Skip to main content

मराठी भाषा दिन व भाषाभ्रम

मराठी भाषादिनानिमित्त टिप्पण करणारा डॉ. प्रकाश परब यांचा एक रोखठोक लेख मराठी भाषा दिन व भाषाभ्रम लोकसत्तात वाचला. मराठी भाषा अस्तंगत होते आहे, आणि काहीतरी जनजागृती उत्सव करून ती टिकेल हा भ्रम आहे असा लेखाचा रोख आहे. लेख मुळातच वाचावा, पण सारांश खाली मांडतो आहे
- मराठी दिनानिमित्त शुभेच्छांचा पाऊस पडतो, भाषेचा अभिमान असल्याचं जाहीर होतं, पण खरं चित्र काय आहे? इंग्रजी ही लोकभाषा व ज्ञानभाषा होणार आहे हे सत्य आपण 'पोपट मेला' प्रमाणे उच्चारायचा धीर करत नाही.
- मराठी ही ज्ञानभाषा कधीच होऊ शकणार नाही हे मान्य करायला हवं, कारण ती शिक्षणभाषा म्हणूनही टिकू शकलेली नाही. जी ज्ञानभाषा नाही ती जागतिकीकरणाच्या धबडग्यात टिकूच शकणार नाही.
- मराठी भाषा टिकवण्याचा प्रश्न सामाजिक किंवा सांस्कृतिक नाही - तर आर्थिक आहे. जी भाषा अर्थार्जन पुरवू शकत नाही तिची पाळंमुळं दुर्बळ होणार. आणि कधी ना कधी तो वृक्ष उन्मळून पडणार.
- भाषा सुदृढ नसताना ती आहे असं म्हणत राहणं धोकादायक आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर मराठी शाळा मरताना दिसतात, मराठी महाविद्यालयांना अवकळा आलेली आहे. हा ऱ्हास थोपवण्यासाठी सरकारने काही करणं अत्यावश्यक असूनही सरकार निष्क्रिय आहे. इतर भाषांबाबत हे प्रयत्न होताना दिसतात.
- स्वभाषा हे मूल्यच राहिलेलं नाही.

या मांडणीकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे हे निश्चित. गेली तीसपस्तीस वर्षं तरी मराठी मरत चालली आहे, आजकाल कामवाल्या बायकांनाही त्यांची मुलं इंग्लिश शाळेत घालण्याचा सोस असतो वगैरे ऐकू येतं आहे. त्याचबरोबर आपल्याला परबांनी म्हटल्याप्रमाणे अनेक शाळा सेमीमराठी होताना दिसताहेत. यावरून मराठी भाषा पुढची पन्नास-शंभर-दोनशे-पाचशे वर्षं टिकेल असं म्हणता येईल का? ऐसीकरांना याविषयी काय वाटतं?

ऋषिकेश Tue, 04/03/2014 - 14:03

In reply to by मी

नै कळ्ळे. काय वेगळं सांगतोय?

खरंतर हे अवांतर होईल पण थोडे वाचायला देतो


हे किंचित गुगलून मिळालेलं काही. तपशीलात शोधलं तर अजूनही मिळेल.
या अंगाने प्रतिसाद थांबवतो आहे कारणः

मुळ प्रतिसादात मराठी हा शब्द खोडताना शाळांची जी काही स्थिती आहे त्यात फक्त मराठीला वेगळे करता येणार नाही, सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे इतकेच सुचवायचे होते.

मन Tue, 11/03/2014 - 15:44

In reply to by ऋषिकेश

मराठी माध्यम निवदू न शकणारयंबद्दल घाउक व तोही जातीपातीसारख्या गलिच्छ कृत्याचा आरोप केला गेलेला प्रतिसादात दिसला.
ह्यावर "अहो तुम्हाला नाही हो. पण काहीजण असतात तसं म्हणणारे " वगैरे स्पश्टीकरणं शक्य आहेत.
पण वर दिलेल्या कारणांशिवायही काही पालक मराठी माध्यम असलेल्या शाळा नाकारत आहेत हेच नजरांदाज होते इतका हा प्रतिसाद जोरकस आहे.
( "मराठी शाळेला नाही म्हणतो काय; लोकांना अस्पृश्य समजणारा हरामखोर स्साला" असा प्रतिसादाचा सूर दिसला.)

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 15:47

In reply to by मन

पण वर दिलेल्या कारणांशिवायही काही पालक मराठी माध्यम असलेल्या शाळा नाकारत आहेत हेच नजरांदाज होते इतका हा प्रतिसाद जोरकस आहे.
( "मराठी शाळेला नाही म्हणतो काय; लोकांना अस्पृश्य समजणारा हरामखोर स्साला" असा प्रतिसादाचा सूर दिसला.)

नेमके अन मार्मिक.

शिवाय मराठी माध्यमाची इतकी भलावण करणारे जर स्वतः त्यात आपल्या पोरांना घालत असतील तरच या प्रतिसादाला काहीएक वेटेज आहे, नपेक्षा एक भले मोठे सिफर. कृतीची अपेक्षा प्रत्येक ठिकाणी करावी असे नै मात्र अशा ठिकाणी नै दिसली तर ढोंगीपणाचा आरोप होणे स्वाभाविक आणि योग्यही आहे.

सिफ़र Tue, 11/03/2014 - 16:56

In reply to by बॅटमॅन

शिवाय मराठी माध्यमाची इतकी भलावण करणारे जर स्वतः त्यात आपल्या पोरांना घालत असतील तरच या प्रतिसादाला काहीएक वेटेज आहे
+१

ऋषिकेश Tue, 11/03/2014 - 17:39

In reply to by बॅटमॅन

मुलांच्या शिक्षण-माध्यमांवर चर्चा करण्यासाठी, त्यावर कोणत्याही बाजुने मते मांडण्यासाठी व त्या मतांना काही एक वेटेज वगैरे येण्यासाठी मुळात मुले जन्माला घालायची पुर्वअट कशाला?

मन Tue, 11/03/2014 - 17:44

In reply to by ऋषिकेश

कृती व उक्ती ह्यात अंतर असू नये हे ब्रॉड स्केलवर वरील प्रतिसाद कर्त्यांना म्हणायचं असावं.
"हाड थू तुम्हा अंधश्रद्ध, मठ्ठ लोकांच्या " असं देवळात जाउन फक्त नमस्कार करणार्‍या व्यक्तीला कुणी म्हणेल व स्वत: मात्र माघारी जाउन सत्यनारायण घालेल किंवा नारायण नागबली करेल तर क्रुती व उक्तीत अंतर येते. ते असू नये असे म्हणणे दिसते.
अंधश्रद्धा वगैरे सेफ पॉलिटिकली करेक्ट, दिप्लोमॅटिक भाषाच कशाला प्रामाणिकपणानं "थुत तुमच्या देवाच्या " असं कुणी म्हणालं तरी ते ऐकून घेता येतं; समोरचा गंभीरपणे व प्रामाणिकपणे म्हणत असल्यास.

मेघना भुस्कुटे Tue, 11/03/2014 - 17:45

In reply to by ऋषिकेश

समलिंगी संबंधांना पाठिंबा देण्यासाठी, लग्नसंस्थेबद्दल काही मत व्यक्त करण्यासाठी, बालसंगोपनावर मत देण्याआधी.... असो. असल्या पूर्वअटींची पूर्तता करायला थांबायचं म्हटलं, तर झालंच!

मन Tue, 11/03/2014 - 17:51

In reply to by मेघना भुस्कुटे

प्रतिसादाचा सूर " अमुक एक कृती करणारे सगळे कसे इतरांना विनाकारण तुच्छ समजणारे , बुरसटलेल्या मनोवृत्तीचे आहेत" असा दिसतो. आता दुसर्‍अयंना बुरसटलेलं म्हटलं की स्वतः आपण तसे नाही; हे बाय डिफॉल्ट येतच.(केजरीवाल स्टाइल स्वतःच स्वतःला स्वच्छतेचं सर्तिफिकेट द्यायच; दुसरयवर आरोप करुन!)
अमुक एक कृती करण्याचे दुसरे काही कारण असूच शकत नाही; हे ग्रुहितक त्यामागे नाही का ?
म्हणजे ती गोष्ट करणारे सगळेच्या सगळे **घाले बायड्फॉल्ट ?

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 17:48

In reply to by ऋषिकेश

मुलांच्या शिक्षण-माध्यमांवर चर्चा करण्यासाठी, त्यावर कोणत्याही बाजुने मते मांडण्यासाठी व त्या मतांना काही एक वेटेज वगैरे येण्यासाठी मुळात मुले जन्माला घालायची पुर्वअट कशाला?

मस्त पळवाट.

मते मांडणे अन चर्चा करणे याला काही प्रीरेक्विसिट नाही. मीही उद्या आईन्स्टाईनची थेरी कशी चुकलेली आहे आणि न्यूटन कसा जगातला सगळ्यात मूर्ख माणूस होता वैग्रेवर प्रवचन देतो.

पण त्या मताला वेटेज कधी येईल? एक तर मी फिजिसिस्ट असेन किंवा नसलो तरी त्याचा सखोल अभ्यास असेल तरच. ही अट लै आहे का?

तद्वतच, एक तर मुले जन्माला तरी घाला नैतर त्या प्रश्नाचा सखोल अभ्यास तरी करा. सखोल अभ्यास असणारे विचारवंत किती? बाकीचे किती?

मुले जन्माला न घातल्यामुळे, त्या प्रश्नाचा सामना करायला न लागला तर ज्यांना त्याचा सामना करायला लागतो ते तुमच्या मताला किंमत का देतील? (अझ्यूमिंग तुम्ही त्या प्रश्नाचे जाणकार नाही)

आता त्यांनी किंमत द्यावी का अन त्यांनी दिलेल्या महत्त्वाला इच्यारतो कोण असे प्रश्न हे मी माझ्या तोकड्या आकलनाआधारे आईन्स्टाईनवर टीका केली, अन कुणी जाणकाराने माझ्यावर टीका केली तर त्याच्या मताला मी का महत्त्व देऊ या प्रश्नासारखेच आहेत.

मेघना भुस्कुटे Tue, 11/03/2014 - 17:52

In reply to by बॅटमॅन

दोन गोष्टींमध्ये गल्लत होतेय.

अमुक एका विषयावर अभ्यासपूर्ण मत असणं आणि त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव असणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत. हर्ष भोगलेला उद्या म्हटलं, दोन षटकं खेळून दाखव रे साल्या, नि मग काय ती बकबक कर, तर चालेल? किंवा चिंजंना सांगितलं, आधी एक छानसा-छोट्टुसा-भारीसा सिनेमा तयार करून दाखवा, तरच तुमच्या मताला किंमत आहे, तर योग्य ठरेल का ते?

भ्रष्टाचार करणे आणि करू नका हे सांगणे - ही निराळी गोष्ट आहे.
आणि पोटचं मूल नसताना मूल कसं वाढवावं यावर काहीएक मत देणं - ही निराळी गोष्ट आहे.

मन Tue, 11/03/2014 - 17:56

In reply to by मेघना भुस्कुटे

घाउक आरोप करणं योग्य आहे का ?
(घाउक विधानं बिचार्‍या अरुण जोशी काकांनी केली तर सगळी प्रोग्रेसिव्ह मंडळी अंगावर धावून जातात.
तावातावाने हातवारे करत आपापलं म्हणणं मांडतात. मग इथे अपवाद कशाला ?)

मन Tue, 11/03/2014 - 18:05

In reply to by मेघना भुस्कुटे

वरचाच प्रतिसाद पुनः लिहीत होतो; तोवर तुझा उपप्रतिसाद आला.
वरचा प्रतिसाद मी पुन्हा अधिक तपशील घालून लिहितो आहे :-
आरोप मेघनाने केलेला नाही; ऋ च्या प्रतिसादातून आरोप होत आहे.

