डॉ. वि. भि. कोलते : मराठी भाषाविज्ञानाचे जाज्वल्य दीपस्तंभ
डॉ. वि. भि. कोलते : मराठी भाषाविज्ञानाचे जाज्वल्य दीपस्तंभ
आज, डॉ. वासुदेव भिकाजी कोलते यांची ११७वी जयंती साजरी करताना, आपण केवळ एका व्यक्तीचा गौरव करत नाही, तर मराठी भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र आणि संशोधन परंपरेचा एक तेजस्वी अध्याय उजळवत आहोत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची व्याप्ती इतकी व्यापक आहे की, ती एका लेखात सामावणे हेच एक आव्हान ठरते. मात्र त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहताना त्यांच्या विचारांचा मागोवा घेणे हेच खरे अभिवादन ठरेल. समस्त हत्ती परीवाराकडून डॉ. वि. भि. कोलते यांना ११७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
डॉ. वि. भि. कोलते यांचा जन्म २२ ऑगस्ट १९०८ रोजी विदर्भातील एका शेतकरी कुटुंबात झाला. अत्यंत साध्या आणि पारंपरिक वातावरणात त्यांचे बालपण गेले, परंतु त्यांची बौद्धिक जिज्ञासा आणि अभ्यासाची तळमळ ही लहानपणापासूनच वेगळी होती. त्यांनी नागपूर विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्यानंतर भाषाशास्त्राच्या क्षेत्रात गाढा अभ्यास सुरू केला. त्यांच्या विद्याव्यासंगामुळे त्यांना 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' (D.Litt) ही सन्माननीय पदवी प्राप्त झाली.
भाषाशास्त्रातील अग्रणी कार्य
डॉ. कोलते हे मराठी भाषाविज्ञानाच्या अभ्यासात अग्रणी संशोधक मानले जातात. त्यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन मराठीचा अभ्यास करताना भाषेतील ध्वनी, व्याकरण, वाक्यरचना, शब्दोत्पत्ती इत्यादी घटकांचा अत्यंत सूक्ष्मतेने अभ्यास केला. त्यांच्या संशोधनाचा पाया भाषेच्या मूळ स्वरूपावर आधारित होता, आणि त्यांनी मराठी भाषेचा उत्क्रांतीक्रम मांडताना पाली, प्राकृत, अपभ्रंश आणि संस्कृत यांचा संदर्भ घेतला.
त्यांचे एक महत्त्वाचे संशोधन म्हणजे “मध्यकालीन मराठीचा अभ्यास” — या ग्रंथात त्यांनी संतसाहित्य, लिपीपरिवर्तन, भाषिक संरचना आणि ग्रामीण बोलींच्या प्रभावाचा सखोल अभ्यास मांडला आहे. ते मराठी भाषेतील ‘विकासाची प्रक्रिया’ केवळ ग्रंथाधारित नव्हे, तर बोलींच्या अभ्यासातूनही समजावून सांगणारे थोडेच अभ्यासक होते.
संतसाहित्यावरील अभ्यास
डॉ. कोलते हे संतसाहित्याचे अतिशय विद्वान अभ्यासक होते. त्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, सोयराबाई, मुक्ताबाई, जनाबाई यांच्या वाङ्मयावर अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन केले. त्यांनी संतसाहित्याच्या भाषाशास्त्रीय वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना केवळ भावसंपन्नता नव्हे, तर भाषेचा प्रवाह, छंदोबद्धता, आणि अर्थछटा यांचा अभ्यास केला.
त्यांच्या मते, संतवाङ्मय हे फक्त भक्तिरसातून नव्हे, तर भाषेच्या सजीवतेतून समजावे लागते. त्यांनी संत साहित्याचे भाष्य करताना विवेचन आणि साधक दृष्टिकोन यांचा समन्वय साधला. त्यांनी अनेक अप्रकाशित अभंग, ओव्या आणि वचनांचे संकलन व संपादन करून त्या रसिकांपुढे आणल्या.
प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील भूमिका
डॉ. कोलते केवळ एक संशोधक नव्हते, तर एक आदर्श प्रशासकही होते. त्यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्य केले. त्यांच्या काळात विद्यापीठात नव्या शाखा, संशोधन केंद्रे आणि प्राच्यविद्येच्या अभ्यासासाठी स्वतंत्र पाठ्यक्रम सुरू करण्यात आले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन दिले आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरणात शिस्त, गुणवत्ता आणि मूल्याधिष्ठानाचे बीज रोवले.
