Skip to main content

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: पुरोगामीस्य किम् लक्षणं?

2 minutes

आश्रमात स्वामीजी ध्यानमग्न बसलेले होते, अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी त्रिकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी पुरोगामी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी त्रिकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या डाव्या अंगाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी त्रिकाळदर्शी: त्या फांदीला पुरोगामी फांदी असे म्हणतात. मी त्या वाळक्या फांदी कडे बघितले,मला काहीच कळले नाही. मी पुन्हा प्रश्न केला, स्वामीजी मी अज्ञ बालक आहे, आपल्या गूढ वाक्याच्या अर्थ स्पष्ट करावा. स्वामी त्रिकाळदर्शी म्हणाले, बच्चा, ती वडाची वाळकी फांदी स्वत:ला वडाच्या झाडाचा अंग मानीत नाही. ती वडाच्या झाडाचा तीव्र द्वेष करते. म्हणून तिने फांदीवर लागणार्या पानांना झटकून दिले. मी मध्येच टोकले, का स्वामीजी? स्वामी त्रिकाळदर्शी म्हणाले, हिरवी पानें झाडासाठी प्राणवायू तैयार करतात, प्राणवायू झाडाला न मिळावी हाच तिचा हेतू. ही गोष्ट वेगळी कि झाडापासून मिळणारे सर्व पोषक तत्व ही फांदी शोसते. मी म्हणालो, बाबा हे तर विचित्र आहे. मनात एक प्रश्न आला, म्हणून विचारतो, ही फांदी सर्व झाडांचा द्वेष करते का? स्वामीजींच्या चेहऱ्यावर पुन्हा मंद मुस्कान पसरली, ते म्हणाले, बच्चा, ही फांदी फक्त ती ज्या वडाच्या झाडावर आहे, तिचा द्वेष करते, पण शेजारच्या घराच्या कुंपणावर लागलेल्या बाभळीच्या झाडाची ती सदैव प्रशंसा करते. पुरोगामी आहे म्हणून, मागच्या जन्मी काही पाप केले असेल म्हणून वडाची फांदी झाले असे तिला नाही वाटत. पण आपण एखाद्या दुर्घटनेमुळे वडाची फांदी झालो असे तिला वाटते. मी पुन्हा स्वामीजींना पुन्हा प्रश्न विचारला, स्वामीजी, झाडावर एखादे संकट आले, पुरात झाड बुडाले वैगरेह? स्वामीजी म्हणाले, अशा वेळी झाडाची मुळे मातीला घट्ट पकडून झाडाला पडण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न करतात, झाडाचे इतर अंग ही उदा. फांद्या ही मुळांना भरपूर प्राणवायू पोहचवून त्यांची ताकद वाढवितात. पण पुरोगामी फांदी असे काहीच करत नाही, ती केवळ विचार करते, पूर का आला, हे झाड का वाचले, पडले का नाही इत्यादी. एखादा NGO सेमिनार साठी पेपर तैयार करतो तसेच. पण स्वामीजी, जरं, वडाचे झाड पडले तर, झाडा बरोबर फांदीचे अस्तित्व ही नष्ट होईल, हे तिला कळत कसें नाही. स्वामीजी पुन्हा जोरात हसले व म्हणाले, बच्चा तिला जर हे कळले असते तर ती पुरोगामी कशी झाली असती? क्षणभर आ! वासून मी स्वामीजींना बघत राहिलो, स्वामीजींना पुढचा प्रश्न विचारणार, पण स्वामीजी डोळे मिटून पुन्हा ध्यानमग्न झाले होते.

(स्वामीजींच्या बोलण्याचा मला काहीच बोध झाला नाही, पण वाचक सुज्ञ आहेत)

Node read time
2 minutes

मेघना भुस्कुटे Thu, 04/09/2014 - 11:45

आयला! भारी आहे!

"हाण तेज्यायला!" असे म्हणायचा मोह झाला होता, पण आवरला. शेवटी जेणूं काम तेणूं थाय!

विवेक पटाईत Thu, 04/09/2014 - 17:17

In reply to by मेघना भुस्कुटे

मेघना ताई ,
गेल्या दोन महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर आहे (अजून एक महिना तरी राहावे लागेल) , आता खाली दिमाग शैतान का घर असे म्हणतातच. निळ्या अक्षरात रोज 'पुरोगामी', तटस्थ, भावनाविरहीत, छुप्या टोलांचा वैगरेह शब्द वाचून डोक्यात खुरापत आली अर्थात प्रेरणा मिळाली. म्हणून स्वामी त्रिकाळदर्शी यांना भेटून शंका निरसन करून आलो.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 11:48

शीर्षकातलं 'पुरोगामीस्य' ऐवजी 'पुरोगामिनः' हे करेक्ट रूप वापरावे असे सुचवतो.

बाकी लेखाबद्दल काय बोलावे? हाण तेजायला. लयच जबरी _/\_

ऋषिकेश Thu, 04/09/2014 - 11:57

:) छान रुपक, नेमके शालजोडीतले वगैरेमुळे खुमासदार झाला आहे

पुलं म्हणतात त्याप्रमाणे विनोद करणार्‍याने न्हाव्याचा आदर्श ठेवावा. दाढी तर गुळगुळीत झाली पाहिजे मात्र समोरच्याला जखम होता कामा नये!
हा लेख वाचून तेच आठवले .. मजा आली :)

मी Thu, 04/09/2014 - 12:12

झाड वडाचं घेतलं एवढं बरं केलं, खरतरं त्यातल्या पारंब्या म्हणजे पुरोगामी, त्या नुसत्या झाडावर जगुन गळून जात नाहीत तर झाडाला आधार देतात पण फांद्या आणि पानाशिवाय वेगळं असं त्यांचं अस्तित्त्व असतं.

