हाला फरक पडेल का?
सध्याला हिंदू धर्म मेजॉरिटी आहे आणि हिंदू धर्म सहिष्णू आहे. लक्षात घ्या इथे हिंदू देवतांची नागडी चित्रे बनवता येतात, गाय कापता येते, आणि गीता अभ्यासक्रमातून काढा म्हणून आंकांडतांडव करता येते, किंवा हिंदूंची कोणतीही गोष्ट धार्मिक भावना दुखावणारी आहे म्हणून सरकारी गोष्टींतून बाहेर काढता येते, वंदे मातरम म्हणताना संसदेतून उठून जाता येते. आणि याचे समर्थन करणारे तुमच्यासारखे लाखो संतुलित हिंदू मिळतात.
हे चित्र पालटेल. अनुक्रमे अल्लाचे नागडे चित्र काढणे, डुक्कर कापणे, कुराणाचा राज्यघटनेत उल्लेख नसणे, शरीयत विरुद्ध बोलणे, रोज्याचा वेळी खाणे हे सगळे जमणार नाही. तुम्ही सुटाल, पण तुमची समोरची पिढी यात अडकेल.
इन जनरल कुठल्याही धर्माची
इन जनरल कुठल्याही धर्माची लोकसंख्या वाढायला ( धर्माच्या अनुयायांची संख्या वाढते म्हणून ) माझा तसाही विरोधच आहे.
पण अजोंच्या मुद्द्यात दम आहे,
सहिष्णुता जास्ती असणाऱ्या धर्माच्या लोकसंख्येपेक्षा सहिष्णुता कमी असणाऱ्या धर्माची लोकसंख्या वाढणे मला जास्त धोकादायक वाटते पुढील पिढीसाठी.
अजोंशी वरील प्रतिसादापुरता सहमत आहे.
अवांतर - हि लोकसंख्या वाढण्यासाठीही धर्मविषयक अतिरेकी धारणा कारणीभूत आहे (आणि हे सर्वच धर्मांसाठी खरे आहे) असे जाता जाता नोंदवतो.
सध्याला हिंदू धर्म मेजॉरिटी
सध्याला हिंदू धर्म मेजॉरिटी आहे आणि हिंदू धर्म सहिष्णू आहे. लक्षात घ्या इथे हिंदू देवतांची नागडी चित्रे बनवता येतात, गाय कापता येते, आणि गीता अभ्यासक्रमातून काढा म्हणून आंकांडतांडव करता येते
हे फार पुढचे झाले अजो. क्रीटीकल मास झाले की ऐसी वर लिहीतातरी येइल का भारतात राहुन?
इजिप्त, पाकिस्तान व
इजिप्त, पाकिस्तान व आयसिसमध्ये चाललेले प्रकार पाहून हे फिअरमाँगरिंग म्हणवत नाही. बांग्लादेशातही असे कैक किस्से घडलेले आहेत. त्या तुलनेत १६ मे नंतर काही महिने झाले तरी अल्पसंख्याकांसाठीचे कॉन्सण्ट्रेशन कँप उघडल्याचं कुठं कळालं नाही, सबब सेकुलरांची भीती ही फिअरमाँगरिंग आहे असे म्हणायला आधार आहे खरा.
ISIS ला ठोका की. नायनाट करून
ISIS ला ठोका की. नायनाट करून टाका त्यांचा. पण सर्व भारतीय मुसलमान हे जणू ISIS चे आतंकवादी असल्यागत प्रतिसाद दिल्या जातायेत धाग्यावर. सद्यस्थितीत मुसलमान लोकसंख्या अगदीच काही कमी आहे देशात असे नाही पण किती मुसलमान लोकप्रतिनिधी संसदेत आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके. २०१४ च्या निवडणुकीत कितीतरी मतदारसंघ असे होते जिथे मुसलमानांची मते मिळाल्याशिवाय भाजप निवडून येणे केवळ अशक्य होते तिथेही भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला असे असतानाही मुसलमानांविषयी इतकी कटुता का बरं ? फिअरमाँगरिंग नाही तर काय म्हणायचे मग ?
भारत देश मुसलमानबहुल झाला तर
भारत देश मुसलमानबहुल झाला तर अल्पसंख्यांक लोकांवरचे अत्याचार वाढतील हे बाकीची उदाहरणे बघूनही कबूल करायला इतका त्रास होत असेल तर तो एका स्ट्राँग डिनायल मोडचे उदाहरण आहे इतकेच म्हणतो.
असे म्हणणे आणि सर्व भारतीय मुसलमान हे आतंकवादी आहेत असे म्हणणे हे दोन्ही एकच आहेत असा सोयीस्कर समज करून घेतल्याबद्दल धन्यवाद.
भारत देश मुसलमानबहुल झाला तर
भारत देश मुसलमानबहुल झाला तर अल्पसंख्यांक लोकांवरचे अत्याचार वाढतील हे बाकीची उदाहरणे बघूनही कबूल करायला इतका त्रास होत असेल तर तो एका स्ट्राँग डिनायल मोडचे उदाहरण आहे इतकेच म्हणतो.>>>>
भारतातली स्थिती वेगळी आहे आणि भारतीय मुसलमान हे फार वेगळ्या रीतीने वागतील संख्याबहुल असले तरी असा माझा दृढ विश्वास आहे.
असे म्हणणे आणि सर्व भारतीय मुसलमान हे आतंकवादी आहेत असे म्हणणे हे दोन्ही एकच आहेत असा सोयीस्कर समज करून घेतल्याबद्दल धन्यवाद. >>>>
धाग्यावर तसे बरेच प्रतिसाद आहेत. तुमचे नसले म्हणून काय झाले.