घाउक आरोप करणं योग्य आहे का ?
(घाउक विधानं बिचार्‍या अरुण जोशी काकांनी केली तर सगळी प्रोग्रेसिव्ह मंडळी अंगावर धावून जातात.
तावातावाने हातवारे करत आपापलं म्हणणं मांडतात. मग इथे अपवाद कशाला ?)

मागेही एका ठिकाणी चिंजंनी "महारांसारखा मानी समाज पेशवाईतला अपमान सहन करणं शक्यच नव्हतं" असं कहीतरी लिहिलं.
असलच इतरांनी ; विशेषतः अवकाश ताण सिद्धांतवाल्या काकांनी लिहिलं तर ते सरसकटीकरण .
हे बरय.
ऐसीवर "सरसकटीकरण सरसकटीकरण " म्हणत असलं काही धोपटतात की बास रे बास.
"म्हशींना पाण्यात डुंबायला आवडते" हे वाक्य आमच्या विज्ञानाच्या पुस्तकात होते.(हो. तोच तो ब्रोइंग धडा "निकोलेस थोउदोर्डिसेसुर्रे" असलं अजब नाव लक्षात ठेवायला लावणारा.)
तेच वाक्य ऐसीच्या दडपणाने "बहुदा काही म्हशींना कधी कधी पाण्यासारख्या कशात तरी डुंबायला आवडत असावे असे कधी कधी जाणवते" असे गोलमोल करुन लिहायला शिकलो. नैतर "सरसकटीकरण सरसकटीकरण " म्हणत बोंब व्हायची पुन्हा.
"मला भूक लागली" ऐवजी पोलिटिकली करेक्ट वगैरे रहायला "मला भूक लागल्यासारखे वाटते"
किम्वा
"मी दिवसातून दोनदा जेवतो" ऐवजी "मी बहुतांश वेळा दिवसातून दोनदा जेवतो" असे लिहावे लागावे असे वातावरण ऐसीवाले बनवतात.

आम्ही करतो ते सरसकटीकरण तुम्ही करता ते निरीक्षण!
हे बरय.

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 17:57

In reply to by मेघना भुस्कुटे

तोच तर मुद्दा आहे!

प्रत्यक्ष अनुभव तरी घ्या नपेक्षा त्या विषयाचा सखोल अभ्यास तरी करा. जर हे दोन्हीही नसेल तरी मांडल्या जाणार्‍या मतांना एका मर्यादेपलीकडे प्रत्यक्षानुभवींनी का महत्त्व द्यावे? असा प्रश्न आहे. त्यामुळे माझी वरिजिनल पृच्छा गैरलागू ठरत नाही.

चिंतातुर जंतू Tue, 11/03/2014 - 18:01

In reply to by बॅटमॅन

>>प्रत्यक्ष अनुभव तरी घ्या नपेक्षा त्या विषयाचा सखोल अभ्यास तरी करा. जर हे दोन्हीही नसेल तरी मांडल्या जाणार्‍या मतांना एका मर्यादेपलीकडे प्रत्यक्षानुभवींनी का महत्त्व द्यावे? असा प्रश्न आहे.

मांडलेलं मत पुरेसं वेधक असलं तर ते प्रत्यक्ष अनुभवातून आलं आहे की अभ्यासातून की अंगभूत अकलेतून की आणखी कशातून हा मुद्दा गैरलागू ठरावा.

मेघना भुस्कुटे Tue, 11/03/2014 - 18:03

In reply to by चिंतातुर जंतू

राइट!
नाहीतर आता मागे जाऊन ज्ञानोबाला सांगा, की बाबा रे, तू मिसरूड न फुटलेला पोरगा. तू काय अक्कल शिकवतोस? आधी पोरगी पटव, संसार कर, पोरं आण. त्यांची खळगी भर. नि मग काय तो उपदेश कर.

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 18:06

In reply to by चिंतातुर जंतू

मग ते डेथ ऑफ एक्स्पर्ट इ.इ. काय होतं बॉ? पुणे मनपामधील कैक उंदीरमार लोकही राजकारणादि विषयांवर पुरेशी रोचक अन वेधक मतं मांडतच असतात की. त्याला तेव्हा विरोध दिसला अन आत्ता कसा काय सपोर्ट?

मन Tue, 11/03/2014 - 18:06

In reply to by चिंतातुर जंतू

मत वेधक असणं वगैरे छान आणि थोर आहेच. त्याबद्दल सादर सलाम.
पण कृती आणि उक्तीमध्ये अंतर असेल तर काय करायचे ?
इतक्या साध्या प्रश्नाला बगल का दिली जात आहे ते सांगितलत तर बरं होइल.

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 18:08

In reply to by मन

पण कृती आणि उक्तीमध्ये अंतर असेल तर काय करायचे ?
इतक्या साध्या प्रश्नाला बगल का दिली जात आहे ते सांगितलत तर बरं होइल.

असेच म्हणतो.

उक्ती आणि कृतीत अंतर असल्याने काय फरक पडतो इ.इ. चर्चा सुरू झाली तर मात्र मजा येईल.

रोचना Wed, 12/03/2014 - 11:05

In reply to by चिंतातुर जंतू

हे काही बाबतींत ठीक आहे: मला स्वतः सिनेमा काढता (अथवा कादंबरी लिहीता, चित्र रेखाटता)येत नाही , पण अमुक सिनेमा, कादंबरी, चित्र कसं बेकार आहे, चांगल्यात काय असावे लागते हे मी सांगू शकते.
पण शिक्षणमाध्यमाचा, मुलांच्या जीवनाविषयी निर्णयांचा हा मुद्दा "पुट यॉर मनी वेर यॉर माउथ इज" च्या सदरात मोडतो. कारण त्याला कमिटमेंट लागतं, मताला कृतीची जोडी असावीच लागते. राजकीय/सामाजिक मंचावर मत मांडायचं एक आणि कमिट करणं कठीण जातं म्हणून करायचं वेगळंच, याची खूप उदाहरणं आहेत. प्रांतिक भाषांची तथाकथित "बाजू" घेऊन स्वत: च्या मुलांना इंग्रजी शाळांमधे पाठवणारे राजकीय नेतेही देशात कमी नाहीत. तसेच भारताच्या स्वदेशीचे गुण गाऊन स्वतःच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी अमेरिकेला जाणं. भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणे पण स्वतः गपचूप लाच देऊन काम करून घेणे.
हे ऋषिकेशला उद्देशून नाही, जनरली म्हणतेय - त्याला मुलं आहेत का, आणि ती कुठल्या शाळेत जातात हे मला ठाउक नाही . आणि ज्यांना मुलं नाहीत त्यांनी याबद्दल मत मांडू नयेत असंही अर्थातच होत नाही - ज्यांना आहेत, आणि जे या विषयावर आवर्जून मत मांडतात, त्यांच्या कमिटमेंटला उद्देशून आहे.

मी Tue, 11/03/2014 - 17:58

In reply to by मेघना भुस्कुटे

लॉस्ट इन ट्रान्सलेशन अव्हॉइड करण्यासाठी - माझा मुद्दा होता की माझ्या मुलांना मराठी शाळेत न टाकता 'मुलांना मराठी शाळेतच कसं टाकलं पाहिजे' ह्यावर चर्चा करणे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/03/2014 - 19:31

In reply to by मी

'मुलांना मराठी शाळेतच कसं टाकलं पाहिजे' असा सूर ऋच्या या प्रतिसादात (आणि अन्यत्र) मला तरी जाणवला नाही. माझ्या आकलनानुसार त्याच्या प्रतिसादातून, "मराठी शाळा नकोच, इंग्लिश माध्यम किंवा इंटरनॅशनल स्कूलच हवी," असं म्हणणाऱ्या पालकांमधे त्याला सर्वसाधारणपणे दिसणारी, जाणवणारी काही लक्षणं होती. या पलिकडच्या कारणांमुळे पालक मुलांना ठराविक शाळांमधे घालतात/घालत नाहीत असा दावा दिसला नाही. बहुसंख्य समाजाचं वर्तन असं दिसत असेल, असा अर्थ मला त्यातून जाणवला. (मुळात मी असा विचार करत नव्हते तरी त्याचा विचार मला पटण्यासारखा वाटला. पण ती गोष्ट निराळी.)

मला जे हे असं जाणवलं, ज्यात मला इतरांप्रती तुच्छता जाणवली नाही, त्यात अन्य कोणाला अशी तुच्छता जाणवावी याबद्दल (नेहेमीप्रमाणे) आश्चर्य वाटलं. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी, मूल्यं बाळगणारे लोक समाजात आहेत हे दिसणं, आणि त्याचा उच्चार केला म्हणजेच इतरांप्रती तुच्छता दाखवली असं का समजावं? यात बहुदा भावना दुखावणे असा एक कंगोरा असेल आणि तो एक फारच निराळा विषय आहे.

मुळात ऋच्या प्रतिसादात काय लिहीलं होतं याचा मला लागलेला किंवा मी लावलेला जो अर्थ आहे त्यानुसार वरचा मुद्दा अस्थानी ठरतो. पण त्यावर एवढे प्रतिसाद-प्रतिप्रतिसाद पाहून राहवलं नाही एवढंच.

मी Tue, 11/03/2014 - 20:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे विधान बॅटमॅनच्या प्रतिसादातले -

शिवाय मराठी माध्यमाची इतकी भलावण करणारे जर स्वतः त्यात आपल्या पोरांना घालत असतील तरच या प्रतिसादाला काहीएक वेटेज आहे,

ह्याला माझा दुजोरा म्हणून प्रतिसाद अजुनही आहे.

ह्यावर मी इतर कोणाला विरोध केल्याचे कसे कळते हे समजले नाही, लॉस्ट इन ट्रान्सलेशन झालेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/03/2014 - 20:40

In reply to by मी

कुठेतरी प्रतिसाद द्यायचाच तर जिथे मुद्दयाबद्दल आणि आरोप न करणारा थेट प्रश्न होता तिथे प्रतिप्रतिसाद दिला. तो फक्त तुम्हालाच उद्देशून दिला आहे असं नाही. (खांदा वापरला म्हणा, हवंतर!)

अनुप ढेरे Tue, 11/03/2014 - 18:05

In reply to by मेघना भुस्कुटे

उद्या भोगले काका सेहवागला सांगायला गेले की सरळ ब्याटनी खेळ तर सेहवाग काय म्हणेल?

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 18:07

In reply to by अनुप ढेरे

यग्जाक्टली!!!

प्रत्यक्षानुभवी लोकांनी कुणाचा सल्ला मानावा? एक तर अन्य प्रत्यक्षानुभवींचा किंवा सखोल अभ्यासू लोकांचा. काठावर बसून दगड मारणार्‍यांना तसेही प्रत्यक्षानुभवाचे काय होय!

अनुप ढेरे Tue, 11/03/2014 - 18:12

In reply to by बॅटमॅन

किंवा अजुन योग्य उदाहरण म्हणजे सेहवाग कुठल्या नव्या बॅट्समनला फुटवर्क शिकवायला लागला तर?
किंवा करण जोहर कोणाला 'चित्रपटात मोठे सेट्स, गाणी वगैरे अजिबात वापरू नयेत' असं शिकवायला लागला तर?

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 18:15

In reply to by अनुप ढेरे

भोगलेनं फुटवर्क शिकवणं अन सेहवागनं शिकवणं यात नक्कीच गुणात्मक फरक आहे.

प्रत्यक्षानुभवी माणसाने दिलेला प्रत्येक सल्ला योग्य असेलच असे नाही, पण यावर जास्त फोकस करून लॅक ऑफ अनुभवालाही तेवढीच लेजिटिमसी दिली जातेय असं वाटतंय आणि तिथेच प्राब्ळम आहे.

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 18:25

In reply to by साहिर

होईल की. पण किमान अनुभव असणे हा निकष लै होत नै ना? चर्चेचा एकूण सूर पाहता, वैचारिक क्षेत्रातही लोकशाही आणावी असे लोकांचे मत असल्यासारखे दिसते आहे. एका मर्यादेपुढे तो मूर्खपणा आहे.