ऋषिकेश Thu, 04/09/2014 - 13:02

In reply to by मी

मार्मिक देऊन समाधान होईना.
प्रतिसाद आवडला

==

बाकी हे ललित असल्याने, मुद्द्याची फार चिकित्सा न करता मथितार्थ कसा मांडलाय हे मुख्यतः पाहिले आहे. त्यामुळे या धाग्यावर मी अधिक लिहित नाहिये.

राजेश घासकडवी Thu, 04/09/2014 - 12:47

एक प्रश्न आहे. त्या स्वामींच्या पत्नी सकच्छ नेसतात की विकच्छ? कारण एकेकाळी समाजाला घट्ट धरून ठेवणारी मूळं 'स्त्रियांनी सकच्छ नेसलं नाही तर झाड या नवीन विकच्छाच्या पुरात गामी होऊन जाईल' म्हणायचे. ते म्हणणं आणि स्त्री-पुरुषांनी कच्छ सोडून देण्यालाही सत्तर ऐशी वर्षं झाली.

आणि त्याहीआधी कोणतरी राममोहन रॉय का कायशा नावाच्या डहाळीने कुठची तरी परंपरा त्याज्य ठरवून झाडाच्या मुळावर घाव घातला होता म्हणे. हरामखोर पुरोगामी कुठचा! आणि ज्योतिबा फुले - म्हणे स्त्रियांना शिकवा! अस्पृश्यांना पाणी द्या. कुठून कुठून या बिनडोक पुरोगामी डहाळ्या येेतात कोण जाणे. आख्खा वृक्षच बरबाद करून टाकतात.

विवेक पटाईत Thu, 04/09/2014 - 16:50

In reply to by राजेश घासकडवी

महात्मा फुले आणि आजच्या पुरोगामी लोकांमध्ये फार अंतर आहे, आजचे पुरोगामी फक्त थोता छान बाजे घना या धर्तीचे आहे. शिक्षणाचे म्हणाल तर आर्य समाज आणि निकर धारी इत्यादी संस्थांनी देशाच्या कान्या-कोपर्यात शिक्षण पोहचविण्याचे कार्य केले आहे. सद्याचेच उदा: उत्तराखंड मध्ये वादळ फाटले, निकर धारी, डेरा सच्चा सौदा, पतंजली चे कार्यकर्ते जिवाजी परवा न करता तेथे कार्यरत होते. पण तथाकथित पुरोगामी अश्यावेळी दिसत नाही. कारण त्यांच्या जवळ खरे कार्यकर्ते नसतात (फक्त भाषणबाजी वाले असतात). शिवाय अंध श्रद्धा इत्यादी दूर करण्यामध्ये या संस्थांचे कार्य अनिस पेक्षा फार जास्त आहे.

मन Thu, 04/09/2014 - 16:52

In reply to by विवेक पटाईत

अंध श्रद्धा इत्यादी दूर करण्यामध्ये या संस्थांचे कार्य अनिस पेक्षा फार जास्त आहे.

ह्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.

मेघना भुस्कुटे Thu, 04/09/2014 - 16:59

In reply to by विवेक पटाईत

सेवाकार्य आणि पुरोगामित्व या दोन संज्ञांमधला फरक अंतर्धान पावत चालला आहे, ही त्रिकालदर्शी बाबांचीच किमया दिसते!

अनुप ढेरे Thu, 04/09/2014 - 17:25

In reply to by मेघना भुस्कुटे

सेवाकार्य आणि पुरोगामित्व या दोन संज्ञांमधला फरक अंतर्धान पावत चालला आहे,

हे मला पटलय असं वाटतय.
पुरोगामी असण्याचा उपयोग काय पण मग? इतरांचं चांगलं व्हावं म्हणूनच ना?

माणसाला पुरोगामी बनता येतं ठरवून की बाय नेचर एखादा पुरोगामी असतो?

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 17:28

In reply to by अनुप ढेरे

पुरोगामी असण्याचा उपयोग काय पण मग? इतरांचं चांगलं व्हावं म्हणूनच ना?

पुरोगामित्वासारख्या अत्युच्च संकल्पनेला उपयोगाच्या क्षुद्र चौकटीत बसवू पाहण्याचा निषेध. 'कलेसाठी कला' असते तसं 'पुरोगामित्वासाठी पुरोगामित्व' का असू नये? किंबहुना इतकं शुद्ध पुरोगामित्व जवळपास सगळे स्वयंघोषित पुरोगामी पाळतात. त्यानं इतरांचं चांगलं झालं तर पुरोगामित्वाचा इजय सो, न झालं तर दोष समाजाचा.

'न'वी बाजू Thu, 04/09/2014 - 19:51

In reply to by बॅटमॅन

'कलेसाठी कला' असते तसं 'पुरोगामित्वासाठी पुरोगामित्व' का असू नये?

तत्त्वतः हा प्रश्न रोचक आणि विचारप्रवर्तक आहेच. (खरेच, का असू नये?) त्याबद्दल धन्यवाद. परंतु, ही फक्त एक बाजू झाली.

दुसरी बाजू अशी, की सेवाकार्य लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनासुद्धा, करतात. परंतु म्हणून त्या आधारावर त्यांना तुम्ही 'पुरोगामी' म्हणून संबोधाल काय?

सांगण्याचा मतलब एवढाच, की सेवाकार्य आणि पुरोगामित्व या दोन सर्वस्वी भिन्न आणि परस्परअसंबद्ध संकल्पना असाव्यात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाकव्याप्त कश्मीर/आज़ाद कश्मीर/ट्रान्स-एलओसी कश्मीर/त्याला-तुम्ही-जे-काही-म्हणत-असाल-ते-मध्ये झालेल्या भूकंपानंतर तेथील भूकंपग्रस्तांकरिता मदतकार्य, वगैरे.

यात दुनियेतील तमाम सेवाभावी व्यक्तींना आणि संस्थांना कोणत्याही प्रकारे लष्कर-ए-तोयबाबरोबर एकाच तागडीत तोललेले नाही, हे वस्तुतः उघड असावे; परंतु तरीही, एक्ष्ट्रीम प्रीएम्पटिव प्रिकॉशन२अ म्हणून अधोरेखनाचे प्रयोजन.