त्यांच्या काळात नागपूर विद्यापीठ हे एक अभ्यास आणि संशोधनासाठी प्रसिद्ध केंद्र बनले. त्यांनी जे शैक्षणिक धोरण राबवले, त्यात पारंपरिक मूल्यांची सांगड आधुनिक ज्ञानाशी घालण्याचा प्रयत्न होता.
लेखन, संपादन आणि ग्रंथनिर्मिती
डॉ. कोलते यांचे लेखन हे केवळ अभ्यासासाठीच नव्हते, तर त्यात विचारशीलता, प्रगल्भता आणि भाषिक शुद्धतेचा परिचय दिसतो. त्यांच्या काही प्रसिद्ध ग्रंथांमध्ये:
-
"संत साहित्याचे स्वरूप"
-
"मराठी भाषेचा इतिहास"
-
"मुक्ताईचे अभंग" (संपादन)
-
"ज्ञानेश्वरीतील भाषाशैली"
हे ग्रंथ त्यांच्या व्यासंगाचे प्रतीक आहेत. त्यांच्या लेखनात केवळ संशोधन नव्हे, तर रसिकताही होती. त्यामुळेच ते ‘विद्वान आणि कलावंत संशोधक’ या दुर्मीळ श्रेणीत मोडतात.
पुरस्कार व सन्मान
त्यांच्या अमूल्य कार्याची दखल घेत पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार, भाषा संशोधन पुरस्कार, आणि लोकमान्य टिळक पुरस्कार यांसारख्या अनेक सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले.
वारसा आणि प्रेरणा
आज, जेव्हा आपली तरुण पिढी झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक तंत्रज्ञानाकडे धावत आहे, तेव्हा डॉ. कोलते यांच्या कार्याची आठवण करून देणे फार गरजेचे आहे. त्यांनी दाखवलेली अभ्यासवृत्ती, भाषिक शिस्त, संत साहित्याबाबतचा आदर, आणि शैक्षणिक मूल्ये ही आजही मार्गदर्शक ठरतात.
उपसंहार
डॉ. वि. भि. कोलते हे केवळ एक संशोधक नव्हते, तर ते एक संस्कृतीचे वाहक, भाषेचे संरक्षक आणि विद्येचे पुजारी होते. त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी आजही आपल्याला मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या मुळाशी जाण्याची प्रेरणा मिळते.
जयंतीनिमित्त कृतज्ञतेची वंदना
“भाषा हे केवळ संप्रेषणाचे माध्यम नसून ती संस्कृतीची श्वास आहे,
डॉ. कोलते यांच्यासारख्या ऋषितुल्य संशोधकांनी हाच श्वास जपला
आज त्यांच्या ११७व्या जन्मदिनी त्यांना समस्त हत्ती परीवाराकडून शतशः नमन.”
काही शक्यता
गुड क्याच!
(विकीपीडिया त्यांची जन्मतारीख २२ जून १९०८ अशी नोंदवितो.)
कदाचित, त्यांचा जन्म १९०८ साली जून या august महिन्याच्या २२ तारखेस झाला, असे म्हणायचे असेल.
(२२ जून हा बादशहा पंचम जॉर्ज यांच्या राज्याभिषेकाचा, तसेच महाराणी व्हिक्टोरिया हिच्या राज्यारोहणाच्या हीरकमहोत्सवाच्या सोहळ्याचा दिवस. झालेच तर, महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाच्या हीरकमहोत्सवाच्या पुण्यातील सोहळ्यात श्री. रँड यांचा खून झाला होता.
आता, श्री. हत्ती यांच्या sympathies जर ज्याला काही गोटांत ‘राष्ट्रीय’ म्हणून संबोधले जाते, त्यांच्याप्रति असतील, तर त्यांना कदाचित प्रथम दोन घटनांच्या कटु आठवणी नकोश्या वाटणे संभव आहे. उलटपक्षी, त्यांच्या आस्था या जर का ब्रिटिश साम्राज्याप्रति असतील, तर त्यांना तिसऱ्या घटनेच्या स्मृती असह्य होत असू शकतील.
या दोन्हीं परिस्थितींत, ते या तारखेचा असा आडमार्गाने उल्लेख करीत असल्यास ते समजण्यासारखे आहे.)
दुसरी शक्यता म्हणजे, आपल्या हिंदू पंचांगात जेणेकरून तिथीचा क्षय अथवा वृद्धी, झालेच तर अधिक मास, अशासारख्या भानगडी उद्भवतात, तशासारखा काही प्रकार चुकून पाश्चात्त्य कॅलेंडरास लागू करण्याचा प्रकार येथे घडला असावा काय?