साहिर Tue, 11/03/2014 - 18:35

In reply to by बॅटमॅन

एकुणच सर्व लोकांना मतदाना चा अधिकार हाच एक मुर्ख पणा आहे.
माझ्या मते तो काही कसोट्यांची पुर्तता केल्यावर १०-२०% लोकांना मिळाला पाहीजे.

मन Tue, 11/03/2014 - 18:15

In reply to by बॅटमॅन

गांधींची चेष्टा करणारय; स्वतः स्वातंत्र्यलड्यात काहिच योगदान न देणार्‍अय हिम्डुत्ववादी मंडाळींपैकी काहिंबद्दल कुरुंदकरांनी हेच लिहिलय.
पराक्रमी पण जखमी, पराभूत योद्ध्यास सज्जात बसून चकआट्या पिटणार्‍यांनी हिणवल्यासारखी परिशितीत १९४७- १९४८ दरम्यान होती. स्वतः गांधींनी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन काही केले नाहिच; उलट होता होइल तो सर्व प्रयत्न योग्य दिशेनेच केले; पण ते अपुरे ठरले म्हणून इतरांनी चिखल उडवण्याचे व हेतूंवरच श़्आ घेण्याचे कारण नाही.

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 18:18

In reply to by मन

सहमत!

गांधींना हिणवणारे हिंदुत्ववादी काय आणि शासनाचे सर्व फायदे उपटून शासनव्यवस्थाच नको असे बोंबलणारे अ‍ॅनार्किस्ट लोक काय, सारखेच.

साहिर Wed, 12/03/2014 - 14:11

In reply to by मन

स्वातंत्र्यलड्यात काहिच योगदान न देणार्‍अय

स्वातंत्र्यलढा वगैरे असे काहीही नव्हते हो. इंग्रजांच्या वेळेला जेव्ह्डे व्यक्ती आणि मत स्वातंत्र होते तेव्हडे आता नाही.
इंग्रज असल्या पासुन च नगरपालिका, विधानसभा वगैरेत देशीच लोक होती.

काही लो़कांना स्वताकडे पुर्ण सत्ता पाहीजे होती त्यामुळे त्यांनी हे नाटक उभे केले आणि त्याला स्वातंत्र्यलढा वगैरे म्हणले.

आडकित्ता Tue, 11/03/2014 - 19:29

In reply to by मन

कोणत्या प्रतिसादाला वेटेज देण्यासाठी प्रतिसाद देण्यासाठीच्या पूर्वअटी घालण्याबद्दलच्या या ^^ चर्चेत, मूळ चर्चाविषय फाट्यावर तर कधीच गेलेला दिसला, शिवाय, "मुलांनी आपल्या मातृभाषेत सुरुवातीचे शिक्षण घेणे हे त्यांच्या परिपूर्ण वाढ/व्यक्तीमत्व विकास यांसाठी अधिक फायद्याचे असते", या मूळ संकल्पनेबद्द्लही काडीची चर्चा दिसत नाहिये.

आपल्याला मुले नसतील तर बोलू नका, या मुद्द्यावरच्या तिरकस-सब तिरकस चर्चेतून एकच गोष्ट मिळाली, ती म्हणजे,
उत्क्रांतीच्या धाग्यावर आता मी जोशीकाकांना सांगू शकतो,

"उत्क्रांत झाले नसाल, तर उत्क्रांतीबद्दल बोलू नका."

;)

आडकित्ता Tue, 11/03/2014 - 20:50

In reply to by बॅटमॅन

तो प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत, याचा पुरावा होता.
पण, या वरच्या लॉजिकने डायरेक निरुत्तर करता येईल की ;)

अवांतर : ऐसीवर लाईव्ह चर्चा व पेटलेले बाफ पहायला मिळू लागलेत, हे माझ्या मते चांगले लक्षण आहे.

मन Tue, 11/03/2014 - 21:22

In reply to by आडकित्ता

आपल्याला मुले नसतील तर बोलू नका, या मुद्द्यावरच्या तिरकस-सब तिरकस चर्चेतून एकच गोष्ट मिळाली, ती म्हणजे,
उत्क्रांतीच्या धाग्यावर आता मी जोशीकाकांना सांगू शकतो,

ही माझ्या भूमिकेची विपर्यस्त मांडणी आहे. ह्याने दिशाभूल होउ शकते.
माझी भूमिका असली तर इतकीच :-
१.आपली मुले इंग्लिश मिडियमात घालूनसुद्धा इतरांना मराठी शाळा पूर्ववत ठणठणीत आहेत; त्यात घालणे अत्यावश्यक आहे असे सांगू नका .
२. स्वतःची मुले मराठी माध्यमात घातली असली तरीसुद्धा ज्यांनी अपल्या मुलांना मराठी मिडियमात घातले नाही अशांवर बेछूट आरोप करण्यचे लायसन आपल्याकडे आहे समजू नका.
"मराठी माध्यमात येत नाही तो. हलकट लेकाचा; कुजकट विचारांचा. लोकांना अस्पृश्य समजणारा" असे थेट आरोप करु नका.
"स्वतःला मूल नसेल तर बोलूच नका" असे मी म्ह्णालोच नाही. ऋ ने तो मुद्दा त्याच्या उपप्रतिसादात काढला आहे.

आडकित्ता Tue, 11/03/2014 - 22:11

In reply to by मन

अहो,

कुठेतरी प्रतिसाद द्यायचाच तर जिथे मुद्दयाबद्दल आणि आरोप न करणारा थेट प्रश्न होता तिथे प्रतिप्रतिसाद दिला. तो फक्त तुम्हालाच उद्देशून दिला आहे असं नाही. (खांदा वापरला म्हणा, हवंतर!)

हा त्यांचा प्रतिसाद.
मत्लब के, फकस्त तुम्हाला उद्देशून नाही बोललो भाऊ!
या तिरकस चर्चांचे सार कुठे लिहावे, तर ते सर्व तिरक्या चर्चांच्या खाली यावे म्हणून इथे लिहिले इतकेच. अर्थात, तुमचा खांदा वापरून बंदूक चालवली.
आंतर्जालीय चर्चा अन संस्थळे इतकी शिरेस्ली घेत नका जाऊ ब्वा.

ऋषिकेश Wed, 12/03/2014 - 09:37

In reply to by मन

मराठी माध्यम निवदू न शकणारयंबद्दल

शकणार्‍यांबद्दल आरोप केलेला नाही निवडु न इच्चिणार्‍यांबद्दलच्या एका मोठ्या गटाबद्दलचे हे माझे मत आहे.

घाउक व तोही जातीपातीसारख्या गलिच्छ कृत्याचा आरोप केला गेलेला प्रतिसादात दिसला.

जातीभेदही आहेच नी ते कारणही आहेच यासाठी मला स्वतः मुले जन्माला घालायची नी त्यांना मराठी शाळेतही घालायची पूर्वअट धुकडावून मी माझे हे मत देतो आहे. मी माझ्या मुलांना इंग्रजी शाळेत घातले तरीही मराठी शाळेत घालणेच मुलांच्या दृष्टीने योग्य आहे हे माझे मत मी कायम ठेऊ शकतो. माझ्या मताला कोणीही उठून वेटॅज द्यावे म्हणून मी माझी मते मांडत नाही, ती माझी प्रामाणिक मते असतात.

ह्यावर "अहो तुम्हाला नाही हो. पण काहीजण असतात तसं म्हणणारे " वगैरे स्पश्टीकरणं शक्य आहेत.

तुमच्याबद्दल कल्पना नाही. तुमचे इतके दैनंदिन वागणे बघितलेले नाही त्यामुळे जातीभेद पाळता/पाळत नाही यावर टिपणी करणे उचित होणार नाही. स्पष्टीकरणाचा प्रश्नच नाही, त्याच बरोबर चोराच्या मनात चांदणे वगैरे फसवे काहीही म्हणणार नाही. मात्र मी जो उच्चभ्रुंचा सँपलसेट बघितला आहे त्यातील बहुतांश (९०-९५%) मंडळी जातीभेद प्रकटपणे/अप्रत्यक्षपणे/कधी स्वतःच्या नकळत पाळताना दिसलेली आहेत.

पण वर दिलेल्या कारणांशिवायही काही पालक मराठी माध्यम असलेल्या शाळा नाकारत आहेत हेच नजरांदाज होते इतका हा प्रतिसाद जोरकस आहे.
( "मराठी शाळेला नाही म्हणतो काय; लोकांना अस्पृश्य समजणारा हरामखोर स्साला" असा प्रतिसादाचा सूर दिसला.)

बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर!
मुळात त्याच्या मागे जातीभेदाचे एकमेव कारण आहे असे कुठेही म्हटलेले नाही. आर्थिक कारणे आहेतच, आणि त्याला माझ्या पहिल्याच प्रतिसादाच्या पहिल्याच वाक्यात सहमती दिली आहे. तरीही इतर कारणे नजरंदाज वगैरे केलीत हे कशावरून म्हटले आहे?

असो. काही गोष्टी, गंड इतक्या खोलवर भिनलेल्या आहेत की त्या दाखवून दिल्या की "तुला काय कळतंय त्यातलं?" "तुला बोलायचा हक्कच काय?" "स्वतःची कृती पाहिलीस का?" हे वाक्य नी "आम्हाला शिकवायच्या आधी स्वतःच तोंड पाहिलंस का आरशात?" वगैरे उच्चभ्रु प्रतिवाद अनेकदा होतात, त्यात समोरच्याला गप्प करणे याव्यतिरिक्त कोणताही उद्देशही नसतो आणि त्याहून अधिकचा मुद्दाही. आता सवयीने त्याचं काही वाटत नाही, पण विषयावर प्रतिवादाचे मुद्दे संपल्यावरही टांग उपरच ठेवायची असेल तर अश्या पातळीवर मंडळी आली की गंमत जरूर वाटते.

यावर अधिक काही लिहायची इच्छा नाही. माझी मते पुरेशी स्पष्ट आहेत. ज्यांना ते स्वतःवरून आरोप किंवा घाऊक आरोप वाटतात त्यांनी तसा खुशाल गैरसमज करून घ्यावा. या धाग्यावर माझ्याकडून इत्यलम्!

नितिन थत्ते Wed, 12/03/2014 - 10:18

In reply to by ऋषिकेश

स्वतः मुले जन्माला घालणे एकवेळ सोडून दिले तर स्वतः इंग्रजी माध्यमात मुलांना घातलेल्यांनी मराठी माध्यमात शिकणेच योग्य अशी भूमिका घेतली तर त्या भूमिकेला 'शब्द बापुडे केवळ वारा' इतकेच महत्त्व राहते. [त्याखेरीज मी मुलाला/मुलीला इंग्रजी शाळेत घालून पस्तावलो अशी भूमिका घेत असाल तर ठीक].

मेघना भुस्कुटे Wed, 12/03/2014 - 10:21

In reply to by नितिन थत्ते

या मुद्द्यावर बिपिन कार्यकर्येंनी त्यांचा अनुभव इथे मांडला तर फार बरं होईल. बर्‍याच वांझोट्या चर्चा टळतील.

बॅटमॅन Wed, 12/03/2014 - 12:55

In reply to by नितिन थत्ते

स्वतः मुले जन्माला घालणे एकवेळ सोडून दिले तर स्वतः इंग्रजी माध्यमात मुलांना घातलेल्यांनी मराठी माध्यमात शिकणेच योग्य अशी भूमिका घेतली तर त्या भूमिकेला 'शब्द बापुडे केवळ वारा' इतकेच महत्त्व राहते.

एग्झॅक्टलि!!!!

असे असूनही त्या भूमिकेच्या लेजिटिमसीला चिकटून राहणे कै झेपत नै.