२अ वाटल्यास 'गब्बर चावला' असे खुशाल म्हणा.

मेघना भुस्कुटे Thu, 04/09/2014 - 17:33

In reply to by अनुप ढेरे

माणसाला पुरोगामी बनता येतं ठरवून की बाय नेचर एखादा पुरोगामी असतो?

माणसाला शहाणं होता येतं की बाय नेचर एखादा माणूस शहाणा असतो? प्रश्न फक्त उदाहरणादाखल आहे हो. पुरोगामी = शहाणा असा माझा समज नाही. हो, नाहीतर वाल्गुदेय आपली रोचकटचकसामग्री घेऊन यायचा उडत. ;-)

पुरोगामी असण्याचा उपयोग काय पण मग? इतरांचं चांगलं व्हावं म्हणूनच ना?

माझ्या मते 'जनकल्याणा पुरोगामित्व' असं काही नसावं. प्रश्न पडतात, चाकोरीच्या बाहेर काय आहे असं कुतूहल वाटतं, काही मर्यादा उल्लंघून पाहण्याची-तपासून पाहण्याची इच्छा आणि धैर्य आणि कृतिशीलता असं सगळंच असतं तेव्हा पुरोगामित्वाला इलाज उरत नसावा.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 17:45

In reply to by मेघना भुस्कुटे

रोचकटचकसामग्री

एखादं अक्षर आणि अनुस्वार घालायला पाहिजे होतं असं वाटून गेलं. ;)

बाकी मीमांसेशी असहमत आहे, पण वरील शब्द आवडला हे नमूद केलेच पाहिजे.

अनुप ढेरे Thu, 04/09/2014 - 17:49

In reply to by मेघना भुस्कुटे

माझ्या मते 'जनकल्याणा पुरोगामित्व' असं काही नसावं. प्रश्न पडतात, चाकोरीच्या बाहेर काय आहे असं कुतूहल वाटतं, काही मर्यादा उल्लंघून पाहण्याची-तपासून पाहण्याची इच्छा आणि धैर्य आणि कृतिशीलता असं सगळंच असतं तेव्हा पुरोगामित्वाला इलाज उरत नसावा.

ओके. म्हणजे फुल्यांना 'बघुयात तरी स्त्रीया शिकल्या तर काय होतं? दलित शिकले तर काय होतं?' असे प्रश्न पडले आणि त्यांनी कुतुहल म्हणून स्त्री शिक्षण सुरु केलं. असं काहिसं का? त्यात स्त्री मुक्ती, जाति-व्यवस्था निर्मूलन असे हेतू नव्हते का?

मेघना भुस्कुटे Thu, 04/09/2014 - 17:51

In reply to by अनुप ढेरे

सुरुवात तरी प्रश्नापासूनच झाली असणार. हेतू आणि समाजकार्य (सेवाकार्य!) नंतर आले असावेत. म्हणून तर पुरोगामी, विचारवंत, कार्यकर्ता, समाजसेवक, समाजसुधारक... अशा निरनिराळ्या संज्ञा आल्या ना भाषेत? नाहीतर एखाद्याच 'रोचक' शब्दावर भागलं नसतं? ;-)

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 17:54

In reply to by मेघना भुस्कुटे

सुरुवात तरी प्रश्नापासूनच झाली असणार. हेतू आणि समाजकार्य (सेवाकार्य!) नंतर आले असावेत.

प्रश्न, हेतू आणि कार्य हे असं इतक्या सहजपणे वेगळं करता येईल याबद्दल प्रचंड साशंक आहे. अन तो निष्कर्ष फक्त शाब्दिक वैविध्यावरून काढलाय हे उदा. प्रचंड उद्बोधक आहे. विट्झेल वुड हॅव अप्रूव्ह्ड!

अनुप ढेरे Thu, 04/09/2014 - 17:57

In reply to by मेघना भुस्कुटे

आता फुल्यांना पुरोगामी म्हणायचं का समाजसुधारक ते मला नक्की नाही माहित. पण वरती राजेशरावांनी पुरोगामी म्हणून त्यांचं उदाहरण दिलं आहे म्हणून मी पण त्यांना पुरोगामी म्हणालो.

आधीच्या तुमच्या प्रतिसादातली एक शंका.

कृतिशीलता असं सगळंच असतं

पुरोगामित्वाचा आणि कृतिशीलतेचा संबंध असतो का नाही हे क्लीअर करा ना राव एकदा.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 18:03

In reply to by अनुप ढेरे

पुरोगामित्वाचा आणि कृतिशीलतेचा संबंध असतो का नाही हे क्लीअर करा ना राव एकदा.

मध्ये घुसतोय त्याबद्दल क्षमस्व- पण अगोदर एका धाग्यात असा कायच संबंध नसतो असे सप्रमाण इ.इ. सिद्ध झाले नव्हते काय? चार पुस्तके आणि चार प्रतिसाद या समान धाग्यावरून कुरुंदकरांशी गोत्र जुळवू पाहणारे छप्परफाड विनोदी प्रतिसाद आठवून पहावेत.

मेघना भुस्कुटे Thu, 04/09/2014 - 18:02

In reply to by अनुप ढेरे

असतो की. फक्त धोब्यानं शंका बोलून दाखवल्या दाखवल्या सीतेला जंगलात धाडायला निघाल्यासारखे उत्सुक नसतात जगातले यच्चयावत पुरोगामी आपलं पुरोगामित्व या एकाच प्रकारे सिद्ध करून दाखवण्यासाठी, इतकंच काय ते.

'न'वी बाजू Thu, 04/09/2014 - 19:57

In reply to by अनुप ढेरे

आता फुल्यांना पुरोगामी म्हणायचं का समाजसुधारक ते मला नक्की नाही माहित. पण वरती राजेशरावांनी पुरोगामी म्हणून त्यांचं उदाहरण दिलं आहे म्हणून मी पण त्यांना पुरोगामी म्हणालो.