तिसरीही एक शक्यता येथे लक्षात येते, परंतु तिच्या संभाव्यतेबद्दल खात्री नाही. बोले तो, रशियातील ऑक्टोबर क्रांती ही डिसेंबर महिन्यात झाली. (OS वि. NSवाला फंडा. क्रांती झाली, तेव्हा उर्वरित जगात (नव्या कॅलेंडरानुसार) जरी डिसेंबर चालू असला, तरीसुद्धा, रशियात तोवर जुनेच कॅलेंडर लागू असल्याकारणाने, तेथे अद्याप ऑक्टोबर महिनाच चालू होता.) डॉ. कोलत्यांची जन्मतारीख नोंदविताना, कदाचित अशासारखीच काही गल्लत, परंतु (१) फक्त महिन्याच्या बाबतीत, आणि (२) (बहुधा) उलट्या दिशेने (चूभूद्याघ्या.) झाली असू शकेल काय?
…
डॉ. वि. भि. कोलते हे केवळ एक संशोधक नव्हते, तर ते एक संस्कृतीचे वाहक, भाषेचे संरक्षक आणि विद्येचे पुजारी होते. त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी आजही आपल्याला मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या मुळाशी जाण्याची प्रेरणा मिळते.
ते असेलही. नव्हे, डॉ. कोलत्यांबद्दल पूर्ण आदर आहेच. प्रश्न तो नाही.
प्रश्न हा आहे, की हे असे लेख, त्यांतल्या अशा मूलभूत नि धडधडीत अशा निष्काळजी घोडचुकांमुळे, मराठी भाषेच्या नि संस्कृतीच्या मुळाबद्दल कल्पना नाही, परंतु, गेला बाजार डॉ. वि. भि. कोलत्यांच्या मुळावर उठतात, त्याचे काय?
(लेख लिहायचेच, तर काही किमान काळजी घेत जा ना राव! उगाच पाट्या टाकल्यागत लेख पाडायचे, ते कशापायी?
(मग तुमच्यात नि त्या पटाईतकाकांत फरक तो काय राहिला?))
असो चालायचेच.
वि. भि.कोलते आदरणीय व्यक्तिमत्व
एकेकाळी काय थोर मंडळी महाराष्ट्रात होती खरोखर महान ही विशेषण शोभेल अशी थोर मंडळी होती.
त्यांच्या काही विचाराशी मतभेद असेल नसेल तरीही अगदी खरोखर आदरणीय.
कोलते त्यापैकी एक
राजवाडे, नरहर कुरुंदकर, शेजवलकर, केतकर, मे पू रेगे, लक्ष्मणशास्त्री जोशी, रा.ची. ढेरे, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, शरत पाटील
आजच्या महाराष्ट्रात अशी जबरदस्त संशोधक किंवा स्वतंत्र विश्लेषण विचार देणारी माणसे अवतीभवती फारशी दिसत नाहीत.
समकालीन मध्ये मला
राजीव साने, मकरंद साठे, व इतर काही मोजकी मंडळी आवडतात. म्हणजे याचं वाचून काही नवीन विचार मिळतो
बाकी तर एकूण in general आनंदी आनंद आहे.
आभारी आहे
या लेखात अशा चुका आहेत. आम्ही खरडफळ्यावर नेहमी सगळ्यांना ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करायच्या दृष्टीने वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहावेत असे आवाहन करायचो. पण आम्ही कधीच लेख लिहिले नव्हते त्यामुळे इतरांना आवाहन करण्यापेक्षा आपणच सुरवात करून ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करायला मदत करावी असे वाटले. आम्ही सगळे एकदम खुशालचेंडू आहोत आणि फारसे विश्लेषण आम्हाला करता येत नाही. तरीही लेख लिहून ऐसीवर विचारप्रवर्तक वातावरण निर्माण करायला हातभार लागावा म्हणून हा लेख लिहिला आहे.
विचार सौष्ठत्व
अगदी बरोबर !
मी सुद्धा वैचारिक दृष्ट्या कृश झालेलो होतो.
मी ऐसी या वैचारिक व्यायामशाळेत नियमित येऊ लागलो.
वजनदार विचार उचलून उचलून माझे वैचारिक स्नायू मजबूत झालेले आहे.
आता मी कुठल्याही वैचारिक मल्लाचा मुकाबला करू शकतो.
याचे श्रेय ऐसी लाच आहे.
मी आता डाव्या उजव्या मधल्या कुठलाही वैमल्ल असो त्याला भिडू शकतो हा आत्मविश्वास मला ऐसी वर नियमित वैचारिक व्यायाम आणि साधना केल्यानेच आला.