चिंतातुर जंतू Wed, 12/03/2014 - 13:31

In reply to by नितिन थत्ते

>> स्वतः मुले जन्माला घालणे एकवेळ सोडून दिले तर स्वतः इंग्रजी माध्यमात मुलांना घातलेल्यांनी मराठी माध्यमात शिकणेच योग्य अशी भूमिका घेतली तर त्या भूमिकेला 'शब्द बापुडे केवळ वारा' इतकेच महत्त्व राहते. [त्याखेरीज मी मुलाला/मुलीला इंग्रजी शाळेत घालून पस्तावलो अशी भूमिका घेत असाल तर ठीक].

ह्यामागे काही गृहितकं आहेत आणि ती आजच्या वास्तवात व्यवहार्य असतीलच असं नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे -

आज माझ्या परिसरात दोन वेगवेगळ्या मातृभाषा असणारी अनेक जोडपी आहेत (म्हणजे पतीची मातृभाषा एक आणि पत्नीची दुसरी). शिवाय, तुम्ही बंगलोर-मुंबई-पुण्यासारख्या (पक्षी : कॉस्मॉपॉलिटन) परिसरात राहात असलात तर आसपास हिंदी-इंग्रजी-स्थानिक अशा अनेक भाषा बोलल्या जातात. नोकरी आज आहे तर उद्या नाही, किंवा तिच्यासाठी गाशा गुंडाळून देशात किंवा परदेशात कधीही जावं लागतं अशी परिस्थिती असते. जागतिकीकरणानंतर ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात मेट्रोपॉलिटन शहरांतल्या मध्यमवर्गात दिसू लागली. त्यामुळे 'मातृभाषेत शिकायला सोपं जातं' हे गृहीतकच त्यांच्या बाबतीत खोटं ठरतं. अशा लोकांनी त्यांच्या मुलांना कोणत्या माध्यमात घालायचं आणि त्याबद्दल त्यांना किती दोष द्यायचा ते मला कळत नाही. पण तरीही आपल्या मुलाची त्याच्या मातृ-पितृभाषेशी काही तरी नाळ लागावी असं त्यांना वाटत राहतं (किमान असं दिसत राहतं). त्यासाठी ते प्रयत्नदेखील करताना दिसतात. तरीही त्यांना जे वाटतं ते आणि ते जे जगतात ते ह्यांतले अंतर्विरोध दिसत राहतात. त्यांना 'शब्द बापुडे...' म्हणून फटकारण्याची मला इच्छा होत नाही.

नितिन थत्ते Wed, 12/03/2014 - 13:39

In reply to by चिंतातुर जंतू

ऋषिकेशच्या मूळ प्रतिसादात
न शकणार्‍यांबद्दल आरोप केलेला नाही निवडु न इच्चिणार्‍यांबद्दलच्या एका मोठ्या गटाबद्दलचे हे माझे मत आहे
हे वाक्य आहे.

त्यामुळे
नोकरी आज आहे तर उद्या नाही, किंवा तिच्यासाठी गाशा गुंडाळून देशात किंवा परदेशात कधीही जावं लागतं अशी परिस्थिती असते. जागतिकीकरणानंतर ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात मेट्रोपॉलिटन शहरांतल्या मध्यमवर्गात दिसू लागली.
हे सर्व त्या भूमिकेला गैरलागू आहे.

बॅटमॅन Wed, 12/03/2014 - 14:50

In reply to by नितिन थत्ते

पूर्ण सहमत. ज्यांना जमत नाही त्यांचं ठीके, त्यांचा कळवळाही ठीके, मात्र त्यांचं अथवा बुद्ध्याच न जमणार्‍यांचं घाऊक मतप्रदर्शन पाहिलं की शब्द बापुडे केवळ वारा असेच वाटणार.

उक्ती आणि कृती यातील बुद्ध्याच असलेल्या फरकाचे समर्थन पाहून रोचक वाटले खरे. या न्यायाने कुणाही राजकारण्याला काहीच बोलता कामा नये.

मेघना भुस्कुटे Wed, 12/03/2014 - 14:57

In reply to by बॅटमॅन

उक्ती आणि कृती यांच्यातल्या फरकाचं समर्थन करण्याचा माझा अ-जि-बा-त इरादा नाही.

पण अमुक एखादी कृती करण्याची संधी एखाद्या व्यक्तीकडे नसेल, तर त्या व्यक्तीला त्या विशिष्ट कृतीबद्दल मतच व्यक्त करण्याचा अधिकार नाही - असा युक्तिवाद बरेचदा केला जातो. उदाहरणार्थः उदाहरणार्थ मी एक भिन्नलिंगी व्यवहार करणारी अविवाहित, विनापत्य स्त्री आहे. मग मुलांचं संगोपन, समलिंगी संबंध, पुरुषी गंड, विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांबद्दल मी मत व्यक्त करायला लायकच नाही, त्यामुळे मी गप्प बसलं पाहिजे - असा दावा केला जातो.

आता या सगळ्या विषयांचा अभ्यास असो वा नसो, मत असू शकतं की नाही? ते योग्य असेल वा अयोग्य असेल, त्याचं खंडन त्या मताचा स्वतंत्रपणे विचार करूनच झालं पाहिजे. व्यक्ती म्हणून माझी चिरफाड करून नाही. तशी अपेक्षा करणं चूक आहे का?

मराठी शाळा आणि माध्यमाचा प्रश्न बाजूला राहिला. इथे मुळात व्यक्ती म्हणून माझ्या मतस्वातंत्र्यावरच घाला येतो आहे म्हणून बोंबाबोंब करणं भाग पडलं.

बॅटमॅन Wed, 12/03/2014 - 15:02

In reply to by मेघना भुस्कुटे

पण अमुक एखादी कृती करण्याची संधी एखाद्या व्यक्तीकडे नसेल, तर त्या व्यक्तीला त्या विशिष्ट कृतीबद्दल मतच व्यक्त करण्याचा अधिकार नाही - असा युक्तिवाद बरेचदा केला जातो. उदाहरणार्थः उदाहरणार्थ मी एक भिन्नलिंगी व्यवहार करणारी अविवाहित, विनापत्य स्त्री आहे. मग मुलांचं संगोपन, समलिंगी संबंध, पुरुषी गंड, विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांबद्दल मी मत व्यक्त करायला लायकच नाही, त्यामुळे मी गप्प बसलं पाहिजे - असा दावा केला जातो.

माझे प्रतिसाद नीट वाचा म्हणून कितीवेळा सांगायचं? थकलो बॉ. की ऐसीवरचे लोकही सोयीस्कर तेवढंच वाचतात?

मी म्हणालो होतो, की एक तर प्रत्यक्ष कृती करा नपेक्षा त्या गोष्टीचा नीट अभ्यास करा. दोन्ही नसेल तर तुम्ही मत जरूर मांडा, पण त्याला प्रत्यक्षानुभवी लोकांच्या लेखी तितके महत्त्व येणार नाही.

इतके काय म्हणालो तर लगेच व्यक्तिस्वातंत्र्य खतरे मे! चा घोष सुरू झाला.

दोन्हींचा संबंध काय?

विशेषतः प्रस्तुत संदर्भात तरी हे जास्तच जाणवलं. जे लोक बुद्ध्याच आपल्या पोरांना मराठी माध्यमात घालू इच्छित नाहीत, त्यांनी मराठी माध्यमाचे समर्थन करावे यातला विरोधाभास खटकला. तो खटकू नये असं मत असेल तर असो बापडं. मग कुणालाच कशालाच काहीच बोलायचा अधिकार राहत नाही.

मेघना भुस्कुटे Wed, 12/03/2014 - 15:07

In reply to by बॅटमॅन

जे लोक बुद्ध्याच आपल्या पोरांना मराठी माध्यमात घालू इच्छित नाहीत, त्यांनी मराठी माध्यमाचे समर्थन करावे यातला विरोधाभास खटकला.

अहो, मला मुलं नाहीत हो. मी 'माझ्या मुलांना' मराठी माध्यमात घालू इच्छित नाही, हे आपण कसं काय ठरवलंत?

बॅटमॅन Wed, 12/03/2014 - 15:11

In reply to by मेघना भुस्कुटे

च्यायला. परत तेच!

मरो. पुन्हा ल्हितो. वरचे विवेचन तुला वैयक्तिकली उद्देशून नव्हते.

मग कुणाला उद्देशून होते? थत्तेचाचांच्या प्रतिसादातील वाक्य पहावे. त्या संदर्भात माझा प्रतिसाद आहे.

चिंतातुर जंतू Wed, 12/03/2014 - 15:21

In reply to by नितिन थत्ते

>> नोकरी आज आहे तर उद्या नाही, किंवा तिच्यासाठी गाशा गुंडाळून देशात किंवा परदेशात कधीही जावं लागतं अशी परिस्थिती असते. जागतिकीकरणानंतर ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात मेट्रोपॉलिटन शहरांतल्या मध्यमवर्गात दिसू लागली.
हे सर्व त्या भूमिकेला गैरलागू आहे.

पण हे तर माझ्या परिसरातल्या ९०% सुशिक्षित मध्यमवर्गाचं आजचं वास्तव आहे. माझ्या ओळखीत जे 'अक्षर नंदन' वगैरे शाळांत आपल्या मुलांना घालणारे आहेत ते अल्पसंख्य एलिट आहेत. मग खरं निवडस्वातंत्र्य ज्यांना आहे आणि ज्यांचा मोठा गट आहे ते कोण?

नितिन थत्ते Wed, 12/03/2014 - 17:14

In reply to by चिंतातुर जंतू

स्वतःचा व्यवसाय करणारे, बँक, राज्यशासनाच्या/महानगरपालिकेच्या नोकरीत असलेले वगैरे

रोचना Thu, 27/02/2014 - 23:07

अजून एक वैयक्तिक अनुभवः

आम्ही दोघे इंग्लिशमधून शिकलो. माझ्या मुलासाठी सध्या शाळेच्या शोधात आहोत. बंगाली-माध्यम शाळेत घालायची इच्छा आहे, पण हे नात्यागोत्यात किंवा शेजारपाजारांना सांगितलं की जगबुडी आल्यासारखं करतात. पुण्यासारख्याच काही जुन्या, चांगल्या शाळा इथे आहेत, पण त्यांचा दर्जा खालावला आहे असे सर्वत्र ऐकू येतं. पण म्हणजे नेमकं काय बिघडले आहे हे विचारलं तर वर अनेक प्रतिसादात नोंदविले आहे, तसे मुलांचा सामाजिक दर्जा बदलला आहे हे कळतं. ("नाहीतर एकेकाळी सत्यजीत राय या शाळेत शिकले, हो!") काही इंग्रजी शाळांबद्दल सगळे माना डोलावतात (आजकल 'इंटरनॅशनल स्कूल्स चा जमाना आहे), पण मी इथे एम.फिल आणि पी.एच.डी च्या मुलांना शिकवते. शहरातल्या, आणि काही अन्य शहरातल्या नामांकित इंग्रजी शाळा-कॉलेजातून मुलं-मुली येतात. त्यांचं इंग्रजी ऐकून-वाचून इंग्रजी शाळेत जाऊन ही भाषा नीट लिहीता वाचता बोलता येईल यावर माझा तरी विश्वास नाही. अ‍ॅक्सेंटचा छाप असतो, नक्की. काँटॅक्ट्स मिळतात, "वर्नॅक्युलर" छाप नसतो. पण कधी कधी त्यांची पेपरं वाचून रडू येतं. असो. दॅट रँट इज फॉर अनदर डे.