प्रत्येक समाजसुधारक हा (बहुधा; खात्री नाही; चूभूद्याघ्या.) पुरोगामी असावा. प्रत्येक पुरोगामी हा समाजसुधारक असलाच पाहिजे, असे बंधन नसावे.

मन Thu, 04/09/2014 - 18:06

In reply to by अनुप ढेरे

wait
फुल्यांना प्रश्न पडलाच.
पण तो असा असावा :-
"स्त्रियांनी शिकण्यास काय हरकत आहे?"
"स्त्रियांनी शिकायचं नाही असा प्रघात दिसतोय. तो पाळायचा तो कशाला ? "

अनुप ढेरे Thu, 04/09/2014 - 18:11

In reply to by मन

म्हणजे फुल्यांच्या कार्यामागे केवळ व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी हीच प्रेरणा होती काय? अशी बंडखोरी करणार्‍या प्रत्येकाला पुरोगामी म्हणता येइल का?

मन Thu, 04/09/2014 - 18:22

In reply to by अनुप ढेरे

व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी हीच प्रेरणा असण्याबद्दल नेमकं काहीही बोलू शकत नाही.
जितकं आकलन होतं, ते वरील प्रतिसाद मांडून झालं आहे. म्हणजे "फुल्यांनी असा विचार केला असावा " असे मी म्हणू शकतो.

त्यास व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी हीच प्रेरणा असणे किंवा नसणे ठरवण्यास मी ह्या घडिला असमर्थ आहे.

तरीही प्रयत्न करतो.
.
.
.

"स्त्रिया ह्या शिकल्या नसल्याने त्यांची हानी होते आहे. त्यांनी शिकल्यास त्यांचा उद्धार होइल." हा पूर्वार्ध ठेवून मग
"स्त्रियांनी शिकण्यास काय हरकत आहे?" असा आला असावा.
म्हणजे तो मुळात मानवतावादी, सहृदय विचार होता. "अमुक एकाचे भले करायचे आहे.पण तसे करणे ही ती व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी ठरत असेल तर ठरु देत." असा तो विचार असावा. म्हणजे "व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी " हे साध्य नव्हतं. ती प्रेरणाही नव्हती. "ह्याचं भलं केल्यानं बोंब होते तर होउ देत " असा तो विचार आहे.
अर्थात हे निव्वळ मी माझ्या समजुतीनुसार आणि कुवतीनुसार लिहित आहे. फुल्यांचं फारसं अस्सल लेखन मुळातून वाचलेलं नाही.

अजो१२३ Thu, 04/09/2014 - 20:25

In reply to by अजो१२३

कुठेही फुले, रॉय, सतीची प्रथा मोडीत काढणारा तो इंग्रज, आंबेडकर, गांधीजी, कर्वे, भावे, रानडे, आगरकर, लोकहितवादी, होळकर, इ इ यांची उदाहरणे समांतर उदाहरणे म्हणून देता येतील काय? मेघनाला जसे 'पुरोगामीत्व' आणि 'सेवाकार्य' यांच्यातला फरक कधीपासून नष्ट झाला असे वाटतेय तसेच मला 'पुरोगामीत्व' आणि 'विचारभिन्नता (केवळ सामान्यांपेक्षा भिन्न विचार असणे)' यांच्यातला फरक कधी नष्ट झाला असे वाटतेय. प्रत्येक भिन्न विचार हा का म्हणून पुरोगामी मानावा? असे भिन्न विचार मांडून कितीतरी 'काहीच्या काही' विचारदुष्ट स्वतःस पुरोगामी म्हणून खपवावे यामागे तरी लागले नसावेत? कोणत्याही विचाराची स्वीकृती ही त्या विचाराच्या स्वतःच्या क्वलिटेटीव मेरिटवर करावी, तो केवळ भिन्न आहे, चालू विचारांशी विसंगत आहे, हे त्यास पुरोगामी मानायचे पुरेसे कारण नसावे. याकरिता समाज सामान्यतः जे मानतो त्यातलं बरंच काही चूक आहे अशी आढ्यता प्रकट करणारा कोणताही विचार तात्विक दृष्ट्या फार डिफेंडेबल, वाटरटाईट असायला हवा. त्याउपर अधिक संभ्रम माजेल असं पुरोगामीत्वाचं जास्त संहतीकरण करू नये. हुंड्याची समस्या आहे तर ती सोडवावी, विवाहसंस्था अनिष्ट आहे, ती तोडावी असा थेट शोध मांडू नये. मांडला तरी अशा शोधाची सारी अंगे निकोपपणे अभ्यासून मांडावा. केवळ हुंडा नष्ट करायचा आहे इतका संकुचित विचार करू नये.
------------------------
फुले, इ इ ची उदाहरणे फार जास्त देऊ नयेत. उद्या उत्तर प्रदेशच्या लाखो करोडो लोकांना मुंबईत पाठवले, हे सांगून कि 'बाबांनो, पहा तो बच्चन, सुपरस्टार झाला आहे. तुम्हीही नशीब कमवा. जा मुंबईला'. काय होईल? यातली जास्तीत जास्त मंडळी झोपडपट्टीत घाणेरडे जीवन कंठत असताना नि लोकलचे झटके झेलत असताना दिसतील. थोडक्यात, बरेच लोक बरंच काही बोलत असतात. मी बोललेलं सामान्यापेक्षा वेगळं आहे आणि फुल्यांनी बोललेलंसुद्धा सामान्यापेक्षा वेगळं आहे म्हणून मी फुले आहे हे लॉजिक हास्यास्पद आहे. समाजात जे सामान्यतः आहे, त्यापेक्षा आपलं मत फार (किंवा वेडंवाकडं) भिन्न असेल तर मांडणाराने त्याचा योग्य तो डिफेन्स केला पाहिजे. हे नाही जमलं तर किमान माझे विचार उच्च म्हणून मी श्रेष्ठ आणि तुला हे झेपत नाही म्हणून तू नालायक असा भाव ठेऊ नये. समाजाचा, विद्युतप्रवाहाला धातूचा असतो तसा, सामाजिक बदलाला एक विरोध असतो. कोणताही बदल स्वीकारायला त्याला वेळ लागतो. चांगल्या बदलाची स्वीकृती होत नाही तोपर्यंत विचारवंताने आपले विचार सचोटीने नि प्रामाणिकपणे मांडावेत. बाकी समाजात सद्गुणांचा अभाव, बुद्धीचा अभाव, नि दोहोंचा अभाव लोकांमधे सगळीकडे आढळणारच. असे काही लोक त्यांचेच भले करू पाहणार्‍या पुरोगाम्यांचा विरोध करणारच. परंतु सगळेच लोक असे अकारणी विरोधक नसतात. काही प्रामाणिक लोकांनाही खरोखरीच पुरोगाम्यांची वैचारिक भिन्नता झेपत नाही, त्याचा वर्तनातून अंमल करणे तर विचारही करवत नाही, आणि असे लोक त्यांच्या विचारांशी खूप प्रामाणिक आणि सात्विक असतात. पुरोगाम्यांचा मुख्य फोकस यांच्यावर पाहिजे.
----------------
http://www.indianetzone.com/18/ram_mohan_roy.htm येथील रॉय साहेबांचे धर्मावरील विचार कसे आहेत हे वाचावे. प्रथमदर्शनी असे वाटते कि त्यांचा ईश्वर, धर्म, वेदांत, हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म या सगळ्या गोष्टींवर विश्वास होता. रॉय साहेबांनी मी जे अगोदरपासून मानतो त्याचा खरा अर्थ सांगायचा प्रयत्न केला. म्हणून मी त्यावर विचार करतो आणि तो अर्थ स्वीकरतो. पण कोणी त्यांचे नाव घेऊन मी जे मु़ळीच मानत नाही असे विचार विकू लागला तर? तेही स्पष्टीकरण न देता? त्यांचे उदाहरण देत कोणी मला नास्तिकवाद, निर्धर्मवाद, धर्मग्रंथाग्राह्यता, निधर्मवाद, इ इ इष्ट, पुरोगामी आहे असे शिकवू लागला तर ती चिटींग नाही का झाली?