तुमचा दृढ विश्वास खरा ठरो अशी
तुमचा दृढ विश्वास खरा ठरो अशी माझीही इच्छा आहे खरी, पण आपल्या शेजारच्या देशांकडे पाहून तसे म्हणवत नाही. उद्या मुसलमान बहुसंख्य झाले तर जनतेवरील बंधने अनेकपटीने वाढतील ही भीती अगदीच निराधार नाही. अख्ख्या जगातली उदाहरणे त्याला साक्ष आहेत. ते एक असो.
तदुपरि त्या प्रतिसादांना इतके मनाला लावून का घ्यावे? आयसिसमध्ये काही भारतीय मुसलमान गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. आणि सर्वच कशाला बहुसंख्य भारतीय मुसलमान गेले नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे. तेव्हा इतके डिफेन्सिव्ह व्हायचे कारण समजले नाही.
तदुपरि त्या प्रतिसादांना इतके
तदुपरि त्या प्रतिसादांना इतके मनाला लावून का घ्यावे? आयसिसमध्ये काही भारतीय मुसलमान गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. आणि सर्वच कशाला बहुसंख्य भारतीय मुसलमान गेले नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे. तेव्हा इतके डिफेन्सिव्ह व्हायचे कारण समजले नाही>>>>>
तुम्ही म्हणता तेही आहेच. आयसिसची विषवल्ली भारतात पसरू नये म्हणून आपल्या सगळ्यांवर मोठीच जबाबदारी आहे. भारतीय मुसलमानांवर तर जास्तीच.
अनु राव यांनी ऐसीचा याहू चॅट
अनु राव यांनी ऐसीचा याहू चॅट मेसेंजर करून टाकला आहे. तिथे हिंदू - मुस्लिम चर्चा अशाच स्तरावर होई.
===========
हारुनजींनी विशिष्ट आयडीचे नाव घेऊन मत प्रदर्शित करावे. धाग्यावरचे टोकाचे प्रतिसाद एकाच आयडीचे आहेत. बाकी मुद्दे पटो न पटो "मा विद्विषावहै" ला धरून आहेत.
आय एस आय एस ठोकणारे सारे देश
आय एस आय एस ठोकणारे सारे देश मुस्लिमच आहेत. शिवाय ते मुस्लिम नसलेल्या* याझिदींना मदत करत आहेत.
================
हे आय एस आय एस तुम्ही म्हणत असलेल्या "तुम्हींनी" बनवलं नाही. अमेरिकेत हस्तीदंती मनोर्यात निती आखणार्यांचा चूकांचा अनपेक्षित परिपाक आहे तो. शिवाय चार पोरे आय एस आय एस मिळाली आहे भारतातून. त्यांच्या मायबापांनाही शॉक सावरेनाय. इस्लामला बदनाम केले म्हणून जगातला प्रत्येक मुसलमान त्यांच्यावर खार खाऊन आहे. अन्यथा मुस्लिम धर्माचे थोडा कडवटपणा, थोडी व्होटबँक, थोडा अन्यधर्मीय संतुलित सेक्यूलरांचा सपोर्ट असे व्यवस्थित चालले होते.
=======
* बहुतेक
काटा
हारुनही, दोन मिनिटे अनु रावांकडे दुर्लक्ष करा (त्याशिवाय तरणोपाय नाही).
पण मला एक जन्विन शंका आहे. (तिचं अतिरेकी टोक अनु रावांची विचारसरणी आहे.)
आज सामान्य भारतीय मुसलमान देशप्रेमी आहेत यात कुणाला वाद नसावा. ते कट्टर धार्मिक आहेत आणि धर्म सर्वप्रथम असा विचार करतात. सहसा भारत सेक्यूलर असल्याने किंवा हिंदू धर्म सहिष्णू असल्याने इस्लाम आणि भारत असं कंफ्रंटेशन होतच नाही. शिवाय फाळणीपासून चिकार पाणी पूलाखालून गेले आहे. म्हणून आज मुसलमान देश आणि धर्म यात काय निवडतात यावर एखादा वादही घालू शकतो.
पण भविष्याचं काय? इलेक्ट्रॉनिक्स मधे एक अवेलांचे इफेक्ट असतो. मुसलमानांची सहिष्णूता, त्यांचे लोकसंख्येतले प्रमाण बरेच वाढलेले का असेना, आजच्या इतकीच राहील का? भारतात हिंदूंना किती भडकावता येतं याचं अप्पर लिमिट बाबर मजिदीच्या वेळी कळलं. (चिंजंना गुजरातच्या वेळी कळलं असेल, असो). भारत इस्लामबहुल होईल का आणि झाला तर हे स्थित्यंतर शांतीपूर्ण असेल का? त्यानंतरच्या काळात जी (हिंदू) मायनॉरिटी असेल तिचे आयुष्य सामान्य असेल का? मी फार पुढचा प्रश्न विचारतोय. पण वर तुम्ही जो आजच्या मुसलमानाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केलाय आणि अनुंनी जो भविष्यातल्या मुसलमानांबद्दल अविश्वास व्यक्त केलाय त्यात काटा नक्की कुठे स्थिरावतो यासाठी या प्रश्नाचं उत्तर आवश्यक आहे.
पण भविष्याचं काय?
