Skip to main content

आधुनिक आणि वैज्ञानिक व्यवस्था - रंजक बातम्या

आधुनिकतेविरूद्ध बोलायला हिम्मत लागते. त्यातली त्यात विज्ञानाविरुद्ध बोलायला तर फारच. त्यामानाने देवा-धर्मा-परंपरांचे सोपे असते. अगदी देव, धर्म नि परंपरा यांत दृढ श्रद्धा असेल तरी लोक आधुनिकता आणि विज्ञान यांच्या विरोधात बोलत नाहीत. बहुसंख्य लोकांना यांच्याविरोधात बोलण्यासारखे काही आहे याचीच कल्पना नसते. ते एक आदर्श जग आहे अशा कल्पनेत जग जगते. पुजार्‍याला स्वतःला धर्म कळत नाही, त्याचे आचरण नीच आहे, या लोकांनी समाज पतित केला आहे, इ इ हे सहज कळतं. शास्त्रज्ञ मात्र मानवतेच्या कल्याणाला वाहिलेले, गंभीर, विद्वान, नि महान मूल्ये पाळणारे इ इ असतात अशी सामान्यांत जनरल धारणा आहे.

धार्मिक वर्तुळांत अनेक मूर्ख अनेक बोंबा ठोकत असतात. सगळ्या लोकांचा जोर त्यांचाच निषेध करण्यात लागलेला असतो. मात्र आधुनिक राजकारण, समाजकारण, माध्यमे, अर्थकारण, न्यायकारण, पर्यावरण, आरोग्य, मानवी मूल्ये, विज्ञानकारण, इ इ क्षेत्रांत कोणत्या प्रतलावरचे मूर्ख काय गोंधळ घालत आहेत याचा कोणाला विधिनिषेध नसतो.

हा धागा जगातले सूचक ट्रेंड देण्यासाठी उघडण्यात आला आहे. जिथे धर्माचा, इ फारसा संबंध नाही तिथे "आधुनिकतेच्या अधिपत्याखाली" जग कोणत्या दिशेने चालले आहे हे दाखवण्यासाठी बातम्या टाकायचा विचार आहे. शिवाय धार्मित क्षेत्रात ज्याला "निश्चित मूर्खपणा" म्हणता आले असते तसा निश्चित मूर्खपणा आधुनिकतेच्या बाबतीत लोकांना का वाटत नाही असा विचार करायला लावणार्‍या काही घडामोडी लिहायचा विचार आहे. क्वचित टिका आधुनिकतेच्या, विज्ञानाच्या तात्विकतेवर असेल, क्वचित व्यवहार्य सत्यावर.

धर्म नि परंपरांवर देखिल खूप टिका करता येईल, पण ती सर्रासच होते. रादर ती फॅशन आहे. म्हणून इथे धर्मावर कशी अवाजवी टिका होते आणि खरे चोर कसे बाजूला राहतात असा टोन असेल.

नितिन थत्ते Mon, 02/02/2015 - 12:14

आधुनिक व्यवस्था वैज्ञानिक आहे असे समजण्यास काय आधार आहे.

तसेही विज्ञान/वैज्ञानिक हे व्यवस्था कशी असावी याचं काही रेकमेंडेशन देत नाहीत. ते फार तर अमुक परिस्थितीत अमुक घडते (शुद्ध विज्ञानविषयात) किंवा अमुक घडण्याची इतकी शक्यता आहे अशी विधाने करते. किंवा अमुक परिस्थिती आणि तमुक निरीक्षण यांच्यात संबंध आहे/नाही अशी विधाने करते.

व्यवस्था काय असावी याचा निर्णय समाज/समाजधुरीण घेतात. त्यासाठी ते विज्ञानातील विधानांचा आधार घेतील किंवा न घेतील.

नितिन थत्ते Mon, 02/02/2015 - 12:30

In reply to by अजो१२३

धार्मिक कुठे आले मध्ये?

तो निर्णय अमेरिकेच्या अध्यक्षांनी "अ‍ॅज समाजधुरीण" घेतला.

माझा पॉइंट आहे अणुबॉम्ब टाकावा (किंवा मुळात बनवावा) हा निर्णय वैज्ञानिक घेत नाहीत इतकेच मी म्हणतो आहे. अमेरिकेचे अध्यक्ष धार्मिक होते असे कोण म्हणतंय?

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 12:34

In reply to by नितिन थत्ते

मी खूप सिमित मुद्दा मांडतोय. धार्मिक व्यवस्था रिप्लेस झाल्याने जगाचं काही भलं झालं नाही.
=========
वैज्ञानिकांना कोणता शोध (कोलित)राजकारण्यांच्या (माकडांच्या) हाती द्यावे हे कळू नये का?

नितिन थत्ते Mon, 02/02/2015 - 14:40

In reply to by अजो१२३

धार्मिक व्यवस्था रिप्लेस झाली आहे ती वैज्ञानिक व्यवस्थेने रिप्लेस झाली आहे हे गृहीतकच मुळी चूक आहे.

राजेशाही, भांडवलवादी लोकशाहीने रिप्लेस झाली भांडवलवादी सिस्टिम नेसेसरीली वैज्ञानिक नाही.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 14:46

In reply to by नितिन थत्ते

विज्ञान नावाच्या संकल्पनेला चेहरा नाही असा युक्तिवाद आपण करत आहात. आज प्रत्येकजण वैज्ञानिक व्यवस्थेत जगत आहे.
=============
लोकशाही आणि भांडवलवाद हे विज्ञानाची बाळे आहेत. विज्ञान नसले तर हे राबवता देखिल येत नाहीत.

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:53

In reply to by अजो१२३

इसपू ५०० च्या वेळचे अथेन्स आणि औद्योगिक क्रांतीच्या अगोदरचे इंग्लंड या दोन्ही ठिकाणी लोकशाही होती. तिथे विज्ञान असे काय होते म्हणे? क्यापिटलिझमचीही तीच गत आहे. उगीच बाष्कळ क्लेम्स करायची सवय कधी जाणार म्हणे?

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 15:06

In reply to by अजो१२३

अभ्यास वाढवा. तिथे काय होते याबद्दल तुम्हांला काय माहिती आहे? उचलले बोट आणि दाबला कीबोर्ड असे करू नका.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 12:32

In reply to by नितिन थत्ते

विज्ञान/वैज्ञानिक हे व्यवस्था कशी असावी याचं काही रेकमेंडेशन देत नाहीत.

ज्या वैज्ञानिकाने बंदुकीचा शोध लावला त्याने पुढे व्यवस्था कशी होईल याबद्दल काहीही विचार न करता रेकमेंडेशन दिलेले का? लागला शोध कि करा समाजाला सुपुर्त. मग तो वापरायची समाजाची अक्कल किती का असेना.

गवि Mon, 02/02/2015 - 12:50

In reply to by अजो१२३

मुद्दा मार्मिक आहे. गुंतागुंतीचा आहे. वैज्ञानिकांकडून बर्‍याच विषयबाह्य अपेक्षा ठेवल्यासारख्या वाटतात. प्रतिवाद करण्याची इच्छा होतेय पण तरीही तातडीने करता येत नाहीये. काही काळ निरुत्तर करणारा युक्तिवाद तुम्ही केला आहे हे नक्कीच.

पण ..

नितिन थत्ते Mon, 02/02/2015 - 13:36

In reply to by अजो१२३

विज्ञान तंत्रज्ञान किंवा वैज्ञानिक-तंत्रज्ञ यातल्या गोंधळाचा परिणाम आहे.

बंदूक बनवणारा वैज्ञानिक असतोच असे नाही. पण आपल्याकडे (कदाचित सर्वत्र) एडिसन आणि कलाम यांना शास्त्रज्ञ म्हणण्याची पद्धत आहे.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 13:49

In reply to by नितिन थत्ते

तंत्रज्ञ धार्मिक तत्त्वज्ञान वापरून अण्वस्त्र बनवतो का? मग अंततः दोष कोणाला जातो?

नितिन थत्ते Mon, 02/02/2015 - 14:10

In reply to by अजो१२३

तंत्रज्ञ किंवा कोणीही बंदूक किंवा काही इतर बनवतो किंवा समाजधुरीण (आधुनिक काळात) जे कायदे बनवतात ते वैज्ञानिक असते अथवा धार्मिक असते असे विधान कोणी करत आहे का? मग बंदूक बनवण्याचा आरोप धार्मिकांवर आहे असे ओढून ताणून का समजावे आणि त्याचा हिरिरीने प्रतिवाद का करावा?

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 14:32

In reply to by नितिन थत्ते

धर्म भौतिकवादाच्या विरोधात आहे. विज्यान पूर्ण भौतिकवादी आहे. म्हणून धर्माचं जेव्हा समाजजीवनावर प्रभूत्व होतं तेव्हा निसर्गात जे आहे शोधून भोगायचं हा विचार बोकाळला नव्हता. विज्ञानाने हळूहळू धर्म नाकारला. द्रव्यवाद आणला. विज्ञानवाद्यांनी समाजाची दिशा चुकीच्या बाजूने नेली. धार्मिक सोडले तर सगळे समाजधुरीण वैज्यानिक विचारसरनीचे पाईक आहेत.