अंतराआनंद Thu, 04/09/2014 - 15:12

तुमचे हे साधु त्रिकालदर्शी वैगेरे असतील पण धर्मसंसद संमत आहेत का ? पुरोगामित्व त्यांना टोचत असेल तर ते धर्मसंसद certifiable आहेतच.

सविता Thu, 04/09/2014 - 17:54

In reply to by ॲमी

बाकी हिंदी मध्ये कच्छा म्हणने बनियान किंवा सदरा अशा अर्थाने ऐकल्याचे स्मरते त्यामुळे कच्छ म्हणजे शरिराच्या वरच्या भागावर घालायचा कपडा असा अर्थ असावा.

त्याप्र्माणे
सकच्छ - विथ
विकच्छ - विदौट

असे बहुदा असावे.

संस्कॄतात आप्ल्याला पासिंगपुरते मार्क असायचे त्यामुळे गॅरँटी नाही.

मिहिर Thu, 04/09/2014 - 18:41

In reply to by सविता

कच्छ म्हणजे शरिराच्या वरच्या भागावर घालायचा कपडा असा अर्थ असावा.

.

विकच्छ - विदौट

आँ? त्या काळच्या समाजाला एकदमच पुढच्या काळातले करून टाकलेत! ;)

राजेश घासकडवी Thu, 04/09/2014 - 18:40

In reply to by ॲमी

'कच्छ म्हणजे कास किंवा कासोटा. स्त्रिया नऊवारी लुगडे नेसताना कास किंवा कासोटा घालतात. धोतर नेसताना किंवा पंचा, सोवळे नेसताना पुरूषही कासोटा किंवा कास घालतात. दक्षिण भारतीय पुरूष सध्या लुंगीही नेसलेले आढळतात. `सकच्छ का विकच्छ’ या वादाचा विषय स्त्रियांनी कास घातलेले नऊवारी लुगडेच नेसावे की कास न घालता सहावारी गोल पातळ नेसावे, हा होता. या विषयावर सत्तरऐंशी वर्षापूर्वी महाराष्ट्रात जाहीर चर्चा झाली होती, याचे आज हसू येते.'

तरुण भारतमध्ये प्रकाशित झालेल्या या लेखातून. हा तोच तो लेख ज्यात

तरुण स्त्रियांचा हा ड्रेस, पुरुषांची वासना चाळवणाराच असतो. जिन्स पँट आणि टॉपमुळे स्त्रियांचे काही गोपनीय अवयव ठसठशीतपणे उठून दिसतात. त्यांच्याकडे पुरुषांचे लक्ष जातेच. तरुण पुरुष तर चेकाळतातच. तरुणांचा एखदा ग्रुप एखाद्या रस्त्यावर उभा असेल आणि एखादी तरुणी जिन्स टॉप घालून आपल्या गोपनीय अवयवांचे ठसठशीतपणे दर्शन घडवत त्यांच्या बाजूने जात असेल तर ते रुण आपापसात त्यावर चर्चा करणार,मोठय़ाने कॉमेंटस्ही करणार. `तुमची पुरुषी मानसिकता बदला’ असे सांगणे तात्विकदृष्टय़ा बरोबर आहे. पण व्यावहारिकदृष्टय़ा नाही.

हे मुळांना धरणारं विधान आलं होतं...

त्यावर त्यांनी खालीलप्रमाणे ड्रेस सुचवला होता.