आम्ही अजून शाळा पक्की केली नाही, पण बंगाली माध्यम नर्सरी-प्री-प्रायमरी शोधणे रोचक ठरले. २.५-३ वर्षांच्या मुलांसाठी प्लेस्कूल, माँटेसरी वगैरे शाळा सगळ्याच इथे इंग्रजी माध्यमाच्या आहेत, आणि शहरातल्या नामांकित इंग्रजी शाळेच्या इंटर्व्यू साठी मुलांना तयार करणं हे त्यांचे मुख्य ध्येय, आणि सेलिंग पॉइंट आहे. स्वतःला "कॉस्मोपॉलिटन" म्हणवून घेणार्‍या प्लेस्कूल-नर्सर्‍यांनी माझं नाव ऐकून "आम्ही इथे बंगाली बोलू देत नाही" हे मला आवर्जून सांगितलं. पण बंगाली माध्यमाच्या शाळेत प्रवेश हवा असला तर ४ वर्षाच्या आधी काही नाही; अनेक चांगल्या शाळांत ५ वर्षांच्या आधी काही नाही. प्रवेशाचा प्रोसेस काही ठिकाणी लॉटरीने चालतो, तर काहींनी काही खुलासा केलेला नाही. एक-दोन ठिकाणी नर्सरीवजा शाळा आहेत, पण तेथे जाणार्‍या पालकांच्या कामाच्या वेळा लक्षात ठेवून (बहुतांश सकाळी घरकामाला येणार्‍या बायका) त्या शाळा सकाळी ७-९.३० चालतात. इंग्रजी माँटेसरींच्या वेळा ९-१२. आमच्यासारख्या ऑफिसवाल्यांना, अ‍ॅटलीस्ट पार्ट-टाइम सूट होण्यासारख्या.

आम्ही तूर्तास जवळच्या माँटेसरीत घातले आहे, कारण नाहीतर मुलाला अजून दोन वर्षं घरी बसवायला लागेल, आणि दोघे आई-वडील नोकरी करणारे असल्याने हे शक्य नाही. आतापर्यंत त्याला मराठी बाराखडी आणि बंगाली वर्णमाला येत होती, दोन्ही भाषा तो व्यवस्थित बोलतो, पण एका महिन्यातच गुलाबीला "याला पिंक म्हणतात", "हे चौकोन नाही, स्क्वेर आहे" वगैरे चालू केले आहे. घरी बंगाली आणि मराठी दोन्ही चालू ठेवणे आणि दोन वर्षात लॉटरी लागेल आणि गुलाबीचं संपूर्ण पिंक होणार नाही ही आशा बाळगणे ही आमची सध्या स्ट्रॅटेजी आहे.

मातृ-पितृभाषेतूनच मुलांचं शिक्षण व्हावं हे मान्य आहे, पण आमच्या मोलकरणीचा नातू इंग्लिश स्कूलला जातो. त्यासाठी तिच्या मुलीने नोकरी सोडली. आम्ही बंगाली शाळा शोधतो आहोत हे ऐकल्यावर "तुमचं बरं आहे हो, तुम्ही घरीच त्याला चांगलं इंग्रजी शिकवाल. आमचं काय?" हे म्हटली. बरोबरच आहे ते. तो ऑप्शन तिला आणि तिच्यासारख्या लाखोंना नाही, म्हणूनच प्रत्येक गल्लीबोळात इंग्लिश मीडियमच्या शाळा जोरात आहेत.

अजून एक आठवण - माझी एक काकी बरीच वर्षं पुण्याच्या एका मराठी माध्यम प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. तिचा नातू कर्नाटक शाळेत जायला लागल्यावर टिचरांनी घरी चिठ्ठी पाठविली - मुलाच्या आजी-आजोबांना त्याच्याशी इंग्लिशमधे बोलायला सांगा, म्हणजे तो लवकर भाषा शिकेल. काकी भडकली. ३५ वर्षाचा तिचा अनुभव मातीत गेल्यासारखं तिला वाटलं. पण थोड्याच वेळात सूर बदलला आहे. परवाच मी तिला आमच्या समस्येबद्दल सांगितलं. म्हटली (आय कोट): "अगं, मला ही आधी वाइट वाटलं. पण आता आमच्या शाळेत ही नुसते बीसी भरलेत. गेली खड्ड्यात. घाल मुलाला इंग्रजी शाळेत, शेवटी आपले संस्कार नकोत का?"

Nile Thu, 27/02/2014 - 23:12

माझ्या सारख्या कोणतीच भाषा धड न येणार्‍या 'थर्ड वर्ल्ड'वाल्याला हे सगळं(?) वाचून (असं म्हणायची पद्धत आहे) हा 'फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम' आहे का काय असे वाटून राह्यले आहे. ;-)

अतिशहाणा Thu, 27/02/2014 - 23:52

In reply to by Nile

मराठी भाषेचा असा काही प्रश्न आहे हे बहुजन समाजाला मान्य नाही किंवा त्यांना भाषेपेक्षा जगण्याचे (आर्थिक) प्रश्न अर्थातच महत्त्वाचे वाटतात.

आडकित्ता Fri, 28/02/2014 - 08:56

चर्चा मराठी भाषेबद्दल सुरू होऊन मराठी माध्यमांच्या शाळा व त्यातील मास्तर यांच्यावर घसरलेली दिसते. असो.

वास्तविक, भाषेबाबत लोकभावना लक्षात घेऊन तिच्या वापराबाबत धोरण ठरवणे, तिची वापरक्षेत्रे निश्चित करणे, सक्ती आणि संधी यांच्याद्वारा तिच्या वापराच्या प्रेरणा निर्माण करणे, तिचे नियोजन व नियमन करणे हे सरकारचे काम आहे

लोकसत्तेतील ज्या लेखावरून ही चर्चा सुरु झाली त्यातले हे एक वाक्य इथे डकवतो आहे.
मराठी भाषेसाठी सरकार नामक कुणीतरी काहीतरी करायला हवे ही एक कॉमन अपेक्षा असते.
त्या वाक्यात अधोरेखित केलेला 'लोकभावना' हा शब्द कळीचा आहे. लोकांचीच अपेक्षा इंग्रजीतून शिक्षण हवे, अशी असेल, तर सरकार तेच करणार.
शिवाय सरकारने मराठीची सक्ती ('त्यांना') करावी अशी एक कन्सेप्ट असते. मराठी संवर्धनासाठी, जतनासाठी मी काय केले, किंवा काय करू शकतो याचा विचार कुठेच नाही. तो विचार व्हावा अशी आशा करतो.

***
वरच्या प्रतिसादातील मास्तरांच्या दर्जाबाबत.
आधी एक स्वानुभव : एका संस्थेच्या अनेक शाळांपैकी माझी शाळा शहराच्या मागास भागात होती. सहाजिकच 'बॅकलॉग' भरलेले शिक्षक सगळे या शाळेत होते.
पण.
आजच्या अन त्याकाळच्या मास्तरांत फरक हा होता, की माझे सर्व शिक्षक, आपापला विषय उत्तम अभ्यास करून शिकवत असत, त्या विषयात मुलांना रस उत्पन्न होईल याचा प्रयत्न करीत, सर्व प्रकारच्या एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज, अगदी नाटक, चित्रकला स्पर्धा, टिमवि, वक्तृत्व स्पर्धा, शालेय सहली, ज्या खर्‍या अर्थाने शैक्षणिक होत्या, अशा सर्व बाबींत आमच्या शाळेतील मुले हिरिरीने भाग घेत, व बक्षिसेही मिळवीत. याला शिक्षकांचाच आधार व मार्गदर्शन कारणीभूत होते. हे शिक्षक ९०% बहुजन समाजातलेच होते.
आज,
त्या शाळेत तितक्या उत्तम दर्जाचे शिक्षक उरलेले नाहीत, व त्याच्याशी त्यांच्या जात्/पातीपेक्षा, पाट्या टाकण्याच्या वृत्तीचाच संबंध जास्त आहे असे म्हणावेसे वाटते.

चिंतातुर जंतू Fri, 28/02/2014 - 11:21

>> १५ लाखांवरून ८ कोटीवर जर १०० वर्षांत प्रगती झाली, तर भाषा मरतेय अशी बोंब कुठच्या आधारावर ठोकत रहावं? 'मला माझ्या आसपास असं दिसतंय' हा युक्तिवाद फार फसवा असतो.

ही वाढ झाली हे कुणीच नाकारत नाही. प्रश्न भविष्याचा आहे. महाराष्ट्र सरकारनं काही वर्षांपूर्वी जेव्हा पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य करण्याचं धोरण स्वीकारलं तेव्हा त्यावर काही शिक्षणतज्ज्ञांनी नापसंती व्यक्त केली होती. तेव्हा 'आमचा प्रगतीचा मार्ग अभिजनांनी रोखू नये' अशा सुरात बहुजनांकडून मतं व्यक्त झाली होती. माझ्या मते ती प्रातिनिधिक होती. इंग्रजी आल्यामुळे आर्थिक संधी उपलब्ध होतात हे न नाकारता येणारं सत्य आहे. ते आता बहुजन समाजाच्या स्वप्नांचा एक भाग आहे. हे वास्तव जितक्या लवकर स्वीकारलं जाईल तितकं आपलं भविष्याविषयीचं आकलन योग्य दिशेनं जाण्याची शक्यता वाढेल.

>>इथे लिहिणारे जवळपास सगळे जण आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या वरच्या पाच ते दहा टक्क्यात आहेत. अशांच्या 'आसपास'वरून भाषेचं काय चाललंय हे कसं ठरवणार?

मी ज्या बहुजनांविषयी लिहिलंय ते माझ्या परिसरातलेच आहेत. त्यात रिक्षावाले, मोलकरणी, मॉलमध्ये घोडकाम करणारे, शाळेतले/कार्यालयातले शिपाई असे अनेक लोक येतात. शिवाय, हे साक्षर झालेले बहुजन त्यांच्या दृष्टिकोनाची मांडणी आता वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून करत असतात. वर उल्लेख केलेल्या पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य करण्यासारखी शासनाची शैक्षणिक धोरणं ठरवताना ह्या बाजूचा विचार प्रामुख्यानं आता लक्षात घेतला जातो. हे वास्तव दुर्लक्षून चालणार नाही.

आकडेवारीसाठी ह्या काही बातम्या :

गार्डियन : Language exodus reshapes India's schools

वरच्या बातमीतून उद्धृत :

The latest data compiled by the National University of Education, Planning and Administration (NUEPA) shows that the number of children studying in English-medium schools has increased by a staggering 274% between 2003 and 2011, to over 20 million students.

प्रगत शिक्षण संस्था : मराठी शाळांना कसे वाचवायचे

वरच्या लेखातून उद्धृत :

डीआयएसईची (DISE) आकडेवारी दर्शवते की 2002 ते 2011-12 या दशकाहूनही कमी काळात, मराठी माध्यमांच्या शाळांतील भरती 89%
पासून 74% पर्यंत घटली, तर इंग्रजी माध्यमांतील शाळांमधील मुलांची भरती 3% इतक्या अल्प प्रमाणापासून 16% पर्यंत वाढली.
[...]
2011-12 मध्ये खाजगी िवनाअनुदािनत शाळांमधून भरती झालेल्या जवळजवळ 3 लाख मुलांपैकी, 75% हूनही अधिक इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी
होते, तर 20% हूनही कमीविद्यार्थी मराठी माध्यमाचे होते.

प्रहार : मराठी माध्यमाच्या शाळा मृत्युपंथाला?

शिक्षक अभ्यास मंडळाचं हे व्यासपीठसुद्धा रोचक आहे.