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:34

In reply to by अजो१२३

भारतीय व्यापारी धार्मिक आणि द्रव्यवादी दोन्हीही आहेत. त्यांनीही समाजाची दिशा चुकीच्याच बाजूने नेली का?

गवि Mon, 02/02/2015 - 14:21

In reply to by अजो१२३

बंदूक बनवणारा वैज्ञानिक असतोच असे नाही.

तो मुद्दा आहेच पण तो डिफेन्ससाठी पुरेसा नाही. अजोंच्या युक्तिवादातली कमजोर कडी शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.

बंदूक बनवणारा वैज्ञानिक नसतो, पण अजो म्हणतात त्यानुसार मूळ तत्वदेखील समाजाला देताना सर्वांगीण साधकबाधक विचार करुन द्यावे.

म्हणजे उदा:

"काही मिश्रणे जाळली असता निर्माण होणारा वायू कित्येक हजारपट आकारमानाचा असतो आणि त्यामुळे बंदिस्त जागेत कोंडून हा स्फोट केला तर प्रचंड दाब उत्पन्न होतो. शिवाय या प्रक्रियेत लागणारा ऑक्सिजनही देऊ शकणारी इतर द्रव्ये त्यात मिसळली की बंद जागेतही ज्वलन शक्य होते"

हा उपरोक्त ब्रेकथ्रू शोधणे हे शास्त्रज्ञाचे काम. आता या ब्रेकथ्रूने इंजिनही बनते, अनकंट्रोल्ड करायचे तर बॉम्बही बनतो, कंट्रोल्ड करायचे तर दाब एका दिशेला रोखून बंदुकीची गोळीही सोडता येते.

इनफॅक्ट वाफ अथवा गॅसचा दबाव लिक्विडपेक्षा जास्त असतो हे तत्व मुळात थडथडणारे चहाचे झाकण --> वाफेचे इंजिन या मार्गाने सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे. आता पाण्याऐवजी अन्य रसायने, जी अधिक कमी वस्तुमानातून अधिक जास्त आकारमानाचा गॅस तयार करतील आणि त्यांना बंदिस्त जागेत ऑक्सिजनही मिळेल अशी युक्ती शोधण्याचं काम चालू होईल. त्यातून एखाद्या बंदुकीची दारु म्हणता येईल अशा द्रव्याचा "शोध" लागेल किंवा मिश्रण बनवले जाईल.

म्हणजे एका "क्ष" शास्त्रज्ञाने समाजाच्या हातात थेट बंदूक ठेवली असं नसतं. ऊर्जेचा शोध लागला की त्यातून धन आणि ऋण असे दोन्ही प्रकारे वापर करणारे लोक अस्तित्वात असतातच.

इन सच सिनारिओ, जर बंदूक अस्तित्वात येऊ द्यायची नसेल तर वाफेच्या ऊर्जेने शक्ती मिळते या पॉईंटलाच चाप लावावा लागेल.

हे फक्त एक उदाहरण आहे. हेच लॉजिक अन्यत्र वापरल्यास एकूण काही विचारच करु नये आणि ब्रेकथ्रू मनात आला तरी थंड पाण्याने आंघोळ करुन शिव शिव म्हणत तो मनातून दूर काढावा हाच उपाय आहे.

असा कोणता समाजोपयोगी शोध (तत्व ऊर्फ ब्रेकथ्रू) आहे की जो फक्त आणि फक्त कल्याणकारीच असू शकतो आणि बिंधास तो माकडाच्या अर्थात समाजाच्या हाती दिला तरी कोलीत बनूच शकत नाही.

.. सांगा कोणीतरी.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 14:36

In reply to by गवि

टिवी, मोबाईल, कंप्यूटर, ...इंटर्नेट मुळे कौटुंबिक संवाद प्रचंड कमी झाला आहे.
======
त्याची किंमत काय? कोण पे करतंय ती? आता दिडशहाणे लगेच म्हणतील कुटुंबात संवाद करायची गरज काय? कुटुंबाचीच गरज काय?

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:38

In reply to by अजो१२३

कुत्र्यामांजरासारखी खंडीभर पोरे पैदा करणार्‍या जुन्या काळातल्या समाजापेक्षा आजचा समाज कधीही चांगला.

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:43

In reply to by अजो१२३

तेव्हा दुष्काळ पडला तर असलेली लोकं पोसण्याइतकं धान्यही उरायचं नाही. विस्फोट कसला होतोय? शिवाय जेवढी पोरं पैदा व्हायची त्यातली कैक दगावायची. बायका म्हणजे पोरे पैदा करण्याचे मशीनच झाल्या होत्या जवळपास. आता म्हणा की हेच त्यांच्यासाठी अधिक चांगले होते.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 14:48

In reply to by बॅटमॅन

आज बायका पोरे पैदा करायची मशिन शिवाय ऑफिसात ८ तास राबून मूलभूत गरजा पूर्ण करायला लागणारे पैसे कमवणारी मशिन आहेत. एक लोड कमी करून दुसरा वाढवला आहे.

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:51

In reply to by अजो१२३

दुसरा लोड अधिक सुखदायक आणि कमी त्रासाचा आहे. इतकंच असेल तर बायकांची मते घ्या. पोरं पैदा करणे आणि पैसा कमवणे यांपैकी कुठल्या प्रकारचे मशीन होणे तुलनेने कमी त्रासाचे ते बघा.

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 15:09

In reply to by अजो१२३

जुन्या काळी अख्खे तारुण्य व मध्यमवय पोरे पैदा करून त्यांचे मलमूत्र काढण्यात घालवलेल्या आज्यांना विचारून पहा.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 15:13

In reply to by बॅटमॅन

जीवनातलं एकुलतं एक बाळंतपण ८४ दिवसात उरकावं लागणार्‍या स्वतंत्र स्त्रीयांना विचारा.

नितिन थत्ते Mon, 02/02/2015 - 14:58

In reply to by अजो१२३

+१

त्या काळी आपल्या द्रष्ट्या धार्मिक पूर्वजांनी हे लक्षात घेऊन लशींच्या शोधाला चाप लावला असावा.

गवि Mon, 02/02/2015 - 14:46

In reply to by अजो१२३

टिवी, मोबाईल, कंप्यूटर, ...इंटर्नेट मुळे कौटुंबिक संवाद प्रचंड कमी झाला आहे.

माणूस उगाच बाहेर जास्त संवाद कशाला करेल ? पूर्वी कुटुंबात खरोखर संवाद होता? आर यू सिरियस? जेवताना बोलू नये वगैरे नियम. वडील आले की पोराबाळांचे मित्र घरी पळणे आणि सर्वांची डोकी अभ्यासाच्या पुस्तकात अन स्त्रिया स्वयंपाकघरात चूल फुंकायला हे प्रातिनिधिक चित्र नव्हतं?

अजिबात संवाद नसलेल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला बाहेरच्या जगात का होईना पण कुठेनाकुठे आपली मतं शेअर करणं, वाद घालणं, समान इन्टरेस्ट शेअर करणारे मित्र मिळणं हे सर्व विज्ञानाने शक्य झालं. कुटुंबाशी संवाद यामुळे का तुटावा? वर्तुळ प्रसरण पावलं म्हणजे घरातल्यांकडे दुर्लक्ष करा असाच अर्थ नाही. जर घरच्यांशी संवादात आनंद मिळत असेल तर कोणीही ते करेलच. बाहेर जास्त संपर्क ज्याचा असतो त्याला निश्चित घरच्या लोकांपेक्षा त्या बाहेरच्या लोकांकडून जास्त आनंद मिळत असतो म्हणूनच तो ते करतो ना? मग बळंच दुसरा पर्यायच नाही म्हणून घरातल्या लोकांनी एकमेकांशी बोलायचं किंवा तिथेही आपापली कामं करत गप बसायचं अश्या चित्रापेक्षा प्रत्येकी एकेक मोबाईल हातात धरुन एका सोफ्यावर बसलेले तीन कुटुंबसदस्य जास्त बरे. निदान ते मजेत तरी असतात.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 15:06

In reply to by मेघना भुस्कुटे

सध्या इथे चाललेल्या उन्मादी, निष्फळ आरडाओरड्याचा मला वीट आला आहे. त्यामुळे इथला वावर मर्यादित असेल.

पुरोगामी असहिष्णुता?

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 14:53

In reply to by गवि

माणूस उगाच बाहेर जास्त संवाद कशाला करेल ? पूर्वी कुटुंबात खरोखर संवाद होता? आर यू सिरियस? जेवताना बोलू नये वगैरे नियम. वडील आले की पोराबाळांचे मित्र घरी पळणे आणि सर्वांची डोकी अभ्यासाच्या पुस्तकात अन स्त्रिया स्वयंपाकघरात चूल फुंकायला हे प्रातिनिधिक चित्र नव्हतं?

