तोरई (दोडके) + कोथिंबिर सूप
आज सकाळी सौ. दोडक्याची भाजी बनवत होती. मी विनंती केल्यावर सौ.ने मुगाची डाळ भाजीत टाकली. डाळ टाकण्यामुळे दोडके कमी लागले. तीन दोडके, जवळपास 250 ग्राम, उरले. अचानक अनेक महिन्यांपासून सुप्त असलेला माझ्यातला पाकशास्त्री जागृत झाला. दोन दिवस आधीच आठवडी बाजारातून सौ. ने भरपूर कोथिंबिर ही आणली होती. माझ्या सुपीक डोक्यात विचार आला, आज आपण दोडके आणि कोथिंबिर सूप बनवू. सौ. ने नाश्त्यासाठी पोहे बनविणार होती. कोथिंबिर कापल्या नंतरच्या काड्या उरलेल्या होत्या. मी कड्यांसोबत जवळपास 50 ग्राम कोथिंबिर ही घेतली. स्वाद वाढविण्यासाठी एक टमाटो ही घेतला. एक आल्याचा तुकडा ही घेतला. सर्व साहित्य कापून कुकर मध्ये टाकले. कुकर गॅस वर ठेऊन दोन शिट्या होऊ दिल्या. कुकर थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सर मधून काढून भांड्यात टाकले. चार बाउल सूप झाले पाहिजे म्हणून अंदाजे पाणी ही भांड्यात मिसळले. आता भांडे गॅस वर ठेऊन एक उकळी येऊ दिली. त्यात अर्धा चहाचा चमचा काळी मिरी, जिरा पाउडर आणि स्वादानुसार सेंधव मीठ टाकले. गरमागर्म सूप बाउल मध्ये टाकून त्यावर लोणी टाकले. नंतर एक फोटू काढला. पोह्या सोबत हे सूप पिताना अत्यंत स्वादिष्ट लागले. दोडक्याची भाजी न खाणारे छोटे बच्चे ही, हे सूप आनंदाने पिणार याची ग्यारंटी मी देऊ शकतो.
टीप: घरात लोणी नसेल तर दुधावरची साय ही सुपात टाकली तरी स्वाद उत्तम लागेल. (घरी काळी मिरी नसेल तर एक हिरवी मिरची ही कापून कुकर मध्ये घालू शकता).
न बा सकारात्मक विचार करा
Chicken soup for soul या ग्रंथाचे वाचन करा.
जमल्यास पिता पिता वाचून बघा
We learn from observing nature. A seed produces after its kind. Apple seeds produce apples, not bananas. Grape seeds produce more grapes, not a harvest of onions. Seeds of love produce crops of love.
सदरहू ग्रंथातील एक सुंदर सुविचार
तुम्ही संस्कृतीसंमत सोमरस सुद्धा प्राशन करू शकतात
न बा सकारात्मक विचार करा
Chicken soup for soul या ग्रंथाचे वाचन करा.
जमल्यास पिता पिता वाचून बघा
We learn from observing nature. A seed produces after its kind. Apple seeds produce apples, not bananas. Grape seeds produce more grapes, not a harvest of onions. Seeds of love produce crops of love.
सदरहू ग्रंथातील एक सुंदर सुविचार
तुम्ही संस्कृतीसंमत सोमरस सुद्धा प्राशन करू शकतात
होते ना!
त्यात आर्य स्त्रिया ज्वारी, बाजरी वगैरे श्रीधान्यांचा कोंडा काढायच्या. आणि मग मूठ मूठ भरून जात्यात टाकून दळायच्या आणि आर्य पुरुषांना भाकरी खाऊ घालायच्या.
जे सुपात असतात ते कधी ना कधी जात्यात जातात या म्हणीचा प्रत्यय आज येतो आहे. आज स्त्रिया स्वैराचारी झाल्या आहेत आणि पुरुषांवर संसार टिकवायची जबाबदारी आली आहे. पण विश्वाच्या हिशोबात हे परिवर्तन घडायला लागणारा काळ म्हणजे केवळ एक क्षण. आता मोदीजी आले आहेत. तर ते पुन्हा स्त्रियांना जात्यावर बसवणार आहेत. त्यासाठी त्यांनी श्रीज्ज्वला योजना काढली आहे. स्त्रियांनी जातं वापरल्याने त्यांचे ट्रायसेप आणि कोर मसल टोन होणार हा एक अधिकचा फायदा. त्यामुळे त्या शयनेशु रंभा या कॅटेगरीतही बसतील
#ट्रॅडवाइफ
टाकले
इथेच नव्हे तर अनेक ठिकाणी, पाककृतींचे वर्णन करताना बहुसंख्य लोक, शिजवायच्या भांड्यात हे टाकले, ते टाकले असं लिहितात. लहानपणापासुन, भाजीत मीठ ,तिखट किंवा अन्य काहीही पदार्थ घातले, असं ऐकण्याची संवय असल्यामुळे, ही शब्दरचना कायम खटकते. ताटात अमुक वाढ असं म्हणण्याऐवजी, पोळी टाक, भाजी टाक हे कानाला कायम खटकते.
वर्तमानपत्रात बातम्या वाचतानाही साधारण असाच अनुभव येतो. लहान मुलगा किंवा मुलगी यांच्यासंबंधी काही दु:खद बातमी असली तरी , चिमुरडा, चिमुरडी असे शब्द वापरतात. अशा वेळी, चिमुकला,चिमुकली हे शब्दही मराठी भाषेत आहेत याची नवपत्रकारांना माहितीच नसते.
हम्म!
?
वेदकाळात सूप होते काय?
सूप ही मेकालेची देणगी नव्हे काय?