पण भविष्याचं काय? इलेक्ट्रॉनिक्स मधे एक अवेलांचे इफेक्ट असतो. मुसलमानांची सहिष्णूता, त्यांचे लोकसंख्येतले प्रमाण बरेच वाढलेले का असेना, आजच्या इतकीच राहील का? भारतात हिंदूंना किती भडकावता येतं याचं अप्पर लिमिट बाबर मजिदीच्या वेळी कळलं. (चिंजंना गुजरातच्या वेळी कळलं असेल, असो). भारत इस्लामबहुल होईल का आणि झाला तर हे स्थित्यंतर शांतीपूर्ण असेल का? त्यानंतरच्या काळात जी (हिंदू) मायनॉरिटी असेल तिचे आयुष्य सामान्य असेल का? मी फार पुढचा प्रश्न विचारतोय. पण वर तुम्ही जो आजच्या मुसलमानाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केलाय आणि अनुंनी जो भविष्यातल्या मुसलमानांबद्दल अविश्वास व्यक्त केलाय त्यात काटा नक्की कुठे स्थिरावतो यासाठी या प्रश्नाचं उत्तर आवश्यक आहे.
प्रश्न अतिमार्मिक आहे.
हॅ हॅ हॅ. तुम्हीआम्ही मरेतोवर
हॅ हॅ हॅ. तुम्हीआम्ही मरेतोवर तरी भारत मुसलमानबहुल होणार नाही. त्यामुळे जे काय होईल ते तुम्हांला भोगावे लागणारच नाही. तस्मात काय फरक पडतो असे म्हणून कूल पॉइंट्स मिळवायला काहीच हरकत नाही. अशा सर्कशीला हसायचाही आम्हांला छान चान्स मिळतो. तस्मात बहुत धन्यवाद बरं का!
दुर्दैवाने बहुल होण्याची गरज
दुर्दैवाने बहुल होण्याची गरज नाही. २५% ला पोचले की पुढच्या ३-४ वर्षात बाकीच्यांना संपवुन १००%
बॅट्या, कदाचित तुमच्या आयुष्यातच हा दिवस बघण्याची वेळ येइल ( म्हणजे बघायला शिल्लक ठेवले तर )
तसेही माझ्या मते हे आकडे Underplayed आहेत. ( कोणी पुरावे, विदा वगैरे विचारु नये. शंका असल्यास स्वताच्या मनाला विचारावे )
काळ बदलला आहे बॅटमॅन.
काळ बदलला आहे बॅटमॅन. पुर्वीची हत्यारे वेगळे होती. एक माणुस हजार माणसांना मारु शकायचा नाही.
आणि मुख्य म्हणजे पाय ओढायला सेक्युलर हिंदू नव्हते. :-)
तरी सुद्धा हजार वर्षात हिंदु, बौद्ध लँड एरीया कीती आकसला आहे.
दुसरे महत्वाचे म्हणजे मधल्या १५० वर्षात इंग्रज होते. त्यामुळे मोकळे रान मिळता मिळता राहीले.
अहो ५०% तर नक्कीच आकसला आहे
अहो ५०% तर नक्कीच आकसला आहे ना भुप्रदेश.
आणि दुर्दैवाने मराठ्यांनी हिंदू म्हणुन राज्य केले नाही ना. तेंव्हा ही सेक्युलर पणा दाखवलाच. माराठी सैन्यात पण मुसलमान होते, राज्यात पण होते. मशिदी बांधायला बंदी होती असे होते असे वाटत नाही. किंवा झीजीया सारखा टॅक्स लावला होता.
हैदराबाद हुन नबाब येउन पुणे जाळुन गेला पण मराठे हैदराबाद ला गेले नाहीत.
मराठे सगळीकडे गेले. निजामाशी
मराठे सगळीकडे गेले. निजामाशी पॉलिटिक्समध्ये कमी पडले नैतर पालखेड, उदगीर(अजो ऐकताय ना?), राक्षसभुवन, खर्डा या आणि इतरही अनेक वेळेस निजामाला थेट युद्धात मात दिलेली आहे. ते एक असो.
अन अहिल्याबाईंनी भारतभर बांधलेली व जीर्णोद्धार केलेली देवळे पहा. तसेच पेशव्यांनी आणि दक्षिणेतील तंजावरच्या राजांनी दिलेले पॅट्रनेज पहा म्हणजे कळेल हिंदू धर्मासाठी काय काय केले ते.
सहमत आहे. ===============
सहमत आहे.
===============
प्रश्न धर्माचा नाही धार्मिक लिडर्शीपचा आहे. हिंदूंची लिडर्शीप आज धार्मिक नेत्यांकडे नाहीच असे म्हणता यावे. मुसलमानांचे तसे नाही. म्हणून ते कडवट इ वाटतात. जगात चांगले कल्चर असलेले मुस्लिम देशसुद्धा आहेत पण वाईट असलेले जास्त आहेत. भारताचा इतिहास बघितला तर इथे दोन्ही धर्मांना कडवट भावना* आहेत. म्हणून एकदा का मुसलमानांना फ्री हँड मिळाला कि ते मस्त चेपून घेतील. आणि हा इतिहास वाईट असेल.
====================
बाबरी मस्जिद पडायच्या वेळी आखातात हिंदूंना, संख्येने जास्त असूनही, काही (किंवा फार काही) झालं नाही. कारण तिथे हिंदूंचा द्वेष करायची संस्कृती नाही. निषेध करणे वेगळे आणि खूनखराबा करणे वेगळे. तिथे इस्लाम कडक आहे पण हिंदूंबद्दल द्वेष्टा नाही.
============
मुसलमानांत सुधारक पैदा होत नाहीत हे अजून एक दुखणे आहे. तिथेही १०-२० दाभोळकर आवश्यक आहेत. समाजात एकदा उदात्त (किंवा कोणत्याही) धारणा खोल बसल्या कि त्या सहजासहजी निघत नाहीत.
+१ बॅट्या. हिंदूंच्या तथाकथित
+१ बॅट्या.