Thank you ऐसी !
बरोबर, परंतु…
तुमचे म्हणणे बरोबर आहे. परंतु, कदाचित त्यांनी ‘दीपस्तंभ’ हा शब्द ‘दिव्याचा खांब’ अशा (शब्दशः) अर्थाने वापरला असू शकतो.
आता, त्या अर्थाने पाहायला गेले, तर ‘दीपस्तंभ’ हा धोक्याची सूचना देणारा ठरणार नाही खरा. परंतु तरीसुद्धा, त्याही परिस्थितीत, ‘दीपस्तंभा’चे अनेक चांगले उपयोग असू शकतात. जसे, मानवजातीचा मार्ग प्रज्वलित करण्यातील ‘दीपस्तंभा’चे योगदान मोलाचे ठरते. झालेच तर, काही इतर प्रजातींकरिता, मर्यादा आखून देण्यातही ‘दीपस्तंभ’ महत्त्वाची भूमिका बजावतो. (या दुसऱ्या भूमिकेत ‘दीपस्तंभा’ची तुलना कदाचित अमेरिकेतील fire hydrantशी करता यावी. पु.लं.नीही कोठेतरी ‘सारमेय-दीपस्तंभ-न्याया’चा उल्लेख या संदर्भात केलेला आहेच, तो इतक्यातच विसरलात काय?)
अर्थात, कोलत्यांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर त्यांनी मानवजातीकरिता दिलेले योगदानच तेवढे या संदर्भात लक्षात घेणे इष्ट ठरेल. असो चालायचेच.
दीपस्तंभ
तुम्हाला दीपमाळ म्हणायचे आहे काय?
त्रिपुर
पु. १. कार्तिकी पौर्णिमेला देवापुढे दीपमाळेवर किंवा इतरत्र कापूर वगैरेचा लावतात तो मोठा दिवा. २. शिवरात्रीला स्त्रिया शंकरापुढे लावतात त्या वाती, दिवे. ३. देवळासमोर उभारलेला दीपस्तंभ. [सं.]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8…+
थोडी निरूपयोगी माहिती
बी.एम.सी.सी वरून एफ.सी रोडला जाणार्या रस्त्याच्या बाजूला गोखले संस्थेजवळ एक इमारत आहे.तिथे वि.भि.कोलते राहायचे असा निळा फलक पुणे महापालिकेने लावला आहे. तिथे पूर्वी एक वाडा होता तो पाडून ती इमारत बांधली आहे. वि.भि.कोलते बहुतेक त्या वाड्यात राहात असावेत. माझी मावशी लग्न झाल्यावर नागपूरला गेली. तिचे यजमान नागपूर विद्यापीठाचे पदवीधर. त्यांच्या डिग्री सर्टिफिकेटवर कुलगुरू म्हणून वि.भि.कोलते यांची स्वाक्षरी बघितली आहे.
रावणाचा बाप अहिरावण
हॅ हॅ हॅ
जे जे चांगले ते मुळात वाईट(च) आहे आणि जे वाईट मानले जाते ते चांगले(च) आहे असा "डावा" पर्स्पेक्टीव ठेवणारे अनेक महानुभाव गेल्या शतकाने प्रसवले त्यातीलच हे पण एक नरपुंगव. विशेषतः हिंदू आणि वैदिकांवर गरळ ओकणारे हे तथाकथित विद्वान इतरांबद्दल चिडीचूप असतात.. कदाचित बाहेरुन येणारा पैसा यांचे तोंड बंद ठेवत असावा अशी शंका यावी असेच अनेकदा यांचे वर्तन असते.
असो.
बाकी चालू द्या.
हम्म्म्म्म्…
आपण अहिरावण म्हटल्यावर, आपले विचारांचे माध्यम यदाकदाचित पैशाची भाषा जर असलेच (चूभूद्याघ्या.), तर कोणास वास्तविक त्याबद्दल काही आश्चर्य वाटू नये.
परंतु तरीही, एका मराठीच्या प्रोफेसरास, नि त्यातूनही, नागपूरसारख्या दुय्यम दर्जाच्या (चूभूद्याघ्या.) विद्यापीठातील (कुलगुरू झाला, म्हणून काय झाले?) प्रोफेसरास, असले बाहेरचे फंडिंग कोण कशास झक मारावयास देईल, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. (किंबहुना, पैशाची भाषा समजणाऱ्यास इतका साधा प्रश्न पडू नये, याचे आश्चर्य वाटते.)