अजो१२३ Fri, 28/02/2014 - 17:14

जग पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या तुकड्यांत वाटलेले होते आणि अशा तुकड्यांचा एकमेकांशी क्वचितच संपर्क येत असे. जितका संपर्क येई, त्यात संवाद साधण्यासाठी भाषांतरकार असत आणि सामान्य जनतेला या परक्या मुलकाच्या भाषांशी काही देणे घेणे नसे. हळू हळू संस्कृतींचा संपर्क वाढला आणि तात्कालिक वा कायमचे स्थलांतरण वाढले. त्यातून भाषांची, शब्दांची देवाणघेवाण झाली आणी त्यांचे स्वरुप बदलू लागले. परंतु तरीही भाषेचा ढाचा बदलण्याची गरज भासली नाही. उदा. भारतभरात वाक्यरचना एकच प्रकारे होते. अलिकडे ज्या भाषांचा ढाचाच प्रचंड प्रमाणात वेगळा आहे त्यांचा संबंध जगातल्या सर्व भाषांशी जोरकसपणे आला. यामुळे बोली, शालेय, प्रशासकीय स्तरावर या परकीय भाषांचा प्रभाव दिसू लागला. रोजगाराच्या संधी, सामाजिक प्रतिष्ठा, आंतरजालाचा वापर, इअतर जगाशी संपर्क यांमुळे या भाषांचे महत्त्व वाढले.
आता जगातल्या सगळ्याच भाषा एकमेकींशी ढवळल्या जात आहेत. आजमितिला तरी जागतिक ज्ञान जगण्यासाठी आवश्यक बाब नाही. परंतु उद्या प्रत्येकाला जगाच्या प्रत्येक कोपर्‍यातून स्रवणार्‍या ज्ञानाची गरज अगदी सामान्य जीवन जगायला देखिल असेल. यावेळी या भाषांतरकारांवर अवलंबून राहणे हळूहळू कमी होईल. या वेळी शिक्षणाची, व्यापाराची, प्रशासनाची, मनोरंजनाची एक सामान्य भाषा प्रत्येकाला शिकावी लागेल. ही भाषा आकार घेत असताना स्थानिक भाषा हळूहळू एकेका वतुळातून हद्दपार होतील. त्यांना पोसायचा खर्च आणि कष्ट कोणालाही नको असेल. हवा, पाणी फुकट असतात तशी भाषा फुकट असते असे प्रत्येकाला वाटते पण तसे नाही. या हिशेबाने सर्व भारतीय भाषांना भारतीय पुरातत्व खात्याच्या हवाली केले जाईल असा अंदाज आहे. केवळ भारत जर एक प्रबल प्रकारची महासत्ता, तीही प्रत्येक क्षेत्रात बनून दीर्घकाल टिकला तर याला अपवाद होइल.
कितीही नाही म्हटले तर भाषा हे एक साधन आहे. एका प्रकारच्या साधनापेक्षा प्रबल असे दुसरे साधन उपलब्ध झाले तर कमजोर साधनाचा त्याग होणारच. हा त्याग श्रीमंत, शिक्षित लोकांत अगोदर होणार आणि सामान्य लोक नंतर त्याची री ओढणार. या हिशेबाने मराठी बोलणारांचा टक्का थेट कमी होणार. मराठी लिहिणारांचा टक्का प्रथम वाढणार कारण अशिक्षितांना प्रथम शिक्षण याच भाषेत उपलब्ध होणार आहे. मग हळूहळू हे दोन्ही कमी होणार. हळूहळू मराठी पातळ होणार आणि नंतर नष्ट होणार. मराठीच्या इतर बोली भाषांना जर स्वतंत्र भाषा मानले तर हे पातळ होणे प्रकर्षाने जाणवेल, आत्ताच.
अर्थात या सगळ्या घटनांचा कालखंड प्रदीर्घ असणार. १००% साक्षरता -अजून २५ वर्षे. शिक्षणाचा दर्जा (मराठीतच) उत्तम अशी साक्षरता - अजून ५० वर्षे. सगळेच लोक इंग्रजी जाणू लागणार - अजून ५० वर्षे. प्रत्येकाला नेटीव इंग्रजी येणार, पण मराठी घरात, बाजारत, पाहुण्यांत, इ - अजून ५० वर्षे, मराठीचा वापर कमी कमी होत अस्त - अजून १०० वर्षे. एकूण २७५ वर्षे. पण या काळात जागतिकारणाचा वेग काही कारणाने बंद झाला तर असे काही होणार नाही. याउलट उपजिविका आणि इंग्रजीचे ज्ञान यांचे कोरिलेशन जबरदस्त स्ट्राँग झाले तर ही टाईमफ्रेम संकुचित होईल.

(Numbers are intuitional.)

सलील Fri, 28/02/2014 - 21:56

माझ्या घरात किमान १० शिक्षक होते. स्वतः आई आणि वडील दोघेही अनेक शिक्षण संस्थांशी निगडीत होते. घरात साधारण १९९० नंतर ब्राह्मण सोडून अनेक शिक्षक येत असत. ह्यातले बरेच लोक शिकण्यासाठी येत पण काही काही लोक आता आमची वेळ आहे आणि आह्माला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत ह्या वृत्तीचे होते. आई जेंव्हा २००१ ला निवृत्त झाली तोपर्यंत ८०% आरक्षित जागांवरचे लोक होते. त्यातले किमान ६०% लोक फक्त पगार घ्यायला येत. हे में फक्त आईच्या तोंडून नाहीतर अगदी शाळेतला शिपाई आणि आरक्षित जागेवरल्या सुपरवायझर ह्यांच्या मुखातून आईकले आहे. दुसरा मुद्दा अनि-पानी वाल्यांना विरोध होताच पण त्यांनी घेतलेले निर्णय नी त्यांनी सत्ता मिळाल्यावर मुद्दामहून बाकीच्या छळणे ह्या प्रकारामुळे बऱ्याच ब्राह्मण आणि अगदी काही मराठा लोकांनी पण नोकरी सोडून चक्क क्लासेस चालू केल्याचे पहिले आहे. काही फक्त २० वर्षे सर्विस होण्याची वाट पाहत बसले आणि एक दिवस झाल्या झाल्या राजीनामा फेकून लावा आता काय वाट लावायची आहे संस्थेची असे म्हणून बाहेर पडले आहेत. तेंव्हा नविन बदल जे झाले त्यामुळे स्वतः शिक्षकांचे कसे व्यक्तिगत जीवन बदलले हे स्वतः मी पहिले आहे. उरफाटे निर्णय घेवून सगळ्यांचे नुकसान होते आहे हे पण कळत नव्हते. बर ह्याच नविन शिक्षकांची मुले पण त्या शाळेत ते स्वतः घालत नाहीत. म्हणजे त्यांना स्वतःलाच खात्री नाहीये. तेंव्हा सगळा दोष सरधोपटपणे ब्राहमण लोकांना देणे फार सोयीस्कर आणि वरवरचे विवेचन झाले.

पण हेही खरेच आहे की सुरवातीला सगळ्यांनी राखीव जागा भरायला चांगलाच विरोध केला आणि तो सगळा बैक्लोग एकदम भरावा लागला. त्यामुळे एका फार कमी कालावधीत कामाच्या वातावरणात अमुलाग्र बदल झाला. आणि तो पचवणे कठीण आहे. इथे सध्या ज्या कंपनी मध्ये आहे तिथे ऑरकल सोडून एसएपी वापरायला लागल्यावर ९०% लोक बोम्ब मारताना दिसतात. त्यात भले भले नोकरी सोडून गेले कारण रोजच्या काम करण्याच्या सवयीत बदल. इथे तुलना करणे तसे चुकीचे आहे पण मुद्दा कामाच्या स्वरुपात झालेले बदल, निर्णय घेण्याची आणि दुसऱ्यांनी घेतलेले निर्णय राबवाण्यावरून होणारा आणि येणारा ताण ह्यामुळे काही शिक्षक सोडून गेले आणि जे राहिले त्यांना दुसरा काही मार्गच नव्हता म्हणून राहिले असे मला तरी वाटते.

आणि माझे तर स्पष्ट मत आहे की ह्याच मुळे निदान पुण्यात तरी इंग्रजी शाळांचे स्तोम वाढले.