हिंदूंच्या तथाकथित 'षंढ+न्यूनगंडी+बोटचेप्या' सहिष्णू वृत्तीला न जुमानता (किंवा त्या वृत्तीमुळे) भारतातल्या हिंदूंचे धर्मांतरण करणे इस्लामला जमले नाही. भल्याभल्या इस्लामी शासकांना हत्याकांडे, जिझिया, दीर्घ-विस्तृत राजवटी करूनही जमले नाही... ते आता मुस्लिमांना जमेल - असा बागुलबुवा उभा करण्याचे कर्तृत्व कुणाच्या बरे राजकीय पोळीच्या कामी येईल? ;)
मी हिंदू आहे. पण या स्वतःला हिंदुत्वाभिमानी म्हणवणार्या आणि एकेश्वरी अर्वाचीन धर्मांबद्दल अकारण असुरक्षितता व न्यूनगंड बाळगणार्या हिंदुत्वखोर लोकांपोटीच माझ्या धर्माचे खरे नुकसान होते आहे, असे अलीकडे वाटू लागले आहे.
मी हिंदू आहे. पण या स्वतःला
मी हिंदू आहे. पण या स्वतःला हिंदुत्वाभिमानी म्हणवणार्या आणि एकेश्वरी अर्वाचीन धर्मांबद्दल अकारण असुरक्षितता व न्यूनगंड बाळगणार्या हिंदुत्वखोर लोकांपोटीच माझ्या धर्माचे खरे नुकसान होते आहे, असे अलीकडे वाटू लागले आहे.
मी हिंदू आहे. स्वतःला अधार्मिक म्हणवणार्या आणि एकेश्वरी अर्वाचीन धर्मांबद्दल पूज्यभाव व स्वधर्माचा अकारण न्यूनगंड बाळगणार्या नास्तिक्यखोर लोकांपोटीच माझ्या धर्माचे खरे नुकसान होते आहे, असे अलीकडे वाटू लागले आहे.
दुर्दैवाने बहुल होण्याची गरज
दुर्दैवाने बहुल होण्याची गरज नाही. २५% ला पोचले की पुढच्या ३-४ वर्षात बाकीच्यांना संपवुन १००%
अंध मुस्लिमद्वेष्टा असले विधान करेल.
----------------------------------
=(२५%-१४%)/.८ = १४. १४० वर्षांत एकूण लोकसंख्या वाढून घटून आजैतकीच राहिली तरी १२५*७५%= ९४ कोटी लोक. काही तारतम्य? अतिरेकी आणि जहाल मुसलमान क्रूर असतील पण शेवटी मानव आहेत.
===================
हिंदू आणि ख्रिश्चन धर्म देखिल इस्लामसारखेच कडवट आहेत म्हणून धूर निघत आहे. पण प्रत्येकाला मर्यादा आहेत.
================
मूळात इन्फ्लेक्शन पॉइंटच्या अशा वेळी कोणी विरोध करत नाही. म्हणून हत्या फार जास्त होत नाही. इस्लामच बुद्ध धर्माप्रमाणे शांततापूर्वक प्रसार देखिल खूप झाला आहे.
अजो - काश्मीर मधे हिंदूंची
अजो - काश्मीर मधे हिंदूंची संख्या कीती टक्के राहीली आहे.
पंजाब, सिंध मधे १०० वर्षापूर्वी २५ टक्के तरी हिंदु असावेत. आत्ता कीती आहेत?
पूर्व पाकीस्तान मधे पण २०-२५ टक्के हिंदु असावेत १०० वर्षापूर्वी, आता कीती आहेत?
पर्शीया चे कीती वर्षात पूर्ण इस्लामीकरण झाले? अफगणीस्तान चे इस्लामीकरण होयला कीती वर्ष लागली?
९४ कोटी मारायची गरज नाही, ज्यांना जमेत ते पळुन जातील, काही मारले जातील. बायका, मुले वेठबिगार होतील. जमेल ते पुरुष धर्मांतर करतील.
बोको हराम काय करतय ते बघा. आणि जर अमेरिकेनी मधे पाय घातला नाही तर नायजरीयातुन नॉन्-मुस्लिम कीती वर्षात पूर्ण पणे संपतील ते बघा. आशावादी भारतीयांना त्यातुन बरेच शिकण्यासारखे आहे.
अंध मुस्लिमद्वेष्टा असले विधान करेल.>>>> शत्रु च्या असलेल्या ताकदी पेक्षा ती जास्त आहे असे समजुन तयारी करण्यात समजदार पणा आहे. शत्रु नाहीच आहे असे म्हणणे असेल तर खुदा हाफिज.
काश्मिरमधे रक्तरंजित धर्मांतर
काश्मिरमधे रक्तरंजित धर्मांतर झालेले नाही.
पंजाब व सिंध चा दोष सेक्यूलरी न्यूनगंडी काँग्रेसचा आहे. १९४६ पर्यंत हिंदू मुस्लिम तिथे सुखाने राहत.
पर्शियाने आक्रमकांना इस्लाम दिला. आक्रमकांनी पर्शियाला नव्हे.
अफगाणीस्तानचे माहित नाय.
===============================
फाळणीच्या वेळी भारतात
फाळणीच्या वेळी भारतात (इकडच्या बाजूला) मुस्लिमांची प्रचंड कत्तल झाली आहे. त्यात नविन काही नाही. राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मिर हा एकच बेल्ट मानतात धार्मिक भावनिकतेच्या बाबतीत. इथे तर कत्तल झालीच आहे पण बिहार मधे देखिल अवाढव्य प्रमाणात झालेली आहे. आजही पंजाबमधे मुस्लिम लोकसंख्या २% आहे.
