वर्णव्यवस्था आणि आयुष्यमान
वेदकाळातल्या लोकांना एकतर बुद्धी असावी वा नसावी वा थोड्या फार प्रमाणात असावी. त्यांना जितकी बुद्धी होती ती जैविक दृष्ट्या आजही स्थिर आहे असे मानायला हरकत नसावी.
पुरातन काळातल्या लोकांचे जीवनमान किती होते याचे उत्तर ३०-४० वर्षे असे दिले जाते. मग आश्रम पद्धतीत आयुष्य १०० वर्षे कसे? त्यांना आकडेच कळत नसावेत असे म्हणता येत नाही. कोल्हटकर म्हणतात कि त्यांना २ चे वर्गमूळ हा काँप्लेक्स नंबर बर्यापैकी माहित होता. मग शंभर हा पूर्णांक माहित्/कळत असणारच. चला असे मानू कि आकडा कळत होता पण त्यांनी जे काही सामाजिक लिहिले आहे ते ते खोटे लिहित. चला हे ही मान्य करून चालू. पण मग त्यांनी चार सामाजिक वर्ण बनवले हे ही खोटे माना. मग जाती (जातीच काय, वर्ण देखिल) किमान त्या काळात नव्हत्या असे मानावे लागेल.
एखाद्या काळातल्या सर्व वाईट गोष्टी खर्या आणि चांगली गोष्ट एकही खरी नाही ही भूमिका किती विवेकवादी, किती समतावादी, किती सत्यवादी, आणि किती अपॉलिटिकल?
एखाद्या काळातल्या सर्व वाईट
एखाद्या काळातल्या सर्व वाईट गोष्टी खोट्या आणि चांगली गोष्ट एकही खोटी नाही ही भूमिका किती विवेकवादी, किती समतावादी, किती सत्यवादी, आणि किती अपॉलिटिकल?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
या एकाच मुद्द्याचा वेगळा धागा
या एकाच मुद्द्याचा वेगळा धागा का बरे काढला असावा? याचा/असा विचार करतोय.
बाकी चालुदे .. माझा पास!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एखाद्या काळातल्या सर्व वाईट
Exactly who has taken that stand? रोख कळला नाही.
मत
समजा वर्णजर्जर आणि शतकसंपन्न लोक प्राचीन भारतात अस्तित्त्वात होते. पण माझ्या आजुबाजूला जात या संस्थेला मोठेच सामाजिक स्थान आहे आणि नव्वदीच्यावर जगणारे फारच कमी लोक दिसतात. माझ्या पूर्वजांच्या चार-पाच पिढ्यांपर्यंत शंभरी गाठलेले कुणीच नव्हते. सर्व जात मात्र पाळत असत. यावरून वर्णजर्जरतेचे आयुष्य शतकसंपन्नतेपेक्षा अधिक आढळते. कोणी जाणकार काही वाजवी विश्लेषण करून एका लक्षणाचा (शतकी आयुष्य) र्हास आणि दुसर्या लक्षणाची भरभराट (जन्मनिर्धारीत जातीव्यवस्था) या दोन गोष्टी एकत्रितपणे स्पष्ट करू शकल्यास त्या कधीकाळी एकत्रित नांदत असतील या शक्यतेला विचारात घेता येईल.
रजत, स्वर्ण, हीरक, प्लॅटिनम जयंती
यू.एस. मध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या वाढदिवसांकरिता नावे आहेत, आणि त्याबाबत काहीकाही परंपरा देखील आहेत (विकिपीडिया दुवा).
रजत : २५ वर्षे
सुवर्ण : ५० वर्षे
हीरक : ६० वर्षे
...
यू.एस.मध्ये वैवाहिक जीवनाचा अवधी विचारला तर मग लोक >६० वर्षे सांगत नाही.