ब्रिटिश शिक्षण आल्यानंतरच्या ब्राह्मणी कुटुंबात असे असेल.
===============
कृपया भारत म्हणजे ब्राह्मण ही कल्पना बाजूला करा. हे सगळे नियम ब्राह्मणांच्या घरी होते. इतरांच्या कडे मुलांची, बायकांची, पुरुषांची गँग असायची. त्यात जो आणि जितका संवाद होई त्याला मर्यादा नसे.

गवि Mon, 02/02/2015 - 14:56

In reply to by अजो१२३

ओके. इतर समाजात असेल तसा संवाद हे मान्य.

इतरांच्या कडे मुलांची, बायकांची, पुरुषांची गँग असायची. त्यात जो आणि जितका संवाद होई त्याला मर्यादा नसे.

प्रचंड भौगोलिक, टोळीय, जातीय मर्यादा नव्हत्या ? विज्ञान ऊर्फ माहितीजालाने त्या दूर नाही झाल्या?

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:59

In reply to by गवि

प्रचंड भौगोलिक, टोळीय, जातीय मर्यादा नव्हत्या ? विज्ञान ऊर्फ माहितीजालाने त्या दूर नाही झाल्या?

त्या मर्यादा म्हणजेच सुख अशी व्याख्या आहे अजोंची. असतात एकेकाच्या आवडी, काय करणार नै का. शेवटी सूडोलिबरल न होता खरा लिबरलपणा दाखवायचा तर असेही लोक असणारच याची सवय करून घेतलेली बरी.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 15:03

In reply to by गवि

मानवी संवादाला भावनिकतेची झालर होती. सध्याला फॉर्मेलिटीची आहे.
===========
जातीय मर्यादा -
मी १९९१ पासून २०१५ पर्यंत ४ कॉलेजेस आणि ७ कंपन्या पाहिल्या आहेत. ग्रामीण ब्राह्मण सर्वात जास्त जात पाळतात. तर असे ग्रामीण ब्राह्मण आणि गावातले दलित, मुस्लिम यांच्यातला एकूण संवाद आजच्या दोन स्तरांवरील अधिकार्‍यांपेक्षा मला जास्त आणि जास्त जवळचा वाटला. दोन क्लासचे लोक असतील तर बोलायलाच नको. म्हणजे रोज सलाम ठोकणार्‍या पीडब्व्ल्यूसीच्या द्वारपालाचे नाव काय आहे हे सीईओ, डायरेक्टर आणि पार्टनरला जाऊच द्या, साध्या मॅनेजरला माहित नाही. भौतिक अंतर आणि मानसिक अंतर यांत महदंतर.

आजचा क्लासिझम कालच्या जातीयवादापेक्षा प्रचंड विषण्ण करणारा आहे.

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 15:07

In reply to by अजो१२३

आजचा क्लासिझम कालच्या जातीयवादापेक्षा प्रचंड विषण्ण करणारा आहे.

तुम्ही दलित इ. नाही म्हणून तुम्हांला असं वाटणारच. साहजिकच आहे ते.

गवि Mon, 02/02/2015 - 15:09

In reply to by अजो१२३

आपण आंतरजाल/ संपर्कमाध्यमे इत्यादि विज्ञानाच्या पोटातून जन्मलेल्या गोष्टींविषयी बोलतोय. ट्रॅक बदलून उपयोग नाही.

मी आणि तुम्ही आणि आपण सर्व आत्ता इथे जी चर्चा मुक्तपणे करतो आहोत त्यात शंभर टक्के लोकांची जात एकमेकांना माहीत नाही. नव्वद टक्के लोक पुरुष आहेत का स्त्री याविषयीही कसला पुरावा ज्ञात नाही. कदाचित ऐंशी टक्के लोकांबाबत ते कोणत्या देशात राहतात याची माहिती नाही. पंचाहत्तर टक्के लोकांचं वय माहीत नाही.

तरीही आणि कदाचित त्यामुळेच आपण मुक्तपणे शेअर करतोय ना ?

टोळ्यांच्या बाबतीत तुमचे पाल उद्गीरला आणि आमचे चिपळूणला आणि ब्याटमनचे कवलापूरला पडलेले असताना कसली चर्चा हो ?

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 15:11

In reply to by गवि

टोळ्यांच्या बाबतीत तुमचे पाल उद्गीरला आणि आमचे चिपळूणला आणि ब्याटमनचे कवलापूरला पडलेले असताना कसली चर्चा हो ?

कवलापूरला नाही मिरजेला. मिरज ऊर्फ मिरिंज देशात.

गवि Mon, 02/02/2015 - 15:17

In reply to by बॅटमॅन

मी पालांची ठिकाणे ऑफसेट होत असल्याचे धरुन जरा जरा सरकती ठिकाणे घेतली आहेत.. ;) माझेही चिपळूण नव्हेच..!!

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 15:11

In reply to by गवि

माझी चर्चा उदगीरकरांशी होत नाहीत, किंवा अगदी दिल्लीकराम्शीही होत नाहीय, हे का दुर्लक्षिता आहात?

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:57

In reply to by अजो१२३

ब्रिटिशपूर्व ब्राह्मण कुटुंबातही असेच होते. ब्रिटिश शिक्षण हा काही ठिकाणी वायझेडपणा ठरला, पण सर्वत्र नाही.

ऋषिकेश Mon, 02/02/2015 - 14:46

In reply to by गवि

अहो गवि, उगाच लॉजिकं शोधत बसु नका - कारण अजोंच्या वरील तर्कात ते शोधणं ही तुमचीच परिक्षा आहे ;)

खरंतर, अग्नीचा शोध लावलेल्या शास्त्रज्ञाचीच सगळी चुक आहे. त्याने आगीचा शोध लावल्यावर विचार केला नाही सगळं सगळं ज्ञान इतर समाजाला दिलं. काय तर म्हणे अन्न शिजवायच्या उपयुक्ततेचं, शिवाय प्रकाश व उष्णता देणारा अग्नी! हे काय कारण आहे? धार्मिक लोकं पण त्या शास्त्रज्ञामुळे अग्नीची पुजाच करू लागले. त्याच अग्नीमुळे आता माणूस माणसाला जाळु लागला आहे ते पहा! त्या शास्त्रज्ञाने विचार केला असता तर आजचा दिवस दिसता ना!

आता भोगा आपल्या वैज्ञानिक कर्माची फळं!

गवि Mon, 02/02/2015 - 14:49

In reply to by ऋषिकेश

म्हणजे अल्टिमेटली सर्वात पहिला मनुष्य जन्माला घालणार्‍याचीच चूक आहे हे तत्व खरंच आहे तर..

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 15:08

In reply to by ऋषिकेश

अग्नीचा शोध लावलेल्या शास्त्रज्ञाचीच सगळी चुक आहे.

सगळं डिटरमिनिस्टिक आहे हो. उत्क्रांती झाली, त्याची बुद्धी वाढली त्याला बिचारा काय करणार?

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 15:25

In reply to by ऋषिकेश

कारण अजोंच्या वरील तर्कात ते शोधणं ही तुमचीच परिक्षा आहे

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असलं निर्बुद्ध लॉजिक मात्र चालवून घ्या बरं.

नितिन थत्ते Mon, 02/02/2015 - 15:28

In reply to by गवि

>>इनफॅक्ट वाफ अथवा गॅसचा दबाव लिक्विडपेक्षा जास्त असतो हे तत्व मुळात थडथडणारे चहाचे झाकण --> वाफेचे इंजिन या मार्गाने सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे. आता पाण्याऐवजी अन्य रसायने, जी अधिक कमी वस्तुमानातून अधिक जास्त आकारमानाचा गॅस तयार करतील आणि त्यांना बंदिस्त जागेत ऑक्सिजनही मिळेल अशी युक्ती शोधण्याचं काम चालू होईल. त्यातून एखाद्या बंदुकीची दारु म्हणता येईल अशा द्रव्याचा "शोध" लागेल किंवा मिश्रण बनवले जाईल.

छोटी सुधारणा.....

गनपावडरचा शोध जेम्स वॅटच्या ५०० वर्षे आधी लागला.

बर्‍याच शास्त्रीय शोधांमध्ये तंत्र आधी विकसित होते आणि मग त्यामागचे विज्ञान. विज्ञान शोधले गेले की पुढचा तंत्रविकास अधिक एफिशिअंट होतो.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 12:43

In reply to by अजो१२३

http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_military_expenditure_…
http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_GDP_(nominal)_per_cap…

जगातल्या कितीतरी देशांचे पर कॅपिटा मिलिटरी एक्सपेंडीचर (भारत धरून) कितीतरी देशांच्या पर कॅपिटा इन्कमपेक्षा जास्त (यात अमेरिकेसारखा जगातला तिसरी सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश!!!!!) आहे.

जय आधुनिक व्यवस्था!!!

