Skip to main content

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?

हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे
या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?

मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते.

तर यांचे 4जी हे hyper efficient network आहे, म्हणजे फोन चार्ज करायला खरे तर जवळपास एक तृतीयांश ( खरे तर 31.7595 %) वीज लागते. आता कोणाचे वीज बिल यांचे नेटवर्क वापरत असल्याने कमी झाले आहे का ? नाही कारण ही वीज टॉवर कडे microwave form मध्ये परत पाठवली जाते आणि तिचे परत wave particle theory, uncertainty principle, Einsteins Nobel winning equation E=MCsq वापरून परत विजेमध्ये रूपांतर केले जाते.

आणि एक मोठी वीज कंपनी यांच्या बंधू चीच होती तिला हे देतात ,आता तुमच्याच भागातले त्यांचे मित्र चालवतात - ते एकच आहेत हे सर्वांना माहीत आहे..

म्हणजे तुम्ही अधिक डेटा वापरा याना तुमचीच वीज मिळेल आणि ते तुम्हालाच ती विकत देतील!
हे विलक्षण धक्कादायक आहे .

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

Rajesh188 Sun, 27/09/2020 - 10:46

आणि आपण उगाचच आरोप करतो भारतात नवीन शोध लागत नाहीत,नवीन तंत्र ज्ञान विकसित होत नाही.

बघा मुकेश जी च्या कंपनीने किती उच्च दर्जाचे तंत्र ज्ञान वापरले आहे.
ट्रम्प त्यांना नक्कीच विनंती करणार अमेरिकेत सुद्धा अशीच आयडिया वापरण्यासाठी

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 27/09/2020 - 22:39

काही समजलं नाही!

वाचाळ्वीर Sat, 17/10/2020 - 16:14

मा. ताजे प्रेत यांना विनंती आहे की आपल्या चरणांचा एक फोटो आंम्हाला द्यावा. सध्या असलेले आईन्स्टाईन वगैरे चिरकुट लोकांचे फ़ोटो काढुन तेथे आपल्या पादुका प्रस्थपित करेन. रोज तिन्ही त्रिकाल पूजा, आरती यथासांग करेन.

आंम्हाला उपकृत करावे