================
फाळणीचे आकडे नंतरच्या वेळेशी तोलणारे पुन्हा न्यूनगंडी सेक्यूलर इ इ !!! सगळं कसं समान, संतुलित आहे हे दाखवायला प्रयत्नशील. १०० लोकांत ८५ हिंदू १५ मुसलमान. ते जर भिडले तर कुणाचे नुकसान होणार आहे? तसं नुकसान झालं म्हणून मायनॉरिटीच्या पंगा घ्यायच्या वृत्तीवर टिका करणे चूक कसे?
=============
मुसलमानांचं दुर्भाग्य ठिणगीच्या वेळी त्यांची गाठ जम्मूच्या डोग्रांशी पडली.
काय हे? शोभतं का तुम्हाला?
गेल्या दशकातल्या जनगणनेवर आधारित लेखाला आलेल्या तमाम प्रतिक्रिया वाचून दु:ख ह्याचं होतंय की एक नरपुंगव आता पंप्रपदी विराजमान झालेला आहे आणि त्याच्या राजवटीत कसे अच्छे दिन येऊ घातले आहेत आणि तो कसं हे बातमीतलं भुक्कड वास्तव उल्टंपाल्टं करून सोडणार आहे ह्याची दखल घ्यायला कुणीच तयार नाहीय! आपल्या महनीय पंप्रंच्या सुपरमॅनगिरीविषयीचा हा अविश्वास मानावा किंवा कसे?
तो कसं हे बातमीतलं भुक्कड
तो कसं हे बातमीतलं भुक्कड वास्तव उल्टंपाल्टं करून सोडणार आहे ह्याची दखल घ्यायला कुणीच तयार नाहीय.
त्या नरपुंगवाने वास्तव बदलायची काहीही गरज नाही. चिंजीय वृत्तीच्या मस्तवाल लोकांची १६ मे ला चड्डी उतरावून त्यांनी जितकं उलटं पालटं केलं आहे त्यातच त्यांचं जीवन सार्थकी लागलं आहे.
अरेरे!
हे वाचण्यात आलं आणि सुन्न झाले. उजव्या बाजूची सरकारे प्रचंड बहुमताने निवडून येतात तेंव्हा समाजाने आपले रूप आरशात पहायची गरज असते हे खरंच जाणवतंय. पण काय माहिती म्हणा, दहा वर्षांपूर्वी असे सर्वेक्षण केले गेले असते तर कदाचित अजून जास्त लोक असा विचार करणारे असते!
तरीही अलिकडच्या काळात युरोपातही कट्टर उजव्या विचारसरणीचे पक्ष लोकप्रियता मिळवत आहेत, अमेरिकेतही टीपार्टीचे प्राबल्य वाढते आहे. या सगळ्या घटनांकडे पाहिले तर स्वातंत्र्य आणि (काही प्रमाणात) समानता फुकटात मिळालेली पिढी आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घेते आहे की काय असे वाटायला लागले आहे.
समानता आणि स्वातंत्र्य या
समानता आणि स्वातंत्र्य या गोष्टी सुबत्तेनंतर येतात. सुबत्ता कमी व्हायला लागली की पहिला बळी यांचाच जाणार यात काही आश्चर्य नाही त्यामुळेच युरोप-अमेरिकेतला ट्रेंड. किमान ही मुलं तशी परिस्थिती स्विकारण्याच्या मनस्थितीत आहेत हे काय वाईट?
भारतात कधी लोकक्रांती वगैरे झाली आहे का? परकीय सत्तेविरुद्धच लढायला इतके कमी उभे राहिले तिथे स्वकीयांविरुद्ध कोण उभं राहणार?
पोटासारखं विचारांसाठीची फास्ट
पोटासारखं विचारांसाठीची फास्ट फूड (फेबु, वाट्स्प वैगेरेच्या पोस्ट) मिळतं त्याचा परिणाम आहे हा. मिलीटरी रुल नसल्यामुळेच आपण हे असं उघड बोलु शकतो जाची जाणीव नसते.
youngsters are not equipped with necessary skills, attitudes and values to live in a multi-culturual democracy
( सुरुवातीचं गाळून अर्धवट वाक्य घेतलयं पण) हे पायरीशी आलेलं आहे.
उजव्या बाजूची सरकारे प्रचंड
उजव्या बाजूची सरकारे प्रचंड बहुमताने निवडून येतात तेंव्हा समाजाने आपले रूप आरशात पहायची गरज असते हे खरंच जाणवतंय.
हा सर्वे १५-०८-१९४७ पासून आजपर्यंत रोज केला असता तरी असाच निकाल आला असता. भाजपने कधीही हुकमशाहीचे नाव घेतले नाही. अडवाणीच्या काळात पक्षात लोकशाही जास्त झाल्यामुले बिचारे दोनदा रपटले.
नको तिथे, कसाही, कुठेही उजव्यांचा संबंध जोडायचा ही प्रवृत्ती पाहून मन सुन्न झाले.
डावे-उजवे-कम्युनिस्ट-कॅपिटलिस्ट...
डावे-उजवे-कम्युनिस्ट-कॅपिटलिस्ट-टोटॅलिटेरियन-डेमॉक्रॅटिक वगैरे संज्ञांमध्ये मधे थोडा(!) गोंधळ उडालाय काय? नाही म्हणजे अगदी आपल्या विकीवरही थोडी माहिती आहे! पण ठीक आहे, डोळ्यांवर भगवे (किंवा हिरवे किंवा इतर रंगीत!) चष्मे ओढून पाहिले तर डावीकडे झुकणारं सगळंच टोटॅलिटेरियन दिसायला लागतं.