ऋषिकेश Mon, 02/02/2015 - 13:00

In reply to by अजो१२३

हे बजेट पूर्वीच्या काळी (से ३०० वर्षांपूर्वी) किती होते? त्याशिवाय सध्या हे अधिक आहे का कमी यादोन्ही बद्दल काहीच म्हणता येणार नाही.

एकांगीच गोष्टी मांडायच्या आहेत हे आधीच स्पष्ट केले आहे याची कल्पना आहे. तरीही, आधुनिक काळावर टिका करताना प्रत्येकवेळी पूर्वीच्या काळचा त्याच गोष्टीचा विदा उपलब्ध असेल / तेव्हा ती गोष्ट सध्यापेक्षा चांगल्या अवस्थेत होती याचे तर्कशुद्ध स्पष्टिकरण असेल तर त्या त्या टिकेला किमान ग्राह्य (योग्यायोग्यता पुढचा विषय) समजता यावे.

तोवर एकाच बाजुचे रुदन चालु द्या!

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 13:05

In reply to by ऋषिकेश

कंपन्यासुद्धा १० वर्षापेक्षा जास्तीचे अकाउंटस ठेवत नाहीत. ३०० वर्षापूर्वीचे बजेट्स कुठून आणू. पण माझा निर्देश नव्या व्यवस्थेतील विषमतेकडे आहे.

ऋषिकेश Mon, 02/02/2015 - 13:09

In reply to by अजो१२३

पण ती जास्त आहे हे कशावरून ठरवले?
उलट पूर्वी बहुतांश राजे हे युद्धग्रस्त असत. तर दरडोई उत्पन्न अतिशयच कमी असे, तेव्हा राजेशाही वा आधुनिक व्यवस्था नसतानाच्या काळात दरडोई उत्पन्न हे युद्धावरील / सैन्यावरील खर्चापेक्षा कमीच असेल! (पण तर्काला हे पटत असूनही मी तसे विधान बेधडक करत नाही कारण त्यासंबंधित विदा माझ्यापाशी नसताना केवळ मला वाटते म्हणून विधान करायला मी ** थोडीच आहे. गाळलेल्या जागा आपापल्या वकुबाने भरा )

तुम्ही ज्या आधुनिक व्यवस्थेचा जयजयकार वर करताय ते योग्यच आहे म्हणायचे!

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 13:15

In reply to by ऋषिकेश

आधुनिक व्यवस्था नसतानाच्या काळात दरडोई उत्पन्न हे युद्धावरील / सैन्यावरील खर्चापेक्षा कमीच असेल!

असं कसं होईल? विधान लिहिण्यापूर्वी बेसिक मिनिमम विचार करावा कि नाही?
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त कसा असेल? तोही एकाच गोष्टीवरचा?

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 13:27

In reply to by ऋषिकेश

कंटाळा ठिक आहे. पण दरडोई उत्पन्न हे फक्त* दरडोई सैन्यावरील खर्चापेक्षा कमी कसे असेल?
=======
* अनावश्यक आणि सत्य शब्द.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 13:32

In reply to by ऋषिकेश

त्यासंबंधित विदा माझ्यापाशी नसताना केवळ मला वाटते म्हणून विधान करायला मी ** थोडीच आहे

दोन्ही विदा असल्याशिवाय दोन्ही काळांची, व्यवस्थांची तुलना करायची नाही असे म्हटले तर पुरोगामी फार हिरमुसतील. अशी अट घातल्याने तुलना करणे बंद करावे लागेल. पर्यायाने सध्याचा काळ चांगला आहे असे म्हणणे बंद करावे लागेल.

ऋषिकेश Mon, 02/02/2015 - 13:45

In reply to by अजो१२३

दोन्ही विदा असल्याशिवाय दोन्ही काळांची, व्यवस्थांची तुलना करायची नाही असे म्हटले तर पुरोगामी फार हिरमुसतील. अशी अट घातल्याने तुलना करणे बंद करावे लागेल. पर्यायाने सध्याचा काळ चांगला आहे असे म्हणणे बंद करावे लागेल.

कोणाला हिरमुसायचे ते हिरमुसु दे, पण फक्त एकच बाजु माहित असताना/ एकाच बाबतीतला विदा असताना "तुलना" कशी करायची ते सांगाल काय?

सध्या काळ चांगला आहे हे एका मर्यादेत का होईना घासुगुर्जींनी विदा देऊन दाखवले आहे. त्यांचा विदा संपूर्ण नाही, त्याला मर्यादा आहेत वगैरे खरे असले तरी आहे तो विदा चुकीचा आहे व खरेतर त्या त्या क्षेत्रात अधोगती होत आहे असे कोणी दाखवलेले वाचनात आले नाही.

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:07

In reply to by ऋषिकेश

विदा इ. काहीही न देता फक्त एकाच बाजूची अर्ग्युमेंटे लॉजिकल मानायची आणि दुसर्‍या बाजूचे सर्व काही नाकारायचे ही अरुणजोशींची जुनीच युक्ती आहे. त्याला बळी पडू नका.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 14:23

In reply to by ऋषिकेश

घासुगुर्जींनी विदा देऊन दाखवले आहे

घासकडवींनी परकीय सत्तेने ३०० वर्षे शोषून फेकून दिलेल्या काळातला भारत नंतर कसा सुधारला हे दाखवून दिले आहे. त्या आलेखावर तो उंचवटा दिसणार यात नवल ते काय?
नि त्यातही दोन मोठे लोचे आहेत-
१. सगळे आकडे पर कॅपिटा प्रॉडक्शनचे आहेत. कंजंशनचे नाहीत.
२. विषमता कशी आहे ते पूर्ण दुर्लक्षिले आहे.

चिंतातुर जंतू Mon, 02/02/2015 - 13:55

In reply to by अजो१२३

>> "आधुनिकतेच्या अधिपत्याखाली" जग कोणत्या दिशेने चालले आहे हे दाखवण्यासाठी बातम्या टाकायचा विचार आहे.

>> जगातल्या कितीतरी देशांचे पर कॅपिटा मिलिटरी एक्सपेंडीचर (भारत धरून) कितीतरी देशांच्या पर कॅपिटा इन्कमपेक्षा जास्त (यात अमेरिकेसारखा जगातला तिसरी सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश!!!!!) आहे.

शस्त्रास्त्रांवर खर्च करणे ही आधुनिकता कशावरून? इथून उद्धृत :

The consensus among Christians on the use of violence has changed radically since the crusades were fought. The just war theory prevailing for most of the last two centuries — that violence is an evil which can in certain situations be condoned as the lesser of evils — is relatively young. Although it has inherited some elements (the criteria of legitimate authority, just cause, right intention) from the older war theory that first evolved around A.D. 400, it has rejected two premises that underpinned all medieval just wars, including crusades: first, that violence could be employed on behalf of Christ's intentions for mankind and could even be directly authorized by him; and second, that it was a morally neutral force which drew whatever ethical coloring it had from the intentions of the perpetrators.

खूप लष्करी खर्च करण्याची आजच्या राष्ट्रांची जी मानसिकता आहे तिचं मूळ मध्ययुगीन काळातल्या युद्धखोरीमध्ये का नाही? 'आम्ही लष्करी खर्च करतो ते नैतिकच आहे, पण शत्रूपक्षाचा लष्करी खर्च मात्र अनैतिक आणि अधिक लष्करी खर्च करण्यासाठी आम्हाला भाग पडणारा' ही मानसिकता आधुनिक का मानावी?

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 14:20

In reply to by चिंतातुर जंतू

आजचे भारतातले बलात्काराचे किंवा अन्य सामाजिक गुन्ह्यांचे प्रमाण देताना बलात्कार करण्याची प्रवृत्ती मध्ययुगीन आहे म्हणणे निव्वळ विनोद आहे. आपण अंतर्गत सुरक्षेवर इतके पैसे खर्च करतोय किंवा मुलांना शिक्षण द्यायला इतका पैसा खर्चतोय त्याचा परिणाम नको का दिसायला? असं होत नसेल तर नव्या व्यवस्थेचा फायदा काय आहे?

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:25

In reply to by अजो१२३

परिणाम अनेक दिसताहेत. ते न जाणवणे म्हणजे तुमच्या पर्सेप्शनचे दौर्बल्य आहे. :) जसे तुमच्या भाषिक दौर्बल्याचे खापर तुम्ही भाषेवर फोडता त्यातलीच गत आहे ही.

चिंतातुर जंतू Mon, 02/02/2015 - 14:34

In reply to by अजो१२३

>> आजचे भारतातले बलात्काराचे किंवा अन्य सामाजिक गुन्ह्यांचे प्रमाण देताना बलात्कार करण्याची प्रवृत्ती मध्ययुगीन आहे म्हणणे निव्वळ विनोद आहे.

(सूचना : बलात्काराचा मुद्दा मध्ये आणून कदाचित तुम्ही तुमच्याच धाग्यावर अवांतर करता आहात. त्यामुळे मी त्या मुद्द्याला उत्तर देत नाही आहे, तर त्या परिप्रेक्ष्याबाहेर एक विधान इथे करतो आहे.)