(म्हणजे, असे लक्षात घ्या. फंडिंग देणाऱ्याच्या पर्स्पेक्टिवातून पाहिले, तर त्यास यातून ROI काय? प्रस्तुत पुस्तक वाचून मूठभर मराठी साहित्यिक झीट येऊन पडले असतीलही. परंतु, त्यापलीकडे, त्याव्यतिरिक्त, या पुस्तकाचा खप असा कितीसा झाला असावा? (किंबहुना, झीट येऊन पडणारे साहित्यिक मराठी होते, ही बाब लक्षात घेता, त्यांनीसुद्धा हे पुस्तक विकत घेऊन वाचले असावे, हे शंकास्पदच आहे. म्हणजे, एकंदर खपाची शक्यता शून्यवतच.) व्यापक समाजात त्या पुस्तकातील विचार कितीसे पोहोचले असावेत?
बरे, पुस्तक मराठीत आहे, म्हटल्यावर, विदेशी ऑड्यन्स इल्ला. म्हणजे, तिकडूनही खपाची शक्यता नाहीच. (इंग्रजीत असते, तर कदाचित निदान तिकडे तरी धोधो खपले असते. वि.भिं.चे चुक्याच!) मग, अशा पुस्तकाच्या लेखकास फंडिंग देऊन उपयोग काय? कोणता बाह्य फंडिंग देणारा व्हेस्टेड इंटरेस्ट अशा रीतीने आपले पैसे गाढवाच्या **त सारण्यास उत्सुक असण्याइतका मूर्ख असेल?
नाही म्हणजे, मला पैशाची भाषा तितकीशी चांगली कळत नाही. (आणि, हो, हा माझा विनय आहे!) परंतु, हा बेसिक कॉमनसेन्स आहे, नव्हे काय?)
तरी बरे, रावण हा ब्राम्हण होता, ही बाब लक्षात घेता, प्रस्तुत पुस्तक हे ब्राह्मणांच्या (तथा ब्राह्मण्याच्या) समर्थनार्थ तथा ब्राह्मणेतरांप्रति द्वेषभावना पसरविण्याप्रीत्यर्थ लिहिलेले आहे, असा दावा आपण केला नाहीत. असाही दावा करण्यास वस्तुतः पुरेपूर स्कोप होता. (आफ्टर ऑल, राजा — नि उच्चवर्णीय — असला, म्हणून काय झाले? राम हा ब्राह्मणेतर नव्हता काय?) परंतु अर्थात, दावे हे ते करणाऱ्याच्या नज़रियानुसारच — पर्स्पेक्टिवानुसारच — सुचायचे. चालायचेच!
बाकी, आता बाह्य फंडिंगाचा विषय निघालाच आहे, तर… आपण येथे अधूनमधून टपकून लोकांच्या लेखांवर, झालेच तर प्रतिसादांवर, बऱ्यावाईट (Euphemism! Euphemism!) कमेंटा टाकीत असता. त्याबद्दल (आक्षेप नाही, परंतु) आपणांस फंडिंग नक्की कोणत्या बाह्य स्रोताकडून उपलब्ध होते, याबद्दल (आम्हांस) जबरदस्त कुतूहल वाटते खरे. (हेवाही वाटतो.)
(आणि, हा आमचा प्रश्न आपण आमच्यावरच उलटविण्याआधी, त्याचे (आमच्यापुरते) उत्तरही देऊन टाकतो. आम्हांस कोठलेही फंडिंग उपलब्ध नाही. आम्हांस फंडिंग कोण देणार? बाह्य जगात आम्हांस कुत्रे विचारीत नाही. (वस्तुतः, हे तितकेसे खरे नाही. आमच्या शेजाऱ्याच्या बॅकयार्डातील कुत्रा एके काळी आम्हांस पुष्कळ विचारीत असे. गेला बिचारा! परंतु, ते असो.) किंबहुना, बाह्य जगात कुत्रे विचारीत नसल्याकारणानेच आम्ही येथे येऊन वाटेल त्या पिंका (फुकटात!) टाकीत असतो, झाले! परंतु, हे आमचे झाले. आप का क्या, जनाबेअली?)
?
(सर्वप्रथम, जुन्या
हत्तीखान्यासखरडफळ्यास स्मरून:)विनम्र अभिवादन!
आता, एक शंका:
त्यांचे नाव जर वासुदेव, तर मग त्यांची आद्याक्षरे वि. भि. कशी?
(अवांतर: विकीपीडिया त्यांचे संपूर्ण नाव विष्णु भिकाजी कोलते असे नोंदवितो. असो चालायचेच.)