पायात जिन्स पँट, अंगात टॉप, त्याच्यावर कॉलरवाला गुडघ्यापर्यंत लांबी असलेला थोडय़ा जाडसर कापडाचा हाफ कुडता, त्याच्यावर जाकीट, (हल्ली सुषमा स्वराज घालतात तसे.)

असे विचार मांडणारांना काय म्हणायचं हे त्रिकालदर्शी स्वामींना विचारायला हवं.

मन Thu, 04/09/2014 - 16:00

झकास.
छान रुपक, नेमके शालजोडीतले वगैरेमुळे खुमासदार झाला आहे
पुलं म्हणतात त्याप्रमाणे विनोद करणार्‍याने न्हाव्याचा आदर्श ठेवावा. दाढी तर गुळगुळीत झाली पाहिजे मात्र समोरच्याला जखम होता कामा नये!
हा लेख वाचून तेच आठवले .. मजा आली

+१

विवेक पटाईत Thu, 04/09/2014 - 17:04

महात्मा फुले आणि आजच्या पुरोगामी लोकांमध्ये फार अंतर आहे, आजचे पुरोगामी फक्त थोता चना बाजे घना या धर्तीचे आहे. शिक्षणाचे म्हणाल तर आर्य समाज आणि निकर धारी इत्यादी संस्थांनी देशाच्या कान्या-कोपर्यात शिक्षण पोहचविण्याचे कार्य केले आहे. सद्याचेच उदा: उत्तराखंड मध्ये वादळ फाटले, निकर धारी, डेरा सच्चा सौदा, पतंजली चे कार्यकर्ते जीवाजी परवा न करता तेथे कार्यरत होते. पण तथाकथित पुरोगामी अश्यावेळी दिसत नाही. कारण त्यांच्या जवळ खरे कार्यकर्ते नसतात (फक्त भाषणबाजी वाले असतात). शिवाय अंध श्रद्धा इत्यादी दूर करण्यामध्ये या संस्थांचे कार्य अनिस पेक्षा फार जास्त आहे. केवळ स्वामी रामदेव यांनी आपल्या ग्रामीण भाषेत ग्रामस्थांशी संवाद साधून अंधविश्वास इत्यादी दूर करण्याचे जे कार्य केले आहे देशातील सर्व पुरोगामी संस्थांपेक्षा जास्त आहे. (गेल्या १५ वर्षात हजारोंच्या संख्येने घेतलेल्या शिविरांद्वारे अर्थात प्रत्येक शिवीर मध्ये काही वेळ तरी अंधविश्वास इत्यादींवर ते बोलतातच आणि त्यांचा बोलण्याचा फरक पडतो. (लाखों लोकांनी बिडी, सिगारेट, तंबाकू सोडले असतील)

फरक एवढाच पुरोगामी लोकांना धर्म, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कळतच नाही. त्यांची वागणूक बहुधा घरात आणि बाहेर अलग-अलग असते. घरी मात्र १० बोटांत अंगूठी घालतील आणि पंचांग पाहिल्याशिवाय बाहेर पडणार नाही. असे दोतोंडी असतात पुरोगामी.
मी धार्मिक आणि श्रद्धावान व्यक्ती आहे पण अंधश्रद्ध नाही. आज पर्यंत कधी पत्रिका दाखविली नाही आणि मुलीच्या लग्नात ही पत्रिका दाखविली नाही. धर्मावर श्रद्धा असल्यामुळे कार्यावर ही श्रद्धा ठेवतो. गेल्या ३2 वर्षांच्या नौकरीत ९९.९० टक्के तरी ९च्या १५ मिनिटे आधी कामावर पोहचलो आहे. हाच फरक श्रद्धावान आस्तिक आणि पुरोगामी म्हणविणार्या लोकांमध्ये असतो.

सविता Thu, 04/09/2014 - 17:10

In reply to by विवेक पटाईत

प्रचंड सरसकटीकरण...असो...कशाला काय म्हणायचे या बेसिक मध्येच झोल असल्याने खोलात शिरत नाही.

स्वामी रामदेव - तुम्हाला बाबा रामदेव (पतंजली वाले) म्हणायचे आहे का?

असल्यास त्यांच्या योगाभ्यास इत्यादी बद्दल च्या ज्ञानाबद्दल निश्चितच आदर आहे पण आण्णांच्या आंदोलनाच्या आसपास त्यांचे वर्तन व भाषणे पाहता त्या मनुष्याचे पायही मातीचेच आहेत असे मत तयार होते.

मन Thu, 04/09/2014 - 17:14

In reply to by सविता

बाबा रामदेव -->>

अहंतागुणे सर्वही दुःख होतें ।
मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें ॥
सुखी राहतां सर्वही सूख आहे ।
अहंता तुझी तूंचि शोधूनि पाहें ॥

अहंतागुणे नीति सांडी विवेकी।
अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी॥
परी अंतरी अर्वही साक्ष येते।
प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते॥

सविता Thu, 04/09/2014 - 17:29

In reply to by बॅटमॅन

तुमच्या समोरचे चार लोक जे स्वतःला पुरोगामी म्हणतात किंवा अधिक अचूकपणे मांडायचे तर तुमच्या मनात जी काय या चार लोकांबद्दल प्रतिमा आहे त्यावरून हे मत आलेलं दिसतंय.

असो.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 17:33

In reply to by सविता

बहुतेकांची मते या दोहोंपैकी एका किंवा अंशतः दोहोंमधूनच आलेली असतात. स्वतःच्या प्रतिमेशी दुसर्‍याचा निष्कर्ष सुसंगत नसल्यामुळे जज करणं रोचक इ.इ.

पण माझ्या तुच्छ प्रतिसादास आवर्जून प्रतिप्रतिसाद देणं अजूनच उद्बोधक आहे. स्वतः जर स्वयंघोषित तथाकथित पुरोगामी नसाल तर बोचायचे कारण नाही.