  • जर समाजातले अनेक लोक मध्ययुगीन मानसिकतेतून बाहेर आलेले नसतील, आणि
  • त्या मध्ययुगीन मानसिकतेमुळे जर काही अनिष्ट घडत असेल, तर -

त्याला आधुनिक म्हणून आधुनिकतेवर त्या अनिष्ट गोष्टींचं खापर फोडल्यानं नक्की काय साध्य होणार आहे, हे मला समजलेलं नाही. क्षमस्व.

'आधुनिकते'चा अन्वय इतिहासात वेगवेगळ्या पद्धतीनं लावला गेला आहे. तुमचा तुम्ही स्पष्ट केला नाहीत, तर तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते स्पष्ट होणार नाही. ते होत नाही तोवर ह्या वादाला फारसा अर्थ नाही.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 14:39

In reply to by चिंतातुर जंतू

चिंज, मी म्हणतोय कि आधुनिक असायची आपण एक किंमत देतोय (शिक्षण, पोलिस). मग आता ही व्यवस्था मूलभूत प्रश्न सोडवायला फेल ठरली तर खापर मध्ययुगाच्या माथी का मारताय?

चिंतातुर जंतू Mon, 02/02/2015 - 14:49

In reply to by अजो१२३

>> आधुनिक असायची आपण एक किंमत देतोय (शिक्षण, पोलिस).

तुमच्या मते काय आधुनिक आहे आणि काय नाही, आणि त्यामागची तुमची कारणमीमांसा काय आहे, हे जोवर स्पष्ट होत नाही तोवर तुमचं म्हणणं काय आहे ते कळत नाही.

पुन्हा एकदा परिप्रेक्ष्याबाहेरचं मत -

कोणत्याही जीवनदृष्टीचे निव्वळ फायदेच असतात असं सहसा दिसत नाही. फायद्या-तोट्याची तुलना करूनच त्यातलं बरंवाईट ठरवावं लागतं.

बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:41

In reply to by चिंतातुर जंतू

त्याला आधुनिक म्हणून आधुनिकतेवर त्या अनिष्ट गोष्टींचं खापर फोडल्यानं नक्की काय साध्य होणार आहे, हे मला समजलेलं नाही. क्षमस्व.

साध्य होणार तर! नव्या व्यवस्थेला श्या घालायचा कंडु शमेल ते पहा की.

कुंदा गजानन फु… Mon, 02/02/2015 - 14:43

"आधुनिकतेच्या अधिपत्याखाली" मला भरपूर लिहिता येतं; जे काही लिहितो त्याचे पुरावे मिळवावे लागत नाहीत. छापलेला प्रत्येक शब्द खरा मानण्याची मध्यमवर्गीय प्रवृत्ती वापरता येण्याची खात्री असते. त्यातल्या प्रत्येक माणसाला काय काय खरं वाटलं याचा तपासही घेण्याची गरज नसते. म्हणून मला आधुनिकता खूप आवडते.

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 15:58

http://www.gizmodo.com.au/2015/02/its-official-that-much-hyped-big-bang…

There will be no Nobel prizes after all. Last March, scientists announced they had discovered our first direct evidence of the Big Bang, but that evidence has been slowly crumbling away. The results of a joint analysis released today make it official: It was all just cosmic dust.

What the original team of physicists using the BICEP2 telescope thought they saw was evidence of primordial gravitational waves leftover from the Big Bang. Alas, the distortions in light erroneously attributed to the gravitational waves were actually due to cosmic dust.

We wrote about the controversy over the gravitational waves discovery in greater detail last fall, when the doubts first began bubbling up. [ESA]

गेल्या मार्च मधे लै हव्वा केलेली. हा मार्च उजडायच्या आत फुस्स.

मन Mon, 02/02/2015 - 16:03

अजोकाकांशी कुस्ती खेळण्यापूर्वी ह्या फडातला पूर्वीचा पराक्रम , त्यांचे कौशल्य नजरेखालून घालता येइल.
त्यांचे काही मुद्दे इथे सापडतील :-
http://www.aisiakshare.com/node/2453 ( धाग्याचं नाव :- अरुणराव, का जगायचं?)
.
.

वरील धाग्याव्यतिरिक्त त्यांनी ह्यापूर्वी काही विधाने केली आहेत; त्याबद्दलही कुणी चर्चा केली तर बरं होइल.
************************अजोंची विधाने सुरु*******************************************************
.
.
वेल, जैविकतेच्या बाहेर, सामाजिक परिस्थीतींमुळे स्त्रीया अधिक बुद्धिमान असतात. त्या जास्त समंजस असतात. जास्त भावूक असतात. पुरुषांच्या तुलनेत त्या कमी दुष्ट असतात. पुरुषांसाठी तर त्या दुष्ट नसतातच म्हटले तर चालावे. त्यांना इगो कमी असतो. जनरली पुरुष कचरा करत असतात नि त्या तो सावरत असतात. एकूणात त्यांची मूल्येदेखिल पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात.
-------------
आता हे फरक असावेत का? तर हो. का? तर दोघांनी मिसळून जगाची नासाडी करायची ठरवली तर फारच फास्ट होईल. पक्षी कोण्या तरी एकाने शहाणपणाने घेतलेले बरे. जगातले सगळे अनावश्यक, नाशकारी वाद 'हे पुरुष' विरुद्ध 'ते पुरुष' असे आहेत. हे वाद मूर्खपणाचे आहेत हे कळण्याइतकं शहाणपण अगदी अशिक्षित स्त्रीला पण असतं.
--------
स्त्रीयांनीच पडती बाजू का घ्यावी? वेल, कारण तितकी मानसिक क्षमता पुरुषांत नसतेच. झळ लावून न घेता घर, समाज सावरून घेण्याची क्षमता स्त्रीयांत आहे. दुसरं म्हणजे चाणाक्षपणे त्या पुरुषांना कामाला लावून सगळी खरी सुखे भोगत असतात. त्या ज्या काही भूमिका घेतात त्याचा सारा भौतिक मोब्दला त्यांना इथेच नि लगेच मिळतो.
--------------
जगात नेहमीच एक सुप्त स्त्री राज्य असते.
भारतासारख्या पुरुषसत्ताक व्यवस्थेतीतही "खरी सत्ता" स्त्रीकडेच असते.
पारंपरिक व्यवस्थेत स्त्रियांवर अन्याय वगैरे होतो हे सगळं झूट है.
.
.
************************अजोंची विधाने समाप्त***********************************

अनु राव Mon, 02/02/2015 - 16:16

सध्या इथे चाललेल्या उन्मादी, निष्फळ आरडाओरड्याचा मला वीट आला आहे. त्यामुळे इथला वावर मर्यादित असेल.

अगदी अगदी. त्यामुळे गेल्या काही दिवसात काही प्रतिक्रिया लिहाव्या असे पण वाटले नाही.

Nile Mon, 02/02/2015 - 20:03

हसून हसून पुरेवाट झाली! (इतकी की यावेळी हहपूवा हा शॉर्टफॉर्म वापरणे चुकीचे वाटले!)

अतिशहाणा Mon, 02/02/2015 - 21:23

Science is an amazing thing. But it has a credibility issue that it earned. Should we fix the credibility situation by brainwashing skeptical citizens to believe in science despite its spotty track record, or is society’s current level of skepticism healthier than it looks? Maybe science is what needs to improve, not the citizens.

विज्ञानाची विश्वासार्हता का घसरत आहे आणि अरुणजोशींना असे प्रश्न का पडत आहेत याबाबत एक (संयमी भाषेतलं) निरीक्षण

http://blog.dilbert.com/post/109880240641/sciences-biggest-fail#_=_

या ब्लॉगपोस्टमध्ये संदर्भ दिलेल्या लेखातला - वि़ज्ञान आणि सामान्य जनता यांच्या विचारात किती तफावत आहे हे दाखवून देणारा - तक्ता अधिक माहितीसाठी खाली.

अनुप ढेरे Mon, 02/02/2015 - 21:38

In reply to by अतिशहाणा

मस्त लेख आहे. धन्यवाद.
हे वाक्य सार आहे लेखाचं

Science isn’t about being right every time, or even most of the time. It is about being more right over time and fixing what it got wrong.

I’m pro-science because the alternatives are worse. (Example: ISIS.)

असच वाक्य लोकशाहीबद्दलही ऐकलं होतं. पटलं.

अतिशहाणा Mon, 02/02/2015 - 21:37

वरील ब्लॉगपोस्ट आणि दुव्यातील निरीक्षणांशी मी साधारणपणे सहमत आहे. निदान न्युट्रिशन व आरोग्यशास्त्राबाबततरी ज्योतिष-राशीफलासारखेच विज्ञानाचे सामान्य ठोकताळे आहेत. जगातील यच्चयावत व्यक्तींना या ठोकताळ्यांमध्ये बसवणे अत्यंत अवघड असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येऊन विश्वासार्हता ते अविश्वास या स्पेक्ट्रमवर आपण कुठेतरी सापडतो.