(सरासरी/मध्यवर्ती)* १५ वर्षे इतका काहीतरी सांगतात. काहीतरी गडबड आहे खास. (सेन्सस ब्यूरोचा पीडीएफ दुवा)*अशा चर्चांमध्ये असले तपशील निरर्थक असतात, म्हणून शब्द खोडला आहे. मुळातल्या चर्चासूत्रातही तो तपशील घातलेला नाही. "सरासरी" या कल्पनेचा २च्या वर्गमूळाइतका संदर्भ या चर्चेत नाही.
गडबड आहे, असे समजले तर अमेरिकेबद्दल दोनच पर्याय उद्भवतात :
(पर्याय १) हीरक-जयंती सोहळा वगैरे तपशील चुकीचे आहेत आणि असे कुठले सोहळे होतच नाहीत. आणि सामाजिक रूढींबाबत उपलब्ध असलेली सर्व माहिती खोटी आहे. त्यामुळे यू.एसमध्ये वर्णभेद कायम ठेवणारे कायदे होते, असे वर्णनही खोटे आहे.
(पर्याय २) हीरक जयंती सोहळा होतो हे सत्य मानले, तर अमेरिकेत वैवाहिक स्थितीचा अवधी ६० वर्षे किंवा अधिक होता हे सत्य आहे असे मानावे लागते.
(कदाचित आणखी पर्याय आहेत, पण चर्चाप्रस्तावाच्या अनुषंगाने ते पर्याय सुचत नाहीत.)
--------
(१) यू.एस.मधील वैवाहिक जीवनाचा अवधी/जिम क्रो कायदे आणि (२) वैदिक काळातील आयुष्यमान/वर्णभेद या दोन्ही बाबतीतल्या युक्तिवादांत घोटाळा आहे, अशी सहमती व्यक्त करतो.
लेखाचा सुर "अमेरिकन लोक लग्ने
लेखाचा सुर "अमेरिकन लोक लग्ने तर ५-१० वर्षेच टिकवत पण चंद्रावर जाऊन आले असे खोटे खोटे म्हणत असे म्हणू नये " हा आहे. काही बाबतीत लोक कशाला काहीही म्हणतात हे मान्यच आहे, तो विषय नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पुरातन काळातल्या लोकांचे
हे थोडं समजावून घ्यायला हवं. समजा हा आकडा ३५ वर्षं आहे असं धरून चालू. तो बहुतेक वेळा जन्माच्या वेळी अपेक्षित आयुष्य या प्रकारचा असायचा. सगळेच लोक ३५ वर्षांचे झाले की मरत असा नव्हे. मरणाच्या वयाची सरासरी = ३५. यात अनेक बालकं १ वर्ष किंवा ५ वर्षं पूर्ण होण्याआतच मरत. ही संख्या मोठी होती (सुमारे ३०%) त्यामुळे सरासरी विशेष कमी होत असे. वरच्या आलेखात एकाच वर्षी असलेली विविध वयांच्या लोकांचं अपेक्षित जीवनमान दिलेलं आहे. १८५० साली जन्मतः अपेक्षित वय ३८ होतं. पण दहा वर्षांपुढे जगलेल्यांसाठी ते ५८ पेक्षा अधिक होतं. त्यामुळे वयस्क लोकच त्या काळी नव्हते असं म्हणता येत नाही.
हा भाग मला कळला नाही. आश्रम पद्धतीत १०० वर्षांचा उल्लेख कशा प्रकारे आला आहे हे सांगाल का? संदर्भ देण्याची गरज नाही, नुसती माहिती हवी आहे.
वरच्या आलेखात क्ष आणि य
वरच्या आलेखात क्ष आणि य अक्षांवर काय आहे? % लोकसंख्या आणि वय पैकी काय कुठे? सगळे ग्राफ कन्व्हर्ज होत आहेत तिथे पाहिले तर ८०% लोक ८५ वर्षे जगत असा अर्थ निघतोय.