सविता Thu, 04/09/2014 - 17:38

In reply to by बॅटमॅन

प्रत्येक वेळा "स्वयंघोषित", "तथाकथित" अशी शेपटे आणि शिंगे जोडल्याने आपण एका वेगळ्या सबसेटला रेफर करतोय असा आव आणणे हे ही उद्बोधक, रोचक (आणि अजून जी काय शेलकी विशेषणे पेराविशी वाटतील ती पेरून घ्या) इ.इ.!

बाकी जाता जाता: ही चर्चा नाही फक्त बोचकारणे चाललेय.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 17:43

In reply to by सविता

प्रत्येक वेळा "स्वयंघोषित", "तथाकथित" अशी शेपटे आणि शिंगे जोडल्याने आपण एका वेगळ्या सबसेटला रेफर करतोय असा आव आणणे हे ही उद्बोधक, रोचक (आणि अजून जी काय शेलकी विशेषणे पेराविशी वाटतील ती पेरून घ्या) इ.इ.!

बाकी जाता जाता: ही चर्चा नाही फक्त बोचकारणे चाललेय.

शेवटी सगळी टीका स्वतःवरच ओढून घ्यावयाची असेल तर तसे वाटण्याचे स्वातंत्र्य आमच्या उदात्त इ. लोकशाहीने तुम्हांला दिलेलेच आहे. साध्या मताची 'बोचकारणे' म्हणून संभावना करणे हेही दु:खद आहे. असतील आमची मते वेगळी, म्हणून आम्ही मांडूच नयेत काय? तुम्हांला पटले नाही म्हणून लगेच 'बोचकारणे'? हे मात्र अतिशय उद्बोधक आहे.

मन Thu, 04/09/2014 - 18:10

In reply to by बॅटमॅन

वरील प्रतिसादसदृश उल्लेखांत " तथाकथित " हे विशेषण व्यक्तीबद्दल वापरलेले असते. विचारांबद्दल नाही.
म्हणजे ते व्यक्तिगत होते. व्यक्तिगत रोखाची टिका ही "बोचकारणे" वाटण्यात काही चूक नाही.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 18:13

In reply to by मन

स्वतः स्वयंघोषित इ.इ. असू तर टीका बोचणे समजू शकतो. नपेक्षा नाही.

अन बाकी, कुणालाही काहीही वाटणे चूक नाही असा निष्कर्ष आजच की कालपरवा ऐसीवरच निघालाय की!

त्यामुळे व्यक्तीला उद्देशून काहीही बोलूच नये अशा फतव्याचाही निषेध असो. ही देखील हुकूमशाहीच आहे.

सविता Thu, 04/09/2014 - 18:21

In reply to by मन

हे बघा मला काही लोक टोकाचे वागतात, बोलतात असं वाटतं त्यामुळे ते लोक स्वतःला जे जे काय लेबल लावत असतील त्या लेबलची खिल्ली उडवणे माझे आद्य कर्तव्य आहे, समजलं?

मग ते लेबल आणि त्याचा अर्थ कितीही चांगला असू दे, भले ते करत असताना मी दुसरं टोक गाठू दे, चर्चेचे रुपांतर चिखलफेकीत होऊ देत, मला त्याची फिकिर नाही.

मला माझा विरोध मांडायचा आहे.

ओक्के?

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 18:24

In reply to by सविता

आपली ती चर्चा, दुसर्‍याची ती चिखलफेक.

आपली ती विधायक टीका, दुसर्‍याची ती खिल्ली.

शिवाय भारताला वाचवण्याच्या शक्यतेपासूनही आपण फार दूर आलेलो आहोतच. त्याची भीतीही दिवसेंदिवस वाढतच आहे. 'भूमीसंपादन' सुरू होईलही, कोणी सांगावे?

मन Thu, 04/09/2014 - 18:25

In reply to by बॅटमॅन

टीका व्यक्तीवर, वर्तनावर की विचारांवर ह्यावर त्यास चिखलफेक म्हणायचे की नाही ते अवलंबून आहे.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 18:27

In reply to by मन

टीका कशावर आहे यापेक्षा कशी आहे यावरच चिखलफेकीचे लेबल अवलंबून आहे. अमकातमका विचार येडझवा आहे इ. इ. म्हटले तरी ती चिखलफेकच ठरेल. निव्वळ विचारकेंद्री चर्चा असल्याने आपोआप जादूने चिखलमुक्त होईल ही कल्पना भाबडी आणि तितकीच उद्बोधक आहे.

मन Thu, 04/09/2014 - 18:35

In reply to by बॅटमॅन

निव्वळ विचारकेंद्री चर्चा असल्याने आपोआप जादूने चिखलमुक्त होईल
हे आमच्या वाक्याचं चुकीचं एक्स्ट्रापोलेशन होतय.
चर्चा निव्वळ विचारकेंद्री असेल तरच चिखलमुक्त होण्याची शक्यता आहे.
चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरली तर चिखलयुक्त होणार असे म्हणणे आहे.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 18:44

In reply to by मन

चर्चा निव्वळ विचारकेंद्री असेल तरच चिखलमुक्त होण्याची शक्यता आहे.
चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरली तर चिखलयुक्त होणार असे म्हणणे आहे.

डिपेंड्स. लेबले कुणालाही लावली तरी त्यांत फरक नाही. शिव्या त्या शिव्याच. त्यांचा रेसिपियंट कुणी जिताजागता मानव नसला म्हणून श्या द्यायचे लायसन मिळत नाय मनकाका, काय समजलेत?

चिखलफेक या शब्दाची व्याख्याच तुम्ही व्यक्तीकेंद्री करून टाकल्याने, त्यानुसार पाहता चर्चा विचारकेंद्री झाल्यावर चिखलमुक्त होणार हे तर स्वयंस्पष्टच आहे, नै का?

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 18:42

In reply to by अनुप ढेरे

शान्तं पापम्! संस्कृतात शिवी? हे तर औरंगजेबाने स्वतः देवळात जाऊन विधिवत पूजा वगैरे केल्याप्रमाणे.

