कोठे भटकंती केलीत, करणार - भाग १
मला येत्या शुक्रवारी, शनिवारी नि रविवारी कोकणात समुद्रकिनारी शक्यतो शहरापासून दूर शांत, निवांत, स्वच्छ जागी सहकुटुंब राहायचे आहे. अॅनि सजेशन्स? अलिबाग, गणपतीपुळे आणि गोवा सोडून.
मी एखाद्द्या खेडेगावात देखिल
मी एखाद्द्या खेडेगावात देखिल राहायला तयार आहे. बहुतेक महागड्या रिसोर्ट मधे हे अवघड असावे. उद्देश फक्त सात्विक शाकाहारी (नि बायकोसाठी , मुलासाठी सात्विक मांसाहारी) जेवण, एखादी समुद्रात सफर, एखादा अगडबंब किल्ला, एखादे मंदिर नि एरवी पडून राहणे आहे. बाकी सगळं उडत गेलं तरी समुद्रात बेटावर वैगेरे जायला, राहायला धम्माल वाटणार आहे.
अजो - ऐसीला साजेसा हा धागा
अजो - ऐसीला साजेसा हा धागा नाही हे नमूद करायलाच पाहिजे. अश्या धाग्यांसाठी बाकीची २ संस्थळे आहेत.
-----------
कर्द्याला "बाळ" नावाच्या फॅमिलीची बीच वर बांधलेली कॉटेज आहेत. लोकेशन बेस्ट आहे, अगदी बीच वरच आहे.
माझ्याकडे आता कॉन्टॅक्ट नंबर नाही. बर्याच वर्षापूर्वी मी तिथे गेले होते.
टिपिकल कोकणस्थ म्हातारा ते चालवतो, त्यामुळे नियम कानुन लागू होतात.
बाळ यांच्या नाद बीच रिझॉर्टवर
बाळ यांच्या नाद बीच रिझॉर्टवर दोन-तीन वर्षांपूर्वी जाऊन आलोय. चांगलंच आहे पण ही बाळमंडळी सिझन मध्ये मनाला येईल ते दर लावतात. आणि थोडं ओव्हररेटेड पण आहे. तरी जायला हरकत नाही. अगदी बीचसमोरच आहे. आणि अनु राव म्हणतात त्याप्रमाणे कोब्राश्टाईल नियमकानून आहेतच.
नाद रिसॉर्ट मुरुडमध्ये आहे. मुरुडच्याच थोडं पुढे गेलात तर कर्दे बीच आहे. तोदेखील एकदम स्वच्छ आणि सुंदर किनारा आहे. तिथे पण सागर हिल रिसॉर्ट नावाचं सुंदर रिसॉर्ट आहे. त्याशिवाय दापोलीच्या जवळपास आंजर्ले, केळशी, कोळथरे ( ही जागा दापोलीपासून खूप आत, सुमारे २५ किमी आहे आणि तिथे एकमेव असे भावे यांचे गारवा रिसॉर्ट आहे. पण सुंदर. नारळीपोफळीच्या बागा वगैरे ), लाडघर (तेथील तामस्तीर्थ ) वगैरे सुंदर किनारे आहेत. तेही पाहू शकता. तिथेही घरगुती रिसॉर्ट्स आहेत.
रायगड जिल्ह्यात दिवे आगार, हरिहरेश्वर, श्रीवर्धन ही ठिकाणं पण छान आहेत.
मालवणजवळ तारकर्ली, देवबाग, भोगवे, तोंडवली, शिरोडा यांचा विचार करायला हरकत नाही पण त्याला २ दिवस पुरणार नाहीत. दापोली आणि त्याजवळची काही ठिकाणे हा पर्याय बेस्ट वाटतो मला.
"आधी सांगितले नाही असा आरोप
"आधी सांगितले नाही असा आरोप होयला नको"
कन्स्युमर कायदा याफुकटच्या सल्यांना लागू होत नाही ही जमेची बाजू.परदेशातले ज्योतिषी नाही का वैधानिक इशारा "सावधान " देऊनच सल्ला देतात. हल्ली कोणती गोष्ट सर्विस ट्याक्स/RTA/Consumer Act/pil खाली येईल सांगता येत नाही.
आता झाला का धागा ऐसीवर बसण्यासारखा?
अहो हा प्राइम टाइम आहे
अहो हा प्राइम टाइम आहे वर्षातला. आता नाही कमवणार तर कधी?माथेरानमध्ये ज्या रुमचे (रुम भाडे असे नाहीच) कपलचे जेवण-नाश्ता -राहाणे रु पाचहजार घेत होते तीच रूम नंतर १५०रु रुमभाड्याने घेतली आहे.शिवाय थंडीत सगळे समुद्राकडे पळतात.म्हणूनच बोर्डी सांगितलं. तिकडे जाऊनच बार्गिन करा. नाही पटलं तर परत येण्याचं अंतर आहे. दमणसुद्धा फुल्ल असणार.
हल्ली दिवे आगार फॅशनमध्ये
हल्ली दिवे आगार फॅशनमध्ये आहे. ते टाळा!
हर्णे मुरूड हा चांगल ऑप्शन आहे