असे अनेक रोचक समज डाव्यांना
असे अनेक रोचक समज डाव्यांना अतिरेकी सहानुभूती देणारे लोक बाळगत असतात. नुस्ते बाळगतात असं नाही, तर तसे समज गोंजारत बसतात आणि त्याला सत्य सत्य म्हणून इतरांनी पाठिंबा द्यावा याबद्दल गळेही काढत असतात.
(हळव्या श्रेणीदात्यांना खास आमंत्रण. कंडुअतिशमनार्थ प्रतिसाद खुला आहे.)
पण- बातमीचं शीर्षक जरा
पण- बातमीचं शीर्षक जरा हुक(व)लेलं आहे. बातमीत म्हटल्याप्रमाणे ५०% मुलांनी मिलिटरी रूलला पाठींबा दिलाय आणि ५०%नी विरोध.
त्याउलट भिन्न धर्मीय मुलामुलींनी एकत्र येऊ नये ह्या मताला उघड बहुमत आहे. स्त्रियांनी प्रक्षोभक पोषाख न घालणे वगैरे नेहेमीच्या मुद्दयांनाही बर्याच जणांनी पाठिंबा दिलाय.
Pinterest’s Problem: Getting
Pinterest’s Problem: Getting Men to Commit
Pinterest is looking for ways to prevent its growing popularity with women from scaring away male users, who may see the social-media site as a women’s clubhouse. Social Site Adds ‘Geek’ Content, Tweaks Search Results but 71% of Visitors Are Still Women.
--------------------------------------
During Obama Visit, Modi Government Ready to Try What UPA Couldn't
NEW DELHI: The Narendra Modi-led government is all set to go where the previous UPA government had feared to tread. India and the US may soon agree on allowing their warships and aircraft to access each other's bases, refuel and, in case of emergency, operate side by side.
For this, India has to sign what the US calls "Foundational Documents" or agreements required by its law for the transfer of sophisticated military technology and weapons to a country.
Sources tell NDTV that the government is no longer shy of exploring the pacts that the previous Congress-led government, especially then Defence Minister AK Antony, had refused to even consider, saying India's sovereignty would be compromised.
http://gulfnews.com/news/worl
http://gulfnews.com/news/world/india/indian-prime-minister-begs-to-save…
काल बेटी बचाओ, बेटी पढावो योजना चालू करताना मोदी भावूक झालेले. उजव्या सरकारांवर पोटशूळ उठलेल्यांनी, संघ, भाजप नि मोदी कसे स्त्रीद्वेष्टे आहेत यांनी आपले कंसेप्त ठिक करण्यासाठी अवश्य वाचावी अशी बातमी आहे. एक पंतप्रधान तुमच्याकडे मुलींच्या जीवनाची भीक मागतो आहे असे ते म्हणाले. मुलांना मुलींपेक्षा वरचे मानणे हा मानसिक आजार आहे असे पण ते म्हणाले. मोदी संघाच्या कुशीत घडलेले आहेत तेव्हा संघ स्त्रीद्वेष्टा हे लॉजिक किती हलकट आहे हे कळून यावे.
पूर्ण बातमी मोदीद्वेष्ट्या स्त्रीवाद्यांनी वाचावी-
Chandigarh: Amid huge fanfare, Prime Minister Narendra Modi on Thursday launched the nationwide Beti Bachao Beti Padhao (Save Girl, Educate Her) campaign from Panipat, in Haryana, in a determined effort to counter the adverse sex ratio in the country.
“India’s Prime Minister is standing in front of you as a beggar. I have come here to beg for the life of the girl child. In nearby Kurukshetra district, a boy called Prince fell into a well, and the whole nation watched the rescue operation on TV. For one Prince, people united to pray, but with so many girls killed, we do not react. We are not worthy of being called citizens of the 21st century. It is as if we are from the 18th century. At that time, just after a girl’s birth, she was killed. We are worse now, we do not even allow the girl to be born,” Modi said after launching the ambitious programme.
The campaign, to be initiated in 100 worst districts in the country for child sex ratio, aims to sensitise people about the safety and education of the girl child, skewed sex ratio, prevention of female foeticide, and women empowerment.
“Placing importance on sons above daughters is a psychological illness. Girls are better performers than boys. If you need proof, just look at exam results. People want educated daughters-in-law but think several times before educating their own daughters. How can this go on? If we do not realise the crisis brought by female foeticide, our coming generations will face a major problem. For every 1,000 male child births, there should be 1,000 girl child births*,” Modi added urging the nation to take a pledge to oppose female foeticide.
According to United Nations’ data, India’s child sex ratio dropped from 964 in 1971 to 918 in 2011. Between 2001 and 2011, the decline was seen in more than two-thirds of the districts in the nation. A 2011 study published in the British medical journal the Lancet found that as many as 12 million Indian girls may have been selectively aborted between 1980 and 2010.
The programme has been launched from Haryana as the state has the worst child sex ratio in the country. As per the 2011 census, the number of females per 1,000 males in Haryana in 2011 stands at 879. Out of the 100 worst districts in India for sex ratio, Haryana accounts for 12 districts.
Addressing the event, PM Modi said, “as a society we all have a responsibility. We have to be aware. We do not have the right to kill the girl child. What we are pledging to do today will not change things fast, it takes time for people’s mindset to change. The message is for entire nation. The thought that only a son will take care of you during your old age is incorrect. Lets not look back and shift blame, lets wake up and work together to get rid of this scourge. Beta beti ek samaan [girls and boys are equal], this should be our mantra.”
In a direct message to the doctors, Modi said, “to them, I say, the society has made you a doctor to save lives, to get rid of pain, illness not to kill girl children”.