वामा१००-वाचनमा… Thu, 04/09/2014 - 18:49

In reply to by बॅटमॅन

होय होय ते आलं लक्षात. पण किंचित अंतर्विरोध जाणवला. जिस्ट (ओव्हरॉल एफेक्ट) अगदी परफेक्ट आहे :)

अजो१२३ Fri, 05/09/2014 - 11:19

In reply to by वामा१००-वाचनमा…

एक मराठाविरोधी राजनेता व एक क्रूर व्यक्ति म्हणून मला औरंगजेबाबद्दल चीड आहे. पण तितकं सोडलं तर तो मला ठिक होता. तो हिंदू मंदिरांत अभिषेक इ करे. स्वतः वैगेरे पण राही. बर्‍यापैकी सेक्यूलर म्हणायला पाहिजे.
----------------
अवांतर-
त्याने आपल्या मुलीला शिक्षण दिले, युद्धकला शिकवली, राजकारण शिकवले, अर्थकारण शिकवले, बुरखा घालू दिला नाही, इ. इ. झेबुन्निसा-औरंगजेब यांचे नाते सांगणारी (मराठीत) एक कादंबरी लहानपणी वाचल्याचे आठवते. ती दयाळू होती. औरंगजेबाला राग येई तेव्हा ती मध्यस्ती करे. आग्र्याला दरबारात शिवाजी महाराजांचा (ते वाकणे वैगेरे इ साठी) औरंगजेबाला प्रचंड राग आलेला तेव्हा तिने मधे पडून माहौल शांत केलेला! दरबारात तिचा चांगलाच वट होता.

मेघना भुस्कुटे Fri, 05/09/2014 - 11:20

In reply to by अजो१२३

तुम्ही 'आलमगीर'बद्दल बोलताहात का?

आपण कधी बदलणार आपल्या सवयी? कादंबर्‍या वाचून इतिहास. असो. असो.

अजो१२३ Fri, 05/09/2014 - 11:26

In reply to by मेघना भुस्कुटे

आपण कधी बदलणार आपल्या सवयी? कादंबर्‍या वाचून इतिहास. असो. असो.

माझ्या कोणत्याही प्रतिसादाला संदर्भमूल्य नसतं. माझा तो प्रांत नाही. माझा कोणताही प्रतिसाद कोणत्याही कामासाठी प्रमाण म्हणून वाचू नये. त्याला तसा बनवण्याची माझी मानसिकता नाही.

अजो१२३ Fri, 05/09/2014 - 11:37

In reply to by अजो१२३

"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असे म्हणणार्‍या सामान्य जनास "माय फूट" म्हणणारा पुरोगामी आपल्या जागी कसा उचित आहे हे सांगणार ऋषिकेशचा एक धागा आहे. माझा सबब प्रतिसाद त्याचेच अ‍ॅडवान्स्ड व्हर्जन आहे.

मन Fri, 05/09/2014 - 11:32

In reply to by मेघना भुस्कुटे

श्रीयुत अजो,

मृत्युंजय, राधेय,कौतेंय, झालच तर थोडे कमी परिचित युगंधर, दशानन ,धनंजय हे सर्व वाचून मीही भारावून गेलेलो आहे.
शिवाय छावा, श्रीमान योगी, राऊ, मंत्रावेगळा, स्वामी ह्यांनी मी माझं इतिहासाबद्दलचं काय ते अंतिम मत बनवून टाकलेलं आहेच.
मी आता जाज्वल्ल्य अभिमानने पेटून उठलो आहे.

शिवाय विविध लोकांची आत्मचरित्र वाचून ते कसे थोर होते; त्यांच्या हातून अनवधानाने "चुका" झाल्या; पण त्यांनी जाणीवपूर्वक "गुन्हे" केले नाहित;
"चोर्‍या" तर अजिबात केलेल्या नाहित हे मला पटलय. शिवाय त्यामुळेच मधुकर तोरडमल - मोहन वाघ , मोहन जोशी - मच्छिंद्र कांबळी - मोहन वाघ ,
पणशीकर - अत्रे - रांगणेकर ह्या सगळ्या सगळ्यांबद्दल मी त्यांच्या-त्यांच्या स्वकथनातून मिळवलेली माहिती बरोबर आहे.
सर्वच एकावेळी खरे बोलत आहेत!!!
जय हो.

अजो१२३ Fri, 05/09/2014 - 11:43

In reply to by मन

यातलं मी फक्त राधेय हे एकच पुस्तक वाचलं आहे. इतका उलटसुलट इतिहास माहित व्हावा इतकी पुस्तकं मी वाचतच नाही. मी एक कॅज्यूअल रिडर आहे. इतिहास अभ्यासक इ नाही. "कादंबरी आणि इतिहास" हे वेगळे असतात, ऐतिहासिक कादंबरीत सगळं झूठ असतं किंवा जितकं काल्पनिक असतं ते बोल्ड केलेलं असतं, इ इ मला काही माहित नाही. जे लिहिलं आहे ते प्रमाण आहे असं मानून चालतो.

मन Fri, 05/09/2014 - 11:46

In reply to by अजो१२३

लिहिलं आहे ते प्रमाण आहे असं मानून चालतो
"तुम्ही मला दहा हजार रुपये देणं लागता " असं मी इथे जाहिर जालावर लिहितो.
मानता प्रमाण?

ऋषिकेश Thu, 04/09/2014 - 17:18

In reply to by विवेक पटाईत

जे साटल्य तुम्ही मुळ लेखनात साधले आहे, प्रतिसादांत त्यालाच का धुळीस मिळवत आहात?

आजचे पुरोगामी फक्त थोता चना बाजे घना या धर्तीचे आहे

वगैरे म्हणताना कोणाला तुम्ही पुरोगाम्यांचे प्रतिनिधी धरले आहे कल्पना नाही, पण असो. प्रतिसाद अगदीच गंडलाय