कविता महाजन Fri, 28/02/2014 - 23:13

थोडे तुटक लिहिते आहे, त्यासाठी आधीच क्षमा मागते.
एक संशोधन प्रकल्प मी पूर्वी केला होता : महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचे प्रयोग. त्यावेळी मराठी माध्यमाच्या व इतर ( इंग्लीश, हिंदी, उर्दू या तीन प्रामुख्याने इतर मध्ये येतील ) पाहिल्या होत्या. प्रायोगिक शाळांमध्ये 'प्रयोग' गृहीत धरल्याने काही चुका होणे, त्या पुढच्या खेपेला दुरुस्त होणे, असे होत होत पुष्कळ चांगले काम होताना दिसले. या विषयावर पुढच्या काळात अनेक पुस्तकंही मराठीत आली. या पुस्तकांचा वापर इतर अनेक शाळांनी केला. संख्या तुलनेत कमी असली तरी हे दुर्लक्ष करण्याजोगे नाही.
ठरवून / आखून काही गोष्टी करता येतात, त्या केल्या तर चांगले परिणाम दिसू शकतात. शालेय शिक्षण संपल्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण देखील मी मराठी माध्यमात घेतलं आहे. कलाशाखेत समाजशास्त्र, अर्थशास्त्र व मराठी साहित्य हे तीन विषय मी निवडले होते. इतरही अनेक विषय मराठीतून शिकता येत होते व अभ्यासक्रमाची सर्व पुस्तकं आवर्जून मराठीतून लिहिली गेलेली होती. मोठ्या संख्येने कला व वाणिज्य शाखांमधले विद्यार्थी आजही मराठी माध्यमातून शिकत आहेत. अधिक व अवांतर वाचनासाठी आम्हांला इंग्लीश पुस्तकांची यादी दिली जाई.
आजोबांचे शिक्षण मराठवाडा तेव्हा निजामाच्या हद्दीत येत असल्याने उर्दू माध्यमात झालं होतं व वडिलांचंही दुसरीपर्यंत उर्दू माध्यमच होतं, नंतर मराठी शाळा उपलब्ध झाल्या. उर्दूत इंजिनिअरिंग व मेडिकल अशा शाखांचीही पुस्तकं त्या काळात उपलब्ध करून दिली गेली होती व सर्वच शाखांमध्ये विद्यार्थी उर्दूतून शिकू शकत. हे त्या काळात निजामाला शक्य झालं होतं, तर आज आपल्याला अशक्य का व्हावं, असा प्रश्न आजोबा विचारत.
त्यामुळे इथं परब म्हणताहेत हे भाबडं आहे असं मला वाटत नाही.
मी चित्रकलेचं शिक्षण घेतलं तेव्हा तिथंही ( बीएफए करताना ) मराठी माध्यमाचा पर्याय उपलब्ध होता, आजही आहे. ( कलेचा इतिहास, सौंदर्यशास्त्र या विषयांचे पेपर 'लिहावे' लागतात.)
वरील चर्चा वाचताना अजून काही गोष्टी मनात आल्या.
१. शि़क्षणाचा दर्जा जर घसरलेला आहे तर तो सर्वच माध्यमांमध्ये घसरलेला आहे. फक्त मराठी नव्हे.
२. मोलकरणी इत्यादींची मुलं आता मोठ्या प्रमाणात इंग्लीश माध्यमांच्या शाळांमध्येही जातात, केवळ मराठी माध्यमाच्या नव्हे.
३. मराठी माध्यमाच्या शाळांचे 'निकाल' इंग्लीश माध्यमाच्या शाळांहून चांगले आहेत. विशेषकरून दरवर्षीची दहावीची मेरीट लिस्ट पाहिली तर मराठी माध्यमाची मुलं बहुसंख्य आढळतात.
४. 'चांगल्या शाळा' मोजक्या असल्या तरी तिथं विद्यार्थ्यांची गर्दी असते व प्रवेश मिळण्याची मारामार... हे वसईतल्या शाळांचंही दृश्य आहे. मराठी माध्यमाच्या उत्तम शाळा इथं आहेत आणि कॉन्व्हेंटही.
५. दैनंदिन वापरातील बोलीभाषा आजही मोठ्या संख्येने घरांमधून, परिसरात बोलल्या जातात. या बोलींमधून लेखनही होत असतं... फक्त ते नीट 'पोचत' नाही अशी अडचण आहे. त्याची कारणं अजून वेगळी आहेत.
६. मराठीत प्रकाशित होणारी दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं, दिवाळी अंक, पुस्तकं यांची संख्या वाढतेच आहे. प्रकाशकांची संख्याही फुगते आहे दरसाल. अनुवादित पुस्तकांची संख्या तर पूर्वी कधीच नव्हती इतकी वाढली आहे. वाचकही भरपूर आहेत. वाचकांच्या पत्रांवरून ( अनेक लेखकांच्या अनुभवानुसार ) ग्रामीण भाग व लहान शहरं इथले वाचक अधिक आहेत. वृत्तपत्रांमधून लेखन केल्यावर जाणवतं की अनेक लहान गावांची नावंही माहीत नसतात तिथून आजकाल मोठ्या संख्येने इमेल्स येत असतात. रडावं अशी परिस्थिती असती, तर ही कोणतीच संख्या वाढलेली दिसली नसती. पुस्तकं खपत नाहीत असं कुणी प्रकाशक सांगत असतील तर ते तद्दन खोटं असतं. ( फारतर त्यांना मार्केटिंग जमलं नाही किंवा अंदाज चुकला अशी शक्यता असते, हे नवीन लोकांबाबत होतं. पण ते कुठल्याही व्यवसायात होतं.) अन्यथा प्रकाशकांचे बंगले उठले नसते व चारचार गाड्या, फर्महाऊस इत्यादी झालं नसतं... आणि पुढचा काळ ते व्यवसाय करत राहिलेही नसते. ( लेखकांना फारसे पैसे मिळत नाहीत, कारण लेखक वाजवून पैसे मागत नाहीत आणि पुरेसे कष्ट घेऊन लिहीतही नाहीत... तो स्वतंत्र विषय आहे.)
७. अनेकजागी आता 'व्यावसायिक मराठी'चे वर्ग सुरू झाले आहे. व्यवहारात मराठीचा वापर ज्या क्षेत्रांमध्ये होतो, तिथं तो कसा करावा हे शिकवलं जाण्यास ( उशिरा का होईना ) सुरुवात झाली आहे. आर्थिक दृष्ट्या खालच्या स्तरातील जो वर्ग हळूहळू शिक्षणाकडे वळतो आहे त्यांना मराठी माध्यमच आजही सोयीचं वाटतं आहे. ( आदिवासींना अद्याप तेही अवघड जातंय ). इंग्लीश माध्यमात शिकवणारेही मराठीचा, त्यातही बोलीभाषांचा वापर करून शिकवतात सरसकट... ( याचे नमुने नेमाडेंच्या कादंबर्‍यांमध्ये दिसतील.) हे जुनंच चित्र आहे.
८. व्यावसायिकांना व नोकरदारांना बहुतेक जागी दोन्ही भाषा वापरून व्यवहार करावे लागतात. उदा. डॉक्टरला रुग्णाशी बोलताना मराठीतच सगळं समजावून सांगावं लागतं, त्यामुळे स्थानिक भाषा त्याला येणं गरजेचंच ठरतं व झक्कत शिकावं लागतं. हेच चित्र बँकेत, अनेक कार्यालयांमध्ये, कोर्टात कैक जागी दिसतं. ( आमच्या भागातले मराठी भाषिक नसलेले अनेक लोक कैक फॉर्म भरून घेण्यासाठी माझ्याकडे येत असतात, तेव्हा हे ध्यानात येतं. उदा. मृत्यूचा दाखला.)
९. वाचनालयांबाबतही एक निरीक्षण आहे. ज्यांनी आपल्या कार्यपद्धती काळानुरूप केल्यात त्यांना चांगला प्रतिसाद आहे. उदा. फिरती वाचनालये उत्तम चालतात. फोन वा इमेलद्वारे हवी ती पुस्तकं नोंदवून घरी वा कार्यालयात मागवून घेण्याची ( व परत करण्याची ) व्यवस्था आता अनेक वाचनालयांनी सुरू केली आहे, तीही खूप चांगली चालली आहेत. वाचनालयांत काही पुस्तकांच्या आठ-दहा प्रतीही घेतल्या जातात आणि प्रतीक्षायादीत वाचक सहा-सहा महिने थांबतात, हेही चित्र आहे. दिवाळीअंक, मासिकं यांसाठीही लोक वाचनालयांचाच आसरा घेतात. ज्या वाचनालयांनी अभ्यासिका, इंटरनेट, झेरॉक्स, स्कॅनिंग अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तिथं तरुणांचीही पुष्कळ गर्दी असते.
१०. महानगरांचं चित्र निराळं आहे; पण लहान शहरं व गावांमध्ये व्याख्यानमालांना शेकडोंची गर्दी असते, हे मी अनुभवलेले आहे. संगमनेरची दहा दिवसांची अनंत फंदी व्याख्यानमाला तर तिकीट लावून होते व मैदान खच्चून भरलेले असते... तेही प्रचंड थंडी असताना. सोलापूर, अंबेजोगाई, लासलगाव, जामखेड ही अजून सहज आठवलेली काही गावांची नावं. इथल्या काही कार्यक्रमांचं थेट लोकल केबलने टीव्हीवर प्रसारण होतं. थिएटर गच्च भरून बाहेर तीन-तीन स्क्रीन लोकांसाठी लावलेले असतात. अंबेजोगाईला तर दोन मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करून थिएटर बाहेरच्या रस्त्यांवर खुर्च्या मांडल्या होत्या व जागेअभावी थिएटरमध्ये न मावलेले लोक असे बाहेरून व्याख्यान ऐकत होते, असा अनुभव आहे. आणि व्याख्यानं म्हणजे काही निव्वळ मनोरंजन नसतं, तरीही भूक असते लोकांची बुद्धीरंजनाचीही... हे अशा जागी जाणवतं. ( अर्थात बोलणं पटलं नाही तर घोळक्या घोळक्यांनी लोक उठून जाऊ शकतात, ही जोखीम असतेच.) जालन्याच्या एका व्याख्यानानंतरचा अनुभव तर असा होता की व्याख्यानाच्या शेकडो सीडीज लोकांनी कॉपी करून नेल्या... ( अर्थात वक्त्यांची रीतसर परवानगी घेऊन.)
अशी पुष्कळ सुटी निरीक्षणं आहेत... जी सांगतात की चित्र फार विदारक इत्यादी नाहीये. पण ते चांगलं बनवायचं असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करायलाच हवेत.

राजेश घासकडवी Sat, 01/03/2014 - 00:16

In reply to by कविता महाजन

मार्मिक, रोचक आणि माहितीपूर्ण अशा तीनही श्रेणी एकाच वेळी देता येत नसल्यामुळे मार्मिक श्रेणी दिली. आणि बाकीच्यांसाठी पोच म्हणून हा प्रतिसाद.

चिंतातुर जंतूंनी मांडलेलं चित्र 'आत्ता वाढ पण भविष्यकाळ चिंताजनक' आणि तुम्ही मांडलेलं 'आत्ता दिसणारी वाढ आणि प्रयत्न केल्यास तग धरता येईल' या दोनमध्ये मला केवळ भविष्याकडे पहाण्याच्या दृष्टिकोनाचा फरक दिसतो. असे प्रयत्न कुठच्या पातळीवर व्हायला हवेत? परबांनी 'सरकारने काहीतरी करायला हवं' असं कळकळीने म्हटलेलं आहे. सरकारने काय करायला हवं, आणि आपण किंवा सामान्य जनतेने संस्थात्मक पातळीवर काय करायला हवं, याबद्दल काही सांगता येईल का?

कविता महाजन Sat, 01/03/2014 - 10:20

In reply to by राजेश घासकडवी

या बाबतची मांडणी आजवर अनेकांनी केली आहे. अगदी अशातली आहे ती आ.ह. साळुंके यांची. ती लोकसत्तेत छापूनही आली होती आणि वाचकांकडून सूचनाही मागवल्या होत्या. मला आवडलेली मांडणी आहे ती राज्य मराठी विकास संस्थेच्या धोरणांची. दुर्दैवाने ती संस्था केवळ काही पुस्तकं प्रकाशित करणार्‍या सरकारी तरी स्वायत्त प्रकाशन संस्थेसारखी बनून राहिली आणि आता तर तेही धड होत नाहीये. अशा संस्थांवर महत्त्वाकांक्षी, सरकार दरबारी कामं करवून घेण्याची क्षमता असणारी ( लाळघोटी नसणारी ) आणि उत्तम प्रशासकीय कौशल्यं असलेली माणसं अधिकारपदावर असली पाहिजेत.
भाषा संचालनालनालयाला तर गेली काही वर्षं संचालकच नाही, ही अनास्था आहे. तिथली अनुवादाची कामं, शब्दकोशांची कामं मुंगीच्या गतीनं व सुमार दर्जाची होतात व काही कामं ठप्पच झालेली आहेत. कोश अद्ययावत करणं तर घडलेलंच नाहीये.
विश्वकोशाची स्थिती म्हणजे काम सुरू आहे, पण गती मंद आणि काम कमी व समारंभ जास्त अशी अवस्था आहे. तरी आहेत ते खंड जालावर उपलब्ध करून दिले गेल्याने चांगला वापर होतो आहे.
सरकार कडे सगळी जबाबदारी ढकलून मोकळं होता येणार नसतंच. पण ते सोपं असल्याने अनेक क्षेत्रांमध्ये तसं होताना दिसतं. तिथंही पाठपुरावा करत राहावा लागतो आणि तो प्रसारमाध्यमांनी उचलून धरला तर चांगला होतो. प्रसारमाध्यमं फक्त जिथं सनसनाटी असेल अशाच बातम्या उचलतात वा घडवतात वा कशातही सनसनाटीपणा शोधतात; एरवी चांगल्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करतात. अनेक साहित्य विषयक, कलाविषयक कार्यक्रम होत असतात. आता ते कव्हर करणारे वार्ताहरही नसतात अनेक वृत्तपत्रांमध्ये. ( परवा पत्रकार अशोक जैन यांच्या निधनानंतर श्रद्धांजलीची सभा झाली, ती एका पत्रकार मुलीने तिच्या ब्लॉगवर कव्हर केली. जालावर हे प्रकार वाढत जात असून एक चांगली पर्यायी व्यवस्था उपलब्ध होते आहे. पण आपण ब्लॉग्जवर चर्चा करणे अद्याप सुरू केलेले नाही, जशा चर्चा संकेतस्थळांवर करतो... हिंदी इंग्लीशमध्ये हे घडतेय, मराठीत अजून नाही. आवडले म्हणणे, एखादी शंका विचारणे इतपतच प्रतिक्रिया असतात. चर्चा झाल्या पाहिजेत चांगल्या.)
सरकार, प्रसारमाध्यमं यानंतर तिसरी फळी येते ती वैयक्तिक कार्याची. यात विक्रीयोग्य उपक्रम प्रकाशक उचलून धरतात, बाकी नाही. काही संस्थांची स्पॉन्सरशीप मिळवून, फेलोशीप्सच्या माध्यमांमधून व देणगीदारांनी पुढाकार घेऊन काही आवश्यक उपक्रम राबवता येऊ शकतील. उदा. माधुरी पुरंदरे यांचा 'लिहावे नेटके' हा उपक्रम टाटांच्या एका ट्रस्टमधून पैसे मिळाल्याने झाला. समाजविज्ञानकोश हा सहा खंडांचा प्रकल्प डॉ. स. मा. गर्गे यांनी केंद्र शासनाकडून सहाय्य मिळवून पूर्णत्वास नेला. पण अशा मदती मिळवण्याचे कौशल्य अनेकांकडे नसते, त्यांचे प्रकल्प रखडतात, बासनात बांधून ठेवले जातात वा गर्भपात तर नवे नाहीतच. पुढार्‍यांच्या हातापाया न पडता, सरकार दरबारी खेट्या घालाव्या न लागता लोकांना आपले उपक्रम पार पाडता आले पाहिजेत. काही लोक संशोधनासाठी फेलोशीप्स देताहेत आता... उदा. महाराष्ट्र फाउंडेशन किंवा लाभशेटवार यांच्यासारख्या व्यक्ती. पण हे अपेक्षित कामाच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि यांच्या रकमाही अत्यल्प आहेत. तरीही काहीतरी होते आहे हे चांगलेच.
आपल्याकडे कोणते कोश आहेत व कोणते कोश व्हायला हवेत याची एक यादी मी एका कोशविषयक पुस्तकाचे संपादन केले त्यात दिली होती. सूचींबाबतही असे काम होऊ शकते. आपल्या भाषेत अजून भाषिक नकाशाही केला गेलेला नाहीये.
साहित्यसंस्थांना त्यांची कामं जाहीर करण्यास भाग पाडलं पाहिजे. निधी आहेत, जागा आहेत, मनुष्यबळ आहे... पण इच्छाशक्ती नाही, कल्पनादारिद्र्याच्या रेषेखाली असलेले लोक तिथं ठिय्या देऊन बसले आहेत. त्यांना धक्का देणारं कुणी नाही. साहित्य संमेलनापलीकडे कितीतरी कामं त्यांच्या अजेंड्यावर आहेत, पण ती कुणीही करत नाही.
व्यक्तीपातळीवर मोठी कामं होऊ शकतील असा विश्वास मला वाटतो, त्यासाठी निधी उपलब्ध झाले पाहिजेत. आपल्याकडे जे वर्णमालेचे तक्ते आहेत, ते अत्रे-शांता शेळके यांनी एकदा बदलले त्यानंतर अजून बदलले गेले नाहीयेत; मुलांसाठी साधी अल्फाबेट्सची पुस्तकं इंग्लीशमध्ये असतात तशीही नाहीयेत... पण हे काम करून दिलं तरी पुढाकार घेऊन ते छापणं, बाजारात उपलब्ध करून देणं यासाठी तर यंत्रणा हवी; मला अजून तसं कुणी मिळालेलं नाही. मराठी अनिवार्य असल्याने शाळांमधून अशा गोष्टींची गरज आहे, मागणी आहे, पण जुनंच चालतंय तोवर चालू दे ही वृत्ती आहे. शिक्षणखातं, पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती या सगळ्यांना धक्का कोण मारणार? एक मराठी दिन आला की दोन लेख छापायचे किंवा काहीतरी आचरट 'स्टोर्‍या' करायच्या इतकंच करतात वृत्तपत्रं. त्यांचीही धोरणं आता 'लोक बोलतात तसं आम्ही लिहितो' अशी बनली आहेत आणि आवर्जून चांगली भाषा, अचूक मराठी शब्द वापरणं, नवे शब्द घडवणं व रुळवणं अशी उचापत करण्याची त्यांचीही इच्छा नाहीये. असो. भरकटलंच.