ब्रह्मचर्य, ग्रहस्थ,...., वानप्रस्थ, हे प्रत्येकी २५ वर्षाचे होते असे ऐकून आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आलेखाच्या क्ष अक्षावर वय आहे,
आलेखाच्या क्ष अक्षावर वय आहे, आणि य अक्षावर अपेक्षित आयुष्य आहे. म्हणजे १८५० साली जन्मलेल्या मुलाचं अपेक्षित आयुष्य होतं ३८. तर त्यावेळी दहा वर्षांच्या मुलाचं अपेक्षित आयुष्य होतं ५८. याचं कारण कुठच्याही वयाच्या मृतांच्या वयांची सरासरी काढली तर ती कमी येते. कारण ० ते १० या वयोगटात मरणाऱ्यांचं प्रमाण अधिक असतं. जर १० वर्षे जगून त्यानंतर मरणारांच्या वयांची सरासरी काढली तर ती जास्त येते. जसजसं आपण हे १०, २० करत ८० पर्यंत पोचतो तोवर कमी प्रमाणात माणसं शिल्लक राहतात, आणि उच्चतम वयोमर्यादेपोटी आकडे फार बदलत नाहीत. त्यामुळे हे ग्राफ कन्व्हर्ज होणं साहजिक आहे.
अरुण जोशींचे म्हणणे असे दिसते
अरुण जोशींचे म्हणणे असे दिसते की तुम्ही वेद (किंवा जुने ग्रंथ) हे अॅज इज स्वीकारा किंवा नाकारा. म्हणजे १०० वर्षे आयुष्य खोटे असेल तर वेदच टाकून द्या मग वर्णव्यवस्था होती असेही मानू नका (पक्षी वर्णव्यवस्था नव्हतीच सगळे समान होते असे माना).
असे म्हणण्याला काय आधार ते कळत नाही. वर्णव्यवस्था नव्हती असे मानले तरी समानता होती असे का मानावे? वर्णव्यवस्था (असमनतेचा उगम म्हणून) नव्हती असे अनेक विद्वानांनी आधीच सांगितलेले आहे. असमानता होतीच. जाती होत्याच.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
त्यांचे म्हणणे आणि नाडी पट्ट्या
मला त्यांचे म्हणणे आणि नाडी पट्ट्या यांत विलक्षण साम्य दिसू लागले आहे.
नाडी पट्ट्यांवर अक्षरे तर बदलतातच, लिहिलेल्या अक्षरांचा अर्थही वेगवेगळा लागु शकतो आणि तो काही मोजक्यांनाच वाचता येतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माझे म्हणणे आपण अचूक मांडले
माझे म्हणणे आपण अचूक मांडले आहे.
असेच तर लेखातले मत मी मागे घेतो. म्हणजे अगोदर जाती, नंतर वर्ण. माहिती मला नविन आहे, पण असमानता सतत होती हे निश्चित करते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>>म्हणजे अगोदर जाती, नंतर
>>म्हणजे अगोदर जाती, नंतर वर्ण. माहिती मला नविन आहे,
नंतर वर्ण असे म्हणण्याला काही अर्थ नाही. वर्ण हे केवळ क्लासिफिकेशन आहे. मानव आणि उंदीर हे दोन्ही सस्तन प्राणी आहेत असे म्हटल्यासारखे.
त्यांचे सस्तन असे क्लासिफिकेशन होण्याआधीही ते मानव आणि उंदीर होते आणि नंतरही ते मानव आणि उंदीर आहेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मी म्हणालो कि अगोदर चारच सैल
मी म्हणालो कि अगोदर चारच सैल जाती/वर्ण होत्या (म्हणूनच/तरीही वेदकालावर टिका होते). त्यानंतर त्या खूप जास्त आणि कडक जाती झाल्या (म्हणून जातींचे खापर वेदकाळातल्या लोकांच्या माथी मारले जाते).
आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे ते इतर शब्दांत सांगाल काय? खूप जास्त कडक आणि प्रकारांच्या जातीय विषमतेचा उद्गम वेदकालापूर्वी झाला असे का? जातीय विषमता (जी 'इतकी' वाईट इतर देशांत नाही/नव्हती)तिच्या उद्गमाचे खापर भारतात कोणत्या काळातल्या लोकांच्या माथ्यावर फोडायचे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.