The issue of decline in child sex ration is complex and the scheme will address the issue within the broad framework of survival, protection and education of girl children.
Modi flagged 72 campaign vehicles on Thursday.
Evergreen Bollywood diva Madhuri Dixit has been roped in as the brand ambassador of the ambitious campaign. Dixit took to Twitter to announce the news and her happiness to be the face of the campaign.
“We have reached the Moon and the Mars, but sadly, still some view the daughter as a burden. I am proud that in its first year in the office, the government started this initiative. I have immense expectations from this,” Dixit, who attended the event, said.
* मोदी इतिहासाप्रमाणे विज्ञानाच्याही चूका करतात. पण ते असो.
व्हिड्यो चवीचवीनं पाहिला?
व्हिड्यो चवीचवीनं पाहिला
>> According to United Nations’ data, India’s child sex ratio dropped from 964 in 1971 to 918 in 2011.
तुम्हाला मोदी आवडत नाहीत (असा माझा अंदाज, नक्की माहीत नाही) म्हणून ते काय ड्वाय्लॉक डिलेव्हरी करतात, असे म्हणताय का? पण ते फेकूगिरी करत आहेत असे वाटतेय का तुम्हाला? मुलींना वाचवा आणि त्यांना शिकवा, स्त्रीभ्रूण हत्या हा गंभीरपणे विचार करण्याजोगा प्रश्न आहे. केवळ मोदी बोलत आहेत पण म्हणून त्यांचा संदेश चुकीचा आहे का? मला तर हा चक्क biased thinking किंवा "Shooting the messenger" चा प्रकार वाटतोय. (आणि चिंतातूर जंतू यांच्या प्रतिसादाला मार्मिक श्रेणी म्हणजे तर कमाल आहे).
अतिमार्मिक. नावडतीचे मीठही
अतिमार्मिक. नावडतीचे मीठही अळणी त्यातलाच प्रकार आहे. वर त्यांच्या प्रतिसादाला मार्मिक श्रेणी देणारे दीडशहाणे व शहाण्याही तसलेच / तसल्याच. कधीपासून हेच बोंबलून सांगत होतो पण आमच्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाते. किमानपक्षी तुम्ही हा मुद्दा उचलून धरला हे लै बेष्ट केलेत. आता इथले दीडशहाणे हा मुद्दा किमान पाहतील तरी. तो समजेल कितपत याबद्दल शंकाच आहे, पण किमान नजरेसमोर तरी राहील.
(अस्मितांची गळवे तरारलेल्या श्रेणीदात्यांनी अवश्य प्रतिकूल श्रेणिदान करावे. प्रतिसाद ओपन आहे.)
तीन प्रश्न
>> म्हणून ते काय ड्वाय्लॉक डिलेव्हरी करतात, असे म्हणताय का? पण ते फेकूगिरी करत आहेत असे वाटतेय का तुम्हाला? मुलींना वाचवा आणि त्यांना शिकवा, स्त्रीभ्रूण हत्या हा गंभीरपणे विचार करण्याजोगा प्रश्न आहे. केवळ मोदी बोलत आहेत पण म्हणून त्यांचा संदेश चुकीचा आहे का? मला तर हा चक्क biased thinking किंवा "Shooting the messenger" चा प्रकार वाटतोय.
प्रश्न १ : मोदींनी हातात झाडू घेतला तर भारत स्वच्छ होतो असे आपल्याला वाटते का?
प्रश्न २ : मोदींनी मुली पैदा करा असे म्हटले तर भारतीय लगेच आपल्या स्त्रीभ्रूणहत्या थांबवतील असे आपल्याला वाटते का?
प्रश्न ३ : तसे वाटत नसेल तर त्याला हिंदी सिनेमातल्या मूल्यशिक्षणाइतकेच गांभीर्याने का घेऊ नये? विशेषतः हृदयाला हात घालत भावनिक आवाहनाची वक्तृत्वशैली वक्त्यानेच स्वतःहून निवडलेली असताना?
बाकी, एका माणसाच्या हृदयाला-हात-घालू वक्तव्याने भारत बदलेल असे लोकांना वाटले तर ते वास्तववादी, आणि तसे न वाटले तर ते मात्र पूर्वग्रहदूषित हे गंमतीशीर आहे. असो. :-)
प्रश्न १: नेहरूंनी
प्रश्न १: नेहरूंनी शेंगदाण्याची टरफले स्वतः उचलली तर भारत स्वच्छ होतो असे आपल्याला वाटते का?
प्रश्न २ : ईंदिरा गांधींनी गरीबी हटाओ म्हटले तर गरीबी हटते का?
प्रश्न ३ : तसे वाटत नसेल तर त्याला हिंदी सिनेमातल्या मूल्यशिक्षणाइतकेच गांभीर्याने का घेऊ नये? विशेषतः हृदयाला हात घालत भावनिक आवाहनाची वर्तनशैली नेत्यानेच स्वतःहून निवडलेली असताना?
==============
बाकी, एका माणसाच्या हृदयाला-हात-घालू वक्तव्याने भारत बदलेल असे लोकांना वाटले तर ते वास्तववादी, आणि तसे न वाटले तर ते मात्र पूर्वग्रहदूषित हे गंमतीशीर आहे. असो
हे वाक्य तुम्ही टंकल्यापासून जगात जन्म घेतलेले सगळे महापुरुष स्वर्गात ओक्साबोक्सी रडत आहेत.
=======
गांधी, नेहरू, बोस, इ इ तोंडाला पट्टी लावून भारतात बदल घडवून आणू पाहत होते का?