राजेश घासकडवी Mon, 02/02/2015 - 22:05

वैज्ञानिकांचा धिक्कार करावा तितका कमी आहे! यांच्या करतुतांची दोन चार उदाहरणं काफी आहेत.

- अमेरिकेत त्यांनी गेल्या शतकात बालमृत्यूंवर बंदी आणली त्याचे भयानक परिणाम खालच्या ग्राफ्समधून उघड होतात. लहान बालकांच्या मृत्यूंमध्ये वीसपटींनी घट! काय चाललंय काय हे? तरी बरं हे लोण भारतात पसरत नाहीये.

- या दुष्ट वैज्ञानिकांनी सर्व जगालाच वैज्ञानिक बनवण्यासाठी त्यांचं ब्रेनवॉशिंग करून त्यांना साक्षर करायला सुरूवात केली, ताकी तेही विज्ञान वाचून वैज्ञानिक बनतील. त्याचे दुष्परिणाम खालच्या आलेखात दिसतच आहेत. हे असंच चालू राहिलं तर २१व्या शतकाच्या अंतापर्यंत अशिक्षित माणूस शोधूनही सापडणार नाही.

- गेली हजारो वर्षं पंचवीसच्या आसपास असणारी लाइफ एक्स्पेक्टन्सी या वैज्ञानिकांनी वाढवून साठ-सत्तरपर्यंत नेऊन ठेवलेली आहे! बेशरम कुठचे!

बॅटमॅन Tue, 03/02/2015 - 01:06

In reply to by राजेश घासकडवी

सारक्याझमचा डोस अंमळ कमी पडला काय, मालक?

-(हरामखोर वैज्ञानिकांचा सपोर्टर) बॅटमॅन.

बाबा बर्वे Tue, 03/02/2015 - 10:39

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जी .. सरक्याझम म्हणून ठीक आहे पण आपला विदा अपूर्ण आहे ...

तुम्ही म्हणता वैज्ञानिकांचा धिक्कार करायला हवा कारण गेली हजारो वर्ष पंचवीसच्या आसपास असणारी लाइफ एक्स्पेक्टन्सी या वैज्ञानिकांनी वाढवून साठ-सत्तरपर्यंत नेऊन ठेवलेली आहे पण ही लाइफ एक्स्पेक्टन्सी जन्माच्या वेळची आहे की त्या नंतरची ?? कारण पूर्ण विदा असं सांगतो की मध्ययुगीन इस्लामिक खिलाफतींच्या वेळी जन्माच्या वेळची लाइफ एक्स्पेक्टन्सी ३५+ होती पण त्याच्सुमारास मध्यपूर्वेत विद्वानांचं सरासरी आयुष्यमान ५९ ते ८४.३ वर्षे होतं तर इस्लामिक स्पेनमधे ६९ ते ७५ होतं ... क्लासिकल रोममधे १० वर्षे वयाच्या जनतेची लाइफ एक्स्पेक्टन्सी ४५ ते ४७ वर्षे होती तर मध्ययुगीन ब्रिटनमध्ये वयाची २१ वर्षे पाहिलेल्या जनतेची ६४ वर्षे होती ...

पहा ... लाइफ एक्स्पेक्टन्सी

वैज्ञानिकांचा धिक्कार तर करायलाच हवा पण तो काही वेगळ्या कारणांसाठी ..
तुम्ही वैज्ञानिकांचा धिक्कार करताय कारण अमेरिकेत त्यांनी गेल्या शतकात बालमृत्यूंवर बंदी आणली परिणामतः लहान बालकांच्या मृत्यूंमध्ये वीसपटींनी घट झाली म्हणून ... वस्तुतः वैज्ञानिकांचा धिक्कार करायला हवा कारण त्यांच्या कामामुळे इराकी बालकांच्या जिवंत राहण्याच्या दरात झालेली घट .. १९९० च्या आधी ९५% असणारा हा दर १९९० ते १९९५ च्या दरम्यान १०% नी घसरला ...

आजतागायत तुम्ही दिलेला विदा आम्ही डोळे झाकून प्रमाण मानत आलो आहोत ... त्यामुळे आपल्याकडून असा अपूर्ण आणि चुकीचा विदा आलेला पाहून धक्का बसला ... तरीसुद्धा वैज्ञानिक समाजव्यवस्था नालायक, हरामखोर आहे आणि वैज्ञानिकांचा धिक्कार करावा तितका कमी आहे या आपल्या मताशी आम्ही आजही सहमत आहोत ...!

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 12:29

In reply to by राजेश घासकडवी

राजेश घासकडवींची विदा देऊन, आलेख देऊन एखादी स्पष्ट दिसणारी गोष्ट मांडून चार मार्मिक श्रेण्या मिळवण्याची शैली सामान्य माणसाच्या डोळ्यात धूळफेक करणारी, तकलादू आहे*. माहितीचे चार तुकडे होलिस्टिक पर्स्पेक्टीव न मांडता फेकले कि फार विचार न करणार्‍या जनतेला इंप्रेस करता येते.
१. एक आपला डेटा.
http://jn.nutrition.org/content/131/2/401S.short

Crucial to the study of infant mortality was acceptance of a uniform definition of a live birth. It was not until 1951, however, that the Fourth World Health Assembly, the governing body of the WHO, adopted a standard definition of a Live Birth, to wit:

A live birth is any product of conception which, after complete expulsion or extraction from its mother, irrespective of the duration of pregnancy, breathes or shows any other evidence of life such as beating of the heart, pulsation of the umbilical cord or definite movement of voluntary muscles, whether or not the umbilical cord has been cut or the placenta is attached. Each product of such a birth is considered live born.

The years 1900, 1915 and 1933

In 1900, when the republic’s population was 75 million, only a few states and cities had essentially complete birth reporting. It was not until 1915, when the population had reached 100 million, that the Bureau of the Census, for reporting purposes, established a Birth Registration Area (BRA), comprising 10 states and the District of Columbia, all of which regularly registered at least 90% of their live births. Although the BRA involved only one fifth of the then 48 states, it did include 50% of the nation’s population. Other states qualified in short order and, by 1933, with admission of Texas to the BRA, the entire country was covered.

Thus, because of the different denominators, we have no representative national infant mortality figures, as such, for the first decade and a half of the century.

तुमच्या वीसपटीतले कितीतरी पट याच काळातले आहेत.
२. आपण युनिसेफचा डेटा पाहू. तो अलिकडचा आणि जास्त रिलायेबल आहे.
http://data.unicef.org/child-mortality/under-five
यातला सर्वाधिक आकडा हजारी ६१९ आहे. येमेनसाठी १९५२ चा. सर्वात कमी आकडा २०१३ चा आईसलँडचा आहे. वेल, २०१३ मधे आईसलँड सर्वात प्रगत, वैज्ञानिक नाही आणि १९५२ मधे येमेन सर्वात अप्रगत, अवैज्यानिक नव्हते.
३. अमेरिका म्हणजे गावातला पाटलाचा वाडा झाली आहे. तिथल्या सुबत्तेकडे बोट दाखवून जगात सगळं कसं आलबेल आहे हे दाखवायची वृत्ती. २०१३ मधे सर्वात जास्त मृत्यूदर १०० च्यावर सबसहारन आफ्रिकेत आहे.

The global under-five mortality rate has declined by nearly half (49 per cent) since 1990, dropping from 90 to 46 deaths per 1,000 live births in 2013.

या प्रगतीची किंमत विषमता आहे. किंवा या प्रगतीचा परिणाम विषमता आहे. काहीही म्हणा. आईसलँड १.६ आणि अंगोला १०८.६. म्हणजे ६८ पट फरक.
४. तुम्ही अचानक जसा प्रगतीवाल्यांचा लाडीवळ विषय "इंफॅन्ट मॉर्टेलिटी" आणला आहे तसाच हा रेशो इतरत्र लावू. उदा. अमेरिकेच्या माणसाचे शिक्षण अंगोलाच्या माणसापेक्षा ६८ पट जास्त आणि जास्त उत्कृष्ट असणार. मग सगळे बौद्धिक संपदा अधिकार अमेरिकेत जमा होणार. ते ते ६०-६० वर्षे भोगणार. अंगोला अधिकच गरीब होणार. पाटलाच्या वाड्यावर रोषणाईच रोषणाई.
=======================
यात व्यक्तिगत काही नाही. व्यक्ति म्हणून मला आपला खूप आदर आहे. कृपया विचाराला विरोध हा फक्त विचाराला विरोध म्हणून वाचा.

अस्वल Tue, 03/02/2015 - 12:43

In reply to by अजो१२३

भयाण पांडित्याचा आव आणून
इंग्रजीतले काही उतारे सक्सेसफुली चिकटवता आले
म्हणजे जितं मया जितं मया
विचारांच्या टीचभर पिचकारीतलं पाणी
सदैव येणार्‍या जाणार्‍यावर उडवता आलं
म्हणजे जितं मया जितं मया
जडात जड शब्द फुकट असल्याने
कसेही कुठेही (फुकटच!) वापरत राहिलं
म्हणजे जितं मया जितं मया
....
....
इस का मतलब ..समझे दया?