मी Fri, 28/02/2014 - 23:33

बहुजन समाजाच्या शिक्षकांची संख्या वाढल्याने अभिजन वर्ग इंग्रजी माध्यमाकडे वळला व त्यामुळे भाषेचे/मराठी शाळांचे मरण ओढावले असे अनेक प्रतिसादातून जाणवले, ह्याचा अर्थ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेला बहुजन समाज भाषा/शाळा टिकवण्यासाठी असमर्थ आहे असा पण निघतो आहे.

शालेय अभ्यासक्रम अभिजन वर्गाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अधिक पूरक होता त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या नंतरच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे निकाल कमी लागणे स्वाभाविक होते, त्याचा परिणाम म्हणून अशा संस्थांमधे भविष्यातील उत्तम संधीबद्दल जागरूक असणार्‍या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आवक कमी झाली.

कविता महाजन Fri, 28/02/2014 - 23:36

अजून एक मुद्दा उच्चारांबाबत.
माझे स्वत:चे अनेक उच्चार चुकतात. ( काही उच्चार करता येत नाहीत असं म्हणणं अधिक योग्य राहील.)
उदा. सगळ्यांना सहज ओळखू येणारा न / ण चा उच्चार. याहून इतर उच्चारांकडे कुणीच फारसं लक्ष देत नाही; पण श / ष, रु / ऋ इत्यादी उच्चारही अनेकांचे चुकतात. ज्या अक्षरांचे अनेक उच्चार असतात तिथंही ( ज, च, फ इत्यादी ) खूप जणांच्या चुका होतात. बाकीही बर्‍याच गडबडी आहेत, ज्या का होतात हे आम्ही भाषाशास्त्रात शिकलोही होतो.
मी दोन वर्षं प्राध्यापकी केली, तेव्हा वर्गात पहिल्याच तासाला हा 'दोष' सांगून टाके व उच्चारामुळे एखादा शब्द समजला नाही तर तो फळ्यावर लिहून दाखवला जाईल असे सांगे. मराठवाड्यातच शिकवत होते तेव्हा काही फरक पडला नाही, कारण तिथे माझ्यासारखे बहुसंख्य होते. लहान शहरांमध्ये, गावांमध्ये व्याख्यानाला जाते तेव्हाही काही फरक पडला नाही. फरक फक्त तीन जागी पडला... मुंबई, ठाणे व अर्थातच पुणे. तिथेही कुजबुजणारे विद्यार्थी व व्याख्यानांनंतर प्रश्न विचारणारे वा चिठ्ठी पाठवून उच्चारांवर आक्षेप घेणारे केवळ ब्राह्मण या एकमेक जातीचे लोक असत. ( त्यातही अनेकांना 'तुम्ही स्वतः ब्राह्मण असून चुकीचे उच्चार करता याचं दु:ख, लाज, ओशाळलेपण अधिक असे.) बाकी कुठे उच्चारांच्या कटकटी झालेल्या स्मरत नाही. हां... आकाशवाणीवाल्यांशीही यावर सुरुवातीच्या काळात वाद झाले. पण नंतर त्यांनीही माघार घेतली.
उच्चार जमत नाहीत हे काही अभिमानाचे नव्हे, तरीही त्यात प्रादेशिक कारणं असतात, वैद्यकीय कारणं असतात, हेही समजून घेणारे खूप असतात. शुद्ध उच्चार ही ज्या व्यवसायांचीच गरज आहे तिथं ते असायला हवेतही. पण इतरत्र काही फरक पडताना दिसत नाही... बोलीभाषा इतक्या आहेत आणि त्यानुसार शब्द इतक्या तर्‍हांनी उच्चारले जातात... काय किती चुकीचं ठरवत बसणार?
अशोक शहाणे तोतरं बोलतात किंवा प्रा. शेषराव मोरेंचे उच्चार व्याख्यानांमध्ये जड जिभेचे असल्याने कळत नाहीत... तरी कानाचं सूप करून मला त्यांचं बोलणं ऐकावं वाटतं... 'काय बोलतात किंवा कसं शिकवतात' हे अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. माझे अनेक शिक्षक अशुद्ध बोलणारे होते, आहेत... पण ते देतात ते ज्ञान अधिक मोलाचं वाटतं. उच्चार शुद्ध असते, तर दुधात साखर, पण नाहीत म्हणून तेवढ्यावर मी तरी त्यांना बाद करणार नाही.

विवेक पटाईत Sat, 01/03/2014 - 20:09

भाषा एका नदी प्रमाणे आहे, सतत वाहत राहणारी. मराठीचे म्हणाल तर इंटरनेट भाषेला चांगले दिवस आले म्हणता येईल. आधी वर्षातून पुस्तकी माध्यमातून काही लेख आणि गोष्टी वाचायला मिळायच्या. आज रोज वाचायला मिळते. माझ्या सारख्या माणसाने वयाची ५० उलटल्यावर (मराठी न शिकलेल्या) मराठी वाचणे आणि लिहिणे शिकले.

मराठीत डॉक्टर आणि इंगीनीरिंगचे शिक्षण सुरु केल्यास, आपोआप लोक आंग्ल भाषा शिकणे बंद करतील. महाराष्ट्रात दहा कोटी लोक राहतात. महाराष्ट्रातच मराठी माध्यमातून डॉक्टर, इंगीनीअर, आर्किटेक बन्नार्याना कामाची कमी राहणार नाही. इथे भक्त स्वाभिमानाची गोष्ट आणि गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची आहे.

रोचना Sun, 02/03/2014 - 14:08

[कविता महाजन]: आपल्याकडे जे वर्णमालेचे तक्ते आहेत, ते अत्रे-शांता शेळके यांनी एकदा बदलले त्यानंतर अजून बदलले गेले नाहीयेत; मुलांसाठी साधी अल्फाबेट्सची पुस्तकं इंग्लीशमध्ये असतात तशीही नाहीयेत... पण हे काम करून दिलं तरी पुढाकार घेऊन ते छापणं, बाजारात उपलब्ध करून देणं यासाठी तर यंत्रणा हवी; मला अजून तसं कुणी मिळालेलं नाही. मराठी अनिवार्य असल्याने शाळांमधून अशा गोष्टींची गरज आहे, मागणी आहे, पण जुनंच चालतंय तोवर चालू दे ही वृत्ती आहे. शिक्षणखातं, पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती या सगळ्यांना धक्का कोण मारणार? एक मराठी दिन आला की दोन लेख छापायचे किंवा काहीतरी आचरट 'स्टोर्‍या' करायच्या इतकंच करतात वृत्तपत्रं. त्यांचीही धोरणं आता 'लोक बोलतात तसं आम्ही लिहितो' अशी बनली आहेत आणि आवर्जून चांगली भाषा, अचूक मराठी शब्द वापरणं, नवे शब्द घडवणं व रुळवणं अशी उचापत करण्याची त्यांचीही इच्छा नाहीये. असो. भरकटलंच.

पुण्याच्या आप्पा बळवंत चौकात हिंडून फिरून बाराखडीची चार पुस्तकं मिळाली. त्यात कुसुमाग्रजांचं "अक्षरबाग" आहे, आणि एक खूप जुनं पण मस्त "बाराखडीची बडबड गीते" - कक्कड काकडी, ग गारा गारेगार, वगैरे. माझ्या मुलाला आता प्रत्येक अक्षराच्या गाण्यावरून शब्द सुचतात, जुळवता येतात, मजा वाटते. जिंगल टून्स या कार्टून कंपनीने काही मस्त डीवीडी केल्या आहेत. अँड्रॉइड साठी मला दोन-तीन मजेदार अ‍ॅप्स मिळाले - त्यातले एक अक्षर ओळखायचा खेळ आहे, माझ्या मुलाला खूपच आवडला. तो आता साधे शब्द (मात्रा वेलांट्यांसहित) वाचू शकतो.

माधुरी पुरंदरेंची "राधाचं घर" आणि "यश" ची पुस्तकंही त्याला खूप आवडली. प्रथम किंवा मनोज पब्लिकेशन्स वगैरेंनी सगळ्या भाषांमधे एकाच वेळेला काढलेल्या पुस्तकांपेक्षा पुरंदरेंची चांगली आहेत, कारण या सर्वभाषीय प्रकल्पात भाषा कधी कधी फारच कृत्रिम (आणि मनोज च्या पुस्तकांत तर साफ चुकांनी भरपूर) आहे. पुरंदरेंची खूप नॅचरल आहेत.

पण हे सगळं शोधावं लागतं. कुसुमाग्रजांचं पुस्तक मस्त आहे, पण दहा दुकानं फिरल्यावर कुठे सापडलं. थोडं विचारपूर्वक, विषयांचा आणि भाषेचा ही विस्तार करता येईल. लंपन ची मित्रं कशी कधी कधी बेळगावी बोलीत बोलतात, तसंच मुलांच्या पुस्तकात, संवादाद्वारे, लांबचे नातेवाइक आले, किंवा मामाच्या गावाला गेलो च्या लाइनीवर प्रमाण भाषेच्या साचेबाहेर ही मुलांना भाषेची ओळख करून दिले जाऊ शकते असे वाटते. विविध उच्चारांना लिखित भाषेत कसे दर्शवायचे, मुलांना बरोबर-चूक हे कसं शिकवायचं या भीतीपोटी ही पुस्तकं जाम बोर होऊन जातात.