===========
मागे एकदा तुम्ही मला नि मनोबाला तब्येतीची काळजी घ्यायचा मनोमन सल्ला दिलेला. पण तुमची चवीचवीनं मिटक्या मारत भावनिकतांना तुच्छ लेखत व्हिडिओ पाहायची सवय पाहून तुमच्या समीक्षाप्रेक्षकांची काळजी वाटू लागली आहे.
अपात्रतेची कबुली
>> प्रश्न १: नेहरूंनी शेंगदाण्याची टरफले स्वतः उचलली तर भारत स्वच्छ होतो असे आपल्याला वाटते का?
प्रश्न २ : ईंदिरा गांधींनी गरीबी हटाओ म्हटले तर गरीबी हटते का?
प्रश्न ३ : तसे वाटत नसेल तर त्याला हिंदी सिनेमातल्या मूल्यशिक्षणाइतकेच गांभीर्याने का घेऊ नये? विशेषतः हृदयाला हात घालत भावनिक आवाहनाची वर्तनशैली नेत्यानेच स्वतःहून निवडलेली असताना?
तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी अजिबात क्वालिफाइड नाही, कारण मी असल्या वक्तव्यांची (कोणत्याही पंतप्रधानानं केलेल्या) स्तुती कधी केलेली नाही. माझ्या मते असली वक्तव्यं करत राहणं हे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री वगैरेंचं प्रोफेशनल हॅझर्ड आहे आणि त्यांनी ते करत राहावं, पण मी मात्र त्या वक्तव्यांना गांभीर्यानं घेत नाही. मात्र, इथले अनेक सदस्य ते घेतात हे पाहून माझी करमणूक होते. ती चालू राहू द्या.
http://www.vandemataram.com/h
http://www.vandemataram.com/html/vande/controversy.htm
अनंत गीतेंनी फॅक्च्यूअल चूक केली आहे. पण सेक्यूलर काँगींनी वंदे मातरमची कशी बुद्ध्या वाट लावली आहे ते विसरून चालणार नाही. ज्या मुस्लिमांनी या गीताला काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात विरोध केला त्यांना बडतर्फ न करता वा रिफॉर्म न करता त्यांचे म्हणणे मानत गेले. अशा वृत्तीची परिणीती शेवटी फाळणीपर्यंत गेली.
http://www.rediff.com/news/1998/dec/03vande.htm
The Muslim League was quick to take its cue from Nehru and a month later, on October 17, 1937, passed a resolution at its Lucknow session, condemning the Congress for 'foisting Vande Mataram as the national anthem upon the country in callous disregard of the feelings of Muslims.' When the Congress Working Committee met in Calcutta later that year with Nehru as Congress president, it officially recognised 'the validity of the objections raised by the Muslims to certain parts of the Vande Mataram song' and 'recommended that at national gatherings the first two stanzas only of the song should be sung.'
The cultural content of Vande Mataram was knocked out by the Congress on the altar of Muslim League politics.
घोडचूका काँग्रेसनी करायच्या, त्याची दखल घ्यायला वेळ नाही. मात्र गीतेंच्या अज्ञानाची लगेच खबर!!!
Sixty years later to the day, Ali Mian, Syed Shahabuddin and Tahir Mahmood have rediscovered the 'Pirpur Report' and relaunched the assault on Vande Mataram. For them, that is the unfinished task of the Muslim League in undivided India.
It is not surprising that today's Congress should seek to rationalise the jehad against Vande Mataram. In 1937 Nehru had the song truncated; in 1998, the Congress is more than willing to dedicate itself to the task of wiping out the mantra of nationalism from popular consciousness. It was Jawaharlal Nehru then, it is Sonia Gandhi now.
Vande Mataram may have stirred -- indeed, continues to stir -- India's soul, but it failed to touch Nehru's heart. And that which celebrates Indian nationhood cannot be expected to stir Sonia Gandhi's heart
ओढून ताणून काँग्रेसला शिविगाळ
ओढून ताणून काँग्रेसला शिविगाळ करण्याचे विहित कार्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन.
मागे एकदा तुम्हाला प्रश्न विचारला होता, 'अजो तुम्ही नक्की काय "करता" हो?' असा. त्याला पुस्ती जोडतो, '(पेड) आर्मीत असता का?'
आता संदर्भ दुसरा.
हे जे तुम्ही जस्ट केलंत, त्याला म्हणतात,
आपल्यापेक्षा जास्त पिवळा लंगोट शोधून काढा, अन शड्डू ठोकून म्हणा, जितं मया!
रसग्रहण जमलं/समजलं का?
जनार्दन द्विवेदी
http://indianexpress.com/article/india/politics/congress-leader-janarda…
कट्टर कॉग्रेसी, सोनियाबाईंचे खासमखास जवळचे नेते जनार्दन द्विवेदी मोदींचा २०१४ चा विजय हा भारतीयतेचा विजय आहे नि त्याने एक नवे पर्व देशात चालू झाले आहे असे म्हटले.
बादवे - द्विवेदी पक्षांतर इच्छिणारे चीप काँग्रेसी नाहीत.
IN surprise comments critical of his party, eight months after its rout in the Lok Sabha elections, senior Congress leader Janardan Dwivedi said on Wednesday that Prime Minister Narendra Modi and the BJP’s victory in the 2014 Lok Sabha elections was a victory of “Indianness”. He also said Modi’s ascension to power marked the beginning of a “new period”.
वर्धा जिल्हा आलरेडी ड्राय
वर्धा जिल्हा आलरेडी ड्राय आहेच की. यात नवीन काहीच नाही.
तदुपरि हे नखरे फार काळ टिकणारे नाहीत. अबकारी का कुठलासा कर असतो तो दारूवर लावतात. त्याचं उत्पन्न काय नको झालंय होय यांना?