अस्वल Tue, 03/02/2015 - 12:58

In reply to by अजो१२३

तुम्ही... आणि डेटा?
सृष्टीची उलथापालथ तर नाय ना झाली?
मुंग्यान मेरू पर्वत तर नाय ना गिळलेनीत
वडवानलान् समुद्र तर नाय ना जाळलेनीत?
मग हे काय बघतोय रें मी?
पुरावाबिरावा द्यायला लागलात.. प्रकृतीला जपा.
=============================
And do carry on. it might be a big step for you, but certainly not for Aisikind.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 13:01

In reply to by अस्वल

सक्सेसफुली

I think by successfully you mean errorless cut pasting without any relevance to context. अन्यथा तो शब्द तिथे फार विचित्र वा मूर्खपणाने लिहिलेला वाटतोय.
===========
इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे काय? मी मला पंडित समजून प्रतिवाद करणे अनुचित कसे?

गवि Tue, 03/02/2015 - 12:53

In reply to by अजो१२३

अमेरिकेच्या माणसाचे शिक्षण अंगोलाच्या माणसापेक्षा ६८ पट जास्त आणि जास्त उत्कृष्ट असणार. मग सगळे बौद्धिक संपदा अधिकार अमेरिकेत जमा होणार. ते ते ६०-६० वर्षे भोगणार. अंगोला अधिकच गरीब होणार.

मग काय करायचं ? आधुनिक आणि वैज्ञानिक व्यवस्थेमुळे हे कसं झालं आणि न-आधुनिक अवैज्ञानिक व्यवस्थेने कसं टळलं असतं आणि का नाही टळलं आणि टाळता येईल का?

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 12:57

In reply to by गवि

अहो दुप्पट आधुनिकतेची किंमत ६८ पट विषमता? (मला) हा सौदा डळमळित वाटतो. त्यापेक्षा नको असली प्रगती. बाय द वे, या पाटलाच्या वाड्यावाल्या गावात सगळ्यात भयाण शेतकरी आपलाच भारत आहे.

Half of under-five deaths occur in just five countries: India (21 per cent), Nigeria (13 per cent), Pakistan (6 per cent), Democratic Republic of the Congo (5 percent) and China (4 per cent)

गवि Tue, 03/02/2015 - 13:06

In reply to by अजो१२३

अहो दुप्पट आधुनिकतेची किंमत ६८ पट विषमता? (मला) हा सौदा डळमळित वाटतो. त्यापेक्षा नको असली प्रगती.

दुप्पट आधुनिकतेची किंमत ६८ पट विषमता कशी ? मी जरा गोंधळात पडलोय. खोचकपणा नाही.

"त्यापेक्षा नको असली प्रगती" म्हणजे? कशी थांबवायची ती? मनुष्यानेच केलीय ना ती? You are not in traffic, YOU ARE THE TRAFFIC.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 13:41

In reply to by गवि

Had there been no interference of science, the infant mortality rate would have been nearly the same all over the world over a period of time. Even if one argues that it takes some time to spread the effects of a discovery, how much this time should be?
Why should all the white world have a mortality ratio of around 5 in 1000 and the rest of world 100 in 1000? Does progress mean progress of America? Japan?
===================
And the core point I am putting forth is that in the competitive world slightest advantage results in 100s of cascading effects.

गवि Tue, 03/02/2015 - 14:11

In reply to by अजो१२३

Had there been no interference of science, the infant mortality rate would have been nearly the same all over the world over a period of time.

म्हणजे सर्वत्रच एकसारख्या (प्रचंड जास्त) दराने बालके नेहमी मृत. ही स्थिती विषम "वाटणी"(?!)पेक्षा जास्त चांगली असं तुम्हाला म्हणायचंय का?

शिवाय, Had there been no interference of science म्हणजे काय? सायन्स हा मनुष्यप्राण्याच्या जगण्याचा एक भाग आहे. तो मनुष्यापासून विलग कसा करणार? त्याला इंटरफिरन्स म्हणता येईल का? कोणीतरी येऊन सायन्सचा इंटरफेरन्स केला आणि इतरांना तो टाळता आला असता असा सिनारिओ असू शकतो का?


Even if one argues that it takes some time to spread the effects of a discovery, how much this time should be?
Why should all the white world have a mortality ratio of around 5 in 1000 and the rest of world 100 in 1000? Does progress mean progress of America? Japan?


जो करेल त्याची प्रोग्रेस. केवळ अमेरिका आणि जपानचीच प्रोग्रेस का म्हणून, त्यापेक्षा कुणाचीच नको, सर्वांनीच प्रगतीला थारा देणे थांबवावे असं लॉजिक उफराटं वाटत नाही का?

अमेरिकेची किंवा आईसलँडची शास्त्रीय प्रगती ही अंगोला किंवा स्वाझीलँडचा बळी देऊन केली गेली आहे असं म्हणण्यासारख्या घटना घडल्या असतील तरच अशी प्रगती आक्षेपार्ह. पण इन द्याट केसही, दुसर्‍याचा बळी घेऊन आपली प्रगती केली ही पद्धत चुकीची. विज्ञानात असे इनबिल्ट काही नाही.

अनुप ढेरे Tue, 03/02/2015 - 14:17

In reply to by गवि

अमेरिकेची किंवा आईसलँडची शास्त्रीय प्रगती ही अंगोला किंवा स्वाझीलँडचा बळी देऊन केली गेली आहे असं म्हणण्यासारख्या घटना घडल्या असतील

उमेरिकेच्या आर्थिक प्रगतीमागे गुलामांचं काँट्रिब्युशन आहे असं वाचलं होतं. विशेषतः कापसाच्या शेतीमध्ये.

अस्वल Tue, 03/02/2015 - 13:07

In reply to by अजो१२३

"ही फाटकी चड्डी नको मला. मी नागड्यानेच फिरेन ...."
"पण तुझ्या कल्पनेतली चड्डी आहे कशी?" शिंप्याने विचारलं
"ते काही माहीती नाही. बाय द वे, तुमच्या कैचीचं टोक तुटलंय". तो तरूण बाणेदारपणे म्हणाला.

मेघना भुस्कुटे Tue, 03/02/2015 - 13:09

In reply to by अस्वल

=))

अस्वल काय ऐकत नाय आज! हसवून हसवून मारायलंय. आज पोळं तरी कुठलं गावलं तुला, अस्वला? कुठला मध ओरपून आलाहेस, आँ?!

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 13:19

In reply to by अस्वल

"ही फाटकी चड्डी नको मला. मी अमेरिकेच्या झेंड्यावरची तारे काढलेली चड्डी घालूनच फिरेन ...."
"त्याचा नाद सोड. तुला कळणार देखिल नाही केव्हा तुझी चड्डी काढून तुझी मारली गेली आहे." शिपायाने समजावलं
"ते काही माहीती नाही. बाय द वे, तुमच्या बंदुक गंजलीय." तो तरूण बाणेदारपणे म्हणाला.

राजेश घासकडवी Tue, 03/02/2015 - 14:13

In reply to by अजो१२३

घ्या आता तुमच्या बाजूने वैज्ञानिक लोकांवर आणि व्यवस्थेवर टीका केली तरी तुमचं समाधान नाही! वैज्ञानिक व्यवस्थेतून पसरलेली थेरं जगात कशी पसरताहेत हे आकडेवारीनिशी दाखवून तुम्ही म्हणताहात त्याला मी दुजोराच देतो आहे. हे तुम्हाला असिद्ध करता येईल का?

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 12:50

In reply to by राजेश घासकडवी

Globally, major progress has been made in improving child survival. Worldwide, the under-five mortality rate has declined by nearly half (49 per cent), from 90 deaths per 1,000 live births to 46 deaths in 2013.

आईसलँडचे उदाहरण पाहून वाटते कि हा दर आदर्शतः शून्याच्या जवळ असू शकतो. आज अमेरिकेत ६.५ दर आहे. आईसलँडचा १.६. आईसलँड अमेरिकेपेक्षा चौपट प्रगत आहे का?

मुळापासून Mon, 02/02/2015 - 22:49

स्त्री पुरुषांचा पोशाख कशाने ठरावा, यात आधुनिक आणि जुन्या अशा दोन्ही पद्धतींमध्ये काही फरक आहेत का? किंवा तसे फरक असावेत का? "वर्क - वेदर - वरशिप" या तीन कारणांपैकी कुठले कारण वगळले असता कुणाचे काहीही बिघडणार नाही?

खाली एक video देत आहे. किती जणांना हा video पटतो ते बघायचं आहे. मला तरी तद्दन propaganda वाटला. पण video चा एकंदर टोन, "हे कसं चांगलं आहे बघा!" असा आहे.

अस्वल Mon, 02/02/2015 - 23:44

आधुनिकता कशी वाह्यात आहे ह्याबद्दलची चर्चा इंटरनेट वापरून, तंत्रज्ञानाने तयार केलेल्या सॉफ्टवेअरवरून होत आहे.
लोक आजकाल पूर्वीसारखं एकमेकांत बोलत नाहीत असे ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप वगैरेवरूनच फिरत आहेत.
फोनचा वापर फार होतोय अशी चर्चा मोबाईल संभाषणात परवा ऐकली.
तंत्रज्ञानाच्या आयचा घो.

ते एक असो.
अजो, तुम्ही वैचारिक कणेकर तर नाही ना?

बॅटमॅन Tue, 03/02/2015 - 01:08

In reply to by अस्वल

तुम्हां हुच्चभ्रू लोकांसाठी पेश्शल क्लास सुरू केला पायजे- लॉजिक कुठे अपेक्षावे अन कुठे नै त्याचा.

(आत्तापर्यंत त्यात जरा ट्रेन्ड झालेला) बॅटमॅन.

अस्वल Tue, 03/02/2015 - 01:10

In reply to by बॅटमॅन

आम्हीच शिकतो आहोत. जिथेतिथे आपलाच मुद्दा मांडण्याचा ट्रेंड.. म्हटलं अजोंचाच धागा आहे. घरचं कार्य आहे तेव्हा वापरून पाहू.

ऋषिकेश Tue, 03/02/2015 - 09:24

नवमेंब्रांसाठी गाळलेले संभाव्य स्वगत! तुर्तास पहिलाच परिच्छेद पुरेसा आहे.

आधुनिकतेविरूद्ध बोलायला हिम्मत लागते. त्यातली त्यात विज्ञानाविरुद्ध बोलायला तर फारच. (तुम्ही साले पुचाट, शेपुटघाले. माझ्याकडे बघा. मीच मीच मीच तो तुमच्यासारख्यांचा तारणहार आहे. हिम्मत वगैरे शब्द केवळ माझ्याच डिक्शन्रीत आहेत. माझे गुणगान गा! माझी पुजा करा! डोळे बघ! डोळे बघ!) मानाने देवा-धर्मा-परंपरांचे सोपे असते. अगदी देव, धर्म नि परंपरा यांत दृढ श्रद्धा असेल तरी लोक आधुनिकता आणि विज्ञान यांच्या विरोधात बोलत नाहीत.(असे गप्प का! उत्तिष्ठ! - असं म्हटल्यावर नक्की काय उभं करायचं असा अश्लील प्रश्न विचारु नये) बहुसंख्य लोकांना यांच्याविरोधात बोलण्यासारखे काही आहे याचीच कल्पना नसते. ते एक आदर्श जग आहे अशा कल्पनेत जग जगते.(अपवाद फक्त मी! मलाच काय ते सारे कळते. आता मी सांगतो तुम्ही ऐका!) पुजार्‍याला स्वतःला धर्म कळत नाही, त्याचे आचरण नीच आहे, या लोकांनी समाज पतित केला आहे, इ इ हे सहज कळतं. (आता तुम्हाला कैच कळत नाही असं नाही पण मी काय सांगतोय ते अधिक महत्त्वाचं आहे. तुमची माहिती नीच, सोपी आणि तुच्छ सामान्य आहे! मलाच काय ते कोण्णा कोण्णालाही न कळलेले ज्ञान झाले आहे) शास्त्रज्ञ मात्र मानवतेच्या कल्याणाला वाहिलेले, गंभीर, विद्वान, नि महान मूल्ये पाळणारे इ इ असतात अशी सामान्यांत जनरल धारणा आहे. (मूर्ख आहात तुम्ही. मलाच काय ते शास्त्रज्ञांचे अंतरंग माहिती आहेत. आता ऐका. त्या दूष्ष्ष्ष्ट नीऽऽऽऽच वैट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट वैज्ञानिक नी पुरोगाम्यांच्या अरेरावीला च्यालेंज करण्याची हिंमत फक्त माझ्यात आहे. तुम्ही साले घाब्रट. मला भजा, मला पुजा! डोळे बघ! डोळे बघ!)

असो.

मन Wed, 04/02/2015 - 15:39

अजोंशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरुच आहे; तर इतरही काही महत्वाच्या विषयांच्या सहभाग व्हावा असे वाटते.
कारण --
वेगवेगळ्या चर्चेत तेच ते मुद्दे, त्याच भूमिका वेगळ्या भाषेत दरवेळी मांडणं थकवणारं असतं.
त्यापेक्षा एकदा हा स्वतंत्र धागा निघालाच आहे; तर त्यांच्या खालील विषयांबाबतच्या भूमिकांबद्दलही चर्चा होणे उचित ठरेल.
(
हे मी का म्हणतो आहे ? कारण उदाहरण द्यायचच तर गब्बर खूपदा अगदि एकदम "धनदांडग्यांचा जयजयकार" ,"फडतूसांना ठेचून काढा" वगैरे म्हणत अस्तो.
दरवेळी तोच तो प्रतिवाद करण्यात कितपत तथ्य आहे ?
गब्बरच्या महत्वाच्या मुद्द्यांचा समर्पक प्रतिवाद http://www.aisiakshare.com/node/2458 ह्या धाग्यात अक्षय पूर्णपात्रे वगैरेंकडून एकदाच झालेला आहे.
आता दरवेळी त्या व्यतिरिक्त जर काही नवीन मुद्दे गब्बरकडे असतील तरच मी वाद घालायला उतरतो.
नैतर योग्य तो प्रतिवाद उपलब्ध जागेवरून अप्लाय करुन पहायचा.
दरवेळची कटकट वाचते.
हे एक उदाहरण झाले. अशा अजूनही केसेस असू शकतील.
अजोंचे महत्वाचे मुद्दे कव्हर व्हावेत म्हणून इथे पुन्हा कॉपी पेस्ट करत आहे.
)

.
.
अजोकाकांचे काही मुद्दे इथे सापडतील :-
http://www.aisiakshare.com/node/2453 ( धाग्याचं नाव :- अरुणराव, का जगायचं?)
.
.

वरील धाग्याव्यतिरिक्त त्यांनी ह्यापूर्वी काही विधाने केली आहेत.
************************अजोंची विधाने सुरु*******************************************************
.
.
वेल, जैविकतेच्या बाहेर, सामाजिक परिस्थीतींमुळे स्त्रीया अधिक बुद्धिमान असतात. त्या जास्त समंजस असतात. जास्त भावूक असतात. पुरुषांच्या तुलनेत त्या कमी दुष्ट असतात. पुरुषांसाठी तर त्या दुष्ट नसतातच म्हटले तर चालावे. त्यांना इगो कमी असतो. जनरली पुरुष कचरा करत असतात नि त्या तो सावरत असतात. एकूणात त्यांची मूल्येदेखिल पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात.
-------------
आता हे फरक असावेत का? तर हो. का? तर दोघांनी मिसळून जगाची नासाडी करायची ठरवली तर फारच फास्ट होईल. पक्षी कोण्या तरी एकाने शहाणपणाने घेतलेले बरे. जगातले सगळे अनावश्यक, नाशकारी वाद 'हे पुरुष' विरुद्ध 'ते पुरुष' असे आहेत. हे वाद मूर्खपणाचे आहेत हे कळण्याइतकं शहाणपण अगदी अशिक्षित स्त्रीला पण असतं.
--------
स्त्रीयांनीच पडती बाजू का घ्यावी? वेल, कारण तितकी मानसिक क्षमता पुरुषांत नसतेच. झळ लावून न घेता घर, समाज सावरून घेण्याची क्षमता स्त्रीयांत आहे. दुसरं म्हणजे चाणाक्षपणे त्या पुरुषांना कामाला लावून सगळी खरी सुखे भोगत असतात. त्या ज्या काही भूमिका घेतात त्याचा सारा भौतिक मोब्दला त्यांना इथेच नि लगेच मिळतो.
--------------
जगात नेहमीच एक सुप्त स्त्री राज्य असते.
भारतासारख्या पुरुषसत्ताक व्यवस्थेतीतही "खरी सत्ता" स्त्रीकडेच असते.
पारंपरिक व्यवस्थेत स्त्रियांवर अन्याय वगैरे होतो हे सगळं झूट है.
.
.
************************अजोंची विधाने समाप्त***********************************
प्रतिसादात आत्ताच अ‍ॅडवलेला भाग :-
अजोंनी बाजूच्या धाग्यावर काही विधानं केलीत, त्याबद्दलची त्यांनी उदाहरणं दिली तर बरं होइल :-
काय कि ब्वॉ. मला चीन आणि पाकिस्तानबद्दल भारतापेक्षा जास्त सिंपथी आहे. समहाऊ मला त्यांच्या राजकीय भूमिका जास्त रास्त वाटतात.
----------
अर्थातच प्रामाणिकपणे विचार करताना असं होतं. पण मी माझे विचार माझ्या नागरी कर्तव्यांच्या आड येऊ देत नाही. (प्रेरणा - बोले तैसा ...पाउले. माय फूट)
.
.
विशेषतः पाकिस्तानची कोनती भूमिका ह्यांना रास्त वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.